२७ जानेवारी २०२१

केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली.

◾️प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, सोमवारी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली.

◾️ महाराष्ट्रातील सहा जणांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

                       🔴 पद्मश्री 🔴

🔹 सिंधूताई सपकाळ (सामाजिक कार्य)
🔹 गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य)
🔹 नामदेव कांबळे (साहित्य)
🔹 परशूराम गंगावणे (साहित्य)
🔹 जसवंती बेन जमनादास पोपट (उद्योग)
🔹 रजनीकांत श्रॉफ

                     🔴 पद्मभूषण 🔴

🔹 सुमित्रा महाजन (माजी लोकसभा सभापती)
🔹 रामविलास पासवान (दिवंगत नेते, लोक जनशक्ती पक्ष)
🔹 तरुण गोगोई (दिवंगत नेते, आसामचे माजी मुख्यमंत्री)
🔹 कल्बे सादिक (दिवंगत मुस्लिम नेते)

                   🔴 पद्मविभूषण 🔴

🔹 शिंजो आबे (जपानचे माजी पंतप्रधान)
🔹 एस. पी. बालसुब्रमण्यम (दिवंगत, गायक-संगीतकार)
🔹 सुदर्शन साहो (सँड आर्टिस्ट)
🔹 बी. बी. लाल (पुरातत्वशास्त्रज्ञ)

 ◾️ या यादीत २९ महिलांचा समावेश आहे.

◾️ १६ जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

--------------------------------------------------------------------

गूगलचा ऑस्ट्रेलियाला ‘सेवा बंद’चा इशारा

🔰ऑस्ट्रेलिया सरकारने वृत्तसेवेसाठी शुल्क आकारण्याच्या योजनेची अंमलबजावणी करावयाचे ठरविल्यास त्या देशातील सर्च इंजिनची सेवा खंडित केली जाईल, असा इशारा शुक्रवारी गूगलने दिला.

🔰ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्वरेने गूगलला फटकारताना स्पष्ट केले की, आम्ही इशाऱ्यांना भीक घालत नाही, तुम्ही ऑस्ट्रेलियात काय करू शकता याची नियमावली आम्हीच तयार करतो, असे मॉरिसन यांनी ब्रिस्बेन येथे वार्ताहरांना सांगितले. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत निर्णय घेण्यात आला आहे, आमच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे, ऑस्ट्रेलियात तशाच पद्धतीने काम होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

🔰नवी नियमावली अयोग्य असल्याचे गूगल ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे व्यवस्थापकीय संचालक मेल सिल्व्हा यांनी सिनेट चौकशी समितीसमोर सांगितल्यानंतर मॉरिसन यांनी वरील बाब स्पष्ट केली.

केंद्रीय अर्थसंकल्प यंदा कागदमुक्त

🔰 मोबाइल अ‍ॅपद्वारे खासदार, नागरिकांना दस्तावेज 🔰

🔶अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजाच्या संकलनाची सुरुवात ज्या कार्यक्रमाद्वारे केली जाते त्या प्रतीकात्मक ‘हलवा समारंभा’त  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर सहभागी झाले होते.

🔶यंदा करोना निर्बंधांमुळे अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजाची छपाई केली जाणार नसून खासदारांना त्याचे इलेक्ट्रॉनिक वितरण करण्यात येणार आहे. यापूर्वी हलवा कार्यक्रमाने अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात केली जात होती.

🔶स्वातंत्र्यानंतर यंदा प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्पातील मिळकत आणि खर्च याबाबतचे दस्तऐवज, त्याचबरोबर वित्त विधेयक, नव्या करांबाबतचा सविस्तर तपशील आणि नव्या आर्थिक वर्षासाठीच्या अन्य उपाययोजनांबाबतच्या दस्तऐवजाची छपाई करण्यात येणार नाही.

🔶केंद्रीय अर्थसंकल्प (२०२१-२२) यंदा प्रथमच कागदविरहित पद्धतीने सादर केला जाणार आहे. संसदेत १ फेब्रुवारी २०२१ रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. खासदारांना आणि जनतेला अर्थसंकल्पाचा दस्तऐवज सहज उपलब्ध व्हावा यासाठी अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल-अ‍ॅपसेवा सुरू केली आहे.

पद्म पुरस्कार जाहीर - 2021

1. पद्मविभूषण -7 जणांना जाहीर
2. पद्मभूषण - 10 जणांना जाहीर
3. पद्मश्री - 102 जणांना जाहीर

एकूण पद्म पुरस्कार - 119 जणांना जाहीर

🏆 महाराष्ट्रातील रजनीकांत देविदास श्रॉफ यांना - पद्मभूषण जाहीर

🏆 महाराष्ट्रातील 5 जणांना पद्मश्री जाहीर 🏆

1. सिंधुताई सपकाळ
2. परशुराम गंगावणे
3. नामदेव कांबळे
4. जसवंतिबेन पोपट
5. गिरीश प्रभुणे

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

प्रश्न१६१) जोयमोती कोनवारी ही कोणत्या राजघराण्याची राजकन्या होती?
उत्तर :- अहोम साम्राज्य

प्रश्न१६२) कोणत्या कवीने लिहिलेल्या कवितासंग्रहाचे इंग्रजीत “नॉट मेनी, बट वन” या शीर्षकाखाली अनुवाद करण्यात आले आहे?
उत्तर :- श्री नारायण गुरु

प्रश्न१६३) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2021’ प्रसिद्ध केला?
उत्तर :- जागतिक आर्थिक मंच (WEF)

प्रश्न१६४) कोणत्या राज्यात नागौर-गंगानगर खोरे आहे?
उत्तर :- राजस्थान

प्रश्न१६५) कोणत्या मंत्रालयाच्यावतीने "श्रमशक्ती" नामक एका राष्ट्रीय स्थलांतरण समर्थन व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर :- आदिवासी कल्याण मंत्रालय

प्रश्न१६६) टायटन (शनी ग्रहाचा चंद्र) यावरील सर्वात मोठ्या समुद्राचे नाव काय आहे?
उत्तर :- क्रेकन मेर

प्रश्न१६७) कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात भारतातल्या सर्वात दीर्घ कमानी रस्ता-पूलाचे उद्घाटन झाले?
उत्तर :- मेघालय

प्रश्न१६८) कोणत्या भारतीय उपग्रहाने ‘मिल्की वे’ आकाशगंगेमध्ये दुर्मिळ असे उष्ण अतिनील-चमकदार तारे शोधले?
उत्तर :- अ‍ॅस्ट्रोसॅट

प्रश्न१६९) कोणत्या राज्यात नवा थलतेज-शिलाज-रणचरदा रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्यात आला?
उत्तर :-  गुजरात

प्रश्न१७०) ‘लाँगऑप्स / LongOps’ प्रकल्प हा __ या देशांचा एक संयुक्त उपक्रम आहे.
उत्तर :- ब्रिटन आणि जपान

प्रश्न१७१) कोणत्या ठिकाणी ‘MeerKAT रेडिओ दुर्बिण’ आहे?
उत्तर :- दक्षिण आफ्रिकेचा उत्तर केप

प्रश्न१७२) कोणत्या सैन्य दलाने भारतात “सर्द हवा” मोहीम राबविण्यास सुरुवात केली?
उत्तर :-  सीमा सुरक्षा दल

प्रश्न१७३) 'विश्वाचे गुंजन’ नामक विशिष्ट ध्वनी मृत ताऱ्याच्या एका प्रकारापासून प्रक्षेपित होतो, ज्याला _ असे म्हणतात.
उत्तर :- पल्सर

प्रश्न१७४) कोणत्या तारखेला नवा अण्वस्त्रे बंदी करार संपूर्णपणे लागू झाला?
उत्तर :- 22 जानेवारी 2021

प्रश्न१७५) कोणत्या राज्य सरकारने ‘अवलोकन’ सॉफ्टवेअर तयार केले?
उत्तर :- कर्नाटक

प्रश्न१७६) कोणत्या संस्थेत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची नवी पद्धत विकसित करनेत आली आहे?
उत्तर :- CSIR-केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था, दुर्गापूर

