३१ जानेवारी २०२१

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती...



🔶 मानवी डोक्याचे वजन ?

→   १४०० ग्रॅम.

 

🔶 सामान्य रक्तदाब ? 

→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 


🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?

→   न्यूरॉन. 


🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?

→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.

→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. 


🔶 शरिरातील एकूण रक्त ? 

→   ५ ते ६ लीटर.

 

🔶सर्वात लहान हाड ? 

→   स्टेटस ( कानाचे हाड ) 


🔶 सर्वात मोठे हाड ?

→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) 


🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?

→   १२० दिवस. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ? 

→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. 


🔶पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ? 

→   २ ते ५ दिवस. 


🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?

→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. 


🔶हिमोग्लोबिनचे प्रमाण ?

→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. 

→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. 


🔶 हरदयाचे सामान्य ठोके ? 

→   ७२ ते ७५ प्रति मिनिट. 


🔶 नाडी दर (पल्स रेट) ?

→   ७२ प्रतिमिनिट. 


🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?

→   थायरॉईड ग्रंथी. 


🔶 सर्वात मोठा स्नायू ?

→   ग्लुटियस म्याक्सीमस. 


🔶एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?

→   ६३९.


🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?

→   मोनोसाईटस - ३ ते ८%. 

→   बेसोफिल्स - ०.५%. 

→   लिम्फोसाईटस - २० ते २५%. 

→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. 


🔶शरीराचे तापमान ? 

→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. 


🔶परौढांमधील दातांची संख्या ?

→   ३२.


 🔶लहान मुलांमधील दातांची संख्या ?

→   २० दूधाचे दात. 


🔶 सर्वात पातळ त्वचा ? 

→   पापणी (कंजक्टायव्हा)

हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायधीश : अॅना चंडी..


🔥अना चंडी केरळ राज्यात कायद्याची पदवी घेणाऱ्या पहिल्या मल्याळी महिला मानल्या जातात.


🔥सन 1959 मध्ये त्या केरळ हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायधीश बनल्या.

स्त्रीवादी विचारांच्या अॅना चंडी यांनी महिलांच्या अधिकारांसाठीआवाज उठवला.

काही काम फक्त बायकांचीच आहेत या पारंपारिक विचारसरणीला बदलण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. 


🔥पत्नीच्या कमाईने पतीच्या आत्मसन्मानाला धक्का लागेल या विचारांचं त्यांनी खंडन केलं,

त्यांनी आपल्या 'श्रीमती' या मासिकाव्दारे महिलांसाठी आरक्षणाची

मागणी केली.


🔥करळात 1920-30 या काळात महिलांचं शिक्षण आणि आर्थिक अधिकार या विषयांवर काम होत होतं. पण अॅना यांनी महिलांचा आपल्या शरीरावर पूर्णतः अधिकार

असावा आणि महिलांना आपण कधी आई बनावं हे ठरवण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी केली.

महानगरपालिका


ज्या मोठ्या शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक असते तेथील नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेचे रूपांतर यथावकाश महानगरपालिका या वरच्या दर्जाच्या संस्थेत केले जाते.

महानगरपालिकेला इंग्रजीत म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मध्य प्रदेश राज्यात नगर पालिका निगम आणि अन्य हिदी भाषक राज्यांत नगर निगम म्हणतात. महानगरपालिका या लांबलचक शब्दाऐवजी मराठीत या संस्थेचा उल्लेख महापालिका या सुटसुटीत नावाने होतो. इ.स. २०१६पर्यंत, महाराष्ट्रातील खालील शहरांत महानगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत :-


🔰 महाराष्ट्रातील २७ महानगरपालिका 🔰


▪️--अकोला महानगरपालिका

▪️--अमरावती महानगरपालिका

▪️--अहमदनगर महानगरपालिका

▪️--उल्हासनगर महानगरपालिका

▪️--औरंगाबाद महानगरपालिका

▪️--कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

▪️--कोल्हापूर महानगरपालिका

▪️--चंद्रपूर महानगरपालिका

▪️--जळगाव महानगरपालिका

▪️--ठाणे महानगरपालिका

▪️--धुळे महानगरपालिका

▪️--नवी मुंबई महानगरपालिका

▪️--नागपूर महानगरपालिका

▪️--नांदेड-वाघला महानगरपालिका

▪️--नाशिक महानगरपालिका

▪️--पनवेल महानगरपालिका

▪️--परभणी महानगरपालिका

▪️--पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

▪️--पुणे महानगरपालिका

▪️--भिवंडी-निजामपूर महानगरपालिका

▪️--मालेगाव महानगरपालिका

▪️--मीरा-भायंदर महानगरपालिका

▪️--बृहन्मुंबई महानगरपालिका

▪️--लातूर महानगरपालिका

▪️--वसई-विरार महानगरपालिका

▪️--सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका

▪️--सोलापूर महानगरपालिका

जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती

🔴  खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश


✔️कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन


✔️ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया.


✔️अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना.


✔️ क्रोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.


✔️जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.


✔️टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.


✔️टंगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया.


✔️तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.


✔️तेल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.


✔️निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.


✔️बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.


✔️सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.


✔️युरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.


✔️पारा:- इटली, स्पेन, अमेरिका.


✔️मंगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.


✔️ लोहखनिज(साठे):- अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.


✔️लोहखनिज (उत्पादन):- रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.


✔️ शिसे:- ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.

एकूण २२ भाग आणि १२ परिशिष्टे

● भाग I  कलम १ ते ४ संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र ●


भाग II कलम ५ ते ११  नागरिकत्व 


भाग III कलम १२ ते ३५ मूलभूत अधिकार 


भाग IV कलम ३६ ते ५१ राज्याचे मार्गदर्शक तत्वे 


भाग IVA कलम ५१ A मूलभूत कर्त्यव्ये

भाग V कलम ५२ ते १५१ केंद्र सरकार (संघराज्य)


भाग VI कलम १५२ ते २३७ राज्य सरकार 


भाग VII 7 वी घटनादुरुस्ती रद्द


भाग VIII कलम२३९-२४२ केंद्रशासित प्रदेश क्षेत्र


भाग IX कलम २४३-२४३O पंचायतराज 

– ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद


– नगर पंचायत 

भाग IX A कलम २४३P – २४३ZG  नगरपालिका


भाग IX B  कलम ZH – कलम ZT  सहकारी संस्था


भाग X  कलम २४४-२४४A  अनुसूचित जाती व जमातीप्रदेश /क्षेत्र, आदिवासी क्षेञ


 भाग XI  कलम २४५ – २६३  केंद्र – राज्य संबंध 


 भाग XII  कलम २६४-३००A  महसुल – वित्त, मालमत्ता, करार व फिर्याद


 भाग XIII  कलम ३०१-३०७  व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध


 भाग XIV  कलम ३०८-३२३  केंद्र आणि राज्यांतर्गत सेवा, प्रशासकीय लोकसेवा आयोग


 भाग XIV A  कलम ३२३A, ३२३B  न्यायाधिकरण


 भाग XV  कलम ३२४-३२९A  निवडणूक आयोग


 भाग XVI कलम ३३०-३४२   अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय साठी आणि अँग्लो इंडियन्स साठी विशेष सोयी


 भाग XVII   कलम ३४३-३५१  कार्यालयीन भाषा


 भाग XVIIII  कलम ३५२-३६०  आणीबाणी विषयक तरतुदी


 भाग XIX  कलम ३६१-३६७  संकीर्ण


 भाग XX  कलम ३६८ संविधान दुरुस्ती बाबत 


 भाग XXI  कलम ३६९-३९२  अस्थायी, संक्रमाणि आणि विशेष तरतुदी


 भाग XXII  कलम ३९३-३९५  संक्षिप्त रूपे, प्रारंभ आणि 

बीबी का मकबरा

◾️हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा, आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. 


◾️औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी (दिलरास बानो बेगम) हिची कबर आहे.


◾️ बीबी का मकबरा यास सन्मानाने मराठवाड्याचा ताजमहाल म्हणतात.


◾️आजम शाहने 1679  मध्ये बांधला. हा लाल आणि काळ्या दगडांबरोबर, संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनविलेला आहे. या मिश्रणास स्टको प्लॅस्टर (Stucco Plaster) असे म्हणतात.


◾️मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. त्या कबरीवर छतांच्या खिडक्यांतून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्र प्रकाश पडेल, अशी रचना केली आहे मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड वापरला आहे.


◾️राबिया दुर्रानीची कबर 28 नोव्हेंबर 1951 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली


(बांधकामाच्या तारखेबद्दल संभ्रम आहे)

साक्षरतेमध्ये केरळचा पहिला नंबर तर महाराष्ट्र सहाव्या स्थानी

✔️ देशात साक्षरतेमध्ये केरळने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर आंध्र प्रदेश हे राज्य देशात साक्षरतेमध्ये सर्वात पिछाडीवर आहे.


✔️आंध्र प्रदेशात साक्षरतेचे प्रमाण 66.4 टक्के आहे. बिहारपेक्षाही आंध्र प्रदेश साक्षरतेमध्ये मागे आहे. बिहारमध्ये साक्षरतेचे प्रमाण 70.9 टक्के आहे.


🔰आकडेवारी काय सांगते?


✔️ नशनल स्टॅटिस्टिकल ऑफीसने शिक्षणासंदर्भातील रिपोर्ट जाहीर केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. 


✔️साक्षर राज्यांमध्ये महाराष्ट्र सहाव्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात एकूण साक्षरतेचे प्रमाण 84.8 टक्के आहे. 


✔️ परुष आणि महिला साक्षरतेच्या प्रमाणात तब्बल 12.3 टक्क्यांचे अंतर आहे. पुरुष 90.4 टक्के तर महिला 78.4 टक्के साक्षर महिला आहेत. 


✔️ पहिल्या पाच सर्वाधिक साक्षर राज्यांमध्ये केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांचा नंबर लागतो.


✔️ दरम्यान, साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या शेवटच्या पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेश,तेलंगण, बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत.

विविध योजना -

1) प्रधानमंत्री जन-धन योजना — 28 ऑगस्ट 2014

2) मेक इन इंडिया — 25 सप्टेंबर 2014

3) स्वच्छ भारत मिशन — 2 ओक्टोबर 2014

4) संसद आदर्श ग्राम योजना — 11 ऑक्टोबर 2014

5) श्रमेव जयते — 16 ऑक्टोबर 2014 

6) जीवन प्रमाण पत्र योजना — 10 नोव्हेंबर 2014

7) मिशन इंद्रधनुश — 25 डिसेंबर 2014

8) नीती आयोग ची सुरूवात — 1 जानेवारी 2015

9) पहल  योजना — 1 जानेवारी 2015 

10) बेटी बचाओ , बेटी पाढाओ योजना — 22 जानेवारी 2015

11) सुकन्या समृद्धी योजना — 22 जानेवारी 2015 

12) मृदा स्वास्थ्य कार्ड — 19 फेब्रुवारी 2015 

13) प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना — 20 फेब्रुवारी 2015 

14) प्रधानमंत्री जीवन ज्योती याजना — 9 मे 2015

15) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना — 9 मे 2015

16) अटल पेन्शन योजना — 9 मे 2015

17) उस्ताद योजना — मे 2015

18) कायाकल्प योजना — मे 2015

19) D D किसान वाहिनी — मे 2015

20) डिजिटल इंडिया — 1 जुलै 2015

जाणून घ्या देशातील 10 अस्वच्छ शहरे

नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशात सर्वाधिक चार, तर अन्य विभागांतील 13 असे एकूण 17 पुरस्कार मिळवून ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे. 


तर दुसरीकडे सर्वाधिक अस्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल दहापैकी सहा शहरे बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे. 


🛑 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या सर्वात अस्वच्छ शहरांची यादी


🔟 अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये दहाव्या स्थानी आहे बिहारमधील साहारसा हे शहर.


9️⃣ बिहारमधीलच बिहार शरीफ शहर नवव्या स्थानी आहे. 


8️⃣ आठव्या स्थानी आहे नागालँण्डमधील दिमापूर एमसी हे शहर. 


7️⃣ अरुणाचल प्रदेशमधील इटानगर हे या यादीमध्ये सातव्या स्थानी आहे. 


6️⃣ मघालयमधील शिलाँग शहर अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये सहाव्या स्थानी आहे. 


5️⃣ अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी आहे परसा बाजार. हे शहर बिहारमध्ये आहे.


4️⃣ चौथ्या स्थानी बिहारमधील भागलपूर शहर आहे.


3️⃣ तिसऱ्या स्थानी पंजाबमधील अबोहार शहर आहे. 


2️⃣ दसऱ्या स्थानी बिहारमधील बक्सर शहर आहे.


1️⃣ सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये बिहारमधील गया शहर अव्वल स्थानी आहे.


✅ विशेष : अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये अव्वल दहामध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही आहे.

विभक्ती

नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.


वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात. 

शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.

जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे 


असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.


