१० डिसेंबर २०२०

Companies & Their Founder


1. Walmart के संस्थापक कौन है ?

Answer - सैम वॉल्टन (Sam Walton) 1962


2. Paytm के संस्थापक कौन है ?

Answer - विजय शेखर शर्मा (2010)


3. Google के संस्थापक कौन है ?

Answer - लैरी पेज, सर्फ ब्रिन (1998)


4. Microsoft के संस्थापक कौन है ?

Answer - बिल गेट्स, पॉल एलन (1975)


5. WhatsApp के संस्थापक कौन है ?

Answer - ब्रायन ऐक्टन ,जैन कौम (2009)


6. Amazon के संस्थापक कौन है ?

Answer - जैफ बेजोस (Jef bez0s) 1994


7. Flipkart के संस्थापक कौन है ?

Answer - सचिन बंसल और बिन्नी बंसल (2007)


8. Yahoo के संस्थापक कौन है ?

Answer - David filo, Jerry yang (1994)


9. Apple के संस्थापक कौन है ?

Answer - स्टीव जॉब्स (1976)


10. Wikipedia के संस्थापक कौन है ?

Answer - जिमी वेल्स (2001)


11. Motorola के संस्थापक कौन है ?

Answer - Paul & Joseph Gablin (1928)


12. Facebook के संस्थापक कौन है ?

Answer - मार्क जुकरबर्ग (2004)


13. Alibaba के संस्थापक कौन है ?

Answer - जैक मा (1999)


14. Nokia के संस्थापक कौन है ?

Answer - Fredrik Idestam, Leo Mechelin


15. Reliance के संस्थापक कौन है ?

Answer - धीरूभाई अम्बानी (1997)


16. Ebay के संस्थापक कौन है ?

Answer - Pierre Omidyar (1995)


17. Twitter के संस्थापक कौन है ?

Answer - जैक डॉर्स (2006)


18. Instagram के संस्थापक कौन है ?

Answer - केविन सिस्ट्रोम, माइक करिजर (2010)


19. YouTube के संस्थापक कौन है ?

Answer - Jawed KarimStee Chen (2005)


20. Skype के संस्थापक कौन है ?

Answer - Niklas Zennstrom Janus Friis (2003)


21. Tesla के संस्थापक कौन है ?

Answer - एलोन मस्क (2003)


22. Intel के संस्थापक कौन है ?

Answer - गॉर्डन मूरे (1968)


23. Samsung के संस्थापक कौन है ?

Answer - Lee Byungchul (1938)


24. Xiaomi के संस्थापक कौन है ?

Answer - Lie Jun (2010)

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना


🔖केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजना’ (ABRY) याला आपली मंजूरी दिली. औपचारिक क्षेत्रात रोजगार वाढविण्यासाठी आणि ‘आत्मनिर्भर भारत पॅकेज 3.0’ अंतर्गत कोविड-19 महामारीच्या धक्क्यातून व्यवस्था बाहेर काढण्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना आहे.


📍ठळक वैशिष्ट्ये....


🔖ही योजना वर्ष 2020 ते वर्ष 2023 या कालावधीत लागू राहणार. योजनेच्या अंमलबजावणीसाठी 22810 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.


🔖1 ऑक्टोबर 2020 रोजी किंवा त्यानंतर 30 जून 2021 पर्यंतच्या कालावधीत रोजगार दिलेल्या नवीन कर्मचार्‍यांच्या संदर्भात भारत सरकार दोन वर्षांसाठी अनुदान देणार.


🔖1000 कर्मचार्‍यांच्या आस्थापनांमध्ये कामावर घेतलेल्या नवीन कर्मचार्‍यांच्या बाबतीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) यामध्ये 12 टक्के कर्मचार्‍यांचे योगदान आणि 12 टक्के नियोक्ता यांचे योगदान असे एकूण 24 टक्के योगदान भारत सरकार दोन वर्षांच्या कालावधीत देणार.


🔖1000 कर्मचार्‍यांपेक्षा अधिक संख्या असणाऱ्या आस्थापनांच्या बाबतीत भारत सरकार केवळ कर्मचार्‍यांचे 12 टक्के योगदानच देणार.


🔖15 हजार रुपयांपेक्षा कमी मासिक वेतन घेणारे कर्मचारी या योजनेचा लाभ घेवू शकतात.


🔖कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांच्या आधार-जोडलेल्या खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने योगदान जमा करणार. तसेच संस्था या योजनेसाठी एक सॉफ्टवेअर विकसित करणार आहे.

नौदलाने दिली ‘स्मॅश 200 प्लस’ची ऑर्डर.


🔰भारतीय नौदलाला लवकरच इस्रायलकडून ‘स्मॅश 200 प्लस’ सिस्टिम मिळणार आहे. भारतीय नौदलाने या सिस्टिमसाठी ऑर्डर दिली आहे.

तर हे ड्रोन विरोधी शस्त्र आहे. या सिस्टिमद्वारे दिवसा तसेच रात्रीच्यावेळीही शत्रुंची छोटी ड्रोन्स पाडता येतील. ‘स्मॅश 200 प्लस’ ही एक कॉम्प्युटराइज्ड फायर कंट्रोल आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक साइट सिस्टिम आहे.


🔰बदुक किंवा मशीन गनवर ‘स्मॅश 200 प्लस’ सिस्टिम बसवता येईल.पुढच्यावर्षीपासून ‘स्मॅश 200 प्लस’ सिस्टिमचा पुरवठा सुरु होईल.तसेच ‘स्मॅश 200 प्लस’ची किंमत 10 लाखापेक्षा कमी आहे. बंदुक किंवा मशीन गनवर ही सिस्टिम बसवून 120 मीटर अंतरावरुन वेगाने लक्ष्याच्या दिशेने येणारी छोटी ड्रोन्स हवेतच नष्ट करता  येईल.

भारत इस्रायलकडून ही सिस्टिम विकत घेणार  असला, तरी अशा पद्धतीचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे.


🔰भारत अमेरिकेसोबत मिळून छोटी एरियल सिस्टम ड्रोन स्वार्म (थव्याच्या स्वरुपात) तसेच ड्रोन्स विरोधी सिस्टिम विकसित करण्याचे काम सुरु करणार आहे. अमेरिकेबरोबर झालेल्या DTTI द्विपक्षीय करारातंर्गत ही सिस्टिम विकसित करण्यात  येईल.

महिला व बालकांना 'शक्ती'!; ठाकरे सरकार करणार 'हे' दोन कठोर कायदे



महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.


प्रस्तावित कायद्यांची ठळक वैशिष्टे पुढील प्रमाणे आहेत ..


१) हे नवीन गुन्हे समाविष्ट


- समाज माध्यमांमधून महिलांना धमकावणे व बदनामी करणे.

- बलात्कार, विनयभंग आणि ॲसीड हल्ला याबाबत खोटी तक्रार करणे.

- समाजमाध्यम, इंटरनेट व मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी तपास कार्यात सहकार्य न करणे.

- एखाद्या लोकसेवकाने तपासकार्यात सहकार्य न करणे.



- बलात्कार पीडितेचे नाव छापण्यावर बंधने होती ती बंधने विनयभंग आणि ॲसीड हल्ला याबाबत लागू करणे.


२) शिक्षेत वाढ


- बलात्कार, ॲसीड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंड प्रस्तावित केला आहे.

- शिक्षांचा कालावधी वाढविला आहे.

- ॲसीड हल्ला प्रकरणी दंडाची तरतूद केली असून ती रक्कम पीडितेला वैद्यकीय उपचार व प्लास्टीक सर्जरीकरिता देण्याचे प्रस्तावित आहे.

०९ डिसेंबर २०२०

समुद्री चाचण्यांसाठी 'विक्रांत' सज्ज



● भारताची विक्रांत ही पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका समुद्री चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे.


● कोचीन बंदरातील तिच्या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, आता जानेवारीपासून तिच्या समुद्रातील चाचण्या सुरू होतील. 


● 'विक्रांत', 'विराट' या इंग्लिश बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका निवृत्त झाल्यावर भारतीय नौदलाचा भार आता 'विक्रमादित्य' ही रशियन बनावटीची विमानवाहू युद्धनौका वाहत आहे. 


● कोचीन नौदल गोदीत बनवली जात असलेली 'विक्रांत' ही सुमारे चाळीस हजार टनी पहिलीवहिली स्वदेशी युद्धनौका आता विक्रमादित्यच्या जोडीला येत आहे. 


अशी आहे युद्धनौका

- वजन : ४० हजार टन

- लांबी : २६२ मीटर किंवा ८६० फूट

- स्की जंप (विमानोड्डाणासाठीची विशेष चढण)सह तीस विमाने हेलिकॉप्टरचा समावेश शक्य 

- मिग २९ विमाने व कामोव्ह किंवा सी-किंग हेलिकॉप्टर राहू शकतात

- कामोव्ह हेलिकॉप्टर शत्रूच्या हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देईल

- सी-किंग हेलिकॉप्टर शत्रूच्या पाणबुड्यांना शोधून नष्ट करेल


महत्वाचे मुद्दे


● या विमानवाहू युद्धनौकेचे नाव ब्रिटनकडून खरेदी केलेल्या भारताच्या *पहिल्या विमानवाहू युद्धनौका  आयएनएस विक्रांत* च्या नावावरून ठेवण्यात आले आहे. *1997* मध्ये आयएनएस विक्रांतला नौदलाने आपल्या ताफ्यातून निवृत्त केले होते.


● सध्या, रशियाकडून घेण्यात आलेली  44,500 टन क्षमता असलेली *आयएनएस विक्रमादित्य* ही एकमेव विमानवाहू युद्धनौका भारताकडे आहे.


● आयएनएस विक्रमादित्यप्रमाणेच विक्रांतदेखील विमान प्रक्षेपित करण्यासाठी व उतरण्यासाठी करण्यासाठी *STOBAR* (Short Take-Off But Arrested Recovery) यंत्रणा वापरणार आहे.


● या युद्धनौकेची रचना आणि बांधणी पूर्णपणे भारतीय असून, या नौकेच्या बांधणीमुळे भारत अशी नौका तयार करण्याची शक्ती असणाऱ्या *अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स* या देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे.

Forbes ची जगातील सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर, निर्मला सीतारामन यांना स्थान


🔥फोर्ब्सनं नुकतीच जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस, बायोकॉनच्या संस्थापन किरण मजूमदार-शॉ आणि एचसीएल एन्टरप्राईझेसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी नाडार-मल्होत्रा यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.


🔥फोर्ब्सच्या जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीत जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. तसंच या यादीत कमला हॅरिस या तिसऱ्या तर निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे. १७ व्या वार्षिक ‘फोर्ब्स पॉवर लिस्ट’मध्ये ३० देशांतील महिलांचा समावेश करण्यात आला आहे.


🔥“फोर्ब्सच्या या यादीत १० देशांतील प्रमुख महिला, ३८ मुख्य कार्यकारी अधिकारी, पाच मनोरंजन क्षेत्राशी निगडित महिलांचा समावेश आहे. जरी त्यांचं वय, नागरिकत्व आणि निरनिराळ्या क्षेत्रातील त्या असतील तरी त्यांनी २०२० मध्ये आवेव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला मिळालेल्या व्यासपीठाचा योग्यरित्या केला,” असं फोर्ब्सनं म्हटलं आहे.


🔥या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे. तर एचसीएलच्या रोशनी नाडार-मल्होत्रा यांना ५५ वं, किरण मजूमदार शॉ यांना ६८ वं स्थान देण्यात आलं आहे. तर लँडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतीयानी यांना या यादीत ९८ वं स्थान देण्यात आलं आहे. जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल या सलग दहाव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत.

भाषण स्वातंत्र्याचा वापर करताना ‘अधिक जबाबदार’ वागा.


✳️सामान्य लोकांपर्यंत प्रभावशाली व्यक्तींची पोहोच, प्रभाव आणि अधिकार लक्षात घेता त्यांनी भाषण स्वातंत्र्याचा वापर करताना ‘अधिक जबाबदार’ असण्याची आवश्यकता आहे, हे त्यांचे कर्तव्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले.


✳️सर्वोच्च न्यायालयाने भाषण स्वातंत्र्याच्या निरनिराळ्या पैलूंचा ऊहापोह केला. बहुत्ववादाशी बांधील असलेल्या राज्यपद्धतीत द्वेषयुक्त भाषणाचा एखाद्या विशिष्ट गटाबाबत द्वेषाव्यतिरिक्त कुठलाही वैध उद्देश नसतो. 


✳️अशा द्वेषयुक्त भाषणाचे लोकशाहीबाबतच्या कुठल्याही वैध मार्गाने काल्पनिक योगदान असू शकत नाही; उलट त्यामुळे समानतेचा अधिकार नाकारला जातो, असेही न्यायालयाने सांगितले. सुफी संत ख्वाजा मोईउद्दीन चिश्ती यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी दूरचित्रवाणी वाहिनीचे निवेदक अमिश देवगण यांच्यावरचा प्राथमिक माहिती अहवाल रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देताना वरील विधान केले.


✳️सामान्य लोकांवर प्रभावशाली व्यक्तींचा प्रभाव आणि अधिकार यामुळे त्यांचे लोकांबाबत कर्तव्य असते व त्यांनी अधिक जबाबदार असायला हवे, असे न्या. अजय खानविलकर व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने सांगितले.

कृत्रिम सूर्य तयार करण्यात चीन यशस्वी


चीन कृत्रिम सूर्यनिर्मिती करणारे उपकरण बनविण्यात यशस्वी झाला असून त्याची प्रायोगिक चाचणी यशस्वी ठरली. प्रकल्पाच्या माध्यमातून 150 दशलक्ष अंश सेल्सियस पर्यंतचे तापमान निर्माण करण्याची योजना आखण्यात आली आहे.


ठळक बाबी


त्यासाठी ‘HL-2 M टॉकमॅक’ नामक एक उपकरण तयार केले गेले असून, या माध्यमातून नैसर्गिक सूर्याद्वारे मिळणारा प्रकाश निर्माण केला जाणार. निर्माण होणाऱ्या स्वच्छ ऊर्जेचा वापर थर्मोन्यूक्लियर अणुऊर्जेसाठी केला जाणार आहे.


या उपकरणामुळे आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक स्तरावरील अणुभट्टीत (ITER) अधिक प्रमाणात अणुऊर्जा निर्माण करणे सोपे होणार आहे. ITER हा एक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक प्रकल्प असून, तो 38 देशांच्या जागतिक सहकार्याने राबविला जात आहे.


सूर्याच्या  मुख्य भागाचे तापमान 13 दशलक्ष अंश सेल्सियसपर्यंत असल्याचे मानले जाते.

