१६ ऑक्टोबर २०२०

पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती


पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.


उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्‍याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.


उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.


विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्‍या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.


अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.


रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्‍या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.


स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.


निर्यात सज्जता निर्देशांक 2020’मध्ये गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर.



🔥नीती आयोगाने (राष्ट्रीय परिवर्तन भारत संस्था) ‘निर्यात सज्जता निर्देशांक 2020’ (EPI 2020) जाहीर केला आहे. भारतातल्या राज्यांची निर्यात-बाबतची तयारी आणि कामगिरी यांचे परीक्षण करून आव्हाने आणि संधी ओळखणे, सरकारी धोरणाचा प्रभाव अधिक वाढवणे आणि सोयीचे नियमन संरचना तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या पहिल्या अहवालाचा उद्देश आहे.


🔥राज्यांच्या एकूणच यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) - गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू


🔥भपरिवेष्टित राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) - राजस्थान, तेलंगणा आणि हरयाणा


🔥हिमालयी राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – उत्तराखंड, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश


🔥कद्रशासित प्रदेशांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – दिल्ली, गोवा आणि चंदीगड


❗️❗️इतर ठळक बाबी...❗️❗️


हा निर्देशांक चार स्तंभावर आधारित आहे, ते आहेत - धोरण, व्यवसाय परीसंस्था, निर्यात परिसंस्था, निर्यात कामगिरी. यात 11 उप-स्तंभ आहेत.

महाराष्ट्र - जलाशय व धरणे


1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)


2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद


3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड


4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर


5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक


6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर


7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे


8] उजनी - (भीमा) सोलापूर


9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर


10] यशवंत धरण - (बोर) वर्धा


11] खडकवासला - (मुठा) पुणे


12] येलदरी - (पूर्णा) परभणी

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :

 

  भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव


1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)

2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान 

3) काळे खंड - आफ्रिका 

4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया

5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क

6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी

7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा

8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार

9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड

10) नाईलची देणगी - इजिप्त

11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन

12) पाचुचे बेट - श्रीलंका

13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान

14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर

15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे

16) गव्हाचे कोठार - युक्रेन

ग्रंथी (Glands)


🎇 मानवी शरीरात जे रासायनिक नियंत्रण🧪 ठवण्याचे काम होते ते काम ग्रंथीच्या मार्फत होते


🎇 गरंथी या दोन प्रकारच्या असतात


1)अंतः स्रावी ग्रंथी (Endocrine Gland)

2)बाह्यस्रावी ग्रंथी (Exocrine Gland)


🎇अतः स्रावी ग्रंथी 

या संप्रेरके(Harmon's)स्रावतत


🎇बाह्यस्रावी ग्रंथी

 या विकारे(Enzymes)स्रावतत


🎇अतः स्रावी ग्रंथी यांना कोणतेही कोणतीही नलिका नसते ते आपला स्राव थेट रक्तात सोडतात(Ductless Gland)


🎇 बाह्यस्रावी ग्रंथी यांना मात्र नलिका असतात

नद्या व त्यांचे उगमस्थान:



गंगा → गंगोत्री (उत्तराखंड)


यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड)


सिंधू → मानसरोवर (तिबेट)


नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश)


तापी → सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश)


महानदी → नागरी शहर (छत्तीसगड)


ब्रम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट)


सतलज → कैलास पर्वत(तिबेट)


बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश)


गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक


कृष्णा → महाबळेश्वर.



कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक)


साबरमती → उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान)


रावी → चंबा (हिमाचल प्रदेश)


पेन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक).

सहावी पंचवार्षिक योजना


☀️कालावधी➖1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985

🔅भर➖दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती

🌀परतिमान➖अलन मान व अशोक रुद्र


🔥कार्यक्रम


⏩1980➖एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम

⏩1980➖राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम

⏩1983➖गरामीन भूमिहीन रोजगार हमी योजना


✍️1982➖गरामीण भागातील महिला व मुलाचा विकास(डेन्मार्क च्या मदतीने)


🔥दोन पोलाद प्रकल्प


🔘विशाखापट्टणम

🔘सालेम पोलाद


✍️15 एप्रिल 1980➖6 बँक राष्ट्रीयीकरण


🔘1982➖एक्सझीम बँक

🔘जलै 1982➖नाबार्ड


👉या दरम्यान देशाला अन्नधान्य बाबत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले

👉सर्वाधिक यशस्वी योजना मानली जाते


🔥वद्धी दर


👁‍🗨सकल्पित➖5.2 टक्के

👁‍🗨साध्य➖5.54 टक्के

____________________________

विभक्ती


नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.


वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात. 

शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.

जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे 


असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.


विभक्त्यार्थ दोन प्रकार 


१) कारकार्थ - कारक व कारकार्थ

२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म


विभक्तीची आठ नावे


१) प्रथमा 

२) द्वितीया 

३) तृतीया 

४) चतुर्थी  

५) पंचमी 

६) षष्ठी 

७) सप्तमी  

८)  संबोधन 


विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा


विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)


१) प्रथमा  -  प्रत्यय नाही  -  प्रत्यय नाही       

२) द्वितीया  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते    

३) तृतीया  -  ने, ए, शी  -  नी, शी, ही     

४) चतुर्थी  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते     

५) पंचमी  -  ऊन, हून  -  ऊन, हून     

६) षष्ठी  -  चा, ची, चे  -  चे, च्या, ची   

७) सप्तमी  -  त, ई, आ  -  त, ई, आ   

८) संबोधन  -  प्रत्यय नाही  -  नो


विभक्तीतील रूपे


विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)


१) प्रथमा -  फूल  -  फुले 

२) द्वितीया  -  फुलास, दुलाला  -  फुलांस, फुलांना

३) तृतीया  -  फुलाने, फुलाशी  -  फुलांनी, फुलांशी

४) चतुर्थी  -  फुलास, फुलाला  -  फुलांस, फुलांना

५) पंचमी  -  फुलातून, फुलाहून  -  फुलांतून, फुलांहून

६) षष्ठी  -  फुलाचा, फुलाची, फुलाचे  -  फुलांचा, फुलांची, फुलांचे

७) सप्तमी  -  फुलात  -  फुलांत

८) संबोधन  -  फुला  -  फुलांनी


〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कार 2020 .


🦋साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.


🦋नोबेल शांती पुरस्कार 2020 याचे विजेता - संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक खाद्यान्न कार्यक्रम (World Food Programme)


🦋साहित्यासाठी नोबेल पुरस्कार 2020 याचे विजेता - लुईसे ग्लूक (अमेरिकेची कवयित्री)


🚦जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाविषयी...


🦋जागतिक उपासमार संपुष्टात आणण्यासाठी आणि खाद्यान्न सुरक्षितेला प्रोत्साहन देणारी ही सर्वात मोठी संघटना आहे.


