१३ मार्च २०२२

कर्झनच्या शेती सुधारणा

☘  १९०० मध्ये पंजाबात जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा अमलात आणला. ज्याअन्वये शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली.

🌷  १९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली.

☘  त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची  स्थापना केली.

🌷   सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याची मुक्ती होण्यासाठी १९०४ मध्ये सहकारी पतपेढी कायदा  केला. कर्झनच्या कालावधीत पुष्कळ नवीन रेल्वेमार्ग (सहा हजार मल लांब) बांधले.

☘   रेल्वे कारभारात कार्यक्षमतेसाठी सर रॉबर्टसन समिती नेमली. कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले.

🌷  ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शविण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला.

☘  कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची  स्थापना केली.

🍁🍁🍁🍁☘☘☘☘🍁🍁🍁🍁☘☘

8 फेब्रुवारी 1872 रोजी, शेर अली आफ्रिदीने (पठाण) लॉर्ड मेयोची हत्या केली

🔹 जेव्हा व्हॉईसरॉय त्यांची तपासणी पूर्ण करून बोट कडे परतत होते,तेव्हा शेर अलीने हल्ला करून त्याला ठार केले.

🔹 तो त्यावेळी अंदमान आणि निकोबार बेटांवर कैदी होता.

🔹 शेर अली आफ्रिदीला 11 मार्च 1872 रोजी वायपर आयलंड तुरुंगात फाशी देण्यात आली.

🔶 Key Points:-

♦️ लॉर्ड मेयो - (1869 ते 1872)

🔹1870 मध्ये भारतात आर्थिक विकेंद्रीकरण सुरू केले

🔹 काठियारवाड येथे राजकोट कॉलेजची आणि राजपुत्रांसाठी मेयो कॉलेज अजमेर येथे स्थापना केली

🔹 भारतात भारतीय सांख्यिकी सर्वेक्षणाचे (Statistical Survey of India)आयोजन केले

🔹 लॉर्ड मेयोच्या नेतृत्वाखाली 1872 मध्ये जनगणना  सुरुवात झाली

🔹 कृषी आणि वाणिज्य विभागाची स्थापना केली

🔹 भारतीय इतिहासात प्रथमच राज्य रेल्वेचा परिचय

🔹खून होऊन मृत्यू झालेला तो एकमेव व्हाईसरॉय होता

मोजकेच पण महत्त्वाचे उपयुक्त प्रश्नावली

1)  महाराष्ट्रात सर्वाधिक अगरबत्ती उत्पादन कोठे होते ?
:- पंढरपूर ( जि. सोलापूर )

2)  महाराष्ट्राचे ऑटो हब शहर म्हणून कश्याचा उल्लेख कराल ?
:-  पुणे

3) देशातील पहिली संत्रा वायनरी कोठे स्थापन करण्यात आली ?
:- सावरगाव ( नागपूर )

4) देशातील पहिला महिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला ?
:- तांबाळे, ता . भुदरगड ( जि. कोल्हापूर)

5) महाराष्ट्रात ' पामतेलाचे उत्पादन ' कोठे घेतले जाते ?
:- कणकवली ( जि. सिंधुदूर्ग )

6) महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता ?
:- अहमदनगर

7) देशातील कारखान्यांच्या संख्येत महाराष्ट्राचा वाटा किती ?
:-  (12)%

8) हवाबंद अन्न पदार्थ तयार करण्यात कोणत्या राज्यांचा प्रथम क्रमांक लागतो ?
:- महाराष्ट्र

9) महाराष्ट्रामध्ये ........ या जिल्ह्यात ' कुंकवाचे कारखाने ' आढळतात ?
:- अमरावती जिल्हा

10)  महाराष्ट्राची उद्योगनगरी म्हणून कोणता जिल्हा ओळखल्या जातो ?
:- ठाणे जिल्हा

गुरुत्वबल (Gravitational Force)

◆ सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध लावला.

◆ न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या वस्तूला स्वत:कडे ओढते. या प्रकारे प्रयुक्त आकर्षणबलास 'गुरुत्वबल' असे म्हणतात.

◆ हे बल परस्परांकडे आकर्षित होणार्‍या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर (Mass) अवलंबून असते. ओढणार्‍या वस्तूंचे वस्तूमान जास्त असेल तर बलाचे परिमाणही जास्त असते.

