१५ ऑगस्ट २०२१

यशाचा राजमार्ग राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा निकाल

लहान गट :-   पहिली ते चौथी 


जय सचिन साळवे                             प्रथम 

प्रणिती संग्रामसिंह जाधव                   द्वितीय 

मृणाल मुकुंद वलेकर                        तृतीय 

आर्या संदीप तरटे                             उत्तेजनार्थ 

 ईश्वरी प्रदीप  जाधव                         उत्तेजनार्थ 

 किमया अभिषेक चोपडे                   उत्तेजनार्थ 

अपेक्षा वैजनाथ गायकवाड                उत्तेजनार्थ 

अस्मिता आवी  कोपर्डे                      उत्तेजनार्थ 


मध्यम गट :-    पाचवी ते नववी 


रिया जितेंद्र जोगळे                      प्रथम 

शिवानी रवींद्र  येरकल                 द्वितीय 

पूर्वा रामदास चांदरकर                 तृतीय 

श्रेया सुरेश निंबाळकर                 उत्तेजनार्थ 

शिवध्वज गणेश गोडसे                उत्तेजनार्थ 

शुभांगी सनिल  कर्डक                 उत्तेजनार्थ 

दिव्या संजय भोसले                    उत्तेजनार्थ 



खुला गट :-


प्रांजली बाबु वाघमारे     &  मिनेश भाऊसाहेब मेंगल                     प्रथम 

अभिजीत मोहन शिंदे                      द्वितीय 

ऋतुजा धोंडीराम पारसे                    तृतीय 

तेजश्री भाऊसाहेब पवार                उत्तेजनार्थ 

अपूर्वा अनिल  पाटील                    उत्तेजनार्थ 

मृणाल मोहन जाधव                     उत्तेजनार्थ 

समिक्षा गणेश गुमटे                     उत्तेजनार्थ 

सोनाली जालिंदर खराडे                उत्तेजनार्थ 


 सर्वांचे हार्दिक अभिनंदन 

०८ ऑगस्ट २०२१

जगावर आता ‘डेल्टा’ संकट.



🔰मळ करोना विषाणूपेक्षा घातक आणि अधिक वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या ‘डेल्टा’चा अमेरिका, चीनसह १३२ देशांमध्ये फैलाव झाला आहे. सर्वाधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा विषाणूमुळे करोनाविरोधातील लढ्याचे स्वरूप बदलले आहे, असे अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल’ने (सीडीसी) स्पष्ट केले आहे.


🔰‘डेल्टा’मुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या अनुषंगाने स्पष्ट संदेश प्रसारित करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीकरणाची सक्ती आणि मुखपट्टीचा वापर या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब पुन्हा एकदा करण्याची आवश्यकता ‘सीडीसी’ने अधोरेखित केली आहे.


🔰करोना विषाणूचा डेल्टा हा उत्परिवर्तित प्रकार प्रथम भारतात आढळला आणि आता त्याचा फैलाव जगभरात झाल्याचे ‘सीडीसी’च्या अंतर्गत अहवालामध्ये म्हटले आहे. हा विषाणू कांजण्यांच्या विषाणूप्रमाणे वेगाने पसरतो. तसेच सर्दीच्या विषाणूपेक्षाही त्याचा प्रादुर्भाव वेगाने होतो, असेही ‘सीडीसी’ने नमूद केले आहे.


🔰‘इम्प्रुव्हिंग कम्युनिकेशन्स अराऊंड व्हॅक्सिन ब्रेकथ्रू अँड व्हॅक्सिन इफेक्टिव्हनेस’ या अहवालात ‘डेल्टा’च्या धोक्याबद्दल इशारा देण्यात आला आहे. डेल्टाचा सामना करण्यासाठी नव्या योजना आखाव्या लागणार आहेत. त्याचा धोका लोकांना समजून सांगावा लागणार आहे.

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणार ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार; मोदींचे ‘खास पाहुणे’ म्हणून लावणार उपस्थिती.



🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना भेटणार आहेत. या कार्यक्रमामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत १३० कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या १२७ खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे.


🔰सवातंत्र्यदिनानिमित्त हे सर्व खेळाडू पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. टोक्योमध्ये भारताचे १२७ खेळाडू १८ क्रीडा प्रकारांत सहभागी झालेत. लाल किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर या खेळाडूंना पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमंत्रित केलं जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.


🔰समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी प्रत्येक खेळाडूची भेट घेणार असून त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. “१५ ऑगस्टर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चमूतील सर्व खेळाडूंना लाल किल्ल्यावर विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करणार आहेत. ते प्रत्येक खेळाडूची भेट गेणार आहेत तसेच त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहेत,” असं एएनआयने म्हटलं आहे.


🔰तसेच लाल किल्ल्यावरील सत्कार सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व खेळाडूंना त्यांच्या शासकीय निवासस्थानी आमंत्रित करणार आहे. या ठिकाणी ते खेळाडूंशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

४१ वर्षांनी भारतीय हॉकी टीमनं घडवला इतिहास, कांस्यपदकावर कोरलं नाव.



🔰भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळालं आहे.


🔰अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.


🔰उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केला आहे. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढय़ जर्मनीला पराभूत केलं. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले.

सर्वाधिक उंचीवरचा रस्ता भारतात बांधण्यात आला.



🔰सीमा रस्ते संघटनेने (BRO) भारतीय हद्दीत जगातील सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बांधला आहे.


🔰पर्व लड्डाखमध्ये “उमलिंग ला पास” या ठिकाणी 19300 फूट उंचीवर हा रस्ता बनविण्यात आला आहे. 52 किलोमीटर लांबीचा हा रस्ता लडाखच्या चुमार सेक्टरच्या महत्वाच्या छोट्या छोट्या शहरांना जोडतो.


🔰याआधी जगात सर्वात उंचीवरचा रस्ता हा बोलिव्हिया देशामध्ये होता. तो रस्ता समुद्रसपाटीपासून 18,953 फूट एवढ्या उंचीवर आहे.


🔴सीमा रस्ते संघटना (BRO) विषयी..


🔰भारत सरकारची सीमा रस्ते संघटना (BRO) ही भारतीय सीमेलगतच्या भागात रस्त्यांचे जाळे उभारण्याचे काम करते. ही संस्था भारतीय लष्कराच्या भूदलाचा एक भाग असलेली संघटना आहे. तसेच लडाख, काश्मीर सारख्या दुर्गम भागात लष्करी दळणवळणासोबत सामान्यांच्या वापरासाठी ही संस्था रस्ते बनविते.

जर्मनी: सुधारित आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश..



🔰5 ऑगस्ट 2021 रोजी, जर्मनी हा आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर युती करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश ठरला आहे.


🔴आतरराष्ट्रीय सौर युती विषयी..


🔰2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे.


🔰गडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे.


🔰पतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली.


🔰आतरराष्ट्रीय सौर युती (ISA) हा सुरुवातीला केवळ 121 सदस्य देशांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांना उभारण्यासाठी समन्वय साधणारा उपक्रम होता. आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यापासून, आता आंतरराष्ट्रीय सौर युतीचा भाग बनण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्य देशांसाठी हा करार खुला करण्यात आला आहे.

उडान योजनेच्या अंतर्गत 780 हवाई मार्गांना मान्यता..



🔰भारताला हवाई मार्गाने देशातील सर्व प्रदेशांशी जोडण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून उडान (UDAN) योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 780 मार्गांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 359 हवाई मार्ग वर्तमानात कार्यरत केले गेले आहेत.


🔴ठळक बाबी...


🔰कोविड महामारीच्या काळात, विमान कंपन्यांद्वारे मालाची हाताळणी 2 टक्क्यांवरून 19 टक्क्यांपर्यंत वाढली.

भारतात हवाई मालवाहतुक करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढविण्यात आली असून सध्या 28 संचालक कंपन्या मान्य करण्यात आल्या आहेत.

योजनेच्या अंतर्गत 59 नवीन विमानतळांची स्थापना करण्यात आली आहे.


🔴उडान (उडे देश का आम नागरिक) योजना..


🔰भारत सरकारची उडान (उडे देश का आम नागरिक) या नावाची प्रादेशिक जोडणी योजना (RCS) एप्रिल 2017 मध्ये सुरू करण्यात आली. भारतातील सामान्य नागरिकांना विमान प्रवास व्यापक आणि स्वस्त करण्याच्या उद्देशाने या योजनेची रचना करण्यात आली आहे.


🔰या योजनेच्या अंतर्गत पहिल्या फेरीत 5 हवाईसेवा कंपनींना 128 मार्गिका प्रदान करण्यात आल्या आहेत. योजनेच्या अंतर्गत निवडलेल्या विमान कंपन्यांना त्यांच्या एकूण प्रवासभाड्यापैकी 50 टक्के भाडे केंद्र आणि राज्य सरकाराकडून अनुदान किंवा व्यवहार्यता तूट निधीदान (VGF) स्वरुपात मिळण्याचे प्रस्तावित आहे.

नीरज चोप्रा



 🔷 खळ: ट्रॅक आणि फील्ड


 🔷EVENT: भाला फेकणे


 🔷 परशिक्षक:  Uwe Hohn



✔️ जन्म :- खांद्रा गाव, पानिपत जिल्हा, हरियाणा 


🟢 नीरज चोप्रा ची कामगिरी :- 


 🏆 सवर्णपदक - 2020 टोकियो ऑलिम्पिक


 🏆 सवर्णपदक - आशियाई खेळ 2018 जकार्ता, इंडोनेशिया


 🏆 सवर्ण पदक - राष्ट्रकुल खेळ 2018 गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया


 🏆 सवर्णपदक - आशियाई चॅम्पियनशिप 2017 भुवनेश्वर, ओडिशा


 🏆 सवर्ण पदक - दक्षिण आशियाई खेळ 2016 गुवाहाटी/शिलाँग


 🏆 सवर्णपदक - वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2016 बायडगोस्झक, पोलंड


 💠 नीरज चोप्राला 2018 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


 ☑️ नीरज चोप्राने पोर्तुगालमध्ये लिस्बन athalatics  संमेलनात पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकले.

पंजाबमध्ये सर्व शाळा सुरू.



पंजाबमध्ये सोमवारी सर्व वर्गाच्या शाळा काही महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाल्या असून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त होती. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. राज्य सरकारने शनिवारी २ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती.   रुग्णांची संख्या कमी होत असल्याने करोना निर्बंध शिथिल केले होते.


करोनाबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केले जाणार असून मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांकडून लेखी संमती घेतली जाणार आहे. शाळांची वेळ ही सकाळी ८ ते दुपारी २ अशी असणार आहे.  


सोमवारी राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पूर्व प्राथमिक शाळा व पहिली दुसरीचे वर्ग मार्च २०२० नंतर १० महिन्यांनी सुरू झाले आहेत. सर्व शाळा दोन ऑगस्टपासून सुरू करण्याच्या आदेशापूर्वी २६ जुलैला दहावी व बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. जी मुले शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्ग उपलब्ध असणार आहेत.


डॉक्टर्स व शिक्षण तज्ज्ञ यांच्या कोणत्या अहवालानुसार सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असा प्रश्न पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते व आप नेते हरपाल सिंह चिमा यांनी केला आहे.  राज्यात ६०.५ लाख विद्यार्थी असून एकूण २० टक्के लोकसंख्येचा जीव धोक्यात टाकला जात आहे असे त्यांनी सांगितले.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.

 टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.


२०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत ६ पदकं जिंकली होती.


नीरज चोप्रा - सुवर्णपदक


टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे.


मीराबाई चानू - रौप्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताला पदक मिळाले. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने देशाला पहिले पदक मिळून दिले.

भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. याआधी सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते.


पीव्ही सिंधू - कांस्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला.