भारतीय वंशाचे अनिल सोनी WHO फाऊंडेशनचे पहिले सीईओ


⏺भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अनिल सोनी यांना जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आलं आहे.


⏺आरोग्य विषयक समस्यांना तोंड देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं या जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची निर्मिती केली आहे. अनिल सोनी हे या संघटनेचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत.


⏺अनिल सोनी यांच्याकडे 1 जानेवारीपासून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार दिला जाणार आहे. या दरम्या त्यांची लक्ष्य आरोग्य क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा असणार आहे.


⏺जागतिक आरोग्य संघटनेनं करोना महासाथीच्या दरम्यान मे 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची सुरूवात केली होती.


⏺तर आतापर्यंत अनिल सोनी हे ग्लोबव हेल्थकेअर कंपनी वियाट्रिस सोबत कार्यरत होते. ते ‘ग्लोबल इन्फेक्शन डिजिज’चे प्रमुख म्हणून वियाट्रिसमध्ये सेवा बजावत होते.


⏺तसेच यापूर्वी अनिल सोनी हे क्लिंटन हेल्थ अॅक्सेसमध्येही कार्यरत होते. 2005 ते 2010 या कालावधीत त्यांनी या ठिकाणी सेवा बजावली.

ओरछा, ग्वाल्हेर शहरांना युनेस्कोचा वारसा दर्जा



🏵मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर व ओरछा या ऐतिहासिक शहरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा शहरांच्या यादीत स्थान मिळाले आहे. शहरी स्थळ शिल्प प्रवर्गात हा बहुमान मिळाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.


🏵तर राज्य सरकारच्या जनसंपर्क खात्याने म्हटले आहे की, ही दोन किल्ल्यांची शहरे आहेत त्यांना युनेस्कोचा वारसा दर्जा मिळाल्याबाबत पर्यटन तज्ज्ञांनी आनंद व्यक्त केला आहे.


🏵सयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना म्हणजे युनेस्कोने या शहरांना वारसा शहरांचा दर्जा दिला. त्यामुळे आता ग्वाल्हेर व ओरछा शहरांची स्थिती बदलणार आहे.

युनेस्को व राज्य सरकारचे पर्यटन खाते या शहरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करून त्यांचे सौंदर्य वाढवणार आहे.


🏵यनेस्कोचे पथक पुढील वर्षी या दोन शहरांना भेट देणार असून तेथील वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी करणार आहे.


🏵दक्षिण आशियासाठी आदर्शवत ठरेल असे प्रकल्प यात हाती घेतले जातील. यात शहर सौंदर्याबाबत काही सूचना केल्या जातील पण त्यात इतिहास हरवणार नाही याची काळजी घेतली जाईल.

आयुष निर्यात संवर्धन परिषद’ची स्थापना करण्यासाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि आयुष मंत्रालय एकत्र


🔰आयुष निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने, वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि आयुष मंत्रालय (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी मंत्रालय) यांनी मिळून ‘आयुष निर्यात संवर्धन परिषद (AEPC)’ याची स्थापना करून एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.


🔰सपूर्ण आयुष (उत्पादनांच्या) निर्यातीला चालना देवून किंमत आणि दर्जा यांच्या स्पर्धात्मकतेसाठी संपूर्ण आयुष क्षेत्र एकत्रितपणे कार्य करणार आहे.


🔴ठळक बाबी....


🔰सकल्पित AEPC आयुष मंत्रालयात स्थापन करण्यात येणार आहे.

आयुषसाठी ‘हार्मोनाइज्ड सिस्टम (HS)’ कोडचे प्रमाणीकरण लवकरच करण्यात येणार.


🔰आयुषची उत्पादने आणि सेवा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करण्यासाठी आयुष मंत्रालय ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सशी समन्वय साधून काम करणार.


🔰आयुष मंत्रालय आणि आयुष उद्योग त्यांच्या उत्तम कार्यपद्धती/यशोगाथा ओळखून त्यांचा लोकांपर्यंत प्रचार करणार.


🔰आयुष उद्योग आपल्या उत्पादनांचा दर्जा आणि मानके तसेच त्यांची किंमत स्पर्धात्मक दृष्ट्या योग्य असतील हे सुनिश्चित करणार.आयुष ब्रँड इंडिया उपक्रमांसाठी प्रयत्न करणार.

कॅनडाकडून डॉ. विजया वाड यांचा सन्मान.


🌷कनडाच्या पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी राजपत्र असलेले गौरवपत्र वादळवाट या पुस्तकाच्या लेखिका आणि मराठी विश्वकोशाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड आणि वादळवाट पुस्तकातील रमेश खानविलकर यांच्या व्यक्तिमत्त्वावर असल्याने त्यांच्या आई शारदा श्रीराम खानविलकर या दोघींचा मूळचे महाराष्ट्रीयन असलेले कॅनडातील उद्योगपती डॉ. विजय ढवळे यांच्यातर्फे लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते एका कार्यक्रमात नुकताच सन्मान करण्यात आला.


🌷कनडाच्या पार्लमेंट हाऊसमध्ये आतापर्यंत फक्त चारच भारतीय लोकांचा सत्कार आणि सन्मान  तेथील पंतप्रधानांनी केला आहे.


🌷तर त्यापैकी एक असलेले मनोहर जोशी म्हणाले की, कॅनडा देशाची राजमुद्रा असलेले गौरवपत्र डॉ. विजया वाड आणि शारदा खानविलकर यांना माझ्या हस्ते देताना कॅनडा सरकारने या दोन मातांबरोबर माझाही गौरव केला आहे. डॉ. विजय ढवळे यांच्यामुळे आज या दोन्ही महान विभूती मातांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले आहे. यावेळी रमेश खानविलकर हेही उपस्थित होते.

करोना लसीसंबंधी मोठी अपडेट, सीरमकडून तात्काळ मान्यता देण्यासाठी अर्ज


पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड-अ‍ॅझेन्काच्या करोना लसीच्या आपातकालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) अर्ज केला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, महामारीमुळे निर्माण झालेली वैद्यकीय गरज आणि लोकांच्या हितासाठी अशी कारणं सीरम इन्स्टिट्यूटने डीजीसीआयकडे सोपवण्यात आलेल्या अर्जात देण्यात आली आहेत.


‘फायझर’ची करोनाप्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी कंपनीने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला असतानाच ही माहिती समोर आली आहे. ब्रिटनने या लसीला आधीच परवानगी दिली असून एखाद्या देशात परवानगी मिळालेली करोनावरची ती पहिली लस ठरली आहे.


दरम्यान सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. झायडस कॅडिलाच्या देशी करोना लशसीच्या तिसऱ्या टप्प्यांना परवानगी मिळाली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज व रशियाच्या डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांनी स्पुटनिक ५ लशीची निर्मिती भारतात करण्याचे ठरवले असून त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. बायोलॉजिकल ई कंपनीने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू केल्या आहेत.

मलेरिया रोखण्यात भारताला यश.


🧲जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया जागतिक परिस्थिती अहवाल प्रसिद्ध केला असून भारतातील मलेरिया रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे निरीक्षण त्यात नोंदवण्यात आले आहे.मलेरियाचे अस्तित्व असलेल्या देशांपैकी त्याचा प्रसार रोखण्यात यशस्वी ठरलेला भारत हा एकमेव देश ठरला आहे.


🧲जागतिक आरोग्य संघटनेने भारतासह जगातील 11 देशांमध्ये मलेरियाच्या दृष्टीने जोखमीच्या प्रदेशांवर लक्ष केंद्रित केले होते. त्या देशांतील रुग्णसंख्येच्या गणितीय प्रारूपाच्या अभ्यासातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.


🧲2000 ते 2019 या कालावधीत भारतातील मलेरिया रुग्णांची संख्या तब्बल 72 टक्क्यांनी कमी करण्यात यश आले आहे. मलेरियामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्याही 74 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात नमूद केले आहे.

मुखपट्टीविना फिरणाऱ्यांना समुदाय सेवेच्या शिक्षेस स्थगिती.


☄️सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीविना फिरताना आढळलेल्यांना कोविड-19 रुग्णसेवा केंद्रांत समुदाय सेवेसाठी पाठवण्याचे निर्देश देणाऱ्या गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली.


☄️तर हा आदेश ‘कायदेशीर अधिकार नसताना’ देण्यात आल्याचा आरोप करून गुजरात सरकारने त्याविरुद्ध केलेल्या अपिलाची न्या. अशोक भूषण, आर. सुभाष रेड्डी व एम.आर. शहा यांच्या खंडपीठाने नोंद घेतली.


☄️तसेच उच्च न्यायालयाचा हा आदेश कठोर असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर याचे गंभीर परिणाम होतील, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला होता. त्याचीही नोंद खंडपीठाने घेतली.

कोविड-19 प्रतिसादाविषयी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेचे विशेष सत्र.


*⃣3 डिसेंबर 2020 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या (UNGA) विशेष सत्राला सुरुवात झाली. ही बैठक दोन दिवस चालणार आहे.


🌀ठळक बाबी...


*⃣या सत्रात कोविड-19 महामारीला दिला जाणारा प्रतिसाद आणि बिघडलेल्या अर्थव्यवस्थेपासून प्रगतीकडे वळण्याचा उत्तम मार्ग या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहेतसेच कोविड-19 लस, त्याची निर्मिती, वितरण, उत्पादक अश्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.जागतिक आरोग्य संघटनेचा ‘ACT-एक्सीलरेटर’ उपक्रम जगातल्या सर्वात गरीब लोकांना लसी वितरित करण्याचे काम करीत आहे.


🌀सयुक्त राष्ट्रसंघ (UN) विषयी


*⃣आतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.


*⃣1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे.


*⃣सघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.


*⃣UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.


*⃣सयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात प्रमुख अधिकारी पद ‘सरचिटणीस’ (Secretary‑General) हे असून वर्तमानात हे पद पोर्तुगालचे अँटोनियो गुटेरेस यांच्याकडे आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत -


*⃣UN महासभा (General Assembly)

UN सुरक्षा परिषद (Security Council)UN आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council ­ECOSOC)

UN सचिवालय

UN आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) आणिUN विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).


🌀सयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत -


*⃣जागतिक बँक समूह

जागतिक आरोग्य संघटना (WHO)

जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Program)

संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization –UNESCO)

संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund –UNICEF)

दिनांक 2 डिसेंबर 1984 या दिवशीची दुर्घटना

 


◾️भोपाळजवळील युनियन कार्बाइडच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले तर लाखो लोक त्याने प्रभावित झाले. या दुर्घटनेच्या स्मृतीत देशात 2 डिसेंबरला ‘राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन’ पाळला जातो.


◾️औद्योगिक क्षेत्राला या घटनेची आठवण राहावी आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी जागृती पसरवण्यासाठी हा दिवस भारतात पाळला जातो.


◾️औद्योगिक तसेच वैयक्तिक पातळीवर होणार्‍या प्रदूषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्याचा विपरीत परिणाम माणसांबरोबर इतर जीवसृष्टी, नैसर्गिक स्त्रोत आणि हवामानावरही होत आहे. प्रदूषणाच्या दुष्परिणांबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता वाढावी यासाठी प्रत्येक स्तरावर विविध उपक्रमे राबवली जातात.


🔺पार्श्वभूमी


◾️संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनी (ILO) त्याच्या “द सेफ्टी अँड हेल्थ अॅट द हार्ट ऑफ द फ्यूचर वर्क - बिल्डिंग ऑन 100 इयर्स ऑफ एक्स्पीरियन्स” या अहवालात हजारो लोकांना मृत्यूच्या दाढेत लोटणाऱ्या 1984 सालाच्या ‘भोपाळ वायुगळती’ घटनेला शतकातली सर्वात भीषण औद्योगिक घटना म्हणून नोंदवण्यात आले आहे.


◾️मध्यप्रदेशाच्या राजधानीत ‘युनियन कार्बाइड’ या किटकनाशके बनविण्याच्या प्रकल्पात मिथाइल आयसोसायनेट (मिक) वायूची गळती होऊन किमान 6 लाखांहून अधिक मजूर व परिसरातल्या रहिवाशांना फटका बसला होता. त्यात सरकारी आकड्यानुसार 15 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला होता. विषारी कण अजूनही अस्तित्वात आहेत. त्यामुळे हजारो पिडीत व त्यांची पुढची पिढी श्वसनासंबंधी आजाराचा सामना करत आहे.

शांघाय सहकार्य संघटनेच्या सामायिक बौद्ध वारसाविषयक पहिल्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे भारताकडून आयोजन.


🔰भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी 30 नोव्हेंबर 2020 रोजी शांघाय सहकार्य संघटनेतल्या (SCO) सामायिक बौद्ध वारसाविषयक पहिल्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले.


🔰शांघाय सहकार्य संघटनेमधील सरकार प्रमुखांच्या परिषदेची 19 वी बैठक नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती, ज्याचे अध्यक्षपद एम. व्यंकय्या नायडू यांच्याकडे होते.


❄️ठळक बाबी


🔰शांघाय सहकार संघटनेच्या सदस्य देशांचे एकत्रितपणे पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे आयोजन नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्यावतीने करण्यात आले आहे.


🔰या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या कलाकृतींचे त्रिमितीय स्कॅनिंग करण्यात आले आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वेबजीएल मंच, आभासी जागेचा विनियोग, नवसंकल्पनेतून मांडणी आणि पुरातन वस्तूंविषयीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.


🔰बौद्ध तत्वज्ञान आणि मध्य अशियातील कला हे शांघाय सहकार्य संघटनेतल्या (SCO) देशांना एकमेकांशी जोडणारे आहे. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये अशिया खंडातल्या विविध संग्रहालयातल्या कलात्मक समृद्धीची झलक पहायला मिळते. त्याचबरोबर बौद्ध शाळांचा विकास कसा टप्प्याटप्याने होत गेला, याची माहिती देणारे आणि ऐतिहासिक काळाचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व करणारे प्रदर्शन आहे.


❄️शांघाय सहकार्य संघटना (SCO) विषयी


🔰शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची स्थापना 15 जून 2001 रोजी झाली. संघटनेचे मुख्यालय बिजिंग (चीन) येथे आहे. ही एक यूरेशियन राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा युती आहे.


🔰SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. चीन हा संघटनेचा संस्थापक देश आहे. भारताला या संघटनेचे 2017 साली पूर्ण सदस्यत्व मिळाले.