◆ एखाधा वस्तूवर समान अंतरावर पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते. कारण चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा कमी असते.

◆ गुरुत्वबल दोन वस्तूंमधील अंतरावरदेखील अवलंबून असते. जर दोन वस्तूंमधील अंतर कमी असेल तर त्यांच्यातील गुरुत्वबल जास्त असते. (व्यस्तप्रमाणात).

◆ न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तु कोठेही असल्या तरी त्यांच्यात परस्परांना आकर्षित करणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते.

◆ हे बल त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते.

म्हणजेच  F=Gm1m2 /r2

here (G = विश्वगुरुत्व स्थिरांक )

◆ SI पद्धतीत G = 6.67 × 10-11 Nm2/kg2

◆ CGS पद्धतीत G = 6.67 × 10-8 dyne.cm2/g2

★ पृथ्वीचे गुरुत्व त्वरण (Accl^n due to gravity)-

◆ एखादी वस्तु विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते. खाली येताना वेग वाढतो. याचा अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते. यालाच 'गुरुत्व त्वरण' असे म्हणतात.

◆ पिसा येथील झुलत्या मनोर्यातवरून एकाच वेळी वेगवेगळ्या वस्तूमानाचे दगड गॅलिलियोने खाली सोडले व असा निष्कर्ष काढला की गुरुत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानवर अवलंबून नसते. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ गुरुत्वत्वरण हे फक्त पृथ्वीच्या वस्तुमानावर व वस्तूच्या उंचीवर अवलंबून आहे, पण वस्तूच्या व्स्तुमानावर नाही.

◆ गुरुत्व त्वरण g = 9.8 m/s2 (सरासरी)

◆ पृथ्वीची त्रिज्या ध्रुवांजवळ कमी आहे. तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे.

◆ g चे मूल्य ध्रुवावर= 9.83m/s2 आहे.

◆ g चे मूल्य विषुववृत्तावर=  9.78m/s2 आहे.

★ वस्तुमान (Mass)-

◆ कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असणारा द्रव्यसंचय होय. वस्तुमान ही अदिश राशि असून SI एकक kg आहे.

◆ वस्तुमान सगळीकडे सारखेच आहे. ते कधीही बदलत नाही. वस्तुमान कधीही शून्य होत नाही.

◆ जितके वस्तुमान जास्त, तितके जडत्वही जास्त असते. दुकानामधील तराजू फक्त वस्तुमानांची तुलना करू शकतो.

★ वजन (Weight):-

◆ एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला वस्तूचे वजन म्हणतात.

◆ म्हणजेच वस्तूचे वजन हे वस्तूवर कार्यरत असणारे पृथ्वीचे गुरुत्वबल होय.

◆ वजन ही सदिश राशी आहे. (w=mg)

◆ g ची किंमत सगळीकडे सारखी नाही. त्यामुळे वजनसुद्धा सगळीकडे सारखे नाही.

◆ वस्तूचे वजन ध्रुवावर जास्तीत जास्त तर विषुवृत्तावर सर्वात कमी राहील.

◆ गुरुत्व बलाच्या प्रभावापासून मुक्त अवकाशयानात अंतराळवीरांना वजनरहित अवस्थेचा प्रत्यय येतो. तो वजनदार वस्तु सहज उचलू शकतो. कारण तेथे प्रत्येक वस्तूचे वजन w शून्य असते.

★ मुक्तपतन-

◆ झाडाचे वाळलेले पान, पिकलेले फळ हे केवळ गुरुत्वाकर्षणामुळे खाली येतात. त्याला आपण मुक्तपतन असे म्हणतो.

◆ मुक्तपतनाच्या वेळी हवा या वस्तूला विरोध करते. कारण वस्तूचे आणि हवेचे घर्षण होते. खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे फक्त निर्वातातच शक्य आहे.

द्रव्याच्या अवस्था आणि स्पष्टीकरण

🌸 विश्व द्रव्याचे :

🌸 वस्तुमान (m) –

प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत.

एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणार्‍या द्रव्याचे प्रमाण दर्शवते.

वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते.

🌸 आकारमान (v) –

भांड्यातील द्रव्याने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान म्हणतात.

🌸 घनता –

घनता ही वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर आहे.

