१७ एप्रिल २०२२

नागरिकत्व

नागरिकत्व
काही प्रमुख देशांच्या कायद्यांची माहिती
ब्रिटिश नागरिकत्व पुढील मार्गांनी प्राप्त होते
अनुच्छेद ५ ते ९ यांचा एकत्र विचार केला असता, घटनेचा अंमल सुरू होण्याच्या वेळी पुढील व्यक्ती भारताच्या नागरिक होत
नागरिकत्व अधिनियम १९५५ अन्वये नागरिकत्व पुढील मार्गांनी मिळू शकते
लोकांना आपापल्या देशात मिळालेला राजकीय दर्जा म्हणजे नागरिकत्व असे स्थूलमानाने म्हणता येईल. नागरिक म्हणजे नगराचा रहिवासी. प्राचीन काळी एकेका शहरापुरती शासनसंस्था मर्यादित असायची. म्हणून शहराचा रहिवासी तो शासनसंस्थेचा सभासद किंवा घटक मानला जायचा.

पुढे शासन-संस्थेचे क्षेत्र मोठ्या प्रदेशावर पसरले. लहानमोठ्या प्रदेशांतील समाजाला देश ही संज्ञा प्राप्त झाली. एका देशात किंवा शासनसंस्थेच्या अधिकारक्षेत्रात राहणारे ते सगळे त्याचे नागरिक मानले जाऊ लागले. आधुनिक काळात नागरिकत्व म्हणजे शासनसंस्थेचे सदस्यत्व आणि नागरिक म्हणून असलेले हक्क व जबाबदाऱ्या यांचा समुच्चय, असे म्हणता येईल.

नागरिकत्व’ ही संकल्पना कायदेशीर आहे आणि तिला राजकीय व नैतिक अधिष्ठान आहे. शासनसंस्था ही नागरिकांची बनलेली असते. विशिष्ट भूप्रदेशात राहणाऱ्या समुदायाचे राजकीय संघटन म्हणजे शासनसंस्था. या संघटनेचा उद्देश समाजाचे स्थैर्य, स्वास्थ्य आणि सातत्य टिकविणे व त्या आधारे व्यक्तीच्या विकासाला अवसर मिळेल अशी चौकट व वातावरण निर्माण करणे हे आहे.

प्रत्येक व्यक्तीचे तसेच सर्वांचे सामूहिक कल्याण साधता यावे, या दृष्टीने समाजव्यवहारांचे नियमन करणे व परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे हे शासनसंस्थेचे कर्तव्य होय. ते नीट पार पडायचे, तर नागरिकांनी शासनसंस्थेचे नियम पाळले पाहिजेत व तिचा कारभार चालविण्यातील आपला वाटा उचलला पाहिजे. शासनसंस्थेचा उद्देश व्यक्तिमात्राच्या व एकंदर मानवजातीच्या हिताचा असल्याने तिचे सभासदत्व केवळ अपरिहार्यच नव्हे, तर श्रेयस्कर आहे. म्हणून नागरिकत्व ही संकल्पना संस्कृतिसंवर्धनाला उपकारक व पोषक ठरणारी आहे.

मान व समाज राजकीय दृष्ट्या संघटित होऊ लागण्यापूर्वीच्या अवस्थेशी तुलना केली म्हणजे, नागरिकत्वाची ही सांस्कृतिक बाजू स्पष्ट होईल. आदिम मानव जंगले व श्वापदे यांत अलगअलग राहत असे. मोठा मासा लहान माशाला गिळतो, तसाच न्याय आदिम माणसामाणसांतही चालायचा. यावरूनच ‘जंगलचा कायदा’ हा वाक्‌प्रचार रूढ झाला. अशा स्थितीत माणसाला सुरक्षितता वाटणे व स्वतःच्या अंगच्या शक्तींचा व गुणांचा विकास करून घेणे अशक्य होते. हळूहळू ही अवस्था काहीशी आपातातः, तर काही अंशी माणसाच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांनी बदलली.

शासनसंस्था विकसित झाली. राजेशाहीत राजा व प्रजा यांच्यातील नाते सत्ताधारी आणि त्यांचे आज्ञाधारक सेवक या प्रकारचे होते. पुढे मात्र प्रजाजन हे नागरिक आहेत व त्यांचाच शासनावर काहीएक अधिकार आहे, ही कल्पना रूढ झाली. आधुनिक काळात शासनसंस्थेबरोबरच नागरिकत्व आले. प्रत्येक माणसाने आपले स्वतःचे काम करीत करीत शासनसंस्थेचा घटक या नात्याने येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडायची पद्धत वाढू लागली. त्यामुळे सांस्कृतिक जीवन विकसित झाले. विद्या व कला यांचा विकास झाला.

नागरिकत्वाचा पाया अशा प्रकारे नैतिक व सांस्कृतिक असला, तरी तिची जातकुळी राजकीय आहे. नागरिक हा समाजातील एक व्यक्ती किंवा अर्थव्यवहारात उत्पादक, उपभोक्ता या नात्याने भाग घेणारा असला, तरी त्याचे नागरिकत्व हे शासनसंस्थेशी म्हणजेच समाजाच्या राजकीय संघटनेशी निगडित आहे. व्यक्ती जन्मल्याबरोबर ती नागरिक बनते. नागरिकत्वाचे हक्क तिला मिळतात व त्याचप्रमाणे काही जबाबदाऱ्याही तीवर येऊन पडतात.

शासनसंस्थेवर निष्ठा ठेवणे हे नागरिकाकडून अपेक्षित असलेले अगदी प्राथमिक कर्तव्य होय. कर भरणे, फौजदारी कायद्याचे पालन करणे वगैरे काही जबाबदाऱ्या अनिवार्य असतात, तर राजकारणात भाग घेणे वगैरेंसारख्या जबाबदाऱ्या अंगावर घेणे, न घेणे नागरिकाच्या मर्जीवर अवलंबून असते. परकीय आक्रमण व अंतर्गत गुन्हेगारीपासून संरक्षण मिळणे, हा त्याचा प्राथमिक हक्क आहे. शिवाय विविध मूलभूत हक्क, राजकारणात भाग घेण्याला कमीअधिक वाव यांसारखे हक्क त्या समाजाची रचना, परंपरा, कायदा वगैरेंवर अवलंबून असतात.

शासनसंस्थेचा विकास होत गेला, तशी नागरिकत्वाची संकल्पना स्थिरावत गेली. शासनसंस्था या एकेका राष्ट्रापुरत्या विकसित झाल्या. राष्ट्रांची परस्परांतील पृथगात्मता वाढत गेली. त्यामुळे एक व्यक्ती एका वेळी एकाच राष्ट्राची नागरिक असणे अपरिहार्य झाले. कायदेशीर दृष्ट्या नागरिकत्व ही एकेरी कल्पना आहे. मात्र हीत काही कारणांमुळे अपवाद निर्माण झाले.