भारतीय आयटी क्षेत्राचे ‘पितामह’फकिर चंद


🔰भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘पितामह’ म्हणून परिचयाचे असलेले फकिर चंद कोहली यांचं वयाच्या 96 व्या वृद्धापकाळानं निधन झालं.


🔰कोहली हे देशातील सर्वात मोठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) संस्थापक आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते.


🔰1951 मध्ये ते टाटा इलेक्ट्रीक कंपनीत रूजू झाले आणि सिस्टमच्या संचालनासाठी आवश्यक लोड डिस्पॅचिंग सिस्टम स्थापित करण्यास त्यांनी मदत केली.


🔰1970 मध्ये फकीरचंद कोहली यांच्या खांद्यावर टाटा इलेक्ट्रीक कंपन्यांच्या संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.


🔰1991 मध्ये टाटा-आयबीएमचा भाग म्हणून आयबीएमला भारतात आणण्याच्या निर्णयामध्ये कोहली सक्रियपणे सहभागी होते. 


🔰हा भारतातील हार्डवेअर उत्पादनाच्या संयुक्त उपक्रमाचा एक भाग होता. टीसीएसचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी देशाला १०० अब्ज डॉलर्सचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग तयार करण्यास मदत केली.


🔰भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फकिर चंद कोहली यांना 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

सपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द


● मर्द            x     नामर्द


● शंका          x     खात्री


● कृपा           x    अवकृपा


● गमन           x    आगमन


● कल्याण      x     अकल्याण


● ज्ञात           x     अज्ञात


● सत्कर्म       x      दुष्कर्म


● खरे           x      खोटे


● भरती        x     ओहोटी


● सुसंबद्ध     x     असंबद्ध


● हर्ष            x     खेद


● विधायक    x     विघातक


● हानी          x     लाभ


● संघटन       x     विघटन


● सुंदर          x     कुरूप


● सार्थक       x     निरर्थक


● स्वस्थ        x     अस्वस्थ


● सुसंगत      x      विसंगत


● तप्त          x      थंड


● धर्म           x      अधर्म


● सनाथ       x      अनाथ


● सशक्त       x      अशक्त


● कीर्ती        x      अपकीर्ती


● ऐच्छिक     x     अनैच्छिक


● गुण          x      अवगुण

“संविधान सभेची पहिली बैठक”



आजच्या दिवशी संविधान सभा पहिल्यांदा एकत्र आली होती. 


🔸 सविधान सभा “सचिव एच. व्ही. आर. आयंगार” यांनी २० नोव्हेंबर १९४६ रोजी सर्व संविधान सभा सदस्यांना आमंत्रण दिले.


🔸९ डिंसेबर १९४६ रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीच्या परिषद भवनातील संविधान सभा चेंबर मध्ये हजर राहावे.


🔸फ्रांस देशांचे अनुकरण करुन संविधान सभा सल्लागार बी.एन. राव  यांनी सर्वात वयोवृद्ध सदस्य “डाॅ. सच्चिदानंद सिन्हा” यांना तात्पुरते अध्यक्ष करावे अशी शिफारस केली. 


🔸तसेच तात्पुरते उपाध्यक्ष म्हणुन “फ्रॅक ॲन्थोनी” यांची निवड झाली. 


🔸 पहील्या बैठकीला म्हणजेच ९ डिसेंबर १९४६ रोजी ११ वाजता “आचार्य जे. बी. कृपलानी” यांनी सिंन्हा यांचे नाव घोषित केले.


🔸 आचार्य जे. बी. कृपलानी हे पहिले व्यक्ती जे संविधान सभेसमोर बोलले.  कृपलानी त्याचवेळी “काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष” होते.


🔸9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेच्या पहील्या बैठकीला तात्पुरते अध्यक्ष म्हणुन काम पाहणारे “डाॅ. सच्चिदानंद सिन्हा” यांनी 3 देशांचे शुभकामना संदेश वाचुन दाखवले.


१) अमेरीका


२) चीन प्रजासत्ताक 


३) ॲास्ट्रेलिया 


यावर सिन्हा यांचे उद्गार -


“ज्या देशांनी आम्हाला असे उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी शुभ संदेश पाठविले त्या देशांच्या सरकारांप्रति आभार व्यक्त करण्यासाठी संदेश पाठविण्याकरिता ही सभा मला अधिकृत करेल आणि अनुमती देईल असा मला विश्वास वाटतो. आणि मी हेसुद्धा आवर्जून सांगू इच्छितो की, तुमच्या वांच्छित कार्याच्या सिद्धीसाठी हा मोठा शुभ संदेश आहे.” 

हायाबुसा-2’ यान पृथ्वीवर परतले


🌻‘रयुगू’ लघुग्रहाच्या पृष्ठभागाखालच्या खडकाचे नमुने घेवून जपानचे ‘हायाबुसा-2’ यान 6 डिसेंबर 2020 रोजी पृथ्वीवर परतले.


🌻शास्त्रज्ञांना आशा आहे की नमुन्याचे वजन 0.1 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. नमुने असलेला एक कॅप्सूल दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात सापडला.


🛑‘हायाबुसा-2’ मोहीम


🌻‘हायाबुसा-2’ हे JAXA या जपानी अंतराळ संशोधन संस्थेकडून संचालित केले जाणारे अंतराळयान आहे. ‘हायाबुसा-2’ यान 3 डिसेंबर 2014 रोजी अंतराळात पाठविण्यात आले होते. यान दीड वर्षाच्या कालावधीसाठी लघुग्रहाच्या (asteroid) निरीक्षणासाठी पाठवले गेले होते.


🌻अतराळयानावर असलेले रोव्हर ‘रयुगू (Ryugu)’ या नावाच्या लघुग्रहावर उतरविण्यात आले. एखाद्या लघुग्रहावर यान उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. लघुग्रहाच्या पृष्ठभागाची तपासणी आणि खडकाचे नमुने गोळा करण्याच्या उद्देशाने हे यान पाठविण्यात आले होते. लघुग्रहाच्या पृष्ठभागावरील एका विवरात स्फोट घडवून आणि त्यातून माती आणि खडकाचे नमुने गोळा करण्यात आले.


🌻हायाबुसा यानात ‘मिनरव्‍‌र्हा 2’ रोव्हर रोबोट व मस्कॉट हा फ्रेंच रोबोट यांचा समावेश होता. यान फ्रीजच्या आकाराएवढे होते. हायाबुसाचा अर्थ जपानी भाषेत ससाणा असा आहे.


🛑लघुग्रह म्हणजे काय आहे?


🌻सौरमालेची निर्मिती होत असताना जे काही उरले ते म्हणजे लघुग्रह वा अशनी आणि उल्का होय. ‘रयुगू’ हा अगदी प्राथमिक लघुग्रह आहे. त्याला स्वतःच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी साडेसात तास लागतात.


🛑‘रयुगू’ लघुग्रह


🌻‘रयुगू’ लघुग्रह पृथ्वीपासून 30 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. ‘रयुगू’ या लघुग्रहाची निर्मिती साधारणपणे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी म्हणजे सौरमालेच्या जन्मावेळची असून त्यात मोठ्या प्रमाणवर कार्बनी पदार्थ व पाणी आहे असे समजले जाते, त्यामुळे त्याच्या या संशोधनाला विशेष महत्त्व आहे.

Online Line Series

राष्ट्रप्रेमी बाबासाहेब....

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही केवळ व्यक्ती नसून तो विचार आहे. हा विचार प्रेरणादायी आणि प्रवाही आहे. त्यांचे जीवन आणि कार्य हे तळागाळातील हजारो वर्षांच्या सामाजिक अन्याय आणि आर्थिक शोषणामुळे भरडलेल्या लोकांकरिता प्रेरणा आहे. ही प्रेरणा केवळ वैचारिक पातळीपुरती मर्यादित नाही, तर झोपलेल्या समाजाला जागृत करून त्यांच्यात स्वाभिमान, अस्मिता आणि आर्थिक सबळता निर्माण करण्याचा कृती कार्यक्रम आहे. जाज्वल्य-राष्ट्रनिष्ठा आणि देशप्रेम हे बाबासाहेबांच्या जीवन आणि कार्याचे अतूट अंग आहे. त्यांनी निर्माण केलेल्या आणि मूलभूत सिद्धान्त मांडणाऱ्या प्रचंड ग्रंथरचनेत, पत्रकारितेत, लिखाणात, भाषणात या देशाची भौगोलिक अखंडता आणि राष्ट्रीय एकता आणि अस्मिता याला छेद पडेल अथवा ती भंग पावेल असे कोणतेही वाक्य व वक्तव्य दिसून येत नाही. 'भारत' या शब्दाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष आकर्षण होते. त्यांनी स्थापन केलेल्या एका पाक्षिकाचे नाव 'बहिष्कृत भारत' आणि मुद्रणालयाचे नाव भारत भूषण प्रिंटिंग प्रेस' असे होते. परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांच्या राष्ट्रीय कार्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अजूनही संकुचित आणि पूर्वग्रहदूषित आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला नाही अथवा गांधीजींच्या राजकीय चळवळीत सहभागी झाले नाहीत. याचा अर्थ असा होत नाही की त्यांना भारताचे स्वातंत्र्य नको होते. त्यांना भारताचे नुसते स्वातंत्र्य नको होते, त्याचबरोबर दलित आणि अस्पृश्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उत्थानाचा संबंध स्वातंत्र्याशी जोडणे आवश्यक वाटत होते. देश स्वतंत्र झाला पण लोक स्वतंत्र झाले का ? हा प्रश्न ते सदैव विचारीत असत. डॉ. बाबासाहेबांबद्दल सर्वसामान्य जनतेची अजूनही समजूत ब्रिटिशधार्जिणा, काँग्रेस-गांधी विरोधक, हिंदूद्वेष्टा आणि विशिष्ट वर्गाच्या हिताकरिता चळवळ करणारा इत्यादीवर आधारित आहे. पण ही पूर्णतः गैरसमजूत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची साहित्य चळवळ, जीवन आणि कार्य यांचा अभ्यास केल्यास हे स्पष्ट दिसून येते की त्यांनी स्वराज्याला कधीही विरोध केलेला नाही. या उलट स्वतंत्र भारत हे मजबूत सबळ आणि प्रगत राष्ट्र झाले पाहिजे असे त्यांचे स्वप्न होते. बाबासाहेबांचा दृष्टिकोन, स्वराज्य हे केवळ मूठभर लोकांचे आणि सत्ताधीशांचे आहे, असा नव्हता; तर पीडित आणि उपेक्षितांसह सर्वांचे स्वातंत्र्य ही कल्पना बाबासाहेबांच्या मनात सतत होती. पण तसे स्वराज्य निर्माण होण्यास या देशातील समाजव्यवस्था अनुकूल नाही अशी शंका त्यांच्या मनात होती. गेली ७०० वर्षे राजकीय जमात म्हणून विशेषाधिकार भोगलेल्या बॅरिस्टर जिन्ना यांनी धर्माच्या नावाने भारताचे तुकडे पाडून पाकिस्तानची निर्मिती केली. पण व्यक्तिगत जीवनात अनेक अन्याय आणि अत्याचार भोगून हजारो वर्षांच्या सामाजिक गुलामगिरीची पूर्वपीठिका असताना सुद्धा त्यांनी या देशाची एकता आणि अखंडता एकात्मतेकरिता सदोदित प्रयत्न केले. बाबासाहेबांचे कार्य हे केवळ दलित उद्धारापुरते मर्यादित नव्हते, तर ते राष्ट्र उद्धाराचे कार्य होते.

         राष्ट्रीय एकात्मकतेच्या संदर्भात डॉ. बाबासाहेबांचे राष्ट्रप्रेम आणि निष्ठा ही वादातीत आहे. ब्रिटिश राजवटीच्या अनेक गोष्टींचे बाबासाहेबांनी गुणगान व समर्थन केले असले तरी त्यांनी त्यांच्या दोषांचा, अन्याय आणि अत्याचारांचाही प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. मुंबई विधान परिषदेत ते ब्रिटिश सरकारचे नामनिर्देशित सदस्य (१९२७-१९३९) होते. तरीपण त्यांनी ब्रिटिशांचे कायदे आणि धोरण यावर एक खरा राष्ट्रभक्त

आणि देशप्रेमी या नात्याने प्रखर टीका केलेली आहे. ‘आम्ही सर्व एक आहोत, ही भावना म्हणजेच राष्ट्र' भारतातील फार मोठा जनसमूह हा जातीच्या आणि अस्पृश्यतेच्या नावाखाली जर वेगळा पडलेला असेल तर तो समूह देशाच्या प्रमुख प्रवाहात कसा येईल ? म्हणजेच खऱ्या अर्थाने राष्ट्र म्हणता येणार नाही आणि राष्ट्रीय भावना निर्माण होणार नाही. आमची 'विविधतेतील एकता' केवळ घोषणा होईल. या वंचित जनसमूहाला, बाबासाहेबांनी आपल्या कार्याने आणि चळवळीने, प्रमुख प्रवाहात सहभागी करून घेण्याचे मोठे कार्य केले. राष्ट्रवाद ही खऱ्या अर्थाने लोकांची सांस्कृतिक आणि एकात्मिकतेची भावना आहे. ती मनुष्याच्या विचारांची उपज आहे. म्हणून त्याचा जीवन व कृती यांच्याशी सरळ संबंध आहे. वंचित वर्ग हा बहुधा आपल्या हक्काकरिता सशस्त्र क्रांतीकडे वळत असतो. परंतु बाबासाहेबांनी या वंचित वर्गाला कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन करण्याचे बाळकडू पाजले आहे. बाबासाहेब म्हणतात, “राष्ट्रवाद ही अशी सत्य स्थिती आहे की त्याला विसरता येत नाही किंवा नाकारता येत नाही." इतर संस्कृती आणि देशांचे उदाहरण देऊन बाबासाहेबांनी आक्रमक राष्ट्रवादाला नाकारले आहे. राष्ट्रीय सन्मान आणि सामाजिक एकता हे त्यांच्या राष्ट्रवादाचे मूलाधार होते. शोषित आणि वंचित वर्गाच्या हिताकरिता चळवळ करणे हा त्यांच्या राष्ट्रीय कार्याचाच भाग होय. 

त्यांच्या राष्ट्रीय भावनेत दोन गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात- 

१. ब्रिटिश सत्तेचा अंत, स्वकीयांचे राज्य.

 २. जातिविहीन आणि समताधिष्ठित समाजाची निर्मिती.

