०२ मार्च २०२२

कंपनीच्या राज्यसत्तेत गाजलेले बंगालचे गव्हर्नर जनरल.


🅾भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन

🅾 लॉर्ड क्लाईव्ह(1756 ते 1772) :-
भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना.

🅾प्लासिचे युद्ध :- जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला.

🅾बक्सरची लढाई :- बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला.

🅾अलाहाबादचा तह :- बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली.

🅾सर वॉरन हेस्टिंग(सन 1772 ते 1773) :-
सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली.

🅾भारतातील पहिले वृत्तपत्र *बंगाल गॅझेट* (1781) याच काळात सुरू झाले.

🅾लॉर्ड कॉर्नवॉलीस(1786 ते 1793) :-
लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात.

🅾लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-
लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला.

🅾तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली.

🅾सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला.

🅾मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज (सन 1813 ते 1823) :-मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली.

🅾जून 1818 मध्ये एलफिन्स्टनच्या सेनेने कोरेगावाच्या लढाईत बाजीराव पेशव्याच्या सेनेचा निर्णायक पराभव करून पेशवेशाही खालसा केली.

🅾लॉर्ड विल्यम बेंटीक (1823 ते 1833) :-लॉर्ड विल्यम बेंटिकने सन 1829 मध्ये सती प्रथा बंद कायदा पास केला.

🅾भारतीय लोकांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा ही शिक्षणाचे माध्यम राहील असे जाहीर केले.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

ब्रिटिशकालीन आदिवासी उठाव व ठिकाणे

1. फकीर उठाव
◆ नेतृत्व:- मजनुशाह
◆ स्थान:- बंगाल
◆ 1776-77
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
2. रंगपूर उठाव
◆ नेतृत्व:- धीरज नारायण
◆ स्थान:- बंगाल
◆ 1783
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
3. पागलपंथी उठाव
◆  नेतृत्व:- टिपू शाह
◆  स्थान:- बंगाल
◆  1813-31
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
4. पाईका उठाव
◆ नेतृत्व:- बक्षी जगबंधु विद्याधर
◆ स्थान:- उडिशा
◆ 1817-25
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
5. फैरेजी उठाव
◆ नेतृत्व:- दादू मिया
◆ स्थान:- बंगाल
◆ 1820-58
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
6. अहोम उठाव
◆ नेतृत्व:- गोमूधर कुवर
◆ स्थान:- आसाम
◆ 1828-33
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
7. खासी उठाव
◆  नेतृत्व:- तिरथ सिंग
◆  स्थान:- मेघालय
◆ 1830-33
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
8. कुका उठाव
◆ नेतृत्व:- भगवत जवाहरमल/रामसिह कुका
◆ स्थान:- पंजाब
◆ 1840-72
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
9. मणिपूर उठाव
◆ नेतृत्व:- राणी गैडील्यु
◆ स्थान:- मणिपूर
◆ 1920-35
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

डॉ. रामकृष्ण विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड

 (इ.स. १८२४ - मे ३१, इ.स. १८७४)

हे मराठी इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते. 

▫️  लाडांचा जन्म १८२२ साली तत्कालीन पोर्तुगीज गोव्यात मांजरे गावी, एका सामान्य सारस्वत कुटुंबात झाला. लाडांचे वडील मातीच्या मूर्ती घडवणारे मूर्तिकार होते.

▫️  बालपणी लहानग्या रामकृष्णाची बुद्धिबळातील चमक पाहून एका इंग्रज गृहस्थांनी रामकृष्णाच्या वडिलांना त्याला इंग्रजी शाळेत पाठवण्यासाठी राजी केले. इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी लाड मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात दाखल झाले. शालेय अभ्यासातही चमक दाखवत त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या. या काळातच लाडांचे वडील वारले.

▫️ वडिलांपश्चात त्यांनी आपल्या आईची व धाकटा भाऊ नारायण यांची जबाबदारी वाहिली. नारायण दाजी लाड देखील शिकून पुढे डॉक्टर बनले.

▫️  शालेय शिक्षणानंतर लाडांना एल्फिन्स्टन विद्यालयातच शिकवण्याची नोकरी मिळाली. या काळात त्यांनी प्राचीन संस्कृत वाङ्मय अभ्यासले व संस्कृत साहित्यिकांच्या जीवनकाळाबद्दल, कालनिश्चितीबद्दल, तसेच गुप्तकालीन इतिहासाबद्दल त्यांनी मोलाचे संशोधन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील ग्रॅंट मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला.

