१३ मार्च २०२२

कंपनीच्या राज्यसत्तेत गाजलेले बंगालचे गव्हर्नर .


🅾भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन

1. *लॉर्ड क्लाईव्ह* (1756 ते 1772) :-

🅾भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना.

*प्लासिचे युद्ध* :-

🅾जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला.

*बक्सरची लढाई* :-

🅾बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला.

*अलाहाबादचा तह* :-

🅾बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली.

2. *सर वॉरन हेस्टिंग*(सन 1772 ते 1773) :-

🅾सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली.

🅾भारतातील पहिले वृत्तपत्र *बंगाल गॅझेट* (1781) याच काळात सुरू झाले.

3. *लॉर्ड कॉर्नवॉलीस* (1786 ते 1793) :-

🅾लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात.

4. *लॉर्ड वेलस्ली* (1798 ते 1805) :-

🅾लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला.

🅾तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली.

🅾सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला.

5. *मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज* (सन 1813 ते 1823) :-

🅾मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली.

🅾जून 1818 मध्ये एलफिन्स्टनच्या सेनेने कोरेगावाच्या लढाईत बाजीराव पेशव्याच्या सेनेचा निर्णायक पराभव करून पेशवेशाही खालसा केली.

6. *लॉर्ड विल्यम बेंटीक* (1823 ते 1833) :-

🅾लॉर्ड विल्यम बेंटिकने सन 1829 मध्ये सती प्रथा बंद कायदा पास केला.

🅾भारतीय लोकांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा ही शिक्षणाचे माध्यम राहील असे जाहीर केले.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

कायमधारा पध्दत


   प्रायोगिक स्वरूपात :- इ.स. 1790
   कायम स्वरूपात :- इ.स. 1793
   ठिकाण :- बंगालa, बिहार, ओडिसा, उत्तर मद्रास, वाराणसी
   प्रमाण :- भारतातील एकूण शेतजमीनीच्या 19%
   महसूल वाटणी :- शासन, जमीनदार व शेतकरी
   संकल्पना :- लॉर्ड कॉर्नवॉलिस
   गव्हर्नर :- लॉर्ड कॉर्नवॉलिस
   प्रभाव :- सर जॉन शोअर
   इतर नावे - जहागिरदारी पध्दत, मालगुजारी पध्दत, बिसवेदारी पध्दत.

