१५ नोव्हेंबर २०२०

लुशाई टेकड्या



लुशाई टेकड्या ईशान्य भारताच्या पर्वतीय प्रदेशातील डोंगर टेकड्या. यांचा विस्तार प्रामुख्याने मिझोराम राज्यात असून त्यांना ‘मिझो टेकड्या’ असेही म्हणतात. आराकान योमा या पर्वतश्रेणीचा हा उत्तरेकडील भाग होय. उत्तर-दक्षिण दिशेत परस्परांना समांतर पसरलेल्या या टेकड्या मुख्यत: तृतीयक कालखंडातील वालुकाश्म व शेल खडकांपासून तयार झाल्या आहेत. या घडीच्या टेकड्यांच्या दक्षिणेस पातकई टेकड्या आहेत. लुशाईच्या पश्र्चिमेस त्रिपुरा सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत लहानलहान आठ रांगा व दऱ्या आहेत.


जलप्रवाहांच्या खनन कार्यामुळे या टेकड्यांमध्ये तीव्र उताराच्या खोल दऱ्या, घळ्या वव काही ठिकाणी लहान मैदानी द्रोणी प्रदेश तयार झालेले आहेत. या टेकड्यांचे पश्र्चिमेकडील उतार हे पूर्वेकडील उतारांपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आहेत. पश्चिमेकडे जलप्रवाहांची खोरी रुंद व पूर्वेस अरुंद आढळतात. या प्रदेशात १,३७१ मी. उंचीवर टेकड्यांनी वेढलेली सुपीक गाळाची मैदाने आहेत. मैदानामध्ये चांफाई हे मोठे मैदान (लांबी सु. ११ किमी. व रुंदी ५ किमी.) आहे. गाळाने भरून गेलेल्या पूर्वीच्या सरोवराच्या जागी हे मैदाने तयार झाली असावीत.


या टेकड्यांची सस.पासून सरासरी उंची पश्र्चिमेस ९१४ मी. पासून पूर्वेस १,२१८ मी. पर्यंत आढळते; परंतु काही ठिकाणी मात्र ती १,६७५ मी. पर्यंत वाढत जाते. दक्षिण भागात‘ब्लू मौंटन’ वा ‘फ्वंगपूरी’ (२,१६५ मी.) येथे सर्वाधिक उंची आढळते.


या प्रदेशातील जलप्रणाली गुंतागुंतीची आहे. उत्तरेस सुरमा नदीची उपनदी बराक, दक्षिणेस कलदन व पश्र्चिमेस कर्णफुली या नद्यांनी हा प्रदेश व्यापलेला आहे. उत्तर भागात ढालेश्र्वरी, सोनई व तुइव्हावल या बराक नदीच्या, तर दक्षिण भागात पूर्वेस मट, तुईचुंग, त्याओ, तुईपाई या कलदन नदीच्या आणि पश्र्चिमेकडील जलप्रणालीमध्ये चितगाँगजवळ तुईचंग, कओ, देह फायरंग व तुईलिपनुई या कर्णफुली नदीच्या मुखालगत येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत.


या टेकड्यांच्या प्रदेशातील हवामान मानवी जीवनास प्रतिकूल आहे. खोल दऱ्यांमधून रोगट हवामानामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. मार्च-एप्रिलमध्ये वायव्येकडून येणाऱ्याभयानक स्वरूपाच्या वादळी वाऱ्यांचा प्रादुर्भाव होतो. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कोरडा दुष्काळ पडत नाही. उतारावर घनदाट सदारहित जंगले, बांबूंची वने व इतर उपयुक्त वृक्ष आहेत. खोलगट भागात पाम व माथ्यावरील भागात ओक, फर, चेस्टनट इ. वृक्ष आढळतात. या प्रदेशात हत्ती, गेंडा, हरिण, वाघ, अस्वले इ. प्राणीही आढळतात. या प्रदेशात बहुतांश आदिवासी लोक रहात असून ते ‘झूम शेती’ करतात. शेतीतून भात, तीळ, ऊस, तंबाखू व संत्री इ. उत्पादने घेतली जातात.

महेंद्रगिरी



महेंद्र पर्वत दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. प्राचीन भारतातील भूगोलवेत्त्यांनी पूर्व घाटाला ‘महेंद्र पर्वत’ अथवा महेंद्रगिरी म्हटल्याचे दिसून येते. याच्या विस्ताराविषयी मतभेद आढळतात. काही ग्रंथांतील वर्णनांनुसार याचा विस्तार ओरिसा राज्यातील गंजाम जिल्ह्यापासून दक्षिणेस मदुराई (तमिळनाडू राज्य) जिल्ह्यापर्यंत असावा, असे काही तज्ञांचे मत आहे. ओरिसा राज्यातील महानदीचे खोरे आणि गंजाम यांदरम्यानच्या पूर्व घाटाच्या टेकड्या अद्यापही ‘महेंद्रमलई’ किंवा महेंद्र टेकड्या या नावाने ओळखल्या जातात. यावरूनच या भागातील पूर्व घाटाच्या सर्वोच्च शिखराला ‘महेंद्रगिरी’ हे नाव दिले असावे.


पुराणांत या पर्वताला ‘महेंद्राचल’, ‘महेंद्राद्रि’ अशीही नावे असल्याचे दिसून येते. अगस्त्य ऋषींनी या पर्वताची सागरात निर्मिती केली, असा रामायणात निर्देश आहे. श्रीरामाकडून पराभूत झाल्यानंतर परशुरामाने या पर्वतावर येऊन वास्तव्य केल्याच्या अनेक पुराणकथा आहेत. कालिदासाच्या रघुवंशात हा पर्वत कलिंग देशात असल्याचा व कलिंग देशाचा राजा महेंद्राधिपती असल्याचा निर्देश आढळतो.


बाणाच्या हर्षचरितात महेंद्र पर्वत मलय पर्वताशी जोडलेला असल्याविषयीचा उल्लेख मिळतो. पार्जिटरच्या मते महानदी, गोदावरी, वैनगंगा या नद्यांदरम्यानचा प्रदेश अथवा विस्तारांने गोदावरीच्या उत्तरेकडील पूर्व घाटाचा प्रदेश म्हणजे प्राचीन महेंद्र पर्वत असावा.


महेंद्रगिरी हे पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर ओरिसा राज्याच्या गंजाम जिल्ह्यात १८° ५८′ उ. अक्षांश व ८४°२४ पू. रेखांशावर, सस. पासून १,५०१ मी. उंचीवर आहे. दाट वनश्री आणि समुद्रसान्निध्य (सु. २५ किमी. अंतरावर) यांमुळे याचा परिसर निसर्गरम्य बनला आहे.


ब्रिटिशांच्या काळात महेंद्रगिरी हे कलकत्त्याचे आरोग्यधाम म्हणून विकसित करण्याची योजना आखण्यात आली होती. परंतु या टेकडीवजा शिखराच्या तीव्र उताराचा माथा आणि पाण्याचा तुटवडा यांमुळे ती योजना मागे पडली. येथून ‘महेंद्रतनय’ नावांचे दोन प्रवाह उगम पावतात. त्यांतील एक दक्षिणेस वंशधारा नदीस मिळतो, तर दुसरा बारूआ गावाजवळ बंगालच्या उपसागराला मिळतो.


या शिखरावर प्रचंड शिळांनी रचलेली अकराव्या शतकातील चार मंदिरे असून त्यांतील एक भग्नाचवस्थेत आहे. मंदिरात संस्कृत आणि तमिळ भाषांतील शिलालेख आहेत. ‘चोल वंशीय राजा राजेंद्र याने आपला मेहुणा विमलादित्य याचा पराभव केल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या जंगलप्रदेशात उभारलेले हे विजयस्तंभ आहेत’, असा उल्लेख त्या शिलालेखांतून आढळतो.

मलय


1) मलयगिरि : 


दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. हा पर्वत ‘चंदनगिरि’ या नावानेही ओळखला जात असे. मलई (मळे) म्हणजे डोंगर; या मूळ द्राविडी शब्दावरून ‘मलय’ हा संस्कृत शब्द रूढ झाला. पुराणांतील उल्लेखांवरून पश्चिम घाटाचा (सह्याद्रीचा) दक्षिणेकडील भाग म्हणजे मलयगिरी असे मानतात. भवभूतीच्या महावीरचरितातील उल्लेखावरून हा पर्वत कावेरी नदीच्या दक्षिणेस होता असे दिसून येते.


अग्नि, कूर्म, विष्णु इ. पुराणांतील उल्लेखांवरून सांप्रतच्या कोईमतुर खिंडीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या त्रावणकोर व कार्डमम्‌ टेकड्या म्हणजे मलयगिरी असावा. पश्चिम घाटात उगम पावणाऱ्‍या ताम्रपर्णी व कृतमाला (सांप्रत वैगई) या नद्या मलय पर्वतात उगम पावतात , असा उल्लेख मार्कंडेय, वायु, मत्स्य इ. पुराणांत मिळतो; त्यावरून या घाटाचा दक्षिण भाग म्हणजे मलयगिरी या विधानाला दुजोरा मिळतो.


पार्जिटरच्या मते पश्चिम घाटातील निलगिरीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंतची डोंगररांग म्हणजे मलयगिरी होय. माळव्याच्या परमार घराण्यातील राजांच्या कागदपत्रांत भोज राजाचा राज्यविस्तार दक्षिणेस मलय पर्वतापर्यंत होता, असा उल्लेख मिळतो.


या पर्वताच्या पावित्र्याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. मनूने या पर्वतावर तपश्चर्या केल्याचा उल्लेख मत्स्य पुराणात आहे. या पर्वतावरील पोथिगेई शिखरावर अगस्त्य (स्ती) ऋषींचे वास्तव्य होते. असा चैतन्यचरितामृतात उल्लेख आहे. त्यामुळे याला अगस्ती कूट असेही म्हणतात. पुराणात मलय पर्वत चंदनाने समृद्ध होता असे. उल्लेख आढळतात.


2) भारतातील एक प्राचीन ठिकाण. 

याच्या स्थाननिश्चितीविषयी वेगवेगळी मते आहेत. तेलंगांच्या मते हे पश्चिम घाटाच्या दक्षिण टोकाला होते, तर केशवलाल ध्रुव यांच्या मते हे ठिकाणचे नाव नसून ही एक जमात आहे. या जमातीचे लोक हिंदूस्थानाच्या उत्तर सरहद्दीवर राहत असावेत.


रामायण, महाभारत रत्न्कोश इ. संस्कृत ग्रंथाच्या अभ्यासावरून जेम्स बर्जेस यांच्या मते गंडकी व राप्ती नद्यांच्या वरच्या बाजूस असलेला मलयभूमी नावाचा जिल्हा म्हणजेच मलयांचा देश असे दिसून येते.

यूनेस्को की विश्व विरासत में शामिल भारतीय धरोहर



1. ताजमहल - उत्तर प्रदेश [1983]


2. आगरा का किला - उत्तर प्रदेश [1983]


3. अजंता की गुफाएं - महाराष्ट्र [1983]


4. एलोरा की गुफाएं - महाराष्ट्र [1983]


5. कोणार्क का सूर्य मंदिर - ओडिशा [1984]


6. महाबलिपुरम् का स्मारक समूह -तमिलनाडू [1984]


7. काजीरंगा राष्ट्रीय उद्यान - असोम [1985]


8. मानस वन्य जीव अभयारण्य - असोम [1985]


9. केवला देव राष्ट्रीय उद्यान - राजस्थान [1985]


10. पुराने गोवा के चर्च व मठ - गोवा [1986]


11. मुगल सिटी, फतेहपुर सिकरी - उत्तर प्रदेश [1986]


12. हम्पी स्मारक समूह - कर्नाटक [1986]


13. खजुराहो मंदिर - मध्यप्रदेश [1986]


14. एलीफेंटा की गुफाएं - महाराष्ट्र [1987]


15. पट्टदकल स्मारक समूह - कर्नाटक [1987]


16. सुंदरवन राष्ट्रीय उद्यान - प. बंगाल [1987]


17. वृहदेश्वर मंदिर तंजावुर - तमिलनाडू [1987]


18. नंदा देवी राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड [1988]


19. सांची का बौद्ध स्मारक - मध्यप्रदेश [1989]


21. हुमायूँ का मकबरा - दिल्ली [1993]


22. दार्जिलिंग हिमालयन रेल - पश्चिम बंगाल [1999]


23. महाबोधी मंदिर, गया - बिहार [2002]


24. भीमबेटका की गुफाएँ - मध्य प्रदेश [2003]


25. गंगई कोड़ा चोलपुरम् मन्दिर - तमिलनाडु [2004]


26. एरावतेश्वर मन्दिर - तमिलनाडु [2004]


27. छत्रपति शिवाजी टर्मिनल - महाराष्ट्र [2004]


28. नीलगिरि माउंटेन रेलवे - तमिलनाडु [2005]


29. फूलों की घाटी राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड [2005]


30. दिल्ली का लाल किला - दिल्ली [2007]


31. कालका शिमला रेलवे -हिमाचल प्रदेश [2008]


32. सिमलीपाल अभ्यारण्य - ओडिशा [2009]


33. नोकरेक अभ्यारण्य - मेघालय [2009]


34. भितरकनिका उद्यान - ओडिशा [2010]


35. जयपुर का जंतर-मन्तर - राजस्थान [2010]


36. पश्चिम घाट [2012]


37. आमेर का किला - राजस्थान [2013]


38. रणथंभोर किला - राजस्थान [2013]


39. कुंभलगढ़ किला - राजस्थान [2013]


40. सोनार किला - राजस्थान [2013]


41. चित्तौड़गढ़ किला - राजस्थान [2013]


42. गागरोन किला - राजस्थान [2013]


43. रानी का वाव - गुजरात [2014]


44. ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान - हिमाचल प्रदेश [2014]


हयुमिक अँसिड



☘️१५ कारणे का वापरावे पिकांसाठी ह्युमिक अँसिड☘️


☘️सद्रिय शेतीचे महत्त्व आता सर्वांनाच समजले आहे. परंतु हि शेती अधिक कार्यक्षम पद्धतीने कशी करु शकतो हे शेतक-याने जाणुन घेणे खुप महत्वाचे आहे. सेंद्रिय शेती अधिक फायदेशिर करण्यासाठी शेतीसाठी लागणारे आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा यांचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करता येईल ते पहाणे गरजेचे आहे. यासर्व घटकांचा पुरेपुर वापर करण्यासाठी ह्युमस /ह्युमिक अँसिडचा वापर करणे आवश्यक आहे. ह्युमिक अँसिडचा वापर करणे प्रत्येक शेतक-यासाठी अनिवार्यच झाले आहे.


