०८ जानेवारी २०२२

केशवानंद भारती खटला

🔘 राज्यशास्त्र Imp घटक

🔸केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला.

🔸घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते.

🔸राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले.

🔸संसदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे?

🔸या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले.

🔸गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की *घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.*

🔸या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले.

🔸या *खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन* केले गेले.

🔸 सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की
' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.

🔸संसदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.

🔸 सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्‍लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं.

🔸या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं.

🔸केशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्‍लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. *म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.*

कार्बन चक्र


कार्बनाचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व त्याची पुनरुपयुक्तता म्हणजे कार्बन चक्र होय.

✍कार्बनाच्या अणूंचे मुख्यतः प्रकाशसंश्लेषण व श्वसनक्रियेद्वारे अभिसरण व त्याची पुनरुपयुक्तता होते. वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड (Co2) वायू केवळ ०.०३% असतो. उष्ण कटिबंधात कार्बन चक्र प्रभावी असते.

✍पृथ्वीवर कार्बन चक्र अविरत चालू असते. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून होणारी अन्ननिर्मिती फक्त सूर्यप्रकाशात होते. जैविक व अजैविक प्रक्रिया, प्रकाशसंश्लेषण, श्वसन, अपघटन इ. वेगवेगळ्या प्रक्रियांद्वारे हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड वायू वनस्पती व प्राणी यांच्या माध्यमातून संक्रमित होऊन पुन्हा हवेत मिसळत असतो.

✍हिरव्या वनस्पती आपल्या पानांद्वारे वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू शोषून घेतात. त्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डाय-ऑक्साइडाचे कार्बोदके, प्रथिने व मेद यांमध्ये रूपांतर करतात. तृणभक्षक प्राणी आपल्या आहारात हिरव्या वनस्पतींचा उपयोग करतात.

✍तृणभक्षक प्राण्यांना मांसभक्षक प्राणी खातात. म्हणजेच वनस्पतींकडून कार्बोदके, प्रथिने व मेद हे कार्बनी पदार्थ तृणभक्षक प्राण्यांकडे, तृणभक्षक प्राण्यांकडून मांसभक्षक प्राण्यांकडे आणि मांसभक्षक प्राण्यांकडून सर्वभक्षी प्राण्यांकडे संक्रमित होतात.

✍शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यांसारख्या अपघटकांकडून अपघटन होऊन कार्बन डाय-ऑक्साइड वायू मुक्त होतो. हा वायू वातावरणात मिसळतो व साठला जातो.

✍अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसर्‍या सजीवाकडे कार्बनाचे अभिसरण चालू असते. सागरी वनस्पतीसुद्धा समुद्राच्या पाण्यात विरघळलेला कार्बन डाय-ऑक्साइड वायू प्रकाशसंश्लेषणासाठी वापरतात. सागरी वनस्पतीकडून तो सागरी प्राण्यांकडे संक्रमित होतो.

✍सागरी वनस्पती व प्राणी मृत झाल्यावर त्यांच्या अपघटनातून कार्बन डाय-ऑक्साइड पुन्हा वातावरणात मिसळतो. वनस्पती व प्राणी या दोहोंच्याही श्वसनक्रियेत कार्बोदकाचे ऑक्सिडीभवन घडून येते आणि तयार झालेला कार्बन डाय-ऑक्साइड वातावरणात मिसळतो. वातावरणात पुन्हा कार्बन मिसळण्याच्या या जैविक प्रक्रिया आहेत.

✍वनस्पती, प्राणी व खनिज तेले यांचा कार्बन हा महत्त्वाचा घटक आहे. दगडी कोळसा, हिरा, ग्रॅफाइट या स्वरूपात कार्बन भूकवचात विखुरलेला असतो.

✍धातूंच्या खनिजांत तो कार्बोनेट या रूपात आढळतो. वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड हा कार्बनाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे कार्बन चक्रात कार्बन डाय-ऑक्साइड अत्यंत महत्त्वाचा आहे.

