३१ जानेवारी २०२२

पेशीजन्य रोग (Cellular Disease)

कर्करोग/ कॅन्सर (Cancer)

व्याख्या: पेशींच्या अनियंत्रित  विभाजनातून शरीराच्या कोणत्याही भागात अनावश्यक पेशींच्या गाठी/ समुह तयार होणे म्हणजेच कर्करोग होय. अश्या अनावश्यक पेशींच्या समूहालाच गाठ (Tumour) असे म्हणतात.
गाठीचे प्रकार (Types Of Tumours)

निरुपद्रवी गाठ (Benign Tumour): अशा प्रकारच्या गाठींचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवर होत नाही.

दुर्दम्य गाठ (Mallignant Tumour):अशा प्रकारच्या गाठींचा परिणाम अंतर्गत अवयवांच्या कार्यावर होतो.  आणि यामुळेच कर्करोगाच्या स्थितीला दूर्दम्यता (Mallignancy) असेही म्हणतात.

रक्ताद्वारे कॅन्सरच्या वाढत असलेल्या पेशी जेव्हा सर्व शरीरभर पसरतात त्या स्थितीला Metastatis असे म्हणतात.

मानवी शरीरातील कोणत्याही अवयवात कॅन्सर होऊ शकतो. सर्वाधिक तोंडाचा, स्तनांचा, आणि रक्ताचा कॅन्सर बघायला मिळतो.

लक्षणे: कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला आढळत नाहीत. न भरणाऱ्या जखमा, असाधारण रक्तस्त्राव, अपचन, ताप, वजन कमी होणे, खूप थकवा जाणवणे, त्वचेमध्ये बदल होणे.

कर्करोगाची कारणे:

कर्करोग निर्माण करणाऱ्या घटकांचे तीन गट केले जाते.

1) अपसारी/ प्रारणे ऊर्जा (radiant Energy):

अतिनील किरणे, क्ष- किरणे, आणि गॅमा किरणे कर्करोगजन्य असतात. ही  किरणे विविध मार्गांनी डी. एन. ए. रेणूंची हानी करतात.
डी. एन. ए. वरील परिणांव्यतिरिक क्ष-किरणे आणि गॅमा किरणे उतींमध्ये घटक मुक्त मूलके निर्माण करतात.
जगातील सुमारे 10% लोकांना यामुळे कर्करोग होतो.

2) रासायनिक सयुंगे (Chemical Compounds):

जगातील सुमारे 80% लोकांना विविध रासायनिक सयुंगांमुळे कर्करोग होतो.
उदा. आर्सेनिक, कोबाल्ट, कॅडमिअम, अल्फोटॉक्सिन -B-1, अबेसटॉस, पोलिसायक्लिक हाड्रोकार्बन, बेन्झीन, बेरिलियम, निकेल, डॉक्टीनोमायसिन या संयुगांचा परिणाम DNA रेणूंतील ग्वानिन या नत्ररेणूवर होतो.

3) विषाणू (Viruses):

कॅन्सर घडवून आणण्याची क्षमता असलेल्या जनुकांना कर्करोग जनुक म्हणतात. काही रोगांचे विषाणू कर्करोगजनक स्थिती निर्माण करतात. त्याचे प्रमाण 5% आहे.
उदा: हिपॅटिटिस -B आणि हिपॅटिटिस -C च्या विषाणूमुळे यकृताचा कर्करोग होतो.
राउस -सार्कोमा हर्पस विषाणूमुळे रक्ताचा कर्करोग होतो.
पॅपिलोमा विषाणूमुळे त्वचेचा कर्करोग होतो.

4) इतर घटक (Miscllaneous):

जगातील सुमारे 5% लोकांना अनारोग्यादायी सवयीमुळे कर्करोग होतो व दिवसेंदिवस यांचे प्रमाण वाढत चालले आहे.
धूम्रपान आणि तंबाखू सेवनामुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, ग्रसनी, ग्रासनिका, स्वादुपिंड इत्यादींचा कर्करोग होतो.
अतिमद्यप्राशनामुळे यकृत व ग्रासनलिका यांचा कर्करोग होतो.
अतिमेदयुक्त आहारामुळे स्तनांचा कर्करोग होतो.

दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान



* ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.

* ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.

* ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’
शरीरातील
प्रतिकारशक्ती वाढविते.

* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.

*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के
घनपदार्थ
असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश,
३.५ ते
३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व
०.६ ते
०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात,
म्हणून
दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.

* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम
दुधाची आवश्यकता असते.

* ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग
होतो.

* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित
आहे.

* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश
सेल्शिअस
असते.

* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात
केला जातो.

* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.

* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.

* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते.
रक्तामध्ये
मँगेनिज हे द्रव्य असते.

* ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर
कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास
‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.

* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक
जास्त
प्रमाणात असते.

* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.

* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग
करतात.

* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये
कॅफीन हे
अपायकारक द्रव्य असते.

* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ
झाल्यास
ब्लड कॅन्सर होतो.

* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर

कावीळ.

* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व
इन्फ्लुएंझा

* मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे
होतो.

* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व
लॅप्सो स्पायरसी

* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण
दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.

*नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.

* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.

* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.

* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.

* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त
आहे.

* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने
हृदयविकाराचा झटका येतो.

* रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे
कोलेस्टेरॉल
रक्तातून वाहते.

* शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे
मोजले
जाते.

* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’
हा घटक
करतो.

* केमोथेरपी व रेडिओथेरपी हे उपचार कर्करोगावरील
आजाराकरिता घेतले जातात.

* मेंदूतील टय़ुमर ओळखण्यासाठी आर्सेनिक व
आयोडिनचा वापर
करतात.

* रक्ताभिसरणातील दोषावरील उपचारासाठी उपयुक्त
समस्थानिक
म्हणजे सोडियम २४ होय.

* मानवी शरीरात गुणसूत्रांच्या २३ जोडय़ा असतात.

* - गुणसूत्रामुळे मुलाचा जन्म होतो.
* पुरुषांमध्ये - गुणसूत्र असतात
* स्त्रियांमध्ये - गुणसूत्र
असतात.

* अपत्याचे लिंग ठरविण्याचे श्रेय पित्याकडे जाते.

अंतःस्त्रावी संस्था (Endocrine System)

आपल्या शरीरात विविध ठिकाणी काही विशिष्ट अवयव रासायनिक पदार्थांची निर्मिती करतात. या रासायनिक पदार्थांनाच विकरे किंवा संप्रेरके असे म्हणतात. आपल्या शरीरात जी अवयव विकरे किंवा संप्रेरके स्रवतात त्यांना ग्रंथी असे म्हणतात. आणि अशा ग्रंथींच्या समुहापासून अंतःस्त्रावी संस्था तयार होते. अंतः स्त्रावी ग्रंथीतून स्त्रवणारे संप्रेरके सरळ रक्तात मिसळतात कारण त्यांच्या वहनासाठी माध्यम नसते. म्हणून त्यांना नलिका विरहित ग्रंथी असेही म्हणतात.

अंतःस्त्रावी ग्रंथीशिवाय आपल्या शरीरात काही विशिष्ट ठिकाणी बाह्यस्त्रावी ग्रंथी असतात. यातून स्रवणाऱ्या संप्रेरकांच्या वहनासाठी नलिका असते. म्हणून यांना नलिकायुक्त ग्रंथी असेही म्हणतात.

अंतःस्त्रावी ग्रंथी (Endocrine Glands):

1)  पियुषिका ग्रंथी (Pitutary Gland):

ही सर्वात लहान अंतःस्त्रावी ग्रंथी असून आपल्या शरीरात मेंदूमध्ये आढळते. या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात. कारण, या ग्रंथीमुळे इतर ग्रंथीचे कार्य नियंत्रित केले जाते.