प्रश्न१७७) ‘WASP-107b’ हे काय आहे?
उत्तर :-  बाह्य-ग्रह

प्रश्न१७८) कोणता यूरोपमधला सर्वात मोठा सौर प्रकल्प आहे?
उत्तर :- फ्रान्सिस्को पिझारो प्रोजेक्ट

प्रश्न१७९) नवीन ‘स्टार्ट’ करार हा _ या देशांमध्ये झालेला एक करार आहे.
उत्तर :- रशिया आणि अमेरिका

प्रश्न१८०) नव्याने सापडलेली ‘ऊसेरेया जोशी’ ही जात कोणत्या प्रजातीची आहे?
उत्तर :-  मुंगी

कोकणातील नद्या


▪️ठाणे
- सुर्या
- वैतरणा
- उल्हास

▪️मुबंई उपनगर
- दहिसर 
- माहीम

▪️रायगड
- पाताळगंगा
- सावित्री

▪️रत्नागिरी
- वशिष्ठी 
- शास्त्री
- काजळी
- मुचकुंदी

▪️सिंधुदुर्ग
- देवगड
- माचरा
- कर्ली

ठिबक सिंचनाचे अन्य फायदे

१. ठिबक सिंचनाने गरजेनुसार पाणी दिल्याने झाडांच्या हरितद्रव्य तयार करण्याच्या क्रियेत खंड पडत नाही. त्यामुळे त्यांची वाढ जलद आणि जोमाने होते. पर्यायाने उत्पादन वाढते. उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ होते.

२. ठिबकने ३० ते ८०% पाण्यात बचत होते.

३. बचत झालेल्या पाण्याचा दुसऱ्या क्षेत्रात वापर करता येतो.

४. कमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही.

५. दिवस-रात्र कधीही पिकांना पाणी देता येते.

६. ठिबकने सारख्या प्रमाणात पाणी दिले जात असल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने आणि जलद होत राहते.

७. पाणी साठून राहत नाही.

८. पिके लवकर काढणीला येतात. त्यामुळे दुबार पिकाला फायद्याचे ठरते.

९. क्षारयुक्त जमिनीत ठिबकने पाणी दिले तरीही पिकांचे उत्पादन घेता येते.

१०. जमिनी खराब होत नाही.

११. चढ-उताराच्या जमिनी सपाट न करता ठिबकने लागवडीखाली आणता येतात.

१२. कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पिके घेऊन उत्पादन काढता येते.

१३. ठिबकने द्रवरूप खते देता येतात. खताचा १००% वापर होतो. खताच्या खर्चात ३०-३५% बचत होते. खताचा अपव्यय टळतो. पिकांना सम प्रमाणात खाते देता येतात. त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो.

१४. जमिनीची धूप थांबते.

१५. निर्यातक्षम उत्पादनासाठी ठिबक सिंचन आवश्यकच आहे.

RRB NTPC Exam


Q.1. 'यूनियन बजट एप किसने लांच किया है ?
Ans. निर्मला सीतारमण

Q.2. किस स्पेस एजेंसी ने विशाल आकाशगंगा क्लस्टर एबेल- 370 की आश्चर्यजनक तश्वीर साझा की है ?
Ans. NASA

Q.3. किस देश ने अमेरिका के 28 महत्वपूर्ण अधिकारियों पर प्रतिबंध लगा दिया है ?
Ans. चीन

Q.4. किस देश ने COVID-19 प्रभावों से उबरने के लिए 3.7 बिलियन डॉलर के पैकेज की घोषणा की है ?
Ans. मलेशिया

Q.5. हाल ही में DRDO ने किस राज्य के तट पर स्मार्ट एंटी एयरफील्ड वेपन का सफल उड़ान परीक्षण किया है ?
Ans. ओडिशा

Q.6. किस देश ने ऑक्सफ़ोर्ड एस्ट्राजेनेका टीके को मंजूरी दी है ?
Ans. श्रीलंका

Q.7. किस राज्य सरकार ने MANREGA के तहत कार्यदिवसों की
100 से बढ़ाकर 150 कर दी है ?
Ans. उत्तराखंड

Q.8. किस राज्य सरकार ने जेल पर्यटन शुरू करने की घोषणा की है ?
Ans. महाराष्ट्र

Q.9. राष्ट्रीय बालिका दिवस' कब मनाया गया है ?
Ans. 24 जनवरी

Q.10.  किस राज्य ने 24 जनवरी को अपना स्थापना दिवस मनाया है ?
Ans. उत्तर प्रदेश

Q. 1 “नेताजी सुभाष चंद्र बोस अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा”
कहाँ पर स्थित है?
उत्तर कोलकाता (पश्चिम बंगाल)

Q. 2 भारत में पहली किस ” लौह और इस्पात” कंपनी की स्थापना की गई थी?
उत्तर टाटा आयरन एंड स्टील कंपनी लिमिटेड (TISCO)

Q. 3 “सुप्रीम कोर्ट” की पहली महिला न्यायाधीश कौन थी?
उत्तर जस्टिस फातिमा बीवी

Q. 4 राजस्थान में निम्न में से कौन सा नृत्य किया जाता है?
उत्तर घूमर

Q. 5 मेगास्थनीज द्वारा लिखित पुस्तक का नाम बताइए क्या हैं?
उत्तर इंडिका

Q. 6 UNO को “नोबेल शांति पुरस्कार” कब मिला?
उत्तर दिए गए विकल्पों के अनुसार

Q. 7 हाल ही में किस देश ने “समान लेंगिक विवाह” को कानूनी घोषित किया?
उत्तर क्रोएशिया

Q.8 चुनाव में “NOTA” विकल्प कब से प्रारम्भ किया गया था –
उत्तर NOTA विकल्प का इस्तेमाल पहली बार 2013 में

Q.9 निम्न में से एक विषम शब्द हैं –
कानपुर, चंडीगढ़, शिलांग, गांधी नगर
उत्तर कानपुर

Q. 10 “NITI Aayog” को किसके स्थान पर प्रारम्भ दिया गया था –
उत्तर योजना आयोग

Q. 11 स्पैन का सर्वश्रेष्ठ क्ले कोर्ट टेनिस खिलाड़ी कौन है?
उत्तर राफेल नडाल

Q. 12 निम्न में से कौन सी एक गैर धातु वस्तु की विशेषता नहीं है?
उत्तर कंडक्टर

Q. 13 मणिपुर के निम्नलिखित खिलाड़ियों में से किसे “राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार” से सम्मानित किया गया है?
उत्तर एम सी मैरी कॉम

Q. 14 कौन से एक रक्त का कार्य नहीं है?
उत्तर मस्तिष्क को जानकारी संवाद करने के लिए

Q. 15 भारत का कौन सा राज्य अंगूर का सबसे बड़ा उत्पादक है?
उत्तर महाराष्ट्र

Q. 16 भारत का सबसे लंबा रेलवे प्लेटफॉर्म कौन सा है?
उत्तर गोरखपुर जंक्शन रेलवे स्टेशन

Q.18 भारत में समोच्च खेती का उपयोग क्यों किया जाता है?
उत्तर अधिक मिट्टी की उर्वरता और ढलान संरक्षण के लिए

. 19 निम्नलिखित में से कौन “वॉयस असिस्टेंट” नहीं है?
उत्तर दिए गए विकल्पों के अनुसार

Q. 20 http: // www से एक प्रश्न पूछा गया

Q. 21 स्वच्छ भारत के लिए कौन सा अभियान शुरू किया गया था?
उत्तर स्वच्छ भारत मिशन

Q. 22 पैसे के बिना वस्तुओं और सेवाओं को खरीदने और बेचने की प्रक्रिया को कहा जाता है –
उत्तर वस्तु विनिमय प्रणाली

Q. 22 पैसे के बिना वस्तुओं और सेवाओं को खरीदने और बेचने की प्रक्रिया को कहा जाता है –
उत्तर वस्तु विनिमय प्रणाली

Q. 23 “सिंधु घाटी सभ्यता” के किस स्थल पर सबसे पहले खुदाई हुई थी?
उत्तर हड़प्पा,

Q. 24 वायु की उपस्थिति में सल्फाइड अयस्क को उच्च तापमान पर गर्म करने की प्रक्रिया को कहा जाता है –
उत्तर Roasting ( भूनना)

