११ सप्टेंबर २०२१

13 वी BRICS शिखर परिषद.



🌺2021 या वर्षी BRICS समूहाच्या भारताच्या अध्यक्षतेचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आभासी स्वरूपातील 13 व्या BRICS शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.


🌺शिखर परिषदेची संकल्पना - BRICS@15 : सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-BRICS सहकार्य (BRICS@15: Intra-BRICS cooperation for continuity, consolidation and consensus)


🎗ठळक बाबी...


🌺बठकीला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोलेसनारो, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सायरिल रामाफोसा उपस्थित राहणार आहेत.


🌺आपल्या अध्यक्षतेच्या काळासाठी भारताने चार प्राधान्यक्षेत्रांची रूपरेषा मांडली होती. त्यात बहुक्षेत्रीय प्रणालीतील सुधारणा, दहशतवाद विरोध, एसडीजी शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञान साधनांचा वापर करणे आणि व्यक्तींमधील परस्पर संबंध दृढ करण्यासाठी अदलाबदल कार्यक्रम या बाबींचा समावेश आहे. या क्षेत्रांव्यतिरिक्त कोविड-19 महामारीच्या प्रभावावर आणि सध्याच्या अन्य जागतिक समस्यांवर देखील विचारांची देवाण-घेवाण देखील करण्यात येणार आहे.

यापूर्वी BRICS समूहाच्या भारतीय अध्यक्षपदाच्या दरम्यान BRICS समूहाचा पंधरावा वर्धापनदिन आहे.


🎗BRICS समूहाविषयी..


🌺BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले. BRICS देशांमधले द्विपक्षीय संबंध प्रामुख्याने हस्तक्षेप-मुक्त, समानता आणि परस्पर लाभाच्या आधारे प्रस्थापित केले जातात.


🌺रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021



🔰सवच्छ भारत अभियान (टप्पा-2) अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण, 2021” या उपक्रमाचा 9 सप्टेंबर 2021 रोजी प्रारंभ करण्यात येणार आहे. 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' चा एक भाग म्हणून, देशभरातील हागणदारी मुक्त उपक्रम आणि परिणामांना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण उपक्रमाने समर्थन देण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे.


🔰सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून, गावे, जिल्हे आणि राज्ये यांना प्रमुख मापदंडांच्या आधारे क्रमवारीत स्थान दिले जाईल.


🔰सवच्छ सर्वेक्षण ग्रामीण उपक्रमाचा भाग म्हणून, देशभरातील 698 जिल्ह्यांमधील 17,475 गावांचा समावेश केला जाईल. या गावांमधील शाळा, अंगणवाड्या, सार्वजनिक आरोग्य केंद्रे, हाट/बाजार/धार्मिक स्थळे या 87,250 सार्वजनिक स्थळांना सर्वेक्षणासाठी भेट देण्यात येईल. सुमारे 1,74,750 कुटुंबांची स्वच्छ भारत अभियान संबंधित समस्यांवरील प्रतिसादासाठी मुलाखत घेतली जाईल. तसेच, यासाठी विकसित अॅप्लिकेशनचा वापर करून स्वच्छताविषयक समस्यांवर ऑनलाईन अभिप्राय देण्यासाठी नागरिकांना एकत्र आणले जाईल.


🔰सवच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 उपक्रमाच्या विविध घटकांचे मूल्यांकन खालीलप्रमाणे आहे:


🔰सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे थेट निरीक्षण – 30 टक्के

सामान्य नागरिक, ग्रामीण स्तरावरील प्रमुख प्रभावी व्यक्ती आणि मोबाईल अॅपद्वारे नागरिकांकडून ऑनलाइन अभिप्रायासह नागरिकांच्या प्रतिक्रिया – 35 टक्के

स्वच्छता संबंधित मापदंडांवर सेवा स्तरावरील प्रगती – 35 टक्के


🔴पार्श्वभूमी..


🔰पयजल आणि स्वच्छता विभागाने "स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (SSG) 2018 आणि 2019 या उपक्रमांचे आयोजन केले होते. प्रमुख गुणवत्ता आणि संख्यात्मक मापदंडांसंबंधित त्यांच्या कामगिरीच्या आधारे जिल्ह्यांच्या क्रमवारीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी एक सविस्तर शिष्टाचार / प्रोटोकॉल विकसित करण्यात आला आहे.

आयुष मंत्रालयाची "आयुष आपके द्वार" मोहीम..



🔰भारत सरकारच्या आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी) मंत्रालयाच्यावतीने 3 सप्‍टेंबर 2021 रोजी देशभरातील 45 हून अधिक ठिकाणांहून "आयुष आपके द्वार" या नावाने एक राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्यात आली आहे.


🔰एका वर्षात देशभरातील 75 लाख कुटुंबांना औषधी वनस्पतींची रोपे वितरित करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. औषधी वनस्पतींमध्ये तेजपत्ता, स्टीव्हिया, अशोक, जटामांसी, गुळवेल/गुडुची, अश्वगंधा, कुमारी, शतावरी, लेमनग्रास, गुग्गुळ, तुळस, सर्पगंधा, कलमेघ, ब्राह्मी आणि आवळा यांचा समावेश आहे.


🔴ठळक बाबी..


🔰आयुष विभागाचे राज्यमंत्री डॉ मुंजापारा महेंद्रभाई यांनी कर्मचाऱ्यांना औषधी वनस्पतीच्या रोपट्यांचे वाटप करून नवी दिल्लीतील आयुष भवनातून मोहिमेचा शुभारंभ केला. उद्घाटनपर समारंभात एकूण 21 राज्ये सहभागी होत असून 2 लक्षाहून अधिक रोपे वितरित केली गेली.

केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबईतून या मोहिमेचा प्रारंभ केला. सोनोवाल यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्याचा एक भाग म्हणून मुंबई पोर्ट ट्रस्टच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला होता.


🔰आयुष मंत्रालयाने सुरू केलेल्या राष्ट्रीय मोहिमेचा हा एक भाग होता. या प्रसंगी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (NMPB) आणि आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्र (CCRA), आयुष मंत्रालय देखील या कार्यक्रमाचा भाग होते. NMPB संस्थेने औषधी रोपांचे वितरण केले आणि CCRA संस्थेने आयुर्वेदिक औषधांचे नागरिकांमध्ये वाटप केले.

SIMBEX 2021’: भारत आणि सिंगापूर या देशांची द्विपक्षीय संयुक्त सागरी कवायत..



☑️सिंगापूर आणि भारत या देशांच्या नौदलांमधील 28 व्या ‘SIMBEX’ ही सागरी द्विपक्षीय कवायत 02 सप्टेंबर ते 04 सप्टेंबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.


☑️दक्षिण चीन सागरातील दक्षिण भागात सिंगापूर नौदलाने या युद्धसरावाचे आयोजन केले होते.


