२९ जानेवारी २०२२

कायमधारा पध्दत

   प्रायोगिक स्वरूपात :- इ.स. 1790
   कायम स्वरूपात :- इ.स. 1793
   ठिकाण :- बंगालa, बिहार, ओडिसा, उत्तर मद्रास, वाराणसी
   प्रमाण :- भारतातील एकूण शेतजमीनीच्या 19%
   महसूल वाटणी :- शासन, जमीनदार व शेतकरी
   संकल्पना :- लॉर्ड कॉर्नवॉलिस
   गव्हर्नर :- लॉर्ड कॉर्नवॉलिस
   प्रभाव :- सर जॉन शोअर
   इतर नावे - जहागिरदारी पध्दत, मालगुजारी पध्दत, बिसवेदारी पध्दत.
🖍 वॉरन हेस्टिंग याने जमीन महसुल वसुल करण्याच्या अधिकारांचे लिलाव करण्याची पध्दत स्विकारली होती. मात्र ही व्यवस्था काही उपयोगात ठरली नाही. यामुळे हेस्टिंग्जच्या या पध्दतीतील दुष्परिणाम दूर करण्यासाठी कॉर्नवॉलिसने 1789 मध्ये सर जॉन शोअरच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. सर जाॅन शोअर समितीच्या शिफारशी नुसार, कायमधारा पध्दत लॉर्ड कॉर्नवॉलिस याने बंगाल प्रांतात इ.स. 
1790 ला 10 वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर लागू केली होती, परंतू नंतर 1793 मध्ये कॉर्नवॉलिसने ही व्यवस्था कायमस्वरूपासाठी लागू केली. म्हणूनच या व्यवस्थेला कायमधारा पध्दत असे म्हणतात.
🖍कायमधारा पध्दतीत जमीनीचा मालक जमीनदार असून प्रत्यक्ष शेतकरी हा भुदास असतो.
🖍या पध्दतीत शेतसारा हा रोख स्वरूपात गोळा केला जात असल्याने या पध्दतीत व्यापारवादाची तत्वेदिसतात.
🖍या व्यवस्थेत संपूर्ण जमिनीचे महसुल गोळा करण्याची जबाबदारी ही संपुर्णपणे जमिनादारांवरच सोपविण्यात आली.
🖍शेतकऱ्यांकडून मिळालेल्या महसुलांपैकी विशिष्ट रक्कम ही जमिनदाराने ब्रिटीशांना महसुल रूपात देणे आवश्यक होते.
🖍या व्यवस्थेनुसार जमिनदार व शेतकरी यांच्यात करारनाम्याची तरतूद होती जेणे करुन जमीनदाराला शेतकऱ्यांकडून ठराविक रक्कम महसूल रुपात मिळेल. परंतू तसे प्रत्यक्षात न झाल्यामुळे जमिनदार शेतकऱ्यांकडून कितीही महसुल वसुल करु शकत होता व ती जास्तीची रक्कम ही ब्रिटीशांना देण्याची 
गरजही नव्हती.
🖍1799 मध्ये तर महसूलाची रक्कम वेळेत न मिळाल्यास जमिनदारास शेतकऱ्याची जमीन, अवजारे किंवा जनावरे जप्त करण्याचा अधिकार मिळाला व यासाठी त्यास न्यायालयाच्या परवानगीची गरज देखील नव्हती.
🖍या व्यवस्थेचे खास वैशिष्ट्य म्हणजे जमीन महसुलाची रक्कम ही कायमची ठरविण्यात आली. यानुसार 89 टक्के सरकारला व 11 टक्के जमीनदारांना असे जमीन महसूलाच्या रकमेचे दोन भाग करण्यात आले होती.
🖍शेतसारा हा 30 ते 40 वर्षेस्थिर असेल.यात वाढ करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळाला नाही.
🖍या कायमधारा पध्दतीचे लाभार्थी हे केवळ जमिनदारच बनत असे.
🖍या व्यवस्थेवर सर जॉन शोअर याचा प्रभाव होता.
🖍जॉन शोअर समितीच्या शिफारसीनुसार या समितीत जेम्स ग्रँट आणि जोनार्थन डंकन हे इतर सदस्य होते.
🖍ही पध्दत सुरूवातीला केवळ बंगाल प्रांतामध्ये लागु करण्यात आली हाेती. 
🖍तिचा विस्तार पुढे बिहार, ओडिसा, उत्तर मद्रास, वाराणसी या भागांमध्ये करण्यात आला.
🖍भारतातील एकुण शेतजमिनीच्या 19 % क्षेत्रफळावर ही पध्दत अस्तित्वात होती.
🖍विल्यम बेंटिकने आपल्या 1829 च्या भाषणात कायमधारा पध्दतीचे फायदे स्पष्ट केले होते.