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे संविधान संघराज्यात्मक असून राज्याचे नागरिकत्व व संघराच्याचे नागरिकत्व या दोन वेगळ्या कल्पना मानल्या गेल्या आहेत. एका राज्यातील नागरिकाला संघराज्याच्या संदर्भातही नागरिक मानले जाते पण दुसऱ्याराज्यात मात्र त्याला नागरिक मानले जाईलच असे नाही. ते राज्याच्या कायद्यावर अवलंबून आहे.

राष्ट्रकुलातही दुहेरी नागरिकत्व आहे. ब्रिटिश साम्राज्याच्या विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळी त्या साम्राज्याच्या गुलामगिरीतून मुक्त झालेली राष्ट्रे व पूर्वकालीन सम्राट –इंग्लंड हे राष्ट्र यांचे मिळून राष्ट्रकुल बनले आहे. या समूहातील राष्ट्राचा नागरिक हा त्या राष्ट्राचा शिवाय राष्ट्रकुलाचाही नागरिक मानला जातो पण राष्ट्रकुलाचा नागरिक या नात्याने फारच थोडे हक्क आहेत. जागतिक राज्याची कल्पना जेव्हा मूर्त स्वरूपात येईल, तेव्हा काही काळ राष्ट्रीय आणि जागतिक असे दुहेरी नागरिकत्व चालू राहील.
राष्ट्र व शासनसंस्था यांच्या कार्यकक्षा समान असल्याने राष्ट्रीयत्व व नागरिकत्व समान आहेत, असा समज होतो. जे नागरिक असतात त्यांना या देशाचे राष्ट्रीयत्व प्राप्त असतेच पण त्या देशाचे राष्ट्रीयत्व असूनही नागरिकत्व मात्र नाही अशी अवस्था तर्कतः संभवते आणि प्रत्यक्षातही आढळते.

अमेरिकेच्या कायद्यात नागरिक नसलेले ‘राष्ट्रीय’ (नॅशनल) यांच्यासंबंधी तरतुदी आहेत. इंग्लंडच्या १९४८ च्या राष्ट्रीयत्व अधिनियमा (नॅशनॅलिटी ॲक्ट) प्रमाणे इंग्लंडच्या पालकत्वाखाली जे देश किंवा प्रदेश आहेत, त्यांच्या नागरिकांना इंग्लंडचे राष्ट्रीय मानले जाते; पण इंग्लंडच्या नागरिकत्वाचे अधिकार मात्र त्यांना नाहीत. काही आफ्रिकी देशांत व श्रीलंकेत जाऊन वसलेल्या काही भारतीयांना त्या देशाचे नागरिकत्व त्या त्या देशांच्या कायदेशीर तरतुदींमुळे मिळालेले नाही, म्हणून ते लोकही कुठलेच नागरिक नसलेले भारतीय राष्ट्रीय आहेत.

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार पितृराष्ट्राला दुसऱ्यादेशात राहणाऱ्या आपल्या राष्ट्रीयांच्या संपत्तीच्या संरक्षणाविषयी करवाई करता येते. त्या देशाने त्या राष्ट्रीयांना ‘परत घ्या’ म्हणून सांगितले, तर त्यांना परत घेण्याची पितृराष्ट्राची जबाबदारी आहे आणि आपले राष्ट्रीय दुसऱ्या देशात निर्यात करण्याचा म्हणजे कायमचे पाठवून देण्याचा अधिकार कुठल्याच देशाला नाही. नागरिकत्वहीन राष्ट्रीयांची अवस्था शोचनीय असते. त्यांना सर्वसाधारण हक्क (उदा., जीवित व वित्ताचे संरक्षण) असतात; पण राजकीय हक्क (उदा., मतदानाचा, निवडणुकीला उभे राहण्याचा इ.) कोठेच नसतात.

म्हणून असले त्रिशंकूसारखे नागरिकत्वहीन राष्ट्रीय ठेवायचे नाहीत, त्यांना कुठल्या ना कुठल्या देशाचे नागरिकत्व द्यायचे किंवा घ्यायला लावायचे, अशी सध्याची प्रवृत्ती आहे. उलट साम्यवादी चीनने आपल्या देशाचे राष्ट्रीय दुसऱ्या देशात वसत असले व तेथील नागरिकत्व त्यांनी घेतले असले, तरी ते आपल्या म्हणजे पितृदेशाचे नागरिक आहेत असे मानले आहे.

शासनसंस्थेच्या कार्यकक्षेत असलेल्या व्यक्ती नागरिक तरी असतात किंवा ‘परकीय’ असतात. हे ‘परकीय’ बहुधा दुसऱ्या देशाचे नागरिक असतात; पण वर उल्लेखिल्याप्रमाणे काहीजण कुठलेच नागरिक नसतात. एका देशाचे नागरिक दुसऱ्या देशात कामधंद्याच्या किंवा शिक्षण, प्रवास वगैरेंच्या निमित्ताने गेलेले असतात.

काहीजण अल्पावधीत मायदेशी परततात, तर काहीजण स्थायिक होतात; पण स्थायिक झालेल्या देशाचे नागरिकत्व त्यांनी स्वीकारले नाही, तर मूळ पितृदेशाचे त्यांचे नागरिकत्व चालू राहते. परकीयांना काही हक्क असतात (उदा., जीवितवित्ताचे संरक्षण इ.); पण राजकीय हक्क नसतात. परकीयांच्या पितृदेशाशी युद्ध सुरु झाले, तर त्यांना परकीय शत्रू म्हणून घोषित करण्याचा, त्यांच्यावर अनेकविध नियंत्रणे घालण्याचा, त्यांची संपत्ती जप्त करण्याचा किंवा गोठवण्याचा अधिकार वस्तीच्या देशाला असतो. जे परकीय ‘शत्रू’ म्हणून घोषित केलेले नसतात, ते मित्र मानले जातात.

कायद्याच्या दृष्टीने नैसर्गिक मानवी व्यक्तीप्रमाणे क्वचित संस्थेला (उदा., कंपनी, कॉर्पोरेशन, संस्था) व्यक्ती म्हणून मानले जाते; पण कृत्रिम व्यक्तीला नागरिकत्वाचे सर्व हक्क प्राप्त होत नाहीत. किंबहुना कृत्रिम व्यक्तीला कुठले हक्क व अधिकार द्यावयाचे, याची तरतूद काही देशांनी आपल्या कायद्यात केली आहे.