☘️हयुमस /ह्युमिक अँसिड?☘️


ह्युमस म्हणजे सेंद्रिय घटक म्हणजेच  पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ म्हणजे अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण असुन हे पिकांच्य सर्वांगिण वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे.


☘️हयुमिक अँसिडचे गुणधर्म☘️


☘️हयुमिक अँसिड हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे.हे मानवनिर्मीत नसुन पुर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे.ह्युमिक अँसिडमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असुन हायट्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो. तसेच त्यात ४% पर्यंत नत्र असते.ह्युमिक अँसिड हे मुख्य करुन पावडर, दाणेदार स्वरुपात तसेच द्रवरुपातही वापरता येते.


☘️हयुमिक अँसिडचे फायदे ☘️


☘️हयुमिक अँसिडमुळे मातीची रचना सुधारते तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते.

☘️मातीचा सामु स्थिर ठेवण्यास फायदेशिरनत्र स्थिरिकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरुन काढते.ह्याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत रहाण्यास फायदेशिर ठरते.

☘️हयुमिक अँसिडचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणा-या बुरशींची वाढ होऊन ह्या बुरशीमुळे मातीपासुन उद्भवणारे रोगांपासुन संरक्षण मिळण्यास मदत होते.

☘️हयुमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणुनच दुष्काळयुक्त भागात ह्युमिक अँसिडचा वापर खुप महत्वाचा आहे.

☘️जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते.याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात.

☘️बीजप्रक्रिया म्हणुन वापर केल्यास बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते.

☘️हयुमिक अँसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते.सोडियम व इतर विषारी रसायनांपासुन मातीवर होणारे दुष्परिणाम थांबवण्यास हे अतिशय उपयोगी पडते.

☘️यरिया तसेच इतर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिन नापिक होण्यापासुन वाचवते.रासायनिक खतांची कार्यक्षमता ३०% पर्यंत वाढवते त्यामुळे खतांचा खर्च कमी येतो.

☘️सर्वात महत्वाचे म्हणजे पिकांच्या पांढ-या मुळींची वाढ जलद होते.

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे :



1. आंबोली (सिंधुदुर्ग)

2. खंडाळा (पुणे)

3. चिखलदरा-गाविलगड (अमरावती)

4. जव्हार (ठाणे)

5. तोरणमाळ (नंदुरबार)

6. पन्हाळा (कोल्हापूर)

7. पाचगणी (सातारा)

8. भिमाशंकर (पुणे)

9. महाबळेश्वर (सातारा)

10. माथेरान (रायगड)

11. मोखाडा (ठाणे)

12. म्हैसमाळ (औरंगाबाद)

13. येडशी (उस्मानाबाद)

14. रामटेक (नागपूर)

15. लोणावळा (पुणे)

16. सूर्यामाळ (ठाणे)

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प



* मुचकुंदी प्रकल्प 

मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


* श्रीशैलम प्रकल्प

आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


* बियास प्रकल्प

पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.


* भाक्रा-नानगल

पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.


* दामोदर खोरे योजना

पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.

 

* फराक्का योजना 

हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.

 

* हिराकूड 

प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.


* चंबळ योजना

हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.


* उकाई प्रकल्प

तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.

 

* कोसी प्रकल्प

विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.


* नागार्जुनसागर

आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.

वातावरणाचे थर -


 वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठपासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते.


 वातावरणाचे मुख्य थर 


📌 तपांबर - भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर होय, याची सरासरी जाडी ११ किमी आहे. या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात. पाऊस, वारे, ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात.


📌 तपस्तधी - तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय. उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते.


📌 सथितांबर - तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय. या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण, नसतात. व हवा शुष्क असते.


📌 सथितस्तबधी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तबधी होय. या थरातील तापमान स्थिर असते. या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो. हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो.


📌 मध्यांबर - स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय. या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते.


📌 मध्यस्तबधी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तबधी होय.


📌 दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय. या थरात उंचीनुसार तापमान वाढते.


📌 आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे. या थरात उंचीनुसार तापमान वाढते. या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात.


📌 बाह्यंबार - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांम्बर होय. भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे. या थरातील विविध वायूंचे अनु, रेणू, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात.

नसर्गिक साधनसंपत्ती वने, प्राणी, खनिजे, शेती




♍️जग : वनसंपत्ती♍️ 


💠 उष्ण कटिबंधीय वने - यात सदाहरित वने व मॉन्सून वने हे दोन प्रकार पडतात. विषुववृत्तीय सदाहरित वने - या पट्ट्यात भरपूर पाऊस व अधिक तापमान असल्यामुळे या वाणांच्या वाढीस अनुकूल वातावरण आहे. या वनात रबर, महोगनी, सिकोना, या सारखे वृक्ष आढळतात. प्रमुख देश - काँगो, मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील.


💠 मान्सून वने - २०० सेमीच्या अधिक पावसाच्या क्षेत्रात ही वने आढळतात. १०० ते २०० सेमी पावसाच्या पाणयात प्रदेशात पानझडी वने आढळतात. या वनात साग, साल, शिसव, खैर, आंबा, जांभूळ, पळस, बाभूळ ही वने आढळतात. प्रमुख देश भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आहेत.


💠 समतीतोष्ण उष्ण कटिबंधीय पानझडी वने - या वनातील झाडांची पाने हिवाळ्यात झडतात. या वनात ओक, एल्म्स, वोलनट, पॉप्युलर, ओलिव्ह. प्रमुख देश - अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया.


💠 सचिपर्णी किंवा तैगा वने - विस्तृत प्रदेशात अणुकुचीदार, तेलगट, व मऊ पानांचे सूचिपर्णी वृक्ष आढळतात. पाईन, स्प्रूस, फर वगैरे. प्रमुख देश रशिया, फिनलँड, अमेरिका, कॅनडा.


♍️जग : पशुसंपत्ती ♍️


💠 समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ऊत्तर अमेरिका प्रेअरी प्रदेश, दक्षिण अमेरिका पंपास, आफ्रिका - व्हेल्ड.


💠 उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ब्राझीलचा डोंगराळ भाग, दक्षिण अमेरिकेतील ओरिनोको नदीचे खोरे, आफ्रिकेतील झैरे खोरे.


💠 परमुख मास उत्पादक प्रदेश - अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया.


💠 परमुख दूध उत्पादक प्रदेश - न्यूझीलंड, डेन्मार्क, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, भारत, अमेरिका,


💠परमुख लोकर उत्पादक देश - चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया.


💠परमुख रेशीम उत्पादक देश - चीन, भारत


♍️जग : खनिजे व ऊर्जासाधने ♍️


💠 लोह - चीन, रशिया, ब्राझील, अमेरिका, भारत, व इतर देश.


💠मगनीज - रशियन राष्ट्रकुल, गाबाँ, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रलिया, व इतर देश.


💠 बॉक्सइट - ऑस्ट्रेलिया, गिनी, भारत, जमैका, ब्राझील, व इतर देश.


💠 जस्त - जपान, कॅनडा, चीन, रशिया, जर्मनी, व इतर देश.


💠 तांबे - अमेरिका, चिली, जपान, चीन, रशियन राष्ट्रकुल, जर्मनी


💠 चांदी - मेक्सिको, अमेरिका, पेरू, कॅनडा, रशिया.


💠 सोने - दक्षिण आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, चीन, पेरू, घाणा, ग्वाटेमाला


💠 कथिल - चीन, ब्राझील, मलेशिया, थायलंड, व इतर देश.


💠निकेल - रशिया, कॅनडा, जपान, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया.


💠 करोमियम - दक्षिण आफ्रिका, रशिया, भारत, झिम्बॉम्बे, फिनलँड.


💠शिसे - रशिया, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, व इतर देश


💠 गधक - अमेरिका, कॅनडा, रशिया, पोलंड.


💠 खनिज तेल - सौदी अरेबिया, अमेरिका, रशिया, इराण, मेक्सिको, चीन, कुवैत, इराक, व्हेनेझुएला, रूमानिया, इंडोनेशिया, एकवाडोर.


💠 नसर्गिक वायू - रशिया, अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, नेदरलँड्स.


💠 दगडी कोळसा - चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, व इतर देश.


💠 हिरे - काँगो, नामिबिया, लेसोथो, अंगोला, बोस्टवाना, दक्षिण आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.


♍️जग : शेती ♍️


💠गहू - चीन, भारत, अमेरिका, फ्रान्स, रशिया, कॅनडा, व इतर देश


💠 तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांग्लादेश, व्हिएतनाम, इतर देश


💠मका - अमेरिका, चीन, ब्राझील, फ्रान्स, मेक्सिको, भारत, इतर देश


💠जवारी - अमेरिका, भारत, नयजीरिया, चीन, मेक्सिको, भारत, सुदान.


💠 बाजरी - भारत, नयजीरिया, चीन, नाइजर, बुर्किना, फासो.


💠 डाळी - भारत, चीन, ब्राझील, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया,


💠सोयाबीन - अमेरिका, ब्राझील, चीन.


💠 भईमूग - चीन, भारत, नयजीरिया, अमेरिका, इंडोनेशिया.


💠खोबरे - फिलिपिन्स, भारत, इंडोनेशिया,


💠 पामतेल - मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मेक्सिको, व इतर देश.


💠 बटाटे - चीन, रशिया, अमेरिका, पोलंड, युक्रेन, भारत.


💠 सफरचंदे - चीन, अमेरिका, फ्रान्स, टर्की, इराण, भारत,


💠 चहा - भारत, चीन, केनिया, श्रीलंका, इंडोनेशिया,


💠 कॉफी - ब्राझील, युगांडा, कोलंबिया,


💠कशर - स्पेन, भारत, इराण.


💠 कोको बिया - आयव्हरी कोस्ट, घाणा, इंडोनेशिया, ब्राझील, नयजीरिया,


💠 कापूस - अमेरिका, चीन, भारत, पाकिस्तान, उझबेकिस्तान.


💠 ताग - भारत, बांग्लादेश, चीन, थायलंड.


💠 तबाखू - चीन, अमेरिका, भारत, ब्राझील,


💠 रबर - थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, भारत, चीन.


💠 ऊस - भारत, ब्राझील, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया.


💠 फले - नेदरलँड्स, भारत, इझ्रायल, ब्राझील.


महाराष्ट्रातील अभयारण्ये



भारतात २००९-१० मध्ये ५१५ अभयारण्ये होती. 


महाराष्ट्रात ३५ अभयारण्ये. 


अ.क्र. - जिल्हा - अभयारण्य - क्षेत्रफळ


०१. धुळे - अनेर धरण - ८३


०२. अमरावती - मेळघाट वाघ संरक्षक अभयारण्य - ११५०


०३. कोल्हापूर - राधानगरी - ३५१


०४. ठाणे - तानसा - ३०५


०५. वर्धा - बोर - ६१


०६. सोलापूर, अहमदनगर - माळढोक पक्षी अभयारण्य - १२२२


०७. जळगांव - यावल अभयारण्य - १७८


०८. रायगड - कर्नाळा पक्षी अभयारण्य - ५


०९. भंडारा - नागझिरा - १५३


१०. नांदेड - किनवट - २१९


११. अहमदनगर - देऊळगांव रेहेकुरी - ३


१२. सातारा - कोयना - ४२४


१३. सांगली - सागरेश्वर - ११


१४. पुणे, ठाणे - भिमाशंकर - १३१


१५. सांगली,कोल्हापूर - चांदोली - ३०९


१६. रायगड - फणसाड - ७०


१७. नाशिक - नांदूर मधमेश्वर - १००


१८. चंद्रपूर - अंधारी - ५०९ 


१९. अहमदनगर - कळसूबाई हरिश्चंद्र - ३६२


२०. गडचिरोली  - चापराला - १३५


२१. औरंगाबाद, जळगांव - गौताळा औट्रमघाट - २६१


२२. यवतमाळ, नांदेड - पैनगंगा - ३२५


२३. सिंधुदुर्ग - मालवण - २९


२४. पुणे - मयुरेश्वर - ५


२५. औरंगाबाद - जायकवाडी - ३४१


२६. बीड - नायगाव मयुर अभयारण्य - ३०


२७. उस्मानाबाद - येडशी - २२


२८. बुलडाणा - आंबा बरवा - १२७


२९. बुलडाणा - ज्ञान गंगा - २०५


३०. अकोला - नरनाळा - १२


३१. अमरावती - वाण - २११


३२. यवतमाळ - टिपेश्वर - १४८


३३. गडचिरोली - भामरागड - १०४


३४. ठाणे - तुम्भारेश्वर - ८६


३५. वाशीम - कारंजा सोहोळ - १८

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती :



1. ग्रहाचे नाव - बूध


सूर्यापासुन चे अंतर - 5.79  

 परिवलन काळ - 59

 परिभ्रमन काळ - 88 दिवस

 इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.


