११ ऑक्टोबर २०२१

नोबेल शांती पारितोषिक 2021



🔰मारिया रेसा (फिलिपिन्स) आणि दिमित्री मुराटोव्ह (रशिया) हे दोन पत्रकार '2021 नोबेल शांती पारितोषिक'चे विजेते ठरले आहेत.


🔴इतर क्षेत्रातील विजेते -


🔰साहित्यातील ‘2021 नोबेल पारितोषिक’ विजेता - अब्दुलरजाक गुरनाह (टांझानियाचे कादंबरीकार).

रसायनशास्त्रातील ‘2021 नोबेल पारितोषिक’ विजेता - जर्मनीचे बेंजामिन लिस्ट आणि ब्रिटनचे डेव्हिड मॅकमिलन.

भौतिकशास्त्रातील ‘2021 नोबेल पारितोषिक’चे विजेते - सौकुरो मानेबे (जपान), क्लाऊस हॅसलमन (जर्मनी) आणि जॉर्जियो पॅरीसी (इटली).

'वैद्यकशास्त्र किंवा शरीरशास्त्र’ क्षेत्रातील ‘2021 नोबेल पारितोषिक' विजेते - डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पॅतापौटियन (अमेरिका).


🔴नोबेल पारितोषिकाविषयी..


🔰नोबेल पारितोषिक हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवी प्रगतीला वरदान ठरलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान दिलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी स्वीडिश आणि नॉर्वेजियन संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये देण्यात येणारा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हा सन्मान स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेच्या सन्मानार्थ सन 1895 पासून दिला जात आहे. पारितोषिकाचे वितरण विविध संस्थांकडून केले जाते. याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:


🔰भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र: रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस.


🔰शरीरशास्त्र आणि वैद्यकशास्त्र: करोलीन्स्का इंस्टीट्यूट येथील नोबेल असेंब्ली.


🔰साहित्य: स्वीडिश अकादमी

शांती: हे पारितोषिक स्वीडिश संस्थेच्यावतीने नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दिले जाते.

"त्रिशूल" आणि “गरुड”: तीन मालवाहू रेलगाड्यांना जोडून तयार करण्यात आलेल्या रेलगाड्या.



🔰परथमच, भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे (SCR) विभागाने दोन लांब पल्ल्याच्या मालवाहू रेलगाड्या चालवल्या, ज्यांना प्रत्येकी तीन मालवाहू रेलगाड्यांना जोडून तयार करण्यात आले.


🔰या नवीन मालवाहू रेलगाड्यांना "त्रिशूल" आणि “गरुड” असे नाव देण्यात आले आहेत. या गाड्यांना 177 डब्बे जोडले गेले आहेत."त्रिशूल" गाडीने 7 ऑक्टोबर 2021 रोजी कोंडापल्ली स्थानकापासून ते पूर्व किनारी रेल्वेच्या खुर्दा विभागापर्यंत पहिला प्रवास केला.


🔰"गरुड" गाडीने 8 ऑक्टोबर 2021 रोजी गुंटकल विभागातील रायचूर ते सिकंदराबाद विभागातील मनुगुरु पर्यंत पहिला प्रवास केला.याप्रकारे मालाची वाहतूक विक्रमी पद्धतीने होणार असून त्यामागील खर्च देखील कमी येणार आहे. तसेच लागणारे मनुष्यबळ देखील कमी लागणार.

भारतीय रेल्वे विषयी


🔰भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारचे कें‍द्रीय रेल्वे विभाग भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो.


🔰भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ 1853 साली झाला. 1947 सालापर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. 1951 साली या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

ल.ज. नदीम अहमद अंजुम आभारतीय रिझर्व्ह बँकेचे पतधोरण – ऑक्टोबर 2021.



🔰भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या निर्णयांची घोषणा 08 ऑक्टोबर 2021 रोजी RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली.


🔴ठळक मुद्दे...


🔰भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग 8 व्या वेळेस मुख्य कर्ज दर म्हणजेच रेपो दर 4 टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवला आहे. तर रिव्हर्स रेपो दर देखील 3.35 टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवला.


🔰2021-22 या आर्थिक वर्षासाठी स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) याचा अंदाज 9.5 टक्के आहे.मार्जिनल स्टँडिंग सुविधा दर आणि बँक दर 4.25 टक्क्यांवर कायम आहेत.खर्च वाढल्याने येणारी महागाई सौम्य करणे हा रेपो दर कायम ठेवण्यामागचा उद्देश आहे.


🔰पहिल्या अग्रिम अंदाजानुसार, 2021-22 मध्ये खरिपाचे उत्पादन विक्रमी झाल्याने व कृषीक्षेत्रात लवचिक सुधारणा झाल्याने ग्रामीण भागात मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.आर्थिक सुधारणेच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेने खालील दिल्याप्रमाणे काही महत्वाचे उपाय योजले आहेत -


🔰ऑफलाइन पद्धतीने किरकोळ डिजिटल पेमेंट (भरणा) पद्धत लागू केली जाणार असून ऑगस्ट 2020 पासून घेतलेल्या प्रायोगिक चाचण्यांच्या यशस्वितेमुळे, ऑफलाइन डिजिटल पद्धतीने किरकोळ पेमेंट (भरणा) करण्याचा आराखडा देशभर लागू करण्यात येणार आहे. इंटरनेट सुविधा नसलेल्या दुर्गम भागातही याचा उपयोग होणार.


🔰IMPS म्हणजे तत्काळ भरणा सेवेसाठी व्यवहार-रकमेची मर्यादा 2 लाख रुपयांवरून वाढवून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. देशान्तर्गत निधी हस्तान्तरण ताबडतोब व आठवड्याचे सातही दिवस, चोवीस तास करून देणाऱ्या IMPS सुविधेचे महत्त्व लक्षात घेऊन, ग्राहकांच्या सोयीसाठी हा बदल केला आहे.


🔰भरणा सुविधा असणारी ठिकाणे नकाशावर दाखवणे-भरणा सुविधा केंद्रे कमी असणाऱ्या भागांत त्या केंद्रांच्या जिओ-टॅगिंगचा म्हणजे ती केंद्रे ऑनलाइन नकाशावर दाखवण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यामुळे पेमेंट स्वीकारणाऱ्या नव्या-जुन्या केंद्रांची ठिकाणे अचूक कळण्यास मदत होईल. ही नकाशासुविधा व्यापक करण्यासाठी प्रयत्न केले जातील.


🔰रिजर्व बँकेच्या नियामक तरतुदींमध्ये गैरव्यवहार प्रतिबंधकाचा नव्याने समावेश-वित्त-तंत्रज्ञान प्रणालीस अधिक गती देण्यासाठी, वित्तीय गैरव्यवहारांना आळा घालणारा व त्यावर उपाययोजना करणारा नवीन चौथा प्रतिबंधक समाविष्ट केला जाणार आहे. यापूर्वीच्या संकल्पनांसाठी ऑन-टॅप अप्लिकेशन सुविधा दिल्या जाणार आहेत. 


🔰वित्त-तंत्रज्ञान क्षेत्रात सतत अभिनव विचार आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.बिगरबँक वित्तसंस्थांना बँकांकडून होणारा पतपुरवठा हा प्राधान्य क्षेत्र पतपुरवठा म्हणूनच यापुढेही गणला जाईल. अर्थव्यवस्थेतील वंचितांना बिगरबँक वित्त संस्थांमधून मोठ्या प्रमाणात पतपुरवठा केला जातो.


