०२ फेब्रुवारी २०२२

धोंडो केशव कर्वे

टोपणनाव:  - अण्णासाहेब
जन्म:  - (एप्रिल १८, इ.स. १८५८
                           - शेरवली , मुरुड
मृत्यू:  - नोव्हेंबर ९, इ.स. १९६२)
                            हिंगणे आश्रम ,पुणे
चळवळ:  - स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा
पुरस्कार:  - भारतरत्‍न
प्रमुख स्मारके:  - हिगणे पुणे
धर्म:  - हिंदू
वडील:  केशव बापूराव कर्वे
आई:  लक्ष्मीबाई केशव कर्वे
पत्नी:  राधाबाई धोंडो कर्वे , आनंदीबाई धोंडो कर्वे
अपत्ये:  रघुनाथ ,भास्कर , दिनकर

धोंडो केशव कर्वे (एप्रिल १८, इ.स. १८५८ - नोव्हेंबर ९, इ.स. १९६२)महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्‍नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. . इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली.

▪️अनुक्रमणिका
१  बालपण आणि तारुण्य
१.१  पुनर्विवाह
२  कार्य
३  श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठची स्थापना
४  चरित्रे
५  संदर्भ

▪️बालपण आणि तारुण्य

रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला. त्याच वर्षी अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे इ.स. १९१४पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. अण्णा गणिती होते. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.

▪️पुनर्विवाह

त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्ने होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्‍नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.

अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, इ.स. १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली. रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे.

▪️कार्य

इ.स. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले. याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली. विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती. स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.
इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी  '`निष्काम कर्म मठा'ची स्थापना इ.स. १९१० साली केली. स्तियांना आपल्या आवडीनुसार शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी आरोग्यशास्त्र, शिशूसंगोपन, गृह्जीवन शास्त्र, आहार शास्त्र असे विषय अभ्यासक्रमामध्ये ठेवले. यामूळे स्त्रियांच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळाली.

पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' आणि त्यानंतर `महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' असे त्याचे नामकरण करण्यात आले.     १९९६साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देते.
अर्थात, हे सगळे काही सहजसाध्य नव्हते हे नक्कीच. या कार्यामुळे कर्मठ, सनातन पुणेकरांचा त्यांना रोष पत्करावा लागला. संस्था चालविण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने कित्येक वर्ष अण्णासाहेबांना हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज पायी प्रवास करावा लागत असे. आपल्या संस्थांसाठी कुणाकडे देणगी मागायला गेल्यावर कित्येक वेळा त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळत असे. पण अत्यंत जिद्दीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.
जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना १९१६ साली केली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' (एसएनडीटी) असे नामकरण करण्यात आले.
अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषत: महिलांच्या सबलीकरणाचे आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले.
कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले.
मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिले. स्त्री शिक्षणासाठी कर्वे यांनी खूप मोलाचे कार्य केले.

▪️श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठची स्थापना

त्यांनी एका जपानी महिला विद्यापीठाचे माहितीपत्रक पाहिले होते. त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठाचा विचार येत होता. विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून इ.स. 1910 मध्ये ‘निष्काम कर्ममठ‘ या संस्कारपीठाची स्थापना केली.
इ.स. १९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून, इ.स. १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली. स्त्रीशिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली. अंत्यजांना आणि स्त्रियांना दुर्बल घटक लेखून त्यांना विद्येपासून वंचित करणाऱ्या समाजात अण्णांनी आपल्या तपोबलावर हा चमत्कार घडविला. अण्णांच्या कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित झालेल्या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी‘ या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे- ‘संस्कृता स्त्री पराशक्तिः‘ अण्णांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेल्या प्रत्येक संस्थेचे भरणपोषण केले.
इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची माहिती जगाला करून दिली.

बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा. अल्बर्ट आइनस्टाइन यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञानशाळा पाहिली. टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले. अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या.अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन सन्मानित केले. `पद्मविभूषण' हा किताब त्यांना इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच इ.स. १९५८ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान `भारतरत्‍न'ने सन्मानित करण्यात आले. एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर, इ.स. १९६२ ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. धोंडो केशव कर्वे हे आधुनिक महाराष्ट्रातील एक स्त्री सुधारणा करणारे म्हत्वाचे व्यक्तिमत्व आहे.
आजही `कर्वे स्त्री शिक्षण संस्था' दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.

