महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल/मे २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन परीक्षा करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात येऊन परीक्षांचे सुधारित दिनांक जाहीर करण्यात आले आहे. त्यात राज्य सेवा परीक्षेसह अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचा समावेश आहे.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
११ जानेवारी २०२१
१० जानेवारी २०२१
ब्रिटिश काळातील शिक्षण विषयक समिती आणि आयोग
1.जेम्स थॉमसन शिक्षण व्यवस्था-1843-53
2.मेकॉले समिती-1853
3.वुडचा खलिता-1854
4.हंटर समिती-1882-83
5.थॉमस रॅले-1904 यांच्या शिफारशीने भारतीय विद्यापीठ कायदा 1904
6.सॅडलर समिती-1917-18
7.हारटोग समिती-1929
8.वर्धा योजना/मौलिक व आधारभूत शिक्षण-1937
9.सार्जंट योजना-1944
10.राधाकृष्ण आयोग-1948
Trick :
शिक्षणासाठी=( थॉमसन,मेकॉले,वुडला )-हंटर ने मारल्याने ते रडले(रॅले),सॅड झाले,हर्ट झाल्याने -वर्ध्यास अर्जंट(सार्जंट) राधाकृष्ण यांच्याकडे गेले.
भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी
नदी:-उगम:-लांबी:-उपनदया:-कोठे मिळते
गंगा:-गंगोत्री:-2510:-यमुना, गोमती, शोण:-बंगालच्या उपसागरास
यमुना:-यमुनोत्री:-1435:-चंबळ, सिंध, केण, बेटवा:-गंगा नदिस अलाहाबाद जवळ
गोमती:-पिलिभीत जवळ:-800:-साई:-गंगा नदिस
घाघ्रा:-गंगोत्रीच्या पूर्वेस:-912:-शारदा, राप्ती:-गंगा नदिस
गंडक:-मध्य हिमालय (नेपाळ):-675:-त्रिशूला:-गंगा नदिस पटण्याजवळ
दामोदर:-तोरी (छोटा नागपूर पठार):-541:-गोमिया, कोनार, बाराकर:-हुगळी नदिस
ब्रम्हपुत्रा:-मानस सरोवराजवळ (तिबेट):-2900:-मानस, चंपावती, दिबांग:-गंगा नदिस बांग्लादेशामध्ये
सिंधु:-मानस सरोवराजवळ (तिबेट):-2900:-झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास:-अरबीसमुद्रास
झेलम:-वैरीनाग:-725:-पुंछ, किशनगंगा:-सिंधु नदिस
रावी:-कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश):-725:-दीग:-सिंधु नदिस
सतलज:-राकस सरोवर:-1360:-बियास:-सिंधु नदिस
नर्मदा:-अमरकंटक (एम.पी):-1310:-तवा:-अरबी समुद्रास
तापी:-मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश):-702:-पूर्णा, गिरणा, पांझरा:-अरबी समुद्रास
साबरमती:-अरवली पर्वत:-415:-हायमती, माझम, मेखो:-अरबी समुद्रास
चंबळ:-मध्य प्रदेशामध्ये:-1040:-क्षिप्रा, पार्वती:-यमुना नदिस
महानदी:-सिहाव (छत्तीसगड):-858:-सेवनाथ, ओंग, तेल:-बंगालच्या उपसागरास
गोदावरी:-त्र्यंबकेश्वर:-1498:-सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती:-प्रदेशात राजमहेद्रीजवळ
कृष्णा:-महाबळेश्वर:-1280:-कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा:-बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात
भीमा:-भीमाशंकर:-867:-इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान:-कृष्णा नदिस
कावेरी:-ब्रम्हगिरी (कर्नाटक):-760:-भवानी, सुवर्णवती, कर्नावती:-बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)
तुंगभ्रद्रा:-गंगामूळ (कर्नाटक):-640:-वेदावती, हरिद्रा, वरद:-कृष्णा नदिस
इतिहासातील महत्वाच्या घटना
👉 कर_घटनेचे नाव_वर्ष विशेष 👈
1) प्लासीची लढाई 1757 सिराज उधौला व इंग्रज
2) भारताकडे येण्याचा सागरी मार्ग 1498 वास्को-द-गामा
3) वसईचा तह 1802 इंगज व पेशवे
4) बस्कारची लढाई 1764 शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज
5) सालबाईचा तह 1782 इंग्रज व मराठे
6) तिसरे इंग्रज-मराठा युद्ध 1818 दुसर्या बाजीरावचा पराभव, मराठेशाहीचा शेवट
7) अलाहाबादचा तह 1765 बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी
8) तैनाती फौज (सुरवात) 1797 गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी
9) दुहेरी राज्यव्यवस्था 1765 रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल)
10) रेग्युलेटिंग अॅक्ट 1773 बंगालच्या गव्हर्नरला 'गव्हर्नर जनरल' हा किताब देण्यात आला.
11) सतीबंदीचा कायदा 1829 बेटिंग
12) भारतात इंग्रज सत्तेची सुरवात 1835 लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले
13) रेल्वेचा प्रारंभा (मुंबई ते ठाणे) 1853 लॉर्ड डलहौसी
14) भारतातील पहिली कापड गिरणी 1853-54 काउसजी
15) पहिली ताग गिरणी 1855 बंगालमधील रिश्रा
16) विधवा पुनर्विवाह कायदा 1856 लॉर्ड डलहौसी
17) विद्यापीठांची स्थापना 1857 मुंबई,मद्रास,कोलकाता
18) 1857 चा कायदा 1857 भारतमंत्री पदाची निर्मिती
19) राणीचा जाहिरनामा 1 नोव्हेंबर 1858 लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला
20) वुडचा खलिता 1854 वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात
21) 1861 चा कायदा 1861 भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी
22) दख्खनचे दंगे 1875 महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन
23) शेतकर्याचा उठाव 1763 ते 1857 बंगालमध्ये सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाला
24) हिंदी शिपायांचा उठाव 1806 वेल्लोर येथे झाला
25) हिंदी शिपायांचा उठाव 1824 बराकपूर
26) उमाजी नाईकांना फाशी 1832
27) संस्थाने खालसा 1848 ते 1856 डलहौसी (संबळपुर, झाशी, अयोध्या इ.)
28) मंगल पांडे याने मेजर हडसनवर गोळी झाडली 29 मार्च 1857 बराकपूरच्या छावणीत
29) 1857 च्या उठावाची सुरवात 10 मे 1857 'हर हर महादेव, मारो फिरंगी का' अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू
30) भिल्लाचा उठाव 1857 खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली
31) गोंड जमातीचा उठाव - ओडिशा
32) संथाळांचा उठाव - बिहार
33) रामोशांचा उठाव - उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली
34) गडकर्याचा उठाव - कोल्हापूर
35) कोळी व भिल्लाचा उठाव - महाराष्ट्र
36) 1857 च्या उठावाचे नेतृत्व - बहादुरशाह
37) भारतातील पहिली कामगार संघटना 1890 नारायण मेघाजी लोखंडे
38) स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882 लॉर्ड रिपन
39) हंटर कमिशन 1882 भारतीय शिक्षणविषयक आयोग
40) भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली 1878 लॉर्ड लिटन
41) भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली 1882 लॉर्ड रिपन.
महाराष्ट्रातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇
महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
👉 १ मे १९६०
महाराष्ट्राची राजधानी कोणती?
👉 मबई
महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?
👉 नागपूर
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?
👉 ६
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?
👉 ५
महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?
👉 ३६
महाराष्ट्रातील महानगरपालिका?
👉 २६
महाराष्ट्रातील नगरपालिका?
👉 २२२
महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?
👉 ७
महाराष्ट्रातील जिल्हापरीषदा?
👉 ३४
महाराष्ट्रातील एकुण तालुके?
👉 ३५८
महाराष्ट्रातील पंचायत समित्या?
👉 ३५५
महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
👉 ११,२३,७४,३३३
स्त्री : पुरुष प्रमाण किती?
👉 ९२९ : १०००
महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?
👉 ८२.९१%
महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?
👉 मबई उपनगर (८९.९१% )
सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?
👉 नदुरबार (६४.४% )
सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?
👉 रत्नागिरी
सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?
👉 मबई शहर
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 अहमदनगर
क्षेत्रफळाने लहान जिल्हा?
👉 मबई शहर
जास्त लोकसंख्येचा जिल्हा?
👉 ठाणे
कमी लोकसंख्येचा जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?
👉 ९३%
महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?
👉 आबा
महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?
👉 मोठा बोंडारा
महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
👉 हारावत
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
👉 शकरु
महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?
👉 मराठी
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?
👉 कळसुबाई (१६४६ मी.)
महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?
👉 गोदावरी
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
भारतातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇
सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?
👉 गगानगर ( राजस्थान )
सर्वांत जास्त जिल्ह्यांचे राज्य?
👉 उत्तरप्रदेश
सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?
👉 मबई (१,८४,१४,२८८ )
सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?
👉 करळ
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 गिरसप्पा धबधबा
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 बरह्यमपुत्रा
सर्वांत मोठी घुमट कोणती?
👉 गोल घुमट
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 थरचे वाळवंट
सर्वांत उंच पुतळा कोणता?
👉 गोमटेश्वर ( बाहुबली )
सर्वांत मोठे धरण कोणते?
👉 भाक्रा नांगल
सर्वांत उंच धरण कोणते?
👉 टिहरी
सर्वांत लांब धरण कोणते?
👉 हिराकुड
सर्वांत लांब बोगदा कोणता?
👉 जवाहर बोगदा
सर्वांत मोठे स्टेडियम कोणते?
👉 यवा भारती
सर्वांत उंच मनोरा कोणता?
👉 दरदर्शन मनोरा
सर्वांत उंच झाड कोणते?
👉 दवदार
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 कच्छ
लोकसंख्येने मोठा जिल्हा?
👉 ठाणे
सर्वाधिक पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
जगाचे जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 सहारा ( आफ्रिका )
सर्वांत मोठे बेट कोणते?
👉 गरीनॅलंड
सर्वाधिक लोकसंख्येचा देश?
👉 चीन
क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?
👉 रशिया
सर्वांत मोठा खंड कोणता?
👉 आशिया
सर्वांत मोठी गर्ता कोणती?
👉 मरियना
सर्वांत मोठा पक्षी कोणता?
👉 शहाम्रुग
सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?
👉 सदरबन
सर्वांत मोठा पुतळा कोणता?
👉 सटॅचु ऑफ लिबर्टी
सर्वांत मोठी नदी कोणती?
👉 अमेझॉन
सर्वांत मोठे बंदर कोणते?
👉 सिडनी
सर्वांत मोठा महासागर कोणता?
👉 पसिफिक महासागर
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद ( दिल्ली )
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 वहेनेझुएला
सर्वांत लहान खंड कोणता?
👉 ऑस्ट्रेलिया
सर्वांत लहान महासागर कोणता?
👉 आर्क्टिक महासागर
सर्वांत लहान पक्षी कोणता?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लहान दिवस कोणता?
👉 २२ डिसेंबर
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 नाईल
सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम ( मेघालय )
सर्वांत जलद उडणारा पक्षी?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?
👉 मलाक्काची सामुद्रधुनी
पक्षांतर बंदी कायदा म्हणजे काय असते ?
⚡️ राष्ट्रवादीच्या काही आमदारांसोबत अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने आमदारांना उद्देशून शरद पवार यांनी पक्षांतर बंदी कायद्याची आठवण करून दिली आहे.
💫 तया पार्श्वभूमीवर पक्षांतर बंदी कायद्याद्वारे आमदारांवर काय कारवाई होते, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ
🧐 पक्षांतरबंदी कायदा केव्हा लागू झाला ? : 52 व्या घटना दुरुस्तीत 1985 पासून देशात पक्षांतरबंदी कायदा लागू करण्यात आला. एकतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास ते पक्षांतर होत नाही अशी तरतूद करण्यात आली होती.
📍 सदस्य अपात्र कसा ठरतो ? :
▪️ पक्षादेशाचे (व्हिप) पालन न केल्यास सदस्य अपात्र ठरू शकतो.
▪️ अन्य पक्षात प्रवेश केल्यास सदस्य अपात्र ठरू शकतो.
▪️ अन्य पक्षांच्या बैठकांना हजेरी लावल्यास सदस्य अपात्र ठरू शकतो.
🔍 बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी फारकत घेऊन भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.
🎯 पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा :
2003 मध्ये करण्यात आलेल्या घटना दुरुस्तीनुसार एकूण सदस्यसंख्येच्या दोन तृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केले तरच सदस्यत्व कायम राहू शकते.
ED - ईडी म्हणजे नक्की आहे तरी काय ?
🔸ईडी म्हणजे Enforcement Directorate च संक्षिप्त रूप ज्याला मराठी मध्ये अंमलबजावणी संचालनालय म्हटलं जातं.
🔸ह दोन्ही भाषेतील शब्द जितके अवघड आहेत तितकी त्यांची काम करण्याची पध्दत सुद्धा! कायद्याचं उत्तम जाण असणारे निडर कार्यक्षम सनदी अधिकारी ईडी मध्ये नियुक्त केले जातात.