🖍 वॉरन हेस्टिंग याने जमीन महसुल वसुल करण्याच्या अधिकारांचे लिलाव करण्याची पध्दत स्विकारली होती. मात्र ही व्यवस्था काही उपयोगात ठरली नाही. यामुळे हेस्टिंग्जच्या या पध्दतीतील दुष्परिणाम दूर करण्यासाठी कॉर्नवॉलिसने 1789 मध्ये सर जॉन शोअरच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. सर जाॅन शोअर समितीच्या शिफारशी नुसार, कायमधारा पध्दत लॉर्ड कॉर्नवॉलिस याने बंगाल प्रांतात इ.स. 
1790 ला 10 वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर लागू केली होती, परंतू नंतर 1793 मध्ये कॉर्नवॉलिसने ही व्यवस्था कायमस्वरूपासाठी लागू केली. म्हणूनच या व्यवस्थेला कायमधारा पध्दत असे म्हणतात.
🖍कायमधारा पध्दतीत जमीनीचा मालक जमीनदार असून प्रत्यक्ष शेतकरी हा भुदास असतो.
🖍या पध्दतीत शेतसारा हा रोख स्वरूपात गोळा केला जात असल्याने या पध्दतीत व्यापारवादाची तत्वेदिसतात.
🖍या व्यवस्थेत संपूर्ण जमिनीचे महसुल गोळा करण्याची जबाबदारी ही संपुर्णपणे जमिनादारांवरच सोपविण्यात आली.
🖍शेतकऱ्यांकडून मिळालेल्या महसुलांपैकी विशिष्ट रक्कम ही जमिनदाराने ब्रिटीशांना महसुल रूपात देणे आवश्यक होते.
🖍या व्यवस्थेनुसार जमिनदार व शेतकरी यांच्यात करारनाम्याची तरतूद होती जेणे करुन जमीनदाराला शेतकऱ्यांकडून ठराविक रक्कम महसूल रुपात मिळेल. परंतू तसे प्रत्यक्षात न झाल्यामुळे जमिनदार शेतकऱ्यांकडून कितीही महसुल वसुल करु शकत होता व ती जास्तीची रक्कम ही ब्रिटीशांना देण्याची 
गरजही नव्हती.
🖍1799 मध्ये तर महसूलाची रक्कम वेळेत न मिळाल्यास जमिनदारास शेतकऱ्याची जमीन, अवजारे किंवा जनावरे जप्त करण्याचा अधिकार मिळाला व यासाठी त्यास न्यायालयाच्या परवानगीची गरज देखील नव्हती.
🖍या व्यवस्थेचे खास वैशिष्ट्य म्हणजे जमीन महसुलाची रक्कम ही कायमची ठरविण्यात आली. यानुसार 89 टक्के सरकारला व 11 टक्के जमीनदारांना असे जमीन महसूलाच्या रकमेचे दोन भाग करण्यात आले होती.
🖍शेतसारा हा 30 ते 40 वर्षेस्थिर असेल.यात वाढ करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळाला नाही.
🖍या कायमधारा पध्दतीचे लाभार्थी हे केवळ जमिनदारच बनत असे.
🖍या व्यवस्थेवर सर जॉन शोअर याचा प्रभाव होता.
🖍जॉन शोअर समितीच्या शिफारसीनुसार या समितीत जेम्स ग्रँट आणि जोनार्थन डंकन हे इतर सदस्य होते.
🖍ही पध्दत सुरूवातीला केवळ बंगाल प्रांतामध्ये लागु करण्यात आली हाेती. 
🖍तिचा विस्तार पुढे बिहार, ओडिसा, उत्तर मद्रास, वाराणसी या भागांमध्ये करण्यात आला.
🖍भारतातील एकुण शेतजमिनीच्या 19 % क्षेत्रफळावर ही पध्दत अस्तित्वात होती.
🖍विल्यम बेंटिकने आपल्या 1829 च्या भाषणात कायमधारा पध्दतीचे फायदे स्पष्ट केले होते.

संविघानाच्या उद्देशिकेची (Preamble) सुरुवात “आम्ही भारताचे लोक” अशीच का?

🔸 संविधान सभा सदस्य “एच व्ही कामत” यांनी प्रस्ताव ठेवला की “आम्ही भारताचे लोक” ऐवजी आपण “देवाचे नाव” घेवुन सुरुवात करुयात.

🔸”रोहिणी कुमार चाैधरी”यांनी कामत यांच्या सुचनेत बदल करत “देवीचे नाव” सुचवले.

🔸 संविधान सभेचे दुसरे सदस्य “शिब्बन लाल सक्सेना” यांनी आम्ही भारताचे लोक याऐवजी “देव आणि महात्मा गांधी” यांच्या नावाने सुरुवात करण्याचा प्रस्ताव ठेवला.

🔸मात्र वरील दोन्ही प्रस्ताव मान्य झाले नाहीत. आणि उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी करण्यात आली.

“आम्ही भारताचे लोक” (We the people) याचा अर्थ -

“आम्ही भारताचे लोक” ही रचना भारताने “अमेरीका” देशांकडुन घेतली.

१) या संविधानाचे निर्माते भारतीय आहेत.

२) संविधानाच्या शक्तीचा स्त्रोत भारतीय जनता आहे.

३) आम्ही भारताचे लोक ही रचना सार्वभाैमत्वाचे (Sovereign) दर्शन देते.

महाराष्ट्रातील पंचायत राज- महत्त्वपूर्ण माहिती.

आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
 स्थानिक स्वराज्य संस्था

2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
 2 ऑक्टोबर 1953

3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
16 जानेवारी 1957

4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
 वसंतराव नाईक समिती

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
27 जून 1960

6. वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
महसूल मंत्री


7. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
226

8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
 जिल्हा परिषद

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
 1 मे 1962

11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
 7 ते 17

13. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
जिल्हाधिकारी

14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
 जिल्हाधिकारी

15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
 5 वर्षे

16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
 पहिल्या सभेपासून

17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
 तहसीलदार

18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
 विभागीय आयुक्त

19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
सरपंच

20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
पंचायत समिती सभापती

21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
दोन तृतीयांश (2/3)

22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
 तीन चतुर्थांश (3/4)

23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
पंचायत समिती सभापती

24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
 जिल्हा परिषद अध्यक्ष

25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
 संबंधित विषय समिती सभापती

26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
 जिल्हा परिषद अध्यक्ष

27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
विभागीय आयुक्त

28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
 ग्रामसेवक

29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
जिल्हा परिषदेचा

30. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
ग्रामसेवक

32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
 राज्यशासनाला

34. सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
 विस्तार अधिकारी

35. गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
 ग्रामविकास खाते

36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
जिल्ह्याचे पालकमंत्री

37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
जिल्हाधिकारी

38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
दहा (स्थायी+9 विषय समित्या)

39. जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
 स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
 जिल्हा परिषद अध्यक्ष

41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
वसंतराव नाईक

曆 曆 曆 曆 曆 曆 曆 曆 曆 曆 曆

भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी

🔶 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

🔶 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

📚 संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश📚

▪ मूलभूत हक्क : अमेरिका

▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪ संघराज्य पद्धत : कॅनडा

▪ शेष अधिकार : कॅनडा'

▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

कर्झनच्या शेती सुधारणा

☘  १९०० मध्ये पंजाबात जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा अमलात आणला. ज्याअन्वये शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली.

🌷  १९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली.

☘  त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची  स्थापना केली.

🌷   सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याची मुक्ती होण्यासाठी १९०४ मध्ये सहकारी पतपेढी कायदा  केला. कर्झनच्या कालावधीत पुष्कळ नवीन रेल्वेमार्ग (सहा हजार मल लांब) बांधले.

☘   रेल्वे कारभारात कार्यक्षमतेसाठी सर रॉबर्टसन समिती नेमली. कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले.

🌷  ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शविण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला.

☘  कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची  स्थापना केली.

🍁🍁🍁🍁☘☘☘☘🍁🍁🍁🍁☘☘

8 फेब्रुवारी 1872 रोजी, शेर अली आफ्रिदीने (पठाण) लॉर्ड मेयोची हत्या केली

🔹 जेव्हा व्हॉईसरॉय त्यांची तपासणी पूर्ण करून बोट कडे परतत होते,तेव्हा शेर अलीने हल्ला करून त्याला ठार केले.

🔹 तो त्यावेळी अंदमान आणि निकोबार बेटांवर कैदी होता.

🔹 शेर अली आफ्रिदीला 11 मार्च 1872 रोजी वायपर आयलंड तुरुंगात फाशी देण्यात आली.

🔶 Key Points:-

♦️ लॉर्ड मेयो - (1869 ते 1872)

🔹1870 मध्ये भारतात आर्थिक विकेंद्रीकरण सुरू केले

🔹 काठियारवाड येथे राजकोट कॉलेजची आणि राजपुत्रांसाठी मेयो कॉलेज अजमेर येथे स्थापना केली

🔹 भारतात भारतीय सांख्यिकी सर्वेक्षणाचे (Statistical Survey of India)आयोजन केले

🔹 लॉर्ड मेयोच्या नेतृत्वाखाली 1872 मध्ये जनगणना  सुरुवात झाली

🔹 कृषी आणि वाणिज्य विभागाची स्थापना केली

🔹 भारतीय इतिहासात प्रथमच राज्य रेल्वेचा परिचय

🔹खून होऊन मृत्यू झालेला तो एकमेव व्हाईसरॉय होता

मोजकेच पण महत्त्वाचे उपयुक्त प्रश्नावली

1)  महाराष्ट्रात सर्वाधिक अगरबत्ती उत्पादन कोठे होते ?
:- पंढरपूर ( जि. सोलापूर )

2)  महाराष्ट्राचे ऑटो हब शहर म्हणून कश्याचा उल्लेख कराल ?
:-  पुणे

3) देशातील पहिली संत्रा वायनरी कोठे स्थापन करण्यात आली ?
:- सावरगाव ( नागपूर )