Q. 25 किस भारतीय शहर को “पूर्व का स्कॉटलैंड” कहा जाता है?
उत्तर शिलांग

Q. 26 भारत के अंतिमगवर्नर जनरल और पहले वाइसराय कौन थे?
उत्तर लॉर्ड कैनिंग

Q. 27 “UNO” के वर्तमान महासचिव कौन हैं?
उत्तर एंटोनियो गुटेरेस

Q1 ध्वनि की तीव्रता किसमें मापी जाती है?
उत्तर: डेसिबल

Q 2 कोलेरु झील किस राज्य में स्थित है
उत्तर:आंध्र प्रदेश

Q 3 सांची स्तूप किसके द्वारा बनाया गया है? : उत्तर: अशोक

Q  4 हड्डी को हड्डी से कौन जोड़ता है?
उत्तर: लिगामेंट

Q 5 नमक सत्याग्रह कब हुआ है?
उत्तर: 12 मार्च 1930

Q 6 प्लूटो ग्रह किसके द्वारा खोजा गया
उत्तर: क्लाइड टॉम्बो

Q 7 मछली उत्पादन में कौन सा राज्य नंबर 1 है?
उत्तर: तमिलनाडु

Q8 धान की फसलों में कौन सी गैस मौजूद है?
उत्तर: मीथेन ch4

Q 9 महिलाओं में कौन से हार्मोन पाए जाते हैं
उत्तर:  एस्ट्रोजन और प्रोजेस्टेरोन

२५ जानेवारी २०२१

Internet Speed मध्ये जगात अव्वल ठरला ‘हा’ मुस्लिम बहुल देश, तर भारताची रँकिंग मात्र घसरली



मोबाइल इंटरनेट स्पीड आणि फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत भारताच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची घसरण झालीये. मोबाइल इंटरनेट स्पीडमध्ये भारत 129 व्या स्थानावर आहे, तर फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारताचा 65 क्रमांक आहे. तर, मुस्लिम बहुल देश कतारने मोबाइल इंटरनेट स्पीडमध्ये दोन स्थानांची झेप घेतलीये. त्यामुळे साउथ कोरिया आणि संयुक्त अरब अमिरातला मागे टाकून कतार जगातील सर्वात जास्त मोबाइल इंटरनेट स्पीड असलेला देश ठरलाय. तर, थायलंड फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये जगात अव्वल ठरलाय.


▪️भारतातला सरासरी मोबाइल इंटरनेट स्पीड :-


स्पीड टेस्ड ग्लोबल इंडेक्स Ookla च्या रिपोर्टनुसार, भारताच्या मोबाइल इंटरनेट डाउनलोड स्पीडमध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या 13.51Mbps स्पीडच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात 4.4 टक्के घट झाली आणि 12.91Mbps इतका भारताचा स्पीड नोंदवण्यात आला. तर याच महिन्यात भारताच्या सरासरी अपलोड स्पीड मात्र 1.4 टक्क्यांनी वाढलाय. यामुळे अपलोड स्पीड 4.90Mbps वरुन वाढून 4.97Mbps झाला आहे.


177.52Mbps स्पीडसह कतार अव्वल :-


कतारमध्ये मोबाइल डाउनलोडिंग स्पीड सर्वाधिक 178.01Mbps नोंदवण्यात आला. कतारनंतर 177.52Mbps स्पीडसह UAE चा नंबर लागतो. या लिस्टमध्ये साउथ कोरिया तिसऱ्या, चीन चौथ्या आणि ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आहे.


▪️फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारताचा 65 वा क्रमांक :-


तर, फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारताचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 53.90Mbps नोंदवण्यात आला. या क्रमवारीत भारताचा 65 वा नंबर लागतो. डिसेंबर महिन्यातील भारताचा फिक्स्ड ब्रॉडबँड अपलोड स्पीड 50.75Mbps होता, तर नोव्हेंबरमध्ये 52.02Mbps इतका होता. थायलंड फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत अव्वल ठरला. थायलंडचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 308.35Mbps होता. थायलंडनंतर अनुक्रमे सिंगापूर आणि हाँगकाँगचा क्रमांक आहे. तर, रोमानिया चौथ्या आणि स्विझर्लंड पाचव्या स्थानी आहे. जगाचा विचार केल्यास जागतिक सरासरी फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीड डिसेंबर महिन्यात 96.43Mbps होता, तर नोव्हेंबरमध्ये 91.96Mbps इतका होता. तर, अपलोडिंग ब्रॉडबँड स्पीड 49.44mbps वरुन 53.31Mbps झाला.

बायडेन यांचा ‘हा’ निर्णय लाखो भारतीयांचं स्वप्न करणार पूर्ण



अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा संभाळल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये जो बायडेन यांनी भारतीयांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बायडेन यांनी अमेरिकेच्या इमीग्रेशन पॉलिसीमध्ये (स्थलांतर धोरणांमध्ये) मोठे बदल करण्यास सुरुवात केलीय.


बायडेन यांनी अमेरिकन काँग्रेससमोर बोलताना एक नवीन कायदा तयार करण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. या कायद्यामुळे एक कोटी १० लाख अप्रवासी नागरिकांना म्हणजेच कायमस्वरुपी अमेरिकेमध्ये स्थायिक होण्यासाठी गेलेल्या भारतीयांना स्थानिक म्हणून दर्जा मिळण्याबरोबरच अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याच्या मार्गातील अनेक अडथळे दूर होणार आहेत.


यात लाखो भारतीयांचाही समावेश आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतील कोट्यावधी अप्रवासी नागरिकांवर देश सोडून जाण्याची टांगती तलवार होती. मात्र अध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर बायडेन यांनी ट्रम्प यांचे अनेक निर्णय रद्द केले असून त्यामध्ये या स्थलांतर धोरणांमधील बदलांचाही समावेश आहे. बायडेन प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकेत स्थायिक होण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.


बायडेन यांनी जारी केलेल्या नवीन आदेशामुळे कायदेशीर कागदपत्र नसतानाही अमेरिकेत वास्तव्य करत असणाऱ्यांना फायदा होणार आहे. अमेरिकेमध्ये अशा लोकांची संख्या एक कोटी १० लाख इतकी आहे. त्यापैकी पाच लाख नागरिक हे मूळचे भारतीय आहेत. बायडेन यांनी पहिल्याच दिवशी घेतलेला हा निर्णय ट्रम्प यांच्या धोरणांच्या अगदी उलट आहे.

नवीन शैक्षणिक धोरण २०२०ला मंजूरी


NEW EDUCATION POLICY 2020 


⭕️कद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं 

नामकरण आता 

*"शिक्षण मंत्रालय"* असं होणार...


जाणून घेऊया :


*नवीन शिक्षण धोरण २०२०* यांना मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे.

३४ वर्षांनंतर शिक्षण धोरण बदलले आहे. नवीन शिक्षण धोरणाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :


— तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता...


— *५ वर्षे मूलभूत Fundamental :* 

१. नर्सरी            @ ४ वर्षे

२. जूनियर केजी @ ५ वर्षे

३. एसआर केजी @ ६ वर्षे

४. इयत्ता पहिली @ ७ वर्षे

५. इयत्ता दुसरी   @ ८ वर्षे


— *३ वर्षांची प्रारंभिक शाळा Preparatory :*

६. इयत्ता तिसरी  @ ९ वर्षे

७. इयत्ता चौथी   @ १० वर्ष

८. इयत्ता पाचवी @ ११ वर्षे


— *३ वर्षांची माध्यमिक शाळा Middle :*

९.   इयत्ता सहावी @ १२ वर्षे

१०. इयत्ता सातवी @ १३ वर्ष

११. इयत्ता आठवी @ १४ वर्षे


*४ वर्ष माध्यमिक शाळा Secondary :*

१२. इयत्ता नववी     @१५ वर्षे

१३. इयत्ता दहावीची @ १६ वर्षे

१४. एफ.वाय.जे.सी‌. @ 17 वर्षे

१५. एस.वाय.जे.सी. @ १८ वर्षे


*ठळक वैशिष्ट्ये :*


— बोर्ड फक्त १२ वीच्या वर्गाला असेल.