प्रश्नमंजुषा


 १९३५ च्या कायद्याने-------% जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला.

१) ५
२) १०✅
३) १५
४) २०
_______________________________
 सांप्रदायिक निवडणुकीचे जनक असे कोणाला संबोधतात?

१) लॉर्ड कर्झन 
२) लॉर्ड मिन्टो✅
३) मोंटेग्यु
४)  चेम्सफर्ड
_______________________________
 ---------- च्या चार्टर कायद्यानुसार नागरी सेवकांसाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येवू लागले

१) १८५८
२)  १८११
३) १८६१
४) १८३३ ✅
___________________________
 १८३३ च्या चार्टर कायद्यानुसार बंगालच्या  गव्हर्नर  जनरल ला भारताचा  गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात आले भारताचे प्रथम गव्हर्नर  जनरल ----------------- हे होते

१) विल्यम बेंटिक ✅
२) वॉरन हेस्टीग्ज
३) रोबर्ट क्लाइव्ह
४) लॉर्ड कोर्नवालीस
_______________________________
 १७७३  च्या रेग्युलेटिंग  कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर ला गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात येवू लागले पहिले गव्हर्नर जनरल ------------- हे होते

१) विल्यम बेंन्टीक
२) वॉरन हेस्टीग्ज ✅
३) रोबर्ट क्लाइव्ह
४ लॉर्ड कोर्नवालीस
_______________________________
 भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?

१) मार्क्विस ऑफ हेस्टीग्ज ✔️✔️
२) लॉर्ड वेलस्ली
३) लॉर्ड मिंटो
४) लॉर्ड विल्यम बेंटिक
_______________________________
⚫️ भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

१) वॉरन हेस्टींग्ज
२) विल्यम कॅरी
३) लॉर्ड विल्यम बेंटिक
४) चार्ल्स बॅबेज
५) लॉर्ड कॉर्नवालीस ✅
_______________________________
⚪️ ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात
कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
१) रोबर्ट हुक
२) जॉन स्नोव
३) लॉर्ड कॉंर्नवालीस ✅
४) रॉबर्ट कोच
_______________________________
 भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात?
१)फ्रँकेल
२)लॉर्ड कर्झन
३) रिकेट्स
४) लॉर्ड कॉंर्नवालीस ✅
___________________________
 भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?
१) एम.डब्लू.beijerinck1
२) लॉर्ड विल्यम बेंटीक ✅
३) जे.एच. वॉलकर
४)लॉर्ड मिंटो
___________________________

裂 कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ साजरा केला जातो?

(A) 26 जानेवारी
(B) 24 जानेवारी
(C) 25 जानेवारी✅✅
(D) 22 जानेवारी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

裂 2020 या वर्षासाठी कोणत्या देशाने ‘ग्रुप ऑफ 77’ या समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे?

(A) भारत
(B) गुयाना✅✅
(C) ट्युनिशिया
(D) अफगाणिस्तान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

裂 कोणती व्यक्ती 2020 या वर्षासाठी ‘दक्षिण आशियाच्या निवडणूक व्यवस्थापन मंडळाचा मंच’ (FEMBoSA) याचे अध्यक्ष आहेत?

(A) के. एम. नुरुल हुडा
(B) सुनील अरोरा✅✅
(C) सुशील चंद्र
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

裂 कोणत्या ठिकाणी सेवेसाठी प्राण्यांना समर्पित केलेले देशातले पहिले युद्ध स्मारक उभारण्यात येणार आहे?

