०९ डिसेंबर २०२१

भूगोल प्रश्नसंच

1) सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्यास खालीलपैकी कशाचा अवलंब करावा ?
   1) जमीन एका हंगामात पडीक ठेवावी.    2) ठिबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.
   3) एका आड एक सरी भिजवावी.      4) वरीलपैकी एकही नाही.
उत्तर :- 2

2) भारत सरकारने पाणी वापराबाबत काही निर्देश ठरवून दिले आहेत ? महाराष्ट्रासाठी कोणती जोडी चुकीची आहे ?
   1) महापालिका क्षेत्र – 135 लिटर दर डोई दर दिवशी
   2) ‘अ’ गटातील नगरपालिका – 170 लिटर दर डोई दर दिवशी
   3) ‘ब’ गटातील नगरपालिका – 100 लिटर दर डोई दर दिवशी
   4) ग्रामीण विभाग – 40 लिटर दर डोई दर दिवशी
उत्तर :- 2

3) पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिध्दांत वापरून काढतात ?
   1) डारसीज् सिध्दांत    2) हेनरीज् सिध्दांत
   3) ॲव्होगाड्रोज सिध्दांत     4) वरीलपैकी नाही
उत्तर :- 2

4) पिकांना ओलाव्याचा ताण पडलेल्या कालावधी संरक्षक पाणी देण्यासाठी जनसंचयनाची (वॉटर हार्वेस्टिंग) प्रामुख्याने जी आणखी
     केली जाते त्यास ...................... म्हणतात. 
   1) पावसावरची शेती    2) अपधाव शेती
   3) कोरडवाहू शेती    4) वरील सर्व
उत्तर :- 2

5) अ) समतल बांध पध्दत मुख्यत्वे कमी पावसाच्या प्रदेशात जल संधारणासाठी वापरली जाते.
    ब) ढाळीचे बांध पध्दत जास्त पावसाच्या प्रदेशात जास्त झालेले पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी वापरली जाते.
         वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे  ?
   1) अ बरोबर आणि ब चूक आहे.      2) दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत.
   3) अ चूक आणि ब बरोबर आहे.      4) दोन्ही अ आणि ब चूक आहे.
उत्तर :- 2

1) योग्य जोडया लावा :
  वायू      वातावरणातील शुष्क प्रमाण भाग प्रती दशलक्ष
         अ) नायट्रोजन (N2)    i) 0.007ppm
         ब) हेलियम (He)    ii)0.5ppm
        क) ओझोन (O3)    iii) 780,840.0ppm
         ड) हायड्रोजन (H2)    iv) 5.2ppm
    अ  ब  क  ड
           1)  ii  i  iii  iv
           2)  iv  iii  ii  i
           3)  i  ii  iv  iii
           4)  iii  iv  i  ii
उत्तर :- 4

2) खालील विधानांचा विचार करा.
   अ) एल. निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठाभागावरील तापमानात वाढ होते.
   ब) वर्ष 2013-14 मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळी एल निनो प्रवाह प्रबळ होता.
         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?
   1) फक्त अ    2) फक्त ब    3) अ आणि ब दोन्हीही    4) अ आणि ब दोन्हीही नाहीत
उत्तर :- 3

3) स्क्वेल / चंडवात (पाऊस व हिम वर्षाबरोबर येणारी वावटळ) ही महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ आहे, परंतु कधी – कधी ...............
     प्रसंगी येते.
   1) किनारपट्टीवर मान्सून पूर्व काळात आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.
   2) मान्सून काळात किनारपट्टीवर आणि मान्सून पूर्व काळात अंतर्गत प्रदेशात.
   3) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.
   4) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि अंतर्गत प्रदेशात.
उत्तर :- 2

4) नॅशनल सेंटर फॉर मोडियम रेंज वेदर फोरकास्टींग (NCMRWF) याची स्थापना .................. साली नवी दिल्लीत झाली.
   1) 1985    2) 1988      3) 1992      4) 1994 
उत्तर :- 2

5) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन व पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?
   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान
   2) जमीन आणि माती संवर्धन
   3) पिकांचे नियोजन
   4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे
उत्तर :- 1 

1) खालील वातावरणाच्या स्तरांची उंचीनुसार मांडणी करा :
   अ) तपांबर    ब) आयनांबर    क) स्थितांबर    ड) बाह्यांबर
   1) ड, क, ब, अ    2) अ, क, ब, ड    3) अ, ब, क, ड    4) क, ब, अ, ड
उत्तर :- 2

2) सर्वसाधरणपणे उत्सर्जीत सूर्यकिरणांपैकी ................. टक्के सूर्यकिरण पिकाच्या पृष्ठभागावरती शोषले जातात.
   1) 75      2) 79      3) 85      4) 73
उत्तर :- 1

3) जर्मन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसाहाय्याने ग्रामीण पाणी पुरवठा ‘आपलं पाणी’ प्रकल्प पुढील कोणत्या जिल्ह्यात राबविला
      जात आहे ?
   1) नागपूर-अमरावती-अकोला    2) धुळे-जळगाव-नंदूरबार
   3) सांगली-सातारा-कोल्हापूर    4) पुणे-अहमदनगर-औरंगाबाद
उत्तर :- 4

