०६ जानेवारी २०२१

भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-



१) रामसर करार - 

वर्ष - १९७१


* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर


* अमलात येण्याचे वर्ष - १९७५


* भारताने मान्य केला - १९८२


२) CITES - 

वर्ष - १९७३


* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण


*अमलात येण्याचे वर्ष - १९७६


* भारताने मान्य केला - १९८०


३) बोन करार - 

वर्ष -१९७९


* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन


* अमलात येण्याचे वर्ष - १९८३


* भारताने मान्य केला -१९८३


४) व्हिएन्ना करार -

 वर्ष - १९८५


* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८


* भारताने मान्य केला - १९९१


५) बँसेल करार - 

वर्ष - १९८९


* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट


* अमलात येण्याचे वर्ष - १९९२


* भारताने मान्य केला - १९९


६) UNFCCC - 

वर्ष - १९९२


* हवामान बदल रोखणे


* अमलात येण्याचे वर्ष - १९९४


* भारताने मान्य केला - १९९३


७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७


* हरितवायू उत्सर्जनात घट


* अमलात येण्याचे वर्ष - २००५


* भारताने मान्य केला - २००२


८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२


* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन


* अमलात येण्याचे वर्ष - १९९३


* भारताने मान्य वर्ष - १९९४


९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल - 

वर्ष - २०००


* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण


* अमलात येण्याचे वर्ष - २००३


* भारताने मान्य केला - २००३


१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -

वर्ष - १९९४


* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण


* अमलात येण्याचे वर्ष - १९९६


* भारताने मान्य केला - १९९६


११) रोटरडँम करार - 

वर्ष - १९९८


* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .


* अमलात येण्याचे वर्ष - २००४


* भारताने मान्य केला - २००५


१२) स्टॉकहोम करार -

 वर्ष - २००१


*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .


ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार


* अमलात येण्याचे वर्ष - २००४


* भारताने मान्य केला - २००६

मराठी व्याकरण सराव प्रश्न


१) 'भाववाचक नाम' ओळखा 

१)  उंची   ✔️

२)  शरद 

३)  पुस्तक 

४)  झाडे 


२) खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा 

१) ती हळू चालते 

२) रघु खूप झोपला 

३) रमेश दुध पितो  ✔️

४) तो मूर्ख आहे 


३) कंसातील शब्दांचे सामान्यरूप निवडा .

  माझ्या ( अंगण ) एक वडाचे झाड आहे 

१)  अंगणाला 

२)  अंगणाशी 

३)  अंगणाचे

४)  अंगणा    ✔️


४) 'परंतु' हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे ?

१)  उभयान्वयी अव्यय  ✔️

२)  शब्दयोगी अव्यय

३)  क्रियाविशेषण अव्यय 

४)  केवलप्रायोगी अव्यय 


५) कर्ता - कर्म - क्रियापद यांच्या परस्पर संबंधाना ..........म्हणतात 

१)  वाक्य 

२)  शब्दसमूह 

३)  कर्तरी प्रयोग 

४)  प्रयोग   ✔️


६)  ' पुस्तक ' हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंगप्रकारात येतो ?

१)  नपुसंकलिंग    ✔️

२)  पुल्लिंग 

३)  स्त्रीलिंग 

४)   यापैकी नाही 


७)  ' मी निबंध लिहिते असे ' या वाक्यातील काळ ओळखा 

१)   रीती भूतकाळ   ✔️

२)   रीती वर्तमानकाळ

३)   रीती भविष्यकाळ

४)   अपूर्ण भूतकाळ 


८)  ' आणि ' हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?

१)  विकल्पबोधक 

२)  परिणामबोधक 

३)  संकेतबोधक 

४)  समुच्चयबोधक  ✔️

९) अरेरे ! गंगारामचं अजून लग्न झालेलं नाही या वाक्यामध्ये 'अरेरे 'हा कोणता अव्यय आहे ?

१) उभयान्वयी

२)क्रियाविशेषण

३)केवलप्रयोगी  ✔️

४)शब्द योगी


१०) खालीलपैकी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचे उदाहरण कोणते ?

१) तुला पुस्तक हवे की पेन्सिल हवी ?

२)पाऊस आला आणि हवेत गारवा झाला. ✔️

३) मला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक.

४)खुप अभ्यास केला म्हणून पास झालो.


११)'बाभळी मुद्रा व देवळी  निद्रा 'या म्हणीचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.

१) दिसण्यास बावळट व व्यवहार चतुर माणुस ✔️

२)अत्यंत बावळट माणुस

३)बाभळीखाली असणा-या देवळात झोपणारा

४)खूपच आळशी माणुस


१२) गडद निळे गडद निळे जलद भरून आले,

शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले |

हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?

१) यमक

२)पुष्यमक

३)अनुप्रास ✔️

४) श्लेष



1) सर्वनामाचा प्रकार ओळखा ?

"जो"

A. पुरुषवाचक सर्वनाम

B . दर्शक सर्वनाम

C . संबंधी सर्वनाम✔️✔️✔️

D . अनिश्चित सर्वनाम


2) विशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला ---------- असे म्हणतात .

A . विशेष्य✔️✔️✔️

B . अव्य सदृश्य सर्वनाम

C . धातुसाधित विशेषणे

D . अव्ययसाधित विशेषणे


4) अव्ययालाच ------- म्हणतात .

A . विकारी शब्द 

B . पद✔️✔️✔️

C. अविकारी शब्द 

D . विकृति


3) "चांगला मुलगा परिक्षेत पास होतो " यावाक्यातील विशेषण प्रकार ओळखा .

A  . अधिविशेषण✔️✔️✔️

B . विधिविशेषण

C . सार्वनामिक विशेषण

D . उत्तर विशेषण


 4) दिलेल्या शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा ?

"थड"


A . गार

B . किनारा✔️✔️✔️

C . आधात

D . गर्दी 


5) पुढील शब्दसिध्दिचा प्रकार ओळखा ?

"धडपड "


A . पूर्णाभ्यस्त

B .अंशाभ्यस्त

C . अनुकरण वाचक✔️✔️✔️

D .  यापैकी नाही 


6) मराठी भाषेत मुळ सर्वनामे किती आहेत?

A  . १२

B . ०९✔️✔️✔️

C . १५

D . ०७


7) " चला पानावर बसा " या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा?

A . व्यंगार्थ

B . लक्षार्थ✔️✔️✔️

 C . वाच्यार्थ

D . संकेतार्थ


Q: 8) " राम वनात जातो " या वाक्यात एकूण किती मुलध्वनी आहेत ?

A . सात

B. अकरा 

C . तीन 

D . चौदा✔️✔️✔️


10) "मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला"

 या वाक्यातील कर्ता ओळखा

A  .मी

B  . संकष्टी चतुर्थी

C  . चंद्र ✔️✔️

D  . दिसणे


 11) "ळ" वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

A . उष्मे

B . स्पर्श 

C . महाप्राण

D . स्वतंत्र✔️✔️✔️


 12) "आजी दृष्ट काढते" 

वाक्यातील प्रयोग ओळखा

A . कर्मणी प्रयोग 

 B. कर्तरी प्रयोग✔️✔️

C . भावे प्रयोग

D . शक्य कर्मणी प्रयोग


13) प्राधान्य नुसार समासाचे प्रकार  सांगा

A) अव्ययीभाव समास

B) तत्पुरुष समास

C) द्व्ंद्व समास

D) बहुव्रीही समास

आर्सेनिकचे प्रदूषण


✍️आर्सेनिक हा जवळजवळ सर्व प्रकाराच्या जीवनासाठी विषारी ठरतो, परंतु अलीकडेच वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांना एका अभ्यासातून असा शोध लागला आहे की प्रशांत महासागरातले काही सूक्ष्मजीव पाण्यातल्या या विषारी घटकाला सहन करण्यासोबतच सक्रियपणे श्वसनासाठी आत्मसात केले आहे.


✍️बदलत्या वातावरणाशी कश्याप्रकारे जुळवून घेतले जाते त्याबाबत हा शोध घेतला गेला.


◾️आर्सेनिक पदार्थ:-


✍️आर्सेनिक (As) एक गंधहीन आणि चव नसलेला उपधातू आहे, जो भूमीच्या पृष्ठभागाखाली प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. हा पदार्थ सामान्यपणे शीळा, माती, पाणी आणि हवेत आढळतो. हा पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात आढळून येणार्‍या पदार्थांमधील 26वा पदार्थ आहे. प्रमाणानुसार, आर्सेनाइट As-3 याला आर्सेनिकचे सर्वात विषारी स्वरूप मानले जाते. शिवाय आर्सेनिकचे मिथाइलेटेड स्वरूप {MMA(V), DMA(V), MMA(III), DMA(III)} देखील विषारी असतात. जैव-इंधन जाळणे, रासायनिक खते, उद्योग हे या पदार्थाचे मुख्य स्त्रोत आहेत.


✍️मानवी जीवनास विषारी ठरणार्‍या आर्सेनिकमुळे ‘आर्सेनिकोसिस’ ही वैद्यकीय समस्या उद्भवते. त्यामुळे शरीरातल्या उपलब्ध आवश्यक एनजाइमवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे बरेच अवयव काम करणे बंद करतात तसेच त्वचेचे रोग, कर्करोग सारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात.


✍️पयजलात आर्सेनिकसाठी WHO कडून ठरविण्यात आलेल्या मानकानुसार, पेयजलातली या पदार्थाची कमाल पातळी (MLC) 10 PPB एवढी आहे. भारतामध्ये हे प्रमाण 50 PPB एवढे स्वीकृत करण्यात आले आहे.


✍️भारतात पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, आसाम, नागालँड, मणीपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये आर्सेनिकचा प्रभाव आढळून येतो.

महत्त्वाचे आहे नक्की वाचा भारतीय क्षेपणास्त्रे


1. बराक 8 - भारत-इस्त्रायलच्या संयुक्त विध्यमाने, 70 किमी क्षमता, जमिनीवरून हवेत मारा.


2. निर्भय - 1000 किमी पल्ला, डिआरडिओ तर्फे विकसित.


3. पिनाका अग्निबाण प्रणाली 6 - अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.


4. आकाश - एकामागोमाग एक तीन क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता, हवाई दलात तैनात. (जमिनीवरून हवेत मारा करणारे)


5. अस्त्र-सुखोई 30 - विमानांवर तैनात, स्वदेशी बनावटीचे, पल्ला 60 किलोमीटर (हवेतून हवेत मारा करणारे.)


6. पृथ्वी संरक्षण प्रणाली - हवामानाच्या थरांबाहेर 120 किलोमीटरवर शत्रूच्या क्षेपस्त्रांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता. (जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे)


7. ब्राम्होस - पल्ला 300 किमी, गती 2.8 माक, आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, अण्वस्त्रवहन क्षमता.


8. त्रिशूल - जमिनीवरून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्राविरोधी क्षेपणास्त्र.


9. नाग - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र.


10. सूर्या - आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र.


11. सागरिका - पाण्याखालून मारा करणारे क्षेपणास्त्र. पाणबुडीवरून जमिनीवर मारा करणारे.


12. शौर्य - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.


13. धनुष - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.

मोजकेच पण महत्वाचे‌


            सा. विज्ञान विशेष

        शास्त्रीय शोध व संशोधक 


1) प्रोटॉन - गोल्ड स्मिथ 

2) इलेक्ट्रॉन - जे. जे. थॉमसन

3) न्यूट्रॉन - C.C. चाडविक

4) किरणोत्सार - हेन्री बेक्वेरेल

5) लेझर किरण - शॉल व चार्लस टोन्स 

6) क्ष- किरणे - रॉन्टजेन

7) पोलोनियम, रेडियम  - मादाम क्युरी,            पेरी क्युरी

8) अमोनियम, ऑक्सिजन - जोसेफ  प्रिस्टले

9) हायड्रोजन - हेन्री कॅव्हेंडिश

10) अणूबॉम्ब - जे. रॉबर्ट ओपन हायमर

11) महारोगावरील लस - थोर्मन हन्सन

12) डायनामाईट - अल्फ्रेड नोबेल

13) देविची लस - एडवर्ड जेन्नर

14) जडत्वाचे नियम - आयझॅक न्यूटन

15) सापेक्षतावाद - अल्बर्ट आईन्स्टाईन

16) मधुमेहावरील उपचार - M. बेंटिग

17) शिवनयंत्र - एलियस हावे

18) अॅटमबॉम्ब - आटो हॉन

19) रिवॉल्वर - कोल्ट

20) सुरक्षित वस्तरा - जिलेट

21) दुरध्वनी - ग्रॅहम बेल

22) टेलिव्हिजन - जॉन लॉगी बेअर्ड

23) केस्कोग्राफ - जगदिश चंद्र बोस

24) मायक्रोस्कोप - जेन्सन

25) टायर - डेनलफ

26) बॅरोमीटर - टॉरीचीली

27) विमान - राईट बंधू

28) बंदुकीची दारू - रॉजर बेकन

29) बॉलपेन - जॉन लुई

30) बॉल पॉईंट पेन - ब्युरो बंधू

31) विद्यूत घट - व्होल्टा

32) होमियोपॅथी - सॅम्युअल हायेनमन

33) टाईपरायटर - ख्रिस्तोफर शोल्स

34) स्ट्रेप्टोमायसिस - बॅकसन

35) पोलिओ लस दंडावाटे - साल्क

36) पोलिओ लस तोंडावाटे - अल्बर्ट साबीज

37) बिनतारी संदेश - मार्कोनी

38) कॉलरा - रॉबर्ट कॉक

39) वाफेचे इंजिन - जेम्स वॅट

40) पेट्रोल इंजिन - निकोलस ऑटो 

41) डिझेल इंजिन - रुडॉल्फ डिझेल

42) इलेक्ट्रीक डायनामा - लायकेल फॅरडे

43) अनुवंशशास्त्राचा जनक- मेंडेल

44) उत्क्रांतीवाद - चार्ल्स डार्विन

45) मोटर गाडी - हेन्री फोर्ड

46) घड्याळ - पीटर

47) सायकल - मॅकमिलन

48) हातमाग - आर्ट राईट

49) यंत्रमाग - कार्ट राईट

50) मोटर सायकल - एडवर्ड  बटलर

भारतीय निवडणूक आयोग



भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(1989 मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.Sunil Arora हे 23 वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत.