या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले.


लव्हलिना बोर्गोहेन - कांस्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाला पराभवाचा सामना करावा लागला.


उपांत्य फेरीत लव्हलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. लव्हलिना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे.


रवी दहिया - रौप्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी दहियाने रौप्यपदकाची कामगिरी केली आहे. मात्र ५७ किलो वजनी गटामध्ये रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

फायनलमध्ये रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या जावूर युगुयेवशीने दहियाचा पराभव केला. युगुयेवने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना ७-४ ने जिंकला. त्यामुळे रवीला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.


पुरुष हॉकी संघ - कांस्यपदक


तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचत ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ ने पराभव केला.


बजरंग पुनिया - कांस्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरल . 

सुवर्णपदक जिंकल्यानंतर ‘हा’ देश देतो सर्वाधिक पैसा, तीन देश करतात आयुष्यभर मदत.



🗿जगातील २००हून अधिक देशांचे खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत आहेत. ११ हजार खेळाडू सुवर्णपदकासाठी लढत आहेत. अमेरिकेने ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वाधिक पदके जिंकली आहेत. सुवर्ण जिंकल्यावर अमेरिका खेळाडूंना सुमारे २८ लाख रुपये देईल. सिंगापूरसारख्या छोट्या देशात उपलब्ध असलेल्या बक्षिसाच्या रकमेपेक्षा ही रक्कम खूपच कमी आहे. तीन मोठे देश ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूंना आजीवन मदत करतात. त्याचबरोबर युरोपमधील काही मोठे देश कोणत्याही प्रकारची बक्षीस रक्कम देत नाहीत.


🗿फोर्ब्सच्या बातमीनुसार, एस्टोनियामध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला दरवर्षी सुमारे ४ लाख रुपये मिळतील. याशिवाय निवृत्तीवर अधिक भत्ता मिळतो. जर एखादा खेळाडू २९ वर्षात सुवर्ण जिंकतो आणि ७८ वर्षे जगतो, तर त्याला सुमारे २.२५ कोटी मिळतील. इंडोनेशिया आणि मलेशियामध्येही दरमहा भत्ता दिला जातो. ब्रिटन, न्यूझीलंड आणि स्वीडनमध्ये पदक जिंकण्यासाठी बक्षिसाची रक्कम दिली जात नाही. सुवर्णपदकांसाठी सर्वाधिक पैसे देणारे देश कोणते आहेत, ते जाणून घेऊया.


🗿सिंगापूर – सुवर्णपदक जिंकल्यावर जास्तीत जास्त बक्षीस रक्कम सिंगापूरमध्ये दिली जाईल. येथे सुवर्णपदक जिंकल्यावर तुम्हाला सुमारे ५.५० कोटी रुपये मिळतील. त्याचबरोबर रौप्यपदक विजेत्याला २.७५ कोटी तर कांस्यपदक मिळवणाऱ्याला १.३७ कोटी मिळतील. मात्र आतापर्यंत सिंगापूरला एकही पदक मिळालेले नाही. त्यांचे खेळाडू पुढील आठवड्यात महिलांच्या टेबल टेनिसमध्ये पदके जिंकू शकतात.

जलदगती विशेष न्यायालयांसाठीची योजना आणखी दोन वर्षे सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी..



🧩पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र-पुरस्कृत योजना म्हणून 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2023 पर्यंत 389 विशेष POCSO (Protection Of Children from Sexual Offences) न्यायालयांसह 1023 जलदगती विशेष न्यायालये सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली.


🧩तयासाठी 1572.86 कोटी रुपये (971.70 कोटी रुपये केंद्राचा वाटा आणि 601.16 कोटी रुपये राज्याचा वाटा) खर्च अपेक्षित आहे. निर्भया निधीमधून केंद्रीय सरकारचा वाटा देण्यात येईल.


☘️पार्श्वभूमी..


🧩महिला आणि बालकांची सुरक्षा आणि सुरक्षिततेला सरकारने नेहमीच सर्वोच्च महत्त्व दिले आहे. 12 वर्षांखालील मुलगी आणि 16 वर्षांखालील महिलांवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनांमुळे संपूर्ण देशाच्या सद्सदविवेकबुद्धीला मोठा धक्का पोहोचला आहे. अशा प्रकारच्या घटना घडणे आणि त्यांचे खटले प्रदीर्घ काळ चालणे यामुळे असे खटले जलदगतीने चालवणारी आणि लैंगिक अत्याचार पीडितांना तातडीने दिलासा देणारी एक समर्पित यंत्रणा स्थापन करण्याची गरज निर्माण झाली होती.


🧩अधिक कठोर तरतुदी करण्यासाठी आणि अशा प्रकरणांचे खटले जलदगतीने चालावेत आणि त्यांचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी केंद्रीय सरकारने “गुन्हेगारी (दुरुस्ती) कायदा-2018” लागू केला आणि बलात्कार करणाऱ्यांना मृत्युदंडासहित कठोर शिक्षांची तरतूद केली. त्यामुळे जलदगती विशेष न्यायालयांची स्थापना होऊ लागली.


☘️योजनेविषयी . 


🧩2 ऑक्टोबर 2019 रोजी जलदगती विशेष न्यायालय योजना सुरू करण्यात आली. जलदगती विशेष न्यायालये सहजतेने न्याय देणारी समर्पित न्यायालये आहेत. असहाय्य पीडितांना त्वरेने न्याय मिळवून देण्याबरोबरच लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेला देखील ती बळकट करत आहेत.


🧩सध्या 28 राज्यांमध्ये व्याप्ती असलेल्या या योजनेचा विस्तार पात्र असलेल्या सर्व 31 राज्यांमध्ये करण्याचे प्रस्तावित आहे. देशातील दुर्गम भागासह सर्वत्र लैंगिक अत्याचार पीडितांना कालबद्ध पद्धतीने न्याय देण्याच्या राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांच्या प्रयत्नांना त्यामुळे पाठबळ मिळत आहे.

जर्मनी: सुधारित आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश..



☑️5 ऑगस्ट 2021 रोजी, जर्मनी हा आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर युती करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश ठरला आहे.


☄️आतरराष्ट्रीय सौर युती विषयी..


☑️2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे.


☑️गडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे.


☑️पतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली.


☑️आतरराष्ट्रीय सौर युती (ISA) हा सुरुवातीला केवळ 121 सदस्य देशांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांना उभारण्यासाठी समन्वय साधणारा उपक्रम होता. आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यापासून, आता आंतरराष्ट्रीय सौर युतीचा भाग बनण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्य देशांसाठी हा करार खुला करण्यात आला आहे.

वांशिक भेदभावाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा “आफ्रिका वंश असलेल्या लोकांचा स्थायी मंच”..



👍सयुक्त राष्ट्रसंघ महासभेने (UNGA) वंशभेद, असहिष्णुता, परदेशांबददल वाटणारा तिरस्कार आणि वांशिक भेदभावाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तज्ञांचा सल्ला मिळवण्यासाठी एक मंच स्थापन करण्यासाठी एका ठरावाला 2 ऑगस्ट 2021 रोजी मान्यता दिली.


👍तया मंचाचे “आफ्रिका वंश असलेल्या लोकांचा स्थायी मंच” (Permanent Forum of People of African Descent) हे नाव असेल. ती 10 सदस्य असलेली एक सल्लागार संस्था असेल, जी जिनेव्हा मानवी हक्क परिषदेसोबत कार्य करेल. एकूण सदस्यांपैकी 5 जणांना सदस्य देशांच्या सरकारांनी नामांकन दिलेल्या व्यक्तींमधून निवडले जाणार तर इतर पाच जणांची नियुक्ती संयुक्त राष्ट्रसंघ मानवी हक्क परिषद करणार.


🔴सयुक्त राष्ट्रसंघ (UN) विषयी...


👍आतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.


👍1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे.


👍सघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.


👍सयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.


👍सयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत -


👍सयुक्त राष्ट्रसंघ महासभा (General Assembly)

👍सयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (Security Council)

👍सयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council / ­ECOSOC)

👍सयुक्त राष्ट्रसंघ सचिवालय

आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice)

👍सयुक्त राष्ट्रसंघ विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).


🔴सयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत -


👍जागतिक बँक समूह

जागतिक आरोग्य संघटना (WHO)

जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Program)

संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization / UNESCO)

संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund / UNICEF)

झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चमू महाराष्ट्रात दाखल



🌼महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे ‘झिका’ विषाणूचा रुग्ण आढळून आला आहे. एका 50 वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने केलेल्या तपासण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे.


🌼या पार्श्वभूमीवर, झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी आणि रोगाच्या व्यवस्थापनामध्ये राज्य सरकारला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक चमू महाराष्ट्रात पाठवली आहे. या चमूत तीन सदस्य असून त्यात पुण्यातील प्रादेशिक संचालक कार्यालयातील सार्वजनिक आरोग्य तज्ञ, नवी दिल्लीतील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च (ICMR-NIMR) या संस्थेचे कीटकशास्त्रज्ञ यांचा समावेश आहे.


🌼काही दिवसांपूर्वी केरळमध्ये झिका विषाणूचा संसर्ग झालेले 14 रुग्ण आढळून आले होते.


💢झिका विषाणूविषयी


🌼डग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचे वाहक असलेल्या एडीस डासांमुळे झिका विषाणूचा संसर्ग पसरतो.


🌼झिका विषाणू संसर्गाची काही सामान्य लक्षणे - ताप, शरीर दुखणे, पुरळ, नेत्रश्लेष्मलाशोथ, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता किंवा डोकेदुखी

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लक्षणे साधारणपणे 2-7 दिवस टिकतात आणि संक्रमित बहुतेक लोकांना लक्षणे दिसत नाहीत.


🌼तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. अश्या बाळांचे डोकं जन्माच्या वेळी नेहमीपेक्षा लहान असू शकते. यास्थितीला मायक्रोसेफली असे म्हणतात. त्यामुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. तसेच गुलियन-बॅरे सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजारही यामुळे पसरण्याची शक्यता असते.

आतापर्यंत या विषाणूवर ना कोणती लस उपलब्ध नाही, ना कोणते ठराविक औषध उपलब्ध आहे.

भारतातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” याची मान्यता..



🐅वाघांचे उत्तमप्रकारे संरक्षण आणि संवर्धन केल्याबद्दल, देशातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” (Global Conservation Assured | Tiger Standards) अशी मान्यता मिळाली आहे.


🐅मानस, काझीरंगा आणि ओरांग (आसाम)

🐅सातपुडा, कान्हा आणि पन्ना (मध्यप्रदेश)

🐅पच (महाराष्ट्र)

🐅वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प (बिहार)

🐅दधवा (उत्तरप्रदेश)

🐅सदरबन (पश्चिम बंगाल)

🐅पारंबीकुलम (केरळ)

🐅बदिपूर व्याघ्र प्रकल्प (कर्नाटक)

🐅मदुमलाई आणि अन्नामलाई (तामीळनाडू)

🐅“जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा

 

🌸(CA|TS)” विषयी...


🐅CA|TS या संज्ञा ‘मान्यता’ अथवा दर्जा निश्चित करण्यासाठीचे साधन म्हणून वापरण्यास ‘व्याघ्र अस्तित्व असलेल्या देशांच्या जागतिक संघटनेने (TRCs) मंजूरी दिली असून ते निकष व्याघ्र तसेच संरक्षित प्रदेशाच्या तज्ञांनी ठरवले आहेत.


🐅2013 साली या दर्जाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, व्याघ्र प्रजाती (मार्जार कूळ) याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठीचा किमान दर्जा निश्चित करण्यात आला आहे. तसेच, त्या संबंधित संवर्धन क्षेत्रात, हा दर्जा सांभाळला जातो आहे की नाही, याचे मूल्यांकन केले जाते. यामध्ये असे निकष आहे, ज्याअंतर्गत व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणारे व्यवस्थापन संवर्धनासाठी पूरक आहे की नाही हे तपासले जाते.