🦋ती एक आंतरसरकारी संस्था आहे. त्याची स्थापना 01 जानेवारी 1961 रोजी झाली. रोम (इटली) या शहरात त्याचे मुख्यालय आहे.


🦋यद्ध-संघर्षग्रस्त भागातील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाने मोलाची कामगिरी बजावली आहे. जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाने 2019 साली 88 देशांतल्या जवळपास 100 दशलक्ष लोकांना मदत केली आहे.


🚦नोबेल पुरस्काराविषयी...


🦋नोबेल पुरस्कार हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवी प्रगतीला वरदान ठरलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान दिलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी स्वीडनच्या आणि नॉर्वेच्या संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये देण्यात येणारा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.


🦋नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशन यांच्यावतीने दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे       स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1895 सालापासून हा पुरस्कार दिला जातो. 


🦋तयांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 10 डिसेंबरला हे पुरस्कार दिले जातात. वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये नोबेल दिले जाते. 


🦋सटॉकहोम (स्वीडन) या शहरातल्या रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या वतीने ‘स्वेरिगेस रिक्सबँक प्राइज इन इकनॉमिक सायन्सेस इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल’ हा पुरस्कार दिला जातो.


🦋खाली पुरस्काराचा विषय आणि पुरस्कार देणारी संस्था यांच्या जोड्या दिल्या आहेत:


🦋भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र: रॉयल स्वीडीश अकादमी ऑफ सायन्सेस, स्वीडन


🦋शरीरशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र: करोलीन्स्का इंस्टीट्यूट येथील नोबेल असेंब्ली, स्वीडन

साहित्य: स्वीडिश अकादमी, स्वीडन

शांती: हे पुरस्कार स्वीडनच्या संस्थेच्यावतीने नॉर्वे या देशातल्या नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दिले जाते.

जागतिक मानसिक आरोग्य दिन: 10 ऑक्टोबर.



🌼दरवर्षी 10 ऑक्टोबर ही तारीख ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून पाळला जातो. यावर्षी "मेंटल हेल्थ फॉर ऑल: ग्रेटर इन्व्हेस्टमेंट - ग्रेटर अ‍ॅक्सेस" या विषयाखाली जागतिक मानसिक आरोग्य दिन पाळला गेला.


🌼या दिनानिमित्त, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी 8 ऑक्टोबर 2020 रोजी “मानसिक आरोग्य: कोविड 19च्या पल्याड दृष्टीकोन” याविषयी एका आभासी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम भारत सरकारचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग आणि मेलबर्न विद्यापीठ (ऑस्ट्रेलिया) यांनी आयोजित केला होता. ऑस्ट्रेलिया-इंडिया इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. क्रेग जेफ्री हे परिषदेचे सहअध्यक्ष होते.


🌿पार्श्वभूमी....


🌼अमेरिकेतल्या (ऑकोकन, व्हर्जिनिया) जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) या संस्थेच्यावतीने 1992 साली पहिल्यांदा ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ पाळला गेला होता. जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) ही मानसिक आरोग्याच्या संदर्भात जनजागृती करणारी एक जागतिक संघटना आहे. 1948 साली संघटनेची स्थापना झाली आणि त्याचे 150 हून अधिक देश सदस्य आहेत.


🌼मानसिक विकार हा जगभरात आढळणारा एक सामान्य विकार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात मानसिक विकाराने ग्रस्त लोकांची संख्या अंदाजे 450 दशलक्ष आहे. मानसिक विकारामध्ये, व्यक्तीच्या सभोवतालची परिस्थिती आणि त्या व्यक्तीची विचारसरणी यामध्ये जेव्हा तफावत निर्माण होते आणि ती व्यक्ती आलेल्या परिस्थितीला स्वीकारू शकली नाही, त्यावेळी अश्या विकारांचा जन्म होतो. त्यामधून त्या व्यक्तीमध्ये असामान्य वर्तन तयार होते.


🌼आजही भारतामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागृती नाही आणि त्याअभावी भविष्यात याचा उद्रेक होण्याचे संकेत निर्माण झाले आहे. जनसामान्यांना हे समजने अत्यावश्यक झाले आहे की, हा आजार नसून ही एक स्थिती आहे. त्यामुळे भारत सरकारने सन 1982 मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम (NMHP) सुरू केले होते.

भारतमाला प्रकल्प‼️‼️



💼‘भारतमाला’ हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाला भुपृष्ठ रस्त्यांद्वारे जोडण्यासाठीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवविला जात आहे.


🔴ठळक बाबी


💼हा राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम (NHDP) यानंतर देशातला दुसरा सर्वात मोठा महामार्ग बांधकाम प्रकल्प आहे, ज्याच्याअंतर्गत देशात सुमारे 50,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.


💼समारे 25 हजार किलोमीटर रस्त्याचे जाळे भारताच्या सीमांवर बनविण्याची यात तरतूद आहे. यात आणखी समुद्र किनारी क्षेत्र, समुद्री बंदरे, धार्मिक व पर्यटनाच्या क्षेत्रांचा देखील अंतर्भाव आहे. तसेच, 100 जिल्हा मुख्यालयांचाही यात समावेश आहे.


💼परकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 34 हजार 800 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येत आहे.


💼दशातली शहरे जोडणारा इकोनॉमिक कॉरिडॉर विकसित केला जाणार असून 9 हजार किलोमीटर रस्त्यांसाठी 1 लक्ष 20 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

भारताच्या शेजारी देशांसोबत दळणवळण वाढवण्यासाठी 


💼भारत-भुटान-बांगलादेश-नेपाळ-मान्यमार कॉरिडॉर विकसित केला जात आहे.


💼मालवाहतुकीच्या कार्यक्षम आणि वेगवान हालचालीसाठी सुलभ वाहतूक होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकल्पामधून विशेषकरून आर्थिक मार्गिका व वसाहती, सीमेवरील प्रदेश आणि दुर्गम भागांना दळणवळणाची व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होणार.


🗺आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) त्याच्या ‘ए लॉन्ग अँड डिफिकल्ट अॅसेंट’ या शीर्षकाच्या सुधारित अहवालात व्यक्त केला आहे.


🎇इतर ठळक बाबी...


🗺पढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेऊन 8.8 टक्क्यांचा विकासदर गाठण्याची अपेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे.

कोविड-19 महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 4.4 टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


🗺जन महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेच्या घसरणीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा आता त्यामध्ये 0.8 टक्क्यांनी अधिक घट होण्याची अपेक्षा वर्तविली गेली आहे.

जगाच्या शीत प्रदेशामध्ये (युरोप, उत्तर अमेरिका आणि पूर्व आशिया) हवामान बदलामुळे होणारे नुकसान हे उष्ण प्रदेशांपेक्षा कमी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


🎇आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) विषयी...


🗺आतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund -IMF) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्‍या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती दीर्घमुदतीची कर्जे देते.


🗺आतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 27 डिसेंबर 1945 रोजी ब्रेटोन वूड्स परिषदेत झाली. संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका येथे आहे.