महाविद्यालयीन पदवी ४ वर्षांची. 

*दहावी मंडळ रद्द. SSC*

*एमफिल MPhil देखील बंद असेल.*



— *आता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषा शिकविली जाईल. उर्वरित विषय जरी तो इंग्रजी असला तरी एक विषय म्हणून शिकविला जाईल...*

 

— *बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी...*

आता *बोर्ड परीक्षा फक्त १२वी मध्ये द्यावी लागेल.* तर यापूर्वी दहावीची बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक होते, ते आता होणार नाही.


— ९वी ते १२वीच्या सत्र परीक्षा असतील Semester Exam.

 *शालेय शिक्षण ५ + ३ + ३ + ४ सूत्रांच्या (वरील सारणी पहा) अंतर्गत शिकवले जाईल...* 


— महाविद्यालयीन पदवी ३ व ४ वर्षांची असेल. म्हणजेच, 

*पदवीच्या पहिल्या वर्षात तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल,* 

*दुसर्‍या वर्षी पदविका असेल*, तर 

*तृतीय वर्षात डिग्री मिळेल.*


— जे संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तर जे विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल...


— विद्यार्थ्यांना यापुढे एमफिल MPhil करावे लागणार नाही. म्हणजेच, *रिसर्च करणाऱ्यांसाठी पदवी अधिक एक वर्षांचा मास्टर्स अभ्यासक्रम अशी चार वर्षांची पदवी* असेल. यानंतर ते थेट *पीएचडी PHD* करू शकतील. 


— दरम्यान विद्यार्थी इतर कोर्स करू शकतील. *उच्च शिक्षणामध्ये Higher Education* २०३५ पर्यंत एकूण सकल पट नोंदणी Gross Enrolment Ratio २०३५ पर्यंत ५०% पोहोचवण्याचं उद्दिष्ट...

 दुसरीकडे नवीन शिक्षण धोरणांतर्गत जर एखाद्या विद्यार्थ्याला कोर्सच्या मध्यभागी दुसरा कोर्स करायचा असेल तर तो मर्यादित काळासाठी पहिल्या कोर्समधून ब्रेक घेऊन दुसरा कोर्स करू शकतो...


— उच्च शिक्षणातही Higher Education अनेक सुधारणा केल्या आहेत. सुधारणांमध्ये 

*श्रेणीबद्ध शैक्षणिक Graded Academic,* *प्रशासकीय  Administrative* आणि 

*आर्थिक स्वायत्तता Financial Autonomy*

समाविष्ट आहे... 

त्याशिवाय ई-कोर्सेस प्रादेशिक भाषांमध्येही सुरू केले जातील. 

आभासी Vertual लॅब विकसित केल्या जातील. 

राष्ट्रीय शैक्षणिक वैज्ञानिक मंच (NETF) सुरू होईल. देशात ४५ हजार महाविद्यालये असल्याचे स्पष्ट आहे...


*सर्व सरकारी Government,*

*खासगी Private* आणि 

*मान्यताप्राप्त संस्थांसाठी*

*Deemed University*

 समान नियम असतील...


— मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम: एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील. शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीचा असेल तो विषय त्यांना शिकता येईल...


— बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार...


— लॉ आणि मेडिकल शिक्षण वगळता उच्च शिक्षण एका छताखाली येणार...


— शिक्षणातील गुंतवणूक जीडीपीच्या ६% करणार, सध्या हे प्रमाण ४.४३% आहे...


— विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक बदलणार. शिक्षकांसोबतच विद्यार्थीदेखील स्वत:चे मूल्यांकन करणार...


 — सर्व महाविद्यालयांसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा. एनटीए ही परीक्षा घेणार. मात्र ही परीक्षा ऐच्छिक असेल.‌..

अंतनिर्मित (intrusive/plutonic) अग्निजन्य खडकांचे प्रकार



१) डाईक (dyke)

-भूगर्भातील तप्त लाव्हारस भूकवचामध्ये असलेल्या उभ्या भेगांमध्ये साचतो व तो थंड होऊन लांबवत खडकांची निर्मिती होते त्यास डाईक असे म्हणतात

-उदाहरणार्थ इंग्लंडच्या उत्तर भागात क्लिवलँड डाईक ज्याची उंची सुमारे दीडशे मीटर आहे


२) सिल (sill )व शीट

-जलजन्य किंवा रूपांतरित खडकांच्या आडव्या भेगेत लावारस येऊन साचतो व कालांतराने थंड होऊन खडकाची निर्मिती होते ते त्यास सील असे म्हणतात

-याच पातळ किंवा कमी जाडीच्या खडकास शीट असे म्हणतात


३) लॅकोलिथ(lacolith)

-भूगर्भातील तप्त लावारस भूपृष्ठाकडे येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही ठिकाणी खडक घुमटासारखे वर उचलले जातात आणि निर्माण होणाऱ्या पोकळीमध्ये हे लाव्हारसाचे निक्षेपण होते हे आणि त्यापासून घुमटाकार खडक तयार होतात त्यास लकोलिथ असे म्हणतात

-याची निर्मिती ती जलजन्य खडकांमध्ये होते

-संयुक्त संस्थानातील उटाह राज्यातील लासाल पर्वत आणि हेनरी पर्वत ही प्रमुख उदाहरणे आहेत


४) लोपोलीथ

-जेव्हा लाव्हारस खोलगट किंवा उथळ भागात साचतो आणि कालांतराने थंड होऊन बशीच्या(saucer shaped) आकारासारखा आकार निर्माण होतो त्यास लोपोलिथ असे म्हणतात


५) फेकोलिथ(phacolith)

-भूगर्भातील खडकांना जेव्हा घडीचा आकार प्राप्त होतो तेव्हा अशा खडकांमध्ये अपनती आणि अभिनती असतात . तेथे लाव्हारसाचे निक्षेपण होऊन वलयाकार भूआकार निर्माण होतो त्यास फेकोलीथ असे म्हणतात


६) बेथोलिथ (batholith)

-पृथ्वीच्या भूगर्भामध्ये  तप्त लावारस वर येण्याचा प्रयत्न करतो , तेव्हा भूकवचामधील विस्तीर्ण व खोलगट पोकळीमध्ये लाव्हारसाचे निक्षेपण होते, येथे तयार होणाऱ्या विस्तीर्ण खडकाला batholith असे म्हणतात


खासगी कंपन्यांमार्फत सरकारची नोकरभरती


🌀राज्य सरकारमधील विविध विभागांच्या नवीन नोकरभरतीसाठी 'महापोर्टल'मध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकार चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करणार आहे,


🌀राज्य सरकारमधील विविध विभागांच्या नवीन नोकरभरतीसाठी 'महापोर्टल'मध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकार चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करणार आहे, असे संकेत गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिले आहेत.


🌀राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला अखेर सुरुवात करण्याचा महाविकास आघाडीचा मानस असून पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील साडेआठ हजार आणि पोलिस दलातील पाच हजार २९७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. 


🌀तथापि राज्य सरकार 'महापोर्टल'ऐवजी चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया करणार आहे. महापोर्टलअंतर्गत येणाऱ्या परीक्षा पद्धतीत बदल करून सुधारित परीक्षा पद्धतीनुसार सर्व्हिस प्रोव्हायडरची निवड करण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई महाआयटीकडे देण्यात आली होती. या कामासाठी मे. अॅपटेक लिमिटेड, मे. जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेड, मे. जिंजर वेब्ज प्रा. लि., मे. मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेड या चार कंपन्यांना राज्यातील आगामी मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, त्याच्या अधिपत्याखालील सरकारी विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेबाहेरील गट ब आणि गट कच्या परीक्षा पद्धती राबवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.याबाबतची पुढील कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, अशी माहिती राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीट करून दिली आहे.

'महापोर्टल'च्या माध्यमातून होणाऱ्या नोकरभरतीला अनेकांनी विरोध केला होता. 


🌀तयामुळे राज्य सरकारने महापोर्टल रद्द करून राज्य सरकारने चार कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्या आता नवीन नोकरभरती प्रक्रिया करणार आहेत. निवडण्यात आलेल्या चार कंपन्यांद्वारे येथून पुढे पदभरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने घेतील.


