०७ मार्च २०२२

राज्यशास्त्र - केशवानंद भारती खटला

🔸केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला.

🔸घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते.

🔸राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले.

🔸संसदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे?

🔸या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले.

🔸गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.

🔸या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले.

🔸या खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले गेले.

🔸 सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की, ' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.

🔸 संसदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.

🔸 सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्‍लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं.

🔸 या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं.

🔸 केशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्‍लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

विविध अभ्यास शाखा

हवामनाचा अभ्यास
मीटिअरॉलॉजी

रोग व आजार यांचा अभ्यास
पॅथॉलॉजी

ध्वनींचा अभ्यास
अॅकॉस्टिक्स

ग्रह-तार्यांचा अभ्यास
अॅस्ट्रॉनॉमी

वनस्पती जीवनांचा अभ्यास
बॉटनी

मानवी वर्तनाचा अभ्यास
सायकॉलॉजी

प्राणी जीवांचा अभ्यास
झूलॉजी

पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यास
जिऑलॉजी

कीटकजीवनाचा अभ्यास
एन्टॉमॉलॉजी

धातूंचा अभ्यास
मेटलर्जी

भूगर्भातील पदार्थांचा (खनिज वगैरे) अभ्यास
मिनरॉलॉजी

जिवाणूंचा अभ्यास
बॅकेटेरिओलॉजी

विषाणूंचा अभ्यास
व्हायरॉलॉजी

हवाई उड्डाणाचे शास्त्र
एअरॉनाटिक्स

पक्षी जीवनाचा अभ्यास
ऑर्निथॉलॉजी

सरपटनार्या प्राण्यांचे शास्त्र
हर्पेटलॉलॉजी

आनुवांशिकतेचा अभ्यास
जेनेटिक्स

मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास
न्यूरॉलॉजी

विषासंबंधीचा अभ्यास
टॉक्सिकॉलॉजी

ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र
कार्डिऑलॉजी

अवकाश प्रवासशास्त्र
अॅस्ट्रॉनॉटिक्स

प्राणी शरीर शास्त्र
अॅनाटॉमी

मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास)
अँथ्रापॉलॉजी

जीव-रसायनशास्त्र
बायोकेमिस्ट्री

सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र)
बायोलॉजी

रंगविज्ञानाचे शास्त्र
क्रोमॅटिक्स

विविध मानववंशासंबंधीचा अभ्यास
एथ्नॉलॉजी

उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र
हॉर्टिकल्चर

शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र
फिजिअॉलॉजी

फलोत्पादनशास्त्र
पॉमॉलॉजी

मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र
टॅक्सीडर्मी

भूपृष्ठांचा अभ्यास
टॉपोग्राफी

कुतूहल : राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था

- वाढलेली सागरी वाहतूक; रासायनिक कारखाने, कंपन्या आणि घरांमधून समुद्रात सोडले जाणारे प्रदूषित पाणी; समुद्रात साठणारा प्लास्टिकचा प्रचंड कचरा; मोठय़ा प्रमाणावर होणारी यांत्रिक मासेमारी या सगळ्यांचा दुष्परिणाम सागरी पर्यावरणावर होत आहे.

- याबरोबरच समुद्रात इंधन आणि वाळूसाठी उत्खनन होते. गाळ एकाच जागी साचतो. याचा परिणाम जलचरांवर होतो. या सर्व समस्यांवर अभ्यास आणि संशोधन होणे गरजेचे आहे. याच उद्देशाने १९६६ साली राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी- एनआयओ) या संस्थेची स्थापना करण्यात आली.

- या संस्थेचे मुख्यालय गोव्यातील डोना पावला येथे असून कोची, मुंबई आणि विशाखापट्टणम येथे प्रादेशिक केंद्रे आहेत. दिल्ली येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) च्या घटक प्रयोगशाळांपैकी एनआयओ ही एक संस्था आहे. मोठय़ा संख्येने असलेले समुद्र शास्त्रज्ञ आणि योग्य समुद्री संशोधन या पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेली सीएसआयआरची एनआयओ ही संस्था महासागर विज्ञानातील प्रगत शिक्षणाचे केंद्र आहे.

