०७ फेब्रुवारी २०२१

लसीकरणानंतरही रुग्ण वाढले, सौदी अरेबियात भारतासह २० देशातील विमानांना प्रवेशबंदी




🔶भारत, अमेरिकेसह जगातील २० देशांच्या प्रवासी विमानांना सौदी अरेबियाने प्रवेशबंदी जाहीर केली आहे. सौदी अरेबियात करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारपासून २० देशातील प्रवासी विमानांना प्रवेशबंदी लागू करत असल्याचे सौदी अरेबियाच्या अंतर्गत मंत्र्यांनी जाहीर केले.


🔶भारताशिवाय पाकिस्तान, अमेरिका, ब्राझील, जपान आणि अन्य देशाच्या प्रवासी विमानांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. ब्रिटन, इटली, पोर्तुगाल, फ्रान्स, स्वीडन, जर्मनी, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड या देशांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे.


🔶प्रवेशबंदीच्या या नियमातून राजनैतिक अधिकारी, सौदीचे नागरिक, डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना सवलत देण्यात आली आहे. सौदीच्या सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. सौदी अरेबियात आतापर्यंत ३ लाख ६८ हजार नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. ६,४०० नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यभरात 20 ठिकाणी (कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, आणि नागपूर विभागात) लवकरच पर्यटन महोत्सवांचे आयोजन होणार आहे



▪️नाशिक - द्राक्ष महोत्सव, नांदूर माध्यमेश्वर महोत्सव.

▪️ अहमदनगर - भंडारदरा भागात काजवे महोत्सव.

▪️ धुळे - कळींग किल्ला महोत्सव

▪️ पुणे - जुन्नर द्राक्ष महोत्सव

▪️ सातारा - वाई महोत्सव

▪️ कोल्हापूर - पन्हाळा महोत्सव

▪️ सिंधुदुर्ग - वेंगुर्ला (सागरेश्वर) महोत्सव

▪️रायगड - श्रीवर्धन महोत्सव

▪️रत्नागिरी - कातळशिल्प महोत्सव, वेळास/आंजर्ले महोत्सव

▪️ उस्मानाबाद - तेर महोत्सव

▪️ बीड - कपिलधारा महोत्सव

▪️ नांदेड - होट्टल महोत्सव

▪️ बुलढाणा - सिंदखेड राजा महोत्सव

▪️ अकोला - नरनाळा किल्ला महोत्सव

▪️यवतमाळ - टिपेश्वर अभयारण्य महोत्सव 

▪️ नागपूर - रामटेक महोत्सव, बोर धरण आणि वन्यजीव महोत्सव

▪️ गोंदिया - बोधलकसा पक्षी महोत्सव. 

  

जल जीवन मिशन(शहरी) पाणी पुरवठा विस्तृतपणे सार्वत्रिक करण्याची योजना.


🔶2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी ‘शाश्वत विकासाचे ध्येय-6’ (SDG Goal-6) याच्याअंतर्गत जल जीवन मिशन (शहरी) योजना जाहीर केली.


🛑 ठळक बाबी..........


🔶जल जीवन मिशन (शहरी) योजना याची रचना सर्व 4378 वैधानिक छोट्या शहरांमधील सर्व घरांना क्रियाशील नळांद्वारे पाणी पुरवठा विस्तृतपणे सार्वत्रिक करण्यासाठी केली आहे.शहरी घरगुती नळ जोडणीमधील अंदाजे तफावत सुमारे दोन कोटी 68 लक्ष आहे, ज्यांचा जल जीवन मिशन अंतर्गत समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.


🔶अभियान सांडपाण्याचा पुनर्वापर, जलसंपत्तीचे पुनरुज्जीवन आणि जलसंधारणावर लक्ष केंद्रित असेल.20 टक्के पाण्याची मागणी संस्थात्मक यंत्रणेच्या विकासासह पुनर्वापर केलेल्या पाण्याद्वारे पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे.अभियानासाठी प्रस्तावित एकूण खर्च 2 लक्ष 87 हजार कोटी रुपये एवढा आहे.

अभियानाच्या अंतर्गत 4,378 शहरी स्थानिक मंडळ पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यात येईल. 500 अमृत (AMRIT) शहरांमध्ये लिक्विड बेस्ड व्यवस्थापन करणे नियोजित आहे.


🔶योजनेत आगामी काही वर्षांत 3.60 लक्ष कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 2019-20 मध्ये निर्मला सीतारमन यांनी घरापर्यंत नळ योजनेची घोषणा केली होती. ही योजना जल जीवन मिशनचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.


🛑 जल जीवन मिशन...


🔶जल जीवन मिशनचा शुभारंभ 2019 साली करण्यात आला होता. केंद्र सरकार या मोहिमेच्या अंतर्गत देशातील सर्व भागात स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा उद्देश आहे.


🔶2024 सालापर्यंत सर्व घरांना नळाने पाणी देणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेमार्फत प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी पुरविणे, दरडोई 55 लिटर पाणीपुरवठा, शुद्ध पाणी देण्याचा संकल्प, सार्वजनिक नळाद्वारे कुटुंबांना पाणीपुरवठा ही योजनेची वैशिष्ट्ये आहेत.

"मनुष्यबळ भांडवलाचे पुनरूज्जीवन"



▪️राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व घटकांचा समावेश करून 15,000 शाळांना बळकट करणार; स्वयंसेवी संस्था, खाजगी शाळा आणि राज्ये यांच्याबरोबर भागीदारी करून नवीन 100 सैनिकी शाळांची स्थापना करणार.


▪️उच्च शिक्षण आयोगाच्या स्थापनेसाठी कायदा आणणार. यामध्ये सर्व गोष्टी एकाच छताखाली करणे शक्य व्हावे यासाठी स्थापना, मान्यता, नियमन आणि निधी यांच्यासाठी मानके निश्चित करणार; सर्व शासकीय महाविद्यालये, विद्यापीठे, संशोधन संस्था यांना एकाच छताखाली आणून एक महारचना तयार करणार; लडाखमध्ये उच्च शिक्षणाच्या सुविधेसाठी लेह येथे केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणार.


▪️आदिवासी क्षेत्रामध्ये 750 एकलव्य निवासी शाळा स्थापन करणार; आदिवासी विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा देण्यावर भर देणार; अनुसूचित जाती कल्याण अंतर्गत मॅट्रिक/दहावी नंतर देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत सुधारणा; केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या 35,219 कोटी रुपयांच्या मदतीमध्ये सहा वर्षासाठी म्हणजे 2025-26 पर्यंत वाढपदव्युत्तर शिक्षण उमेदवारी, पदवी प्रशिक्षण आणि अभियांत्रिकी पदविकाधारक यांच्यासाठी विद्यमान राष्ट्रीय उमेदवारी प्रशिक्षण योजनेच्या पुनर्गठनासाठी 3000 कोटी रुपयांची तरतूद; संयुक्त अरब अमिरात कौशल्य पात्रता, मूल्यांकन, प्रमाणपत्र आणि प्रमाणित कर्मचारी नियुक्त करण्यास मान्यता.


▪️डिजिटल माध्यमातून पेमेंट करण्यासाठी 1,500 कोटी रुपयांची योजना प्रस्तावितराष्ट्रीय भाषा अनुवाद मिशन (NTLM) याचे कार्य करणार. त्यामध्ये सरकारी योजना आणि त्यासंबंधित धोरणात्मक माहिती प्रमुख भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देणार.


▪️न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्यावतीने PSLV-CS51 याचे प्रक्षेपण करणार यामध्ये ब्राझिलच्या अॅमेझोनिया उपगृहाचे आणि काही भारतीया उपग्रहांचे प्रक्षेपण करणार.


▪️गगनयान मोहिमेअंतर्गत, भारतीय 4 अंतराळवीरांचे रशियातल्या जेनेरिक स्पेस फ्लाईटव्दारे प्रशिक्षण सुरू आहे; पहिल्या मानवविरहित यानाचे डिसेंबर 2021 मध्ये प्रक्षेपण केले जेल.


▪️अतिखोल सागरात जलसंपत्तीच्या आणि सागरी जैवविविधता संवर्धन मोहिमेसाठी पाच वर्षात 4000 कोटी रुपये खर्च करणार.

अभिमानास्पद! ‘नासा’च्या कार्यकारी प्रमुख पदावर भारतीय वंशाची महिला.



🔰भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भाव्या यांचं नाव नासाच्या परिक्षम मसितीच्या सदस्य म्हणून निवडलं आहे. यासंदर्भात नासानेही एक पत्रक जारी करत भाव्या यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे. भाव्या यांची नियुक्ती ही भारतीयांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. व्हाइट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये भाव्या यांच्याबरोबरच नासामधील इतर प्रमुख पदांवरील नियुक्त्यांचीही घोषणा करण्यात आली आहे.


🔰भाव्या यांना अभियांत्रिकी आणि अवकाश संशोधन या दोन्ही क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा दांडगा अनुभव आहे. मात्र भाव्या यांच्यावर अशी महत्वाची जबाबदारी टाकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी भाव्या नाच्या इनोव्हेटिव्ह अ‍ॅडव्हान्स कॉन्सेप्ट्स प्रोग्रॅम म्हणजेच नवीन संकल्पनांवर काम करण्यासंर्भातील उपक्रम आणि अ‍ॅडव्हायझरी काऊन्सीलसाठी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संकल्पा आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या सदस्य देखील होत्या.


🔰भाव्या यांनी स्पेस टेक्नोलॉजी क्षेत्रामध्ये मागील दीड दशकांहून अधिक काळ काम केलं आङे. तसेच त्या इन्स्टीट्यूट ऑफ डिफेन्स अ‍ॅनालिसिस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी पॉलिसी इंन्स्टीट्यूटमध्ये (एसटीपीआय) रिसर्च स्टाफ म्हणून २००५ ते २०२० दरम्यान कार्यरत होत्या.


🔰एसटीपीआय मध्ये सहभागी होण्याअगोदर त्या सी-सटीपीएस एलएलसीच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. त्यापूर्वी भाव्या यांनी केंब्रिजमधल्या मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्राचे संचालक पद भूषवलं आहे. अमेरिकेच्या न्यूक्लिअर सोसायटीच्या अण्वस्त्रविषयक वार्षिक परिषदेच्या अध्यक्षस्थानीही भाव्या यांची नियुक्ती करण्यात आली होती.

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे


प्रश्न२२१) कोणत्या मंत्रालयाने ‘राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना’ जाहीर केली आहे?

उत्तर :- पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय


प्रश्न२२२) गेल्या वर्षभरात भारताच्या अर्थव्यवस्थेमधील पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे होते?

उत्तर :-  V-आकार


प्रश्न२२३) कोणत्या व्यक्तीने संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण 2020-21’ सादर केले?

उत्तर :-  अर्थ मंत्री निर्मला सीतारमण


प्रश्न२२४) कोणता खेळाडू प्रथम आशियाई ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल गटात विजेता ठरला?

उत्तर :-  सौरभ चौधरी


प्रश्न२२५) कोणत्या वर्षी ‘तेजस मार्क II’ या लढाऊ विमानाची प्रथम अति-गती चाचणी घेतली जाणार?

उत्तर :- २०२३


प्रश्न२२६) कोणत्या देशाने बासमती तांदळासाठी GI टॅग प्राप्त केला?

उत्तर :- पाकिस्तान


प्रश्न२२७) कोणत्या दिवशी ‘जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग (NTD) दिन’ साजरा करतात?

उत्तर :- ३० जानेवारी


प्रश्न२२८) केरळ राज्याच्या कोणत्या शहरात ‘जेंडर पार्क’ उभारण्यात आले आहे?

उत्तर :- कोझिकोडे


प्रश्न२२९) कोणत्या शहरात जागतिक सुवर्ण परिषदेचे मुख्यालय आहे?

उत्तर :- लंडन


प्रश्न२३०) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने “तुरुंग पर्यटन” नामक उपक्रमाचा प्रारंभ केला?

उत्तर :- महाराष्ट्र


१. शांघाई सहयोग संघटन (SCO) - २०२० चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?

 A) किर्गिजस्तान 

 B) रशिया 

 C) चीन 

 D) भारत

Correct Answer D 

भारत 


२. शांघाई सहयोग संघटन मध्ये भारताने पूर्ण सदस्यत्व कधी स्वीकारले ? 

  A) ९ जून २०१६ 

 B) ९ जून २०१९ 

 C) ९ जून २०१७ 

 D) ९ जून २०१८

Correct Answer C

९ जून २०१७ 


३.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा म्हणून __साजरा केला जातो?

  A) भारतीय प्रवासी दिन 

 B) राष्ट्रीय एकता दिन 

 C) राष्ट्रीय युवा दिन 

 D) राष्ट्रीय शांतता दिन

Correct Answer B 

राष्ट्रीय एकता दिन


४. " DPD" चे संक्षिप्त रुप काय आहे ?

  A) डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 

 B) डूअर पोर्ट डिलीव्हरी 

 C) डायरेक्ट पार्सल डिलीव्हरी 

 D) डायरेक्ट पार्टी डिलीव्हरी

Correct Answer A 

डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 


५. अमेरिकेच्या "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" ची उंची ९३ मीटर आहे तर, भारतातील स्टैच्यू ऑफ़ यूनिटी ची उंची किती मीटर आहे ? 

  A) १७२ 

 B) १९८ 

 C) १९० 

 D) १८२

Correct Answer D 

१८२ 


६. १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून देणारे महान फुटबॉल पटू यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय टपाल विभागाने तिकीट जारी केले? 

  A) चुनी गोस्वामी 

 B) गोशतो पॉल 

 C) तालिमेरेन आओ 

 D) वरीलपैकी सर्व

Correct Answer A 

चुनी गोस्वामी 


७. 'आयसीसी ' युवा (१९ वर्षाखालील ) विश्व चषक क्रिकेट-२०२० स्पर्धा कोठे होणार आहे ?

  A) इंग्लंड 

 B) द. आफ्रिका 

 C) ऑस्ट्रेलिया 

 D) वेस्ट इंडिज

Correct Answer B 

द. आफ्रिका 


८. " रायसीना डायलॉग " हा दोन दिवसीय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?

  A) मध्य प्रदेश 

 B) दिल्ली 

 C) हरियाणा 

 D) मुंबई

Correct Answer B 

दिल्ली 


९. शांघाई सहयोग संघटनेच्या आठ आश्चर्यमध्ये भारतातील कोणत्या स्थळांचा समावेश करण्यात आला?

  A) सुवर्ण मंदिर 

 B) नालंदा विद्यापीठ 

 C) ताज महाल 

 D) स्टैच्यू ऑफ़ यूनिटी

Correct Answer D 

स्टैच्यू ऑफ़ यूनिटी 


१०. शांघाई सहयोग संघटन चे मुख्यालय कोठे आहे ?

  A) इस्लामाबाद (पाकिस्तान) 

 B) मास्कोव (रशिया) 

 C) बीजिंग (चीन) 

 D) दिल्ली (भारत) 

Correct Answer C 

बीजिंग (चीन)

०३ फेब्रुवारी २०२१

महत्वाचे घाट व जोडणारी शहरे



थळघाट  ➖  मबई  _  नाशिक


बोरघाट   ➖ पणे _ मुंबई


कुंभार्ली ➖ कराड  _ चिपळूण


आंबा ➖ मलकापूर _ रत्नागिरी


फोंडा ➖ कोल्हापूर  _ मालवण, वेगुर्ला


आंबोली ➖ कोल्हापूर  _ गोवा


माळशेज ➖ मबई  _ अहमदनगर


कसारा ➖ मबई  _ नाशिक


पसरणी ➖ वाई  _ पांचगणी

लोकसंख्या वाढीचे टप्पे:-



1.1901-21 :- स्थिर वाढीचा टप्पा .