☑️या युद्धाभ्यासात, भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व INS रणविजय ही गाइडेड क्षेपणास्त्र विनाशिका युद्धनौका आणि या जहाजावरील हेलीकॉप्टर, ASW कर्वेट INS किल्तान आणि कोर्वेट INS कोरा या क्षेपणास्त्र संहारक युद्धनौका, तसेच P8I हे नौदलाचे लांब टप्प्याचे गस्त घालणारे विमान यांनी केले.


🔴पार्श्वभूमी...


☑️1994 साली सुरु झालेला SIMBEX नौ-युद्धाभ्यास भारतीय नौदलाच्या इतर कोणत्याही परकीय नौदलासोबत चालणाऱ्या द्विपक्षीय सराव सत्रापैकी सर्वात जास्त काळ आणि सातत्याने सुरू असलेला युद्धाभ्यास आहे.


☑️एकूण भारत-सिंगापूर द्विपक्षीय संबधांमध्ये द्विपक्षीय संरक्षणविषयक संबंधाना विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये पारंपारिक लष्करी देवाणघेवाण ते HADR व सायबर सुरक्षा या स्तरापर्यंत, परस्पर सहकार्य केले जाते. दोनही नौदलांना परस्परांच्या सागरी माहिती फ्युजन केंद्रात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. पाणबुडी बचावकार्यात एकमेकांना सहकार्य करण्याचा करारही दोनही नौदलांनी नुकताच केला आहे.


🅾️सिंगापूर देश..


☑️सिंगापूर हे मले द्वीपकल्पाच्या दक्षिणेस, हिंद महासागरात आग्नेय आशियातील श्रीमंत व पर्यटकांचे आकर्षण असलेले एक द्वीप प्रजासत्ताक आहे. सिंगापूर सिटी हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. सिंगापूर डॉलर हे देशाचे अधिकृत चलन आहे.

दोहा येथे भारताची तालिबानसोबत प्रत्यक्ष बैठक झाली..



🍂अलीकडेच अफगाणिस्तानवर ताबा मिळविलेल्या तालिबान या दहशतवादी गटाचे प्रतिनिधी आणि भारतीय राजदूत यांच्यात कतार देशाची राजधानी दोहा येथे प्रत्यक्ष बैठक झाली.


🍂भारताचे राजदूत दिपक मित्तल यांची दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख अब्बास स्टानेकझाई यांच्यासोबत ही बैठक झाली. चर्चा सकारात्मक झाल्याचे केंद्रीय विदेश कार्ये मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.


🍂बठकीत अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. तसेच अफगाणिस्तानातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना सुखरुपरित्या मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करण्याबाबत तालिबानसोबत चर्चा झाली आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा यापुढे दहशतवादासाठी वापर होण्याच्या शक्यतेचा मुद्दा भारताने चर्चेत उपस्थित केला.


🌻पार्श्वभूमी..


🍂ऑगस्ट 2021 या महिन्यात तालिबान या दहशतवादी गटाने अफगाणिस्तान देशावर आपला ताबा मिळवला. तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळविताच भारताने “ऑपरेशन देवी शक्ती” या बचाव मोहीमेच्या अंतर्गत दुसऱ्या दिवशीपासून विमानांद्वारे भारतीयांना सुरक्षित मायदेशात परत आणत आहे. या मोहिमेसाठी कार्यात भारतीय हवाई दलाची आणि एअर इंडिया या विमानसेवा कंपनीची विमाने अखंडपणे कार्य करीत आहे.


🌻अफगाणिस्तान देश..


🍂अफगाणिस्तान हा नैर्ऋत आशियातील भूमिवेष्टित देश आहे. देशाच्या उत्तरेस रशिया, ईशान्येस चीन, पूर्वेस भारत व पाकिस्तान, दक्षिणेस पाकिस्तान व पश्चिमेस इराण हे देश आहेत. काबूल हे राजधानीचे शहर असून मझर-इ-शरीफ, कंदाहार ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. ‘अफगाणी’ हे तेथील चलनी नाणे आहे.

पथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार



1. व्दिपकल्प - 

    एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.


2. भूशीर -

    व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.


3. खंडांतर्गत समुद्र - 

    मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.


4. बेट -

     एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.


5. समुद्रधुनी - 

    काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.


6. संयोगभूमी - 

     दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.


7. आखात - 

    उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.


8. खाडी - 

      आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.


9. समुद्र किंवा सागर - 

     महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.


उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र


10. उपसागर -

     खार्‍या पाण्याच्या ज्या जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर

जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ शहराचा समावेश



🔸जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. 


🔹तर, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.


🔸 द इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने हे सर्वेक्षण केलं होतं. जगभरातल्या ६० शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. 


🔹सरक्षित शहरं निवडण्यासाठी ७६ निकषांची पुर्तता करण्याची अट होती. 


🔸यामध्ये डिजीटल, हेल्थ, पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि संबंधित शहरात माणूस वैयक्तिकरित्या किती सुरक्षित आहे, या सर्व गोष्टींचा समावेश होता


🔹भारताची राजधानी दिल्लीसह मुंबईचे या यादीत नाव आहे. यामध्ये दिल्ली ६० पैकी ४८व्या क्रमांकावर तर मुंबई ५०व्या क्रमांकावर आहे.


🔸 दिल्ली आणि मुंबईच्या मध्ये जोहान्सबर्ग आणि रियाध ही दोन शहरं आहेत. 


🔹मबई दिल्लीपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं तरीही वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतीत दिल्ली ५२.८ पॉइंट्ससह ४१व्या क्रमांकावर आहे.


🔸 तर मुंबई ४८.२ पॉइंट्ससह ५०व्या क्रमांकावर आहे.

महिलां विषयक कायदे


1. सतीबंदी कायदा -1829


2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856


3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866


4.भारतीय घटस्फोट कायदा -1869


5. मानवी हक्क संरक्षण कायदा -1993


6. आनंदी विवाह कायदा -1909


7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986


8. विशेष विवाह -1954


9. हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956


10. विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959


11.अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956


12. वैद्यकी व गर्भपात कायदा -1929


13. हुंडाप्रतिबंधक कायदा -1929


14. बालविवाह निर्बंध कायदा -1929


15. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005


16. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005


17. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961


18. समान वेतन कायदा -1976


19. बालकामगार कायदा -1980


20. अपंग व्यक्ती कायदा -1995


21. मानसिक आरोग्य कायदा -1987


22. कुटुंब न्यायालय कायदा - 1984


23. राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990


24. माहिती अधिकार कायदा -2005


25. बालन्याय कायदा - 2000


26. भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959


27. अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960


28. हिंदू विवाह कायदा -1955


29. कर्मचारी विमा योजना -1952


30. प्रसूती सुधारणा कायदा -1961


31. अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा - 1979

०३ सप्टेंबर २०२१

उद्या आपली पूर्व परीक्षा:-

मित्रांनो उद्या तुम्हासर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. तुम्ही वर्षभर जी मेहनत केली त्याची कसोटी उद्या लागणार आहे. काही महत्वाच्या बाबी तुम्हाला सांगतो.