- १९६० च्या दशकात आंतरराष्ट्रीय हिंद महासागर मोहिमेनंतर १ जानेवारी १९६६ रोजी एनआयओची स्थापना करण्यात आली. आज ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली असून या संस्थेमार्फत हिंद महासागरातील समुद्रशास्त्रीय वैशिष्टय़ांचे संशोधन केले जाते. आतापर्यंत येथे पाच हजारांहून अधिक विषयांवर संशोधन- लेखन झाले आहे.

- एनआयओच्या गोवा मुख्यालयात तसेच प्रादेशिक केंद्रांवर अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत. यात ‘आर. व्ही. सिंधू संकल्प’ आणि ‘आर. व्ही. सिंधू साधना’ या दोन समुद्रीशास्त्रीय निरीक्षणासाठी सुसज्ज अशा जहाजांचा समावेश आहे.

-  अभ्यासासाठी तब्बल १५ हजार पुस्तके
आणि २० हजार शोधनियतकालिके असा ज्ञानसाठाही येथे आहे.
संस्थेत अनेक संशोधन घटकांचा समावेश आहे. मुख्यत्वे हिंदी महासागर जैविक केंद्र (आयओबीसी), जैविक समुद्र विज्ञान विभाग, भौतिक समुद्रशास्त्र विभाग, नियोजन आणि विदा विभाग, इत्यादी. गोव्यातील फील्ड युनिट मे १९६७ मध्ये सुरू केले गेले.

- आपल्या सभोवतालच्या समुद्रांबद्दल अभ्यास आणि पाण्याचे भौतिक, रसायन, जैविक, भूवैज्ञानिक, भू-भौतिक, अभियांत्रिकी आणि प्रदूषण या अनुषंगाने संशोधन करून ते ज्ञान सर्वासाठी खुले करणे, हे या संस्थेचे ध्येय आहे.
--------------------------------------------------

जीवनसत्त्व K के

_______________________________________

◾️रासायनिक नाव:-फायलोक्वीनोण

◾️प्रतिदिन गरज:-10 मायक्रो ग्राम

🔰मुख्य कार्य:-

◾️ रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करते

◾️गूलुकोजचे ग्लायकोजन मध्ये रूपांतर

◾️हाडांचा विकास

🔰 मुख्य स्रोत:-

◾️पालक,कोबी

◾️दूध , यकृत ,कडधान्ये

🔰 अभावाचा परिणाम

◾️रक्त गोठण्यास विलंब होतो

🔰आधिक्य चा परिणाम

◾️ऍनिमिया व कावीळ

_______________________________________

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) सहज एकदाच येई सांजवेळी II या काव्यातील रस ओळखा.

   1) करूण    2) श्रृंगार      3) वीर      4) शांत

उत्तर :- 2

2) खालील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

     वारुणी
   1) वायुरूपी    2) तट्टाणी    3) मद्य      4) तरूणी

उत्तर :- 3

3) ‘इत्थंभूत’ या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा.

   1) त्रोटक    2) सारखा    3) निराळा    4) समान

उत्तर :- 1

4) म्हणीच्या योग्य अर्थाचा पर्याय ओळखा. – ‘धर्म करता कर्म उभे राहते.’

   1) दुस-याचा अनुभव घेऊन चुका टाळाव्यात      2) आपले काम सोडून नको ती चौकशी करणे
  3) जे आपल्या येथे आहे तेच सर्व जगात असते    4) चांगले करताना नको ते निष्पन्न होणे

उत्तर :- 4

5) खालील वाक्यप्रकार ओळखा.
     ‘केवढी उंच इमारत ही ..........!’

   1) विधानार्थी    2) उद्गारार्थी    3) होकारार्थी    4) संकेतार्थी

उत्तर :- 2 

6) ‘निर्वासित’ या शब्दाचा अर्थ लिहा.

   1) परदेशात राहणारा        2) देश सोडून गेलेला
   3) घरादारासय व देशास पारखा झालेला    4) देशात राहणारा

उत्तर :- 3

7) शुध्द शब्द ओळखा.

   1) शरदचंद्र    2) शारिरीक    3) शारीरीय    4) शारदिय

उत्तर :- 3

8) ‘ई’ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ?
   1) संयुक्त    2) –हस्व      3) दीर्घ      4) स्वरादी

उत्तर :- 3

9) ‘पुनस् + स्थापन’ हा शब्द कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?