त्यांची विचारधारा ही मानवतावादी आणि लोकशाहीवादी असली तरी ती प्रखर राष्ट्रभक्तीने ओतप्रोत होती. कारण वर्ण, जात, वंश आणि सांप्रदायिकता यांना बाबासाहेबांनी आपल्या राष्ट्रवादाचा आधार कधीही मानलेला नाही. सर्व भारतीय लोकांत एकात्मतेची भावना निर्माण व्हावी आणि आम्ही सर्व भारतीय आहोत म्हणून जगावे हे त्यांचे स्वप्न होते. दलित वर्गाचे स्वार्थ आणि देशाप्रति कर्तव्य, यात त्यांनी देशाला प्रथम स्थान दिलेले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा देशातला पहिला संप; २५००० शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोर्चा



☝️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख केवळ दलितांचे कैवारी, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनच सांगितली जाते. परंतु बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठीही अत्यंत महत्त्वाचे कार्य केले. 


📓 अवघ्या २७ वर्ष वयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील शेती आणि शेतकरी यांचे संशोधन करून ‘लहान शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय’ हा शोधनिबंध लिहिला.


🧐 *देशातील पहिला संप* : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. 


● हा संप इ.स. १९२८-१९३४ या दरम्यान रायगड जिल्ह्यातल्या 'चरी' या गावात झाला. हा संप तब्बल सात वर्ष चालला.


● १० जानेवारी १९३८ रोजी २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळावर नेण्यात आला. 


● शेतकऱ्यांच्या यशस्वी मोर्च्यानंतर, शेतकऱ्यांची चळवळ अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने; त्यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कोकणचा दौरा केला. 


● १७ सप्टेंबर १९३७ रोजी 

खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले होते. 


● शेतकऱ्यांच्या अनेक सभांमध्ये त्यांनी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. विशेष म्हणजे हे शेतकरी कुणबी, मराठा आणि मुसलमान होते.


● बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या जातींचा विचार न करता सर्व जातिधर्माच्या शेतकऱ्यांसाठी चळवळ उभारली होती परिणामी हा इतिहास प्रकाशझोतात येत नाही याचे दुःख आहे.



🌾 *बाबासाहेबांच्या दृष्टिकोकातून शेतीचे धोरण* : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयीकरण’ करण्याची. 


⭕️ शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकर्‍यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. 


⭕️ अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. 


⭕️ यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. 


⭕️ मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. 


⭕️ तयाचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. 


⭕️ नसर्गिक आपत्तीमुळे पिकांवर ओढवणाऱ्या नुकसानीमुळे पिक विमा हा असलाच पाहिजे जेणे करून शेतकऱ्यावर आत्महत्येचा प्रसंग ओढवणार नाही हा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचाच.


💥 आजही शेतकर्‍यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. 


🙏 या पार्श्‍वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकर्‍यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.

जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे :-



❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल


❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन


❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन


❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन


❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड


❇️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन


❇️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन


❇️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड


❇️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन


❇️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड


❇️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल


❇️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल


❇️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन

चीनचे चँग 5 हे अवकाशयान चंद्रावर यशस्वीरीत्या उतरले .


🌀 चीनची चँग 5 चांद्रमोहीम आतापर्यंतच्या टप्प्यांमध्ये यशस्वी झाली असून अमेरिकेनंतर चांद्रभूमीवर ध्वज लावणारा चीन हा दुसरा देश ठरला आहे.


🌀 चीनचे चँग 5 हे अवकाशयान चंद्रावर मंगळवारी यशस्वीरीत्या उतरले असून तेथे चीनचा ध्वज यंत्रमानावाच्या बाहूंनी लावण्यात आला.


🌀 तर हे यान तेथील खडकांचे नमुने गोळा करुन ते पृथ्वीवर आणणार आहे. त्याचे लँडर, ऑर्बिटर,अ‍ॅसेंडर, डिसेंडर असे अनेक भाग आहेत.

चीनच्या अवकाश संस्थेने म्हटले आहे,की कुठल्याही ग्रह किंवा उपग्रहावरून पुन्हा पृथ्वीच्या दिशेने यान उडवणारा चीन हा पहिला देश ठरला आहे.


🌀 चीनने पाठवलेल्या यानातील यांत्रिक बाहूने तेथे चीनचा ध्वज लावण्यात आला असून खडकांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत.


🌀 तसेच त्यातून चंद्रावरील ज्वालामुखी प्रक्रियेचाही अभ्यास केला जाणार आहे. हे खडकाचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत.


🌀 चद्रावरून खडकाचे नमुने पृथ्वीवर आणणारा अमेरिका, रशिया नंतरचा चीन हा तिसरा देश ठरला आहे.


'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे सीईओ अदर पुनावाला यांना 'एशियन ऑफ दी इयर' पुरस्कार.


🏆 पण्यातील 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे सीईओ अदर पुनावाला यांना 'एशियन ऑफ दी इयर' पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंगापूरचं आघाडीचं वृत्तपत्र 'दी स्ट्रेट्स टाइम्स'कडून हा पुरस्कार दिला जातो. 


🏆 आशियातील सहा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून यात पुनावाला यांच्या नावाचा समावेश आहे. करोना महामारीविरोधातील लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.


🏆 जगातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी असलेल्या 'सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने' ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-स्वीडिश फार्मा कंपनी अस्ट्रा झेनेका यांच्या सहकार्याने कोविड-१९वर 'कोविशिल्ड' नावाने लस विकसित केली आहे. भारतात सध्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे.


🏆 वत्तपत्र 'द स्ट्रेट्स टाइम्स'कडून दिल्या जाणाऱ्या 'एशियन ऑफ दी इयर' पुरस्कारासाठी अदर पुनावाला यांच्याव्यतिरिक्त चिनी संशोधक झँग योंगझेन यांचा समावेश आहे. झँग यांनी आपल्या टीमसह Sars-CoV-2 विषाणूचा जिनोम सर्वप्रथम शोधून काढला आणि याबाबत ऑनलाइन माहिती प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुईची मोरिशिटा आणि सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग यांचाही या यादीत समावेश आहे, या सर्वांनी लस निर्मितीत मोठे काम केले आहे.


🏆 दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांच्या कंपनीने लस तयार करुन वितरणाची जबाबदारी घेतली असून त्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. या सर्वांचा उल्लेख 'व्हायरस बस्टर्स' असा करण्यात आला आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिलं आहे.


🏆 या पुरस्काराच्या मानपत्रात म्हटलं की, Sars-Cov-2 विषाणूने अनेक बळी घेतले आहेत. जगातील जनजीवन ठप्प केले. अशावेळी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आशिया खंडातील या 'व्हायरस बस्टर्स'नी चांगले काम केले आहे. त्यांच्या धैर्याला व सर्जनशीलतेला आमचा सलाम. या अडचणीच्या काळात त्यांनी आशिया हा आशेचा किरण असल्याचे दाखवून दिले.


🏆 'दी स्ट्रेट्स टाइम्स'च्या परदेश विभाग संपादक भाग्यश्री गारेकर यांनी सांगितलं की, "आज एकही दिवस करोनाच्या उल्लेखाशिवाय जात नाही. आम्ही ज्यांची निवड केली आहे ते सर्वजण या सन्मानास पात्र आहेत. आशियातील सर्वात मोठ्या आरोग्य आव्हानाला तोंड देण्यात त्यांनी मदत केली आहे."

०८ डिसेंबर २०२०

Online Test Series

क्षारयुक्त जमिनींचे गुणधर्म


▪️जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी असतो.


▪️जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.


▪️विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असते.


▪️ उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर क्‍लोराईड व सल्फेटयुक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअमच्या पांढऱ्या क्षारांचा पातळ थर आढळतो.


▪️जास्त क्षारांमुळे पाणी व अन्नद्रव्ये शोषून घेण्यास पिकांना जास्त ऊर्जा खर्च करावी लागते.


▪️जमिनीतील पाण्याची पातळी उथळ (एक मीटरच्या आत) असते.


▪️ पिकांची पाने पिवळी पडून वाढ खुंटते.



⭕️ क्षारयुक्त जमिनींची सुधारणा ⭕️


▪️ शेताभोवती खोल चर काढावेत, पृष्ठभागावरील क्षारांचा थर खरवडून जमिनीबाहेर काढावेत.


▪️शेतात लहान लहान 20 गुंठ्यांचे वाफे तयार करून चांगले ओलिताचे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा.


▪️ सेंद्रिय खतांचा हेक्‍टरी 20 ते 25 टन वापर करावा.


▪️जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचा (उदा. पाचट) आच्छादनासाठी वापर करावा, जमीन पडीक ठेवू नये.


▪️ हिरवळीची पिके धैंचा, ताग 45 ते 50 व्या दिवशी तीन वर्षांतून एकदा तरी जमिनीत गाडावा.


▪️ भाजीपाला रोपे सरी वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी.


▪️सेंद्रिय भूसुधारके मळीकंपोस्ट, स्पेंटवॉश जमिनीत टाकू नये, तसेच रासायनिक भूसुधारकांमध्ये जिप्सम, गंधक यांचा वापर करू.

०७ डिसेंबर २०२०

नोंगपोक सेकमई (थौबल, मणीपूर): 2020 या वर्षात देशात सर्वोत्तम कामगिरी करणारे पोलीस ठाणे.



देशातल्या पोलीसांना अधिक परिणामकारकरीत्या त्यांचे काम करण्यासाठी उत्तेजन मिळावे आणि कार्यक्षमतेबाबत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण व्हावी या उद्देशाने भारत सरकार दरवर्षी देशभरात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पोलीस ठाण्यांची यादी जाहीर करते.


2020 या वर्षात देशात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रथम 10 पोलीस ठाण्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे -


नोंगपोक सेकमई (थौबल, मणीपूर)

AWPS-सुरामंगलम (सालेम सिटी, तामिळनाडू) खारसांग (चांगलांग, अरुणाचल प्रदेश) झिलमिल (भैया थाना) (सूरजपूर, छत्तीसगड)

संगुइम, दक्षिण गोवा कालीघाट (उत्तर व मध्य अंदमान, अंदमान व निकोबार बेटे)

पाकयोंग (पूर्व जिल्हा, सिक्किम)

कंठ (मुरादाबाद, उत्तरप्रदेश)

खानवेल (दादर व नगर हवेली)

जम्मीकुंटा टाउन पोलीस स्टेशन (करीमनगर, तेलंगणा)


▪️परस्कारासाठीचे निकष


प्रत्येक राज्यातल्या एकूण ठाण्यांपैकी उत्तम कामगिरी करणाऱ्या काही पोलीस ठाण्यांची निवड करताना खालील गुन्ह्यांबाबत केलेल्या कार्यवाहीचे निकष लावण्यात आले:


मालमत्तेच्या वादासंदर्भातील गुन्हे

महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे

समाजातील दुर्बल घटकांविरोधातील गुन्हे

हरविलेल्या व्यक्तींचा शोध, सापडलेल्या अनोळखी व्यक्ती आणि ओळख न पटलेले मृतदेह यांच्यासंदर्भातील पुढील कार्यवाही

अंतिम टप्प्यात 19 मानकांच्या कसोटीवर तत्पर सेवा आणि कामाचा दर्जा उंचावण्यासाठी नव्या तंत्रांचा उपयोग यांच्यासंदर्भात निष्कर्ष, पोलीस ठाण्यांमधील पायाभूत सुविधा, पोलीसांची उपलब्धता आणि त्या-त्या पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेतल्या नागरिकांचे अभिप्राय तपासण्यात आले. 



UN चा ऐतिहासिक निर्णय, गांजा ड्रग्स नव्हे तर औषध ! भारतासह २७ देशांनी केलं समर्थन



संयुक्त राष्ट्रसंघात ऐतिहासिक मतदानानंतर गांजाला (भांग) धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने (CND) बुधवारी हा निर्णय घेतला आहे.


जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवले आहे. यासाठी झालेल्या मतदानात २७ देशांनी गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिले तर उर्वरित देशांनी याविरोधात मतदान केले. विशेष म्हणजे यावेळी भारतानेही गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ मतदान केलं. तर, चीन,पाकिस्तान आणि रशिया यांसारख्या २५ देशांनी विरोधात मतदान केले. “या ऐतिहासिक मतदानानंतर गांजाच्या औषधी व उपचारात्मक क्षमतेची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”, असं संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटलं आहे.


संयुक्त राष्ट्रसंघाच्या या निर्णयानंतर गांजा किंवा भांगपासून बनलेल्या औषधांचा वापर वाढू शकतो. याशिवाय गांजाच्या साइंटिफिक रिसर्चसाठीही चालना मिळू शकते. या निर्णयानंतर अनेक देश गांजा किंवा भांगच्या वापराबाबतच्या आपल्या पॉलिसीमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गांजाचे तोटे आणि त्याच्या वैद्यकिय फायद्यांबाबत मोठी चर्चा सुरू आहे. सध्या ५० पेक्षा जास्त देशांनी गांजाचं वैद्यकीय महत्त्व समजून घेत गांजाला वैध ठरवलं आहे. कॅनडा, उरूग्वे आणि अमेरिकेच्या १५ राज्यांमध्ये वैद्यकीय वापरासाठी गांजाला परवानगी देण्यात आली आहे.

देशातील दहा उत्कृष्ट पोलीस ठाण्यांमध्ये राज्यातील सर्वच अपात्र



केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने निवड करण्यात आलेल्या देशातील दहा उत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश झालेला  नाही.


केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने दरवर्षी देशातील दहा पोलीस ठाण्यांना उत्कृष्ट पोलीस ठाण्याचा पुरस्कार दिला जातो. २०२० मधील दहा पोलीस ठाण्यांची यादी गुरुवारी गृहमंत्रालयाने जाहीर केली. मणिपूरमधील थोंबूल जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्याला पहिला पुरस्कार मिळाला. दुसरा क्रमांक तमिळनाडूतील सालेम शहर तर तिसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशमधील चँगलँग जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्याला मिळाला.


महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या दादरा नगर- हवेली खानवेल पोलीस ठाण्याचा दहा जणांच्या यादीत समावेश आहे.


गोवा, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार, सिक्कीम, उत्तर प्रदेश, तेलंगणा या राज्यांमधील पोलीस ठाण्यांचा दहा जणांच्या यादीत समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश झालेला नाही. 

देशात लस काही आठवडय़ांत



नवी दिल्ली : करोना प्रतिबंधक लशीसाठी फार काळ थांबावे लागणार नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत असल्याने पुढील काही आठवडय़ांत लस उपलब्ध होऊ शकेल. तज्ज्ञांनी हिरवा कंदील दिल्यानंतर लगेच लसीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत दिली.