विभक्त्यार्थ दोन प्रकार 


१) कारकार्थ - कारक व कारकार्थ

२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म


विभक्तीची आठ नावे


१) प्रथमा 

२) द्वितीया 

३) तृतीया 

४) चतुर्थी  

५) पंचमी 

६) षष्ठी 

७) सप्तमी  

८)  संबोधन 


विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा


विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)


१) प्रथमा  -  प्रत्यय नाही  -  प्रत्यय नाही       

२) द्वितीया  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते    

३) तृतीया  -  ने, ए, शी  -  नी, शी, ही     

४) चतुर्थी  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते     

५) पंचमी  -  ऊन, हून  -  ऊन, हून     

६) षष्ठी  -  चा, ची, चे  -  चे, च्या, ची   

७) सप्तमी  -  त, ई, आ  -  त, ई, आ   

८) संबोधन  -  प्रत्यय नाही  -  नो


विभक्तीतील रूपे


विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)


१) प्रथमा -  फूल  -  फुले 

२) द्वितीया  -  फुलास, दुलाला  -  फुलांस, फुलांना

३) तृतीया  -  फुलाने, फुलाशी  -  फुलांनी, फुलांशी

४) चतुर्थी  -  फुलास, फुलाला  -  फुलांस, फुलांना

५) पंचमी  -  फुलातून, फुलाहून  -  फुलांतून, फुलांहून

६) षष्ठी  -  फुलाचा, फुलाची, फुलाचे  -  फुलांचा, फुलांची, फुलांचे

७) सप्तमी  -  फुलात  -  फुलांत

८) संबोधन  -  फुला  -  फुलांनी


भारतीयांकडून प्रभावी हायड्रोजन उत्क्रांतीसाठी कार्यक्षम व स्वस्त असे उत्प्रेरक विकसित.

🔰बगळुरू येथील सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CENS) या केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थेच्या संशोधकांनी ‘पॅलाडिअम Pd(II)’ आयन-युक्त नव्या प्रकारचे कॉर्डिनेशन पॉलिमर (COP) संश्लेषित केला आहे, जो H-अ‍ॅडसॉरप्शन आणि बेनेझ टेट्रामाईन (BTA) यांच्या सक्रीय स्थळांचा स्रोत म्हणून कार्य करतो. 


🔰दोन्ही मिळून द्वीमितीय (2D) Pd(BTA) पत्र्याच्या माध्यमातून H-बंध परस्परसंवाद निर्माण करतात. संशोधकांनी द्वीमितीय 2D Pd(BTA) पत्रा देखील तयार केला आहे.


🔰हायड्रोजन (H2) इव्होल्यूशन रिअॅक्शन (HER) यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रो उत्प्रेरकाची कार्यक्षमता मुख्यत्वे त्याचा टिकाऊपणा, इलेक्ट्रोकेमिकल अभिक्रियेची क्षमता कमीतकमी करण्यावर आणि संश्लेषण (उत्पादन) याच्या किंमतीवर अवलंबून असते. 


🔰उद्योगांमध्ये वापरण्यात येणारे प्लॅटीनम (Pt) / कार्बन (C) कार्यक्षम उत्प्रेरक आहेत, परंतु ते किंमतीत महाग आहेत आणि दीर्घकाळ वापरल्यास मेटल आयनवर काम करीत नाहीत. त्यातच पृथ्वीवर प्लॅटीनम धातूचे साठे अल्प आहेत.


🔴या शोधाचे महत्व...


🔰हवामानातले बदल यांच्या विरोधात असलेल्या लढ्यासाठी जीवाश्म इंधनांऐवजी पुढील पिढीचे कमी कार्बनयुक्त इंधन म्हणून हायड्रोजन ओळखले जाते. इंधन म्हणून हायड्रोजनच्या वापराचे भवितव्य हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे इलेक्ट्रोकेमिकल विभाजन सुलभ करण्यासाठी लागणाऱ्या कार्यक्षम इलेक्ट्रोकॅटिलिस्टच्या रचनेमध्ये आहे.


🔰हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे विभाजन करण्याचे कार्यक्षम साधन विकसित करणे हा या शोधामागचा हेतु आहे.

अशुद्ध शब्द - शुद्ध शब्द

1) चाह - चहा 

2) छपर - छप्पर 

3) जागार - जागर 

4) जागर्त - जागृत 

5) ज्यादुगार - जादूगार 

6) जीज्ञासू - जिज्ञासू 

7) ज्योस्त्ना - ज्योत्स्ना 

8) तिर्थरूप - तीर्थरूप 

9) त्रीभूवन - त्रिभुवन 

10) ततसम - तत्सम 

11) जागतीक - जागतिक 

12) हूंकार - हुंकार 

13) हिंदू - हिंदु 

14) हारजित - हारजीत

15) तरून - तरुण 

16) तांत्रीक - तांत्रिक 

17) तरका - तारका 

18) बंकेश्वर - त्र्यंबकेश्वर 

19) थाठ - थाट 

20) थेरला - थोरला 

21) दिर्घ - दीर्घ 

22) दाण - दान 

23) दागीना - दागिना 

24) दक्षीणा - दक्षिणा 

25) दूसरा - दुसरा 

26) दिलगीरी - दिलगिरी 

27) दरारोज - दररोज 

28) दिर्घोद्योग - दीर्घोदयोग 

29) दत्पर - दप्तर 

30) धिकार - धिक्कार 

31) धण - धन 

32) धनूष्य - धनुष्य 

33) धुर्त - धूर्त 

34) धोपटर्माग - धोपटमार्ग 

35) ध्यानधारना - ध्यानधारणा 

36) धारीष्ट - धारिष्ट 

37) नोर्झर - निर्झर

38) नीष्कारण - निष्कारण

39) नियूक्त - नियुक्त

T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच

🔰T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील दोन वर्षांत होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाच्या आयोजनाविषयीचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी मंडळाची शुक्रवारी बैठक झाली.


🔰वहिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत २०२१ आणि २०२२च्या टी-२० विश्वचषकाच्या यजमानपदाबद्दल निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०२१चा टी-२० विश्वचषक भारतातच होणार असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त टाईम्सनाऊने दिले आहे. याशिवाय २०२१मध्ये न्यूझीलंडमध्ये होणारा महिला वन डे विश्वचषकदेखील पुढे ढकलण्यात आला आहे.


🔰महिलांचा २०२१ एकदिवसीय विश्वचषक तसेच पुरुषांचे पुढील दोन टी-२० विश्वचषक यांच्या आयोजनाविषयी या बैठकीत चर्चा झाली. ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२०मध्ये होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२१च्या यजमानपदासाठी आग्रही होते. त्यामुळे भारताला २०२१ऐवजी २०२२च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळू शकते असे बोलले जात होते. पण अखेर २०२१च्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताकडेच कायम असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहे.

खाडी

🟢 नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते, तेथील पाण्याच्या साठ्याला खाडी असे म्हणतात. 


🟢 भरतीचे पाणी नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत येते त्या भागास “खाडी”असे म्हणतात. कोकणचा किनारा अनेक खाड्यांनी बनलेला आहे.


▪️कधीकधी किनाऱ्याचा सखल भूभाग खचून किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यानेसुद्धा समुद्री खाडी तयार होते. 


▪️खाडी जर बऱ्यापैकी मोठी असेल तर तिला आखात म्हणतात.


▪️बगालचा उपसागर हा देखील एका अखाताचाच प्रकार आहे.


▪️महाराष्ट्राच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याला अशा अनेक खाड्या आहेत. तिथली बहुतेक बंदरे खाडीच्या आश्रयाने बनली आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🛑 खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रम खालीलप्रमाणे आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


१) डहाणूची खाडी, जि. ठाणे


२) दातीवऱ्याची खाडी, जि. ठाणे


३) वसईची खाडी, जि. ठाणे


४) धरमतरची खाडी, जि. रायगड


५) रोह्याची खाडी, जि. रायगड


६) राजापुरीची खाडी, जि. रत्नागिरी


७) बाणकोटची खाडी, जि. रत्नागिरी


८) दाभोळची खाडी, जि. रत्नागिरी


९) जयगड, जि. रत्नागिरी


१०)विजयदुर्ग, जि. सिंधुदूर्ग


११)तेरेखोलची खाडी, सिंधुदूर्ग


ओझोन चे संरक्षण कवच

🔰 वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. 


🔰ओझोन  वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे  सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे. 


🔰सर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही 

किरणे ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील  सजीवांचे रक्षण होते. 


🔰वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यांमध्ये हवा थंड  करण्यासाठी वापरला जाणारे 

📌 कलोरोफ्लुरोकार्बन्स तसेच  

📌 कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास  ओझोनच्या थराचा नाश होतो.  


🔰ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी  १६ सप्टेंबर हा दिवस जगभर ‘ओझोन संरक्षण दिन’  म्हणून मानला जातो.

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?

 A. 1 ते 14 वयोगट

 B. 6 ते 14 वयोगट✍️

 C. 1 ते 18 वयोगट

 D. 5 ते 14 वयोगट.

____________________

2) "आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता यांचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती होय,'' असे कोणी म्हटले?

 A. महात्मा गांधी

 B. हर्बर्ट स्पेन्सर

 C. थॉमस वुड✍️

 D. जागतिक आरोग्य संघटना.


____________________


3) भारत सरकारने _ पासून मौखिक पोलीओ कार्यक्रमासोबत इंजेक्शनद्वारा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

 A. 1 नोव्हेंबर, 2011

 B. 30 नोव्हेंबर, 2015 ✍️

 C. 1 जानेवारी, 2016

 D. 26 फेब्रुवारी, 2017.


______________________


4) बलवंतराय मेहता समितीने त्री-सूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना 'पंचायत राज'' असे कोणी संबोधीले ?

 A. महात्मा गांधी

 B. डॉ. राजेंद्र प्रसाद

 C. पंडित जवाहरलाल नेहरू✍️

 D. बलवंतराय मेहता.


____________________


5) खालीलपैकी कोणती योजना बालकांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्यांचे पुनर्वसन व अर्थसाहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे?

 A. माझी कन्या भाग्यश्री योजना 

 B. बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजना 

 C. मनोधैर्य योजना ✍️

 D. जीवनोन्नती योजना.


____________________


6) देवदासींच्या उदरनिर्वाहाकरीता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे ?

 A. स्वाधार योजना

 B. राज्य गृह योजना 

 C. मातृत्व सहयोग योजना

 D. निर्वाह अनुदान योजना.✍️


____________________


7) भारताची जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात (दर हजारी) अर्भक मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे?

 A. पश्चिम बंगाल

 B. बिहार 

 C. उत्तर प्रदेश

 D. मध्य प्रदेश.✍️


____________________


8) 73वी घटनादुरुस्ती ही महिलांसाठी महत्वाची मानली जाते कारण त्यानुसार :

 A. संघटित क्षेत्रात काम करणा-या स्त्रियांना 3 ऐवजी 6 महिने मातृत्व रजा मिळाली.

 B. कामावर होत असलेल्या शोषणाची तक्रार केल्यास महिलेला खास संरक्षण देण्यात येते. 

 C. पंचायतीत एकूण संख्येच्या एक तृतीयांश जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले. ✍️

 D. लग्नाच्या संमतीसाठी वयाची किमान मर्यादा वाढविण्यात आली.


____________________


9) 1969 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) उद्देश काय आहे? 

 A. सहयोगातून शिक्षण

 B. सेवेतून उत्कृष्टता

 C. कल्याणातून शिक्षण

 D. सेवेतून शिक्षण.✍️


____________________


10) खालीलपैकी कोणत्या उद्देशाने 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुरू केली?

(a) मुलींचा जन्मदर वाढविणे.

(b) मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे.

(c) मुलींना शिक्षण देणे.

(d) बालविवाहास प्रतिबंध करणे.


पर्यायी उत्तरे :

 A. फक्त (a)

 B. (a) आणि (c)

 C. (a), (b) आणि (c)

 D. (a), (b), (c) आणि (d). ✍️

ग्राहक संरक्षण कायदा, 2019 लागू

• ' संरक्षण कायदा, 2019' 20 जुलै 2020 पासून लागू झाला. हा नवीन कायदाग्राहकांना सक्षम करेल आणि आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणास मदत करेल.



📚 या कायद्यातील प्रमुख तरतुदी 


• या कायद्यात ग्राहकांच्या हक्कांना प्रोत्साहन, संरक्षण देऊन ग्राहक संरक्षणाचीअंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापनाकरण्याचा समावेश आहे. 


• केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन तपासणे आणितक्रारी / खटला चालवणे, असुरक्षित वस्तू व सेवा परत मागवणे, अन्यायकारकव्यापार पद्धती बंद करवणे व दिशाभूल करणार्‍या जाहिरातींवर दंड आकारणे आदीअधिकार देण्यात येतील. 


• ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार रोखण्यासाठीचे नियमही या कायद्यांतर्गतसमाविष्ट आहेत.


• या कायद्यांतर्गत प्रत्यके ई-कॉमर्स घटकाला वस्तू परत केल्यास, परतावा, वस्तूबदलून घेतली असल्यास, वारंटी आणि गॅरंटी, वस्तूची डिलेव्हरी आणि शिपमेंट, देयकाचे प्रकार, तक्रार निवारण पद्धती, देयक प्रदान पद्धती, देयक पद्धतीचीसुरक्षितता, परताव्यावरील शुल्क या सर्व बाबींची माहिती द्यावी लागणार आहे. 


