०२ मार्च २०२२

महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार

महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.

महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:

१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती

३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

४. आर्द्र-पानझडी वनस्पती

५. शुष्क पानझडी वनस्पती

६. रूक्ष काटेरी वनस्पती

७. खाजण वनस्पती

◾️उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग भागात सावंतवाडी परिसरात ही सदाहरित वने पाहायला मिळतात. ज्या प्रदेशात २०० सें. मी. पेक्षा जास्त पाऊस पडते त्या भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित वने असतात.साचा:ए बी सवडी या प्रदेशातील आर्द्रतेचे जास्त प्रमाण व जमिनीमध्ये हुयमसचे प्रमाण जास्त असल्याने या वृक्षांची उंची ४५ ते ६० मी. दरम्यान असते. सदाहरित वृक्षांचे नागचंपा, पांढरा सीडार, फणस, कावसी, जांभूळ अशी उदाहरणे आहेत.

आर्थिक महत्त्व- या वनाचा आर्थिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात उपयोग होतो. त्याचे कारण या वनस्पतीपासून तयार होणारे लाकूड अतिशय कठीण असल्याने ते टिंबर म्हणून वापरण्यास योग्य असत नाही.

उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने

वार्षिक पर्जन्य २०० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात निमसदाहरित अरण्ये आढळतात. सदाहरित वने पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पट्टा पाहायला मिळतो. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात काही वनस्पती व आंबोली, लोणावळा, इगतपुरीच्या परिसरात निमसदाहरित वने आढळतात. हे वृक्ष सदाहरित अरण्यापेक्षा जास्त उंचीचे असते. निमसदाहरित अरण्यात किंडल, रानफणस, नाना, कदम, शिसम, बिबळा हे वृक्ष आढळतात.

◾️उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने

महाराष्ट्रात हि अरण्ये प्रामुख्याने २५० से मी पर्जन्य पडणाऱ्या भागात आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान  आणि भीमाशंकरच्या परिसरात उपउष्ण सदाहरित अरण्ये आहेत. पावसाचे भरपूर प्रमाण, तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्वरूपाचे तापमान दीर्घकाळ पाऊस आणि आद्रता सर्व घटकामुळे सदाहरित वृक्ष आढळतात. सदाहरित अरण्यात जांभळा, आंबा, हिरडा, बेहडा, कारवी हे वृक्ष आढळतात. हिरडा या झाडाचे वृक्ष टणक आहेत.थंड हवेच्या ठिकाणी अशी वने आढळतात.

◾️उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी अरण्ये

सातपुडा पर्वत आणि अजिंठा डोंगररांगात वृक्ष पानझडी अरण्ये आढळतात. वार्षिक पर्जन्य ८० ते १२९ से मी अरण्यात हि अरण्ये कमी प्रमाणात आढळून येतात. उष्ण कटिबंधीय वृक्ष, धावडा, शिसम, तेंदू, पळस, लेडी, हेडी, बबेल, खैर, अंजन इ. या अरण्यातील वनस्पतीचा उपयोग हा टीबर म्हणून व्यापारी दृष्टीने केला जातो. खैर वनस्पतीचा उपयोग कात करण्यासाठी केला जातो.

◾️उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने

ही वने प्रामुख्याने विदर्भाच्या पश्चिम भागात वर्धा-वैनगंगा नद्यांच्या खोर्‍यात आढळतात. वार्षिक पर्जन्य 80 ते 120 से. मी. दरम्यान ही वने आढळतात. या वृक्षांची उंची 25 ते 30 सें.मी.असते. ही वृक्ष आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची असतात. यामध्ये सागवान, खैर, तेंदू, बैल, बीजसाल, कुसुम, तीवस, रोहन, सावन, चारोळी, इ.

◾️उष्ण कटिबंधीय काटेरी वने

दख्खनच्या पठारावर मध्य महाराष्ट्रात नद्यांच्या खोऱ्यात लागवडीच्या परिसरात असणाऱ्या डोंगरावर आणि कमी उंचीच्या पठारावर काटेरी वने आढळतात. संपूर्ण महाराष्ट्रात काटेरी वने आढळतात. वार्षिक पर्जन्य ८० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात हि वने आढळतात. बाभूळ, खैर, हिवर हे वृक्ष आढळतात. तारवड सारख्या झुडुपचा उपयोग केला जातो.महाराष्ट्रात खूप ठिकाणी काटेरी झुडपे आढळून येतात.