✍जीवाश्म इंधनाचे ज्वलन, लाकडाचे ज्वलन, वणवे आणि ज्वालामुखी उद्रेक प्रसंगी कार्बन डाय-ऑक्साइड वायू बाहेर पडून हवेत मिसळतो. वातावरणात पुन्हा कार्बन मिसळण्याच्या या अजैविक प्रक्रिया आहेत.

✍प्रकाशसंश्लेषणाने वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो, तर श्वसनाने कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर वातावरणात सोडला जातो. वनस्पतींमुळे वातावरणातील ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड वायू यांचा निसर्गतः समतोल राखला जातो.

1833 चा तिसरा सनदी कायदा

👉 कंपनीची मुदत 20 वर्षाने वाढविली.

👉 कंपनीची व्यापारी मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात आणली (चाची संपुष्टात i.e. चहा आणि चीन) म्हणजेच इतर ब्रिटिशांना भारतात व्यापार करण्याची परवानगी मिळाली.

👉 आता कंपनी फक्त प्रशासकीय कार्य करणार.

👉 बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. (पहिला - लॉर्ड विलयम बेंटिंग)

👉 मुंबई व मद्रास च्या गव्हर्नर चे कायदे करण्याचे अधिकार काढून घेतले.

👉 कोणत्याही भारतीयाला कंपनीत कोणतेही पद धारण करण्यास बंदी असणार नाही. (संचालक मंडळाच्या विरोधानंतर ही तरतूद रद्द केली)

👉 गुलामांची पद्धत नष्ट करण्याचा भारत सरकारला आदेश.

  〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

इंग्रज अधिकारी व कामगिरी


▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था

◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट*

◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत

◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज

◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त

◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा

◾️ चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता

◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक

भास्करराव विठोजीराव जाधव

◾️भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे

◾️ रा.गो. भांडारकर हे त्यांचे सहाध्यायी होते

◾️मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई इलाख्यात सर्वप्रथम आले होते

◾️महात्मा फुले, आय्यवारू स्वामी , प्रा. केळूसकर ही त्यांची दैवते बनली . अशाप्रकारे ते सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते बनले. 

◾️पुण्यातील 'डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी'चे अध्वर्यू अ‍ॅड. गंगाराम भाऊ म्हस्के यांनी त्यांचे नाव शाहू महाराजांना सुचवले. 

◾️दुर्मिळ गुणांमुळे त्यांनी भास्कररावांना आग्रहाने करवीर संस्थानात नेमून घेतले. 

◾️१८९५ ते १९२१ या काळात भास्कररावांनी मुख्य महसूल अधिकारी , जिल्हा व सत्र न्यायाधीश, असिस्टंट प्लेग व फॅमिन कमिशनर, १९०१ च्या शिरोगणतीचे उपाधीक्षक इ. अनेक महत्त्वाची पदे भूषवली

◾️बहुजन समाजाचे शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निर्मुलन, ब्राह्मणेतरांचे राजकारण या बाबतीत त्यांचे व शाहू महाराजांचे विचार समान होते

◾️शाहू महाराजांचा प्रगाढ विश्वास असल्यामुळे कोल्हापूर नगरपालिकेच्या कारभाराची सर्व सूत्रे तब्बल १४ वर्षे भास्कररावांच्या हाती राहिली

◾️करवीरची जनता त्यांचा 'कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार' असा त्यांचा अभिमानाने उल्लेख करते.

◾️त्यांना प्रति शाहू महाराज असेही म्हटले जाते

अब्दुल रसूल कुर्बान हुसेन

📚अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते.

📚 कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून, १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविले. त्यावेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे २२ वर्षे होते. एवढ्या तरुण वयात हौतात्म्य लाभलेले ते पहिलेच संपादक असावेत.

📚सोलापुरातील स्वातंत्र्यलढा दडपण्यासाठी इंग्रजांनी मार्शल कायदा लागू केला. त्यामुळे कुर्बान हुसेन यांचे वृत्तपत्र बंद पडले.