4) देशातील पहिला महिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला ?
:- तांबाळे, ता . भुदरगड ( जि. कोल्हापूर)

5) महाराष्ट्रात ' पामतेलाचे उत्पादन ' कोठे घेतले जाते ?
:- कणकवली ( जि. सिंधुदूर्ग )

6) महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता ?
:- अहमदनगर

7) देशातील कारखान्यांच्या संख्येत महाराष्ट्राचा वाटा किती ?
:-  (12)%

8) हवाबंद अन्न पदार्थ तयार करण्यात कोणत्या राज्यांचा प्रथम क्रमांक लागतो ?
:- महाराष्ट्र

9) महाराष्ट्रामध्ये ........ या जिल्ह्यात ' कुंकवाचे कारखाने ' आढळतात ?
:- अमरावती जिल्हा

10)  महाराष्ट्राची उद्योगनगरी म्हणून कोणता जिल्हा ओळखल्या जातो ?
:- ठाणे जिल्हा

गुरुत्वबल (Gravitational Force)

◆ सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध लावला.

◆ न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या वस्तूला स्वत:कडे ओढते. या प्रकारे प्रयुक्त आकर्षणबलास 'गुरुत्वबल' असे म्हणतात.

◆ हे बल परस्परांकडे आकर्षित होणार्‍या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर (Mass) अवलंबून असते. ओढणार्‍या वस्तूंचे वस्तूमान जास्त असेल तर बलाचे परिमाणही जास्त असते.

◆ एखाधा वस्तूवर समान अंतरावर पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते. कारण चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा कमी असते.

◆ गुरुत्वबल दोन वस्तूंमधील अंतरावरदेखील अवलंबून असते. जर दोन वस्तूंमधील अंतर कमी असेल तर त्यांच्यातील गुरुत्वबल जास्त असते. (व्यस्तप्रमाणात).

◆ न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तु कोठेही असल्या तरी त्यांच्यात परस्परांना आकर्षित करणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते.

◆ हे बल त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते.

म्हणजेच  F=Gm1m2 /r2

here (G = विश्वगुरुत्व स्थिरांक )

◆ SI पद्धतीत G = 6.67 × 10-11 Nm2/kg2

◆ CGS पद्धतीत G = 6.67 × 10-8 dyne.cm2/g2

★ पृथ्वीचे गुरुत्व त्वरण (Accl^n due to gravity)-

◆ एखादी वस्तु विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते. खाली येताना वेग वाढतो. याचा अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते. यालाच 'गुरुत्व त्वरण' असे म्हणतात.

◆ पिसा येथील झुलत्या मनोर्यातवरून एकाच वेळी वेगवेगळ्या वस्तूमानाचे दगड गॅलिलियोने खाली सोडले व असा निष्कर्ष काढला की गुरुत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानवर अवलंबून नसते. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ गुरुत्वत्वरण हे फक्त पृथ्वीच्या वस्तुमानावर व वस्तूच्या उंचीवर अवलंबून आहे, पण वस्तूच्या व्स्तुमानावर नाही.

◆ गुरुत्व त्वरण g = 9.8 m/s2 (सरासरी)

◆ पृथ्वीची त्रिज्या ध्रुवांजवळ कमी आहे. तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे.

◆ g चे मूल्य ध्रुवावर= 9.83m/s2 आहे.

◆ g चे मूल्य विषुववृत्तावर=  9.78m/s2 आहे.

★ वस्तुमान (Mass)-

◆ कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असणारा द्रव्यसंचय होय. वस्तुमान ही अदिश राशि असून SI एकक kg आहे.

◆ वस्तुमान सगळीकडे सारखेच आहे. ते कधीही बदलत नाही. वस्तुमान कधीही शून्य होत नाही.

◆ जितके वस्तुमान जास्त, तितके जडत्वही जास्त असते. दुकानामधील तराजू फक्त वस्तुमानांची तुलना करू शकतो.

★ वजन (Weight):-

◆ एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला वस्तूचे वजन म्हणतात.

◆ म्हणजेच वस्तूचे वजन हे वस्तूवर कार्यरत असणारे पृथ्वीचे गुरुत्वबल होय.