4) पावसाच्या थेंबामुळे जमिनीचे धुपीवर कोणता मुख्य परिणाम होतो ?
   1) जमिनीच्या कणांची अलिप्तता होऊन त्यामुळे जमिनीची घडण बिघडणे.
   2) पाणी साठयास सुरुवात होणे.
   3) जमिनीतील ओलावा कमी करणे.
   4) जोरात वाहणा-या पाण्यामुळे जमिनीच्या कणांची वाहतुक होते.
उत्तर :- 1

5) पाण्याची वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल, विलासराव साळुंखेच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू
     करण्यात आले ?
   1) बारामती    2) खेड      3) पुरंदर      4) मावळ
उत्तर :- 3



महाराष्ट्रात असलेले अभयारण्य

अंधारी-----------------------चंद्रपुर

बोर---------------------------वर्धा

टिपेश्वर---------------------यवतमाळ

नागझिरा----------------------भंडारा

भामरागड--------------------गडचिरोली

चपराळ-----------------------गडचिरोली

मेळघाट-----------------------अमरावती

नर्नाळा--------------------------अकोला

वान---------------------------अमरावती

अंबाबरवा----------------------बुलढाणा

नांदूर मध्यमेश्वर---------------नाशिक

यावल----------------------------जळगाव

कळशुबाई हरिश्चंद्र गड--------अहमदनगर

गौताळा औटरमघाट------------औरंगाबाद, जळगाव

जायकवादी पक्षी अभयारण्य---------------औरंगाबाद, अहमदनगर

नायगव मयूर अभयारण्य------------------बीड

येडसी  रामलिंगघाट----------------उस्मानाबाद

अनेर डॅम------------------------------धुळे

काटेपूर्णा---------------------अकोला, वाशिम

पैनगंगा-------------------------यवतमाळ

ज्ञानगंगा-------------------------बुलढाणा

कारंजा-सोहळ------------------अकोला

लोणार अभयारण्य--------------------बुलढाणा

कर्नाळा पक्षी अभयारण्य---------------------ठाणे

तानसा------------------------------ठाणे

फनसाड-------------------------रायगड

भीमाशंकर--------------------------पुणे

माळढोक अभयारण्य----------------पुणे, सोलापूर, अहमदनगर

रेहकुरी अभयारण्य-----------------अहमदनगर

मयूरेश्वर-सुपे--------------------------पुणे

राधानगरी अभयारण्य---------------------कोल्हापूर

सागरेश्वर अभयारण्य----------------------सांगली

कोयना अभयारण्य-----------------------सातारा

चांदोली अभयारण्य------------------सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी

मालवण सागरी अभयारण्य-------------------सिंधुदुर्ग

तुंगरेश्वर अभयारण्य----------------------ठाणे

भारतीय नियोजन आयोगाची कार्य


१)भारतीय नियोजन आयोगदेशाच्या स्रोतांचे मूल्यांकन करणे .

२)या स्रोतांच्या प्रभावी वापरासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे.

३) प्राधान्यक्रम ठरविणे आणि योजनांना संसाधनांचे वाटप करणे.

४)योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक यंत्रणा निश्चित करणे.

५)वेळोवेळी योजनांच्या प्रगतीचे मूल्यांकन करणे.

६) देशातील संसाधने सर्वात प्रभावी आणि संतुलित पद्धतीने वापरण्याची योजना आखणे.

७) आर्थिक वाढ रोखणारे घटक ओळखणे.

८) योजनेच्या प्रत्येक टप्प्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक यंत्रणा निश्चित करणे.

🌺2014 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते विघटन करण्याची घोषणा केली आणि जानेवारी  2015 मध्ये त्याच्या जागी एनआयटीआय आयोग स्थापन झाला .

शाश्वत विकासाची संकल्पना

आपल्या बुद्धीच्या जोरावर नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करताना माणूस हा निसर्गचक्राचा एक घटक आहे याची जाणीव शाश्वत विकास या संकल्पनेत आहे. पृथ्वीवरील इतर कोणताही सजीव आपल्या गरजेपेक्षा जास्त संसाधनांचा वापर करत नाही. जीवो जीवस्य जीवनम हे निसर्गचक्र आहे. माणसाच्या सतत अधिक काही मिळवण्याच्या इच्छेमुळे तो सतत अधिकाधिक संसाधनांचा वापर करत असतो

🔳 शाश्वत विकास १७ ध्येये 🔳

१. सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे.

 २. भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे.

३. आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे.

४. सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे.

५. लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे.

६. पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे.

७. सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे.

८. शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे.

९.पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे.

१०. विविध देशांमधील असमानता दूर करणे.

११. शहरे आणि मानवी वस्त्या, अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे.

१२. उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे.

१३. हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे.

१४. महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे.

१५.परिस्थितिकीय व्यवस्थांचा (Ecosystem) शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे.

१६. शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे.

१७. चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे.