• ग्राहकांना वस्तू घेतानाच तपशील समजून घेण्यासाठी वस्तू कोणत्या देशातील आहे, याची माहिती द्यावी लागणार आहे. 


• ई-कॉमर्स कंपन्यांना ग्राहकांच्या तक्रारीची पोहोच 48 तासांत द्यावी लागेल आणि याकायद्यानुसार पोहोच मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत तक्रारीचे निवारण करावेलागणार आहे. 


• नवीन कायदा उत्पादनाच्या उत्तरदायित्वाची संकल्पना आणतो आणि नुकसानभरपाईच्या कोणत्याही दाव्यासाठी, वस्तू उत्पादक, उत्पादन सेवा प्रदाता आणिउत्पादन विक्रेता यांना आपल्या कार्यकक्षेत आणतो.


• नवीन कायद्यांतर्गत ग्राहक आयोगामधील ग्राहक विवाद निवाडा प्रक्रिया सुलभकरण्याची तरतूद आहे, ज्यात राज्य व जिल्हा आयोगाचे सबलीकरण करण्याचासमावेश आहे.


• नवीन कायद्यात मध्यस्थीसंदर्भात पर्यायी विवाद निराकरण यंत्रणेची तरतूद केलीआहे. यामुळे निवाडा प्रक्रिया सुलभ होईल.


• ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमांनुसार 5 लाख रुपयांपर्यंतच्या तक्रारीसाठीकसलेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तक्रारी दाखलकरण्याची तरतूद आहे.


• केंद्रीय ग्राहक संरक्षण व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याच्या मंत्र्यांच्याअध्यक्षतेखाली केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण नियमांची तरतूद करण्यात आलीआहे. 


• यात राज्यमंत्री उपाध्यक्ष असतील आणि विविध क्षेत्रांतील 34 सदस्यांचासमावेश असेल.

नेत्रयोग (Eye Disease)

 १) रंग आंधळेपणा (Colour Blindness):

अनुवांशिक व बरा न होणारा रोगसर्व रंग दिसतात. मात्र, त्यातील फरक जाणवून येत नाही. विशेषतः लाल व हिरवा रंगातील फरक समजून येत नाही . फक्त पुरुषांनाच होतो.


२) मोतीबिंदू (Cataract)

डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे नेत्रभिंग धूसर किंवा अस्पष्ट बनतो, कमी प्रकाशात चांगले तर जास्त प्रकाशात कमी दिसते. उपाय: भिंगारोपण, बहिरवर्क भिंगाचे रोपण केले जाते. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर कधी कधी नवीन बसविलेल्या भिंगाच्या मागे पुन्हा मोतीबिंदू तयार होते. यासाठी काही महिने ते काही वर्षे असा कालावधी असू शकतो. YAG लेसर वापरून हा द्वितीयक मोतीबिंदू काढता येतो.


३) काचबिंदू (Glaucoma):

हि व्यथा वयाच्या ४० ते ५० वर्षाच्या दरम्यान होते. नेत्रजलाच्या निचऱ्यामध्ये बिघाड झाल्यास ते डोळ्यात साठू लागते. त्यामुळे डोळ्याच्या आतील दाब (अंतर्दाब) वाजवीपेक्षा जास्त वाढतो व डोळा टणक बनतो. त्यामुळे बुबुळ घासले गेल्याने काचेसारखे चकचकीत होते. म्हणून त्याला काचबिंदू असे म्हणतात. काचबिंदूची परिणीती आंधळेपणात होऊ शकते. डोळ्याचा अंतर्दाब टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो.


४) शुष्कता (Xerophtalmia/xerosis):

व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे होतो. डोळे कोरडे पडून पुढे रातांधळेपणा होऊ शकतो.


५) डोळे येणे (Conjuctivitis)

विषाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग डोळे लाल होऊन खूप लागतात व चिकट पाणी येते.


६) खुपरी (Trachoma)

संसर्गजन्य रोग, घाणेरडया वस्तीत, दूषित हवेत, दूर व धुळीत राहणाऱ्यांना होतो. प्रथम पापण्यांचा आतील भाग खरखरीत होतो व नंतर त्यावर साबुदाणाच्या आकाराचे उंचवटे येतात. डोळ्याच्या उघटझापीमुळे ते बुबुळावर घासले गेल्याने बुबुळावर फुले पडतात. त्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.


७) रांजणवाडी (Meibomian Cyst)

पापण्यांच्या केसांच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्मस्रावक ग्रंथींमधून नेहमी एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर पडत असतो.

या ग्रंथी धूलिकण, केसातील कोंडा इत्यादी कारणांमुळे बंद झाल्यास द्रव बाहेर न पडल्याने सुजतात. त्यालाच रांजणवाडी असे म्हणतात.


विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना

🔰 राजश्री योजना : राजस्थान 


🔰 कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल 


🔰 भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक


🔰 लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश 


🔰 पख अभियान : मध्य प्रदेश 


🔰 लाडली : दिल्ली व हरियाणा


🔰 मख्यमंत्री लाडली योजना : उत्तर प्रदेश 


🔰 मख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना : बिहार


🔰 किशोरी शक्ति योजना : ओडिशा 


🔰 ममता योजना : गोवा 


🔰 सरस्वती योजना : छत्तीसगढ


🔰 माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र


🔰 नदा देवी कन्या योजना : उत्तराखंड .

देशभरात विशेष पल्स पोलिओ अभियान.....

राष्ट्रीय लसीकरण दिवसाची सुरुवात 17 जानेवारीपासून होणार होती. मात्र 16 जानेवारीपासून कोविड-19 लसीकरण अभियान सुरु झाल्याने पोलिओ लसीकरण मोहिमेला स्थगिती दिली. 


भारताच्या राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून आरोग्य मंत्रालयाने पोलिओ लसीकरण दिन 31 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला. 


हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिवस किंवा पोलिओ संडे म्हणून देखील ओळखला जातो.


🎯 महत्त्वाच्या बाबी : 


• 0 ते 5 वर्षांच्या मुलांना पोलिओ ड्रॉप्स दिले जातील.


• 31 जानेवारीपासून सुरु होणारे अभियान 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार.


• ज्या रविवारी लसीकरण अभियान सुरु होते, त्या दिवसाला राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून मानले जाते.


• 1995 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल पोलिओ निर्मूलन उपक्रमाच्या पुढाकाराने भारताने पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरू केला.


• पोलिओ लसीकरण अभियान वर्षातून दोनदा आयोजित केला जातो.


• कोविड-19 संकटाच्या काळात पोलिओ लसीकरण अभियान राबवण्यात येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना लसीकरण शिबिरात न घेण्याचा सल्ला दिला आहे.

भारताची पहिली स्वदेशी 9 mm मशीन पिस्तूल विकसित

डीआरडीओ आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे देशाची पहिली स्वदेश निर्मित 9 mm मशीन पिस्तूल विकसित केले आहे.


इन्फंट्री स्कूल, महू आणि डीआरडीओच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था(एआरडीई), पुणे यांनी हे पिस्तूल विकसित केले आहे.


पिस्तूलाचे नाव “अस्मि” असे ठेवण्यात आले आहे

IMP QUESTION

१)  भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधनाचां उल्लेख आधुनिक भारताचे चाणक्य असा केला जातो.

१. चरणसिंग

२. व्ही.पी.सिंग

३. अटलबिहारी वाजपेयी

४. पी.व्ही.नरसिंहराव🔶


२) सचिन तेंडूलकरने आपले १०० वे शतक कोणत्या मैदानवर झळ\कावले होते.

१. वानखेडे स्टेडीयम

२. ईडन गार्डन

३. लॉर्डस

४. शेर- ए - बांगला स्टेडीयम🔶


३) २०१८ च्या प्रारंभी कोणत्या राज्यात राष्ट्रीय कर्करोग संस्था स्थापन करण्यात आली.

१. राजस्थान

२. पंजाब

३. हरियाणा🔶

४. हिमाचल प्रदेश


४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात आपले पहिले भाषण खालीलपैकी कोणत्या वर्षी दिले होते.

१. ऑक्टोंबर १४🔶

२. ऑक्टोंबर १५

३. ऑगस्ट १४

४. सप्टेंबर १४


५)  खालीलपैकी भारताच्या कोणत्या पंतप्रधनांनी संसदेत मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा केल्यानंतर त्याला देशव्यापी विरोध झाला होता.

१. राजीव गांधी

२. व्ही.पी. सिंग🔶

३. चौथरी चरणसिंग

४. चंद्रशेखर


६) १९८३ मध्ये कन्याकुमारी ते दिल्लीतील राजघाटापर्यंत पदयात्रा काढणारे नेते खालीलपैकी कोण आहे?

१. चंद्रशेखर

२. लालकृष्ण अडवाणी🔶

३. रामविलास पासवान

४. व्ही. पी.सिंग


७) सर डॉन ब्रॅडमॅन यांच्यानंतर कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद २५ शतक झळकवणारा दुसरा फलंदाज ------------ हा आहे.

१. विराट कोहली

२. महेला जयवर्धने

३. केन विल्यम्सन

४. स्टीव्ह स्मिथ🔶


८)  ------------- हा देश ऑस्ट्रेलीया समुहाचा ४३ वां सदस्य देश ठरला.

१. चीन

२. पाकिस्तान

३. भारत🔶

४. ब्राझील


९)  युनेस्को द्वारा ----ते ------ पर्यंत युनेस्को वारसा सप्ताह साजरा केला जातो.

१. १४ ते २० नोव्हेंबर

२. २० ते २४ नोव्हेंबर

३. १९ ते २५ नोव्हेंबर🔶

४. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर


१०) जागतिक व्यापार संघटनेने २०१९ या वर्षापासून ------- हा दिवस जागतिक कापूस दिवस म्हणून घोषित केले.

१. ७ ऑक्टोंबर🔶

२. १५ ऑक्टोंबर

३. ६ नोव्हेंबर

४. २६ नोव्हेंबर


११) अवयवदानात परिणामकारक चळवळ उभी करणाऱ्या ----------------- या राज्याला केंद्र सरकरने सर्वोत्तम राज्याचा दर्जा दिला.

१. गुजरात🔶

२. महाराष्ट्र

३. तामिळनाडू

४. आंध्र प्रदेश


१२) बाळाच्या नैसर्गिक संगोपनासाठी आणि आईच्या दुधाचे महत्व लक्षात घेऊन ---------- शहरामध्ये पहिलीह्युमन मिल्क बँक स्थापन करण्यात येणार आहे.

१. पुणे

२. नागपूर

३. औरंगाबाद

४. नाशिक🔶

 

१३)  ग्रीनपीस इंडिया नावाच्या स्वयंसेवी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ………….हे शहर भारतातील सर्वात प्रदूषित शहर आहे

१.      झरिया🔶

२.      धनबाद

३.      नोएडा

४.      गाज़ियाबाद – उत्तर प्रदेश

 


१४) 6 जानेवारी 2020 रोजी किसान विज्ञान कॉंग्रेस कोठे आयोजित केली गेली होती? 

१. नवी दिल्ली

२. बंगळुरू🔶

३. पुणे

४. मुंबई

 


१५) राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करता यावी म्हणून सर्व नदी खोऱ्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी शासनाने जल आराखडा तयार केला आहे. असा एकात्मिक जल आराखडा तयार करणारे ............ देशातील पहिले राज्य ठरले.

१.     केरळ

२.     तामिळनाडू

३.     महाराष्ट्र

४.     आंध्र प्रदेश🔶


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार

🏆 ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद 

🔰 दश : सौदी अरेबिया


🏆 सटेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान 

🔰 दश : अफगाणिस्तान 


🏆 गरँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार 

🔰 दश : पॅलेस्टाईन


🏆 ऑर्डर ऑफ झायेद 

🔰 दश : संयुक्त अरब अमिरात 


🏆 सियोल शांती पुरस्कार 

🔰 दश : दक्षिण कोरिया


🏆 य एन चँपियन्स ऑफ द अर्थ 

🔰 सस्था : संयुक्त राष्ट्र 


🏆 गलोबल गोलकीपर पुरस्कार 

🔰 सस्था : बिल और मेलिंडा गेट्स फाउंडेशन


🏆 किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां

🔰 दश : बहरीन


🏆 निशान इज्जुद्दीन पुरस्कार

🔰 दश : मालदीव


🏆 ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू 

🔰 दश : रशिया


🏆 लीजन ऑफ मेरिट

🔰 दश : अमेरिका .

भूकंप

🔰भूकंप लहरी : 


» ज्या वेळी भूकंप होतो, त्या वेळी 

   भूकवचात मोठय़ा प्रमाणात हालचाली 

   होतात व मोठय़ा प्रमाणात कंप निर्माण 

   होतात. यांनाच ‘भूकंप लहरी’ असे 

   म्हणतात.


🔰नाभी (Focus) : 


» भूकंप झाल्यावर भूकवचातील ज्या 

   स्थानापासून उगम पावून सर्वदूर 

   पसरतात, त्या स्थानास भूकंप केंद्र किंवा 

   नाभी म्हणतात.