भारत पाण्याखालून हल्ला करु शकतो, ही भीती चीनच्या मनात.



🌠पूर्व लडाखमध्ये सीमावाद सुरु झाल्यापासून चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी पँगाँग टीएसओच्या परिसरावर हायस्पीड गस्ती नौकांद्वारे लक्ष ठेवून  आहे.


🌠चीनकडून टाइप 305 आणि टाइप 928 डी बोटींचा वापर करण्यात येतो. या नौका स्वीडीश सीबी-90 ची कॉपी आहे.

चीन पँगाँग टीएसओ परिसरातील फक्त भूभागावरच नव्हे, तर पाण्याखालून कुठली हालचाल होऊ नये, यावरही चीन लक्ष ठेवून आहे.भारत पाण्याखालून हल्ला करु शकतो, ही भीती चीनच्या मनात आहे. जगभरातील नौदलं ज्या पाणबुडी विरोधी तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्याचाच वापर चीनकडून सरु आहे.


🌠फिंगर चार ते फिंगर आठ दरम्यान चीनने एकूण 13 बोटी तैनात केल्या आहेत. पँगाँग टीएसओ तलावात पाण्याखाली चालणाऱ्या हालचालींवर पीएलए एअर फोर्सने बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.यासाठी पीएलओ एअर फोर्सने मॅग्नेटिक अ‍ॅनोमली डिटेक्टर बूम बसवलेल्या विशेष विमानांचा वापर  सुरु केला आहे.विमानाच्या शेपटाकडे हे उपकरण असते.पीएलएच्या नौदलाकडून पाणबुडीविरोधात Y-8 GX6 किंवा Y-8 या विमानांचा वापर केला जातो

वित्तीय समित्या.



१) लोकअंदाज समिती/प्रकलन समिती

जॉन मथाई यांच्या शिफारशीने - 1950 मध्ये स्थापन  रचना 30 सदस्य - सर्व लोकसभेमधूनच सर्व पक्षांfना प्रतिनिधीत्व

मंत्री सदस्य नाही.



♨️अध्यक्षांची नेमणुक


लोकसभा अध्यक्षांकडून अध्यक्ष नेहमी सरकारी पक्षातीलच 


♨️कार्य


अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजाची मितव्यायिता सुचविणे.


२) लोकलेखा समिती-

रचना-22 सदस्य (15 लोकसभा+7 राज्यसभा)एका वर्षासाठी सदस्यांची निवड मंत्री सदस्य नसतात लोकसभेतील एका सदस्याची लोकसभेच्या अध्यक्षांकडून अध्यक्ष म्हणून निवड.1967-68 नंतर अध्यक्ष नेहमी विरोधी पक्षातीलCAG च्या अहवालांची तपासणी करण्याचे कार्य.


♨️समितीला कार्य पार पाडतांनी महालेखापरिक्षक वेळोवेळी मदत

करतात म्हणून त्यांना लोकलेखा समितीचे कान, डोळे, मित्र,मार्गदर्शक व तत्वज्ञ असे म्हणतात.

राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धत.


🎯 उत्पादन किंवा मूल्यवर्धित पद्धत

🎯 बाजारभावला मोजले जाते

🎯 वस्तू उत्पादक क्षेत्र साठी वापर

🎯 परत्यक्ष पद्धत आहे


❄️ उत्पन्न पद्धत

🎯 घटक किंमती ला मोजले जाते

🎯 सवा क्षेत्र साठी वापर

🎯 अप्रत्यक्ष पद्धत आहे


❄️खर्च पद्धत

🎯 वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी च्या खर्च ची मोजणी

🎯 गरामीण बांधकाम क्षेत्र साठी मोजले जाते

जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत


    सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.


🟣1. सत्व – अ  


शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस


🟣2. सत्व – ब1


शास्त्रीय नांव – थायमिन  

उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – बेरीबेरी

स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,


🟣3. सत्व – ब2


शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे


🟣4. सत्व – ब3


शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी


🟣5. सत्व – ब6  


शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या


🟣6. सत्व – ब10  


शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत


🟣7. सत्व – क  


शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि


🟣8. सत्व – ड  


शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे


🟣9. सत्व – इ  


शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या


🟣10. सत्व – के 

 

शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी

वाचा :- प्रमुख पिके व त्यांच्यावरील रोग



🔰 डाळींब 🔜  तल्या, सुरसा, मर, करपा


🔰 सत्रा  🔜 डिंक्या, देवी (कँकर)


🔰 दराक्षे  🔜  भरी, केवडा (अँधैकनोज) 


🔰 कळी 🔜   जळका चिरूट, पर्णगुच्छ (बंचिटॉप), सीगाटोका (करपा)


🔰 चिकू 🔜  फायटो पथोरा (फळांची सड)


🔰 मोसंबी  🔜 डायबॅक (आरोह)


🔰 लिंबू  🔜 खऱ्या 


🔰 आबा 🔜   भिरूड

बौद्धिक संपदा निर्देशांक: भारत ४० व्या स्थानी .



🔰भारत बौद्धिक संपदा निर्देशांकात ४० व्या स्थानी आहे. ५३ अर्थव्यवस्थांमध्ये ४० व्या क्रमांकावर आहे. जागतिक नाविन्य धोरण केंद्र (Global Innovation Policy Centre – GIPC), यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने याबाबतची निर्देशांक जारी केली.


🔰GIPC नुसार भारत सर्वात आव्हानात्मक परंतु आश्वासक बाजार, अंमलबजावणी आणि पेटंट पात्रता यांमध्ये मुख्यत्वे अडथळे निर्माण.


🔰यावर्षी निर्देशांकात भारताची १६.२२ गुणांची नोंद.


🔰मागील वर्षाच्या अहवालाच्या तुलनेत भारताच्या गुणांमध्ये ७% वाढ.


🔰सापेक्ष कामगिरीच्या आधारे भारत ४ स्थानांनी मागे.


🔴भारत गत क्रमवारी आणि आकडेवारी


🔰२०१९: ३६ व्या क्रमांकावर

🔰२०१८: ४४ व्या क्रमांकावर

🔰२०१९ मध्ये कोणत्याही देशासाठी सर्वाधिक कमाई


🔴जग क्रमवारी....


1.अमेरिका

2.यूके

3.स्वीडन

4.फ्रान्स

5.जर्मनी

6.आयर्लंड


🔰भारतीय पेटंट कायदा, २००५

कायद्यामध्ये बऱ्याच सुधारणा

हेच बौद्धिक संपत्तीच्या क्षेत्रात होणारी विकासाची गती मंदावण्याचे मुख्य कारण मानतात.


🔰कायद्याच्या प्रमुख दुरुस्तीत कलम(डी) समाविष्ट.


🔰ततीय पक्षाला परवाना बंधनकारक

विशेषत: सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी नाविन्यपूर्ण औषध बनविण्याचा परवाना देणे अनिवार्य.