(A) जम्मू
(B) लखनऊ
(C) पटना
(D) मेरठ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

裂 निवडणूक-विषयक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने पापुआ न्यू गिनी आणि ____ या देशांसोबत सामंजस्य करार केला आहे.

(A) ट्युनिशिया✅✅
(B) श्रीलंका
(C) बांग्लादेश
(D) मालदीव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

裂 कोणत्या राज्याने कृषी व्यवसायांना मदत करण्यासाठी जागतिक बँकेसोबत 210 दशलक्ष डॉलरचा कर्ज करार केला?

(A) आसाम
(B) नवी दिल्ली
(C) मणीपूर
(D) महाराष्ट्र✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव

संन्याशाचा उठाव : 1765-1800 – बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

चुआरांचा उठाव : 1768 – बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला

हो जमातीचे बंड : 1820 – छोटा नागपूर व सिंगभूम

जमिनदारांचा उठाव : 1803 – ओडिशा जगबंधू

खोंडांचा उठाव : 1836 – पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

संथाळांचा उठाव : 1855 – कान्हू व सिंधू

खासींचा उठाव : 1824 – आसाम निरतसिंग

कुंकिंचा उठाव : 1826 – मणिपूर

❇️ दक्षिण भारतातील उठाव 

पाळेगारांचा उठाव : 1790 – मद्रास

म्हैसूरमधील शेतकर्यांचा उठाव : 1830 – म्हैसूर

विजयनगरचा उठाव : 1765 – विजयनगर

गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 – गोरखपूर

रोहिलखंडातील उठाव : 1801 – रोहिलखंड

रामोश्यांचा उठाव : 1826 – महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824

केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 – केतूर

फोंडा सावंतचा उठाव : 1838

भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश

दख्खनचे दंगे : 1875 पुणे, सातारा, महाराष्ट्र शेतकरी

महाराष्ट्र - सामान्यज्ञान


★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०
★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई
★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर
★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६
★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५
★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६
★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २७
★ महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६
★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : ७
★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३
★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४
★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८
★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५
★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३
★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००
★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%
★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग
★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१% )
★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४% )
★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे
★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर
★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर
★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा : ठाणे
★ जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर
★ कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण : ९.२८%
★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा
★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा
★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत
★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु
★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती : मराठी
★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)
★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी : गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)
★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)

★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा
★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा
★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)
★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)
★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला
★ महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा : सोलापूर
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी : मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा : रत्नागिरी
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा : चंद्रपूर
★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे :महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी : गोदावरी
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)
★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा
★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण
★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश
★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका : मुंबई
★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)
★ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)
★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)
★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)
★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)
★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि.अहमदनगर : (१९५०)
★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)
★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश (१९०४)
★ महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा : पुणे (१८४८)
★ महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा : सातारा (१९६१)
★ महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी : मुंबई (१८५४)

जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती


1.  जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते.

2.   नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.

📌. रचना -  प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.

📌. सभासद संख्या -  प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात.

📌. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.

📌.  सभासदांची निवडणूक -  प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.

📌.  पात्रता (सभासदांची) - जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

1.    तो भारताचा नागरिक असावा.

2.    त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3.    1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.

📌.  आरक्षण : -.   1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

📌.  तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.

📌. कार्यकाल : -  5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.

📌.  अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.

📌.  कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.

📌.  राजीनामा :

1.    अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे

2.    उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे

मानधन :

1. अध्यक्ष - 20,000/-

📌.  अविश्वासाचा ठराव :  - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

📌.  सचिव - . जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.

📌.  बैठक :-.  जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.

