२६ ऑक्टोबर २०२१

प्रश्न मंजुषा

१) महाराष्ट्रातील क्षेऋफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ?
१) पुणे
२)नागपूर
३)मुंबई
४)अहमदनगर ✅

२) २०११ च्या घनातेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा आहे ?

१)नाशिक
२)पुणे
३)मुंबई उपनगर ✅
४)मुंबई शहर

३) हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली आहे..?
१)ठाणे जिल्हा
२)पुणे जिल्हा
३) वाशिम जिल्हा
४)परभणी जिल्हा ✅

४) नांदेड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?
१)१६ ✅
२)०९
३)१३
४)१०

५) अमरावती जिल्हास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.?
१) आंध्र प्रदेश
२)तेलंगणा
३)मध्य प्रदेश ✅
४)कर्नाटक

६) अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे ?
१) पूर्व - पश्चिम
२) पश्चिम - उत्तर
३)उत्तर - पूर्व ✅
४) दक्षिण - पूर्व

७ ) बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय ?
१)भिलेवडा
२) भिल्लेश्र्वर
३) भिवटेकडी
४) भिलठाण ✅

८ ) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) अमरावती
२) लात्तुर
३) सोलापूर
४)बुलढाणा ✅

९)  सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) चंद्रपूर
२) नागपूर
३) भंडारा
४) यवतमाळ ✅

१० ) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) सांगली
२)सातारा ✅
३)धुळे
४) औरंगाबाद

११)  धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
१)४ ✅
२)१०
३)१४
४)१६

१२)  तोरणमाळ डोंगर  कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) जळगाव जिल्हा
२) बुलढाणा जिल्हा
३)नाशिक जिल्हा
४) नंदुरबार जिल्हा ✅

१३)  खान्देशी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रख्यात आहे ?
१) वाशिम जिल्हा
२) धुळे जिल्हा
३) जळगांव जिल्हा ✅
४)हिंगोली जिल्हा

१४)  गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) जालना जिल्हा
२)परभणी जिल्हा
३) सातारा जिल्हा
४) औरंगाबाद जिल्हा ✅

१४) भारतातील सर्वात पहिली सूतगिरणी कुठे सुरू झाली ?

👉 ११ jully १८५१ रोजी भारतातील पहिली सूतगिरणी मुंबईत सुरु झाली.येथून मुंबईमध्ये अनेक सूतगिरण्यासह औधोगिक वाढीस सुरुवात झाली.

१५) महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता जिल्हा कोणता व त्याचे प्रमाण किती टक्के आहे.?
Ans.मुबंई उपनगर जिल्हा त्याचे प्रमाण 89.9% इतके आहे.

राज्यसभा

राज्यसभा

राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते व्दितीय सभागृह आहे असे म्हटले जाते तर लोकसभा कनिष्ठ सभागृह असून प्रथम सभागृह मानले जाते.

■ सभासदांची संख्या :

घटनेच्या 80 व्या कलमामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्यसभेची सभासद संख्या 250 इतकी असेल त्यातील 238 निर्वाचित असतील तर 12 सदस्य भारताच्या राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेले असतील यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ असतील.
उदा. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक इ.

■ उमेदवारांची पात्रता :

घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे:
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

■ निवडणूक पद्धत :

राज्यसभेच्या सदस्यांची निवड भारतीय नागरिकांकडून न करता प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून केली जाते व ही निवडणूक पद्धत प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष आहे.

■ राज्यसभेचा कार्यकाल :

राज्यसभा हे स्थायी सभागृह असून दर दोन वर्षानी 1/3 सभासद निवृत्त होतात. तेवढेच त्याच्या जागी नव्याने निवडतात.

■ सभासदांचा कार्यकाल :

प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी तो आपला राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षाकडे देऊ शकतो.

■ पदमुक्तता :

कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)

■ बैठक किंवा आधिवेशन :

घटनेच्या 85/1 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची योग्य वाटेल त्यावेळी अधिवेशन बोलवितो परंतु या अधिवेशनामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे.

■ गणसंख्या :

कोणतेही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.

■ राज्यसभेचा सभापती :

घटनेच्या 89व्या कलमानुसार भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तो राज्यसभेचा सभासद नसल्यामुळे त्याला सभागृहात मतदान करण्याचा अधिकार नाही परंतु 100 व्या कलमानुसार समान मते पडल्यास तो आपले निर्णायक मत देऊ शकतो.