▫️ १८५० साली वैद्यकीचा अभ्यासक्रम पुरा करणाऱ्या पदवीधरांच्या पहिल्या तुकडीत ते होते.

▫️ १८५१ साली त्यांनी मुंबईत डॉक्टरकी आरंभली. वैद्यकीय पेशास अनुसरत त्यांनी वैद्यकीतही संशोधन केले.

▫️ महारोगावरील औषधाचा त्यांनी लावलेला शोध, हे त्यांचे वैद्यकशास्त्रातील मोठे योगदान आहे.

▫️   त्यांच्या कामामुळे मुंबईतील एतद्देशीय व इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका इत्यादी परदेशांतील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व बहाल केले. सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

▫️ विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षणव अंधश्रद्धा निर्मूलन यांविषयीच्या उपक्रमांना त्यांनी पाठबळ पुरवले. मुंबईतील प्रशासकीय, राजकीय सुधारणांमध्येही त्यांनी स्वारस्याने भाग घेतला. 

▫️ १८६९ व १८७१ सालीं अशा दोन वेळा ते मुंबईच्या नगरपालपदासाठी निवडले गेले.

▫️ मे ३१, १८७४ रोजी लाड यांचे निधन झाले.

प्रश्नसंच.

🅾रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी विवेकानंद

🅾आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती

🅾प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- आत्माराम पांडुरंग

🅾सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर----------महात्मा फुले

🅾दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

🅾इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?उत्तर----------- न्या. रानडे

🅾मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

🅾निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

🅾महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर ------------- लोकमान्य टिळक

🅾आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------- पंडिता रमाबाई

🅾हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर-------------- महात्मा गांधी

🅾भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

🅾गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर -------------- विनोबा भावे

🅾सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- रमाबाई रानडे

🅾एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर-------------- न्या. रानडे

🅾परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर------------- दादोबा पांडुरंग

🅾दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🅾सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- ग. वा. जोशी

🅾शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)

🅾 ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

निवडणूक आयोगाचे अधिकार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कलम 424(1) मधील कार्यकारीद्वारे निवडणूक आयोगाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाऊ शकत नाही.याचे अधिकार केवळ निवडणुकांशी संबंधित घटनात्मक उपाययोजना आणि संसदेने बनविलेल्या कायद्याद्वारेच संचालित केले जातात. निवडणुका देखरेख, थेट, नियंत्रण आणि आयोजन करण्याची शक्ती संसद कायदा ज्या देशात असेल तेथे स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका घेण्याचेदेखील सूचित केले गेले आहे संबंध गप्प नाही करण्यासाठी असावे निवडणूक आयोगाने अमर्याद शक्ती, तथापि, नैसर्गिक न्याय, कायदा आणि शक्ती वापर नियम आहे
n निवडणूक विधीमंडळ नाही Ullg करू शकता ँ बांधले पद्धत किंवा स्वयंसेवी काम न्यायालयीन पुनरावलोकनास पात्र असे निर्णय घेऊ शकतात
निवडणूक आयोगाचे अधिकार निवडणूक कायद्याच्या पूरक असतात आणि प्रभावी आणि कायदेशीर प्रक्रियेद्वारे बनविलेल्या कायद्याविरुध्द त्यांचा उपयोग करता येणार नाही,
हे आयोग निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणूकीचे वाटप करण्याचे थेट निर्देश आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याचे अधिकार ठरवू शकते . ठेवते
म्हणतो की, तो निवडणूक कार्यक्रम Nirdhari फक्त न्यायासनासमोर आहे की, त्याच्या शक्ती सर्वोच्च न्यायालयात अर्थ लावणे निवडणूक केवळ कार्य करण्यासाठी
कायदा 1951 कलम 14,15 अध्यक्ष लोकप्रतिनिधी, निवडणूक सूचना जारी राज्यपाल अधिकार याद्वारे आयोगाच्या सल्ला नुसार समस्या करण्यासाठी अधिकृत आहे.

🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

भारताचा नियंत्रक व महालेखापरिक्षक" कॅग (CAG)

- घटनेच्या भाग 5 मधील प्रकरण 5 दरम्यान कलम 148 ते 151 दरम्यान या पदाच्या तरतुदी आहेत.

