०५ जून २०२१

तैनाती फौज

🔸(सब्‌सिडिअरी फोर्स) हिंदुस्थानात सार्वभौम सत्ता स्थापन करण्यासाठी फ्रेंच आणि इंग्रज यांनी अवलंबिलेली एक उपाययोजना. तैनाती फौजेची सुरूवात प्रथम फ्रेंचांनी केली.

▪️१७४८–४९ मध्ये द्यूप्लेक्स व चंदासाहेब यांच्यात करार होऊन फ्रेंचांनी आपली फौज नबाबाच्या मदतीसाठी ठेवली. त्याबद्दल नबाबने द्यूप्लेक्सला पॉंडिचेरीजवळचा मुलूख तोडून दिला. यातच पुढे इंग्रजांनी सुरू केलेल्या तैनाती फौजेचा उगम आहे. अशाच तऱ्हेचा करार १७६० मध्ये इंग्रजांनी मीर कासीमशीही केला होता.

◾️वॉरन हेस्टिंग्जने थोड्या फार प्रमाणात तैनाती फौजेची योजना अंमलात आणली होती. पण बेलस्लीने हिंदुस्थानात खऱ्या अर्थाने तैनाती फौजेचा प्रसार केला आणि एतद्देशीय संस्थानिकांना ब्रिटिश अंमलाखाली आणले व हिंदुस्थानचे ब्रिटिश साम्राज्यात रूपांतर केले.

◾️वेलस्लीने प्रथम निजामाकडची फ्रेंच फौज काढून टाकण्यास सांगून त्या जागी इंग्रज फौज ठेवून तैनाती फौजेच्या योजनेला मूर्त स्वरूप दिले. पुढे त्याने या योजनेची सक्ती केली व जे एतद्देशीय संस्थानिक फौज ठेवून घेणार नाहीत, अशांबरोबर काहीतरी निमित्त काढून युद्धे केली. उदा., टिपू, दुसरा बाजीराव पेशवा, नागपूरकर भोसले, शिंदे, होळकर इत्यादी. तसेच जे संस्थानिक इंग्रजांची तैनाती फौज ठेवून घेतील, त्यांच्यावर काही अटी लादण्यात आल्या.

🔴त्यापैकी महत्त्वाच्या अटी अशा :

(१) संस्थानिकांनी फौजेच्या खर्चापुरता मुलूख तोडून द्यावा.

(२) इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतर युरोपीयांस आपल्या पदरी नोकरीस ठेवू नये व परकीय सत्तेशी कोणताही करार करू नये.

(३) आपापसांतील तंट्याचा निकाल इंग्रज करतील तो संस्थानिकांनी मान्य करावा.

(४) तैनाती फौजेचे अधिकारी इंग्रजच असावेत.

(५) संस्थानची देखरेख पाहण्यास रेसिडेंट नावाचा अधिकारी ठेवून घ्यावा. अशा तऱ्हेच्या अनेक अटी घालून वेलस्लीने पेशवे, नागपूरकर भोसले, गायकवाड, शिंदे वगैरे मराठी संस्थानिकांस तसेच म्हैसूर व हैदराबाद येथील सत्ताधारी यांच्या पदरी तैनाती फौज ठेवून त्यांना आपले मांडलिक केले. अशा तऱ्हेने एतद्देशीयांची विरोध करण्याची शक्ती कमी करून इंग्रजांनी आपली सार्वभौम सत्ता प्रस्थापित केली.

⌛️तैनाती फौजेच्या प्रकारामुळे एतद्देशीय संस्थानिकांतील स्वत्व नाहीसे होऊन हिंदुस्थानला लवकरच पारतंत्र्य प्राप्त झाले. या योजनेत अनेक दोष होते. इंग्रजांनी संस्थानिकांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतल्यामुळे संस्थानिकांनी स्वतःची फौज ठेवेण बंद केले. त्यामुळे संस्थानात बंडाळी व लुटालूट वाढली. रयतेला आणि उद्योगधंद्यांना संरक्षण मिळेनासे झाले. संस्थानात ठेवलेली तैनाती फौज सर्व राज्यातील बंडाळीचा मोड करण्यास अपुरी होती. एतद्देशीय राज्यकर्ते क्रमाने परतंत्र बनून बेजबाबदारपणे वागू लागले. त्यांची कारभार करण्याची कार्यक्षमता कमी झाली. जनतेतील लढण्याची शक्तीच नाहीशी होऊन तीही परतंत्र बनू लागली