या ग्रंथीतून सोमॅटोट्रॉपिन हे वृद्धी संप्रेरक स्त्रवत असते.
हे विकर जास्त प्रमाणात स्रवल्यास व्यक्ती जास्त उंच होतो, तर कमी प्रमाणात स्रवल्यास त्या व्यक्तींची उंची कमी राहते.
कार्य : आपल्या शरीरात वाढ, विकास, प्रजनन, इतर ग्रंथींचे कार्य नियंत्रण करते.

2) हायपोथॅलॅमस (Hypothalamus):

ही ग्रंथी आपल्या डोक्यामध्ये पियुषिका ग्रंथीच्या बाजुला आढळते. यातून थायरोट्रोपीन (TRH), डोपॅमाईन, वृद्धीसंप्रेरक, सोमॅटोस्टॅटिन, गोनॅडोट्रोपिन, कॉर्टिकोट्रोपीन, ऑक्झिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन (ADH) ही संप्रेरके स्रवतात.

कार्य:

थायरोट्रोपिनमुळे पियुषिका ग्रंथीतून थायरॉईड उद्दीपन संप्रेरक स्रवण्यास मदत होते.

डोपॅमाईनमुळे मेंदूतील चेतापेशींचे कार्य नियंत्रित करण्यासाठी प्रोलॅक्टिन रसायन स्रवले जाते.
सोमॅटोस्टॅटिनमुळे वाढ आणि विकास नियंत्रित केली जाते.

व्हॅसोप्रेसिन संप्रेरकांमुळे वृक्क मालिकेतील पाण्याचे वहन नियंत्रित केले जाऊन रक्ताचे आकारमान नियंत्रित राहते.

3) पिनल ग्रंथी (Pineal Gland):

मेंदूच्या आतील भागात आढळते. यामधून मेलॅटॉनिन हे संप्रेरक स्त्रवते. हे संप्रेरक सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाल्यानंतर स्रवण्यास सुरुवात होते म्हणूनच आपल्याला झोप येते.

4) थायरॉईड ग्रंथी (Thyroid Gland):

ही ग्रंथी आपल्या शरीरात गळ्याच्या खालील भागात श्वसननलिकेच्या तोंडावर असते. या ग्रंथीमधून थायरॉक्झीन (Thyroxine) आणि ट्रायआयोडो थायरॉनॊईन (Tri-iodo-Thyronoine) नावाचे संप्रेरक स्त्रवत असते.

या संप्रेरकाच्या कमी स्रवण्यामुळे लहान मुलांना Cretinism नावाचा रोग होतो. म्हणजे त्यामध्ये मुलगा कमी खातो, जास्त झोपतो, जीभ लांब होते इत्यादी दोष दिसून येतात.

हे प्रमाण प्रौढ व्यक्तींमध्ये कमी झाल्यास Myxedemerma नावाचा रोग होतो. अशा व्यक्तीस थंडी सहन होत नाही आणि तो शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या दुर्बल बनतो.
कार्य:

तसेच मानसिक वाढ नियंत्रित करणे.
ऊर्जानिर्मिती तसेच रोगप्रतिकारक क्षमता नियंत्रित करणे.

विभक्ती

🔶विभक्ती- नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.

🔶कारक- वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध म्हणजे कारक होय.

🔶कारकार्थ- वाक्यातील नाम किंवा सर्वनाम त्यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात, त्यांना कारकार्थ असे म्हणतात

🔶उपपदार्थ- क्रियापदाशिवाय इतर असलेल्या संबंधांना उपपदार्थ असे म्हणतात.

विभक्तीचे प्रकार

प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते यात क्रियापद हा मुख्य शब्द होय

. ही क्रिया करणारा कोणीतरी असतो. त्याला कर्ता असे म्हणतात.

ही क्रिया कोणावार घडली, कोणी केली, कशाने केली, कोणासाठी केली, कोठून घडली, कोठे किंवा केंव्हा घडली, हे सांगणारे शब्द वाक्यात असतात.

नामांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध अशा ८ प्रकारे असतो.