📌.  मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :-  प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

७३ वी घटना दुरुस्ती ( १९९२ – ९३ )

   ग्रामविकास राष्ट्रविकासाचा मूलभूत पाया मानला जातो. भारतीय राह्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो. परंतु हे कलम राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये येत असल्यामुळे याकडे राज्यांनी दुर्लक्ष केले. भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून पंचायतराज संस्था अस्तित्वात आहेत. परंतु या संस्थांना घटनात्मक दर्जा नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये या संस्थांचा विकास झाला नाही. पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा. अशी शिफारस सर्वप्रथम १९८६ मध्ये डॉ. एल. एम. सिंघवी या समितीने केली होती.
            ग्रामीण भागात सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यासाठी व पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यासाठी पहिला प्रयत्न राजीव गांधी यांनी केला ‘नया पंचायतराज’ नावाचे ६४ वे घटनादुरुस्ती विधेयक १९८९ ला संसदेत सादर केले. परंतु अपयश आले. तसेच व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर यांनीही प्रयत्न केले.
– पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस प्रथम डॉ. एल. एम. सिंघवी यांनी केली.
– राजीव गांधी यांनी सर्वप्रथम १५ मे  १९८९ ला ‘नाय पंचायतराज’ नावाचे ६४ वे पंचायतराज घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले.

– १९८९ ला व्ही. पी.सिंग व चंद्रशेखर यांनीही पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न केले.
– १९९० ला लोकसभा विसर्जित झालयामुळे या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही.
-१९९२ ला पी. व्ही. नरसिंहराव यांनी पंचायतराज संबधी ७३ वे घटना दुरुस्ती विधेयक तयार केले.
– २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध.
– २३ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध. व त्यानंतर या विधेयकास १७ राज्याची विधिमंडळाची मंजुरी मिळाली.
– २० एप्रिल १९९३ ला या विधयेकावर राष्टत्रपतीची स्वाक्षरी होऊन पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.
– २४ एप्रिल १९९३ पासून ७३ व्या घटना दुरुस्तीच्या अंबलबजावणी सुरु.
– २४ एप्रिल १९९४ पर्यंत या शिफारशी सर्व राज्यांना लागू करण्याचे बंधनकारक आले.
– २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये ‘पंचायतराज दिन’ म्हणून पाळला जातो.

२४ एप्रिल १९९४ पर्यंत या शिफारशी सर्व राज्यांना लागू करण्याचे बंधनकारक आले.
– २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये ‘पंचायतराज दिन’ म्हणून पाळला जातो.
– भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३ ( A ते O ) मध्ये पंचायतराजची तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्यघटनेला ११ वे परिशिष्ट जोडण्यात आले व त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश करण्यांत आला आहे.
– ७३ व्या घटनादुरुस्ती विधेयकास बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांनी विरोध दर्शविला होता.

अन्नातील पोषक तत्वे/घटक

स्थूल पोषक तत्वे – शरीरासाठी सर्वांत जास्त आवश्यकता. उदा. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ (मेदपदार्थ)

सूक्ष्म पोषक तत्वे – अत्यंत कमी प्रमाणात (अल्प) आवश्यकता. उदा. जीवनसत्वे, क्षार.

🌿🌿प्रथिने (प्रोटीन्स) :🌿🌿

प्रथिने हि अमिनो आम्लांपासून बनलेली असतात.

शरीराला ’24’ अमिनो आम्लांची गरज असते.

त्यापैकी ‘9’ अमिनो आम्ले शरीरात निर्माण होऊ शकत नाहीत. ती आहारातून पुरवावी लागतात. म्हणून अशा अमिनो आम्लांना ‘आवश्यक अमिनो आम्ले’ असे म्हणतात.

(लायसीन, ल्युसीन, आयासोल्युसीन, व्हॅलिन, हिस्टीजीन, थ्रिओनिन, टिप्ट्रोफॅन, मिथिओनिन, फिनाईल, अॅलॅनिन)

अमिनो आम्ले ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर व कधी-कधी फॉस्फरस व लोह यांपासून बनलेली असतात.

🌿🌿प्रथिनांची साधने :🌿🌿

🌷प्राणीज साधने – दूध, अंडी, मांस, मासे.

🌷वनस्पतीज साधने –

डाळी-तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन  
                

धान्ये – ज्वारी, बाजारी, नाचणी, गहू.

तेलबिया – शेंगदाणे, तीळ, बदाम, करडई.

डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 20-25% असते.

सोयबींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 43.2% (सर्वाधिक)

दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण- 3.2-4.3%

अंडी प्रथिनांचे प्रमाण – 13%

मासे प्रथिनांचे प्रमाण – 15-23%

मांस प्रथिनांचे प्रमाण – 18-26%

प्राणीज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा ‘उच्च दर्जाचे’असतात. कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले उपलब्ध असतात.