🔸तम्ही अजय देवगण चा रेड हा सिनेमा पहिला असेलच. आपल्या भारतामध्ये आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी तसेच आर्थिक गुन्ह्यांचा मुकाबला करणारी यंत्रणा आहे. ही अर्थ मंत्रालयातील राजस्व विभागाचा एक भाग आहे. यात भारतीय महसूल सेवेतील अधिकारी काम करतात. परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा तपास करण्यासाठी भारत सरकारने १ जून २००० रोजी याची स्थापना केली.
पण त्यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाची स्थापना १ मे १९५६ रोजी करण्यात आली. भारतात आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही देशात आर्थिक कायद्याचं व्यवस्थापन करणारी संस्था आहे. अंमलबजावणी संचालनालय ही संस्था अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागा अंतर्गत येते.
🔸भारत सरकारच्या १९४७ च्या कायद्याअंतर्गत ईडीची स्थापना करण्यात आली होती. १९५६ ला स्थापनेच्या वेळी ईडीला ईयू (एनफोर्समेंट यूनिट) म्हणून ओळखलं जायचं. पण १९५७ ला त्याचं नाव बदलून ईडी (एनफोर्समेंट डायरेक्टरेट) असं करण्यात आलं.
🔸ही एक इकोनॉमिक्स इंटेलिजन्स एजन्सी आहे. देशातील हवाला, मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींवर ईडी नजर ठेवते. तिचा मुख्य उद्देश भारत सरकारच्या दोन प्रमुख कायद्यांची अंमलबजावणी करणे आहे. हे दोन कायदे आहेत "परकीय विनिमय व्यवस्थापन अधिनियम १९९९" व "अवैध मुद्रा रूपांतरण प्रतिबंध, २००२".
🔸सर्वप्रथम फेरा (Foreign Exchange Regulation Act) १९४७ च्या कायद्यानुसार ईडीची स्थापना झाली. त्यानंतर या कायद्यात बदल करून फेरा १९७३ आला. आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेमुळे फेरा १९७३ च्या नियामक कायद्यात थोडाफार बदल करण्यात आला. त्याच्या जागी १ जून २००० ला फेमा (Foreign Exchange Management Act) १९९९ हा कायदा लागू करण्यात आला.
🔸तयानंतर विदेशी संपत्ती नियमन कायदा (पीएमएलए २००२) (Prevention of Money Laundering Act 2002) हा नवा कायदा लागू करून अंमलबजावणी संचालनालयाकडे त्याची जबाबदारी देण्यात आली.
🔶ईडी चे कार्यालय व केंद्र........
🔸नवी दिल्ली इथं अंमलबजावणी संचालनालयाचं मुख्यालय आहे. इथं संचालक कार्यरत असतात. त्या शिवाय मुंबई, चेन्नई, चंदीगढ आणि कोलकाता आणि दिल्ली याठिकाणी विभागीय कार्यालय आहेत. इथं विशेष संचालक काम पाहतात. यांच्या खाली अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगढ, चेन्नई, कोच्ची, दिल्ली, पणजी, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जालंधर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, पटना आणि श्रीनगर या शहरांत क्षेत्रीय कार्यालय आहेत. याठिकाणी संयुक्त संचालक काम पाहतात.
🔸उपक्षेत्रीय कार्यालय भुवनेश्वर, कोझिकोडे, इंदूर, मदुरै, नागपूर, इलाहाबाद, रायपूर, देहरादून, रांची, सुरत, शिमला, विशाखापट्टणम आणि जम्मू इथं उपक्षेत्रीय कार्यालय आहेत. इथं उप संचालक कार्यरत असतात. सध्या संजयकुमार मिश्रा अंमलबजावणी संचालक म्हणून काम पाहत आहेत.
🔶ईडीचे कार्य........
🔸१९९९ च्या फेमा उल्लंघनाशी संबंधित माहिती संकलित करणे, विकसित करणे आणि प्रचार करणे. केंद्रीय व राज्य गुप्तहेर संस्था, तक्रारी इ. सारख्या विविध स्त्रोतांकडून गुप्त पध्दतीने कोणती गुंतवणूक केली गेली आहे का ते तपासणे.
🔸फमाच्या संशयास्पद उल्लंघनाच्या तरतुदींचे परीक्षण करणे, जसे की "हवाला" परकीय चलन रॅकेटिंग, निर्यात प्रक्रिया पूर्ण न करणे, परकीय चलन परत न करणे किंवा अंतर्गत इतर प्रकारच्या उल्लंघनांचे प्रकार तपासण
ग्रामप्रशासन
· भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.
· लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला.
· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार -2 ऑक्टोंबर 1959
· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य - आंध्रप्रदेश स्विकार -1 नोव्हेंबर 1959
· पंचायतराज स्विकारणारे नववे राज्य - महाराष्ट्र
· स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले.
बलवंतराय मेहता समिती
· भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.
· या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला.
· या समितीमधील इतर सदस्य - ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव.
यासमितीने केलेल्या शिफारशी
· लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.
· पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.
· ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.
· ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.
· ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी.
· जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे.
· जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा.
· पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)
· अशोक महेता समिती नियुक्ती - 1977. शासनास अहवाल सादर - 1978.
महत्वाच्या घटना दुरुस्त्या
४२वी [१९७६]- स्वर्ण सिंग समितीच्या शिफारासीवरून ही घटना दुरुस्ती करण्यात आली.
मूलभूत हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना अधिक महत्व देण्यात आले
सरनाम्यामध्ये समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट
५१अ भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट
मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक
४४वी [१९७८]- संपत्तीचा अधिकार मूलभूत हककांमधून वगळण्यात आला.
१ली [१९५०]- ९वे परिशिष्ट समाविष्ट [विविक्षित नियम विधिग्रह्य करणे]
५२वी [१९८५]- १०वे परिशिष्ट समाविष्ट [पक्षांतर बंदी]
७३वी [१९९३]- ११वे परिशिष्ट समाविष्ट [ग्राम प्रशासन]
७४वी [१९९३]- १२वे परिशिष्ट समाविष्ट [नागरी प्रशासन]
२१वी [१९६७]- सिंधी भाषा समाविष्ट
७१वी [१९९२]- कोकणी, मणिपुरी, नेपाळी भाषा समाविष्ट
९२वी [२००३]- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी भाषा समाविष्ट.
२४वी [१९७१]- कलम ३६८ मध्ये इंदिरा गांधींनी दुरुस्ती केली. [वादग्रस्त]
२५वी [१९७१]- बँकाच्या राष्ट्रीयीकरनाबाबत.
२६वी [१९७१]- संस्थानिकांचे तनखे रद्द
३६वी [१९७५]- सिक्किमला राज्याचा दर्जा
५५वी [१९८६]- अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा
५६वी [१९८७]- गोव्याला राज्याचा दर्जा
६१वी [१९८९]- मतदाराचे वय २१ वरुन
१८ वर्षे करण्यात आले.
८६वी [२००२]- ६-१४ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाचा हक्क आणि पालकांचे कर्तव्य समाविष्ट
८९वी [२००३]- अनुसूचित जमाती आयोग अनुसूचित जाती आयोगापासून वेगळा करण्यात आला. (कलम ३३९)
९१वी [२००३]- मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभा व विधानसभा सदस्यसंख्येच्या १५% पेक्षा जास्त असणार नाही.
९३वी [२००६]- खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मागासावर्गीयांसाठी राखीव जागांची तरतूद
९६वी [२०१२]- ओरिसा राज्याचे नाव ओडिशा करण्यात आले
९७वी [२०१२]- सहकारी संस्था [१४व्या लोकसभेत हे १०४वे तर १५व्या लोकसभेत १११वे घटना दुरुस्ती विधेयक म्हणून मांडण्यात आले होते]
१०३वी- राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना
१०८वी- स्त्रियांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये १/३ आरक्षणासंबंधी [सर्वप्रथम १९९६ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ५ वेळा लोकसभेत मांडले गेले]
११०वी- स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५०% आरक्षणासंबंधी
११५वी- गूड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स संबंधी
११६वी- लोकपाल [सर्वप्रथम १९६७ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ११ वेळा संसदेत मांडले गेले.
विधानसभेची रचना :
170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.
राखीव जागा :
घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 33 तर अनुसूचीत जमातीसाठी 14 राखीव जागा आहेत.
निवडणूक : प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.
उमेदवारांची पात्रता :
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.
सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.
गणसंख्या : 1/10
अधिवेशन : दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.
सभापती व उपसभापती :
विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.
सभापतीचे कार्य आणि अधिकार :
1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.
2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.
3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.
4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.
जनरल माहिती :
1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.
2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.
3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.
4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.
5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.
6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.
7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.
8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.
भारतीय संघराज्य निर्मिती
* संघराज्य म्हणजे अधिकार वाटपाची व्यवस्था असून त्यात एक सर्वसाधारण शासन केंद्रशासन व संघराज्य शासन आणि सर्वसाधारण शासनाचे घटक पातळ्या निर्माण केल्या जातात.
* संघराज्य निर्मितीच्या मुख्यतः दोन प्रक्रिया दिसून येतात एक केंद्रोकर्षी व केंद्रोत्सारी आहेत.
* केंद्राकर्षी - यात स्वतंत्र प्रदेश येऊन संघशासन निर्माण करतात. उदा - अमेरिकन संघराज्य पूर्वसूचीच्या १३ स्वतंत्र वसाहतींनी एकत्र येऊन निर्माण झाले.
* केंद्रोत्सारी - यात एक अखंड भूप्रदेश विविध कारणामुळे घटक शासनाची निर्मिती करतो. उदा भारत
* पुढील कारणामुळे व्यवस्थेचा स्वीकार केला लक्षात येते समाजव्यवस्थेत आढळणारी विविधता, सामाजिक, राजकीय, आर्थिक विकासाचे उद्दिष्ट्ये, लोकशाही विकेंद्रित करणारे तत्व, प्रशासकीय सोय.
आतापर्यंतचे लोकसभेतील एंग्लो इंडियन खासदार.
1. १९५२ ते १९५७ - श्री. फ्रैंक एन्थोनी
2. १९५२ ते १९५७ - श्री. ए.इ.टी. बैरो
3. १९५७ ते १९६२ - श्री. फ्रैंक एन्थोनी
4. १९५७ ते १९६२ - श्री. ए.इ.टी. बैरो
5. १९६२ ते १९६७ - श्री. फ्रैंक एन्थोनी
6. १९६२ ते १९६७ - श्री. ए.इ.टी. बैरो
7. १९६७ ते १९७० - श्री. फ्रैंक एन्थोनी
8. १९६७ ते १९७० - श्री. ए.इ.टी. बैरो
9. १९७१ ते १९७७ - श्री. फ्रैंक एन्थोनी
10. १९७१ ते १९७७ - श्रीमती मर्जरी गॉडफ्रे
11. १९७७ ते १९७९ - श्री. ए.इ.टी. बैरो
12. १९७९ ते १९७९ - श्री. रुडॉल्फ रॉड्रीग्ज
13. १९८०ते १९८४ - श्री. फ्रैंक एन्थोनी
14. १९८० ते १९८४ - श्री. ए.इ.टी. बैरो
15. १९८४ ते १९८९ - श्री. फ्रैंक एन्थोनी
16. १९८४ ते १९८९ - श्री. ए.इ.टी. बैरो
17. १९८९ ते १९९१ - श्री. जॉस फर्नांडीज
18. १९८९ ते १९९१ - श्री. पॉल मंतोष
19. १९९१ ते १९९६ - श्री. फ्रैंक एन्थोनी
20. १९९१ ते १९९६ - मेजर जनरल रॉबर्ट इ विल्यम्स
21. १९९६ ते १९९७ - श्री. नील ओब्रायन
22. १९९६ ते १९९७ - श्रीमती हेडविग रेगो
23. १९९८ ते १९९९ - डॉ. श्रीमती बेट्रीक्स डिसुजा
24. १९९८ ते १९९९ - लेफ्टनंट जनरल नेविल फॉले
25. १९९९ ते २००४ - डॉ. श्रीमती बेट्रीक्स डिसुजा
26. १९९९ ते २००४ - श्री. डेन्झेल बी. एटकिन्सन
27. २००४ ते २००९ - श्रीमती इंग्रीड मैकलिओड
28. २००४ ते २००९ - श्री फ्रान्सिस फान्थोमे
29. २००९ ते २०१४ - श्रीमती इंग्रीड मैकलिओड
30. २००९ ते २०१४ - डॉ. श्री. चार्ल्स डायस
31. २०१४ ते पुढे - प्रा. रिचर्ड हे
32. २०१४ ते पुढे - श्री. जॉर्ज बेकर
भारतीय निवडणूक आयोग
🔺 सथापना :- २५ जानेवारी १९५०
🔹 मख्यालय :- नवी दिल्ली
🔸 मख्यनिवडणूक आयुक्तांची निवड :-
राष्ट्रपती - सूनिल अरोरा
🔹 हल्पलाईन क्रमांक :- १९५०
🔸 सलोग्न :- देश का महा त्योहार
🔹 पोर्टल :- eci.gov.in
🔸 राज्यघटना भाग :- १५
🔺 कलम :- 324
🔹 आयोग संबधित कलम :-
३२४ - ३२९
🔸 ७३ वी घटना दुरुस्ती :- राज्य निवडणूक
📚 आयोगाची स्थापना
🔸 निवडणूक आयोगाची कामे :-
०१) मतदारसंघ आखणे
०२) मतदारयादी तयार करणे
०३) राजकीय पक्षांना मान्यता देणे
निवडणूक चिन्हे ठरवणे
०४) उमेदवारपत्रिका तपासणे
०५) निवडणुका पार पाडणे
०६) उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा
ताळमेळ लावणे
◆ ६१ वी घटना दुरुस्ती :- १९८८ ,
मतदार वय २१ वरून १८ करण्यात
आले.