संक्षिप्‍त नावे व त्‍यांची संपूर्ण नावे/मूळ नावे



🏀 *संत ज्ञानेश्‍वर=ज्ञानेश्‍वर विठ्ठलपंत कुलकर्णी*.


🏀 *संत नामदेव=नामदेव दामाजी रेळेकर*..


🏀 *संत तुकाराम=तुकाराम बोल्‍होबा अंबिले*..


*🏀समर्थ रामदास=नारायण सूर्याजीपंत ठोसर*.


*🏀गाडगेबाबा=डेबूजी झिंगराजी जाणोरकर*..


🏀 *राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज=माणिक बंडोजी ठाकूर (ब्रह्मभट)*.


🏀 *भगिनी निवेदिता=मार्गारेट एलिझाबेथ नोबल*..


*🏀महात्‍मा गांधी=मोहनदास करमचंद गांधी*..


*🏀सनापती बापट=पांडुरंग महादेव बापट*


*बाबा आमटे=मुरलीधर देविदास आमटे*.


*🏀अण्‍णा हजारे=किसन बाबूराव हजारे*


*🏀 सयाजीराव गायकवाड=गोपाळ काशिनाथ गायकवाड*


*🏀राजर्षी शाहू महाराज=यशवंतराव जयसिंगराव घाटगे*


*🏀स‍वामी दयानंद सरस्‍वती=मूळशंकर अंबाशंकर तिवारी*..


*🏀स‍वामी विवेकानंद=नरेंद्रनाथ विश्‍वनाथ दत्*


🏀 *मदर टेरेसा=अँग्‍नीस गॉकशा वाजक शियू*.


🏀 *के. आर. नारायण=केचेरेल रामण नारायणन*..


🏀  *डी. देवेगौडा=हरदनहळ्ळी दौडेगौडा देवेगौडा*..


🏀 *व्‍ही. शांताराम=शांताराम राजाराम वनकुद*


🏀 *पी. व्‍ही. नरसिंहराव=पाम्‍लामूर्ती व्‍यंकटरामय्‍या नरसिंहराव*.


🏀 *दादासाहेब फाळके=धुंडीराज गोविंद फाळके*.


🏀 *टी. एन. शेषन=तिरूनिल्‍लाई नारायणन अय्‍यर शेषन*.


🏀  *पी. ए. संगमा=पुर्णो आयटोक संगमा*..


*🏀दलाई लामा=तेन्‍झीन गायात्‍सो*..


*🏀कर्मापा लामा=कर्मापा युगिन त्रिनले दोरजी*.


🏀 *स्‍वामी रामानंद तीर्थ=व्‍यंकटेश भगवानराव खेडगीकर*..


🏀 *बिल क्लिंटन=विल्‍यम जोफरसन क्लिंटन*..


🏀 *पी. टी. उषा=पिलूवालकंडी टेकापरविल, उषा*..


🏀 *कपिल देव=कपिलदेव रामलाल निखंज*..


🏀 *माईक टायसन=मलिक अब्‍दुल अजीज*..


 🏀 *पेले=एडसन अरांतेस डो नासिमेंटो*..


🏀 *डॉ. ए. पी. जे. अब्‍दुल कलाम=डॉ. अबुल पाकिर जैनुलाब्‍दीन अब्दुल कलाम*....


डॉ एे पी जे अब्दुल कलाम



◾️जन्म : 15 ऑक्टोबर 1931 रामेश्वर येथे.


◾️अवुल पाकिर जेनुलब्दिन अब्दुल कलाम


◾️ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते.


◾️कार्यकाळ 

25 जुलै  2002 – 25 जुलै 2007


◾️तयांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले


◾️1963 मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेतला


◾️इदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला


◾️अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले.


◾️सरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.


◾️भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व 1997 मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला


◾️कलाम हे राष्ट्रपती भवनवर आलेले प्रथम शास्त्रज्ञ होते


🚀 1985 : त्रिशूल, 

🚀1988 : पृथ्वी, 

🚀1989 : अग्नी, 

🚀1990 : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.


◾️5 अग्नी बाणांमुळे त्यांना मिसाईल मँन म्हणतात


◾️ सप्टेंबर 2015 : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.


◾️ए.पी.जे. अब्दुल कलाम 27 जुलै 2015 रोजी कलाम शिलॉंग येथे भारतीय शास्त्र व्यवस्थापन शिलॉंग येथे "पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे" या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेले. 


◾️तथेच त्यांचे निधन झाले


◾️अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.

१५ ऑक्टोबर २०२०

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 _____ यांच्या हस्ते ‘सेल्फस्कॅन’ अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले.*

(A) स्मृती इराणी

(B) निर्मला सीतारमण

(C) ममता बॅनर्जी✅✅

(D) यापैकी नाही


कोणत्या देयक बँकेनी अल्पवयीन मुलांसाठी ‘भविष्य बचत खाता’ योजना सादर केली?*

(A) फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड✅✅

(B) इंडिया पोस्ट पेमेंट बँक

(C) पेटीएम पेमेंट बँक

(D) एयरटेल पेमेंट बँक


बळीसाठी जनावरांच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी बांग्लादेश सरकारने कोणते व्यासपीठ तयार केले?*

(A) अॅनिमल बाजार

(B) डिजिटल हाट✅✅

(C) बुक माय मीट

(D) यापैकी नाही


_______ या कंपनीद्वारे कोविड-19 नमुन्यांची तपासणी पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने करणारे पहिले यंत्र तयार करण्यात आले आहे.*

(A) NABL लॅब

(B) ट्रूथ लॅब सोल्यूशन

(C) मायलाब डिस्कव्हरी सोल्यूशन्स✅✅

(D) यापैकी नाही


____ यांनी ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020’ प्रसिद्ध केला आहे.*

(A) केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस✅✅

(B) प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस

(C) सिलिकॉन प्रेस

(D) यापैकी नाही


🚦 _ यांच्या हस्ते ‘सेल्फस्कॅन’ अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले.

(A) स्मृती इराणी

(B) निर्मला सीतारमण

(C) ममता बॅनर्जी✅✅

(D) यापैकी नाही


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🚦 कोणत्या देयक बँकेनी अल्पवयीन मुलांसाठी ‘भविष्य बचत खाता’ योजना सादर केली?

(A) फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड✅✅

(B) इंडिया पोस्ट पेमेंट बँक

(C) पेटीएम पेमेंट बँक

(D) एयरटेल पेमेंट बँक


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🚦 बळीसाठी जनावरांच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी बांग्लादेश सरकारने कोणते व्यासपीठ तयार केले?

(A) अॅनिमल बाजार

(B) डिजिटल हाट✅✅

(C) बुक माय मीट

(D) यापैकी नाही


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🚦 ___ या कंपनीद्वारे कोविड-19 नमुन्यांची तपासणी पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने करणारे पहिले यंत्र तयार करण्यात आले आहे.