🌀राज्यातील या भरतीप्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पोलिस दलात ५२९७ पदे आणि आरोग्य विभागात ८५०० अशी एकूण १३ हजार ८०० पदांची भरती अपेक्षित आहे. राज्यातील मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश आणि नोकरभरती यातील आरक्षणाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. यामुळे नवीन नोकरभरतीची प्रक्रिया काही काळ पुढे ढकलावी, अशी मागणी काही मराठा संघटनांकडून होत आहे.

मोठी बातमी! पंतप्रधान मोदी, सर्व मुख्यमंत्री, MP, MLA सर्वांनाच दिली जाणार करोना लस; अशी आहे योजना



🌈दशामध्ये करोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या अंमलबजावणीला १६ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलीय. मात्र आता दुसऱ्या टप्प्यामध्ये राजकीय नेत्यांना करोनाची लस देण्यात येणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार यांच्याबरोबरच इतर आजार असणाऱ्या राजकीय नेत्यांचे लसीकरण केलं जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


🌈विशेष म्हणजे अनेक दिग्गज नेते हे ८० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. ८० हून अधिक वय असणाऱ्या नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एचडी देवगौडा यांच्याबरोबरच भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.


🌈सरकारने करोना लसीकरणाची मोहीम टप्प्याटप्प्यांमध्ये राबवली जाणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यामध्ये सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मंत्र्यांबरोबर नेत्यांना करोनाची लस देण्यात येणार आहे. यात अगदी पंतप्रधानांपासून सर्व मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.


🌈सध्याची आकडेवारी पाहिली तर लोकसभेमधील तीनशेहून अधिक नेते ५० पेक्षा जास्त वर्षांचे आहेत. तर राज्यसभेमधील २०० हून अधिक खासदार हे वयाची पन्नाशी ओलांडलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये भारत सरकार तीन कोटी वैद्यकीय कर्मचारी आणि पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांना करोनाची लस देणार असून दुसरा टप्पा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल, असं हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

अग्निदुर्घटनेनंतर सीरमने आज तीन देशांना पाठवला ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा साठा


🌸पण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची एक इमारत गुरुवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. इमारतीचे बांधकाम सुरु होते. या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने या आगीमुळे ‘कोव्हिशिल्ड’ लस निर्मितीच्या उत्पादनावर कुठलाही परिणाम झालेला नाही. सध्या सर्वांचेच लक्ष या जीवरक्षक लसीकडे लागले आहे.


🌸दशात शनिवारपासूनच लसीकरणाला सुरुवात झालीय. आतापर्यंत लाखो लोकांना या लसीचे डोस देण्यात आले आहेत. पुण्यातील या अग्नि दुर्घटनेनंतर आज सीरम इन्स्टिट्यूटने म्यानमार, सेशेल्स आणि मॉरिशेस या देशांना ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा साठा पाठवून दिला.


🌸अदर पूनावाला काय म्हणाले - सर्व सरकारी संस्था आणि लोकांना मी हे निश्चितपणे सांगू शकतो की कोव्हिशिल्डच्या निर्मितीला कोणताही फटका बसलेला नाही. कोव्हिशिल्डची निर्मिती अनेक इमारतींमध्ये केली जाते. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अशी एखादी घटना घडलीच तर लस सुरक्षित रहावी म्हणून मी मुद्दाम अशाप्रकारची रचना करुन ठेवली आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी ट्विटरवरुन दिली आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी पुणे पोलीस आणि अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत.


🌸मतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांची मदत - पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना सीरम इन्स्टिट्यूटकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मृतांपैकी दोन जण पुण्यातील असून अन्य दोन जण उत्तर प्रदेश व एकजण बिहारमधील आहे. हे सर्वजण कंत्राटी मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.

नीति आयोगाने दुसरा इंडिया इनोव्हेशन अहवाल २०२० प्रसिद्ध केला




🔝 २०२० इंडिया इनोव्हेशन अहवालात मोठ्या राज्यात कर्नाटकने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला


🔰 ०१) कर्नाटक : ४२.५० गुण 

🔰 ०२) महाराष्ट्र : ३८.०३ गुण

🔰 ०३) तमिळनाडू : ३७.९१ गुण 

🔰 ०४) तेलंगणा : ३३.२३ गुण 

🔰 ०५) केरळ : ३०.५८ गुण

🔰 ०६) हरयाणा : २५.८१ गुण 

🔰 ०७) आंध्रप्रदेश : २४.९१ गुण

🔰 ०८) गुजरात : २३.६३ गुण 

🔰 ०९) उत्तर प्रदेश : २२.८५ गुण

🔰 १०) पंजाब : २२.५४ गुण 

🔰 ११) पश्चिम बंगाल : २१.६९ गुण 

🔰 १२) राजस्थान : २०.८३ गुण 

🔰 १३) मध्य प्रदेश : २०.८३ गुण  

🔰 १४) ओडिशा : १८.९४ गुण 

🔰 १५) झारखंड : १७.१२ गुण

🔰 १६) छत्तीसगड : १५.७७ गुण 

🔰 १७) बिहार : १४.४८ गुण .


👎 २०२० इंडिया इनोव्हेशन अहवालात मोठ्या राज्यात बिहार १४.४८ गुणासह शेवटच्या क्रमांकावर आहे .

भारताचा शेजारील देशांना मदतीचा हात; भूटान, मालदिवला पाठवली करोनाची लस



उत्कृष्ट नियोजनाद्वारे करोनाच्या संकटावर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतानं नियंत्रण मिळवलं आहे. या आजारावरील लस निर्मिती प्रक्रियेतही भारत आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे अवघं जग भारताकडं आशेने पाहत आहे. जागतिक स्तरावरील आपली जबाबदारी ओळखून भारतही कौतुकास्पद पावलं टाकत आहे. नुकताचं भारतानं भूटान आणि मालदीव या आपल्या सख्या शेजारी देशांना भेट स्वरुपात करोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला आहे.


एएनआयच्या माहितीनुसार, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन भूटानची राजधानी थिंफूकडे सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोविशिल्ड लसीचे १.५ लाख डोस पाठवण्यात आले आहेत. तसेच मालदीवची राजधानी माले येथे मुंबईतून कोविशिल्डचे १ लाख डोस पाठवण्यात येणार आहेत.


भारत हा जगातील लस निर्मिती उद्योगातील एक प्रमुख देश म्हणून ओळखला जातो. आजवर भारतानं जगातील अनेक देशांना विविध आजारांवरील औषधे तसेच लसींचा पुरवठा केला आहे. करोनाच्या या संकट काळात सध्या भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरु आहे.


दरम्यान, भारतातील कंपन्यांना जगातील 

अनेक देशांनी लस पुरवठ्यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे. दरम्यान, भूटान आणि मालदीव या शेजारील देशांना भारतानं भेट स्वरुपात लस पाठवली आहे.


भारत सरकारकडून सीरमच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' या दोन लसींना आपत्ककालिन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे

दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ठाकरे सरकारची मोठी घोषणा


🌷राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केली आहे. १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.


🌷राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे संकेत गायकवाड यांनी यापूर्वीच दिले होते. बारावीच्या परीक्षांचा निकाल हा जुलै महिना संपण्याआधी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न असून दहावीचे निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी लावले जातील असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.


🌷दरवर्षी साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होते. मात्र यंदा  करोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत. ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून आता परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली आहे.