नाबार्डची भूमिका

१)ग्रामीण भागातील कर्ज देणार्‍या संस्थांना पुनर्वित्त प्रदान करणे

२)संस्थात्मक विकास किंवा पदोन्नतीग्राहकांच्या बँकांचे मूल्यांकन करणे.
 
३)ग्रामीण भागातील विकासात्मक कामांना चालना देण्यासाठी गुंतवणूक आणि उत्पादन पत पुरवणा provide्या विविध संस्थांना वित्तपुरवठा करण्यासाठी ही एक सर्वोच्च संस्था म्हणून काम करते.
      
  ४)पत वितरण प्रणालीच्या शोषण क्षमतेसाठी संस्था तयार करण्याच्या दृष्टीकोनातून देखरेख, पुनर्वसन योजनांची अंमलबजावणी, पत संस्थांची पुनर्रचना, कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणात सुधारणा   

५)सर्व संस्था ज्या प्रामुख्याने तळागाळातील विकासाच्या कामात गुंतलेल्या आहेत, त्यांच्या ग्रामीण वित्तपुरवठा कार्यात समन्वय ठेवतात आणि भारत सरकार, राज्य सरकारे, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि इतर धोरण संबंधित बाबी. राष्ट्रीय स्तरावरील संस्थांशी समन्वय राखतो.
 
६)हे त्याच्या पुनर्वित्त प्रकल्पांचे परीक्षण आणि मूल्यांकन करते.

राज्य आणि त्यांनी सुरु केलेल्या योजना

👉"अमा घरे LED योजना" ➖उड़ीसा

👉"उज्जवल सेनीटरी नैपकिन" ➖उड़ीसा

👉"बीज़ू स्वास्थ्य योजना" ➖उड़ीसा

👉"युवा स्वाभिमान योजना" ➖मध्य प्रदेश

👉"जय किसान ऋण मुक्ती योजना" ➖मध्य प्रदेश

👉"अटल सोलर कृषि पंज योजना" ➖महाराष्ट्र

👉"महिला पुलिस स्वयंसेवक योजना" ➖हरियाणा

👉"गौ कल्याण सेस"➖उत्तर प्रदेश

👉"एक परिवार, एक नोकरी" ➖सिक्किम

👉"प्रवासी लाभांश पेंशन योजना" ➖ केरल

👉"रक्षक प्लस योजना" ➖ भारतीय सेना द्वारा, पीएनबी बैंक के साथ

👉"जीवन संपर्क परियोजना"➖उड़ीसा

👉"महाग्रिटेक परियोजना"➖ महाराष्ट्र

अर्थसंकल्प जाहीर होण्याची वेळ.

🅾सन 1999 पर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कार्यकारी दिवशी संध्याकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आला. ही प्रथा वसाहतीच्या काळातली होती.

🅾 दुसरे कारण म्हणजे  1990  च्या दशकात, सर्व बजेट कर वाढविणे म्हणजे संध्याकाळी सादर केलेल्या सादरीकरणामुळे उत्पादकांना आणि कर वसूल करणार्‍या एजन्सीनांना रात्रीच्या किंमतीतील बदल लक्षात घेण्याची संधी मिळाली. 

🅾अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारमध्ये ( भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात ) तत्कालीन अर्थमंत्री श्री. यशवंत सिन्हा हे होते.

🅾 त्यांनी सकाळी ११ वाजता 1999 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा करून विधी बदलला. ही परंपरा 2001 पासून सुरू झाली.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

चला पटापट गणित सोडवा

1) मुलांचे वय वडिलांच्या 1/4 पट असुन काकांच्या 1/3 पट आहे जर वडील व काका याच्या वयात 12 वर्षांचे फरक असेल तर मुलांचे 12 वर्षानंतर वय किती  ?

स्पष्टीकरण👇
मुलाचे वय = x  वर्षे

वडील = 4x वर्षे

काका = 3x = वर्षे

4x - 3x = 12

        = 12 

मुलाचे  वय =x =12 वर्षे

मुलाचे 12 वर्षानंतर वय 24 वर्ष✅

1) बहिणीचे वय आईच्या 1/3 असुन भावाचे वय 1/4 आहे जर त्यांच्या वयांची बेरीज 57 वर्षे असेल आईचे वय किती ?

स्पष्टीकरण👇
आई वय = X वर्षे

बहिणीचे वय = 1/8 × X/8

भावाचे वय = 1/4 × X = X/4  वर्षे

X + X/3 + X/4 = 57

12X + 4X + 3X = 57 ×12

19X = 57 × 12

X = 57 × 12/19

        &
X = 36 वर्षे

आईचे वय = X = 36 वर्ष✅

1) दोन भांवाच्या वयाची बेरीज 30 वर्षे असुन आणखी 7 वर्षे नंतर मोठया भावाचे वय 24 वर्षे होईल तर 5 वर्षापुर्वी लहान भावाचे वय किती  ?