🔰 तया पार्श्वभूमीवर, शेती, सूक्ष्म; लघु व मध्यम उद्योग आणि गृहनिर्माण यासह अशा संस्थांना बँकांकडून होणारा पतपुरवठाही प्राधान्य क्षेत्र पतपुरवठा म्हणून गणला जात आहे. या सुविधेस आणखी सहा महिने म्हणजे 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

ग्राहकसंख्या आणि व्यवहार अधिक असणाऱ्या श्रेणींसाठी, बिगरबँक वित्तसंस्थांसाठी अंतर्गत लोकपाल योजना अंतर्गत तक्रार निवारण व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने योजना सुरू केली जाणार आहे.


🔴भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) विषयी..


🔰भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्याचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे.


🔰RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार डेप्युटी गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी डी देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.यएसआयच्या प्रमुखपदी :


🔰पाकिस्तानच्या शक्तिशाली अशा इंटर सव्र्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर यंत्रणेत अनपेक्षित फेरबदल करण्यात आला असून, लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजुम यांना तिचे नवे प्रमुख नेमण्यात आले आहे.


🔰ल.ज. अंजुम हे लेफ्टनंट जनरल फैझ हमीद यांची जागा घेतील. हमीद यांची पेशावर कॉप्र्सचे कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.


🔰‘डॉन’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, लेफ्टनंट जनरल अंजुम हे यापूर्वी कराची कॉप्र्सचे कमांडर होते. सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांना लेफ्टनंट जनरलपदी बढती देण्यात आली.

पाव शतकाच्या पाठपुराव्यानंतर सिंधुदुर्गात विमानतळाचे स्वप्न साकार .


🔰कोकण रेल्वेनंतर या प्रदेशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाचा टप्पा ठरू शकणाऱ्या सिंधुदुर्ग विमानतळाचे स्वप्न सुमारे पाव शतकाच्या सर्वपक्षीय पाठपुराव्यानंतर  शनिवारी साकार होत आहे.


🔰 क. मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस आणि रामकृष्ण हेगडे यांच्या प्रयत्नांतून १९९६-९७ मध्ये कोकणात रेल्वे गाडी धावू लागली त्याच सुमारास या भागातील काँग्रेसचे तत्कालीन खासदार मेजर सुधीर सावंत यांनी येथे विमानतळ व्हावा, म्हणून प्रयत्न सुरू केले. तेव्हा केंद्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आघाडीच्या सरकारमधील नागरी हवाई वाहतूकमंत्री कै. माधवराव शिंदे यांना भेटून त्यांनी या प्रकल्पासाठी गळ घातली. त्यावेळी मेजर सावंत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे चिटणीस होते. त्यामुळे दिल्लीत त्यांचे वजन होते.


🔰गोव्यातील दाभोळी विमानतळ त्या वेळी नौदलाच्या ताब्यात असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास या ठिकाणी गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला फायदा होईल, असे मेजर सावंत यांनी तत्कालीन हवाईमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले  होते. त्यानंतर शिंदे यांनी १९९५ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची हवाई पाहणी केली आणि १९९६ मध्ये राज्यातील तत्कालीन युती सरकारच्या धोरणानुसार सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा करण्याबरोबरच येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत केंद्रीय पातळीवरून चाचपणी सुरू झाली.


🔰तयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या विमानतळ झालेल्या चिपी-परुळे भागात जागा पाहण्यासाठी समिती नेमण्यात आली आणि या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली, अशी माहिती सावंत यांनी दिली. योगायोगाचा भाग म्हणजे, माधवराव शिंदे यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य शिंदे सध्या त्याच नागरी हवाई वाहतूक खात्याचे मंत्री या नात्याने या विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत.

१० ऑक्टोबर २०२१

कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा : मनूचा दुहेरी सुवर्णवेध

🔶 ऑलिम्पिकपटू मनू भाकरच्या दुहेरी सुवर्णकमाईमुळे भारताने ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताने चार सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांवर नाव कोरले.

🔶 भारताला १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या मिश्र, महिला आणि पुरुष सांघिक अशा तिन्ही गटांत सुवर्णपदक जिंकण्यात यश आले. भारताची १९ वर्षीय नेमबाज मनूने या स्पर्धेत अचूक वेध साधताना तीन सुवर्णपदके आपल्या नावे केली आहेत.

🔶सरबजोत सिंगसोबत मिश्र सांघिक गटात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर मनूने १० मीटर एअर पिस्तूलच्या महिला सांघिक गटात रिदम सांगवान आणि शिखा नरवालसह खेळतानाही सुवर्णपदक जिंकले. त्यांनी अंतिम फेरीत बेलारूसला १६-१२ असे पराभूत केले. या स्पर्धेच्या पात्रता फेरीतही भारताने वर्चस्व गाजवताना अव्वल स्थान मिळवले होते.

०९ ऑक्टोबर २०२१

स्पर्धा परीक्षा उपयोगी पुस्तके


1) मराठी व्याकरण- १) मो. रा. वाळिंबे 

                                २) बाळासाहेब शिंदे

2) इंग्रजी व्याकरण-  १) बाळासाहेब शिंदे

                               २) एम जे शेख

3) अंकगणित -      १) नितीन महाले

                             २)पंढरीनाथ राणे

4) बुद्धीमत्ता चाचणी- १)जी. किरण

                                 २) सतिष वसे

5) इतिहास -            १) ग्रोव्हर, बेल्हेकर

                                २) जयसिंग पवार

6) भूगोल -               १)ए. बी. सवदी

                                  २) खतीब

7) अर्थशास्त्र -       १) रंजन कोळंबे

                              २)किरण देसले 

8) राज्यव्यवस्था  -    १) रंजन कोळंबे

                                  २) किशोर लवटे

9) सामान्य विज्ञान-   १) सचिन भस्के

                                 २) रंजन कोळंबे

10) PSI /STI /ASST- पूर्व परीक्षा गाईड  

                              १) एकनाथ पाटील

                              २) प्रकाश गायकवाड

वरील पुस्तकांपैकी प्रत्येक विषयाचे किमान एक तरी पुस्तक आपल्या कडे असावे.

    तर लागा तयारीला... All The Best

राज्यसेवा परीक्षा 2021 नियोजनअभ्यासासाठी टिप्स-



-- जो दररोज अभ्यास करणार आहे त्याची रिविजन त्यादिवशी करायचे आहे

-- दिवस कमी असल्या कारणामुळे कोणताही टाइमपास करू नये

-- मुख्य परीक्षेचा आता कोणताही अभ्यास करू नका

-- तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्याच पुस्तकाचा अभ्यास करा नवीन पुस्तके जास्त विकत घेण्याच्या फंदात पडू नका

-- जर मागच्या तीन ते चार वर्षापासून सतत अपयश येत असेल तर सर्व सोशल मीडिया बंद करून अभ्यास करा

-- परीक्षेचा अभ्यास कसा करावा यासाठी दिवसभराच्या सेमिनार साठी कुठेही वेळ घालवू नका

-- या पुस्तकातून अगोदर अभ्यास केला आहे त्याच पुस्तकाचा सतत अभ्यास करा

-- या परीक्षेत अर्थशास्त्र या विषयामध्ये कोर अर्थशास्त्र विचारले जात नाही त्यामुळे अर्थशास्त्राची विशेष तयारी करण्यासाठी वेळ घालवू नका दारिद्र्य रोजगार विकास सर्वसमावेशक विकास शाश्वत विकास लोकसंख्या या टॉपिकवर प्रश्‍न विचारले जात असल्या कारणामुळे जास्त वेळ देऊ नका