♦️ आतापर्यंतचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त


🔹 सुकुमार सेन : २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८

🔹 कल्याण वैद्यनाथन सुंदरम : २० डिसेंबर १९५८ ते ३० सप्टेंबर १९६७

🔹 एस.पी. सेन वर्मा : १ ऑक्टोबर १९६७ ते ३० सप्टेंबर १९७२

🔹 महाराज डॉ. नागेन्द्र सिंह : १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३

🔹 टी. स्वामीनाथन : ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जुन १९७७

🔹 एस.एल. शकधर : १८ जुन १९७७ ते १७ जुन १९८२

🔹 राम कृष्ण त्रिवेदी : १८ जुन १९८२ ते ३१ डिसेंबर १९८५

🔹 आर.व्ही.एस. पेरी शास्त्री : १ जानेवारी १९८६ ते २५ नोव्हेंबर १९९०

🔹 श्रीमती व्ही. एस. रमादेवी : २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९०

🔹 टी.एन. सेशन : १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६

🔹 एम. एस. गिल : १२ डिसेंबर १९९६ ते १३ जुन २००१

🔹 जेम्स मायकल लिंगडोह : १४ जुन २००१ ते ७ फेब्रुवारी २००४

🔹 टी. एस. कृष्णमूर्ती : ८ फेब्रुवारी २००४ ते १५ मे २००५

🔹 ब्रिज बिहारी टंडन : १६ मे २००५ ते २८ जुन २००६

🔹 एन. गोपालस्वामी : २९ जुन २००६ ते १९ एप्रिल २००९

🔹 नवीन चावला : २० एप्रिल २००९ ते २९ जुलै २०१०

🔹 शाबुद्दिन याकुब कुरेशी : ३० जुलै २०१० ते १० जून २०१२

🔹 वीरावल्ली सुंदरम संपथ : ११ जून २०१२ ते १५ जानेवारी २०१५

🔹 हरिशंकर ब्रम्हा :१६ जानेवारी २०१५ ते १९ एप्रिल २०१५

🔹 नसीम जैदी :१९ एप्रिल २०१५ ते ६ जुलै २०१७

🔹 अचल कुमार जोति :६ जुलै २०१७ ते 22 जानेवारी 2018

🔹 ओमप्रकाश रावत : 23 जानेवारी 2018 ते 1 डिसेंबर 2018

🔹 सुनील अरोरा : 2डिसेंबर 2018 पासुन पुढे

मराठी व्याकरण शब्दाच्या जाती


1] नाम -


जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.


उदाहरण - घर, आकाश, गोड, गणेश... 

__________________________


2] सर्वनाम-


 जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.


उदाहरण - मी, तू, आम्ही, हा, जो, तो, कोण...... 

__________________________


3] विशेषण-


 जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.


उदाहरण - गोड, उंच, सुंदर, चपळ, चातुर.... 

__________________________


4] क्रियापद- 


जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.


उदाहरण - बसणे, पळणे, जातो..... 

__________________________


5] क्रियाविशेषण- 


जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.


उदाहरण - इथे, तिथे, आज, उद्या.... 

__________________________


6] शब्दयोगी अव्यय- 


जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.


उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी, 

__________________________


7] उभयान्वयी अव्यय-


 जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.


उदाहरण - व, आणि, किंवा, परंतु..... 

__________________________


8] केवलप्रयोगी अव्यय-


 जे शब्द आपल्या मनातील वृत्तीकिंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.


उदाहरण - अरेरे, अबब..... 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

चर्चित शहर/देश /राज्य :-


• अरुणाचल प्रदेश:-

हे राज्य संपूर्णत: हागणदारीमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले. हागणदारीमुक्त ठरलेले हे भारतातील सहावे राज्य ठरले. या अगोदर   सिक्किम, हिमाचल प्रदेश, केरळ, हरियाणा आणि उत्तराखंड हे पाच राज्य हागणदारीमुक्त ठरले आहे 


• तामिळनाडू:-

राज्य पोलीस दलातील सेवा तृतीयपंथी व्यक्तीसाठी खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकाने घेतला .असा निर्णय घेणारे तामिळनाडू हे देशातील पहिले राज्य ठरले 


• केरळ :-

केरळ देशातील ४  विमानतळे असलेले भारतातील  पहिले राज्य  आहे. कोचीन, त्रिवेंद्रम, कालिकत आणि कन्नूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत.


• दिल्ली:-

भारतातील पहिले राष्ट्रीय पोलीस संग्रहालय दिल्लीच्या लुटियन भागात बनवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.केंद्रीय पोलीस दल आणि राज्यांच्या पोलीस दलांच्य इतिहासाचा अभ्यास करण्याची संधी या संग्रहालयामुंळे मिळणार आहे. पोलीसांचे गणवेश आणि पोलीसांशी संबंधित अन्य सामग्रीचा संग्रह यात करण्यात येणार आहे.


• फगवाडा (पंजाब):-

पंजाब (फगवाडा ) येथे सुरु असलेल्या १०६ व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये देशातील पहिली चालकविना बस धावली .


• राजस्थान

राष्ट्रीय जैव इंधन धोरण  (National Biofuel Policy) लागू करणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान ठरले 


• मुंबई :-

केंद्र शासन ,राज्य शासन यांच्या सयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक भागीदारी परिषद मुंबई येथे आयोजित केली आहे .२५ वर्षात मुंबईला आयोजक होण्याचा प्रथमच मान मिळाला 


• पाटणा देवी (चाळीसगाव):-

गणितीय खेळांची सांगड घालत गणित सोप करून सांगणारा गणितीतज्ञ भास्कराचार्य गणितनगरी प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील पाटणा देवी येथे उभारला जात आहे 


• सातारा

महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क सातारा येथे  स्थापन करण्यात येत आहे 


• चंदिगढ़

सैन्य साहित्य महोत्सव-2018’ चे आयोजन चंदिगड या शहरात करण्यात आले होते


• बुडापेस्ट

2023 या वर्षामध्ये आईएएएफ (IAAF) विश्व अथॅलेटिक्स चॅपियनशिप ची स्पर्धा पार पडणार आहे


• भोपाळ

भारतातील पहिला वैश्विक कौशल (Mutti-Skill) पार्क स्थापन होत आहे :- 


• सिंगापुर

6 सप्टेंबर , 2018 रोजी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक ने सिंगापुर येथे आशियातील पहिले  डेटा सेंटर सुरु करण्याची घोषणा केली 


• बुंदेलखंड एक्सप्रेस-वे

21 ऑगस्ट  2018 रोजी उत्तरप्रदेश सरकाने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ बुंदेलखंड एक्सप्रेस-वे चे नाव ‘अटल पथ’ असे केले 


• तेलंगाना

या राज्य सरकार ने बायोटेक आणि बायोफार्मा क्षेत्रासाठी ‘बी. हब’ स्थापित करण्याचा निर्णय घेतला


• गुरुग्राम

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड ने भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित केले


• दंतेवाड़ा

अटल बिहारी वाजपेयी एजुकेशन सिटी छत्तीगढ़ मध्ये दंतेवाड़ा या ठिकाणी स्थापन केले  जाणार आहे 


• झारखंड

या राज्यात भारतातील पहिला खादी मॉल स्थापन केला जात आहे 


• उत्तर प्रदेश

या राज्यात विद्युत चोरी बंद करण्यासाठी प्रत्येक जिल्हात एंटी पॉवर थेफ्ट पुलिस स्टेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला 


• गुवाहाटी

 हे रेल्वे स्टेशन भारतातील पहिले सौर ऊर्जा संचालित स्टेशन ठरले 


• महाराष्ट्र

डीजीटल स्वाक्षरी असलेले ७/१२ देणारे भारतातील पहिले राज्य कोणते:- 


• पूर्वी गोदावरी (आंध्र प्रदेश )

भारतातील १००% एलईडी स्ट्रीट लाइटिंग असणारा पहिला जिल्हा  


• सूरत (गुजरात)

भारतातील १०० % सौरऊर्जा ने संचालित प्राथमिक स्वास्थ्य केंद्र (पीएचसी) असणारा पहिला जिल्हा :-


• तमिळनाडु( तमिळनाडु कृषि विश्वविद्यालय, कोईमतूर)

भारतातील पहिले  कीटक  संग्रहालय या राज्यात स्थापन करण्यात येत आहे :-


• फरीदाबाद

भारतातील पहिले पॅरालंपिक भवन येथे स्थापित केले जात आहे 


•  कर्नाटक

या राज्यात जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा पार्क ‘शक्तिस्थल’ स्थापन करण्यात आले


मिशन नोकरी

• गांधीनगर रेल्वे  स्टेशन (जयपुर)

भारतातील संपूर्ण महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक ठरले या अगोदर मुंबईतील माटुंगा हे ‘ संपूर्ण महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक ठरले होते परंतु ते सब-अर्बन (उप-नगरीय) ररेल्वे स्टेशन आहे


• कलकत्ता :- 

भारतातील पहिल्यांदा तरंगता बाजार म्हणजेच 'फ्लोटिंग मार्केट' पश्चिम बंगाल येथील कलकत्ता येथे सुरु करण्यात आला आहे 

Online Test Series

हरदास लक्ष्मणराव नगराळे उपाख्य बाबू हरदास

🟢


◾️जन्म नागपूरमधील कामठी येथे 6 जानेवारी 1904 रोजी झाला.


◾️डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी असलेल्या बाबू हरदास यांना "जय भीम" या अभिवादनाचे जनक मानले जाते


◾️डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 साली स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्य प्रांताचे सरचिटणीस होते


◾️वयाच्या 35 व्या वर्षी त्यांना क्षयरोगाने बाधले व त्यातच 12 जानेवारी  1949 रोजी त्यांचा मृत्यू झाला.


चालू घडामोडी चे २० प्रश्न व उत्तरे

१) कोणत्या व्यक्तीची चौथे निवडणूक उपायुक्त म्हणून नेमणूक झाली?

(A) सुनील अरोरा

(B) ओम प्रकाश रावत

(C) अचल कुमार ज्योती

(D) उमेश सिन्हा✅


२) कोणत्या राज्याला AFSPA कायद्याच्या अंतर्गत ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले?

(A) त्रिपुरा

(B) सिक्किम

(C) मेघालय

(D) नागालँड✅


३) “नॅशनल पोलीस K-9 जर्नल” हे ‘______’ या विषयावरील देशातले पहिले प्रकाशन आहे.

(A) पोलीस श्वान✅

(B) पोलीस घोडे

(C) पोलीस उंट

(D) यापैकी नाही


४) कोणत्या व्यक्तीला "बूल" कुमार म्हणून ओळखले जात होते?

(A) लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी

(B) कॅप्टन मोडकुर्ती नारायण मूर्ती

(C) कर्नल नरेंद्र✅

(D) मेजर हेमंत राज


५) कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?

(A) राजस्थान

(B) कर्नाटक

(C) गुजरात✅

(D) आंध्रप्रदेश


६) कोणत्या व्यक्तीने "विप्लवा तपस्वी: पीव्ही" या शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे?

(A) एम. व्यंकय्या नायडू

(B) ए. कृष्ण राव✅

(C) A आणि B

(D) यापैकी नाही


७) ‘राष्ट्रीय मापन शास्त्र परिषद 2021’ याचा विषय काय होता?

(A) अॅडव्हांसेस इन मेट्रोलॉजी

(B) मेट्रोलॉजी फॉर द ग्रोथ ऑफ द नेशन

(C) मेट्रोलॉजी फॉर द इन्क्लूसिव ग्रोथ ऑफ द नेशन✅

(D) यापैकी नाही


८) कोणत्या संस्थेनी “कोची-मंगळुरू वायू पाईपलाईन प्रकल्प” तयार केला?

(A) NTPC लिमिटेड

(B) भारतीय पोलाद प्राधिकरण

(C) GAIL (इंडिया) लिमिटेड✅

(D) ऑइल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन


९) कोणत्या व्यक्तीची दिल्ली सरकारने स्थापना केलेल्या ‘तामिळ अकादमी’च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? 

(A) एन. राजा✅

(B) सेनगोट्टीयन के. ए.

(C) पी. थांगमणी

(D) एस. पी. वेलुमानी


१०) कोणता देश 2023 सालापर्यंत लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार?

(A) भारत

(B) जपान✅

(C) चीन

(D) रशिया


११) कोणत्या चक्रीवादळामुळे डिसेंबर 2020 या महिन्याच्या शेवटी फिजी देशाचे मोठे नुकसान झाले?

(A) लुसी चक्रीवादळ

(B) उला चक्रीवादळ

(C) दमण चक्रीवादळ

(D) यासा चक्रीवादळ✅


१२) _ आणि _ या राज्यांच्या सीमेवर ‘दजूको खोरे’ आहे.

(A) नागालँड आणि मणीपूर✅

(B) नागालँड आणि मिझोरम

(C) मणीपूर आणि त्रिपुरा

(D) यापैकी नाही


१३) कोणत्या दिवशी ‘जागतिक ब्रेल दिन’ साजरा करतात?

(A) 1 जानेवारी

(B) 3 जानेवारी

(C) 5 जानेवारी

(D) 4 जानेवारी✅


१४) कोणत्या देशाने फाशीची शिक्षा रद्द केली? 

(A) बेलारूस

(B) कझाकस्तान✅

(C) ताजिकिस्तान

(D) चीन


१५) नव्या विधेयकानुसार, केंद्रीय सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला परवानगी देण्याचे वय किती निश्चित केले आहे?

(A) 18 वर्ष

(B) 25 वर्ष

(C) 24 वर्ष

(D) 21 वर्ष✅


१६) कोणत्या व्यक्तीची भारतीय भूदलाच्या ‘मानवी हक्क कक्ष’चे प्रथम प्रमुख म्हणून नेमणूक झाली?