   1) पुर्नस्थापना    2) पुन:स्थापना    3) पुनर्स्थापना    4) पुनर्रस्थापना

उत्तर :- 2

10) खालील विधाने पहा :
  अ) सामान्यनामांची अनेक वचने होत नाहीत.      ब) विशेषनामांची अनेकवचने होतात.
         पर्यायी उत्तरांतून योग्य पर्यायी उत्तर  सांगा.

1) फक्त अ बरोबर  2) फक्त ब बरोबर    3) अ व ब बरोबर    4) अ व ब चूक

उत्तर :- 4

विषय : मराठी व्याकरण

*1】' रंगात येणे ' या वाक्प्रचारासाठी योग्य अर्थ निवडा. ?*

1) खूप मजा येणे
2) *तल्लीन होणे ☑*
3) विजय मिळवणे
4) फेर धरणे

*2】 ' बिंब ' या शब्दाला खालीलपैकी कोणते उपसर्ग जोडले असता बनणारा शब्द मूळ शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा असेल. ?*

1) गैर
2) यथा
3) *प्रति ☑*
4) बिन

*3】' कुस्ती खेळण्याची जागा ' या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. ?*

1) तट
2) *हौद ☑*
3) डोह
4) यापैकी नाही

*4】' शावक ' कोणाचे असते ?*

1) गाढवाचे
2) *हरणाचे ☑*
3) सिंहाचा
4) यापैकी नाही

*5】' भाव ' या शब्दाचा अर्थ असणारे पर्याय निवडा.  ?*

अ) भक्ती
ब) किंमत 
क) दर
ड) भावना

1) अ, ब, क
2) ब, क, ड
3) अ, क, ड
4) *अ, ब, क, ड ☑*

*6】खालीलपैकी मराठी उपसर्ग ओळखा. ?*

1) अनु
2) *अद ☑*
3) अप
4) अभि

*7】खालीलपैकी कोणत्या वाक्यात दर्शक सर्वनाम आलेले आहे. ?*

अ) ती मुलगी
ब) हा मुलगा आहे
क) ते चपळ बाळ आहे
ड) माणूस हा आळशी प्राणी आहे
इ) तो हत्ती दयाळू आहे

1) अ, ब, क
2) क, ड, इ
3) अ, क, ड
4) *ब, क, ड ☑*

*8】खालीलपैकी कोणत्या शब्दातील अंत्य 'अ' निभृत उच्चारला जातो. ?*

1) गृह
2) संत
3) *पान ☑*
4) शिस्त

*9】' आभाळगत माया तुझी आम्हांवरी राहू दे ! '  या ओळीत साधारण धर्म दर्शविणारा कोणता शब्द आला आहे ?*

1) आभाळ
2) गत
3) माया
4) *यापैकी नाही ☑*

*10】' तिचे मुख म्हणजे चंद्रबिंब होय ' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा ?*

1) *गौणी लक्षणा ☑*
2) शुद्धा लक्षणा
3) उपदान लक्षणा
4) लक्षण-लक्षणा

०४ मार्च २०२२

Mil Mi-17 हेलिकॉप्टर

🔸भूमिका : वाहतूक हेलिकॉप्टर 
(अनेक सशस्त्र आवृत्त्या देखील )

🔹राष्ट्रीय मूळ : सोव्हिएत युनियन आणि रशिया

🔸निर्माता : कझान हेलिकॉप्टर प्लांट
Ulan-Ude एव्हिएशन प्लांट

🔹डिझाइन गट : मिल मॉस्को हेलिकॉप्टर प्लांट

🔸पहिले उड्डाण : ७ जुलै १९६१

🔹परिचय :1967

🔸प्राथमिक वापरकर्ते : सोव्हिएत युनियन (ऐतिहासिक)

🔹निर्मिती  : 1961-आतापर्यंत

🔸संख्या  : 17,000+ आणि उत्पादन आज सुरू आहे; (जगातील सर्वाधिक उत्पादित हेलिकॉप्टर)