🔰 अधीकेंद्र (Epicentre) : 


» नाभीच्या अगदी वर क्षितिजाजवळच्या 

   लंब रेषेवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो 

   बिंदू मिळतो, त्याला ‘अधीकेंद्र’ असे 

   म्हणतात. भूकंपकेंद्रापासून निघणाऱ्या 

   भूकंप लहरींचा सर्वात अधिक प्रभाव 

   अधीकेंद्राच्या निकट दिसून येतो. 

   अधिकेंद्रापासून जसजसे अंतर वाढत 

   जाते, तसेतसे भूकंपाची तीव्रता कमी 

   कमी होत जाते.


🔰 भूकंप अधिलेख (Seismogram):-

     

» भूकंप लहरींचा अभ्यास भूकंप            

   अभिलेखांवरून करता येतो. भूकंप 

   लहरींचे तीन प्रकार पडतात-  प्राथमिक 

   लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी.


🔰 भूकंप लहरींचे प्रकार :- 


■ प्राथमिक लहरी (P waves) : 


» प्राथमिक लहरींचा वेग इतर सर्व 

   लहरींपेक्षा जास्त असतो. 


» प्राथमिक लहरी या स्थायुरूप व द्रव्यरूप 

   पदार्थावरून प्रवेश करू शकतात. 


» प्राथमिक लहरी या ध्वनी लहरींप्रमाणे 

   असतात. 


» यात कणांचे कंपन लहरींच्या संचरण 

   दिशेने घडून येते.


■ दुय्यम लहरी (S waves) : 


» दुय्यम लहरी या प्रकाश लहरींप्रमाणे 

   असून यात कणांचे कंपन संचरण 

   दिशेशी समलंब दिशेने घडून येते. 


» दुय्यम लहरी या घनपदार्थापासून जाऊ 

   शकतात; परंतु द्रवरूप पदार्थातून त्या 

   जाऊ शकत नाहीत. 


» सर्व साधारणपणे त्यांचा वेग प्राथमिक 

   लहरींच्या वेगापेक्षा निम्मा असतो.


■ भूपृष्ठ लहरी (L waves) : 


» भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठांवरूनच सागरी 

   लहरींप्रमाणे प्रवाहित होतात. 


» सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या 

   अधिक विनाशक असतात. 


» भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या लहरी 

   प्रवास करू शकत नाही. 


» भूपृष्ठ लहरी पृथ्वीपासून आरपार न 

   जाता पृथ्वीगोलाला फेरी मारतात. 


» भूकंप अभिलेखावर या लहरींची नोंद 

   सर्वात शेवटी होते.


🔰 रिश्टर स्केल (Richter Scale) : 


» अमेरिकन भूकंप शास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर 

   यांनी १९३५ साली भूकंपाच्या लहरींची 

   तीव्रता मोजण्यासांठी रिश्टर प्रमाण 

   शोधून काढले. 


» याच्या साह्य़ाने भूकंपाच्या तीव्रतेची 

   सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा 

   एक ते नऊ या दरम्यान असतात.


🌍 भूकंपाचे जागतिक वितरण 

     

■पॅसिफिक महासागराचा पट्टा : 


» जगातील ६५% भूकंप प्रदेश पॅसिफिक 

   महासागराच्या सभोवतालच्या पट्टय़ात 

   आढळतो. 


» याला प्रशांत महासागरातील पट्टा किंवा 

   अग्निकंकण (Rings of Fire) असे 

   म्हणतात. 


» यात इंडोनेशिया, फिलिपाइन्स, जपानची 

   बेटे, कामचटका द्वीपकल्प व पूर्व 

   सबेरियातील काही भाग येतो. 


» भूकंपाचा हा पट्टा उत्तर अमेरिकेत 

   आल्प्सपासून रॉकीज पर्वत दक्षिण 

   अमेरिकेत अँडीज पर्वताला अनुसरून 

   पुढे अंटाक्र्टिका खंडापर्यंत गेलेला आहे. 


» या भागातच असलेल्या जपानच्या हांशू 

   बेटांवर जगातील सर्वात जास्त विद्धंसक 

   भूकंप होतात.


■ मध्य अटलांटिक पट्टा  : 


» या पट्टय़ात अटलांटिक महासागरातील 

   मध्य अटलांटिक रिझ आणि 

   रिझजवळील काही बेटांचा समावेश 

   होतो. 


» येथे सर्वसाधारणपणे मध्यम तीव्रतेच्या 

   भूकंपाची नोंद झालेली आहे.


■ भूमध्य सागरीय पट्टा : 


» या पट्टय़ाचा विस्तार अटलांटिक 

   महासागरातील जलमग्न पर्वतरांगेपासून 

   होऊन भूमध्य समुद्राभोवती पसरलेला 

   आहे.

एकात्मिक व संघराज्यीय प्रणाली

◆एकात्मिक प्रणाली


1. ब्रिटन

2. फ्रांस

3. जपान

4. चीन

5. इटली

6. बेल्जियम

7. नॉर्वे

8. स्वीडन

9. स्पेन


◆संघराज्यीय प्रणाली


1. अमेरिका

2. स्वित्झर्लंड

3. ऑस्ट्रेलिया

4. कॅनडा

5. रशिया

6. ब्राझील

7. अर्जेंटिना


३० जानेवारी २०२१

Online Test Series

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना



◾️भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?

- लॉर्ड हार्डींग्ज पहिला


◾️इग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत्तपत्र कोणते?

- बॉम्बे हेराॅल्ड.


◾️भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?

- मुस्लिम लीग


◾️ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?

- 1780 ची पाल्लुतुरची लढाई 


◾️भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?

- लॉर्ड कॅनिंग 


◾️ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?

- बंगाल प्रांतात


◾️1858च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?

- लॉर्ड स्टैनले


◾️1857च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये पेटली?

- 34वी एन. आय. रजिमेंट 


◾️इग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?

- कलकत्ता विद्यालय

भारत आणि शाश्वत विकास उद्दिष्टे



🌻सर्वेक्षणात नमूद केले आहे की एसडीजींना सरकारच्या धोरण, योजना आणि कार्यक्रमांमध्ये मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारताने अनेक सक्रिय पावले उचलली आहेत.


🌻कोविड -19 महामारीच्या अभूतपूर्व संकटामुळे उद्भवलेल्या आव्हानांचा उल्लेख या सर्वेक्षणात आहे. तसेच  शाश्वत विकास हा भारतीय विकास रणनीतीमधील गाभा असल्याचे यात म्हटले आहे.


🌷हवामान बदल🌷


🌻आर्थिक सर्वेक्षणानुसार भारत हा अनेक सक्रिय हवामानविषयक उपक्रम राबवित आहे.


🌻 तयात हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती योजना (एनएपीसीसी), जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियान (जेएनएनएसएम), हवामान बदल कृती योजना (सीसीएपी), हवामान बदलावरील राष्ट्रीय अनुकूलन निधी तसेच भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि उत्पादनासाठी त्वरित अंमलबजावणी यासारख्या सरकारच्या महत्वाकांक्षी उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला आहे. 


🌹शाश्वत हवामान वित्तपुरवठा


🌻समाज कल्याणकारी उद्दीष्ट साकार करण्यासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक उपक्रमांद्वारे भांडवल उभारण्यासाठी सेबीच्या नियामक तत्वाखाली भारत एक सामाजिक शेअर बाजार (एसएसई) उभारण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.


🌻या सर्वेक्षणात चीननंतर उभरत्या बाजारात भारत दुसर्‍या क्रमांकाचा हरित बॉन्ड मार्केट असल्याचे नमूद केले आहे. 2017 मध्ये, भारतातील ग्रीन बॉन्ड्सच्या चलनास पाठबळ देण्यासाठी सेबीने भारतीय शेअर बाजारात हरित बॉन्डच्या यादीसह हरित बाँडसंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केली. 24 डिसेंबर 2020 पर्यंत भारतात आठ ईएसजी म्युच्युअल फंड सुरू झाले आहेत.


🌷आतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा पुढाकार


🌻विकासाचे शाश्वत मॉडेल विकसित करण्यासाठी आणि आपत्ती निवारक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जागतिक स्तरावर भारताने घेतलेल्या पुढाकारांचा सर्वेक्षणात उल्लेख आहे.


🌻1. आंतरराष्ट्रीय सौर युती (आयएसए) ने नुकतीच जागतिक स्तरावर सौर ऊर्जा क्रांती घडवून आणण्यासाठी ‘वर्ल्ड सोलर बँक’ आणि ‘वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड इनिशिएटिव्ह’ या दोन नवीन उपक्रमांची सुरूवात केली आहे. 


🌻आयएसए सचिवालयानं नुकतीच जागतिक सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांचा समावेश असलेल्या ‘शाश्वत हवामान उपक्रमांसाठी युती’ सुरू केली आहे.


🌻 सदर देशांना कला आणि अद्ययावत सौर तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने सप्टेंबर 2020 मध्ये त्यांनी प्रथम जागतिक सौर तंत्रज्ञान परिषदेचे (डब्ल्यूएसटीएस) आयोजन केले होते.


🌻2. आपत्ती निवारण पायाभूत सुविधांसाठी युती: राष्ट्रीय सरकारद्वारे सर्वसमावेशक बहु-भागधारक व्यासपीठ म्हणून युती कार्य करते, जिथे आपत्ती निवारणाच्या पायाभूत सुविधांचे विविध पैलू जाणून घेऊन त्यांची देवाणघेवाण केली जाते.


🌷 सीडीआरआय ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्राची लवचीकता वाढविण्यावर काम करीत असून सर्व खंडातील देश आणि विविध स्तरातील विकास आणि जोखीम यात या देशांना समाविष्ट करण्यासाठी आपली सदस्यता वाढविण्याच्या विचारात आहे.


महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट



१) पहिली 

- 17 फेब्रुवारी ते 8 जून 1980 

- राज्यपाल -: सादिक अली 

- राष्ट्रपती -: नीलम संजीव रेड्डी 


२) दुसरी 

- 28 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2014

- राज्यपाल -: सी विद्यासागर राव 

- राष्ट्रपती -: प्रणव मुखर्जी 

- एकूण 32 दिवस राजवट लागू होती


3) तिसरी 

- 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 

- राज्यपाल -: भगतसिंग कोशारी 

- राष्ट्रपती -: रामनाथ कोविंद 

- एकूण 12 दिवस राजवट लागू होती 


🔰 सर्वाधिक वेळा मणिपूर मध्ये राजवट लागू 

🔰 छत्तीसगड व तेलंगणा मध्ये एकदाही लागू नाही . 


15 वा वित्त आयोग



अध्यक्ष:एन के सिंग, =  सचिव: अरविंद मेहता 

स्थापना:नोव्हेंबर 2017 =अहवाल : नोव्हेंबर 19

 


» मुख्य शिफारस - राज्यांचा वाटा 42% वरून 41 % करावा


» करातील वाट्यानुसार राज्ये 

१. उत्तरप्रदेश - 17.9%

२. बिहार 10%

३. मध्यप्रदेश 7.9

४. पश्चिम बंगाल 7.5

५. महाराष्ट्र - 6.1( 5.5 वरून 6.1) (0.6 ची वाढ झाली )


» सर्वात शेवटचे राज्य - सिक्कीम - 0.388


» करातील वाटा ठरवण्यासाठी खालील आधार ठरवण्यात आले

१. लोकसंख्या : 15%

२. क्षेत्रफळ     : 15%

३. वने आणि पर्यावरण : 10%

४. उत्पन्न तफावत : 45 %

५. लोकसंख्या कामगिरी : 12.5%

६. कर प्रयत्न : 2.5 %

राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना.



🔰समुद्रात मोठ्या प्रमाणावर असलेल्या विविध प्राण्यांचे आणि सागरी कासवांचे संवर्धन करण्याची गरज लक्षात घेऊन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्यावतीने ‘सागरी महा प्राणी संपत्ती मार्गदर्शक तत्वे’ आणि ‘राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना’ जाहीर करण्यात आली आहे.


🔴ठळक बाबी....


🔰भारताला 7500 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. समुद्रामध्ये समृद्ध जैवविविधता आहे. त्यामध्ये रंगबिरंगी मासे पासून शार्क, देवमासे, वेगवेगळ्या प्रकारची कासवे, महाकाय सस्तन प्राणी, डॉल्फिन, चमकदार प्रवाळ अशा असंख्य प्रकाराच्या सागरी प्रजाती भारतामध्ये आहेत. सागरी प्राण्यांमुळे मानवी आरोग्यासाठीही आवश्यक साधनसामुग्री मिळते.


🔰सागरी व्यापार आणि वाहतूक, अन्न, खनिज स्रोत, सांस्कृतिक परंपरा, त्याचबरोबर अध्यात्मिक मूल्ये आणि विश्वभरातल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सागरी किनाऱ्यांच्या स्रोतांवर लक्षावधी लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.


🔰भारतामध्ये सागरी अधिवासांला आर्थिक, पर्यावरणीय महत्व आणि सांस्कृतिक मूल्ये असूनही सागरातल्या महा प्राणी संपत्तीला आणि सागरी कासवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

🔰अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांच्या सहभागाबरोबरच समन्वय साधून कृती करण्याची आवश्यकता आहे. यामुळे सागरी प्रजाती आणि त्यांचा अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी मदत मिळू शकणार आहे.