देशातील काही महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्ती

👤 पी सी घोष : पहिले लोकपाल
👤 वैकय्या नायडू : १३वे उपराष्ट्रपती
👤 रामनाथ कोविंद : १४वे राष्ट्रपती
👤 जी सी मुर्मु : १४वे नियंत्रक व महालेखापाल
👤 नरेंद्र मोदी : १४वे प्रधानमंत्री
👤 के के वेणुगोपाल : १५वे महान्यायवादी
👤 उद्धव ठाकरे : १९वे मुख्यमंत्री
👤 करमबीर सिंह : २४वे नौदलप्रमुख
👤 बी एस कोश्यारी : २२वे राज्यपाल
👤 सुशिल चंद्रा : २४वे मुख्य नि. आयुक्त
👩‍🦰 एस बर्मन : २४व्या महालेखा नियंत्रक
👤 शक्तिकांता दास : २५वे गवर्नर
👤 भदौरीया : २६वे हवाईदल प्रमुख
👤 एम एम नरवणे : २७वे लष्करप्रमुख
👤 एन व्ही रमण्णा : ४८वे सरन्यायाधीश.

वाचा :- भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)

🌀 बुरेवी : तमिळनाडू
✔️ नाव दिले : मालदीव

🌀 निवार : तमिळनाडू , आंध्रप्रदेश
✔️ नाव दिले : इराण

🌀 फनी : ओडिशा , पश्र्चिम बंगाल
✔️ नाव दिले : बांग्लादेश

🌀 वायु : भारत , पाकिस्तान
✔️ नाव दिले : भारत

🌀 हिक्का : गुजरात
✔️ नाव दिले : मालदीव

🌀 महा : ओमान , श्रीलंका , भारत
✔️ नाव दिले : ओमान

🌀 बुलबुल : बांग्लादेश , भारत
✔️ नाव दिले : पाकिस्तान

🌀 क्यार : सोमालिया , भारत , येमन
✔️ नाव दिले : म्यानमार

🌀 पवन : सोमालिया , भारत
✔️ नाव दिले : श्रीलंका

🌀 अम्फान : ओडिशा , पश्र्चिम बंगाल
✔️ नाव दिले : थायलंड

🌀 निसर्ग : महाराष्ट्र , गोवा , गुजरात
✔️ नाव दिले : बांग्लादेश .

🌀 येणारी चक्रीवादळे व त्यांची नावे

🌀 तौकते : म्यानमार

🌀 यास : ओमान।  

महाराष्ट्रातील महत्त्वाचे पठारांची नांवे आणि जिल्हे

1) खानापुरचे पठार :-  सांगली

2) तोरणमाळचे पठार  :- नंदुरबार

3) पाचगणीचे पठार :-  सातारा

4)  तळेगांवचे पठार :-  वर्धा

5)  औधचे पठार  :- सातारा

6) गाविलगडचे पठार :-  अमरावती

7) सासवडचे पठार :-  पुणे

8) बुलढाण्याचे पठार :- बुलडाणा

9)  मालेगांवचे पठार :-  नाशिक

10) यवतमाळचे पठार :-  यवतमाळ

11) अहमदनगरचे पठार  :- अहमदनगर

12)  बालाघाटचे पठार  :- उस्मानाबाद

संविधान सभा


🔸9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक

🔸11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड

🔸13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली

🔸22 जानेवारी 1947:-उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला

🔸25 जानेवारी 1947:- एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली

🔸22 जुलै 1947:- राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला

🔸24 जानेवारी 1950:-राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले

🔸29 ऑगस्ट 1947:- मसुदा समिती स्थापन

🔸26 नोव्हेंबर 1949:- घटना स्वीकृत केली गेली

🔸24 जानेवारी 1950:- घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या

🔸26 जानेवारी 1950:- घटनेचा अंमल सुरू झाला .