🌸पार्श्वभूमी...


🐅दरवर्षी 29 जुलै या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ साजरा करतात. 2021 साली हा दिवस “त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे” (Their Survival is in our hands) या संकल्पनेखाली पाळण्यात आला.

Filmfare Awards 2021


• सर्वोत्कृष्ट चित्रपट: थप्पड

• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक:  ओम राऊत  (चित्रपट:-'तान्हाजी: द अनसंग हीरो')

• सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): इरफान खान ( चित्रपट:- 'इंग्लिश मीडियम')

• सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): तापसी पन्नू ( चित्रपट:-'थप्पड')

• सर्वोत्कृष्ट अभिनेता, सहायकअभिनेता (पुरुष): सैफ अली खान (चित्रपट- तान्हाजी: द अनसंग हीरो)

• सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): फारुख जाफर - ( चित्रपट:-गुलाबो सीताभो)

• सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला: आलाया फर्निचरवाला - जवानी जानमन

•सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: राजेश कृष्णन (चित्रपट- लूटकेस)

• सर्वोत्कृष्ट संगीत: प्रीतम (चित्रपट:-लुडो)

• सर्वोत्कृष्ट गायक (पुरुष): राघव चैतन्य  (चित्रपट:-एक तुकडा धूप - चापट)

• सर्वोत्कृष्ट गायक (महिला): असीस कौर - (चित्रपट:-मलंग 


● समीक्षक पुरस्कार:-

---------------------------------------------------

• सर्वोत्कृष्ट चित्रपट: ऐब आले ऊ

• सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमिताभ बच्चन -  ( चित्रपट:-गुलाबो सीताबो)

• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : तिलोटामा शोम (चित्रपट:- सर )


● फिल्मफेअर शॉर्ट फिल्म पुरस्कार:-

--------------------------------------------------

•सर्वोत्कृष्ट चित्रपट (पॉप्युलर चॉईस): देवी

• सर्वोत्कृष्ट चित्रपट (फिक्शन): अर्जुन

• सर्वोत्कृष्ट चित्रपट (नॉन-फिक्शन): बॅकयार्ड वाईल्ड लाईफ सेंचुरी

• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : प्रुती सावर्दकर 

• सर्वोत्कृष्ट अभिनेता : अर्णव अब्दगिरे


● विशेष पुरस्कार:-

---------------------------------------------------

• आरडी बर्मन पुरस्कार: गुलजार

• लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड: इरफान खान

०४ ऑगस्ट २०२१

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. 4 सप्टेंबरला होणार संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.

कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर
मार्च महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला होता. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिपत्रक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं परीक्षेचं आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 3 ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणार पत्र प्राप्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगन 4 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे. तर, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेटस साठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.

कोणत्या पदासाठी किती जागा?
सहायक कक्ष अधिकारी – MPSC ASO – 67 जागा
राज्य कर निरीक्षक – MPSC STI – 89 जागा
पोलीस उप निरीक्षक – MPSC PSI – 650 जागा
एकूण - 806 जागा
__________

०२ ऑगस्ट २०२१

अस्थाना यांची नियुक्ती ‘घटनाबाह्य’.



🔰राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी झालेली नियुक्ती ही ‘घटनाबाह्य’ असल्याचा ठराव दिल्ली विधानसभेने गुरुवारी संमत केला. अस्थाना यांची नियुक्ती करण्याचा निर्णय आपल्या पक्षाच्या नेत्यांना ‘त्रास देण्यासाठी’ घेण्यात आला असल्याचा आरोप करून, सत्ताधारी आम आदमी पक्षाने या नियुक्तीवरून केंद्र सरकावर टीका केली.


🔰दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अल्पावधीच्या चर्चेद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना; अस्थाना यांची नियुक्ती ‘घटनाबाह्य’ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असल्याचे नमूद करणारा ठराव ‘आप’चे आमदार संजय झा यांनी मांडला.


🔰गजरात कॅडरच्या या वादग्रस्त अधिकाऱ्याला पोलीस आयुक्त म्हणून दिल्लीवर ‘थोपवण्यात’ आल्याबाबत या ठरावात नापसंती व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारने मंगळवारी अस्थाना यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आणि निवृत्तीपूर्वी या पदावर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली.

कोव्हॅक्सिन’ आयातीच्या निर्णयाला ब्राझीलची स्थगिती.



🔰भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या करोना प्रतिबंधक लशीच्या प्रस्तावित नैदानिक चाचण्या आणि तिच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीची विनंती स्थगित केल्यानंतर या लशीच्या ४० लाख मात्रा देशात आयात करण्याचा निर्णयही ब्राझीलने स्थगित केला आहे.


🔰बराझिलियन भागीदारांसोबतचा करार संपवल्याचे भारत बायोटेकने त्या देशाच्या सरकारला कळवल्यानंतर, कोव्हॅक्सिनची आयात आणि वितरण यांसाठी दिलेली तात्पुरती अधिकृत परवानगी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे नॅशनल हेल्थ सव्‍‌र्हेलन्स एजन्सी ऑफ ब्राझीलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.


🔰बराझीलच्या प्रेसिसा मेडिकॅमेंटोस आणि एनव्हिक्झिया फार्मास्युटिकल्स एलएलसीशी केलेला करार आपण संपुष्टात आणला असल्याचे भारत बायोटेकने २३ जुलैला सांगितले होते.

राज्याच्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार! आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा.



🔰राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.


🔰यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर येत्या १ ते २ दिवसांमध्ये जीआर निघेल असं देखील ते म्हणाले.


🔰कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल, असं ते म्हणाले.

चांद्रयान ३ मोहीम २०२२ मध्ये तिसऱ्या तिमाहीत - जितेंद्र सिंह.



🔰चांद्रयान ३ मोहीम २०२२ मध्ये तिसऱ्या तिमाहीत होईल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले. करोना साथीमुळे या मोहिमेची गती मंदावली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


🔰लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अवकाश खात्याचे राज्यमंत्री असलेल्या सिंह यांनी म्हटले आहे की, चांद्रयान ३ मोहिमेचे वेळापत्रक बदलावे लागत आहे. चांद्रयान ३ मोहिमेत अनेक प्रक्रिया असून त्यात अनेक उपप्रणाली, त्यांची जोडणी व तपासणी असे अनेक मुद्दे आहेत. या प्रकल्पाची प्रक्रिया करोनामुळे लांबली असून घरून जे काम करता येणे शक्य आहे तेवढे टाळेबंदीच्या काळात पूर्ण झाले आहे.


🔰चांद्रयान ३ मोहीम अमलात आणण्यासाठी टाळेबंदी उठल्यानंतर पुन्हा काम सुरू होईल व ही मोहीम तरीही प्रगतिपथावर आहे. यापूर्वी भारताने २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सोडले होते. जिथे कुठल्याही देशाने तोपर्यंत यान पाठवले नव्हते. भारताच्या शक्तिशाली प्रक्षेपकाच्या मदतीने ते यान सोडण्यात आले होते. त्या वेळी ७ सप्टेंबर २०१९ रोजी विक्रम या लँडरचे आघाती अवतरण झाल्याने भारताला चंद्रावर गाडी उतरवण्यात अपयश आले होते.


🔰अन्यथा पहिल्याच प्रयत्नात गाडी तेथे उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असता. चांद्रयान ३ मोहीम भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोसाठी महत्त्वाची असून त्यात आंतरग्रहीय मोहिमांमध्ये भारताच्या कामगिरीस बळ मिळणार आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बोम्मई यांचा शपथविधी



🔰कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई यांचा शपथविधी बुधवारी येथे झाला असून तेथील राजकीय अस्थिरतेला तूर्त पूर्णविराम मिळाला आहे. येडियुरप्पा पक्षाच्या आदेशानुसार पायउतार झाल्यानंतर बोम्मई यांच्या नावाची घोषणा भाजपच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी केली होती. त्यानुसार बोम्मई यांनी बुधवारी मंत्रिपदाची शपथ घेतली.


🔰कर्नाटक भाजप विधिमंडळ पक्षाच्या आमदारांनी मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत बोम्मई यांची नेतेपदी निवड केली होती. बोम्मई हे उत्तर कर्नाटकातील लिंगायत नेते असून येडियुरप्पा यांचे विश्वासू मानले जातात, त्यामुळे यापुढेही कर्नाटकच्या राजकारणावर येडियुरप्पा यांचा प्रभाव राहील असे सांगण्यात येते. बोम्मई हे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस.आर बोम्मई यांचे पुत्र असून येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात ते गृह कामकाज, कायदा, विधिमंडळ कामकाज या खात्याचे मंत्री होते. आता येडियुरप्पा यांचे मंत्रिमंडळ विसर्जित झाले असून बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली नवे मंत्रिमंडळ सत्तारुढ होत आहे.


🔰कर्नाटकात पिता-पुत्र जोडीने मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एच.डी. देवेगौडा तसेच एच.डी. कुमार स्वामी या पिता-पुत्रांनी मुख्यमंत्री पद सांभाळले होते. बोम्मई हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. हावेरी जिल्ह्य़ातील शिगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व ते करतात.

राकेश अस्थाना दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त



🔰गुजरात कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांनी बुधवारी दिल्लीच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.


🔰अस्थाना हे येथील जयसिंह मार्गावरील दिल्ली पोलीस मुख्यालयात पोहोचले, त्या वेळी त्यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.


🔰‘दिल्ली पोलीस आयुक्त म्हणून मी आज पदभार स्वीकारला. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हे रोखणे या पोलीस सेवेच्या प्राथमिक संकल्पनांवर माझा विश्वास असून आम्ही त्याच करणे अपेक्षित आहे. या गोष्टी योग्य रीतीने करण्यात आल्यास समाजात शांतता नांदेल’, असे अस्थाना यांनी पत्रकारांना सांगितले.


🔰सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून काम पाहणारे राकेश अस्थाना हे तत्काळ प्रभावाने दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी रुजू होतील, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आदेशात सांगितले. अस्थाना हे ३१ जुलैला निवृत्त होणार असताना काही दिवसांपूर्वी ही नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ १ वर्षांचा राहणार आहे.

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस: 29 जुलै


🔰दरवर्षी 29 जुलै या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ साजरा करतात. 2021 साली हा दिवस “त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे” (Their Survival is in our hands) या संकल्पनेखाली पाळण्यात आला.


🔰यानिमित्ताने व्याघ्र संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी जगभरात अनेक उपक्रम राबवले जातात.


⭕️काही ठळक बाबी


🔰भारत जगातल्या 70 टक्के वाघांचे निवासस्थान आहे. भारत 18 राज्यांत पसरलेल्या 51 व्याघ्र राखीव क्षेत्रांची भूमी आहे. 2018 साली झालेल्या व्याघ्र गणनेत वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळले आहे. भारताने व्याघ्र संवर्धनाबाबत सेंट पिट्सबर्ग घोषणापत्रानुसार, निश्चित करण्यात आलेले उद्दिष्ट चार वर्षे आधीच पूर्ण केले आहे.

जगभरात, मुख्यत: आशिया खंडात, वाघांच्या केवळ काही हजार प्रजाती आढळून येतात. फक्त शंभर वर्षांत जगभरातून 90 टक्के वन्य वाघ लोप पावले आहेत. आता जवळपास 3,000 पेक्षा जास्त वाघ जंगलांत राहतात आणि बर्‍याच वाघांच्या प्रजाती आधीच नामशेष झालेल्या आहेत. 