(A) जनरल बिपिन रावत

(B) लेफ्टनंट जनरल सतिंदर कुमार सैनी

(C) मेजर जनरल गौतम चौहान✅

(D) लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग


१७) कोणत्या देशात हिमयुगात अस्तित्वात असलेल्या ‘लोकरीने आच्छादित असलेला गेंडा’ याचे अवशेष सापडले?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) रशिया✅

(D) चीन


१८) कोणत्या व्यक्तीने आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांची जागा घेतली?

(A) पोनी मा हुआटेंग

(B) जॅक मा

(C) अनिल अंबानी

(D) झोंग शांशां✅


१९) चीनच्या पहिल्या मंगळ मोहीमेचे नाव काय आहे?

(A) झेंगहे

(B) तियानवेन-1✅

(C) शेनझोऊ

(D) चांग’ए प्रोजेक्ट


2०) कोणत्या मंत्रालयाने 'उद्योग मंथन' कार्यक्रमाचे आयोजन केले?

(A) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

(B) अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय

(C) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

(D) वाणिज्य व उद्योग मंत्रालय✅

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम लवकरच - मोदी.


🗑औषध नियंत्रक संस्थेने कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर आता जगातील सर्वात मोठी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम भारतात सुरू होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


🗑या लशी भारत निर्मित असून त्यात आपले वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांनी मोठी भूमिका पार पाडली, अशा शब्दात पंतप्रधानांनी प्रशंसा केली. ते म्हणाले, की जगातील सर्वात मोठा कोविड १९ लसीकरण कार्यक्रम भारतात सुरू होत असून त्यात वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांच्या परिश्रमांचे मोठे योगदान आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी सोमवारी ऑक्सफर्डची कोविड १९ लस म्हणजे सीरमची कोव्हिशिल्ड व भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.


🗑राष्ट्रीय हवामानशास्त्र बैठकीत मोदी यांनी सांगितले, की भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांना जगात केवळ मागणीच आहे असे नाही तर ती उत्पादने जगाने स्वीकारली आहेत. गुणवत्ता व संख्या यात गुणवत्ता जास्त महत्त्वाची असून आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा पाठपुरवा करताना भारतीय उत्पादनांची गुणवत्ता वाढत आहे.

भारतीय हवामान विभागाचा “वर्ष 2020 मधले भारतातले हवामान’ अहवाल.


🔰भारतीय हवामान विभागाने (IMD) “वर्ष 2020 मधले भारतातले हवामान’ या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.


🔴ठळक नोंदी ...


🔰वर्ष 2020 हे वर्ष 1901 पासूनचे आठवे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले.सर्वात उष्ण हवामानाची वर्षे म्हणून नोंदवल्या गेलेल्या वर्षांपैकी बारा वर्षे ही गेल्या पंधरा वर्षातली म्हणजे 2006-2020 मधली वर्षे आहेत.


🔰मागील दशक (2001 - 2010/2011 - 2020) हे देखिल नोंदवले गेलेल्या सर्वाधिक उष्ण दशकांपैकी एक आहे.

देशभरात झालेला नैऋत्य मौसमी हंगामातला (जून ते सप्टेंबर) पाऊस सरासरीपेक्षा जास्त (LPAच्या 109 टक्के) होता.


🔰दशभरातले 2020 या वर्षातले ईशान्य मोसमी हंगामामधले पावसाचे प्रमाण सर्वसाधारण होते.


🔰2020 या वर्षामध्ये उत्तर हिंद महासागरात पाच वादळे तयार झाली. ही वादळ म्हणजे अतीशक्तिशाली वादळ ‘अम्फान’, अतितीव्र चक्रीवादळ ‘निवारा’ आणि ‘गती’,  तीव्र चक्रीवादळ ‘निसर्ग’ आणि चक्रीवादळ ‘बुरेवी’.


🔰हवामानासंबधीत प्रभावी मोठ्या घटना देशात घडल्या. उदाहरणार्थ - अतिशय मुसळधार पाऊस, पूर, दरडी कोसळणे, वादळ, विजांचे थैमान, थंडीची लहर इत्यादी.


🔰वार्षिक पृष्ठभाग तसेच हवेचे तापमान वर्ष 2020 मध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त होते. यावर्षी देशभरात जमीन आणि हवेचे तापमान हे सरासरी +0.29 अंश सेल्सियस राहिले.


🔰दशभरातल्या हवामानाच्या नोंदी वर्ष 1901 पासून केल्या जातात. या नोंदींनुसार 2020 हे आठवे सर्वाधिक उष्ण वर्ष आहे.


🔰‘WMO स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट’ याच्यानुसार, जागतिक पातळीवर पृष्ठभाग तापमानातला फरक वर्ष 2020 मध्ये (जानेवारी तो ऑक्टोबर) हा +1.2 अंश सेल्सियस राहिला.

Shift 1 Mts 5 January 2021 exam questions



१) वैदिक संस्कृतीचा कालखंड


२) महाराष्ट्राचे वनमंत्री


३) महाराष्ट्राचे पाणीपुरवठामंत्री


४) भारताने जगाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे


५) भारतातील सर्वात साक्षर जिल्हा


६) अकोल्याचे खासदार


७) केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री


८) गोदावरी नदीची लांबी किती


९) कावेरी नदी कोठे आहे


१०) महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा कधी सुरू केली


११) बुलंद दरवाजा कोठे आहे


१२) परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी कोणती मोहीम राबविली गेली


१३) संत जनाबाई कोणाच्या शिष्या होत्या


१४) संत कबीर कोणत्या समाजाचे होते


१५) भारतात पोस्ट बँक ची सुरुवात केव्हा झाली


१६) गीत गोविंद ग्रंथ कोणी लिहिला आहे


28) जयदेव लिखित गीतागोविंदम कोणत्या भाषेत आहे


29) कलिंगा पुरस्कार कोणती सायन्स अकॅडेमी देते


30) मुदुमलाई अभयारण्य कोठे आहे


31) मानस कोणत्या नदीची उपनदी आहे


32) गंदक कोणत्या नदीची उपनदी आहे


33) बालमजुरी हे कोणत्या मूलभूत हक्कामध्ये येते


34) वेद किती आहेत


35) आत्मीय सभेची स्थापना कोणी केली


36) बॉम्बे प्रेसिडन्सी स्थापना


37) NATO ट्रीटी मध्ये शेवटचा सदस्य देश कोणता


38) जीविताच स्वातंत्र्य कोणत्या कलमात येते


39) गुरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे


40) ग्रँड टॅंक रोड कधी बांधण्यात आला


41) राष्ट्रीय सभेत फूट केव्हा पडली


42) वेदांचे किती प्रकार आहेत


43) कन्याकुमारी ते तामिळनाडू मध्ये कोणती नदी आहे


44) मुंबई येथे कोणती चळवळ झाली होती


45) कावेरी नदी काठी कोणते गाव/शहर आहे


46) जगातील कोणता देश पोलिओ मुक्त झाला आहे


47) (20×20×20) ÷(4×4×4)


48) मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतला आहे


49) आकारमानाने देशातील सर्वात मोठे राज्य कोनते


50) राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेतली


51) (152 × 17 ) (33 ÷ 11 ) = ?


52) (120÷16) × ? - 4=356


53) बिहू सण कोणत्या राज्याचा आहे


54) दादासाहेब फाळके पुरस्कार कशाशी संबंधित आहे


55) CII चा फुल फॉर्म


56) कृष्णा आणि कावेरी कोणत्या किनाऱ्यावरून वाहतात


57) DGP फुल फॉर्म


58) पेंच व्याघ्रप्रकल्प


59) ऑपरेशन समुद्र सेतू


60) अष्टप्रधान मंडळातील प्रधान


61) भारताचे 12 वे राष्ट्रपती


62) सर्वात जास्त ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात असतो


63) महाबलिपुरम मंदिर


64) प्रस्तावनेत नसलेला शब्द


65) बोडो भाषा कोठे बोलली जाते


66) दक्षिणवासी कालीमाता मंदिर

पोलिस भरतीचा निर्णय ! 'एसईबीसी'तील विद्यार्थ्यांना भरावे लागणार खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क; 'ईडब्ल्यूएस'चा उल्लेखच नाही



गृह विभागाच्या निर्णयात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा आणि संबंधित पात्र विद्यार्थ्यांकडून वाढीव परीक्षा शुल्क भरून घ्यावे, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, या आदेशात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा 'ईडब्ल्यूएस'मधून विचार करावा, असा उल्लेख करण्यात आलेला नाही. गृह विभागाने संबंधित विभागाला पूर्वीच्या निर्णयाचे शुध्दीपत्रक काढण्याचेही आदेश दिले आहे.


 सोलापूर : पोलिस भरतीसंदर्भात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करुन संबंधित विद्यार्थ्यांची पात्रता, वयोमर्यादा पाहून त्यांच्याकडून वाढीव परीक्षा शुल्क 15 दिवसांत भरुन घेतले जाणार आहे. त्यानंतर पोलिस महासंचालक कार्यवाहीचा अहवाल तत्काळ शासनास सादर करणार आहेत. तसे आदेश गृह विभागाने आज काढले. 


दरम्यान, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयाच्या तथा अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जावर अंतिम निकाल होईपर्यंत लागू राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


गृह विभागाच्या आदेशानुसार... 


'एसईबीसी'चे आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी 

'एसईबीसी'तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू करावी 

जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून करावा विचार 

'एसईबीसी'तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारावे 

वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरुन घेण्यात येईल; 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी 

पोलिस महासंचालकांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करावा.


गृह विभागाने 2019 मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने 'एसईबीसी' आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली. मात्र, आज गृह विभागाचे उपसचिव शिरीष मोहोड यांनी पोलिस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले. दरम्यान, गृह, सार्वजनिक आरोग्य व मेडिकल विभागाअंतर्गत रिक्‍त पदांची भरती करण्यास वित्त विभागाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यानुसार आता भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. 


मात्र, गृह विभागाच्या निर्णयात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा आणि संबंधित पात्र विद्यार्थ्यांकडून वाढीव परीक्षा शुल्क भरून घ्यावे, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, या आदेशात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा 'ईडब्ल्यूएस'मधून विचार करावा, असा उल्लेख करण्यात आलेला नाही. गृह विभागाने संबंधित विभागाला पूर्वीच्या निर्णयाचे शुध्दीपत्रक काढण्याचेही आदेश दिले आहे.

पत्रकार दिन


महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. 

महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.


बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला**


भाषेत गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी  1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले


त्याचवेळी इंग्रजी  सत्ताधार्‍यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.


वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. 


1832 मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले


चालूघडामोडी



कोणत्या व्यक्तीची चौथे निवडणूक उपायुक्त म्हणून नेमणूक झाली?

(A) सुनील अरोरा

(B) ओम प्रकाश रावत

(C) अचल कुमार ज्योती

(D) उमेश सिन्हा✅



कोणत्या राज्याला AFSPA कायद्याच्या अंतर्गत ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले?

(A) त्रिपुरा

(B) सिक्किम

(C) मेघालय

(D) नागालँड✅



 “नॅशनल पोलीस K-9 जर्नल” हे ‘______’ या विषयावरील देशातले पहिले प्रकाशन आहे.

(A) पोलीस श्वान✅

(B) पोलीस घोडे

(C) पोलीस उंट

(D) यापैकी नाही



 कोणत्या व्यक्तीला "बूल" कुमार म्हणून ओळखले जात होते?

(A) लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी

(B) कॅप्टन मोडकुर्ती नारायण मूर्ती

(C) कर्नल नरेंद्र✅

(D) मेजर हेमंत राज



 कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?

(A) राजस्थान

(B) कर्नाटक

(C) गुजरात✅

(D) आंध्रप्रदेश



कोणत्या व्यक्तीने "विप्लवा तपस्वी: पीव्ही" या शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे?

(A) एम. व्यंकय्या नायडू

(B) ए. कृष्ण राव✅

(C) A आणि B

(D) यापैकी नाही


1) महापौर पदाची जबाबदारी स्वीकारणारी देशातली सर्वात तरुण व्यक्ती कोण ठरली?

उत्तर : आर्या राजेंद्रन


2) पहिला ‘आंतरराष्ट्रीय महामारी सज्जता दिन’ साजरा कोणत्या तारखेला करण्यात आला?

उत्तर: 27 डिसेंबर 2020


3) “नौशेरा का शेर” म्हणून कोणत्या व्यक्तीला संबोधले जाते?

उत्तर : ब्रिगेडिअर मोहम्मद उस्मान


4) ‘ट्रायब इंडिया’याच्या उत्पादन यादीत समाविष्ट करण्यात आलेला मध कोणत्या प्रकाराचा आहे?

उत्तर: जायंट रॉक बी हनी


5) ‘सीड टू शेल्फ’ या संज्ञेचा अर्थ काय आहे?

उत्तर : शेतकरी आणि उत्पादक यांच्यातला दुवा


6) ‘ब्लू फ्लॅग’ कार्यक्रम कोणती संस्था राबविते?

उत्तर : फाउंडेशन फॉर एनव्हिरोनमेंटल एज्युकेशन


7) ‘पेडलंदरिकी इल्लू’ योजना कशासंबंधी आहे?

उत्तर : सर्व गरीबांसाठी घरे


8) ‘भसन चर’ बेट कोणत्या प्रदेशात आहे?

उत्तर : बांगलादेश


● आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांची जागा कोणत्या व्यक्तीने घेतली?

उत्तर : झोंग शानशान


● नुकतीच कोणत्या देशाने फाशीची शिक्षा रद्द केली?

उत्तर : कझाकस्तान


● नव्या विधेयकानुसार, केंद्रीय सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला परवानगी देण्याचे वय किती निश्चित केले आहे?

उत्तर : 21 वर्ष


● भारतीय भूदलाच्या ‘मानवी हक्क कक्ष’चे प्रथम प्रमुख म्हणून कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?