2. ग्रहाचे नाव - शुक्र


सूर्यापासुन चे अंतर - 10.82  

 परिवलन काळ - 243 दिवस

 परिभ्रमन काळ - 224.7 दिवस

 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


3. ग्रहाचे नाव - पृथ्वी


सूर्यापासुन चे अंतर - 14.96  

 परिवलन काळ - 23.56 तास

 परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस

 इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.


4. ग्रहाचे नाव - मंगळ


सूर्यापासुन चे अंतर - 22.9  

 परिवलन काळ - 24.37 तास

 परिभ्रमन काळ - 687

 इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.


5. ग्रहाचे नाव - गुरु


सूर्यापासुन चे अंतर - 77.86

 परिवलन काळ - 9.50 तास

 परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे

 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.


6. ग्रहाचे नाव - शनि


सूर्यापासुन चे अंतर - 142.6

 परिवलन काळ - 10.14 तास

 परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष

 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.


7. ग्रहाचे नाव - युरेनस  


सूर्यापासुन चे अंतर - 268.8

 परिवलन काळ - 16.10 तास

 परिभ्रमन काळ - 84 वर्षे

 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


8. ग्रहाचे नाव - नेपच्यून  


सूर्यापासुन चे अंतर - 449.8

 परिवलन काळ - 16 तास

 परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे

 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

गाल्फ प्रवाह



काय आहे गल्फा प्रवाह


📌उत्तर अटलांटिक महासागरातील जगप्रसिद्ध उबदार सागरी प्रवाह. १४९२ मध्ये कोलंबसच्या व १५१३ मध्ये पॉन्से द लेऑन या स्पॅनिश नाविकाच्या लक्षात तो आला होता. तो मेक्सिकोच्या आखातातून येतो, या समजुतीमुळे बेंजामिन फ्रँक्लिनने त्याला गल्फ स्ट्रीम हे नाव दिले.* 


📌परंतु फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीपासून न्यू फाउंडलंडच्या आग्‍नेयीकडील ग्रँड बँक्सपर्यंत त्याची खास वैशिष्ट्ये दिसून येत असल्यामुळे, एवढ्या भागातच त्याचे हे नाव योग्य आहे. फ्लॉरिडा सामुद्रधुनीपासून नॉर्वेजियन समुद्रापर्यंतच्या प्रवाहास हे नाव अजूनही दिले जाते.

दक्षिण अमेरिकेच्या सेंट रॉक भूशिराजवळ दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या दोन शाखा होतात. 


📌तयांपैकी उत्तरेकडील शाखा दक्षिण व मध्य अमेरिकेच्या किनाऱ्याकिनाऱ्याने कॅरिबियन समुद्रात आल्यावर तिला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची वेस्ट इंडीजच्या दक्षिणेकडील शाखा मिळते. मग तो प्रवाह मेक्सिकोच्या आखातात जाऊन तेथून फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडतो. 


📌तयाला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची अँटिलीस प्रवाह ही शाखा मिळते व मग खरा गल्फ प्रवाह सुरू होतो. येथे त्याचे तापमान २०० से. ते २४०से.; रुंदी सु.१०० किमी.; खोली. सु. ८०० मी.; वेग ताशी ६·५ किमी.; क्षारता उच्च व रंग गर्द निळा असून तो दर सेकंदास २·६ कोटी घ. मी. पाणी वाहून नेतो

पृथ्वीच्या परिवलनामुळे मिळणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे तो उजवीकडे वळू लागतो


📌अमेरिकेच्या आग्‍नेय किनाऱ्याला समांतर मार्गाने हॅटरस भूशिरापर्यंत गेल्यावर तो अधिक रूंद व संथ होतो, त्यात लहान लहान भोवरे दिसतात, खोली ४ ते ५ हजार मी. होते व तो सेंकदाला ८·२ कोटी घ.मी.पाणी वाहून नेतो. ग्रँड बँक्सकडे गेल्यावर त्याला लॅब्रॅडॉर हा थंड प्रवाह मिळतो. त्याचे काही फाटे गल्फ प्रवाह व किनारा यांच्या दरम्यान शिरतात आणि गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे किनार्‍यापासून दूर गेल्यामुळे तळाचे थंड पाणी वर येते. यामुळे किनारा व गल्फ प्रवाह यांच्यामध्ये थंड पाण्याची एक भिंतच उभी राहते. 


📌गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे न दक्षिणेस सारगॅसो समुद्राचे पाणीही उच्च क्षारतेचे व उबदार असते.

गल्फ प्रवाहात व उत्तर अटलांटिक प्रवाहचक्राच्या मध्यभागीच्या सारगॅसो समुद्रात सारगॅसो या विशिष्ट सागरी वनस्पतीची चकंदळे तरंगत असतात. 


*📌गल्फ प्रवाहाच्या उजव्या बाजूच्या पाण्याची पातळी डावीकडील पातळीपेक्षा सु. ८० सेंमी. उंच असते. ग्रँड बँक्सजवळ उष्ण प्रवाहावरील आर्द्र हवा, थंड प्रवाहावरील थंड हवेत मिसळून बाष्पांचे सांद्रीभवन होते व दाट धुके पडते.*


📌 त तेथील मासेमारी नौकांस धोक्याचे असते. सु. ४०० उ. अक्षांश व ५०० प. रेखांश येथे गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे ईशान्येकडे जाऊन पश्चिमी वाऱ्यांमुळे वाहणाऱ्याउत्तर अटलांटिक प्रवाहात मिसळून जातो.

पुढे हा प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत गेल्यावर त्याच्या दोन शाखा होतात.


📌 दक्षिणेकडील शाखा आयबेरियन द्विपकल्प, वायव्य आफ्रिका यांच्याजवळून थंड कानेरी प्रवाह म्हणून उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला मिळते.

उत्तरेकडील शाखा ब्रिटिश बेटे व नॉर्वे यांच्या किनाऱ्यांजवळून जाऊन पुढे आर्क्टिक महासागरात नाहीशी होते. तिचे तपमान अझोर्सच्या उत्तरेस १५·५० से. होते. 


📌या प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क व ब्रिटिश बेटे आणि नॉर्वे यांची बंदरे हिवाळ्यात न गोठता खुली राहतात. गल्फ प्रवाहामुळे पश्चिम व वायव्य युरोपचे हवामान अधिक उबदार होते, असे समजले जाते. 


📌तथापि हा परिणाम प्रवाहापेक्षा त्याने वेढलेल्या उबदार जलसंचयाचा आहे असे आता दिसून आले आहे; किंबहूना प्रवाह जेव्हा अधिक पाणी वाहून नेत असतो, तेव्हा यूरोपात तपमान थोडे कमीच होते असे आढळले आहे.

अमेरिकेहून यूरोपकडे जाणाऱ्या नौकांस गल्फ प्रवाहाचा फायदा मिळून वेळ व जळण यांची बचत होते. परंतु उलट बाजूने येणाऱ्या नौका मात्र हा प्रवाह टाळतात.


 📌गल्फ प्रवाह, त्याच्या समुद्रपृष्ठावरील व खोल पाण्यातील लहानमोठ्या शाखा, खालून वाहणारा प्रतिप्रवाह, सागरतळावरील निक्षेपांवर होणारा परिणाम इत्यादींचे संशोधन आधुनिक पद्धतींनी चालूच आहे.

____________________________________

मान्सूनचे स्वरूप

*अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल

*ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण

*क) मान्सूनचा खंड

*ड) मान्सूनचे निर्गमन


🚺अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल

या घटकाची माहिती  आपण भाग 2 मध्ये बघितली आहे आता समोरची माहिती 👇 👇 👇 👇


🚺ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण

1) आर्द काल व शुष्क काल

👉 सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.

अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .

आर्द कालाच्या  पाठोपाठ शुष्क काल येतो  


2 पाऊसचे  वितरण

👉बगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .

नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .

👉 पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो . पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .

 

3) मान्सून द्रोणी  व आवर्ताचा संबंध

👉बगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन  पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ;

👉 याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने  आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.*

👉  पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.


🚺क) मान्सूनचा खंड

👉 नऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात*

पाऊस न पडण्याचे अनेक करणे पुढीलप्रमाणे ....


🔹 पाऊस घेऊन येणारे उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने अश्या प्रकारचा खण्ड पडतो . 


🔹उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही.


🔹भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.

 

🔹पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे

 पाऊस पडत नाही . 

तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .


🚺ड) मान्सूनचे निर्गमन


👉 वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला  मान्सूनचे निर्गमन होते . मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.

___________________________

जगातील सर्वात उंच 10 शिखर


(1)......माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) 

🔹8848 मीटर उंच.


(2)..... माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) 

🔹8611 मीटर उंच.


(3).... कांचनगंगा (भारत ) 

🔹8586 मीटर उंच.


(4)...... ल्होत्से (नेपाळ)

🔹8516 मीटर उंच.


(5)...... मकालू (नेपाळ)

🔹8463 मीटर उंच 


(6).......चो ओयू (नेपाळ) 

🔹8201 मीटर उंच.


(7).......धौलागिरी (नेपाळ) 

🔹8167 मीटर उंच.


(8).......मानसलू (पश्चिम नेपाळ) 

🔹8163 मीटर उंच


(9).....नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) 

🔹8125 मीटर उंच.


(10).....अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ)

 🔹8091 मीटर उंच.


(11).....गशेरब्रु( हिमालय)

🔹8068 मीटर उंच.


(12).....ब्रॉड पिक (बाल्टिस्तान)

 🔹8051 मीटर उंच.


(13)...... गशेरब्रूम --2

🔹(हिमालय) 8035 मीटर उंच


(14)..... शिशापंग्मा (तिबेट)

🔹8027 मीटर उंच.


जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आहेत.

महाराष्ट्र - जलाशय व धरणे:

 


1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)


2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद


3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड


4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर


5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक


6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर


7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे


8] उजनी - (भीमा) सोलापूर


9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर


10] यशवंत धरण - (बोर) वर्धा


11] खडकवासला - (मुठा) पुणे


12] येलदरी - (पूर्णा) परभणी

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे



●››अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण


●››अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)


●›› औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे


●›› उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण


●›› कोल्हापूर जिल्हा : रंकाळा तलाव


●›› गडचिरोली जिल्हा : दिना


●›› गोंदिया जिल्हा : इटियाडोह


●›››चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा


●››जळगाव जिल्हा : अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)


●›› ठाणे जिल्हा : भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे


●››धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव


●››नंदुरबार जिल्हा : यशवंत तलाव,


●›› नागपूर जिल्हा : उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.


●›› नांदेड जिल्हा : इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण


●›› नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण


●›› परभणी जिल्हा : कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण


●›› पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)


●›› बुलढाणा जिल्हा :खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी


●›› बीड जिल्हा : माजलगाव धरण,मांजरा धरण


●›› भंडारा जिल्हा : इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप


●›› मुंबई जिल्हा : मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी


●›› यवतमाळ जिल्हा: पूस ,अरुणावती ,बेंबळा


●›› वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)


●›› सातारा जिल्हा : उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)


●›› सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी धरण,देवधर धरण


●›› सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)


●›› हिंगोली जिल्हा : येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.

'फायझर’ची करोना लस 90 टक्के परिणामकारक



जगभर आतापर्यंत सुमारे 10 लाख लोकांचा बळी घेणाऱ्या करोना विषाणूच्या प्रतिबंधाबाबत दिलासादायक माहिती फायझर कंपनीने सोमवारी दिली. कंपनीने तयार केलेली लस 90 टक्के परिणामकारक ठरू शकते, असे कंपनीने सांगितले.


तसेच फायझर आणि तिची जर्मन सहयोगी कंपनी बायोएनटेक यांनी ही लस संयुक्तपणे तयार केली आहे. ती 90 टक्के परिणामकारक ठरू शकेल, असे प्राथमिक निष्कर्ष असल्याचे फायझर कंपनीने सांगितले.


तर लशीचा उपयोग 16 ते 85 वयोगटातील लोकांवर तातडीने करण्यासाठी या महिनाअखेरीस अमेरिकेच्या नियंत्रकांकडे अर्ज करण्याचे संकेतही कंपनीने दिले आहेत.

भारताचा पहिला अनेक खेड्यांसाठीचा संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा एकात्मिक पाणीपुरवठा प्रकल्प अरुणाचल प्रदेशात उभारला


अरुणाचल प्रदेशात भारताचा पहिला अनेक खेड्यांसाठीचा संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा एकात्मिक पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्यात आला आहे.


‼️ठळक बाबी


अरुणाचल प्रदेशाच्या लोअर दिबांग व्हॅली जिल्ह्यातील्या 39 खेड्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे.

17,480 लोकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी प्रकल्प संरचीत केलेला आहे.


प्रकल्प 28.50 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. प्रकल्पात पिण्याचे पाणी, हरित ऊर्जा आणि पर्यटन अश्या घटकांसह हा एकात्मिक प्रकल्प म्हणून तयार केला गेला आहे.


व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, जसे की एनर्जी-सोलर ग्रिड, SCADA ऑटोमेशन सिस्टम, प्री-फॅब्रिकेटेड झिंक अलम स्टोरेज टाकी, यांचा वापर केला गेला आहे.


प्रकल्पामध्ये स्विमिंग पूल, अ‍ॅम्फीथिएटर, कारंजे आणि बसण्याची व्यवस्था अश्या सोयी उभारून त्याला एक मनोरंजनाचे स्थळ म्हणून स्वरूप देण्यात आले आहे.