नागरिकत्व मुख्यतः जन्माने प्राप्त होते. त्या देशात किंवा त्या देशाचे नागरिक असलेल्या मातापित्यांच्या पोटी जन्म होणे एवढ्याने व्यक्तीला त्या देशाचे नागरिकत्व प्राप्त होते; पण नागरिकत्व बदलता येते. स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी दुसऱ्या देशाच्या नागरिकांबरोबर लग्न केल्यास त्यांचे मूळ नागरिकत्व संपते व पतीच्या देशाचे नागरिकत्व त्यांना प्राप्त होते. मात्र अलीकडे या संकेतात बदल होत असून लग्नाने स्त्रीच्या नागरिकत्वात बदल होऊ नये, अशी तरतूद काही देशांनी केली आहे. प्रौढ व्यक्तीला स्वेच्छेने एका देशाचे नागरिकत्व सोडून देऊन दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेता येते; पण ही सर्व प्रक्रिया त्या देशाच्या कायद्यात नमूद केलेल्या पद्धतीनुसार व्हायला हवी. नव्याने स्वीकारलेल्या नागरिकत्वाचा पुरावा दिला जात नाही, तोपर्यंत जुने नागरिकत्व त्याच्या पित्यावर अवलंबून असते. पित्याचे नागरिकत्व बदलले, तर त्याचेही बदलते. पिता आपल्या अज्ञान मुलाला आपल्यापेक्षा वेगळ्या देशाचे नागरिकत्व देववू शकत नाही.

शासनसंस्थेच्या कार्यकक्षेत राहणारे ते सर्व नागरिक (परकीय सोडून), ही भूमिका आज मान्य झाली असली; तरी पूर्वी काही राज्यांत तशी मान्यता नव्हती. विशेषतः ग्रीक नगरराज्यांत जे जमिनीचे मालक होते त्यांना नागरिक म्हटले जाई व जमिनीवर काम करणाऱ्यांना गुलाम मानले जाई. त्यांना नागरिकत्वाचे हक्क नसत. हळूहळू ही भूमिका बदलत गेली. जीवितवित्ताचे संरक्षण, समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत भाग घेण्यास वाव, नोकरीधंद्यात प्रतिबंधाचा अभाव वगैरे हक्क सर्वांना मिळाले; परंतु राज्यकारभारात भाग घेण्याचा हक्क मात्र थोड्याच लोकांना देण्याचा आग्रह चालत राहिला.

लोकशाही राज्यव्यवस्था स्वीकारलेल्या फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांसारख्या देशांतसुद्धा मतदानाचा हक्क संपत्ती असलेल्या नागरिकांपुरता मर्यादित होता. न्यूझीलंड वगळता स्त्रियांना तर बहुतेक ठिकाणी मतदानाचा हक्क पहिल्या महायुद्धापर्यंत मिळालेला नव्हता. राज्यकारभाराची सूत्रे समजदार लोकांच्या हाती राहावीत आणि समजदार तेच की जे पुरुष संपत्तिवान आहेत, अशी समजूत खूप दिवस प्रभावी होती. दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र बहुतेक सर्व लोकशाहीवादी देशांत लिंग, वंश, संपत्ती वगैरे भेदांचा नागरिकांच्या समानतेवर परिणाम होऊ देण्याचे कारण नाही, अशी भूमिका मान्य झाली

नागरिकत्व हे प्रदेशविशिष्ट असते. एका देशात राहणारे ते नागरिक असे सर्वसाधारणपणे मानले जाते; पण याला अपवाद आहेत. हिटलरच्या काळात केवळ सेमिटिक वंशाच्या लोकांनाच नागरिकत्वाचे अधिकार होते, ज्यूंना नागरिकत्व नव्हते. ब्रह्मदेशाच्या राज्यघटनेनुसार ज्यांची माता व पिता दोन्ही ब्रह्मदेशाच्या स्थानिक वंशांपैकी एका वंशाचे आहेत, त्यांनाच नागरिकत्वाचे हक्क मिळतात.

नागरिकत्व ही कायदेशीर संकल्पना असलेल्या बहुतेक देशांनी त्याबाबतचे कायदे केलेले आहेत. नागरिक कुणाला म्हणावे व त्या देशाचे नागरिकत्व कसे प्राप्त करून घेता येते, यांविषयीच्या तरतुदी त्यात असतात.

काही प्रमुख देशांच्या कायद्यांची माहिती
अमेरिकेच्या संविधानात चौदाव्या दुरुस्तीने नागरिकत्वाविषयी तरतूद करण्यात आली आहे. त्या दुरुस्तीच्या पहिल्या अनुच्छेदात म्हटले आहे, ‘युनायटेड स्टेट्समध्ये जन्मलेल्या किंवा स्वीकृत करून घेतलेल्या (नॅचरलाइज्ड) आणि त्याच्या अधिकारकक्षेला बाध्य असलेल्या सर्व व्यक्ती युनायटेड स्टेट्‌सच्या नागरिक होत आणि ते ज्या राज्यात राहतात, त्याच्याही त्या नागरिक होत’.

एखादा नवा प्रदेश अमेरिकेत सामील झाला, तर तेथील नागरिकांना अमेरिकन नागरिकत्व देण्याची तरतूद केली जाते, तसेच अमेरिकन काँग्रेस कायदा करून एखाद्या समूहाला नागरिकत्व देऊ शकते.

ग्रेट ब्रिटनमध्ये नागरिकत्वविषयक सर्व मुद्यांचे नियमन राष्ट्रीयत्व अधिनियम १९४८ या कायद्याने केले जाते.

ब्रिटिश नागरिकत्व पुढील मार्गांनी प्राप्त होते
(अ) जन्म, (आ) नोंदणी, (इ) स्वीकृतिकरण, (ई) नव्या प्रदेशाचे सामीलीकरण, जन्माबाबत अमेरिकेसारखेच अपवाद आहेत.

ऑस्ट्रेलिया हे संघराज्य असले, तरी अमेरिकेप्रमाणे तेथे दुहेरी नागरिकत्व नसून भारताप्रमाणे एकेरी आहे. तेथील राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व अधिनियम १९४८ (नॅशनॅलिटी अँड सिटिझनशिप अक्ट), हा ब्रिटिश कायद्यासारखाच आहे

कॅनडातही प्रांतिक नागरिकत्व वेगळे नसून सर्व संघराज्यात एकच नागरिकत्व आहे. कॅनॅडियन सिटिझनशिप ॲक्ट १९४६ अन्वये नागरिकत्व जन्माने किंवा नोंदणी-दाखल्यानुसार मिळते. नोदंणी-दाखला मिळण्याची पद्धती स्वीकृतिकरणासारखी आहे.

ब्रह्मदेशात घटनेतच नागरिकत्वाविषयी तरतुदी आहेत. स्वीकृतिकरणासाठी मातापिता वा आजी-आजोबा यांपैकी कोणीतरी एकजण ब्रह्मी वंशांपैकी असला पाहिजे, अशी अट आहे.