विभक्तीचे एकुण ८ प्रकार पुढीलप्रमाणे मानले जातात.

🌷प्रथमा

🌷द्वितीया

🌷तृतीया

🌷चतुर्थी

🌷पंचमी

🌷षष्ठी

🌷सप्तमी

🌷संबोधन

🔶विभक्तीचे अर्थ🔶

कर्ता – क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो. त्याला कर्ता असे म्हणतात. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता होय. कधी कधी कर्त्याची विभक्ती प्रथमा असते.
उदा- मीना पुस्तक वाचते.

कर्म – कर्त्याने केलेली क्रिया कोणावार घडली हे सांगणारा शब्द म्हणजे कर्म होय. द्वितीयेचा कारकार्थ कर्म असतो. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीया असते. तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती अप्रत्यक्ष चतुर्थी असते.
उदा- राम रावणास मारतो.

करण– करण म्हणजे साधन. वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते, किंवा ज्याच्या साधनाने घडते, त्याला करण असे म्हणतात. तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण आहे.
उदा- आई चाकुने भाजी कापते.

संप्रदान – जेंव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते, तेंव्हा ते दान ज्याला करण्यात येते, त्याच्या वाचक शब्दाला किंवा देणे, बोलणे, सांगणे, इ. अर्थाच्या क्रिया ज्याला उद्देशून घडतात, त्या वस्तूला किंवा स्थानाला संप्रदान असे म्हणतात. चतुर्थीचा मुख्य कारकार्थ संप्रदान आहे.
उदा. मी गुरूजींना दक्षिणा दिली.

अपादान – क्रिया जेथून सुरू होते, तेथून ती व्यक्ती वा वस्तू दूर जाते. म्हणजे क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग दाखवायचा असतो, त्यास अपादान असे म्हणतात. पंचमीचा कारकार्थ अपादान आहे.
उदा. मी शाळेतून आताच घरी आलो.

अधिकरण – वाक्यातील क्रिया केंव्हा आणि कोठे घडली हे क्रियेचे स्थान किंवा काळ दर्शविणाऱ्या शब्दाच्या संबंधास अधिकरण असे म्हणतात. सप्तमीचा मुख्य कारकार्थ अधिकरण हा आहे. उदा. दररोज सकाळी मी शाळेत जातो.

संबंध – षष्ठी विभकीत शब्दांचा संबंध सामान्यतः क्रियापदांशी न येता दुसऱ्या नामाशी येतो. षष्ठीचा अर्थ संबंध. केंव्हा केंव्हा षष्ठीलाही कारकार्थ असलेला आढळतो.
उदा. रामाची बायको होती सीता.

▪️संबोधन – संबोधनाचा उपयोग हाक मारताना करतात. जे नाम संबोधन म्हणून वापरले जाते, त्याचा विकर होतो व प्रत्ययही लागतात. म्हणून संबोधन ही आठवी विभक्ती आहे.
उदा. मुलांनो, खाली बसा.

विभक्ती अर्थावरून मानावी की प्रत्ययावरून-

उदा.

१)तो घरातून बाहेर पडला.

२) तुझ्या हातून हे काम होणार नाही.

वरीलपैकी पहिल्या वाक्यात घरातून या शब्दामध्ये पंचमी विभक्ती असून पंचमीचा कारकार्थ अपदान आहे.

दुसऱ्या वाक्यात हातून या शब्दात ऊन हा प्रत्यय आहे. त्यावरून आपण येथे पंचमी विभक्ती आहे असे निर्विवादपणे म्हणू शकतो का? प्रत्ययावरून पंचमी म्हणाव तर कारकार्थ करण आहे म्हणजेच तृतीया विभक्ती यायला हवी.

मग हातून या शब्दामध्ये कोणता विभक्ती प्रत्यय असला पाहिजे?

हा वाद नेहमी निर्माण होतो. अर्थाशिवाय प्रत्यय नाहीत आणि प्रत्ययाशिवाय अर्थ व्यक्त करता येत नाही.