उत्तर : मेजर जनरल गौतम चौहान


● दीपोर बील आर्द्रभूमी प्रदेश कोणत्या राज्यात आहे?

उत्तर : आसाम


● ‘डायमिडोफॉस्फेट’चे रासायनिक सूत्र काय आहे?

उत्तर : H4N2O2P


● हिमयुगात अस्तित्वात असलेल्या ‘लोकरीने आच्छादित असलेला गेंडा’ याचे अवशेष कोणत्या देशात सापडले?

उत्तर : रशिया


● चीनच्या पहिल्या मंगळ मोहीमेचे नाव काय आहे?

उत्तर : तियानवेन-1

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस देण्यास ब्रिटनमध्ये सुरुवात.


🔶ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड -अ‍ॅस्ट्राझेनेका यांची कोविड प्रतिबंधक लस डायलिसिसवर असलेल्या एका ८२ वर्षीय रुग्णास देण्यात आली. याआधीच मान्यता दिलेल्या फायझर-बायोएनटेक लशीच्या मदतीने लसीकरणाची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.


🔶ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस पहिल्यांदा या व्यक्तीस देण्यात आली. ब्रायन पिंकर असे या व्यक्तीचे नाव असून ऑक्सफर्ड विद्यापीठ रुग्णालयात ही लस देण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य सेवेने लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने सुरू केला असून ऑक्सफर्डची लस हे आता तेथील करोना विरोधी लढाईत दुसरे शस्त्र ठरले आहे. याआधी फायझर व बायोएनटेक यांच्या लशीस मान्यता देण्यात आली होती.


🔶मूत्रपिंड विकाराने डायलिसिसवर असलेल्या निवृत्त व्यवस्थापकास ऑक्सफर्डची लस देण्यात आली असून पिंकर यांनी सांगितले, की करोना विषाणूपासून संरक्षण मिळाले याचे समाधान आहे. पिंकर यांच्याव्यतिरिक्त तीन मुलांचा पिता असलेले शिक्षक ट्रेव्हर कोलेट व प्रा. अँड्रय़ू पोलार्ड यांना सोमवारी लस देण्यात आली. पोलार्ड हे बालरोगतज्ज्ञ असून ऑक्सफर्डची लस तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.


🔶ऑक्सफर्ड लस गटाचे संचालक व ऑक्सफर्ड लस चाचणीचे मुख्य संशोधक प्रा. पोलार्ड यांनी सांगितले, की ऑक्सफर्ड विद्यापीठाने अ‍ॅस्ट्राझेनेकासाठी तयार केलेली लस मिळाली हा अभिमानाचा क्षण आहे. आमच्या चमूने त्यासाठी बरेच कष्ट केले होते व आता ही लस जगात उपलब्ध होत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने लस देणे गरजेचे आहे. कारण या रोगाच्या उच्चाटनात त्यांचा मोठा वाटा आहे. नव्या ऑक्सफर्ड लशीची वाहतूक व साठवणूक सोपी आहे. फायझरची लस उणे ७० अंश सेल्सियस तापमानाला ठेवावी लागते, त्यामुळे तिचा वापर सोपा नाही.

'युपीएससी'ची 8 ते 17 जानेवारीपर्यंत परीक्षा ! 'एमपीएससी'ची परीक्षा फेब्रवारीत?



आरक्षण बदलासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी जाहीरात काढली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या 'एसईबीसी' आरक्षणास स्थगिती दिली.


 या पार्श्‍वभूमीवर आयोगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गाचा दावा केलेल्या विद्यार्थ्यांनी आता खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गातून आरक्षण बदलावे, असे आदेश काढले आहेत. त्यासाठी 5 ते 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. 

सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती कायम असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 'एसईबीसी' प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या अथवा केंद्र सरकारच्या 'ईडब्ल्यूएस'चा पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.


 दुसरीकडे 8 ते 17 जानेवारीदरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा जानेवारीअखेर अथवा 15 फेब्रुवारीपर्यंत होईल, अशी शक्‍यता सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली आहे.

 

आरक्षण बदलासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी जाहीरात काढली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या 'एसईबीसी' आरक्षणास स्थगिती दिली. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गाचा दावा केलेल्या विद्यार्थ्यांनी आता खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गातून आरक्षण बदलावे, असे आदेश काढले आहेत. त्यासाठी 5 ते 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. 

 

राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यभर लॉकडाउन करण्यात आला. विद्यार्थ्यांना वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने आणि परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने आयोगाच्या माध्यमातून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. कोरोनासंबंधीचे निर्बंध व नियमांचे पालन करुन परीक्षा घेण्याचे आयोगाने निश्‍चित केले आणि विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रही वितरीत केले. मात्र, मराठा समाजाचे आरक्षण स्थगित झाल्याने पुन्हा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. 


आयोगाच्या प्रश्‍नपत्रिका अद्यापही जिल्ह्याच्या कोषागार कार्यालयातच पडून आहेत. दुसरीकडे हजारो विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात आली असून त्यांच्यासमोर बेरोजगारीचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा आधार घेऊन परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु केल्याचेही सांगण्यात आले.


 तत्पूर्वी, आयोगाने स्पर्धा परीक्षा देण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना यापुढे अधिकाधिक सहा संधी तर अनुसूचित जाती- जमातीतील विद्यार्थ्यांसाठी अमर्याद संधी असेल, असा निर्णय घेतला. तर उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना नऊ संधी देण्यात येतील, असेही स्पष्ट केले आहे. त्यानुसार पुढील काळात कार्यवाही केली जाणार आहे.

अंटार्क्टिकासाठी 40 वी भारतीय वैज्ञानिक मोहीम



भारताने अंटार्क्टिकासाठी 40 वी वैज्ञानिक मोहीम आयोजित केली आहे. भारतीय मोहीम देशाच्या चार दशकांच्या दक्षिणेकडील बर्फाळ प्रदेशातल्या वैज्ञानिक प्रयत्नांचे प्रतिक आहे. 40 व्या भारतीय अंटार्क्टिका मोहिमेचा प्रवास 5 जानेवारी 2021 रोजी गोव्याहून 43 सदस्यांसह सुरु झाला.


‘चार्टर्ड आईस’ श्रेणीचे ‘एमव्ही वॅसिली गोलोव्हिन’ हे जहाज 30 दिवसांचा प्रवास करून अंटार्क्टिकाला पोहोचेल. चमूला तिथे सोडल्यानंतर हे जहाज एप्रिल 2021 मध्ये भारतात परत येणार. परत येताना जहाज मागील फेरीतल्या चमूला परत घेऊन येणार.


अभ्यासले जाणारे विषय - हवामान बदल, भूगर्भशास्त्र, समुद्रातले निरिक्षण, विद्युत व चुंबकीय प्रवाह मोजमाप, पर्यावरणी देखरेखीसाठी चालू असलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांना पाठबळ देण्यावर भर दिला आहे; अन्न, इंधन, तरतुदी आणि अतिरिक्त वस्तूंचे पुनर्वसन; आणि हिवाळ्यातल्या चमूला परत आणण्यावर भर दिला आहे.


पार्श्वभूमी


भारत सरकारने 1981 सालापासून ‘अंटार्क्टिका संशोधन’ हा एक प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेतला आहे. पहिल्या फेरीमध्ये डॉ. एस.झेड. कासिम यांच्या नेतृत्वात 21 वैज्ञानिक आणि सहाय्यक कर्मचारी यांच्या पथकाचा समावेश होता.


या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर, भारतीय अंटार्क्टिका कार्यक्रमाने आता अंटार्क्टिकामध्ये दक्षिण गंगोत्री, मैत्री आणि भारती अशी तीन कायमस्वरूपी संशोधन केंद्रे उभारली आहेत. आजपर्यंत, अंटार्क्टिकामध्ये मैत्री आणि भारती अशी दोन कार्यान्वित संशोधन केंद्रे आहेत.

राष्ट्रीय अंटार्क्टिक व महासागरी संशोधन केंद्र ‘नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिक अँड ओशन रिसर्च’ पणजी (गोवा) येथे आहे.


अंटार्क्टिका खंड


अंटार्क्टिका पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवाभोवतीचे हिमाच्छादित व पर्यावरण प्रदूषणमुक्त खंड आहे. ते जागतिक हवामानाचे नियंत्रक म्हणून ओळखले जाते. या खंडाचे क्षेत्रफळ 1.42 कोटी चौ. किमी. आहे. पृथ्वीवरील एकूण गोड्या जलसंसाधनांपैकी 70 टक्के जलसंसाधन अंटार्क्टिकावर हिमरूपात आहे.

०५ जानेवारी २०२१

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी


1) आचार्य कृपलानी – 1947


2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49


3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950


4) जवाहरलाल नेहरु – 1951-54


5) यू. एन. धेबर – 1955-59


6) इंदिरा गांधी – 1959


7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63


8) के. कामराज – 1964–67


9) निजलिंगअप्पा – 1968


10) जगजीवनराम – 1970–71


11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74


12) देवकांत बरुआ – 1975-77


13) इंदिरा गांधी – 1978–84


14) राजीव गांधी – 1985–91


15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96


16) सिताराम केसरी – 1996–98


17) सोनिया गांधी – 1998 ते 2017


18) राहुल गांधी - 2017 पासून

राजस्थानमध्ये ‘बर्ड फ्लू’चा इशारा



राजस्थानच्या झालावाड जिल्ह्य़ात मृत कावळ्यांमध्ये एका भयंकर विषाणूचे अस्तित्व आढळल्यानंतर, तसेच जयपूरसह इतर काही जिल्ह्य़ांत आणखी पक्षी मृत्युमुखी पडल्यानंतर राज्यात ‘बर्ड फ्लू’चा इशारा जारी करण्यात आला आहे.


पशुसंवर्धन विभागाने एक राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, परिणामकारकरीत्या देखरेखीसाठी आपली पथके विविध जिल्ह्य़ांमध्ये पाठवली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


जयपूरमधील प्रसिद्ध जल महल येथे रविवारी ७ कावळे मृतावस्थेत आढळले. यामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्या कावळ्यांची एकूण संख्या २५२ झाली आहे.


बर्ड फ्लू रोगामुळे झालेले मृत्यू प्रामुख्याने कावळ्यांमध्ये आढळले असून, त्यापैकी बहुतांश कोटा व जोधपूर विभागांतील आहेत, असे पशुसंवर्धन खात्याचे प्रधान सचिव कुंजीलाल मीणा यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले.

‘हा विषाणू भयानक असून त्या संदर्भात आवश्यक ती मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. 


सर्व फील्ड अधिकारी आणि पोल्ट्री फार्म मालकांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे. प्रामुख्याने पाणथळ जागा, सांभर सरोवर आणि कायलादेवी पक्षी अभयारण्य यांच्यासह सर्व ठिकाणांवर परिणामकारक देखरेख सुनिश्चित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्य स्तरावर एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे’, अशी माहिती मीणा यांनी दिली. झालावाड येथे २५ डिसेंबरला कावळ्यांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. त्यांचे नमुने भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हाय- सिक्युरिटी अ‍ॅनिमल डिसिझेस (निषाद) येथे पाठवण्यात आल्यानंतर बर्ड फ्लू विषाणू आढळला, असेही मीणा यांनी सांगितले.

कोची-मंगळुरू नैसर्गिक वायू पाईपलाईन प्रकल्प



पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 5 जानेवारी 2021 रोजी व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे “कोची-मंगळुरू वायू पाईपलाईन प्रकल्प” देशाला समर्पित करणार आहेत.


ठळक बाबी


हा कार्यक्रम ‘वन नेशन वन गॅस ग्रिड’ निर्मितीच्या दिशेने ठरवलेला महत्वपूर्ण टप्पा आहे.

ही 450 किलोमीटर लांबीची पाईपलाईन गेल इंडिया लिमिटेड या कंपनीने तयार केली आहे. या संपूर्ण प्रकल्पाची अंदाजे किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये इतकी होती.


दररोज 12 दशलक्ष मेट्रीक स्टँडर्ड क्यूबिक मीटर इतकी वाहतूक करण्याची याची क्षमता आहे.

पाईपलाईनद्वारे कोची (केरळ) येथील रिगॅसिफीकेशन टर्मिनल पासून एरनॅक्यूलम, थ्रीसूर, पलक्कड, मल्लपूरम, कोझिकोडी, कन्नूर आणि कासारगोड या जिल्ह्यांमधून जात मंगळुरू (कर्नाटकातला दक्षिण कन्नड जिल्हा) पर्यंत द्रव नॅचरल गॅस (LNG) नेला जाणार.


या पाईपलाईनमुळे घराघरांत पर्यावरण अनुकूल आणि परवडणारे इंधन पाईप नॅचरल गॅस स्वरूपात पुरविण्यात येणार असून वाहतूक क्षेत्राला काँम्प्रेस्ड नॅचरल गॅस मिळणार. तसेच या पाईपलाईनवरून जिल्ह्यांतील व्यावसायिक आणि औद्योगिक घटकांना नैसर्गिक वायूचा पुरवठा होणार. अशा स्वच्छ इंधनाच्या वापराने वायूप्रदूषणाला आळा बसून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होणार.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशात ६०,००० बालकांचा जन्म, सर्वाधिक बालकांचा जन्म झालेल्या देशांमध्ये भारत अव्वल



भारतामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जवळजवळ ६० हजार बालकांचा जन्म झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक बालकांचा जन्म होण्याच्या यादीमध्ये भारत अव्वल राहील असा अंदाज अधिक व्यक्त करण्यात आला होता. मुलांसंदर्भातील विषयांवर जगभरामध्ये काम करणाऱ्या युनिसेफ (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड) या संस्थेने भारतामध्ये पहिल्याच दिवशी ६० हजार बालकांचा जन्म होईल असं म्हटलं होतं. 