--CSAT मध्ये गणित या विषयावरती मागील पाच वर्षात पाच ते सात प्रश्न विचारले जातात त्यासाठी जास्त वेळ वाया घालू नका त्यासाठी स्पेशल क्लास लावण्याची कोणतीही आवश्यकता नाही मागील परीक्षेमध्ये चे प्रश्न विचारले गेले आहेत त्याचाच सराव करा तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी प्रश्न रिपीट होत आहेत

-- उताऱ्यावरील प्रश्न यासाठी मागील आयोगाच्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि दररोज तीन ते चार उतारे सोडवा आणि त्यामध्ये आपण कुठे चुका करतोय त्याच्यावरती काम करा

-- बुद्धिमत्ता मध्ये पंधरा ते सतरा प्रश्न विचारले जातात त्याची विशेष तयारी करा कोणतेही पुस्तक वापरा त्यातील सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये किमान दहा ते बारा प्रश्नांची उत्तर येऊन जातील जोपर्यंत स्वतः प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही केले तर त्याला काहीच फरक पडत नाही सध्या मार्केटमध्ये बुद्धिमत्ता चे चांगली पुस्तके आहेत. या सर्व पुस्तकांमध्ये प्रश्न सोडवण्याच्या चांगल्या क्लुप्त्या दिलेल्या आहेत आणि ही पुस्तके अतिशय स्वस्तात बाजारात मिळतात त्यामुळे आणखी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही ती पुस्तकेच जर तुम्ही व्यवस्थित पणे सोडवली तर तुमची भीती कायमची दूर होऊ शकते.

-- सामान्य विज्ञान या विषयावरती जास्त प्रश्न परीक्षा मध्ये विचारले जातात त्यामुळे या विषयाचा अभ्यास आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे या दोन बाबी होणे गरजेचे आहे सामान्य विज्ञान विषयासाठी क्रमिक पुस्तकांमधील 60 ते 70 टक्के प्रश्न येतात या विषयांमध्ये मुलांना मार्ग कमी का पडतात कारण या विषयावरची असलेली भीती आणि रिविजन न करणे हे आहे त्यामुळे या विषयांची जास्तीत जास्त रिव्हिजन करायला हवी.

-- इतिहास या विषयाचा राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये अभ्यास जास्त आहे आणि विद्यार्थी या विषयालाच सर्वाधिक वेळ देतात आणि परीक्षेमध्ये प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरं ज्यांनी भरपूर अभ्यास केला आहे त्यांनाही देता येत नाहीत त्यामुळे एकच चांगलं पुस्तक वापरा आणि शालेय क्रमिक पुस्तके वापरा त्याचीच सतत सतत रिविजन करा प्रश्न सोडवा .कमीत कमी वेळ द्या.

-- भूगोल आणि पर्यावरण या विषयांमध्ये आपणास हमखास चांगले मार्क मिळू शकतात यासाठी क्रमिक पुस्तके त्यासंदर्भातल्या चालू घडामोडी आणि कोणतेही पुस्तक वाचा जास्त प्रश्न आहे प्राकृतिक भूगोल  व भारत आणि जगाच्या भूगोलाचा संदर्भात विचारले जातात याचाही जास्तीत जास्त सराव करा

-- राज्यघटना आणि लोकाभिमुख धोरण कायदे या संदर्भामध्ये बेसिक राज्यघटनेचा अभ्यास चांगला झाला पाहिजे जो पुढे जाऊन तुम्हाला मुख्य परीक्षेलाही उपयोगी पडणार आहे त्याचबरोबर शासनाची महिला कम कुवत घटक आणि विविध बाबी जसे की शिक्षण आरोग्य व्यवसाय रोजगार यासंदर्भात मधील शासनाचे धोरण याबाबत प्रश्न विचारले जातात.

-- जर प्रायोरिटी ठरवायचे म्हटलं तर सर्वाधिक जास्त प्रायोरिटी या परीक्षांमध्ये CSAT, सामान्य विज्ञान राज्यघटना भूगोल चालू घडामोडी 

पर्यावरण अर्थशास्त्र आणि इतिहास या क्रमाने द्यायला हवी.

-- लक्षात घ्या हा अभ्यास सर्व तुम्हालाच करावयाचा आहे कोणीतरी तुम्हाला मदत करेल या आशेने स्वतःला फसवू नका आणि घरच्यांनाही फसवू नका

--- आज पर्यंतचा इतिहास परीक्षेचे अभ्यासक्रम जास्त असल्याने त्याच प्रमाणे कॉम्पिटिशन जास्त असल्याकारणामुळे जो हार्ड आणि स्मार्ट दोन्ही वर काम करेल तसेच आत्मविश्वास सातत्य आणि स्वतःला पारंगत ठेवेल तोच हा गड जिंकेल.

-- फालतू च्या बिनकामाचा ज्या आपल्या करिअरमध्ये काहीही महत्वाच्या नाहीत अशा गप्पा अभ्यास करताना सोशल मीडियावर करण्यात वेळ घालू नका लक्षात ठेवा 2022 ही लढाई तुमची पण आहे त्यामुळे दुसऱ्याच्या लढाईबद -- यश मिळेपर्यंत समाजकारण-राजकारण या गोष्टीपासून दूर राहा स्वतःचे हित कशात आहे हे पहा

महत्त्वाचे युद्ध सराव


🌺 कोप इंडिया 2019 (हवाई) 

✍️ भारत-अमेरिका

✍️ कलाईकुंडा & अर्जनसिंह हवाईतळावर (पश्चिम बंगाल)

✍️ 3 ते 14 डिसेंबर दरम्यान

✍️ 2014 पासून


🌺 कोकण 18 (नौदल) 

✍️ भारत-इंग्लंड

✍️ गोव्याच्या समुद्रकिनारपट्टीनजीक

✍️ 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान

✍️ 2004 पासून


🌺 शिन्यू मैत्री - 18 (हवाई)

✍️ भारत-जपान

✍️ आग्रा हवाईतळावर (उत्तर प्रदेश व)

✍️ 3 ते 7 डिसेंबर दरम्यान

✍️ हा पहिलाच सराव


🌺 'इंद्र नेव्ही' (नौदल) (10th) (https://t.me/joinchat/AAAAAEANaOYJb535HKO_TA)🌺

✍️ भारत-रशिया

✍️ विशाखापट्टणम समुद्रकिनारपट्टीनजीक (आंध्र प्रदेश)

✍️ 9 ते 16 डिसेंबर दरम्यान

✍️ 2003 पासून


🌺 'हँड इन हँड' (लष्करी) (7th) 

✍️ भारत-चीन

✍️ चगडू (चीन)

✍️  डिसेंबर 2018

✍️ 2007 पासून


🌺 इंम्बेक्स (IMBEX) 2018-19 ' 

【लष्करी】

✍️ भारत-म्यानमार

✍️ चडी मंदिर (पश्चिम कमांडचे मुख्यालय) (हरियाणा)

✍️  जानेवारी 2019

✍️ 2018 पासून


🌺 सी व्हिजिल (Sea Vigil) 2019 【नौदल】🌺

✍️ भारतीय नौदलाने तटरक्षक दलाच्या साहाय्याने

✍️ भारताचा 7517 km लांबीचा संपूर्ण समुद्रकिनारा, EEZs आणि 13 तटीय राज्ये व केंद्रशासित प्रदेश व्यापणारा पहिलाच बहू-एजन्सी सराव ठरला.