■ उपाध्यक्ष :

राज्यसभेतील निवडून आलेल्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते.
_______________________________

आचारसंहिता म्हणजे काय ?

महाराष्ट्रासह हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. शनिवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महासंग्रामाची घोषणा केली. २१ सप्टेंबरपासून महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. पण, आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहितामध्ये काय करू नये? असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील. या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला देणार आहोत.

निवडणुकीत भाग घेणारे राजकीय पक्ष व उमेदवार यासाठी निवडणूक आयोग एक आदर्श आचारसंहिता तयार करत असतो, तिचे पालन करणे प्रत्येक राजकीय पक्षासाठी व उमेदवारांसाठी बंधनकारक असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार, सर्व उमेदवार आणि पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आहे. आचारसंहितेचं मॅन्युएल निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या तत्त्वांना आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जाऊ लागलं आणि निवडणुकांच्या काळात त्यांचा वापर होऊ लागला.

🔷 कोणत्या गोष्टींचं पालन होणं आवश्यक आहे?

शेवटच्या ४८ तासांदरम्यान प्रचारावर प्रतिबंध- निवडणूक संपण्याची वेळ निश्चित झाल्यापासून त्याआधीच्या ४८ तासांच्या दरम्यान कोणत्याही मार्गाने व कोणत्याही प्रकारे निवडणुकीविषयी कार्यवाही करण्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१, कलम १२५ अंतर्गत प्रतिबंध करण्यात आला आहे.

मतदारांना आमिष देणं किंवा धमकावणं, हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं ठरू शकतं.

राजकीय धोरणावर टीका करण्याची मुभा असते. पण मतं मिळवण्यासाठी ते एकमेकांची जात किंवा धर्म काढू शकत नाहीत.

बैठका किंवा रॅली घेण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक असतं.

एखाद्या सभेत विरोधकांचा पुतळा जाळणं, हेही नियमात बसत नाही.

आचारसंहितेच्या काळात मंत्र्यांना किंवा सरकारला नव्या घोषणा करता येत नाहीत. त्यासाठी निधी जाहीर करता येत नाहीत.

मतदान केंद्रात कर्मचारी, अधिकारी आणि मतदारांव्यतिरिक्त कुणालाच जाण्याची परवानगी नसते.

मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरापर्यंत कार्यकर्ते आपल्या पक्षाचा प्रचार करू शकत नाहीत.

जर एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केला तर त्याची तक्रार निवडणूक आयोगाला नियुक्त केलेल्या निरीक्षकाकडे करता येते.

पक्षाच्या कामासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करणं म्हणजे आचारसंहितेचा भंग ठरतं. सरकारी माध्यमांचा वापर करून पक्षाची जाहिरात करता येत नाही.

प्रश्न मंजुषा


१. पचलेल्या अन्नाचे रक्तात अवशोषन होऊन त्याचा ऊपयोग उर्जा निर्मीतीसाठी केला जातो.
या क्रियेला काय म्हणतात?

1)पचन
2)अवशोषण  (absorption)
3)सात्मिकरन (Assimilation)✅
4)उत्सर्जन (Excretion)

👉5 steps of Digestion

Ingestion ➡️Digestion➡️Absorption➡️Assimilation➡️Egestion

२. आधुनिक आवर्तसारणीचे मांडणी कोणी केली?

1)डोबेरायनर
2)न्यूलँडस
3)मेंडेलिव
4)हेन्री मोस्ले✅

३. पुढीलपैकी कोणते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये नाही?

1)थायमिन
2)रायबोफ्लेविन
3)फॉलिक ऍसिड
4)एस्कॉर्बिक ऍसिड✅
5)वरीलपैकी सर्व येतात.

👉व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये खालील 8 जीवनसत्त्वे असतात.

व्हिटॅमिन बी 1 थायामिन
बी 2 रिबोफ्लेविन
बी 3 नियासिन
बी 5 पँटोथेनिक ऍसिड
बी 6 पायरिडॉक्साइन
बी 7 बायोटिन
बी 9 फॉलिक ऍसिड
बी 12 सायनोकोबालामिन

👉एस्कॉर्बिक ऍसिड =व्हिटामीन C

४. मुलद्रव्याच्या अणूमध्ये बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात तेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही?