🔹रूपे : Mil Mi-8T / Mi-17

🔸Status. : In service

--------------------------------------------------------

परमहंस मंडळी

🔰 स्थापना - 31 जुलै 1849
🔰 ठिकाण - मुंबई
🔰 संस्थापक - दादोबा पांडुरंग तर्खडकर
🔰 अध्यक्ष - राम बाळकृष्ण(पाहिले आणि शेवटचे)
🔰 इतर सदस्य - भाऊ महाजन,आत्माराम पांडुरंग,

🔰उद्देश - ते एका देवावर विश्वास ठेवत (एकेश्वरवादाचा पुरस्कार)आणि रोटीबंदीचे बंधन तोडणे व जातीभेद मोडणे मुख्य उद्देश

🔰 इतर मुद्दे -
🔸ब्राम्हो समाज व त्यांच्या विचारांचा प्रभाव
🔸स्त्रियांसाठी शिक्षण, विधवा पुनर्विवाह यावरही त्यांचा विश्वास होता
🔸धर्मविवेचन,पारमहंसिक ही परमहंस सभेचे विचार सांगणारी दोन पुस्तके दादोबा पांडुरंग यांनी तयार केली
🔸सभेचे कार्य गुप्त पद्धतीने चाले
🔸सभेचे जनमानसात ओळख झाल्यावर समोर येणार होते,परंतु त्यांच्या सभासदांची यादी कुणी पळविल्यामुळे सभेची मंडळी घाबरली व सभेचे 1860 ला अस्तित्व संपले

🔰 ते दादोबाच्या सात तत्त्वांवर आधारित होते

१. केवळ देवाचीच पूजा केली पाहिजे
२. खरा धर्म हा प्रेम आणि नैतिक आचरणावर आधारित आहे
३. अध्यात्मिक धर्म एक आहे
४. प्रत्येक व्यक्तीला विचारस्वातंत्र्य असायला हवे
५. आपली कृती आणि बोलणे योग्य असावे
६. माणूस ही एक जात आहे
७. योग्य प्रकारचे ज्ञान सर्वांना द्यायला हवे

टिटू मीरची चळवळ :-1782-1831

✅ टिटू मीर उर्फ सय्यद मीर निसार अली:-
एक शेतकरी नेता व बंगालमधील तारीकाह-इ मुहम्मदियाचे नेते होते

✅ चळवळीचे उद्दिष्ट:-सुरुवातीला सामाजिक-धार्मिक सुधारणा, मुस्लिम समाजातील शिर्क (सर्वधर्म), बिदत (नवीनता)च्या प्रथा नष्ट करणे आणि मुस्लिमांना अनुसरण करण्यास प्रेरित करणे हे होते. 

✅ टिटू मीर हे वहाबी चळवळीचे संस्थापक सय्यद अहमद बरेलवी यांचे शिष्य होते.

✅ त्यांनी 1831 मध्ये नरकेलबेरिया उठावाचे नेतृत्व केले,बर्‍याचदा ब्रिटिशांविरुद्धचा पहिला सशस्त्र शेतकरी उठाव मानला जातो.

✅ त्यांनी नरकेलबेरिया गावात बांबूचा किल्ला बांधला

✅ त्याने बंगालच्या मुस्लिम शेतकर्‍यांना जमीनदार,जे बहुतांश हिंदू होते,आणि ब्रिटिश नीळ बागायतदार यांच्या विरोधात संघटित केले.

✅ ब्रिटीशांच्या नोंदीनुसार ही चळवळ उग्रवादी नव्हती, टिटूच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षातच त्याचा आणि ब्रिटीश पोलिसांचा सामना झाला.

✅ 1831 मध्ये कारवाईत तो मारला गेला.

धर्म सभा (Dharma Sabha)

🔸 स्थापना :-1830
🔸 संस्थापक :- राधाकांता देब
🔸 ठिकाण :- कोलकाता
🔸 धर्मसभा ही परंपरावादी हिंदू समाज होता.

🔷 कार्य :-

1⃣ या समाजाने समाजाच्या उदारमतवादी आणि मूलगामी सुधारणांचा निषेध केला उदा.सती प्रथा रद्द करणे इ.

2⃣धर्मसभेने हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा,1856 विरुद्ध मोहीम चालवली.

3⃣ या संघटनेची स्थापना प्रामुख्याने राजा राममोहन रॉय आणि हेन्री डेरोजिओ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सामाजिक सुधारणा चळवळींना तोंड देण्यासाठी करण्यात आली.