अमेरिकेतील सहावीच्या अभ्यासक्रमात भारतीयाच्या जीवनावर आधारित धडा.




भारताचे वनपुरुष म्हणजेच ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून लोकप्रिय असणाऱ्या जादव यांनी एकट्याने संपूर्ण जंगल उभारलं आहे असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. 


पायेंग यांच्या या कामाची दखल आता थेट पाश्चिमात्य देशांकडून घेण्यात येत आहे. नुकताच अमेरिकेतील एका अभ्यासक्रमामध्ये पायेंग यांच्या कार्याबद्दल माहिती देणाऱ्या एका धड्याचा समावेश करण्यात आला आहे.


कनेक्टीकटमधील ब्रिस्टोल येथील ग्रीन हिल्स स्कूलने सहावीच्या अभ्यासक्रमामध्ये पायेंग यांच्या कामासंदर्भातील धड्याचा समावेश केला आहे. इकोलॉजी म्हणजेच पर्यावरणशास्त्रामध्ये या धड्याचा समावेश करण्यात आला आहे. 


आता येथील मुलं पद्मश्री पुरस्कारप्राप्त पायेंग यांच्या कार्याबद्दल शिकणार आहेत.

जगभरामध्ये पर्यावरणासंदर्भात अनेक गोष्टी घडत असतानाच वातावरणातील बदलांसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.


पर्यावरणाबद्दल संवेदनशील राहण्यासंदर्भात लहान मुलांना शालेय वयामध्येच शिक्षण देण्याच्या उद्देशाने जगभरामध्ये प्रयत्न सुरु आहेत. अशा मुलांसमोर वयाच्या 16 वर्षापासूनच पर्यावरण संरक्षणाचे काम करणाऱ्या पायेंग यांच्यापेक्षा अधिक चांगले उदाहरण कोणाचे असू शकते. 


पायेंग यांच्या कार्याने मुलांनाही प्रेरणा मिळेल या उद्देशाने त्यांच्या आयुष्यावरील धड्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे.


जादव यांनी एकट्याने उभ्या केलेल्या जंगलाला मोलाईचे जंगल असं म्हणतात. या जंगलाचा आकार न्यू यॉर्कमधील सेंट्रल पार्कपेक्षाही मोठा आहे. हे जंगला आता बंगाल टायगर, भारतीय गेंडे, वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि 100 हून अधिक प्रजातीची हरणं आणि ससे यांचा अधिवास आहे.

केरळमध्येही आता सीबीआयला राज्यात सामान्य परवानगीला स्थगिती दिली आहे.


त्यामुळे राज्यात जर चौकशी करायची असल्यास सीबीआयला केरळ सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. 


सीबीआयला विरोध करणारे  केरळ हे चौथं राज्य ठरले आहे


केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन


👇CBI ला विरोध करणारी 4 राज्ये:-


✔️पश्चिम बंगाल

 

✔️राजस्थान  


✔️महाराष्ट्रानंतर 


✔️ करळ

१४ नोव्हेंबर २०२०

MPSC बद्दल काही गोष्टी


📌 एकच पुस्तक 10 वेळा वाचा...... 


📌 जवढे जास्त question सोडवाल तेवढा जास्त result चे chance आहे


📌 आयोगाचे जुने झालेले सर्व Question  पेपर सोडवून घ्या( पाठ करा) कमीत कमी 20% तरी question दर वर्षी पुन्हा तेच येतात...


📌 पास होणारे व पास न होणारे  सर्वजण एकच books वापरत असतात त्यामुळे कोणी वेगळी पुस्तके वाचून पास होत नाही....


📌 जवढी जास्त revision कराल तेवढा विषय सोपा वाटू लागतो..


📌 इतिहास आणि विज्ञान जास्त Output देत नाहीत यांना जास्त वेळ देऊ नका कारण प्रश्न काहीही विचारतात...


📌 भगोल , polity आणि इकॉनॉमिक्स , current 4  विषय strong ठेवा


📌 अभ्यासात सातत्य नसेल तर पास होणारच नाही हे नेहमी लक्षात ठेवा..


📌 MPSC ची कोणती post कमी जास्त नाही सर्व चांगल्याच आहेत....


📌 पर्व परीक्षेत CSAT शिवाय पास होताच येत नाही.. त्याचा अभ्यास करत जा (combine साठी बुद्धिमत्ता)


📌 काही गोष्टी समजल्या नाही तर पाठ करा कारण paper objective आहे


📌 वाचून काही आठवत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही परीक्षेत पर्याय पाहिलं की बरोबर उत्तर आठवत. .(यासाठी revision करा जास्त)


📌 Syllabus ची कॉपी नेहमी जवळ ठेवा.

लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाणार




🔸लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 


🔷महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेले लोणार सरोवर राज्यातील सात आश्चर्यांपैकी मानले जाते. 


🔸लोणार सरोवर नेमके वय किती, यावरून मतमतांतरे आहे. सरोवराचे वय मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या गेल्या आहेत. एक म्हणजे थर्मोलोमिनेसेन्स विश्लेषण पद्धत. 


🔰यानुसार, लोणार सरोवर ५२ हजार वर्षे जुना आहे. परंतु, आजच्या काळात सर्वांत अचूक मानल्या जाणाऱ्या ऑर्गन डेटिंगनुसार, लोणार सरोवराची निर्मिती ही सुमारे ५ लाख ७० हजार वर्षांपूर्वी झाली असावी, असे सांगितले जाते. २०१० मध्ये यासंदर्भातील संशोधन करण्यात आले होते.

'प्लाझ्मा जेट'चा शोध; ३० सेकंदात होणार कोरोनाचा खात्मा


⚡️ कोरोना संकटातून लवकर मुक्तता होण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 


💁‍♂️ अनेक देशांमध्ये या लसींची चाचणी देखील सुरु आहे. त्यातील काही लसी चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. हे संशोधन सुरु असतानाच वैज्ञानिकांनी कोरोनाचा विषाणू नष्ट करण्याची क्षमता प्लाझ्मा जेटमध्ये असल्याचा दावा केला आहे.


👉 अवघ्या ३० सेकंदांमध्ये प्लाझ्मा जेटच्या मदतीने कोरोना विषाणूचा खात्मा होत असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.


💫 अमेरिकेतील लॉस एन्जलिसमधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये करण्यात आलेल्या संशोधनामध्ये प्लाझ्मा जेटच्या मदतीने धातू, चामडे आणि प्लास्टिकवर असणारा कोरोना अवघ्या ३० सेकंदांमध्ये नष्ट करता येतो.


🎉 थरी-डी प्रिंटरच्या मदतीने हा प्लाझ्मा जेट संशोधकांनी तयार केला आहे. या प्लाझ्मा जेटची पहिली चाचणी यशस्वी ठरली आहे.


👀 पलाझ्मा जेटचा स्प्रे संशोधनामध्ये प्लास्टिक, धातू, कार्डबोर्ड आणि चामड्यावर मारण्यात आला. कोरोनाचा विषाणू हा यामध्ये तीन मिनिटांपेक्षा कमी कालावधीमध्ये नष्ट करण्यात यश आल्याचे दिसून आले.


📌 बहुतांश विषाणू हे ३० सेकंदांमध्ये नष्ट झाले. यासंदर्भातील संशोधनाचा अहवाल फिजिक्स ऑफ फ्लुएड्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार



🏆 ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद 

🔰 दश : सौदी अरेबिया


🏆 सटेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान 

🔰 दश : अफगाणिस्तान 


🏆 गरँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार 

🔰 दश : पॅलेस्टाईन


🏆 ऑर्डर ऑफ झायेद 

🔰 दश : संयुक्त अरब अमिरात 


🏆 सियोल शांती पुरस्कार 

🔰 दश : दक्षिण कोरिया


🏆 य एन चँपियन्स ऑफ द अर्थ 

🔰 सस्था : संयुक्त राष्ट्र 


🏆 गलोबल गोलकीपर पुरस्कार 

🔰 सस्था : बिल और मेलिंडा गेट्स फाउंडेशन


🏆 किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां

🔰 दश : बहरीन


🏆 निशान इज्जुद्दीन पुरस्कार

🔰 दश : मालदीव


🏆 ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू 

🔰 दश : रशिया


🏆 टाईम्स पर्सन ऑफ द ईयर : २०१६ .

काही महत्त्वपुर्ण व्यक्ती व त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट



🔰 दगल : गीता - बबिता फोगाट 

🔰 अझहर : मोहम्मद अझरुद्दीन 

🔰 नीरजा : नीरजा भनोत 

🔰 सरबजीत : सरबजीत सिंह 

🔰 अलिगढ : डॉ श्रीनिवास सिरस 

🔰 मरी कॉम : मेरी कॉम 

🔰 मांझी : दशरथ मांझी 

🔰 भाग मिल्खा भाग : मिल्खा सिंह

🔰 बांदीत क्वीन : फुलन देवी

🔰 हरीशचंद्राची फॅक्टरी : दादासाहेब फाळके

🔰 मटो : सादत हसन मंटो

🔰 शाबाश मिठू : मिताली राज

🔰 शरशाह : कैप्टन विक्रम बत्रा

🔰 "८३ : कपिल देव

🔰 झलकी : कैलाश सत्यार्थी

🔰 सरमा : संदिप सिंह

🔰 मदान : सय्यद अब्दुल रहमान

🔰 थलाईवी : जे जयललिता

🔰 गल मकई : मलाला युसुफजाई .

online Test Series

भारत ‘या’ देशाला विकणार घातक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र.


🔶‘ब्रह्मोस’ हे भारताच्या ताफ्यातील सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे.


🔶 भारत लवकरच हे क्षेपणास्त्र निर्यात करु शकतो. पुढच्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्यात एक परिषद होणार आहे. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये ‘ब्रह्मोस’च्या निर्याती संदर्भात महत्त्वाचा करार होऊ शकतो.


🔶तर हा करार प्रत्यक्षात आल्यास फिलिपिन्स हा ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेणारा भारताचा पहिला ग्राहक ठरेल.‘ब्रह्मोस’ हे भारत आणि रशियाने मिळून विकसित केलेले क्षेपणास् आहे. ब्रह्मोस एरोस्पेसची एक टीम पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये या करारासंदर्भात मनिलाला जाऊ शकते.


🔶 तसेच दोन्ही देशांमध्ये हा करार होण्याआधी काही मुद्दे आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी ही टीम मनिलाला जाणार आहे. फिलिपिन्सच्या लष्कराला जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करणाऱ्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या आवृत्तीचा पुरवठा करण्यात येईल.


🔶हवेतून जमिनीवर मारा करणारे ब्रह्मोस हे भारताचे सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. 300 किलो वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरातील चिनी युद्धनौका तसेच तिबेट आणि शिनजियांगमधील चीनच्या धावपट्टया उद्धवस्त करु शकते.


🔶तर या क्षेपणास्त्राचे वैशिष्टय म्हणजे सुखोई Su-30 MKI या फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते. त्यामुळे ब्रह्मोसमधून होणारा हल्ला अधिका घातक असेल. 


🔶 चीन बरोबर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने लडाखमध्येही हे क्षेपणास्त्र तैनात केले आहे. “भारत आणि रशिया मिळून या क्षेपणास्त्राचा पल्ला वाढवण्यावर काम करत

१३ नोव्हेंबर २०२०

परसिद्ध व्यक्तींचे मृत्यू


🔴 महत्वाचे प्रश्न 🔴


❇️परश्न 1️⃣:- सुशांतसिंग राजपुतने अभिनयाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मालिकेतून केली?


१) किस देश मे है मेरा दिल✅✅

२)पवित्र रिस्ता

३) जरा जिके दिखा

४) यापैकी नाही


❇️परश्न 2️⃣:-अभिनेता इरफान खान यांचा पहिला चित्रपट कोणता?


१)हासिल

२) चाणक्य

३) सलाम बॉम्बे✅✅

४) बनगी आपनी बात


❇️परश्न 3️⃣:- रत्नाकर मतकरी यांनी खालीलपैकी कोणत्या बँक मध्ये काम केले होते?


१) बँक ऑफ बडोदा

२) बँक ऑफ महाराष्ट्र

३) बँक ऑफ इंडिया ✅✅

४) स्टेट बँक ऑफ इंडिया


❇️परश्न 4️⃣:-आत्मनेपदी हे मनोगत खालीलपैकी कोणाचे आहे?


१)रत्नाकर मतकरी✅✅

२) जयराम कुलकर्णी

३) पाटील संजय

४) यापैकी नाही


❇️परश्न 5️⃣:- चल रे लक्ष्या मुंबई ला हे नाटक कोणाचे आहे ?


१) रत्नाकर मत्कारी

२) जयराम कुलकर्णी ✅✅

३) अर्जुन गाडगीळ

४) उत्तम तुपे


❇️परश्न 6️⃣:-  ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट कोणता?


१) शर्माजी नमकीन

२) सलामत

३) अग्निपथ

४) द बॉडी✅✅


 ❇️परश्न 7️⃣ :- रणजी स्पर्धा मध्ये सर्वाधिक बळी कोनि मिळवले आहेत?


१) राजेंद्र गोयल✅✅

२) रणजित गोयल

३) जितेंद्र गोयल

४) यापैकी नाही



 ❇️परश्न 8️⃣:- प्रसिद्ध संगीतकार वाजीद खान यांचे शेवटचे गाणे कोणते?


१) तुमको चाहते है

२) हम आपके है

३) भाई भाई✅✅

४) यापैकी नाही


 ❇️परश्र 9️⃣ :- इरफान खान यांनी खालीलपैकी कोणत्या मालिकेतून सिनेसृष्टीत प्रवेश केला?