◆ वजन ही सदिश राशी आहे. (w=mg)

◆ g ची किंमत सगळीकडे सारखी नाही. त्यामुळे वजनसुद्धा सगळीकडे सारखे नाही.

◆ वस्तूचे वजन ध्रुवावर जास्तीत जास्त तर विषुवृत्तावर सर्वात कमी राहील.

◆ गुरुत्व बलाच्या प्रभावापासून मुक्त अवकाशयानात अंतराळवीरांना वजनरहित अवस्थेचा प्रत्यय येतो. तो वजनदार वस्तु सहज उचलू शकतो. कारण तेथे प्रत्येक वस्तूचे वजन w शून्य असते.

★ मुक्तपतन-

◆ झाडाचे वाळलेले पान, पिकलेले फळ हे केवळ गुरुत्वाकर्षणामुळे खाली येतात. त्याला आपण मुक्तपतन असे म्हणतो.

◆ मुक्तपतनाच्या वेळी हवा या वस्तूला विरोध करते. कारण वस्तूचे आणि हवेचे घर्षण होते. खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे फक्त निर्वातातच शक्य आहे.

द्रव्याच्या अवस्था आणि स्पष्टीकरण

🌸 विश्व द्रव्याचे :

🌸 वस्तुमान (m) –

प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत.

एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणार्‍या द्रव्याचे प्रमाण दर्शवते.

वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते.

🌸 आकारमान (v) –

भांड्यातील द्रव्याने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान म्हणतात.

🌸 घनता –

घनता ही वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर आहे.

घनता = वस्तुमान (m)/आकारमान (v)

🌸 गुणधर्म –

 द्रव्य जागा व्यापते.

द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते.

द्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते.

🌸 द्रव्याच्या अवस्था –

स्थायुरूप

द्रवरूप

वायुरूप

1. स्थायू अवस्था :

स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.

जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.

स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो.

स्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे.

स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात.

उदा. रबर, लाकूड, हिरा इ.

2. द्रव अवस्था :

द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते.

द्रवपदार्थांना निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात.

द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात.

द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो.

उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ.

3. वायु अवस्था :

वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात.

वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात.

उदा. हवा, गॅस इ.

🌸 अवस्थांतर :

स्थयुला उष्णता दिल्यास द्रवत रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचा ‘द्र्वनांक’ असे म्हणतात.

द्रवाला उष्णता दिल्यास वायुत रूपांतर होते.

वायुला  उष्णता दिल्यास त्याचे प्लाझ्मा मध्ये रूपांतर होते.

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय

✍अलाहाबाद बैंक - कोलकाता
✍बैंक ऑफ इंडिया - मुंबई
✍बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे
✍केनरा बैंक - बैंगलोर
✍सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई
✍कॉरपोरेशन बैंक - मंगलौर
✍देना बैंक - मुंबई
✍इंडियन बैंक - चेन्नई
✍इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई
✍ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली
✍पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली
✍पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली
✍सिंडिकेट बैंक - मणिपाल
✍यूको बैंक - कोलकाता
✍यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई
✍यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता
✍विजया बैंक - बैंगलोर
✍आंध्रा बैंक - हैदराबाद
✍बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

सराव  प्रश्नमालिका ( स्पेशल पोलीस भरती )

1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार --------- हा मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे
समानतेचा हक्क
स्वातंत्र्याचा हक्क
घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क
धार्मिक स्वांत्र्याचा हक्क

● उत्तर - घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क

2. कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?
३२ साव्या
३९ साव्या
४२ साव्या
४४ साव्या

● उत्तर - ४२ साव्या

3. राष्ट्रपतील त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?
महाभियोग
पदच्युत
अविश्र्वास ठराव
निलंबन

● उत्तर - महाभियोग

4. राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते?
३०
२५
४०
३५

● उत्तर - ३५

5. व्यक्तिस्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील महत्वाची तरतूद कोणती?
मार्गदर्शक तत्वे
शिक्षण
पैसा
मुलभूत हक्क

● उत्तर - मुलभूत हक्क

6. मुलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येथे?
दिवाणी न्यायालय
सर्वोच्च न्यायालय
उच्च न्यायालय
फौजदारी न्यायालस