सदाहरित वने

महाराष्ट्रात सदाहरित वने तुरळक प्रमाणात आढळतात. विपुल पर्जन्याच्या प्रदेशात पठारी अथवा दऱ्याखोऱ्यात हिरवीगार वने आढळतात. या भागात ३०० ते ६०० से.मी पर्जन्य असते. या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान,भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात. पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात. या वनांत खालील सदाहरितवृक्ष मुख्यत्वेकरुन आढळतात. जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजर, आंबगा, लालदेवदार, वगैरे, झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरेआढळतात. विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ गारबी,पळसवेल, वाटोळी,वगैरे अजस्त्र वेली आढळतात.

आद्र पानझडी वने

घाटमाथ्यावरुन खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगरउतारावर, व सपाट भागावर या प्रकारची वने आढळतात. पर्जन्यमान 150 ते 200सेंमी निचऱ्याची जमीन, उष्णतामान यांमुळे सागवान वृक्ष असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची 30 - 35 मी.पर्यंत असू शकते व्यापारी दृष्टया अशा वनांचे महत्त्व फार आहे. वृक्षांमध्ये सागवान वत्याच्याबरोबरच शिसम, सावर, बीजा, हळदू कळंब, ऐन बोंडारा, शिरीष अर्जुनसादडा, धावडाइ. उपयुक्त वृक्ष सापडतात.

शुष्क पानझडी वने

शुष्क पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वात जास्त असते.उन्हाळयामध्ये तर अशा वनामध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात. अशारानात सागवान वृक्षही आढळतात. असाणा, तिवस,सावर, चारोळी, आवळा, बेहडा, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण, टेंबुणीर वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, आपटा,तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात. इमारती लाकडाच्या दृष्टीनेया प्रकारच्या वनांना कमी महत्त्व असले, तरी भरपूर जळाळु लाकडाचा पुरवठा करणारीजंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जातात. अशा रानातील वृक्षांची वाढ अतिशय हळू असल्याने जर अनिर्बंध लाकूडतोड सुरु झाली तर सर्व प्रदेश वैराण होण्यासवेळ लागत नाही. अशा वनात दुय्यम उत्पन्न देणाऱ्या वनस्पती म्हणजे तेंदू, गवते,औषधी वनस्पती, इ. लावून अशा जंगलाचे महत्त्व वाढविता येईल.

झुडपी व काटेरी वने

पठारी प्रदेशातील 80 सें.मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात वनस्पती अगदी विरळ आहेत. या भागातील कमी व नापीक जमीन ही अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात सोलापूर, मराठवाडाव पश्चिम विदर्भात अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. काटेरी खुज्या वनस्पती वत्यांच्याबरोबर गवताळ माळराने असे दृश्य सर्वत्र दिसते. बाभूळ, बोर, खैर, निंब हे वृक्ष आणि तरवड, टाकळा, निवडुंग इत्यादी झुडपे व अनेक प्रकारची गवते त्या भागात मात्र पानझडी जातीचे वृक्ष आढळतात

जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती

खनिज संपत्ती:-उत्पादन करणारे देश

कोळसा दगडी(उत्पादन):-चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन.

कोळसा दगडी(वापर करणारे):-चीन, अमेरिका, भारत, रशिया.

अभ्रक:-भारत, द.आफ्रिका, घाना.

क्रोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.

जस्त:-अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.

टिन:-मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.

टंगस्टन:-चीन, द.कोरिया, रशिया.

तांबे:-अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.

तेल, खनिज:-रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.

निकेल:-कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.

बॉक्साईट:-ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.

सोने:-द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.

युरेनियम:-द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.

पारा:-इटली, स्पेन, अमेरिका.

मंगल (मॅगनीज):-रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.

लोहखनिज(साठे):-अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.

लोहखनिज (उत्पादन):-रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.

शिसे:-ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया...

महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा – गोंदिया

प्रमुख तलाव –

 ताडोबा, घोडझरी, असोलामेंढा (चंद्रपुर),

नवेगांव, बोदलकसा, चोरखमारा (गोंदिया),

रामसागर (नागपूर),

लोणार (बुलढाणा),

अंबाझरी (नागपूर),

आंध्रलेक (पुणे),

धामापूर (रत्नागिरी),

मुंबईस पाणीपुरवठा करणारे तलाव – भातसा, ताणसा, वैतरणा, पवई विहार (मुंबई)

अंबाझरी –    नागपुर

रामसागर –    नागपूर

नवेगाव –    गोंदिया

बोदलकसा –    गोंदिया

ताडोबा –    चंद्रपूर

असेलमेंढा –    चंद्रपूर

सिंदेवाही –    चंद्रपूर

लक्ष्मी –    कोल्हापूर

चोरखमारा –    गोंदिया

खळबंद –    गोंदिया

चुलबंद –    गोंदिया

शिवनी –    भंडारा

लोणार –    बुलढाणा

विसापूर –    नगर

रंकाळा –    कोल्हापूर

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार.

🧩व्दिपकल्प - 

🅾एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

🧩 भूशीर - 

🅾व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.

🧩खंडांतर्गत समुद्र -

🅾 मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.

🧩 बेट - 

🅾एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.

🧩 समुद्रधुनी -

🅾 काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

 🧩संयोगभूमी - 

🅾दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.

 🧩आखात - 

🅾उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.

🧩खाडी - 

🅾आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.

🧩 समुद्र किंवा सागर - 

🅾महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.
उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र.

🧩 उपसागर - 

🅾खार्‍या पाण्याच्या ज्या  जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर 

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

कंपनीच्या राज्यसत्तेत गाजलेले बंगालचे गव्हर्नर जनरल.


🅾भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन

🅾 लॉर्ड क्लाईव्ह(1756 ते 1772) :-
भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना.

🅾प्लासिचे युद्ध :- जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला.

🅾बक्सरची लढाई :- बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला.

🅾अलाहाबादचा तह :- बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली.

🅾सर वॉरन हेस्टिंग(सन 1772 ते 1773) :-
सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली.

🅾भारतातील पहिले वृत्तपत्र *बंगाल गॅझेट* (1781) याच काळात सुरू झाले.

🅾लॉर्ड कॉर्नवॉलीस(1786 ते 1793) :-
लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात.

🅾लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-
लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला.

🅾तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली.

🅾सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला.

🅾मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज (सन 1813 ते 1823) :-मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली.

🅾जून 1818 मध्ये एलफिन्स्टनच्या सेनेने कोरेगावाच्या लढाईत बाजीराव पेशव्याच्या सेनेचा निर्णायक पराभव करून पेशवेशाही खालसा केली.

🅾लॉर्ड विल्यम बेंटीक (1823 ते 1833) :-लॉर्ड विल्यम बेंटिकने सन 1829 मध्ये सती प्रथा बंद कायदा पास केला.

🅾भारतीय लोकांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा ही शिक्षणाचे माध्यम राहील असे जाहीर केले.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

ब्रिटिशकालीन आदिवासी उठाव व ठिकाणे

1. फकीर उठाव
◆ नेतृत्व:- मजनुशाह
◆ स्थान:- बंगाल
◆ 1776-77
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
2. रंगपूर उठाव
◆ नेतृत्व:- धीरज नारायण
◆ स्थान:- बंगाल
◆ 1783
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
3. पागलपंथी उठाव
◆  नेतृत्व:- टिपू शाह
◆  स्थान:- बंगाल
◆  1813-31
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
4. पाईका उठाव
◆ नेतृत्व:- बक्षी जगबंधु विद्याधर
◆ स्थान:- उडिशा
◆ 1817-25
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
5. फैरेजी उठाव
◆ नेतृत्व:- दादू मिया
◆ स्थान:- बंगाल
◆ 1820-58
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
6. अहोम उठाव
◆ नेतृत्व:- गोमूधर कुवर
◆ स्थान:- आसाम
◆ 1828-33
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
7. खासी उठाव
◆  नेतृत्व:- तिरथ सिंग
◆  स्थान:- मेघालय
◆ 1830-33
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
8. कुका उठाव
◆ नेतृत्व:- भगवत जवाहरमल/रामसिह कुका
◆ स्थान:- पंजाब
◆ 1840-72
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
9. मणिपूर उठाव
◆ नेतृत्व:- राणी गैडील्यु
◆ स्थान:- मणिपूर
◆ 1920-35
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

डॉ. रामकृष्ण विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड

 (इ.स. १८२४ - मे ३१, इ.स. १८७४)

हे मराठी इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते. 

▫️  लाडांचा जन्म १८२२ साली तत्कालीन पोर्तुगीज गोव्यात मांजरे गावी, एका सामान्य सारस्वत कुटुंबात झाला. लाडांचे वडील मातीच्या मूर्ती घडवणारे मूर्तिकार होते.