📚त्यांनी १९२७ साली ‘गझनफर’ नावाचे उर्दू भाषेतील साप्ताहिक सुरु केले होते.

📚‘गझनफर’ या शब्दाचा अर्थ आहे सिंह. लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ वृत्तपत्राने ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यासाठी जागृती केली, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हयात कुर्बान हुसेन यांच्या ‘गझनफर’ वृत्तपत्राने कार्य सुरु केले होते. गझनफर हे नाव उर्दू भाषेतील होतं, परंतु ते मराठी भाषेत देवनागरी लिपीत छापले जात असे. त्यांनी गझनफर वृत्तपत्रातून स्वातंत्र्यलढा, कामगारांचे प्रश्न, हिदु-मुस्लिम ऐक्य यासह विविध विषयांवर लेखन केले.

📚त्यांची भाषा प्रभावी आणि परखड होती. कुर्बान हुसेन हे एका सामान्य मुस्लीम कुटुंबात जन्माला आले. ते गिरणी कामगार होते. कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जात होते, ते सभांमध्ये अतिशय प्रभावी भाषणे करीत असत. ५ मे १९३० रोजी महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर सोलापूर शहरात जे सभा झाली, त्यातील त्यांचे भाषण ऐकून तरुण कार्यकर्ते इंग्रजाविरुद्ध पेटून उठले होते.

📚 सोलापुरातील तरुण रस्त्यावर उतरल्यानंतर येथील परिस्थिती कलेक्टर यांच्या नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे ९, १०, ११ मे १९३० हे तीन दिवस सोलापूर शहरात इंग्रज सरकारचे शासनच नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी तीन दिवस सोलापूर शहराने पूर्ण स्वातंत्र्य अनुभवले.

MPSC ला विचारले जाणारी व मागच्या परीक्षेत विचारलेली डोंगर रंगावरची काही प्रश्न:

ग्रेटर हिमालयातील डोंगर रांगाचा उत्तर ते दक्षिण क्रम लावा.
०काराकोरम पर्वत
०लडाख
०झास्कर
०पीर पांजल
०शिवालीक पर्वत

दक्षिण भारतातील पर्वत डोंगररांगा ची दक्षिण ते उत्तर असा क्रम लावा.:
०निलगिरी पर्वत
०शेवरॉय
०जावडी
०पलकोंडा
०नल्लामल्ला पर्वत

मध्य भारतातील डोंगररांगा चा उत्तर ते दक्षिण असा उतरता क्रम:
०अरवली पर्वत
०विंध्य पर्वत
०सातपुडा
०सातमाळा
०अजिंठा
०बालाघाट
०महादेव डोंगर

पूर्वोत्तर भारतातील टेकड्या उत्तर ते दक्षिण या क्रमाने लावा
मिष्मी टेकड्या
डफला
नागा
बारील
मिकीर
गारो/खाशी

जगातील शहरे व नद्या कशास काय म्हणतात

 ◾️ हवाग नदी - पीत नदी, चीनचे दुखाश्रु

◾️ गल्फ सागर प्रवाह - समुद्रानंतर्गत नदी

◾️रोम शहर - सात टेकड्यांचे शहर

◾️ ऍबर्डीन - ग्रॅनाईट नगरी

◾️ व्हेनिस शहर - एड्रियाटची राणी

◾️ पामीरचे पठार पर्वत - जगाचे ओढे

◾️ सिडनी शहर - दक्षिण गोलार्धाची राणी '

◾️ बाबेल मॅण्डेबची सामुद्रधुनी - अश्रुंचे द्वार

◾️ डेट्रॉईट शहर - मोटार गाड्यांचे शहर

◾️ अटलांनटीक महासागर - हेरिंग माशांचे तळे

◾️ बेलग्रेड शहर - श्वेत शहर

◾️ शिकागो शहर - उद्यानाचे शहर

◾️ जिब्राल्टर - भूमध्यसमुद्राची किल्ली

◾️ ल्हासा शहर - निषिद्ध शहर

◾️ न्यूयॉर्क शहर - गगनचुंबी इमारतींचे शहर

◾️ स्टोकहोम शहर - उत्तरेचे व्हेनिस

महत्त्वाच्या दऱ्या.