(A) NABL लॅब

(B) ट्रूथ लॅब सोल्यूशन

(C) मायलाब डिस्कव्हरी सोल्यूशन्स✅✅

(D) यापैकी नाही


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🚦 _ यांनी ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020’ प्रसिद्ध केला आहे.

(A) केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस✅✅

(B) प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस

(C) सिलिकॉन प्रेस

(D) यापैकी नाही


वाय कोम सत्याग्रह कुठे सुरू झाले ? 

A. बिहार, 1925-26

B. केरल, 1924-25 ई. ✅

C. महाराष्ट्र, 1920-22 ई

D. मद्रास, 1924-26



दलित वर्ग मिशन समाजाची स्थापना कोणत्या स्थानी केल्या गेली ? 

A. 1912 ई, दिल्ली

B. 1908 ई, बिहार

C. 1906ई., मुंबई ✅

D. 1908 ई, उत्तर प्रदेश



 श्रीनारायण गुरू बहुजन समाजाची स्थापना कोणी केली ? 

A. राजाराम मोहन रॉय

B. बी. आर. अंबेडकर

C. राजाराम मोहन राय

D. वी. आर. शिंदे✅



 नानू आसन कोणाला म्हणटले जाते ? 

A. सी. एन. मुदालियार

B. श्रीनारायण गुरु ✅

C. वी. रामास्वामी. नायकर

D. टी. एम. नायर


 बहुजन समाजाची स्थापना कोणी केली ? 

A. वी. आर. शिंदे

B. मुकुंदराव पाटिल ✅

C. महात्मा गांधी

D. श्रीनारायण गुरु


1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?

 A. 1 ते 14 वयोगट

 B. 6 ते 14 वयोगट✍️

 C. 1 ते 18 वयोगट

 D. 5 ते 14 वयोगट.


____________________


2) "आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता यांचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती होय,'' असे कोणी म्हटले?

 A. महात्मा गांधी

 B. हर्बर्ट स्पेन्सर

 C. थॉमस वुड✍️

 D. जागतिक आरोग्य संघटना.

____________________


3) भारत सरकारने _ पासून मौखिक पोलीओ कार्यक्रमासोबत इंजेक्शनद्वारा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

 A. 1 नोव्हेंबर, 2011

 B. 30 नोव्हेंबर, 2015 ✍️

 C. 1 जानेवारी, 2016

 D. 26 फेब्रुवारी, 2017.


______________________


4) बलवंतराय मेहता समितीने त्री-सूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना 'पंचायत राज'' असे कोणी संबोधीले ?

 A. महात्मा गांधी

 B. डॉ. राजेंद्र प्रसाद

 C. पंडित जवाहरलाल नेहरू✍️

 D. बलवंतराय मेहता.


____________________


5) खालीलपैकी कोणती योजना बालकांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्यांचे पुनर्वसन व अर्थसाहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे?

 A. माझी कन्या भाग्यश्री योजना 

 B. बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजना 

 C. मनोधैर्य योजना ✍️

 D. जीवनोन्नती योजना.


____________________

6) देवदासींच्या उदरनिर्वाहाकरीता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे ?

 A. स्वाधार योजना

 B. राज्य गृह योजना 

 C. मातृत्व सहयोग योजना

 D. निर्वाह अनुदान योजना.✍️


____________________


7) भारताची जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात (दर हजारी) अर्भक मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे?

 A. पश्चिम बंगाल

 B. बिहार 

 C. उत्तर प्रदेश

 D. मध्य प्रदेश.✍️

____________________


8) 73वी घटनादुरुस्ती ही महिलांसाठी महत्वाची मानली जाते कारण त्यानुसार :

 A. संघटित क्षेत्रात काम करणा-या स्त्रियांना 3 ऐवजी 6 महिने मातृत्व रजा मिळाली.

 B. कामावर होत असलेल्या शोषणाची तक्रार केल्यास महिलेला खास संरक्षण देण्यात येते. 

 C. पंचायतीत एकूण संख्येच्या एक तृतीयांश जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले. ✍️

 D. लग्नाच्या संमतीसाठी वयाची किमान मर्यादा वाढविण्यात आली.

____________________

9) 1969 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) उद्देश काय आहे? 

 A. सहयोगातून शिक्षण

 B. सेवेतून उत्कृष्टता

 C. कल्याणातून शिक्षण

 D. सेवेतून शिक्षण.✍️

____________________

10) खालीलपैकी कोणत्या उद्देशाने 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुरू केली?

(a) मुलींचा जन्मदर वाढविणे.

(b) मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे.

(c) मुलींना शिक्षण देणे.

(d) बालविवाहास प्रतिबंध करणे.

पर्यायी उत्तरे :

 A. फक्त (a)

 B. (a) आणि (c)

 C. (a), (b) आणि (c)

 D. (a), (b), (c) आणि (d). ✍️

बेटी बचाव बेटी पढाओ योजना :



सुरुवात - 22 जानेवारी 2015


दूत - साक्षी मलिक  


बाल लिंगगुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

  हरियाणा येथील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

  'बेटा बेटी एकसमान' हा आपला मंत्र असला पाहिजे असे सांगत लिंग भेदभाव संपुष्टात आणला पाहिजे.

  हरियाणातील बाल लिंगगुणोत्तर परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे या योजनेच्या उद्घाटनासाठी हरियाणाची निवड करण्यात आली.

  यात 10 वर्षाखालील मुलींचे बँक खाते उघडावे लागते.

  भारतीय टपाल खात्याच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' टपाल तिकिटेही काढण्यात आली.

  सध्या भारतातील 100 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर लागू. 


महाराष्ट्रातील निवड करण्यात आलेले जिल्हे (लिंगगुणोत्तर दर)


   जिल्हा - 2001 - 2011


1) बीड - 894 - 807 

2) जळगाव - 880 - 842 

3) अहमदनगर - 884 - 452 

4) बुलढाणा - 908 -  855

5) औरंगाबाद - 890 - 858 

6) वाशिम - 918 - 863 

7) कोल्हापूर - 839 - 863 

8) उस्मानाबाद - 894 - 867 

9) सांगली - 867 - 851 

10) जालना - 903 -870

राज्यात "चिरंजीव ' योजना



राज्यातील ज्या भागात मातामृत्यू दर आणि अर्भक मृत्युदर जास्त आहे अशा भागात गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना हा पायलट प्रकल्प राबविला जाणार आहे . तसेच जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या उपलब्धतेनुसार वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री डॉ . दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली . आमदार नीलम गोऱ्हे , हुस्नबानो खलिफे, माणिकराव ठाकरे , भाई गिरकर , तसेच इतर सदस्यांनी राज्यातील रुग्णालयाबाबत प्रस्ताव मांडला . त्या वेळी सावंत बोलत होते . राज्यातील रुग्णालयांमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा पुरविण्यासाठी डॉक्टरांबरोबर विशेषज्ञ डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील असून , प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय असणार आहे . त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णांना फायदा होईल . त्याचबरोबर डॉक्टरांचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे वाढविण्याचे केंद्राकडे प्रस्तावित असल्याचेही सावंत यांनी सांगितले . तसेच रुग्णालयामधून बालकांची होणारी चोरी टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयांत सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून दिले जात आहेत.


आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात योजनांची अंमलबजावणी:

राज्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांतही सर्व योजनांचा लाभ देण्यात येत आहे . त्याचबरोबर विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कॉल सेंटर सुविधा, विविध प्रकारचे सॉफ्टवेअर उपलब्ध करण्यात आले आहे . रुग्णांच्या नातेवाइकांची सोय होण्यासाठी रुग्णालयांशेजारी धर्मशाळा बांधण्याचा विचार आहे . त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये मोफत अन्न पुरविण्यासाठी सिद्धिविनायक आणि दगडूशेठ हलवाई या मंदिर विश्वस्तांशी संपर्क साधल्याची माहिती त्यांनी दिली . विविध प्रकारचे कर्करोग टाळण्यासाठी त्यावर तज्ज्ञांमार्फत उपचार करण्यासाठी टाटा संस्थेची मदत घेणार आहे .

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय



अलाहाबाद बैंक - कोलकाता


• बैंक ऑफ इंडिया - मुंबई


• बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे


• केनरा बैंक - बैंगलोर


• सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई


• कॉरपोरेशन बैंक - मंगलौर


• देना बैंक - मुंबई


• इंडियन बैंक - चेन्नई


• इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई


• ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली


• पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली


• पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली


• सिंडिकेट बैंक - मणिपाल


• यूको बैंक - कोलकाता


• यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई


• यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता


• विजया बैंक - बैंगलोर


• आंध्रा बैंक - हैदराबाद


• बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

सकन्या समृद्धी योजना २०१६



* १ हजार रुपयाच्या किमान रकमेसह सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडता येते.


* हे खाते मुलीच्या जन्मापासून केवळ १० वर्षापर्यंतच उघडता येते. एका वर्षामध्ये या खात्यात किमान हजार रुपये किंवा अधिकाधिक १.५० लाख जमा करता येतात.


* एक पालक आपल्या केवळ दोन मुलीकरता हे खाते उघडू शकतो, आणि दोघींच्या खात्यात एक वर्षात १.५० लाख यापेक्षा अधिक रक्कम भरता येणार नाही.


* मात्र दुसऱ्यांदा जुळ्या मुली झाल्यास तिसऱ्या मुलीकरता हे खाते उघडले जाऊ शकते. मुलगी २१ वर्षे झाल्यावर हे खाते परिपक्व होते.


* तथापी १८ वर्षानंतर आवशक्यता असल्यास ५०% रक्कम काढता येईल, ही योजना मुलीच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा खर्च घेऊन तयार करण्यात आली.


* या योजनेसाठी मुलीचे खाते काढताना मुलीचा जन्माचा दाखला, ओळखपत्र, निवासी पत्र, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.


* खात्याच्या परिपक्वतेनंतर जमा झालेली रक्कम संबंधित मुलीच्या मालकीची होते. भारतात हे खाते कुठेही काढता येते.


* वयाच्या १० वर्षानंतर मुलगी स्वतः आपले खाते हाताळू शकते. किमान एक हजार रुपये दरवर्षी न भरू शकल्यास त्या वर्षासाठी ५० रुपये दंड आकाराला जाईल, मात्र दंडाच्या रकमेसह १४ वर्षापर्यंत कधीही हे खाते पुन्हा सुरु करण्याची तरतूद आहे.

______________________________________

पराथमिक कृषि सहकारी पतसंस्था :



(Primary Agricultural Credit Co-Operatives) 


प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात कार्य करतात. 


🎯सथापना -


गावातील 10 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी पतसंस्थेची स्थापना करू शकतात.

  गरीब शेतकर्‍यांनाही संस्थेला सभासद होता यावे यासाठी सदस्यत्व शुल्क/प्रवेश शुक्ल नाममात्र ठेवले जाते.तसेच या संस्था अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर (Unlimited liability) स्थापना केल्या जातात. म्हणजेच, ती संस्था अपयशी ठरल्यास तिची देणी (Liabilities) देण्याची पूर्ण जबाबदारी सदस्यांवर असते. 


🎯कार्ये -


ही संस्था प्रत्यक्ष ग्रामीण जनतेच्या संपर्कात येते. त्यांच्या ठेवी स्वीकारते व त्यांना कर्जे देते. कर्जे मुख्यत: अल्प मुदतीचे व मुख्यत: कृषीसाठी दिले जाते. मात्र सावकाराच्या तावडीत सापडू नये म्हणून खावटी कर्जे सुद्धा दिली जातात.ही संस्था ग्रामीण जनता व दुसर्‍या बाजुला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात दुव्याचे काम करते. 


🎯भांडवल उभारणी -


स्व-स्वामित्व निधी - सदस्यत्व फी, भागभांडवल व राखीव निधी.ठेवी - सदस्य तसेच, बिगर सदस्यां कडून मिळविलेल्या.कर्जे - जिल्हा मध्येवर्ती सहकारी बँकेकडून मिळालेली. 


🎯विस्तार -


भारतात मार्च 2010 मध्ये विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे 95,633 प्राथमिक कृषि सह. संस्था कार्य करीत होत्या. त्यांची एकूण सदस्य संख्या त्यावेळी सुमारे 1.32 कोटीपेक्षा जास्त असून त्यांनी 26,245 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या. 


🎯महाराष्ट्रातील विस्तार -


31 मार्च 2010 रोजी महाराष्ट्रात 21,392 प्राथमिक कृषि सह.पतसंस्था होत्या आणि त्यांची सभासद संख्या 149 लाख होती. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका :



🎯सवरूप -


जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते व जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते.प्रकार - जि.म.स. बँकेचे दोन प्रकार आहेत - शुद्ध सहकारी संघ (Co-Op. Banking Union) :- या प्रकारात जि.म.स. बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा आणि केरळ या राज्यांमध्ये असा प्रकार आहे.मिश्र मध्य. सहकारी बँका (Mixed Central Co-Op-erative Banks) :- या प्रकारच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच, व्यक्तींना सुद्धा खुले असते. इतर सर्व राज्यातील जि.म.स. बँका या प्रकारच्या आहेत. 


🎯कार्ये -


जिल्हा मध्य. सह. बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरावठा करणे हे आहे. मात्र काही कर्जे व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात.नियमांनुसार, या बँका व्यापारी कारणांसाठी (Commercial Purposes) कर्जपुरवठा करीत नाही. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 372 जि.म.सह. बँकांपैकी 75 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.या बँका शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. 


🎯भांडवल उभारणी -


स्वस्वामित्व निधी - यात सहकारी संस्थांनी पुरविलेले भागभांडवल व राखीव निधीचा समावेश होतो.ठेवी - सहकारी संस्था तसेच व्यक्तींच्या.कर्जे - शिखर बँक, इतर बँका यांकडून मिळालेली.प्राथमिक सह. संस्थांनी जिल्हा म.स. बँकेमध्ये ठेवलेला आपल्याकडील अतिरिक्त निधी. 