1. आज रात्री जरा हलके जेवण करा. थोडा भात खाल्ला तर छान झोप येईल.नॉनव्हेज शक्यतो टाळा.

2. रात्री उगाच जगण्याचा प्रयत्न करू नका. झोप येत नसेल तर आपल्या श्वासावर लक्ष द्या. श्वास कसा जातोय व कसा बाहेर येतोय हे बघा झोप लागेल.

3. झोपताना आपल्या आई बाबा ना भाऊ बहीण यान समवेत बोलून घ्या हलके वाटेल.

4. सर्व कागदपत्रे , पेन, पेन्सिल, एक पाणी बॉटल, दोन रूमाल वगैरे सर्व बाबी बघून घ्या.

5. सकाळी जाताना परत आपली बॅग बघून घ्या. सर्व सामान त्यात नीट ठेवले आहेत का? एखादं आवडीचं चॉकलेट जवळ ठेवा आणि पेपर सुरू होण्यापूर्वी खावा. थोडं डोकं जोरात चालेल आणि अस्वस्थ वाटणार नाही.

6. परीक्षा केंद्र जवळ 1 ते 1.30 तास आधी पोहचाल असेल निघा. आज आणि उद्या शक्यतो गाणी ऐकायचं टाळा. डोकं शांत राहू द्या.

7. परीक्षा केंद्रावर गेल्यावर नेहमी प्रमाणे आपले no. बघून घ्या.आणि निश्चिती करून घ्या आपण बरोबर त्याच ठिकाणी आहोत का म्हणून.

8. परीक्षा केंद्रावर गेल्यावर अथवा जाताना काहीही आठवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला ते आठवणार नाही हे मला माहीत आहे. आणि काळजी करायचं देखील कारण नाही आहे कारण आपली परीक्षा objective आहे. पर्याय पाहिले की आठवतं सगळं. वाटल्यास चालू घडामोडीच पुस्तक वाचत बसा.

9. पेपर ला गेल्यावर सीट no बघून नीट बसा. उत्तरतालिका हातात आल्यावर  आपला सीट no. नीट भरून गोल करून घ्या. 3 वेळेस परत चेक करून घ्या.

10. पेपर कोणत्या क्रमाने सोडविणार आहे हे निश्चित करून घ्या. गणित बुध्दिमत्ता आधी की नंतर हे ठरवून घ्या आत्ताच. तसंच गोल रंगवण्याबाबतही आताच धोरण ठरवून घ्या. पुन्हा गैरसोय नको.

11. सर्वात महत्त्वाचे टीप:-
    पेपर च्या ठिकाणी पोहोचल्यानंतर कोणाशीही काहीही बडबड करू नका. केलीत तर तुमचे apti reasoning चे मार्क कमी झाले म्हणून समजा😅. शक्यतो एकटे राहा आणि वर्गात गेले असाल तर त्या बेंच वर  डोकं टेकवून पडून राहा. मात्र हलकं काही तरी एकटे जाऊन खाऊन घ्या. उपाशी राहू नका.

12. मनातील भीतीही तेव्हाच नाहीशी होते जेव्हा आपल्या क्षमतांची आपल्याला जाणीव असते. आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं त्यांना  हरवण्यासाठी नेहमी तयार राहायचं असतं. जन्म सगळ्यांचा जिंकण्यासाठीच झालेला असतो. फक्त जिकायचं कसं? हे ज्याचं तो ठरवतो.

तुम्हा सर्वांना उद्याच्या पेपर साठी खूप खूप शुभेच्छा... तुमचे प्रामाणिक प्रयत्न नक्की कामाला येतील स्वतःवर विश्वास ठेवा. नकारार्थी विचार करू नका.

परत एकदा मनःपूर्वक सर्वाना शुभेच्छा!!💐💐💐💐

२९ ऑगस्ट २०२१

चार्टर अ‍ॅक्ट १८३३

🍀  ह्या कायद्यान्वये कंपनीचा कारभार हळूहळू आटोपता घेण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले गेले. कंपनीचे चीनबरोबर व्यापाराचे सर्वाधिकार काढून घेण्यात आले.

🍀  कंपनीच्या प्रमुखाला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल ऐवजी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा हुद्दा देण्यात आला. कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण हिंदुस्थानभर करण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला.

🍀   गव्हर्नर जनरलच्या समितीमध्ये चौथ्या सभासदाची भर घालण्यात आली. त्यासाठी पहिली नेमणूक लॉर्ड मेकॉले या अधिकाऱ्याची करण्यात आली.

🍀   मद्रास आणि मुंबई राज्य गव्हर्नर जनरलच्या अखत्यारीखाली आले. याच कायद्याने आग्रा हा नवीन विभाग अस्तित्वात आला.

🍀  कोणाही भारतीयाला त्याच्या धर्म, जन्मस्थान, वर्ण वा वंश ह्या कारणावरून नोकरीची संधी नाकारण्यात येऊ नये असा नियम जाहीर झाला.

🍀   ब्रिटिश नागरिकांना भारतात मालमत्ता खरेदी करण्याचे व कायम नागरिकत्वाचे अधिकार मिळाले.

चार्टर अ‍ॅक्ट १७९३

🍀  चार्टर अ‍ॅक्ट १७९३ हा ब्रिटिश संसदेने १७९३मध्ये पारित केलेला कायदा होता.

🍀   या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीला भारतात राज्यकारभारासाठी २० वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. समिती सदस्यांनी दिलेल्या सूचना नाकारण्याचा अधिकार गव्हर्नरला मिळाला.

                    🍃🍃🍃🍃🍃

रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३

🍀  रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ हा ब्रिटिश भारतातील एक कायदा असून तो इ.स. १७७४ ते इ.स. १७८४ अशी दहा वर्षे कार्यान्वित होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश पार्लमेंटकडे कर्ज मिळण्यासाठी विनंती केली.

🍀   लॉर्ड नॉर्थ हा त्यावेळी इंग्लंडचा मुख्य प्रधान होता. त्याने पार्लमेंटमध्ये एक ठराव करून कंपनीने हिंदुस्थानातील व्यापारामुळे जो फायदा झाला असेल त्यावर पार्लमेंटची सत्ता आहे असे ठरवले व कंपनीला कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी पार्लमेंटमध्ये एक कायदा पास करून घेतला.

🍀   इ.स. १७७३ सालीं नॉर्थने कंपनीच्या राज्यकारभारासंबंधी जो कायदा केला त्याला रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ असे म्हणतात.

🍀   ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा करण्यात आला. 

🍀  बंगालच्या राज्यपालांना गव्हर्नर जनरल ऑफ कलकत्ता हा दर्जा देण्यात आला. मद्रास व मुंबईचे राज्यपाल त्यांच्या अमलाखाली आले.