✍️  22-23 जानेवारी 2019


🌺 'IAFTX 2019' सराव' 【लष्करी】 (https://t.me/joinchat/AAAAAEANaOYJb535HKO_TA) 🌺

✍️ भारत-आफ्रिकन देश (12 देश)

✍️ औध, पुणे

✍️  18 ते 27 मार्च 2019


🌺 'कटलास एक्सप्रेस 2019 【नौदल】

✍️ बहुराष्ट्रीय सागरी सराव (15 देश सहभागी)

✍️ जिबुती, मोझाम्बीक, आणि सेशेल्स या देशांच्या किनाऱ्यानजीक

✍️  27 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2019


🌺 'कोब्रा गोल्ड 2019' 【लष्करी】 (38th) 

✍️ बहुराष्ट्रीय लष्करी सराव

✍️ थायलंड येथे 【अमेरिका आणि थायलंडचे लष्कर संयुक्त यजमान】

✍️  फब्रुवारी 2019

✍️ 1982 पासून


🌺 'तोपची 2019' सराव 【लष्करी】

✍️ भारतीय सेनेद्वारे

✍️ दवळाली【नाशिक】

✍️  12 फेब्रुवारी 2019


🌺 'वायू शक्ती 2019' हवाई सराव 【लष्करी】 🌺

✍️ भारतीय हवाई सेनेद्वारे

✍️ पोखरण【राजस्थान】

✍️  8 te 18 फेब्रुवारी

✍️ वायू शक्ती आणि गगन शक्ती हे भारतीय हवाई दलातर्फे आयोजित केले जाणारे मोठे सराव आहेत.


🌺 'मैनामती मैत्री 2019' सराव' 【लष्करी】

✍️ भारताचे सीमा सुरक्षा दल 【BSF】आणि 'बॉर्डर गार्ड्स बांगलादेश' यांच्यामध्ये

✍️ तरिपुरा-बांगलादेशच्या सीमावर्ती भागात आयोजन

✍️  फब्रुवारी 2019


🌺 'संप्रिती 2019' सराव' 【लष्करी】【8th】 ( 🌺

✍️ भारत-बांगलादेश

✍️ तगेल 【बांगलादेश】

✍️  18 ते 27 मार्च 2019

✍️ 2009 पासून


🌺 'अल नागाह ३' सराव 【लष्करी】

✍️ भारत-ओमान

✍️ ओमान

✍️  12 ते 25 मार्च 2019


🌺 'AFINDEX 2019' सराव' 【लष्करी】

✍️ भारत-आफ्रिकन देश (16 देश)

✍️ औध, पुणे

✍️  18 ते 27 मार्च 2019


🌺 'TROPEX 2019' सराव' 【नौदल】 🌺

✍️ भारतीय सेना दल, भारतीय हवाई दल, भारतीय नौदल, आणि भारतीय तटरक्षक दल सहभागी

✍️ अदमान आणि निकोबार बेटांवर

✍️  जानेवारी ते मार्च 2019

✍️ 2005 पासून


🌺 'IND-INDO CORP-T 2019' सराव' 【नौदल】 

✍️ भारत- इंडोनेशिया

✍️ अदमान आणि निकोबार 【एप्रिल 2019】


🌺 'मित्र शक्ती -6 ' सराव 【लष्करी】

✍️ भारत- श्रीलंका 【एप्रिल 2019】


🌺 'AUS INDEX 2019' सराव' 【नौदल】

✍️ भारत- ऑस्ट्रेलिया

✍️ विशाखापट्टणम 【एप्रिल 2019】


🌺 'बोल्ड कुरुक्षेत्र 2019' सराव' 【लष्करी】

✍️ भारत- सिंगापूर

✍️ झाशी 【उत्तर प्रदेश】


🌺 'वरुण 2019' सराव' 【नौदल】

✍️ भारत- फ्रान्स

✍️ गोवा 【मे 2019】


🌺 'ADMM+ सागरी सराव' 【नौदल】

✍️ ADMM+ चे 18 सदस्य देश सहभागी 【भारतासह】

✍️ सिंगापूर आणि द. कोरिया संयुक्त आयोजन


 🌺 'SIMBEX 2019' सराव' 【नौदल】

✍️ भारत- सिंगापूर 【मे 2019】

✍️ 1993 पासून



🌺 'IMCOR' 【8th】

✍️ भारत-म्यानमार समन्वयित गस्त


🌺 'खड्ग प्रहार' सराव【लष्करी】

✍️ भारतीय सेना दलाचा प्रशिक्षण सराव

✍️ अबाला 【पंजाब】【जून 2019】


महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प



♦️महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प

 

*खोपोली - रायगड              

*भिरा अवजल प्रवाह- रायगड                              

*कोयना - सातारा                

*तिल्लारी - कोल्हापूर          

*पेंच - नागपूर                      

*जायकवाडी - औरंगाबाद


♦️महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प                 

*तारापुर - ठाणे                    

*जैतापुर - रत्नागिरी              

*उमरेड - नागपूर(नियोजित)


♦️महाराष्ट्रातील पवन विद्युत  प्रकल्प                     

*जमसांडे - सिंधुदुर्ग             

*चाळकेवाडी - सातारा           

*ठोसेघर - सातारा               

*वनकुसवडे - सातारा           

*ब्रह्मनवेल - धुळे                 

*शाहजापूर - अहमदनगर

समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ...


• डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)


• राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर


• नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)


• कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)


• बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)


• महात्मा फुले- पुणे


• महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)


• गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)


• गोपाळ हरी देशमुख- पुणे


• न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)


• सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)


• बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)


• आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-

शिरढोण (रायगड)


• आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)


• स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)


• सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)


• विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)


• गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)


• विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)


• डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)


• साने गुरुजी- पालघर (रायगड)


• संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)


• सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)


• संत ज्ञानेश्वर- आपेगाव


• संत एकनाथ- पैठण-


• समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)

1857 चा उठाव व इंग्रजी अधिकारी


👉  दिल्ली- विलोबी, जॉन नोकोल्सन , लेफी हडसन 


👉कानपूर - सर ह्यु व्हीलर , कोलिन कॅम्पबेल 


👉  लखनौ - हेनरी लॉरेन्स, हेन्री हावलॉक, जेम्स औट्राम, कोलिन कॅम्पबेल


👉 झांशी - सर ह्यु रोज 


👉 बनारस- कर्नल जेम्स नील


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🎯सवदेशी चळवळीचे नेतृत्व


👉पणे आणि मुंबई - बाळ गंगाधर टिळक


👉 पजाब - लाला लजपतराय , अजित शिंह


👉 दिल्ली - सय्यद हैदर रझा 


👉मद्रास - चिदम्बरम पिलई

पचायत राज


🔰 भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.


🔰 लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला.


🔰 सथानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार -2 ऑक्टोंबर 1959


🔰 सथानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य - आंध्रप्रदेश स्विकार - 1 नोव्हेंबर 1959


🔰 पचायतराज स्विकारणारे नववे राज्य - महाराष्ट्र


🔰 सथानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले


🎯 बलवंतराय मेहता समिती:-


🔰 भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.


🔰 या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला.


🔰 या समितीमधील इतर सदस्य - ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव.


🎯 यासमितीने केलेल्या शिफारशी:-


📌 लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.


📌 पचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.


📌 जया गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.


📌 गरामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.

ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी.


📌 जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे.


📌 जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा.

पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)


अशोक महेता समिती नियुक्ती - 1977 . शासनास अहवाल सादर - 1978.


🎯 महत्वाच्या शिफारशी:-


🔰 पचायत संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी जनतेच्या सहभागास महत्व दिले गेले पाहिजे.


🔰 पचायत संस्थाच्या निवडणुका वेळेवर घेणे बंधनकारक करावे.