३१ जानेवारी २०२२

Online Test Series

महाराष्ट्रातील विविध महामंडळे व स्थापना वर्ष

● महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (मुंबई) : 1961

● महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (मुंबई) : 1960

● महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडळ (मुंबई) : 1962

● महाराष्ट्र राज्य औधोगिक व गुंतवणूक महामंडळ (मुंबई) : 1966

● महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ (मुंबई) : 1962

● महाराष्ट्र राज्य लघुउधोग विकास महामंडळ (मुंबई) : 1962

● महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन (मुंबई) : 1978

● महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोधोग मंडळ (मुंबई) : 1962

● महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (पुणे) : 1957

● मराठवाडा विकास महामंडळ (औरंगाबाद) : 1967

● पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ (पुणे) : 1970

● कोकण विकास महामंडळ (नवी मुंबई) : 1970

● विदर्भ विकास महामंडळ (नागपूर) : 1970

● महाराष्ट्र कृषी उधोग विकास महामंडळ (पुणे) : 1965

● महाराष्ट्र राज्य वस्त्रोधोग महामंडळ (मुंबई) : 1966

● महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ (नागपूर) : 1971

● महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ (मुंबई) : 1972

● महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (अकोला) : 1976

जाणून घ्या नवीन 22 जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव!

⚡ राज्यात नवे 22 जिल्हे व 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव आहे. मोठमोठ्या जिल्ह्यांचे विभाजन, त्रिभाजन करुन हे नवे जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे.

💁‍♂ देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. वित्त, महसूल, नियोजन विभागचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते.

📌 या समितीने महाराष्ट्रात नवे 22 जिल्हे व 49 नवे तालुके असा प्रस्ताव या समितीसमोर होता. अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी, संगमनेर व श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.

👀 *या जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव?* :

▪ *नाशिक* : मालेगाव आणि कळवण
▪ *ठाणे* : मीरा-भाईंदर आणि कल्याण
▪ *बुलडाणा* : खामगाव
▪ *यवतमाळ* : पुसद
▪ *अमरावती* : अचलपूर
▪ *भंडारा* : साकोली
▪ *चंद्रपूर* : चिमूर
▪ *गडचिरोली* : अहेरी
▪ *जळगाव* : भुसावळ
▪ *लातूर* : उदगीर
▪ *बीड* : अंबेजोगाई
▪ *नांदेड* : किनवट
▪ *सातारा* : माणदेश
▪ *पुणे* : शिवनेरी
▪ *पालघर* : जव्हार
▪ *रत्नागिरी* : मानगड
▪ *रायगड* : महाड
▪ *अहमदनगर* : शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर.

महाराष्ट्र जिल्हे.

🧩जिल्हे व तालुका संख्या:-

🅾अकोला 7 तालुके

🅾अमरावती 14 तालुके

🅾 औरंगाबाद 9 तालुके

🅾 अहमदनगर 14 तालुके

🅾 बीड 11 तालुके

🅾 बुलढाणा 13 तालुके

🅾 भांडारा 7 तालुके

🅾 चंद्रपूर 15 तालुके

🅾धुळे 4 तालुके

🅾 गोंदिया 8 तालुके

🅾 गडचिरोली 12 तालुके

🅾हिंगोली 5 तालुके

🅾 जालना 8 तालुके

🅾 जळगांव 15 तालुके

🅾 कोल्हापूर 12 तालुके

🅾 लातूर 10 तालुके

🅾 मुंबई उपनगर 3 तालुके

🅾 मुंबई शहर एक ही तालुका नाही

🅾 नागपूर 14 तालुके

🅾नाशिक 15 तालुके

🅾नांदेड 16 तालुके

🅾नंदुरबार 6 तालुके

🅾 पुणे 14 तालुके

🅾 परभणी 9 तालुके

🅾 पालघर 8 तालुके

🅾 रायगड 15 तालुके

🅾 रत्नागिरी 9 तालुके

🅾 सिंधुदुर्ग 8 तालुके

🅾 सोलापूर 11 तालुके

🅾सांगली 10 तालुके

🅾सातारा 11 तालुके

🅾 ठाणे 7 तालुके

🅾 उस्मानाबाद 8 तालुके

🅾 वाशीम 6 तालुके

🅾 वर्धा 8 तालुके

🅾 यवतमाळ 16 तालुके

🅾एकही तालुका नसलेला जिल्हा मुंबई शहर.