🔰अनेक देशात खिताब आणि औषधी उद्देशाने वाघाच्या शारीरिक अवयवांची मागणी वाढली असल्याने त्यांची तस्करी केली जाते.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दुरुस्ती विधेयक-2021” याला मंजूरी..



🔰“बाल न्याय कायदा-2015” यामध्ये दुरुस्ती सुचवणारे “बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दुरुस्ती विधेयक-2021” 28 जुलै 2021 रोजी राज्यसभेत मंजूर झाले. विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.


🔴विधेयकातील दुरुस्ती...


🔰परकरणांचा त्वरित निपटारा करण्यासाठी आणि जबाबदारी वृद्धिंगत करण्यासाठी या सुधारणांमध्ये अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्याना बाल न्याय कायद्याच्या कलम 61 अंतर्गत दत्तक आदेश जारी करण्यास अधिकृत मान्यता समाविष्ट आहे. याची अंमलबजावणी सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कठीण परिस्थितीत मुलांच्या बाजूने प्रयत्न करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना कायद्याअंतर्गत अधिक अधिकार देण्यात आले आहेत.


🔰कायद्याच्या सुधारित तरतुदींनुसार कोणत्याही बाल-देखभाल संस्थेची नोंदणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या शिफारसींचा विचार करून केली जाईल. जिल्हा दंडाधिकारी स्वतंत्रपणे जिल्हा बाल संरक्षण विभाग, बालकल्याण समित्या, बाल न्याय मंडळे, विशेष बालकांसाठी पोलिस विभाग, बाल देखभाल संस्था इत्यादींच्या कार्याचे मूल्यांकन करतील.

समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ


🌷 डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)


🌷 राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर


🌷 नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)


🌷 कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)


🌷 बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)


🌷 महात्मा फुले- पुणे


🌷 महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)


🌷 गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)


🌷 गोपाळ हरी देशमुख- पुणे


🌷 नया. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)


🌷 सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)


🌷 बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)


🌷 आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-

शिरढोण (रायगड)


🌷 आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)


🌷 सवा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)


🌷 सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)


🌷 विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)


🌷 गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)


🌷 विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)


🌷 डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)


🌷 साने गुरुजी- पालघर (रायगड)


🌷 सत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)


🌷 सनापती बापट- पारनेर (अहमदनगर)


🌷 सत ज्ञानेश्वर- आपेगाव


🌷 सत एकनाथ- पैठण-


🌷 समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना )

आत्तापर्यंतचे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी



१९९६  पु. ल. देशपांडे : साहित्य


१९९७  लता मंगेशकर : कला, संगीत


१९९९  विजय भटकर : विज्ञान


२०००  सुनील गावसकर  : क्रीडा


२००१  सचिन तेंडुलकर : क्रीडा


२००२   भीमसेन जोशी : कला,संगीत 


२००३   अभय बंग आणि राणी बंग  : समाजसेवा व आरोग्यसेवा


२००४  बाबा आमटे : समाज सेवा


२००५  रघुनाथ अनंत माशेलकर  : विज्ञान


२००६  रतन टाटा  : उद्योग


२००७   रा.कृ. पाटील : समाज सेवा


२००८   नानासाहेब धर्माधिकारी : समाज सेवा


२००८   मंगेश पाडगावकर : साहित्य


२००९   सुलोचना लाटकर : कला, सिनेमा


२०१०   जयंत नारळीकर : विज्ञान


२०११  अनिल काकोडकर : विज्ञान


२०१५  बाबासाहेब पुरंदरे : इतिहासलेखन


२०१९  राम सुतार : शिल्पकला


२०२०  आशा भोसले : गायन


ऑस्ट्रेलियाच्या एम्मा मॅकेन यांनी टोकियो ऑलिंपिकमध्ये ०७ पदके जिंकली आहेत



📌 एम्मा मॅकेन टोकियो ऑलिंपिकमध्ये ०४ सुवर्ण व ०३ कांस्य पदकांची कमाई केली आहे


👩‍🦰 अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्या जलतरणपटू व २ऱ्या महिला खेळाडू ठरल्या आहेत


🤸‍♀️ यापुर्वी १९५२ मध्ये सोविएत युनियनच्या 

जिम्नॅस्ट मारीया यांनी ०७ पदके जिंकली होती


🏅 एम्मा मॅकेन यांनी २०१६ रिओ ऑलिंपिकमध्ये ०४ पदके जिंकली होती (🥇१🥈२🥉१)


🏅 तया ऑलिंपिकमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 

११ पदके जिंकणाऱ्या खेळाडू ठरल्या आहेत


🥇 एका ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक ०८ पदके जिंकण्याचा (सर्व सुवर्ण) विक्रम : मायकेल फेल्प्स


📌 २००८ बिजिंग ऑलिंपिकमध्ये अमेरिकेच्या मायकल फेल्प्सने ०८ सुवर्ण पदके जिंकली होती


३० जुलै २०२१

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक



‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी घोषणा करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आज जन्मदिवस. आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेऊ सविस्तर...


*टिळकांचा जीवनप्रवास :*


▪️ लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी मधील चिखलगांवी झाला. स्वातंत्र्यसाठी लढणारी जी अनेक रत्ने होती. त्यांतील हे रत्नागिरीचे ‘रत्न’ होते. त्यांचे ‘केशव’ हे नांव ठेवण्यात आले होते. 


▪️ पण ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. वडील शिक्षण खात्यात सेवेस होते. लहानपणी आई वारल्याने संगोपन चुलतीनेच केले. वडिलांची पुणे येथे बढती मिळाल्याने बदली झाली. वडिलांचे छत्र 19 व्या वर्षी निवर्तले. 


▪️ 16 व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा झाल्याने टिळकांचे लग्न 17व्या वर्षी झाले. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना पदवीधर होण्यासाठी पैशाची फारशी अडचण भासली नाही. 


▪️ 1876 साली टिळक बी. ए. ची परीक्षा गणित घेऊन पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांचे गणित व संस्कृत हे दोन विषय उत्तम होते. पुढे टिळकांनी एल. एल. बी. पर्यंत मजल मारली.


▪️ महाविद्यालामध्ये टिळक असतांना गोपाळ गणेश आगरकर या तरुण मित्राची मैत्री जमली. दोघेही एका विचाराची मने घेऊनी चर्चा करीत. देशात सामाजिक सुधारणा व राजकीय स्वातंत्र्य हे झाले पाहिजे. 


▪️ आगरकरांचा विषय तत्त्वज्ञान तर टिळक गणितवाले ‘जोडणारे तोडणारे’ पण मातृभूमीबद्दल खळबळ आंतरिक एकत्र आले की चर्चा असे विद्यार्थी हवे आहेत. असतीलही कदाचित. 


▪️ दोघांवर पाश्चात्य विचारवंत मिल व स्पेन्सर यांचा प्रभाव होता. यातूनच 2 जानेवारी 1880 ला पुणमध्ये नू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. टिळक-आगरकर यांच्यासमवेत तिसरे सहकारी चिपळूणकर मिळाले व लोकशिक्षण प्रभावी करण्याच्या दृष्टीने ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू करण्याचे ठरले. 


▪️ ‘केसरी’ मधून टिळकांनी आपले जहाल विचार व्यक्त करणे सुरू केलने हे साप्ताहिक महाराष्ट्रात सर्वत्र परिचित झाले. सामाजिक प्रश्नावर आगरकर लिहू लागले. आधी सामाजिक की आधी राजकीय यावर आगरकर आधी सामाजिक तर टिळक आधी राजकीय असे विचार पर्यायाने मतभेद होऊ लागले. 


▪️ टिळक म्हणायचे सामाजिक प्रश्न ही हृदयाची जखम आहे तिला सावकाशपणे हाताळले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक प्रश्न सोडविणे सोपे जाते. यातूनच मतभेद विकोपाला गेला व आगरकरांनी केसरीचे संपादकत्व सोडले. 


▪️ आगरकरांनी सामाजिक प्रश्नासाठी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र काढले. त्यातून टिळकांकडे केसरीचे संपादकत्व आले. टिळकांनी शैक्षणिक संस्थांचा राजीनामा दिला व पूर्णवेळ केसरीकडे दिला. अल्पावधीत ‘केसरी’ प्रसिद्धीस आला.


*टिळकांचं महत्वपुर्ण कार्य :*


▪️ 1880 साली पुण्यात न्यु इंग्लिश हायस्कुलची स्थापना

▪️ 1881 साली जनजागृतीकरता ’केसरी’ व ’मराठा’ अशी वृत्तपत्र सुरू

▪️ 1884 साली पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 

▪️ 1885 साली पुणे येथेच फग्र्युसन काॅलेज सुरू केले

▪️ ’सार्वजनिक गणेशोत्सव’ आणि ’शिव जयंती’ उत्सवाला सुरूवात 

▪️ 1897 राजद्रोहाचा आरोप लावुन टिळकांना दिड वर्षांची कैद 

▪️ 1916 साली ’होमरूल लीग’ संघटनेची स्थापना 

▪️ टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हंटले गेले

▪️ टिळक ’लाल बाल पाल’ या त्रिमूर्तीमधील एक


दरम्यान, 1 आॅगस्ट 1920 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अखेरचा श्वास घेतला.

भारतीय विमान वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा



भारतीय विमान वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेऊयात सविस्तर...


टाटा यांचा जीवनप्रवास :


▪️ ज. आर. डी. टाटा यांचा जन्म २९ जुलै १९०४ रोजी पॅरिसमध्ये झाला. उद्योगपती रतनजी दादाभॉय टाटा हे त्यांचे वडील आणि त्यांच्या आईचे नाव होते. 


▪️ सझान ब्रीअरे. त्या फ्रेंच होत्या. रतनजी टाटा हे टाटा उद्योगसमूहाची स्थापना करणाऱ्या सर जमशेदजी टाटा यांचे चुलत बंधू होते. 


▪️ ‘जेआरडी’ यांची आई ही भारतात १९२९ मध्ये कार चालवणारी पहिली महिला होती. जे. आर. डी. टाटा हे देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते. 


▪️ टाटा उद्योगसमूहातील अनेक नव्या उद्योगांचा पाया ‘जेआरडीं’नी घातला. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्रीज, टाटा टी, व्होल्टास आणि देशातील पहिली विमान कंपनी एअर इंडिया यांचा समावेश आहे. 


▪️ फरान्स, लंडन, जपान आणि भारतात त्यांचे शिक्षण झाले. १९२५मध्ये त्यांनी ‘टाटा सन्स’मध्ये बिनपगारी अॅप्रेंटिस म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. 


▪️ १९३८ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी ते ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष बनले होते. स्टील, रसायने, ऊर्जा, वीज, अभियांत्रिकी आणि आतिथ्यशीलता या क्षेत्रात त्यांना अधिक रस होता. 


▪️ तयामुळे या क्षेत्रातील अनेक उद्योगांचा पाया त्यांनी घातला. उद्योगात मूल्य आणि तत्त्वे यांचा पाया बळकट करून त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा आदर्श जगासमोर उभा केला. 


▪️ टाटा म्हणजे विश्वासार्हता, हे समीकरण जनमानसात रुजवण्यात ‘जेआरडीं’चे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली टाटा समूहाने आपली उलाढाल १०० दशलक्ष अमेरिकी डॉलरवरून पाच अब्ज डॉलर्सच्या पुढे नेली. 


▪️ ८८ व्या वर्षापर्यंत कार्यरत असलेल्या ‘जेआरडीं’च्या नेतृत्वाखाली टाटा समूहाच्या कंपन्यांची संख्या ९५ झाली होती. सर दोराबजी टाटा ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. 


▪️ तयांच्याच मार्गदर्शनाखाली १९४१मध्ये टाटा मेमोरिअल सेंटर हे कर्करोगावर उपचार, संशोधन करणारे आशियातील पहिले रुग्णालय उभे राहिले. 