◆ अन्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक -
राष्ट्रपती - ३२४ (२) - या दोन
निवडणूक आयुक्तांना पदावरून
काढण्या साठी महाभियोग
चालवण्यात येत नाही.
◆ आयोग घटनात्मक, स्थायी, स्वायत्व
भारत में बैंकों का स्थापना वर्ष
👉 बक आॅफ हिन्दुस्तान =1770 में
👉इलाहाबाद बैंक =1865 में
👉 अवध काॅमर्शिल बैंक = 1881 में
👉 पजाब नेशनल बैंक =1894 में
👉 कनरा बैंक =1906 में
👉 बक आॅफ इंडिया = 1906 में
👉 काॅरपोरेशन बैंक = 1906 में
👉 इडियन बैंक =1907 में
👉 पजाब एंड सिंधी बैंक = 1908 में
👉 बक आॅफ बड़ौदा= 1908 में
👉 सट्रल बैंक आॅफ इंडिया =1911 में
👉 यनियन बैंक आॅफ इंडिया =1919 में
👉 इम्पीरियल बैंक =1921में
👉 आध्रा बैंक = 1923 में👉 सिंडीकेट बैंक = 1925 में
👉 विजया बैंक =1931 में
👉 रिजर्व बैंक आॅफ इंडिया =1935में
👉 बक आॅफ महाराष्ट्र =1935में
👉 इडियन ओवरसीज बैंक =1937 में
👉 दना बैंक =1938 में
👉 ओरिएंटल बैंक आॅफ काॅमर्स =1943में
👉 यको बैंक =1943 में
👉 यनाइटेड बैंक आॅफ इंडिया = 1950 में
👉 सटेट बैंक आॅफ इंडिया =1955 में
👉 ICICI बैंक = 1994 में
👉 HDFC बैंक = 1994 में
👉 IDBI बैंक =1964 में
👉 एक्सिस बैंक = 2007 में
लंब आणि क्षैतिज आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.
🔰सर्वोच्च न्यायालयाने लंब आणि क्षैतिज आरक्षणावर आपला निर्णय दिला आहे.
🔰नयायालयाचा निर्णय - लंब-क्षैतिज आरक्षित प्रवर्ग असे दोन्हीमध्ये मोडणारी एखादी व्यक्ति जर लंब आरक्षणाशिवाय पात्र होण्यासाठी पुरेसे गुण मिळविलेले असेल तर त्या व्यक्तीला लंब आरक्षणाशिवाय पात्र ठरविले जाणार आणि सर्वसामान्य श्रेणीतल्या क्षैतिज आरक्षणापासून वगळता येणार नाही.
🔰लब आरक्षण (Vertical reservation) - अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला लंब आरक्षण असे संबोधले जाते. कायद्यानुसार निर्दिष्ट केलेल्या प्रत्येक गटासाठी ते स्वतंत्रपणे लागू होते.
🔰कषैतिज आरक्षण (Horizontal reservation) – समाजात सर्व नागरिकांना समान संधी देण्याच्या उद्देशाने स्त्री, जेष्ठ व्यक्ती, तृतीयपंथी समुदाय आणि दिव्यांग व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या आरक्षणाला लंब आरक्षण म्हणतात.
निवडणूक खर्च मर्यादेत वाढ
▪️लोकसभा आणि विधानसभा निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांना दिलासा देताना केंद्र सरकारने निवडणूक खर्चाची मर्यादा १० टक्क्यांनी वाढविली आहे.
▪️तयाअंतर्गत आता उमेदवार लोकसभा निवडणुकीत ७७ लाखांपर्यंत आणि विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त
३०.८० लाख रुपये खर्च करू शकतील.
▪️लोकसभेत आतापर्यंत खर्चाची ही मर्यादा जास्तीत जास्त ७० लाख रुपये आणि विधानसभेत २८ लाख रुपयांपर्यंत होती.
▪️कद्रीय कायदा मंत्रालयाने दिलेल्या अधिसूचनेनंतर ही वाढ तातडीने अंमलात आली आहे.
▪️यापूर्वी निवडणूक खर्च मर्यादेमध्ये २०१४ मध्ये ही वाढ करण्यात आली होती. (डिटेल्स मध्ये या लेखानंतर माहिती देतो )
▪️अरुणाचल प्रदेश, गोवा, सिक्कीम, पुद्चेरी, अंदमान आणि निकोबार, दादरा नगर हवेली आणि दमण दीव, लक्षद्वीप, लडाख या छोट्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकारने निवडणूक खर्चाची मर्यादा कमीच ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीत ५९.४० लाख आणि विधानसभा निवडणुकीत २२ लाख रुपये.
▪️यासह मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड या ईशान्येकडील राज्यांत लोकसभेने खर्चाची मर्यादा ७७ लाख ठेवली आहे, परंतु विधानसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा २२ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
♦️निवडणूक आयोगाकडून दोन सदस्यीय समिती: :-
▪️कद्रीय विधि व न्याय मंत्रालयाने निवडणूक खर्चात दहा टक्के वाढ केल्यानंतर यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने २१ ऑक्टोबर २०२० रोजी दोन सदस्यांची समिती नियुक्त केली.
▪️माजी महसूल अधिकारी हरीश कुमार व उमेश सिन्हा यांची समिती उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याबाबत चार महिन्यांत आयोगाला अहवाल सादर करेल.
♦️निवडणूक खर्चाची मर्यादा - 2014.
▪️सन २०१४ मध्ये केंद्र सरकारने मोठ्या राज्यांतील लोकसभेच्या उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा पूर्वीच्या रु. ४० लाखांवरून रु.७० लाख अशी वाढविली. इतर राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मर्यादा पूर्वीच्या रु.१६ लाख ते ४० लाख यांवरून रु. ५४ लाख करण्यात आली.
▪️तयाचप्रमाणे मोठ्या राज्यातील विधानसभेच्या जागेसाठी ही मर्यादा पूर्वीच्या रु.१६ लाखांवरून रु. २८ लाख करण्यात आली.
▪️इतर राज्ये व संघराज्य प्रदेशांसाठी ही मर्यादा रु.८ लाख ते रु.१६ लाखांवरून रु. २० लाख करण्यात आली.
▪️ तसेच खर्चाच्या राज्यनिहाय मर्यादा वेगवेगळ्या आहेत.
......................................................
📌 आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा 100% प्रश्न विचारला जाऊ शकेल.
📌घटक - निवडणुक प्रक्रिया.
📌उपघटक - निवडणूकविषयक सुधारणा व निवडणुकीतील निवडणुकीतील खर्च
भारताने ‘राष्ट्रीय अणु कालमापक’ विकसित केले
4 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी मापनशास्त्र’ या संकल्पनेखाली आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय मापन शास्त्र परिषद 2021’ याचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ‘राष्ट्रीय अणु कालमापक’ आणि ‘भारतीय निर्देशक द्रव्य प्रणाली’ हे महत्वाचे शोध राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (CSIR-NPL) या संस्थेनी ‘राष्ट्रीय अणु कालमापक’ तयार केला आहे.2.8 नॅनो सेकंदापर्यंतची अचूक वेळ मोजण्यात कालमापक सक्षम आहे.
भारत आता एका नॅनो सेकंदाच्या कालमापन करण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला आहे. आता भारतीय प्रमाण वेळ 3 नॅनो सेकंदापेक्षा कमी अंतराने आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेशी जुळते.
ह्या प्रणालीची ISRO सारख्या अति अचूक तंत्रज्ञानाशी संबंधित काम करणाऱ्या संस्थांना मोठी मदत होणार आहे. बँकिंग, रेल्वे, संरक्षण, आरोग्य, दूरसंचार, हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन आणि अशा आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक क्षेत्रांना याचा मोठा फायदा होणार आहे.
अमेरिकेतील न्यायाधीशपदासाठी भारतीयाला नामांकन
• डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया (वॉशिंग्टन सी.) न्यायालयाच्या सहाय्यक न्यायाधीशपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे वकील विजय शंकर यांच्या नावाची शिफारस केली आहे.
• शंकर यांच्या नावाला सिनेटची मंजुरी मिळाल्यास या पदावरील त्यांचा कार्यकाल 15 वर्षांचा असेल.
• ते सध्या न्याय विभागात वरिष्ठ वकील आहेत.
• 2012 मध्ये न्याय विभागात नियुक्त होण्यापूर्वी शंकर वॉशिंग्टन डीसीमध्ये खासगी वकिली करत होते.
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या...
▪️पोलादपूर तालुक्यातील ऐतिहासिक कोंढवी किल्लय़ावर भैरवनाथ जोगेश्वरी मंदिराच्या जीर्णोद्धार समयी खोदकाम करतेवेळी शिवकाळातील १५ मुर्त्यां सापडल्या आहेत.
▪️तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवी येथे मंदिराचे काम करतेवेळी पाण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्यासाठी खोदकाम करतेवेळी शिवकाळातील पंधरा मुर्त्यां सापडल्या या मूर्तीमध्ये भैरी ,जोगेश्व्री ,वाघजाई, वीर मूर्ती, तसेच गणेश मूर्ती इत्यादी मूर्तिंचा समावेश आहे. मोठय़ा प्रमाणात मुर्ति सापडल्यामुळे पोलादपूर तालुक्यासह कोकणातील भाविकांची या कोंढवी गडाकडे दर्शनासाठी रीघ लागली आहे
▪️तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवी सह चोळई, गाजवणे, खडकवणे, धामणदेवी, फणसकोंड, गोलदरा, तळ्याचीवाडी या गावाचे आराध्य दैवत असलेल्या जोगेश्वरी मंदिराच्या पूर्व बाजू पाण्याची साठवण टाकी साठी खोदकाम करीत असताना या मुर्त्यां आढळून आले आहेत.
▪️या मुर्त्यां मध्ययुगीन व शिवकाळातील असून सदर मुत्यांमध्ये श्री गणेश, भैरी जोगेश्वरी वाघजाई वीर मुर्त्यां इत्यादींचा समावेश आहे कोकण इतिहास परिषदेचे प्रा.अंजय धनावडे तसेच इतिहास संशोधक प्रवीण भोसले यांनी या मूर्त्यां संदर्भात या मुर्त्यां चौदाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत असल्याचे नमूद केले आहे सदर मुर्ती या अगोदर सुद्धा येथे शिव लिंगाखालील पीठ,दिवा,तसेच मध्ययुगीन भांडय़ांचे अवशेष सापडले आहेत.
टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन अशक्य.
🔶जपानसह काही देशांमध्ये करोनाची साथ पुन्हा तीव्र झाल्यामुळे येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यांत लांबणीवर पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन अवघड आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.
🔶टोक्योसहित काही राज्यांमध्ये जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी गुरुवारी आणीबाणी जाहीर केली आहे. यासंदर्भात कॅनडाचे ‘आयओसी’ सदस्य रिचर्ड पौंड यांनी ‘बीसीसी’ वृत्तवाहिनीवर म्हटले की, ‘‘सध्या करोना संसर्गाची रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. त्यामुळे ऑलिम्पिकबाबत अनिश्चितता पसरली आहे.’’
🔶जपानमध्ये गुरुवारी २,४४७ नव्या रुग्णांची विक्रमी नोंद झाली. त्यामुळे लागू करण्यात आलेली आणीबाणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत असेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. या परिस्थितीतही ऑलिम्पिक होईल, अशी संयोजकांना आशा आहे. परंतु याकरिता कृती आराखडा त्यांच्याकडे नाही, असे पौंड यांनी सांगितले. खेळाडूंना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन पौंड यांनी केले आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट या काळात ऑलिम्पिक आयोजित केले जाणार आहे.
०९ जानेवारी २०२१
प्रवासी भारतीय दिवस: 9 जानेवारी 2021.
🔰परदेशांत राहणाऱ्या भारतीयांना जोडून आणि सामावून घेण्याच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणारी ‘प्रवासी भारतीय दिवस परिषद’ हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे.
🔰यदाची सोळावी प्रवासी भारतीय दिवस परिषद 9 जानेवारी 2021 रोजी आभासी माध्यमातून आयोजित केली जाणार आहे. “आत्मनिर्भर भारतासाठी योगदान देताना” परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे.
🔰परिषदेचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर सुरीनाम प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत.
🔰यवा प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे आयोजन 8 जानेवारी 2021 रोजी आभासी माध्यमातून झाली असून, “भारत आणि परदेशातील यशस्वी तरुणांना एकत्र आणताना” अशी या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना होती. ही परिषद युवक कल्याण व क्रिडा मंत्रालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शासनाची परवानगी.
🔰महाराष्ट्र केसरी किताब लढत आणि ६४व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला महाराष्ट्र शासनाने गुरुवारी परवानगी दिली.
🔰या स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पाठपुरावा केला होता. करोनाविषयक सर्व शिष्टाचारांचे पालन करून या स्पर्धेला परवानगी देण्यात आली आहे. शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्यक्ष संपर्क असलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये कुस्तीचा समावेश होता. याआधी वैयक्तिक कौशल्य आणि तंदुरुस्तीपुरती खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रमाणित कार्यपद्धतीनुसार परवानगी होती. मात्र शासनाच्या या आदेशाने अन्य स्पर्धा संयोजकांनाही दिलासा मिळाला आहे.