घनता = वस्तुमान (m)/आकारमान (v)

🌸 गुणधर्म –

 द्रव्य जागा व्यापते.

द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते.

द्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते.

🌸 द्रव्याच्या अवस्था –

स्थायुरूप

द्रवरूप

वायुरूप

1. स्थायू अवस्था :

स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.

जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.

स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो.

स्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे.

स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात.

उदा. रबर, लाकूड, हिरा इ.

2. द्रव अवस्था :

द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते.

द्रवपदार्थांना निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात.

द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात.

द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो.

उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ.

3. वायु अवस्था :

वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात.

वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात.

उदा. हवा, गॅस इ.

🌸 अवस्थांतर :

स्थयुला उष्णता दिल्यास द्रवत रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचा ‘द्र्वनांक’ असे म्हणतात.

द्रवाला उष्णता दिल्यास वायुत रूपांतर होते.

वायुला  उष्णता दिल्यास त्याचे प्लाझ्मा मध्ये रूपांतर होते.

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय

✍अलाहाबाद बैंक - कोलकाता
✍बैंक ऑफ इंडिया - मुंबई
✍बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे
✍केनरा बैंक - बैंगलोर
✍सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई
✍कॉरपोरेशन बैंक - मंगलौर
✍देना बैंक - मुंबई
✍इंडियन बैंक - चेन्नई
✍इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई
✍ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली
✍पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली
✍पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली
✍सिंडिकेट बैंक - मणिपाल
✍यूको बैंक - कोलकाता
✍यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई
✍यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता
✍विजया बैंक - बैंगलोर
✍आंध्रा बैंक - हैदराबाद
✍बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

सराव  प्रश्नमालिका ( स्पेशल पोलीस भरती )

1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार --------- हा मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे
समानतेचा हक्क
स्वातंत्र्याचा हक्क
घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क
धार्मिक स्वांत्र्याचा हक्क

● उत्तर - घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क

2. कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?
३२ साव्या
३९ साव्या
४२ साव्या
४४ साव्या

● उत्तर - ४२ साव्या

3. राष्ट्रपतील त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?
महाभियोग
पदच्युत
अविश्र्वास ठराव
निलंबन

● उत्तर - महाभियोग

4. राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते?
३०
२५
४०
३५

● उत्तर - ३५

5. व्यक्तिस्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील महत्वाची तरतूद कोणती?
मार्गदर्शक तत्वे
शिक्षण
पैसा
मुलभूत हक्क

● उत्तर - मुलभूत हक्क

6. मुलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येथे?
दिवाणी न्यायालय
सर्वोच्च न्यायालय
उच्च न्यायालय
फौजदारी न्यायालस

● उत्तर - सर्वोच्च न्यायालय

7. राष्ट्रपतीवर महाभियोग खटला कोठे चालतो?
सर्वोच्च न्यायालयात
फक्त लोकसभेत
फक्त राज्यसभेत
संसदेत

● उत्तर - फक्त राज्यसभेत

8. खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?
अर्थविधेयक मंजूर करणे
सामान्य विधेयक मंजूर करणे
मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे
राष्ट्रपतीच्या निवडणूकीत भाग घेणे

● उत्तर - मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे

9. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?
स्वातंत्र्य
समता
न्याय
बंधुभाव

● उत्तर - न्याय

10. महाराष्ट्रच्या विधानपरिषदेची सभासद संख्या किती आहे?
५५
६५
७८
८७

● उत्तर - ७८

पोलीस भरती परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न उत्तरे...

➡️ हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
👉 बियास

➡️ भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
👉 तिरुवनंतपुरम

➡️ कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
👉 मध्य प्रदेश

➡️ कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
👉 औरंगाबाद

➡️ हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
👉 रांची

➡️ फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 जळगाव

➡️ मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
👉 लक्षद्वीप

➡️ भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
👉 १२ लाख चौ.कि.मी.