▪️ १९३६ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, १९४५मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि राष्ट्रीय सादरीकरण कला केंद्र या संस्थांची स्थापनाही ‘जेआरडीं’नी केली. १९४५ मध्ये टाटा मोटर्सची स्थापनाही त्यांनी केली. 


▪️ १९३२ मध्ये त्यांनी टाटा एअरलाइन्स ही स्वतःची विमान कंपनी स्थापन केली. नंतर तिचे राष्ट्रीयीकरण करून ती एअर इंडिया झाली. ‘जेआरडी’ २५ वर्षे या कंपनीचे अध्यक्ष होते. देशात सर्वोत्तम हवाई वाहतूक सेवा देण्याचे त्यांचे स्वप्न होते. 


▪️ तयासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या या योगदानाची दाखल घेऊन त्यांना मानद एअर कमोडोर पद देण्यात आले होते. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले होते. १९५५ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 


▪️ दरम्यान, देशाच्या प्रगतीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च मानाच्या नागरी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले होते. या महान उद्योजकाचा १९९३ मध्ये वयाच्या ८९व्या वर्षी २९ नोव्हेंबर १९९३ रोजी जीनिव्हामध्ये मृत्यू झाला.

वडील - मुलगा एकाच राज्याचे मुख्यमंत्री



👨‍👦 बीजु पटनायक - नवीन पटनायक (ओडिशा)


👨‍👦 एम करुणानिधी - स्टॅलिन (तमिळनाडू)


👨‍👦 शिबु सोरेन - हेमंत सोरेन (झारखंड)


👨‍👦 मलायमसिंह यादव - अखिलेश (उत्तरप्रदेश)


👨‍👦 राजशेखर रेड्डी - जगनमोहन (आंध्रप्रदेश)


👨‍👦 शख अब्दुल्ला - फारुख अब्दुल्ला (जे&के)


👨‍👦 फारुख अब्दुल्ला - उमर अब्दुल्ला (जे&के)


👨‍👦 दवी लाल - ओम प्रकाश चौटाला (हरियाणा)


⭐️ शकरराव चव्हाण - अशोक चव्हाण (महाराष्ट्र)


👨‍👦 पीए संगमा - कोनराड संगमा (मेघालय)


👨‍👦 रविशंकर शुक्ला - श्यामा चरण (मध्यप्रदेश)


👨‍👦 दोरजी खांडू व पेमा खांडू (अरुणाचल)


👨‍👦 एचडी देवेगौडा - कुमारस्वामी (कर्नाटक)


👨‍👦 एस आर बोम्मयी - बसवराज (कर्नाटक)

मीराबाई चानु .... 'लाकूडतोड ते अॉलिंपिक पदक!'

 


मीराबाई चा जन्म मणीपूर मधल्या एका खेड्यातला! 'लाकूड' हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकडं आणण्यासाठी आपल्या भावंडांबरोबर जायची. सहा भावंडातली ती सर्वात लहान. पण येताना सर्वात जास्त लाकडं ती घेऊन यायची. तिनं आणलेली मोळी तिच्या मोठ्या  भावांनाही  उचलता येत नसे. तिची आई चाणाक्ष होती. आपल्या मुलीला वेटलिफ्टर बनवावं अशी तिची इच्छा होती. पण मीराला मात्र तिरंदाज व्हायचं होतं. मात्र आठवीच्या पुस्तकात तिनं मणीपूरच्याच कुंजराणी देवीवरचा धडा वाचला आणि तिचं जीवनाचं ध्येय ठरलं... वेटलिफ्टरच व्हायचं! 


नंतर खडतर परिश्रम करत राज्य पातळीवर,  राष्ट्रीय पातळीवर तिनं उत्तम चमक दाखवली. आशियाई गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स , जागतिक चँपियनशिप अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धात तिनं सुवर्णपदकं जिंकली. 


पण सर्वात महत्वाची स्पर्धा म्हणजे अॉलिंपिक ! 2015 च्या रिओ अॉलिंपिक मधे तीन प्रयत्नात ही वजन उचलण्यात अपयशी ठरली. तिच्या कारकीर्दीला लागलेला हा फार मोठा डाग होता. 2015 नंतर तिनं वर नमूद केल्याप्रमाणे अनेक पदकं जिंकलेली असली तरी रिओ मधील अपयशाची भरपाई झाली नव्हती. 


त्यातच तिला पाठीच्या दुखण्याचा जबरदस्त त्रास होऊ लागला. दोन-तीन दिवसातून एकदा सराव करणंही अशक्य झालं. तशात कोवीडचं संकट ! लॉकडाऊन मुळे प्रॕक्टिस पूर्णपणे बंद! करियर संपणार की काय अशी सर्वांना धास्ती वाटू लागली. पण केंद्र सरकारनं 71 लाख रुपये खर्च करुन तिला ट्रेनिंग आणि प्रॕक्टिस साठी अमेरिकेत पाठवलं.. अॉक्टोबर 2020 मधे. तिथल्या प्रशिक्षणाचे सुपरिणाम लवकरच दिसू लागले. दररोज सराव करणं शक्य होऊ लागलं. हळूहळू दिवसातून दोनदा सराव करायलाही जमू लागलं. तिची जिद्द, चिकाटी, मेहनत यावर प्रशिक्षक खूष झाले. 


... आणि पुन्हा एकदा मोठ्या परीक्षेचा दिवस उजाडला ... टोकियो अॉलिंपिक ! यावेळी मीरा पूर्ण तयारीत होती. यावेळी रिओची पुनरावृत्ती घडणार नव्हती. 49 कि. गटात तिनं, 'क्लीन अँड जर्क' मधे 115 किलो वजन उचलून नवीन अॉलिंपिक रेकॉर्ड केलं. आणि एकूण 202 किलो वजन उचलून तिनं 'सिल्व्हर मेडल' जिंकलं. संपूर्ण देशात आनंदाची लहर उमटली. 


जे हात  लाकडाची मोळी वाहून आणत होते तेच आज 'अॉलिंपिक पदक' अभिमानानं उंचावत आहेत. अतिशय प्रेरणादायी अशी ही जीवनकथा !

आता शालेय पुस्तकात मीराबाईच्याही जीवनावरचा एक धडा समाविष्ट झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

२९ जुलै २०२१

उत्तराखंडमध्ये १ ऑगस्टपासून शाळेची घंटा वाजणार; ६ वी ते १२ वीपर्यंत वर्ग सुरु करण्याची परवानगी.



🔰करोनामुळे शिक्षणक्षेत्राचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. देशात सध्या ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. दहावी, बारावीच्या परीक्षाही रद्द कराव्या लागल्या होत्या. तसेच अंतर्गत मूल्यांकनावर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी शाळा कधी सुरु होणार? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. आता देशातील अनेक राज्यात शाळा सुरु करण्यासाठी पावलं उचलली जात आहे. आता उत्तराखंड सरकारने निर्णय घेत १ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.


🔰सहावी ते बारावीच्या वर्ग सुरु करण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. १ जुलैपासून राज्यातील सर्व शाळा ऑनलाइन सुरु करण्याचे आदेश सरकारने दिले होते. शाळांना ३० जूनपर्यंतची उन्हाळी सुट्टी होती. दुसरीकडे उत्तराखंड विधानसभेचं पावसाळी अधिवेशन २३ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे.


🔰उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलं आहे. यूपीएससी, एनडीए, सीडीएसची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

भारतात प्रवास करणाऱ्या नागरिकांवर ‘हा’ देश घालणार तीन वर्षांची बंदी; कायदेशीर कारवाईचाही इशारा.



🔰करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सौदी अरेबियाकडून महत्वाची पावलं उचलली जात असून काही देशांना रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. या देशांमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सौदी अरेबियाने दिला आहे. या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांवर तीन वर्षांसाठी प्रवासाची बंदी घालण्यात येणार असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.


🔰परराष्ट मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, काही सौदी नागरिक ज्यांना मे महिन्यात प्रशासनाने कोणत्याही परवानगीशिवाय परदेशात प्रवास करण्याची परवानगी दिली होती त्यांनी प्रवासी नियमांचं उल्लंघन केलं आहे. मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच ही परवानगी देण्यात आली होती.


🔰“जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसंच मोठा दंड ठोठावला जाईल. याशिवाय त्यांच्यावर तीन वर्षांसाठी प्रवासबंदी घालण्यात येईल,” असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. सौदी अरेबियाने ज्या देशांमध्ये प्रवास करण्यास बंदी घातली आहे त्यामध्ये भारताचाही समावेश आहे.


🔰सौदी अरेबियाने अफगाणिस्तान, अर्जेंटिना, ब्राझील, इजिप्त. इथोपिया, भारत. इंडोनेशिया, लेबॅनन, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, तुर्की, व्हिएतनाम आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये प्रवास करु नये असा आदेश आपल्या नागरिकांना दिला आहे. “नागरिकांना ज्या देशांनी अद्याप करोनावर नियंत्रण मिळवलेलं नाही किंवा क्या देशांमध्ये नवे विषाणू फैलावत आहेत तिथे थेट किंवा दुसऱ्या देशांमधून प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे”.

अकरावीच्या सीईटीसाठी नोंदणीस मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फॉर्म

 


🔰राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी (FYJC CET 2021) सुरू झाली आहे. मात्र, नोंदणी करताना विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. जवळपास तीन ते चार दिवस वेबसाईटच सुरु होत नसल्याने नोंदणी कशी करायची असा प्रश्न विद्यार्थ्यासमोर होता.


🔰दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच पुरजन्य परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत २ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अकरावी सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत २६ जुलै पर्यंत होती.


🔰दहावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यायची आहे ते विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करु शकणार आहेत. मात्र, अद्यापही वेबसाईट बंद असल्याचं समोर आलं आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे.

काकतीया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर: भारतातील 39 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ..



🔰भारतामधील काकतीया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर याचा UNESCO संस्थेच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. तेलंगणा राज्यातील वारंगळ मालुगू जिल्ह्यातील पालमपेठ येथे हे मंदिर आहे. यासह ते भारतातील 39 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ ठरले आहे.


🔰रामप्पा मंदिर हे तेराव्या शतकातील तंत्रज्ञानाची कमाल दाखवणारी एक अद्भुत वास्तुकला आहे.


🔴भारतातील जागतिक वारसा स्थळे...


🔰सयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.


🔰आता, भारतात एकूण 39 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 31 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

कोविंद यांच्याकडून चार वर्षांत ६३ विधेयकांना मंजुरी.



🔰राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कार्यकालातील चार वर्षे पूर्ण केली असून त्यांनी आतापर्यंत ६३ विधेयकांना मान्यता दिली आहे. त्यांनी करोना काळात आघाडीवर काम करणाऱ्या करोना योद्ध्यांचे कौतुक केले होते. कोविंद हे ७६ वर्षांचे असून त्यांचा शपथविधी २५ जुलै २०१७ रोजी झाला होता.


🔰राष्ट्रपती भवनने म्हटले आहे की, ते पदाची चार वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या कामांची इ पुस्तिकाही यावेळी जारी करण्यात आली आहे. कोविंद यांनी १३ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांना भेट दिली असून ७८० लोकांची भेट वेगवेगळ्या निमित्ताने घेतली आहे. राज्यघटनेचे रक्षणकर्ते म्हणूनही त्यांनी भूमिका पार पाडली. केंद्र सरकारची ४३ व राज्य सरकारांची २० विधेयके त्यांनी मंजूर केली आहेत.