🔰सरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, थर्मन स्कॅनिंग, इत्यादी कोविड-१९ करिता घालून दिलेल्या सर्व निकषांचे पालन करण्याच्या अटीवर स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यात आली असल्याचे शासनाने पत्रकात म्हटले.
🔰‘‘शासनाने दिलेल्या अटी-शर्तीनुसार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी परवानगी मिळाली आहे. आता कार्यकारिणी समितीच्या बैठकीत आम्ही आयोजनाचे धोरण ठरवू,’’ अशी माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली.
एमपीएससी’ परीक्षा मार्चमध्ये.
🔰महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या परीक्षांच्या नव्या तारखांबाबत आयोगाने अंतिम निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात राज्य सेवा पूर्व परीक्षा तर तिसऱ्या आठवडय़ात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे. शुक्रवारी याबाबत राज्य सरकारकडून अधिकृत तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
🔰सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागास (एसईबीसी) आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलल्या. राज्यसेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार होत्या. मात्र, एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर संघटनांकडून परीक्षा घेण्यास विरोध दर्शवण्यात आला.
🔰मात्र आता सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून(एसईबीसी) अर्ज केल्यास उमेदवारांना खुल्या किंवा आर्थिकदृष्टय़ा मागास (ईडब्लूएस) प्रवर्ग निवडण्याची संधी आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे परीक्षा घेण्याचा तिढा सुटला असून तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
🔰यासंदर्भात राज्य शासनाची चर्चा करून आयोगाने परीक्षांच्या तारखा ठरवल्या आहेत. त्याप्रमाणे आता राज्यसेवा पूर्व परीक्षा व अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा मार्च महिन्यात तर दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. आयोगाने किमान वर्षभरापासून रखडलेल्या परीक्षांच्या तारखा तरी जाहीर कराव्या, अशी मागणी परीक्षार्थीकडून केली जात होती.
‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षा ३ जुलैला होणार; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा.
🔰‘जेईई अॅडव्हान्स्ड’ परीक्षेच्या तारेख संदर्भात आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार ३ जुलै २०२१ रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षा होणार आहे. यावेळी पोखरियाल यांनी आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक पात्रता आणि नियमांबाबत देखील माहिती दिली.
🔰दशभरातील लाखो विद्यार्थ्यांना या घोषणेची प्रतीक्षा होती. जेईई मुख्य परीक्षेच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर, ‘जेईई अॅडव्हान्स्ड’ परीक्षा कधी होणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता.
🔰या परीक्षेच्या तारखेची घोषणा करताना पोखरियाल यांनी सांगितले की, आपण अद्याप पूर्णपणे करोनाच्या संकटातून बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जेईईद्वारे आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी ७५ टक्क्यांची पात्रता नसेल. याची विद्यार्थ्यांना मदत होईल. आयआयटी खरगपूर या परीक्षेचं आयोजन करणार आहे.
एलन मस्क बनले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती.
🔰स्पेसएक्स आणि टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक एलन मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी दिग्गज अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांना मागे टाकत हा किताब पटकावला. टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये गुरुवारी ४.८ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत ५०० लोकांच्या ब्लूमबर्गच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचले.
🔰दक्षिण अफ्रेकत जन्मलेल्या मस्क यांची काल १८८.५ अब्ज डॉलर संपत्तीची नोंद झाली. ही बेजोस यांच्या तुलनेत १.५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. दरम्यान, जेफ बेजोस ब्लूमबर्गच्या या यादीत ऑक्टोबर २०१७ पासून पहिल्या स्थानावर होते. हे स्थान आता एलन मस्क यांनी पटकावलं आहे.
🔰दरम्यान, गेल्या काही वर्षांत एलन मस्क यांच्या संपत्तीत बरीच वाढ झाली आहे. एका निरिक्षणानुसार, गेल्या वर्षी मस्क यांच्या संपत्तीत १५० अब्ज डॉलरपेक्षा अधिक वाढ झाली. चांगला फायदा झाल्याने गेल्या वर्षी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत ७४३ टक्के वाढ झाली. सहा जानेवारीपर्यंत एलन मस्क यांची संपत्ती १८१ अब्ज डॉलरवर पोहोचली होती. तेव्हापासूनच बेजोस यांचे अव्वल स्थान डळमळीत झाले होते.
भारताची राज्ये आणि त्यांचे राज्यपाल
‼️ 1. आंध्र प्रदेश
➡️ राज्यपाल - श्री विश्व भूषण हरीचंदन
‼️ 2.अरुणाचल प्रदेश
➡️ राज्यपाल - ब्रिगेडिअर (डॉ) बी.डी. मिश्रा (सेवानिवृत्त)
‼️3. आसाम
➡️ राज्यपाल - प्राध्यापक श्री जगदीश मुखी
‼️ 4. पश्चिम बंगाल
➡️ राज्यपाल - श्री. जगदीप धनकर
‼️ 5. बिहार
➡️ राज्यपाल - श्री फागु चौहान
‼️6. छत्तीसगड
➡️ राज्यपाल - सुश्रीअनसुइया उईके
‼️7. गोवा
➡️ राज्यपाल - श्री भगतसिंग कोश्यारी(प्रभारी)
‼️ 8.गुजरात
➡️ राज्यपाल - श्री आचार्य देववृत्त
‼️ 9. हरियाणा
➡️ राज्यपाल - श्री सत्यदेव नारायण आर्य
‼️ 10. हिमाचल प्रदेश
➡️ राज्यपाल - श्री बंडारू दत्तात्रेय
‼️ 11. झारखंड
➡️ राज्यपाल - श्रीमती द्रौपदी मुर्मू
‼️ 12. कर्नाटक
➡️ राज्यपाल - श्री वजुभाई वाला
‼️ 13. केरळ
➡️ राज्यपाल - श्री. आरिफ मोहम्मद खान
‼️ 14. मध्य प्रदेश
➡️ राज्यपाल - श्रीमती आनंदीबेन पटेल
‼️ 15. महाराष्ट्र
➡️ राज्यपाल - श्री भगतसिंग कोश्यारी
‼️ 16. मणिपूर
➡️ राज्यपाल - नजमा हेपतुल्ला
‼️ 17. मेघालय
➡️ राज्यपाल - श्री सत्यपाल मलिक
‼️ 18. मिझोरम
➡️ राज्यपाल - श्री पी.एस. श्रीधरन पिल्लई
‼️ 19. नागालँड
➡️ राज्यपाल - श्री आर.एन. रवी
‼️ 20. ओडिशा
➡️ राज्यपाल - प्राध्यापक गणेशीलाल
‼️21. पंजाब
➡️ राज्यपाल - श्री व्ही.पी. सिंग बदनोर
‼️ 22.राजस्थान
➡️ राज्यपाल - श्री कलराज मिश्रा
‼️ 23. सिक्किम
➡️ राज्यपाल - श्री गंगा प्रसाद
‼️ 24. तामिळनाडू
➡️ राज्यपाल - श्री बनवारीलाल पुरोहित
‼️ 25. तेलंगणा
➡️ राज्यपाल - डॉ. तमिलीसाई सौंदराराजन
‼️26. त्रिपुरा
➡️ राज्यपाल - श्री. रमेश बैस
‼️27. उत्तर प्रदेश
➡️ राज्यपाल - श्रीमती आनंदीबेन पटेल
‼️ 28. उत्तराखंड
➡️ राज्यपाल - श्रीमती बेबी राणी मौर्य
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार.
🔰 साहित्य महामंडळाच्या काल औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली.
🔰 नाशिकच्या लोकहितवादी मंडळाच्या प्रस्तावानुसार महामंडळाच्या निवड समितीनं नाशिकमध्ये स्थळपाहणी केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
🔰 मार्च महिन्याच्या अखेरीस हे साहित्य संमेलन होणार आहे.
०८ जानेवारी २०२१
विभक्ती
नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.
वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे
असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.
विभक्त्यार्थ दोन प्रकार
१) कारकार्थ - कारक व कारकार्थ
२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म
विभक्तीची आठ नावे
१) प्रथमा
२) द्वितीया
३) तृतीया
४) चतुर्थी
५) पंचमी
६) षष्ठी
७) सप्तमी
८) संबोधन
विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा
विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)
१) प्रथमा - प्रत्यय नाही - प्रत्यय नाही
२) द्वितीया - स, ला, ते - स, ला, ना, ते
३) तृतीया - ने, ए, शी - नी, शी, ही
४) चतुर्थी - स, ला, ते - स, ला, ना, ते
५) पंचमी - ऊन, हून - ऊन, हून
६) षष्ठी - चा, ची, चे - चे, च्या, ची
७) सप्तमी - त, ई, आ - त, ई, आ
८) संबोधन - प्रत्यय नाही - नो
विभक्तीतील रूपे
विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)
१) प्रथमा - फूल - फुले
२) द्वितीया - फुलास, दुलाला - फुलांस, फुलांना
३) तृतीया - फुलाने, फुलाशी - फुलांनी, फुलांशी
४) चतुर्थी - फुलास, फुलाला - फुलांस, फुलांना
५) पंचमी - फुलातून, फुलाहून - फुलांतून, फुलांहून
६) षष्ठी - फुलाचा, फुलाची, फुलाचे - फुलांचा, फुलांची, फुलांचे
७) सप्तमी - फुलात - फुलांत
८) संबोधन - फुला - फुलांनी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे
१) चटरगाला बोगदा _ या ठिकाणांना जोडतो.
(A) कठुआ आणि दोडा✅
(B) जम्मू आणि बारामुल्ला
(C) राजौरी आणि कुपवाडा
(D) कठुआ आणि उधमपूर
२) जानेवारी 2021 मध्ये चर्चेत आलेला बर्ड फ्लू आजार कोणत्या विषाणूमुळे होतो?
(A) इन्फ्लूएंझा टाइप-बी विषाणू
(B) व्हॅरिसेला-झोस्टर विषाणू
(C) इन्फ्लूएंझा टाइप-ए विषाणू✅
(D) एचएसव्ही-2
३) __ या ठिकाणांना जोडणारी जगातली पहिली डबल स्टॅक लाँग हल 1.5 किलोमीटर लांबीची कंटेनर रेलगाडी कार्यरत झाली.
(A) कोटा आणि अंबाला
(B) अजमेर आणि फरीदाबाद
(C) जोधपूर आणि गुडगाव
(D) अटेली आणि किशनगड✅
४) 'नवी दिल्ली स्कूल बॅग’ धोरणानुसार, स्कूल बॅगचे वजन किती असावे?
(A) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 15 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे
(B) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे✅
(C) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 18 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे
(D) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 16 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे
५) कोणत्या संस्थेनी ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट’ अहवाल प्रसिद्ध केला?
(A) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
(B) जागतिक व्यापार संघटना
(C) जागतिक बँक✅
(D) युनेस्को
६) कोणत्या विद्यापीठाने आफ्रिकी हत्तींचे AI-आधारित सर्वेक्षण करणारे तंत्र तयार केले?
(A) हार्वर्ड विद्यापीठ
(B) कॅंब्रिज विद्यापीठ
(C) स्टॅनफोर्ड विद्यापीठ
(D) ऑक्सफोर्ड विद्यापीठ✅
७) कोणत्या देशासोबत भारताने "विशिष्ट कौशल्य कामगार" संबंधित सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार केला?
(A) जपान✅
(B) चीन
(C) अमेरिका
(D) रशिया
८) कोणती बँक RBI कडून लघु वित्त बँकेचा परवाना मिळविणारी भारतातली पहिली शहरी सहकारी बँक ठरली?
(A) राजकोट सहकारी बँक मर्यादित
(B) शिवालिक मर्केंटाईल सहकारी बँक✅
(C) राजानगर सहकारी बँक मर्यादित, बेंगळुरू
(D) पालमूर सहकारी अर्बन बँक मर्यादित
९) कोणत्या देशासोबत भारताने मध्यम-श्रेणीच्या पृष्ठभाग-ते-हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (MRSAM) संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली?
(A) रशिया
(B) जर्मनी
(C) जपान
(D) इस्त्रायल✅
1०) कोणती व्यक्ती ‘अयोध्या’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?
(A) माधव भंडारी✅
(B) देवेंद्र फडणवीस
(C) उद्धव ठाकरे
(D) भागवत सिंह कोश्यारी
Coronavirus - देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ८ जानेवारीला दुसरा ‘ड्राय रन’.
\
🔰दशात करोना लसीकरण कार्यक्रमास सुरूवात होण्या अगोदर ८ जानेवारी रोजी देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये दुसरा ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. या अगोदर २ जानेवारी रोजी संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, तेव्हा सर्वच जिल्ह्यांमध्ये ‘ड्राय रन’ घेण्यात आलेला नव्हता. आता होणारा दुसरा ‘ड्राय रन’ हा देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम २८ व २९ डिसेंबर रोजी चार राज्यांमधील काही ठिकाणी पहिला ‘ड्राय रन’ घेण्यात आला.
🔰पजाबा, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या ‘ड्राय रन’चे परिणाम समोर आल्यानंतर, सरकारने संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ८ जानेवारी रोजी पुन्हा एकदा संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ पार पडणार आहे.