श्रीलंकेत नागरिकत्वाचे १९४८ व १९४९ असे दोन कायदे असून त्यांनुसार नागरिकांचे तीन वर्ग पडतात : (अ) जन्म व अनुवंशाने प्राप्त होणारे नागरिकत्व,

(आ) या कायद्यान्वये दिले जाणारे नागरिकत्व,

(इ) इंडियन अँड पाकिस्तानी रेसिडेंट्स ॲक्ट १९४९ अन्वये नागरिक म्हणून नोंदणी होण्यासाठी पुढीलप्रमाणे तरतूद आहे : भारतीय किंवा पाकिस्तानी राष्ट्रीय, १ जानेवारी १९४६ पूर्वी, अविवाहित, विधवा किंवा विधुर असल्यास १० वर्षे व विवाहित असल्यास पत्नी आणि अज्ञान मुलांसह सात वर्षे श्रीलंकेमध्ये राहत असेल, तर त्याला श्रीलंका नागरिक म्हणून नोंदवून घेता येईल.

पाकिस्तानात नागरिकत्व अधिनियम १९५१ असून (अ) जन्म, (आ) अनुवंश, (इ) नोंदणी, (ई) स्वीकृतिकरण व (उ) प्रदेशाचे सामीलीकरण या मार्गांनी नागरिकत्व प्राप्त होते.

भारतात नागरिकत्वाविषयी संविधानात अनुच्छेद ५ ते ११ अन्यये काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. शिवाय अनुच्छेद ११ ने दिलेल्या अधिकारानुसार संसदेने १९५५ साली नागरिकत्व अधिनियम संमत केला.

संविधानाच्या अनुच्छेद ५ अन्वये जी व्यक्ती भारतात स्थायिक असून (अ) जिचा जन्म भारतीय प्रदेशात झाला आहे किंवा (आ) जिची माता किंवा पिता भारतात जन्मलेला आहे किंवा (इ) जी घटनेच्या सुरुवातीच्या आधी किमान पाच वर्षे भारतात सर्वसाधारण वास्तव्य करीत आहे, अशा सर्व व्यक्तींना भारताचे नागरिक मानण्यात आले आहे

स्थायिक नागरिक याला कायद्याच्या परिभाषेत विशिष्ट अर्थ आहे. राष्ट्रीयत्वामुळे व्यक्तीचे राजकीय स्थान निश्चित होते, तर त्याचे नागरी स्थान ठरविण्यासाठी जो देश हा तिचे घर मानला जातो, तो देश म्हणजे तिचे स्थायिक स्थान होय. स्थायिकत्वाचा किंवा वास्तव्याचा सर्वसाधारण लौकिक अर्थ येथे अभिप्रेत नाही, तर त्याची व्याख्या ‘अशी जागा जिच्याशी तिचा कायदेशीर कारणांसाठी निश्चित व स्थिर संबंध आहे, मग तो तिचे घर तेथे असल्याने असो वा कायद्याने तशी तरतूद केली असल्याने असो’, अशी करण्यात आली आहे.

घटनेच्या अनुच्छेद ६ ते ९ मध्ये काही अनुषंगिक तरतुदी करण्यात आल्या आहेत. देशाच्या फाळणीमुळे व लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरामुळे विशेष परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे इतक्या विस्तृत तरतुदी घटनेत कराव्या लागल्या.

अनुच्छेद ५ ते ९ यांचा एकत्र विचार केला असता, घटनेचा अंमल सुरू होण्याच्या वेळी पुढील व्यक्ती भारताच्या नागरिक होत
(१) भारतीय प्रदेशात जन्मलेली व स्थायिक असलेली व्यक्ती.

(२) भारतात जन्मलेल्या पित्याच्या किंवा मातेच्या पोटी जन्मलेली व भारतात स्थायिक असलेली व्यक्ती.

(३) जी व्यक्ती स्वतः किंवा तिचा पिता भारतात जन्मलेला नाही; पण जी भारतात स्थायिक आहे व अंमल सुरु होण्यापूर्वी पाच वर्षे भारतात राहत आहे.

(४) जी व्यक्ती पाकिस्तानातून भारतात स्थलांतर करून आली आहे;

(अ) जिचे मतापिता किंवा आजी-आजोबा भारत सरकार कायदा १९३५ मध्ये वर्णिलेल्या भारतीय प्रदेशात जन्मले होते अशी आणि

(आ) १९ जुलै १९४८ पूर्वी ती भारतात आली असेल आणि तेव्हापासून भारतीय प्रदेशात स्थायिक असेल किंवा १९ जुलै १९४८ नंतर आली असेल व भारत सरकारने नेमलेल्या विशिष्ट अधिकाऱ्यांसमोर स्वतःची नोंदणी करून घेतली असेल.

(५) जी व्यक्ती १ मार्च १९४७ नंतर भारतातून पाकिस्तानात गेली होती व भारतात स्थायी होण्याचा परवाना घेऊन जी भारतात परत आली व जिने स्वतःची रीतसर नोंदणी करून घेतली आहे.

(६) जी व्यक्ती किंवा जिचे आईबाप वा आजी किंवा आजोबा यांच्यापैकी कोणीतरी एक व्यक्ती भारतात जन्मलेली आहे व जी त्या वेळी अन्य देशांत राहत होती; पण जिने आपली नोंदणी करून घेतली आहे.

नागरिकत्व अधिनियम १९५५ अन्वये नागरिकत्व पुढील मार्गांनी मिळू शकते
(अ) २६ जानेवारी १९५० रोजी किंवा त्यानंतर भारतीय प्रदेशात जन्म (नेहमीचे अपवाद सोडून),

(आ) अनुवंश (भारतीय नागरिकाच्या पोटी परदेशात जन्म झाला असताना),

(इ) नोंदणी,

(ई) स्वीकृतिकरण,

(उ) प्रदेशाचे सामीलीकरण,

(ऊ) जेथे स्पष्टता नसेल अशा प्रकरणात सरकारने नेलेल्या अधिकाऱ्याचा दाखला.

याबाबतच्या विस्तृत तरतुदी कायद्यात करण्यात आलेल्या आहेत.

नागरिकत्व मिळते, तसे ते जातेही.

भारतात ते पुढील मार्गांनी जाऊ शकते : नागरिक स्वेच्छेने नागरिकत्व सोडू शकतो किंवा त्याने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले असले, तर त्याचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात आले असे मानले जाते. शिवाय विशिष्ट परिस्थितीत एखाद्याचे नागरिकत्व भारत सरकार आपल्या हुकूमान्वये रद्द करू शकते. फसवणुकीच्या मार्गांने नागरिकत्व मिळविलेले असणे, भारतीय राज्यघटनेशी द्रोह करणे, युद्धकाळात देशद्रोह करणे, स्वीकृत नागरिकाबाबत त्याला पाच वर्षांच्या आत दुसऱ्या देशात दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झालेली असणे किंवा विशिष्ट कारण नसताना परदेशात सात वर्षांपेक्षा अधिक वास्तव्य असणे, यांसारख्या कारणांवरून त्याचे नागरिकत्व रद्द होऊ शकते.