🧩काश्मीर दरी :

🅾पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रुंदी सुमारे ८० किमी इतकी आहे.

🧩कांग्रा दरी :

🅾हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.

🧩कुलू दरी :

🅾रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.

🧩काठमांडू दरी :

🅾नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेला काठमांडू दरी आहे.

🧩शिवालिक रांगा/ बाह्य हिमालय (Outer Himalaya) :

🅾हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग म्हणजे शिवालिक रांग. या रांगेलाच ‘बाह्य हिमालय’ असे म्हणतात.

🅾हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला व येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली यालाच ‘डून’ असे म्हणतात .

🅾उदा. डेहराडून (उत्तराखंड), उधमपूर व कोटला (जम्मू व काश्मीर), शिवालिक रांगांच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे, तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होताना दिसते.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

केंद्रीय पीक संशोधन केंद्र.

१)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र.
       =लखनौ (उत्तरप्रदेश)
२)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.
       =कर्नाल (हरियाणा)
३)केंद्रीय आवळा संशोधन केंद्र
       =फैजाबाद (उत्तरप्रदेश)
४)केंद्रीय नारळ संशोधन केंद
       =कासरगोड (केरळ)
५)केंद्रीय केळी संशोधन केंद्
      =कळांडूथोराई (तामिळनाडू)
६)केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र
      =सांगोला, सोलापूर
७)केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र
      =मांजरी (पुणे)
८)केंद्रीय दूध संशोधन केंद्र
      =कर्नाल (हरियाणा)
९)केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र
      =सिमला
१०)केंद्रीय संत्री संशोधन केंद्र
      =नागपूर
११)केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र
      =अंबिकानगर (गुजरात)
१२)केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र
      =झाशी (मध्‍यप्रदेश)
१३)केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र
      =पुणे
१४)केंद्रीय काजू संशोधन केंद्र
      =पहूर
१५)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      =बराकपूर (पश्चिम बंगाल)
१६)केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र
      =राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)
१७)केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र
      =नागपूर
१८)केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र
      =इंदोर (मध्‍यप्रदेश)
१९)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र
      =नागपूर
२०)केंद्रीय ज्‍वारी संशोधन केंद्र
      =राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)
२१)केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र
      =सोलन
२२)केंद्रीय उंट संशोधन केंद्र
      =जोरबीट (राजस्‍थान)
२३)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      =बराकपूर (पश्चिम बंगाल)
२४)केंद्रीय लाख संशोधन केंद्र
      =रांची (झारखंड)
२५)केंद्रीय फळ संशोधन केंद्र
      =गणेशखिंड (पुणे)
२६)मसाला पीक संशोधन केंद्र
     =केरळ
२७)इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्‍स
     =हैदराबाद (आंध्रप्रदेश)

सातवी पंचवार्षिक योजना

कालावधी: इ.स. १ एप्रिल १९८५ - इ.स. ३१ मार्च १९९०
प्राधान्य :
उत्पादक रोजगार निर्मिती घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व उत्पादकता' मॉडेल : मजुरी वस्तू प्रतिमान खर्च : प्रस्तावित खर्च- १,८०,००० कोटी रु., वास्तविक खर्च- २,१८,७२९ कोटी रु.