1)12
2)6
3)7
4)8✅

५.खालील विधानांचा विचार करा.व योग्य विधाने निवडा

1)अणुमधील प्रोटोन्स व न्युट्रोन्स ची संख्या म्हणजे अणु अंक होय.
2)कोणत्याही मुलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म अणुअंकानुसार नियंत्रीत होतात.
3)अणुअन्काला मुलद्रव्याचे रासायनिक ओळख म्हणतात.

A)1 व 2
B)2 व 3✅
C) फक्त 1
D)1,2 व 3

👉अणुमधील प्रोटोन्स व न्युट्रोन्स ची संख्या म्हणजे अणु वस्तुमान अंक(Mass Number)होय.

अणुमधील प्रोटोन्स ची संख्या म्हणजे अणुअंक होय.

६. 1803 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने अणुसिध्दंत मांडला ?

1)चांडविक
2)रुदरफोर्ड
3)डाल्टन✅
4)थॉमसन

७. 1911 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने सोन्याच्या पत्र्याचा वापर केला आणी अणुमध्ये एक अतिशय लहान भरीव असे अणुकेंद्रक असते हे सिध्द केले?

1)चांडविक
2)रुदरफोर्ड✅
3)डाल्टन
4)थॉमसन

८. न्युट्रोन चा शोध कोणी लावला?

1)चांडविक✅
2)रुदरफोर्ड
3)कणाद
4)थॉमसन

👉इलेक्ट्रॉन=थॉमसन
प्रॉटोन=गोल्डस्टीन

९. खालील विधाने पाहा..

1)पाणी हे मिश्रण आहे.
2)हायड्रोजन व ओक्सिजन चे 1:2 प्रमाणात संयोग होऊन पाणी बनते

A)दोन्ही विधाने चूक✅
B)दोन्ही विधाने अचुक
C)फक्त विधान 1 चूक
D )फक्त विधान 2 चूक

👉पाणी हे संयुग आहे.
हायड्रोजन व ओक्सिजन चे 2:1 प्रमाणात संयोग होऊन पाणी बनते

१०.  खालीलपैकी संप्लवनशील पदार्थ कोणते?
1)नवसागर  व कापूर
2)कोळसा व शिसे
3)हिरा व चुना

A)1 व 2
B)2 व 3
C) फक्त 1✅
D)1,2 व 3

११.अर्सेनीक ,सिलिकॉन व सेलेनियम ही कोणती उदाहरणे आहेत?

1)धातू
2)अधातू
3)धातूसदृश्य ✅
4)वरीलपैकी सर्व

१२. पाणी किती फरनहेट( °f) ला गोठते?

1)31°f
2)0°f
3)32°f✅
4]37°f

१३. खालीलपैकी सत्य विधान ओळखा.

1)इलेक्ट्रॉन धन प्रभारित असतात.
2)न्युट्रोन ऋन प्रभारित असतात.
3)प्रोटोन्स प्रभार रहित असतात.

A)1 व 2
B)1,2 व 3
C) फक्त 1
D)यापैकी एकही नाही✅

👉1)इलेक्ट्रॉन ~धन~ ऋण प्रभारित असतात.
2)न्युट्रोन ~ऋन~ प्रभार रहित असतात.
3)प्रोटोन्स ~प्रभार रहित~ धन प्रभारित असतात.

१४. पित्त शरीरातील कोणत्या अवयवाद्वारे स्त्रवले जाते?

पित्त हे यकृत (Liver) या अवयवाद्वारे स्त्रवले जाते
यकृत पित्त गॉल ब्लँडर मध्ये स्त्रवतो.
यकृत = वजन 1500 ग्राम

१५. डिग्री सेल्सियस तापमानाचे डिग्री फैरनहेट( °f) मध्ये रुपांतरण कसे करतात?

(X °C × 9/5) + 32 = °F

मूलद्रव्ये व संज्ञा

          अॅल्युमिनियम - Al

            बेरीअम - Ba

            कोबाल्ट - Co

            आयोडीन - I

           मॅग्नेशिअम - Mg

            मॅग्नीज - Mn

            निकेल - Ni

            फॉस्फरस - P

             रेडीअम - Ra

              सल्फर - S

              युरेनिअम - U

             झिंक - Zn

             चांदी - Ag

             सोने - Au

             तांबे - Cu

            लोखंड - Fe

             पारा - Hg

             शिसे - Pb

             कथिल - Sn

              टंगस्टन - W

तरंगण्याचा नियम :

· पाण्याहून कमी घनता असलेला पदार्थ पाण्यावर तरंगतो.