भारतीय घटनेनुसार नागरिकाला अनेक हक्क आणि अधिकार आहेत. घटनेच्या अनुच्छेद १४ अन्वये कायद्याचे समान संरक्षण व कायद्यासमोर समानता हे हक्क कुठल्याही व्यक्तीला उपलब्ध असले, तरी अनुच्छेद १५, १६, १९, ३० वगैरेंत नमूद केलेले मूलभूत हक्क फक्त नागरिकालाच उपभोगता येतात. शिवाय राष्ट्रपती वगैरेंसारख्या पदावर निवडून जाणे किंवा संसद वा विधिमंडळ यांचे सभासद होणे, हे हक्कदेखील नागरिकांपुरतेच मर्यादित आहेत.

भारतीय संघराज्याचे स्वरूप

भारतीय संघराज्याचे स्वरूप

आपल्या राज्यघटनेची मुलभूत वैशिष्ट्ये समजून घ्यायला हवी. यापैकी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे संघराज्य व्यवस्था. मुख्य परीक्षेतील पहिला घटक याच्याशी संबंधित आहेत.

भारतीय संघराज्याचे स्वरूप

कोकणात राजकीय वातावरण तापलं, दोन वजनदार नेते ईडीच्या रडारवर?
पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेतील राज्यव्यवस्था घटकाची चर्चा गेल्या दोन लेखांत आपण केली. पूर्व परीक्षेचा अभ्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने करावा लागतो तर मुख्य परीक्षेत तुलनात्मक व विश्लेषणात्मक दृष्टिकोन उपयुक्त ठरतो. अभ्यासाला सुरुवात करताना मुख्य परीक्षेच्या दृष्टीने करावी. राज्यघटनेतील प्रमुख तरतुदी समाविष्ट करण्यामागील घटनाकारांची नेमकी भूमिका काय होती हे लक्षात घ्यावे. त्याबरोबर गेल्या ६५ वर्षांमध्ये या तरतुदींचे स्वरूप कसे बदलले, हे बदल घडवण्यात संसद व सर्वोच्च न्यायालयाची काय भूमिका राहिली, यातून कोणते संघर्ष निर्माण झाले अशा विविध बाबींचा अभ्यास करायला हवा. यासाठी आपल्या राज्यघटनेची मुलभूत वैशिष्ट्ये समजून घ्यायला हवी. यापैकी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे संघराज्य व्यवस्था. मुख्य परीक्षेतील पहिला घटक याच्याशी संबंधित आहेत. २०१३ आणि २०१४ मध्ये त्या अनुषंगाने प्रश्नही विचारले गेले आहेत.

२०१३ च्या मुख्य परीक्षेतील प्रश्न
 लहान राज्यांच्या निर्मितीमुळे प्रभावी शासन निर्माण होईल का?
 आंतरराज्य जल विवाद सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या संविधानिक यंत्रणांच्या अपयशाची कारणमीमांसा करा.
 १३व्या वित्त आयोगाच्या स्थानिक स्वराज्य संस्था बळकटी देण्याविषयक तरतुदींची चर्चा करा.
२०१४ च्या मुख्य परीक्षेतील प्रश्न
 संघराज्य हे भारतीय राज्यघटनेचे ठळक वैशिष्ट्य असले तरी प्रबळ केंद्राच्या बाजूने भारतीय संघराज्य झुकलेले दिसते, हे प्रबळ संघराज्य व्यवस्थेच्या विरोधात आहे – चर्चा करा.
भारतीय संघराज्य (Indian Federalism)
संघराज्य म्हणजे केंद्र व राज्य अशा दोन स्तरावर स्वायत्त शासन यंत्रणा अस्तित्वात असणे. अमेरिकेने आधुनिक अर्थाने संघराज्य व्यवस्थेला सुरुवात केली. अमेरिकन संघराज्य प्रतिमानानुसार संघराज्य व्यवस्थेची ५ ठळक वैशिष्ट्ये असतात.
 द्विस्तरीय शासन (केंद्र व राज्य)
 दोन्ही स्तरांसाठी विशिष्ट अधिकार. ही अधिकार विभागणी स्पष्ट व घटनेद्वारे केलेली असावी.
 लिखित व परीदृढ म्हणजे बदलण्यास कठीण असणारी राज्यघटना.
 स्वतंत्र न्यायमंडळ याचे उद्दिष्ट केंद्र व राज्य किंवा राज्य व राज्य यांतील विवाद निष्पक्षपातीपणे सोडवणे.
 द्विगृही केंद्रीय कायदेमंडळ. यातील एक सभागृह जनतेचे प्रतिनिधित्व करेल मात्र दुसरे सभागृह घटकराज्यांचे प्रतिनिधित्व करेल.
भारतीय घटनाकारांनी ही पाचही वैशिष्ट्ये आपल्या राज्यघटनेत स्वीकारली. केंद्र-राज्य यांना स्वतंत्र अस्तित्व दिले, अधिकारांची विभागणी करण्यासाठी संघसूची, राज्यसूची व समवर्ती सूची निर्माण केली. स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण करून घटनेचा अन्वयार्थ लावण्याची व संघ–राज्यांतील वाद सोडवण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाकडे दिली आणि राज्यसभा हे राज्यांचे प्रतिनिधिगृह म्हणून लोकसभेसोबत संसदेचा अविभाज्य भाग बनवले.
अमेरिकन संघराज्य हे राज्यांनी एकत्र येऊन निर्माण केले. स्वाभाविकपणे राज्यांनी स्वतःकडे अधिक अधिकार ठेवले. सुरुवातीला अनेक भारतीय नेत्यांना अशा संघराज्याची निर्मिती भारतासाठी व्हावी असे वाटत होते. घटना समितीमधील काहीजणही याच मताचे होते. किमान अधिकार (उदा. परराष्ट्र व्यवहार, संरक्षण, चलन इ.) केंद्राकडे ठेऊन अन्य सर्व अधिकार राज्यांकडे द्यावे, असे त्यांचे मत होते. मात्र देशाच्या फाळणीमुळे चित्र बदलले. धर्माच्या आधारावर देश विभाजित झाला. संस्थानांच्या विलीनीकरणाचेही मोठे आव्हान होते. भाषिक राज्यांच्या मागण्या जोर धरत होत्या. या पार्श्वभूमीवर घटनाकारांनी प्रबळ केंद्राची निर्मिती देशाच्या अखंडतेसाठी अधिक महत्त्वाची मानली. त्यामुळे प्रबळ राज्यांपेक्षा प्रबळ केंद्र असणारे कॅनडाचे संघराज्य प्रतिमान घटनाकारांना जास्त योग्य वाटू लागले. स्वातंत्र्याच्या काळातील राष्ट्रउभारणीच्या विविध आव्हानांचा विचार करून प्रबळ केंद्र असलेल्या संघराज्याची निर्मिती घटनाकारांनी केली. हे अनेक तरतुदींवरून दिसून येते.
उदाहरणार्थ –
 संघसूचीमधील विषयांची संख्या अधिक आहे, तसेच हे विषय अधिक महत्त्वाचे आहेत.
 राज्यसूचीमधील विषयांवर राज्यसभेच्या संमतीने संसद कायदा बनवू शकते.
 राज्यपाल हा घटकराज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. पण त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
 आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार केंद्राला आहे. या काळात राज्यांचे अधिकार केंद्राकडे जातात.
 अखिल भारतीय सेवांची तरतूद इत्यादी.
अशा अनेक तरतुदींवरून केंद्र शासन राज्यांपेक्षा प्रबळ आहे हे स्पष्ट होते. काही घटनेच्या अभ्यासकांनी भारतीय संघराज्य हे खरे संघराज्य नाही, अशी टीका केली. आपल्या घटनाकारांनी राज्यघटनेत ‘फेडरॅलिझम’ हा शब्दप्रयोग न करता ‘युनिअन ऑफ स्टेटस’ (राज्यांचा समूह) असा शब्द वापरला आहे. वरील टीकाकार टीका करताना अमेरिकन प्रतिमान नजरेसमोर ठेवत असल्याचे दिसते. पण भारताच्या गरजेनुसार योग्य ते बदल करून घटनाकारांनी भारतीय संघराज्य घडवले आहे. संघराज्याच्या मुलभूत व्यवस्थेचा स्वीकार करताना आवश्यक ते बदलही त्यात केले, यात काहीही वावगे नाही. त्यामुळे भारतीय संघराज्य हे कोणत्याही अन्य देशाची नक्कल नसून ते स्वयंभू आहे. डी. डी. बासू या अभ्यासू घटनातज्ज्ञांनी म्हटले आहे की भारतीय संघराज्य हे