🔰करोना योद्ध्यांना स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपती भवनात बोलावून त्यांचा प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान करीत त्यांचे धैर्य व समर्पण याला मोलाची साथ दिली होती असे इ पुस्तिकेत म्हटले आहेत. परिचारिका संघटना, लष्करी परिचर संघटना, राष्ट्रपती आस्थापना दवाखाना परिचर यांच्यासमवेत त्यांनी रक्षाबंधन साजरे केले होते. 


🔰एकूण २३ परदेशी राजदूतांची अधिकारपत्रे त्यांनी स्वीकारली तसेच अनेकदा राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. कर्नाटकातील जनरल थिमय्या म्युझियमचे उद्घाटन त्यांनी केले होते. अंदमान निकोबार कमांडच्या स्वराज दीप संचलनाची सलामी त्यांनी स्वीकारली होती.

‘शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश...



*‘एमपीएसएसी’च्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा;विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून पद भरतीसाठी सूट*


 *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय*


           


मुंबई, दि. २८ जुलै - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून सूट देण्यात यावी. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. 


मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात राज्य शासनातील एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 


बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, लेखा व कोषागार विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील आदी उपस्थित होते. 


‘कोरोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आली आहे. दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासननिर्णयानुसार राज्यातील इतर विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला निर्बंध लावण्यात आले होते. मात्र विशेष बाब म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त असणाऱ्या पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदासह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून सूट देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक १५ ऑगस्टपर्यंत संबंधित विभागांनी ‘एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यामुळे ‘एमपीएससी’ ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सामान्य ज्ञान | Generl Knowldge |



● कोणत्या खेळाडूने ‘कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप’ स्पर्धेत ७३ किलोग्राम गटाचे सुवर्ण पदक जिंकले?

उत्तर : प्रिया मलिक


● कोणत्या राज्यात अमित शहा यांच्या हस्ते ग्रीन सोहरा वनीकरण मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला?

उत्तर : मेघालय


● 

कोणत्या दिवशी  ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात येतो?

उत्तर : २६ जुलै


● कोणती व्यक्ती ‘अ‍ॅन ऑर्डिनरी लाइफ: पोर्ट्रेट ऑफ अॅन इंडियन जनरेशन’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?

उत्तर : अमृता प्रीतम


● कोणत्या मंत्रालयाने “pmcaresforchildren.in” हे संकेतस्थळ सक्रिय केले?

उत्तर : महिला व बाल विकास मंत्रालय


● कोणत्या बँकेला इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC) यांच्याकडून हरित गृहनिर्माणसाठी 250 दशलक्ष डॉलरचे कर्ज प्राप्त झाले?

उत्तर : एचडीएफसी लिमिटेड


● कोणता देश फेसबुक याला एक पर्याय म्हणून ‘जोगाजोग’ नामक सोशल मीडिया मंच तयार करीत आहे?

उत्तर : बांगलादेश


● कोणत्या दिवशी ‘जागतिक जलसमाधी दिवस’ साजरा करतात?

उत्तर : २५ जुलै


● कोणत्या दिवशी २०२१ साली ‘आषाढ पौर्णिमा-धम्म चक्र दिवस’ साजरा करण्यात आला?

उत्तर : २४ जुलै


● कोणत्या खेळाडूला ‘एआयएफएफ फुटबॉलर ऑफ द इयर २०२०-२१’ घोषित करण्यात आले?

उत्तर : बाला देवी आणि संदेश झिंगन


● अकामाई टेक्नोलॉजीज कंपनी हे जागतिक डिजिटल सामुग्री वितरण करणारे एक जाळे असून त्याचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर : मॅसेच्युसेट्स, अमेरिका


● ‘मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स’ या कंपनीने स्वत:चे नाव बदलून काय ठेवले आहे?

उत्तर : निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स


● कोणत्या दिवशी १६१ वा “प्राप्तिकर दिवस” साजरा करण्यात आला?

उत्तर : २४ जुलै


● जागतिक आरोग्य संस्थेच्या पहिल्या ‘जलसमाधी प्रतिबंधक उपाय विषयक प्रादेशिक स्थिती’ या अहवालानुसार, कोणत्या प्रदेशात जलसमाधीमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही एकूण जागतिक मृत्यूंपैकी जवळजवळ दोन तृतीयांश आहे?

उत्तर : आशिया-प्रशांत


● कोणत्या दिवशी “जागतिक मेंदू दिवस” साजरा करतात?

उत्तर : २२ जुलै


● कोणत्या व्यक्तीला ब्रिटीश उच्चायुक्त यांच्यावतीने दिल्या गेलेल्या ‘अलेक्झांडर डलरीम्पल पुरस्कार’ प्राप्त झाला?

उत्तर : व्हाइस अ‍ॅडमिरल विनय बधवार

युनेस्को - जागतिक वारसा स्थळ



👉 सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला जातो. 

👉 जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केल्यानंतर त्या स्थळाच्या देखभालीसाठी व संरक्षणासाठी 'युनेस्को'कडून अनुदान दिले जाते.

👉 जागतिक वारसा स्थळांचे नैसर्गिक, सांस्कृतिक व मिश्र अशा तीन गटात वर्गीकरण केले जाते.

👉 जलै 2021 अखेर जगभरातील 167 देशांमध्ये 1120 जागतिक वारसा स्थळे आहेत. (यामध्ये 868 सांस्कृतिक, 213 नैसर्गिक व 39 मिश्र स्थळांचा समावेश) 


🔘 सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असणारे पहिले पाच देश :

1. इटली (57)

2. चीन (55)

3. स्पेन (49)

4. जर्मनी (46)

5. फ्रान्स (45)


👉 भारत (39) या यादीत सहाव्या स्थानी आहे.


🔘 UNESCO बाबत : 


👉 सयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे.

👉 सथापना : 16 नोव्हेंबर 1945

👉 सथळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो. 

👉 भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.


धोलावीरा (हडप्पाकालीन शहर): भारतातील 40 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ..



🎭गजरातच्या कच्छच्या रणमधील हडप्पाकालीन शहर असलेल्या धोलाविरा या स्थळाला जुलै 2021 महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान मिळाले आहे.


🎭याव्यतिरिक्त अलीकडेच, तेलंगाना राज्यात मुलुगु जिल्ह्यात पालमपेट येथील रुद्रेश्वर मंदिराला (ज्याला रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाते) भारतातील 39 वे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख मिळाली आहे.


🎭भारताकडे आता एकूण 40 जागतिक वारसा स्थळे आहेत, ज्यात 32 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि एका संमिश्र स्थळांचा समावेश आहे.


🎗धोलावीरा शहराविषयी...


🎭हडप्पा संस्कृतीतील हे शहर दक्षिण आशियातील अगदी मोजक्या उत्तम पद्धतीने जतन केलेल्या प्राचीन नागरी वसाहतींपैकी एक आहे. ख्रिस्तपूर्व काळात, तिसऱ्या सहस्त्रकाच्या मध्यापासून ते दुसऱ्या सहस्त्रकापर्यंतच्या काळात इथे मानवी संस्कृती असल्याच्या खुणा सापडतात. धोलाविरा हे एक महत्त्वाचे शहरी केंद्र होते.


🎭आशियात सापडलेल्या हडप्पा संस्कृतीच्या 1000 प्राचीन जागांमध्ये हे स्थळ सहाव्या स्थानी असून, या ठिकाणी सुमारे 1500 वर्षे मानवी वस्ती असावी, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मानवी जीवनाच्या या प्राचीन, अत्यंत सुरुवातीच्या काळातील,नागर संस्कृतीचा उदय आणि अस्त या दोन्हीचे धोलावीरा हे साक्षीदार आहे.  त्या काळातील नागरी शहररचना, बांधकाम तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन, सामाजिक प्रशासन आणि त्याचा विकास, कला, उत्पादन, व्यापार, तसेच श्रद्धा-समजुती अशा त्या संस्कृतीतील सर्व समृद्ध जीवनाची माहिती आपल्याला या स्थळी मिळू शकते.


🎭धोलावीरा येथे, या सर्व संस्कृतींच्या खुणा अत्यंत उत्तम पद्धतीने जतन केल्या असून, अतिशय समृद्ध अशा कलात्मक वस्तूंच्या या नागरी वस्तीची सर्व प्रादेशिक वैशिष्ट्येही याठिकाणी आपल्याला आढळतात. ज्यातून, एकूण हडप्पा संस्कृतीविषयीचे समग्र ज्ञान आपल्याला मिळू शकते.


🎭धोलावीरा या शहराच्या जन्मापासून त्याची नगररचना, ही नियोजित शहर आणि वर्गीकृत अशा नागरी रहिवासी वस्त्यांचे अप्रतिम उदाहरण आहे. त्या काळातील लोकांच्या विविध व्यावसायिक कामांच्या अनुषंगाने तशी स्तररचना करण्यात आली आहे. जल संवर्धनातील, सांडपाणी व्यवस्थेतील तंत्रज्ञानाची प्रगती तसेच स्थापत्यशास्त्र आणि तंत्रज्ञान दृष्ट्या विकसित वैशिष्ट्ये, या रचनेत आपल्याला जागोजागी दिसतात. विशेष म्हणजे त्यात स्थानिक साहित्याचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.


🎭धोलावीरा हे प्रगैतिहासिक कांस्ययुगीन हडप्पा नागर संस्कृतीचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. या वारसा स्थळी, हडप्पा संस्कृतीची सुरुवात, एक विकसित समृद्ध संस्कृति आणि अखेरचा काळ, या सर्व खुणा आढळतात. अगदी सुरुवातीच्या काळातील पुरावा, ख्रिस्तपूर्व 3000 वर्षापूर्वीचा म्हणजे हडप्पा संस्कृतीचे पुरावे सापडतात.


🎭पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्यासाठी तयार करण्यात आलेली अत्यंत महागडी जलव्यवस्थापन प्रणाली, त्या काळातील लोकांची भू-हवामानात होणाऱ्या बदलांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या धडपडीची साक्ष देणारी आहे. पावसाळी झऱ्यांमधील पाणी वळवणे, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध भूजलाचा वापर करणे, मोठमोठ्या दगडी जलाशयांमध्ये त्याची साठवणूक आणि जतन करणे हे आजही आपल्याला पौर्वात्य आणि दक्षिण संस्कृतित आजही आपल्याला दिसते. तसेच, पाणी मिळवण्यासाठी खडकात खोदलेल्या विहिरी या अशाप्रकारचे सर्वात प्राचीन उदाहरण आहे. अशा प्रकारची रचना त्यांच्या किल्यामध्ये आढळते धोलावीरा इथल्या जलसंवर्धनाच्या पद्धती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून प्राचीन जगातातील त्या सर्वाधिक प्रभावी उपाययोजना मानल्या जातात.

अमेरिकेतील लस घेतलेल्या नागरिकांनाही पुन्हा घालावा लागणार मास्क; आरोग्य प्रशासनाचे निर्देश.


🔰अमेरिकेत करोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या भागांमधील लस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालावा लागणार आहे. आरोग्य प्रशासनाने लसीकरण झालेल्या या नागरिकांना मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत. करोना विषाणूंमध्ये सतत बदल होत असल्याने आणि डेल्टा व्हेरियंटवर मात करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत.


🔰रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (Centers for Disease Control and Prevention) संचालकांनी पत्रकार परिषदेत मास्क वापरण्यासंबंधी निर्देश दिले. डेटानुसार लस अत्यंत प्रभावी आहे, मात्र डेल्टाच्या काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.


🔰“संसर्गाचं प्रमाण जास्त तसंच धोकादायक ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्यांनी घरांमध्येही मास्क वापरण्याची शिफारस सीडीसी करत आहे,” असं त्यांनी सांगितलं. सीडीसीच्या ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील दक्षिण भागात संक्रमणाचं प्रमाण अधिक आहे. तर दुसरीकडे ईशान्येकडील लसीकरण झालेल्या भागांमध्ये संक्रमणाचा मध्यम स्तरावर आहे.