· लाकडाचा ठोकळा पाण्यावर तरंगतो. पाण्यात जातांना तो पाणी बाजूला सारतो. सारलेल्या पाण्याचे वजन ठोकळ्याच्या वजनाएवढे होते.

या वेळी ठोकळ्याचे वजन आणि ठोकळ्यावर कार्य करणारे प्लावी बल समान असते.

· एक लोखंडी जाड पत्रा पाण्यात पडला की तो बुडतो. तथापि तोच पत्रा ठोकून घमेले केले तर ते पाण्यात तरंगते.

· अॅल्युमिनियमची फॉईल पाण्यावर तरंगते पण त्याचीच चुरगळून बनविलेली गोळी मात्र पाण्यात बुडते आणि पार्यांवर तरंगते. यांचे कारण घनतेतील बदल होय.

· पदार्थाची घनता म्हणजे त्याचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर होय. त्याचे SI पद्धतीतील एकक किलोग्रॅम/मीटर3 असे आहे.

· जर वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा अधिक असेल तर ती पाण्यात बुडते. मात्र जर वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा कमी असेल तर ती पाण्यावर तरंगते.

· पदार्थाची सापेक्षा घनता म्हणजे त्याच्या घनतेचे पाण्याच्या घनतेशी असणारे गुणोत्तर होय.

· सापेक्ष घनता = पदार्थाची घनता / पाण्याची घनता

· यालाच पदार्थाचे 'विशिष्ट गुरुत्व' म्हणतात.

अणूंची संरचना

🔰      इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अणूतील मूलकण आहेत. 

🔰    अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.

🔰      प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.

·🔰     अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.

🔰      अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.

🔰     मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.

🔰   मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला 'संयुजा' म्हणतात.

〰〰〰〰〰〰〰

कर्करोगा बद्दल माहिती

- ल्युकेमिया: रक्ताचा कर्करोग
- अॅडिनोमाझ: ग्रंथींचा कर्करोग
- सारकोमा: संयोजी ऊतीचा कर्करोग
- लिम्फोमा: लसिकापेशीचा कर्करोग
- कार्सीनोमा: अभिस्तर ऊतीचा कर्करोग

- कर्करोगाच्या अभ्यासाला ओन्कोलाॅजी म्हणतात.
- ज्या घटकामुळे कर्करोग होतो, त्या घटकाला carcinogen म्हणतात
- ज्या विषांणूनमुळे कर्करोग होतो, त्या विषाणूंना oncogen म्हणतात

पोलीस भरती प्रश्नसंच

प्र.१) महाराष्ट्र राज्यातील येलदरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

अ) पुणे
ब) परभणी ✅
क) औरंगाबाद
ड) सोलापूर

स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात येलदरी हे धरण आहे.

प्र.२) भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य कोणते ?
अ) राजस्थान
ब) मध्ये प्रदेश
क) राजस्थान ✅
ड) कर्नाटक


स्पष्टीकरण : भारतातील आकारमानाने राजस्थान राज्य सर्वात मोठे आहे.

जयपूर ही या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राजस्थानचे क्षेत्रफळ ३,४२,२३९ चौ.किमी एवढे आहे.

क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो.

येथील लोकसंख्या ६,८६,२१,०१२ एवढी आहे

प्र.3) जोड्या लावा.

   जिल्हा         साखर कारखाना
अ) बीड - I) तुळशीदास नगर
ब) अहमदनगर - II) व्रध्देश्वर
क) सोलापूर   - III) कडा
ड) कोल्हापूर   - IV) हलकर्णी

अ) (IV) (III) (II) (I)
ब) (II) (I) (III) (IV)
क) (III) (II) (I) (IV) ✅
ड) (III) (IV) (II) (I)


स्पष्टीकरण : अ) बीड - III) कडा
ब) अहमदनगर - II) व्रध्देश्वर
क) सोलापूर   - III) तुळशीदास नगर
ड) कोल्हापूर   - IV) हलकर्णी

प्र.४) - - - - - - - - - - - वर्षी लातूर येथे तर - - - - - - - - वर्षी कोयना येथे भूकंप झाले.