विज्ञान :- पंचसृष्टी

- 1969 मध्ये आर. एच. व्हिटाकर यांनी या पंचसृष्टी पद्धतीचा शोध लावला.

1. सृष्टी मोनेरा (Kingdom Monera):

- जीवाणूंची सृष्टी
- Archaebacteria: Methanogens, Halophiles, Thermoacidophiles
- Eubacteri:
अॅन्टाॅन व्हाॅन लिवेनहुक- Father of  Bacteriology
- Cynobacteria
- Mycoplasma
- Actinomtcetes

2. सृष्टी प्रोटेस्टा (Kingdom Protesta):

- एकपेशीय सजीवांची सृष्टी
- Chrysophytes, Dinoflagellates, Euglenoids, Slime Moulds,
- Protozoa: Zooflagellates, Sarcodines, Sporozoan, Ciliates

3. सृष्टी कवक (Kingdom Fungai):

- असंश्लेषी, दृश्यकेंद्रकी & परपोषी सजीवांची सृष्टी
- कवकांचा अभ्यास - मायसिटाॅलाॅजी - जनक पियर अॅन्टोनिओ मायकेली
- भारतीय मायकाॅलीचा जनक - बटलर
- कवकांचे विभाजन: Myxeomicotina, Eumycoyina - Phycomycetes, Ascomycetes, Basidiomycetes, Dueteromycetes

4. सृष्टी वनस्पती (Kingdom Plantae):

- सर्व सजीवांची सृष्टी
- कॅरोलस लिनीयस - वनस्पतींच्या वर्गीकरणाचे श्रेय
- स्वयंपोषी व अचल असतात, इतर सजीवांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत

5. सृष्टी प्राणी (Kingdom Animalia):

- बहुपेशीय सजीवांची सृष्टी
- परपोषी व चल असतात, पेशीभित्तीका नसते.

● पंचसृष्टी

- 1969 मध्ये आर. एच. व्हिटाकर यांनी या पंचसृष्टी पद्धतीचा शोध लावला.

1. सृष्टी मोनेरा (Kingdom Monera):

- जीवाणूंची सृष्टी
- Archaebacteria: Methanogens, Halophiles, Thermoacidophiles
- Eubacteri:
अॅन्टाॅन व्हाॅन लिवेनहुक- Father of  Bacteriology
- Cynobacteria
- Mycoplasma
- Actinomtcetes

2. सृष्टी प्रोटेस्टा (Kingdom Protesta):

- एकपेशीय सजीवांची सृष्टी
- Chrysophytes, Dinoflagellates, Euglenoids, Slime Moulds,
- Protozoa: Zooflagellates, Sarcodines, Sporozoan, Ciliates

3. सृष्टी कवक (Kingdom Fungai):

- असंश्लेषी, दृश्यकेंद्रकी & परपोषी सजीवांची सृष्टी
- कवकांचा अभ्यास - मायसिटाॅलाॅजी - जनक पियर अॅन्टोनिओ मायकेली
- भारतीय मायकाॅलीचा जनक - बटलर
- कवकांचे विभाजन: Myxeomicotina, Eumycoyina - Phycomycetes, Ascomycetes, Basidiomycetes, Dueteromycetes

4. सृष्टी वनस्पती (Kingdom Plantae):

- सर्व सजीवांची सृष्टी
- कॅरोलस लिनीयस - वनस्पतींच्या वर्गीकरणाचे श्रेय
- स्वयंपोषी व अचल असतात, इतर सजीवांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत

5. सृष्टी प्राणी (Kingdom Animalia):

- बहुपेशीय सजीवांची सृष्टी
- परपोषी व चल असतात, पेशीभित्तीका नसते.

● वनस्पतींचे वर्गीकरण

- 1883 मध्ये एचर या शास्त्रज्ञाने अबीजपत्री (Cryptogame) आणि बीजपत्री (Phanerogamae) असे केले
- आर. एच. व्हिटाकर यांनी अबीजपत्री उपसृष्टीचे तीन प्रकारात खालीलप्रमाणे विभाजन केले.