🎯विस्तार -


भारतात मार्च 2010 मध्ये 370 जि.म.स. बँका होत्या. त्यांच्या एकूण ठेवी त्यावेळी 1,27,600 कोटी रुपये इतक्या होत्या.महाराष्ट्रात मार्च 2010 अखेर 31 जि.म.स. बँका होत्या. त्यांचे सभासद एकूण 1,48,360 इतके होत्या, तर ठेवी 44,278 कोटी रुपये इतक्या होत्या.

निरांचल प्रकल्प:



१) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविल्या जाणा-या "निरांचल" प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने ०७ ऑक्टोबर २०१५ रोजी मान्यता दिली. 

.

२) ह्या प्रकल्पाचा एकूण खर्च २१४२.३० कोटी रुपये असून हा प्रकल्प महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि तेलंगाना ह्या ९ राज्यात राबविण्यात येणार आहे.


३) ह्या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ५०% खर्च शासन तर ५० % जागतिक बँकेकडून मिळणा-या कर्जातून होणार आहे. 

.

४) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील पाणलोट क्षेत्राची महत्वाची उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी, प्रत्येक शेतीला सिंचन सुविधा पुरविण्यासाठी "निरांचल" प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. 

.

५) ह्या प्रकल्पामुळे पर्जन्यावर आधारित कृषी उत्पादकतेत आणि दुग्ध उत्पादनात वाढ होणार आहे.

प्रकल्पाची उद्दिष्ट्ये

६) भारतातल्या पाणलोट आणि पावसावर आधारित कृषी व्यवस्थापनाच्या पद्धतीत संस्थात्मक बदल घडविणे. 

.

७) पाणलोट उपक्रमाच्या खात्रीसाठी आणि पावसावर आधारित व्यवस्थापन पद्धतीवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता यावे म्हणून यंत्रणा उभारणे. 

.

८) पाणलोट आधारित दृष्टीकोनाच्या माध्यमातून समता, उपजीविका, आणि उत्पन्न यात सुधारणा घडविण्यासाठी सहाय्य करणे. 

.

९) सर्वसमावेशकता आणि स्थानिक सहभाग ह्यावर भर देणे. 

.

१०) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या सर्व घटकासाठी विशेषतः पाणलोट क्षेत्राला तांत्रिक सहाय्य पुरविणे.



जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक २०१५



१) World Economic Forum (WEF) ह्या संस्थेनुसार प्रसिद्ध केलेल्या जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकानुसार भारताने जगातील १४० देशांच्या यादीत ५५ वे स्थान पटकावले आहे. like emoticon


२) २०१४ मध्ये भारत ७१ व्या क्रमांकावर होता.


३) भारतातील आर्थिक वाढ, संस्थांच्या स्पर्धात्मकतेत सुधारणा, पायाभूत सुविधामध्ये सुधारणा, ह्या कारणामुळे भारत ५५ व्या स्थानावर आहे.


४) या अहवालानुसार प्रथम पाच देश 


१) स्वित्झर्लंड 

२) सिंगापूर

३) युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका 

४) जर्मनी 

५) नेदरलँड्स


विकसनशील देशांचे स्थान

५) चीन (२८) वा, दक्षिण आफ्रिका (४९) वा आणि भारत (५५) वा



ग्रामीण भारत (जणगणना २०११ नुसार)



१) देशातील खेड्यांची संख्या : ६४०८६७ 

२) देशातील ग्रामीण लोकसंख्या : ८३.३० कोटी

.

३) देशातील लोकसंख्येचे देशातील एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण : ६८.८४ % 

.

४) ग्रामीण भागातील साक्षरता प्रमाण : ६८.९० % 

.

५) २००१ ते २०११ ह्या कालावधीत ग्रामीण लोकसंख्येत झालेली घट : -५.९ % 

.

६) ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर : ९४७ (१००० पुरुषामागे) 

.

७) ग्रामीण लोकसंख्येबाबत आघाडीची राज्ये : उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल 

.

८) ग्रामीण लोकसंख्येबाबत मागे पडलेली राज्ये : सिक्कीम, मिझोराम, गोवा 

.

९) ग्रामीण लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण : 

.

अ) हिमाचल प्रदेश (८९.९६ %) 

.

ब) बिहार (८८.७० %) 

.

क) आसाम (८५.९२ %) 

.

१०) ग्रामीण लोकसंख्येचे सर्वात कमी प्रमाण : 

.

अ) गोवा (३७.८३ %) 

.

ब) मिझोराम (४८.४९ %) 

.

क) तामिळनाडू (५१.५५ %) 

.

११) महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्या : ६.१ कोटी 

.

१२) २००१ ते २०११ ह्या कालावधीत ग्रामीण लोकसंख्येत झालेली घट : -४.९१ % 

.

१३) महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण : ५७.५७ % 

.

१४) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील साक्षरता प्रमाण : ८३.३९ % 

.

१५) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर : ९४८ (१००० पुरुषामागे)

ससदेविषयी महत्त्वाची माहीती




· एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्‍यावी लागतात.


· संसदेच्‍या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्‍तीत जास्‍त सहा महिने असू शकतो.


· नागरिकत्‍व नियमित करण्‍याचा अधिकार संसदेस आहे.


· राज्‍यघटनेतील तरतुदी बदलण्‍याचा अधिकार केवळ संसदेला आहे.


· घटनेच्‍या कलम ३०२ नुसार विविध निर्बंध लादण्‍याचे अधिकार संसद यांना आहेत.


· संरक्षण या विषयावर कायदा करण्‍याचे सर्वस्‍वी अधिकार संसदेस आहेत.


· जेव्‍हा राज्‍यात राष्‍ट्रपती-शासन कलम ३५६ अन्‍वये लागू होते, तेव्‍हा राज्‍य यादीतील कर कायदे संमत करण्‍याचे अधिकार संसद अथवा संसदेने विहित केले प्राधिकारी यांना आहेत.


· विधेयकाचे रूपांतर विधिनियमात होण्‍यासाठी त्‍यांला तीन टप्‍प्‍यातून जावे लागते.


· करात कपात किंवा कर रद्द करण्‍याविषयी तरतूद असलेले विधेयक राष्‍ट्रपतीच्‍या शिफारशीशिवाय मांडता येतो.


· सामान्‍यत: वित्त विधेयकाची मसंडणी व प्रविष्‍टीकरण राष्‍ट्रपतींची शिफारस असल्‍याशिवाय शक्‍य होत नाही.


· वित्त विधेयकाची मांडणी राष्‍ट्रपती यांच्‍या शिफरशीवरून केली जाते.


· विधेयक वित्त विधेयक आहे/नाही असा प्रश्‍न उद्भवचल्‍यास अंतिम निर्णय लोकसभेचे सभापतीचा असतो.