4⃣ संस्थेने लवकरच 'हिंदू जीवनशैली किंवा संस्कृतीच्या रक्षणासाठी समाज' मध्ये रूपांतर केले जे नंतर RSS साठी Think Tank बनले.

🔷 वृत्तपत्र :- समाचार चंद्रिका हे साप्ताहिक वृत्तपत्र
🔸 स्थापना :- 1822 मध्ये
🔸 संस्थापक :-भाबानी चरण बंदोपाध्याय
🔸 उद्देश :- हे धर्म सभेचे सनातनी हिंदू वृत्तपत्र होते.

वहाबी चळवळ / वलीउल्लाह चळवळ

▶️ स्थापना -18व्या शतकात अरेबियात
▶️ संस्थापक - अब्दुल वहाब
▶️ उद्देश - ही एक इस्लामिक शुद्धीकरण चळवळ
इस्लामची खरी व मूळ शिकवण पुनरुज्जीवित करने
▶️ भारतात - भारतातील वहाबी चळवळीचे प्रवर्तक रायबरेलीचे सय्यद अहमद 1820 मध्ये पटना (बिहार) येथे स्थापन

➡️ सय्यद अहमद यांच्यावर अरबचे अब्दुल वहाब आणि संत शाह वलीउल्लाह यांच्या शिकवणीचा प्रभाव होता

▶️ मुख्य मुद्दे - संघटनेचे मुख्य केंद्र - सीताना या ठिकाणी इनायत अलीच्या नेतृत्वाखाली लष्करी सैन्य तयार केले

➡️ मुख्य ध्येय - मूळ इस्लामची पुनर्स्थापना आणि काफिराविरुद्ध जिहाद पुकारने त्यांचा नायनाट करणे

➡️ सुरुवातीला हे पंजाबच्या शीख राज्याविरुद्ध जिहाद सुरू केले

➡️ नंतर ईस्ट इंडिया कंपनीमध्ये पंजाबचा समावेश झाल्यानंतर, त्याचे एकमेव लक्ष्य भारतातील इंग्रजी वर्चस्व बनले

➡️ ही चळवळ 1820 पासून सक्रिय, परंतु 1857 च्या उठावाच्या पार्श्वभूमीवर,त्याचे रूपांतर सशस्त्र प्रतिकार,ब्रिटिशांविरुद्धच्या जिहादमध्ये झाले

➡️ त्यानंतर ब्रिटिशांनी वहाबींना देशद्रोही आणि बंडखोर म्हणून संबोधले आणि वहाबींविरुद्ध व्यापक लष्करी कारवाया केल्या

ऑपरेशन आहट

✅ RPF ने ऑपरेशन आहट सुरू केले आहे.

✅ मानवी तस्करी रोखण्यासाठी (prevent human trafficking) रेल्वे संरक्षण दलाने (Railway Protection Force RPF) ऑपरेशन आहट सुरू केले आहे.

❄️ महत्वाचे मुद्दे

✅ यामध्ये प्रामुख्याने सीमावर्ती देशांमधून धावणाऱ्या गाड्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

✅ हे ऑपरेशन रेल्वे मंत्रालयाकडून केले जात आहे.

✅ ऑपरेशनचा एक भाग म्हणून, RPF लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये विशेष दल तैनात करेल.

✅ या ऑपरेशनमध्ये प्रामुख्याने महिला आणि मुलांची तस्करांपासून सुटका करण्यावर भर असेल आणि भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये हे ऑपरेशन राबविण्यात येईल.

✅ या कारवाईअंतर्गत RPF कडून सुगावा गोळा करणे, जुळवणे आणि त्याचे विश्लेषण करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

✅ याअंतर्गत मार्ग, बळी, स्रोत गंतव्य स्थाने, लोकप्रिय गाड्या यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे.

✅ या मोहिमेअंतर्गत सायबर सेल तयार करण्यात येणार आहेत.

✅ या ऑपरेशनमध्ये म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेश येथून निघणाऱ्या गाड्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल.