🔰 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड प्रत्यक्ष मतदारामधून करण्यात यावी.

पंचायत पद्धती व्दिस्तरीय असावी.

महत्वाचे ब्रँड अँबेसिडर


👍1)  महाराष्ट्राचे व्याघ्रदूत :- अमिताभ बच्चन 


👍2) महाराष्ट्र हरितदूत :- सचिन तेंडुलकर 


👍3) युनिसेफ :- प्रियांका चोप्रा  


👍4) नेपाळ क्रिकेट संघटना :- महेंद्रसिंग धोनी 


👍5) केरळ पर्यटन व आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर :- स्टेफी ग्राफ 


👍6) हरियाना राज्याचे ब्रँड अँबॅसेडर :- बाबा रामदेव 


👍7) तेलंगाना राज्य :- सानिया मिर्झा  


👍8) बेटी बचाओ बेटी बढाओ :- माधुरी दीक्षित 


👍9) महाराष्ट्र सरकार व्यसन मुक्ती अभियान :- सिंधुताई सपकाळ 


👍10) युनेसेफ सदभावना राजदूत :- सचिन तेंडूलकर 


👍11) तंबाखु नियंत्रण अभियान :- राहुल द्रविड 


०८ ऑक्टोबर २०२१

7 पीएम-मित्र केंद्रांची उभारणी करण्यास मंजुरी

🔰केंद्रीय सरकारने 7 “मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अॅपरल पार्क (PM MITRA)” अर्थात “भव्य एकात्मिक वस्त्रोद्योग क्षेत्र आणि परिधान केंद्रे (पीएम-मित्र)” स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.

🔰प्रकल्पांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीकोनातून तसेच जागतिक वस्त्रोद्योग नकाशात भारताला समर्थपणे स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

🔰पीएम-मित्र केंद्रे पंतप्रधानांच्या 5F संकल्पनेपासून प्रेरित आहेत. ही 5F संकल्पना म्हणजे “शेत ते धागा; धागा ते कारखाना; कारखाना ते फॅशन ते परदेश” अशी पाच सूत्रे होय. अर्थव्यवस्थेतील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या आणखी वाढीसाठी ही एकात्मिक संकल्पना उपयुक्त ठरणार आहे.

🅾ठळक मुद्दे

🔰पीएम-मित्र केंद्रे वेगवेगळ्या इच्छुक राज्यांमध्ये असलेल्या ग्रीनफील्ड / ब्राउनफील्ड ठिकाणी स्थापन केली जाईल. ज्या राज्यांमध्ये विद्यमान वस्त्रोद्योग परिसंस्थेच्या लगत एक हजार एकरांहून मोठा व विनापाश भूखंड उपलब्ध असेल, त्या राज्यसरकारांकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत.

🔰ग्रीनफील्ड क्षेत्रातील सर्व पीएम मित्र केंद्रांसाठी जास्तीतजास्त 500 कोटी रुपयांचे विकास भांडवली पाठबळ (DCS) आणि ब्राऊनफील्ड क्षेत्रातील पीएम मित्र केंद्रांसाठी जास्तीतजास्त 200 कोटी रुपयांचे विकास भांडवली पाठबळ (DCS) सामायिक पायाभूत विकासासाठी (एकूण प्रकल्प खर्चाच्या 30 टक्के) दिले जाणार आहे.

🔰पीएम मित्र केंद्रांमध्ये लवकरात लवकर वस्त्रोद्योग सुरु करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला 300 कोटी रुपयांचे स्पर्धात्मकता प्रोत्साहन पाठबळ (CIS) दिले जाणार आहे. राज्यात जागतिक स्तराचे उद्यम नगर स्थापित करण्यासाठी इतर प्रोत्साहनांबरोबरच राज्य सरकारतर्फे 1000 एकर जमीन दिली जाईल.

🔰ग्रीनफील्ड / ब्राऊनफील्ड क्षेत्रातील पीएम मित्र केंद्रांसाठी भारत सरकारचा विकास भांडवली निधी (DCS) एकूण प्रकल्प खर्चाच्या 30 टक्के परंतु जास्तीतजास्त 500 कोटी रुपये दिला जाईल.

🔰ब्राऊनफील्ड क्षेत्रांसाठी, मूल्यमापनानंतर, प्रकल्पातील विकासाधीन असलेल्या पायाभूत सुविधा व प्रकल्पाला सहाय्य्यभुत असलेल्या इतर सुविधांसाठी येणाऱ्या खर्चाच्या 30 टक्के, व जास्तीतजास्त 200 कोटी रुपयांपर्यंत विकास भांडवली निधी (DCS) दिला जाईल.

०७ ऑक्टोबर २०२१

मोजकेच पण महत्त्वाचे उपयुक्त प्रश्नावली


1) शरीरातील सर्वात व्यस्त भाग ( अवयव ) कोणता ?

:- हृदय


2) जगातील सर्वात मोठे फुल कोणते   ?

:-  रिफ्लेशीया आरनोडाई


3) वनस्पती शास्त्राचे जनक कोण ?

:- थियोफ्रेस्टस


4)  मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी  ?

:- ग्लुटीयस मॅक्सीमस


5) कोणते शैवाल हे ' अंतरीक्ष शैवाल ' 

( Space Algae ) म्हणून ओळखले जाते ?

:- क्लोरेल्ला ( Chlorella )


6) व्हिटॅमिन डी ( vit - D ) चा शोध कुणी लावला ?

:- हापकिंस


7) डायनामाइट चा शोध कोणी लावला ?

:- आल्फ्रेड नोबेल


8) ( RDX ) चा full form काय आहे  ?

:- Research and Developed Explosive.


9) कोणत्या वायूला ( हसवणारा वायू ) laughing gas असे म्हटले जाते ?

:- नाइट्रस ऑक्साइड


10) नील हरित शैवाल आता कोणत्या नावाने ओळखले जाते ?

:- Cyanobacteria

( साइनोबॅक्टीरिया )


भौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा



👉 अम्पिअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण. एका संकेदाला वाहणारा 6x10 इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे एक अॅम्पिअर होय.


👉 बार :- बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर असलेला 10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा हाजारावा भाग म्हणजे मिलिबार होय. 


👉 कलरी :- उष्णतेचे परिमाण. 1 ग्रॅम वजनाच्या पाण्याचे तापमान 1 सें.ग्रॅ. मे वाढवण्यास जेवढी उष्णता लागते ती एक कॅलरी होय. एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थापासून शरीरास किती ऊर्जा वा उष्णता मिळेल तेही या परिमाणात व्यक्त करतात. 


👉 ओहम :- विद्युतरोधाचे परिमाण 1 अॅम्पियर वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट विद्युतदाब असताना विद्युतधारा जाऊ दिली असता जितका विद्युत विरोध निर्माण होतो. तो 1 ओहम होय. 1 ओहम = 1 व्होल्ट/ 1 अॅम्पियर 


👉 अश्चशक्ती :- यंत्राची शक्ती मोजण्याचे परिमाण 550 पौंड वजनाची वस्तु सेकंदामध्ये 1 फुट पुढे सरकण्यास लागणारी शक्ती म्हणजे एक अश्वशक्ती होय. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय. 


👉 जयूल :- कार्य किंवा ऊर्जेचे परिमाण 1 व्होल्ट दाबाच्या विद्युत मंडलतून 1 अॅम्पियर शक्तीचा विद्युत प्रवाह 1 सेकंद पाठविल्यास जेवढी ऊर्जा खर्च होईल ती 1 ज्यूल होय. 