🌷कद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या. त्यानंतर आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. गायकवाड यांनी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१ विजेते


👤 अमेय एल : आंध्रप्रदेश : कला 

👤 वयोम आहुजा : उत्तरप्रदेश : कला 

👤 हरुदय आर के : केरळ : कला 

👤 अनुराग रामोला : उत्तराखंड : कला 

👤 तनुज समादार : आसाम : कला 

👤 वनिश केईशम : मणिपूर : कला 

👤 सौहारद्य डे : पश्चिम बंगाल : कला 

👤 जयोती कुमारी : बिहार : साहस 

👤 कवर दिव्यांश : उत्तरप्रदेश : साहस 

👤 कामेश्वर वाघमारे : महाराष्ट्र : साहस 

👤 राकेश के : कर्नाटक : इनोव्हेशन

👤 शरीनभ अग्रवाल : महाराष्ट्र : इनोव्हेशन

👤 वीर कश्यप : कर्नाटक : इनोव्हेशन

👤 नम्या जोशी : पंजाब : इनोव्हेशन

👤 अर्चित पाटील : महाराष्ट्र : इनोव्हेशन

👤 आयुष रंजन : सिक्कीम : इनोव्हेशन

👤 सी हेमेश : तेलंगणा : इनोव्हेशन

👤 चिराग भंसाली : उत्तरप्रदेश : इनोव्हेशन

👤 हरमनज्योत सिंह : जम्मु व कश्मीर : इनोव्हेशन

👤 मो. शादाब : उत्तरप्रदेश : विद्वान

👤 आनंद : राजस्थान : विद्वान

👤 ए एस प्रधान : ओडिशा : विद्वान

👤 अनुज जैन : मध्यप्रदेश : विद्वान

👤 सोनित सिसोलेकर : महाराष्ट्र : विद्वान

👤 परसिद्धी सिंह : तमिळनाडू : सामाजिक काम 

👤 सविता कुमारी : झारखंड : खेळ 

👤 अर्शिया दास : त्रिपुरा : खेळ

👤 पलक शर्मा : मध्यप्रदेश : खेळ

👤 मो. रफी : उत्तरप्रदेश : खेळ

👤 काम्या कार्तिकेयन : महाराष्ट्र : खेळ 

👤 खशी पटेल : गुजरात : खेळ

👤 मत्र हरखानी : गुजरात : खेळ .

पून्हा एकदा नोटबंदी? आरबीआयकडून ‘या’ नोटा चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरु.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद होण्याची शक्यता आहे. आरबीआयचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी महेश यांनी ही माहिती दिली आहे. मार्च किंवा एप्रिलपर्यंत आरबीआय १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

जिल्हास्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आरबीआयकडून बँकांना नोटा परत घेण्याची मोहीम आखण्यास सांगण्यात आलं आहे. यामुळे बँकेत जमा झालेल्या १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा पुन्हा चलनात येणार नाही यासाठी बँकांनी तयारी केली आहे.

यावेळी बी महेश यांनी १० रुपयांच्या नाण्याला अद्यापही व्यापारी तसंच उद्योजकांकडून स्वीकारलं गेलं नसल्यावरुन नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, "१० रुपयांचं नाणं आणून १५ वर्ष झाल्यानंतरही व्यापारी आणि उद्योजकांनी त्याचा स्वीकार न करणं बँका आणि आरबीआयसाठी मोठी समस्या झाली आहे. १० रुपयांची नाणी बँकांसाठी मोठं ओझं झालं आहे".

यावेळी त्यांनी नाण्याच्या वैधतेसंबंधी अफवा पसरत असून लोकांना याबद्दल जागरुक करण्याची गरज बोलून दाखवली. लोकांनी १० रुपयांचं नाणं जास्तीत जास्त वापरावं यासाठी बँकांनी मार्ग शोधण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. २०१९ मध्ये आरबीआयने १०० रुपयांची नवी जांभळ्या रंगातील नोट आणली होती. बी महेश यांनी १०० च्या नव्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत असं स्पष्ट केलं आहे


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड


🔸यदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे.


🔸दीड दशकांनंतर यंदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका विज्ञान कथा लेखक आणि संशोधकाची संमेलनाध्यक्ष पदी निवड झाल्याने नाशिकचे संमेलन सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे. 


विज्ञानकथा पुस्तके

वामन परत न आला

अंतराळातील भस्मासुर

कृष्णमेघ (अनुवाद, मूळ लेखक:फ्रेड हॉयल Fred Hoyle)

प्रेषित

व्हायरस

अभयारण्य

यक्षांची देणगी

टाइम मशीनची किमया

याला जीवन ऐसे नाव


इतर पुस्तके

आकाशाशी जडले नाते

विज्ञानाची गरुडझेप

गणितातील गमतीजमती

विश्वाची रचना

विज्ञानाचे रचयिते

नभात हसरे तारे

आदिवासी कल्याण मंत्रालयाचे ‘श्रमशक्ती’ व्यासपीठ



▪️कद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते गोव्याच्या पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात "श्रमशक्ती" नामक एका राष्ट्रीय स्थलांतरण समर्थन व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले.


🛑ठळक बाबी...


▪️सकेतस्थळ आधारित या व्यासपीठावर स्थलांतर करणाऱ्या कामगारांच्या विषयीची राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील माहिती उपलब्ध असणार.


▪️आकडेवारीतले अंतर दूर करण्यासाठी तसेच रोजगार आणि उत्पन्न निर्मितीच्या शोधात असलेल्या स्थलांतरित कामगारांना सक्षम बनविण्यात व्यासपीठाची मदत होणार आहे.


▪️रोजगाराच्या स्थलांतरणाची प्रक्रिया सुरक्षित आणि उत्पादनक्षम असावी याची खात्री करण्यासाठी केंद्रीय सरकारने स्थलांतरित कामगारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची "श्रमसाथी" नामक एक मार्गदर्शन पुस्तिका देखील तयार केली आहे.


▪️गोव्यामध्ये विविध राज्यांतून गोव्यात येणाऱ्या स्थलांतरितांच्या मदतीसाठी गोव्यात एक समर्पित ‘स्थलांतर कक्ष’ देखील उघडण्यात आले आहे. परप्रांतीय कामगारांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी असे केंद्र उघडणारे गोवा हे भारतातले पहिले गंतव्यस्थान बनले आहे.

सवादुपिंड आणि त्याची कार्ये


👉सवादुपिंड ओटीपोटावर स्थित एक अवयव आहे. 


👉आपण खात असलेल्या अन्नाचे शरीरातील पेशींच्या इंधनात रुपांतर करण्यात ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.


👉 सवादुपिंडात दोन मुख्य कार्ये असतात: एक एक्सोक्राइन फंक्शन जे पचन करण्यास मदत करते आणि रक्तातील साखर नियंत्रित करते अंतःस्रावी कार्य.


👉👉सवादुपिंडाचे स्थान👉👉


👉सवादुपिंड पोटच्या मागे डाव्या ओटीपोटात स्थित आहे.


👉 ह लहान आतडे, यकृत आणि प्लीहासह इतर अवयवांनी वेढलेले आहे


👉. हे स्पंजदार आहे, सुमारे सहा ते दहा इंच लांबीचे आणि उदर ओलांडून आडवे वाढलेले सपाट नाशपाती किंवा माशासारखे आकार आहे.


👉सवादुपिंडाचा प्रमुख म्हटलेला रुंद भाग ओटीपोटाच्या मध्यभागी स्थित असतो. 


👉सवादुपिंडाचा मुख्य भाग अशा जंक्शनवर स्थित असतो जेथे पोट लहान आतड्याच्या पहिल्या भागाला मिळते.


👉 यथूनच पोट आतड्यांमधील अंशतः पचलेले अन्न रिक्त करते आणि स्वादुपिंड पाचन एंझाइम्स या सामग्रीमध्ये सोडतात.


👉सवादुपिंडाच्या मध्यवर्ती भागास मान किंवा शरीर म्हणतात.


👉पातळ शेवटला शेपटी म्हणतात आणि डाव्या बाजूला वाढवते.


👉सवादुपिंडाभोवतालच्या अनेक मोठ्या रक्तवाहिन्या, उच्च मेन्स्टेरिक धमनी, उच्च मेन्स्ट्रिक व्हेन, पोर्टल व्हेन आणि सेलिआक अक्सिस, स्वादुपिंड आणि इतर उदर अवयवांना रक्तपुरवठा करतात.




👉सभोवतालच्या जहाज आणि अवयवांसह स्वादुपिंड


👉बहुतेक सर्व स्वादुपिंडात (95%) एक्सोक्राइन टिशू असते जे पचन करण्यासाठी स्वादुपिंड एंझाइम तयार करते.