🅾राज्यातील सर्वाधिक तालुके
असणारे दोन जिल्हे यवतमाळ व नांदेड १६

🅾राज्यात एकच जिल्हा असा आहे की त्यात फक्त 13 जिल्हे आहेत तो म्हणजे बुलढाणा

🅾असे एकूण चार जिल्ह्ये आहेत की ज्यात 14 तालुके आहेत.पूणे. नागपूर. अमरावती. अहमदनगर

🅾असे एकूण चार जिल्ह्ये आहेत की त्यात 15 तालुके आहेत चंद्रपूर. जळगाव.रायगड. नाशिक

🅾असे दोन जिल्ह्ये आहेत की जेथे फक्त 10 तालुके आहेत.सांगली. लातूर

🅾असा एकमेव जिल्हा आहे की जेथे फक्त तीन तालुके अहेत तो म्हणजे मुंबई उपनगर

🅾असे :सतरा:जिल्ह्ये आहेत जी त्यांच्या तालुक्यांची संख्या दहाच्या खाली आहे

🅾धुळे हा एकमेव जिल्हा आहे की ज्यात फक्त चार तालुके आहेत.

🅾हिंगोली हा असा एकमेव जिल्हा आहे की त्यात फक्त पाच तालुके आहेत

मोजकेच पण महत्वाचे


💥 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विषयी काही महत्त्वाची माहिती
( अध्यक्ष विशेष )

1) काँग्रेस चे पहिले अध्यक्ष
    - व्योमेश चंद्र बॅनर्जी ( 1985 )

2) काँग्रेस च्या पहिल्या महिला अध्यक्षा
    - अॅनी बेझंट ( 1917 )

3) काँगेस चे पहिले मुस्लिम अध्यक्ष
    - बद्रुद्दिन तैयबजी( 1887 )

4) काँग्रेस चे पहिले पारशी अध्यक्ष
    - दादाभाई नौरोजी ( 1886)

5) काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष
    - पी. आनंद चार्लू ( 1891 )

6) काँगेस च्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा- सरोजिनी नायडू ( 1925 )

7) काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष
    - सर नारायण गणेश चंदावरकर ( 1900)

8) काँग्रसचे सर्वात जास्त काळ राहिलेले अध्यक्ष - मौलाना आझाद ( 1940 - 1946)

9) ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन
    - फैजपूर ( 1936 )

10) काँग्रेसचे एकदाही अध्यक्षपद न मिळालेली महत्त्वाची व्यक्ती
    - बाल गंगाधर टिळक

खिल्जी घराण्याचा कर्तबगार सुल्तान: अल्लाउद्दीन खिलजी

सुलतान अल्लाउद्दीन खिलजी
अधिकारकाळ- १२९० ते १३१६
राज्याभिषेक- १२९६
राजधानी- दिल्ली
पूर्ण नाव- अल्लाउद्दीन जलालुद्दीन खिलजीलख्नौती (बंगाल)
मृत्यू- १३१६ दिल्ली
पूर्वाधिकारी- जलालुद्दीन फिरोझ खिलजी
उत्तराधिकारी- कुतुबुद्दीन मुबारक शाह
राजघराणे- खिलजी

अल्लाउद्दीन खिलजी (मृत्यू: इ.स. १३१६) इ.स.च्या तेराव्या शतकातील खिलजी घराण्यातील दिल्लीचा सुलतान होता. त्याने इ.स. १२९६ ते इ.स. १३१६ या कालावधीत राज्य केले. तो खिलजी घराण्यातील सर्वात कर्तबगार सुलतान समजला जातो. त्याच्या राजवटीच्या शेवटच्या वर्षांमध्ये त्याचा वजीर मलिक काफूर ह्याने कारभार चालवला.