NMCG संस्थेचा ‘गंगा नदीच्या खोऱ्यात जलसंवेदनशील शहरे तयार करणे’ उपक्रम..



🔰विज्ञान व पर्यावरण केंद्र (CSE) या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने (NMCG) ‘गंगा नदीच्या खोऱ्यात जलसंवेदनशील शहरे तयार करणे’ या विषयावर आधारित एक नवीन क्षमता निर्मितीचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.


🔰गगा नदीच्या खोऱ्यातील शहरांमध्ये नदीचे आरोग्य सुधारण्यात मदत होणाऱ्या शस्वत शहरी जल व्यवस्थापनास प्रोत्साहन देण्यासाठी क्षमता निर्मिती आणि कृती संशोधनाला चालना देणे, हा या उपक्रमाचा हेतु आहे.


🔴कार्यक्रम पुढील घटकांवर केंद्रीत असणार,


जल संवेदनशील नागरी संरचना आणि नियोजन

शहरी भूजल व्यवस्थापन

शहरी जल कार्यक्षमता आणि संवर्धन

विकेंद्रित सांडपाण्यावरील प्रक्रिया आणि स्थानिक पुनर्वापर

शहरी पाणी संस्था / तलाव व्यवस्थापन

या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या भागधारकांमध्ये महानगरपालिका, तांत्रिक आणि संशोधन घटक, राज्य कार्यक्रम व्यवस्थापन गट, नमामि गंगे, आंतरराष्ट्रीय संस्था आणि स्थानिक तळागाळातील समुदाय यांचा समावेश आहे.


🔴राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) विषयी...


🔰राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) ही राष्ट्रीय गंगा परिषदेची अंमलबजावणी करणारी शाखा आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये लागू झालेल्या “गंगा नदी (पुनरुत्थान, संरक्षण व व्यवस्थापन) प्राधिकरणे आदेश 2016” अंतर्गत NMCG ची स्थापना झाली.

संयुक्त राष्ट्रातील पी ५ गटात भारताने समतोल साधला- तिरूमूर्ती.



🔰संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या भारताने समतोल साधण्याचा  प्रयत्न केला आहे. पाच स्थायी सदस्यांमधील मतभेद मिटवण्यात मोठे काम केले आहे, असे भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत  तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचे फिरते अध्यक्षपद १ ऑगस्टला मिळणार असून  २०२१-२२ या काळात हे पद भारताकडे राहणार आहे. सुरक्षा मंडळात एकूण पंधरा अस्थायी देश आहेत.


🔰भारताला सुरक्षा मंडळात अतिशय महत्त्वाच्या काळात पद मिळाले असून जग करोनात चाचपडत असताना व त्यावरून मतभेद व वादविवाद असताना सुरक्षा मंडळ व इतर पातळीवरही भारत सामूहिक कृतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे भारताचे राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, भारत सदस्य देशांमधील मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करील. कारण सध्या अनेक प्रश्नांवरून सुरक्षा मंडळात वादविवाद आहेत.


🔰अनेक प्रश्नांवर भारताने ठोस भूमिका गेल्या सात महिन्यात घेतली आहे. कुठलीही जबाबदारी घेण्यात टाळाटाळ केलेली नाही. भारतासारख्या स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या देशाचा संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा मंडळात महत्त्वाचे पद मिळाल्याने बहुमान होत आहे पण त्याचबरोबर पाच कायम सदस्य असलेल्या देशातील मतभेद टाळण्यास मदत होणार आहे. चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन व अमेरिका हे सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्य असलेले देश आहेत. सुरक्षा मंडळातील ध्रुवीकरण टाळण्याचा प्रयत्न करून विचारांती निर्णय घेण्यास भाग पाडू असे सांगून ते म्हणाले की, म्यानमार, अफगाणिस्तान यांसारख्या देशातील परिस्थितीवर चर्चा करण्याची गरज असून तेथील परिस्थितीबाबत संवेदनशीलता दाखवली पाहिजे.

Kargil Vijay Diwas : ४ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान काय काय घडलं?; जाणून घ्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम



🔰टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध


🔰आजच्याच दिवशी २१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला. त्याच निमित्ताने १९९९ च्या कारगिल युद्धात नक्की काय घडले यावर ‘लोकसत्ता डॉटकॉम’ने टाकलेली नजर…


🔰 भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते.



🔰 कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली.


🔰 टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरले.


१९९९च्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम….


🔰 म ४: कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली.


🔰 म ५ ते मे १५: या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते.


🔰 म २६: भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.


🔰 म २७: भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.


🔰 म ३१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती दिली.


🔰 जन १०: पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती.


🔰 जन १२: दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चर्चेनंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच घुसखोरांनी परत जायला हवे असे सांगितले.


🔰 जन १५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली


🔰 जन २९: भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या.


🔰 जलै ४: संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली


🔰 जलै ५: शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली


🔰 जलै ११: पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली


🔰 जलै १४: भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला


🔰 जलै २६: कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली.

२५ जुलै २०२१

फ्रान्सवरून आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखल.



🔰राफेल लढाऊ विमानांच्या सातव्या खेपेत आज आणखी तीन विमानं फ्रान्सवरून थेट भारतात दाखल झाली आहेत. जवळपास ८ हजार किलोमीटरचा प्रवास करून ही विमानं भारतात आली आहेत. या विमानांचा भारतीय वायूसेनेच्या राफेल विमानांच्या दुसऱ्या स्क्वाड्रनमध्ये समावेश केला जाणार आहे.


🔰भारतीय वायू सेनेने ही तीन विमानं भारतात दाखल झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. या विमानांच्या प्रवासा दरम्यान हवाई मार्गात यूएईने त्यांना इंधन उपलब्ध करून दिलं. याबद्दल भारतीय वायू सेनेकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.


🔰फरान्सच्या इस्त्रेस एअर बेसवरून उड्डाण घेऊन न थांबता तीन राफेल विमानं काही वेळापूर्वीच भारतात पोहचली. हवाई मार्गात मदत पुरवल्या बद्दल यूएई वायू सेनेला भारतीय वायू सेना धन्यवाद देते. असं ट्विट वायू सेनेकडून ट्विट करण्यात आलं आहे.


🔰राफेल विमानांची ही खेप भारतात पोहचल्यानंतर आता भारताकडे २४ राफेल विमानं झाली आहेत. राफेल जेटची नवीन स्क्वाड्रन पश्चिम बंगालच्या हासीमारा एअर बेसवर असेल. पहिली राफेल स्क्वाड्रन अंबाला वायू सेना स्टेश

चक दे इंडिया..! मेरी कोम आणि मनप्रीतनं केलं भारतीय पथकाचं नेतृत्व.



🔰जपानची राजधानी टोकियो येथे आजपासून ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. करोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी तहकूब करण्यात आल्या. पण एका वर्षानंतर या स्पर्धा खेळल्या जात आहेत.


🔰आज या स्पर्धेचा उद्धाटन सोहळा अतिशय दिमाखात रंगला. टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या मार्चपास्टमध्ये भारतीय तुकडी २१ व्या क्रमांकावर उतरली. यात २२ खेळाडू आणि ६ अधिकारी सहभागी झाले. या मार्चपास्टमध्ये ग्रीकचा पहिला क्रमांक होता.


🔰सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व केले. भारतीय पथकाच्या प्रवेशावेळी पंतप्रधान मोदींनी टाळ्या वाजवून संघाला प्रोत्साहन दिले. १२७ खेळाडूंसह २२८ सदस्यीय पथक टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाठवण्यात आले आहे.

ग्वाल्हेर आणि ओरछा या शहरांचा UNESCO संस्थेच्या 'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट' अंतर्गत समावेश



🌹21 जुलै 2021 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (UNESCO) 'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट' अंतर्गत मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर (किंवा ग्वालियर) आणि ओरछा या ऐतिहासिक शहरांमध्ये विकास कार्यांचे उद्घाटन झाले.


🌹परकल्पाच्या अंतर्गत चालणारी कार्ये UNESCO संस्थेच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार आणि मध्य प्रदेश सरकार संयुक्तपणे चालविणार आहेत.


प्रकल्पाविषयी


🌹सस्कृती आणि वारसा जपताना वेगाने वाढणाऱ्या ऐतिहासिक शहरांच्या समावेशक व सुनियोजित विकासासाठी 'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट' या अंतराष्ट्रीय प्रकल्पाचा 10 नोव्हेंबर 2011 रोजी प्रारंभ करण्यात आला आहे.


🌹'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप' दृष्टिकोन मानवी, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी मुख्य संपदा म्हणून सांस्कृतिक विविधता आणि सर्जनशीलता लक्षात घेतो आणि भौतिक व सामाजिक परिवर्तनांचे व्यवस्थापन करण्यासाठी साधने प्रदान करतो.


🌹वर्तमानात, UNESCO संस्थेच्या 'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट' अंतर्गत दक्षिण आशियातील 8 शहरांची निवड केली गेली आहे. 


🌹तयात अजमेर (राजस्थान), वाराणसी (उत्तर प्रदेश), ग्वाल्हेर आणि ओरछा (मध्य प्रदेश) या चार भारतीय शहरांचा समावेश आहे.

अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक-2021



🎗22 जुलै 2021 रोजी लोकसभेत.‘अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक-2021’ चर्चेसाठी मांडण्यात आले.


🎲ठळक बाबी...


🎗दशभरातील सर्व सरकारच्या मालकीच्या आयुध निर्मिती कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यापासून रोखण्यासाठी या विधेयकाची रचना केली गेली आहे.


🎗विधेयकात असे म्हटले गेले आहे की, निर्बाध पुरवठा, संरक्षणाबाबत सज्जता ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि म्हणूनच कर्मचार्‍यांचा संप किंवा कोणत्याही अडथळाविना कारखान्यांची कार्ये सतत चालू ठेवावे.


🎗जन 2021 महिन्यात, केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुध निर्मिती कारखाने मंडळाला औद्योगिक कंपनीचे स्वरूप देण्याच्या योजनेला मान्यता दिली. योजनेनुसार, देशातील 41 आयुध निर्मिती कारखान्यांचे विलीनीकरण करून 7 नवीन संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (DPSU) तयार केले जातील. त्यांचे 100 टक्के स्वामित्व भारत सरकारकडे असेल.

'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार'



🔰 पुरस्काराची सुरुवात :- एप्रिल 1957.


🔰 'रॅमन मॅग्सेसे' हे आशियाचे नोबेल पारितोषिक म्हणूनही ओळखले जाते.


🔰 हा पुरस्कार फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो.


🔰 2009 पासून ह पुरस्कार खालील सहा प्रकारात दिला जातो.


1. Government services (GS)

2. Public services (PS)

3. Community leadership(CL)

4. Journalism, literature & creative communication arts (JLCCA)

5. Peace and International Understanding (PIU)

6. Emergent leadership (EL)


🔰 जर्नलिज्म, लिट्रेचर और क्रिएटिव कम्युनिकेशन आर्ट्स कैटेगरी मध्ये  'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' भेटलेले भारतीय व्यक्ती :-


🔸 2019 - रवीश कुमार

🔹 2007 - पालगुम्मी साईनाथ

🔸 1997 - महेश्वेता देवी

🔹 1992 - रवि शंकर

🔸 1991- के वी सुबबना

🔹 1984 - राशीपुरम लक्ष्मण

🔸 1982 - अरुण शौरी

🔹 1981 - गौर किशोर घोष

🔸 1975 - बूबली जॉर्ज वर्गीस

🔹 1967 - सत्यजित राय

🔸 1961 - अमिताभ चौधरी

 

🔹 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारे पाहिले भारतीय. :- विनोबा भावे

🔸 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारी पाहिली भारतीय महिला. :- मदर टेरेसा

🔹 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारे पाहिले भारतीय पत्रकार. :- अमिताभ चौधरी

सोमवारनंतर पायउतार होण्याचे येडियुरप्पांचे संकेत


🔰कर्नाटकमध्ये नेतृत्वबदल होणार असल्याच्या अनेक आठवड्यांच्या अटकळींनंतर, २६ जुलैनंतर पायउतार होण्याचे संकेत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी दिले.