काही प्रश्न


🔰खालीलपैकी कोणाची नुकतीच पाकिस्तानचे 23वे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली?
( 1 ) नवाझ शरीफ
( 2 ) इम्रान खान
( 3 ) शेहबाज शरीफ ✅✅
(4) कमर जावेद बाजवा

1536. खंजर 2022 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला?
(1) भारत - नेपाळ
(2) भारत - तुर्कमेनिस्तान
( 3 ) भारत किर्गिझस्तान ✅✅
(4) भारत - म्यानमार

1537. 'नॉट जस्ट अ नाईटवॉचमनः माय इनिंग्स विथ बीसीसीआय' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(1) सौरव गांगुली
( 2 ) जय शहा
( 3 ) विनोद रॉय ✅✅
(4) रत्नाकर शेट्टी

1538.योग्य विधान निवडा:

(a) प्रसिद्ध कवी नीलमणी फुकन यांना 2021 सालचा 56 वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

(b) ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे नीलमणी फुकन पहिलेच आसामी व्यक्ती आहेत. पर्यायी उत्तरे:
( 1 ) फक्त (a) योग्य. ✅✅
(2) फक्त (b) योग्य
( 3 ) दोन्ही योग्य
( 4 ) दोन्ही अयोग्य

1539.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली?

( 1 ) प्रदिप कुमार जोशी
( 2 ) अरविंद सक्सेना
( 3 ) मनोज सोनी ✅✅
(4) भरत भूषण व्यास

1540.खालीलपैकी कोणाची नुकतीच पाकिस्तानचे 23वे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली?
( 1 ) नवाझ शरीफ
( 2 ) इम्रान खान
( 3 ) शेहबाज शरीफ ✅✅
(4) कमर जावेद बाजवा

1541.मंगळ ग्रह साठी "मिशन होप" खालील पैकी कोणत्या देशाने सुरू केले आहे?

A) USA

B) UAE🔰

C) रशिया

D ) जपान

1542.राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

A ) 4 फेब्रुवारी

B) 27 फेब्रुवारी

C) 1 फेब्रुवारी

D) 28 फेब्रुवारी🔰

1543.

5 जानेवारी 2022 रोजी बालविवाह मुक्त म्हणून घोषित झालेला 'गंजम' हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

A.केरळ

B.ओडीसा🔰

C.गुजरात

D.कर्नाटक

1544. ISRO ची स्थापना खालीलपैकी कधी झाली आहे?

A) 15 ऑगस्ट 1950

B) 15 ऑगस्ट 1969🔰

C ) 26 जानेवारी 1947

D) यापैकी नाही

1545. Vivo च्या जागी आता ipl चा टायटल स्पॉन्सर खालील पैकी...... असेल?

a ) टाटा🔰

b ) बाटा

c) जिओ

d) आयडिया

1546..इस्रोचे नवीन प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

A) एस सोमनाथ🔰

B ) के सीवन

C) जी सतीश रेड्डी

D) वि. के. नायपॉल

रुपया अवमूल्यन आणि महात्मा गांधीजीं बाबत संबोधन

MPSC_PSI_STI
🟢रुपया अवमूल्यन🟢

❇️पहिले अवमूल्यन

🔳दिनांक:-26 सप्टेंबर 1949

🔳टक्के:-30.5% ने केले गेले

🔳अमेरिकन डॉलर बाबत केले

🔳रुपयांची किंमत 21 सेंटस पर्यंत कमी झाली

▪️पंतप्रधान:-जवाहरलाल नेहरू

▪️अर्थमंत्री:-जॉन मथाई

❇️दुसरे अवमूल्यन

🔳दिनांक:-6 जून 1966

🔳टक्के:-36.5% ने केले

🔳चलन:-अमेरिकन डॉलर व इतर हार्ड चलन

🔳रुपयांचा विनिमय दर कमी झाला

❇️उद्दिष्टे:-

🔳व्यापरतोल कमी करणे

🔳निर्यात वाढवणे

▪️पंतप्रधान:-इंदिरा गांधी

▪️अर्थमंत्री:-सचिन चौधरी

❇️तिसरे अवमूल्यन

📌दिनांक:-1 जुलै 1991

🔳टक्के:-9.5%

📌दिनांक:-3 जुलै 1991

🔳टक्के:-10-10.78%

📌दिनांक:-15 जुलै 1991

🔳टक्के:-2 %

🔳चलन:-सर्व महत्त्वाचे जागतिक चलन

▪️पंतप्रधान:-पी व्ही नरसिंह राव

▪️अर्थमंत्री:-मनमोहन सिंग

_____________________________

★महात्मा गांधीजीं बाबत संबोधन★

१ महात्मा - रविंद्रनाथ टागोर व स्वामी श्रद्धानंद

२ बापू - सरोजिनी नायडू

३ भारतीय राजनीतीचा बच्चा - अॅनी बेझंट

४ राष्ट्रपिता - सुभाषचंद्र बोस

५ मलंग बाबा - खान अब्दुल गफार खान

६ देशद्रोही फकीर - विन्स्टन चर्चिल

७ अर्धनंगे फकीर - फॅन्क मारेश

८ इमानदार परंतु बोल्शेव्हिक - लॉर्ड विलिंग्टन

९ अर्धनग्न विणकर - विल ड्युरॅन्ड

भारत वाद्य आणि त्यांचे प्रसिद्ध वादक आणि भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे २०१९-२०२०

*🥁🎹🎼 भारत वाद्य आणि 🎺🎸त्यांचे प्रसिद्ध वादक.*

🎺 *शहनाई* :- बिस्मिल्ला खाँ, अली अहमद खां

🪕 *वीणा*:- सादिक आली काह खान, असद अली खान

🎻 *संतूर* :- पंडित शिवकुमार शर्मा

🎷 *सारंगी* :- रामनारायण

🎹 *सरोद* :- अमजद अली खान

🪘 *तबला* :- झाकीर हुसेन

🎸 *सतार* :- पंडित रविशंकर

🎺 *बासरी* :- पन्नालाल घोष, हरिप्रसाद चौरासिया

🎤 *शास्त्रीय संगीत* :- मल्लिकार्जुन🎼

🎻 *व्हायोलिन* :- वी.वी.जोग, गजानन जोशी, अरविंद मफतलाल, टि. एन. कृष्णन....