1. थॅलोफायटा (Thalophyta)

- शैवाळांचा विभाग
- मूळ, खोड, पान नसतात
- फायकोलाॅजी म्हणजे शैवाळांचा अभ्यास
- जनक: माॅरिस
- भारतीय जनक: लाईंगर
- जगातील एकूण प्रकाशसंश्लेषणापैकी 90% प्रकाशसंश्लेषण शैवाळांमार्फत होते.
- शैवाळांचे 3 प्रकार: हिरवे (Chlorophyceae), तपकिरी (Phaeophyceae), लाल (Rhodophyceae)

2. ब्रायोफायटा (Bryophyta)

- मूळ, खोड, पान नसतात, मूलाभ असतात.
- वर्गीकरण: लिव्हरवार्टस (हिपॅटेसी) आणि माॅसेस (मुस्सी)
- ब्रायोलाॅजी म्हणजे ब्रायोफायटचा अभ्यास
- जनक: हेडविक
- भारतीय जनक: कश्यप

3. टेरिडोफायटा (Pteridophyta)

- पृथ्वीवरीर पहिली संवहनी संस्था
- मूळ, खोड, पान असतात
- चार प्रकार: सिलोफायटा, लायकोफायटा, आर्थोफायटा, फिलीकोफायटा
- जनक: थ्रिओफ्रस्ट

● मानवातील स्नायू

- सर्वात मोठा स्नायू - पार्श्वभागात असतो: Gluteus Maximus
- सर्वात लांब स्नायू - मांडीमध्ये असतो: Sartorious
- सर्वात मजबूत स्नायू - जबड्यात असतो: Masseter
- सर्वात अखूड स्नायू - कानात असतो: Stapedial Muscle

वनस्पती व प्राण्यांमधील ऊती

वनस्पती ऊती :

शरीरांच्या भागांना अवयव म्हणतात. अवयव हे ऊती पासून बनलेले असतात. ऊती या पेशिसमुहापासून बनलील्या असतात. सजीवांच्या विविध अवयवांची कार्य भिन्न असल्यामुळे यांच्या  रचनेतही फरक दिसून येतो.

वनस्पतींची वाढ हि त्यांच्या मुळ व खोडांच्या अग्रभागी दिसून येते. याचे  कारण म्हणजे अग्रभागासी वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या ऊती असतात. पेशींच्या विभाजन क्षमतेनुसार वनस्पती उतीचे विभाजी ऊती व स्थायी ऊती असे वर्गीकरण केले जाते.

हि एकाच वनस्पती ऊती अशाप्रकारची ऊती आहे, ज्यात पेशिविभाजानाद्वारे नवीन पेशींची निर्मिती होते.

या विभाजी ऊती कोणत्या विभागामध्ये आढळतात यावरून त्यांचे प्ररोह विभाजी(Apical meristem)आणि पार्श्व विभाजी ऊती (lateal meristem)असे प्रकार आहेत.

अंतरीय विभाजी ऊती हा सुद्धा एक प्रकार आहे.(Entercalary Meristem).

प्ररोह विभाजी ऊती हि खोडाच्या व मुलाचा अग्रक़्भगि असते.

खोड किंवा मुळचा घेर व्रुंडी पार्श्व विभाजी उतीमुळे होते.

अंतर विभाजी ऊती हि पानांच्या तळासी व  फांदीच्या तळासी असते. त्या अतिक्रियाशील असतात.

विशिष्ट भूमिका बजावल्यानंतर विभाजी उतीच्या पेशी विबाह्जानामुळे तयार झालेल्या पेशींची विभाजनाची

स्थायी ऊती

यामुळे स्थायी ऊती तयार होतात . स्थायी आकार , आकृती व कार्य घडवण्याच्या या प्रक्रियेस 'विभेदन' (differentiation) असे म्हणतात.

स्थायी ऊती या सरळ स्थायु किंवा जातील स्थायू ऊती असतात.

सरल स्थायी ऊती :

या ऊती एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असून या उतींचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते.

मूलऊती:

यातील पेशी जिवंत असतात. यात केंद्रक असून याची भित्तिका पातळ असते.

या पेशींमध्ये मोकळी जागा असते. या पेशी बटाटा व बिट यासारख्या वनस्पतीत अन्न साठवण्याचे कार्य करतात .