▫️  बालपणी लहानग्या रामकृष्णाची बुद्धिबळातील चमक पाहून एका इंग्रज गृहस्थांनी रामकृष्णाच्या वडिलांना त्याला इंग्रजी शाळेत पाठवण्यासाठी राजी केले. इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी लाड मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात दाखल झाले. शालेय अभ्यासातही चमक दाखवत त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या. या काळातच लाडांचे वडील वारले.

▫️ वडिलांपश्चात त्यांनी आपल्या आईची व धाकटा भाऊ नारायण यांची जबाबदारी वाहिली. नारायण दाजी लाड देखील शिकून पुढे डॉक्टर बनले.

▫️  शालेय शिक्षणानंतर लाडांना एल्फिन्स्टन विद्यालयातच शिकवण्याची नोकरी मिळाली. या काळात त्यांनी प्राचीन संस्कृत वाङ्मय अभ्यासले व संस्कृत साहित्यिकांच्या जीवनकाळाबद्दल, कालनिश्चितीबद्दल, तसेच गुप्तकालीन इतिहासाबद्दल त्यांनी मोलाचे संशोधन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील ग्रॅंट मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला.

▫️ १८५० साली वैद्यकीचा अभ्यासक्रम पुरा करणाऱ्या पदवीधरांच्या पहिल्या तुकडीत ते होते.

▫️ १८५१ साली त्यांनी मुंबईत डॉक्टरकी आरंभली. वैद्यकीय पेशास अनुसरत त्यांनी वैद्यकीतही संशोधन केले.

▫️ महारोगावरील औषधाचा त्यांनी लावलेला शोध, हे त्यांचे वैद्यकशास्त्रातील मोठे योगदान आहे.

▫️   त्यांच्या कामामुळे मुंबईतील एतद्देशीय व इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका इत्यादी परदेशांतील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व बहाल केले. सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

▫️ विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षणव अंधश्रद्धा निर्मूलन यांविषयीच्या उपक्रमांना त्यांनी पाठबळ पुरवले. मुंबईतील प्रशासकीय, राजकीय सुधारणांमध्येही त्यांनी स्वारस्याने भाग घेतला. 

▫️ १८६९ व १८७१ सालीं अशा दोन वेळा ते मुंबईच्या नगरपालपदासाठी निवडले गेले.

▫️ मे ३१, १८७४ रोजी लाड यांचे निधन झाले.

प्रश्नसंच.

🅾रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी विवेकानंद

🅾आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती

🅾प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- आत्माराम पांडुरंग

🅾सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर----------महात्मा फुले

🅾दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

🅾इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?उत्तर----------- न्या. रानडे

🅾मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

🅾निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

🅾महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर ------------- लोकमान्य टिळक

🅾आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------- पंडिता रमाबाई

🅾हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर-------------- महात्मा गांधी

🅾भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

🅾गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर -------------- विनोबा भावे

🅾सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- रमाबाई रानडे

🅾एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर-------------- न्या. रानडे

🅾परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर------------- दादोबा पांडुरंग

🅾दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🅾सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- ग. वा. जोशी

🅾शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)

🅾 ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

निवडणूक आयोगाचे अधिकार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कलम 424(1) मधील कार्यकारीद्वारे निवडणूक आयोगाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाऊ शकत नाही.याचे अधिकार केवळ निवडणुकांशी संबंधित घटनात्मक उपाययोजना आणि संसदेने बनविलेल्या कायद्याद्वारेच संचालित केले जातात. निवडणुका देखरेख, थेट, नियंत्रण आणि आयोजन करण्याची शक्ती संसद कायदा ज्या देशात असेल तेथे स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका घेण्याचेदेखील सूचित केले गेले आहे संबंध गप्प नाही करण्यासाठी असावे निवडणूक आयोगाने अमर्याद शक्ती, तथापि, नैसर्गिक न्याय, कायदा आणि शक्ती वापर नियम आहे
n निवडणूक विधीमंडळ नाही Ullg करू शकता ँ बांधले पद्धत किंवा स्वयंसेवी काम न्यायालयीन पुनरावलोकनास पात्र असे निर्णय घेऊ शकतात
निवडणूक आयोगाचे अधिकार निवडणूक कायद्याच्या पूरक असतात आणि प्रभावी आणि कायदेशीर प्रक्रियेद्वारे बनविलेल्या कायद्याविरुध्द त्यांचा उपयोग करता येणार नाही,
हे आयोग निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणूकीचे वाटप करण्याचे थेट निर्देश आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याचे अधिकार ठरवू शकते . ठेवते
म्हणतो की, तो निवडणूक कार्यक्रम Nirdhari फक्त न्यायासनासमोर आहे की, त्याच्या शक्ती सर्वोच्च न्यायालयात अर्थ लावणे निवडणूक केवळ कार्य करण्यासाठी
कायदा 1951 कलम 14,15 अध्यक्ष लोकप्रतिनिधी, निवडणूक सूचना जारी राज्यपाल अधिकार याद्वारे आयोगाच्या सल्ला नुसार समस्या करण्यासाठी अधिकृत आहे.

🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

भारताचा नियंत्रक व महालेखापरिक्षक" कॅग (CAG)

- घटनेच्या भाग 5 मधील प्रकरण 5 दरम्यान कलम 148 ते 151 दरम्यान या पदाच्या तरतुदी आहेत.

- कलम 148(1) : नुसार भारताला एक कॅग असेल ज्याची नेमणुक राष्ट्रपती(पंतप्रधानांच्या सल्ल्याने)  करतात.

- सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या प्रमाणे पदावरून बडतर्फ केले जाते त्याच प्रमाणे कॅगला पदावरून दूर केले जाते.

- कलम 148(2) : कॅगला शपथ हे परिशिष्ट 3 मधील शपथेच्या नमुन्यानुसार राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती देते.

- कलम 148(3) : कॅगचे वेतन तसेच निवृत्तीवेतन संसद ठरवील त्याप्रमाणे परिशिष्ट 2 प्रमाणे दिले जातील.

- कलम 148(4) : पदावधी संपल्यावर कॅग पुन्हा केंद्र किंवा राज्य सरकार मध्ये कोणत्याही पदास पात्र असत नाही.

- कलम 148(5) : कॅगच्या अधिकारात ते पदावर असताना कोणतेही बदल करायचे असल्यास कॅगशी विचारविनिमय करून राष्ट्रपती करतील.

- कलम 148(6) : कॅग व त्यांचा प्रशासकीय व कार्यालयीन खर्च हा भारताचा संचित निधीतून केला जाईल.

- कॅग राजीनामा ध्यायचा असल्यास राष्ट्रपतीला देतील.

"कॅग" विषयी अन्य घटनात्मक तरतुदी :

कलम 149 : कॅगचे कर्तव्य व अधिकार

- कॅगची कर्तव्ये व अधिकार कायदा, 1971 नुसार कॅगची कामे सांगण्यात आली.

- 1976 साली या कायद्यात बदल करून कॅगची लेखविषयक कामे काढून केवळ लेखा परीक्षण कामे ठेवण्यात आली.

कलम 150 : कॅग राष्ट्रपतींना केंद्र व राज्यसरकारचे लेखे कोणत्या नमुन्यात ठेवावेत याबाबत सल्ला देतात.

कलम 151(1) : कॅग केंद्र सरकारचे लेखा अहवाल राष्ट्रपतींना देतात तर राष्ट्रपती ते अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहात मांडतात.

कलम 151(2) : कॅग राज्य सरकारचे लेखा अहवाल राज्यपालना देतात तर राज्यपाल ते अहवाल राज्य विधिमंडळासमोर प्रत्येक सभागृहात मांडतात.

विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती

घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत

विधानसभेची रचना :
170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.

राखीव जागा :
घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 29 तर अनुसूचीत जमातीसाठी 25 राखीव जागा आहेत.

निवडणूक :
प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.

उमेदवारांची पात्रता :
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.
सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.

गणसंख्या : 1/10

अधिवेशन :
दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापती :

विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

सभापतीचे कार्य आणि अधिकार :

1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.
2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.
3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.
4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.

जनरल माहिती :

1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.
2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.
3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.
4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.
5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.
6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.
7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.
8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.

संसदेविषयी महत्त्वाची माहीती.

🅾 एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्‍यावी लागतात.

🅾संसदेच्‍या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्‍तीत जास्‍त सहा महिने असू शकतो.

🅾नागरिकत्‍व नियमित करण्‍याचा अधिकार संसदेस आहे.

🅾 राज्‍यघटनेतील तरतुदी बदलण्‍याचा अधिकार केवळ संसदेला आहे.