🔰कती योजनेमध्ये सागरी प्राणी संपत्ती संवर्धनासाठी आंतर-क्षेत्रीय कार्यक्रमाला चालना मिळणार आहे, तसेच सागरी सस्तन प्राण्यांच्या संवर्धनातल्या समस्या सोडविण्यासाठी सरकार आणि समाज तसेच संबंधित भागधारक यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करणे शक्य होणार आहे.

भारतात ‘टिकटॉक’चा व्यवसाय बंद.


🔰चीनची बाईट डान्स ही कंपनी भारतातील टिकटॉक व हेलो उपयोजनांचा व्यवसाय बंद करणार असल्याचे सांगण्यात आले. बाईट डान्स या समाज माध्यम कंपनीच्या मालकीचे टिकटॉक हे उपयोजन असून त्यावर भारताने बंदी घातली होती, तसेच सरकारने टिकटॉक व हेलो सह ५९ उपयोजनांवर जूनमध्ये बंदी घातली होती.


🔰टिकटॉकच्या जागतिक हंगामी प्रमुख व्हॅनेसा पप्पास व जागतिक व्यवसाय प्रमुख ब्लेक चँडली यांनी संयुक्त ईमेलमध्ये ही माहिती दिली असून टिकटॉक भारतात बंद करून कमर्चारीही कमी करण्यात येतील असे म्हटले आहे. भारतात पुनरागमन केव्हा होईल हे सांगता येणार नाही, पण आम्ही नक्कीच पुन्हा भरारी घेऊन भारतात परत येऊ, असे त्यांनी म्हटले आहे.


🔰टिकटॉकच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की कंपनीने भारतात २९ जून २०२० रोजी लागू करण्यात आलेले नियम पाळण्याचे वचन दिले होते तरी उपयोजनावर बंदी घालण्यात आली. स्थानिक कायदे व नियमांचे आम्ही पालन केले होते, त्यामुळे गेल्या सहा महिन्यात आम्हाला कुठलेही स्पष्ट निर्देश सरकारकडून मिळाले नव्हते.

51 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI)



🎷51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) सांगता सोहळा  गोव्याच्या ताळीगाव येथे 24 जानेवारी 2021 रोजी पार पडला.


🎷51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 60 देशांचे 126 हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले, ज्यात 50 भारतीय प्रीमियर,  22 आशियाई प्रीमियर, 7 वर्ल्ड प्रीमिअर आणि 6 आंतरराष्ट्रीय प्रीमियर होते.


🎷माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारे चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला जातो.


🎗परस्कारांचे विजेते...


🎷डन्मार्कच्या ‘इन टू द डार्कनेस’  या चित्रपटाने प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला आहे.


🎷तवानच्या दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्या चेन-नियन को यांना त्यांच्या मँड्रिन भाषेतील चित्रपट ‘द साइलेंट फॉरेस्ट’ यासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार प्राप्त झाला आहे.सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी रौप्य मयूर पुरस्काराने तझू-चुआन लियू याला गौरविण्यात आले. प्रमाणपत्र आणि दहा लक्ष रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


🎷सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार पोलिश अभिनेत्री झोफिया स्टॅफिएज हिला ‘आय नेव्हर क्राय’ या चित्रपटातील भूमिकेसाठी प्राप्त झाला आहे.


🎷दिग्दर्शक कामिन कालेव यांना रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 15 लक्ष रुपयांचा रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विशेष उल्लेखनीय पुरस्कार भारतीय दिग्दर्शक कृपाल कलिता यांना त्यांच्या आसामी चित्रपट ‘ब्रिज’ यासाठी प्रदान करण्यात आला आहे.


🎷सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण हा पुरस्कार ब्राझीलचे दिग्दर्शक कोसिओ परेरा डॉस सॅंटोस यांना पोर्तुगिज चित्रपट ‘व्हॅलेंटिना’ यासाठी देण्यात आला आहे.

भारत-चीन तणाव दूर करण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांची रूपरेषा



🔰भारत आणि चीन यांच्यातील ताणलेले संबंध सुधारण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी आठ व्यापक तत्त्वांची आणि दोन्ही देशांनी कोणत्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे त्याची रूपरेषा मांडली. दोन्ही देश खरोखरच एकमेकांसमोर असून त्याचे परिणाम केवळ दोन देशांवरच नव्हे तर संपूर्ण जगावर होणार आहेत, असेही जयशंकर म्हणाले.


🔰पर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी घडलेल्या घडामोडींमुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले. चीनच्या भूमिकेतील बदल आणि सीमेवर सैन्याची जमवाजमव करण्यामागील कारणे याबाबत चीनने भारताकडे अद्याप विश्वासार्ह स्पष्टीकरण दिलेले नाही, असे जयशंकर यांनी एका ऑनलाइन परिषदेत सांगितले. गेल्या ५ मेपासून दोन्ही देशांचे सैन्य पूर्व लडाखमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.


🔰सीमा व्यवस्थापनाबाबत जे सर्व करार झाले आहेत त्यांचे कटाक्षाने पालन करणे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा सन्मान राखणे, सीमेवर शांतता राखणे हा सर्व प्रकारच्या संबंधांचा आधार असावा, आदी तत्त्वांचा जयशंकर यांनी मांडलेल्या आठ व्यापक तत्त्वांमध्ये समावेश आहे.


🔰तयाचप्रमाणे एकमेकांबद्दल आदर, संवेदना आणि हित या गोष्टींचे दोन्ही देशांनी पालन केले पाहिजे आणि याच तीन गोष्टी संबंध सुधारण्यास मदत करतील. उदयास येणाऱ्या शक्ती म्हणून प्रत्येकाच्या आकांक्षा आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले. चायना स्टडीजच्या १३ व्या अखिल भारतीय परिषदेत जयशंकर बोलत होते.

चित्रपटगृहे, स्विमिंग पूल जास्त क्षमतेनं वापरता येणार; केंद्रानं दिली परवानगी.



⚜️करोनाच्या संकटकाळात गर्दी टाळण्यासाठी विविध बाबींवर घालण्यात आलेले निर्बंध आता कमी केले जात आहेत. दरम्यान, यापूर्वीच चित्रपटगृह आणि जलतरण तलाव मर्यादीत स्वरुपात खुले करण्यास परवानगी देण्यात आली होती. हे आता अधिक क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून याबाबत एसओपी जाहीर करण्यात येणार आहे.


⚜️गह मंत्रालयाने नवी एसओपी जाहीर करत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले की, निरिक्षण, कंटेन्मेंट झोन आणि सुरक्षेबाबत जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हे निर्देश १ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहेत.


⚜️तयाचबरोबर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कन्टेंमेंट झोनबाहेर सर्व व्यवहारांना परवानगी असेल. सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांना राज्यांच्या एसओपींप्रमाणे परवानगी दिली जाईल.

महाराष्ट्र पोलिस भरती - Imp महत्त्वाचे प्रश्न



1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)


2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे) 


3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)


4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर :- अमित शहा (29 वे)


5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)


6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)


7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे) 


8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?

उत्तर :- शरद बोबडे (47 वे)


9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)


10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :- जनरल बिपीन रावत 


11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- अजित डोवाल


12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- दत्ता पडसलगीकर


13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर :- पियुष गोयल


14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8


15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- राजीव कुमार ( 1 सप्टेंबर 2020 )


16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- यु.पी.एस.मदान


17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर :- लेह ( लदाख )


18) प्रश्न :- भारताचे थलसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने


19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- आर.के.एस.भदौरिया


20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह

थेट द्वितीय अभियांत्रिकी प्रवेशामध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट अव्वल


कॅप राउंड टू साठी सिंहगडला २००४ विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती

शैक्षणिक वर्ष २०२१-२१ या वर्षाकरीता थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्यातील २००४ विद्यार्थ्यांनी सिंहगड इन्स्टिट्यूटला पसंती दिली असून थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशात सिंहगड इन्स्टिट्यूट अव्वल स्थान प्राप्त केले असून थेट द्वितीय अभियांत्रिकी प्रवेशात कॅप राउंड टू साठी सिंहगडला २००४ विद्यार्थ्यांची पसंती दिली आहे.

सिंहगड इन्स्टिट्यूटला राष्ट्रीय मुल्यांकन परिषद कडून नॅक "ए" ग्रेड  मिळाला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या सोयी सुविधा, गुणवत्ता पुर्ण आणि दर्जेदार शिक्षण पद्धती, शिक्षणाचा दर्जा, उच्चविद्याभूषित प्राध्यापक वृंद, प्राध्यापकांचा अनुभव व संस्थेचा भविष्यातील दृष्टीकोन, संशोधन प्रक्रिया आणि विविध राष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय नामांकीत कंपन्यात विद्यार्थ्यांची होणारी प्लेसमेंट इत्यादी गोष्टीमध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट अग्रेसर असण्याची पावती म्हणजे हा "ए" ग्रेड हे सिद्ध झाले. याचा अनुषंगाने चालू शैक्षणिक वर्षात १६५६ हून अधिक विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत नोकरी मिळाली असून यातील काही कंपनीकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १० लाख वार्षिक पगाराची नोकरी मिळाली आहे.

समाजाला आणि देशाला उपयुक्त असणारे परफेक्ट इंजिनिअर देण्याचं काम सिंहगड संस्था गेली ३० वर्षे करीत आहे. . विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता सामाजिक बांधिलकी, सामाजिक भान, राष्ट्राच्या, समाजाच्या हितासाठी, उन्नतीसाठी व प्रगती कडे घेऊन जाणारे शिक्षण सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये दिले जाते. म्हणून थेट द्वितीय अभियांत्रिकी प्रवेशामधील कॅप राउंड टू साठी सिंहगडला २००४ विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती दिली आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील ४११८ विद्यार्थ्यांनी सिंहगड इन्स्टिट्युट प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाला प्रथम पंसती दिली होती. आता सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये मोजक्याच जागा शिल्लक असून ज्या विद्यार्थ्यांना इच्छुक ठिकाणी थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेता येईल.

२९ जानेवारी २०२१

मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा किंवा…”; भाजपा नेत्याची मागणी.


🟠कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादामुळे दोन्ही राज्यांमधील नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणामध्ये वादग्रस्त भागाला केंद्रशासित घोषित करण्याची मागणी केली. त्यानंतर आता भाजपाचे नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिलीय.


🟠लक्ष्मण सवादी यांनी, “ज्या क्षेत्रावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये वाद आहे त्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. माझीही हीच मागणी आहे,” असं मत व्यक्त केलं आहे. इतकचं नाही सवादी यांनी मुंबईलाच केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणीही केलीय. “जोपर्यंत मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश केला जात नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं अशी मागणी मी केंद्र सरकारकडे करतो,” असं सवादी म्हणाले आहेत.


🟠कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केला. ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प’ पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. “मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.  “सीमाभाग हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. तुम्ही महाराष्ट्रातच आहात.


🟠कर्नाटक सरकार उर्मटपणाने एक एक पाऊल टाकत आहे. एखादं प्रकरण कोर्टात गेल्यानंतर काही करायचं नसतं, तो कोर्टाचा अपमान ठरतो. पण तरीही बेळगावचं नामांतर करण्यात आलं. त्याला उपराजधानी केली गेली. विधीमंडळाचं अधिवेशन केलं जातं. हा न्यायालयाचा अपमान नाही का?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर काही तासांमध्येच सवादी यांनी मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केलीय.

8 वर्षे जुन्या वाहनांवर ‘हरित कर’ लागू केला जाणार


▪️कद्रीय सरकार भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 8 वर्षे जुन्या वाहनांवर ‘हरित कर’ (ग्रीन टॅक्स) लागू करण्याची मंजुरी दिली.


▪️वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र देताना हा कर वसूल केला जाणार. या करामधून मिळणारा पैसा प्रदुषण नियंत्रणासाठी खर्च केला जाणार आहे.


🛑ठळक बाबी....


▪️8 वर्षे जुन्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करताना रस्ता कराच्या 10 ते 25 टक्के इतका हरित कर लागू केला जाऊ शकतो.


▪️याव्यतिरिक्त सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या वाहनांच्या अ-नोंदणीकरण आणि भंगारात काढण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांसाठी हा नियम असणार आहे.


▪️15 वर्षांनंतर नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण करताना खासगी वाहनांवर हरित कर लागू केला जाणार. मात्र सार्वजनिक वाहतूक विभागाच्या गाड्यांवर कमी हरित कर लागू केला जाणार.सरकारने जास्त प्रदूषण असेलल्या शहरांमधील वाहनांसाठी जास्त कर लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.


▪️सर्वाधिक प्रदूषित असलेल्या शहरांमध्ये नोंदणीकृत वाहनांवर सर्वाधिक करीत कर आकारला जाणार

आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखलं; ७००० किमीचं अंतर केलं पार.



🔰फरान्सकडून विकत घेतलेली अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांची तिसरी बॅच गुरुवारी भारतात दाखल झाली. नॉनस्टॉप ७००० किमीचं अंतर या विमानांनी पार केलं. दरम्यान, हवेतचं या इंधन भरण्याची कमालही या विमानांनी केली. भारतीय हवाई दलानं  माहिती दिली.