लसीकरणाचे प्राधान्यक्रमही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक आदी करोनायोद्धे, तर पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा, सफाई कामगार हे आघाडीचे योद्धे, गंभीर व्याधिग्रस्त व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. या प्राधान्यक्रमाची यादी राज्यांकडून मागवली जात आहे. राज्यांच्या सूचनेनुसार लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाणार असल्याची ग्वाही मोदी यांनी दिली.


शारीरिक अंतर नियम, मुखपट्टीचा वापर हे करोना प्रतिबंधक नियम कोणत्याही परिस्थितीत पाळले गेले पाहिजेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. 

अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड यशस्वी.



आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड प्रथमच यशस्वी झाली असून त्यामुळे अवकाशवीरांना आता ताज्या मुळ्यांचा आस्वाद घेता येणार आहे.


महिला अवकाशवीर केट रुबीन्स यांनी लागवड केलेल्या बियाण्यांना कोंब फुटून नंतर त्याचे रोप झाले व 30 नोव्हेंबरला मुळे तयार झाले आहेत.


ऐतिहासिक अशी ही घटना मानली जात असून अवकाशस्थानकातील वनस्पती उद्यानात सूक्ष्म गुरुत्वाला मुळ्याची लागवड करण्यात आली होती.


वनस्पती अवकाशात वाढवणे कठीण असते, त्यामुळे एका विशिष्ट कक्षात त्याची लागवड करून त्यावर एलइडीचा प्रकाश सोडला होता. त्याला नियंत्रित पद्धतीने पाणी, पोषके व खते तसेच ऑक्सिजन देण्यात आला.


मुळ्याचे रोप परिपक्व होण्यास केवळ 27 दिवस लागतात त्यामुळे मुळ्याची लागवडीसाठी निवड केली आली होती. ते मुळे 2021 मध्ये पृथ्वीवर आणले जाणार आहेत.


तसेच आतापर्यंत अवकाश स्थानकात कोबी, मोहरी, झिनिया पुष्प वनस्पती, आणि एका रशियन वनस्पतीची लागवड यशस्वी झाली आहे.


अवकाशवीरांना ताजे अन्न मिळावे व तेथे वनस्पतींची वाढ कशी होते याचा अभ्यास करणे या हेतूने प्रयोग केले जात आहेत.

पूर्व हिंद महासागर प्रदेशात रशिया आणि भारत यांच्या नौदलांचा पॅसेज एक्झरसाइज (PASSEX)



भारतीय नौदलाने 4 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत पूर्व हिंद महासागर क्षेत्रात रशियाच्या नौदलासोबत ‘पॅसेज एक्झरसाइज (PASSEX)’ नामक सराव केला.


ठळक बाबी


या सरावात RuFN मार्गदर्शित क्षेपणास्त्र जहाज ‘वर्याग’, मोठे पाणबुडी-भेदी जहाज ‘अॅडमिरल पॅन्टेलेयेव’ आणि मध्यम ओशन टँकर ‘पेचेंग’ या जहाजांचा समावेश होता. 


भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व हेलिकॉप्टरसह स्वदेशी बनावटीची मार्गदर्शक क्षेपणास्त्र फ्रिगेट ‘शिवालिक’ आणि ‘कदमत’ हे पाणबुडीरोधी जहाजाने केले.

या सरावाचा उद्देश आंतरपरिचालन वाढवणे, सामंजस्य सुधारणे आणि मैत्रीपूर्ण नौदलांमधील उत्कृष्ट पद्धती आत्मसात करणे हा असून उन्नत पृष्ठभाग आणि पाणबुडीविरोधी युद्ध कवायती, शस्त्रास्त्र गोळीबार, सीमॅनशिप कवायती आणि हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे.


परस्परांच्या बंदरांना भेटीदरम्यान किंवा समुद्रातल्या भेटीच्या वेळी परदेशी मित्रदेशांमधल्या नौदलासोबत भारतीय नौदल नियमितपणे PASSEXचे आयोजन करीत आहे. 


पूर्व हिंद महासागर प्रदेशात आयोजित केला जाणारा हा सराव दोन्ही देशांमधले दीर्घकालीन सामरिक संबंध आणि विशेषत: सागरी क्षेत्रातले संरक्षण सहकार्य प्रतिबिंबित करतो.


रशिया देश


रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातला एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातला सर्वात मोठा देश आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी आहे. रूबल हे रशियाचे राष्ट्रीय चलन आहे. 

भारतातही लसवापरासाठी ‘फायझर’चा अर्ज



‘फायझर’ची करोनाप्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी कंपनीने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. 


ब्रिटनने या लशीला आधीच परवानगी दिली असून एखाद्या देशात परवानगी मिळालेली करोनावरची ती पहिली लस ठरली  आहे.


आता भारताने या लशीला परवानगी दिली तर ती येथेही उपलब्ध होईल, पण आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या लशीची गरज नसल्याचे प्रतिपादन यापूर्वी केले आहे.


तर आपल्याकडे 2—3 लशींची निर्मिती होत असताना या महागडय़ा लशीची खरेदी करण्यात स्वारस्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. ही लस साठवण्यासाठी उणे 70 अंश तापमान लागते.


ब्रिटनमध्ये मंगळवारपासून फायझर लशीच्या मदतीने कोविड 19 लसीकरण सुरू करण्यात येणार  आहे.


बहारिननेही या लशीला मान्यता दिली असून फायझरने भारतातही ही लस निर्यात करता यावी यासाठी औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे.


नवीन औषधे व वैद्यकीय चाचण्या नियम 2019  मधील विशेष तरतुदीखाली फायझर कंपनीने परवानगीसाठी अर्ज केला आहे.

लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा यांचे निधन



गुप्तवार्ता विभागाचे माजी प्रमुख आणि लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा यांचे चेन्नईतील रुग्णालयात फुफ्फुसाच्या विकाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.


दिनेश्वर शर्मा यांच्याविषयी 

ते केरळ केडरचे 1976 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. 


1994 ते 1996 दरम्यान ते काश्मीरमध्ये आयबीचे सहाय्यक संचालक होते आणि त्यानंतर ते राष्ट्रीय राजधानीतील ब्युरोच्या काश्मीर डेस्कवर सेवारत होते. 


डिसेंबर 2014 मध्ये त्यांना दोन वर्षांसाठी आयबीचे संचालक म्हणून नियुक्त केले होते. 


जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करण्यासाठी शर्मा यांची 2017 मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 


ऑक्टोबर 2019 मधे शर्मा यांची लक्षद्वीपचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 

व्हाइट हाउस सोडण्यास डोनाल्ड ट्रम्प तयार, पण ठेवली ‘ही’ अट



अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर व्हाइट हाउस सोडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, यासाठी त्यांनी एक अट ठेवलीये. जर इलेक्टोरल कॉलेजकडून जो बायडन यांना अधिकृतपणे विजेता म्हणून घोषित करण्यात आलं तर मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे, असं महत्त्वाचं विधान ट्रम्प यांनी केलं आहे.


निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी पहिल्यांदाच माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांनी , जर इलेक्टोरल कॉलेजनी जो बायडन यांना निवडणुकीचा विजेता ठरवलं तर मी निश्चितपणे व्हाईट हाऊस सोडेन असं म्हटलं. या निवडणुकीत घोटाळा झालाय. हा एक उच्च स्तरीय घोटाळा आहे, असा पुनरुच्चार ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला. तसंच, जर इलेक्टोरल कॉलेजनी जो बायडन यांना विजेता म्हणून घोषित केलं तर ती त्यांची मोठी चूक ठरेल असंही ट्रम्प म्हणाले.


डोनाल्ड ट्रम्प यांचा अलिकडेच झालेल्या निवडणुकीत पराभव झाला आहे. पण, डोनाल्ड ट्रम्प आपला हा पराभव मान्य करायला तयार नव्हते. निवडणुकीत आपला पराभव होतोय, हे लक्षात येताच त्यांनी कांगावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता व्हाइट हाउस सोडण्याबाबत ट्रम्प यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.


दरम्यान, इलेक्टोरल कॉलेज मतांवर अखेरचा निर्णय घेण्यासाठी पुढील महिन्यात बैठक घेणार आहे. 14 डिसेंबर रोजी अमेरिकी इलेक्टोरल कॉलेज बायडन यांच्या विजयाची घोषणा करण्याची शक्यता असून त्यानंतर 20 जानेवारी रोजी जो बायडन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील अशी माहिती आहे. 

‘जलीकट्टू’ चित्रपट: 93व्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत भारताकडून नामांकन



“जलीकट्टू” या मल्याळम चित्रपटाला आगामी 93व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन प्राप्त झाले. यासह 25 एप्रिल 2021 रोजी लॉस एंजेलिस (अमेरिका) येथे पार पडणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात भारताने अधिकृत प्रवेश केला आहे.


🌸ठळक बाबी


हा चित्रपट परदेशी भाषा चित्रपट या विभागात भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.


फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 14 सदस्यांच्या समितीने ‘जलीकट्टू’ चित्रपटाची निवड केली.“जलीकट्टू” चित्रपटाचे दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरी हे आहेत.


‘जलीकट्टू’ हा चित्रपट केरळच्या पारंपरिक खेळावर आधारित आहे. या खेळाच्या नियमांनुसार बैलाला ठार मारण्यापूर्वी गर्दीत सोडले जाते.

ऑस्कर पुरस्काराविषयी


"ऑस्कर पुरस्कार" या नावाने ओळखला जाणारा अकादमी पुरस्कार हा अमेरिकेतल्या चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा आणि चित्रपटांचा सन्मान करण्यासाठी ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ (AMPAS) तर्फे 24 कलात्मक आणि तांत्रिक पुरस्कार श्रेणींमध्ये दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. पुरस्काराच्या स्वरुपात विजेत्याला पुतळ्याचे सन्मानचिन्ह (अकॅडेमी अवॉर्ड ऑफ मेरिट) दिले जाते.


दिनांक 11 मे 1927 रोजी ‘अकॅडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ या संस्थेची स्थापना झाली. प्रथम पुरस्कार सोहळा 1929 साली आयोजित केला गेला होता.

देश मंदीच्या छायेत, सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपी मायनसमध्ये.



करोनाचं संकट, लॉकडाउन या सगळ्यामुळे आपला देश मंदीच्या छायेत आहे हे स्पष्ट होताना दिसतं आहे. कारण सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये उणे ७.५ टक्के इतका नोंदवला गेला. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर उमे २३.९ टक्के इतका नोंदवला गेला झाली होती. आता जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी उणे ७.५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सरकारने ही आकडेवारी प्रसिद्ध केली. मागील चाळीस वर्षात पहिल्यांदा जीडीपीमध्ये इतकी घसरण झाली आहे.


पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये ऐतिहासिक अशी उणे २३.९ टक्के घसरण झाली आहे. तर आता दुसऱ्या तिमाहीत उणे ७.५ टक्के घसरण झाली आहे. या आकडेवारीमुळे देश आर्थिक मंदीच्या छायेत आहेत हे स्पष्ट होतं आहे. दोन तिमाहीमध्ये जीडीपी म्हणजेच विकासदर हा उणे राहिला तर तांत्रिकदृष्ट्या अर्थव्यवस्था मंदीत असल्याचं म्हटलं जातं.


बांधकामासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात ५० टक्के तर उत्पादन क्षेत्रात ४० टक्के घसरण झाी आहे. ही दोन क्षेत्र भारतात सर्वाधिक रोजगार निर्मिती करतात.कोणत्याही अर्थव्यवस्थेची वाढ होण्यासाठी वस्तूंना असलेल्या मागणीचा आणि खरेदीचा मोठा वाटा असतो. या काळात ६० टक्के घसरण झाली कमी झालेलं उत्पन्न, अनेकांचे रोजगार गेल्याने वाढलेलं बेरोजगारीचं प्रमाण यामुळे लोकांनी खर्च कमी केले आणि उद्योगांनी गुंतवणुकीचं प्रमाण कमी झालं. करोनाच्या जागतिक संकटामुळे अनेक लहान उद्योग कोलमडून पडले त्याचाही परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. 

इडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडून ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ सादर


◾️इडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) यांनी त्याच्या मंचावर ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी PNB मेटलाइफ इंडिया विमा कंपनी सोबत करार केला.


◾️विशेषत: भारतातल्या बँकिंग व्यवस्था उपलब्ध नसलेल्या तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना विमा संरक्षण आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने हा करार झाला आहे.


🔷परधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे स्वरूप...


◾️परधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नावनोंदणी करण्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 50 वर्ष आहे.


◾️विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्याकडून नामनिर्देशित व्यक्तीला 2 लक्ष रुपयांपर्यंत विम्याची रक्कम दिली जाते. योजनेच्या अंतर्गत विमा हस्तांतरित केला जाऊ शकत नाही तसेच अवधी संपल्यानंतर कोणताही लाभ दिला जात नाही.

ग्राहकाच्या बचत खात्यातून दरवर्षी हप्ता वजा केला जातो.


🔷इडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) विषयी


◾️इडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) भारत सरकारच्या 100 टक्के मालकीची देयक बँक आहे. त्याची स्थापना दळणवळण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या टपाल कार्यालयाच्या अंतर्गत करण्यात आली. IPPB प्रायोगिक प्रकल्प म्हणून 30 जानेवारी 2017 रोजी रांची (झारखंड) आणि रायपूर (छत्तीसगड) येथे कार्यरत करण्यात आले होते. त्याचे व्यवस्थापन भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) करते.

चीनच्या आणखी 42 उपयोजनांवर बंदी.



चीनच्या 42 मोबाइल उपयोजनांवर इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातली असून त्यात अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वुई डेट यांचा समावेश आहे. भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षा व सार्वजनिक व्यवस्था यांना या उपयोजनांमुळे धोका असल्याचे सांगण्यात आले.तर मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने दिलेल्या अहवालाच्या आधारे या उपयोजनांवर बंदी घालण्यात येत आहे.


तसेच 29 जुलै रोजी सरकारने चीनच्या 59 उपयोजनांवर बंदी घातली होती त्यात टिक टॉक, युसी ब्राउजर यांचा समावेश होता. त्यानंतर 2 सप्टेंबरला 118 उपयोजनांवर बंदी घालण्यात आली त्यात पबजी नॉर्डिक मॅप,लिव्हिक, पबजी मोबाइल लाइट, वुई चॅट वर्क, बायडू, टेनसेंटर वेयुन यांचा समावेश होता. त्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 69 ए अन्वये बंदी घालण्यात आली.

मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार



महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला. इतर पुरस्कारांमध्ये पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार तांदलवाडी जि. जळगाव येथील उदय सुभाष चौधरी यांना तर पक्षी संशोधन पुरस्कार डॉ. अमोल सुरेश रावणकर, अचलपूर व किरण मोरे, अमरावतीयांना विभागून देण्यात आला आहे. पक्षी जनजागृती पुरस्कार नाशिक येथील सतीश गोगटे यांना जाहीर करण्यात आला आहे.


महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली.


सोलापूरमध्ये होणार पुरस्कार वितरण - यंदाच्या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे. यावर्षी ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे २०२१ मध्ये आहे. या पुरस्कारांचे वितरण या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले जाणार आहे.

10 उपग्रहांसोबत ISROच्या ‘PSLV-C49’ प्रक्षेपकाचे यशस्वी प्रक्षेपण.



भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) 7 नोव्हेंबर 2020 रोजी त्याचा ‘EOS-01’ ('अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट') याचे यशस्वी प्रक्षेपण केले. उपग्रह PSLV-C49 या प्रक्षेपकाच्या मदतीने पृथ्वीच्या कक्षेत ठेवण्यात आला.


या मोहिमेत अमेरिका आणि लक्जमबर्गचे प्रत्येकी चार आणि लिथुआनियाच्या एका उपग्रहासह नऊ उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात आले.


आंध्रप्रदेशातल्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. ही यावर्षीची पहिली अंतराळ मोहीम आहे.


▪️EOS-01 ची वैशिष्ट्ये


‘EOS-01’ हा रेडार इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करणारा एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. त्यामध्ये सिंथेटिक अॅपर्चर रडार (SAR) प्रस्थापित करण्यात आले आहे, जे कुठल्याही वेळी आणि कोणत्याही प्रकारच्या हवामानात पृथ्वीची स्पष्ट छायाचित्रे घेऊ शकते. या उपग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याद्वारे ढगांच्या आड असतानाही पृथ्वीवर लक्ष ठेवून स्पष्ट चित्र टिपले जाऊ शकते.

Online Test Series

०५ डिसेंबर २०२०

Online Test Series

अक्साई चीनला दाखवलं चीनचा भाग, भारत सरकारचा विकिपीडियाला नकाशा हटवण्याचा आदेश


🔶ऑनलाइन एनसायक्लोपीडिया विकिपीडियाच्या साईटवरील नकाशामध्ये अक्साई चीनला चीनमध्ये दाखवण्यात आले आहे. भारत सरकारने यावर आक्षेप घेतला आहे. सरकारने विकिपीडियाला तो नकाशा हटवण्यास सांगितले आहे. सरकारने विकिपीडियाला पाठवलेल्या पत्रामध्ये अत्यंत कठोर शब्दांचा वापर केला आहे.


🔶 इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत विकिपीडियाला तो नकाशा हटवण्याचे निर्देश दिले आहेत. भारत-भूतान संबंधावरील विकिपीडियाच्या पानावर जम्मू-काश्मीरचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. एका टि्वटर युझरने विकिपीडियाच्या या चुकीकडे लक्ष वेधले. त्याने सरकारकडे कारवाई करण्याचीही विनंती केली.


🔶 या तक्रारीची दखल घेत मंत्रालयाने २७ नोव्हेंबरला विकिपीडियासाठी आदेश जारी केला. विकिपीडियाच्या साईटवरील चुकीचा नकाशा म्हणजे भारताच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. त्यामुळे तो नकाशा हटवण्यात यावा असे या आदेशात म्हटले होते. विकिपीडियाने ऐकले नाही, तर भारत सरकार कायदेशीर कारवाई करु शकते असे सूत्रांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेचा ‘जागतिक मलेरिया अहवाल 2020’

🔶 गणिती मांडणीवर आधारित आणि जगभरातील मलेरिया आजाराच्या रुग्ण संख्येचे अंदाज वर्तवणाऱ्या ‘जागतिक मलेरिया अहवाल (WMR) 2020’ जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) प्रसिद्ध केला आहे.


⭕️ ठळक बाबी


🔶 मलेरियाचा प्रसार असणाऱ्या देशांपैकी भारत हा एकमेव असा देश आहे जिथे 2018 सालाच्या तुलनेत 2019 साली प्रकरणांमध्ये 17.6 टक्के घट झाली.


🔶भारताने मलेरियाचा धोका कमी करण्यात सातत्यपूर्ण यश मिळवले आहे. वार्षिक परजीवी घटनांमध्ये (API) 2017 सालाच्या तुलनेत 2018 साली 27.6 टक्के घट आणि 2019 साली 18.4 टक्के घट झाली.


🔶प्रादेशिक स्तरावरील संख्येनुसारही भारतामध्ये या आजाराची रुग्णसंख्या 20 दशलक्ष ते 6 दशलक्ष अशी लक्षणीय रित्या कमी झाली आहे. मलेरिया रुग्ण संख्येचा टक्का वर्ष 2000 ते वर्ष 2019 पर्यंतच्या काळात 71.8 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तर आजाराने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही 73.9 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.


🔶मलेरियात दगावण्याच्या प्रमाणात 92 टक्के घट झाली आहे. परिणामी ‘मिलेनियम विकास ध्येये’ मधले सहावे ध्येय (वर्ष 2000 ते वर्ष 2019 या काळात रुग्णसंख्येत 50-75 टक्के घट) साध्य करण्यात यश आले आहे.


🔶मलेरियाच्या उच्चाटनाचे प्रयत्न देशात 2015 सालापासून सुरू झाले आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2016 साली मलेरिया उच्चाटनासाठी  राष्ट्रीय नियमावली (NFME) प्रत्यक्षात आणल्यानंतर त्यांना वेग आला.  


🔶मंत्रालयाने जुलै 2017 मध्ये मलेरिया उच्चाटनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना (2017-22) प्रसिद्ध केली, ज्यामध्ये पुढील पाच वर्षांसाठीच्या धोरणाची मांडणी केली आहे.


🔶ओडीशा, छत्तीसगड, झारखंड, मेघालय आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये 45.47 टक्के मलेरिया आजाराचे रुग्ण आहेत (भारताच्या 3,38,494 या एकूण रुग्णसंख्येपैकी 1,53,909 रुग्णसंख्या), तर 2019 साली फाल्सिफेरम मलेरियाचे 70.54 टक्के रुग्ण (भारताच्या 1,56,940 या एकूण रुग्णसंख्येपैकी 1,10,708 रुग्णसंख्या) आहेत.


🔶WHO ने भारतासह 11 देशांमध्ये उच्च धोका उच्च परिणाम म्हणजेच HBHI (High Burden High Impact) प्रदेश निर्धारित केले होते. HBHI कार्यक्रमाची सुरूवात पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगढ़ आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये जुलै 2019 पासून झाली. परिणामी गेल्या दोन वर्षात रुग्णसंख्येत 18 टक्के तर मृत्यूसंख्येत 20 टक्के घट दिसून आली.


🔶मलेरियाचे प्रमाण 31 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात लक्षणीय आहे (आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगढ, गोवा, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मिर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश मणीपूर, मिझोरम, नागालँड, ओडीशा, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, चंदीगड, दमण व दीव, दादरा नगरहवेली आणि लक्षद्वीप). या राज्यांमध्ये मलेरियाचे प्रमाण कमी होताना आढळते आहे.

सात जिल्ह्यातील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा; ठाकरे सरकारचा निर्णय



लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येणार नियुक्त्या


बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा सात जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.



थोरात म्हणाले, सात जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे सामान्य प्रशासन विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायास अनुसरुन सात जिल्ह्यातील सन २०१९ तलाठी पदभरतीतील एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत मान्यता मिळाली आहे. 


सन २०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यापूर्वी राज्यातील २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 


१) यामध्ये कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे.

२) अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ हे जिल्हे.

३) नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे. 

४) औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे.

५) नाशिक विभागातील जळगाव, नाशिक हे जिल्हे. 

६) पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली होती. 


तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर निर्बंध घातले होते.

ब्रह्मपुत्रा’वर चीन बांधणार महाकाय धरण; ईशान्य भारतात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती


🔰दक्षिण आशिया खास करुन भारताला लागून असलेल्या सिमेवर चीन मोठ्या जोमाने विकासकामं हाती घेताना दिसत आहे. आता चीनने लवकरच तिबेटमधून उगम पावणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवर म्हणजेच यारलुंग जांगबो नदीवर भारतीय सिमेजवळ मोठं धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हे धरण जगातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असणार आहे.


🔰सध्या जगातील सर्वात मोठं धरण असणाऱ्या थ्री जॉर्जच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या विजेच्या तीनपट अधिक जलविद्युत निर्मिती या धरणाचा माध्यमातून होणार आहे. या प्रकल्पामुळे ईशान्य भारतातील राज्यांबरोबरच बांगलादेशमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण करण्याचे समार्थ्य चीनला मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


🔰चीनमधील सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार हे धरण तिबेटमधील मेडोग काउंटीमध्ये उभारण्यात येणार आहे. हा प्रदेश भारताच्या अरुणाचल प्रदेशपासूनच खूपच जवळ आहे. चीनने यापूर्वीही ब्रह्मपुत्रा नदीवर अनेक लहान आकाराची धरणं बांधली आहेत. मात्र सध्या चीन विचार करत असणारे धरण खरोखरच महाकाय असणार आहे. जगातील सर्वाधिक जलविद्युत निर्मिती करणाऱ्या धरणांमध्ये या धरणाचा समावेश असेल. तिबेटमधून उगम पावणारी ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेश राज्याच्या सीमेतून भारतामध्ये प्रवेश करते.


🔰अरुणाचल प्रदेशमध्ये या नदीला सियांग या नावाने ओळखलं जातं. अरुणाचलमधून ही नदी आसाममध्ये प्रवेश करते जिथून तिला ब्रह्मपुत्रा या नावानं ओळखलं जातं. आसाममधून ही नदी बांगलादेशच्या हद्दीत प्रवेश करते. ब्रह्मपुत्रा नदी ही ईशान्य भारतातील राज्यांबरोबर बांगलादेशमधील प्रमुख नदी आहे. लाखो लोकांची उपजिविका या नदीवर अवलंबून आहे.

युपीनंतर आता मध्य प्रदेश सरकार आणणार ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा

🔶उत्तर प्रदेशनंतर आता मध्य प्रदेश सरकारही जबरदस्तीनं धर्मांतरविरोधी (लव्ह जिहाद) कायदा आणणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याची घोषणा केली. उत्तर प्रदेशमध्ये नुकताच हा अध्यादेश लागू झाला असून त्याअंतर्गत एक अटकही झाली आहे.


🔶उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लग्नाच्या आमिषानं होणारं धर्मांतर रोखण्यासाठी अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाला दोनच दिवसांपूर्वी राज्यपाल अनंदीबेन पटेल यांनी मान्यता दिली. त्यांच्या मान्यतेनंतर हा अध्यादेश राज्यात लागू झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका मुस्लिम तरुणाला हिंदू विद्यार्थीनीचं लग्नासाठी धर्मांतर घडवून आणण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. अशा कायद्यांतर्गत ही देशातील पहिलीच अटक ठरली.


🔶तयानंतर आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील अशा कायद्यावर विचार सुरु असल्याचं म्हटलं आहे.


🔶यावरुन भाजपाशासित राज्यांनी अशा कायद्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसते. लग्नासाठी धर्मांतर घडवून आणण्याच्या प्रकाराला भाजपाने ‘लव्ह जिहाद’ असं म्हटलं आहे. हा प्रकार गुन्हेगारी स्वरुपाचा असून तो ऱोखायला हवा, या विचारातून भाजपाशासित राज्यांमध्ये याविरोधात कायदे तयार होत आहेत.

भारतातील पहिली सीप्लेन सेवा तात्पुरती बंद; ‘हे’ आहे कारण.

🔶पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर २०२० रोजी देशातील पहिल्या सीप्लेन सेवेचे उद्घाटन करण्यात आलं. केवडियामध्ये त्यांनी सीप्लेन सेवेसाठी वॉटर एरोडोमचं लोकार्पण केलं. सरदार सरोवर धरणाजवळच्या तळे क्रमांक ३ येथे या सेवेचे उद्घाटन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्ताने करण्यात आलं होतं. सरदार सरोवराजवळची सीप्लेन सेवा स्पाइस जेटची ‘स्पाइस शटल’ ही कंपनी चालवत आहे. परंतु सध्या काही कारणास्तव ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे.


🔶“मालदीवरून विमान परतल्यानंतर सीप्लेन सेवा पुन्हा १५ डिसेंबरपासून पुन्हा सुरू केली जाणार आहे. दरम्यान, याबाबत यापूर्वीपासूनच ठरवण्यात आलं होतं. त्यामुळेच २७ नोव्हेंबर नंतर कोणत्याही प्रकारचं बुकींग घेण्यात आलं नव्हतं,” अशी माहिती स्पाईस जेटच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.


🔶आतापर्यंत ८०० प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. दररोज दोन सीप्लेन उड्डाणांचं संचालन करण्यात येतं. या योजनेअंतर्गत एका मार्गाचं भाडं १ हजार ५०० रूपयांपासून सुरू होतं. तसंच ३० ऑक्टोबर २०२० पासून या सेवेसाठी बुकींग सुरू करण्यात आलं होतं. एका मार्गाचा प्रवास हा ३० मिनिटांचा आहे. स्पाईस जेटनं यासाठी मालदीवकडून एक सीप्लेन विकत घेतलं आहे. यामध्ये एकावेळी १२ प्रवासी प्रवास करू शकतात.

लक्ष्मी विलास बँकेचं डीबीएस बँकेत विलीनीकरण.



🔰 लक्ष्मी विलास बँकेचं डीबीएस बँकेत विलीनीकरण  करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.


🔰कद्राच्या या निर्णयामुळे लक्ष्मी विलास बँकेच्या सुमारे 20 लाख खातेदारांना आणि चार हजार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे.


🔰लक्ष्मी विलास बँक आर्थिक संकटात सापडल्याने आरबीआयने या बँकेवर निर्बंध लादले आहेत. 16 डिसेंबरपर्यंत म्हणजेच पुढील 30 दिवस हे निर्बंध  लादण्यात आले आहेत.


🔰तर या कारवाईमुळे लक्ष्मी विलास बँकेच्या खातेदरांना महिनाभरासाठी फक्त 25 हजारांची रोख रक्कम काढता येणार आहे. 17 नोव्हेंबरपासून हे निर्बंध लादण्यात आले आहेत.


🔰आता या बँकेचं डीबीएस बँकेत विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने या संदर्भातला प्रस्ताव दिला होता जो मंजूर करण्यात आला आहे.