2.1921-51 :- मंद  वाढीचा  टप्पा .


3. 1951-81 :- वेगवान उच्च वाढीचा टप्पा .


4. 1981-2011:- उच्च वाढ मात्र घसरता दर  .


📌 लोकसंख्या संक्रमण सिद्धांत :-

 

1ला टप्पा :- जन्मदर आणि मृत्युदर जास्त


2रा टप्पा  :- वाढीचा वार्षिक दर 2.0%


3रा टप्पा :- जन्मदर सातत्याने कमी आणि लोकसंख्या वृध्दी कमी

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना


◾️भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?

- लॉर्ड हार्डींग्ज पहिला


◾️इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत्तपत्र कोणते?

- बॉम्बे हेराॅल्ड.


◾️भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?

- मुस्लिम लीग


◾️ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?

- 1780 ची पाल्लुतुरची लढाई 


◾️भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?

- लॉर्ड कॅनिंग 


◾️ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?

- बंगाल प्रांतात


◾️1858च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?

- लॉर्ड स्टैनले


◾️1857च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये पेटली?

- 34वी एन. आय. रजिमेंट 


◾️इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?

- कलकत्ता विद्यालय

पाबना शेतकरी विद्रोह 1873-76


★ 1850/1859 च्या कायद्याने शेतकर्यांंना संरक्षण दिले मात्र कंपनी सरकारने अन्याय करण्यास सुरुवात केली


★ 1873 च्या दरम्यान या अन्यायाविरुद्ध "युसूफ सराय" च्या शेतकर्यांनी "क्रुषक संघ" स्थापन केला 


🔸परमुख नेता:- ईशान चन्द्र राय, शंभुपाल


★ कालांतराने हा विद्रोह ढाका, त्रिपूरा, बेकरगंज, फरिदपूर, बोगरा, मेमनसिंह येथे झाले


★ दरम्यान पबनाच्या नागरिकांनी घोषणा केली, " आम्ही फक्त महाराणीची जनता होऊ इच्छितो"



★ समर्थन:- बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय,  आर.सी. दत्त,  सुरेन्द्रनाथ बनर्जी, आनंद मोहन बोस, द्वारका नाथ गांगुली यांनी पुढील काळात समर्थन केले


RRB NTPC Exams -2021 (अति संभाव्य प्रश्नोत्तरे )



#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा


#2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाधर टिळक

    

#3. महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते? - गोपाळ कृष्ण गोखले


#4. दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला शासक / सर्वप्रथम महिला शासक कोण होती? - रझिया सुल्तान


#5. सिंधू सभ्यतेचे पट्टानगर (बंदर) कोणते होते? - लोथल


#6. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक कोण होते? - ए.ओ. ह्यूम


#7. कोणते वेद गद्य आणि श्लोक या दोन्ही मध्ये रचले गेले आहेत? - यजुर्वेद


#8. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? - सय्यद अहमद खान


#9. बौद्ध धर्म कोणाच्या शासनकाळात हीनयान आणि महायान या दोन भागात विभागला गेला होता? - कनिष्क


#10. लोदी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? - इब्राहिम लोदी


#11. प्रथम जैन संगीत कोठे आयोजित केले गेले होते? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#12. ऋग्वैदिक समाजातील सर्वात लहान घटक कोणते होते? - कुल किंवा कुटुंब


#13. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौसेना होती? - चोल


#14. संकीर्तन प्रणालीचे जनक कोण होते? - चैतन्य


#15. कोणत्या मुगल शासकास 'आलमगीर' म्हटले जाते? - औरंगजेब


#16.  'शहीद आजम' ही पदवी कोणाला दिली गेली? - भगतसिंग


#17. सायमन कमिशनच्या निषेधाच्या वेळी लाठीचार्जात कोणत्या राजकारण्यांचा मृत्यू झाला? - लाला लाजपत राय


#18. वहाबी चळवळीचे प्रवर्तक कोण होते? - सय्यद अहमद


#19. बुद्धांनी महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी केले? - कुशीनारा / कुशीनगरमध्ये


#20. कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? - व्योमेश चंद्र बॅनर्जी

महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते



👤 १९९६ : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

🙎‍♀️ १९९७ : लता मंगेशकर 

👤 १९९९ : विजय भटकर 

👤 २००१ : सचिन तेंडुलकर

👤 २००२ : भिमसेन जोशी 

👤 २००३ : अभय बंग व राणी बंग 🙎‍♀️

👤 २००४ : बाबा आमटे 

👤 २००५ : रघुनाथ माशेलकर

👤 २००६ : रतन टाटा 

👤 २००७ : आर के पाटील

👤 २००८ : नाना धर्माधिकारी 

👤 २००८ : मंगेश पाडगावकर

🙎‍♀️ २००९ : सुलोचना लाटकर 

👤 २०१० : जयंत नारळीकर

👤 २०११ : डॉ. अनिल काकोडकर 

👤 २०१५ : बाबासाहेब पुरंदरे .

चालू घडामोडी



१. शांघाई सहयोग संघटन (SCO) - २०२० चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?

 A) किर्गिजस्तान 

 B) रशिया 

 C) चीन 

 D) भारत

Correct Answer D 

भारत 


२. शांघाई सहयोग संघटन मध्ये भारताने पूर्ण सदस्यत्व कधी स्वीकारले ? 

  A) ९ जून २०१६ 

 B) ९ जून २०१९ 

 C) ९ जून २०१७ 

 D) ९ जून २०१८

Correct Answer C

९ जून २०१७ 


३.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा म्हणून ______साजरा केला जातो?

  A) भारतीय प्रवासी दिन 

 B) राष्ट्रीय एकता दिन 

 C) राष्ट्रीय युवा दिन 

 D) राष्ट्रीय शांतता दिन

Correct Answer B 

राष्ट्रीय एकता दिन


४. " DPD" चे संक्षिप्त रुप काय आहे ?

  A) डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 

 B) डूअर पोर्ट डिलीव्हरी 

 C) डायरेक्ट पार्सल डिलीव्हरी 

 D) डायरेक्ट पार्टी डिलीव्हरी

Correct Answer A 

डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 


५. अमेरिकेच्या "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" ची उंची ९३ मीटर आहे तर, भारतातील स्टैच्यू ऑफ़ यूनिटी ची उंची किती मीटर आहे ? 

  A) १७२ 

 B) १९८ 

 C) १९० 

 D) १८२

Correct Answer D 

१८२ 


६. १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून देणारे महान फुटबॉल पटू यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय टपाल विभागाने तिकीट जारी केले? 

  A) चुनी गोस्वामी 

 B) गोशतो पॉल 

 C) तालिमेरेन आओ 

 D) वरीलपैकी सर्व

Correct Answer A 

चुनी गोस्वामी 


७. 'आयसीसी ' युवा (१९ वर्षाखालील ) विश्व चषक क्रिकेट-२०२० स्पर्धा कोठे होणार आहे ?

  A) इंग्लंड 

 B) द. आफ्रिका 

 C) ऑस्ट्रेलिया 

 D) वेस्ट इंडिज

Correct Answer B 

द. आफ्रिका 


८. " रायसीना डायलॉग " हा दोन दिवसीय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?

  A) मध्य प्रदेश 

 B) दिल्ली 

 C) हरियाणा 

 D) मुंबई

Correct Answer B 

दिल्ली 


९. शांघाई सहयोग संघटनेच्या आठ आश्चर्यमध्ये भारतातील कोणत्या स्थळांचा समावेश करण्यात आला?

  A) सुवर्ण मंदिर 

 B) नालंदा विद्यापीठ 

 C) ताज महाल 

 D) स्टैच्यू ऑफ़ यूनिटी

Correct Answer D 

स्टैच्यू ऑफ़ यूनिटी 


१०. शांघाई सहयोग संघटन चे मुख्यालय कोठे आहे ?

  A) इस्लामाबाद (पाकिस्तान) 

 B) मास्कोव (रशिया) 

 C) बीजिंग (चीन) 

 D) दिल्ली (भारत) 

Correct Answer C 

बीजिंग (चीन)


काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ


🌷अकबर : श्रेष्ठ किंवा मोठा


🌷अकदस : पुण्यवान,धर्मात्मा


🌷अखई : अखंड


🌷अगेल : पहिला


🌷अगाब : मजबूत, श्रेष्ठ


🌷अधा : धनी,यजमान


🌷अजा : शेळी, बकरी


🌷आदोली  :  हेलकावा, झोका


🌷आदिष्ट  :  आज्ञा , हुकूम केलेला


🌷आपगा  :  नदी


🌷आभु  :  ब्रम्हा


🌷आमण  :  आवण, चाकाचा आस ज्यात फिरतो ते


🌷आयतन  :  जागा ,स्थळ


🌷आलक  :  कपटी, लबाड, गुन्हेगार


🌷आली  :  सखी, मैत्रीण,रांग,ओळ


तैनाती फौज

 ◾️ या पध्दतीमध्ये इंग्रज फौजेचा सर्व खर्च हा ती फ़ौज ज्यांच्याकडे आहे ( राजाने ) त्यांनी करावयाचा   


◾️ लॉर्ड वेलस्लिने 1798 मध्ये सर्वप्रथम निजामावर 'तैनाती फौजेचा' अवलंब केला.


🔹 निजामाने या तैनाती फौज चा खर्च द्यायचा

🔹 निजामाचे परराष्ट्र धोण मात्र इंग्रज ठरवू लागले. 


⚔️ निजाम 1798

⚔️ टिपू सुलतान  1799

⚔️ अयोध्येचा नवाब 1801

⚔️  दुसरा बाजीराव पेशवा 1802


 यांच्यावर तैनाती फौजेची सक्ती करण्यात आली.


मराठी व्याकरण - भाषेतील रस



रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.


साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.


मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.


साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.


१) स्थायीभाव - रती


रसनिर्मिती – शृंगार


हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन


उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.


२) स्थायीभाव – उत्साह


रसनिर्मिती - वीर


हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात


उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’


३) स्थायीभाव –शोक


रसनिर्मिती – करुण


हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात


उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!


४) स्थायीभाव – क्रोध


रसनिर्मिती – रौद्र


हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन


उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.


५) स्थायीभाव – हास


रसनिर्मिती – हास्य


हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.


उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.


६) स्थायीभाव – भय


रसनिर्मिती- भयानक


हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.


उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.


७) स्थायीभाव – जुगुप्सा


रसनिर्मिती – बीभत्स


हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.


उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.


८) स्थायीभाव – विस्मय


रसनिर्मिती- अदभुत


हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात


उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.


९) स्थायीभाव – शम (शांती)


रसनिर्मिती – शांत


हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.


उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

एक काल बाह्यतरतूद.(विधानपरिषद)....



♦️ पदवीधर व शिक्षक यांना प्रतिनिधित्व का देण्यात आले ....

          राज्यघटना तयार झाली, त्यावेळी साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प होते, तरीही दूरदृष्टीने विचार करून घटना समितीने मतदानाचा हक्क सर्वांना दिला. त्यावेळी हा निर्णय कसा चुकीचा आहे, असा युक्तिवाद करणारा मोठा वर्ग होता. कायदेमंडळातील अशिक्षित व कमी शिकलेले सभासद सरकारच्या कामावर देखरेख करू शकतील का आणि कायदे करताना त्याचा बारकाईने विचार करू शकतील का, याबाबत त्यांना संदेह होता. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांचेही असे मत होते; त्यामुळेच विधान परिषदेत पदवीधर व शिक्षक यांचे प्रतिनिधित्व असावे, अशी मागणी पुढे आली आणि त्यानुसार कलम १७१ अन्वये ही तरतूद करण्यात आली.


♦️विधानपरिषद रचनेबद्दल चर्चा..

  घटनेच्या 171 कलमाच्या पहिल्या प्रारूपात विधान परिषदेत किती सभासद असावेत याची फक्त तरतूद होते आणि बाकीचा सर्व तपशील.कायद्यान्वये निर्धारित करावा, असे अपेक्षित होते; पण घटना समितीत असा आग्रह धरण्यात आला, की हे योग्य होणार नाही व घटनेतच विधान परिषदेत काय प्रतिनिधित्व असावे, याची तरतूद केली जावी. त्यानुसार विधानसभेने आणि पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी निवडून द्यावयाचे सभासद; तसेच राज्यपाल नियुक्त सभासद यांची तरतूद करण्यात आली. त्यावेळी कदाचित ही पुरेशीही होती; पण आता झालेल्या विविध बदलांचे प्रतिनिधित्व विधान परिषदेत हवे.


♦️ नामनिर्देशित सदस्यांची तरतूद रद्द करता करावी का ?

राज्यपालांनी नेमावयाच्या सभासदांचा प्रश्न नेहमीच विवाद्य झाला आहे. समाजातील ज्या क्षेत्रातील व्यक्तींना निवडणुकांच्या धामधुमीत पडता येणे शक्य नाही, त्यांचे विचार विधान परिषदेत मांडले जावेत व ते लक्षात घेतले जावेत, या दृष्टीने राज्यघटनेत केलेली ही तरतूद योग्य म्हणता येईल. प्रत्यक्षात मात्र त्याचे वेगळेच स्वरूप दिसते. या जागांवर नेमणूक करणे, हा प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाच्या हातातील अधिकार होतो; त्यामुळे अनेकदा राजकारणी मंडळीच या पदावर नेमण्यासाठी आग्रह धरला जातो. शिवाय, आता अनेक प्रकारच्या माध्यमांतर्फे विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना आपले विचार लोकांसमोर ठेवण्याच्या असंख्य संधी आहेत; त्यामुळे आता राज्यपालांनी नियुक्त करावयाचे सभासद ही तरतूद आवश्यक नाही.


♦️विधान परिषदेची आवश्यकता आहे का? 

महात्मा गांधींना ही चैन भारताला परवडणारी नाही, असे वाटे. हा प्रश्न घटना समितीत आला, तेव्हा डॉ. आंबेडकरांनी या संस्थांचे काम पाहून मग त्या चालू ठेवाव्यात किंवा कसे त्याबाबत निर्णय घ्यावा, असे म्हटले होते. गेल्या सात दशकांत अनेक राज्यांनी विधान परिषदा रद्द केल्या. बाकीच्या विधान परिषदांनी केलेल्या कामाचा सखोल आढावा घेऊन, त्यांची आवश्यकता आहे किंवा कसे, याचा विचारच झालेला नाही. आता केवळ सहा राज्यांमध्ये परिषदा आहेत, हे पाहता असा आढावा अगत्याचा आहे. महाराष्ट्राने असा आढावा लवकर घ्यावा. राज्यघटनेतील तरतुदी काळानुसार बदलू शकतात. म्हणूनच घटनेत बदल करण्याच्या तरतुदी सहजसाध्य ठेवल्या आहेत. राज्यघटना बदलली नाही, तर काय होऊ शकते, याचे विधान परिषदांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुका हे एक ज्वलंत उदाहरण आहे. म्हणूनच या तरतुदीचा नव्याने विचार होणे आवश्यक आहे.


♦️विधानपरिषद नष्ट/निर्माण करणे.. (कलम 169)

- अधिकार विधानसभा..