अ) १९९३, १९६७ ✅
ब) १९८३, २००१
क) २००१, २००९
ड) १९९९, १९६६

स्पष्टीकरण : १९९३ वर्षी लातूर येथे तर वर्षी १९६७ कोयना येथे भूकंप झाले.

प्र.५) महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा.

    तालुके               जिल्हे
अ) खेड      I) रायगड, अहमदनगर
ब) कर्जत     II) रत्नागिरी, पुणे
क) कळंब    III) नाशिक, अमरावती
ड) नंदगाव   IV) उस्मानाबाद, यवतमाळ

अ) (II) (IV) (I) (III)
ब) I) (II) (IV) (III)
क) (II) (I) (IV) (III) ✅
ड) (IV) (III) (II) (I)

स्पष्टीकरण : अ) खेड - II) रत्नागिरी, पुणे
ब) कर्जत - I) रायगड, अहमदनगर
क) कळंब - IV) उस्मानाबाद, यवतमाळ
ड) नंदगाव - III) नाशिक, अमरावती

प्र.६) भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग - - - - - - - शहरात बांधण्यात आला.

अ) मुंबई
ब) दिल्ली
क) चेन्नई
ड) कोलकाता ✅

स्पष्टीकरण : भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग कोलकाता शहरात बांधण्यात आला.

प्र.७) गोदावरी नदी महाराष्ट्रातील - - - - - - - - - येथून उगम पावते.

अ) भीमाशंकर
ब) मुलताई
क) त्र्यंबकेश्वर ✅
ड) महाबळेश्वर

स्पष्टीकरण : गोदावरी नदी महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यातील एक देवस्थान आहे.

प्र.८) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती सिंचन पध्दत फार मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

अ) ठिबक सिंचन पध्दती
ब) मोकाट सिंचन पध्दती ✅
क) उपसा सिंचन पध्दती
ड) तलाव सिंचन पध्दती

स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील मोकाट सिंचन पध्दती सिंचन पध्दत फार मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

प्र.९) अ) ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर  जिल्ह्याचा सर्वप्रथम क्रमांक लागतो.
ब) बागायती क्षेत्रात वाढ झाल्यामुळे पुर्वी ज्वारी घेत असलेल्या क्षेत्रांमध्ये आता व्यावसायिक पिके घेण्यावर जास्त भर दिला जातो.

वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने बरोबर आहेत ?

अ) फक्त अ
ब) फक्त ब
क) अ आणि ब बरोबर ✅
ड) वरीलपैकी एकही नाही.

स्पष्टीकरण : अ) ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचा सर्वप्रथम क्रमांक लागतो.
ब) बागायती क्षेत्रात वाढ झाल्यामुळे पुर्वी ज्वारी घेत असलेल्या क्षेत्रांमध्ये आता व्यावसायिक पिके घेण्यावर जास्त भर दिला जातो.

वरीलपैकी दोन्ही विधान बरोबर आहेत.

प्र.१०) आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीजग्रह कोठे आहे ?

अ) जायकवाडी प्रकल्प
ब) तारापूर प्रकल्प
क) कोयना प्रकल्प ✅
ड) पूर्णा प्रकल्प

स्पष्टीकरण : आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीजग्रह कोयना प्रकल्प आहे, हा प्रकल्प कोयना धरणावर बांधला गेला आहे, कोयना जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळुन या टप्प्यातून १९२० MW वीज निर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म.रा.वि.मं./MSEB) या कंपनीच्या विद्यमाने चालविला.