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

कांही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे

🔶भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई

🔶भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई

🔶महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा       --  मुंबई शहर

🔶महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड

🔶महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड

🔶मुंबईची परसबाग -- नाशिक

🔶महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी

🔶मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक

🔶द्राक्षांचा जिल्हा --  नाशिक

🔶आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार

🔶महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव

🔶महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ

🔶संत्र्याचा जिल्हा -- नागपूर

🔶महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती

🔶जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली

🔶महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव

🔶साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर

🔶महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार --  सोलापूर

🔶महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा -- कोल्हापूर

🔶कुस्तीगिरांचा जिल्हा -- कोल्हापूर

🔶लेण्यांचा जिल्हा -- औरंगाबाद

🔶महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर
     --  औरंगाबाद

🔶महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा        -- बीड

🔶महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा
       -- उस्मानाबाद

🔶महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा
     -- नांदेड

🔶देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिpल्हा
       --  अमरावती

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

३० मे २०२१

अंकगणित प्रश्नसंच

Q. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा

१) ०, ७, २६, ६३, ?
🏷 १) ९   २) २७  ३) ६४  ४) १२४

२) २, ९, २८, ६५, ?
🏷 १) ११  २) २९  ३)१२५  ४) १२६

३) २०, १२, ६, २, ?
🏷 १) ४    २) २    ३)१    ४) ०

४) ३०, २०, १२, ६, ?
🏷 १)०     २) २    ३)१     ४)३

५) १, ३, ७, १५, ३१, ?
🏷 १) ३३  २) ५२  ३) ६३  ४) ७१

६) २, ८, १८, ३२, ५०, ?
🏷 १) ६८  २) ७२  ३) ७६  ४) ८०

७) २, ३, ५, ७, ११, १३, १७, ?
🏷 १) २१  २) १९  ३) २७  ४) ३१

८) २, ५, ११, १७, २३, ?
🏷 १) १९  २) २५  ३) २७  ४) ३१

९) ३, ७, १३, १९, २९, ?
🏷 १) ३१  २) ३३  ३) ३७  ४) ४७

१०) १६, २७, ३८, ?, ६०
🏷 १) ४९  २) ५१  ३) ५३  ४) ५७

११) ११, १३, १६, २१, ?, ३९, ५२
🏷 १) २३  २) २८  ३) ३१  ४) ३७

१२) १६, २५, ३९, ?, ६४
🏷 १) ४    २) ४३  ३) ४६  ४) ४९

१३) १०, २६, ५०, ?, १२२
🏷 १) ७१  २) ८२  ३) ९६  ४) १०४

१४) १०, १७, २६, ३७, ?
🏷 १) ४२  २) ५०  ३) ६१  ४) ८२

१५) १२, ४४, २८, ६०, ४४, ?
🏷 १) ७६  २) ८०  ३) ४४  ४) ६६

१६) १३, १३, २०, १८, २७, ?, ३४, २८
🏷 १) १९  २) २१  ३) २३  ४) ३३

१७) ४, १६, ३६, ?, १००
🏷 १) ४२  २) ५४  ३) ६०  ४) ६४

१८) २४, ३५, ४८, ?, ८०
🏷 १) ५२  २) ६३  ३) ७१  ४) ७९

१९) ५, ३, १०, ८, १७, ?, २६, २४
🏷 १) १५  २) १७  ३) २१  ४) २९

२०) ६, २, १२, ६, ?, १२, ३०
🏷 १) ११  २) १७  ३) २०  ४) ३१

२१) ८, २७, ६४, ?, २१६
🏷 १) १२५ २) ७८ ३) ८६  ४) ५८

२२) ९, २८, ६५, ?, २१७
🏷 १) ८२   २) ९३  ३) १२६  ४) १५४

२३) ७, २६, ६३, १२४, ?
🏷 १) ८०   २) ९६   ३) १७६  ४) २१५

उत्तरे  :