🍀   कंपनीवर देखरेख ठेवण्याच्या कामात मदत करण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या हाताखाली चार सभासदांची एक समिती नेमण्यात आली. कलकत्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली.

🍀  तिथे मुख्य न्यायाधीश आणि अन्य तीन न्यायाधीशांची नेमणूक झाली. हे न्यायाधीश गव्हर्नर जनरलच्या अधिकाराखाली येत नसत. हा कायदा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठीच बनवलेला होता. परंतु ह्या कायद्यामध्ये अनेक त्रुटी होत्या.

🍀   या कायद्यामुळे गव्हर्नर जनरलला संपूर्णत: समितीच्या सदस्यांवर अवलंबून रहावे लागे. त्याला प्रत्यक्षात निर्णय घ्यायचे काहीही अधिकार नव्हते.

🍀  अमेंडिंग अ‍ॅक्ट १७८१द्वारे यात काही सुधारणा करण्यात आल्या

विविध उत्पादन क्षेत्रातील क्रांतीसाठी संज्ञा:

1. हरित क्रांती :- अन्नधान्य उत्पादन
2. निल क्रांती :- मत्स्य उत्पादन
3. पीत क्रांती :- तेलबिया उत्पादन
4. सुवर्ण क्रांती :- फळे उत्पादनात वाढ
5. सुवर्ण तंतू क्रांती :- ताग उत्पादन
6. कृष्ण क्रांती :- पेट्रोलियम क्षेत्र
7. करडी क्रांती :- खत उत्पादन
8. धवल क्रांती :- दुग्ध उत्पादन
9. गुलाबी क्रांती :- कोळंबी/कांदा/औषध/झिंगे उत्पादन
10. चंदेरी क्रांती:- अंडी
11. चंदेरी तंतू :- कापूस
12. अमृत क्रांती :- नद्या जोड प्रकल्प
13. लाल क्रांती :- टोमॅटो/मांस
14. तपकिरी क्रांती :- कोको
15. गोल क्रांती :- बटाटे
16. नारंगी :- युक्रेन मधील क्रांती
17. इंद्रधनुष्य :- कृषी क्षेत्रातील सर्वंकष विकास.

मार्गदर्शक तत्वांची उपयुक्ततता :

📌डॉ. आंबेडकर - राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये. ही तत्वे अमलात न आणणाऱ्या सरकारला न्यायालयांमध्ये नसला तरी जनतेच्या दरबारात जाब द्यावाच लागेल.

📌B.N. राव - राज्यसंस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे, त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.

.📌N.M. सिंघवी - घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतूदी.

📌M.C. छगला (माजी सरन्यायाधीश) - मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वी वरील स्वर्ग बनेल. त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.

📌M.C. सेटलवाड - न्यायालयास उपयुक्त beacon-light व प्रस्ताविकेचे विस्तारण करणारी तत्वे.

📌ग्रॅनव्हिल ऑस्टिन - मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीद्वारे देशातील सामाजिक क्रांती ची उद्दिष्टे साध्य होतील.

📌ईवोर जेनिंग्ज - Pious aspiration.

📌अनंत नारायण - अ-वादयोग्य आणि अमूर्त.

📌 ग्लॅडहिल - "इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना.'

📌K.V.राव - “या मागील खरा हेतू भारताला पोलिस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे."

🎯मार्गदर्शक तत्वांवरील टिका :

📌K.T. शहा - Pious Superfluities, बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक.

📌नसिरोद्दीन - नववर्षाचा निश्चय जो 2 जानेवारीला मोडला जातो.

📌T.T. कृष्णमाचारी - भावनांची खरी केराची टोपली.

📌K.C. व्हेअर - कंटाळवाणा नैतिक उपदेश, जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानावयाचे ठरले तरीही
त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकिर्ती प्राप्त होईल.

📌K. संथानम - या तत्वांनी केंद्र विरुद्ध राज्य, राष्ट्रपती विरुद्ध पंतप्रधान, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा घटनात्मक संघर्ष निर्माण केला.

प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल

🛑 असमपृष्ठरज्जू प्राणी 🛑

🔶प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.

🔶पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा

🔶 सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन

🔶 प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म

🔶 नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म

🔶 अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस

🔶 आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी

🔶 मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय

🔶 इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर

🔶हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती...

🔶 मानवी डोक्याचे वजन ?
→   १४०० ग्रॅम.
 
🔶 सामान्य रक्तदाब ?
→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची.

🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
→   न्यूरॉन.

🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?
→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.

🔶 शरिरातील एकूण रक्त ?
→   ५ ते ६ लीटर.
 
🔶सर्वात लहान हाड ?
→   स्टेटस ( कानाचे हाड )

🔶 सर्वात मोठे हाड ?
→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )

🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→   १२० दिवस.

🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.

🔶पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→   २ ते ५ दिवस.

🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.

🔶हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.

🔶 ह्रदयाचे सामान्य ठोके ?
→   ७२ ते ७५ प्रति मिनिट.

🔶 नाडी दर (पल्स रेट) ?
→   ७२ प्रतिमिनिट.

🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
→   थायरॉईड ग्रंथी.

🔶 सर्वात मोठा स्नायू ?
→   ग्लुटियस म्याक्सीमस.

🔶एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
→   ६३९.

🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
→   मोनोसाईटस - ३ ते ८%.
→   बेसोफिल्स - ०.५%.
→   लिम्फोसाईटस - २० ते २५%.
→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.

🔶शरीराचे तापमान ?
→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.

🔶प्रौढांमधील दातांची संख्या ?
→   ३२.

🔶लहान मुलांमधील दातांची संख्या ?
→   २० दूधाचे दात.

🔶 सर्वात पातळ त्वचा ?
→   पापणी (कंजक्टायव्हा)

२८ ऑगस्ट २०२१

महाराष्ट्र पोलिस भरती - महत्त्वाचे प्रश्न

(०१) राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर- २४ डिसेंबर.

(०२) सायकलचा शोध कोणी लावला ?
उत्तर- मॅकमिलन.

(०३) 'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?
उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.

(०४) भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?
उत्तर- १९२० मध्ये.

(०५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?
उत्तर- सोलापूर.

(०६) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
उत्तर- वड.

(०७) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.

(०८) कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?
उत्तर- विंबलडन.

(०९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?
उत्तर- २० मार्च १९२७.