प्रकल्प :
१. इंदिरा आवास योजना इ.स १९८५-१९८६ -RLEGP चा भाग म्ह णून सुरु करण्यात आली.
२. Million Wells Scheme (दशलक्ष विहीर योजना)
३. Council for Advancement of People‟s Action and Rural Technology (CAPART)
४. जवाहर रोजगार योजना- NREP व RLEGP या योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली.
5. Speed post start up (1986)
6. Security Exchange Board of India (SEBI) (12 APRIL 1988)

मूल्यमापन : या योजनेने समाधानकारक प्रगती केली. या योजनेला 'रोजगारनिर्मिती जनक' योजना असे म्हणतात. दारिद्र्य रेषेखालील लोकसंखेचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून (१९८३ - ८४) ३० टक्के पर्यंत (१९८७) कमी झाली.

सातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरु करण्यात आली नाही. त्याएवजी दोन वार्षिक योजना राबवण्यात आल्या.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

बेरोजगारीचे फायदे

बेकारी फायदे (कार्यकक्षा देखील म्हणतात अवलंबून बेकारी विमा किंवा बेकारी भरपाई ) वर अधिकृत संस्था केलेल्या देयके बेरोजगार लोक. अमेरिकेत, फायदे नागरिक नागरिकांवर कर न आकारता अनिवार्य सरकारी विमा प्रणालीद्वारे दिले जातात. कार्यक्षेत्र व त्या व्यक्तीच्या स्थितीनुसार या रकमे लहान असू शकतात आणि केवळ मूलभूत गरजा पूर्ण करतात किंवा गमावलेल्या वेळेची पूर्तता मागील अर्जित पगाराच्या प्रमाणात होईल.

बेरोजगारीचे फायदे सामान्यत: केवळ बेरोजगार म्हणून नोंदणी केलेल्यांनाच दिले जातात आणि बर्‍याच राज्यांत नोकरी नसलेली आणि नोकरी नसलेली नोकरी मिळवून दिली जाते आणि बहुतेक राज्यांत कारणास्तव नोकरी काढून टाकली जात नसल्याची वैधता असते.

◾️बेरोजगारीवर बेरोजगारी विमा प्रभाव ◾️

मध्ये ग्रेट मंदी , बेकारी विमा आणि विशेषतः जास्तीत जास्त गेल्या फायदे विस्तार हे "नैतिक धोका" समस्या 99 आठवडे-लक्षणीय शोधत आणि रोजगार घेत रिपब्लिकन आमदार यांनी व्यक्त केले ते कामगार परावृत्त करून बेकारी प्रोत्साहन देते. पुराणमतवादी अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट बॅरो यांना असे आढळले की फायद्यांमुळे बेरोजगारीचे प्रमाण 2% वाढले.  बार्कोच्या अभ्यासानोशी सहमत नसलेले बर्कले अर्थशास्त्रज्ञ जेसी रोथस्टीन यांना असे आढळले की बेरोजगारीचे "बहुसंख्य" हे "मागणी धक्का" नव्हे "[बेरोजगारी विमा] - पुरवठा कपात" कमी केल्यामुळे होते. "बेरोजगारी विमा लोकांना नोकरी मिळविण्यापासून परावृत्त करते या कल्पनेची चाचणी करण्यासाठी, बेकारीवर केलेल्या UI चा एकूण परिणाम 1% च्या दशांशपेक्षा जास्त न वाढवता होता. 

४ थी पंचवार्षिक योजना.

🅾कालावधी: इ.स. १९६९ - इ.स. १९७४

🅾प्रतिमान ःॲलन एस. मान आणि अशोक रुद्र प्राधान्य : स्वावलंबन घोषवाक्य : स्थैर्यसह आर्थिक वाढ मॉडेल : Open Consistency Model खर्च : प्रस्तावित खर्च- १५,९०० कोटी रु., वास्तविक खर्च- १५,७९९ कोटी रु. योजनेचे उपनाव: गाडगीळ योजना प्रकल्प : १. DROUGHT PRONE AREAS PROGRAMME (DPAP) (1973) २. Small Farmer Development Agency (SFDA) ३. बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने) (१९७२) ४. SAIL (Steel Authority of India Ltd) (१९७३)