- कलम 148(1) : नुसार भारताला एक कॅग असेल ज्याची नेमणुक राष्ट्रपती(पंतप्रधानांच्या सल्ल्याने)  करतात.

- सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या प्रमाणे पदावरून बडतर्फ केले जाते त्याच प्रमाणे कॅगला पदावरून दूर केले जाते.

- कलम 148(2) : कॅगला शपथ हे परिशिष्ट 3 मधील शपथेच्या नमुन्यानुसार राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती देते.

- कलम 148(3) : कॅगचे वेतन तसेच निवृत्तीवेतन संसद ठरवील त्याप्रमाणे परिशिष्ट 2 प्रमाणे दिले जातील.

- कलम 148(4) : पदावधी संपल्यावर कॅग पुन्हा केंद्र किंवा राज्य सरकार मध्ये कोणत्याही पदास पात्र असत नाही.

- कलम 148(5) : कॅगच्या अधिकारात ते पदावर असताना कोणतेही बदल करायचे असल्यास कॅगशी विचारविनिमय करून राष्ट्रपती करतील.

- कलम 148(6) : कॅग व त्यांचा प्रशासकीय व कार्यालयीन खर्च हा भारताचा संचित निधीतून केला जाईल.

- कॅग राजीनामा ध्यायचा असल्यास राष्ट्रपतीला देतील.

"कॅग" विषयी अन्य घटनात्मक तरतुदी :

कलम 149 : कॅगचे कर्तव्य व अधिकार

- कॅगची कर्तव्ये व अधिकार कायदा, 1971 नुसार कॅगची कामे सांगण्यात आली.

- 1976 साली या कायद्यात बदल करून कॅगची लेखविषयक कामे काढून केवळ लेखा परीक्षण कामे ठेवण्यात आली.

कलम 150 : कॅग राष्ट्रपतींना केंद्र व राज्यसरकारचे लेखे कोणत्या नमुन्यात ठेवावेत याबाबत सल्ला देतात.

कलम 151(1) : कॅग केंद्र सरकारचे लेखा अहवाल राष्ट्रपतींना देतात तर राष्ट्रपती ते अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहात मांडतात.

कलम 151(2) : कॅग राज्य सरकारचे लेखा अहवाल राज्यपालना देतात तर राज्यपाल ते अहवाल राज्य विधिमंडळासमोर प्रत्येक सभागृहात मांडतात.

विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती

घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत

विधानसभेची रचना :
170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.

राखीव जागा :
घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 29 तर अनुसूचीत जमातीसाठी 25 राखीव जागा आहेत.

निवडणूक :
प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.

उमेदवारांची पात्रता :
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.
सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.

गणसंख्या : 1/10

अधिवेशन :
दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापती :

विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

सभापतीचे कार्य आणि अधिकार :

1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.
2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.
3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.
4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.

जनरल माहिती :

1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.
2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.
3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.
4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.
5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.
6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.
7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.
8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.

संसदेविषयी महत्त्वाची माहीती.

🅾 एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्‍यावी लागतात.

🅾संसदेच्‍या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्‍तीत जास्‍त सहा महिने असू शकतो.

🅾नागरिकत्‍व नियमित करण्‍याचा अधिकार संसदेस आहे.

🅾 राज्‍यघटनेतील तरतुदी बदलण्‍याचा अधिकार केवळ संसदेला आहे.

🅾घटनेच्‍या कलम ३०२ नुसार विविध निर्बंध लादण्‍याचे अधिकार संसद यांना आहेत.

🅾 संरक्षण या विषयावर कायदा करण्‍याचे सर्वस्‍वी अधिकार संसदेस आहेत.

🅾जेव्‍हा राज्‍यात राष्‍ट्रपती-शासन कलम ३५६ अन्‍वये लागू होते, तेव्‍हा राज्‍य यादीतील कर कायदे संमत करण्‍याचे अधिकार संसद अथवा संसदेने विहित केले प्राधिकारी यांना आहेत.

🅾 विधेयकाचे रूपांतर विधिनियमात होण्‍यासाठी त्‍यांला तीन टप्‍प्‍यातून जावे लागते.

🅾करात कपात किंवा कर रद्द करण्‍याविषयी तरतूद असलेले विधेयक राष्‍ट्रपतीच्‍या शिफारशीशिवाय मांडता येतो.

🅾 सामान्‍यत: वित्त विधेयकाची मसंडणी व प्रविष्‍टीकरण राष्‍ट्रपतींची शिफारस असल्‍याशिवाय शक्‍य होत नाही.