🔰फरान्सच्या इस्ट्रेस एअर बेसवरुन निघालेली ही तीन विमानांची बॅच भारतातील एअर बेसवर दाखल झाली. या विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी युएई एअर फोर्सने पाठवलेल्या इंधन टँकरसाठी भारताने ट्विटद्वारे आभार मानले.


🔰भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल विमानं विकत घेतली आहेत. यांपैकी आत्तापर्यंत भारतात तीन बॅचमध्ये एकूण ९ विमानं दाखल झाली आहेत. येत्या मार्चमध्ये तीन आणखी राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्यांत आणखी सात विमानं येतील. पाच विमानांची पहिली बॅच भारतात २८ जुलै रोजी दाखल झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल झाली होती.

Online Test Series

२८ जानेवारी २०२१

'यूपीएससी उमेदवारांना आणखी संधी नाही’


केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) कोविड १९ महासाथीच्या काळात झालेल्या परीक्षेत गेल्या वर्षी संधी हुकलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतील उमेदवारांना आणखी संधी देण्याचा कुठलाही विचार नाही, असे केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातच स्पष्ट केले.


न्या. ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील पीठास अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी सांगितले की, अशी संधी देता येणार नाही. राजू यांनी कार्मिक व प्रशिक्षण विभागाची बाजू मांडली.  राजू यांनी सांगितले की, यूपीएससीच्या उमेदवारांना आणखी संधी देण्याचा सरकारचा विचार नाही, असे संकेत कालच केंद्राने दिले आहेत, त्याबाबत आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहोत.


दरम्यान, यासंदर्भातील रचना सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर २५ जानेवारी रोजी सुनावणी करण्यात येईल असे सांगून न्यायालयाने म्हटले आहे की,  केंद्र सरकारने याबाबत विहित काळात प्रतिज्ञापत्र दाखल करून नोटिसा जारी कराव्यात.

अंतिम सामना पुढे ढकलला; नव्या तारखा जाहीर


🔰एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटचं महत्त्व कमी होऊ लागल्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये रंजकता निर्माण करण्यासाठी २०१९च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर कसोटी अजिंक्य स्पर्धा (World Test Championship) सुरू करण्यात आली. या स्पर्धेची रूपरेषा जाहीर करतानाच स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर १० ते १४ जून या दरम्यान खेळला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होते. पण ICCने आता अंतिम सामना पुढे ढकलला असून नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.


🔰ICCच्या महत्त्वाकांक्षी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या लॉर्ड्सवरच होणार आहे. पण नव्याने मिळालेल्या माहितीनुसार हा सामना १० ते १४ जूनऐवजी आता १८ ते २२ जून या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. IPL 2021 चं आयोजन एप्रिल-मे या दरम्यान केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे BCCIच्या विनंतीला मान देत ICCने अंतिम सामन्यांच्या तारखांमध्ये बदल केला असल्याची चर्चा आहे.


🔰नव्या नियमांनुसार हल्ली एका देशातून दुसऱ्या देशात क्रिकेट खेळण्यासाठी गेल्यास क्वारंटाइनचा नियम लागू होतो. ७ ते १४ असा विविध ठिकाणी हा कालावधी वेगवेगळा असतो. तसेच IPL स्पर्धेत पाकिस्तान वगळता इतर सर्व देशांचे खेळाडू खेळतात. त्यामुळे कोणतेही दोन संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पोहोचले तरी त्या संघातील खेळाडूंना क्वारंटाइन आणि सरावाला पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने अंतिम सामना पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार ICCने अंतिम सामना पुढे ढकलला आहे.

नेपाळच्या पंतप्रधानांची पक्षातून हकालपट्टी.


🔰नेपाळमध्ये पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या फुटीर गटाने रविवारी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची पक्षाच्या सर्वसाधारण सदस्यपदावरून हकालपट्टी केली असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. यापूर्वी या गटाने ओली यांना पक्षाध्यक्षपदावरून हटवले होते.

 

🔰ओली यांच्या अलीकडच्या कृतींबाबत पक्षनेतृत्वाने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते. मात्र त्यांनी स्पष्टीकरण न दिल्यामुळे माजी पंतप्रधान प्रचंड व माधवकुमार नेपाळ यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या स्थायी समितीच्या बैठकीत ओली यांना सर्वसाधारण सदस्य म्हणून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे ‘दि हिमालयन टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.


🔰परचंड यांच्या नेतृत्वाखालील गटाने पंतप्रधानांच्या बालुवाटार येथील निवासस्थानी हकालपट्टीचे पत्र नेऊन दिले. ओली हे पक्षाचे नियम मोडीत  असल्याचा आरोप आहे.

टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय.


🔰लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षानंतर भारताने घेतलेली अ‍ॅपबंदीची भूमिका अजून कठोर करण्यात आली आहे. भारताने काही चिनी अ‍ॅप्सवर तात्पुरत्या स्वरुपासाठी बंदी घातली होती. मात्र आता ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये TikTok, Baidu, WeChat, UC Browser, Club Factory, Mi Video Call (Xiaomi) आणि BIGO Live अशा अनेक मोठ्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.


🔰या अ‍ॅप्सवर केंद्र सरकारकडून याआधीच बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे. गतवर्षी जूनच्या अखेरीस केंद्र सरकारने ज्या २६७ चिनी अ‍ॅप्सवर कारवाई केली होती त्यामध्ये यांचाही समावेश होता. आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत केंद्र सरकारने चिनी अ‍ॅप्सविरोधात कारवाई केली होती. या अ‍ॅप्सकडून भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मकता तसंच सुरक्षेला धोका असल्याचं सांगण्यात आलं होतं.


🔰माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने डेटा गोळा करणं, त्याची प्रक्रिया, सुरक्षा असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यांची उत्तर देण्यात कंपन्या असमर्थ ठरल्याने कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये SHAREit, Likee, Weibo आणि शाओमीच्या Mi Community यांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

निम्म्यावर स्थलांतरितांना उत्तर प्रदेशमध्येच रोजगार.


🔰करोना काळात देशभरातून उत्तर प्रदेशमध्ये परतलेल्या ४५ लाखांहून अधिक कामगार-मजुरांपैकी निम्म्याहून अधिक जणांना उत्तर प्रदेशमधील लघु व मध्यम उद्योगांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. इतरांनाही मनरेगासह स्वयंरोजगाराच्या अन्य योजनांमध्ये रोजगार पुरविण्यात येत असल्याने आता बहुतांश स्थलांतरित  अन्य राज्यांमध्ये परतणार नाहीत, असे उत्तर प्रदेशच्या लघु व मध्यम उद्योग खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नवनीत सेहगल यांनी सांगितले.


🔰करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतरच्या तीन-चार महिन्यांच्या काळात दिल्ली, महाराष्ट्रासह देशभरातून लाखो स्थलांतरित मजूर व कामगार उत्तर प्रदेशमध्ये परतले. रस्ते व रेल्वे वाहतुकीची साधनेही उपलब्ध न झाल्याने हजारो कामगारांनी मिळेल त्या वाहनाने व पायीही प्रवास केला. तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या स्थलांतरितांना उत्तर प्रदेशमध्ये रोजगार पुरविण्यासाठी स्वतंत्र स्थलांतरित आयोग (मायग्रंट कमिशन) स्थापन करण्याची घोषणा केली होती.


🔰सथलांतरित आयोगाकडे सुमारे ४५ लाख जणांची नोंद झाली आहे. या कामगार-मजुरांचे शिक्षण, रोजगार कोणत्या स्वरूपाचा होता, त्यांच्याकडे कोणते व्यवसाय कौशल्य आहे, हे पाहून आतापर्यंत २८ लाख २८ हजार ३७६ कामगार-मजुरांना येथील लघु-मध्यम स्वरूपाच्या सुमारे ११ लाख ५० हजार उद्योगांमध्ये रोजगार देण्यात आला आहे.


🔰समारे चार लाख जणांना शासकीय आस्थापनांशी निगडित रोजगार देण्यात आला आहे. मनरेगा, मुद्रा बँक योजनेसह स्वयंरोजगार यांच्या योजनांचाही लाभ अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे आता हे स्थलांतरित कामगार उत्तर प्रदेशमध्येच राहतील, असे अपेक्षित असल्याचे सेहगल यांनी सांगितले.

राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१ विजेते


👤 अमेय एल : आंध्रप्रदेश : कला 

👤 वयोम आहुजा : उत्तरप्रदेश : कला 

👤 हरुदय आर के : केरळ : कला 

👤 अनुराग रामोला : उत्तराखंड : कला 

👤 तनुज समादार : आसाम : कला 

👤 वनिश केईशम : मणिपूर : कला 

👤 सौहारद्य डे : पश्चिम बंगाल : कला 

👤 जयोती कुमारी : बिहार : साहस 

👤 कवर दिव्यांश : उत्तरप्रदेश : साहस 

👤 कामेश्वर वाघमारे : महाराष्ट्र : साहस 

👤 राकेश के : कर्नाटक : इनोव्हेशन

👤 शरीनभ अग्रवाल : महाराष्ट्र : इनोव्हेशन

👤 वीर कश्यप : कर्नाटक : इनोव्हेशन

👤 नम्या जोशी : पंजाब : इनोव्हेशन

👤 अर्चित पाटील : महाराष्ट्र : इनोव्हेशन

👤 आयुष रंजन : सिक्कीम : इनोव्हेशन

👤 सी हेमेश : तेलंगणा : इनोव्हेशन

👤 चिराग भंसाली : उत्तरप्रदेश : इनोव्हेशन

👤 हरमनज्योत सिंह : जम्मु व कश्मीर : इनोव्हेशन

👤 मो. शादाब : उत्तरप्रदेश : विद्वान

👤 आनंद : राजस्थान : विद्वान

👤 ए एस प्रधान : ओडिशा : विद्वान

👤 अनुज जैन : मध्यप्रदेश : विद्वान

👤 सोनित सिसोलेकर : महाराष्ट्र : विद्वान

👤 परसिद्धी सिंह : तमिळनाडू : सामाजिक काम 

👤 सविता कुमारी : झारखंड : खेळ 

👤 अर्शिया दास : त्रिपुरा : खेळ

👤 पलक शर्मा : मध्यप्रदेश : खेळ

👤 मो. रफी : उत्तरप्रदेश : खेळ

👤 काम्या कार्तिकेयन : महाराष्ट्र : खेळ 

👤 खशी पटेल : गुजरात : खेळ

👤 मत्र हरखानी : गुजरात : खेळ .

भारतानं अमेरिका, युके, फ्रान्सलाही टाकलं मागं; पहिल्या दिवशी सर्वाधिक लोकांना दिली लस



जगातील सर्वात मोठ्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला कालपासून भारतात सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी भारतात सर्वाधिक लोकांना लस देण्यात आली. यामध्ये अमेरिका, युके, फ्रान्सलाही भारतानं मागे टाकलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली.


आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लसीकरणाच्या पहिल्या दिवशी भारतात एकूण २,०७,२२९ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. दिवसभरात सर्वाधिक लोकांना लस दिल्याचा हा जागतिक विक्रम ठरला आहे.


 अमेरिका, युके आणि फ्रान्स या आघाडीच्या देशांनाही भारतानं यामध्ये मागे टाकलं आहे.

आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी लसीकरणाची माहिती देताना सांगितलं की, देशात लसीकरणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी केवळ सहा राज्यांनीच लसीकरण सेशन केले. 


आज झालेल्या एकूण ५५३ सेशनमध्ये १७,०७२ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. त्यामुळे काल आणि आज अशा दोन दिवसांत एकूण २,२४,३०१ लोकांना भारतात लस देण्यात आली आहे. या दोन्ही दिवसांमध्ये लसीकरणानंतर ४४७ जणांमध्ये प्रतिकूल परिणाम दिसून आले यांपैकी केवळ तीन जणांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली.

सृष्टी गोस्वामी एका दिवसासाठी बनली मुख्यमंत्री; सरकारी योजनांचा घेतला आढावा.



✴️राष्ट्रीय बालिका दिना निमित्त आज(रविवार) हरिद्वार येथील सृष्टी गोस्वामी हिला उत्तराखंडचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली होती. यावेळी, सृष्टीने राज्य सरकारकडून राबवल्या जात असलेल्या विविध योजानांचा अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला.


✴️दशभरात महिला व बालविकास मंत्रालयाच्या पुढाकाराने दरवर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.


✴️हरिद्वार जिल्ह्यातील बहादराबाद विकासखंडच्या दौलतपुर गावातील असलेली सृष्टी गोस्वामी २०१८ मध्ये बाल विधानसभेत बाल आमदार म्हणून देखील गेलेली आहे. तसेच, २०१९ मध्ये सृष्टीने गर्ल्स इंटरनॅशनल लीडरशीपसाठी थायलंडमध्ये भारताचे नेतृत्व देखील केलेले आहे. मागील दोन वर्षांपासून सृष्टी ‘आरंभ’ ही योजना चालवत आहे. यामध्ये परिसरातील गरीब मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं व त्यांना मोफत पाठ्यपुस्तक पुरवण्याचं काम केलं जातं.