अर्थ व प्रत्यय हे परस्परांवर अवलंबून असल्यामुळे विभक्ती या प्रत्ययावरून मानाव्यात असे म्हणता येईल.

 म्हणून विभक्ती ही कारकार्थावरून मानण्यापेक्षा प्रत्ययावरून मानावी. मग विभक्तीचा अर्थ वेगळा असला तरी काही हरकत नाही.
जॉईन करा https://t.me/talathi20

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.

   1) स, ला, ना, ते    2) चा, ची, चे, च्या   
   3) त, इ, आ    4) ने, ए, शी, नी

उत्तर :- 2

2) ‘किती उंच पर्वत आहे हा !’ विधानार्थी वाक्य करा.

   1) कोण  म्हणेल हा पर्वत उंच नाही    2) हा पर्वत लहान थोडाच आहे
   3) पर्वत किती उंच आहे ?      4) हा पर्वत खूप उंच आहे

उत्तर :- 4

3) उद्देश्य व विधेय हे ................. चे घटक होत. वरील रिकाम्या जागेत अचूक पर्याय भरा.

   1) वाक्या    2) अर्थप्रकाश   
   3) अर्था    4) वाक्य प्रयोगा

उत्तर :- 1

4) शिपायाकडून चोर पकडला गेला. – या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्तरी    2) सकर्मक कर्तरी   
   3) नवीन कर्मणी    4) भावे

उत्तर :- 3

5) खालील पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर कोणते ?

     ‘अव्ययीभाव समासात .............................’

   1) पहिले पद प्रुख    2) दुसरे पद प्रमुख
   3) दोन्ही पदे प्रमुख    4) तिसरे पद प्रमुख

उत्तर :- 1

6) खालील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या. – सुनील शाळेला का जात नाही.
   1) .      2) ?     
   3) !      4) :

उत्तर :- 2

7) ‘कुल’ या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते होईल ?
   1) कुळाचार    2) कुळकर्णी   
   3) कुलटा    4) कुलीन

उत्तर :- 4

8) योग, रूढी, योगरूढ हे कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत ?
   1) अभिधा    2) लक्षणा   
   3) व्यंजना    4) गौणी

उत्तर :- 1

9) ‘सूर्य’ या अर्थी पुढील शब्द वापरत नाही.
   1) रवि      2) आदित्य   
   3) भानू    4) सुधांशू

उत्तर :- 4

10) विधायक च्या विरुध्द
   1) विनायक    2) विघातक   
   3) वैधानिक    4) संकट

उत्तर :- 2 

महाष्ट्रातील समाज सुधारक :- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

🔘 जीवन परिचय 🔘

◼️महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर पुढे मुंबई येथील एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर रानडे यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात  दाखल केले.

◼️१८६४ मध्ये इतिहास हा विषय घेऊन एम ए ची पदवी त्यांनी संपादन केली. १८६६ मध्ये  कायद्याची परीक्षा पास झाले. विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो  म्हणून रानडे यांची निवड झाली होती.

◼️१८६८ मध्ये त्यांची मुंबई येथे एल्फिन्स्टन कॉलेजात इग्रजी व इतिहास या विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.

◼️मुंबई इलाख्याचा गवर्नर रे याने १८८५ रानडे यांची कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त केले.

◼️१८९३ मध्ये मुंबई उच्च न्यायालायचे न्यायाधीश म्हणून नेमणूक आली.

◼️सन १८८५ मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे एक संस्थापक म्हणूनही रानडे याचा उल्लेख केला जातो.

🔘 प्रार्थना समाज 🔘

◼️३१ मार्च १८६७ रोजी आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे, डॉ भांडारकर वामन  मोडक, या सर्वांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.

🔘प्रार्थना समाजाची  तत्त्वे 🔘

◼️ईश्वर एकाच आहे तो निराकार आहे व तोच या विश्वाचा निर्माता आहे.  