जगन्नाथ 'नाना' शंकरसेठच्या जीवनाचा संक्षिप्त लेखाजोखा

✅1803: 10 फेब्रुवारी 1803 रोजी शंकरसेठ यांचा भवानीदेवी मुंबई येथे जन्म झाला. (तत्कालीन बॉम्बे)

✅1822-बॉम्बे नेटिव्ह स्कूल आणि स्कूल बुक सोसायटीच्या स्थापनेत सक्रिय सहभाग
✅1822-त्यांच्या वडिलांचाही मृत्यू

✅1827- नानांच्या नेतृत्वाखाली एल्फिन्स्टन निधीची स्थापना. नंतर एल्फिन्स्टन हायस्कूल आणि कॉलेज सुरू केले

✅1829 - नानांनी सती प्रथेवर बंदी घालण्याच्या चळवळीचे नेतृत्व केले

✅1830-कृषी-हॉर्टिकल्चर सोसायटीची स्थापना झाली

✅1834 - नानांना शांततेचा न्याय बहाल करण्यात आला

✅1840- नाना  शिक्षण मंडळा
चे कार्यकारी सचिव झाले

✅1845- नानांच्या पाठिंब्याने ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली

✅1845 नाना रॉयल एशियाटिक सोसायटीचे सदस्य झाले आणि पुस्तकांच्या खरेदीसाठी 5,000/- रुपयांची देणगी दिली.

✅1846 - ग्रँट रोड येथील नानांच्या मालकीच्या जमिनीवर नाट्य सादरीकरणासाठी थिएटरची स्थापना झाली

✅1848- नानांच्या घरी मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली. स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली आहे

✅1850 - मच्छीमार समाजासाठी शाळा सुरू केली

✅1852- स्थानिक लोकांच्या मागण्या आणि तक्रारींना आवाज देण्यासाठी बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली.

✅1853- नानांच्या प्रेरणेने मुंबईत रेल्वेची सुरुवात. यासाठी त्यांनी १८४३ मध्ये ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनीची स्थापना केली होती.

✅1853- नानांच्या पुढाकाराने बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना झाली

✅1855- नानांनी लॉ कॉलेजची स्थापना केली

✅1857-जेजे स्कूल ऑफ आर्ट्स स्थापन करण्यात मदत.

✅1857- मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत नानांनी पुढाकार घेतला

✅1858- राणीचा बाग आणि आता जिजामाता उद्यान आणि डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय या नावाने ओळखले जाणारे संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव नानांनी सुरू केला.

✅1862 - नाना राज्यपालांना सल्ला देण्यासाठी स्थापन केलेल्या विधान मंडळाचे सदस्य झाले

✅1864- मुंबई महानगरपालिका कायदा तयार करण्यात नानांनी सक्रिय भूमिका बजावली.

✅1865- नाना यांचे ३१ जुलै १८६५ रोजी निधन झाले.

विधेयक मंजूर करण्यात राज्यपालांची भूमिका

✡ सध्या चर्चेत का आहे?

✡ राज्यपाल आर. एन. रवी यांनी परत पाठवलेले NEET परीक्षेबाबत विधेयक तामिळनाडू विधानसभेने पुन्हा एकदा मंजूर केले आहे. राज्यपालांनी हे विधेयक ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचे सांगत ते परत केले होते.

✡ सध्याच्या प्रकरणात, हे विधेयक राष्ट्रपतींकडे त्यांच्या संमतीसाठी पाठवावे लागेल, कारण ते केंद्रीय कायद्याद्वारे अंतर्भूत असलेल्या विषयावर समवर्ती सूचीमधील नोंदीनुसार लागू करण्यात आले आहे.

✡ भारतीय वैद्यकीय परिषद कायदयामध्ये 2016 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार कलम 10डी अंतर्गत NEET परीक्षा बंधनकारक आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी संमती दिली तरच राज्याचा कायदा लागू होऊ शकतो.

❄️ विधेयक मंजूर करण्यात राज्यपालांची भूमिका

✡ कोणतेही विधेयक राज्यपालाच्या संमतीशिवाय कायदयात रूपांतरित होत नाही. राज्य विधानमंडळाने विधेयक संमत केल्यानंतर ते राज्यपालाकडे संमतीसाठी सादर केले जाते.

✡ त्यावर राज्यपाल राज्य घटनेतील कलम 200 नुसार पुढील निर्णय घेऊ शकतात:

1. विधेयकाला संमती देऊ शकतात,

2. विधेयकाला संमती रोखून ठेवू शकतात,

3. ते विधेयक (अर्थ विधेयक वगळता) राज्य पुनर्विचारार्थ पाठवू शकतात.