🅾वित्त विधेयकाची मांडणी राष्‍ट्रपती यांच्‍या शिफरशीवरून केली जाते.

🅾 विधेयक वित्त विधेयक आहे/नाही असा प्रश्‍न उद्भवचल्‍यास अंतिम निर्णय लोकसभेचे सभापतीचा असतो.

🅾वित्त विधेयक हे कर, कर्जे व खर्च याबाबत असते.

🅾 वित्त-विधेयक प्रथमत: लोकसभेत मांडले जाते.

🅾सर्व वित्त विधेयके (Financial Bills) ही धन विधेयके (Money Bills) असतात.

🅾 राज्‍यघटनेच्‍या कलम ३३० व ३३२ अनुसार लोकसभा व राज्‍याच्‍या विधानसभांनी अनुसूचित जाती व जमातींसाठी खास राखीव जागा ठेवल्‍या आहेत.

🅾लोकसभेमध्‍ये केंद्रशासित प्रदेशांमधून १३ सदस्‍य निवडले जातात.

🅾 लोकसभेच्‍या पहिल्‍या मध्‍यावधी निवडणुका १९७१ मध्‍ये घेण्‍यात आल्‍या.

🅾 आणीबाणीच्‍या काळात लोकसभेचा कार्यकाळ एक वर्ष पर्यंत वाढवता येतो.

🅾राज्‍यसभा कधीच बरखास्‍त केली जात नाही.

🅾 राज्‍यसभेच्‍या सभासदाचा कार्यकाळ ६ वर्षाचा असतो.

🅾लोकसभेने पारित केलेले व राज्‍य सभेकडे शिफारशीकरिता पाठवलेले वित्त विधेयक १४ दिवसात परत पाठवणे हे राज्‍यसभेवर बंधनकारक आहे.  

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे



❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल


❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन


❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन


❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन


❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड


❇️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन


❇️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन


❇️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड


❇️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन


❇️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड


❇️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल


❇️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल


❇️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन

विज्ञान मैत्री प्रश्नमंजूषा💡 🍀 उत्तरासाहित


१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते ✅✅
३) कमी होते
४) समान राहते
〰〰〰〰〰〰〰〰〰
२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर✅✅
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी
〰〰〰〰〰〰〰〰〰
३) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ...........
१) नसते✅✅
२) असते
३) दोन्हीपैकी नाही
४) समान असते
〰〰〰〰〰〰〰〰〰
४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी✅✅
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन
〰〰〰〰〰〰〰〰〰
५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती✅✅
४) मानवी प्राणी
〰〰〰〰〰〰〰〰〰
६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी✅✅
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे
〰〰〰〰〰〰〰〰〰
७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण ✅✅
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा
〰〰〰〰〰〰〰〰〰
८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त✅✅
३) वलयांकित
४) वरील सर्व
〰〰〰〰〰〰〰〰〰
९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव ✅✅
२) किटक
३) विषाणू
४) कृमी
〰〰〰〰〰〰〰〰〰
१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा✅✅
४) नाक
〰〰〰〰〰〰〰〰〰
११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती✅✅
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार
〰〰〰〰〰〰〰〰〰
१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव✅✅
३) साथीचे रोगविषयक
४)  यापैकी नाही
〰〰〰〰〰〰〰〰〰

Online Test Series

०१ मार्च २०२२

English grammar

Fill in the blanks with an appropriate preposition.

1. He has been married .................her for more than three decades.
with
to ✓
for

2. The Irish are very proud ....................their sense of humor.
about
of ✓
in

3. He is interested ................... the supernatural.
at
in ✓
with

4. I am pleased .................. your promotion.
for
about ✓
with

5. She was angry ................. me for revealing her secret.
on
with ✓
to

6. I am getting anxious .................his health.
for
to
about ✓

7. We are all anxious ................... an amicable solution to this
problem.
about
to
for ✓

8. She is anxious ................ reunite with her family.
about
for
to ✓

9. You can't be independent ..................your parents until you find a job.
for
of ✓
from

10. Why can't you be polite  .................. him?
with
to ✓
at

11. Both parents are responsible ................. raising a child.
to
for ✓
about

12. I feel really sorry ..................his wife.
for ✓
about
at

"प्रधानमंत्री महिला सशक्तीकरण"



👉 प्रधानमंत्री महिला सशक्तीकरण योजनाच्या अंतर्गत महिला शक्ती केंद्रे स्थापन करण्याची उपाययोजना सन २०१७ ते २०२० या कालावधीमध्ये पथदर्शी तत्वावर राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सबलीकरण घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महिलासाठीच्या शासकीय योजनांचा लाभ तसेच आरोग्य व स्वछताविषयक मदत व मार्गदर्शन यांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये हक्क आणि अधिकार याबाबत जागृती निर्माण करणे. हा या योजनेचा उद्देश आहे.