👉 विधानपरिषदेचे अस्तित्व विधानसभेच्या मर्जीवर अवलंबून असते..

- अंतिम अधिकार संसद..

👉सबंधित राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने ठराव पारित केल्यासच संसद विधानपरिषद नष्ट /निर्माण करू शकते.

(विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसतो पण ठरावाविना संसद पुढील कोणतीच कार्यवाही करू शकत नाही)


०२ फेब्रुवारी २०२१

रामसर करारासंबंधित महत्वपूर्ण माहिती.




🔰 १९७१ साली इराणमधील रामसर शहरात भरलेल्या ‘कन्वेन्शन ऑन वेटलँड्स’ ह्या जागतिक परिषदेला ‘रामसर परिषद’ मानले जाते


🔰 हयाच परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापरासंबंधीचे निर्णय घेण्यात आले


🔰 पाणथळ जागेच्या व्याख्येत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा यात समावेश केला जातो


✍️ भारताने ’रामसर’ करारावर १९८२ साली सही करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचलले.


🌍 सध्या जगातील २,४४१ पाणथळींना ’रामसर’चा दर्जा प्राप्त आहे


🇮🇳 भारतातील ४२ पाणथळींना ’रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाला आहे


🗓 जगभरात दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस ‘पाणथळ दिन’ म्हणून साजरा केला जातो


🔰 ओडिशातील चिल्का सरोवर हे भारतातील पहिले रामसर स्थळ आहे (१९८१)


🔰 नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे (जानेवारी , २०२०)


🔰 लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ आहे (नोव्हेंबर , २०२०).


अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या मोठ्या घोषणा :



Budget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मली सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. करोना संकटामुळे आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून करोना प्रतिबंधक लसीचाही उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय देशात शेतकरी आंदोलनाची चर्चा सुरु असताना शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.


महाराष्ट्राबद्दल बोलायचं गेल्यास नाशिक मेट्रो फेज-१ आणि नागपूर मेट्रो फेज- २ ची घोषणा करण्यात आलेली असून नाशिकसाठी २ हजार ९२ कोटी आणि नागपूरसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय ७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती देण्यात आलेली असून सामान्य करदात्यांना मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. जाणून घेऊयात अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा


- नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार कोटी रुपयांची तरतूद

- प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारणीसाठी तरतूद

- १५ अत्यावश्यक आरोग्य केंद्र आणि २ मोबाईल हॉस्पिटलची घोषणा

- आरोग्य क्षेत्रासाठी २ लाख २३ हजार ८४६ कोटींच्या निधीची तरतूद

- कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद

- १५ वर्षे जुन्या वाहनांसाठी 'स्क्रॅपिंग पॉलिसी

- देशभरात ७ मेगा इन्व्हेस्टमेंट पार्क उभारणार

- कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १ लाख ७८ हजार कोटींचा निधी

- डीएफआयसाठी ३ वर्षांकरिता ५ लाख कोटींच्या निधीची तरतूद

- दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरात गॅस पाइपलाईनचा विस्तार करणार

- कापड उद्योगासाठी आवश्यक सर्व सुविधांसह येत्या ३ वर्षात ७ टेक्स्टाईल पार्कची निर्मिती

- रस्ते विभागासाठी १ लाख १८ हजार कोटींचा निधी

- मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद

- २०३० पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य डोळ्यासमोर

- रेल्वेसाठी १ लाख १० हजार ५५ कोटींच्या निधीची तरतूद

- २०३० पर्यंत राष्ट्रीय रेल्वे योजना राबवणार

- गरज पडल्यास सरकार कोरोना लसीकरणासाठी आणखी निधी मंजूर करणार

- सार्वजनिक वाहतुकीतल्या बसेसची सुधारणा करण्यासाठी १८ हजार कोटी

- नाशिक मेट्रो फेज-१ आणि नागपूर मेट्रो फेज- २ ची घोषणा

- नाशिकसाठी २ हजार ९२ कोटी आणि नागपूरसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतूद

- विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मर्यादा ४९ वरून ७४ टक्क्यांवर

- सरकारी बँकांसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद

- या वर्षी एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार

- बीपीसीएल,एअर इंडिया, पवनहंस, आयडीबीआयची निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करणार

- मोठ्या कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीमधून १ लाख ७५ हजार कोटींचा निधी उभारणार

- शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दिष्ट

- गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरिता तरतूद

- पश्चिम बंगालमध्ये कोलकाता-सिलिगुडी राष्ट्रीय महामार्गाची घोषणा

- १६.५ लाख कोटी कृषी कर्ज वाटप करण्याचं उद्दिष्ट

- १०० नवीन सैनिक स्कूलची घोषणा

- असंघटित मजुरांसाठी ऑनलाईन पोर्टल निर्माण करणार

- सर्व क्षेत्रात सर्व पदांवर महिलांना नोकरी करता यावी म्हणून प्रयत्न

- आदिवासी भागात ७५० 'एकलव्य' शाळा उभारणार

- पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेसाठी ६४ हजार कोटींची तरतूद

- लहान सिंचन प्रकल्पांसाठी ५ हजार कोटींची तरतूद

- गगनयान मिशन डिसेंबर महिन्यात सुरु करणार

- ५ वर्षात सागर मिशन अंतर्गत अभूतपूर्व संशोधनाचं लक्ष्य

- डिजिटल जनगणनेसाठी ३ हजार कोटींपेक्षा जास्त तरतूद

- समुद्र संशोधन करण्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद

- देशभरातील सर्व शहरी स्थानिक संस्थांमध्ये जल जीवन मिशन राबवण्यात येणार असून या - महत्त्वकांक्षी योजनेसाठी २.८७ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

- अनुसूचित जातीत मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिष्यवृत्ती

- सरकारला ८० हजार कोटींच्या निधीची गरज; ८० हजार कोटींचा निधी जमा करण्यासाठी अनेक योजना

- उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांची संख्या १ कोटीने वाढवणार

- लघु उद्योगांसाठी १५ हजार ७०० कोटींची तरतूद

- लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ उभारणीची घोषणा

- देशात उच्च शिक्षण आयोगाची निर्मिती, त्यासाठी कायद्यात सुधारणा करणार

- सौदी अरेबिया आणि जपानच्या मदतीने स्किल ट्रेनिगवर काम सुरु

- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासाठी १,१८,१०१ कोटींची तरतूद

- ३ वर्षात ५ लाख कोटींचा निधी उभारण्यासाठी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूटशनची स्थापना करणार.

Budget 2021: निर्मला सीतारामण यांचं बजेट भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.  


▪️छोट्या करदात्यांसाठी डिस्प्युट रिझोल्युशन कमिटिची स्थापना


▪️कराशीसंबंधीत वाद सोडवण्यासाठी ही समिती मदत करणार


▪️कर चुकवणाऱ्यांसाठी पुन्हा केस रिओपन करणाऱ्यांना 6 वर्षाच्या कालावधिवरून 3 वर्षांचा कालावधि करण्यात येणार 


▪️75 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना आणि पेन्शनर असलेल्यांना ITRमधून सूट


▪️डायरेक्ट टॅक्स

कॉर्पोरेट टॅक्सचा दर कमी केला होता. 2014च्या तुलनेत ITR भरणाऱ्यांची संख्या अधिक 


▪️परवडणाऱ्या भाड्याच्या घरांसाठी असलेल्या स्कीममध्ये 1 वर्षाने वाढ


▪️परवडणारी घर बांधणाऱ्या बिल्डरसाठी टॅक्समध्ये 1 वर्षासाठी सूट


▪️परदेशी गुंतवणूकदारांनासुद्धा काही प्रमाणात TDSवर सूट 


▪️वयावसायिकांसाठी 5 कोटी उत्पन्न असणाऱ्यांनाच ऑडिट बंधनकारक


▪️कपनीला PF कापल्यानंतर कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा करणं बंधनकारक


▪️PF कापला जातो पण खात्यावर जमा होत नसेल तर त्याचा लाभ कंपनीला मिळणार नाही


▪️लोखंड आणि स्टील स्वस्त होणार


▪️सोनं आणि चांदी स्वस्त होणार


▪️मोबाईल आणि चार्जर महागणार 


▪️मोबाईल पार्टमध्ये 0 कस्टम ड्युटी असलेल्यांना 2 टक्के लागणार


▪️GST- 80 न लागू होणाऱ्या कस्टम ड्युटी रद्द


▪️fy22 सीएसएक्स 12 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेईल


▪️वित्तीय वर्ष 22 मध्ये 6.8% वित्तीय तूट उद्दिष्ट


▪️आर्थिक वर्ष 21 मधील वित्तीय तूट जीडीपीच्या 9.5% असेल


▪️करारासंदर्भात असलेला वाद सोडवण्यावर भर


▪️इनकम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही


▪️आयकरात कोणताही बदल नाही


▪️२० वर्षापेक्षा जुनी वाहनं भंगारात काढणार


▪️नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटी रूपयांची घोषणा


▪️डिजिटल पेमेंटसाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद


▪️भारतात पहिल्यांदा डिजिटल जनगणना होणार


▪️चहा व्यवसायिकांसाठी 1000 कोटींची तरतूद


▪️15 हजार शाळांना आदर्श शाळा बनवणार


▪️एग्रिकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड बनवला जाईल


▪️गरामीण विकासासाठी ४० हजार कोटी रूपये 


▪️शहरांसाठी जल जीवन मिशन सुरू 


▪️मासेमारी साठी ५ बंदर. फिशिंग हब बनेल


▪️अर्बन क्लीन इंडिया १.४१ कोटी


▪️माइक्रो इरेगेशन साठी ५ हजार कोटी 


▪️पतप्रधान आत्मनिर्भर योजनेसाठी 64 हजार कोटींची तरतूद


▪️डिजिटल ट्रान्झाक्शन वाढवण्यासाठी मोदी सरकारचं एक पाऊल


▪️डिजिटल ट्रान्झाक्शनसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद


▪️उच्च शिक्षण आयोगाची स्थापना करणार


▪️उज्ज्वला योजनेत आणखी एक कोटी लाभार्थींचा समावेश असेल 


▪️आदिवासी भागात ७५० एकलव्य शाळा उभारणार 


▪️कष कर्जासाठी मोदी सरकारनं 16.5 लाख कोटींची तरतूद- अर्थमंत्री


▪️100 सैनिकी शाळा देशभरात उघडल्या जाणार


▪️विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधांचा लाभ


▪️मजुरांसाठी विशेष पोर्टल लॉन्च करणार


▪️शतकरी आणि महिलांसाठी बजेटमध्ये महत्त्वाच्या तरतुदी


▪️शिक्षणासाठी मोठ्या घोषणा 

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झालं.


▪️किमान आधारभूत किंमतपेक्षा दीडपट अधिक भाव देणार


▪️गव्हाच्या MSPमध्ये दीड पटीने वाढ, गहूचं पीक घेणाऱ्यांची संख्या वाढली


▪️१६.५ लाख कोटी कृषी कर्ज वाटप करणार


▪️शतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी 75 हजार कोटींची तरतूद


▪️शतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी MSPपेक्षा 1.5 पट अधिक किंमत देणार


▪️शती आणि त्याला पुरक व्यावसाय किंवा जोड व्यावसायांसाठी ही योजना देण्याचं लक्ष्य


▪️करेडिट पॉलिसमध्ये 16 टक्क्यांची वाढ


▪️या वर्षी एलआयसीचा आयपीओ बाजारात येणार


▪️हमीभावात दीडपट वाढ करणार


▪️एअर इंडिया विकणार 


▪️सरकारी बँकांना २२ हजार कोटी रूपयांची मदत देणार


▪️#IDBI बँकेचा खासगीकरणाचा प्रस्ताव ठेवणार


▪️नागपूर, नाशिक मेट्रोचा विस्तार6


▪️11,000 किलोमीटर महामार्गांचं काम पूर्ण, मार्च 2022पर्यंत 8500 किलोमीटर अंतराचे महामार्ग पूर्ण करण्यावर भर


▪️नागपूर मेट्रो फेज-2 आणि नाशिक मेट्रोसंदर्भात घोषणा


▪️टायर -2, टियर -3 शहरांमध्ये गॅस पाइपलाइनचा विस्तार केला जाईल. 2021-22 मध्ये 4.39 लाख कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य आहे


▪️दशात सध्या 702 किमी अंतराचं मेट्रोचं जाळं आहे. तर 1000 किमीपेक्षा अधिक किमी अंतराचं जाळं तयार करण्यावर भर


▪️शहरी भागांमध्ये मेट्रोच्या सुविधेसोबत बसची संख्या वाढवणार


▪️मट्रोचं जाळं वाढवण्यावर यापुढील काढात मोदी सरकारचा भर


▪️इन्फ्रा क्षेत्राला चालना देण्यासाठी डेव्हलपमेंट फायनान्स कंपन्यांवर 20 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 


▪️35 हजार कोटींची कोरोना लशीसाठी तरतूद करण्यात आली आहे. 


▪️परत्येक वाहनाची तपासणी आणि चाचणी केली जाणार


चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे


प्रश्न१) कोणत्या प्रदेशात पोंग धरण-तलाव आहे?

(A) अरुणाचल प्रदेश

(B) ल्हासा

(C) हिमाचल प्रदेश√√

(D) काठमांडू


प्रश्न२) कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय रोखे आयोग संघटना (IOSCO) आहे?

(A) दिल्ली

(B) माद्रिद√√

(C) पॅरिस

(D) बेसेल


प्रश्न३) कोणत्या सेवेसाठी “मिस कॉल सुविधा” सुरू करण्यात आली आहे?

(A) कार विषयक नोंदणी

(B) भूमी विषयक नोंदणी

(C) एलपीजी टाकी भरण्याविषयक नोंदणी√√

(D) यापैकी नाही


प्रश्न४) कोणत्या देशाने ‘राष्ट्रगीत’मधल्या शब्दामध्ये बदल केला?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) चीन

(D) ऑस्ट्रेलिया√√


प्रश्न५) कोणत्या दिवशी संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याचा स्थापना दिन साजरा केला जातो?

(A) 30 डिसेंबर

(B) 31 डिसेंबर

(C) 01 जानेवारी√√

(D) 02 जानेवारी


प्रश्न६) कोणत्या व्यक्तीने भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL) याचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला?

(A) शशांक प्रिया

(B) पुनीत कंसल

(C) हरिनंद राय

(D) सोमा मोंडल√√


प्रश्न७) कोणत्या अनुसूचित भारतीय उद्योग महासंघाने (CII) ‘पर्यटन’ क्षेत्राचा समावेश करण्याची मागणी केली आहे?

(A) पाचवी

(B) सहावी

(C) चौथी

(D) सातवी√√


प्रश्न८) कोणत्या राज्यात भारतातले पहिले परागणकर्ता उद्यान आहे?

(A) जम्मू व काश्मीर

(B) उत्तराखंड√√

(C) हिमाचल प्रदेश

(D) पंजाब


प्रश्न९) कोणत्या व्यक्तीला मध्यप्रदेश सरकारच्यावतीने ‘तानसेन सन्मान 2020’ देण्यात आला?

(A) शिव कुमार शर्मा

(B) हरिप्रसाद चौरसिया

(C) झाकीर हुसेन

(D) पं. सतीश व्यास√√


प्रश्न१०) कोणती व्यक्ती ‘त्रावणकोर रेडिओ’ची प्रथम इंग्रजी बातमीदार होती?