(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?
उत्तर- C₁₂H₂₂O₁₁ 

घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी



👉घटने मध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख नाही


👉धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही


👉समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही


👉घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही


👉घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत


👉घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही


👉घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही


👉घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही


👉घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही


👉ससदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही


👉उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत


👉पतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही


👉ससदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही


👉घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही


👉कबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता


👉कबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही


👉महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही


👉राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही


👉घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही


👉घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही


👉वहीप्स चा घटनेत उल्लेख नाही

8

👉CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही


👉सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही


👉नयायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही


👉घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही


👉उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही


👉नयायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही


👉उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही


👉घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही


👉महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही


थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या


● जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ


● मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ


● मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ


● आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे


● घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर


● मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे


● लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख


● विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख


● समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले


● भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय


● नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय


● आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय


● भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय


● हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद


● आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी


● भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे


● भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी


● पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे


● नामदार : गोपाळ कृष्णा गोखले


● हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले

 प्रश्न :-१- हिवाळी(शीतकालीन) आॕलिम्पिक स्पर्धांची सुरवात कोणत्या वर्षापासून  झाली ?


१) १८९६

२) १९४८

३) १९२८

४) १९२४✅

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-२- आॕलिम्पिक म्युजियम कोठे आहे ?


 १) चीन

२) स्वित्झर्लंड✅

३) रशिया

४) यूरोप

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-३- 'बनाना किक'हा शब्द कोणत्या खेळा संबंधित आहे ?


 १) टेबल टेनिस

२) व्हाॕकी

३) फुटबाॕल✅

४) कबड्डी

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-४- 'ग्राउंड स्ट्रोक' हा शब्द कोणत्या खेळा संबंधित आहे ?


१) टेबल टेनिस✅

२) व्हाॕकी

३) डाॕज बाॕल

४) बेसबाॕल

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-५- 'अमेरिका कप'हा  कोणत्या खेळा संबंधितआहे ?


१) टेबल टेनिस

२) व्हाॕली बाॕल

३) बास्केट बाॕल✅

४) बेसबाॕल

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-६- 'चायना कप' हा  कोणत्या खेळा संबंधितआहे ?


१) जिम्नास्टिक✅

२) पोलो

३) गोल्फ

४) शतरंज

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-७- गोळा फेक मैदानामध्ये फेक प्रदेशाचा वर्तुळातील कोण किती अंश असतो ?


१) ३५.६५°

२) ४०°

३) ३४.९२°✅

४) ४५°

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-८- सवाई मानसिंह स्टेडियम कोठे आहे ?


१) जयपूर✅

२) कोलकत्ता

३) मुंबई

४) विशाखापट्टन

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-९- अष्टांग योग चे प्रथम अंग कोणते आहे ?


१) आसन

२) प्राणायाम

३) नियम

४) यम✅

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-१०- 'अंजली भागवत'ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?


 १) टेनिस

२) जिम्नास्टिक

३) रायफल शुटिंग✅

४) अॕथेलॕटिक्स

लष्करी सराव(समविष्ट देश ):-


१. नसीम अल बहर:- भारत व ओमान
२. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया
३. वरुणा :-भारत व फ्रान्स
४. SIMBEX:- भारत व सिंगापूर
५. सूर्यकिरण:- भारत व नेपाळ
६. AL Nagh Li:- भारत व ओमान
७. युद्ध अभ्यास :- भारत व अमेरिका
८. समप्रीती-७ :- भारत व बांगलादेश
९. मित्र-शक्ती :- भारत व श्रीलंका
१०. कोकण: भारत व ब्रिटन
११. इंद्र:- भारत व रशिया
१२. मलबार :- भारत,युएसए,जपान व ऑस्ट्रेलिया
१३. सिल्नेक्स :- भारत व श्रीलंका
१४. अजेय वारियर :- भारत व युके.
१५. वज्र प्रहार :- भारत व अमेरिका
१६. शीन्यू मैत्री :- भारत व जपान
१७. गरुडा: भारत व फ्रान्स
१८. हॅड अॅड हॅड:- भारत व चीन
१९. IMBEX:- भारत व म्यानमार
२०. एकुवेरीन:- भारत व मालदीव
२१. मिलन :- भारतासह ९ देश
२२. JIMEx:- भारत व जपान
२३. CORPAT:- भारत व बांगलादेश

भारतातील सर्वात मोठे


Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)?
-- राजस्थान

Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)?
-- उत्तरप्रदेश

Q3) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या शहर?
-- मुंबई ( महाराष्ट्र )

Q4) भारतातील सर्वात मोठा किल्ला?
-- आग्रा

Q5) भारतातील सर्वात मोठा दरवाजा?
-- बुलंद दरवाजा ( फत्तेपुर सिक्रि )

Q6) भारतातील सर्वात मोठे वाळवंट?
-- थर ( राजस्थान )

Q7) भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान?
-- भारतरत्न

Q8) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान?
-- परमवीर चक्र

Q9) भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ)?
--रामेश्वर मंदिर

Q10) भारतातील सर्वात मोठे चर्च?
-- सेंट कथेड्रल, गोवा

Q11) भारतातील सर्वात मोठा गुरुद्वार?
-- सुवर्णमंदिर ,अमृतसर

Q12) भारतातील सर्वात मोठी म्हशजीद?
-- जामा म्हशजीद

Q13) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर?
-- चिलका सरोवर ( ओरिसा )

२७ ऑगस्ट २०२१

 🔹महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?


A. 200.60 लाख हेक्टर

B. 207.60 लाख हेक्टर

C. 307.70 लाख हेक्टर✔️✔️

D. 318.60 लाख हेक्टर


🔹कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__________ कि.मी. ने कमी झाले. 


A. 513 ✔️✔️

B. 213

C. 102

D. 302


🔹 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?


A. तेरणा

B. प्रवरा

C. मांजरा

D. भातसा ✔️✔️


🔹___________ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.


A. कांडला ✔️✔️

B. कोची

C. मांडवी

D. वरीलपैकी नाही


🔹जागतिक वारसा शिल्पस्थानात _____ या लेणीची नोंद केलेली आहे. 


A. अजंठा लेणी ✔️✔️

B. कार्ले लेणी

C. पितळखोरा लेणी

D. बेडसा लेणी


🔹खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?


A. आंध्र प्रदेश ✔️✔️

B. महाराष्ट्

C. मध्य प्रदेश

D. गुजरात


🔹गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?


A. अकोला

B. बुलढाणा

C. धुळे ✔️✔️

D. ठाणे


🔹2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात ________ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.


A. नाशिक

B. औरंगाबाद

C. पुणे ✔️✔️

D. सोलापूर


🔹महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?


A. सह्याद्रि पर्वत ✔️✔️

B. सातपुडा पर्वत

C. निलगिरी पर्वत

D. अरवली पर्वत


🔹महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _____ नावाने ओळखली जाते.


A. सायरस

B. ध्रुव

C. पूर्णिमा

D. अप्सरा✔️✔️


१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......

१) वाढते

२) मंदावते✅✅✅

३) कमी होते

४) समान राहते


२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......

१) साखर✅✅✅

२)जीवनसत्वे

३) प्रथिने

४) पाणी


४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.