🅾योजनेच्या ठळक तरतुदी व वैशिष्ट्ये

✍योजनेअंतर्गत राज्यस्तरावर महिलांसाठी राज्य संशोधन केंद्र संबंधित राज्य सरकारच्या अधिपत्याखाली विविध योजनांचा अभ्यास करून तांत्रिक साहाय्य व सल्ला उपलब्द करून देईल.

✍जिल्हास्तरीय महिला केंद्रे ही महिलाविषयक विविध योजनांची माहिती गोळा करून राज्य स्तरावर आणि जनतेस उपलब्द करून देतील. ही केंद्रे तालुका ग्राम पातळी आणि राज्य पातळी यामध्ये दुव्याचे कार्य करतील.

✍महिला शक्ती केंद्रे ही तालुका पातळीवर कार्य करतील व गाव पातळीवर सेवा उपलब्द करून देतील. गाव पातळीवर सेवा उपलब्द करून देण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, ANM, सामान्य सेवा केंद्रे,

✍ महिला स्वयंसहायता समूह, बँक मित्र, शिक्षा मित्र, न्याय मित्र, महिला ओकप्रतिनिधी, महिला पोलीस स्वयंसेविका या गाव पातळीवर विविध शासकीय/अशासकीय कार्यामध्ये कार्यरत व्यक्तींची मदत घेण्यात येईल.

✍ महाविद्यायातील NSS/NCC कॅडेट्स तसेच इतर स्वयंसेवक विद्यार्थ्यांना सहा महिन्याची समूह सेवा देता येईल. हा कालावधी २०० तास पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना समूह सेवा प्रमाणपत्र देण्यात येईल.

✍अशा प्रकारे जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांना समूह सेवेमध्ये उपयोजित करून त्यांच्यामध्ये जबाबदार नागरिकांचे गुण निर्माण करण्यासही यातून हातभार लागणार आहे.

✍ ग्रामीण महिलांना ग्रामसभा तसेच पंचायत राज संस्थांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक माहिती तसेच संसाधने उपलब्द करून देण्यात येतील.

✍ विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेणे, त्यामध्ये सहभागी होणे, यासाठी मुलांना प्रोत्साहन देण्यात येईल.

✍ विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे बनवून घेण्यासाठी ग्रामीण महिलांना साहाय्य करण्यात येईल.

✍ बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मदत करण्यात येईल. महिलांच्या तक्रारी, तक्रार नोंदविणे तसेच त्याबाबतचा पाठपुरवठा यामध्ये साहाय्य करणे.

✍ महिलांना एकत्र येण्यास, सामूहिक कार्ये करण्यास, समूह बनवण्यास प्रोत्साहन देणे व त्या माध्यमातून त्यांची क्षमता बांधणी व विकास घडविणे यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

✍ योजनेच्या अंमलबजावणीची प्रगती दर्शविण्यासाठी तसेच शंकाचे व समस्यांचे निराकरण करणे, आणि तक्रारी नोंदविणे यासाठी संकेतस्थळ उपलब्द करून देण्यात येणार आहे.

✍ ही योजना नीती आयोगाच्या अहवालानुसार देशातील सर्वात मागास राहिलेल्या ११५ जिल्ह्यामध्ये पथदर्शी तत्वावर राबविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नंदुरबार, जळगाव, गडचिरोली व नांदेड या चार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.

✍प्रत्येक जिल्ह्यातील कमाल, ८ तालुके, याप्रमाणे ९२० तालुक्यामध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. या अंमलबजावणीमध्ये प्राप्त झालेल्या अनुभवावरून देशातील उर्वरित जिल्ह्यामध्ये विस्ताराबाबत निर्णय घेण्यात येईल.

 ✍यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून ६०:४० या प्रमाणात निधी उपलब्द करून देण्यात येईल. ईशान्येकडील राज्ये व विशेष दर्जा प्राप्त राज्यामध्ये निधीचा हिस्सा ९०:१० याप्रमाणे असेल. 