🔰दसरीकडे लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन हे उद्या(गुरुवार) राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांबरोबर बैठक करणार आहेत. या वेळी ते राज्य सरकारच्या तयारीचा आढावा घेतील. उद्या साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे.
राज्यातील अवयवदानात पुणे अव्वल
पुणे : राज्यात अवयवदानाची चळवळ रुजवण्यात पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे योगदान मोठे आहे. २०२० या महामारीच्या वर्षांतही राज्यातील सर्वाधिक अवयव दान यशस्वी करण्यात समितीला यश आले आहे. हे अवयवदान गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असले तरी राज्यात सर्वाधिक आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात ६२ मेंदूमृत रुग्णांची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीला मिळाली. त्यांपैकी ४१ मेंदूमृत रुग्णांचे अवयव गरजू रुग्णांसाठी उपलब्ध झाले. त्यातून ३६ मूत्रपिंडं, ३९ यकृत, तीन हृदय, सहा मूत्रपिंडं-स्वादुपिंड, एक मूत्रपिंड-यकृत आणि दोन लहान आतडय़ांचे यशस्वी प्रत्यारोपण गरजू रुग्णांवर करण्यात आले. २०१९ मध्ये विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीला १०४ मेंदूमृत रुग्णांची माहिती मिळाली होती. त्यांपैकी ७८ रुग्णांच्या नातेवाइकांनी मृतांचे अवयव दान करण्याची तयारी दर्शवली होती. ६३ मेंदूमृत रुग्णांकडून १९२ अवयव प्राप्त झाले. त्यांपैकी १८८ अवयवांचे गरजू रुग्णांच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. त्यांमध्ये ९६ मूत्रपिंडे, ६४ यकृत, १३ हृदय, तीन हृदय-यकृत, पाच मूत्रपिंड-स्वादुपिंड, ६४ कॉर्निआ आणि आठ त्वचा यांचे प्रत्यारोपण पूर्ण करण्यात आले. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये झालेले अवयवदान तुलनेने कमी असले तरी महामारीसारख्या आव्हानात्मक काळात ते यशस्वी करण्याचे मोल अधिक ठरले.
समितीच्या आरती गोखले म्हणाल्या,की करोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली त्या वेळी अवयव प्रत्यारोपणही बंद होते. ते पुन्हा सुरू करताना गरजू रुग्ण आणि त्यांच्या कु टुंबीयांच्या मनात धाकधुक असणे शक्य होते. राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय समितीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत प्रत्यारोपण सुरू करण्यात आले. गरजू रुग्ण शक्य तेवढा नजिकच्या परिसरातील असावा अशी सूचना होती, त्यामुळे दूरच्या रुग्णांना अवयव देणे शक्य नव्हते. मात्र, सर्व आव्हानांवर मात करत काही गरजू रुग्णांना निरोगी अवयव मिळाल्याचे समाधान गोखले यांनी व्यक्त केले.
जम्मू व काश्मिरच्या औद्योगिक विकासासाठी केंद्रीय क्षेत्र योजनेला केंद्रीय सरकारची मान्यता.
⚙️पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक बाबींविषयीच्या मंत्रिमंडळाच्या समितीच्यावतीने जम्मू व काश्मिरच्या औद्योगिक विकासासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या केंद्रीय क्षेत्र योजनेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
⚙️नवीन गुंतवणूक आकर्षित करून आणि सध्याच्या गुंतवणूकींना बळकटी देऊन रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि शाश्वत विकासावर भर देण्यावर नव्या जोमाने काम करून उद्योग आणि सेवा क्षेत्रातल्या विकासाच्या दृष्टीने वर्तमान योजना कार्यान्वित केली जात आहे.
💎योजनेची ठळक वैशिष्ट्य...
⚙️लहान आणि मोठ्या दोन्ही प्रकाराच्या उद्योगांसाठी ही योजना आकर्षक आहे. प्रकल्प आणि यंत्रसामग्रीमध्ये 50 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्या छोट्या उद्योगांना 7.5 कोटी रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर भांडवल मिळणार आणि जास्तीत जास्त 7 वर्षांसाठी 6 टक्के दराने अर्थसहाय्य मिळणार.
⚙️परस्तावित योजनेचा आर्थिक खर्च आर्थिक वर्ष 2020-21 ते आर्थिक वर्ष 2036-37 या कालावधीत 28,400 कोटी रुपये आहे.
⚙️जम्मू व काश्मिर केंद्रशासित प्रदेशात तालुका पातळीवर औद्योगिक विकास करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
⚙️योजनेतून संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात अधिक शाश्वत व संतुलित औद्योगिक वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
उद्योग सुलभतेच्या धर्तीवर ही योजना अधिक सुलभ करण्यात आली असून GST संलग्न फायदे मिळून पारदर्शकतेशी तडजोड न करणारी खात्रीशीर योजना आहे.
⚙️दावे मंजूर होण्यापूर्वी स्वतंत्र लेखापरीक्षण संस्थेद्वारे पडताळणी करून ही योजना नोंदणी आणि अंमलबजावणीच्या दृष्टीने जम्मू व काश्मिर केंद्रशासित प्रदेशात महत्वाची भूमिका बजावत आहे.
💎इतर बाबी...
⚙️जम्मू व काश्मिरच्या केंद्रशासित प्रदेशात उद्योगांच्या विकासासाठी भारत सरकारने एक केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून “जम्मू व काश्मिर औद्योगिक विकास योजना-2021” तयार केली आहे.
⚙️रोजगार निर्मिती हा या योजनेचा मुख्य हेतू आहे, ज्याद्वारे क्षेत्राचा थेट सामाजिक आर्थिक विकास होणार.
⚙️‘जम्मू व काश्मिरच्या पुनर्गठन अधिनियम-2019’ अंतर्गत 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू व काश्मिरचे जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशात रूपांतर झाले.
हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे
🔶हमंत नगराळे हे सुबोधकुमार जैस्वाल यांची जागा घेतील
🔶 सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली
🔶 हमंत नगराळे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत
🔶 हेमंत नगराळे यांनी २०१६ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता
🔶तयानंतर २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली . नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत
🔶 नगराळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक , विशेष सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदकानं गौरवण्यात आलं आहे .
भारत-इस्रायलने मिळून बनवलेल्या घातक मिसाइल डिफेन्स सिस्टिमची चाचणी यशस्वी.
भारत आणि इस्रायलने मागच्या आठवडयात जमिनीवरुन हवेतील लक्ष्याचा वेध घेणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने (IAI) मंगळवारी ही माहिती दिली. भारत आणि इस्रायल दोघांनी मिळून हे क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. या क्षेपणास्त्राद्वारे हवेत ५० ते ७० किलोमीटर अंतरावरील शत्रूचे फायटर विमान नष्ट करता येऊ शकते.
भारताची डीआरडीओ आणि इस्रायलच्या IAI ने मिळून ही मिसाइल डिफेन्स सिस्टिम विकसित केली आहे. MRSAM सिस्टिममध्ये कमांड आणि कंट्रोल, अत्याधुनिक रडार, मोबाइल लाँचर्स आणि इंटरसेप्टर्सचा समावेश आहे. मिसाइल डिफेन्स सिस्टिममधील सर्व घटकांनी चाचणीचे सर्व अपेक्षित निकष पूर्ण केले अशी माहिती इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजकडून देण्यात आली.
“MRSAM एअर आणि मिसाइल डिफेन्स सिस्टिम ही नवीन, कल्पक आणि अत्याधुनिक सिस्टिम आहे. या सिस्टिमने हवाई धोक्यापासून संरक्षण करण्याची आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. प्रत्येकवेळी एअर डिफेन्स सिस्टिमची चाचणी एक जटिल प्रक्रिया असते” असे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि सीईओ बोएझ लेवी म्हणाले.
स्वतंत्र विद्यापीठासाठी समिती अस्तित्वात नाही, उच्च तंत्र शिक्षण विभागाची माहिती
उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्यात आली. पुढील तीन महिन्यात समिती अहवाल सादर करणार. शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ऑगस्टमध्ये असे जाहीर केले होते. मात्र अशी कोणतीही समिती उच्च तंत्र व शिक्षण विभागाने गठीत केली नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानेही शिक्षण विभागाच्या या माहितीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र विद्यापीठाचे स्वप्न बाळगून असलेल्या उस्मानाबादकरांचा माहविकास आघाडीकडूनही भ्रमनिरास झाला आहे.
मागील वर्षी 20 ऑगस्ट रोजी मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक झाली. या बैठकीत जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जाहीर केली होती.
या समितीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे डी.टी शिर्के, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी प्राचार्य डॉ.अनार साळुंखे, शिक्षणतज्ञ एम.डी. देशमुख, विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय निंबाळकर, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने यांच्यासह औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचा समावेश असल्याचे खासदार राजेनिंबाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले होते
औरंगाबाद विमानतळास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय.
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस तापत असताना, आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला. औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद महापालिका निवडणूक नामांतराच्या मुद्द्याभोवतीच घुटमळणार असल्याचे दिसत आहे.
औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना कळवले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदिप पुरी यांना स्मरण पत्र पाठवले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. (http://www.simplifiedcart.com/)
भारतीय रिझर्व्ह बँकेची ‘देयके पायाभूत सुविधा विकास कोष’ योजना.
भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) “पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (PIDF)” अर्थात “देयके पायाभूत सुविधा विकास कोष” योजनेची घोषणा केली असून त्याच्या कार्यान्वयन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
🔍योजनेविषयी....
250 कोटी रुपयांच्या प्राथमिक योगदानासह देयके पायाभूत सुविधा विकास कोष तयार केला आहे.
योजना 1 जानेवारी 2021 पासून पुढील तीन वर्षांसाठी कार्यरत असणार आणि या काळातली प्रगती पाहता हा मर्यादित कालावधी आणखी दोन वर्षांसाठी वाढविला जाऊ शकतो.
योजनेच्या कालावधीसाठी 345 कोटी रुपयांचे कर्ज दिले जाणार असून, त्यापैकी 250 कोटी रुपये RBI तर उर्वरित रक्कम अधिकृत कार्ड नेटवर्क हे गोळा करणार आहेत.
हा निधी अधिग्रहणकर्त्यांना स्तर-3 ते स्तर-6 केंद्रे आणि ईशान्य राज्यांमध्ये पॉइंट ऑफ सेल (PoS) पायाभूत सुविधा तैनात करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे.या निधीचा उपयोग बँक आणि अ-बँकांना देयके पायाभूत सुविधा तैनात करण्यासाठी अनुदानासाठी केला जाणार आहे.
उपकरणे उपलब्ध नसलेल्या परिवहन व आतिथ्य, सरकारी देयके, इंधन पंप स्टेशन, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत दुकाने, आरोग्य सुविधा आणि किराणा दुकान यासारख्या अत्यावश्यक सेवा प्रदान करणाऱ्या व्यापारी केंद्रांवर भर देणे, हे या योजनेचे प्राथमिक उद्दीष्ट आहे.
सेंट्रल व्हिस्टा’चा मार्ग मोकळा
नवे संसद भवन (सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने दोन विरुद्ध एक अशा बहुमताने प्रकल्प उभारणीस हिरवा कंदील दाखवला.
तर या प्रकल्पाला मिळालेली पर्यावरणविषयक परवानगी आणि प्रकल्प उभारणीसाठी जमिनीच्या वापराबाबत प्रसृत करण्यात आलेली अधिसूचना वैध असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
केंद्र सरकारने ‘डीडीए’कायद्याचा वापर करून या प्रकल्पासाठीच्या जमिनीच्या वापरासंबंधी केलेले बदल योग्य आहेत. त्याचा 20 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेत उल्लेख होता.
तसेच पर्यावरणविषयक परवानगीची तज्ज्ञ समितीने केलेली शिफारस आणि त्यानुसार पर्यावरण मंत्रालयाने घेतलेला निर्णयही योग्य आहे, असे या निकालपत्रात स्पष्ट करण्यात आले.
सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये ‘सेंट्रल व्हिस्टा’प्रकल्पाची घोषणा केली होती. हा प्रकल्प ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे.
देवतांच्या नावे यंत्र विक्रीच्या जाहिरातीवर बंदी घालण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
देवी-देवतांच्या नावाने यंत्र-तंत्र विक्री करण्याची जाहिरात दाखविण्यावर बंदी घालावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एम. जी. शेवलीकर यांनी मंगळवारी दिले. अशा प्रकारच्या यंत्राची विक्री, उत्पादन, प्रसार व प्रचार करणाऱ्यांवर १०१३ अघोरी कृत्य आणि काळी जादू कायदा २०१३ अनुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत. केंद्र व राज्याने ३० दिवसांत अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठी काय पावले उचलली, याबाबतचा अहवाल खंडपीठास सादर करावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
विविध प्रसार माध्यमांवर धर्माच्या नावाने भीती दाखवून हनुमान चालिसा, देवीचे यंत्र आदी वस्तू विक्रीच्या जाहिराती मोठय़ा प्रमाणावर दाखविल्या जातात. सर्वसामान्य नागरिकांची अशा भोंदूगिरीच्या माध्यमातून लूट केली जाते.