👉 उर्वरित ऊतकांमध्ये अंतःस्रावी पेशी असतात ज्याला लॅंगेरहॅन्सचे आयलेट्स म्हणतात. पेशींचे हे समूह द्राक्षेसारखे दिसतात आणि रक्तातील साखर नियंत्रित करणारे आणि स्वादुपिंडाच्या स्रावांचे नियमन करणारे हार्मोन्स तयार करतात.



२२ जानेवारी २०२१

पाबना शेतकरी विद्रोह 1873-76


★ 1850/1859 च्या कायद्याने शेतकर्यांंना संरक्षण दिले मात्र कंपनी सरकारने अन्याय करण्यास सुरुवात केली


★ 1873 च्या दरम्यान या अन्यायाविरुद्ध "युसूफ सराय" च्या शेतकर्यांनी "क्रुषक संघ" स्थापन केला 


🔸परमुख नेता:- ईशान चन्द्र राय, शंभुपाल


★ कालांतराने हा विद्रोह ढाका, त्रिपूरा, बेकरगंज, फरिदपूर, बोगरा, मेमनसिंह येथे झाले


★ दरम्यान पबनाच्या नागरिकांनी घोषणा केली, " आम्ही फक्त महाराणीची जनता होऊ इच्छितो"



★ समर्थन:- बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय,  आर.सी. दत्त,  सुरेन्द्रनाथ बनर्जी, आनंद मोहन बोस, द्वारका नाथ गांगुली यांनी पुढील काळात समर्थन केले


महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प आणि जिल्हे



महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प  


▪️ तर्भ-मुंबई, खापरखेडा : नागपूर.

▪️बल्लारपूर : चंद्रपूर.

▪️ चोला : ठाणे.

▪️ परळी बैजनाथ : बीड.

▪️ पारस : अकोला.

▪️ एकलहरे : नाशिक.

▪️ फकरी : जळगाव.


महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प


▪️ खोपोली : रायगड.

▪️ भिरा अवजल प्रवाह : रायगड.

▪️ कोयना : सातारा.

▪️ तिल्लारी : कोल्हापूर.

▪️ पच : नागपूर.

▪️ जायकवाडी . औरंगाबाद.


महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प 


▪️ तारापुर : ठाणे.

▪️ जतापुर : रत्नागिरी.

▪️ उमरेड : नागपूर.


महाराष्ट्रातील पवनविद्युत प्रकल्प 


▪️ जमसांडे : सिंधुदुर्ग.

▪️ चाळकेवाडी : सातारा.

▪️ ठोसेघर : सातारा.

▪️ वनकुसवडे : सातारा.

▪️ बरह्मनवेल : धुळे.

▪️ शाहजापूर : अहमदनगर.

Current affairs 2020



 वन संशोधन संस्था कोठे आहे?

(अ) लखनऊ

(ब) नवी दिल्ली 

(क) देहरादून ✔️✔️

(ड) भोपाळ


:केंद्रीय भूकंपीय वेधशाळा कोठे आहे?

(अ) पुणे

 (ब) सिलीगुडी

(क) कोडाईकनाल ✔️✔️

(ड) शिलाँग


शुष्क प्रादेशिक वनीकरण संशोधन संस्था आहे?


(अ) आसाम 

(ब) महाराष्ट्र 

(क) जोधपूर ✔️✔️

(ड) जैसलमेर


राष्ट्रीय संग्रहालय कोठे आहे?

(अ) नवी दिल्ली

(ब) मदुरै 

(क) मुंबई 

(ड) कोलकाता✔️✔️


कमी तापमानात औष्णिक पृथक्करण करण्याच्या तत्त्वावर आधारित, दररोज एक लाख लिटर गोड्या पाण्याचे उत्पादन करणार्‍या प्रथम डिझलिनेशन प्लांटची सुरूवात कोठे झाली?

(अ) कवारत्ती✔️✔️

(ब) पोर्ट ब्लेअर

(क) मंगलोर 

(ड) वलसाड


वाणिज्य विभागांतर्गत खालीलपैकी कोणते सर्वात जुने बोर्ड आहे?

(अ) रबर बोर्ड 

(ब) चहा बोर्ड 

(क) कॉफी बोर्ड ✔️✔️

(ड) तंबाखू बोर्ड


भारतातील उच्च शिक्षणाच्या प्रगतीसाठी 'UGC' ची स्थापना कधी करण्यात आली?

(अ)  1953 ✔️✔️

 (ब) 1954 

(क) 1951 

 (ड) 1967


 ● कोणती लेणी महाराष्ट्र राज्यातल्या उस्मानाबाद शहरापासून 7 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या 7 लेण्यांचा समूह आहे.

 : धाराशिव लेणी


● तमिळनाडूमध्ये साजरा होणार्‍या कोणत्या सणाच्या कालावधीत जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ खेळण्याची प्रथा सहस्रो वर्षांपासून चालू आहे.

 : पोंगल


● विजेरी मोटार वाहन निर्मिती करणाऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

 : कॅलिफोर्निया


● ‘सेमेरू ज्वालामुखी’ कोणत्या देशात आहे?

*उत्तर* : इंडोनेशिया


● बसवाकल्याण येथे ‘न्यू अनुभवा मंतपा’ कोणत्या कवीच्या स्मृतीत उभारले जात आहे?

 : बसवेश्वरा उर्फ बसवा


● ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’ नामक संकेतस्थळ-आधारित व्यासपीठ कोणत्या संस्थेने तयार केले?

: नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन-इंडिया


● ‘हरिके आर्द्रभूमी’ हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

 : पंजाब


● ‘फुरफुरा’ तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

 : पश्चिम बंगाल

राष्ट्र आणि राज्य या भिन्न संकल्पना :-



🏅राज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र या संकल्पनांच्या दृष्टीने या पुस्तकात भारताच्या स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षांचा आढावा घेतला आहे.


🏅 तयामुळे राज्य, राष्ट्र, राज्यराष्ट्र व सांस्कृतिक राष्ट्र या संकल्पनांचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. राज्य आणि राष्ट्र या दोन शब्दांच्या अर्थांमध्ये अनेकवेळा गल्लत होते.


🏅 पाश्चिमात्य विचारवंतांनी या विषयावर बरीच चर्चा करूनही बहुतांश वेळा या शब्दांना समान अर्थाने मानले गेले. 



🏅राज्य म्हणजे असे प्रदेश किंवा देश ज्यांच्यावर एक शासनव्यवस्था आहे. वेगवेगळे देश, वसाहती किंवा प्रदेशांमध्ये एक समान शासनव्यवस्था असेल तर ते सर्व मिळून एक राज्य बनेल. 


🏅जथील लोक काही समान ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्यांनी एकत्र आलेले असतात व त्यांच्यामध्ये एक बांधिलकीची भावना असते. त्यास राष्ट्र म्हणतात.



🏅जव्हा आपण पाश्चिमात्य राष्ट्रे (Western Nations), किंवा आफ्रिकन राष्ट्रे (African Nations) म्हणतो, तेव्हा ते राष्ट्र नसून राज्य असते. 


🏅सयुक्त राष्ट्रे (United Nations) ही संघटना राष्ट्रांची नाही तर ‘राष्ट्रराज्यांची' (Nation States) संघटना आहे. 

इराण सहीत इतर सहा राष्ट्रांनी UNGA मधला मतदानाचा हक्क गमावला.


☑️इराण सहीत इतर सहा राष्ट्रांनी त्यांच्या जबाबदाऱ्यांची काळजी न घेतल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ महासभेतला (UNGA) त्यांचा मतदानाचा हक्क गमावला आहे.


☑️इतर सह देशांमध्ये नायजर, दक्षिण सुदान, झिम्बाब्वे, कांगो ब्राझाव्हिल, मध्य आफ्रिला प्रजासत्ताक आणि लिबिया यांचा समावेश आहे. या देशांना दोन वर्षाची अतिरिक्त मुदत दिली गेली आहे.


☑️सयुक्त राष्ट्रसंघ (UN) संहिता यामधील ‘कलम 19’ अन्वये सदस्याला मतदानाचा हक्क असू शकत नाही जर त्याने संयुक्त राष्ट्रसंघाला करावयाच्या त्याच्या आर्थिक वचनबद्धतेची पूर्तता केली नसणार.