✴️सष्टी रुडकी येथील बीएसएम पीजी महाविद्यालयाची बीएससी अॅग्रीकल्चरची विद्यार्थीनी आहे. तिचे वडील प्रवीण पुरी हे गावात किराणा दुकान चालवतात. तर आई सुधा गोस्वामी या अंगणवाडी कार्यकर्ता आहेत. छोटा भाऊ श्रेष्ठ पुरू इयत्ता अकारावीचा विद्यार्थी आहे. सृष्टीचा सर्व गावाला अभिमान आहे, असं तिच्या वडिलांना म्हटलं आहे.

प्रमुख पुरस्कार आणि सम्मान 2019-20



एशिया गेम चेंजर अवार्ड 2020- शेफ विकास खन्ना


लोकमान्य टिळक नेशनल अवार्ड 2020- सोनम वांगचुक


पी.सी.महालनोबिस पुरस्कार 2020- सी.रंगराजन


डॉ. एम. एस. स्वामीनाथन पुरस्कार 2020- वी.प्रवीण.राव


गुलबेंकियन पुरस्कार 2020- ग्रेटा थेंबर्ग


एबल पुरस्कार 2020- हिलेल फुरस्तेनबर्ग


डैन डेविड पुरस्कार 2020- गीता सेन


टायलर पुरस्कार 2020- पवन सुखदेव


इंदिरा गांधी पुरस्कार 2020- आर. रामानुजम


क्रिस्टल अवार्ड 2020- दीपिका पादुकोण


संगीत कलानिधि पुरस्कार 2019- एस. सौम्या


एकलव्य पुरस्कार 2019- जिह्ला दलबेहेरा


प्रितज़कर अवार्ड 2019- अराटा इसोजोकी


विश्व खाद्य पुरस्कार 2019- साइन एन ग्रूट


डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम अवार्ड 2019- के. शिवन


व्यास सम्मान 2019- नासिरा शर्मा(कागज़ के नाव)


सरस्वती सम्मान 2019- वासदेव मोही


मूर्ति देवी पुरस्कार 2019- विश्वनाथ तिवारी


ज्ञानपीठ पुरस्कार 2019- अच्युतन नंबूदरी 


रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार 2020- जावेद अख्तर


मैडल ऑफ द आर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया -शोभा शेखर


हीरो टू एनिमल्स(पेटा)- नवीन पटनायक


सेंट्रल बैंकर ऑफ द ईयर- शक्तिकांत दास


आर्डर ऑफ राइजिंग सन- थांगजाम धबली सिंह


संयुक्त राष्ट्र सैन्य जेंडर एडवोकेट ऑफ द ईयर-मेजर सुमन गवानी


युगांडा का सर्वोच्च नागरिक सम्मान-राजेश चपलोत


वैश्विक मानवतावादी पुरस्कार-सचिन अवस्थी

पश्चिम बंगालमध्ये वारसास्पर्धा.



📋पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा वारसा सांगण्यासाठी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये शनिवारी ‘वारसास्पर्धे’ला तोंड फुटले. तृणमूलने नेताजींच्या १२५व्या जंयतीनिमित्त त्यांचा जन्मदिवस ‘देशनायक दिवस’ जाहीर केला, तर केंद्र सरकारने ‘पराक्रम दिन’ म्हणून घोषित केला.


📋तणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सकाळी कोलकात्यात मोठी मिरवणूक काढून नेताजींची जयंती साजरी केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘पराक्रम दिना’च्या कार्यक्रमात सहभागी झाले. नेताजींच्या जयंतीनिमित्त तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राज्यभर अनेक कार्यक्रम आयोजित करून परस्परांशी जणू स्पर्धाच केली.


📋तणमूल आणि भाजप यांच्यातील निवडणूकपूर्व राजकीय संघर्ष आजपर्यंत रस्त्यावर होत होता. परंतु शनिवारी नेताजींच्या १२५व्या जंयतीनिमित्त कोलकाता येथील व्हिक्टोरिया स्मारकात झालेल्या सरकारी कार्यक्रमातही निवडणुकीच्या राजकारणाने शिरकाव केल्याचा प्रत्यय आला.  या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकाच व्यासपीठावर होते.


📋ममता भाषणासाठी उभ्या राहताच श्रोत्यांमधील भाजप समर्थकांनी जय श्रीराम घोष सुरू केला. त्यामुळे ममता यांनी भाषण करण्यास नकार दिला आणि अशा प्रकारचा अपमान अस्वीकारार्ह आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा सरकारी कार्यक्रम आहे, राजकीय नाही. निमंत्रित केल्यानंतर मान राखला पाहिजे. निमंत्रित करून कोणीही अपमानित करीत नाही, अशा शब्दांत ममता यांनी संताप व्यक्त केला.

Online Test Series

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 नियोजित वेळापत्रकानुसार अवघ्या दीड महिन्यावर येवून ठेपली आहे.



या कालावधीचे नियोजन कसे  करावे? असा प्रश्नांसाठी आपुलकीचा सल्ला :


1. शेवटच्या दीड महिन्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे Revision. तुमचे राहिलेले महत्वाचे टॉपिक या आठवड्यात संपवून घ्या. 

जे आधीच वाचले आहे, underline करून ठेवले आहे, short notes मध्ये लिहून ठेवले आहे. त्याची व्यवस्थित उजळणी करा. 


बर्‍याचदा टेस्ट सिरीज मध्ये 2 पैकी एक पर्याय confuse होवून उत्तर चुकत असते, revision कमी पडल्याने असे प्रकार होतात. हे टाळण्यासाठी उजळणी करायलाच हवी.. मागील राज्यसेवा पेपर सोडवायलाच हवे. 


2. सोबतच, रोज काही तास csat ला द्या. Csat मधील passages सोडविण्यासाठी किती वेळ लागतो, कोणत्या प्रकाराचा passage अवघड जातोय, कोणते passage शेवटी सोडवायला हवे? Reasoning चे कुठले जास्त वेळ घेतात? याचे विश्लेषण करा. 


3. Current affairs करताना फार वाहवत जाऊ नका, दिवसभर इतर अभ्यास करून झाल्यानंतर या भागाला वेळ द्या. मागील papers पाहून चर्चेतील व्यक्ति, दिवंगत व्यक्ती , isro च्या achievements असे जे जे topics महत्वाचे वाटतात, त्यांची लिस्ट तयार करून त्यांचे revision करा.. 


विनाकारण खूप सारे facts, current issues यात वाहवत जावू नका. त्याऐवजी तेवढाच वेळ polity, geography, science ला दिलात तर खूप output येईल.. 


4. पुरेशी झोप घ्या. जागरण टाळा. परीक्षेच्या शेड्यूल सोबत मॅच व्हा. 

(रात्री 10 ते सकाळी 6-7 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा, 

किमान 7 तास झोप घ्या )

 ( दुपारची झोप (विशेषतः पुण्यातील उमेदवारांनी) बंद करून दुपारी csat प्रॅक्टिस करा. कारण आपला csat paper दुपारी असणार, आणि झोप येत असल्यास आकलन, आकडेमोड याला लागणारा वेळ वाढेल).. आणि जागरण करून अभ्यास करायला ही काही बोर्ड परीक्षा नाही, तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास आठवायला, लॉजिक लावायला मन:स्थिती चांगली असणे आवश्यक आहे.


5. एक-दीड महिना शिल्लक असल्याने या स्टेजला टेंशन येणे, हे नॉर्मल आहे. पास होण्याची इच्छा बाळगून अभ्यास करण्याऱ्या जवळपास सर्वांनाच याकाळात टेंशन येत. टेंशन आल म्हणुन जागरण न करता, पास होईल की नाही याचा विचार करत वेळ न घालवता, दिवसभराचा वेळ व्यवस्थित वापरून अभ्यास करावा.. 


6. आणि, वाचलेल्या सगळ्या गोष्टी लक्ष्यात रहाव्यात, पाहिजे तेव्हा आठवाव्या, असे काही नाही. आपली परीक्षा Objective आहे, तिथे चारपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. बर्‍याच वेळी पर्याय पाहिले की उत्तर आठवते.. विनाकारण facts आठवण्याचा प्रयत्न केला तरी टेंशन येत असते.. 


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष (२००६ ते २०२१)



🔰 ७९वे : २००६ : सोलापूर : मारुती चितमपल्ली

🔰 ८०वे : २००७ : नागपूर : अरुण साधू

🔰 ८१वे : २००८ : सांगली : म.द. हातकणंगलेकर

🔰 ८२वे : २००९ : महाबळेश्वर : आनंद यादव

🔰 ८३वे : २०१० : पुणे : द.भि.कुलकर्णी

🔰 ८४वे : २०११ : ठाणे : उत्तम कांबळे

🔰 ८५वे : २०१२ : चंद्रपूर : व.आ. डहाके

🔰 ८६वे : २०१३ : चिपळूण : ना कोत्तापल्ले

🔰 ८७वे : २०१४ : सासवड : फ. मुं. शिंदे

🔰 ८८वे : २०१५ : घुमान (पंजाब) : स मोरे

🔰 ८९वे : २०१६ : पिंपरी-चिंचवड : श्री. सबनीस

🔰 ९०वे : २०१७ : डोंबिवली : अ. काळे

🔰 ९१वे : २०१८ : बडोदे : लक्ष्मीकांत देशमुख

🔰 ९२वे : २०१९ : यवतमाळ : अरुणा ढेरे

🔰 ९३वे : २०२० : उ.बाद : फादर फ्रा. दिब्रिटो

🔰 ९४वे : २०२१ : नाशिक : जयंत नारळीकर .

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे



प्रश्न१५१) कोणती व्यक्ती राष्ट्रीय स्टार्टअप सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहे?

उत्तर :- पियुष गोयल


प्रश्न१५२)  कोणती बँक “टू बिग टू फेल” यादीत समाविष्ट करण्यात आली आहे?

उत्तर :- भारतीय स्टेट बँक,आयसीआयसीआय बँक,एचडीएफसी बँक


प्रश्न१५३) कोणत्या राज्याने नीती आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ मधील मोठ्या राज्यांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे?

उत्तर :- कर्नाटक


प्रश्न१५४) कोणत्या व्यक्तीची किर्गिजस्तान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली?

उत्तर :- सादीर झापारोव्ह


प्रश्न१५५) कोणत्या दिवशी भारतीय सशस्त्र दलांचा ‘माजी सैनिक दिन’ साजरा करतात?

उत्तर :-  14 जानेवारी


प्रश्न१५६) कोणत्या मंत्रालयाने पाचव्या राष्ट्रीय कायाकल्प पुरस्कारांची घोषणा केली?

उत्तर :- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय


प्रश्न१५७) कोणती व्यक्ती डिजिटल कर्ज सेवांचे नियमन करण्यासाठी RBIने नेमलेल्या कार्य गटाचे अध्यक्ष आहे?

उत्तर :- सौरव सिन्हा


प्रश्न१५८) कोणत्या संस्थेने ‘तेजस’ नामक हलके लढाऊ विमान तयार केले?

उत्तर :- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड


प्रश्न१५९) कोणत्या देशात “विलियूचिन्स्की धबधबा” आहे?

उत्तर :- रशिया


प्रश्न१६०) कोणत्या काळात ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना 2021’ पाळला गेला?

उत्तर :- 18 जानेवारी - 17 फेब्रुवारी

पद्म पुरस्कार - 2021 (महाराष्ट्र विशेष)


 


• प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सात जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत.

• महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील पाच जण पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 

• परशुराम आत्माराम गंगावणे (कला), नामदेव सी. कांबळे (साहित्य आणि शिक्षण), गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य), जसवंतीबेन जमनादास पोपट (उद्योग आणि व्यापार) आणि सिंधुताई सपकाळ (सामाजिक कार्य)


परशुराम आत्माराम गंगावणे

• कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्रातील परशुराम गंगावणे यांना जाहीर झाला आहे. 

• परशुराम गंगावणे गेल्या 45 वर्षांपासून आदिवासी पारंपरिक लोककला जतन आणि प्रसार करण्याचे काम करत आहेत. 

• आव्हानात्मक परिस्थितीतही त्यांनी ही लोककला जोपासली असल्याने त्यांचे कार्य विशेष ठरले.

• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात पिंगुळी गावात परशुराम गंगावणे यांनी कळसूत्री बाहुल्यांची कला जोपसली आहे. कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी अनेक लोककथा सादर केल्या आहेत.

• आदिवासी कलेचा हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी परशुराम गंगावणे यांनी गुरे आणि गोठा विकून त्याठिकाणी लोककलेचे संग्रहालय बनवले आहे. 

• त्यांनी कलाआंगण चॅरिटेबल ट्रस्टही सुरू केले आहे या संग्रहालयात पपेट, चित्रकथा, कळसूत्री पहायला मिळतात.


सिंधुताई सपकाळ

• सिंधुताई सपकाळ यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी 'ममता बाल सदन' नावाची संस्था स्थापन केली. 

• अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या 'अनाथांची माय' म्हणून परिचित झाल्या.

• सिंधुताई सपकाळ या गेली 40 वर्षे सामाजिक कार्य करत आहेत. 

• त्यांना आजवर 750 हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई नेहमी अभिमानाने सांगतात की, मी हजारहून अधिक मुलांची आई आहे.