(A) शुभा जोशी

(B) इंदिरा जोसेफ वेन्नीयूर√√

(C) उत्तरा केळकर

(D) यापैकी नाही


TOPPER9 चालूघडामोडी, [01.02.21 09:45]

🔹चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे 


▪️दिनांक :- ०२/०१/२०२१


🔘माहिती संकलन :- Amar chavan


प्रश्न१) ‘आशा-भारत’ योजनेचे पूर्ण नाव काय आहे?

(A) अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग अरेंजमेंट

(B) अॅम्प्लिफाइड सस्टेनेबल हाऊसिंग अरेंजमेंट

(C) अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग अॅक्सेलेरेटर√√

(D) यापैकी नाही


प्रश्न२) कोणत्या राज्यात ‘दिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यान’ आहे?

(A) मणीपूर

(B) मिझोरम

(C) आसाम√√

(D) त्रिपुरा


प्रश्न३) कोणत्या राज्यात पारादीप बंदर आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) अंदमान

(C) ओडिशा√√

(D) तामिळनाडू


प्रश्न४) कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?

(A) राजस्थान

(B) कर्नाटक

(C) गुजरात√√

(D) आंध्रप्रदेश


प्रश्न५) कोणत्या ठिकाणी भारतातले सर्वोच्च उंचीवर हवामानशास्त्र केंद्र आहे?

(A) इटानगर

(B) लेह√√

(C) नवी दिल्ली

(D) कोलकाता


प्रश्न६) ‘इन पर्स्यूट ऑफ जस्टीस: अॅन ऑटोबायोग्राफी’ हे पुस्तक कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे?

(A) न्यायमूर्ती राजिंदर सचार√√

(B) न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे

(C) न्यायमूर्ती उदय यू. ललित

(D) न्यायमूर्ती अशोक भूषण


प्रश्न७) विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीचे नाव काय आहे?

(A) आकाश-एनजी

(B) करंज-जी

(C) कलवरी-जी

(D) सहायक-एनजी√√


प्रश्न८) कोणती व्यक्ती येस बँकेचे नवे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) आहे?

(A) महेश कृष्णमूर्ती

(B) निरंजन बनोडकर√√

(C) अतुल भेडा

(D) सुनील मेहता


प्रश्न९) कोणत्या व्यक्तीची "ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन" या संस्थेच्या GAVI मंडळामध्ये एक सदस्य निवड झाली?

(A) अमित शाह

(B) राजनाथ सिंग

(C) डॉ. हर्ष वर्धन√√

(D) यापैकी नाही


प्रश्न१०) कोणत्या मंत्रालयाने “डिजिटल ओशन” अॅप तयार केले?

(A) पृथ्वी विज्ञान मंत्रालय√√

(B) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

(C) रसायन व खते मंत्रालय

(D) यापैकी नाही


प्रश्न२१) कोणती व्यक्ती महापौर पदाची जबाबदारी स्वीकारणारी देशातली सर्वात तरुण व्यक्ती ठरली?

(A) आदित्य के.

(B) कांती पईकरा

(C) आर्या राजेंद्रन√√

(D) भार्नेश्वरी निर्मलकर


प्रश्न२२) कोणत्या तारखेला पहिला ‘आंतरराष्ट्रीय महामारी सज्जता दिन’ साजरा करण्यात आला?

(A) ३०डिसेंबर २०२०

(B) २९ डिसेंबर २०२०

(C) २८ डिसेंबर २०२०

(D) २७ डिसेंबर २०२०√√


प्रश्न२३) ‘पेडलंदरिकी इल्लू’ योजना कश्यासंबंधी आहे?

(A) सर्व गरीबांसाठी घरे(आंध्रप्रदेश)√√

(B) पहिल्या दोन बाळांच्या जन्मासाठी स्त्रियांना ४००० रुपयांचे रोख अनुदान

(C) योगदान-आधारित निवृत्तीवेतन प्रणाली

(D) वार्षिक १२ रुपयांच्या प्रीमियमसह अपघाती विमा


प्रश्न२४) कोणत्या प्रदेशात ‘भसन चर’ बेट आहे?

(A) बांगलादेश√√

(B) अंदमान

(C) निकोबार

(D) श्रीलंका


प्रश्न२५) अलीकडेच निधन झालेले सुनील कोठारी कोणत्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होते?

(A) शास्त्रीय गायक

(B) वैज्ञानिक

(C) नृत्य-इतिहासकार√√

(D) पत्रकार


प्रश्न२६) कोणत्या संस्थेनी “न्युमोसील” या ब्रांड खाली स्वदेशी लस विकसित केली?

(A) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया√√

(B) इंडियन असोसिएशन फॉर मेडिकल इन्फॉर्मेटिक्स

(C) AIIMS नवी दिल्ली

(D) भारतीय आरोग्य व्यवस्थापन संशोधन संस्था


प्रश्न२७) कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात भारताच्‍या पहिल्‍या चालकविरहित रेलगाडीचे उद्घाटन झाले?

(A) दिल्ली√√

(B) बंगळुरू

(C) कोलकाता

(D) चेन्नई


प्रश्न२८) कोणती व्यक्ती 'सुत्रनिवेदनाची सूत्रा – एक अणभव' हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?

(A) ए. कृष्ण राव

(B) डॉ. रूपा च्यारी√√

(C) श्रीपाद नाईक

(D) यापैकी नाही


प्रश्न२९) कोणत्या शहरात थोबल बहुउद्देशीय प्रकल्प आहे?

(A) कोहिमा

(B) दिसपूर

(C) इम्फाळ√√

(D) आगरतळा


प्रश्न३०) कोणती कंपनी घन-इंधनावर चालणाऱ्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेणारी पहिली भारतीय कंपनी ठरली?

(A) कोलिन्स एरोस्पेस

(B) एनआरसी एरोस्पेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

(C) स्कायरूट एरोस्पेस√√

(D) स्कंद एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड


प्रश्न३१) कोणत्या व्यक्तीची चौथे निवडणूक उपायुक्त म्हणून नेमणूक झाली?

(A) सुनील अरोरा

(B) ओम प्रकाश रावत

(C) अचल कुमार ज्योती

(D) उमेश सिन्हा✅


प्रश्न३२) कोणत्या राज्याला AFSPA कायद्याच्या अंतर्गत ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले?

(A) त्रिपुरा

(B) सिक्किम

(C) मेघालय

(D) नागालँड✅


प्रश्न३३) “नॅशनल पोलीस K-9 जर्नल” हे ‘______’ या विषयावरील देशातले पहिले प्रकाशन आहे.

(A) पोलीस श्वान✅

(B) पोलीस घोडे

(C) पोलीस उंट

(D) यापैकी नाही


प्रश्न३४) कोणत्या व्यक्तीला "बूल" कुमार म्हणून ओळखले जात होते?

(A) लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी

(B) कॅप्टन मोडकुर्ती नारायण मूर्ती

(C) कर्नल नरेंद्र✅

(D) मेजर हेमंत राज


प्रश्न३५) कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?

(A) राजस्थान

(B) कर्नाटक

(C) गुजरात✅

(D) आंध्रप्रदेश


प्रश्न३६) कोणत्या व्यक्तीने "विप्लवा तपस्वी: पीव्ही" या शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे?

(A) एम. व्यंकय्या नायडू

(B) ए. कृष्ण राव✅

(C) A आणि B

(D) यापैकी नाही


प्रश्न३७) ‘राष्ट्रीय मापन शास्त्र परिषद 2021’ याचा विषय काय होता?

(A) अॅडव्हांसेस इन मेट्रोलॉजी

(B) मेट्रोलॉजी फॉर द ग्रोथ ऑफ द नेशन

(C) मेट्रोलॉजी फॉर द इन्क्लूसिव ग्रोथ ऑफ द नेशन✅

(D) यापैकी नाही


प्रश्न३८) कोणत्या संस्थेनी “कोची-मंगळुरू वायू पाईपलाईन प्रकल्प” तयार केला?

(A) NTPC लिमिटेड

(B) भारतीय पोलाद प्राधिकरण

(C) GAIL (इंडिया) लिमिटेड✅

(D) ऑइल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन


प्रश्न३९) कोणत्या व्यक्तीची दिल्ली सरकारने स्थापना केलेल्या ‘तामिळ अकादमी’च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली?

(A) एन. राजा✅

(B) सेनगोट्टीयन के. ए.

(C) पी. थांगमणी

(D) एस. पी. वेलुमानी


प्रश्न४०) कोणता देश 2023 सालापर्यंत लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार?

(A) भारत

(B) जपान✅

(C) चीन

(D) रशिया


प्रश्न४१) कोणत्या चक्रीवादळामुळे डिसेंबर 2020 या महिन्याच्या शेवटी फिजी देशाचे मोठे नुकसान झाले?

(A) लुसी चक्रीवादळ

(B) उला चक्रीवादळ

(C) दमण चक्रीवादळ

(D) यासा चक्रीवादळ✅


प्रश्न४२) _ आणि _ या राज्यांच्या सीमेवर ‘दजूको खोरे’ आहे.

(A) नागालँड आणि मणीपूर✅

(B) नागालँड आणि मिझोरम

(C) मणीपूर आणि त्रिपुरा

(D) यापैकी नाही


प्रश्न४३) कोणत्या दिवशी ‘जागतिक ब्रेल दिन’ साजरा करतात?

(A) 1 जानेवारी

(B) 3 जानेवारी

(C) 5 जानेवारी

(D) 4 जानेवारी✅


प्रश्न४४) कोणत्या देशाने फाशीची शिक्षा रद्द केली?

(A) बेलारूस

(B) कझाकस्तान✅

(C) ताजिकिस्तान

(D) चीन


प्रश्न४५) नव्या विधेयकानुसार, केंद्रीय सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला परवानगी देण्याचे वय किती निश्चित केले आहे?

(A) 18 वर्ष

(B) 25 वर्ष

(C) 24 वर्ष

(D) 21 वर्ष✅


प्रश्न४६) कोणत्या व्यक्तीची भारतीय भूदलाच्या ‘मानवी हक्क कक्ष’चे प्रथम प्रमुख म्हणून नेमणूक झाली?

(A) जनरल बिपिन रावत

(B) लेफ्टनंट जनरल सतिंदर कुमार सैनी

(C) मेजर जनरल गौतम चौहान✅

(D) लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग


प्रश्न४७) कोणत्या देशात हिमयुगात अस्तित्वात असलेल्या ‘लोकरीने आच्छादित असलेला गेंडा’ याचे अवशेष सापडले?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) रशिया✅

(D) चीन


प्रश्न४८) कोणत्या व्यक्तीने आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांची जागा घेतली?

(A) पोनी मा हुआटेंग

(B) जॅक मा

(C) अनिल अंबानी

(D) झोंग शांशां✅


प्रश्न४९) चीनच्या पहिल्या मंगळ मोहीमेचे नाव काय आहे?

(A) झेंगहे

(B) तियानवेन-1✅

(C) शेनझोऊ

(D) चांग’ए प्रोजेक्ट


प्रश्न५०) कोणत्या मंत्रालयाने 'उद्योग मंथन' कार्यक्रमाचे आयोजन केले?

(A) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

(B) अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय

(C) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

(D) वाणिज्य व उद्योग मंत्रालय✅


प्रश्न५१) तांदळाचा तिसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोणत्या देशाने अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच भारताकडून तांदूळ खरेदी करण्यात सुरुवात केली?

(A) चीन

(B) व्हिएतनाम✅

(C) मलेशिया

(D) थायलँड


प्रश्न५२) खालीलपैकी कोणते विधान ‘राज्यपाल’ पदाविषयी अचूक नाही आहे?

(A) राज्यपालाचे नामांकन केंद्र सरकार देते.

(B) राज्यपाल राज्याचा नाममात्र कार्यकारी प्रमुख असतो.

(C) कार्यालयाच्या कार्यकाळात संसदेकडून राज्यपालाचे वेतन कमी केले जाऊ शकते.✅

(D) राज्य महाधिवक्ता पदाची याची नियुक्ती राज्यपाल करतात.


प्रश्न५३) कोणता देश ‘आफ्रिकेचे शिंग’ याचा भाग नाही?

(A) इरिट्रिया

(B) सोमालिया

(C) जिबूती

(D)सर्व ‘आफ्रिकेचे शिंग’चे भाग आहेत✅


प्रश्न५४) कोणत्या संस्थेनी ‘स्वस्थ वायु’ नामक व्हेंटिलेटर यंत्र तयार केले?

(A) CSIR-NAL✅

(B) CSIR-CEERI

(C) CSIR-CDRI

(D) CSIR-CCMB


प्रश्न५५) कोणती संस्था ‘कामधेनू गौविज्ञान प्रचार-प्रसार परीक्षा’ घेणार आहे?

(A) नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)

(B) राष्ट्रीय कामधेनू आयोग (RKA)✅

(C) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU)

(D) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)


प्रश्न५६) IUCN संस्थेनी कोणत्या गटात ‘भारतीय खवल्या मांजर’ जातीला समाविष्ट केले आहे?

(A) माहितीची कमतरता

(B) धोक्यात येण्याच्या जवळपास

(C) संकटात असलेली✅

(D) असुरक्षित


प्रश्न५७) कोणत्या राज्यात ‘किसान सूर्योदय योजना’ राबविली जात आहे?

(A) झारखंड

(B) उत्तरप्रदेश

(C) हिमाचल प्रदेश

(D) गुजरात✅


प्रश्न५८) कोणत्या नदीवर भारत पाण्यावर तरंगणारा जगातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प तयार करणार आहे?

(A) गोदावरी

(B) कृष्णा

(C) नर्मदा✅

(D) तापी


प्रश्न५९) कोणत्या राज्यात ‘ट्रायफूड पार्क’ उभारण्यासाठी TRIFED आणि अखिल भारतीय वनवासी कल्याण केंद्र यांच्यात सामंजस्य करार झाला?

(A) मध्यप्रदेश✅

(B) आसाम

(C) उत्तरप्रदेश

(D) कर्नाटक


प्रश्न६०) कोणत्या व्यक्तीची अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली?

(A) पी. आर. व्ही. राजा

(B) भारत सिंग चौहान

(C) डी. व्ही. सुंदर

(D) संजय कपूर✅


प्रश्न६१) चटरगाला बोगदा _ या ठिकाणांना जोडतो.

(A) कठुआ आणि दोडा✅

(B) जम्मू आणि बारामुल्ला

(C) राजौरी आणि कुपवाडा

(D) कठुआ आणि उधमपूर


प्रश्न६२) जानेवारी 2021 मध्ये चर्चेत आलेला बर्ड फ्लू आजार कोणत्या विषाणूमुळे होतो?

(A) इन्फ्लूएंझा टाइप-बी विषाणू

(B) व्हॅरिसेला-झोस्टर विषाणू

(C) इन्फ्लूएंझा टाइप-ए विषाणू✅

(D) एचएसव्ही-2


प्रश्न६३) __ या ठिकाणांना जोडणारी जगातली पहिली डबल स्टॅक लाँग हल 1.5 किलोमीटर लांबीची कंटेनर रेलगाडी कार्यरत झाली.

(A) कोटा आणि अंबाला

(B) अजमेर आणि फरीदाबाद

(C) जोधपूर आणि गुडगाव

(D) अटेली आणि किशनगड✅


प्रश्न६४) 'नवी दिल्ली स्कूल बॅग’ धोरणानुसार, स्कूल बॅगचे वजन किती असावे?