👉 वहोल्ट :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम विरोध असणार्‍या विद्युत मंडळातून एक अॅम्पियर प्रवाह पाठविण्यासाठी लागणारा एकूण विद्युत दाब म्हणजे एक व्होल्ट होय. 


👉 वट :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम 1 अॅम्पियरचा परिवता प्रवाह 1 सेकंदात जेवढी ऊर्जा खर्च करेल ती एक वॅट होय. 1000 वॅट = 1 किलोवॅट. 


👉 नॉट :- जहाजाच्या वेगाचे परिमाण. हा वेग दर ताशी साधारणपणे 1,853 मीटर किंवा 6,080 फुट इतका असतो. यालाच नॉटिकल मैल असेही म्हणतात. सागरावरील सर्व अंतरे याच परिमाणात मोजतात. 


👉 सौर-दिन :- दर दिवशी सूर्य मध्यान्हीला डोक्यावर येत असतो. लागोपाठ येणार्‍या दोन मध्यान्हीमधील कालावधीला सौर-दिन असे म्हणतात. सौर-दिनाचा काल ऋतुनुसार बदलत असतो. संपूर्ण वर्षातील सौर-दिनांच्या कलावधीवरुन मध्य सौरदिन ठरवतात. मध्य सौर दिन सर्वसाधारणपणे 24 तासांचा असतो. 


👉 परकाश वर्ष :- प्रकाशवर्ष विश्वातील ग्रह व तारे यातील अंतरे मोजण्याचे परिमाण आहे. प्रकाशाचा वेग दर सेकंदाला (3x10)8 मी./सेकंद इतका आहे. या वेगाने प्रकाश किरणाने वर्षभरात तोडलेले अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष होय. 1 प्रकाश वर्ष = (9.46x10)12 किमी . 


परश्न मंजुषा



Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.

1 १९ जुलै √√√√

2 ३१ आॅक्टोबर

3  २३ एप्रिल

4 १ व ३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.

1  २००७

2  २००४

3  २००५√√√√√√

4  २०१३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.3  भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही 

1  कामगारांची वाढती संख्या

2  अयोग्य तंत्रज्ञान 

3  प्रभावी मागणीची      

कमतरता 

4  कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?

1  १९४८-४९

2  १९३१-३२√√√√

3  १९११-१२

4  १८६७-६८


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.5  खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?

1   चलन निश्चलीकरन 

2   रुपयाचे अवमूल्यन√√√√

3   १ व २  दोन्ही घडले 

4  १ व २ दोन्ही घडले नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.6  रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?

1   बँकदर

2  रोख राखीव प्रमाण

3  वैधानिक रोखता प्रमाण

4  रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.7  खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.

1  "से" चा बाजार विषयक नियम

2  उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम

3  एंजल चा नियम√√√√√

4  फिलिप्स वक्ररेषा


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.8  १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.

1  २० कोटी व ३४० रुपये वार्षिक

2  २४० कोटी व २० रुपये वार्षिक

3  ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√

4  ३४० कोटी वार्षिक व २०  रुपये मासिक


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न 

3  दरडोई उत्पन्न

4  किमतीचा निर्देशांक√√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.10  भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?

अ. ग्रामीण शिक्षण

ब. ग्रामीण आरोग्य

क. ग्रामीण पाणीपुरवठा

ड. ग्रामीण रस्ते

1   अ आणि ब  √√√√√

2   ब आणि क

3   क आणि ड

4  अ आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.11  खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते? 

1  चीन -भारत युध्द

2  भारत पाकिस्तान संघर्ष 

3  आर्थिक मंदी

4  राजकीय अस्थिरता √√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.12  तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.

1  मुद्रा अवपात

2  मुद्रा संस्फीती√√√√√

3  स्टगफ्लेशन

4  स्टगनेशन


📖📖📖📖📖📖📖📖📖


[Q.13  भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?

1  यु एस ए √√√√√√  

2  यु के  

3  चीन   

4  सिंगापूर


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?

अ इंदिरा गांधी 

ब  मोरारजी देसाई

क जयप्रकाश नारायण

ड  रिझर्व्ह बँक 

1  अ आणि क 

2  ब आणि  ड√√√√√√

3  ब आणि  क

4  क आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.15  तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न

3  परकीय चलन साठा

4  किमतीचा निर्देशांक√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.16  भारतात मध्यवर्ती   बँकेची शिफारस कोणी केली नव्हती? 

1   हिल्टन यंग आयोग

2   चेंबर्लिन आयोग

3   फौलर समिती

4   मॅकलेगन समित✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.17  ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.

1  राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.

2  मद्रास फर्टिलायझर ली.

3  हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√

4  वरील सर्व


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?

1  १९४६

2  १९३८√√√√√

3  १९२९

4  १९२५


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?

1  रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे

2  नवीन चलन निर्मिती

3  स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे

4  जमा झालेले महसूल√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.

1  रोख

2  बहुआयामी

3  शून्याधारीत√√√√√

4  यापैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?

1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√

2 प्रो पिगु

3 डॉ मार्शल

4 वरील पैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?

1  पुरोगामी

2  न्याय्य 

3  प्रतिगामी√√√√√√

4  प्रमाणशीर


चालू घडामोडी प्रश्नसंच



१) बस चालकाचा परवाना मिळवणारी देशातील पहिलीच इंजिनिअर महिला कोण ठरली आहे ?

अ) प्रतिक्षा दास ✅✅

ब) भक्ती दास

क) प्रिया राव

ड) प्रिया दास


२) डॉ. श्रीराम लागू आणि दिपा लागू यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने कोणता पुरस्कार दिला जातो ?

अ) तन्वीर सन्मान ✅✅

ब) बालगंधर्व पुरस्कार

क) प्रभात पुरस्कार

ड) नाट्य सेवा पुरस्कार


३) नुकतेच प्रकाशित करण्यात आलेले ' अर्थसंकल्प सोप्या भाषेत ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

अ) उद्धव ठाकरे

ब) देवेंद्र फडणवीस ✅✅

क) अजित पवार

ड) शरद पवार


४) पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रिडा स्पर्धा २०२० मध्ये कोणत्या विद्यापीठाने सर्वाधिक पदक जिंकून प्रथम स्थान पटकावले ?

अ) सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे

ब) पंजाब विद्यापीठ चंदिगड ✅✅

क) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली

ड) कोल्हापूर विद्यापीठ कोल्हापूर


५) नुकतेच मध्यप्रदेशातील कोणते अभयारण्य इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केले आहे ?

अ) सरदारपुर अभयारण्य

ब) राष्ट्रीय चंबळ अभयारण्य ✅✅

क) फेन अभयारण्य

ड) केन अभयारण्य


 खालीलपैकी कोणते ‘२०२० टोकियो ऑलिम्पिक’ खेळांचे घोषवाक्य आहे?

उत्तर : फास्टर, हायर, स्ट्रॉंगर – टुगेदर


● कोणत्या व्यक्तीची हैती देशाच्या पंतप्रधान पदावर नियुक्ती झाली?

उत्तर : एरियल हेन्री


● कोणत्या संस्थेत ऑक्सिजन वायुचा नियंत्रित पुरवठा करणारे ‘AMLEX’ नामक उपकरण विकसित करण्यात आले?

उत्तर : आयआयटी रोपार


● “फार्मास्युटिकल उत्पादनाचे प्रमाणपत्र” कोणती संस्था देते?

उत्तर : जागतिक आरोग्य संघटना


● कोणत्या देशाने ताशी ६०० किलोमीटर या गतीने धावणारी जगातील पहिली हाय-स्पीड मॅगलेव्ह परिवहन व्यवस्था’ कार्यरत केली आहे?