🅾महत्वपूर्ण घटना १. आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP Act-1969 हा कायदा संमत करण्यात आला. २. जुलै १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ३. अग्रणी बँक योजना सुरु करण्यात आली. -1969 ४. विमा महामंडळाची स्थापना (१९७३) ५. १९७२-७३ मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल होता. ६. Foreign Exchange Regulation Act-1973

🅾मूल्यमापन : काही प्रमाणात अपयश आले. करणे- १) बांगलादेश मुक्ती युद्ध - १९७१ २) १९७३ चे पहिला तेलाचा झटका (Oil Shocks)

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

०७ जानेवारी २०२२

भारतीय राज्यघटने संबंधित महत्त्वाच्या दिनांक


9 डिसेंबर 1946    ➖  संविधान सभेचे पहिले बैठक.
11 डिसेंबर 1946  ➖ डॉ  राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी निवड.
13 डिसेंबर 1946  ➖ प. नेहमी  उद्दिष्टांचा ठराव मांडला.
22 जानेवारी 1947➖ उद्दिष्टांबाबतचा ठराव मंजूर .
18 जुलै 1947      ➖ भारतीय स्वातंत्र्याचा ठराव मंजूर.
22 जुलै 1947      ➖ भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत.
14 ऑगस्ट 1947  ➖ घटना समितीला सार्वभौमत्व प्राप्त.
29 ऑगस्ट 1947  ➖ मसुदा समितीची स्थापना.
26 नोव्हेंबर 1949  ➖ भारतीय राज्यघटना स्वीकृत.
26 जानेवारी 1950 ➖ भारतीय राज्यघटनेचे अंमलबजावणी.
24 जानेवारी 1950 ➖ राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत स्वीकृत.
24 जानेवारी 1950 ➖ संविधान सभेची शेवटची व विशेष बैठक.
18 डिसेंबर 1976   ➖ 42 वी घटनादुरुस्ती करण्यात आली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔷

खाली दिलेल्या नेत्यांचे गुरू कोण ते सांगा

1】लोकमान्य टिळक यांचे गुरू कोण होते❓के●टी●तेलंग✅

2】महात्मा गांधी यांचे गुरू कोण होते ❓
      गोपालकृष्ण गोखले✅

3】स्वतंत्र्यवीर सावरकर यांचे गुरू कोण होते❓श्यामजी कृष्ण वर्मा✅

4】रवींद्रनाथ टागोर यांचे गुरू कोण होते❓बँकिंचंद्र चॅटर्जी✅

5】न्यामुर्ती रानडे यांचे गुरू कोण होते❓
     के●टी●तेलंग✅

6】अरविंद घोष यांचे गुरू कोण होते❓
     विष्णू भास्कर लेले✅

7】गोपालकृष्ण गोखले यांचे गुरू कोण होते❓न्यामुर्ती रानडे✅

8】सुभाषचंद्र बोस यांचे गुरू कोण होते❓चित्तरंजन दास✅

9】डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू कोण होते❓महात्मा फुले,शाहू महाराज,संत कबीर✅

सजीव व गुणसूत्रांची संख्या

🦁 प्राणी -

❇️ मानव:- 46

❇️ डास:- 06

❇️ चिम्पाझी:- 48

❇️ सिंह:- 76

❇️ माशी:- 12

❇️ माकड:- 42

❇️ घोडा:- 64

❇️ कुत्रा:- 78

❇️ मेंढी :- 54

❇️ शेळी :- 60

❇️ उंदीर :- 42

❇️ कोंबडी :- 78

❇️ उंट :- 64

❇️ हत्ती :- 58

❇️ डुक्कर :- 38

❇️ ससा :- 44

❇️ हरीण :- 68

❇️ कबुतर :- 80

🌳 वनस्पती -

✳️ तांदूळ - 24

✳️ गहू - 42

✳️ मका - 20

✳️ बटाटा - 48

✳️ सोयाबीन - 40

✳️ टोमॅटो - 24

✳️ कलिंगड - 22

✳️ ऊस - 80

✳️ कापूस - 56

✳️ कांदा - 32

✳️ कोबी -18

━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...