स्पष्टीकरण👇
7 वर्षानंतर

मोठ्या भाऊ = 24 वर्षे

आज

मोठ्या भाऊ = 17 वर्षे

लहान भाऊ + मो.भाऊ = 30

लहान भाऊ + 17 = 30

लहान भाऊ = 13 वर्षे

5 वर्षा पुर्वी लहान भाऊ = 8 वर्षे✅

1) 5 वर्षापुर्वी आई वडील व मुलगा यांच्या वयांची बेरीज 65 वर्षे होती तर आणखी 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज ?

स्पष्टीकरण👇
5 पुर्वी

65

आजचे = 65 + 5 + 5 + 5 = 80

4 वर्षानंतर = 80 + 4 + 4 + 4 = 92 वर्षे✅

2 वर्षापुर्वी शाम व राम यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 4 होते आणखी 6 वर्षानंतर त्यांचेगुणोत्तर 1 : 2 होईल तर राम चे आजचे वय शोधा ?

स्पष्टीकरण👇
2 वर्षापुर्वी

राम : शाम = 1 : 4

राम = 1x = 4 वर्षे

शाम = 4x

6 वर्षानंतर

राम = ( x + 8 )

शाम = ( 4x + 8)

( x + 8)/(4x + 8) = 1/2

2x + 16 = 4x + 8

16 : 8 4x - 2x

8 = 2x

8/2 = 4

x = 4

2 वर्षा पुर्वी राम = 4 वर्षे आज राम चे वय 6 वर्षे✅

1) आजोबाचे वय नातवाच्या 9 पट असुन वडीलांच्या वयाच्या 2 पट आहे वडीलाचे 6 वर्षापुर्वी वय 30 वर्षे असेल तर नातवाचे आजचे वय किती  ?

स्पष्टीकरण👇
वडील 6 वर्ष पुर्वी = 30 वर्षे

आज वडीलांचे वय = 36 वर्षे

आजोबा = 2×36 = 72

नातवाचे वय = 1/9 × 72

         = 8 वर्षे✅

1) कृष्णाचे वय त्यांच्या वडीलांच्या वयाच्या 1/5 असुन त्यांच्या आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षानी कमी आहे जर 10 वर्षानंतर आईचे वय 40 वर्षे असेल तर कृष्णाचे आजचे वय किती ?

स्पष्टीकरण👇

10 वर्षानंतर आई = 40 वर्षे

आज आईचे = 30 वर्षे

वडीलांचे वय = 35

कृष्णाचे वय = 1/7×35

       7 वर्षे✅

1) एका मत्स्यटाकी काठोकाठ भरल्यावर तिच्या 45 लिटर पाणी मावते जर तिच्यातुन 2/5 इतके पाणी काढून टाकले तर ती 4/9 भरते ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल ?

स्पष्टीकरण👇
45×4/9 = 20 लिटर

   20×2/5 = 8 लिटर
-------------------------
                    12 लिटर + 33 लिटर

     33 लिटर✅

1) A एक कामं 16 दिवसांत पुर्ण करतो तेच कामं B हा 24 दिवसांत पुर्ण करतो A व B ने सुरुवातील 8 दिवस एकत्र कामं केले व A कामं सोडून निघून गेला तर कामं संपण्यासांठी सुरुवातीपासून किती दिवस लागले असतील ?
A -- 16 दिवस

B -- 24 दिवस

लसावि = 48

एकून कामं = 48 कामं

प्रति दिवस A चे कामं = 3

प्रति दिवस B चे कामं = 2
-------------------------
एकत्रित = 05 प्रति दिवस

8 दिवस एकत्रित = 5×8 = 40 कामं

राहिलेले कामं = 48 - 40 = 08 कामं

प्रति दिवस = 02 कामं

8 कामं संपवण्यासाठी = 4 दिवस

एकून दिवस = 8 दिवस + 4 दिवस = 12 दिवस✅

1) A हा एक कामं 12 दिवसांत पुर्ण करतो B हा एक (तेच) कामं 24 दिवसांत पुर्ण करतात दोघांनी मिळून कामं केले तर किती दिवसात पुर्ण होईल  ?

*स्पष्टीकरण*👇
A === 12 दिवसांत काम करतो

B === दिवसांत काम करतो

12 व 24 चा लसावि = 24

समजा ते कामं = 24

A -- प्रति दिन = 2 कामं

B -- प्रति दिन = 1 कामं कामं

प्रति  दिन = ( A + B ) = ( 2 + 1) = 3  कामं

1 दिवसा = 03 कामं

8 दिवसांत = 24 कामं

8 दिवसांत पुर्ण होईल✅

एकमान पद्धत विषयी संपूर्ण माहिती

(अ) एकमान पद्धत

नमूना पहिला –

उदा. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

252 रु.

336 रु.

168 रु.

420 रु.

उत्तर : 252 रु.  

स्पष्टीकरण :-दीड डझन = 18 पेन आणि 6 ची 3 पट = 18:: 84 ची 3 पट = 84×3 = 252

नमूना दूसरा –

उदा. प्रत्येक विधार्थ्याला 8 वह्या वाटल्या; तर दीड ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येतील?