प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB : Regional Rural Banks)

📝 या बँका क्षेत्रीय किंवा विभागीय ग्रामीण बँका म्हणून देखील ओळखल्या जातात.

🌐 उद्देश : -
दूर्गम ग्रामीण भागात बँक व्यवसाय रूजवून तेथील प्रादेशिक विषमता दुर करण्यास हातभार लावणे.
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

🔰 स्थापना : - 26 सप्टेंबर 1975 रोजी प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याच्या वटहुकुमावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली.

⚜ 2 ऑक्टोबर 1975 रोजी भारतात पाच ठिकाणी ग्रामीण बँका सुरू झाल्या.

🌺 ग्रामीण बँका - - - राज्य - - - पुरस्कृत बँक🌺
  
🔹 मोरादाबाद - - -  उत्तर प्रदेश - - - सिंडीकेट बँक

🔹 गोरखपूर - - - उत्तर प्रदेश- - - स्टेट बँक ऑफ इंडिया

🔹 भिवानी - - - हरियाणा - - - पंजाब नॅशनल बँक

🔹 जयपूर - - - राजस्थान- - - यूनायटेड खमर्शियल बँक

🔹 माल्डा - - - प. बंगाल- - - यूनायटेड बँक

⚜ प्रादेशिक ग्रामीण बँकांचा कायदा 1976 मध्ये संमत झाला.

⚜ भांडवल उभारणीत वाटा : केंद्र : 50% ; संबंधित राज्य सरकार : 15% ; पुरस्कृत व्यापारी बँक : 35%.

⚜ उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक RRB कार्यरत आहेत.

अर्थव्यवस्था

बॅसेल कमिटी ऑन बँक सुपरव्हीजन (BCBS) या संस्थेच्या अहवालानुसार, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) या नियमांनुसार ठरविण्यात आलेल्या मानदंडांची पूर्तता करण्यास कमी पडली - बॅसेल III.

आंतरराष्ट्रीय 

UNच्या ‘द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019: हायलाइट्स’ या अहवालाच्या अंदाजानुसार, 2027 सालापर्यंत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश – भारत.

सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) याच्या सर्वेक्षणानुसार, जगातले सर्वात कमकुवत पोलीस दल असलेला देश – भारत.

राष्ट्रीय 

सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) याच्या सर्वेक्षणानुसार, पोलीस दलासंबंधी जागतिक निकष पूर्ण करणारा राज्य - पंजाब.

NITI आयोगाने या सालापासून फक्त विद्युत वाहनेच भारतात विकली जावी असा प्रस्ताव मांडला आहे - 2030.

१९९१ च्या नरसिंहम समितीच्या शिफारशी

  

आर्थिक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एम. नरसिंहम यांनी  1991 मध्ये खालील शिफारसी केल्या.

१. या समितीने पुढील पाच वर्षांत कायदेशीर तरलता प्रमाण (एसएलआर) 38. cent टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत तरलतेचे प्रमाण कमी करण्याची शिफारस केली.

२. या समितीने निर्देशित कर्ज कार्यक्रम रद्द करण्याची शिफारस केली.

This. या समितीच्या मते व्याज दर बाजार दलांनी निश्चित केले पाहिजेत. व्याजदराच्या निर्धारणात रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करू नये.

This. या समितीने बँकांची लेखा प्रणाली सुधारण्याबाबतही सांगितले.

This. या समितीने बँकांच्या कर्जाची वेळेवर पुनर्प्राप्ती करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापनेवर जोर दिला.

Nara. नरसिंहम समितीने बँकांच्या पुनर्रचनेवरही भर दिला. या समितीनुसार or किंवा banks आंतरराष्ट्रीय बँका, or किंवा १० राष्ट्रीय बँका आणि काही स्थानिक बँका आणि काही ग्रामीण बँका एका देशाच्या आत असाव्यात.

Branch. या समितीने शाखा परवाना रद्द करण्याची शिफारस केली.

Nara. नरसिंहम समितीने आपल्या देशात परकीय बँकिंगला प्रोत्साहन देण्याची शिफारस केली.

This. या समितीने बँकांवरील दुहेरी नियंत्रण रद्द करण्याची शिफारस केली.

यापूर्वी वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेचे बँकांकडून नियंत्रण होते. केवळ रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालीच बँकांचे नियंत्रण करावे, अशी सूचना नरसिंहम समितीने केली.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...