तसेच जगभरामध्ये ३ लाख ७० हजार बालकांचा १ जानेवारी २०२१ रोजी जन्म होईल असंही युनिसेफने म्हटलेलं. मात्र यंदा भरतात वर्षाच्या पहिल्याच दिवशी जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण हे मागील वर्षीपेक्षा कमी आहे. मागील वर्षी म्हणजे १ जानेवारी २०२० रोजी भारतात ६७ हजाराहून अधिक बालकांचा जन्म झाला होता.


नवीन वर्षाच्या आगमानाआधीच १ जानेवारी रोजी सर्वाधिक बालकांचा जन्म कोणत्या देशांमध्ये होईल यासंदर्भातील अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार भारतात ५९ हजार ९९५ बालकांचा जन्म होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला. त्याचबरोबर चीन ३५ हजार ६१५, नायझेरिया २१ हजार ४३९, पाकिस्तान १४ हजार १६१, इंडोनेशिया १२ हजार ३३६, इथियोपिया १२ हजार ६, अमेरिका १० हजार ३१२, इजिप्त नऊ हजार ४५५, बांगलादेश नऊ हजार २३६ आणि डेमोक्रेटीक रिपब्लिक ऑफ काँगो आठ हजार ६४० बालकांचा जन्म होईल असं सांगण्यात आलं होतं. 


जगभरामध्ये १ जानेवारी जन्माला येणाऱ्या बालकांपैकी ५२ टक्के बालकं या दहा देशांमध्ये जन्माला येतील असं युनिसेफनं म्हटलं आहे.

यंदाच्या वर्षी जन्माला येणाऱ्या १४ कोटी बालकांचे सरासरी वयोमान हे ८४ वर्ष असेल असंही युनिसेफने म्हटलं आहे. भारतामधील बालकांचे सरासरी वयोमान हे ८० वर्षे ९ महिने इतकं असेल असंही यात नमूद करण्यात आलं आहे. तुलनात्मकरित्या सांगायचं झाल्यास यंदाच्या वर्षी जन्माला येणाऱ्या बलाकांची संख्या ही २०२० मध्ये करोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येपेक्षा ७८ पटींनी जास्त असणार आहे.

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राकडे.


🔰वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राने सांभाळावे, असा प्रस्ताव भारतीय हौशी कबड्डी महासंघाकडून देण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी महासंघाचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी दिली.


🔰तर येत्या 9 जानेवारीला भारतीय कबड्डी महासंघाची ऑनलाइन कार्यकारिणी समितीची बैठक होणार आहे. या सभेला पाटील आणि कार्यकारिणी सदस्य सचिन भोसले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.


🔰तसेच या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेच्या यजमानपदाविषयी भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून विचारणा केली जात आहे.


🔰महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यास  मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्हा संघटनांनी आयोजनासाठी उत्सुकता दर्शवली आहे.

कोरोना लसीसाठी Co-WIN अ‍ॅपवर करावे लागणार रजिस्टर.


🔰भारतातील सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना लसीची ड्राय रन सुरू झाली आहे.


🔰दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड -19 लसीच्या वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी, डेटा ठेवण्यासाठी आणि लोकांना या लसीसाठी नोंदणी करण्यासाठी कोविन (Co-WIN App) नावाचे अ‍ॅप तयार केले आहे.


🔰दशातील नागरिक जे आरोग्य कर्मचारी नाहीत ते कोविन अ‍ॅपवर लससाठी स्वत: ची नोंदणी करु शकतात, ज्यासाठी त्यांना हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल स्टोअर वरून डाउनलोड करावे लागेल.


🔰तर यामुळे लसीकरण सुरू झाल्यानंतर ज्यांनी या अ‍ॅपवर आधीच नोंदणी केली आहे त्यांना लवकरात लवकर लस मिळेल.

भारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’.


🔰भारतात एक खास ट्रेन सुरू होणार आहे जी संपूर्ण जगात कुठल्याही देशानं अद्याप सुरू केलेली नाही. भारतीय रेल्वेने जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’  बनवली आहे.


🔰भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्येच रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध असणाऱ्या या ट्रेनचं नाव ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’ असं ठेवण्यात आलं आहे.


🔰‘लाइफलाइन एक्स्प्रेस’ सध्या आसामच्या बदरपूर स्टेशनवर आहे. या ट्रेनमध्ये हॉस्पीटलमधील सर्व अत्याधुनिक सेवा, उपकरणं आणि डॉक्टरांची एक टीम तैनात आहे. 


🔰यात दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि पाच ऑपरेटिंग टेबलसह इतर सर्व सुविधा आहेत.तर विशेष म्हणजे, ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’मध्ये  रुग्णांचा मोफत उपचार केला जाणार आहे.


🔰कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने याआधीच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पावलं उचललं आहेत. यात रेल्वे स्थानकांवर ऑटोमॅटीक तिकीट तपासणी यंत्र यासह अनेक सुविधांचा समावेश आहे.

चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे

 प्रश्न१) कोणत्या प्रदेशात पोंग धरण-तलाव आहे?

(A) अरुणाचल प्रदेश

(B) ल्हासा

(C) हिमाचल प्रदेश√√

(D) काठमांडू


प्रश्न२) कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय रोखे आयोग संघटना (IOSCO) आहे?

(A) दिल्ली

(B) माद्रिद√√

(C) पॅरिस

(D) बेसेल


प्रश्न३) कोणत्या सेवेसाठी “मिस कॉल सुविधा” सुरू करण्यात आली आहे?

(A) कार विषयक नोंदणी

(B) भूमी विषयक नोंदणी

(C) एलपीजी टाकी भरण्याविषयक नोंदणी√√

(D) यापैकी नाही


प्रश्न४) कोणत्या देशाने ‘राष्ट्रगीत’मधल्या शब्दामध्ये बदल केला?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) चीन

(D) ऑस्ट्रेलिया√√


प्रश्न५) कोणत्या दिवशी संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याचा स्थापना दिन साजरा केला जातो?

(A) 30 डिसेंबर

(B) 31 डिसेंबर

(C) 01 जानेवारी√√

(D) 02 जानेवारी


प्रश्न६) कोणत्या व्यक्तीने भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL) याचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला?

(A) शशांक प्रिया

(B) पुनीत कंसल

(C) हरिनंद राय

(D) सोमा मोंडल√√


प्रश्न७) कोणत्या अनुसूचित भारतीय उद्योग महासंघाने (CII) ‘पर्यटन’ क्षेत्राचा समावेश करण्याची मागणी केली आहे?

(A) पाचवी

(B) सहावी

(C) चौथी

(D) सातवी√√


प्रश्न८) कोणत्या राज्यात भारतातले पहिले परागणकर्ता उद्यान आहे?

(A) जम्मू व काश्मीर

(B) उत्तराखंड√√

(C) हिमाचल प्रदेश

(D) पंजाब


प्रश्न९) कोणत्या व्यक्तीला मध्यप्रदेश सरकारच्यावतीने ‘तानसेन सन्मान 2020’ देण्यात आला?

(A) शिव कुमार शर्मा

(B) हरिप्रसाद चौरसिया

(C) झाकीर हुसेन

(D) पं. सतीश व्यास√√


प्रश्न१०) कोणती व्यक्ती ‘त्रावणकोर रेडिओ’ची प्रथम इंग्रजी बातमीदार होती?

(A) शुभा जोशी

(B) इंदिरा जोसेफ वेन्नीयूर√√

(C) उत्तरा केळकर

(D) यापैकी नाही


प्रश्न१) ‘आशा-भारत’ योजनेचे पूर्ण नाव काय आहे?

(A) अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग अरेंजमेंट

(B) अॅम्प्लिफाइड सस्टेनेबल हाऊसिंग अरेंजमेंट

(C) अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग अॅक्सेलेरेटर√√

(D) यापैकी नाही


प्रश्न२) कोणत्या राज्यात ‘दिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यान’ आहे?

(A) मणीपूर

(B) मिझोरम

(C) आसाम√√

(D) त्रिपुरा


प्रश्न३) कोणत्या राज्यात पारादीप बंदर आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) अंदमान

(C) ओडिशा√√

(D) तामिळनाडू


प्रश्न४) कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?

(A) राजस्थान

(B) कर्नाटक

(C) गुजरात√√

(D) आंध्रप्रदेश


प्रश्न५) कोणत्या ठिकाणी भारतातले सर्वोच्च उंचीवर हवामानशास्त्र केंद्र आहे?

(A) इटानगर

(B) लेह√√

(C) नवी दिल्ली

(D) कोलकाता


प्रश्न६) ‘इन पर्स्यूट ऑफ जस्टीस: अॅन ऑटोबायोग्राफी’ हे पुस्तक कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे?

(A) न्यायमूर्ती राजिंदर सचार√√

(B) न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे

(C) न्यायमूर्ती उदय यू. ललित

(D) न्यायमूर्ती अशोक भूषण


प्रश्न७) विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीचे नाव काय आहे?

(A) आकाश-एनजी

(B) करंज-जी

(C) कलवरी-जी

(D) सहायक-एनजी√√


प्रश्न८) कोणती व्यक्ती येस बँकेचे नवे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) आहे?

(A) महेश कृष्णमूर्ती

(B) निरंजन बनोडकर√√

(C) अतुल भेडा

(D) सुनील मेहता


प्रश्न९) कोणत्या व्यक्तीची "ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन" या संस्थेच्या GAVI मंडळामध्ये एक सदस्य निवड झाली?

(A) अमित शाह

(B) राजनाथ सिंग

(C) डॉ. हर्ष वर्धन√√

(D) यापैकी नाही


प्रश्न१०) कोणत्या मंत्रालयाने “डिजिटल ओशन” अॅप तयार केले?

(A) पृथ्वी विज्ञान मंत्रालय√√

(B) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

(C) रसायन व खते मंत्रालय

(D) यापैकी नाही


प्रश्न२१) कोणती व्यक्ती महापौर पदाची जबाबदारी स्वीकारणारी देशातली सर्वात तरुण व्यक्ती ठरली?

(A) आदित्य के.

(B) कांती पईकरा

(C) आर्या राजेंद्रन√√

(D) भार्नेश्वरी निर्मलकर


प्रश्न२२) कोणत्या तारखेला पहिला ‘आंतरराष्ट्रीय महामारी सज्जता दिन’ साजरा करण्यात आला?

(A) ३०डिसेंबर २०२०

(B) २९ डिसेंबर २०२०

(C) २८ डिसेंबर २०२०

(D) २७ डिसेंबर २०२०√√


प्रश्न२३) ‘पेडलंदरिकी इल्लू’ योजना कश्यासंबंधी आहे?

(A) सर्व गरीबांसाठी घरे(आंध्रप्रदेश)√√

(B) पहिल्या दोन बाळांच्या जन्मासाठी स्त्रियांना ४००० रुपयांचे रोख अनुदान

(C) योगदान-आधारित निवृत्तीवेतन प्रणाली

(D) वार्षिक १२ रुपयांच्या प्रीमियमसह अपघाती विमा


प्रश्न२४) कोणत्या प्रदेशात ‘भसन चर’ बेट आहे?

(A) बांगलादेश√√

(B) अंदमान

(C) निकोबार

(D) श्रीलंका


प्रश्न२५) अलीकडेच निधन झालेले सुनील कोठारी कोणत्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होते?

(A) शास्त्रीय गायक

(B) वैज्ञानिक

(C) नृत्य-इतिहासकार√√

(D) पत्रकार


प्रश्न२६) कोणत्या संस्थेनी “न्युमोसील” या ब्रांड खाली स्वदेशी लस विकसित केली?

(A) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया√√

(B) इंडियन असोसिएशन फॉर मेडिकल इन्फॉर्मेटिक्स

(C) AIIMS नवी दिल्ली

(D) भारतीय आरोग्य व्यवस्थापन संशोधन संस्था


प्रश्न२७) कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात भारताच्‍या पहिल्‍या चालकविरहित रेलगाडीचे उद्घाटन झाले?

(A) दिल्ली√√

(B) बंगळुरू

(C) कोलकाता

(D) चेन्नई


प्रश्न२८) कोणती व्यक्ती 'सुत्रनिवेदनाची सूत्रा – एक अणभव' हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?

(A) ए. कृष्ण राव

(B) डॉ. रूपा च्यारी√√

(C) श्रीपाद नाईक

(D) यापैकी नाही


प्रश्न२९) कोणत्या शहरात थोबल बहुउद्देशीय प्रकल्प आहे?

(A) कोहिमा

(B) दिसपूर

(C) इम्फाळ√√

(D) आगरतळा


प्रश्न३०) कोणती कंपनी घन-इंधनावर चालणाऱ्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेणारी पहिली भारतीय कंपनी ठरली?

(A) कोलिन्स एरोस्पेस

(B) एनआरसी एरोस्पेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

(C) स्कायरूट एरोस्पेस√√

(D) स्कंद एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड

०४ जानेवारी २०२१

स्वाऱ्या चंद्रावरच्या


◾️गल्या ६० वर्षांत आतापर्यंत १०९ चांद्रमोहिमा आखल्या गेल्या आहेत. त्यापैकी ६१ यशस्वी, तर ४८ मोहिमा अयशस्वी झाल्या आहेत. 


◾️यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अंतराळात माणसानं प्रवेश करण्यापूर्वी एका प्राण्यानं प्रवेश करून माणसांचा मार्ग मोकळा केला होता.


◾️ हा प्राणी कोण होता माहीत आहे, ती होती रशियाच्या रस्त्यांवर फिरणारी एक भटकी कुत्री. तिचं नाव होतं लायका. 


◾️रशियानं ३ नोव्हेंबर १९५७मध्ये आपल्या स्फुटनिक-२ यानातून तिला अंतराळात पाठवलं होतं.


◾️ तयानंतर साधारण १९५०च्या दशकात पहिल्यांदा चंद्रावर स्वारी करायचं, असं माणसानं ठरवलं. 


◾️तया काळात अमेरिका आणि रशिया हीच बलाढ्य आणि पुढारलेली राष्ट्रं होती. साहजिकच त्यांनी चंद्रावर स्वाऱ्या करायला सुरुवात केली.


◾️ तयानंतर आतापर्यंत १०९ मोहिमा झाल्या आहेत.