16

24

27

36

उत्तर : 27

स्पष्टीकरण :-एक ग्रोस = 144 किंवा 12 डझन :: दीड ग्रोस = 18 डझन18×12/8 = 27 किंवा एक ग्रोस वह्या 144/8 = 18 मुलांना:: 1 ½ = 18 च्या दिडपट = 27 मुलांना

नमूना तिसरा –

उदा. एका संख्येचा 1/13 भाग = 13, तर ती संख्या कोणती?

26

121

84

169

उत्तर : 169

क्लृप्ती :-एक भाग ‘क्ष’ मानू.उदाहरणानुसार 1/13 क्ष = 13:: क्ष = 13×13 = 132 = 169 अपूर्णांक व्यस्त करुन गुणणे.

नमूना चौथा –

उदा. 60 चा 2/5 =?

12

24

18

30

उत्तर : 24

क्लृप्ती :-60 चा 2/5 = 60×2/5 = 12×2 = 24  किंवा1/5 = 2/10 आणि 2/5 = 4/10, 60 चा = 1/10 आणि 60 चा 4/10 = 6×4

नमूना पाचवा –

उदा. 80 चा 3/5 हा 60 च्या ¾ पेक्षा कितीने मोठा आहे?

5

3

2

8

उत्तर : 3

क्लृप्ती :-80 चा 3/5 = 80×3/5 = 48, 60 चा ¾ = 60×3/4 = 45,उदाहरणानुसार 48-45 = 3

नमूना सहावा-

उदा. 400 चा 3/8 हा कोणत्या संख्येचा 5/8 आहे?

200

180

210

240

उत्तर : 240

स्पष्टीकरण :-400 चा 3/8 = 400×3/8 = 50×3 = 150 आणि क्ष चा 5/8 = 150:: क्ष = 150×8/5 = 240 किंवा5 भाग = 400:: 3 भाग = 400 × 3/5 = 240 किंवा400×3/8×8/5 = 240

नमूना सातवा –

उदा. 350 लीटर पाणी मावणार्‍या टाकीचा 2/7 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल ?

3.15 ली.

200 ली.

250 ली.

245 ली.

उत्तर : 250 ली.

स्पष्टीकरण :-350 चा 2/7 = 50×2 = 100 उदाहरणानुसार 350-100 = 250 लीटर

नमूना आठवा –

उदा. रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, ¼ भागात भुईमुग लावला व उरलेल्या 25 एकारांत ज्वारी लावली, तर रामरावांचे एकूण किती एकर शेत आहे?

50

60

120

75

उत्तर : 60

स्पष्टीकरण :-1/3+1/4=4/12+3/12=7/12;1-7/12=12/12-7/12=5/12=25 एकर,:: एकूण शेत = 5/12  चा व्यस्त 12/5 ने 25 ला गुणणे,यानुसार 12/5×25=60

 (ब) एकमान पद्धत

नमूना पहिला –

उदा. 16 खुर्च्यांची किंमत 1680 रु. तर एका खुर्चीची किंमत किती?

15 रु.

150 रु.

105 रु.

140 रु.

उत्तर : 105 रु.

स्पष्टीकरण :-अनेकांवरून एकाची किंमत काढताना भागाकार करावा व एकावरून अनेकांची किंमत काढताना गुणाकार करावा.यानुसार 1680 ÷ 16 = 105

नमूना दूसरा –

उदा. 12 सेकंदांत 1 पोळी लाटून होते; तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?

250

150

125

180

उत्तर : 150

स्पष्टीकरण :-60 सेकंद = 1 मिनीट, 12 सेकंदांत 1 पोळी यानुसार60 सेकंद = 1 मिनीट = 5 पोळ्या:: 30 मिनिटात = 5×30 = 150अर्धातास = 30 मिनीटे:: 60/12 × 30 = 150

मराठी व्याकरण :- संधी

जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुस-या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी म्हणजे सांधणे, जोडणे होय.

🟤 संधीचे प्रकार 🟤

१. स्वरसंधी:–

एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना 'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात. स्वरसंधीचे स्वरूप स्वर  स्वर असे असते.

उदाहरणार्थ:-

कवि + ईश्वर = कवीश्वर (इ + ई = ई)

🟤 २. व्यंजनसंधी: –🟤

जवळजवळ येणा-या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला 'व्यंजनसंधी' म्हणतात.

 उदाहरणार्थ:- 

१. सत + जन = सज्जन

  (त + ज) (व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी)  

२. चित  + आनंद = चिदानंद

  (त + आ) (व्यंजन + स्वर = व्यंजन संधी)

🟤३. विसर्गसंधी: –🟤

एकत्र येणा-या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेंव्हा त्यास विसर्गसंधी असे म्हणतात. विसर्ग  व्यंजन किंवा विसर्ग  स्वर असे त्याचे स्वरूप असते.

उदाहरणार्थ : - 

१. तप: + धन = तपोधन (विसर्ग  +ध)   

२. दुः + आत्मा = दुरात्मा (विसर्ग + आ)

🟤सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी -🟤

दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो याला सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी असे म्हणतात.