(A) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 15 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे

(B) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे✅

(C) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 18 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे

(D) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 16 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे


प्रश्न६५) कोणत्या संस्थेनी ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट’ अहवाल प्रसिद्ध केला?

(A) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

(B) जागतिक व्यापार संघटना

(C) जागतिक बँक✅

(D) युनेस्को


प्रश्न६६) कोणत्या विद्यापीठाने आफ्रिकी हत्तींचे AI-आधारित सर्वेक्षण करणारे तंत्र तयार केले?

(A) हार्वर्ड विद्यापीठ

(B) कॅंब्रिज विद्यापीठ

(C) स्टॅनफोर्ड विद्यापीठ

(D) ऑक्सफोर्ड विद्यापीठ✅


प्रश्न६७) कोणत्या देशासोबत भारताने "विशिष्ट कौशल्य कामगार" संबंधित सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार केला?

(A) जपान✅

(B) चीन

(C) अमेरिका

(D) रशिया


प्रश्न६८) कोणती बँक RBI कडून लघु वित्त बँकेचा परवाना मिळविणारी भारतातली पहिली शहरी सहकारी बँक ठरली?

(A) राजकोट सहकारी बँक मर्यादित

(B) शिवालिक मर्केंटाईल सहकारी बँक✅

(C) राजानगर सहकारी बँक मर्यादित, बेंगळुरू

(D) पालमूर सहकारी अर्बन बँक मर्यादित


प्रश्न६९) कोणत्या देशासोबत भारताने मध्यम-श्रेणीच्या पृष्ठभाग-ते-हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (MRSAM) संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली?

(A) रशिया

(B) जर्मनी

(C) जपान

(D) इस्त्रायल✅


प्रश्न७०) कोणती व्यक्ती ‘अयोध्या’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?

(A) माधव भंडारी✅

(B) देवेंद्र फडणवीस

(C) उद्धव ठाकरे

(D) भागवत सिंह कोश्यारी


प्रश्न७१) ‘जम्मू व काश्मिर IDS २०२१’ या नव्या योजनेचा मुख्य हेतू काय आहे?

(A) दिव्यांग व्यक्तींना मदत

(B) माजी सैनिकांसाठी योजना

(C) हातमाग विणकरांना वर्धित विमा संरक्षण

(D) रोजगार निर्मिती✅


प्रश्न७२) ‘राइट अंडर युवर नोज’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

(A) आर. गिरीधरन✅

(B) शक्तीकांत दास

(C) रघुराम रंजन

(D) उर्जित पटेल


प्रश्न७३) कोणत्या व्यक्तीने अमेरिकेच्या भुदलाचे पहिले मुख्य माहिती अधिकारी म्हणून पदाचा कार्यभार स्वीकारला?

(A) व्यंकटरामन रामकृष्णन

(B) राज अय्यर✅

(C) अभिजित बॅनर्जी

(D) मंजुल भार्गव


प्रश्न७४) कोणत्या देशाने ‘फतह-1’ नामक स्वदेशी विकसित अग्निबाण प्रणालीची चाचणी यशस्वीपणे घेतली?

(A) तुर्कमेनिस्तान

(B) अफगाणिस्तान

(C) पाकिस्तान✅

(D) उझबेकिस्तान


प्रश्न७५) अमेरिकेची ‘कॅपिटोल हिल’ इमारत कश्यासाठी ओळखली जाते?

(A) अमेरिका संघ सरकारच्या विधानसभेचे बैठकीचे स्थळ✅

(B) सत्ताधारी सरकारचे आसन

(C) संयुक्त राज्ये अमेरिका देशातल्या सर्वात मोठ्या विभागाची प्रशासकीय इमारत

(D) यापैकी नाही


प्रश्न७६) कोणती संस्था दूरसंचार प्रणालीच्या वापरासाठी एअरवेव्ह आणि स्पेक्ट्रम यांचा लिलाव करण्यासाठी जबाबदार आहे?

(A) भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण

(B) दूरसंचार विभाग✅

(C) माहिती व प्रसारण मंत्रालय

(D) भारतीय रोखे व विनिमय मंडळ


प्रश्न७७) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीनुसार पक्ष सोडून जाण्याच्या पार्श्वभूमीवर पदासाठी निवडून आलेल्या व्यक्तीला त्या कार्यकाळासाठी निवडणूक लढविण्याची परवानगी नाही?

(A) आठवी अनुसूची

(B) सहावी अनुसूची

(C) दहावी अनुसूची✅

(D) पाचवी अनुसूची


प्रश्न७८) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या “LASI WAVE-1 इंडिया रीपोर्ट” या अहवालाच्या शीर्षकामधील “LASI” या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे?

(A) लॅटिट्यूडिनल एजिंग स्टडी ऑफ इंडिया

(B) लेबर एजिंग स्टडी ऑफ इंडिया

(C) लेबलिंग एजिंग स्टडी ऑफ इंडिया

(D) लोंजिट्यूडिनल एजिंग स्टडी ऑफ इंडिया✅


प्रश्न७९) जी. किशन रेड्डी समिती _ याच्याशी संबंधित आहे.

(A) नगरपालिकेच्या कर्ज रोख्यांच्या विकासाशी संबंधित धोरणात्मक बाबींविषयी सल्ला देणे

(B) लडाखच्या भाषा, संस्कृती आणि भूमीचे रक्षण करणे✅

(C) अ-वैयक्तिक महितीशी संबंधित मुद्द्यांचा अभ्यास करणे

(D) यापैकी नाही


प्रश्न८०) ‘काराकल’ हे काय आहे?

(A) मांजर✅

(B) सरडा

(C) फूल

(D) हत्ती


प्रश्न८१) खालीलपैकी कोणते शहर ‘सुवर्ण चतुर्भुज’ प्रकल्पाद्वारे जोडले जाणार नाही?

(A) दिल्ली

(B) अहमदाबाद✅

(C) मुंबई

(D) चेन्नई


प्रश्न८२) कोणत्या देशाला 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘कंट्री इन फोकस’ म्हणून घोषित केले गेले आहे?

(A) बांगलादेश✅

(B) म्यानमार

(C) इंडोनेशिया

(D) नेपाळ


प्रश्न८३) कोणत्या संस्थेने इब्रमपूर, वेलिंग आणि पर्रा या गावांमध्ये ‘मेरा गांव मेरा गौरव’ उपक्रमाच्या अंतर्गत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला?

(A) केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था

(B) राष्ट्रीय अॅटलस संघटना

(C) भारतीय कृषी संशोधन परिषद✅

(D) विज्ञान प्रसार


प्रश्न८४) कोणत्या संवर्गात जम्मू व काश्मिर अधिकाऱ्यांचा संवर्ग विलीन झाला आहे?

(A) झारखंड

(B) उत्तरप्रदेश

(C) गुजरात

(D) AGMUT✅


प्रश्न८५) कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करतात?

(A) स्वामी विवेकानंद✅

(B) महात्मा गांधी

(C) सारडा देवी

(D) अरबिंदो घोष


प्रश्न८६) अमेरिकेकडून दिला जाणारा H-1B व्हिसा ____ याच्याशी संबंधित आहे.

(A) प्रवेश व्हिसा

(B) विशिष्ट व्यवसायात पदवीधर कामगारांची नोकरी✅

(C) इतर राष्ट्रांच्या राजदूतांना दिला जाणारा व्हिसा

(D) यापैकी नाही


प्रश्न८७) आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या कृष्णविवराचे नाव काय आहे?

(A) मेसियर 87

(B) मिल्की वे

(C) सेगीटेरियस ए*✅

(D) एस2


प्रश्न८८) कोणता भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे?

(A) दुगोंग

(B) घडियाल

(C) ब्लूफिन ट्यूना

(D) गंगा नदी डॉल्फिन✅


प्रश्न८९) केन-बेटवा जोड प्रकल्प कशाशी संबंधित आहे?

(A) नदी जोड प्रकल्प✅

(B) स्वदेश दर्शन

(C) उडान योजना

(D) प्रधानमंत्री वंदना योजना


प्रश्न९०) कोणत्या राज्यात ‘कलरीपयट्टू’ हा युद्धकलेचा प्रकार प्रसिद्ध आहे?

(A) आंध्रप्रदेश

(B) कर्नाटक

(C) तामिळनाडू

(D) केरळ✅


प्रश्न९१) चर्चेत असलेले ‘पार्लर’ हे काय आहे?

(अ) जॉर्डनच्या सीमेवरील एक ठिकाण

(ब) पक्ष्याची नवीन जात

(क) कोविड-१९ वरचे औषध

(ड) एक सोशल नेटवर्क व्यासपीठ✅


प्रश्न९२) कोणत्या मंत्रालयाने ‘नॉर्थ ईस्ट व्हेंचर फंड (NEVF)’ याची स्थापना केली?

(अ) वित्त मंत्रालय

(ब) ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय✅

(क) कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय

(ड) वाणिज्य व उद्योग मंत्रालय


प्रश्न९३) वेस्ट बँक या भूपरिवेष्टित प्रदेशाला कोणत्या समुद्राची सीमा लागलेली आहे?

(अ) काळा समुद्र

(ब) लाल समुद्र

(क) मृत समुद्र✅

(ड) यापैकी नाही


प्रश्न९४) भारतात २६/११च्या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यासाठी कोणती कवायत आयोजित करण्यात येते?

(अ) इंद्र नाव्ह

(ब) सी व्हिजिल✅

(क) मलबार

(ड) नसीम अल बहर


प्रश्न९५) कोणता देश ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२१’ याच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे?

(अ) सिंगापूर

(ब) दक्षिण कोरिया

(क) भारत

(ड) जपान✅


प्रश्न९६) कोणती व्यक्ती “द पॉप्युलेशन मिथ: इस्लाम, फॅमिली प्लानिंग अँड पॉलिटिक्स इन इंडिया” हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?

(अ) व्ही. एस. संपत

(ब) एच. एस. ब्रह्मा

(क) एस. वाय. कुरैशी✅

(ड) ओ. पी. रावत


प्रहन९७) कोणत्या संघटनेने क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत नियमांच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल केली?

(अ) म्हैस व्यापारी कल्याण संघटना✅

(ब) रेड पॉव्ज रेस्क्यू

(क) संजय गांधी अ‍ॅनिमल केअर सेंटर

(ड) स्ट्रे रिलीफ अँड अ‍ॅनिमल वेलफेअर (STRAW) इंडिया


प्रश्न९८) UAPA कायद्याच्या संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?

(अ) UAPA याचा अर्थ ‘बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक अधिनियम’ असा आहे.

(ब) UAPA अंतर्गत भारतीय आणि विदेशी अश्या दोन्ही नागरिकांवर आरोप केला जाऊ शकतो.

(क) हा कायदा 1967 साली लागू झाला.

(ड) सर्व विधाने अचूक आहेत.✅


प्रश्न९९) कोणती व्यक्ती जगातल्या सर्वात लांब पल्ल्याच्या हवाई मार्गावरून जाण्यासाठी उड्डाण केलेल्या महिला वैमानिकांच्या चमूचा भाग नव्हती?

(अ) कॅप्टन सुनीता ठाकूर✅

(ब) कॅप्टन झोया अग्रवाल

(क) कॅप्टन थनमाई पापगरी

(ड) कॅप्टन आकांक्षा सोनवणे


प्रश्न१००) कोणत्या अंतराळ संस्थेने “स्पेस लॉंच सिस्टम” या नावाचा अग्निबाण तयार केला?

(अ) ISRO

(ब) रोसकॉसमॉस

(क) CNSA

(ड) NASA✅


प्रश्न१०१) कोणत्या व्यक्तीला मध्यम व दीर्घ अंतर शर्यतीसाठी भारतीय धावपटूंच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली?

उत्तर :- निकोलाई स्नेसारेव


प्रश्न१०२) कोणती व्यक्ती वर्तमानात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) आहे?

उत्तर :- अजित डोवाल


प्रश्न१०३) कोणत्या देशात लेणीमध्ये चित्रित केलेले जगातले सर्वात प्राचीन ज्ञात भित्तिचित्र शोधले गेले?

उत्तर :- इंडोनेशिया


प्रश्न१०४) कोणत्या अंतराळ संस्थेने ‘पार्कर’ नामक सौरयान तयार केले आहे?

उत्तर :- नासा


प्रश्न१०५) कोणत्या मंत्रालयाला ‘स्कॉच चॅलेंजर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर :- आदिवासी विकास मंत्रालय


प्रश्न१०६) कोणत्या व्यक्तीने सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (SCBA) याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला?

उत्तर :- दुष्यंत दवे


प्रश्न१०७) कोणत्या सॉफ्टवेअर कंपनीने आर्थिक समावेशाला प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसोबत करार केला?

उत्तर :- फायनॅनष्यल सॉफ्टवेअर अँड सिस्टीम्स


प्रश्न१०८) कोणत्या व्यक्तीची इंटेल कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली?

उत्तर :- पॅट जेलसिंगर


प्रश्न१०९) भारतीय संविधानातल्या कोणत्या कलमान्वये ‘सुओ मोतू’च्या अधिकाराची तरतूद आहे?

उत्तर :- कलम 32 आणि कलम 226


प्रश्न११०) कोणत्या देशात ‘सुलावेसी बेट’ आहे?

उत्तर :- इंडोनेशिया


प्रश्न१११) केवडिया हे गुजरातच्या _ जिल्ह्यामधले एक शहर आहे.

उत्तर :- नर्मदा जिल्हा


प्रश्न११२) कोणत्या व्यक्तीला प्रतिष्ठित "चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन" सन्मान देण्यात आला?

उत्तर :- अमरेश कुमार चौधरी


प्रश्न११३) उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहब यांचे निधन झाले, ते _ घरान्यातले होते.

उत्तर :- रामपूर-सहसवान घराना


प्रश्न११४) “आर्टेमिस 1” ही एक _ मोहीम आहे.

उत्तर :- चंद्र


प्रश्न११५) CRPF आणि DRDO या संस्थांनी तयार केलेल्या ‘दुचाकी रुग्णवाहिका’चे नाव काय आहे?

उत्तर :- रक्षिता


प्रश्न११६) किती वर्षानंतर प्रथमच, २०२१ साली पॅलेस्टाईनमध्ये राष्ट्रीय निवडणुका घेतल्या जाणार आहेत?

उत्तर :- चौदा


प्रश्न११७) कोणत्या मंत्रालयाने ‘हरित व स्वच्छ ऊर्जा’ विषयक जनजागृती करण्यासाठी ‘सक्षम’ मोहीम आयोजित केली?

उत्तर :- पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय


प्रश्न११८) कोणत्या बँकेने निरोगीपणा या विषयावर आधारित क्रेडिट कार्ड प्रस्तुत करण्यासाठी ‘आदित्य बिर्ला वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत करार केला?

उत्तर :- येस बँक


प्रश्न११९) कोणत्या व्यक्तीची २०२१ या वर्षासाठी संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषद (UNHRC) याच्या अध्यक्ष पदावर निवड झाली?

उत्तर :- नजात शमीम खान


प्रश्न१२०) कोणत्या संस्थेने ‘डॉपलर वेदर रडार’ तयार केले?

उत्तर :- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड


TOPPER9 चालूघडामोडी, [01.02.21 09:45]

🔹चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे 


▪️दिनांक :- २०/०१/२०२१


🔘माहिती संकलन :- Amar chavan


प्रश्न१२१) कोणत्या शहरात विजेरी मोटार वाहन निर्मिती करणाऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे मुख्यालय आहे?