◼️सत्य, सदाचार, भक्ती हे ईश्वराचे उपासक आहेत.  

◼️पठ्नेच्या मार्गाने ईश्वराची उपासना येते पण भौतिक फळाची नाही.  

◼️प्रार्थना ही फक्त आत्मिक उन्नातीशिवाय करावयाची असते. 

◼️मूर्तीपूजा हा परमेश्वराच्या उपासनेचा त्यज्य मार्ग आहे. 

◼️सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत म्हणून सर्वांनी बंधू  राहावे.

🔘सार्वजनिक सभा🔘

◼️सार्वजनिक सभेची स्थापना २ एप्रिल १८७० रोजी पुणे येथे झाली. १८७१ पासून  काकाच्या मदतीने तिला राजकीय स्वरूप प्राप्त झाले.

🔘 भारतीय सामाजिक परिषद 🔘

◼️सामाजिक सुधारणेचा मार्ग म्हणून रानडे यांनी सामाजिक परिषद ची सथापना केली.  १८८७ मध्ये कॉंग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनात सामाजिक परिषद भरविण्यात आली.

◼️मुंबईत १८६५ मध्ये स्थापन झालेल्या विधवाविवाह उत्तेजक मंडळाचे ते एक प्रमुख सभासद होते. 

◼️मराठी सत्तेचा  हा ग्रंथ लिहून विश्लेषणात्मक दृष्टीचा प्रत्यय आणून दिला आहे. १६ जानेवारी १९०१ रोजी मुंबई येथे निधन झाले.

UPSC प्रश्नसंच

प्र.1. हिमालयामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे आढळणार्‍या खिंडीचा योग्य क्रम लावा.
1) कालापाणी, बुर्झिल, बनिहाल, पीर-पांजाल
2) कालापाणी बुर्झिल, पीरपंजाल, बनिहाल.  √
3) पीरपंजाल, बनिहाल, बुर्झिल, कालापाणी
4) बुर्झिल, कालापाणी, पीरपंजाल, बनिहाल

प्र.2. खालीलपैकी कोणते घटक ऋतूनिर्मितीस कारणीभूत आहेत.
अ. पृथ्वीचे परीभ्रमण
ब. पृथ्वीचे परिवलन
क.पृथ्वी अक्षाकडे झुकलेली असणे   
ड. पृथ्वीच्या अंडाकृती आकारामुळे

1) अ,ब
2) ब, क, ड
3) सर्व कारणीभुत घटक   √
4) अ,ब व क

प्र.3. खालीलपैकी कोणते उष्णप्रवाह आहेत.
अ.उत्तर विषवृत्तीय प्रवाह ब.कॅरीबियन प्रवाह क.कॅलीफोर्निया प्रवाह ड. क्यरोसिवा प्रवाह

1) अ,ब, क
2) अ, ब, ड
3) अ,ब,ड √
4) वरील सर्व

प्र.4. खालीलपैकी कोणते विधाने -प्रावरण/मध्यावरण- विषयी बरोबर आहे.
अ. प्रावरणचा विस्तार खालच्या कवचा पासून गाभा पर्यंत आहे.
ब. प्रावरणाची जाडी सुमारे 2900 किमी आहे.
क. पृथ्वीच्या एकूण घनफ ळापैकी प्रावरणाने 83 टक्के भाग व्यापलेला आहे. व पृथ्वीच्या एकूण वस्तूमानापैकी प्रावरणाने वस्तूमान 68 टक्के आहे.

1) अ,क
2) अ
3) अ,ब
4) वरील सर्व. √

प्र.5. वार्‍याच्या अपरक्षण/खननकार्यामुळे निर्मित भुरूपे संबंधी कोणता पर्याय अयोग्य आहे.
अ.इयूजेन ब.यारदांग क.भुछत्र खडक ड.द्विपगिरी
इ.कंकतगिरी/केम्स ई तरंग घर्षितमंच
उ. भुस्तंभ

1) सर्व योग्य
2) सर्व अयोग्य
3) क, ड, इ, ई, उ
4) इ, ई.  √

प्र.6. बिटुमिनस कोळशाच्या प्रकारासंबंधी असत्य विधान ओळखा.
अ. बिटुमिनस कोळशात डांबराचा व वायूचा अंश जास्त असतो.
ब. बिटुमिनस कोळसा जळताना धुराचे प्रमाण कमी असून राखही कमी पडते.
क. बिटुमिनस कोळसा लवकर पेटतो व लवकर विझतो.