4. ते विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात.

✡ यापैकी कोणत्याही कार्यासाठी राज्यघटनेत कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही.

✡ मात्र, राज्य विधानमंडळाने ते विधेयक सुधारणेसह किंवा त्याविना पुन्हा पारित केले आणि राज्यपालाकडे संमतीकरता सादर केले तर, राज्यपाल त्यास संमती देण्याचे रोखून ठेवू शकत नाही.

✡ मात्र, राज्यपाल धन विधेयक विधानमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. राज्यपाल धन विधेयकाला संमती देऊ शकतात किंवा ती रोखून ठेवू शकतात.

✡ जर ते विधेयक राज्याच्या उच्च न्यायालयाच्या बदल घडवून आणणारे असेल तर राज्य विधानमंडळाने संमत केलेले विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे राज्यपालास बंधनकारक असते.

या बरोबरच, पुढील परिस्थितीतही राज्यपाल ते विधेयक राखून ठेवू शकतोः

1. जर ते घटनेच्या तरतुदींना विसंगत असेल तर,

2. जर ते मार्गदर्शक तत्वांच्या विरोधी असेल तर,

3. जर ते देशाच्या व्यापक हितसंबंधांच्या विरोधी असेल तर,

4. जर ते राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे असेल तर,

5. जर ते घटनेच्या कलम 329 अन्वये संपत्तीच्या अनिवार्य संपादनाशी संबंधित असेल तर.

✡ ज्यावेळी राज्यपाल एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवतात त्यावेळी त्या विधेयकाच्या बाबतीत राज्यपालाची भूमिका संपुष्टात येते.

✡ राष्ट्रपतींनी राज्यपालाला ते विधेयक (धन विधेयक वगळता) राज्य विधानमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठविण्याबाबत निर्देश दिल्यास, आणि राज्य विधानमंडळाने असे विधेयक सुधारणेसह किंवा त्याविना पारित केल्यास राज्यपालाला ते विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ पुन्हा राखून ठेवावेच लागते.

✡ राष्ट्रपतींनी विधेयकास संमती दिल्यास त्याचे कायद्यात रूपांतर होते, त्यासाठी राज्यपालाच्या संमतीची आवश्यकता नसते.

फरियादी चळवळ (Faraizi Movement)

संस्थापक :-  हाजी शरियतुल्ला, 1818 मध्ये
ठिकाण :- फरीदपूर (बंगाल)
मुख्यालय :-  बहादूरपूर
उद्देश :- धार्मिक शुद्धी व बंगाली मुस्लिमांतील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी,इस्लामवादी पुनरुज्जीवनवादी चळवळ होती.

🔰 नंतर या चळवळीने आर्थिक व राजकीय स्वरूप धारण केले.

🔰 हाजी शरीअतुल्ला यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अहमद दुदू मियाँ चळवळीचा नेता झाला यांच्याकडे संघटनकौशल्य होते.

🔰 1838 मध्ये,त्यांच्या नेतृत्वाखाली,अनुयायांना भाडे न देण्याचे आणि नीळ पेरण्यासाठी नीळ बागायतदारांच्या आदेशाची अवज्ञा करण्याचे आणि कर भरण्यास नकार देण्यास आवाहन केले.

🔰 त्यांनी शेतकर्‍यांना जमीनदार आणि नीळ बागायतदारांविरुद्ध एकत्र करून त्यांच्यात नवीन जागृती निर्माण केली.

🔰 त्यांना जुलै,1857 मध्ये अटक केली व अलीपूरच्या तुरुंगात ठेवले.

🔰 ते 24 सप्टेंबर,1860 - बहादूरपूर येथे मृत्यू पावले.

❇️ Additional Information

🔰19व्या शतकातील इतर काही मुस्लिम सामाजिक-धार्मिक चळवळी होत्या.

१. वहाबी चळवळ - शाह वल्लुल्लाह यांनी
२. अहमदिया चळवळ - मिर्झा गुलाम अहमद यांनी
३. अलीगड चळवळ - सर सय्यद अहमद खान यांनी.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...