उत्तर :- कॅलिफोर्निया


प्रश्न१२२) कोणत्या देशात ‘सेमेरू ज्वालामुखी’ आहे?

उत्तर :- इंडोनेशिया


प्रश्न१२३) कोणत्या कवीच्या स्मृतीत बसवाकल्याण येथे ‘न्यू अनुभवा मंतपा’ उभारले जात आहे?

उत्तर :- बसवेश्वरा


प्रश्न१२४) जल्लीकट्टू  हा खेळ कोणत्या राज्यात खेळण्यात येतो ?

उत्तर :- तामिळनाडू


प्रश्न१२५) कोणत्या संस्थेने ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’ नामक संकेतस्थळ-आधारित व्यासपीठ तयार केले? Topper9 चालू घडामोडी

उत्तर :- नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन-इंडिया


प्रश्न१२६) कोणत्या राज्यात ‘हरिके आर्द्रभूमी’ हे ठिकाण आहे?

उत्तर :- पंजाब


प्रश्न१२७) कोणत्या राज्यात ‘फुरफुरा’ तीर्थक्षेत्र आहे?

उत्तर :- पश्चिम बंगाल


प्रश्न१२८) 'नागी-नक्ती पक्षी अभयारण्य’ येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम राज्यस्तरीय पक्षी उत्सवाचे नाव काय आहे?

उत्तर :- कलरव


प्रश्न१२९) कोणत्या साली आफ्रिका खंडात ‘ग्रेट ग्रीन वॉल’ नामक उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली?

उत्तर :- २००७


प्रश्न१३०) कोणत्या व्यक्तीला मध्यम व दीर्घ अंतर शर्यतीसाठी भारतीय धावपटूंच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली?

उत्तर :- निकोलाई स्नेसारेव


प्रश्न१३१) ‘एक्स-डेझर्ट नाइट-२१’ ही भारत आणि _ या देशांच्या हवाई दलांची हवाई कवायत आहे.

उत्तर :- फ्रांस


प्रश्न१३२) कोणती व्यक्ती प्रजासत्ताक दिनाच्या पथप्रदर्शनात भाग घेणारी प्रथम महिला लढाऊ वैमानिक ठरणार आहे?

उत्तर :- भावना कांत


प्रश्न१३३) 'त्रिशूल’ पर्वत कुठे आहे?

उत्तर :- उत्तराखंड, भारत


प्रश्न१३४) कोणत्या राज्यात ‘ओर्वाकल विमानतळ’ आहे?

उत्तर :- आंध्रप्रदेश


प्रश्न१३५) कोणत्या नेत्याची जयंती जयंती “पराक्रम दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे?

उत्तर :- सुभाषचंद्र बोस


प्रश्न१३६) कोणत्या देशात ‘सक्करा’ नामक ठिकाण आहे?

उत्तर :- इजिप्त


प्रश्न१३७) कोणत्या राज्यात ‘वन स्कूल वन IAS’ योजना राबवली जात आहे?

उत्तर :- केरळ


प्रश्न१३८) 'डिजिटल रिव्होल्यूशन स्कोरकार्ड २०२०’ याच्या यादीत भारत कोणत्या क्रमांकावर आहे?

उत्तर :- चौथा


प्रश्न१३९) कोणत्या दिवशी ‘भारतीय लष्कर / भुदल दिन’ साजरा करतात?

उत्तर :- १५ जानेवारी


प्रश्न१४०) कोणत्या दोन ठिकाणांच्या दरम्यान भारतातली प्रथम ‘हवाई टॅक्सी’ सेवा आरंभ करण्यात आली आहे?

उत्तर :-  गुरुग्राम आणि कर्नाल


प्रश्न१५१) कोणती व्यक्ती राष्ट्रीय स्टार्टअप सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहे?

उत्तर :- पियुष गोयल


प्रश्न१५२)  कोणती बँक “टू बिग टू फेल” यादीत समाविष्ट करण्यात आली आहे?

उत्तर :- भारतीय स्टेट बँक,आयसीआयसीआय बँक,एचडीएफसी बँक


प्रश्न१५३) कोणत्या राज्याने नीती आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ मधील मोठ्या राज्यांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे?

उत्तर :- कर्नाटक


प्रश्न१५४) कोणत्या व्यक्तीची किर्गिजस्तान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली?

उत्तर :- सादीर झापारोव्ह


प्रश्न१५५) कोणत्या दिवशी भारतीय सशस्त्र दलांचा ‘माजी सैनिक दिन’ साजरा करतात?

उत्तर :-  14 जानेवारी


प्रश्न१५६) कोणत्या मंत्रालयाने पाचव्या राष्ट्रीय कायाकल्प पुरस्कारांची घोषणा केली?

उत्तर :- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय


प्रश्न१५७) कोणती व्यक्ती डिजिटल कर्ज सेवांचे नियमन करण्यासाठी RBIने नेमलेल्या कार्य गटाचे अध्यक्ष आहे?

उत्तर :- सौरव सिन्हा


प्रश्न१५८) कोणत्या संस्थेने ‘तेजस’ नामक हलके लढाऊ विमान तयार केले?

उत्तर :- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड


प्रश्न१५९) कोणत्या देशात “विलियूचिन्स्की धबधबा” आहे?

उत्तर :- रशिया


प्रश्न१६०) कोणत्या काळात ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना 2021’ पाळला गेला?

उत्तर :- 18 जानेवारी - 17 फेब्रुवारी


प्रश्न१४१) ‘रीसा’ कापड हा हाताने विणलेला पारंपारिक कापड आहे, ज्याचा उपयोग _ राज्यातला आदिवासी समुदाय करतो.

उत्तर :- त्रिपुरा


प्रश्न१४२) __ येथे भारतीय सैन्य ‘एक्झरसाइज कवच’ ही संयुक्त सैन्य कवायत आयोजित करणार आहे.

उत्तर :- अंदमान समुद्र ,बंगालचा उपसागर


प्रश्न१४३) कोणत्या राज्य सरकारने “मुख्यमंत्री बागायत विकास अभियान” जाहीर केले?

उत्तर :- गुजरात


प्रश्न१४४) कोणत्या कंपनी मदतीने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारतात ‘क्वांटम कंप्युटिंग अॅप्लिकेशन्स प्रयोगशाळा’ उभारणार आहे?

उत्तर :- अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस


प्रश्न१४५) कोणत्या राज्यात ‘नामरूप’ गाव आहे?

उत्तर :- आसाम


प्रश्न१४६) कोणत्या संस्थेने ‘स्मार्ट अॅंटी एअरफिल्ड वेपन’ (SAAW) विकसित केले आहे?

उत्तर :- DRDO


प्रश्न१४७) ‘सॅल्वेटोर मुंडी’ हे शीर्षक असलेले चित्र _ यांनी काढले आहे.

उत्तर :- लिओनार्डो दा विंची


प्रश्न१४८) कोणत्या नावाखाली ‘ड्रॅगन फ्रूट’चे पेटंट घेण्यासाठी गुजरात सरकारने अर्ज केला?

उत्तर :- कमलम


प्रश्न१४९) कोणत्या देशांनी 2021 साली संयुक्त राष्ट्रसंघ महासभेतला मतदानाचा हक्क गमावला आहे?

उत्तर :- इराण, नायजर,दक्षिण सुदान, झिम्बाब्वे,कांगो ब्राझाव्हिल, लिबिया


प्रश्न१५०) कोणत्या रेलगाडीचे नाव बदलून ‘नेताजी एक्सप्रेस’ असे ठेवण्यात आले?

उत्तर :-  हावडा-कालका मेल


प्रश्न१६१) जोयमोती कोनवारी ही कोणत्या राजघराण्याची राजकन्या होती?

उत्तर :- अहोम साम्राज्य


प्रश्न१६२) कोणत्या कवीने लिहिलेल्या कवितासंग्रहाचे इंग्रजीत “नॉट मेनी, बट वन” या शीर्षकाखाली अनुवाद करण्यात आले आहे?

उत्तर :- श्री नारायण गुरु


प्रश्न१६३) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2021’ प्रसिद्ध केला?

उत्तर :- जागतिक आर्थिक मंच (WEF)


प्रश्न१६४) कोणत्या राज्यात नागौर-गंगानगर खोरे आहे?

उत्तर :- राजस्थान


प्रश्न१६५) कोणत्या मंत्रालयाच्यावतीने "श्रमशक्ती" नामक एका राष्ट्रीय स्थलांतरण समर्थन व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले?

उत्तर :- आदिवासी कल्याण मंत्रालय


प्रश्न१६६) टायटन (शनी ग्रहाचा चंद्र) यावरील सर्वात मोठ्या समुद्राचे नाव काय आहे?

उत्तर :- क्रेकन मेर


प्रश्न१६७) कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात भारतातल्या सर्वात दीर्घ कमानी रस्ता-पूलाचे उद्घाटन झाले?

उत्तर :- मेघालय


प्रश्न१६८) कोणत्या भारतीय उपग्रहाने ‘मिल्की वे’ आकाशगंगेमध्ये दुर्मिळ असे उष्ण अतिनील-चमकदार तारे शोधले?

उत्तर :- अ‍ॅस्ट्रोसॅट


प्रश्न१६९) कोणत्या राज्यात नवा थलतेज-शिलाज-रणचरदा रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्यात आला?

उत्तर :-  गुजरात


प्रश्न१७०) ‘लाँगऑप्स / LongOps’ प्रकल्प हा __ या देशांचा एक संयुक्त उपक्रम आहे.

उत्तर :- ब्रिटन आणि जपान


प्रश्न१७१) कोणत्या ठिकाणी ‘MeerKAT रेडिओ दुर्बिण’ आहे?

उत्तर :- दक्षिण आफ्रिकेचा उत्तर केप


प्रश्न१७२) कोणत्या सैन्य दलाने भारतात “सर्द हवा” मोहीम राबविण्यास सुरुवात केली?

उत्तर :-  सीमा सुरक्षा दल


प्रश्न१७३) 'विश्वाचे गुंजन’ नामक विशिष्ट ध्वनी मृत ताऱ्याच्या एका प्रकारापासून प्रक्षेपित होतो, ज्याला _ असे म्हणतात.

उत्तर :- पल्सर


प्रश्न१७४) कोणत्या तारखेला नवा अण्वस्त्रे बंदी करार संपूर्णपणे लागू झाला?

उत्तर :- 22 जानेवारी 2021


प्रश्न१७५) कोणत्या राज्य सरकारने ‘अवलोकन’ सॉफ्टवेअर तयार केले?

उत्तर :- कर्नाटक


प्रश्न१७६) कोणत्या संस्थेत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची नवी पद्धत विकसित करनेत आली आहे?

उत्तर :- CSIR-केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था, दुर्गापूर


प्रश्न१७७) ‘WASP-107b’ हे काय आहे?

उत्तर :-  बाह्य-ग्रह


प्रश्न१७८) कोणता यूरोपमधला सर्वात मोठा सौर प्रकल्प आहे?

उत्तर :- फ्रान्सिस्को पिझारो प्रोजेक्ट


प्रश्न१७९) नवीन ‘स्टार्ट’ करार हा _ या देशांमध्ये झालेला एक करार आहे.

उत्तर :- रशिया आणि अमेरिका


प्रश्न१८०) नव्याने सापडलेली ‘ऊसेरेया जोशी’ ही जात कोणत्या प्रजातीची आहे?

उत्तर :-  मुंगी


प्रश्न१८१) कोणत्या अंतराळ संस्थेने एकाच अग्निबाणाने १४३ उपग्रह प्रक्षेपित करून ISRO संस्थेचा विक्रम मोडीत नवीन जागतिक विक्रम रचला?

उत्तर :- स्पेसएक्स


प्रश्न१८२) कोणता देश अमेरिकेला मागे टाकत २०२० साली प्रत्यक्ष परकीय गुंतवणूकीचा (FDI) सर्वाधिक प्राप्तकर्ता ठरला आहे?

उत्तर :- चीन


प्रश्न१८३) कोणत्या राज्याने मुलींसाठी ‘पंख अभियान’ची सुरुवात केली?

उत्तर :- मध्यप्रदेश


प्रश्न१८४) कोणत्या व्यक्तीची पोर्तुगाल देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदावर निवड झाली?

उत्तर :- मार्सेलो रेबेलो डी सूसा


प्रश्न१८५) कोणता पुरस्कार अपवादात्मक यशासाठी १८ वर्ष वयोगटाखालील बालकांना दिला जाणारा भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान आहे?

उत्तर :- प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार


प्रश्न१८६) कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन’ साजरा करतात?

उत्तर:- २४ जानेवारी


प्रश्न१८७) कोणत्या दिवशी हिमाचल प्रदेशाचा स्थापना दिन साजरा करतात?

उत्तर :-  २५ जानेवारी


प्रश्न१८८) कोणत्या प्रदेशात “ॲम्फेक्स-२१” नामक संयुक्त त्रि-सेवा कवायत झाली?

उत्तर :- अंदमान व निकोबार बेटसमूह


प्रश्न१८९) कोणते लढाऊ विमानांसाठी द्रुतगती मार्गांवर दोन हवाईपट्ट्या असलेले पहिले राज्य / केंद्रशासित प्रदेश आहे?

उत्तर :- उत्तरप्रदेश


प्रश्न१९०) जर्मनवॉच संस्थेच्या ‘जागतिक हवामान जोखीम निर्देशांक २०२१’ याच्या यादीत भारताचा क्रमांक कोणता आहे?

उत्तर :- ७


प्रश्न१९१) कोणती व्यक्ती एस्टोनिया देशाची पहिली महिला पंतप्रधान ठरली?

उत्तर :- काजा कलास


प्रश्न१९२) "जारोसाइट" हे एक _ आहे.

उत्तर :- खनिज


प्रश्न१९३) कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन २०२१’ साजरा करण्यात आला?

उत्तर :- २६ जानेवारी


प्रश्न१९४) कोणता देश ‘करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI 2020)’ याच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे?

उत्तर :- न्यूझीलँड,डेन्मार्क


प्रश्न१९५) कोणत्या शहरात ‘फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह फोरम’ची बैठक आयोजित केली जाते?

उत्तर :- रियाध


प्रश्न१९६) कोणत्या मंत्रालयाच्या कार्यकक्षेत नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेस इनकॉर्पोरेटेड (NICSI) ही संस्था येते?

उत्तर :- इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय


प्रश्न१९७) कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे मुख्यालय आहे?

उत्तर :- पॅरिस


प्रश्न१९८) कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘कला उत्सव’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो?

उत्तर :-  मनुष्यबळ विकास मंत्रालय


प्रश्न१९९) ऑस्ट्रेलियाच्या लोवी संस्थेने जाहीर केलेल्या ‘कोरोनाव्हायरस परफॉरमन्स इंडेक्स’ या यादीत भारताचा क्रमांक कोणता आहे?

उत्तर :- ८६


प्रश्न२००) कोणत्या देशात ‘मेरापी पर्वत’ आहे?

उत्तर :- इंडोनेशिया


प्रश्न२०१) कोणत्या नदीवर पहिल्यांदाच ‘यंग रीडर्स बोट लायब्ररी’ नावाचे तरंगते ग्रंथालय उभारले गेले आहे?

उत्तर :-  हुगळी नदी


प्रश्न२०२) कोणती आकाशगंगा “लॉस्ट गॅलक्सी” म्हणून ओळखली जाते?