_____________________________

🌀 भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)

🌀 बुरेवी : तमिळनाडू
✔️ नाव दिले : मालदीव

🌀 निवार : तमिळनाडू , आंध्रप्रदेश
✔️ नाव दिले : इराण

🌀 फनी : ओडिशा , पश्र्चिम बंगाल
✔️ नाव दिले : बांग्लादेश

🌀 वायु : भारत , पाकिस्तान
✔️ नाव दिले : भारत

🌀 हिक्का : गुजरात
✔️ नाव दिले : मालदीव

🌀 महा : ओमान , श्रीलंका , भारत
✔️ नाव दिले : ओमान

🌀 बुलबुल : बांग्लादेश , भारत
✔️ नाव दिले : पाकिस्तान

🌀 क्यार : सोमालिया , भारत , येमन
✔️ नाव दिले : म्यानमार

🌀 पवन : सोमालिया , भारत
✔️ नाव दिले : श्रीलंका

🌀 अम्फान : ओडिशा , पश्र्चिम बंगाल
✔️ नाव दिले : थायलंड

🌀 निसर्ग : महाराष्ट्र , गोवा , गुजरात
✔️ नाव दिले : बांग्लादेश .

🌀  चक्रीवादळे व त्यांची नावे

🌀 तौकते : म्यानमार

🌀 यास : ओमान

Current Affairs

Current Affairs:
📖 Complete February Current Affairs Revision for all Upcoming Exams #Hindi

1) भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) ने अपने पृथ्वी अवलोकन उपग्रह ईओएस -4 और दो सह-यात्री प्रौद्योगिकी प्रदर्शक और वैज्ञानिक उपग्रहों को आंध्र प्रदेश के श्रीहरिकोटा में देश के एकमात्र स्पेसपोर्ट में पहले लॉन्च पैड से सफलतापूर्वक लॉन्च किया।
▪️इसरो :-
➨Formed :- 15 August 1969
➨Headquarter :-  Bangalore, Karnataka, India
➨Chairman :- S Somnath

2) जम्मू और कश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश और त्रिपुरा उन राज्यों और केंद्र शासित प्रदेशों की सूची में सबसे ऊपर हैं जहां 2021 में पत्रकारों और मीडिया घरानों को निशाना बनाया गया था।
➠देश भर में कम से कम छह पत्रकार मारे गए, 108 हमले हुए और 13 मीडिया घरानों या समाचार पत्रों को निशाना बनाया गया।

3) रसायन विज्ञान विभाग, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मद्रास के एक वैज्ञानिक को बेंजो [बी] थियोफीन नामक एक औषधीय रूप से महत्वपूर्ण यौगिक के उत्पादन के लिए एक हरी पद्धति विकसित करने के लिए एक पेटेंट प्रदान किया गया है।

4) जांच में उत्कृष्टता के लिए केंद्रीय गृह मंत्री पदक केंद्रीय जांच एजेंसियों या राज्य / केंद्र शासित प्रदेश पुलिस बलों के सदस्यों को एक जांच में उत्कृष्टता के लिए प्रदान किया जाता है।
➠ अपराध की जांच के उच्च पेशेवर मानकों को बढ़ावा देने के लिए 2018 में पदक का गठन किया गया था।

5) भारत सरकार ने इन अनुप्रयोगों को राष्ट्रीय सुरक्षा के लिए खतरा बताते हुए 54 चीनी ऐप्स पर प्रतिबंध लगाने का आदेश जारी किया है।
➠पिछले साल जून में, भारत ने टिकटॉक, वीचैट और हेलो सहित 59 चीनी मोबाइल एप्लिकेशन पर प्रतिबंध लगा दिया था।

6) टाटा संस ने घोषणा की है कि इल्कर आई को एयर इंडिया का सीईओ और एमडी नियुक्त किया गया है।
➠श्री ऐसी का जन्म 1971 में इस्तांबुल में हुआ था। वह 1994 में बिल्केंट विश्वविद्यालय के राजनीति विज्ञान और लोक प्रशासन विभाग के पूर्व छात्र हैं।

7) नेशनल बैंक फॉर एग्रीकल्चर एंड रूरल डेवलपमेंट (NABARD) ने JIVA कृषि-पारिस्थितिकी-आधारित कार्यक्रम शुरू किया, जो 11 राज्यों में अपने मौजूदा वाटरशेड और वाडी कार्यक्रमों के माध्यम से प्राकृतिक खेती को बढ़ावा देगा।

☞ राष्ट्रीय कृषि और ग्रामीण विकास बैंक (NABARD) :-
Formation - July 12, 1982
Headquarters - Mumbai
Chairman - Govinda Rajulu Chintala

8) दिसंबर 2024 तक सूरत का अपना खुद का बुलेट ट्रेन स्टेशन होगा।
➠बुलेट ट्रेन स्टेशन मुंबई-अहमदाबाद रूट पर बनने वाला पहला स्टेशन होगा।
➠ मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन परियोजना देश की पहली बुलेट ट्रेन रूट होगी।

9) केंद्रीय सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्री डॉ वीरेंद्र कुमार ने केंद्रीय क्षेत्र की योजना "SMILE : आजीविका और उद्यम के लिए सीमांत व्यक्तियों के लिए समर्थन" का शुभारंभ किया।

10) भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड ने जी महालिंगम की अध्यक्षता में निवेशक संरक्षण और शिक्षा कोष (आईपीईएफ) पर अपनी सलाहकार समिति का पुनर्गठन किया है।
➠भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (सेबी) भारत सरकार के वित्त मंत्रालय के अधिकार क्षेत्र में भारत में प्रतिभूतियों और कमोडिटी बाजार के लिए नियामक निकाय है।  यह 12 अप्रैल 1988 को स्थापित किया गया था और सेबी अधिनियम, 1992 के माध्यम से 30 जनवरी 1992 को वैधानिक शक्तियां दी गई थी।