डेली का डोज


1. किस न्यायालय ने केंद्रीय जांच एजेंसियों के सभी पुलिस स्टेशनों और कार्यालयों में अनिवार्य तौर पर CCTV कैमरे लगाने का निर्देश दिया है?

a. दिल्ली HC

b. मद्रास HC

c. इलाहाबाद HC

d. सुप्रीम कोर्ट✔️


2. भारत के किस प्रतिष्ठित मसाला ब्रांड के मालिक का 3 दिसंबर, 2020 को निधन हो गया?

a. एवरेस्ट

b. MDH✔️

c. MTR

d. कैच 


3. किस राज्य की कैबिनेट ने जाति-आधारित नामों वाली सभी आवासीय कॉलोनियों का नाम बदलने के प्रस्ताव को मंजूरी दी है?

a. कर्नाटक

b. उत्तर प्रदेश

c. महाराष्ट्र✔️

d. बिहार


4. किस राज्य ने सरकारी योजनाओं के वितरण के लिए "द्वारे सरकार" कार्यक्रम शुरू किया है?

a. असम

b. पश्चिम बंगाल✔️

c. बिहार

d. झारखंड


5. किस देश ने अगले 10 वर्षों के लिए बौद्धिक संपदा परीक्षा और संरक्षण पर सहयोग के लिए भारत के साथ एक समझौते पर हस्ताक्षर किए हैं?

a. अमेरिका✔️

b. फ्रांस

c. रूस

d. जर्मनी


6. भारत के किस राज्य की विधानसभा ने अपने राज्य में ऑनलाइन गेमिंग पर प्रतिबंध लगाने वाला विधेयक पारित किया है?

a. तमिलनाडु

b. आंध्र प्रदेश✔️

c. तेलंगाना

d. महाराष्ट्र


7. भारत ने 2 दिसंबर, 2020 को संयुक्त आयोग की 7वीं बैठक किस देश के साथ आयोजित की थी?

a. तंजानिया

b. जॉर्जिया

c. आर्मेनिया

d. सूरीनाम✔️


8. आंध्र प्रदेश राज्य का एक्वाकल्चर सेक्टर इस राज्य की अर्थव्यवस्था में लगभग कितने करोड़ रुपये का वार्षिक योगदान देता है.

a. लगभग 40,630 करोड़ रुपये

b. लगभग 60,680 करोड़ रुपये

c. लगभग 50,660 करोड़ रुपये✔️

d. लगभग 45,353 करोड़ रुपये


डेली का डोज



1. भारत ने किस तारीख़ तक अनुसूचित अंतर्राष्ट्रीय वाणिज्यिक यात्री उड़ानों पर प्रतिबंध बढ़ा दिया है?

a. 31 दिसंबर✔️

b. 1 जनवरी

c. 25 दिसंबर

d. 24 दिसंबर


2. भारतीय IT उद्योग के जनक के रूप में किसे जाना जाता था?

a. अजीम प्रेमजी

b. FC कोहली✔️

c. मुकेश अंबानी

d. रतन टाटा


3. फ़कीर चंद कोहली का 26 नवंबर, 2020 को दिल का दौरा पड़ने से निधन हो गया. उन्होंने किस वैश्विक IT कंपनी की स्थापना का नेतृत्व किया था?

a. इंफोसिस

b. विप्रो

c. HCL

d. TCS✔️


4. इनमें से कौन-सा देश वर्ष, 2020 के लिए फीफा की फाइनल रैंकिंग लिस्ट में सबसे ऊपर है?

a. इंग्लैंड

b. फ्रांस

c. ब्राजील

d. बेल्जियम✔️


5. इनमें से कौन-सा देश वर्ष, 2020 के लिए फीफा रैंकिंग के शीर्ष 10 देशों में अपनी जगह बनाने में असफल रहा?

a. स्पेन

b. अर्जेंटीना

c. जर्मनी✔️

d. इटली


6. भारत के विदेश मंत्री डॉ. एस. जयशंकर इस समय तीन देशों की यात्रा पर हैं. निम्नलिखित में से कौन-सा देश उनकी इस विदेशी यात्रा का हिस्सा नहीं है?

a. सऊदी अरब✔️

b. बहरीन

c. सेशेल्स

d. संयुक्त अरब अमीरात


7. ट्रांसजेंडर व्यक्तियों के लिए गरिमा गृह और नेशनल पोर्टल का उद्घाटन किसने किया?

a. पीयूष गोयल

b. नितिन गडकरी

c.अमित शाह

d. थावरचंद गहलोत✔️


8. राष्ट्रीय उच्च गति रेल निगम ने बुलेट ट्रेन परियोजना के लिए किस कंपनी के साथ देश के सबसे बड़े अनुबंध पर हस्ताक्षर किए हैं?

a. HAL

b. L&T✔️

c. रिलायंस इन्फ्रास्ट्रक्चर

d. अशोक लीलैंड


सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'


सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे. डिसले यांच्या रुपाने भारताला पहिल्यादाचं हा सन्मान मिळाला आहे.


युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी शाळेचे शिक्षक रंजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. तब्बल सात कोटी रक्कमेचा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरल्याने, त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारासोबतच त्यांना जगातील सर्वोत्तम शिक्षक असा बहुमान प्राप्त झाला आहे. पुरस्काराची रक्कम आपण विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करणार असल्याचे डिसले गुरुंजीनी मटाला सांगितले.

लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. डिसले यांची अंतिम दहा स्पर्धकांमध्ये निवड झाल्यावर, त्यांचे कौतुक थेट बॉलिवूडमधूनही करण्यात आले होते. क्युआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रतच नव्हे, तर देशातील शिक्षण क्षेत्रांत डिसले यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी डिसले यांनी निवड करण्यात आली आहे.असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे डिसले यांनी जाहीर केले आहे. त्या माध्यमातून ९ देशांतील शेकडो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ३० टक्के रक्कम डिसले ते टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार आहे. त्यामुळे देशातील शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे डिसले यांनी सांगितले.तर, उर्वरित २० टक्के रक्कम विविध देशातील विद्यार्थ्यांच्या 'पीस आर्मी'साठी वापरणार येणार असल्याचे डिसले यांनी सांगितले.

मी सोलापूर जिल्ह्यात असतांना, पुरस्कारांची घोषणा झाली. आपल्याला पुरस्कार जाहीर झाल्याचे कळाल्यावर खूप आनंद झाला आणि समाधान वाटले. या पुरस्कारासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी, वार्की फाउंडेशन आणि शालेय शिक्षण विभागाचे आभार मानतो. हा पुरस्कार मी राज्य व देशातील माझ्या शिक्षक बांधवांना समर्पित करतो. पुरस्काराची निम्मी रक्कम ९ शिक्षकांना त्यांच्या देशातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी देण्यात येईल. तर, शिक्षकांना टेक्नोसॅव्ही बनवण्यासाठी ३० टक्के रक्कम वापरण्यात येईल. उर्वरित रक्कमेतून २०३० पर्यत विविध देशातील ५० हजार विद्यार्थ्यांची पीस आर्मी तयार करण्यात येईल.

रणजितसिंह डिसले, ग्लोबल टीचर प्राइज विजेते


कोण आहे डिसले गुरुजी?

सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.

समुद्री चाचण्यांसाठी 'विक्रांत' सज्ज



● भारताची विक्रांत ही पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका समुद्री चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे.


● कोचीन बंदरातील तिच्या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, आता जानेवारीपासून तिच्या समुद्रातील चाचण्या सुरू होतील. 


● 'विक्रांत', 'विराट' या इंग्लिश बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका निवृत्त झाल्यावर भारतीय नौदलाचा भार आता 'विक्रमादित्य' ही रशियन बनावटीची विमानवाहू युद्धनौका वाहत आहे. 


● कोचीन नौदल गोदीत बनवली जात असलेली 'विक्रांत' ही सुमारे चाळीस हजार टनी पहिलीवहिली स्वदेशी युद्धनौका आता विक्रमादित्यच्या जोडीला येत आहे. 


अशी आहे युद्धनौका

- वजन : ४० हजार टन

- लांबी : २६२ मीटर किंवा ८६० फूट

- स्की जंप (विमानोड्डाणासाठीची विशेष चढण)सह तीस विमाने हेलिकॉप्टरचा समावेश शक्य 

- मिग २९ विमाने व कामोव्ह किंवा सी-किंग हेलिकॉप्टर राहू शकतात

- कामोव्ह हेलिकॉप्टर शत्रूच्या हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देईल

- सी-किंग हेलिकॉप्टर शत्रूच्या पाणबुड्यांना शोधून नष्ट करेल


महत्वाचे मुद्दे


● या विमानवाहू युद्धनौकेचे नाव ब्रिटनकडून खरेदी केलेल्या भारताच्या *पहिल्या विमानवाहू युद्धनौका  आयएनएस विक्रांत* च्या नावावरून ठेवण्यात आले आहे. *1997* मध्ये आयएनएस विक्रांतला नौदलाने आपल्या ताफ्यातून निवृत्त केले होते.


● सध्या, रशियाकडून घेण्यात आलेली  44,500 टन क्षमता असलेली *आयएनएस विक्रमादित्य* ही एकमेव विमानवाहू युद्धनौका भारताकडे आहे.


● आयएनएस विक्रमादित्यप्रमाणेच विक्रांतदेखील विमान प्रक्षेपित करण्यासाठी व उतरण्यासाठी करण्यासाठी *STOBAR* (Short Take-Off But Arrested Recovery) यंत्रणा वापरणार आहे.


● या युद्धनौकेची रचना आणि बांधणी पूर्णपणे भारतीय असून, या नौकेच्या बांधणीमुळे भारत अशी नौका तयार करण्याची शक्ती असणाऱ्या *अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स* या देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे.

३० नोव्हेंबर २०२०

भारतात विदेशी कोरोना लसीचं उत्पादन...


💫 भारतात सध्या ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीचं भारतात ट्रायल सुरू असून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियामार्फत या लशीचं भारतात उत्पादन घेतलं जातं आहे. 


✨ दरम्यान, आता भारतात आणखी एका विदेशी कोरोना लशीचं उत्पादन घेतलं जाणार आहे. रशियाच्या Sputnik V लशीचं भारतात उत्पादन घेतलं जाणार आहे.  


👉 RDIF आणि हैदराबादमधील हेट्रो फार्मा कंपनीचा करार झाला असून हेट्रो कंपनी भारतात वर्षाला 100 दशलक्षपेक्षा अधिक डोस तयार करणार असल्याची माहिती रशियानं दिली. 


📍 2021 पासून भारतात रशियन कोरोना लशीचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली जाणार आहे. डॉ. रेड्डीज कंपनीमार्फत या लशीचं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. 


📌 दरम्यान, या लशीला11 ऑगस्टला मंजुरी देण्यात आली असून यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला आहे.

जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताच्या GDP दरात 7.5 टक्क्यांची घट



🔰कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, 2020-21 या आर्थिक वर्षांच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) दरात 7.5 टक्क्यांची घट झाली.


🔰चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत GDP दरात 23.9 टक्क्यांची घट झाली होती. मागील तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात आकुंचन झाल्यानंतर लक्षणीय सुधारणा झाली आहे.


🔴सथूल देशांतर्गत उत्पादन (GDP) विषयी...


🔰उत्पादन, उत्पन्न आणि उत्पादन व्यय असे हे तीन प्रवाह राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहाची तीन स्वरूपे आहेत. यांपैकी कोणत्याही स्वरूपातले वर्ष किंवा इतर हव्या असलेल्या कालखंडातला एकूण प्रवाह म्हणजे त्या वर्षातले किंवा कालखंडातले ‘राष्ट्रीय उत्पन्न’ होय.


🔰एकूण राष्ट्रीय उत्पादन दोन घटकांचे बनलेले असते. त्यांपैकी पहिला व अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवाकर्मे, ज्याला ‘स्थूल देशांतर्गत उत्पादन’ (GDP) असे म्हणतात. ‘GDP’मधून भांडवली वस्तूंची झीज वजा केली म्हणजे ‘निव्वळ देशांतर्गत उत्पादन’ (NDP) मिळते. ‘एकूण राष्ट्रीय उत्पादन’चा दुसरा घटक म्हणजे देशातील रहिवाशांना त्यांच्या परदेशांतल्या मालमत्तेवर मिळणारे उत्पन्न वजा परदेशांतल्या रहिवाशांना देशातल्या त्यांच्या मालमत्तेवर मिळणारे उत्पन्न, ज्याला परदेशातून प्राप्त होणारे निव्वळ घटक उत्पन्न असे म्हणतात.


🔰राष्ट्रीय उत्पन्नाची जगातली पहिली परिगणना 1665 साली इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रज्ञ सर विल्यम पेटी यांनी केली.भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची पहिली परिगणना विख्यात नेते आणि अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नवरोजी यांनी 1876 साली 1867-68 या वर्षासाठी केली.

ओबीसींसाठी केंद्राचा निर्णय, सैनिक शाळांमध्ये २७ टक्के आरक्षण जाहीर



🔶 दशभरातील सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून (२०२१-२२) हे आरक्षण लागू होणार आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी सैनिक स्कूल सोसायटी देशभरातील ३३ निवासी शाळांचं कारभार पाहतं.


🔶यासंबंधीचा अधिकृत आदेश जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सैनिक शाळांमध्ये आता अनुसूचित जाती १५ टक्के, अनुसूचित जमाती सात टक्के, ओबीसी २७ टक्के, संरक्षण विभाग १३ टक्के आणि खुल्या प्रवर्गासाठी ३८ टक्के अशी विभागणी असणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. १३ ऑक्टोबर रोजीचं हे परिपत्रक देशभरातील सैनिक शाळांच्या प्राध्यापकांना पाठवण्यात आलं आहे.परिपत्रकातील माहितीनुसार, सैनिक शाळा ज्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात असते तेथील मुलांसाठी ६७ टक्के जागा राखीव असतात. उर्वरित ३३ टक्के जागा इतर राज्यांमधील मुलांसाठी असतात. A आणि B अशा पद्दतीनं या यादीची क्रमवारी केली जाते. आरक्षणाचा निर्णय दोन्ही याद्यांमध्ये लागू असणार आहे.

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी २०२१-२२ शैक्षणिक सत्रात सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा प्रस्ताव मान्य केला होता. टप्प्याटप्प्याने मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. मिझोराममधील सैनिक शाळेतील पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

२९ नोव्हेंबर २०२०

Online Test Series

पृथ्वी संबंधीची सविस्तर माहिती


पृथ्वीचा जन्म - 46000 अंदाजित कोटी वर्षापूर्वी


पृथ्वीचा आकार - जिऑइड


पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर - 14,88,00,000 कि.मी.