१) ४       २) ४     ३) ४     ४) २     ५) ३      ६) २       ७) २     ८) ४     ९) ३   १०) १  ११) २   १२) ४   १३) २   १४) २  १५) १ १६) ३  १७) ४    १८) २   १९) १  २०) ३     २१) १  २२) ३    २३) ४

१) संंख्यामार्लेत (n^३  - १) या सुत्रानुसार

२) संंख्यामार्लेत (n^३ + १) या सुत्रानुसार

३) संख्यामालेत (n^२ - n) या सुत्रानुसार

४) संख्यामालेत (n^२ + n) या सुत्रानुसार

५) संख्यांमध्ये अनुक्रमे २, ४, ८, १६, ३२ चा फरक

६) संख्याच्या फरकातील फरक ४ आहे

७) क्रमाने येणाऱ्या मुळसंख्या

८) एकाआड एक येणाऱ्या मूळसंख्या

९) एकाआड एक येणाऱ्या मूळसंख्या

१०) लगतच्या दोन संख्यांमध्ये ११ चा फरक

११) संख्यामालेत अनुक्रमे २,३,५,७,११,१३ या क्रमवार मूळसंख्यांचा फरक

१२) अनुक्रमे ४, ५, ६, ७, ८ या नैसर्गिक संख्यांचे वर्ग

१३) n^२ + १ सुत्रानुसार ३, ५, ७, ९, ११ संख्यांचे वर्ग + १

१४) n^२ + १ सुत्रानुसार ३, ४, ५, ६, ७ संख्यांचे वर्ग + १

१५) सम स्थानावरील संख्या (उदा. ४४) मागील विषमसंख्येपेक्षा (उदा. १२) ३२ ने अधिक व पुढील विषमसंख्येपेक्षा (उदा. २८) १६ ने कमी

१६) विषमस्थानावरील संख्यांमध्ये ७ चा फरक, समस्थानावरील संख्यांमध्ये ५ चा फरक

१७) अनुक्रमे २, ४, ६, ८, १० या समसंख्यांचे वर्ग

१८) n^२ - १ सूत्रानुसार ५, ६, ७, ८, ९ संख्यांचे वर्ग - १

१९) विषमस्थानावर n^२ + १ नुसार २, ३, ४, ५ या संख्यांचे वर्ग + १ तर समस्थानावर n^२ - 1 नुसार २, ३, ४, ५ या संख्यांचे वर्ग - १

२०) विषमस्थानावर n^2 + n नुसार २, ३, ४, ५ संख्यांचे वर्ग + १ तर समस्थानावर n^२ - n नुसार २, ३, ४, ५ संख्यांचे वर्ग उणे (-) अनुक्रमे त्याच संख्या.

२१) n^३ नुसार अनुक्रमे २, ३, ४, ५, ६ या संख्यांचे घन

२२) n^३ + १ नुसार अनुक्रमे २,३,४,५,६ या संख्यांचे घन + १

२३) n^३ - १ नुसार अनुक्रमे २, ३, ४, ५, ६ या संख्यांचे घन उणे १

यशाचा राजमार्ग

सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे

1) काशी - बनारस
2) कोसल -लखनौ 
3) मल्ल -  गोरखपूर
4) वत्स -   अलाहाबाद
5) चेदि -    कानपूर
6) कुरु -     दिल्ली
7) पांचाल-   रोहिलखंड
8) मत्स्य -   जयपूर
9) शूरसेन -  मथुरा
10)अश्मक- औरंगाबाद(महाराष्ट्र)
11) अवंती - उज्जैन
12) अंग  -  चंपा-पूर्व बिहार
13) मगध -  दक्षिण-बिहार
14) वृज्जी - उत्तर बिहार
15) गांधार  -पेशावर
16) कंबोज -गांधारजवळ

२४ मे २०२१

"एमपीएससी'ची सप्टेंबरमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा?

आयोगाने जिल्हानिहाय कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरवात केली आहे. लॉकडाउन संपल्यानंतर आयोगाकडून परीक्षेसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाला विचारणा केली जाईल.