राज्य शासनाच्या २०१३ मधील अघोरी कृत्य व काळी जादू कायद्यानुसार प्रसार माध्यमांवर प्रक्षेपण करता येत नाही. याविरुद्ध २०१५ मध्ये औरंगाबाद येथील राजेंद्र गणपतराव अंभोरे (रा. टाउनसेंटर सिडको औरंगाबाद) यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. समाजात विज्ञाननिष्ठ नागरिक तयार होऊन वैज्ञानिक वातावरणास गती मिळावी, अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावे यासाठी २०१३ मध्ये कायदा निर्माण केला. प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या समवेत अशा बाबींवर प्रतिबंध घालण्यासाठी एक अधिकारी नियुक्त केलेला आहे.
कायद्याच्या माध्यमातून भोंदूगिरीला वेसण घालावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. हनुमान चालिसा यंत्र विक्री करणाऱ्या जाहिरातीमधून व्यवसायात तोटा होत असेल, तर अशा प्रकारे यंत्र जवळ ठेवल्यावर लाभ होतो वगैरे दावे केले जात होते.
ससदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून
🔰मत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीने (सीसीपीए) 29 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिफारस केली आहे.
🔰तयामुळे आता संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होईल. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागात असेल.
🔰तर पहिला भाग 29 जानेवारीपासून सुरू होऊन 15 फेब्रवारी पर्यंत चालेल व दुसरा भाग 8 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत असेल.तर, केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रवारी रोजी सादर केला जाईल.
🔰तसेच 29 जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. या अधिवेशन काळात करोनाशी निगडीत सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे.
केरळमध्ये राज्यस्तरीय आपत्ती जाहीर‼️
📌कोरोना लस आल्यानंतर काहीसा दिलासा मिळेल, असं वाटत असतानाच आता नवं संकट घोंघावू लागलंय. देशातल्या अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालाय. यामुळे शेकडो कावळे आणि इतर पक्ष्यांचा मृत्यू झालाय. राजस्थान, मध्य प्रदेश यांच्यानंतर आता हिमाचल प्रदेश आणि केरळपर्यंत या बर्ड फ्लूने भीतीचं वातावरण निर्माण केलीय.
📌या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारांनी अलर्ट जारी केलाय. केरळने तर या संकटाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात आपत्ती घोषीत केलीय. महाराष्ट्रात बर्ड फ्लूची एकही घटना आढळली नाही. पण सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून अलर्ट जारी केलाय. प्रशासनासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात.
📌शजारच्याच मध्य प्रदेशात २३ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत ३७६ कावळ्यांचा मृत्यू झालाय. यामध्ये सर्वाधिक घटना या इंदौरमधल्या आहेत. याशिवाय मंदसौर, आगर-मालवा, खरगोन, सिहोर या जिल्ह्यातही कावळ्यांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्यात.
📌हिमाचल प्रदेशातही कांगडा इथल्या तलावात हजारोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत आढळले. या पक्ष्यांचाही मृत्यू एच५एन१ म्हणजेच बर्ड फ्लूनं झाल्याचं तपासणीतून सिद्ध झालंय. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं तलावाशेजारच्या भागात मांस तसंच अंडा विक्रीवर निर्बंध घातलेत.
📌हरियाणामध्येही कोंबड्यांच्या संशयास्पद मृत्यूने एवियन फ्लूची भीती तयार झालीय. इथल्या बरवाला भागात जवळपास १ लाख कोंबड्या आणि पिलांचा मृत्यू झालाय. गुजरातच्या जूनागड भागातही बर्ड फल्यूमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालंय.
📌तिकडे राजस्थानामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूच्या केसेस सापडल्यात. झालावाड जिल्ह्यात बर्ड फ्लूची पहिली केस आढळली. इथे एकाचवेळी शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर कोटा, पाली, राजधानी जयपूर, बारां आणि जोधपूर इथूनही कावळ्यांच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत.
📌करळच्या अलापुझा आणि कोट्टायम जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या केसला दुजोरा मिळालाय. जवळपास सतराशे बदकांचा मृत्यू झालाय. इथले नमुने तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेला पाठवण्यात आलेत. ८ पैकी ५ नमुन्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणं आढळली.
०७ जानेवारी २०२१
सर्वाधिक रामसर स्थळे असणारे देश
🇬🇧 बरिटन : १७५
🇲🇽 मक्सिको : १४२
🇪🇸 सपेन : ७५
🇸🇪 सवीडन : ६८
🇦🇺 ऑस्ट्रेलिया : ६६
🇨🇳 चीन : ६४
🇳🇴 नॉर्वे : ६३
🇮🇹 इटली : ५६
🇳🇱 नदरलँड : ५५
🇯🇵 जपान : ५२
🇺🇦 यक्रेन : ५०
🇮🇳 भारत : ४२
🇺🇲 अमेरिका : ४१
🇨🇦 कनडा : ३७
🇷🇺 रशिया : ३५
🇧🇷 बराझील : २७
🇿🇦 दक्षिण आफ्रिका : २६
🇵🇰 पाकिस्तान : १९
🇧🇩 बांग्लादेश : ०२
चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे
१) तांदळाचा तिसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून ओळखल्या जाणार्या कोणत्या देशाने अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच भारताकडून तांदूळ खरेदी करण्यात सुरुवात केली?
(A) चीन
(B) व्हिएतनाम✅
(C) मलेशिया
(D) थायलँड
२) खालीलपैकी कोणते विधान ‘राज्यपाल’ पदाविषयी अचूक नाही आहे?
(A) राज्यपालाचे नामांकन केंद्र सरकार देते.
(B) राज्यपाल राज्याचा नाममात्र कार्यकारी प्रमुख असतो.
(C) कार्यालयाच्या कार्यकाळात संसदेकडून राज्यपालाचे वेतन कमी केले जाऊ शकते.✅
(D) राज्य महाधिवक्ता पदाची याची नियुक्ती राज्यपाल करतात.
३) कोणता देश ‘आफ्रिकेचे शिंग’ याचा भाग नाही?
(A) इरिट्रिया
(B) सोमालिया
(C) जिबूती
(D)सर्व ‘आफ्रिकेचे शिंग’चे भाग आहेत✅
४) कोणत्या संस्थेनी ‘स्वस्थ वायु’ नामक व्हेंटिलेटर यंत्र तयार केले?
(A) CSIR-NAL✅
(B) CSIR-CEERI
(C) CSIR-CDRI
(D) CSIR-CCMB
५) कोणती संस्था ‘कामधेनू गौविज्ञान प्रचार-प्रसार परीक्षा’ घेणार आहे?
(A) नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)
(B) राष्ट्रीय कामधेनू आयोग (RKA)✅
(C) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU)
(D) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)
६) IUCN संस्थेनी कोणत्या गटात ‘भारतीय खवल्या मांजर’ जातीला समाविष्ट केले आहे?
(A) माहितीची कमतरता
(B) धोक्यात येण्याच्या जवळपास
(C) संकटात असलेली✅
(D) असुरक्षित
७) कोणत्या राज्यात ‘किसान सूर्योदय योजना’ राबविली जात आहे?
(A) झारखंड
(B) उत्तरप्रदेश
(C) हिमाचल प्रदेश
(D) गुजरात✅
८) कोणत्या नदीवर भारत पाण्यावर तरंगणारा जगातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प तयार करणार आहे?
(A) गोदावरी
(B) कृष्णा
(C) नर्मदा✅
(D) तापी
९) कोणत्या राज्यात ‘ट्रायफूड पार्क’ उभारण्यासाठी TRIFED आणि अखिल भारतीय वनवासी कल्याण केंद्र यांच्यात सामंजस्य करार झाला?
(A) मध्यप्रदेश✅
(B) आसाम
(C) उत्तरप्रदेश
(D) कर्नाटक
1०) कोणत्या व्यक्तीची अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली?
(A) पी. आर. व्ही. राजा
(B) भारत सिंग चौहान
(C) डी. व्ही. सुंदर
(D) संजय कपूर✅
ब्रेकिंग न्यूज! पोलीस भरतीचा जीआर रद्द: गृहमंत्र्यांची मोठी घोषणा!
✍🏻 आज गृहमंत्र्यांनी पोलीस भरतीसंबंधित मोठी घोषणा केली. यामध्ये भरतीसाठी निघालेला आधीचा 4 जानेवारी चा जीआर रद्द करण्यात आला आहे.
💁♀️ 4 जानेवारी रोजी एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल असा जीआर काढला होता. या जीआर ला बराच विरोध झाला. यानंतर गृह विभागाने हा निर्णय आता रद्द केला आहे.
➡️ एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस चा लाभ मिळावा म्हणून आता गृह विभाग नवीन जीआर शुद्धिपत्रक काढणार आहे.
📌 याविषयी गृहमंत्र्यांनी सांगितले की, "पोलिस भरती 2019 साठी ज्या एस ई बी सी उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा लाभ मिळावा म्हणून, लवकरच दुसरा जीआर गृह विभागाकडून निर्गमित करण्यात येईल."
🔎 जन्या जीआर मध्ये काय होते?
▪️ या आधीच्या जीआर मध्ये पात्रता ठरवताना, उमेदवारांना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार होती. त्यामुळे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी आणि शर्ती ची पूर्तता करतात त्यांना खुल्या प्रवर्गातून विचार करावा असंही सांगितलं होतं. त्यामुळे याला बराच विरोध झाला होता.
विज्ञान मात्रक एवं ईकाई
🌞शक्ति का मात्रक है– वाट
━━━━━━━━━━━━━━━━━
🌞बल का मात्रक है– न्यूटन
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞कार्य का मात्रक है– जूल
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞चालक की वैधुत प्रतिरोधकता की मात्रक है– ओम मीटर
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞परकाश वर्ष इकाई है– दूरी का
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞परकाश वर्ष है– वह दूरी, जो प्रकाश 1 वर्ष में तय करता है|
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞एक पारसेक, तारों संबंधी दूरियां मापने का मात्रक, बराबर है– 3.25 प्रकाश वर्ष
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞पारसेक मात्रक है– दूरी की
एंपियर मापने की इकाई है– current
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞मगा वाट बिजली के नापने की इकाई है जो– उत्पादित की जाती है
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞तवरण का मात्रक है– मीटर प्रति सेकंड स्क्वायर
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞आवेश का मात्रक है– न्यूटन सेकंड
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞उष्मा का मात्रक है – कैलोरी
━━━━━━━━━━━━━━━━━━.
🌞समुद्री जहाज की गति मापी जाती है– नॉट
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞नौसंचालन का मात्रक है– नॉटिकल मील
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞विभवांतर का मात्रक है– वोल्ट
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞परकाश के तरंगधैर्य का मात्रक है – Angastram
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞एक हॉर्स पावर में कितने वाट होते हैं-746
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞ऊर्जा का मात्रक है– जूल
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞दाब का मात्रक है– पास्कल
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞उच्च वेग को प्रदर्शित करता है– मैक(mach)
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞धवनि की प्रबलता की मात्रक है– डेसीबल
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞शक्ति की इकाई है– अश्वशक्ति(हॉर्स पॉवर)
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞नौसंचालन में दूरी की इकाई है– समुद्री मील
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞कयूसेक में मापा जाता है – जल का बहाव
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞ओजोन परत की ऊंचाई मापी जाती है– dabson(डॉबसन)
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞महासागर में डूबी हुई वस्तुओं की स्थिति जानने के लिए यंत्र का प्रयोग करते हैं– सोनार
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞नौसंचालाको द्वारा प्रयोग में लाया जाता है– सोनार
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞धवनि की तीव्रता मापने वाले यंत्र हैं– ऑडियो मीटर
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞वायु की चाल मापने वाला यंत्र है– एनीमोमीटर
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞विधुत प्रतिरोध का मात्रक है– ओम
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞विधुत आवेश का मात्रक है -कूलाम
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞करेंट का मात्रक है– एम्पिएर
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞लम्बाई की न्यूनतम इकाई है– फर्मिमीटर
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞भकम्प की तीव्रता मापी जाती है– रिक्टर पैमाने पर
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞डॉबसन इकाई का प्रयोग जाता है – ओजोन परत की मोटाई मापने में
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞धवनि की तीव्रता को मापने वाला यन्त्र है– ऑडियोमीटर
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞पईरोमीटर मापन में प्रयोग होता है– उच्च ताप
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞मनोमीटर के द्वारा माप की जाती है – गैसों के दाब
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞दाब मापने हेतु प्रयोग की जाती है – बैरोमीटर
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞अमीटर प्रयोग की जाती है – करंट
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞हाइग्रोमीटर मापन में प्रयोग होता है – आर्द्रता
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞रक्त दब मापने के यन्त्र है – स्फिग्मोमैनोमीटर
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞परकाश की तीव्रता मापने के लिए प्रयोग की जाती है – लक्समीटर
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞सिस्मोग्राफ क्या रिकॉर्ड करता है– भूचाल
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞रनगेज का प्रयोग होता है – वर्षामापी के लिए
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞मात्रकों का अंतरराष्ट्रीय पद्धति कब लागू हुआ– 1971
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞एस आई पद्धति में लेंस की शक्ति का मात्रक है– डायोप्टर
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞लयूमेन मात्रक है- ज्योति फ्लक्स का
━━━━━━━━━━━━━━━━
🌞कडेला मात्रक है– ज्योति तीव्रता का
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌞रडियोऐक्टिव धर्मिता का मात्रक है- क्यूरी
बारा जोतिर्लिँगे
✍️सोमनाथ (गुजरात - वेरावळ)
✍️मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)
✍️महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)
✍️ओकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर)
✍️वजनाथ (महाराष्ट्र - परळी)
✍️भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर)
✍️रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)
✍️नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ)
✍️विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)
✍️तर्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर)
✍️कदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ)
✍️घष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद)
ब्रिटनमध्ये करोनाचे गंभीर संकट, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रद्द केला भारत दौरा
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती गंभीर आहे. करोनाचा हा स्ट्रेन वेगाने फैलावत आहे. स्वदेशातील या गंभीर परिस्थितीमुळे बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण सुद्धा स्वीकारले होते.