11) रक्षा मंत्रालय ने हाई एल्टीट्यूड स्यूडो सैटेलाइट (HAPS) विकसित करने के लिए बेंगलुरु की एक कंपनी के साथ एक डिजाइन और विकास अनुबंध पर हस्ताक्षर किए हैं जो निगरानी संचालन और संचार का समर्थन करने में सक्षम होगा।

12) तेलंगाना सरकार और ब्रिटिश काउंसिल ने विश्व स्तर पर उच्च शिक्षा का विस्तार करने, गतिशीलता बढ़ाने और सूचना और कौशल साझा करने के लिए तीन साल के समझौता ज्ञापन (एमओयू) पर हस्ताक्षर किए।
▪️तेलंगाना :-
➨CM - Kalvakuntla Chandrashekhar Rao
➨Amrabad Tiger Reserve
➨Kawal Tiger Reserve

13) आंध्र प्रदेश ने महानिदेशक (खुफिया) केवी राजेंद्रनाथ रेड्डी को नया डीजीपी और राज्य पुलिस बल का प्रमुख नियुक्त किया है।
▪️आंध्र प्रदेश :-
➨CM -  Jaganmohan Reddy
➨Governor - Biswabhusan Harichandan
➨ Venkateswara Temple
➨Sri Bhramramma Mallikarjuna Temple

14) फिक्की (फेडरेशन ऑफ इंडियन चैंबर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री) ने वायकॉम 18 मीडिया प्राइवेट लिमिटेड के मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योति देशपांडे की  फिक्की मीडिया और मनोरंजन बोर्ड के सह-अध्यक्ष के रूप में नियुक्ति की घोषणा की है।

15) राजीव कुमार भाटिया ने "भारत-अफ्रीका संबंध: चेंजिंग होराइजन्स" नामक एक नई पुस्तक लिखी है।
➨पुस्तक अपने सभी महत्वपूर्ण आयामों में भारत-अफ्रीका साझेदारी का विस्तृत अन्वेषण प्रदान करती है।

16) नवीन और नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आजादी का अमृत महोत्सव समारोह के हिस्से के रूप में "न्यू फ्रंटियर्स" नामक अक्षय ऊर्जा पर एक कार्यक्रम आयोजित कर रहा है। यह कार्यक्रम 16 फरवरी से 18 फरवरी 2022 तक आयोजित किया जा रहा है।

17) वयोवृद्ध पर्यावरणविद् रवि चोपड़ा ने चार धाम परियोजना पर सुप्रीम कोर्ट की उच्चाधिकार प्राप्त समिति (एचपीसी) के अध्यक्ष के रूप में इस्तीफा दे दिया है।

18) महाराष्ट्र के स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे ने घोषणा की है कि राज्य में कैंसर की रोकथाम के लिए "होप एक्सप्रेस" शुरू की जाएगी।  यह भारत में पहली ऐसी मशीन है।

19) ईरान ने 1,450 किलोमीटर की कथित सीमा के साथ "खैबर-बस्टर" नामक एक नई मिसाइल का अनावरण किया है जो इस क्षेत्र में अमेरिकी ठिकानों के साथ-साथ कट्टर इजरायल दोनों तक पहुंच जाएगा।

20) वेदांता एल्युमीनियम बिजनेस ने डॉव जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स (डीजेएसआई) परिवार में वैश्विक एल्युमीनियम उत्पादकों में चौथा स्थान हासिल किया है।
➨डॉव जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स एक वैश्विक बेंचमार्क है जो आर्थिक, पर्यावरणीय और सामाजिक मानदंडों के संदर्भ में दुनिया की अग्रणी कंपनियों के प्रदर्शन को ट्रैक करता है।

21) वयोवृद्ध गायक और संगीतकार बप्पी लाहिड़ी का 69 वर्ष की आयु में निधन हो गया।

22) राष्ट्रपति राम नाथ कोविंद ने मुंबई (महाराष्ट्र) के मालाबार हिल स्थित राजभवन में दरबार हॉल का उद्घाटन किया।
➨नया दरबार हॉल पुराने दरबार हॉल की साइट पर बनाया गया है और इसमें बैठने की क्षमता 750 है।
▪️महाराष्ट्र :-
CM - Uddhav Thackeray
Governor - Bhagat Singh Koshiyari
Trimbakeshwar Temple
Bhimashankar Temple
Grishneshwar Temple

23) हरियाणा कैडर के आईपीएस अधिकारी कला रामचंद्रन को गुरुग्राम की पहली महिला पुलिस आयुक्त बनाया गया है।
➨ 1994 बैच के आईपीएस कार्यालय ने केके राव का स्थान लिया है, जिन्हें गुरुग्राम के पास भोंडसी में पुलिस प्रशिक्षण और अनुसंधान केंद्र में स्थानांतरित कर दिया गया है।

24) भारत की सबसे बड़ी आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया वित्त वर्ष 2011-22 के दौरान उपभोक्ता के बाद 27,000 मीट्रिक टन प्लास्टिक कचरे के संग्रह, प्रसंस्करण और पुनर्चक्रण के बाद देश में एक पूर्ण प्लास्टिक कचरा तटस्थ फर्म बन गई है।

25) विश्व स्वास्थ्य संगठन ने आज 'तंबाकू छोड़ो ऐप' लॉन्च किया ताकि लोगों को सिगरेट की लत छुड़ाने में मदद मिल सके और धूम्रपान रहित और अन्य नए उत्पादों सहित सभी रूपों में तंबाकू का उपयोग बंद किया जा सके।
▪️ विश्व स्वास्थ्य संगठन :-
Headquarters - Geneva, Switzerland
Founded - 7 April 1948
Director-general - Tedros Adhanom

26) शिक्षा मंत्रालय में अतिरिक्त सचिव विनीत जोशी को सीबीएसई अध्यक्ष का प्रभार सौंपा गया है।
➨मणिपुर कैडर के 1992 बैच के आईएएस अधिकारी, जोशी ने पहले केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) के अध्यक्ष के रूप में कार्य किया है।
➨ वह राष्ट्रीय परीक्षण एजेंसी (NTA) के महानिदेशक भी हैं।
➽ केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड :-
Formation - 2 July 1929
Headquarters - New Delhi
Chairman - Vineet Joshi

≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡

जालियनवाला बाग हत्याकांड

❇️ जालियनवाला बाग हत्याकांड ❇️

◆ पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती.

◆ 1919 साली भारतीय जनतेतील वाढता असंतोष दडपण्याबाबत उपाययोजना रौलेट समितीने सुचवली.

◆ त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटला न चालवता स्थानबदध करण्याचा अधिकार शासनास मिळाला.

◆ गांधीजीनी या काळया कायदयाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनतेला 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.

◆ 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरप्रणीत जालियनवाला बागेतील हत्याकंड घडले.

◆ या घटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी ब्रिटिश शासनाशी असहकार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

◆ रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...