उत्तर :- एनजीसी 4535


प्रश्न२०३) कोणत्या संस्थेने अंदमानमध्ये सेवेत आणलेली विजेरी बस विकसित केली आहे?

उत्तर :- NTPC विद्युत व्यापार निगम लिमिटेड


प्रश्न२०४) कोणते देशातच विकसित करण्यात आलेले भारताचे पहिले लढाऊ-बॉम्बर विमान आहे?

उत्तर :- HAL HF-24 मारुत


प्रश्न२०५) कोणत्या संस्थेने “बर्ड्स ऑफ द सुंदरबन बायोस्फीअर रिझर्व” या शीर्षकाखाली एक पुस्तिका प्रसिद्ध केली?

उत्तर :- भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभाग


प्रश्न२०६) कोणत्या व्यक्तीला विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021’ देण्यात आले?

उत्तर :- IG देव राज शर्मा


प्रश्न२०७) कोणत्या मंत्रालयाने ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान’ आखण्याचा प्रस्ताव दिला आहे?

उत्तर :- कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय


प्रश्न२०८) कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करतात?

उत्तर :- 25 जानेवारी


प्रश्न२०९) कोणत्या मंत्रालयाने ‘भारत पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन केले?

उत्तर :-  पर्यटन मंत्रालय


प्रश्न२१०) कोणत्या व्यक्तीला 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

उत्तर :- बिश्वजित चटर्जी


प्रश्न२११) कोणत्या देशामध्ये लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प आहे?

उत्तर :- नेपाळ


प्रश्न२१२) EIU संस्थेच्या ‘एशिया-पॅसिफिक पर्सनलाइज्ड हेल्थ इंडेक्स २०२१’ याच्या यादीत भारत कोणत्या क्रमांकावर आहे?

उत्तर :- १० वा


प्रश्न२१३) कोणती व्यक्ती आशियाई क्रिकेट परिषद (ACC) याचे नवे अध्यक्ष आहे?

उत्तर :- जय शाह


प्रश्न२१४) भारतीय नौदलाची IN FAC T- ८१ ही युद्धनौका सेवेतून हटविण्यात आली आहे; ती कोणत्या श्रेणीतली नौका आहे?

उत्तर :- सुपर ड्वोरा MK II


प्रश्न२१५) कोणत्या कंपनीने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कंत्राट जिंकले?

उत्तर :-  लार्सन अँड टुब्रो


प्रश्न२१६) कोणत्या व्यक्तीची आयुषमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी पदावर नेमणूक झाली?

उत्तर :- आर. एस. शर्मा


प्रश्न२१७) कोणत्या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन साजरा करतात?

उत्तर :- जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार


प्रश्न२१८) कोणत्या भारतीय व्यक्तीच्या स्मृतीत ३० जानेवारी हा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून पाळला जातो.

उत्तर :- मोहनदास करमचंद गांधी


प्रश्न२१९) २०२१ साली कोणत्या दिवशी ‘थाईपुसम उत्सव’ साजरा करण्यात आला?

उत्तर :- २८ जानेवारी


प्रश्न२२०) कोणत्या देशाने ‘जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ अॅक्शन (JCPOA)’ या करारावर स्वाक्षरी केलेली नाही?

उत्तर :- भारत


चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे



प्रश्न२०१) कोणत्या नदीवर पहिल्यांदाच ‘यंग रीडर्स बोट लायब्ररी’ नावाचे तरंगते ग्रंथालय उभारले गेले आहे?

उत्तर :-  हुगळी नदी


प्रश्न२०२) कोणती आकाशगंगा “लॉस्ट गॅलक्सी” म्हणून ओळखली जाते?

उत्तर :- एनजीसी 4535


प्रश्न२०३) कोणत्या संस्थेने अंदमानमध्ये सेवेत आणलेली विजेरी बस विकसित केली आहे?

उत्तर :- NTPC विद्युत व्यापार निगम लिमिटेड


प्रश्न२०४) कोणते देशातच विकसित करण्यात आलेले भारताचे पहिले लढाऊ-बॉम्बर विमान आहे?

उत्तर :- HAL HF-24 मारुत


प्रश्न२०५) कोणत्या संस्थेने “बर्ड्स ऑफ द सुंदरबन बायोस्फीअर रिझर्व” या शीर्षकाखाली एक पुस्तिका प्रसिद्ध केली?

उत्तर :- भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभाग


प्रश्न२०६) कोणत्या व्यक्तीला विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021’ देण्यात आले?

उत्तर :- IG देव राज शर्मा


प्रश्न२०७) कोणत्या मंत्रालयाने ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान’ आखण्याचा प्रस्ताव दिला आहे?

उत्तर :- कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय


प्रश्न२०८) कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करतात?

उत्तर :- 25 जानेवारी


प्रश्न२०९) कोणत्या मंत्रालयाने ‘भारत पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन केले?

उत्तर :-  पर्यटन मंत्रालय


प्रश्न२१०) कोणत्या व्यक्तीला 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

उत्तर :- बिश्वजित चटर्जी


Current affairs 2020 in Marathi



 :  91 वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला? 

(अ) बाओ

(ब) रोमा 

(क) ग्रीन बुक ✔️✔️

(ड) स्कीन


:  ' अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ ब्रेक्झिट '  या ग्रंथाचे लेखक कोण? 

(अ) कॅरोलिन क्रायडो पेरेझ 

(ब) केविन ओरार्की  ✔️✔️

(क) जेस्पर रॉईन

(ड) थॉमस पिकेटी 


 :  ______ हे सिंगल टाईटल जिंकणारे पहिले पुरुष खेळाडू बनले आहे? 

(अ) जिमी कोनर्स (107 )✔️✔️

(ब) रॉजर फेडरर  (100)

(क) आंद्रे आगासी 

(ड) राफेल नदाल 


 :  ______ हे सिंगल टाईटल जिंकणारी पहिली महिला खेळाडू बनलीआहे? 

(अ) सिमोना हॅलेप 

(ब) नाओमी ओसाका 

(क) सेरेना विलियम्स 

(ड) मार्टिना नवरातिलोवा (167)✔️✔️


  IIC अंडर- 19 क्रिकेट वर्ल्ड कप - 2019 स्पर्धा कोठे पार पडल्या? 

(अ) द. आफ्रिका 

(ब) ऑस्ट्रेलिया 

(क) भारत  

(ड) वेस्ट इंडिज 



 : IIC अंडर- 19 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये कोणत्या देशांनी सर्वात जास्त ते सर्वात कमी वेळा विश्वचषक जिंकला तो पर्याय निवडा? 

(अ) ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, बांग्लादेश

(ब) भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांग्लादेश ✔️✔️

(क) भारत, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, पाकिस्तान

(ड) भारत, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान

आज एमपीएससी मुंबई ला वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली.



1) यावर्षी होणाऱ्या सर्व परिक्ष्यांच्या प्रश्नपत्रिका ह्या जुन्याच असणार आहेत.


2) सध्यातरी या वर्षीची मुख्य परीक्षा ऑनलाइन नाही.


3) PSI  physical या वर्षी qualify नाही.पुढच्या वार्षिसाठी विचार सुरू. मराठा आरक्षण विषयात सुस्पष्टता नंतर PSI physical.


4) engg sevices mains exam  online होऊ शकते.


5) MPSC -CSAT पुढच्या वर्षीसाठी  qualify बद्दल चर्चा सुरू आहे. यावर्षी CSAT आहे.

6) Engg services Interview, MPSC सदस्य कमी असल्यामुळे थांबलेले आहेत. सदस्य भरती नंतर लवकर सुरू होतील.

विद्यार्थ्यांनी GD की Intetview याबाबत MPSC ला mail द्वारे लवकर  कळवावे जेणेकरून MPSC ला निर्णय घेण्यास सोफ होईल


०१ फेब्रुवारी २०२१

भारतात मनुष्यबळाची अफाट क्षमता- बिल गेट्स


🔰‘‘भारतामध्ये मनुष्यबळाची अफाट  शक्ती आहे, त्याचा योग्य वापर केला तर अविश्वसनीय अशा गोष्टी आपण घडवू शकतो’’, असे मत बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रमुख बिल गेट्स यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना व्यक्त केले.


🔰करोना साथीने मानव जातीला किती हादरा दिला, असे विचारले असता ते म्हणाले, की करोना साथ हा मोठा धक्काच होता. त्याचा मूल्यमापनात्मक स्पष्ट परिणाम अजून समजलेला नाही, पण मानसिक आरोग्याचे, शैक्षणिक व आर्थिक नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. येत्या दोन ते पाच वर्षांत ही परिस्थिती पूर्वपदावर येईल. त्यामुळे आताची हानी ही कायमची आहे अशी निराशा बाळगण्याचे कारण नाही.


🔰पढील दोन ते पाच वर्षांत पुन्हा करोनासारखी महासाथ येण्याची शक्यता वर्षांत २ टक्के आहे. त्यामुळे अजून दहा वर्षे तरी अशी साथ पुन्हा येणार नाही.  औषधे व लशी येत आहेत, त्यामुळे यापुढील काळात दुर्दैवाने अशी साथ आली तरी ती किरकोळ असेल कारण आपली सज्जता मोठी असणार आहे. आताच्या साथीतही आपण ऑस्ट्रेलिया व दक्षिण कोरिया यांनी किती तत्परतेने या साथीला प्रतिसाद दिला हे पाहिले आहे. त्यामुळे त्या देशांना कमी फटका बसला. आरोग्य व शिक्षण या दोन गोष्टींवर भर द्यायला हवा कारण त्यात असमानता आहे.

ताजमहालच्या संरक्षित क्षेत्रातील चार हजार झाड कापण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी


🔰सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे विकास महामंडळाला मथुरा ते झाशीदरम्यान रेल्वे ट्रॅकचं काम करण्यासाठी चार हजार १०८ झाडं कापण्याची परवानगी दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही परवानगी दिली आहे.


🔰विशेष म्हणजे जी झाडं पाडण्यासाठी न्यायलयाने परवानगी दिली आहे ती सर्व झाडं ताज ट्रॅपिझियम झोन (टीटीझेड) म्हणजेच संरक्षित क्षेत्रातील आहे. देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी रेल्वे विकास महामंडळाने या दोन स्थानकांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचं काम करण्यासाठी परवानगी घेतल्याची माहिती न्यायालयाला दिली.


🔰ताज ट्रॅपिझियम झोन (टीटीझेड) हा १० हजार ४०० स्वेअर किलोमीटरचा परिसर आहे. अर्थात नावाप्रमाणे हा परिसर ताजमहालच्या आजूबाजूचा परिसर आहे. ताजमहाल ज्या ठिकाणी आहे तेथील प्रदुषण नियंत्रणात रहावे म्हणून या भागातील वन क्षेत्र संरक्षित करण्यात आलेलं आहे.


🔰सर्वोच्च न्यायालयाने टीटीझेडसंदर्भात उद्योग व्यवसायांना निर्देश देणारे आणि हे क्षेत्र संरक्षित करणारा आदेश ३० डिसेंबर १९९६ रोजी दिला होता. सर्वोच्च न्यायालयामध्ये ताजमहालच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहितयाचिकेमध्ये हे क्षेत्र संरक्षित करण्याची मागणी करण्यात आलेली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने या भागातील जमीन संरक्षित घोषित केलेली

राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला


🔰करोनाच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ठराविक कालावधीनंतर लॉकडाऊनला मुदतवाढ दिली जात असून, राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवला आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.


🔰करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनला सातत्यानं मुदतवाढ दिली जात आहे. राज्य सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेश आज काढण्यात आले आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला असून, आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टींवर सुरू राहणार आहेत. तर ज्या सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या पूर्वीप्रमाणेच बंद असणार आहेत.


🔰लॉकडाऊन वाढवताना राज्य सरकारनं यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असतील. गेल्या ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे.

हुकूमशहा किम जोंग उनच्या भावाच्या हत्येची नवी कथा आली समोर, वाचा काय आहे 'Assassins'


🔰२०१७ साली नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनचा सावत्र भाऊ किम जोंग नाम याची मेलशियाची राजधानी क्वाललंपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर नर्व एजंटने हत्या केली होती. या प्रकरणाबाबत अमेरिकन सिने दिग्दर्शक आणि डॉक्युमेंट्री मेकर रेयान व्हॉइन यांनी 'असासिन्स' नावाने एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे.


🔰जयात किम जोंग नामच्या हत्येशी संबंधित गोष्टींची चौकशी करण्यात आली आहे. या डॉक्टुमेंट्रीमध्ये अनेक धक्कादायक खुलासेही करण्यात आले आहेत. कारण रेयान या डॉक्टमेंट्रीमध्ये त्या महिलांनाही दाखवलं आहे ज्या हत्येच्या आरोपात पकडल्या गेल्या होत्या आणि नंतर त्यांची सुटका झाली होती.


🔰किम जोंग नामवर मलेशियाची राजधानी क्वाललंपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर VX नर्व एजंटकडून हल्ला करवण्यात आला होता. काही सेकंदातच त्याचा मृत्यू झाला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ह कॅमेरात कैद झाली होती. यात दोन महिला इंडोनेशियाची सिती ऐस्याह आणि व्हिएतनामची दोअन थि हुंओंग यांची नावे समोर आली होती.


🔰दोन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. पण त्यांना मलेशिया कायद्यानुसार शिक्षा मिळणार होती. मात्र त्यांनी जे सांगितलं त्यानंतर त्यांना २०१९ मध्ये सोडण्यात आलं. मुळात दोघींना माहितीच नव्हतं की, त्या काय करत आहेत. कारण दोघींना या गोष्टीचा विश्वास देण्यात आला होता की, दोघी एका टीव्ही शो च्या भाग आहेत.

पुण्यतिथी विशेष : तेव्हा देशाच्या चलनी नोटांवर पहिल्यांदाच गांधींजींचा फोटो छापला.



🔰राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 73 वी पुण्यतिथी साजरी होत असून जगभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राष्ट्रपित्याच्या आठवणी आज जागवल्या जात आहेत.


🔰राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 73 वी पुण्यतिथी साजरी होत असून जगभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राष्ट्रपित्याच्या आठवणी आज जागवल्या जात आहेत.


🔰दशाच्या चलनी नोटांवर फोटो असण्याचा मान स्वातंत्र्य संग्रामातील एकमेव नेत्याला मिळाला आहे. तो म्हणजे महात्मा गांधी यांना. सर्वप्रथम 1969 मध्ये देशाच्या चलनी नोटांवर गांधींजींचा फोटो दिसून आला.


🔰भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, पण देश 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक झाला. या दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेने सध्या प्रचलित असणाऱ्या नोटा प्रसिद्ध करायला सुरुवात केली


🔰महात्मा गांधींच्या 100 व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 1969 मध्ये पहिल्यांदा चलनी नोटेवर महात्मा गांधीजींचा फोटो छापण्यात आला. यामधले गांधीजी बसलेले होते आणि मागे सेवाग्राम आश्रम होता.


🔰दशाच्या अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विस्तार होत होता आणि लोकांची खरेदी क्षमता वाढत होती. म्हणून रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर 1987 मध्ये पहिल्यांदाच 500 च्या नोटा चलनात आणल्या आणि यावरही महात्मा गांधींचं छायाचित्र होतं. अशोक स्तंभ वॉटरमार्कमध्ये होता.

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे


प्रश्न२०१) कोणत्या नदीवर पहिल्यांदाच ‘यंग रीडर्स बोट लायब्ररी’ नावाचे तरंगते ग्रंथालय उभारले गेले आहे?