“बोरिस जॉन्सन यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर फोनवरुन चर्चा केली. महिनाअखेरीस भारत दौऱ्यावर उपस्थित राहता येणार नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली” असे डाऊनिंग स्ट्रीटवरील प्रवक्त्याने सांगितले.
“करोना व्हायरसचा नवा स्ट्रेन वेगाने फैलावत असल्यामुळे काल रात्री ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. व्हायरसमुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी यूकेमध्येच थांबणे आवश्यक आहे” असे जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले.
काही दिवसांपूर्वी बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींना पुढच्यावर्षी युकेमध्ये होणाऱ्या G-7 परिषदेचे आमंत्रण दिले होते. यापूर्वी १९९३ साली जॉन मेजर हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे ब्रिटनचे शेवटचे पंतप्रधान होते. पुढच्या दशकात भारत-ब्रिटन संबंध कसे असावेत? याविषयी मित्र आणि पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर उत्तम चर्चा झाली असे मोदींनी २७ नोव्हेंबरच्या टि्वटमध्ये म्हटले होते.
बँक ऑफ बडोदाने सुरू केली व्हॉट्सअॅप बँकिंग सेवा
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवरबँकिंग सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
बँक ऑफ बडोदा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अकाउंट बॅलन्सची माहिती, मिनी स्टेटमेंट, चेक स्टेटस माहिती, चेकबुकसाठी विनंती, डेबिट कॉर्ड ब्लॉक करणे आणि उत्पादने व सेवांविषयी माहिती उपलब्ध केली जाणार आहे.
बँकिंग सेवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर चोवीस तास उपलब्ध असतील. तर यासाठी अतिरिक्त अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही.
तसेच, जे लोक बँकेचे ग्राहक नाहीत, ते सुद्धा या प्लॅटफॉर्मद्वारे बँकेची उत्पादने, सेवा, ऑफर, एटीएम आणि शाखांविषयी माहिती घेऊ शकतात.
२०२० मध्ये इंटरनेट उपयोगावर सर्वाधिक बंदी घालणारे देश व त्यामुळे झालेले नुकसान
🇮🇳 भारत : २७७९.३ मिलियन डॉलर्स
🇧🇾 बलारुस : ३३६.४ मिलियन डॉलर्स
🇾🇪 यमेन : २३६.८ मिलियन डॉलर्स
🇲🇲 मयानमार : १८९.९ मिलियन डॉलर्स
🇦🇿 अझरबैजन : १२२ मिलियन डॉलर्स
🇪🇹 इथिओपिया : १११.३ मिलियन डॉलर्स
🇸🇩 सदान : ६८.७ मिलियन डॉलर्स
🇹🇷 तर्की : ५१.१ मिलियन डॉलर्स
🇸🇾 सिरीया : ३५.९ मिलियन डॉलर्स
🇹🇿 तझानिया : २७.५ मिलियन डॉलर्स
🇹🇩 चाड : २३.१ मिलियन डॉलर्स
🇩🇿 अल्जेरिया : ९.६ मिलियन डॉलर्स
🇬🇳 गिनिया : ६.१ मिलियन डॉलर्स
🇯🇴 जॉर्डन : ४.९ मिलियन डॉलर्स
🇻🇪 वनेझुएला : २.४ मिलियन डॉलर्स .
टॉयकॅथॉन–2021
🔰केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि केंद्रीय महिला व बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी यांच्या हस्ते 5 जानेवारी 2021 रोजी संयुक्तपणे “टॉयकॅथॉन-2021” या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. भारतीय मुलभूत प्रणालीवर आधारित नाविन्यपूर्ण खेळणी विषयीची संकल्पना हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.
🔰कार्यक्रमामधून शाळा आणि महाविद्यालयामधले विद्यार्थी आणि शिक्षक, रचना तज्ञ, खेळणी तज्ञ आणि स्टार्टअप उद्योग भारतीय संस्कृती आणि नीतीमूल्य, स्थानिक लोककथा आणि थोर व्यक्ती यांना विषय धरून खेळणी आणि खेळ विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना सामायिक करणार आहेत.
🔰यासंबंधीचे प्रस्ताव 5 जानेवारी ते 20 जानेवारी 2021 या कालावधीत ऑनलाईन सादर करता येणार आहेत.
🔰हा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), महिला व बालविकास मंत्रालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, MSME मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालय यांच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालयाच्या अभिनवता कक्षाने आयोजित केलेला एक आंतर-मंत्रालय उपक्रम आहे.
💢पार्श्वभूमी
🔰भारतातले खेळण्यांच्या बाजारपेठेचे मूल्य सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलर आहे, परंतु 80 टक्के खेळणी आयात केली जातात. भारताला जागतिक खेळण्यांचे उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी टॉयकॅथॉन आयोजित केले जात आहे. देशांतर्गत खेळण्यांचे उद्योग आणि स्थानिक उत्पादकांनी न वापरलेल्या संसाधनांचा वापर करण्यासाठी एक परिसंस्था तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
🔰या कार्यक्रमामुळे शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने देशातल्या सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधले विद्यार्थी, प्राध्यापकांना आत्मनिर्भर भारताच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ससदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून
🧪मत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीने (सीसीपीए) 29 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिफारस केली आहे.
त्यामुळे आता संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होईल. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागात असेल.
🧪तर पहिला भाग 29 जानेवारीपासून सुरू होऊन 15 फेब्रवारी पर्यंत चालेल व दुसरा भाग 8 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत असेल.
तर, केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रवारी रोजी सादर केला जाईल.
🧪तसेच 29 जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. या अधिवेशन काळात करोनाशी निगडीत सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे.
देशातील आनंदी शहरांत महाराष्ट्रातील तीन शहरे
● ‘इंडियन सिटिज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’नुसार आनंदी शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
● प्रा. राजेश पिल्लानिया यांनी ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२० या दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरांतील १३ हजाराहून अधिक नागरिकांशी चर्चा करून ही यादी तयार के ली आहे. गेल्या अनेक दशकांपासून व्यवस्थापनासंदर्भातील संशोधनामध्ये राजेश कार्यरत आहेत.
● वयोमान, शिक्षण, कमाई आणि शहरात वास्तव्य करताना मिळणाऱ्या सोई-सुविधा तसेच जीवनशैली या निकषांच्या आधारे आनंदी शहरांची यादी करण्यात आली आहे.
● राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर या यादीमध्ये १२ व्या स्थानी आहे.
● देशातील सर्वाधिक आनंदी शहरांपैकी अव्वल २५ शहरांमध्ये पुण्याबरोबरच नागपूर आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे.
● देशातील आनंदी शहरांमध्ये पुणे १२ व्या स्थानी असून नागपूर १७ व्या आणि मुंबई २१ व्या स्थानी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
● आनंदी शहरांमध्ये लुधियाना प्रथम स्थानी तर अहमदाबाद आणि चंदिगड शहरे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थानी आहेत.
आनंदी शहरांची क्रमानुसार यादी
लुधियाना, अहमदाबाद, चंदिगड, सुरत, वडोदरा, अमृतसर, चेन्नई, जयपूर, जोधपूर, हैदराबाद, भोपाळ, पुणे, नवी दिल्ली, डेहराडून, फरिदाबाद, पाटणा, नागपूर, इंदूर, कोची, भुवनेश्वर, मुंबई, गुवाहटी, धनबाद, नोएडा, जम्मू, कानपूर, बंगळूरू, कोलकता, लखनऊ, शिमला, रांची, गुरुग्राम, विशाखापट्टणम, रायपूर
‘इस्रो’च्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी भारताचा ४२ वा संप्रेषण उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडला. हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि माहिती महाजाल संपर्कतेसाठी काम करणार आहे.
कोविड-१९च्या स्थितीत इस्रोने केलेले हे दुसरे प्रक्षेपण आहे. उपग्रह उत्तम स्थितीत असल्याचे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी म्हटले आहे.
श्रीहरिकोटा येथील द्वितीय प्रक्षेपण केंद्रातून बुधवारी दुपारी पीएसएलव्ही-सी ५० रॉकेटने अवकाशात झेप घेतली.
हा उपग्रह देशाच्या मुख्य भूमीसह अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपला व्यापणाऱ्या वारंवारिता स्पेक्ट्रमच्या विस्तारित सी बॅण्डमध्ये सेवा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सीएमएस-०१, इस्रोचा संप्रेषण उपग्रह आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे हे ५२ वे अभियान आहे.
०६ जानेवारी २०२१
भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-
१) रामसर करार -
वर्ष - १९७१
* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर
* अमलात येण्याचे वर्ष - १९७५
* भारताने मान्य केला - १९८२
२) CITES -
वर्ष - १९७३
* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण
*अमलात येण्याचे वर्ष - १९७६
* भारताने मान्य केला - १९८०
३) बोन करार -
वर्ष -१९७९
* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन
* अमलात येण्याचे वर्ष - १९८३
* भारताने मान्य केला -१९८३
४) व्हिएन्ना करार -
वर्ष - १९८५
* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८
* भारताने मान्य केला - १९९१
५) बँसेल करार -
वर्ष - १९८९
* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट
* अमलात येण्याचे वर्ष - १९९२
* भारताने मान्य केला - १९९
६) UNFCCC -
वर्ष - १९९२
* हवामान बदल रोखणे
* अमलात येण्याचे वर्ष - १९९४
* भारताने मान्य केला - १९९३
७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७
* हरितवायू उत्सर्जनात घट
* अमलात येण्याचे वर्ष - २००५
* भारताने मान्य केला - २००२
८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२
* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन
* अमलात येण्याचे वर्ष - १९९३
* भारताने मान्य वर्ष - १९९४
९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -
वर्ष - २०००
* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण
* अमलात येण्याचे वर्ष - २००३
* भारताने मान्य केला - २००३
१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
वर्ष - १९९४
* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण
* अमलात येण्याचे वर्ष - १९९६
* भारताने मान्य केला - १९९६
११) रोटरडँम करार -
वर्ष - १९९८
* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .
* अमलात येण्याचे वर्ष - २००४
* भारताने मान्य केला - २००५
१२) स्टॉकहोम करार -
वर्ष - २००१
*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .
ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार
* अमलात येण्याचे वर्ष - २००४
* भारताने मान्य केला - २००६
मराठी व्याकरण सराव प्रश्न
१) 'भाववाचक नाम' ओळखा
१) उंची ✔️
२) शरद
३) पुस्तक
४) झाडे
२) खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा
१) ती हळू चालते
२) रघु खूप झोपला
३) रमेश दुध पितो ✔️
४) तो मूर्ख आहे
३) कंसातील शब्दांचे सामान्यरूप निवडा .
माझ्या ( अंगण ) एक वडाचे झाड आहे
१) अंगणाला
२) अंगणाशी
३) अंगणाचे
४) अंगणा ✔️
४) 'परंतु' हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे ?
१) उभयान्वयी अव्यय ✔️
२) शब्दयोगी अव्यय
३) क्रियाविशेषण अव्यय
४) केवलप्रायोगी अव्यय
५) कर्ता - कर्म - क्रियापद यांच्या परस्पर संबंधाना ..........म्हणतात
१) वाक्य
२) शब्दसमूह
३) कर्तरी प्रयोग
४) प्रयोग ✔️
६) ' पुस्तक ' हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंगप्रकारात येतो ?
१) नपुसंकलिंग ✔️
२) पुल्लिंग
३) स्त्रीलिंग
४) यापैकी नाही
७) ' मी निबंध लिहिते असे ' या वाक्यातील काळ ओळखा
१) रीती भूतकाळ ✔️
२) रीती वर्तमानकाळ
३) रीती भविष्यकाळ
४) अपूर्ण भूतकाळ
८) ' आणि ' हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?
१) विकल्पबोधक
२) परिणामबोधक
३) संकेतबोधक
४) समुच्चयबोधक ✔️
९) अरेरे ! गंगारामचं अजून लग्न झालेलं नाही या वाक्यामध्ये 'अरेरे 'हा कोणता अव्यय आहे ?
१) उभयान्वयी
२)क्रियाविशेषण
३)केवलप्रयोगी ✔️
४)शब्द योगी
१०) खालीलपैकी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचे उदाहरण कोणते ?
१) तुला पुस्तक हवे की पेन्सिल हवी ?
२)पाऊस आला आणि हवेत गारवा झाला. ✔️
३) मला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक.
४)खुप अभ्यास केला म्हणून पास झालो.
११)'बाभळी मुद्रा व देवळी निद्रा 'या म्हणीचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.
१) दिसण्यास बावळट व व्यवहार चतुर माणुस ✔️
२)अत्यंत बावळट माणुस
३)बाभळीखाली असणा-या देवळात झोपणारा
४)खूपच आळशी माणुस
१२) गडद निळे गडद निळे जलद भरून आले,
शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले |
हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
१) यमक
२)पुष्यमक
३)अनुप्रास ✔️
४) श्लेष
1) सर्वनामाचा प्रकार ओळखा ?