१) सलामत

२) भारत एक खोज

३) जय हनुमान

४) चाणक्य ✅✅


 ❇️परश्न १० :- अरुण जेटली यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले नाही?


१) कायदा व न्याय मंत्री

२) वित्त मंत्री

३) संरक्षण मंत्री

४) गृह मंत्री ✅✅


चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे


Q1) कोणत्या व्यक्तीची रोखे बाजारच्या आकडेवारीसाठी धोरणांची शिफारस करण्यासाठी SEBI संस्थेनी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?

------- माधबी पुरी बुच


Q2) कोणत्या संस्थेच्यावतीने 'मेरी सहेली' उपक्रम चालवला जात आहे?

------ रेल्वे सुरक्षा दल


Q3) एशिया पॉवर इंडेक्स 2020’ यामधल्या सामर्थ्यशाली देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कोणता आहे?

------- 4 था क्रमांक


Q4) कोणत्या व्यक्तीला वैद्यकीय संशोधनासाठी "आउटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द वर्ल्ड 2020" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

-------  जाजिनी व्हर्गीस


Q5) भारतीय हवाई दलात सेवा दिलेल्या पहिल्या महिला अधिकारीचे नाव काय आहे, ज्यांचे नुकतेच निधन झाले?

------- विजयालक्ष्मी रामानन


Q6) कोणत्या मंत्रालयाच्यावतीने “लाइफ इन मिनीएचर” प्रकल्पाचा आरंभ करण्यात आला आहे?

-------- सांस्कृतिक मंत्रालय


Q7) कोणत्या संस्थेनी ‘स्टेट ऑफ द ग्लोबल एअर (SOGA) 2020’ अहवाल प्रसिद्ध केला?

--------  हेल्थ इफेक्ट इंस्टीट्यूट


Q8) मानवी शरीराच्या कोणत्या भागात “ट्युबरिअल सलायवरी ग्लॅंड” आहे?

---------  ग्रसनी यामध्ये


Q9) 'पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर’ हे कोणत्या भारतीयाचे आत्मचरित्र आहे?

-------- एन. के. सिंग (15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष )


Q10) कोणत्या कंपनीची निवड NASA संस्थेनी चंद्रावर 4G सेल्युलर नेटवर्क तैनात करण्यासाठी केली?

--------  नोकिया


Q1) कोणत्या राज्य सरकारने जमीन व मालमत्ता-संबंधित सर्व माहिती ऑनलाइन मिळविण्यासाठी ‘धरणी’ संकेतस्थळ तयार केले?

------- तेलंगणा


Q2) कोणत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ देशात ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा केला जातो?

-------  सरदार वल्लभभाई पटेल


Q3) कोणत्या मंत्रालयाने “SERB-POWER” नावाच्या उपक्रमाचा आरंभ केला?

------- विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय


Q4) कोणत्या दलाने राजस्थानमध्ये 'फिट इंडिया वॉकथॉन' आयोजित केले?

-------- भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP)


Q5) कोणत्या संस्थेनी 'डूईंग बिझनेस इन इंडिया रिपोर्ट, 2020' हा अहवाल प्रसिद्ध केला?

------- UK-इंडिया बिझिनेस कौन्सिल


Q6) कोणत्या व्यक्तीची भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूक झाली?

-------- यशवर्धन कुमार सिन्हा


Q7) कोणत्या कंपनीने डिजिटल कौशल्यासह 1 लक्ष महिलांना सक्षम करण्यासाठी NSDC संस्थेसोबत एक सहकार्य करार केला?

-------- मायक्रोसॉफ्ट


Q8) कोणते मंत्रालय NABCB कडून मान्यता प्राप्त झालेली राष्ट्रीय उत्पादकता परिषद नियमित करते?

--------- वाणिज्य व उद्योग मंत्रालय


Q9) कोणता ‘संयुक्त राष्ट्रसंघ अणुशस्त्रे प्रतिबंधक करार’ याला मान्यता देणारा 50वा देश ठरला?

------- होंडुरास


Q10) कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात भारतातले पहिले ‘वालुधन्व उद्यान’ बांधले जाणार आहे?

-------- गोवा

यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार.


🔰राज्यातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता ७ डिसेंबर २०२० पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठीकीमध्ये घेण्यात आला आहे. मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली.


🔰हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आयोजित करण्यात येते, पण सध्याची राज्यातील करोनाची परिस्थिती पाहता, यंदा ते नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, ७ डिसेंबर २०२० रोजी अधिवेशन घेता येईल का? किती दिवस घ्यायचे? याबाबतही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.


🔰बठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणाऱ्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला. अनेक विधिमंडळ सदस्यांनी नागपूर येथे कोविडच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन घेणे उचित होणार नाही अशा सूचना यावेळी केल्या.


🔰या बैठकीस विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे) संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय कार्यालयांत मराठी भाषा आता सक्तीची


🔰केंद्र शासनाच्या सर्व कार्यालयांत इंग्रजी व हिंदीबरोबरच स्थानिक भाषा म्हणजेच मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक केले आहे.


🔰तर ते न करणारे कार्यालय जिल्ह्यात आढळल्यास त्याच्या प्रमुखास निमंत्रक करून त्यास पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मराठीचा वापर करण्यास प्राधान्य देण्याचे लक्षात आणून देणे आवश्यक आहे.


🔰तसेच यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी भाषा संचालनालयास अहवाल देण्याचे आदेश राज्य शासनाने 6 नोव्हेंबर रोजी जारी केले आहेत.


🔰राज्यातील केंद्र शासनाच्या राजभाषा विभागाने हिंदी व इंग्रजीबरोबर प्रादेशिक मराठी भाषेचा वापर प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


🔰यानुसार, राज्यासह जिल्ह्यातील केंद्रीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, विमा कंपन्या, रेल्वे तसेच अन्य केंद्रीय आस्थापनांच्या कार्यालयांत मराठी भाषेचा वापर करण्यात येतो यावर लक्ष केंद्रित करून अहवाल तयार करण्याच्या कामासाठी जिल्हा व तालुका स्तरावर गट-ब च्या दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांमधून एका समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक आदेशही आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत.

भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)



🌀 फनी : ओडिशा , पश्र्चिम बंगाल 

✔️ नाव दिले : बांग्लादेश


🌀 वायु : भारत , पाकिस्तान

✔️ नाव दिले : भारत 


🌀 हिक्का : गुजरात

✔️ नाव दिले : मालदीव 


🌀 महा : ओमान , श्रीलंका , भारत 

✔️ नाव दिले : ओमान


🌀 बलबुल : बांग्लादेश , भारत

✔️ नाव दिले : पाकिस्तान


🌀 कयार : सोमालिया , भारत , येमन

✔️ नाव दिले : म्यानमार 


🌀 पवन : सोमालिया , भारत 

✔️ नाव दिले : श्रीलंका 


🌀 अम्फान : ओडिशा , पश्र्चिम बंगाल

✔️ नाव दिले : थायलंड


🌀 निसर्ग : महाराष्ट्र , गोवा , गुजरात

✔️ नाव दिले : बांग्लादेश .

भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी


🔶 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. 


🔶 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.


📚 सविधानात घेतलेल्या गोष्टी : देश📚


▪️ मलभूत हक्क : अमेरिका

▪️ नयायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪️ नयायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪️ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪️ ससदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪️ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪️ सघराज्य पद्धत : कॅनडा

▪️ शष अधिकार : कॅनडा'

▪️ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪️ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪️ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪️ ससदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

चालू घडामोडीचे प्रश्न व सविस्तर उत्तरे


1) भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद  यांनी पहिला विदेश दौरा कोणत्या देशाचा केला..

👉जिबूती ( द आफ्रिका) 


2) कर्नाटक राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे..

👉निलमनी राजू


3) भारत स्वतंत्र नंतर चे पहिले काँग्रेस अध्यक्ष कोण होते..

👉आचार्य कृपलानी सध्या चे आहे राहुल गांधी 18 वे


4) 7 व्या  आयोगाचे सचिव म्हणून कोनाची नियुक्ती करण्यात आली आहे ..

👉 मीना अग्रवाल


5) नुकतीच परकीय 100 चित्रपटाची यादी जाहीर करण्यात आली आहे त्या मध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाचा समावेश आहे.

👉 जगातील सर्वोत्कृष्ट 100 चित्रपटांत सत्यजित रे यांचा बंगाली भाषेतील 'पाथेर पांचाली' 

भाषा - बंगाली  (100 चित्रपट मध्ये 15व्या स्थानी) 

 BBC :-  प्रथम स्थानी जपानी चित्रपट 'सेवन सामुराई'


6) ओडिशातिल झारसुगुडा विमानतळाचे नामांतर करून कोणते नाव देण्यात आले आहे .

👉वीर सुरेंद्र साई विमानतळ

(ओडिशातील स्वातंत्र्य सैनिक आहेत.)


7) FTII च्या अध्यक्ष पदाचा अनुपम खेर यांनी नुकताच राजीनामा दिला याची स्थापना कोणत्या वर्षी झाली.

👉 1960 या वर्षी


8) धर्म गार्डीयन -2018 "युध्दसराव कोणत्या दोन देशा  दरम्यान होत आहेत.

👉भारत × जपान ( मिझोराम)


9) इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस महानिरीक्षक पदी  कोणाची निवड करण्यात आली आहे.(ITBP) 

👉एस.एस. देवसाल आगोदर:- आर के पचानंदा ....स्थापना :- 24 ऑक्टोबर 1962


10) "हॉल ऑफ फेम "पुरस्काराने कोणत्या भारतीय खेळाडूला  सन्मानित करण्यात आले..

👉 राहुल द्रविड ( पाचवा भारतीय खेळाडू द वॉल म्हणून प्रसिद्ध )


1)  Indian Ocean Rim Association (IORA) च्या 18 वी परराष्ट्र मंत्री स्तरीय परिषद कोठे संपन्न झाली..

- डर्बन (दक्षिण आफ्रिका)


2) अवनी ची शिकार करणारा शार्पशूटर चे नाव काय आहे..

- असगर अली खान


3) भारतीय क्रिकेट संघात चायना मॅन म्हणून कोणत्या खेळाडूला ओळखतात..

- कुलदीप यादव


4) CBI चे संचालक कोण आहेत..

- अलोक वर्मा 


5) भारतीय अंतराळ संशोधन ( ISRO) मुख्यालय कोठे आहे.

- बंगरुळू


6) T20 मध्ये शतक झळकवणारी प्रथम भारतीय महिला कोण.

- हनप्रित कौर (कर्णधार )


7) ओडिशा या राज्याने शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरु केली.

- सौर जल निधी योजना


8) केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे.( CTU ) 

- आंध्रप्रदेश 


9) भारतीय सैनिकाच्या सन्मानार्थ कोणत्या देशात स्मारक उभारण्यात आले.

- ब्रिटन ( नाव लायन्स ऑफ द ग्रेट  वॉर


10) लालन सारंग कोण होत्या ..

- बंडखोर अभिनेत्री  अशी त्यांची ओळख होती..


महाराष्ट्रातील महामंडळे


१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२


२) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६


३) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२


४) महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२


५) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८


६) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२


७) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५


८) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१


९) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित) - १९६३


१०) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५


११) मराठवाडा विकास महामंडळ - १९६७


१२) कोकण विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०


१३) विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०


१४) महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६


१५) विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७


१६) कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७


१७) तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७


१८) गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८


१९) महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८


२०) म्हाडा - १९७६


महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग

 


🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.३.

🚍 मबई  〰️ आग्रा.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.४.

🚍 मबई  〰️ चन्नई.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ब.

🚍 नहावासेवा 〰️ पळस्पे.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.६.

🚍 धळे 〰️ कोलकत्ता.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.७.

🚍 वाराणसी 〰️ कन्याकुमारी.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.८.

🚍 मबई 〰️ दिल्ली .



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.९.

🚍 पणे 〰️ विजयवाडा.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१३.

🚍 सोलापूर 〰️चित्रदुर्ग.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१६.

🚍 निझामाबाद〰️ जगदाळपूर.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१७.

🚍 पणवेल 〰️ मगळूर.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.५०.

🚍 पणे 〰️ नाशिक .

मराठी व्याकरण


प्रश्न(१) 'दादा पायी चालत आले' या वाक्यातील 'पायी' या सप्तमी विभक्तीच्या रूपाचा कारकार्थ कोणता? 

१) अधिकरण

२) करण✅

३) अपदान

४) कर्ता

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(२) योग्य पर्याय निवडा

मृच्छकटीक 

१) मृच्छ + कटिक

२) मृत + छकटिक

3) मृत्+ शकटिक✅

४) मृच्च + कटिक

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(३) मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शाषणाने ---------- यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

१) शाम मनोहर

२) कोतिकराव ठाले पाटील

३) नरेन्द्र जाधव

४) रंगनाथ पठारे✅

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(४) 'अधोमुख' या शब्दाचा विरुद्ध अर्थ सांगा.

१) संमुख

२) उन्मुख✅

३) विमुख

४) दुर्मुख

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(५) 'अश्वत्थ' या शब्दाचा समान अर्थ -

१) वड

२) पिंपळ✅

३) कदंब

४) उंबर

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(६) योग्य शब्दाची निवड करा.

पिस्तुल पाहून साक्षीदाराला न्यायालयातच  ........... आली.

१) घेरी

२) चक्कर

३) मूर्च्छा✅

४) भोवळ

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(७) पद्याची रचना ज्या शास्त्राच्या आधाराने होत असते किंवा अनेक प्रकारच्या पद्यांवरून जे शास्त्र तयार झालेले आहे त्याचे नाव कोणते?

१) काव्यशास्त्र

२) साहित्यशास्त्र

३) टीकाशास्त्र

४) छंदशास्र ✅

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(८) " होते जनात अपकीर्ती निरक्षरांची" या काव्यातील वृत्ते ओळखा.