अल्लाउद्दीन खिलजी हा दिल्लीवर राज्य करणाऱ्या खिलजी घराण्यातला दुसरा सुलतान होता. पहिला सुलतान त्याचा काका जलालुद्दीन खिलजी. अल्लाउद्दीनने गादीवर येण्यापूर्वी जलालुद्दीनची २२ ऑक्टोबर १२९६ला हत्या केली होती.

राज्यपाल.



🅾  राज्यपाल च्या भारतातील राज्यांमध्ये की राज्य पातळीवर समान अधिकार आणि कार्ये आहेत भारताचे राष्ट्रपती केंद्रीय स्तरावर.

🅾 राज्यपाल अस्तित्वात राज्यांमध्ये लेफ्टनंट राज्यपाल किंवा प्रशासक अस्तित्वात असताना केंद्रशासित प्रदेश समावेश दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश . 

🅾राज्यपाल हे नाममात्र प्रमुख म्हणून काम करतात तर खरी सत्ता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या / तिच्या मंत्र्यांच्या परिषदेची असते.

🅾 केंद्रशासित प्रदेशांमध्ये वास्तविक सत्ता लेफ्टनंट गव्हर्नर किंवा प्रशासकाची असते, दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू-काश्मीर वगळता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्रिमंडळात तो / ती सत्ता सामायिक करतो.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠राज्यपाल💠💠

🅾 भारतात केंद्रशासित प्रदेशाचा प्रभारी लेफ्टनंट गव्हर्नर असतो. तथापि, हा पद फक्त अंदमान आणि निकोबार बेटे , लडाख , जम्मू-काश्मीर , दिल्ली आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात अस्तित्त्वात आहे (इतर प्रदेशात प्रशासक नेमलेला आहे, जो सामान्यत: आयएएस अधिकारी किंवा कोर्टाचा सेवानिवृत्त न्यायाधीश असतो). तथापि, पंजाबच्या राज्यपालपदी प्रशासक म्हणून काम करते चंदीगड . लेफ्टनंट गव्हर्नर प्राधान्यक्रमात एखाद्या राज्याच्या राज्यपालपदाइतके पद मानत नसले तरी.

🅾गव्हर्नर आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांची नेमणूक पाच वर्षांच्या मुदतीसाठी अध्यक्ष करतात.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠 पात्रता 💠💠

🅾लेख 157 आणि कलम 158 च्या भारतीय संविधानाच्या राज्यपाल पदासाठी पात्रता आवश्यकता निर्देशीत करा. ते खालीलप्रमाणे आहेतः

🅾राज्यपालांनी हे करायला हवेः

🅾[भारताचे नागरिक] व्हा.

🅾कमीतकमी 35 वर्षे वयाचे असावेत.

🅾संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे किंवा राज्य विधिमंडळाच्या सभासदाचे सदस्य होऊ नका .

🅾नफ्याचे कोणतेही पद घेऊ नका.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠कार्यकारी अधिकार.💠💠

🅾राज्यघटना राज्यपाल मध्ये याबाबतचे अंतिम अधिकार मा सर्व राज्य सरकारच्या कार्यकारी शक्ती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांची नेमणूक केली , ज्यांना राज्य विधानसभेत बहुमताचा पाठिंबा आहे. राज्यपाल मंत्री परिषदेच्या इतर सदस्यांची नेमणूक करतात आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना विभागणी वाटप करतात.

🅾राज्यपालांच्या इच्छेनुसार मंत्रीपरिषद सत्तेत राहते, परंतु खर्‍या अर्थाने विधानसभेत बहुमत मिळवण्याच्या आनंदाचा अर्थ होतो. जोपर्यंत राज्य विधानसभेतील बहुमत सरकारला पाठिंबा देत नाही तोपर्यंत मंत्रीमंडळ बरखास्त करता येणार नाही.

🅾राज्यपाल एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतात . तसेच she डव्होकेट जनरल आणि राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूकही करतात. त्याशिवाय राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूकही राज्यपालांमार्फत केली जाते (राष्ट्रपतींनी काढून टाकली असती तरी). 

🅾अध्यक्ष न्यायाधीश नियुक्ती राज्यपाल consults उच्च न्यायालये आणि राज्यपाल जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक करते. सर्व प्रशासन त्याच्या किंवा तिच्या नावावर चालविले जाते, त्याला किंवा तिच्यातही भारतीय राज्यघटनेनुसार इयत्ता एक आणि वर्ग चौथीच्या कार्यकाळात कर्मचारी नियुक्त करण्याचे सामर्थ्य आहे.