🔳सयुक्त राष्ट्रसंघ (UN) विषयी....


☑️आतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.


☑️1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे.


☑️सघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.


☑️सयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.


☑️UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.


☑️सयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.


☑️सयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात प्रमुख अधिकारी पद‘सरचिटणीस’ (Secretary‑General) हे असून वर्तमानात हे पद पोर्तुगालचे अँटोनियो गुटेरेस यांच्याकडे आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत -


◾️UN महासभा (General Assembly)


◾️UN सुरक्षा परिषद (Security Council)


◾️UN आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council ­ECOSOC)


◾️UN सचिवालय


◾️UN आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) आणि


◾️UN विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).


🟥सयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत -


◾️जागतिक बँक समूह

जागतिक आरोग्य संघटना (WHO)

जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Program)


◾️सयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization –UNESCO)


◾️सयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund –UNICEF)

पर्यावरण जागरूकता-महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे

  (Environment Awareness- Important questions)



१) भोपाळ येथील युनियन कार्बाईड कारखान्यातून------ वायूची गळती झाली होती

अ)  क्लोरीन                                

ब) कार्बन मोनॉक्साईड

क) मिथाईल आयसोसायनेट √                           

ड) नायट्रोजन ऑक्साईड


२) नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्प -----------राज्यात आहे .

अ) महाराष्ट्र                              

ब) आंध्र प्रदेश

क)  कर्नाटक                               

 ड) गुजरात   √


३) हवेत नायट्रोजनचे प्रमाण -------आहे.

 अ) 20•99%                                           

ब) 78•03%   √

क) 0•94%                                               

ड) 0•03℅


४) मानवाच्या शरीरामध्ये----- चे प्रमाण अधिक असते.

अ) ऑक्सिजन                     

ब) नायट्रोजन

क)  हायड्रोजन    √                  

क) कार्बन


५) नवेगाव राष्ट्रीय उद्यान------- ठिकाणी आहे .

अ) नागपूर                                      

ब) चंद्रपूर

क)भंडारा      √                                 

ड) कोल्हापूर


६). भारतामध्ये-------- ही नैसर्गिक आपत्ती अधिक येते .

अ ) चक्रीवादळ                        

 ब) भूकंप

क)   पूर          √             

 ड) वनवा


७) जागतिक वन दिन केव्हा साजरा केला जातो?

अ) 16 सप्टेंबर                                         

ब) 22 एप्रिल

क) 21 मार्च       √                                   

ड) 7 एप्रिल


८) भारतामध्ये ऊर्जेच्या आवश्यकतेसाठी जीवाष्म इंधन नंतर योगदान देणारा महत्त्वपूर्ण स्त्रोत कोणता ?

अ) सौर ऊर्जा          √                                

ब) आण्विक उर्जा

क)  जल विद्युत ऊर्जा                                  

ड) पवन ऊर्जा


९)----- हा वन्य प्राणी विसाव्या शतकाच्या मध्यात भारतातून नामशेष झाला. 

अ)  गंगेतील डॉल्फिन                                           

ब) महाकाय पांडा

क) दोन शिंगी भारतीय गेंडा     √                                  

ड) चित्ता


१०) जैविक कचऱ्यापासून होणारी गांडूळ खताची निर्मिती प्रामुख्याने यांच्यामुळे होते-

अ) कवके                                 

ब) कीटक

क) कृमी          √                               

ड) बॅक्टेरिया


नीति आयोगाने दुसरा इंडिया इनोव्हेशन अहवाल २०२० प्रसिद्ध केला



🔝 २०२० इंडिया इनोव्हेशन अहवालात मोठ्या राज्यात कर्नाटकने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला


 ०१) कर्नाटक : ४२.५० गुण 

 ०२) महाराष्ट्र : ३८.०३ गुण

 ०३) तमिळनाडू : ३७.९१ गुण 

 ०४) तेलंगणा : ३३.२३ गुण 

 ०५) केरळ : ३०.५८ गुण

 ०६) हरयाणा : २५.८१ गुण 

 ०७) आंध्रप्रदेश : २४.९१ गुण

 ०८) गुजरात : २३.६३ गुण 

 ०९) उत्तर प्रदेश : २२.८५ गुण

 १०) पंजाब : २२.५४ गुण 

 ११) पश्चिम बंगाल : २१.६९ गुण 

 १२) राजस्थान : २०.८३ गुण 

 १३) मध्य प्रदेश : २०.८३ गुण  

 १४) ओडिशा : १८.९४ गुण 

 १५) झारखंड : १७.१२ गुण

 १६) छत्तीसगड : १५.७७ गुण 

 १७) बिहार : १४.४८ गुण .


 ▪️२०२० इंडिया इनोव्हेशन अहवालात मोठ्या राज्यात बिहार १४.४८ गुणासह शेवटच्या क्रमांकावर आहे .

बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट; म्हणाले.



🎲जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची बुधवारी सूत्रं स्वीकारली. अमेरिकेत झालेल्या सत्तांतराचं देशभरातून स्वागत करण्यात आलं. विविध देशांच्या प्रमुखांनी बायडेन यांचं अभिनंदन केलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं.


🎲बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलं. बायडेन यांचं अभिनंदन करतानाच मोदी म्हणाले,”भारत-अमेरिकेतील संबंध समान मूल्यांवर आधारित आहे. आपल्याकडे भरीव असा बहुअंगी द्विपक्षीय अजेंडा आहे. जो आर्थिक गुंतवणुकीबरोबरच उत्साही लोकांसोबतचे संबंध वृद्धिंगत करत आहे. भारत-अमेरिकेतील भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी बायडेन यांच्यासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे,” असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.


🎲“अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्याबद्दल मी जो बायडेन यांचं अभिनंदन करतो. भारत-अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मी बायडेन यांच्यासोबत काम करण्याची प्रतीक्षा करत आहे. अमेरिकेचं यशस्वी नेतृत्व करण्यासाठी माझ्या शुभेच्छा कारण, आपल्याला जागतिक शांतता आणि सुरक्षा पुढे नेण्यासाठी समान आव्हानांचा सामना करावा लागत आहे,” असंही मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्राचे एक पाऊल मागे.



🌇वया कृषी कायद्यांविरोधात जवळपास दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशींवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने अखेर एक पाऊल मागे घेतले. याबाबत स्वतंत्र समिती नेमून तोडगा निघेपर्यंत तिन्ही कायद्यांना दीड वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने बुधवारी शेतकरी संघटनांसमोर ठेवला. तसे प्रतिज्ञापत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याची तयारी केंद्राने दर्शवली. या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.


🌇कद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी संघटना यांच्यात बुधवारी विज्ञान भवन येथे झालेली दहावी बैठकही तोडग्याविना संपली. मात्र, केंद्राच्या नव्या प्रस्तावावर शुक्रवारी २२ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पुन्हा बैठक होणार आहे. ‘शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या समितीचा प्रस्ताव मान्य केला तर दीड वर्षांसाठी कायद्यांना स्थगिती दिली जाऊ  शकते’, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.


🌇दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या आंदोलनाला ५६ दिवस झाले असून, केंद्राने पहिल्यांदाच कृषी कायद्यांना स्थगिती देण्याची तयारी शेतकऱ्यांच्या बैठकीत दर्शवली. ‘शेतकरी नेत्यांशी सकारात्मक आणि योग्य दिशेने चर्चा झाली असून, शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत कदाचित तोडगा निघू शकेल’, असा आशावादही तोमर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र : पंचायत राज आणि महत्वाचे प्रश्न



1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

*उत्तर* : स्थानिक स्वराज्य संस्था


2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती?

*उत्तर* : 2 ऑक्टोबर 1953


3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली?

*उत्तर* : 16 जानेवारी 1957


4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती?

*उत्तर* : वसंतराव नाईक समिती


5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती?

*उत्तर* : 27 जून 1960


6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते?

*उत्तर* : महसूल मंत्री


7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या?

*उत्तर* : 226


8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली?

*उत्तर* : जिल्हा परिषद


9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत?

*उत्तर* : तीन (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद)


10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला?

*उत्तर* : 1  मे 1962

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...