राज्यातील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना "एमपीएससी'च्या (MPSC) संयुक्‍त पूर्व परीक्षेबाबत उत्सुकता लागली आहे. मात्र, राज्यातील 14 जिल्ह्यांमधील कोरोनाची (Covid-19) स्थिती अजूनही सुधारली नसल्याने ही परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तरीही, सध्याचा लॉकडाउन संपल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या (Disaster Management Department) परवानगीने 18 जुलैला परीक्षा होऊ शकते, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

जूननंतर राज्यात पावसाला सुरवात होते आणि जुलै-ऑगस्टमध्ये मुंबई, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यामुळे या काळात परीक्षा घेणे अशक्‍य आहे. तर ऑक्‍टोबरमध्ये यूपीएससीच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे 18 जुलैपर्यंत परीक्षा न झाल्यास संयुक्‍त पूर्व परीक्षा सप्टेंबरमध्येच होईल, असे आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आता आयोगाने जिल्हानिहाय कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरवात केली आहे. लॉकडाउन संपल्यानंतर आयोगाकडून परीक्षेसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाला विचारणा केली जाईल. त्यानंतर परीक्षेसाठी पोषक वातावरण असल्यास जुलैच्या मध्यावधीत परीक्षा घेण्याचे नियोजन होईल. परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या एक महिना अगोदर जाहीर करावे लागते, असेही आयोगातील सूत्रांनी या वेळी सांगितले.

१६ मे २०२१

संयुक्‍त पूर्वपरीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लॉकडाउन आता 31 मेपर्यंत आहे. कोरोनाची स्थिती सुधारत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणारी संयुक्‍त गट-ब पूर्व परीक्षा जुलै 2021 च्या पहिल्या आठवड्यात घेता येईल का, याबाबतही आयोगाने सरकारला विचारणा केली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईसह अन्य जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतो. त्यामुळे त्या वेळी परीक्षा घेणे अशक्‍य आहे. जुलैमध्ये परीक्षा न झाल्यास सप्टेंबरमध्येच परीक्षा होऊ शकेल, असेही आयोगाने त्या पत्रातून सरकारला स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर आता आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अभिप्राय घेतला जाणार असून त्यानंतरच अंतिम वेळापत्रक ठरेल, असेही सांगण्यात आले.

०७ मे २०२१

भूगोल भूगर्भ रचना :

अ. आर्कियन खडक :

हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.

ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.

ब. धारवाड खडक :

या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स, डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.

पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.

पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.

क. कडप्पा श्रेणींचा खडक :

महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.

कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडकa आहेत.

ड. विंध्ययन खडक :

विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.

हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.

इ.गोंडवना खडक :

अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊन दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.

खोर्‍यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.

कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.

त्याला 'गोंडवना खडक' असे म्हणतात.

चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.

महाराष्ट्रातील कांही वैशिष्टय़े असलेल्या जिल्ह्यांची नावे

🔶भारताचे प्रवेशद्वार
मुंबई

🔶भारताची आर्थिक राजधानी
मुंबई

🔶महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा
मुंबई शहर

🔶महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार
रायगड

🔶महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा
रायगड

🔶मुंबईची परसबाग
नाशिक

🔶महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा
रत्नागिरी

🔶मुंबईचा गवळीवाडा
नाशिक

🔶द्राक्षांचा जिल्हा
नाशिक

🔶आदिवासींचा जिल्हा
नंदूरबार

🔶महाराष्ट्रातील कापसाचे शेत
जळगाव

🔶महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा
यवतमाळ

🔶संत्र्याचा जिल्हा
नागपूर

🔶महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ
अमरावती

🔶जंगलांचा जिल्हा
गडचिरोली

🔶महाराष्ट्रातील केळीच्या बागा
जळगाव

🔶साखर कारखान्यांचा जिल्हा
अहमदनगर

🔶महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार
सोलापूर

🔶महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा
कोल्हापूर

🔶कुस्तीगिरांचा जिल्हा
कोल्हापूर

🔶लेण्यांचा जिल्हा
औरंगाबाद

🔶महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर
औरंगाबाद

🔶महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा
बीड

🔶महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा
उस्मानाबाद

🔶महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा
नांदेड

🔶देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
अमरावती.