हरीत ऊती:

वनस्पतींच्या पानामधील ऊतींना हरित ऊती म्हणतात.

वायू ऊती:

जलीय वनस्पतीमध्ये अंतरपेशिय पोकळ्यामुळे हवेच्या पोकळ्या निर्माण होतात. पाण्यावर तरंगण्याची क्षमता देतात . त्यांना वायू ऊती असे म्हणतात.

स्थूलकोन ऊती :

या ऊती प्रामुख्याने पानाच्या डेठात आढळतात . त्या पाने,खोड व फांद्या यांना लवचिकता देतात .

दृढ ऊती :

दृढ ऊती मधील पेशी मृत असतात . त्यांच्या भिंती जाड असतात . या ऊती खोड संवाहणी पूल . शिरा व बियांच्या कठीण कवचामध्ये आढळतात .

विशिष्ट रचणे मुळे वनस्पती टणक व ताठ बनतात.

मलमलचे कापड अंबाडीच्या दृढ ऊतीपासून  बनवले जाते .

पृष्ठभागीय ऊती :

वनस्पतींचा संपुर्ण पृष्ठभाग हा पृष्ठभागीय  उतींच्या थराने बनतो .

या आपित्वाचीय पेशी सपाट असतात.

हि ऊती वनस्पतीच्या सर्व भागांचे संरक्षण करते.

निवडूंगासारख्या वनस्पतींचे बाह्य आवरण हे जाडसर असते.

बाह्य आवरणातील पेशी नेहमी मेणासारखा पदार्थ स्त्रवत असतात. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते.

वातावरणा बरोबर वायूंचे देवाणघेवाण करण्यासाठी पानांच्या बाह्य आवरणाला सूक्ष्मछिद्रे असतात . त्यांना पर्णरंध्रे  असे म्हणतात.

सामान्यज्ञान प्रश्नसंच

● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य :
*हिमाचल प्रदेश

● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य :
*तामिळनाडू

● सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य :
*राजस्थान

● पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य :
*राजस्थान 

● संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य :
*उत्तराखंड

● मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य :
*हरियाणा

● भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य :
*आंध्रप्रदेश

● जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य :
*हिमाचल प्रदेश

● संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : *केरळ

● देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य :
*पंजाब

● मतांची जनगणना करणारे पहिले राज्य :
*कर्नाटक

● विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य :
*कर्नाटक

● भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : *उत्तरप्रदेश

● मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य :
*तामिळनाडू

● महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य :
*महाराष्ट्र (मुंबई)

● रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य :
*महाराष्ट्र

● राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य :
*आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

● अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य :
*छत्तीसगड

● मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य :
*मध्यप्रदेश

● अटल पेन्शन योजनेचे संचालन कोणती संस्था करते?
: ‘निवृत्ती वेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण’ (PFRDA)

● ‘FIR आपके द्वार’ हि  योजना कोणत्या राज्य सरकारने राज्यात लागू केली?
: मध्यप्रदेश

● भारतात ‘सेरोसर्वे’ कोणती संस्था आयोजित करणार आहे?
: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

● भारतात तयार केले गेलेले पहिले ‘PPE किट सीम सीलिंग’ यंत्र कोणत्या कंपनीने विकसित केले?
: मॅकपॉवर सीएनसी

● देशातील कोणत्या राज्यात सर्वात कमी बालमृत्यू दर आहे?
: केरळ

● केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अध्यक्ष पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
: मनोज अहुजा

● तामिळनाडूच्या कोणत्या उत्पादनाला GI हा टॅग प्राप्त झाला?
: तंजावूर नेट्टी कलाकृती

● ‘फेड कप हार्ट अवॉर्ड’ जिंकणारी प्रथम भारतीय कोण ठरली?
: सानिया मिर्झा

● DFRL संस्थेनी विकसित केलेल्या फिरत्या तपासणी प्रयोगशाळेचे नाव काय?
: परख

● स्कायट्रॅक्सचा जगातले सर्वोत्कृष्ट विमानतळ हा 2020 सालाचा पुरस्कार कोणत्या विमानतळाला जाहीर झाला?
: चांगी विमानतळ

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...