१) इद्रवज्रा

२) उपेंद्रवज्रा

३) भ्रांतिमान

४) वसंततिलिका✅

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(९) पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत? 

म   स   ज   स   त   त   ग 

१) भुजंगप्रयात

२) वसंततिलिका

३) आर्या

४) शार्दूलर्विक्रीडित✅

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(१०) चुकीची जोडी ओळखा.

१) सलाम - मंगेश पाडगावकर

२) पैस - दुर्गा भागवत

३) झोंबी - आनंद गायकवाड✅

४) खूणगाठी - ना.घ. देशपांडे

🍁🍁🍁🍁🍁🍁

Online Test Series

१२ नोव्हेंबर २०२०

पदवीधर मतदान म्हणजे काय?


पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020


आपल्याकडे ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत सर्वच निवडणुकांना महत्व आहे. परंतु दुर्दैवाने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही. कित्येकांना तर अशी काही निवडणूक असते हेच मुळात माहीत नाही म्हणून हा माहिती देण्याचा प्रपंच… 


आपल्या महाराष्ट्र राज्यात विधानसभा आणि विधानपरिषद अशी दोन कायदेमंडळ गृहे आहेत हे आपण नागरिकशास्त्रात वाचले असेलच. महाराष्ट्रासह भारतातील एकूण सात राज्यात अशी द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा समावेश होतो. या सर्व राज्यांमध्ये विधानसभेसोबत विधानपरिषदेचेही कामकाज चालते. विधानसभेच्या सदस्यांना इंग्रजीत MLA म्हणतात तसे विधानपरिषदेच्या सदस्यांना MLC (Member of Legislative Council) असे संबोधले जाते. नुकतीच आपली विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे तिथले सदस्य कसे निवडले जातात हे सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु विधानपरिषदेचे सदस्य कसे निवडले जातात याची थोडी कल्पना असणे गरजेचे आहे. 


महाराष्‍ट्र विधानपरिषदेत एकूण 78 सदस्य कार्यरत असतात. त्यापैकी 31 सदस्य विधानसभेतून, 21 सदस्य स्थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधून, 12 सदस्य राज्‍यपालांच्या नेमणूकीमधून, 7 सदस्‍य शिक्षक मतदार संघातून आणि 7 सदस्‍य 'पदवीधर' मतदार संघातून निवडले जातात. विधानपरिषदेच्या सदस्यांच्या निवडी एकाचवेळी होत नाहीत. विधान परिषद हे कायम सभागृह असते. त्‍यातील सदस्यांचा सहा वर्षाचा कार्यकाळ असतो आणि दर दोन वर्षानी एक तृतीयांश सभासद निवृत्त होत असतात व तितकेच नवीन नेमले जातात. आपल्या महाराष्‍ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. त्यात सात पदवीधर मतदारसंघ मुंबई, पुणे, कोकण, औरंगाबाद, नागपुर, नाशिक आणि अमरावती याप्रमाणे विभागले गेले आहेत. 


आता येणाऱ्या काळात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. पण मी त्याबद्दल आजच का सांगतोय? कारण या निवडणुकीसाठी मतदार म्हणून नाव नोंदनी वेळ संपली आहे.  

लक्षात घ्या, सामान्य नागरिक म्हणून आपली जशी कर्तव्ये आणि अधिकार असतात तसेच अधिकार पदवीधर म्हणूनही असतात. ग्रॅज्युएट झाल्यावर घटनेने आपल्याला आपला प्रतिनिधी निवडायची संधी दिली असते. हा आपण निवडलेला प्रतिनिधी आपल्या समस्या सभागृहात मांडतो आणि त्याचा पाठपुरावा करतो. जर तो तसे करत नसेल तर त्याला जाब विचारण्याचा अधिकारही आपल्याला आहे. आपण अपेक्षेप्रमाणे कामे झाली नाही तर आमदाराला जाब विचारतोच ना? मग निवडून गेलेला पदवीधर प्रतिनिधी नेमकं काय करतोय हे ही जाणून घ्यायला हवंच की.  


● पदवीधर मतदार नोंदणीकरिता पात्रता:

१. तो भारताचा नागरीक असावा.

२. तो मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्‍या किमान ३ वर्षापूर्वी, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्‍सम विद्‍यापिठाचा पदवीधर असावा.

३. सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असावा

४. त्‍याने विहित कागदपत्रांसह फॉर्म क्र. १८ भरावा.

५. पदविका (Diploma) जर पदवीतूल्‍य असेल तरच पदवीधर गृहित धरण्‍यात येईल.  


● पदवीधर मतदार नोंदणीकरिता आवश्‍यक इतर कागदपत्रे:

१. रहिवासाचा पुरावा. (पासपोर्ट, वाहन अनुज्ञप्‍ती, टेलीफोन/विज बिल किंवा इतर मान्‍यताप्राप्‍त कागदपत्रांची साक्षांकित प्रत.)

२. मार्क लिस्‍टची साक्षांकित प्रत.

३. पदवी/पदविकेची साक्षांकित प्रत.

४. विवाहित महिलेने विवाहानंतर नाव बदलले असल्‍यास त्‍याबाबतचे राजपत्र, पॅन कार्ड, राजपत्र नसल्‍यास प्रतिज्ञापत्र.

५. प्रमाणपत्रांचे साक्षांकन संबंधित जिल्ह्यात कार्यरत तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी, किंवा शासन मान्‍यता प्राप्‍त विद्‍यालयाचे प्राचार्य किंवा जिल्ह्यातील अन्‍य राजपत्रित अधिकार्‍यांकडून करून घ्‍यावे. 

६. ही कागदपत्रे आपण तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय येथे जमा करू शकता. 


● मतदान पद्धत 

- पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान हे मतपत्रिकेवर होते.

- मतपत्रिकेवर नमुद उमेदवार क्रमांकानुसार, उमेदवारांना पसंती क्रमांक द्यायचा असतो.

- सर्वात पहिली पसंती असणा-या उमेदवारासमोर मराठी, इंग्रजी किंवा रोमन यापैकी एका भाषेतील आकडय़ांमध्ये अंक लिहिता येतो.

- पसंती क्रमांक लिहिताना तो एका भाषेतील आकडय़ांमध्येच लिहावा. उदाहरणार्थ (१, २, ३ असे मराठीत किंवा 1, 2, 3 असे इंग्रजीत पसंतीनुसार आकडे लिहिता येतील). 

- मतपत्रिकेवर पसंती क्रमांक सोडून दुस-या कसल्याही खाणाखुणा करू नयेत. 

- मतपत्रिकेवर पसंती क्रमांक लिहिताना स्वत:चा पेन किंवा पेन्सिल वापरण्यास परवानगी नाही. जांभळ्या रंगाचा स्केच पेन मतदान केंद्रावर मतदारांना दिला जातो, त्याचाच वापर मतदानासाठी करण्‍यात यावा. अन्‍यथा मत बाद ठरेल.  

- "वरीलपैकी कोणी पर्याय नाही" (नोटा) हा पर्याय मतपत्रिकेवर उपलब्ध असतो.

- 'नोटा' किंवा पसंती क्रमाने मत देता येते. यापैकी एकच पर्याय मतदारांनी वापरावा.

मी कधी असे आवाहन करत नाही, पण यावेळी करतो... पोस्ट जास्तीतजास्त शेअर करा... आपले मतदान अमूल्य असते

आपण सुशिक्षित मतदार आहात 

आपले मतदानाने योग्य उमेदवार निवडा

----- ------


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

११ नोव्हेंबर २०२०

प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल


🛑 असमपृष्ठरज्जू प्राणी 🛑


🔶प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.


🔶पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा


🔶 सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन


🔶 प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म


🔶 नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म


🔶 अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस


🔶 आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी


🔶 मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय


🔶 इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर


🔶हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

काकोरी कट (Kakori conspiracy)



🔰9 ऑगस्ट 1925🔰


🔰लखनौ ते सहारनपूर दरम्यान काकोरी


🔰सहभाग:- चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, मन्मथनाथ गुप्ता, अशफाक उल्लाखान, राजेंद्रनाथ लाहिडी, रोशनलाल इत्यादी क्रांतिकारक अग्रणी होते. (एकून 10 जणांचा समावेश) 


🔰बरिटिशांच्याविरुद्ध सशस्त्र लढा देण्याच्या हेतूने काकोरी (उत्तर प्रदेश) येथे घडवून आणलेला प्रसिद्ध क्रांतिकारी कट.


🔰सरकारी पोस्ट कार्यालयांमध्ये जमा झालेला पैसा रेल्वे मार्गाने जाणार असल्याची माहिती क्रांतिकारकांना मिळाली


🔰लखनौ ते सहारनपूर मार्गावर लखनौपासून आठ मैल अंतरावर असलेल्या काकोरी या गावाजवळ सशस्त्र क्रांतिकारकांनी रेल्वे थांबवून त्यातील खजिना लुटावा अशी योजना आखली.


🔰 9 ऑगस्ट 1925 रोजी क्रांतिकारक सरकारी खजिना घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यात जाऊन बसले. रेल्वे आडवळणी अशा काकोरी स्थानकाजवळ येताच त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली


🔰रामप्रसाद बिस्मिल यांनी चैन खेचुन रेल्वे थांबवली


🔰कवळ दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही नियोजित लूट यशस्वी केली. या घटनेलाच ‘काकोरी कट’ असे म्हणतात.


🔰या कटात जवळपास 8000 रुपये लुटले


🔰काकोरी खटल्याचे कामकाज एप्रिल १९२७ पर्यंत चालले.


🔰यामधील रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाखान, रोशनलाल व राजेंद्रनाथ लाहिडी यांना फाशी दिली


🔰कारस्थानांमध्ये सहभागी असलेले चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांना गुंगारा देऊन भूमिगत राहिले.


🔰सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशाने चंद्रशेखर आझाद यांनी ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशनʼ या जुन्या संस्थेचे ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोशिएशनʼ असे नामकरण करून क्रांतिकार्य चालू ठेवले.

वाचा :- महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने



1) गाडगे महाराज - अमरावती


2) समर्थ रामदास- सज्जनगड


3) संत एकनाथ - पैठण


4) गजानन महाराज - शेगाव


5) संत ज्ञानेश्वर - आळंदी


6) संत गोरोबा कुंभार - ढोकी


7) संत चोखा मेळा - पंढरपूर


8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी


9) संत तुकडोजी  - मोझरी


10) संत तुकाराम - देहू


11) साईबाबा - शिर्डी


12) जनार्दन स्वामी - कोपरगाव 


13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर


14) दामाजी पंत - मंगळवेढा


15) श्रीधरस्वामी - पंढरपूर


16) गुरुगोविंदसिंह - नांदेड


17) रामदासस्वामी - जांब


18) सोपानदेव - आपेगाव


19) गोविंदप्रभू - रिधपुर


20) जनाबाई - गंगाखेड


21) निवृत्तीनाथ - आपेगाव

भारतीय क्षेपणास्त्रे




1. बराक 8 - भारत-इस्त्रायलच्या संयुक्त विध्यमाने, 70 किमी क्षमता, जमिनीवरून हवेत मारा.


2. निर्भय - 1000 किमी पल्ला, डिआरडिओ तर्फे विकसित.


3. पिनाका अग्निबाण प्रणाली 6 - अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.


4. आकाश - एकामागोमाग एक तीन क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता, हवाई दलात तैनात. (जमिनीवरून हवेत मारा करणारे)


5. अस्त्र-सुखोई 30 - विमानांवर तैनात, स्वदेशी बनावटीचे, पल्ला 60 किलोमीटर (हवेतून हवेत मारा करणारे.)


6. पृथ्वी संरक्षण प्रणाली - हवामानाच्या थरांबाहेर 120 किलोमीटरवर शत्रूच्या क्षेपस्त्रांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता. (जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे)


7. ब्राम्होस - पल्ला 300 किमी, गती 2.8 माक, आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, अण्वस्त्रवहन क्षमता.


8. त्रिशूल - जमिनीवरून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्राविरोधी क्षेपणास्त्र.


9. नाग - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र.


10. सूर्या - आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र.


11. सागरिका - पाण्याखालून मारा करणारे क्षेपणास्त्र. पाणबुडीवरून जमिनीवर मारा करणारे.


12. शौर्य - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.


13. धनुष - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.

अमेरिकेने टाकलेला 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' म्हणजे नेमके काय?

 


अमेरिकेने अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतात आयसिसला लक्ष्य करताना जीबीयू-४३/बी मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट (एमओएबी) नावाचा बॉम्ब टाकला. या बॉम्बला 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' असेही म्हटले जाते. अफगाणिस्तानातील आयसिसच्या तळांना लक्ष्य करत अमेरिकेने सर्वाधिक मोठा बॉम्ब हल्ला केला आहे. या कारवाईनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याचे अभिनंदन केले.


मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्टचा वापर शत्रूवर मानसिक दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने केला जातो. गुरुवारी अमेरिकेने या बॉम्बचा वापर करण्याआधी कोणत्याही देशाने या बॉम्बचा वापर केला नव्हता. त्यामुळे मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्टचा वापर करणारा अमेरिका हा पहिला देश ठरला आहे. अनेक वृत्तांनुसार, अफगाणिस्तानातील नंगरहारमध्ये या बॉम्बच्या वापरानंतर तब्बल ३०० मीटरचा खड्डा पडला आहे.