सजातीय स्वरसंधीची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ +अ = आ    

१. सूर्य + अस्त = सूर्यास्त

२. कट + अक्ष = कटाक्ष

३. रूप + अंतर = रुपांतर

४. मिष्ट + अन्न = मिष्टान्न

५. स + अभिनय = साभिनय

६. प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय

७. सह + अध्यायी = सहाध्यायी

८. पुरुष + अर्थ = पुरुषार्थ

९. सह + अनुभूती = सहानुभूती

१०. मंद + अंध = मंदांध

११. स्वभाव + अनुसार = स्वभावानुसार

🟤 अ + आ = आ 🟤

१. देव + आलय = देवालय

२. हिम + आलय = हिमालय

३. फल + आहार = फलाहार

४. अनाथ + आश्रम = अनाथाश्रम

५. गोल + आकार = गोलाकार

६. मंत्र + आलय = मंत्रालय

७. शिशिर + आगमन = शिशिरागमन

८. प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय

९. धन + आदेश = धनादेश

१०. जन + आदेश = जनादेश

११. दुख: + आर्त = दुखार्त

१२. नील + आकाश = नीलाकाश

१३. कार्य + आरंभ = कार्यारंभ

🟤 आ +आ = आ 🟤

१. महिला + आश्रम = महिलाश्रम 

२. राजा + आश्रय = राजाश्रय

३. कला + आनंद = कलानंद

४. विद्या + आलय = विद्यालय

५. राजा + आज्ञा = राजाज्ञा

६. चिंता + आतुर = चिंतातुर

🟤 इ+ इ = ई 🟤

१. मुनी + इच्छा = मुनीच्छा

२. कवि + इच्छा = कवीच्छा

🟤 इ+ इ = ई 🟤

१. मुनी + इच्छा = मुनीच्छा

२. कवि + इच्छा = कवीच्छा

३. अभि + इष्ट = अभीष्ट

🟤 इ+ ई = ई 🟤

१. गिरि + ईश = गिरीश

२. कवि + ईश्वर = कवीश्वर

३. परि + ईक्षा = परीक्षा

🟤 ई+ इ = ई 🟤

१. गोमती + इच्छा = गोमतीच्छा

२. रवी + इंद्र = रवींद्र

३. मही+  इंद्र = महिंद्र

🟤 ई+ ई = ई 🟤

१. मही + ईश = महीश

२. पार्वती + ईश = पार्वती

🟤 उ +उ = ऊ 🟤

१. गुरु + उपदेश = गुरुपदेश

२. भानु + उदय = भानुदय

🟤 ऊ +उ = ऊ 🟤

१. भू + उद्धार = भूद्धार

२. वधू + उत्कर्ष = वधूत्कर्ष

३. लघू + उत्तरी = लघूत्तरी

ऋ+ ऋ = ऋ

१. मातृ + ऋण = मातृण

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘माझा भाऊ आनंदाने रसगुल्ले खातो’ या वाक्यातील उद्देश्यविस्तार ओळखा.

   1) रसगुल्ले    2) माझा      3) भाऊ      4) आनंदाने

उत्तर :- 2

2) ‘राणी प्रधानाला बोलावतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्तरी    2) कर्मणी    3) भावे      4) प्रधानकर्तृक

उत्तर :- 1

3) ज्या सामासिक शब्दात पहिले पद महत्त्वाचे असते, त्या समासास ............. म्हणतात.

   1) तत्पुरुष समास  2) अव्ययीभाव समास  3) बहुव्रीही समास    4) कर्मधारय समास

उत्तर :- 2

4) संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापराल ?

   1) स्वल्पविराम    2) अर्धविराम    3) संयोगचिन्ह    4) अपूर्णविराम

उत्तर :- 1

5) ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळीले सूर्याशी’ अलंकार ओळखा.

   1) अतिशयोक्ती    2) व्यतिरेक    3) श्लेष      4) अन्योक्ती

उत्तर :- 1

6) खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ?

   1) पद      2) नयन      3) वडवानल    4) डोळा

उत्तर :- 4

7) उष:काल होता होता, काळरात्र झाली ........... या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

   1) वाच्यार्थ    2) शब्दार्थ    3) व्यंगार्थ    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

8) ‘अवडंबर’ म्हणजे –

   1) अगडबंब    2) अवघड    3) स्तोम      4) यापैकी नाही

उत्तर :- 3

9) ‘चोर चोरी करून पळून जात असताना पोलिसांनी त्याला पाहिले’ या वाक्यातील चोर या शब्दाचा विरुध्दार्थी अर्थ असलेला
     शब्द निवडा.

   1) साधू    2) सन्याशी    3) प्रामाणिक    4) साव

उत्तर :- 4

10) जो वेळेला हजर असतो, त्याचा फायदा होतो – या अर्थाने कोणती म्हण वापरली जाते ?