वेगवेगळ्या क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला

1] अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच फायटर पायलट ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ विमानं उडवणाऱ्या महिला

2] इंदिरा गांधी: देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान

3] कल्पना चावला: अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला

4] दुर्गाबाई कामत: दुर्गाबाई कामत या पहिल्या भारतीय महिला अभिनेत्री होत्या.

5] प्रिया जिंघन: भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या पहिल्या महिला

6] पी.व्ही.सिंधू: रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूने रौप्य पदकाची कमाई केली. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारी पहिली महिला ठरली

7] आनंदीबाई गोपाळ जोशी: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाई शिकल्या, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला.

8] अदिती पंत: अंटार्टिकावर जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला

9] बचेंद्री पाल: या एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. १९९४ साली त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर सर केले. भारत सरकारने २०१९ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.

10] रिटा फेरिया पॉल: मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी पहिली भारतीय महिला

11] हिना सिंधू: वर्ल्डकप शुटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला.

12] मिताली राज: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६००० धावांचा टप्पा पार करणारी पहिली भारतीय महिला. एकदिवसीय सामन्यात २०० एकदिवसीय सामने खेळणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे

13] होमी वरारावाला: छायाचित्रकार म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या (फोटो जर्नालिस्ट) पहिल्या भारतीय महिला साडी नेसून खांद्यावर कॅमेरा घेतलेला त्यांचा फोटो त्या काळाची प्रचिती देतो.

14] सायना नेहवाल: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

15] फातिमा बेवी: सर्वोच्च न्यायलयातील पहिल्या महिला न्यायाधीश

16] दीपा मलिक: २०१६ साली रिओ येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला

17] पी. टी. उषा: ऑलिम्पिक खेळांच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू

महत्त्वाचे प्रश्नसंच

रक्त हे काय आहे?*
A} संयुग
B} *मिश्रण 📚📚*
C} मूलद्रव्य
D} संयुग व मिश्रण दोन्ही

भोपाळ वायू दुर्घटना ही "युनियन कार्बाईड " ह्या कंपनीत घडली ही कोणत्या देशाची कंपनी होती ?*
A} ब्रिटन
B} *अमेरिका 📚📚*
C} जर्मनी
D} जपान

१९८४ मधे भोपाळ वायू दुर्घटना मीथिल आयसोसायनाईट ह्या वायूमुळे घडली वॉरन अंडरसन हे त्या कंपनीचे CEO होते

  तीन मुळे असणारा दात म्हणजे च?*
A} *दाढ 📚📚*
B} उपदाढ
C} क्रंतक
D} सुळा

  हृदयाचा एक ठोका  सेकंदात होतो?*
A} ८
B} *०.८ 📚📚*
C} ०.०८
D} ०.००८

संसदेच्या संयुक्त आधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात ?*
A} राष्ट्रपती
B} उपराष्ट्रपती
C} *सभापती 📚📚*
D} उपसभापती

राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना __ साली करण्यात आली?*
A} १९८९
B} १९९०
C} *१९९२ 📚📚*
D} १९९६

राष्ट्रीय मानवधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. ?*
A} १९९०
B} १९९२
C} *१९९३ 📚📚*
D} १९९४

भारतीय कामगार चळवळीचे पितामह कुणाला म्हंटले जाते?*
A} एस. एम.जोशी
B} नारायण मेघाची लोखंडे
C} *ना. म.जोशी 📚📚*
D} एम. एन.रॉय

  मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी परित झाला. ?*
A} १९५६
B} १९५७
C} *१९५८ 📚📚*
D} १९५९

बॉम्बे हाय इथे पहिली तेल विहीर केव्हा खोदली गेली?*
A} *१९७४📚📚*
B} १९८१
C} १९७७
D} १९७९

१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------
११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
--------------------------------------------------
१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
--------------------------------------------------
१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
--------------------------------------------------
१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
--------------------------------------------------
१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
--------------------------------------------------
१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
--------------------------------------------------
१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------
२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
---------------------------------------------------

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
---------------------------------------------------
२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
---------------------------------------------------
२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
---------------------------------------------------
२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
---------------------------------------------------
२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...