मदर ऑफ ऑल बॉम्ब नावाने ओळखल्या जाणाऱ्या बॉम्बला जाळीदार पंख असतात. बॉम्ब आकाशातून टाकण्यात आल्यानंतर पंख बॉम्बच्या वजनाला नियंत्रित करतात. हा बॉम्ब इतका मोठा असतो की तो फक्त विमानाच्या माध्यमातूनच टाकला जाऊ शकतो. या बॉम्बला पॅलेटवर ठेवले जाते. यानंतर पॅराशूटच्या मदतीने बॉम्बला विमानाबाहेर टाकले जाते. पॅराशूटच्या मदतीने पॅलेटला खेचण्यात आल्यानंतर पॅलेट बॉम्बपासून वेगळे करण्यात येते आणि त्यानंतर बॉम्ब टार्गेटवर टाकला जातो. यानंतर बॉम्ब लक्ष्याच्या दिशेने वेगाने जातो. उपग्रहाच्या माध्यमातून या बॉम्बचे नियंत्रण केले जाते.


जमिनीपासून सहा फूट अंतरावर बॉम्बचा स्फोट घडवण्यात येतो. बॉम्ब स्फोटाची तीव्रता जास्तीत जास्त राखण्यासाठी जमिनीपासून काही अंतरावर असतानाच स्फोट घडवला जातो. मोठे लक्ष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि जमिनीवरील सैन्याला, शस्त्रास्त्र साठ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी मदर ऑफ ऑल बॉम्बचा वापर केला जातो. या स्फोटाची तीव्रता ११ टिएनटी बॉम्बच्या स्फोटांएवढी असते. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणूबॉम्बमध्ये १५ टन टिएनटी स्फोटके होती.


२००३ मध्ये इराक युद्धादरम्यान अमेरिकेने एमओएबी बॉम्बची चाचणी घेतली होती. मात्र अद्यापपर्यंत अमेरिकेसह कोणत्याही देशाने या बॉम्बचा वापर केला नव्हता. अमेरिकेने मदर ऑफ ऑप बॉम्बची निर्मिती केल्यावर रशियाने त्यापेक्षा चारपट अधिक संहारक बॉम्बची निर्मिती करत त्याला फादर ऑफ ऑल बॉम्ब असे नाव दिले. मदर ऑफ ऑप बॉम्ब ३० फूट लांब आणि ४० इंच रुंद असतो. या बॉम्बचे वजन ९ हजार ५०० किलो असते. या बॉम्बचे वजन हिरोशिमामध्ये टाकण्यात आलेल्या बॉम्बपेक्षा जास्त होते.


मदर ऑफ ऑल बॉम्ब अतिशय विध्वंसक असतो. या बॉम्बच्या स्फोटानंतर सर्व दिशांना साधारणत: एका मैलापर्यंत नुकसान होते. मात्र अणूबॉम्ब नसल्याने यामुळे कोणताही किरणोत्सार होत नाही. या स्फोटानंतरच्या अवघ्या काही सेकंदांनतर आसपासच्या भागातील ऑक्सिजन संपतो. त्यामुळे परिसरातील लोकांचा श्वास गुदमरतो. स्फोटाच्या आवाजानंतर एक प्रकाशाचा किरण निघतो आणि एक विध्वंसक लाट एका मैलापर्यंत जाऊन तिच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे जबरदस्त नुकसान करते. यामुळे बहुतांश लोकांचा मृत्यू होता. अनेकांच्या कानांमधून रक्तस्राव सुरु होतो. परिसरातील झाडे उन्मळून पडतात आणि इमारती कोसळतात.


जिभेचा रंग काय सांगतो ?



अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. कधी तुम्ही हा विचार केला आहे का की तुमची जीभ पाहुण डॉक्टरला आजाराचं निदान कसं होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतो.

जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण.


 काय सांगते तुमची जीभ.


१. गुलाबी रंग - गुलाबी रंगाची जीभेवर जर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील तर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आहात.


२. तुमच्या जीभेवर जर सफेद रंगाचा थर असेल तर तुमच्या पचन क्रिया व्यवस्थित नाही. तुमच्यात अशक्तपणा आहे. काही वेळेस हे वायरल इंफेक्शनचा ही प्रकार असू शकतो.


३. पिवळा रंग - पिवळा रंग सांगतो की तुम्हाला सर्दी, वायरल इंफेक्शन किंवा तुमच्या शरिरात हिट वाढली आहे. काही वेळेस हा पचन न होण्याच्या समस्येचंही संकेत देतो.


४. लाल रंग - लाल रंगाची जीभ ताप, रक्तात उष्णता वाढणे किंवा अंतर्गत जखम आणि इंफेक्शनचं संकेत देते.


५. कोरडी जीभ - जीभ कोरडी पडणे आणि पिवळी पडणे म्हणजे काविळ, अशक्तपणा, कमी झोप, आतड्यांना सूज थकवा याचे संकेत देते.


६. निळा रंग - शरिरात विटामिन बी-2 ची कमतरता आणि महिलांना दुखणे याचा संकेत देते. कोणत्याही औषधाच्या साईड इफेक्टमुळे देखील जीभ निळी पडते.


७. जीभेचा सर्वात पुढचा भाग लाल होणं हा मानसिक समस्येचं संकेत देतो.


८. जीभेछ्च्यावर अनेकदा सफेद डाग तयार होतात हे इंफेक्शन आणि अधिक घाम येण्याचे संकेत असतात.

महत्वाच्या संज्ञा




*काचेचा रंग - वापरावयाची धातूसंयुगे*


 लाल - क्युप्रस ऑक्साइड


निळा - कोबाल्ट ऑक्साइड


हिरवा - क्रोमीअम ऑक्साइड किंवा फेरस ऑक्साइड


जांभळा - मॅगनीज डाय ऑक्साइड


पिवळा - अॅटीमनी सल्फाइड


दुधी - टिन ऑक्साइड किंवा कॅल्शिअम सल्फेट 


*समीश्रे - घटक*


 पितळ - तांबे+जस्त


ब्रांझ - तांबे+कथिल


अल्युमिनीअम ब्रांझ - तांबे+अॅल्युमिनीअम


जर्मन सिल्व्हर - तांबे+जस्त+निकेल


गनमेटल - तांबे+जस्त+कथिल


ड्युरॅल्युमिनीअम - तांबे+अॅल्युमिनीअम+मॅग्नेशियम


मॅग्नेलियम - मॅग्नेशियम+अॅल्युमिनीअम


स्टेनलेस स्टील - क्रोमियम+लोखंड+कार्बन


नायक्रोम -    लोह+निकेल+क्रोमियम+मॅगेनीज 


*व्यावहारिक नाव - शास्त्रीय नाव*


 मार्श गॅस - मिथेन             


 खाण्याचा - सोडीयम बाय कार्बोनेट


धुण्याचा सोडा - सोडीयम कार्बोनेट


मीठ - सोडीयम क्लोराइड


व्हाईट व्हिट्रीऑल - झिंक सल्फेट


ब्ल्यु व्हिट्रीऑल - कॉपर सल्फेट


ग्रीन व्हिट्रीऑल - फेरस सल्फेट


जलकाच -    सोडीयम सिलिकेट


फॉस्जीन - कार्बोनिल क्लोराइड


जिप्सम सॉल्ट - मॅग्नेशियम सल्फेट


ग्लोबर्स सॉल्ट - सोडीयम सल्फेट


बेकिंग सोडा - सोडीयम बाय कार्बोनेट


फेरस अमोनियम सल्फेट - मोहर सॉल्ट


ल्युनर कॉस्टीक - सिल्व्हर नायट्रेट


संगमवर - कॅल्शियम कार्बोनेट


मोरचूद - कॉपर सल्फेट


रडार




रेडिओ डिटेकशन अँड रेजिंग


💎```हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे याच्या दृष्टीक्षेपात येणाऱ्या,हलणाऱ्या व स्तब्ध वस्तूंची नोंद घेऊ शकते डोळ्याला न दिसणाऱ्या वस्तूंची दिशा ,अंतर,उंची आणि वेग यांची माहिती करून घेण्याची क्षमता या उपकरणात आहे.```


💎```रडार चा मूळ उद्देश वस्तूंचे अस्तिस्त्व नोंदणे

आपल्या डोळ्यांना वस्तू दिसण्याचे कारण प्रकाशाच्या लहरी वस्तूवर पडतात आणि तेथून त्या आपल्या डोळ्यांच्या दिशेने  परावर्तित होतात .आपल्या डोळ्यामध्ये प्रतिबिंबित होतात.```


💎```रडार शक्तिशाली रेडिओ ट्रांसमीटर (प्रक्षेपक यंत्र)वापरून रेडिओ लहरींचे प्रक्षेपण करून वस्तू प्रकाशमान करतो```


💎```संवेदनाक्षम रेडिओ receiver परावर्तित लहरींचा शोध घेतो अशा परावर्तित लहरींना प्रतिध्वनी म्हणतात

या लहरी दूरध्वनी यंत्राच्या श्रावकामार्फत इलेक्टरोनिकसच्या साहाय्याने पडद्यावर प्रदर्शित केल्या जातात```


💎```या प्रकाशाचे ठिपके किंवा प्रत्यक्ष वस्तूंचे प्रतिबिंब्या स्वरूपात दिसते```


💎```दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे यंत्र सैन्याच्या वापरासाठी ,विमान,व युद्धनौका यांचा शोध घेण्यासाठी होते

आता हे यंत्र विमान व नौकांच्या मार्गदर्शनासाठी,वादळे किंवा आकाशातील इतर गोंधळ तसेच ग्रह उपग्रह यांच्या अभ्यासासाठी वापरले जाते```


धवनी:



'ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना'.

ध्वनीचे स्वरूप :'ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते'.


ध्वनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.


प्रत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.


कंपन : वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.


उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने




ध्वनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.


वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.


ध्वनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.


ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.


प्रत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्‍यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.

ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये :


जेव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.


संपीडने : कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.


संपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.


विरलने : कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.


विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.


दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.


त्याचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.


वारंवारता :


घनतेचे उच्चतम किंमतीपासून कमीत कमी किंमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किंमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो.


एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय.


ध्वनी तरंगाची वारंवारता ग्रीक अक्षर न्यू ने दर्शवितात.


त्याचे SI पद्धतीत एकक हर्टझ असून ते Hz ने दर्शवितात.


(note- हर्टंझ (1857-1894) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. सर्वप्रथम त्यांनी बिनतारी संदेशवहनाचे प्रसारण व तरंगांची स्वीकृत केली. )

तरंगकाल :


लगतची दोन संपीडणे किंवा विरलने यांना ठराविक बिंदु पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे 'तरंगकाल' होय.


माध्यमाच्या घनतेमध्ये एक संपूर्ण आंदोलन होण्यास लागणारा वेळ हा ध्वनी लहरीचा तरंगकाल असतो.


तो 'T'ने दर्शविला जातो.


SI पद्धतीत तरंगकालाचे एकक सेकंद आहे.


u=1/t



ध्वनीचा वेग :


तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदुने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय.


वेग=अंतर/काल


एका तरंगकालात कापलेले अंतर,


वेग= तरंगलांबी/तरंगकाल


वेग= वारंवारता*तरंगलांबी


मानवी श्रवण मर्यादा :


मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा सुमारे 20 हर्टझ ते 20,000 हर्टझ आहे.


पाच वर्षाच्या आतील मुले आणि कुत्र्यांसारखे काही प्राणी 25000 हर्टझ पर्यंत ध्वनी एकू शकतात.



श्रव्यातील ध्वनी :


20000 हर्टझ पेक्षा अधिक वारंवारता असणार्‍या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असे म्हणतात.


निसर्गात डॉल्फिन्स, वटवाघुळे, उंदीर वगैरे तो निर्माण करू शकतात.


उपयोग :


जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनी उपयोगी ठरते.

ध्वनीचे परिवर्तन :


ध्वनी तरंगांचे घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते.


ध्वनीच्या परावर्तनासाठी फक्त मोठ्या आकाराचा खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते.


प्रतिध्वनी :


मूल ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय.


अंतर= वेग*काल


निनाद :


एखाद्या ठिकाणाहून ध्वनी तरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन, ध्वनीतरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो.त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो त्यालाच निनाद म्हणतात.



सोनार (SONAR):


Sound Navigation And Ranging याचे लघुरूप म्हणजे SONAR होय.


पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनी तरंगाच्या उपयोग करून SONAR मोजते.

संगणकाविषयी माहिती भाग :



DOT म्हणजे - डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन

  

SSA म्हणजे - सर्व शिक्षा अभियान

  

SARI म्हणजे - सस्टेनेबल अॅक्सेस इन रूरल इंडिया

  

CIC म्हणजे - कॉम्युनिटी इन्फ्रोर्मेशन सेंटर

  

CIC ची सुरुवात झाली - 17 ऑगस्ट 2002

  

ई-वेस्ट म्हणजे - इलेक्ट्रॉनिक कचरा

  

सॉफ्टवेअर चोरी रोखण्यासाठीचा कायदा - इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अॅक्ट

  

नॅशनल अॅरोलॅटिक लॅब - बंगळुरू

  

सी-डॅक चे मुख्यालय - पुणे

  

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - मुंबई

  

'अनुराग' ही संगणकविषयक संस्था - हैदराबाद

  

संगणकाच्या चौथ्या पिढीचा कालावधी - 1970-80

  

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली हिरवी रेषा संकेत आहे - व्याकरणातील चुका

  

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली लाल रेषा संकेत आहे - स्पेलिंग मिस्टेक

  

रिसायकल बिन या चित्राने दर्शवितात - डस्ट बिन

  

नेटस्केप नेव्हीगेटर प्रकार आहे - ब्राऊझरचा

  

डॉसची आज्ञावली या भाषेत असते - अमेरिकन

  

बारकोड रिडर्सना म्हणतात - हॅन्डहेल्ड स्कॅनर

  

ई-मेल म्हणजे - इलेक्ट्रॉनिक मेलिंग

Greenhouse effect हरितगृह परिणाम


हरितगृह परिणाम:-


   सूर्याकडून पृथ्‍वीकडे येणारी ऊर्जा लघू प्रारणांच्‍या (Short Waves) रूपाने येते. पृथ्‍वीकडून उत्‍सर्जित होणारी ऊर्जा दीर्घ प्रारणांच्‍या (Lonh waves) रूपाने आढळते. वातावरणातील जलबाष्‍प, कार्बन डाय ऑक्‍साईड हे घटक सूर्याकडून पृथ्‍वीकडे येणार्‍या प्रारणांसाठी पारदर्शक आहेत. परंतु पृथ्‍वीकडून अवकाशात उत्‍सर्जित होणारी दीर्घ प्रारणे मात्र हे घटक अडवतात. वातावरणाच्‍या अध:स्‍तरात अडलेल्‍या दीर्घ प्रारणांमुळे वातावरणाचे तापमान वाढते. यालाच हरितगृह परिणाम असे म्‍हणतात.