● उत्तर - सर्वोच्च न्यायालय

7. राष्ट्रपतीवर महाभियोग खटला कोठे चालतो?
सर्वोच्च न्यायालयात
फक्त लोकसभेत
फक्त राज्यसभेत
संसदेत

● उत्तर - फक्त राज्यसभेत

8. खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?
अर्थविधेयक मंजूर करणे
सामान्य विधेयक मंजूर करणे
मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे
राष्ट्रपतीच्या निवडणूकीत भाग घेणे

● उत्तर - मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे

9. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?
स्वातंत्र्य
समता
न्याय
बंधुभाव

● उत्तर - न्याय

10. महाराष्ट्रच्या विधानपरिषदेची सभासद संख्या किती आहे?
५५
६५
७८
८७

● उत्तर - ७८

पोलीस भरती परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न उत्तरे...

➡️ हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
👉 बियास

➡️ भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
👉 तिरुवनंतपुरम

➡️ कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
👉 मध्य प्रदेश

➡️ कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
👉 औरंगाबाद

➡️ हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
👉 रांची

➡️ फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 जळगाव

➡️ मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
👉 लक्षद्वीप

➡️ भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
👉 १२ लाख चौ.कि.मी.

➡️ नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
👉 दख्खनचे पठार

➡️ महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
👉 मध्य प्रदेश

➡️ महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
👉 उत्तर

➡️ परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
👉 निर्मळ रांग

➡️ 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
👉 नदीचे अपघर्षण

➡️ दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
👉 Lignite

➡️ बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
👉 औरंगाबाद

➡️ Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
👉 पाचगणी

➡️ हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
👉 आसाम

➡️ पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
👉 मणिपूर

➡️ पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
👉 मरियाना गर्ता

➡️ गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
👉 राजस्थान

➡️ घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
👉 दुर्गा

➡️ ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
👉 प्रशांत महासागर

➡️ कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
👉 शुक्र
➡️ कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
👉 गोदावरी

➡️ भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
👉 आसाम

➡️ जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
👉 मणिपुरी

➡️ भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
👉 महाराष्ट्र

➡️ इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
👉 आंध्र प्रदेश

➡️ पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
👉 अरूणाचल प्रदेश

➡️ वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
👉 महाराष्ट्र

➡️ लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
👉 हिमाचल प्रदेश

➡️ फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
👉 गुजरात.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

 पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. – पाचावर धारण बसणे.

1) मनात संख्या मोजणे   
2) पंचप्राण धारण करणे   
3) खूप भयभीत होणे   
4) ऐसपैस बसणे

उत्तर :- 3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 तिथी, वार, नक्षत्र, योग, करणा-या पाच घटकांनी युक्त अशा दिनी – वैशिष्टयांची माहिती असणारी पुस्तिका कोणती ?

1) पंचीकरण   
2) पंचांग     
3) पंचशील   
4) पंचीकृती

उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता ?

1) मनस्थीती   
2) मनस्थिति:   
3) मन्हस्थिती   
4) मन:स्थिती

उत्तर :- 4
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 ट, ठ, ड, ढ, ण हे वर्ण ..................
आहेत.

1) तालव्य   
2) अनुनासिक   
3) दन्त्य     
4) मूर्धन्य

उत्तर :- 4
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

1) पूर्वरूप संधी   
2) पररुप संधी   
3) व्यंजन संधी   
4) विसर्ग संधी

उत्तर :- 4
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 कुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ?

1) कुत्र्या   
2) कुत्रा     
3) कुत्र्याने   
4) कुत्र्याचा

उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

1) चार     
2) पाच     
3) सहा     
4) सात

उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 पुढीलपैकी अव्ययसाधीत विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

1) बोलकी बाहुली   
2) पुढची गल्ली   
3) कापड – दुकान   
4) माझे – पुस्तक

उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ...................

1) क्रियापद   
2) धातू     
3) कर्म     
4) कर्ता

उत्तर :- 1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

  खालील विधानातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.

तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला.

1) उद्देशदर्शक   
2) कारणदर्शक   
3) रीतिदर्शक   
4) कालदर्शक

उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...