1) अ
2) ब
3) क
4) यापैकी नाही.  √

प्र.7. पुढीलपैकी कोणत्या देशातून मकरवृत्त जाते?
अ. ऑस्टे्रलिया
ब. नामिबिया
क. ब्राझिल
ड. चिली

1) अ,ब,क
2) ब व क
3) अ,ब, क
4) सर्व योग्य.  √

प्र.8. पुढील पठार पश्‍चिमेकडून पूर्वेकडे क्रमाने लावा.
अ. छोटा नागपूर
ब.माळवा
क. बुंदेलखंड
ड. बाघेलखंड

1) ब,क,ड,अ.  √
2) क,ब,ड,अ
3) अ,क,ड,ब
4) ब,क,अ,ड

प्र.9. जनगणना 2011 वरून योग्य ओळखा. (महाराष्ट्राबाबत)
अ. महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.
ब. सर्वात कमी स्त्री-पुरूष (लिंग गुणोत्तर) मुंबई शहरमध्ये आहे.
क. सर्वाधिक साक्षरतमुंबई उपनगर या जिल्हयाची
आहे.

1) अ व ब
2) ब व क
3) अ व क
4) सर्व योग्य.  √

प्र.10. अ,ब,क व ड यासाठी योग्य टेकडया/डोंगर ओळखा.

1. चिरोली  
2. गरमसूर
3. गाळणा
4. मुदखेड

.      अ     ब      क    ड
1)    3     4      2     1.  √
2)    3     4      1     2
3)    1     2      3     4
4)    1     2      4     3
👍
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

1.निम्नलिखित में से बौद्ध धर्म की पवित्र पुस्तक कौन सी है ?
(A)त्रिपिटक✔️
(B)क्लप सूत्र
(C)तोरा
(D)द अवेस्ता

2.साल्सेट द्वीप भारत के किस राज्य में स्थित है ?
(A)केरल
(B)महाराष्ट्र✔️
(C)तमिलनाडु
(D)आंध्र प्रदेश

3.दूधसागर झरना कहाँ स्थित है ?
(A)महाराष्ट्र
(B)कर्नाटक
(C)केरल
(D)गोवा✔️

4.रोवर्स कप कब आरंभ हुआ था ?
(A)1931
(B)1891✔️
(C)1952
(D)1981

5.सागा दावा किस राज्य का त्योहार है ?
(A)सिक्किम✔️
(B)त्रिपुरा
(C)असम
(D)मणिपुर

6.शोर मंदिर भारत के किस राज्य में स्थित है ?
(A)ओड़िशा
(B)तमिलनाडु✔️
(C)केरल
(D)महाराष्ट्र

7.तिब्बत में ब्रह्मपुत्र नदी को किस नाम से जाना जाता है ?
(A)यरलुंग त्संगपो✔️
(B)लोहित
(C)दिबंग
(D)दिहांग

8.कृष्ण नदी का उद्गम स्थल कौन सा है ?
(A)मुलताई
(B)अमरकंटक
(C)ताला (Tala)
(D)महाबलेश्वर✔️

9.घाघरा और सोन किस नदी की सहायक नदियाँ हैं ?
(A)चंबल
(B)यमुना
(C)गंगा✔️
(D)ब्रह्मपुत्र

10.पत्रिका ‘केसरी’ की शुरुआत किसने की ?
(A)लाला लाजपत राय
(B)बाल गंगाधर तिलक✔️
(C)दादाभाई नौरोजी
(D)बिपिन चंद्र पाल

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...