🔰‘पुढील घडामोडीबाबत मला २५ जुलैनंतरच कळेल आणि पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे मी पालन करीन. पक्ष बळकट करण्यासाठी आपण कर्नाटकात पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी मी काम करीन,’ असे मुख्यमंत्रिपदाच्या बाबतीत आतापर्यंत ठाम राहिलेले येडियुरप्पा यांनी बेंगळूरुत पत्रकारांना सांगितले.


🔰यापूर्वी ठरलेल्या कार्यक्रमानुसार, मुख्यमंत्री २६ जुलैला विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला हजर राहणार होते आणि त्याच्या आदल्या दिवशी, २५ जुलैला आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करणार होते, मात्र आता या कार्यक्रमांत बदल करण्यात आला आहे.


🔰यडियुरप्पा यांचे सरकार २६ जुलैला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, त्या दिवशी ते राजीनामा देऊ शकतात अशा अटकळी होत्या. असे झाल्यास भाजपच्या आणखी एका मुख्यमंत्र्याला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा होईल.

मंगळवार व बुधवारी निरनिराळ्या मठांच्या साधूंनी येडियुरप्पा यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेऊन त्यांना त्यांचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करण्याचे आवाहन केले.


🔰यडियुरप्पा यांना हटवण्याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कुठल्याही हालचालीविरुद्ध त्यांचे समर्थक उघडपणे बोलू लागल्यानंतर, येडियुरप्पा यांनी बुधवारी पक्षाबाबत आपली निष्ठा पुन्हा व्यक्त करण्यासाठी बुधवारी ट्विटरवर एक निवेदन जारी केले. पक्षाला अडचणीचा ठरेल असा कुठलाही विरोध किंवा बेशिस्त कुणीही दर्शवू नये असे आवाहन मी करतो, असे त्यांनी यात सांगितले.

पेगॅसस प्रकरणामुळे फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय



💢सध्या संपूर्ण जगभरात पेगॅसस प्रकरणावरुन खळबळ उडाली आहे. इस्राायलच्या ‘एनएसओ’ संस्थेने तयार केलेल्या पेगॅसस या स्पायवेअरचा वापर करत जगातील एकूण १२ राष्ट्रपमुखांवर पाळत ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. 


💢याशिवाय काही माजी पंतप्रधान आणि एका राजाचाही समावेश आहे. राष्ट्राध्यक्षांच्या यादीत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचाही समावेश आहे. एनएसओ समूहाने तयार केलेले हे स्पायवेअर संबंधित व्यक्तीच्या मोबाइलमधील संभाषण, संदेश व इतर सगळी माहिती उघड करत असते.


💢दरम्यान पेगॅसस प्रकरणामुळे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी आपला मोबाइल आणि मोबाइल क्रमांक बदलला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. पेगॅसस प्रकरणविरोधात फ्रान्स सरकारकडून घेण्यात आलेला हा पहिला मोठा निर्णय आहे.


💢"त्यांच्याकडे अनेक मोबाइल नंबर आहेत. याचा अर्थ त्यांच्यावर पाळत ठेवली नाही असा नाही. हा फक्त अतिरिक्त सुरक्षेचा भाग आहे," असं अधिकाऱ्यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं आहे. 


💢सरकारचे प्रवक्ते गॅब्रियल यांनी पेगॅसस प्रकरण उजेडात आल्यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात असल्याचं म्हटलं आहे.

मॅक्रॉन यांच्यासह १४ जणांचे मोबाइल फोन हॅक करण्यात आले होते. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे सरचिटणीस अ‍ॅग्नेस कॉलामार्ड यांनी सांगितले, की ही अतिशय धक्कादायक बाब असून त्यामुळे जागतिक नेत्यांना धक्का बसला आहे. पन्नास हजार फोनमधील माहिती या स्पायवेअरच्या मदतीने उघड करण्यात आली आहे. 


💢परिस येथील ‘फॉरबिडन स्टोरीज’ या संस्थेने हा प्रकार उघडकीस आणला असून त्यांनी म्हटले आहे, की दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोसा, इराकचे बरहाम सलिह, मोरोक्कोचे राजे महंमद-सहावे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली, मोरोक्कोचे पंतप्रधान साद एडिन ओथमानी यांचाही यादीत समावेश आहे, असे ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. या राष्ट्रप्रमुखांनी त्यांचे मोबाइल फोन तपासणीसाठी दिलेले नाहीत.


💢पगॅसस अशा पद्धतीने फोन हॅक करतं की वापरणाऱ्यालाही ते कळत नाही. हॅकरला एकदा जो फोन हॅक करायचा आहे त्याची माहिती मिळाली की त्याला एका वेबसाईटची लिंक पाठली जातो. जर युजरने त्या लिंकवर क्लिक केलं तर मोबाइलमध्ये पेगॅसस इन्स्टॉल होतं. ऑडिओ कॉल्स तसंच व्हॉट्सअॅपसारख्या अॅपमधील सुरक्षेच्या त्रुटींमधूनही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं. पेगॅससची पद्धत इतकी गुप्त आहे की, युजरला मिस कॉल देऊनही हॅकिंग केलं जाऊ शकतं. 


💢सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या मोबाइलमधील आलेल्या फोन क्रमाकांची यादीही ते डिलीट करु शकतात. यामुळे युजरला मिस कॉल आल्याचीही माहिती मिळत नाही.

एकदा पेगॅससने तुमच्या मोबाइलमध्ये शिरकाव केला की ते सतत पाळत ठेवू शकतं.


💢 वहॉट्सअॅपसारख्या अॅपमधून करण्यात आलेले चॅटही ते पाहू शकतात. सुरक्षा तज्ज्ञांनुसार, पेगॅसस मेसेज वाचू शकतं तसंत कॉलही ट्रॅक करु शकतं. याशिवाय अॅप्सचा वापर, त्यात होणाऱ्या घडामोडी, लोकेशन डेटा, व्हिडीओ कॅमेराचा ताबा मिळवणे, मायक्रोफोनच्या सहाय्याने संभाषण ऐकणं या गोष्टीही शक्य आहेत.


💢दहशतवादावर नियंत्रणासाठी वापर करत असल्याचा कंपनीचा दावा

हे स्पायवेअर फक्त सरकारी एजन्सीना विकण्यात आलं आहे. त्याचा उद्देश केवळ दहशतवादाविरोधात लढणे हाच आहे असा इस्त्राईलच्या कंपनीचा दावा आहे.

२३ जुलै २०२१

ब्रिस्बेनला होणार ऑलिम्पिक स्पर्धा, ३२ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला मिळालं यजमानपद.



🔰२०३२मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजनपद मिळवण्यात ब्रिस्बेन यशस्वी झाला आहे. या यजमानपदाची जबाबदारी ब्रिस्बेनकडे जाणार, ही शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. आज बुधवारी याची अधिकृत घोषणा करण्यात आली.


🔰बधवारी मतदानानंतर ब्रिस्बेनला अधिकृतपणे यजमान म्हणून घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी १९५६ मध्ये मेलबर्न आणि २००० मध्ये सिडनी येथे ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले होते. त्यामुळे तब्बल ३२ वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहेत.


🔰ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले, ”आमच्या सरकारला अभिमान आहे की आम्हाला ब्रिस्बेन आणि क्वीन्सलँड येथे या स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे.


🔰ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँडची सरकारे या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सज्ज आहेत. आम्ही खेळ उत्कृष्ट पद्धतीने आयोजित क

अ‍ॅमेझॉनवीराची अवकाशवारी.



अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती जेफ बेझॉस यांनी मंगळवारी त्यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीच्या वतीने पहिली साहसी अवकाशवारी पूर्ण केली. स्वत:च्या अवकाशयानातून सफर करणारे ते आठवडाभराच्या अंतरातील दुसरे अब्जाधीश ठरले.


अ‍ॅमेझॉनचे संस्थापक असलेल्या बेझॉस यांच्यासमवेत त्यांचे बंधू आणि इतर दोघे होते. ब्लू ओरिजिन यानाच्या अग्निबाणास न्यू शेफर्ड असे नाव देण्यात आले होते. पश्चिम टेक्सासमधून हा अग्निबाण अपोलो ११ या चांद्रमोहिमेच्या बावन्नाव्या वर्धापनदिनी अवकाशात झेपावला. नंतर सर्व जण तेथेच परतले. व्हर्जिन गॅलक्टिकचे रिचर्ड ब्रॅन्सन यांनी अलीकडे अशाच प्रकारे न्यू मेक्सिकोतून अवकाशवारी केली होती.


बेझॉस यांनी त्यांची योजना आधी जाहीर केलेली असताना ब्रॅन्सन यांनी त्यांची योजना मध्येच जाहीर करून आघाडी मारली होती. ब्रॅन्सन यांचे अग्निबाणयुक्त विमान होते, तर बेझॉस यांची कॅप्सूल होती; पण दोन्ही स्वयंनियंत्रित होते. ब्लू ओरिजिन यान ६६ मैल म्हणजे १०६ कि.मी. उंचीवर गेले होते.  बेझॉस यांचे अवकाशयान १० मैल म्हणजे १६ कि.मी. जास्त उंचीवर जाऊन आले. साठ फूट बूस्टरच्या मदतीने मॅक ३ म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या ३ पट वेगाने कॅप्सूल अवकाशात गेले. नंतर विलग झाले. प्रवाशांना तीन ते चार मिनिटे शून्य गुरुत्वाचा अनुभव घेता आला. त्यानंतर कॅप्सूल खाली जमिनीवर आले तेव्हा त्यांना सहापट गुरुत्व जाणवले. बेझॉस यांचे एक मोठे स्वप्न  पूर्ण झाले. वॅली फंक या महिला वैमानिक त्यांच्यासमवेत होत्या. ऑलिव्हिएर डेमेन यांनी २८ दशलक्ष डॉलर्स भरून या सफरीत पर्यटक म्हणून स्थान मिळवले.

उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताचे आतापर्यंतचे सर्व ध्वजवाहक (१९२० ते २०२०)



👤 १९२० (बेल्जियम) : पी बॅनर्जी

👤 १९३२ (अमेरिका) : एल एस भोखारी

👤 १९३६ (जर्मनी) : मेजर ध्यानचंद

1️⃣ १९५२ (फिनलॅंड) : बलबीर सिंह सि.

2️⃣ १९५६ (स्वीडन) : बलबीर सिंह सि.

👤 १९६४ (टोकियो) : जी एस रंधावा 

👤 १९७२ (जर्मनी) : डिव्हिन जोन्स 

👤 १९८४ (अमेरिका) : जफर इक्बाल 

👤 १९८८ (द.कोरिया) : के डी सिंह

👩‍🦰 १९९२ (स्पेन) : एस अब्राहम विल्सन 

👤 १९९६ (अमेरिका) : पी सिंह

👤 २००० (ऑस्ट्रेलिया) : लिअँडर पेस

👩‍🦰 २००४ (ग्रीस) : अंजु बॉबी जॉर्ज 

👤 २००८ (बिजिंग) : राजवर्धन राठोड

👤 २०१२ (लंडन) : सुशिल कुमार 

👤 २०१६ (रिओ) : अभिनव बिंद्रा

👩‍🦰 २०२० (टोकियो) : मेरी कॉम व मनप्रीत

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...