➡️ नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
👉 दख्खनचे पठार

➡️ महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
👉 मध्य प्रदेश

➡️ महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
👉 उत्तर

➡️ परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
👉 निर्मळ रांग

➡️ 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
👉 नदीचे अपघर्षण

➡️ दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
👉 Lignite

➡️ बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
👉 औरंगाबाद

➡️ Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
👉 पाचगणी

➡️ हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
👉 आसाम

➡️ पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
👉 मणिपूर

➡️ पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
👉 मरियाना गर्ता

➡️ गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
👉 राजस्थान

➡️ घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
👉 दुर्गा

➡️ ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
👉 प्रशांत महासागर

➡️ कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
👉 शुक्र
➡️ कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
👉 गोदावरी

➡️ भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
👉 आसाम

➡️ जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
👉 मणिपुरी

➡️ भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
👉 महाराष्ट्र

➡️ इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
👉 आंध्र प्रदेश

➡️ पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
👉 अरूणाचल प्रदेश

➡️ वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
👉 महाराष्ट्र

➡️ लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
👉 हिमाचल प्रदेश

➡️ फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
👉 गुजरात.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

 पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. – पाचावर धारण बसणे.

1) मनात संख्या मोजणे   
2) पंचप्राण धारण करणे   
3) खूप भयभीत होणे   
4) ऐसपैस बसणे

उत्तर :- 3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 तिथी, वार, नक्षत्र, योग, करणा-या पाच घटकांनी युक्त अशा दिनी – वैशिष्टयांची माहिती असणारी पुस्तिका कोणती ?

1) पंचीकरण   
2) पंचांग     
3) पंचशील   
4) पंचीकृती

उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता ?

1) मनस्थीती   
2) मनस्थिति:   
3) मन्हस्थिती   
4) मन:स्थिती

उत्तर :- 4
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 ट, ठ, ड, ढ, ण हे वर्ण ..................
आहेत.

1) तालव्य   
2) अनुनासिक   
3) दन्त्य     
4) मूर्धन्य

उत्तर :- 4
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

1) पूर्वरूप संधी   
2) पररुप संधी   
3) व्यंजन संधी   
4) विसर्ग संधी

उत्तर :- 4
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 कुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ?

1) कुत्र्या   
2) कुत्रा     
3) कुत्र्याने   
4) कुत्र्याचा

उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

1) चार     
2) पाच     
3) सहा     
4) सात

उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 पुढीलपैकी अव्ययसाधीत विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

1) बोलकी बाहुली   
2) पुढची गल्ली   
3) कापड – दुकान   
4) माझे – पुस्तक

उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ...................

1) क्रियापद   
2) धातू     
3) कर्म     
4) कर्ता

उत्तर :- 1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

  खालील विधानातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.

तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला.

1) उद्देशदर्शक   
2) कारणदर्शक   
3) रीतिदर्शक   
4) कालदर्शक

उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

राजर्षि शाहू महाराज


जन्म – 16 जुलै 1874.

एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल करण्यात आली.
महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.
भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.

▪️संस्थात्मक योगदान :

ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.
1901 – मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).
नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.
1902 – राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.
15 नोव्हेंबर 1906 – किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.
1907 – मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.
1911 – जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.
1911 – शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.
1917 – माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
14 फेब्रुवारी 1919 – पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.
लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.
पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.
जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.
1894 – बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.
1917 – विधवा विवाहाचा कायदा.
1918 – आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.
1918 – महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.
वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.
1920 – माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.
1895 – गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.
1899 – वेदोक्त प्रकरण – सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.
यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.
1906 – शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.
1907 – सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.
1911 – सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.
1911 – भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.
1912 – कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.
1916 – निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.
1918 – कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.
1918 – आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.
1919 – स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.
1920 – घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.
1920 – हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
कोल्हापूर शहरास ‘वस्तीगृहांची जननी‘ म्हटले जाते.
ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.
मृत्यू – 6 मे 1922.

▪️वैशिष्टे :

महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ.
सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील म. फुले यांचे खरेखरे वारसदार.
जाती भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य.
पददलित व मागास वर्गीयांची उन्नती हेच जीवन कार्य.
उदार विचार प्रणालीचा राजा.
राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.
कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या, हा संदेश. He Was a King But a Democratic King – भाई माधवराव बागल.
शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता. – वि. रा. शिंदे.
टीकाकारांकडून ‘शुद्रांचा राजा‘ असा उल्लेख.