१) पाणी✅✅✅

२) कार्बन डाय ऑक्साईड 

३) हरित द्रव्य

४) नायट्रोजन 


५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?

१) जीवाणू

२) मासा

३) हिरव्या वनस्पती✅✅✅

४) मानवी प्राणी


६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?

१) बुरशी✅✅✅

२) शैवाल

३) दगडफूल

४) नेचे


७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?

१) तुरटी

२) विरंजक चुर्ण✅✅✅

३) चुनखडी 

४) धुण्याचा सोडा


८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.

१) संतृप्त 

२) असंतृप्त✅✅✅

३) वलयांकित

४) वरील सर्व


९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.

१) सुक्ष्मजीव✅✅✅

२) किटक

३) विषाणू

४) कृमी


१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?

१) डोळे

२) कान

३) त्वचा✅✅✅

४) नाक 


११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.

१) ऊती✅✅✅

२) केंद्रक

३) मूल 

४) अभिसार


१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला

१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती

२) जंतूपासून रोगोद्भव✅✅✅

३) साथीचे रोगविषयक 

४)  यापैकी नाही

विधानपरिषद स्थान



विधान परिषदेची जागा दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट भागात राजधानी मुंबईत आहे . अर्थसंकल्पीय अधिवेशन व पावसाळी अधिवेशन मुंबईत तर हिवाळी अधिवेशन सहाय्यक राजधानी नागपूर येथे आयोजित केले जाते .


विधानपरिषदेची रचना


विधानपरिषदेमध्ये than० पेक्षा कमी सदस्य किंवा विधानसभेच्या एकूण सदस्यांपैकी जास्तीत जास्त एक तृतीयांश सदस्यांचा समावेश असेल, जो या विभागात प्रदान केलेल्या पद्धतीने निवडला जाईल.


Members० सदस्य विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडले जातील


महाराष्ट्रातील सात प्रभागांमधून (मुंबई, अमरावती विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग आणि पुणे विभाग) पदवीधारकांमधून members सदस्य निवडले जातात.


महाराष्ट्रातील सात विभागांतील शिक्षकांमधून members सदस्य निवडले जातात (मुंबई, अमरावती विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग व पुणे विभाग)


महाराष्ट्रातील २१ प्रभागातून (मुंबई (२ जागा) आणि अहमदनगर, अकोला-कम-वाशिम-कम-बुलढाणा, अमरावती, औरंगाबाद-कम-जालना, भंडारा-गोंदिया) मधील स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी २२ सदस्य निवडले गेले आहेत. , धुळे-कम-नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद-कम-लातूर-कम-बीड, परभणी-हिंगोली, पुणे, रायगड-कम-रत्नागिरी-कम-सिंधुदुर्ग, सांगली-कम-सातारा , सोलापूर, ठाणे-कम-पालघर, वर्धा-कम-चंद्रपूर-कम-गडचिरोली आणि यवतमाळ)


राज्यपालाद्वारे साहित्य, विज्ञान, कला, सहकारी चळवळ आणि सामाजिक सेवाशास्त्र या विषयांबद्दल विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असणार्‍या १२ सदस्यांची नेमणूक


हे एक सतत घर आहे आणि विघटनास अधीन नाही. तथापि, त्याचे एक तृतीयांश सदस्य दर दुसर्‍या वर्षी सेवानिवृत्त होतात आणि त्यांची जागा नवीन सदस्यांनी घेतली आहे. अशा सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. विधान परिषदेचे सभासद त्याचे अध्यक्ष व उपसभापती निवडतात.

रक्त (Blood) 🔰


- रक्त हा लाल रक्त पेशी (आरबीसी किंवा एरथ्रोसाइट्स), पांढर्‍या रक्त पेशी (ल्युकोसाइट्स) आणि बिंबिका  (प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स) यांनी बनलेला व गुंतागुंतीची (जटिल) रचना असलेला जैविक द्रव पदार्थ आहे. 


- रक्ताचा मुख्य घटक पाणी आहे. रक्त हा एकमेव द्रव उती आहे. रक्तामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. या पेशींमधील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. 


- हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू आणि कार्बन डायॉक्साइड रक्तात विरघळू शकतात आणि त्यांचे वहन करणे सुलभ बनते.


- पांढर्‍या रक्त पेशींमुळे संसर्गाला प्रतिबंध होतो तर बिंबिकांमुळे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते. पृष्ठ्वंशी प्राण्यांचे रक्त तांबड्या रंगाचे असते. 


- संधिपाद प्राणी आणि मृदुकाय प्राण्यांच्या रक्तामध्ये प्राणवायू वहनानासाठी हिमोग्लोबिनऐवजी हिमोसायनिन असते. 


- कीटक आणि काहीं मृदुकाय प्राण्यामध्ये हिमोलिंफ नावाचा द्रव, प्राणवायू वहनाचे कार्य करतो. हिमोलिंफ बंद रक्तवाहिन्यामध्ये नसते. ते रक्तवाहिन्या आणि शरीर यांच्या मधल्या पोकळ्यांमधून वाहते. 


- बहुतेक कीटकांच्या रक्तामध्ये प्राणवायू वहनासाठी हिमोग्लोबिन सारखा वाहक रेणू नसतो.


- रक्त हा  संयोजी उतींचा द्रवरूप प्रकार आहे.

शुद्ध रक्ताचा रंग लाल भडक असून चव खारट असते.


- रक्त आम्लारी / अल्कलीधर्मी असून त्याचा सामू (pH) 7.35 ते 7.45 आहे. रक्त द्रवरूप तसेच स्थायूरुप घटकांचे बनलेले असते.


- रक्तातील द्रवरूप भागाला रक्तद्रव्य किंवा प्लाझ्मा असे म्हणतात. रक्तातील स्थायूरुप भागाला रक्तपेशी असे म्हणतात.

जिवाणू

   🔰  कॉलरा (cholera) 🔰

____________________________________

◾️ जिवाणू चे नाव -   विब्रिओ कॉलरी


◾️ प्रसार - दूषित अन्न पाणी


◾️ मोठी अवयव - मोठी आतडे


◾️ लक्षणे -  उलट्या-जुलाब शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे त्वचा सुखणे 


◾️ उपचार - 1)औषध - ओ आर एस (ORS)


◾️ लस - हाफकिन ची लस 

ORS चे घटक 

1) सोडियम क्लोराइड 2)ग्लूकोज 3)पोटॅशियम क्लोराइड 4) ट्रायसोडियम सायट्रेट


◾️ शिगेल्ला  बॅसिलस हा जिवाणू हा हागवणीस कारणीभूत ठरतो


                   🔰  घटसर्प 🔰

____________________________________

◾️जिवाणू चे नाव -  कॉनिऺबॅक्टेरियम डिप्थेरी.