   1) तळे राखील तो पाणी चाखीन      2) साखरेचे खाणार, त्याला दैव देणार
   3) पै दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा      4) हाजिर तो वजीर

उत्तर :- 4

०७ डिसेंबर २०२१

भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-


१) रामसर करार - 

वर्ष - १९७१


* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर

* अमलात येण्याचे वर्ष - १९७५

* भारताने मान्य केला - १९८२


२) CITES - 

वर्ष - १९७३


* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण

*अमलात येण्याचे वर्ष - १९७६

* भारताने मान्य केला - १९८०


३) बोन करार - 

वर्ष -१९७९


* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९८३

* भारताने मान्य केला -१९८३


४) व्हिएन्ना करार -

 वर्ष - १९८५


* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८

* भारताने मान्य केला - १९९१


५) बँसेल करार - 

वर्ष - १९८९


* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट

* अमलात येण्याचे वर्ष - १९९२

* भारताने मान्य केला - १९९


२६) UNFCCC - 

       वर्ष - १९९२


* हवामान बदल रोखणे

* अमलात येण्याचे वर्ष - १९९४

* भारताने मान्य केला - १९९३


७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७


* हरितवायू उत्सर्जनात घट

* अमलात येण्याचे वर्ष - २००५

* भारताने मान्य केला - २००२


८) CBD जैवविविधता करार - 

वर्ष -१९९२


* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९९३

* भारताने मान्य वर्ष - १९९४


९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -वर्ष - २०००


* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण

* अमलात येण्याचे वर्ष - २००३

* भारताने मान्य केला - २००३


१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -

वर्ष - १९९४


* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण

* अमलात येण्याचे वर्ष - १९९६

* भारताने मान्य केला - १९९६


११) रोटरडँम करार - 

वर्ष - १९९८


* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००५


१२) स्टॉकहोम करार -

 वर्ष - २००१


*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .


ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००६


दरवर्षी सप्टेंबरमध्ये पदभरतीचे मागणीपत्र सादर करणे आवश्यक ; राज्य शासनाच्या सर्व विभागांना सूचना.

🔰राज्य शासनाच्या सेवेतील सरळसेवेच्या कोटय़ातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्रे सादर करणे आवश्यक आहे, अशा सूचना सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत.


🔰महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कक्षेतील सरळसेवेची पदे भरण्यासाठीची कार्यपद्धती ठरविण्यात आली होती. ही पदे भरण्यासाठी लोकसेवा आयोगाला विहित कालावधीत मागणीपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु दर वर्षी मागणीपत्रे पाठविली जात नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. मागणीपत्रे पाठविली जात नसल्यामुळे पदे दीर्घकाळ रिक्त राहून, त्याचा प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होतो.


🔰तयामुळे या पुढे सरळसेवेच्या रिक्त पदांच्या भरतीची मागणीपत्रे प्रतिवर्षी सप्टेंबर महिन्यात म्हणजे पदोन्नत्तीच्या निवडसूचीच्या वर्षांच्या सुरुवातीस एमपीएससीला सादर करावीत, अशा सूचना राज्य शासनाने सर्व प्रशासकीय विभागांना दिल्या आहेत.


🔰राज्य शासनाच्या सेवेतील सरळसेवेची पदे भरण्यासंदर्भात लोकसेवा आयोगाला सादर करावयाच्या मागणीपत्रांबाबतची सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. सप्टेंबर ते ऑगस्ट या कालावधीत रिक्त पदांची गणना करणे, तसेच सरळसेवेच्या कोटय़ातील रिक्त पदांची संख्या निश्चित करून, त्यानुसार एमपीएससीला मागणीपत्रे सादर करायची आहेत. सेवानिवृत्ती आणि पदोन्नत्तीमुळे रिक्त होणारी पदेही विचारात घेणे आवश्यक आहे. सामाजिक व समांतर आरक्षण निश्चित करुन पदभरतीची मागणी पत्रे सादर करावयाची आहेत.

ओमायक्रॉनच्या संकटामुळे गुगलने घेतला मोठा निर्णय; वर्क फ्रॉम होमच्या निर्णयाबाबत दिली महत्त्वाची माहिती.

🔰जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या करोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे गुगलने १० जानेवारी २०२२ पासून ऑफिस-टू-ऑफिस योजना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.


🔰अल्फाबेट इंकची कंपनी गुगलने गुरुवारी सांगितले की, करोनाच्या ओमायक्रॉन प्रकारामुळे जागतिक स्तरावर धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत, कंपनी सक्तीच्या लसीकरणाच्या नियमांनुसार काही काळासाठी वर्क फ्रॉम होम मोडवर काम करेल.


🔰गगलने ऑगस्टमध्ये सांगितले होते की नवीन वर्षात १० जानेवारीपासून आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमधून काम करणार आहोत. त्यानंतर वर्क फ्रॉम होम पॉलिसी संपेल.


🔰गरुवारी गुगलच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता ऑफिस टू रिटर्न प्लॅन लागू केला जाणार नाही. पुढील परिस्थिती पाहूनच कार्यालयात परतण्याच्या योजनेबाबत निर्णय घेतला जाईल.

जागतिक मालिकेचा अंतिम टप्पा - सिंधूला उपविजेतेपद.