उत्तर : चीन


● कोणत्या शहरात ‘२०३२ ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक’ आयोजित केले जाईल?

उत्तर : ब्रिस्बेन


● खालीलपैकी कोणते विधान ‘मंकीपॉक्स’ या आजाराच्या संदर्भात चुकीचे आहे?

उत्तर : मानवामध्ये मंकीपॉक्सच्या संक्रमनाची पहिली नोंद १९४५ साली झाली होती.


● २१ जुलै २०२१ रोजी, कोणत्या  स्थळाला युनेस्को संस्थेच्या जागतिक वारसा यादीतून हटविण्यात आले.


प्र.1. हिमालयामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे आढळणार्‍या खिंडीचा योग्य क्रम लावा.

1) कालापाणी, बुर्झिल, बनिहाल, पीर-पांजाल 

2) कालापाणी बुर्झिल, पीरपंजाल, बनिहाल.  √

3) पीरपंजाल, बनिहाल, बुर्झिल, कालापाणी 

4) बुर्झिल, कालापाणी, पीरपंजाल, बनिहाल


प्र.2. खालीलपैकी कोणते घटक ऋतूनिर्मितीस कारणीभूत आहेत.

अ. पृथ्वीचे परीभ्रमण 

ब. पृथ्वीचे परिवलन

क.पृथ्वी अक्षाकडे झुकलेली असणे    

ड. पृथ्वीच्या अंडाकृती आकारामुळे


1) अ,ब 

2) ब, क, ड

3) सर्व कारणीभुत घटक   √

4) अ,ब व क


प्र.3. खालीलपैकी कोणते उष्णप्रवाह आहेत.

अ.उत्तर विषवृत्तीय प्रवाह ब.कॅरीबियन प्रवाह क.कॅलीफोर्निया प्रवाह ड. क्यरोसिवा प्रवाह


1) अ,ब, क 

2) अ, ब, ड 

3) अ,ब,ड √

4) वरील सर्व


प्र.4. खालीलपैकी कोणते विधाने -प्रावरण/मध्यावरण- विषयी बरोबर आहे.

अ. प्रावरणचा विस्तार खालच्या कवचा पासून गाभा पर्यंत आहे.

ब. प्रावरणाची जाडी सुमारे 2900 किमी आहे.

क. पृथ्वीच्या एकूण घनफ ळापैकी प्रावरणाने 83 टक्के भाग व्यापलेला आहे. व पृथ्वीच्या एकूण वस्तूमानापैकी प्रावरणाने वस्तूमान 68 टक्के आहे.


1) अ,क

2) अ 

3) अ,ब 

4) वरील सर्व. √


प्र.5. वार्‍याच्या अपरक्षण/खननकार्यामुळे निर्मित भुरूपे संबंधी कोणता पर्याय अयोग्य आहे.

अ.इयूजेन ब.यारदांग क.भुछत्र खडक ड.द्विपगिरी

इ.कंकतगिरी/केम्स ई तरंग घर्षितमंच 

उ. भुस्तंभ


1) सर्व योग्य 

2) सर्व अयोग्य 

3) क, ड, इ, ई, उ 

4) इ, ई.  √


प्र.6. बिटुमिनस कोळशाच्या प्रकारासंबंधी असत्य विधान ओळखा.

अ. बिटुमिनस कोळशात डांबराचा व वायूचा अंश जास्त असतो.

ब. बिटुमिनस कोळसा जळताना धुराचे प्रमाण कमी असून राखही कमी पडते.

क. बिटुमिनस कोळसा लवकर पेटतो व लवकर विझतो.


1) अ 

2) ब 

3) क 

4) यापैकी नाही.  √


प्र.7. पुढीलपैकी कोणत्या देशातून मकरवृत्त जाते?

अ. ऑस्टे्रलिया 

ब. नामिबिया 

क. ब्राझिल 

ड. चिली


1) अ,ब,क 

2) ब व क 

3) अ,ब, क 

4) सर्व योग्य.  √


प्र.8. पुढील पठार पश्‍चिमेकडून पूर्वेकडे क्रमाने लावा.

अ. छोटा नागपूर 

ब.माळवा 

क. बुंदेलखंड 

ड. बाघेलखंड


1) ब,क,ड,अ.  √

2) क,ब,ड,अ 

3) अ,क,ड,ब 

4) ब,क,अ,ड


प्र.9. जनगणना 2011 वरून योग्य ओळखा. (महाराष्ट्राबाबत)

अ. महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.

ब. सर्वात कमी स्त्री-पुरूष (लिंग गुणोत्तर) मुंबई शहरमध्ये आहे.

क. सर्वाधिक साक्षरतमुंबई उपनगर या जिल्हयाची

आहे.


1) अ व ब 

2) ब व क 

3) अ व क 

4) सर्व योग्य.  √


प्र.10. अ,ब,क व ड यासाठी योग्य टेकडया/डोंगर ओळखा.


1. चिरोली   

2. गरमसूर 

3. गाळणा 

4. मुदखेड


.      अ     ब      क    ड

1)    3     4      2     1.  √

2)    3     4      1     2

3)    1     2      3     4

4)    1     2      4     3

महाराष्ट्रातील सात आश्चर्ये


जगात जशी सात आश्चर्ये आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रात राज्यातील काही अद्भुत आणि सुंदर स्थळांना जून २०१३ रोजी आश्चर्यांचा दर्जा दिला आहे. जगभरातून साधारणपणे २२ लाख मतांच्या आधारे ही सात आश्चर्ये निवडण्यात आलेली आहेत. चला तर बघूया कोणती आहेत ती आश्चर्ये :


१) विश्व विपश्यना पॅगोडा(स्तूप) :


हा पॅगोडा जगातील सर्वात मोठा खांब-विरहित पॅगोडा आहे, जो मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला आहे. गौतम बुद्धांच्या स्मृतींची जपणूक करण्यासाठी हा पॅगोडा बांधण्यात आलेला आहे. या पॅगोडाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पती यांच्या हस्ते ८ फेब्रुवारी २००९ साली करण्यात आले. हा पॅगोडा शांती आणि ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. दररोज येथे दीड ते दोन हजार पर्यटक भेट देत असतात. स्तूपाच्या कळसाची उंची २९ मी. असून भूकंपरोधक आहे. एकावेळी ८ ते १० हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था केली आहे.


२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) :


हे रेल्वे स्थानक व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त १८८७ मध्ये बांधले गेले आहे. मुंबई शहरातील ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक व मध्य रेल्वेचे मुख्यालय अशी याची ओळख आहे. सर्वात व्यस्त व गजबजलेले स्थानक अशीही याची ख्याती आहे. या स्थानकावर एकूण १८ फलाट आहेत. २००८ साली अतिरेक्यांनी याच स्थानकावर अतिरेकी हल्ला केला होता.


३) अजिंठा लेणी :


इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन चौथे शतक या काळात या बौद्धलेण्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण २९ लेणी आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या वाघुर नदीच्या परिसरात ही लेणी अस्तित्वात आहेत. ही लेणी नदीपात्रापासून ४० ते १०० फुट उंचीवर डोंगररांगांमध्ये कोरलेली आहेत. या लेण्यांत गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्र तसेच बौद्ध तत्वज्ञान चित्रशिल्प रुपात तयार केले आहे. 


४) *कास पठार* :


या पठारावर पावसाळ्यात असंख्य रानफुले फुलतात. या फुलांमध्ये अनेक दुर्मिळ प्रकारची फुले आढळून येतात. हे पठार विविध प्रकारची फुले आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराचे क्षेत्रफळ १० चौ.कि.मी. असून पठारावर २८० फुलांच्या जाती व वनस्पती, वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. रंगीबेरंगी फुले व फुलपाखरे पाहण्यासाठी पर्यटकांची येथे तुडुंब गर्दी असते.