◾️ प्रसार -  हवेमार्फत द्रवबिंदू च्या स्वरूपात


◾️ अवयव - श्‍वसनसंस्था 


◾️ लक्षणे - श्वासोच्छ्वासाचा त्रास होणे घसा लाल होणे 


◾️उपचार -  पेनिसिलिन लस. DPT ( त्रिगुणी लस)



            🔰 डांग्या खोकला. 🔰

____________________________________

◾️जिवाणू चे नाव - haemophilus pertusis


◾️ प्रसार - हवेमार्फत 


◾️ अवयव - श्वसनसंस्था


◾️ लक्षणे - तीव्र खोकला छातीत दुखणे 


◾️ उपचार - DPT (त्रिगुणी लस)



               🔰 धनुर्वात (tetanus)🔰

____________________________________

◾️ जिवाणू चे नाव - काॅस्ट्रिडियम टिटॅनी


◾️ प्रसार - ओल्या जखमेतून 


◾️अवयव -  मध्यवर्ती चेतासंस्था


◾️लक्षणे - दातखिळी बसणे ताप तीव्र वेदना


◾️उपचार -  DPT लस 



                🔰  न्युमोनिया.  🔰

____________________________________


◾️ जिवाणू चे नाव -  डीप्लोकोकस न्युमोनी


◾️ प्रसार -  हवेमार्फत 

 

◾️अवयव ,- फुप्फुसावर सूज येणे


◾️ लक्षणे - छातीत दुखणे श्वसनासाठी त्रास


◾️ उपचार - औषध पेनिसिलीन


.               🔰  कुष्ठरोग 🔰

____________________________________


◾️ जिवाणू चे नाव - मायकोबॅक्टेरियम लेप्री

◾️ प्रसार - संपर्क रक्त द्रव्यबिंदू


◾️ अवयव -  परिघीय चेता संस्था


◾️ लक्षणे -   बोट झडणे सुरकुत्या पडणे त्वचेवर चट्टे पडणे


◾️  उपचार - लस उपलब्ध नाही

विज्ञान - शोध व संशोधक ----



 

01) विमान – राईट बंधू


02) डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल


03) रडार - टेलर व यंग


04) रेडिओ - जी. मार्कोनी


05) वाफेचे इंजिन - जेम्स वॅट


06) थर्मामीटर - गॅलिलीयो


07) हेलीकॉप्टर - सिकोर्स्की


08) विजेचा दिवा - एडिसन


09) रेफ्रीजरेटर - पार्किन्स


10) वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस


11) सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन


12) सायकल - मॅकमिलन


13) डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल


14) रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी


15) टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल


16) ग्रामोफोन - एडिसन


17) टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड


18) पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग


19) उत्क्रांतिवाद - डार्विन


20) भूमिती - युक्लीड


21) देवीची लस - जेन्नर


22) अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस


23) अँटी रेबीज -लुई पाश्चर


24) इलेक्ट्रोन – थॉमसन


25) हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश


26) न्यूट्रोन – चॅडविक


27) आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर


28) विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे


29) कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल


30) गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार


▪️ महाराष्ट्र - लावणी, कोळी नृत्य

▪️ तामिळनाडू - भरतनाट्यम


▪️ करळ - कथकली

▪️ आध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम


▪️ पजाब - भांगडा, गिद्धा

▪️ गजरात - गरबा, रास


▪️ ओरिसा - ओडिसी

▪️ जम्मू आणी काश्मीर - रौफ


▪️ आसाम - बिहू, जुमर नाच

▪️ उत्तरखंड - गर्वाली


▪️ मध्य प्रदेश - कर्मा, चार्कुला

▪️ मघालय - लाहो


▪️ कर्नाटक - यक्षगान, हत्तारी

▪️ मिझोरम - खान्तुंम


▪️ गोवा - मंडो

▪️ मणिपूर - मणिपुरी


▪️ अरुणाचल प्रदेश - बार्दो छम

▪️ झारखंड - कर्मा


▪️ छत्तीसगढ - पंथी

▪️ राजस्थान - घूमर


▪️ पश्चिम बंगाल - गंभीरा

▪️ उत्तर प्रदेश - कथक

वातावरण

 पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. वातावरणाचे खालील स्तर पडतात.



1. तपांबर


भूपृष्ठापासून तेरा किलोमीटर ऊंची पर्यंतच्या हवेच्या थर तपांबर म्हणून ओळखला जातो. या थराची विषुववृत्तावरील जाडी जवळजवळ सोळा किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमिटरच्या दरम्यान आहे.

समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत. या थरामधील हवेत खालील वायु आढळतात.




हवेतील घटक घटकाचे प्रमाण


नायट्रोजन 78.03%


ऑक्सीजन 20.99%


कार्बडायक्साईड 00.03%


ऑरगॉनवायु 00.94%


हैड्रोजनवायु 00.01%


पाण्याची वाफ, धुळ व इतर घटक 0.01%


एकूण हवा 100.00%.


2. तपस्तब्धी


भुपृष्ठापासून जवळजवळ दहा किलोमिटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते. त्यानंतर तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा थर स्थिर तापमानाचा थर म्हणून ओळखला जातो. या थराला तपस्तब्धी असे म्हणतात.



3. स्थितांबर


तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितांबराच्या या भागाची जाडी जवळजवळ 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आहे. या थरामधील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान सारखेच आढळते. स्थितांबरामध्ये खालील स्थराचे अस्तित्व आढळते.

ओझोनोस्पीअर – स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायुचा स्तर आहे. हा थर ओझोनोस्पीअर या नावाने ओळखला जात असून या थरामध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्होयलेट किरणे शोषली जातात.

मध्यांबर – स्थितांबरचा वर मध्यांबर आहे. या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.



4. आयनाबंर


मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ अस्तित्व आहे. सूर्यापासुन आलेल्या अल्ट्राव्होयलेट किरणाची हवेच्या अणूवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर थर निर्माण झालेला आहे. यामध्ये खालील स्तर आढळतात.

इ-लेअर – या थरातील 100 ते 208 किलोमिटरचा थर इ-लेअर (E-Layaer) म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नेभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी पृथ्वीवर प्रवर्तित होतात.

एफ-लेअर – त्यानंतरचा थर (F-Layer) एफ-लेअर म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रामधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.


5. बाहयांबर


आयनाबंराच्या पलीकडील हवेच्या भागास बाहयांबर म्हणतात. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते. या भागात हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व आढळते.

भारताचे मानचिन्हे.


◾️ 22 जुलै 1947 रोजी संविधानसभेने भारताच्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली व हा राष्ट्रध्वज 14 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आला..


◾️राष्ट्रध्वजाचा आकार 3:2 या प्रमाणात असतो..


◾️ घटना समितीने 24 जानेवारी 1950 रोजी जन गण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली..


◾️ जन गण मन हे गीत गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी रचले आहे.. 


◾️संविधान सभेने वंदेमातरम या गीतालासुद्धा राष्ट्रगीताचा दर्जा बहाल केला आहे..