    💢 अमेरिका : १९६६ ते १९७२ दरम्यान 💢


◾️नासा ही अमेरिकेची अवकाश संस्था. अपोलो मोहिमेत फेब्रुवारी १९६६ ते डिसेंबर १९७२ या काळात तिनं १९ मोहिमा केल्या.


◾️ तयापैकी १६ यशस्वी झाल्या. 


◾️या मोहिमांमधून नील आर्मस्ट्राँग एल्विन ऑल्ड्रिनसह २४ अंतराळवीरही चंद्रावर जाऊन आले.


  💢 रशिया : १९५९ ते १९७६ दरम्यान💢


◾️रशियानं या १७ वर्षांत २४ चांद्रमोहिमा केल्या. 


◾️यातील १५ यशस्वी झाल्या. 


◾️लना-१ ही पहिली मोहीम अयशस्वी झाल्यानंतर १३ सप्टेंबर १९५९ रोजी रशियाने लुना-२ मोहीम आखली. ती यशस्वी झाली. या मोहिमेत रशियानं चंद्रावरून नमुने आणले. 


◾️तर नंतरच्या लुना-१७ आणि लुना-२१ मोहिमेत चंद्रावर रोव्हर उतरवण्यात रशियानं यश मिळवलं.


      💢 जपान : १९९० पासून 💢


◾️जपाननं २४ जानेवारी १९९० रोजी 'हितेन' ही पहिली चंद्रस्वारी केली. 


◾️चद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर काही काळात ऑर्बिटरचा जमिनीपासूनचा संपर्क तुटला. 


◾️जपाननं आपली दुसरी मोहीम सेलेन १४ सप्टेंबर २००७ रोजी आखली.


◾️ या अवकाश यानाचे ऑर्बिटर, रिले उपग्रह आणि व्हीएलबीआय उपग्रह असे तीन भाग होते.


        💢 चीन : २००७ पासून 💢


◾️चीननं त्यांच्या चंद्र देवीच्या नावानं म्हणजेच, चँग नावानं चार टप्प्यांमध्ये रोबोटिक चांद्रमोहिमा आखल्या. त्या सर्व यशस्वी ठरल्या आहेत. 


◾️चग-१ आणि चँग-२ या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ऑर्बिटर पाठवण्यात आले आणि चँग-३ आणि चँग-४ मध्ये लँडर होते. 


◾️यात युतू १ आणि युतू २ नावाचे रोव्हरही होते.


💢भारत : २२ ऑक्टोबर २००८ पासून💢


◾️खरंतर २००८च्या आधीपासून भारताचा अंतराळ कार्यक्रम सुरू होता. 


◾️भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा १९८४मध्ये अंतराळात जाऊन आले होते. पण चंद्रावर स्वारी २२ ऑक्टोबर २००८ रोजी झाली. 


◾️शरीहरीकोटा येथील पीएसएलव्ही सी-११ भारताचे चांद्रयान घेऊन उडाले. 


◾️चद्राच्या रासायनिक, खनिज आणि प्रकाश-भौमिकी मानचित्रणासाठी चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवरून चांद्रयान-१ परिभ्रमण करीत होते.


◾️ याच्या अवकाशयानात भारतासह संयुक्त राष्ट्रे, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन आणि बल्गेरियाची ११ उपकरणे होती.

भारतातील उच्चपदस्थ


💢लोकसभा अध्यक्ष:- ओम बिर्ला


💢लोकसभेचे हंगामी अध्यक्ष:- वीरेंद्र कुमार


💢सरन्यायाधीश:- रंजन गोगोई (४६ वे)


💢राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार:- श्री अजित दोवाल 


💢पतप्रधानांचे प्रधान सचिव:- श्री नृपेंद्र मिश्रा


💢पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव:-डॉ.पी.के.मिश्र


💢महान्यायवादी :- के. के. वेणुगोपाल


💢महालेखापाल:- राजीव महर्षी


💢मुख्य निवडणूक आयुक्त :-सुनील अरोरा ( २३ वे)


💢निवडणूक आयुक्त :- अशोक लवासा, सुशिल चंद्रा


💢पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार:- कृष्णमुर्ती सुब्रमण्यम


💢केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष :- अरविंद सक्सेना


💢केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष :-शरद कुमार (हंगामी)


💢मुख्य माहिती आयुक्त :- सुधीर भार्गव


💢रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष:- शक्तीकांत दास( २५ वे)


💢नीती आयोगाचे उपाध्यक्ष:- डॉ. राजीव महर्षी


💢सेबी अध्यक्ष :- अजय त्यागी


💢भारतीय विमा नियामक

 अध्यक्ष:-सुभाषचंद्र खुंटीया


💢१५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष:- एन. के सिंग


💢केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष :_ नरेंद्र कुमार


💢राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष:- न्या. बी. एन. कीरपाल


💢सातव्या आयोगाचे अध्यक्ष:- अशोक के. माथुर


💢आयबी अध्यक्ष:- राजीव जैन


💢राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष:- भगवान लाल सहाय


💢राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष:- रामशंकर कथरिया


💢राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष:- नंद कुमार साई


💢राष्ट्रीय महिला आयोग:- रेखा शर्मा


💢राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष:- सईद हायरुल हसन रिझवी


💢राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष:- न्या. एच. एल. दत्तू


💢राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष:- वालजीभाई वाला


💢राष्ट्रीय बालअधिकार व सरक्षण आयोग:- प्रियांक कानुंगो


💢कायदा आयोगाचे अध्यक्ष ( २१ व्या ) :- न्या. बलवीर सिंह चौहान


💢राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष:- रेखा शर्मा


💢बँक बोर्ड ब्युरोचे अध्यक्ष:- भानू प्रताप शर्मा


💢सीबीआय अध्यक्ष:- ऋषीकुमार शुक्ला


💢भूदल प्रमुख:- बिपीन रावत


💢नौदल प्रमुख: करमवीर सिंह


💢हवाईदल प्रमुख:- बी. एम. धनोआ


💢इस्रो अध्यक्ष:- के. सिवन


💢डीआरडीओ प्रमुख: जी. सतीश रेड्डी


💢भारतीय अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष:- के. एन. व्यास


💢टेलीकाॅम रेग्युलेटरी अॅथरिटीचे (ट्राय) अध्यक्ष:- राम सेवक शर्मा


💢कृष्णा जलवादाचे प्रमुख:- न्या. ब्रिजेश कुमार


💢भारताचे पहिले लोकपाल:- पिनाकी घोष


💢युजीसी चे अध्यक्ष:- डि. पी सिंग


💢भारतीय लोकसभेचे महासचिव:- स्नेहलता श्रीवास्तव


💢भारतीय राज्यसभेचे महासचिव :- देशदीपक वर्मा


💢NCC (राष्ट्रीय विद्यार्थी सेना) महासंचालक:- लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा


💢भाभा अणू संशोधन केंद्राचे नवे संचालक:- डॉ. ए. के. मोहंती


💢BCCI चे पहिले लोकपाल:- न्या. डी. के. जैन


💢केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष:- प्रमोचंद्र मोदी


💢रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष:- व्ही. के यादव


💢परराष्ट्र सचिव :- विजय गोखले.


या धाडसी निर्णयामुळे जेटली राहतील कायम स्मरणात


🌀 देशाचे माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचे ६६ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. भारतीय राजकारणामध्ये जेटली यांना अभ्यासू नेता म्हणून ओळखले जात होते. 


🌀पशाने वकील असणाऱ्या जेटली यांनी मंत्रीपदावर असताना अनेक महत्वाचे आणि कठोर निर्णय घेतले. या निर्णयामुळे ते नेहमीच स्मरणात राहतील.जाणून घेऊयात जेटलींच्या महत्वाच्या आणि धाडसी निर्णयाबद्दल….


             🎇 नोटबंदी 🎇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌀आठ नोव्हेंबर २०१६ रोजी देशाच्या अर्थव्यवस्थेत एका रात्रीतून मोठा बदल घडला तो म्हणजे नोटबंदीने. 


🌀पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि ५००  रुपयाच्या जुन्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली. त्यावेळी अरुण जेटली अर्थमंत्री म्हणून काम करत होते. या निर्णयामध्ये जेटलींची भूमिका महत्वाची होती.


             🎇जीएसटी 🎇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌀अरूण जेटली यांनी भारतीय अर्थव्यस्थेला बळकटी देण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीचा निर्णय देखील त्यांच्याच काळात घेण्यात आला. 


🌀या निर्णयामुळे देशातील अर्थव्यवस्थेत मोठे बदल झालेले पहायला मिळाले. अनेक राज्यांनी जीएसटीला विरोध दर्शवला होता. 


🌀पण जेटली यांनी सर्व राज्यांची मनभरणी करत हा निर्णय घेतला. जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू केल्यानंतर अनेक अडचणी आल्या. विरोधकांसह व्यापारी वर्गाने याचा तीव्र विरोध केला. मात्र, अर्थमंत्री असताना जेटली यांनी संयम आणि धैर्याने या सर्वांचा सामना केला.


🎇एन्सॉल्वेंसी अॅण्ड बैंकरप्सी कोड (IBC) 🎇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌀जीएसटी व्यतिरिक्त एन्सॉल्वेंसी अॅण्ड बैंकरप्सी कोड (IBC)चा महत्वपूर्ण निर्णय जेटली यांनी घेतला. बँकींग व्यवस्थेत त्यांनी अनेक बदल केले. 


🌀तयामुळे बँकेतून कर्ज घेऊन फरार होणाऱ्यांना चाप बसला. २८ मे २०१६ रोजी या निर्णयाची अंमलबजावणी झाली होती. तर २०१९ च्या फेब्रुवारी पर्यंत १.४२ लाख कोटी इतकी मोठी रक्कम सरकारने फ्रॉड कंपन्यांकडून वसूल केली होती.


🎇मुद्राधोरण समितीची स्थापना 🎇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌀२०१६ मध्ये जेटली यांनी मुद्राधोरण आखण्याकरिता समितीची स्थापना केली होती. यामध्ये सहा सदस्यांचा समावेश करण्यात आला. 


🌀यात तीन आरबीआय आणि तीन सरकारचे सदस्य आहेत. पूर्वीप्रमाणे सारे अधिकार केवळ रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरसाहेबांच्या हातात न ठेवता सहा शहाण्या मंडळींच्या हातात देशाच्या मुद्राधोरणाचं सुकाणू सोपवण्यात आलं. वर्षभरात चार बैठका या समितीच्या होतात.


          🎇बँकांचे विलीनीकरण🎇 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌀बँकिंग व्यवसायाच्या व्यवहारांची वैशिष्ट्ये व त्यांचे राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणारे दूरगामी परिणाम विचारात घेऊन जनतेच्या हिताचे संरक्षण व्हावे म्हणून बँकांचे नियमन किंवा त्यांवर राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने बँकाचे एकीकरण करण्यात आले.


🌀 हा निर्णय अर्थमंत्री अरूण जेटलींच्या नेतृत्वात घेण्यात आला होता. देना आणि विजया बँकेचे ‘बँक ऑफ बडोदा’ मध्ये विलीनीकरण करण्यात आले.


              🎇अर्थसंकल्प 🎇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌀देशाचे अर्थमंत्री असताना जेटली यांनी देशाचा अर्थसंकल्प आणि रेल्वेचा अर्थसंकल्प असे वेगळे असणारे दोन संकल्पाची संकल्पना रद्द करत देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वेचा समावेश केला. 


🌀तसेच देशाचा अर्थसंकल्प दरवर्षी एक फेब्रुवारीलाच सादर करण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण आणि धाडसी निर्णय त्यांनी घेतला


🎇एफडीआय नियमात सुधारणा 🎇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌀विदेशी कंपन्यांना देशात अधिकाधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळावे, तसेच उद्योग करण्यास वाव मिळावा, यासाठी गुंतवणुकीचे नियम आणखी सोपे करण्यात आले. हा निर्णय जेटलींच्या नेतृत्वात घेण्यात आला होता. 


🌀या निर्णयामुळे आशिया खंडातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतात जागतिक भांडवलाचा ओघ वाढण्यास सुरुवात झाली. 


🌀अमेरिका, युरोपीय राष्ट्रांतून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीचा ओघ वाढला.


           🎇जनधन योजना 🎇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌀मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी जनधन योजनेच्या यशामागे अरूण जेटलींचा हात आहे. जनधन योजनेमुळे आज देशातील तब्बल 36.06 कोटी भारतीयांचे बँकेत खाती आहेत. 


🌀सर्वसामान्य नागरिकांच्या या बँक खाते उघडण्याचा निर्णयदेखील अरूण जेटली यांच्याच काळात घेण्यात आला.

माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचा अल्प परिचय


१) अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी झाला.


२) त्यांचे वडील महाराज किशन जेटली हे प्रसिद्ध वकील होते. त्यांच्या आईचे नाव रतन प्रभा जेटली होते.


३) अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते.


४) २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते.


५) ३ जून २००९ रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधीपक्षनेतेपदी नियुक्ती झाली होती.


६) १९६०-६९ दरम्यान सेंट झेवियर्स स्कूल, नवी दिल्ली येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले.


७) १९७३ मध्ये श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स, कॉमर्स विषयाची पदवी संपादन केली.


८) १९७७ मध्ये दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायदा पदवी पास केली.


९) सत्तरच्या दशकात ते दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) विद्यार्थी कार्यकर्ते होते.


१०) १९७४ मध्ये विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले.


११) १९८२ साली त्यांनी संगीता जेटली यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत. मुलाचं नाव रोहन तर मुलीचं नाव सोनाली आहे.


१२) १९८९ मध्ये त्यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाली.


१३) जानेवारी १९९० मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नियुक्त केले.


१४) जेटली १९९१ पासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.


१५) १९९९ च्या लोकसभा निवडणुकींच्या काळात ते भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते होते.


१६) १३ ऑक्टोबर १९९९ रोजी अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये जेटली यांनी ‘माहिती आणि प्रसारण’ राज्य मंत्रीपदी नियुक्ती झाली.