५) रायगड किल्ला :


स्वराज्याची राजधानी असलेला किल्ला म्हणजे रायगड होय. या डोंगरी किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ८२० मीटर आहे. या किल्ल्याला अजून १५ नावानी संबोधले जाते. गडाला १४३५ पायऱ्या आहेत. अवघड व दुर्गम भागातील भागातील हा गड एक पर्यटनस्थळ म्हणून नावाजलेला आहे. गडावर एकूण २५ हून अधिक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.


६) लोणार सरोवर :


एका उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून हे सरोवर पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. या सरोवराचे  पाणी अल्कधर्मी आहे. सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार सरोवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या परिसारत बाराशे वर्षांपूर्वीची १५ मंदिरे अस्तित्वात आहेत. या सरोवराचे क्षेत्रफळ १.१३ चौ.कि.मी. इतके असून सरासरी खोली १३७ मीटर आहे. अमेरिकेतील अनेक संस्थांनी येथे येऊन संशोधन केलेले आहे.


७) दौलताबादचा किल्ला :


हा गड यादवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे. देवगिरी किल्ल्याला २८ नोव्हेंबर १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मेंढातोफ होय. या तोफेत एकाच माऱ्यात पूर्ण गड उध्वस्त करण्याची क्षमता होती. ती तोफ पंचधातूंपासून बनवलेली आहे. प्राचीन काळातील गड म्हणून हा गड प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावाजला गेला आहे. या गडावर लोक भरपूर प्रमाणात भेट देतात.


General Knowledge



● पर्यटनासंबंधी दिल्ली सरकारने कोणते मोबाईल ॲप तयार केले?

उत्तर : देखो मेरी दिल्ली


●  कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने गुरु ग्रहाच्या सभोवताली फिरणाऱ्या ‘ट्रोजन’ नामक लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ‘ल्युसी’ नामक पहिले अंतराळयान तयार केले?

उत्तर : NASA


● कोणती व्यक्ती ट्युनिशिया देशाची पहिली महिला पंतप्रधान ठरली?

उत्तर : नजला बौडेन रोमधाने


● कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस’ साजरा करतात?

उत्तर : ०१ ऑक्टोबर


●  कोणत्या व्यक्तीने २९ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या ३८ व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद भूषविले?

उत्तर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी


● कोण IFSC येथे ‘सस्टेनेबल फायनॅन्स हब’च्या स्थापनेसंदर्भात शिफारस प्राप्त करण्यासाठी नेमेलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष असतील?

उत्तर : सी. के. मिश्रा


● कोणत्या व्यक्तीची नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) याच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली?

उत्तर : पद्मजा चुंडुरू


●  खालीलपैकी कोण "क्रॉनिकल्स फ्रॉम द लँड ऑफ द हॅप्पीएस्ट पीपल ऑन अर्थ" हे शीर्षक दिलेल्या कादंबरीचे लेखक आहे?

उत्तर : वोले सोयिंका

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1. आहारात —– जीवनसत्वाच्या आधीक्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा येतो.

 अ जीवनसत्व
 ब जीवनसत्व
 क जीवनसत्व
 ड जीवनसत्व
उत्तर : अ जीवनसत्व

2. एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून, त्यांच्या पायांची संख्या 144 आहेत तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?

 28, 22
 24, 26
 22, 28
 26, 24
उत्तर : 28, 22

3. संपृक्त मेदघटकांच्या अतिसेवनाची परिणती म्हणजे —– होय.

 अशक्तता
 लठ्ठपणा
 ताजेपणा
 वजन कमी होणे
उत्तर : लठ्ठपणा

4. 0.0049 या संख्येचा वर्गमुळाचा घन किती?

 0.000343
 0.00343
 0.0343
 0.343
उत्तर : 0.000343

5. एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज 50/7 असेल, तर ती संख्या कोणती?

 3
 6
 7
 14
उत्तर : 7

6. शुद्ध लोखंडाचा प्रकार म्हणजे —– होय.

 ओतिव लोखंड
 बीड लोखंड
 घडीव लोखंड
 वितळलेले लोखंड
उत्तर : घडीव लोखंड

7. एका 8 सें.मी. त्रिज्या असलेल्या शिशाच्या गोळ्यास वितळवून 1 सें.मी. त्रिज्या असलेले लहान लहान गोल तयार केल्यास असे किती गोल तयार होतील?

 256
 64
 712
 512
उत्तर : 512

8. महितीचा अधिकार महाराष्ट्रातील नागरिकांना —— यांनी केलेल्या आंदोलनामुळे मिळाला.

 विवेक पंडित
 डॉ. बाबा आढाव
 अण्णा हजारे
 कुमार केतकर
उत्तर : अण्णा हजारे

9. लाल बहादुर शास्त्री अवार्ड फॉर एक्सलन्स इन पब्लिक अॅडमिनिश्ट्रेशन (Lal Bahadur Shastri Award For Excellence in Public Administration) हा पुरस्कार कुणाला मिळाला?

 जुईली रफिक
 इला भट
 शिवानी ठाकूर
 योगिता शिवा
उत्तर : इला भट

10. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोणत्या शहरात आहे?

 पुणे
 नाशिक
 नागपुर
 मुंबई
उत्तर : नाशिक

11. राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस (26 जुलै) —— या नावाने साजरा करण्यात येतो.

 राष्ट्रीय एकात्मता दिन
 महराष्ट्र दिन
 सामाजिक न्याय दिन
 कामगार दिन
उत्तर : सामाजिक न्याय दिन

12. संसदेने नुकत्याच मंजूर केलेल्या घटनादूरस्ती विधेयकानुसार किती देशातील भारतीय वंशाच्या नागरिकांना दुहेरी नागरिकत्वचा फायदा मिळणार आहे?

 4
 16
 12
 5
उत्तर : 16

13. देशातील पहिली 540 मेगावॉट वीजनिर्मिती करणारी अनुभट्टी कोठे सुरू करण्यात आली?

 रावतभाटा
 तारापुर
 काक्रापार
 श्रीहरीकोटा
उत्तर : तारापुर

14. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात —– प्रकारची मृदा आढळते.

 क्षारयुक्त व अल्कली
 रेगुर
 जांभी
 दलदलयुक्त
उत्तर : जांभी

15. इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?

 उदारमतवादी पक्ष
 स्वराज्य पक्ष
 काँग्रेस पक्ष
 मुस्लिम लीग
उत्तर : स्वराज्य पक्ष

16. ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना कोणी केली?

 स्वामी दयानंद
 स्वामी विवेकानंद
 अॅनी बेझंट
 केशवचंद्र सेन
उत्तर : अॅनी बेझंट

17. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?

 इस्लामाबाद
 ढाका
 अलाहाबाद
 अलिगड
उत्तर : ढाका

18. स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली?

 1895
 1896
 1897
 1898
उत्तर : 1897

19. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

 डॉ. बी.आर. आंबेडकर
 वि.रा. शिंदे
 महात्मा जोतिबा फुले
 भास्करराव जाधव
उत्तर : वि.रा. शिंदे

20. हिमालय हा —– आहे.

 अर्वाचीन वलीपर्वत (घडीचा पर्वत)
 अवशिष्ट पर्वत
 ठोकळ्यांचा पर्वत
 ज्वालामुखीय पर्वत
उत्तर : अर्वाचीन वलीपर्वत (घडीचा पर्वत)

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...