"जो"
A. पुरुषवाचक सर्वनाम
B . दर्शक सर्वनाम
C . संबंधी सर्वनाम✔️✔️✔️
D . अनिश्चित सर्वनाम
2) विशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला ---------- असे म्हणतात .
A . विशेष्य✔️✔️✔️
B . अव्य सदृश्य सर्वनाम
C . धातुसाधित विशेषणे
D . अव्ययसाधित विशेषणे
4) अव्ययालाच ------- म्हणतात .
A . विकारी शब्द
B . पद✔️✔️✔️
C. अविकारी शब्द
D . विकृति
3) "चांगला मुलगा परिक्षेत पास होतो " यावाक्यातील विशेषण प्रकार ओळखा .
A . अधिविशेषण✔️✔️✔️
B . विधिविशेषण
C . सार्वनामिक विशेषण
D . उत्तर विशेषण
4) दिलेल्या शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा ?
"थड"
A . गार
B . किनारा✔️✔️✔️
C . आधात
D . गर्दी
5) पुढील शब्दसिध्दिचा प्रकार ओळखा ?
"धडपड "
A . पूर्णाभ्यस्त
B .अंशाभ्यस्त
C . अनुकरण वाचक✔️✔️✔️
D . यापैकी नाही
6) मराठी भाषेत मुळ सर्वनामे किती आहेत?
A . १२
B . ०९✔️✔️✔️
C . १५
D . ०७
7) " चला पानावर बसा " या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा?
A . व्यंगार्थ
B . लक्षार्थ✔️✔️✔️
C . वाच्यार्थ
D . संकेतार्थ
Q: 8) " राम वनात जातो " या वाक्यात एकूण किती मुलध्वनी आहेत ?
A . सात
B. अकरा
C . तीन
D . चौदा✔️✔️✔️
10) "मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला"
या वाक्यातील कर्ता ओळखा
A .मी
B . संकष्टी चतुर्थी
C . चंद्र ✔️✔️
D . दिसणे
11) "ळ" वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?
A . उष्मे
B . स्पर्श
C . महाप्राण
D . स्वतंत्र✔️✔️✔️
12) "आजी दृष्ट काढते"
वाक्यातील प्रयोग ओळखा
A . कर्मणी प्रयोग
B. कर्तरी प्रयोग✔️✔️
C . भावे प्रयोग
D . शक्य कर्मणी प्रयोग
13) प्राधान्य नुसार समासाचे प्रकार सांगा
A) अव्ययीभाव समास
B) तत्पुरुष समास
C) द्व्ंद्व समास
D) बहुव्रीही समास
आर्सेनिकचे प्रदूषण
✍️आर्सेनिक हा जवळजवळ सर्व प्रकाराच्या जीवनासाठी विषारी ठरतो, परंतु अलीकडेच वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांना एका अभ्यासातून असा शोध लागला आहे की प्रशांत महासागरातले काही सूक्ष्मजीव पाण्यातल्या या विषारी घटकाला सहन करण्यासोबतच सक्रियपणे श्वसनासाठी आत्मसात केले आहे.
✍️बदलत्या वातावरणाशी कश्याप्रकारे जुळवून घेतले जाते त्याबाबत हा शोध घेतला गेला.
◾️आर्सेनिक पदार्थ:-
✍️आर्सेनिक (As) एक गंधहीन आणि चव नसलेला उपधातू आहे, जो भूमीच्या पृष्ठभागाखाली प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. हा पदार्थ सामान्यपणे शीळा, माती, पाणी आणि हवेत आढळतो. हा पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात आढळून येणार्या पदार्थांमधील 26वा पदार्थ आहे. प्रमाणानुसार, आर्सेनाइट As-3 याला आर्सेनिकचे सर्वात विषारी स्वरूप मानले जाते. शिवाय आर्सेनिकचे मिथाइलेटेड स्वरूप {MMA(V), DMA(V), MMA(III), DMA(III)} देखील विषारी असतात. जैव-इंधन जाळणे, रासायनिक खते, उद्योग हे या पदार्थाचे मुख्य स्त्रोत आहेत.
✍️मानवी जीवनास विषारी ठरणार्या आर्सेनिकमुळे ‘आर्सेनिकोसिस’ ही वैद्यकीय समस्या उद्भवते. त्यामुळे शरीरातल्या उपलब्ध आवश्यक एनजाइमवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे बरेच अवयव काम करणे बंद करतात तसेच त्वचेचे रोग, कर्करोग सारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात.
✍️पयजलात आर्सेनिकसाठी WHO कडून ठरविण्यात आलेल्या मानकानुसार, पेयजलातली या पदार्थाची कमाल पातळी (MLC) 10 PPB एवढी आहे. भारतामध्ये हे प्रमाण 50 PPB एवढे स्वीकृत करण्यात आले आहे.
✍️भारतात पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, आसाम, नागालँड, मणीपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये आर्सेनिकचा प्रभाव आढळून येतो.
महत्त्वाचे आहे नक्की वाचा भारतीय क्षेपणास्त्रे
1. बराक 8 - भारत-इस्त्रायलच्या संयुक्त विध्यमाने, 70 किमी क्षमता, जमिनीवरून हवेत मारा.
2. निर्भय - 1000 किमी पल्ला, डिआरडिओ तर्फे विकसित.
3. पिनाका अग्निबाण प्रणाली 6 - अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.
4. आकाश - एकामागोमाग एक तीन क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता, हवाई दलात तैनात. (जमिनीवरून हवेत मारा करणारे)
5. अस्त्र-सुखोई 30 - विमानांवर तैनात, स्वदेशी बनावटीचे, पल्ला 60 किलोमीटर (हवेतून हवेत मारा करणारे.)
6. पृथ्वी संरक्षण प्रणाली - हवामानाच्या थरांबाहेर 120 किलोमीटरवर शत्रूच्या क्षेपस्त्रांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता. (जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे)
7. ब्राम्होस - पल्ला 300 किमी, गती 2.8 माक, आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, अण्वस्त्रवहन क्षमता.
8. त्रिशूल - जमिनीवरून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्राविरोधी क्षेपणास्त्र.
9. नाग - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र.
10. सूर्या - आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र.
11. सागरिका - पाण्याखालून मारा करणारे क्षेपणास्त्र. पाणबुडीवरून जमिनीवर मारा करणारे.
12. शौर्य - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.
13. धनुष - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.
मोजकेच पण महत्वाचे
सा. विज्ञान विशेष
शास्त्रीय शोध व संशोधक
1) प्रोटॉन - गोल्ड स्मिथ
2) इलेक्ट्रॉन - जे. जे. थॉमसन
3) न्यूट्रॉन - C.C. चाडविक
4) किरणोत्सार - हेन्री बेक्वेरेल
5) लेझर किरण - शॉल व चार्लस टोन्स
6) क्ष- किरणे - रॉन्टजेन
7) पोलोनियम, रेडियम - मादाम क्युरी, पेरी क्युरी
8) अमोनियम, ऑक्सिजन - जोसेफ प्रिस्टले
9) हायड्रोजन - हेन्री कॅव्हेंडिश
10) अणूबॉम्ब - जे. रॉबर्ट ओपन हायमर
11) महारोगावरील लस - थोर्मन हन्सन
12) डायनामाईट - अल्फ्रेड नोबेल
13) देविची लस - एडवर्ड जेन्नर
14) जडत्वाचे नियम - आयझॅक न्यूटन
15) सापेक्षतावाद - अल्बर्ट आईन्स्टाईन
16) मधुमेहावरील उपचार - M. बेंटिग
17) शिवनयंत्र - एलियस हावे
18) अॅटमबॉम्ब - आटो हॉन
19) रिवॉल्वर - कोल्ट
20) सुरक्षित वस्तरा - जिलेट
21) दुरध्वनी - ग्रॅहम बेल
22) टेलिव्हिजन - जॉन लॉगी बेअर्ड
23) केस्कोग्राफ - जगदिश चंद्र बोस
24) मायक्रोस्कोप - जेन्सन
25) टायर - डेनलफ
26) बॅरोमीटर - टॉरीचीली
27) विमान - राईट बंधू
28) बंदुकीची दारू - रॉजर बेकन
29) बॉलपेन - जॉन लुई
30) बॉल पॉईंट पेन - ब्युरो बंधू
31) विद्यूत घट - व्होल्टा
32) होमियोपॅथी - सॅम्युअल हायेनमन
33) टाईपरायटर - ख्रिस्तोफर शोल्स
34) स्ट्रेप्टोमायसिस - बॅकसन
35) पोलिओ लस दंडावाटे - साल्क
36) पोलिओ लस तोंडावाटे - अल्बर्ट साबीज
37) बिनतारी संदेश - मार्कोनी
38) कॉलरा - रॉबर्ट कॉक
39) वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
40) पेट्रोल इंजिन - निकोलस ऑटो
41) डिझेल इंजिन - रुडॉल्फ डिझेल
42) इलेक्ट्रीक डायनामा - लायकेल फॅरडे
43) अनुवंशशास्त्राचा जनक- मेंडेल
44) उत्क्रांतीवाद - चार्ल्स डार्विन
45) मोटर गाडी - हेन्री फोर्ड
46) घड्याळ - पीटर
47) सायकल - मॅकमिलन
48) हातमाग - आर्ट राईट
49) यंत्रमाग - कार्ट राईट
50) मोटर सायकल - एडवर्ड बटलर
भारतीय निवडणूक आयोग
भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(1989 मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.Sunil Arora हे 23 वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत.
♦️ आतापर्यंतचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त
🔹 सुकुमार सेन : २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८
🔹 कल्याण वैद्यनाथन सुंदरम : २० डिसेंबर १९५८ ते ३० सप्टेंबर १९६७
🔹 एस.पी. सेन वर्मा : १ ऑक्टोबर १९६७ ते ३० सप्टेंबर १९७२
🔹 महाराज डॉ. नागेन्द्र सिंह : १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३
🔹 टी. स्वामीनाथन : ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जुन १९७७
🔹 एस.एल. शकधर : १८ जुन १९७७ ते १७ जुन १९८२
🔹 राम कृष्ण त्रिवेदी : १८ जुन १९८२ ते ३१ डिसेंबर १९८५
🔹 आर.व्ही.एस. पेरी शास्त्री : १ जानेवारी १९८६ ते २५ नोव्हेंबर १९९०
🔹 श्रीमती व्ही. एस. रमादेवी : २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९०
🔹 टी.एन. सेशन : १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६
🔹 एम. एस. गिल : १२ डिसेंबर १९९६ ते १३ जुन २००१
🔹 जेम्स मायकल लिंगडोह : १४ जुन २००१ ते ७ फेब्रुवारी २००४
🔹 टी. एस. कृष्णमूर्ती : ८ फेब्रुवारी २००४ ते १५ मे २००५
🔹 ब्रिज बिहारी टंडन : १६ मे २००५ ते २८ जुन २००६
🔹 एन. गोपालस्वामी : २९ जुन २००६ ते १९ एप्रिल २००९
🔹 नवीन चावला : २० एप्रिल २००९ ते २९ जुलै २०१०
🔹 शाबुद्दिन याकुब कुरेशी : ३० जुलै २०१० ते १० जून २०१२
🔹 वीरावल्ली सुंदरम संपथ : ११ जून २०१२ ते १५ जानेवारी २०१५
🔹 हरिशंकर ब्रम्हा :१६ जानेवारी २०१५ ते १९ एप्रिल २०१५
🔹 नसीम जैदी :१९ एप्रिल २०१५ ते ६ जुलै २०१७
🔹 अचल कुमार जोति :६ जुलै २०१७ ते 22 जानेवारी 2018
🔹 ओमप्रकाश रावत : 23 जानेवारी 2018 ते 1 डिसेंबर 2018
🔹 सुनील अरोरा : 2डिसेंबर 2018 पासुन पुढे
मराठी व्याकरण शब्दाच्या जाती
1] नाम -
जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.
उदाहरण - घर, आकाश, गोड, गणेश...
__________________________
2] सर्वनाम-
जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.
उदाहरण - मी, तू, आम्ही, हा, जो, तो, कोण......
__________________________
3] विशेषण-
जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.
उदाहरण - गोड, उंच, सुंदर, चपळ, चातुर....
__________________________
4] क्रियापद-
जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.
उदाहरण - बसणे, पळणे, जातो.....
__________________________
5] क्रियाविशेषण-
जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदाहरण - इथे, तिथे, आज, उद्या....
__________________________
6] शब्दयोगी अव्यय-
जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी,
__________________________
7] उभयान्वयी अव्यय-
जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - व, आणि, किंवा, परंतु.....
__________________________
8] केवलप्रयोगी अव्यय-
जे शब्द आपल्या मनातील वृत्तीकिंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - अरेरे, अबब.....
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Latest post
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
खालील विधाने विचारात घ्या? अ पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...
-
1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior) 1. Brave – Courageous (शूर) 2. Honest – Truthful (प्रामाणिक) 3. Happy – Joyful (आनंद...
-
601) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे? 👉 अनक्रीप्शन 602) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी ब...
-
1-10: व्यक्ती आणि त्यांचे वैशिष्ट्ये (People & Their Characteristics) 1. Ascetic – जो ऐहिक सुखांचा त्याग करून साधी जीवनशैली जगतो. (संन...