उत्तर :-  हुगळी नदी


प्रश्न२०२) कोणती आकाशगंगा “लॉस्ट गॅलक्सी” म्हणून ओळखली जाते?

उत्तर :- एनजीसी 4535


प्रश्न२०३) कोणत्या संस्थेने अंदमानमध्ये सेवेत आणलेली विजेरी बस विकसित केली आहे?

उत्तर :- NTPC विद्युत व्यापार निगम लिमिटेड


प्रश्न२०४) कोणते देशातच विकसित करण्यात आलेले भारताचे पहिले लढाऊ-बॉम्बर विमान आहे?

उत्तर :- HAL HF-24 मारुत


प्रश्न२०५) कोणत्या संस्थेने “बर्ड्स ऑफ द सुंदरबन बायोस्फीअर रिझर्व” या शीर्षकाखाली एक पुस्तिका प्रसिद्ध केली?

उत्तर :- भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभाग


प्रश्न२०६) कोणत्या व्यक्तीला विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021’ देण्यात आले?

उत्तर :- IG देव राज शर्मा


प्रश्न२०७) कोणत्या मंत्रालयाने ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान’ आखण्याचा प्रस्ताव दिला आहे?

उत्तर :- कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय


प्रश्न२०८) कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करतात?

उत्तर :- 25 जानेवारी


प्रश्न२०९) कोणत्या मंत्रालयाने ‘भारत पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन केले?

उत्तर :-  पर्यटन मंत्रालय


प्रश्न२१०) कोणत्या व्यक्तीला 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

उत्तर :- बिश्वजित चटर्जी

महत्त्वाच्या म्हणी व अर्थ



चढेल तो पडेल------

उत्कर्षासाठी धडपडणाऱ्या माणसाला अपयश आले तरी त्यात कमीपणा नाही



चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही------

काही विशेष कार्य केल्याशिवाय लोक मान देत नाहीत



चांभाराच्या देवाला खेटराची पूजा------

जशास तसे या न्यायाने वागणे चांगले



चार आण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला------

क्षुल्लक गोष्टीला अधिक खर्च



चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे------

प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची संधी आयुष्यात मिळतेच



चालत्या गाडीला खीळ घालणे------

व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचणी निर्माण करणे



चिंती परा ते ये‌ई घरा------

दुसर्‍याचे वाईट चिंतीत राहिले की ते आपल्यावरच उलटते



चोर तो चोर वर शिरजोर------

गुन्हा करुन वर मुजोरी



चोर सोडून संन्याशाला फाशी------

खरा गुन्हेगार न पकडता आणि त्याला शिक्षा न देता निरपराध माणसाला शिक्षा होणे



चोराच्या उलट्या बोंबा------

स्वतःच गुन्हा करुन दुसर्‍याच्या नावाने ओरडणे



चोराच्या मनात चांदणे------

वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटणे



चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक------

वाईट माणसांनाच वाईट माणसाची लक्षणे कळतात



चोराच्या हातची लंगोटी------

ज्यांच्याकडून काही मिळायची आशा नाही त्याच्याकडून थोडेसे मिळणे हेच नशीब



चोराला सुटका आणि गावाला फटका------

चोर सोडून निरपराधी माणसाला पकडणे



चोरावर मोर------

एकापेक्षा एक सवाई



चोरीचा मामला हळू हळू बोंबला------

पापकर्म केल्यामुळे आपत्ती आली किंवा हानी झाली तरी न ओरडता निपटून घ्यायचे असते.

३१ जानेवारी २०२१

बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ आता जैविक वारसा क्षेत्र


🔰सिंधुदुर्ग जिल्ह्यतील बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ हे जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली. ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ या प्रजातीकरिता जैविक वारसा क्षेत्र घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.


🔰बांबर्डे येथील ग्रामपंचायत हेवाळे हद्दीतील २.५९ हेक्टर क्षेत्र ‘मायरिस्टीका स्वम्प्स’जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रामध्ये ‘मायरिस्टीका’ या दुर्मिळ प्रजाती वृक्ष असून स्थानिक लोक या वृक्ष प्रजातीला देवराई संबोधतात व अनेक पिढय़ांपासून या प्रजातीचे करत आहेत. निसर्गाच्या संवर्धनासाठी कार्यरत आंतरराष्ट्रीय संघटनेने (आययूसीएन-इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झरवेशन ऑफ नेचर) ‘मायरिस्टीका’ प्रजाती ही दुर्मिळ व नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या जैविक वारसा क्षेत्रास महत्त्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रामध्ये या वृक्षासह विविध वृक्ष व वन्यप्राणी यांचा वावर असून ‘मायरिस्टीका’ या वृक्ष प्रजातीचे संरक्षण व जतन होणे गरजेचे आहे. भविष्यात या प्रजातीवर संशोधन होवू शकेल. त्यासाठी हे क्षेत्र जैविक वारसा स्थळ घोषित करण्यात आले आहे. जैवविविधतेच्या संसाधनांचे संवर्धन व शाश्वत असा विकास घडवून आणणे व त्यातून मिळणाऱ्या अनुषंगिक फायद्यांचे न्याय्य व समान वाटप करणे हा जैवविविधता कायदा आणि नियमांचा मुख्य उद्देश आहे. त्या अनुषंगाने बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ हे जैविक वारसा क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.


🔰राज्यातील चौथे जैविक वारसा क्षेत्र

शासनाने आतापर्यंत ग्लोरी अल्लापली, लांडोरखोरी जळगाव व गणेशखिंड पुणे हे क्षेत्र जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित केले होते. जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित होणारे बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ हे राज्यातील चौथे स्थळ ठरले आहे.

आर्थिक सर्वेक्षण 2020-21



▪️कद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी 29 जानेवारी 2021 रोजी संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण 2020-21’ सादर केले. त्याचे ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:


▪️आर्थिक वर्ष 2021-22 यामध्ये भारताचा वास्तविक GDP 11 टक्क्यांनी वाढणार आणि सांकेतिक GDP दर 15.4 टक्क्यांनी वाढणार, असा अंदाज आहे.


▪️आर्थिक वर्ष 2020-21 यामध्ये भारताचा GDP वृद्धि दर उणे 7.7 टक्के राहणार, असा अंदाज आहे.


▪️आर्थिक वर्ष 2020-21 यामध्ये जोखीम न घेतल्यामुळे आणि कर्जाची मागणी घटल्यामुळे बँक कर्जात घट झाली.


▪️खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किंमतीमुळे वर्ष 2020 मध्ये महागाईचा दर चढा राहिला. मात्र डिसेंबर 2020 मध्ये महागाई दर रिझर्व्ह बॅंकेच्या 4+/-2 टक्क्यांच्या श्रेणीत घसरून 4.6 टक्के राहिला.


▪️बाह्य क्षेत्राने विकासाला आवश्यक पाठबळ दिले. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चालू खात्यात शिल्लक GDPच्या अंदाजे 3.1 टक्के होती.


▪️GDP गुणोत्तर म्हणून बाह्य कर्ज सप्टेंबर 2020च्या अखेरच्या तुलनेत 21.6 टक्क्यांपर्यंत वाढले. मार्च 2020 च्या शेवटी ते 20.6 टक्के होते.


▪️आर्थिक वर्ष 2020-21 यामध्ये भारत गुंतवणूकीचे प्राधान्य केंद्र म्हणून कायम राहिला. देशात निव्वळ FII (विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार) ओघ नोव्हेंबर 2020 मध्ये 9.8 अब्ज डॉलर या सार्वकालीन उच्चांकी स्तरावर पोहचला. वर्ष 2020 मध्ये उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारत एकमेव देश होता जिथे इक्विटी FPI ओघ आला.


▪️आर्थिक वर्ष 2020-21 च्या सहामाहीत सरकारी वापरामुळे आर्थिक वाढ 17 टक्क्यांनी होने अपेक्षित आहे.


▪️आर्थिक वर्ष 2020-21 यासाठी कृषी क्षेत्राचा विकास दर 3.4 टक्के राहणार असा अंदाज आहे.

आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान उद्योग आणि सेवा क्षेत्रात अनुक्रमे 9.6 टक्के व 8.8 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.


▪️आर्थिक वर्ष 2021 याच्या पहिल्या सहामाहीत चालू खाते खाते अधिशेष एकूण देशांतर्गत उत्पादन (GDP) याच्या 3.1 टक्के आहे.


▪️भारतीय संदर्भात, विकासामुळे कर्जाच्या धारण क्षमतेस चालना मिळते, परंतु कर्ज स्थिरतेमुळे विकासाला गती मिळत नाही.


▪️सार्वजनिक आरोग्यावरील खर्च GDPच्या 1 टक्क्यांवरून 2.5 ते 3 टक्क्यांपर्यंत वाढत असताना, आरोग्य सेवांवरील सार्वजनिक खर्च 65 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे.


▪️एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत भारताची व्यापारी तूट 57.5 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी कमी झाली आहे.


▪️एप्रिल ते डिसेंबर 2020 मध्ये व्यापारी मालची निर्यात 15.7 टक्क्यांनी घटून 200.8 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी झाली आहे.


▪️सप्टेंबर 2020 अखेर भारताचे बाह्य कर्ज 556.2 अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते.


▪️आतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याने 'विश्व सौर बँक' आणि 'एक सूर्य एक विश्व एक ग्रिड' असे दोन नवीन उपक्रम सुरू केले आहेत.


▪️2020-21 या आर्थिक वर्षादरम्यान (प्रथम आगाऊ अंदाज) कृषी (आणि सहाय्यक काम) क्षेत्राच्या स्थिर दरात 3.4 टक्के वाढ दिसून आली.


▪️पतप्रधान पीक विमा योजनेत वर्षाकाठी 5.5 कोटी शेतकर्‍यांच्या विम्यांचा समावेश करण्यात आला आहे.


▪️आर्थिक वर्ष 2020-21 याच्या पहिल्या सहामाहीत भारताच्या सेवा क्षेत्रात जवळपास 16 टक्के घट झाली.

शक्ती कायदा:-



● महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर जलद करवाई करता यावी आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा देता यावी यासाठी महाराष्ट्र सरकार दोन कायदे करणार आहे.

● आंध्र प्रदेशच्या 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर 'शक्ती' नावाचे हे दोन कायदे असतील. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेलं हे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडलं जाणार आहे.

● महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कारवाई करता यावी, यासाठी प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 अशी दोन विधेयकं विधिमंडळासमोर मांडण्यात येणार आहेत.

● सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण अध्यक्षतेखाली यासाठी एक उपसमिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये अनिल देशमुख, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड या मंत्र्यांचा समावेश होता


● प्रस्तावित 'शक्ती' कायद्यानुसार :-


• महिला अत्याचारांच्या प्रकरणात 21 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करुन खटला चालवून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. महिलांवरील अॅसिड हल्ले आणि बलात्कारासारखे गुन्हे अजामीनपात्र करण्यात येणार आहेत.


• इतकंच नाही तर महिलांचा जर ई-मेल, इलेक्ट्रॉनिक मीडियातून किंवा मेसेजद्वारे छळ करण्यात आला तसंच त्यांच्यावर जर कुणी आक्षेपार्ह कमेंट केली तर त्यासाठीही कडक शिक्षा होणार आहे.


• हे सगळे गुन्हे अजामीनपात्र असतील


• बलात्कार प्रकरणी, Rarest of rare प्रकरणात फाशीच्या शिक्षेचीही तरतूद ठेवण्यात आली आहे.


• आपल्याच ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद करण्यात आलीय.


• 16 वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलींवर अत्याचार झाल्यास गुन्हेगाराला मरेपर्यंत जन्मठेप होऊ शकते.


• सामूहिक बलात्कारप्रकरणी 20 वर्ष कठोर जमठेपेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि 10 लाख रुपये दंड किंवा मृत्युदंडाची तरतूद असेल


• 12 वर्षाखालील मुलीवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत कठोर जन्मठेपेची शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड


• महिलांवर पुन्हा पुन्हा अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते.


• अॅसिड हल्ल्याप्रकरणी किमान 10 वर्षांची किंवा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि पीडित व्यक्तीला दंडाची रक्कम द्यावी लागेल


• अॅसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास 10 ते 14 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो


• महिलेचा कोणत्याही पद्धतीने छळ केल्यास किमान 2 वर्ष तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड होऊ शकतो


• सोशल मीडिया, मेल, मेसेज, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या माध्यमातून महिलांवर कमेंट करणे, धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे यासाठी पण शिक्षेची तरतूद या प्रस्तावित कायद्यांत करण्यात आलीये.


● याचबरोबर फौजदारी प्रक्रियेमध्येही या कायद्याअंतर्गत काही बदल सुचवले गेलेत.


•  तपासाचा कालावधी दोन महिन्यांवरून 15 दिवसांचा केला आहे.


•  खटला चालवण्याचा कालावधी दोन महिन्यांवरून 30 दिवसांचा केला गेलाय.


•  अपील करण्याचा कालावधी सहा महिन्यांवरून 45 दिवसांवर आणण्यात आलाय.


•प्रक्रियांमध्ये बदल करत असतानाच इतरही व्यवस्थांमध्ये म्हणजे न्यायालयीन, पोलीस आणि सामाजिक व्यवस्थांतही काही प्रस्ताव सूचवण्यात आलेत.


•  36 अनन्य विशेष न्यायालयं स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.


•  प्रत्येक घटकामध्ये महिला आणि लहान मुलांवरील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी जिल्हा अधीक्षक किंवा आयुक्तालयात विशेष पोलीस पथक, ज्यामध्ये किमान एका महिला अधिकाऱ्याचा समावेश असेल, असं नेमण्याचंही प्रस्तावित आहे.


• पीडितांना मदत आणि सहकार्य करण्यासाठी सेवाभावी संस्थांना अधिसूचित करण्याचाही प्रस्ताव आहे.

भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी....



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...


 १. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? 


२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.


 २. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?


- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.


३. कसं लिहीलं गेलं संविधान?


-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.


४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?


-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.


 ५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?


-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.


६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?


-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.


 ७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?


- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.


 ८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?


-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.


 ९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?


- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.


१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?


-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

महाराष्ट्रातील अभयारण्ये



नरनाळा – अकोला

टिपेश्वर -यवतमाळ

येडशी रामलिंग – उस्मानाबाद

अनेर – धुळे, नंदुरबार

अंधेरी – चंद्रपूर


औट्रमघाट – जळगांव

कर्नाळा – रायगड

कळसूबाई – अहमदनगर

काटेपूर्णा – अकोला

किनवट – नांदेड,यवतमाळ


कोयना – सातारा

कोळकाज – अमरावती

गौताळा औट्रमघाट – औरंगाबाद, जळगांव

चांदोली – सांगली, कोल्हापूर

चपराला – गडचिरोली


जायकवाडी – औरंगाबाद

ढाकणा कोळकाज – अमरावती

ताडोबा – चंद्रपूर

तानसा – ठाणे

देऊळगांव रेहेकुरी – अहमदनगर


नवेगांव – भंडारा

नागझिरा – भंडारा

नांदूर मध्यमेश्वर -नाशिक

नानज – सोलापूर

पेंच – नागपूर


पैनगंगा – यवतमाळ, नांदेड

फणसाड – रायगड

बोर – वर्धा

बोरीवली(संजय गांधी) – मुंबई

भिमाशंकर – पुणे, ठाणे

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...