१७) मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये अरुण जेटली हे केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.


१८) मागील अनेक दिवसांपासून अरूण जेटलींची तब्येत खराब असल्याने, त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कॅबिनेट मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपला निर्णय कळवला होता.


१९) ट्विटरवर देखील त्यांनी माहिती दिली होती की, मागील १८ महिन्यांपासून मी आजारी आहे. माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्रीपदासाठी विचार केला जाऊ नये.


२०) २४ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांचं निधन झालं.

भारत हा सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन करणारा सर्वात मोठा देश



● कोळसा जाळून सल्फर डायऑक्साइडचे (SO2) उत्सर्जन करणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा देश असल्याचा दावा 'ग्रीनपीस' या स्वयंसेवी संस्थेने 'नासा'च्या पाहणीचा हवाला देऊन केला आहे.

● 'नासा'ने ही पाहणी केली असून, त्यासाठी ओझोन मॉनिटरिंग इन्स्ट्रुमेंट (ओएमआय)चा वापर करण्यात आला.

● त्यात 'SO2'चे सर्वाधिक उत्सर्जन करणारी जगातील प्रमुख ठिकाणांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी भारत हा सर्वाधिक 15 टक्के 'SO2'चे उत्सर्जन करत असल्याचे म्हटले असल्याचे 'ग्रीनपीस'ने म्हटले आहे.


अहवालाची ठळक वैशिष्ट्ये

● भारताच्या संदर्भातः भारत जगातील सल्फर डाय ऑक्साईडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे.

● नासाच्या ओएमआय उपग्रहाच्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साइड हॉटस्पॉट आहेत, ज्याचे मुख्य कारण कोळसा वापर आहे.

● भारतात मध्य प्रदेशातील सिंगरौली, तमिळनाडूतील नेवेली आणि चेन्नई, ओडिशातील तल्चेर आणि झारसुगुडा, छत्तीसगडमधील कोरबा, गुजरातेतील कच्छ, तेलंगणातील रामागुंडम आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि कोराडी येथे सर्वाधिक उत्सर्जन होत असल्याचे या पाहणीत आढळले. 

● हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील बहुतेक प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव असल्याचेही या पाहणीच्या विश्लेषणात आढळले. 

● जगातील सर्वाधिक 'SO2'चे उत्सर्जन रशियातील नोरिल्सक स्मेल्टर कॉम्प्लेक्स येथे होते. त्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील क्रील आणि इराणमधील झाग्रोझ या ठिकाणांचा समावेश आहे. मात्र 'एसओ२'चे उत्सर्जन करणारी अधिक ठिकाणे भारतात असल्याने भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.


● भारतातील बहुतेक कोळशावर चालणार्यात उर्जा प्रकल्पांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी डीसल्फराईजेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. 

● शासनाने उचललेली पावले: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने डिसेंबर 2015 मध्ये कोळशाच्या उर्जा प्रकल्पांमधून सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यासाठी मर्यादा निश्चित केली. परंतु डेसल्फ्युरायझेशन तंत्राची अंतिम मुदत 2017 ते 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

● रशिया, दक्षिण आफ्रिका, इराण, सौदी अरेबिया, भारत, मेक्सिको, संयुक्त अरब अमिराती, तुर्की आणि सर्बिया या जगात सल्फर डायऑक्साइड उत्सर्जनाचे प्रमुख आकर्षण केंद्र सापडले आहेत. 

● चीन आणि अमेरिकेने स्वच्छ उर्जा स्त्रोतांचा वापर करून सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यात यश मिळविले आहे.

● विश्लेषणानुसार, वायू प्रदूषण ही सार्वजनिक आरोग्यासाठी मोठी चिंता आहे, जगातील 91 टक्के लोकसंख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) बाह्य प्रदूषणाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या मर्यादा ओलांडणार्याए भागात राहते आणि परिणामी,प्रत्येक वर्षी 4.2 दशलक्ष लोक अकाली मृत्यूमुखी पडतात..

आधुनिक भारताचे जनक विषयी माहिती


📒 आधुनिक भारताचे जनक 

    - राजा राममोहन रॉय


📕 आधुनिक भारताचे शिल्पकार 

   - पंडित जवाहरलाल नेहरू.


📗 भारतीय अर्थशास्त्राचे जनक 

   - दादाभाई नौरोजी.


📒 भारतीय राष्ट्रवादाचे जनक

   - सुरेंद्रनाथ चटर्जी


📕 भारतीय असंतोषाचे जनक

   - लोकमान्य टिळक


📗 भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार 

   – सरदार वल्लभभाई पटेल.


📒 मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक

   - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.


📕 भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक

   - दादासाहेब फाळके.


📗 भारताच्या अनुविज्ञानाचे जनक

   - डॉ.होमी भाभा.


📒 आधुनिक मराठी कादंबरीचे जनक 

   - ह.ना.आपटे.


 📕 आधुनिक मराठी कवितेचे जनक 

   - केशवसुत.


📗 सथानिक स्वराज्य संस्थेचे जनक

   - लॉर्ड रिपन.


📒 भारताच्या हरितक्रांतीचे जनक 

   - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.


📕 भारताच्या धवलक्रांतीचे जनक

   - डॉ.व्हार्गीस कुरियन.


📗 भारतीय भूदान चळवळीचे जनक

   - आचार्य विनोबा भावे.


📒 भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार

   - विक्रम साराभाई.


📕 भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक

   - सॅम पित्रोदा.

भारताच्या इतिहासातील काही अभिमानास्पद गोष्टी.


🌸 भारतात पहिल्यांदा 1951मध्ये निवडणूक घेतली गेली. यामध्ये 45.7 टक्के मतदान झालं होतं.


🌸1966मध्ये रेटीया फरिया पॉवेलने ही मिस वर्ल्ड किताब मिळवणारी पहिली आशियाई महिला ठरली.


🌸1974मध्ये भारताने पोखरण चाचणी करुन आण्विक शस्त्रांनी सज्ज असलेल्या देशांच्या यादीत जागा मिळवली.


🌸आर्यभट्ट हा पहिला सॅटेलाइट भारताने १९७५ मध्ये अवकाशात सोडला.


🌸1983 मध्ये टीम इंडियाने पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.


🌸राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत. त्यांनी हे 1984 मध्ये केले होते.


🌸1999मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला धुळ चारत टायगर हिल पुन्हा ताब्यात घेतले.


🌸 2005 भारताने माहिती अधिकार अमलात आणला. हा अधिकार जगातील मोजक्याच देशांमध्ये आहे.


🌸 पहिल्यांदाच प्रतिभाताई पाटील यांच्या रुपाने एक महिला देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या होत्या.


🌸 टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरत, क्रिकेटमध्ये आपला दबदबा पुन्हा सिद्ध केला.


🌸 अभिनव बिंद्रा याने 2008 बिजिंग ऑलंम्पिकमध्ये १०एम एअर रायफल स्पर्धेत वैयक्तीत सुवर्ण पदक जिंकले. हे भारताचे पहिले सुवर्ण पदक आहे.


🌸 संगीतकार ए.आर.रहमान याला 2009 मध्ये 'स्लमडॉग मिलेनिअर' सिनेमासाठी मानाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.


🌸2011 मध्ये टीम इंडियाने क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफीवर पुन्हा एकदा नाव कोरले.


🌸अग्नि-5 क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय सेनादलाकरिता 2012 मध्ये विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे.


🌸मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून 2013 रोजी प्रक्षेपित केले गेले.


🌸कैलाश सत्यार्थी यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.


🌸देशातील व्यवस्थेला हादरा देण्यासाठी व भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ तरूणाई अण्णा हजारेंच्या समर्थनार्थ 2011 ला उपोषणात सहभागी झाली.


🌸2008 मध्ये भारताने चांद्रयान-1 ही मोहीम आखली होती. या यानाने 10 महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली. चंद्रावर पाणी असल्याचा शोध याच मोहिमेमध्ये लागला होता. यानंतर 2019मध्ये इस्रोचे चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं...


🌸 तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले आहे...


🌸 जम्मू काश्मीरातून कलम 370 हटविण्यात आलं. तसेच जम्मू काश्मीर आणि लडाख यांची केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा करण्यात आली

विक्रम अंबालाल साराभाई


🚀 विक्रम अंबालाल साराभाई (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते.


🚀 त भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह .


🚀 विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात ऑगस्ट १२ १९१९ ला झाला.

 

🚀 १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. 


🚀पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले त्यांनी बंगलोरमधील

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये 

नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. 


🚀१९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, 

कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. 


🚀 १९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. 


🚀 भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७लाअहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. 


🚀हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. 


🚀 विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 


🚀 १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती.


🚀 आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.


🚀 विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट(IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातुनच उभी राहिली. 


🚀 भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. 


🚀 अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन(ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली.


🚀 पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखिल त्यांनी उभारली.


🚀 डॉ. विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आले. 


🚀 ३० डिसेंबर १९७१ साली

 केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने विक्रम साराभाई यांचे निधन झाले.

पहिली अंडरवॉटर ट्रेन


🚇 कोलकात्यात हुगळी नदीखालून धावणार देशातली पहिली अंडरवॉटर ट्रेन

 

🚇 भारतात पहिली अंडरवॉटर ट्रेन म्हणजेच पाण्याखालून जाणारी रेलगाडी लवकरच धावणार आहे. 


🚇 पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार आहे. 


🚇 रेल्वे लाईन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे.


🚇 देशातली पहिली पाण्याखालून धावणारी ट्रेन सॉल्टलेक सेक्‍टर 5 ते हावडा मैदानापर्यंत धावण्यासाठी जवळपास तयार झाली आहे. 


🚇 तसेच हा रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यातला पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाणार. 


🚇 या ट्रेनला पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आले आहे.


🚇 तसेच नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब आणि 30 मीटर खोल आहे.


🚇 नदीखालून ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे.


🚇 या प्रकल्पासाठी हावडा ते कोलकाता दरम्यानच्या मेट्रो मार्गाला जोडणाऱ्या हुगळी नदीखाली दुहेरी बोगद्याचे बांधकाम केले गेले. 


🚇 देशातला हा पहिलाच नदीखालचा बोगदा ठरला. 


🚇 कोलकातामधील रेल्वेच्या 16.6 किमी लांबीच्या पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत 520 मीटर लांबीचा हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

कारगिल युद्ध

🔥 कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने 🇮🇳ऑप्रेशन विजयचीसुरुवात केली.


  🎇 १९९९च्या  युद्धाचा घटनाक्रम 🎇


🔥 मे ४: कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली. 


🔥 मे ५ ते मे १५: या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते.


🔥 मे २६: भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.


🔥 मे २७: भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले. 


🔥मे ३१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती दिली.


🔥 जून १०: पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती. 


🔥 जून १२: दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चर्चेनंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच घुसखोरांनी परत जायला हवे असे सांगितले.


🔥 जून १५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली 


🔥 जून २९: भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या.


🔥 जुलै ४: संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली 


🔥 जुलै ५: शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली


🔥जुलै १४: भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला


🔥 जुलै २६: कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली.


    🇮🇳😔 मृतांची आकडेवारी 😔🇮🇳


🔥 या युद्धामध्ये ५२७ भारतीयांना प्राण गमवावे लागले तर पाकिस्तानमधील मृतांचा आकडा ४५० इतका होते

आंतरराष्ट्रीय विमानतळे.


🛫 छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) 


🛫 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (नवी दिल्ली)


🛫 नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोलकाता) 


🛫 के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (चेन्नई)


🛫 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपूर) 


🛫 राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद)


🛫 गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुवाहाटी) 


🛫 दबोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (गोवा)


🛫 सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद) 


🛫 श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ (श्रीनगर)


🛫 बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (बंगळूर)


🛫 मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मंगळूर)


🛫 कलिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ (कलिकत)


🛫 कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोची)


🛫 त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ (तिरूअनंतपुरम) 


🛫 देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंदौर)


🛫 श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अमृतसर)


🛫 जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (जयपूर)


🛫 वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (पोर्टब्लेअर) 


🛫 कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोइंबतूर)


🛫 तिरूचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ (तिरूचिरापल्ली) 


🛫 चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ (लखनौ)


🛫 लालबहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ (वाराणसी) 

भारत सरकार की योजनाएं(हिंदी)


🎇  नीति आयोग - 1 जनवरी 2015


🎇  ह्रदय योजना -21 जनवरी 2015


🎇 बेटी बचाओ बेटी पढ़ाओं -22 जनवरी 2015


🎇 सुकन्या समृद्धि योजना -22 जनवरी 2015


🎇 मुद्रा बैंक योजना -8 अप्रैल 2015


🎇 प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना -9 मई 2015


🎇 अटल पेंशन योजना -9 मई 2015


🎇 प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना -9 मई 2015


🎇 उस्ताद योजना (USTAD) -14 मई 2015


🎇 प्रधानमंत्री आवास योजना -25 जून 2015


🎇 अमरुत योजना(AMRUT) -25 जून 2015


🎇 स्मार्ट सिटी योजना -25 जून 2015


🎇 डिजिटल इंडिया मिशन -1 जुलाई 2015


🎇 स्किल इंडिया मिशन -15 जुलाई 2015


🎇 दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना -25 जुलाई 2015


🎇 नई मंजिल -8 अगस्त 2015


🎇 सहज योजना -30 अगस्त 2015


🎇 स्वावलंबन स्वास्थ्य योजना - 21 सितंबर 2015


🎇 मेक इन इंडिया -25 सितंबर


🎇. इमप्रिण्ट इंडिया योजना - 5 नवंबर 2015


🎇. स्वर्ण मौद्रीकरण योजना -5 नवंबर 2015


🎇. उदय योजना (UDAY) -5 नवंबर 2015


🎇 वन रैंक वन पेंशन योजना -7 नवंबर 2015


🎇 ज्ञान योजना -30 नवंबर 2015


🎇 किलकारी योजना -25 दिसंबर 2015


🎇 नगामि गंगे, अभियान का पहला चरण आरंभ -5जनवरी 2016


🎇 स्टार्ट अप इंडिया -16 जनवरी 2016


🎇 प्रधानमंत्री फसल बीमा योजना -18 फरवरी 2016


🎇 सेतु भारतम परियोजना -4 मार्च 2016


🎇 स्टैंड अप इंडिया योजना - 5 अप्रैल 2016


🎇. ग्रामोदय से भारत उदय अभियान -14अप्रैल 2016


🎇 प्रधानमंत्री अज्वला योजना - 1 मई 2016


🎇 प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना - 31 मई 2016


🎇 राष्ट्रीय आपदा प्रबंधन योजना -1 जून 2016


🎇 नगामी गंगे कार्यक्रम -7 जुलाई 2016


🎇 गैस फॉर इंडिया -6 सितंबर 2016


🎇 उड़ान योजना -21 अक्टूबर 2016


🎇 सौर सुजला योजना -1 नवंबर 2016


🎇 प्रधानमंत्री युवा योजना -9 नवंबर 2016


🎇 भीम एप - 30 दिसंबर 2016


🎇 भारतनेट परियोजना फेज - 2 -19 जुलाई 2017


🎇 प्रधानमंत्री वय वंदना योजना -21 जुलाई 2017


🎇आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना -21 अगस्त 2017


🎇 प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना- सौभाग्य -25 सितंबर 2017


🎇 साथी अभियान -24 अक्टूबर 2017


🎇 दीनदयाल स्पर्श योजना- 3 नवंबर 2017

रोगांचे वर्गीकरण


❗️🦠🦠संसर्गजन्य🦠🦠❗️


💉 इन्फ्लुएंजा,

💉 कषय, 

💉 नायटा, 

💉 अमांश,

 💉 घटसर्प,

💉 पोलियो. 