पृथ्वीचे क्षेत्रफळ - 5101 कोटी चौ.कि.मी.


पृथ्वीचे पाण्याचे क्षेत्रफळ - 3613(71%) कोटी चौ.कि.मी.


पृथ्वीचे जमीन क्षेत्रफळ - 1484(29%) कोटी चौ.कि.मी.


पृथ्वीची त्रिज्या - 6371 कि.मी.


पृथ्वीचा ध्रुवीय व्यास - 12714 कि.मी.


पृथ्वीचा विषवृत्तीय व्यास - 12,758 कि.मी.


पृथ्वीच्या विषवृत्तीय परिघाची लांबी - 40,077 कि.मी.


पृथ्वीच्या ध्रुवीय परिघाची लांबी - 40,009 कि.मी.


पृथ्वीच्या परिघाचे मापन करण्याचा पहिला प्रयत्न एरॅटोस्थेनिसने केला. 


🎯पृथ्वीला प्राप्त झालेल्या गती व त्याचे परिणाम :


पृथ्वी सूर्याभोवती तसेच स्वत:भोवती फिरते. यामुळे पृथ्वीला परिवलन आणि परीभ्रमण अशा दोन गती प्राप्त झालेल्या आहेत.

५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला.


◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे. 


◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे १०वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे. 


◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.


◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. 


◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.


◾️ तया सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे. 


‼️ पण २/३ पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.

केशवानंद भारती खटला


संपुर्ण नक्की वाचा... 


🔘 राज्यशास्त्र Imp घटक


🔸केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला. 


🔸घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते. 


🔸राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले. 


🔸ससदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे? 


🔸या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले. 


🔸गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की *घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.* 


🔸या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले. 


🔸या *खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन* केले गेले. 


🔸 सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की 

' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.


🔸ससदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.


🔸 सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्‍लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं. 


🔸या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं. 


🔸कशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्‍लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. *म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.*

आझाद हिंद सेना -



◾️  जयेष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी 1942 साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली.


◾️ नताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.


◾️  नताजींनी 1943 आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले.


◾️ आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.


◾️  18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली.


◾️ आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले.


◾️  लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.

पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती


पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.


उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्‍याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.


उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.


विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्‍या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.


अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.


रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्‍या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.


स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.

महणी व अर्थ


🔰 गाढवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य - निरुपयोगी माणसावर केलेले उपकार अनाठायी जातात


🔰 गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता - मुर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होत नाही


🔰 गाढवाला गुळाची चव काय - ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही, त्याला त्या गोष्टीचे महत्व कळू शकत नाही


🔰 गाव करी ते राव न करी - श्रीमंत माणूस पैशाच्या जोरावर जे करु शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या जोरावर करु शकतात


🔰 गाव तेथे उकीरडा - प्रत्येक समाजात काही वाईट माणसे असतातच


🔰 गरुची विद्या, गुरुलाच फळली - एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य


🔰 गळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी - गरिबीमुळे आपण काही करु शकत नसलो तरी गोड बोलणे शक्य असल्यास गोड तरी बोलावे


🔰 गळाचा गणपती, गुळाचाच नैवेद्य - एखाद्याची वस्तू घेऊन त्यालाच अर्पण करणे


🔰 गोगलगाय आणि पोटात पाय - बाह्यरुप एक आणि कृती दुसरीच


🔰 गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे - कोणत्याही कामात ताळमेळ नसणे


🔰 गोरा गोमटा आणि कपाळ करंटा - फक्त दिखावट चांगली आणि प्रत्यक्षात काहीच नसणे


🔰 गोष्ट लहान, सांगणं महान - क्षुल्लक गोष्टीचा उदो उदो करणे


🔰 गोष्टी गोष्टी आणि मेला कोष्टी - लांबलचक गोष्टी करत बसलो तर मूळ कामधंदा बाजूलाच राहतो व नुकसान होते


🔰 गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट - निर्लज्ज माणसाशी झगडल्यामुळे फायद्यापेक्षा हानीच अधिक होते


🔰 घटका पाणी पिते, घड्याळ टोले खाते - प्रत्येक माणसाला त्याच्या कर्मानुसार वेगवेगळे सुखदुःखादि भोग प्राप्त होतात


🔰 घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी - कधी खूप लाड करावे, प्रेम करावे आणि कधी शिव्या द्याव्यात


🔰 घर चंद्रमौळी पण बायकोला साडीचोळी - स्वतःच्या घरची गरिबी असूनही बायकोसाठी खूप खर्च करणे


🔰 घर ना दार, चावडी बिऱ्हाड -

बायको पोरे नसणारा

भारतातली जागतिक वारसा स्थळे


🍀 आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत,


 🍀 तयात 30 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 


🍀 7 नैसर्गिक ठिकाणे


 🍀 एक मिश्रित ठिकाण आहे.

 


             🎇 ♻️सांस्कृतिक♻️ 🎇


💐आग्रा किल्ला 🏰, आग्रा( उत्तरप्रदेश)


💐अजिंठा लेणी, महाराष्ट्र


💐 नालंदा विद्यापीठ 🏢 , बिहार


💐 बौद्ध स्मारक , सांची, मध्यप्रदेश (1989)



💐 चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात


💐 छत्रपती शिवाजी टर्मिनस

🚂🚃🚃, मुंबई, महाराष्ट्र


💐 गोव्याचे चर्च 🏥आणि कॉन्व्हेंट


💐 एलिफंटा लेणी/ 🗿 घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र


💐 वल्लोर/ 🗿वरूळ लेणी, महाराष्ट्र


💐 फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश


💐 चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू


💐 हंपीमधील मंदिरे, कर्नाटक


💐 महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू


💐 पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक


💐राजस्थानामधील 🏔पर्वतीय किल्ले


💐 अहमदाबाद 🛣ह ऐतिहासिक शहर


💐 हुमायूनची कबर, दिल्ली


💐 खजुराहो, मध्यप्रदेश


💐महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार


💐 भारतातली पर्वतीय रेल्वे🚂🚃 (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)


💐 कुतुब मिनार🕌, दिल्ली


💐 राणी की वाव🏟, पटना, गुजरात


💐 लाल किल्ला 🏰🗼, दिल्ली


💐 दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश


💐 कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा


💐 ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश


💐 ले कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड


💐 जंतर मंतर, जयपूर


💐 मबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत


       

         🎇♻️ नैसर्गिक ♻️🎇


💐 ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान 🦌🐕 , कुल्लू, हिमाचल प्रदेश


💐 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान🦏🦏, आसाम


💐 मानस राष्ट्रीय उद्यान 🐘 , आसाम


💐 केवलदेव राष्ट्रीय उद्यान 🦢🦌, राजस्थान


💐 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान 🐅🏝, पश्चिम बंगाल


💐 नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान🌻, उत्तराखंड


💐 पश्चिम घाट⛰⛰  (सह्याद्री पर्वतरांगा)



               🎇♻️   मिश्र  ♻️🎇


💐 खांगचेंडझोंगा 🐼 🐆राष्ट्रीय उद्यान, सिक्किम

“भारत हा गणराज्य किंवा प्रजासत्ताक ” (Republic) आहे याचा अर्थ.....



🔸गणराज्यात “राष्ट्रप्रमुख” हा लोंकामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडला जातो. तो वंशपरंपरागत नसतो.


🔸भारत हे गणराज्य आहे कारण, भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारे राष्ट्रपती (President) हे लोकांद्वारे ५ वर्षांच्या कालावधीसाठी अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. 


🔸राजकीय सार्वभौमत्व लोकांच्या हाती असून राजा किंवा राणीसारख्या एका व्यक्तीच्या हाती नसते. 


🔸गणराज्यात कोणताही अधिकार संपन्न वर्ग (priviledged class) नसतो आणि सर्व सार्वजनिक कार्यालये विना भेदभाव सर्वांना खुली असतात.


🔸 “भारत आणि अमेरिका” हे दोन Republic देशांची प्रमुख उदाहरणे आहेत.


🔸२६ जानेवारी १९५० ला भारत हा प्रजासत्ताक झाला.


🔸 महत्वाचे म्हणजे, भारताचे राष्ट्रपती आपल्या दस्तऐवजावर “PRESIDENT REPUBLIC OF INDIA” असेच लिहतात.


महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे


🔸परवरा नदी व मुला नदी  -  नेवासे,  

     अहमदनगर


🔸मळा व मुठा नदी - पुणे


🔸गोदावरी व प्राणहिता  -  सिंगेचा, 

     गडचिरोली


🔸तापी व पूर्णानदी - श्रीक्षेत्र चांगदेव 

     तिर्थक्षेत्र, जळगाव


🔸कष्णा व वेष्णानदी -  माहुली, 

     सातारा


🔸तापी व पांजरानदी - मूडवद, धुळे


🔸कष्णा व पंचगंगा - नरसोबाची वाडी, 

     सांगली


🔸कष्णा व कोयना -  कराड, सातारा


🔸गोदावरी व प्रवरा  - टोके, 

    अहमदनगर


🔸कष्णा व येरळ -  ब्रम्हनाळ, सांगली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२८ नोव्हेंबर २०२०

वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या भारतीय इंजिनिअर्सना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातून मोठ्या ऑफर्स.

🔰भारतीय टेक्नॉलॉजी प्रोफेशनल्स जे सध्याच्या करोनाच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. त्यांना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातील इतर कंपन्यांकडून कामाच्या अनेक ऑफर येत आहेत. कोविडच्या उद्रेकानंतर आता जगभरात कामाची ही नवी पद्धत रुजू पाहत आहे.


🔰इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, जगभरातील अनेक कंपन्या भारतातील हायप्रोफाईल टेक्निकल टॅलेंटच्या शोधात आहेत. करोनाचा काळ सुरु होण्यापूर्वी या प्रोफेशनल्सना जेवढी मागणी होती त्यापेक्षा दोन ते तीन टक्के जास्त मागणी सध्या या लोकांना मिळत आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिलं आहे.


🔰या हायप्रोफाईल टेकीजना अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मध्य आशियातील Instahyre, Interviewbit, Rocket, Techfynder, CIEL HR Services and Pesto Tech यांसारख्या कंपन्या कामावर रुजू करुन घेण्यास उत्सुक आहेत.


🔰इन्स्टाहायरचे सहसंस्थापक सरबोजित मलिक बिझनेस लाईनशी बोलताना म्हणाले, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत कंपन्या नवी भरती करण्यास उत्सुक नव्हत्या. त्यांचा व्यवसाय थंड पडला होता. मात्र, त्यानंतर जुलै ते सप्टेंबर या काळात भरती प्रक्रियेत वाढ झाली आहे. इन्स्टाहायर सध्या ८,७०० कंपन्यांसोबत काम करत आहे. गेल्या वर्षी हा आकडा ५,३०० इतका होता. त्याचबरोबर कंपनीचा महसूलही तीन ते चार टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये बहुतकरुन त्यांचे क्लायन्ट्स हे अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील आहेत.

संविधान लोकांना समजले पाहिजे.

🔰अलीकडे आपण नो युवर कस्टमर (केवायसी) हा शब्द सातत्याने ऐकतो. याचा अर्थ ‘ग्राहकाला जाणून घ्या’ असा होतो. आता त्याचा अर्थ ‘नो युवर कॉन्स्टिटय़ुशन’ म्हणजे आपले संविधान समजून घ्या असा घेता येईल. देशातील नागरिकांना संविधानाची माहिती असली पाहिजे, त्याची जाण व्यापक झाली पाहिजे. त्यासाठी लोकांना संविधान समजावून सांगणेही गरजेचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८० व्या परिषदेत व्यक्त केले.


🔰नव्या पिढीला संविधानामध्ये नेमके काय आहे हे समजले पाहिजे, त्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये सातत्याने जागरूकता मोहीम राबवली पाहिजे. संविधान लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, ते तरुण पिढीत अधिक लोकप्रिय केले पाहिजे, त्यासाठी अभिनव मोहीम राबवण्याचा सल्ला मोदींनी पीठासीन अधिकाऱ्यांना दिला.


🔰आपल्या संविधानामध्ये नागरिकांच्या कर्तव्याला महत्त्व दिले गेले आहे. महात्मा गांधीही त्याबद्दल आग्रही असत. नागरिकांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्य हे एकमेकांशी जोडलेले असतात. नागरिक आपले कर्तव्य पार पाडतात तेव्हा त्यांच्या हक्कांचेही रक्षण होते यावर गांधीजींचा विश्वास होता. नागरिकांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढेल अशी अपेक्षा संविधानातही व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी सर्वानी आपल्या संविधानाने दिलेल्या कर्तव्याचे पालन करणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले. गेल्या पाच वर्षांपासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभरा साजरा केला जातो.

वरुणास्त्र’: भारताचा स्वदेशी टॉरपीडो


➡️भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांच्या हस्ते ‘वरुणास्त्र’ या स्वदेशी टॉरपीडोच्या पहिल्या निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन झाले. पाणबुडी किंवा जहाज नष्ट करण्यासाठी टॉरपीडो हे सर्वात अचूक शस्त्र आहे.


💎ठळक वैशिष्ट्ये ..


‘➡️वरुणास्त्र’ हा भारताचा पहिला पूर्ण स्वदेशी टॉरपीडो आहे.वरुणास्त्र 40 किलोमीटर अंतरापर्यंत कोणतीही पाणबुडी नष्ट करण्यास सक्षम आहे. ते ताशी 74 किलोमीटर वेगाने हल्ला करते.वरुणास्त्र टॉरपीडोचे वजन सुमारे दीड टन आहे. ते पाणबुडीभेदी टॉरपीडो असून यात 250 किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.


➡️खोल आणि उथळ पाण्यातल्या पाणबुड्यांनाही या टॉरपीडोने लक्ष्य करता येणार. त्यात जोडलेल्या ‘GPS’ यंत्रणेमुळे लक्ष्याचा अचूकपणे वेध घेणे या टॉरपीडोला सहज शक्य आहे.

इतर बाबी


➡️वरुणास्त्राने भारतीय युद्धनौका आणि सिंधू श्रेणीतली पाणबुडी सुसज्ज असणार.संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (DRDO) विशाखापट्टणम येथील ‘नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी’ने (NSTL) वरुणास्त्र विकसित केले आहे. तर ‘भारत डायनॉमिक्स लिमिटेड’ने (BDL) त्याचे उत्पादन सुरू केले आहे.

Online Test Series

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...