नामदेव कांबळे

• गावकुसाबाहेरील स्त्रियांच्या वेदना मांडणारे विदर्भातील लेखक नामदेव कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. 

• 'राघववेळ' या कांदबरीसाठी 1995 साली साहित्य अकदमीच्या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

• वाशीममधील शिरपूर गावात शेतमजूर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वाशीम येथील राणी लक्ष्मीबाई शाळेत ते शिक्षक होते. याच शाळेत त्यांनी सुरुवातीला सुरक्षारक्षकाचीही नोकरी केली.

• अस्पर्श,राघववेळ, ऊनसावली, साजरंग अशा आठ कांदबऱ्या, चार कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, चरित्र लेखन, भाषण संग्रह असे साहित्य त्यांच्या नावावर आहे.

• डॉ.बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले आहे. बालभारतीच्या अध्यक्षपदीही त्यांनी काम केले आहे.


गिरीश प्रभुणे

• सामाजिक कार्य क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार गिरीश प्रभुणे यांना जाहीर झाला आहे. उपेक्षित, वंचित घटकातील लोकांसाठी, भटक्या-विमुक्त समाजासाठी त्यांनी काम केले.

• 'भटके-विमुक्त समाज परिषदे'च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यरत आहेत. तुळजापूरजवळील वैदू, कैकाडी, पारधी समाजातील मुलांसाठी त्यांनी काम केले. 

• चिंचडवड येथील 'पुनरुत्थान समरसता गुरुकुलम'मधील भटक्या समाजातील मुला-मुलींच्या शिक्षण आणि कौशल्यविकासासाठी त्यांनी कार्य केले.

• पारधी समाजासाठी, त्यांच्या प्रश्नांवर, त्यांच्या जीवनावर आधारित त्यांनी लेखन केले. 

• 'पारधी' पुस्तकाचे ते लेखक आहेत.


जसवंतीबेन जमनादास पोपट

• व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील कार्यासाठीचा पद्मश्री पुरस्कार जसवंतीबेन जमनादास पोपट यांना जाहीर झाला. 

• सुप्रसिद्ध लिज्जत पापड उद्योगाच्या त्या संस्थापिका आहेत.

• 80 रुपये उधारीवर जसवंतीबेन यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायाची उलाढाल शेकडो कोटींची असून 42 हजार महिला कर्मचारी येथे काम करतात.

• मुंबईत गिरगाव परिसरात राहणाऱ्या जसवंतीबेन आणि त्यांच्या सात मैत्रीणींच्या पुढाकाराने हा उद्योग 1965 साली सुरू झाला. 

• आपल्या घराला हातभार म्हणून महिलांनी हे काम सुरू केले आणि बघता बघता लिज्जत पापड घराघरात पोहचला.


भारताचा महान्यायवादी (Attorney General of India)


संविधानात “भाग 5 मधील प्रकरण 1 अंतर्गत कलम 76 मध्ये” महान्यायवादी पदाची तरतुद करण्यात आली आहे. 


महत्वाचे म्हणजे घटनेतील “कलम 88 आणि 105” ही देखील या पदाशी संबंधित कलमे आहेत..


कलम 88 नुसार, महान्यायवादी यांना सभागृहातील हक्क दिले आहेत. यानुसार भारताच्या महान्यायवादीस, संसदेच्या कोणत्याही सभागृहात, सभागृहाच्या कोणत्याही संयुक्त बैठकीत आणि संसदेच्या ज्या समितीत त्याचे नाव सदस्य म्हणून घातलेले असेल अशा कोणत्याही समितीत, भाषण करण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल, पण या कलमाच्या  आधारे त्याला मतदान करण्याचा हक्क असणार नाही.


कलम 105 नुसार, महान्यायवादी यांना संसदेची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार, इत्यादी दिले आहेत.


कलम 76 च्या व्यतिरिक्त जी दोन कलमे आहेत ती लक्षात असुद्या..

कोसी नदी



बिहार राज्याची अश्रूंची नदी. मुख्य प्रवाहाची लांबी सु. ५९० किमी. ही पूर्व नेपाळच्या हिमालय प्रदेशात उगम पावते. तिचा एक शीर्षप्रवाह तर तिबेटातून येतो. उंच पर्वतांवरून येणाऱ्या सात प्रवाहांनी ती बनलेली असल्यामुळे तिला सप्त कोसी व त्या प्रदेशाला सप्तकोसिकी म्हणतात. मुख्य प्रवाह सुन कोसी हा आहे. गाधीच्या कुशिक राजाची मुलगी कौशिकी हिने पुत्रप्राप्तीनंतर नदीचे रूप घेतले. तीच कोसी नदी अशी आख्यायिका आहे. सु. ९६ किमी. दक्षिण व

नैर्ऋत्य दिशांनी वाहिल्यावर सुन कोसी पूर्व व आग्नेय दिशांस २९६ किमी. वाहते. तिला मग उत्तरेकडून अरुण व  पूर्वेकडून तांबर नद्या मिळाल्यावर ती दक्षिणाभिमुख होते. भारत-नेपाळ सीमेच्या उत्तरेस ४८ किमी. छतरा येथे ती खडकाळ, अरुंद निदरीतून सपाटीवर येते.


येथपर्यंतचा तिचा प्रवाह लहानमोठे धबधबे, द्रुतवाह इत्यादींनी युक्त असून मौंट एव्हरेस्टच्या पश्चिमेस गोसाइंतान व पूर्वेस कांचनजंघा यांमधील सु. ६२,४०० चौ. किमी. पर्वतप्रदेशातील पावसाच्या व वितळलेल्या बर्फाच्या पुराचे पाणी ती आपल्या वेगवान प्रवाहाने घेऊन येते.

रॉबर्ट ओएन (१७७१-१८५८) हा आधुनिक सहकारी चळवळीचा जनक होय.

वयाच्या एकविसाव्या वर्षी स्कॉटलंडमधील गिरणीत तो भागीदार बनला. न्यू लानार्क येथे त्याचा कारखाना होता.


🩸 तथे त्याने कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी सहकारी पद्धतीचा अयशस्वी प्रयत्न  केला. पुढे अमेरिकेतील इंडियाना येथे त्याने ‘ न्यू हार्मनी कॉलनी ’ ही सहकारी वसाहत स्थापन केली.


🩸 गरेट ब्रिटनमधील रॉचडेल या सुती कापड गिरण्यांच्या छोटया गावातील २८ कामगारांनी २१ डिसेंबर १८४४ रोजी इक्विटेबल पायोनिअर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी नावाच्या सहकारी भांडाराची स्थापना केली. त्यांनी स्वीकारलेली तत्त्वे सहकार चळवळीला मार्गदर्शक ठरली. 


🩸सभासदत्व सर्वांना खुले असावे, प्रत्येकाला एकच मत असावे, भांडवलावर ठराविक व्याज दिले जावे, सर्व खर्च वजा जाता शिल्ल्क राहिल्यास ती सभासदांमध्ये खरेदीच्या प्रमाणात वाटून दयावी, सर्व व्यवहार रोखीने व्हावा, माल शुद्ध व निर्भेळ दिला जावा, वजने-मापे यांत गडबड  होऊ नये, राजकारण व धर्म यांबाबत सोसायटीची तटस्थतेची भूमिका असावी, ही तत्त्चे पुढे बहुतेकांनी स्वीकारली. सहकाराच्या कल्पनेला व्यावहारिक व व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले. 


🩸वयवसाय संघटनेचा एक नवीन प्रकार म्हणून सहकारी संस्थांचा उपयोग पहिल्यांदा इंग्लंडमध्ये झाला.

एकाचवेळी १४३ उपग्रहांचे प्रक्षेपण; Elon Musk यांच्या कंपनीकडून नवा विक्रम



🔰जागतिक स्तरावर आरामदायी वाहन निर्मितीत आघाडीवर असणाऱ्या 'टेस्ला' या कंपनीचे सर्वेसर्वा असणाऱ्या Elon Musk यांच्या एका वेगळ्या कंपनीने एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम आधी भारताच्या नावावर होता. 


🔰Elon Musk यांच्या 'स्पेसएक्स' या कंपनीकडून अंतराळात एकाच वेळी १४३ उपग्रह यशस्वीरित्या सोडण्यात आले आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये भारताने एकाचवेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम केला होता. भारताच्या या विक्रमाला मागे टाकत स्पेसएक्स यांनी तब्बल १४३ उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले आहेत. यामुळे स्पेस एक्सने नवीन जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. 


🔰सर्व १४३ उपग्रह 'फाल्कन ९'मधून प्रक्षेपित करण्यात आले. फ्लोरिडा येथील कॅप केनेवरल येथून भारतीय वेळेनुसार, रविवारी रात्री ०८ वाजून ३१ मिनिटांनी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात हे उपग्रह सोडण्यात येणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला.  Elon Musk यांची कंपनी उपग्रह सोडण्यासाठी तब्बल १० लाख डॉलर घेते, अशी माहिती मिळाली आहे. 


🔰अतराळात उपग्रह सोडण्याचे स्वप्न घेऊन Elon Musk वयाच्या ३० व्या वर्षी रशियात पोहोचले. मात्र, दोनवेळा प्रयत्न करूनही रशियाने उपग्रह देण्यास नकार दिला. यानंतर Elon Musk यांनी स्वतःच उपग्रह निर्मितीचा चंग बांधला आणि स्पेसएक्स या कंपनीची स्थापना केली. या प्रवासात Elon Musk यांनी अनेक आव्हाने, संकटे आणि अडचणींचा सामना केला. मात्र, अखेर Elon Musk यांनी आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवले, असे सांगितले जाते. आताच्या घडीला Elon Musk जागतिक स्तरावरील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये आघाडीवर आहेत.

२७ जानेवारी २०२१

Online Test Series

नोबेल पुरस्कार २०२० विजेते

🏆 वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२०
👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका)
👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन)
👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका)

🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०
👤 १) रॉजर पेनरोज (ब्रिटन)
👤 २) रेनहार्ड गेंजेल (जर्मनी)
🙎‍♀ ३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)

🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०
🙎‍♀ १) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)
🙎‍♀ २) जेनफिर डाउडना (अमेरिका)

🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२०
🙎‍♀ १) लुईस ग्लुक ( अमेरिका )

🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०२०
🌾 १) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम

🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०
👤 १) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)
👤 २) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)

आयपीएल’चा लिलाव १८ फेब्रुवारीला

🖱इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या हंगामासाठीची लिलाव प्रक्रिया १८ फेब्रुवारीला होण्याची दाट शक्यता असून, ठिकाण मात्र अद्याप निश्चित झालेले नाही, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली.

🖱‘आयपीएल’चा आगामी हंगाम भारतात होणार की परदेशात हेसुद्धा अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली मात्र हंगाम होण्याबाबत आशावादी आहे. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर २०२०चा ‘आयपीएल’ हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीत झाला होता.

🖱पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकांद्वारे देशात ‘आयपीएल’ होण्याबाबतची स्पष्टता येऊ शकेल. तसेच ४ फेब्रुवारीपर्यंत संघांसाठी खेळाडू स्थलांतरण व्यवहार प्रक्रिया सुरू राहील.

11 वा राष्ट्रीय मतदार दिन देशभरात साजरा

निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार कार्ड, वेब रेडीओचे केले उद्‌घाटन

👉25 जानेवारी 2021 रोजी नवी दिल्ली येथे आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थित 11 वा राष्ट्रीय मतदार दिन देशभरात साजरा करण्यात आला.
👉केंद्रीय कायदा आणि न्याय, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.
👉यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त सुशील चंद्र, राजीव कुमार, सरचिटणीस उमेश सिन्हा यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
👉यावर्षी, कोविड-19 मुळे, देशभरातील एनव्हीडी उत्सव हा प्रत्यक्ष आणि आभासी दोन्ही पद्धतीने साजरा केला जात आहे.

👉‘आपले मतदार सक्षम, जागरुक, सुरक्षित आणि माहितीपूर्ण बनविणे’ ही NVD 2021 ची संकल्पना आहे.

कोविड-सुरक्षित निवडणुका आयोजित करण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या (ईसीआय) वचनबद्धतेचा तसेच प्रत्येक मतदाराला माहितीपूर्ण, नैतिक आणि जागरूक करण्याचा हा पुनरुच्चार आहे.

👉आज दोन अनोखे डिजिटल उपक्रम सुरु करण्यात आले. आयोग डिजिटल मतदार ओळखपत्रे किंवा ई-ईपीआयसी सुरु करत आहे, यामध्ये मतदाता हेल्पलाइन मोबाइल ॲप , मतदार पोर्टल (www.voterportal.eci.gov.in) किंवा राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (www.nvsp.in/) वरून लॉग इन केल्यानंतर मोबाइल फोनवर किंवा संगणकावर स्व-मुद्रणयोग्य स्वरुपात डाउनलोड करू शकतो.

👉राष्ट्रपतींनी आज ‘रेडिओ हॅलो वोटर्स’ ही एक 24x7 ऑनलाईन डिजिटल रेडिओ सेवा देखील सुरू केली, जी भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर मतदार जागरूकता कार्यक्रम प्रसारित करेल.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...