❗️🦠🦠असंसर्गजन्य🦠🦠❗️

   

💉 मधुमेह (डायबिटीस),

💉  कर्करोग. 


❗️🦠🦠विषाणूंपासून होणारे🦠🦠❗️


💉 देवी, 

💉 इन्फ्ल्युएंझा, 

💉 पोलिओ, 

💉 कांजिण्या,

💉  काला आजार, 

💉 जपनीज एन्सेफेलाइटिस 


❗️🦠🦠जिवाणूंपासून होणारे 🦠🦠❗️


💉 कुष्ठरोग, 

💉 कॉलरा (पटकी),

💉  नयूमोनिया, 

💉 कषय (टी. बी.)


❗️🦠🦠दुषित पाण्यापासून 🦠🦠 ❗️


💉 कॉलरा, 

💉 विषमज्वर, 

💉 अतिसार, 

💉 कावीळ,

💉  जत इत्यादी.


❗️🦠🦠हवेतून पसरणारे🦠🦠❗️


💉 सर्दी, 

💉इन्फ्ल्यूएंझा, 

💉घटसर्प, 

💉कषय.


❗️🦠🦠कीटकांमार्फत पसणारे 🦠🦠❗️


💉अतिसार

💉अमांश, 

💉पटकी

💉 मलेरिया,

💉 हत्तीरोग,

 💉 नारू,

💉 पलेग


❗️🦠🦠कवकांपासून होणारे🦠🦠 ❗️


💉गजकर्ण, 

💉चिखल्या. 

नृत्य कला


👑 महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य


👑 तामिळनाडू --- भरतनाट्यम


👑 केरळ --- कथकली


👑 आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम


👑 पंजाब --- भांगडा, गिद्धा


👑 गुजरात --- गरबा, रास


👑 ओरिसा --- ओडिसी


👑 जम्मू आणी काश्मीर --- रौफ


👑 आसाम --- बिहू, जुमर नाच


👑 उत्तरखंड --- गर्वाली


👑 मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला


👑 मेघालय --- लाहो


👑 कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी


👑 मिझोरम --- खान्तुंम


👑 गोवा --- मंडो


👑 मणिपूर --- मणिपुरी


👑 अरुणाचल प्रदेश --- बार्दो छम


👑 झारखंड- कर्मा


👑 छत्तीसगढ --- पंथी


👑 राजस्थान --- घूमर


👑 उत्तर प्रदेश --- कथक


भारतातली जागतिक वारसा स्थळे

🍀 आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत,


 🍀 तयात 30 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 


🍀 7 नैसर्गिक ठिकाणे


 🍀 एक मिश्रित ठिकाण आहे.

 


             🎇 ♻️सांस्कृतिक♻️ 🎇


💐आग्रा किल्ला 🏰, आग्रा( उत्तरप्रदेश)


💐अजिंठा लेणी, महाराष्ट्र


💐 नालंदा विद्यापीठ 🏢 , बिहार


💐 बौद्ध स्मारक , सांची, मध्यप्रदेश (1989)


💐 चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात


💐 छत्रपती शिवाजी टर्मिनस

🚂🚃🚃, मुंबई, महाराष्ट्र


💐 गोव्याचे चर्च 🏥आणि कॉन्व्हेंट


💐 एलिफंटा लेणी/ 🗿 घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र


💐 वल्लोर/ 🗿वरूळ लेणी, महाराष्ट्र


💐 फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश


💐 चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू


💐 हंपीमधील मंदिरे, कर्नाटक


💐 महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू


💐 पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक


💐राजस्थानामधील 🏔पर्वतीय किल्ले


💐 अहमदाबाद 🛣ह ऐतिहासिक शहर


💐 हुमायूनची कबर, दिल्ली


💐 खजुराहो, मध्यप्रदेश


💐महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार


💐 भारतातली पर्वतीय रेल्वे🚂🚃 (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)


💐 कुतुब मिनार🕌, दिल्ली


💐 राणी की वाव🏟, पटना, गुजरात


💐 लाल किल्ला 🏰🗼, दिल्ली


💐 दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश


💐 कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा


💐 ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश


💐 ले कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड


💐 जंतर मंतर, जयपूर


💐 मबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत

       

         🎇♻️ नैसर्गिक ♻️🎇


💐 ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान 🦌🐕 , कुल्लू, हिमाचल प्रदेश


💐 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान🦏🦏, आसाम


💐 मानस राष्ट्रीय उद्यान 🐘 , आसाम


💐 केवलदेव राष्ट्रीय उद्यान 🦢🦌, राजस्थान


💐 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान 🐅🏝, पश्चिम बंगाल


💐 नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान🌻, उत्तराखंड


💐 पश्चिम घाट⛰⛰  (सह्याद्री पर्वतरांगा)



               🎇♻️   मिश्र  ♻️🎇


💐 खांगचेंडझोंगा 🐼 🐆राष्ट्रीय उद्यान, सिक्किम


PINK CITY

☣️ भारतातील PINK CITY जयपूर World Heritage Sites मध्ये निवड करण्यात आली


☣️ UNSCO चे मुख्यालय पॅरिस(फ्रांस ची राजधानी) ला आहे


☣️  युनेस्को वारसा समितीही

 21 सदस्यांची असून त्यांची बैठक दरवर्षी होते.


☣️ आतापर्यंत 167 देशांतील 1092 ठिकाणांची निवड युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये झाली आहे..


☣️ UNSCO ची 43 वी बैठक 6 जुलै ला अझरबैजान देशाची राजधानी 'बाकु' येथे पार पडली


☣️ भारतात आता 38 world heritage sites झाली आहेत.


☣️ सर्वात जास्त WHS चीन मध्ये आहेत.


☣️ राजस्थान चे सध्या चे मुख्यमंत्री अशोक गेलोत आहेत


☣️ याच्यामुळे पर्यटन ला खूप फायदा होतो.


☣️ याआधी जयपूरच्या

  'आमेर किल्ला' 🏯आणि

 'जंतरमंतर' ⛩चा वारसा य केलेला आहे


         🌸PINK CITY🌸


☣️ 1876 इंग्लंड राजा आणि राणी व्हिक्टोरिया या भारत भेटीला आल्या त्या वेळचे राजा राम सिंग यांनी पूर्ण शहर गुलाबी रंगाने रंगवले होते.तेव्हा पासुन गुलाबी शहर नावाने ओळखले जात आहे.


  💐Most World Heritage Sites💐


🇨🇳 China: 55

🇮🇹 taly: 54

🇩🇪 Germany: 47

🇪🇸 Spain: 47

🇫🇷 France: 45

🇮🇳 India: 38

🇲🇽 Mexico: 35

🇬🇧 UK: 31

🇷🇺 Russia: 28

🇮🇷 Iran: 24

🇺🇸 US: 23

🇯🇵 Japan: 23

🇧🇷 Brazil: 22

🇦🇺 Australia: 20

🇨🇦 Canada: 20

🇬🇷 Greece: 18

🇹🇷 Turkey: 18

🇵🇱 Poland: 16

🇸🇪 Sweden: 15

SEBC आरक्षण चा दावा केलेल्या उमदेवार च्या बाबतीत सूचना..

 




⚠️SEBC मधून ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना EWS किंवा खुल्या गटात पुन्हा प्रवर्ग निवडण्याची संधी आयोगाने दिली आहे


🔴 MPSC 2020 परीक्षा मध्ये SEBC विद्यार्थ्याना EWS प्रवर्ग बदलण्याची संधी 👆👆

🔴 5 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान राहणार लिंक खुली  

यनेस्को जागतिक वारसा स्थळे



🔰 २०१९ मध्ये राजस्थानातील जयपूर शहराचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे


🔰 जयपूर हे राजस्थानातील ऐतिहासिक शहर असून त्याची स्थापना सवाई जयसिंग द्वितीय यांनी इ.स १७२७ मध्ये केली


🔰 आता भारतात एकूण ३८ जागतिक वारसा स्थळे आहेत , त्यात ३० सांस्कृतिक स्थळे , ७ नैसर्गिक ठिकाणे आणि १ मिश्रित ठिकाण आहे


🔰 सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे


✅ सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असणारे देश 


🇮🇹 इटली (५५) 

🇨🇳 चीन (५५)

🇪🇸 सपेन (४८)

🇩🇪 जर्मनी (४६)

🇫🇷 फरान्स (४५)

🇮🇳 भारत (३८)

🇲🇽 मक्सिको (३५) 

🇬🇧 यनायटेड किंगडम (३२) 

🇷🇺 रशिया (२९)

🇺🇲 अमेरिका (२४) .

Online Test Series

राष्ट्रीय महिला आयोगाकडे गत वर्षभरात सर्वाधिक तक्रारी



राष्ट्रीय महिला आयोगाकडे गतवर्षी सहा वर्षांतील उच्चांकी म्हणजे २३,७२२ तक्रारींची नोंद झाली आहे. त्यातील एक चतुर्थाश तक्रारी या घरातील हिंसाचाराशी संबंधित होत्या, असे दिसून आले आहे.


✍🏻 _ उत्तर प्रदेशातून ११,८७२, दिल्लीतून २,६३५, हरियाणा १,२६६, महाराष्ट्र १,२८८ या प्रमाणे तक्रारींची संख्या आहे. एकूण २३,७२२ तक्रारींपैकी ७,७०८ तक्रारी या सन्मानाने जगण्याचा अधिकार या मुद्दय़ांवर आहेत. सन्मानाने जगण्याचा अधिकार याचा अर्थ महिलांच्या भावनांचा आदर करून केलेली वर्तणूक असा आहे. अनेक प्रकरणात महिलांच्या भावनांची कदर केलेली दिसत नाही.


एकूण ५२९४ तक्रारी या घरातील हिंसाचाराच्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले, की आर्थिक असुरक्षितता, वाढता ताण, नैराश्य, आर्थिक चिंता, भावनिक आधार नसणे, आईवडील किंवा कुटुंबाने काळजी न घेणे यातून घरगुती हिंसाचाराची प्रकरणे घडतात. शाळा, महाविद्यालये व काही प्रमाणात कार्यालये बंद असल्याने सर्व जण घरातच असल्याने महिलांना अनेक कामे करावी लागत आहेत. तसेच त्या कुटुंबाला आधार देत आहेत. या कठीण परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी महिलांना बरेच कष्ट पडत आहेत. २०२० मध्ये सहा वर्षांतील सर्वाधिक तक्रारी आल्या असून २०१४ मध्ये ३३,९०६ तक्रारी आल्या होत्या. जुलै व त्याआधीच्या काही महिन्यांत घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्या असून त्याबाबत एकूण ६६० तक्रारी आल्या आहेत. या प्रकारचा हिंसाचार हा वर्षभर चिंतेचा विषय होता, असे शर्मा यांनी सांगितले.


टाळेबंदीमुळे कोंडी


घरातील हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना आधार देणारी घरातील यंत्रणा निरुपयोगी ठरली. त्यांना बाहेरूनही मदत घेता आली नाही. कोविड १९ टाळेबंदीमुळे घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी करण्याची संधी त्यांना फार कमी मिळाली, असेही त्या म्हणाल्या. हुंडय़ासाठी छळवणुकीच्या ३,७८४ आणि विनयभंगाच्या १,६७९ तक्रारी आल्या आहेत. १,२७६ तक्रारी या पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या असून ७०४ तक्रारी या सायबर गुन्ह्य़ांबाबत आहेत. बलात्काराच्या १,२३४ तर लैंगिक छळवणुकीच्या ३७६ तक्रारी आहेत.


वाढती जागरूकता


अलीकडे बलात्काराच्या घटनांबाबत महिला बोलू लागल्या आहेत. त्यामुळे तक्रारींची संख्या वाढली आहे, असे मत महिला हक्क कार्यकर्त्यां योगिता भयाना यांनी व्यक्त केले. समाज माध्यमांमुळेही घरगुती हिंसाचाराच्या घटना समोर येण्यास मदत होत आहे. घरगुती हिंसाचाराविरोधात सरकारने खंबीर भूमिका घ्यावी, असे महिला कार्यकर्त्यां शमिना शफीक यांनी म्हटले आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...