मराठी - वाक्यप्रचार व अर्थ

1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे

10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे

11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे

12)रामराम ठोकणे - निरोप घेणे

13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे

14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे

15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे

16) वर्ज्य करणे - टाकणे

17) काडीमोड करणे - संबंध तोडणे

18) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे

19) अगतिक होणे - उपाय न चालणे

20) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे

21) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे

22) इडापिडा टळणे - संकट जाणे

23) उतराई होणे - उपकार फेडणे

24) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे

25) लकडा लावणे - सारखी घाई करणे

26) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे

27) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे

28)कागाळी करणे - तक्रार करणे

29) खांदा देणे - मदत करणे

30) खोबरे करणे - नाश करणे

31) गय करणे - क्षमा करणे

32) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे

33) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे

34) जीव ओतणे - मन लावून काम करणे

35) सुपारी देणे - आमंत्रण देणे

36) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे

37) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे

38) नामोहरम होणे - पराभूत होणे

39) पदर पसरणे - याचना करणे

40) पाणउतारा करणे - अपमान करणे

41) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे

42) हात तोकडे पडणे - मदत करण्यास  क्षमता कमी पडणे

43) हिरमुसले होणे - नाराज होणे

44) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे

45) विटून जाणे - त्रासणे

46) डोके सुन्न होणे - काही न सुचणे

47) फडशा पाडणे - संपवणे

48) गोरेमोरे होणे - लाज वाटणे

49)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे

50)धिंडवडे निघणे - फजिती होणे

61) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे

62)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे

63) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे

64)हातपाय गाळणे - धीर सोडणे

65) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील

काम न करता कागदी पराक्रम गाजविणे

66) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे

67)झाकड पडणे - अंधार पडणे

68)पोटात आग पडणे - खूप भूक लागणे

69)टोपी उडवणे - टवाळी करणे

70)पाणी पाजणे - पराभव करणे

71)वहिवाट असणे - रीत असणे

72)छी थू होणे - नाचक्की होणे

73)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे

74)दंडेली करणे - जबरदस्ती करणे

75)दिवा विझणे - मरण येणे

76)मूठमाती देणे - शेवट करणे

77) सुगावा लागणे - अंदाज लागणे

78)प्रतारणा करणे - फसवणूक करणे

79)डोक्यावर घेणे - कौतुक करणे

80)कानाशी लागणे - चहाडी करणे

81)किटाळ करणे - आरोप होणे

82)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे

83)हातावर तुरी देणे - फसविणे

84)बेगमी करणे - साठा करणे

85)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ध्वन्यर्थ म्हणजे –

   1) व्यंजना शब्दशक्तीमुळे सुचित होणारा अर्थ      2) भाषेतील मूलध्वनींचा अर्थ
   3) अभिधा शक्तीमुळे जाणवणारा अर्थ      4) लक्षणा शब्दशक्तीमुळे जाणवणारा अर्थ
उत्तर :- 1

2) खालील शब्दाला पर्याय सांगा. – ‘खग’

   1) आकाशात फिरणारे    2) पक्षी   
   3) जलचर      4) उडता न येणारे

उत्तर :- 2

3) ‘सुवाच्य’ याचा विरुध्दार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही ?

   1) गिचमिड    2) दुर्बोध   
   3) अवाचनीय    4) अर्वाच्य

उत्तर :- 4

4) ‘अल्पज्ञानाने ताठा मिरविणे’ म्हणतात ना ........................

   1) उथळ पाण्याला खळखळाट फार      2) नाचता येईना अंगण वाकडे
   3) उंटावरचा शहाणा        4) आढे वेढे घेणे

उत्तर :- 1

5) पुढील वाक्यप्रचाराशी योग्य अर्थ सांगणारा पर्याय शोधा : गाशा गुंडाळणे.

   1) माशा मारणे    2) निघून जाणे   
   3) वाट लावणे    4) चादर पांघरणे

उत्तर :- 2

6) खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

   अ) जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास विशेषण म्हणतात.
   ब) ज्या शब्दांपासून कालगत क्रियेचा बोध होतो त्या शब्दांस क्रियापदे असे म्हणतात.
   क) सर्वनाम ही नामप्रमाणे लिंग, वचन व विभक्ती विकार धारण करणारी शब्दजाती नाही तर ती स्वतंत्र आहे.

   1) अ व ब बरोबर    2) ब व क बरोबर   
   3) अ व क बरोबर    4) अ, ब व क बरोबर

उत्तर :- 1

7) खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.

   1) बलिष्ट    2) बलीष्ट     
   3) बलिष्ठ    4) भलिष्ट

उत्तर :- 3

8) पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा.

   1) प्    2) ख्   3) भ्   4) ध्

उत्तर :- 1

9) ‘नीरव’ या शब्दाचा संधी विच्छेद कसा होतो ?

   1) नि: + रव    2) नी + रव   
   3) नि + रव    4) नी: + रव

उत्तर :- 1

10) ‘धर्मीवाचक’ नामे कशास म्हणतात ?

   1) सामान्यनामे व विशेषनामे    2) सर्वनामे व विशेषणे
   3) सामान्यनामे व सर्वनामे      4) विशेषनामे व सर्वनामे

उत्तर :- 1

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...