हरितगृह परिणामामुळेच पृथ्‍वीचे वातावरण उबदार बनले आहे. त्‍यामुळेच पृथ्‍वीवर सजीव सृष्‍टीचे अस्तित्‍व आढळते. म्‍हणजेच हरितगृह परिणाम आवश्‍यक व 

उपकारक आहे. या परिणामाचा उपयोग शेतीमध्‍ये केला जातो. काही पिकांना दमट हवामानाची गरज असते. ते निर्माण करण्‍यासाठी प्‍लास्टिकचा कागद वापरून हरितगृह निर्माण केले जाते.


  प्‍लास्टिक कागदामुळे पृथ्‍वीकडून अवकाशात जाणारी दीर्घ प्रारणे अडवली जातात. त्‍यामुळे हरितगृहामधील तापमान वाढते. वाढलेल्‍या तापमानामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढते. थंड हवामानाच्‍या प्रदेशात प्‍लास्टिक कागदाऐवजी काचेचा उपयोग केला जातो. या रचनेला ग्‍लास हाऊस असे म्‍हणतात. या ग्‍लास हाऊसमध्‍ये अत्‍यंत कमी तापमान असणार्‍या प्रदेशातही पिके घेता येतात.


हरितगृह परिणामात वाढ:-

मानवाच्‍या विविध क्रियांमुळे वातावरणातील हरितगृह घटकांचे प्रमाण वाढले आहे. जलबाष्‍प, कार्बन डाय ऑक्‍साइड यांच्‍याप्रमाणेच कार्बन मोनोक्‍साइड, सल्‍फर डाय ऑक्‍साइड, सल्‍फर ट्राय ऑक्‍साइड, मिथेन, नायट्रोजन डाय ऑक्‍साइड, क्‍लोरोफ्‍ल्‍युरो कार्बन्स हेदेखील हरितगृह वायू आहेत. त्‍यांचे वातावरणातील प्रमाण लक्षणीयरि‍त्‍या वाढले आहे. त्‍यामुळे वातावरणाचे तापमान वाढत आहे. यालाच ‘जागतिक तापमानवाढ'  असे म्हणतात. ही जागतिक तापमानवाढच मानवनिर्मित हवामान बदलाचे मुख्‍य कारण आहे.



हवामान बदलाचे परिणाम अल्‍पकालीन व दीर्घकालीन स्‍वरूपाचे आढळतात:-



सागर जल पातळीत वाढ

महासागरांचे आम्‍लीकरण

मासेमारीवर परिणाम

प्रवालींचा नाश व विरंजन

हिमरेषांच्‍या उंचीत वाढ

तापमान, पाऊस, कार्बन डाय ऑक्‍साइडचे प्रमाण या घटकांचा शेतीवर मोठा प्रभाव पडतो.

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी :



1 Joule = 107 अर्ग

 

फटक्यामध्ये रासायनिक ऊर्जा साठविलेली असते.

 

ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो की, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ठही करता येत नाही. केवळ तिचे एका प्रकारातून दुसर्यार प्रकारात रूपांतर करता येते.

 

कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती होय. तसेच एकक कालात केलेले कार्य म्हणजे शक्ती होय.

 

SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.

 

१ वॅट = १ ज्युल/से = 1 N – m/s तसेच 1 HP = 746 वॅट

 

माध्यमातून प्रक्षोभाचा जो आकृतीबंध प्रवास घडतो त्या आकृतिबंधास ‘तरंग’ असे म्हणतात.

 

यांत्रिक तरंग दोन प्रकारचे असतात. १) अनुतरंग (longitudinal wave), २) अवतरंग (transverse wave)

 

ध्वनीचा कोरड्या हवेतील वेग 00से तापमानाला 332 मी/से. आहे.

 

ज्या ध्वनी तरंगाची वारंवारता २० Hz पेक्षा कमी किंवा २०,००० Hz पेक्षा जास्त असते असे ध्वनी माणसाला ऐकू येत नाहीत. त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात.

 

प्रकाशाचा वेग 3 x 108 m/s आणि ध्वनीचा वेग ३४० m/s आहे.

 

ध्वनीलहरींचे परावर्तन होऊन 1/10 सेकंदानंतर त्या आपल्या कानावर पडल्यास मूळ आवाज पुन्हा ऐकू येतो. हाच प्रतिध्वनी होय.

 

प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान १७ मी. अंतर असणे आवश्यक आहे.

 

वटवाघूळ उच्च वारंवारतेचा ध्वनी निर्माण करतात. या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी असे म्हणतात.

 

प्रतिध्वनीचे तत्व SONAR पद्धतीत वापरतात.

 

SONAR- Sound Navigation And Ranging System

 

पाण्यामध्ये ध्वनीचा वेग १४१० m/s आहे तर समुद्राच्या पाण्यात हाच वेग १५५० m/s आहे. लोखंडामध्ये ध्वनीचा वेग सुमारे ५१०० m/s आहे.

 

ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डेसिबल (decibel) हे आहे. लघुरूपात डेसिबल हे dB असे लिहितात.

 

नकोसा वाटणारा ध्वनी म्हणजे कुरव होय.

 

पाण्याचे तापमान ४°से. पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्टपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखविते.


सर्वसामान्य मानवी डोळा त्यावर ताण न देता वस्तु स्पष्ट पाहण्याचे किमान अंतर म्हणजे २५ सेंमी होय.

 

निकटदृष्टीता फक्त जवळच्या वस्तु स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन या दृष्टीदोषाचे निराकरण करता येते.

 

दूरदृष्टीता – नेत्रगोल उभट होण्याने निर्माण होतो. लांबच्या वस्तु नीटपणे दिसू शकतात. बहिर्वक भिंगाचा चष्मा वापरुन हा दोष दूर करता येतो.

 

अबिंदुकता – एकाच प्रतलातील क्षितीज समांतर रेषा व क्षितीज लंब रेषा यांच्या प्रतिमा वेगवेगळ्या प्रतलात तयार होतात. या दोषाला अबिंदुकता असे म्हणतात. दंडगोल भिंगाचा चष्मा वापरुन दूर करतात.

 

वृद्ध दृष्टीता – निकट बिंदूचे डोळ्यापासूनचे अंतर वयाबरोबर वाढते. निकटबिंदूच्या डोळ्यापासून मागे सरण्याला वृद्धदृष्टीता असे म्हणतात.

 

बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन वृद्धदृष्टीता दूर करता येते.

 

जेव्हा अबिंदुकता आणि निकटदृष्टीता किंवा दूरदृष्टीता असे दोन दोष असतील तेव्हा त्यांना घालविण्यासाठी तीन अंक दिलेले असतात.

 

साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक असेही म्हणतात. रत्नाची पारख करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी जव्हेरी याचा उपयोग करतात.

 

संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका व पदार्थभिंग अशा दोन बहिवक्र भिंगाचा बनलेला असतो.

 

अपवर्तन होताना पांढर्या  प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात अपस्करण होऊन पांढर्या. वस्तूंच्या रंगीत प्रतिमा तयार होतात. त्याला वर्णीय विपयन असे म्हणतात.

 

वस्तु दूर केल्यानंतरही १/१६ सेकंदापर्यंत प्रतिमेची दृष्टीपटलावरील ठसा तसाच राहतो. दृष्टिपटलावरील संवेदना टिकणे या परिणामाला दृष्टीसातत्य असे म्हणतात.

 

दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदुस प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवितात.

शक्ती

 


कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण म्हणजे 'शक्ती' होय.


कार्य करण्याच्या दरास 'शक्ती' म्हणतात.


केलेले कार्य समान असले तरी त्यांनी वापरलेली शक्ती वेगवेगळी असे शकते.


गच्चीवरील पाण्याची टाकी एक माणूस दिवसभरत बादलीच्या सहाय्याने भरू शकतो, तर तेच काम करण्यासाठी मोटारीला 5 मिनिटे लागू शकतात.


शक्ती (P) = कार्य/काल = w/t


शक्तीचे एकक=>


SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.


1 वॅट = 1 ज्युल/सेकंद


1 किलोवॅट = 1000 वॅट


औधोगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती Horse Power या एककाचा वापर प्रचलित आहे.


1 अश्वशक्ती = 746 वॅट


व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एकक किलोवॅट तास हे आहे.


1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रति सेकंद या प्रमाणे केलेले कार्य.


1 Kwhr = 1 Kw × 1 hr


= 1000w × 3600 s


= 3.6 × 106 Joules


घरगुती वापर, औधोगिक, व्यावहारीक उपयोगासाठी हे एकक वापरतात.

___________________________________

बल



निसर्गात आढलाणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे 4 मुख्य गटात वर्गीकरण करता येते.


गुरुत्व बल


विधुत चुंबकीय बल


केंद्रकीय बल


क्षीण बल


गुरुत्वबल (Gravitational Force)=>


सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.


न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या  वस्तूला स्वत:कडे ओढते. या प्रकारे प्रयुक्त आकर्षणबलास 'गुरुत्वबल' असे म्हणतात.


हे बल परस्परांकडे आकर्षित होणार्‍या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असते. ओढणार्‍या वस्तूंचे वस्तूमान जास्त असेल तर बलाचे परिमाणही जास्त असते.


एखाधा वस्तूवर समान अंतरावर पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते. कारण चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा कमी असते.


गुरुत्वबल दोन वस्तूंमधील अंतरावरदेखील अवलंबून असते. जर दोन वस्तूंमधील अंतर कमी असेल तर त्यांच्यातील गुरुत्वबल जास्त असते.


न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तु कोठेही असल्या तरी त्यांच्या परस्परांना आकर्षित करणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते.


F=G m1 m2 /r2  G = विश्वगुरुत्व स्थिरांक


SI पद्धतीत G = 6.67 × 10-11 Nm2/kg2


CGS पद्धतीत G = 6.67 × 10-8 dyne.cm2/g2


पृथ्वीचे गुरुत्व त्वरण=>


एखादी वस्तु विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते. खाली येताना वेग वाढतो. याचा अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते. यालाच 'गुरुत्व त्वरण' असे म्हणतात.

उष्णता



उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते.


थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.


जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विधुत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते.


वाफेच्या इंजिनामध्ये वाफेचे रूपांतर यांत्रिक उर्जेत होते व वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने रेल्वे धावते.


पाण्याचे असंगत आचरण=>


सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.


परंतु पाण्याचे तापमान 4℃ पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.


0℃ तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 4℃ तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते.


4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 4℃ च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.


पाण्याचे 0℃पासून 4℃ पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.


4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 4℃ ला उच्चतम (Maximum) असते.


पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.


बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 0℃ तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.


थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 0℃  पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 4℃होईपर्यंत चालू राहते.


तापमान 4℃ पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते.

सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स :



सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित आठ ग्रह फिरतात.


 चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

 प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५० मिनिटे उशिरा होतो.

 चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास २७.३ दिवस लागतात.

 एका अमावस्येपासुन दुसर्‍या आमवस्येपर्यंतचा काळ २९.५ दिवसांचा असतो.


 एकूण ८८ तारकासमूह मानले जातात. त्यातील ३७ तारकासमूह उत्तर खगोलीय तर ५१ तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.


 प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी २७ नक्षत्रांची कल्पना केली आहे.


 प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.


 बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त ८८ दिवस तर नेपच्यूनचा सुमारे १४६ वर्षे इतका मोठा असतो.

  बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.

 पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला पहाटतारा म्हणतात.


 पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना अंतर्ग्रह, तर कक्षेबाहेरील ग्रहांना बाह्यग्रह म्हणतात.

 मंगळ हा पहिला बाह्यग्रह आहे.


  सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु

 गुरूला एकूण ६३ उपग्रह आहेत.

 शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.


 शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.


 धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.

 हॅले हा धूमकेतू ७६ वर्षानी दिसतो. आता २०६० मध्ये दिसेल.


 भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट १९ एप्रिल १९७५ रोजी सोडण्यात आला.

 त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - १, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.

 ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत २१ उपग्रह सोडण्यात आले.


 GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.

टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.


 आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार १९७५ पासून अंमलात आला आहे. 


जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या १९९२ च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.


  ५ मार्च १८७२ रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.


 चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.


 मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.


 इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अनुतील मूलकण आहेत.

 अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.

  प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.

 अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.

 अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.

  मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.

 मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला संयुजा म्हणतात.


 विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.

 जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.

 स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.

 पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.


 साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.

 संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ

 संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.


 पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.


 रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.


 WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र  काढली आहेत. (Directly Observed Treatment)

 मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्‍याचा जिवाणू वाहक आहे.


 लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.

 त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.

Online Test Series

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...