🔰भारताच्या दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडिमटन मालिकेच्या अंतिम टप्प्यात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिला कोरियाच्या आन सेयंगने सरळ गेममध्ये पराभूत केले.


🔰टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या सिंधूला मागील काही काळात जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत १९ वर्षीय सेयंगने तिचा २१-१६, २१-१२ असा पराभव केला. ४० मिनिटे चाललेल्या या लढतीत सिंधूला सेयंगचा बचाव भेदता आला नाही किंवा तिने केलेल्या वेगवान खेळाचे उत्तरही देता आले नाही. सिंधूची सरळ गेममध्ये पराभूत होण्याची ही सलग तिसरी वेळ ठरली.


🔰सिंधूने वर्षांअखेरीस होणाऱ्या या स्पर्धेचे २०१८ मध्ये जेतेपद पटकावले होते. यंदा अंतिम लढतीत तिला चांगला खेळ करता आला नाही. पहिल्या गेममध्ये सुरुवातीलाच ती ०-४ अशी मागे पडली. सेयंगने वेगवान पद्धतीने खेळ करत १६-८ अशी आघाडी घेतली. यानंतर सिंधूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण सेयंगला हा गेम २१-१६ असा जिंकण्यात यश आले.

रशियाचे अध्यक्ष पुतिन आज भारत दौऱ्यावर.

🔰पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे आज, सोमवारी नवी दिल्लीत आगमन होणार आहे. भारत रशियाकडून एस-४०० ही प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा ताब्यात घेणार असून, त्यानिमित्ताने पुतिन हे गेल्या सहा महिन्यांत प्रथमच एखाद्या देशाचा दौरा करत आहेत. ही खरेदी म्हणजे ५ अब्ज डॉलरच्या शस्त्र खरेदी व्यवहाराचा भाग आहे.


🔰एरवी अशा व्यवहारांसाठी अमेरिकेचे निर्बंध लागू होण्याचा धोका पत्करून भारत रशियाकडून अब्जावधी डॉलरची शस्त्रसामुग्री खरेदी करत आहे. मात्र चीनला आटोक्यात ठेवण्याच्या आपल्या प्रयत्नांत भारतालाही सामील करून घेण्यास इच्छुक असलेली अमेरिका याकडे डोळेझाक करू शकते.


🔰एस-४०० प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेची खरेदी हा ५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या शस्त्रखरेदी व्यवहाराचा भाग आहे.


🔰नाटोचा मित्रदेश असलेल्या तुर्कस्तानने अशाचप्रकारची खरेदी केल्यानंतर अमेरिकेने आपली आधुनिक एफ-३५ लढाऊ विमाने त्या देशाला विकण्यावर निर्बंध घातले होते.

देशात निम्म्याहून अधिक प्रौढांचे करोना लसीकरण.

🔰लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लसमात्रांची संख्या १२७.६१ कोटींहून अधिक झाली असल्याने, भारताच्या पात्र प्रौढ लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक जणांचे करोना प्रतिबंधक लसीकरण झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी सांगितले.


🔰भारतातील प्रौढ लोकसंख्येपैकी ८४.८ टक्क्यांहून अधिक लोकांना करोना प्रतिबंधक लशींची पहिली मात्रा देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


🔰‘भारताचे अभिनंदन. पात्र लोकसंख्येपैकी ५० टक्क्यांहून अधिक लोकांचे संपूर्ण लसीकरण होणे हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपण सारे मिळून करोनाविरुद्धची लढाई जिंकू’, असे ट्वीट मांडविया यांनी केले.


🔰२४ तासांच्या कालवधीत १,०४,१८,७०७ लसमात्रा देण्यात आल्यामुळे, देशभरात आतापर्यंत देण्यात आलेल्या लसमात्रांची संख्या १२७.६१ कोटींहून अधिक झाली असून; १,३२,४४,५१४ सत्रांद्वारे हे साध्य झाले असल्याचे सकाळी ७ वाजेपर्यंतच्या हंगामी अहवालात म्हटले आहे.

ड्रोननविरोधी देशी तंत्रज्ञान लवकरच.

🔰दशाच्या सीमेवर ड्रोनच्या माध्यमातून होणाऱ्या संशयित हालचाली हाणून पाडण्यासाठी भारत ड्रोनविरोधी देशी तंत्रज्ञान विकसित करीत आहे. हे तंत्रज्ञान लवकरच सुरक्षा दलांना पुरविले जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिली. 


🔰सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ५७ व्या स्थापना दिनानिमित्त राजस्थानातील जैसलमेर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहा यांनी उपस्थित अधिकारी-जवानांना सांगितले की, देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल.


🔰डरोनमुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेता ड्रोनविरोधी सुरक्षा यंत्रणा तयार करण्याचे काम सध्या बीएसएफ, एनएसजी आणि डीआरडीओ यांच्यातर्फे सुरू आहे. आमच्या शास्त्रज्ञांच्या क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. देशात विकसित केलेले ड्रोनविरोध तंत्रज्ञान लवकरच आम्हाला प्राप्त होईल.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...