महात्मा ज्योतीराव फुले

✅ जीवन परिचय, शिक्षण, विवाह

🔯 जीवन परिचय - आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून फुले यांना ओळखले जाते. आधुनिक  महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून फुले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराणे मुलचे  सातार्यापासून २५ मैल अंतरावर असलेले कटगुण हे गाव होते.शेटीबाचा मुलगा गोविन्दराव व गोविंदरावची पत्नी चिमणाबाई यांच्या पोटी ११ एप्रिल १८२७ रोजी एक मुलगा ज्योतिबा .

🔯 शिक्षण - महात्मा फुल्यांनी १८३४ ते १८३८ हे चार वर्षे कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पुर्ण केले. दुरद्येवाची गोष्ट अशी चौथा वर्ग झाल्यानंतर काही कालावधीपर्यंत महात्मा फुल्यांचे शिक्षण थांबले

🔯 विवाह - महात्मा फुले १३ वर्षे असताना इ . स . १८४० मध्ये त्यांचा विवाह नायगावच्या खंडोजी नेवासे पाटील यांची मुलगी सावित्री बाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला.

✅ समाज क्रांतीमध्ये वाटचाल ✅

◾️युरोपियन लेखक थोमस पेन यान्ह्या ( रीतस ऑफ मन ) या पुस्तकाचा प्रभाव त्यांचावर झाला. ओगष्ट १८४८ मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.

◾️१७ सप्टेबर १८५१ रोजी रस्ता पेठेतील मुलीची दुसरी शाळा सुरु केली. १५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची तिसरी शाळा सुरु केली. १८५५ मध्ये रात्रीची शाळा सुरु केली. महात्मा फुल्यांनी इ . स .
१८६३ मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्याच घरी केली. इंग्रज सरकारने २५ जुले १८५६ रोजी विधवा विवाहाचा कायदा संमत केला होता.

◾️८ मार्च  १८६४ रोजी त्यांच्या प्रयत्नाने पुण्यात गोघ्ल्यांच्या बागेत एका शेणवी जातीतील अठरा वर्षाच्या नर्मदा या विधवेचापुनर्विवाह घडवून आणला हा पहिला पुनर्विवाह होय. अस्पृश्यासाठी शिक्षणाची दारे खुली व्हावी  त्यांनी १८५१ मध्ये  शहरात नानापेठेत अस्पृश्यासाठी पहिली शाळा सुरु केली. १८७३ मध्ये अस्पृशायासाठी जाहीरनामा काढला.

🔘 सत्यशोधक समाजाची स्थापना 🔘

◾️२४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुल्यांचा समाज मानवता बुद्धिमत्ता, व्यक्तीस्वतंत्र, या प्रमुख तत्वावर आधारित होता. निवृत्त सनदी अधिकारी अलन व्हूम यांच्या मदतीने राष्ट्रीय सभा २८डिसेंबर १८८५ रोजी गोकुलचंद संस्कृत महाविद्यालयात स्थापना केली.

◾️१८८० मध्ये महात्मा फुले यांनी कामगाराच्या प्रश्नाची वाचा फोडण्यासाठी नारायण लोखंडे यांच्या   माध्यमातून बॉम्बे मिल असोसिअशन या संघटनेशी स्थापना केली. ही देशातील प्रथम कामगार संघटना ठरली.

🔘 फुले यांची ग्रंथसंपदा 🔘

🔘 ग्रंथ  - वर्षे  -   ठिकाण 🔘

🔸तृतीय रत्न(नाटक) - १८५५ - पुणे

🔸पोवाडा(शिवाजी राजे) -१८६९ - मुंबई

🔸ब्राम्हणाचे कसब - १८६९ - मुंबई    
        
🔸गुलामगिरी - १८७३ - पुणे 

🔸शेतकऱ्यांचा असूड - १८८३ - पुणे

🔸इशारा - १८८५ - पुणे

🔸सार्वजनिक सत्यधर्म - १८९१ - मुंबई

◾️या लिखाणाच्या माध्यमातून ११ मे १८८८ रोजी मांडवी येथील कोळीवाडा सभागृहात महात्मा फुल्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्या  समारंभात सामाजिक कार्यकर्ते रावबहादूर  वाद्वाद्देवर होते. यांच्या उपस्थितीत फुले यांना (महात्मा) ही पदवी अर्पण करण्यात आली. फुल्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांची उजवी बाजू लुळी पडली.१एप्रिल १८८९ रोजी सार्वजनिक हा ग्रंथ पूर्ण केला.   

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...