🅾घटनेच्‍या कलम ३०२ नुसार विविध निर्बंध लादण्‍याचे अधिकार संसद यांना आहेत.

🅾 संरक्षण या विषयावर कायदा करण्‍याचे सर्वस्‍वी अधिकार संसदेस आहेत.

🅾जेव्‍हा राज्‍यात राष्‍ट्रपती-शासन कलम ३५६ अन्‍वये लागू होते, तेव्‍हा राज्‍य यादीतील कर कायदे संमत करण्‍याचे अधिकार संसद अथवा संसदेने विहित केले प्राधिकारी यांना आहेत.

🅾 विधेयकाचे रूपांतर विधिनियमात होण्‍यासाठी त्‍यांला तीन टप्‍प्‍यातून जावे लागते.

🅾करात कपात किंवा कर रद्द करण्‍याविषयी तरतूद असलेले विधेयक राष्‍ट्रपतीच्‍या शिफारशीशिवाय मांडता येतो.

🅾 सामान्‍यत: वित्त विधेयकाची मसंडणी व प्रविष्‍टीकरण राष्‍ट्रपतींची शिफारस असल्‍याशिवाय शक्‍य होत नाही.

🅾वित्त विधेयकाची मांडणी राष्‍ट्रपती यांच्‍या शिफरशीवरून केली जाते.

🅾 विधेयक वित्त विधेयक आहे/नाही असा प्रश्‍न उद्भवचल्‍यास अंतिम निर्णय लोकसभेचे सभापतीचा असतो.

🅾वित्त विधेयक हे कर, कर्जे व खर्च याबाबत असते.

🅾 वित्त-विधेयक प्रथमत: लोकसभेत मांडले जाते.

🅾सर्व वित्त विधेयके (Financial Bills) ही धन विधेयके (Money Bills) असतात.

🅾 राज्‍यघटनेच्‍या कलम ३३० व ३३२ अनुसार लोकसभा व राज्‍याच्‍या विधानसभांनी अनुसूचित जाती व जमातींसाठी खास राखीव जागा ठेवल्‍या आहेत.

🅾लोकसभेमध्‍ये केंद्रशासित प्रदेशांमधून १३ सदस्‍य निवडले जातात.

🅾 लोकसभेच्‍या पहिल्‍या मध्‍यावधी निवडणुका १९७१ मध्‍ये घेण्‍यात आल्‍या.

🅾 आणीबाणीच्‍या काळात लोकसभेचा कार्यकाळ एक वर्ष पर्यंत वाढवता येतो.

🅾राज्‍यसभा कधीच बरखास्‍त केली जात नाही.

🅾 राज्‍यसभेच्‍या सभासदाचा कार्यकाळ ६ वर्षाचा असतो.

🅾लोकसभेने पारित केलेले व राज्‍य सभेकडे शिफारशीकरिता पाठवलेले वित्त विधेयक १४ दिवसात परत पाठवणे हे राज्‍यसभेवर बंधनकारक आहे.  

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे



❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल


❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन


❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन


❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन


❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड


❇️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन


❇️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन


❇️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड


❇️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन


❇️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड


❇️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल


❇️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल


❇️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन

विज्ञान मैत्री प्रश्नमंजूषा💡 🍀 उत्तरासाहित


१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते ✅✅
३) कमी होते
४) समान राहते
〰〰〰〰〰〰〰〰〰
२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर✅✅
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी
〰〰〰〰〰〰〰〰〰
३) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ...........
१) नसते✅✅
२) असते
३) दोन्हीपैकी नाही
४) समान असते
〰〰〰〰〰〰〰〰〰
४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी✅✅
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन
〰〰〰〰〰〰〰〰〰
५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती✅✅
४) मानवी प्राणी
〰〰〰〰〰〰〰〰〰
६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी✅✅
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे
〰〰〰〰〰〰〰〰〰
७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण ✅✅
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा
〰〰〰〰〰〰〰〰〰
८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त✅✅
३) वलयांकित
४) वरील सर्व
〰〰〰〰〰〰〰〰〰
९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव ✅✅
२) किटक
३) विषाणू
४) कृमी
〰〰〰〰〰〰〰〰〰
१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा✅✅
४) नाक
〰〰〰〰〰〰〰〰〰
११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती✅✅
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार
〰〰〰〰〰〰〰〰〰
१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव✅✅
३) साथीचे रोगविषयक
४)  यापैकी नाही
〰〰〰〰〰〰〰〰〰

Online Test Series

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...