◾️ वंदेमातरम हे प्रसिद्ध बंगाली कवी बकीमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून घेण्यात आले आहे..


◾️भारताचे बोधचिन्ह सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहाच्या प्रतिकृतीवरून घेण्यात आले आहे..


◾️ या बोधचिन्हात मंडूकोपनिषदातील सत्यमेव जयते हे वाक्य अंतर्भूत करण्यात आले आहे..


📌 राष्ट्रीय नदी :- गंगा..


📌 राष्ट्रीय महाकाव्य :- गीता..


📌 राष्ट्रीय जलजीव :- गंगा डॉल्फिन..


📌 राष्ट्रीय फळ :- आंबा..


📌 राष्ट्रीय विरासत पशु :- हत्ती..


📌 राष्ट्रीय खेळ :- हॉकी..


📌 राष्ट्रीय वृक्ष :- वड..


📌 राष्ट्रीय पशु :- वाघ..

आपत्ती व्यवस्थापन कायदा म्हणजे काय ?👇 (NDM Act, 2005)



◾️आपत्ती म्हणजे काय?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी किंवा अन्य प्रकारची हानी संभवते. बाहेरील मदतीची आवश्यकता भासण्याइतपत तीव्रता असणारी बाब म्हणजे आपत्ती.


◾️आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय?

नैसर्गिक आपत्ती(Natural Calamities)  मानव संसाधन (Human Resources), राष्ट्रीय संपत्ती( National Wealth),आणि अर्थव्यवस्था (Economy) संबधित कोणतीही आपत्ती आल्यानंतर अथवा आपत्ती येऊ नये म्हणून केलेली कार्यवाही म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्तीपूर्व काळासंबंधी आपत्ती प्रतिबंध यंत्रणा किंवा पूर्वतयारी तसेच नियोजन, संघटन, समन्वय व कार्यप्रणाली यांची योग्य अंमलबजावणी महत्वाची असते.


◾️आपत्ती व्यवस्थापन कायदा :-

भारतात १९९३ साली ओरिसा (ओडिशा)च्या चक्रीवादळानंतर केंद्र सरकारने एक समिती स्थापन करून धोक्यांचा आणि त्यापासून उद्भवणाऱ्या आपत्तींचा सर्वंकष अभ्यास केला. तसेच भारताने आपत्तिदरम्यान मदतकार्यासाठी व्यवस्थापनातील सगळे विभाग, शास्त्रीय संशोधनातील संस्था, शिक्षण संस्था आणि सामान्य जनसमुदाय तसेच बचावकार्य करणाऱ्या संस्था यांच्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु २००४ साली आलेल्या त्सुनामीमुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा बनवण्याची निकड कळून चुकली. 


◾️त्यानंतर  संसदेत पारित झाल्यानंतर NDMA

👉२५ डिसेंबर २००५👈 साली राष्ट्रपतीने संमत केला. आपत्ती व्यवस्थापनाचे धोरण आणि आराखडा तयार करण्याची तरुतूद कायद्यात आहे.


◾️आपत्ती व्यवस्थापन कायदा कोण लागू करु शकतो?

कोणत्याही प्रकारची आपत्ती लागू करताना राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्तरीय समितीचे प्रमुख आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णय घेतात. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान, राज्यपातळीवर मुख्यमंत्री, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी हा निर्णय घेतात. 


भारतात आपत्ती व्यवस्थापनामध्ये खालील 4 समिती/संस्था महत्वाची भूमिका पार पाडतात.


◾️राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण(NDMA)-

 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती तयार केली जाते ज्याचे कायमस्वरुपी अध्यक्ष पंतप्रधान असतात. पंतप्रधान 9 तज्ज्ञांची नेमणूक करतात येणाऱ्या आपत्तींबाबत माहीत देतात. राज्यस्तरावर या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात. 


◾️राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM)-  राज्यस्तरीय प्रशिक्षक तयार करण्याचे काम ही संस्था करते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या गाईडलाईननुसार ही संस्था आपत्ती व्यपस्थापनची सर्व प्रशिक्षण देते. 


◾️राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल(NDRF) - 

राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल  उभारण्यात आल्या असून आपत्ती नंतरच्या काळात काम करतो.  केंद्रशासनार्गंत निमलष्करी दल म्हणजे सीमा सुरक्षा दल( BSF) आणि इंडो-तिबेट सीमा पोलिस (ITBP) सारखे दल आपत्ती व्यवस्थापनासाठी पाठविल्या जातात. त्यांच्याकडे उपलब्ध असलेले आधुनिक संसाधनाचा वापर करुन आपत्ती निवारणाचे काम हे दल करतात. पुर, त्सुनामी, भूकंप कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास निमलष्करी दल आपत्ती निवारण करते.  



🔸राज्य स्तरावर तत्सम दल (SDRF) -

 राज्य स्तरावर तत्सम दल उभाण्यात आली असून मुख्यमंत्री अध्यक्ष असतात. राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापनामध्ये मुख्य सचिव(Chief Secretary) यांच्या खालोखल सर्व विभाग प्रमुख असतात. आपत्ती आल्यानंतर राज्य स्तरावर तत्सम दलाने दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्याचे काम हे अधिकारी करतात. राज्यशासनाने अथवा केंद्रशासनाने घेतलेला निर्णय अतिमपातळीपर्यंत पोहचवून अंमलबजावणी करण्याचे काम हे अधिकारी करतात. आपत्ती आल्यानंतर या सर्व विभागांच समन्वय साधण्याचे काम राज्य स्तरावर तत्सम दल विभागामार्फत केले जाते. 


🔸आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर अधिकाऱ्यांना मिळणारे अधिकार..

- आवश्‍यकता भासल्यास खासगी जागा, वाहने,  सेवा, वस्तू अधिग्रहित करण्याचा अधिकार. 

उदा. हॉस्पिटल, डॉक्टर, अँमब्यूलन्स

- आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारा निधी उभा करणे.

- आपत्ती बाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करणे. 

- आपत्ती व्यवस्थापनसाठी लागणारी मानवी संसाधन( Man Power) उभारणे.

- आत्यवशक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणे.


🔸आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर अधिकाऱ्यांवरील जबाबदारी..

- आपत्ती बाबत जनजागृती करणे

- आपत्ती बाबत गोंधळाची निर्माण होऊ नये यासाठी दक्ष राहणे.

- आपत्तकालिन मदत आणि सेवा लोकांपर्यंत पोहचवणे.

- आपत्ती निवारणासाठी धोरण आखणे आणि अंमलबजावणी करणे.


🔸आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे व दंड : 

कायद्यातील प्रकरण १० मधील कलम ५१ ते ५८ यांमार्फत आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित विविध प्रकारचे गुन्हे व त्यांवर करावयाच्या कार्यवाहीची तरतूद आहे.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...