🅾राज्यपालांचे राज्यपाल हे त्यांच्या कार्यकाळातील बहुतेक विद्यापीठांचे कुलपती आहेत . कुलपती कार्यालयाची प्रतिष्ठा आणि निःपक्षपातीपणा यामुळे राज्यपालांना विद्यापीठांच्या स्वायत्ततेचे रक्षण आणि त्यांना अयोग्य राजकीय हस्तक्षेपापासून वाचविण्याच्या बाबतीत अनन्य स्थान दिले जाते. 

🅾विद्यापीठाचे कुलपती म्हणून राज्यपाल हे सिनेटचे अध्यक्ष म्हणूनही काम करतात. राज्यपालांना विद्यापीठाच्या व त्या संलग्न महाविद्यालयांच्या प्रत्येक घटकाची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे अधिकार आहेत, चौकशीच्या निकालावर योग्य ती कारवाई करावी लागेल. कुलपती भेटी शोध समिती नियुक्ती कुलगुरू. 

🅾राज्यपालांनी सिनेटच्या शिफारशीनुसार पदांच्या वॉरंटची आणि डिग्री मागे घेण्यास किंवा भिन्नतेस मान्यता देण्यास मान्यता दिली. राज्यपाल सिनेटने मंजूर केलेले कायदे मंजूर किंवा नाकारले व संबंधित समित्यांच्या शिफारसीच्या आधारे विद्यापीठाच्या शिक्षकांची नेमणूक केली.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠वैधानिक अधिकार.💠💠

🅾राज्य प्रमुख राज्य विधानसभेच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन बोलावतात व त्यांची पूर्तता करतात. राज्यपाल राज्य विधानसभेचे विघटन करू शकतात. हे अधिकार औपचारिक असतात आणि राज्यपालांनी हे अधिकार वापरताना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार कार्य केले पाहिजे.

🅾राज्यपालांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर आणि दरवर्षी पहिल्या अधिवेशनाच्या सुरूवातीला राज्य विधानसभेचे उद्घाटन (समर्पित करण्यासाठी) केले. 

🅾या प्रसंगी राज्यपालांच्या संबोधनात राज्य सरकारच्या नवीन धोरणांची रूपरेषा असते. राज्य विधानसभेने हे विधेयक मंजूर केले, हे राज्यपालांच्या मान्यतेनंतरच कायदा होऊ शकते. राज्यपालांनी राज्य विधीमंडळाला हे पैसे विधेयक नसल्यास पुन्हा विचारासाठी विधेयक परत देऊ शकतात . 

🅾तथापि, राज्य विधिमंडळाने ती पुन्हा राज्यपालांकडे दुसर्‍यांदा पाठविल्यास राज्यपालांनी त्यास मान्यता देणे आवश्यक आहे. राष्ट्रपतींकडे काही विधेयके राखून ठेवण्याचे अधिकार राज्यपालाकडे असतात.

🅾जेव्हा राज्य विधिमंडळ अधिवेशनात नसते आणि राज्यपाल कायदा असणे आवश्यक मानतात, तर राज्यपाल अध्यादेश काढू शकतात. हे अध्यादेश पुढील अधिवेशनात राज्य विधिमंडळात सादर केले जातात. पूर्वीच्या मंजुरीशिवाय राज्य विधिमंडळ पुन्हा तयार होण्याच्या तारखेपासून ते सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ वैध राहतील. 

🅾कलम १ 192 under अन्वये राज्य विधानसभेच्या सभासदाला अपात्र ठरविण्यास राज्यपाल यांना अधिकार देण्यात आला आहे जेव्हा निवडणूक आयोगाने शिफारस केली आहे की आमदार यापुढे अनुच्छेद १ 1 १ च्या तरतुदींचे पालन करीत नाहीत.

🅾अनुच्छेद 165 आणि 165 Per नुसार राज्यपाल महाधिवक्ता यांना राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात उपस्थित राहण्यास सांगू शकतात आणि काही बेकायदेशीर कामकाज करण्यास कळवू शकतात.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...