· वित्त विधेयक हे कर, कर्जे व खर्च याबाबत असते.


· वित्त-विधेयक प्रथमत: लोकसभेत मांडले जाते.


· सर्व वित्त विधेयके (Financial Bills) ही धन विधेयके (Money Bills) असतात.


· राज्‍यघटनेच्‍या कलम ३३० व ३३२ अनुसार लोकसभा व राज्‍याच्‍या विधानसभांनी अनुसूचित जाती व जमातींसाठी खास राखीव जागा ठेवल्‍या आहेत.


· लोकसभेमध्‍ये केंद्रशासित प्रदेशांमधून १३ सदस्‍य निवडले जातात.


· लोकसभेच्‍या पहिल्‍या मध्‍यावधी निवडणुका १९७१ मध्‍ये घेण्‍यात आल्‍या.


· आणीबाणीच्‍या काळात लोकसभेचा कार्यकाळ एक वर्ष पर्यंत वाढवता येतो.


· राज्‍यसभा कधीच बरखास्‍त केली जात नाही.


· राज्‍यसभेच्‍या सभासदाचा कार्यकाळ ६ वर्षाचा असतो.


· लोकसभेने पारित केलेले व राज्‍य सभेकडे शिफारशीकरिता पाठवलेले वित्त विधेयक १४ दिवसात परत पाठवणे हे राज्‍यसभेवर बंधनकारक आहे.  

जम्मू-काश्मीर आणि कलम ‘३५ अ’

 


जम्मू-काश्मीरसंदर्भात महत्त्वाचे आहे. आतापर्यंत या कलमाबद्दल भारतीय जनमानसात फार चर्चा झालेली नाही. मात्र, काश्मीरमधील राजकीय परिस्थिती बदलत असताना कलम ‘३५ अ’ पुन्हा चर्चेत आले आहे. काय आहे हे कलम?


> रहिवासी ठरवण्याचा अधिकार


भारतीय राज्यघटनेतील कलम ‘३५ अ’ अंतर्गत जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेला राज्याचे ‘कायमस्वरूप रहिवासी’ (परमनंट रेसिडंट्स) ठरवण्याचा अधिकार आहे. याशिवाय नागरिकांचे विशेष हक्क आणि विशेषाधिकारही विधानसभेला ठरवता येतात. जम्मू-काश्मीरमधील तत्कालीन सरकारच्या सहमतीने १९५४मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशाने हे कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले.


> ऐतिहासिक पार्श्वभूमी


जम्मू-काश्मीर संस्थान असताना तेथील डोग्रा शासक महाराजा हरिसिंग यांनी १९२७ आणि १९३२मध्ये राज्यात राज्याचे विषय आणि त्याचे अधिकार निश्चित करणारा कायदा लागू केला होता. त्याअंतर्गत राज्यात स्थलांतरित झालेल्या नागरिकांचे नियमनही होत होते. महाराजा हरिसिंग

यांनी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर जम्मू आणि काश्मीर ऑक्टोबर १९४७मध्ये भारतात समाविष्ट झाले. त्यानंतर काश्मीरमधील लोकप्रिय नेते शेख अब्दुल्ला यांच्याकडे सत्ता आली. त्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून राज्यघटनेत कलम ३७० समाविष्ट करण्यात आले. या कलमानुसार संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण हे विषय केंद्राकडे ठेवून जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला.


> कलम ‘३५ अ’ कधी आले?


तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात दिल्लीत १९५२मध्ये झालेल्या करारानुसार राज्यघटनेतील काही तरतुदी राष्ट्रपतींच्या आदेशाने १९५४मध्ये करण्यात आल्या. त्या वेळी कलम ३५अ राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. जम्मू-काश्मीर या राज्याला स्वतःची राज्यघटना असून ती १९५६मध्ये तयार करण्यात आली. त्यामध्ये मराहाजा हरिसिंग यांच्या काळातील ‘कायमस्वरूपी नागरिकां’ची व्याख्या परत आणण्यात आली. त्यानुसार १९११पूर्वी राज्यात जन्मलेले किंवा स्थायिक झालेले सर्व नागरिक किंवा संबंधित तारखेपूर्वी दहा वर्षांहून अधिक काळ कायदेशीर मार्गाने स्थावर मालमत्ता धारण केलेले नागरिक यांचा समावेश आहे. त्याशिवाय जम्मू-काश्मीरमधून स्थलांतर केलेले सर्व नागरिक, त्यामध्ये पाकिस्तानात स्थलांतरित झालेले नागरिकही येतील, हा राज्याचा विषय असेल. स्थलांतरितांच्या पुढील दोन पिढ्यांतील वंशजांचाही यात समावेश आहे.


> बाहेरच्या नागरिकांना बंदी


जम्मू आणि काश्मीरचे कायमस्वरूपी नागरिक नसलेल्या व्यक्तींना राज्यात स्थावर मालमत्ता धारण करता येणार नाही. सरकारी नोकरी, शिष्यवृत्ती, सरकारी मदत त्यांना मिळणार नाही, अशी तरतूद ‘३५ अ’ अंतर्गत आहे. जम्मू-काश्मीरचे कायमस्वरूपी नागरिकत्व असलेल्या महिलेने बिगर कायमस्वरूपी नागरिकत्व असलेल्या पुरुषाशी लग्न केल्यास, तिचे राज्याचे नागरिकत्वाचे अपात्र ठरते. मात्र, ऑक्टोबर २००२मध्ये जम्मू आणि काश्मीर हायकोर्टाने काश्मीरबाहेरील व्यक्तीशी विवाह केलेल्या महिलेचे नागरिकत्व अपात्र ठरणार नाही, असा निकाल दिला होता. मात्र, अशा महिलेच्या मुलांना वंशपरंपरागत अधिकार नसतील, असेही कोर्टाने म्हटले होते.


> कलम ‘३५ अ’ कशामुळे चर्चेत?


‘वी द सिटिझन’ या स्वयंसेवी संस्थेने २०१४मध्ये कलम या कलमाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. कलम ३६८अंतर्गत सुधारणांद्वारे हे कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले नसल्याचे सांगून याचिकाकर्त्यांनी त्याला विरोध केला आहे. संसदेसमोर हे कलम मांडण्यात आले नाही, तसेच ते तातडीने लागू करण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे. गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टात दुसऱ्या एका प्रकरणात दोन काश्मिरी महिलांनी म्हणणे मांडले होते. कलम ३५अ आधारित राज्याच्या कायद्यामुळे आमच्या मुलांचे नागरिकत्व हिरावले गेले असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले होते.


> विरोध का?


‘३५ अ’ रद्द झाल्यास जम्मू आणि काश्मीरची स्वायत्तता लोप पावेल, अशी भीती राजकीय पक्ष आणि फुटीरतावादी संघटनांना वाटते आहे. कलम रद्द झाल्यास मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या राज्यात सामाजिक बदल होतील. काश्मीरचा करार सर्वोच्च स्वायत्ततेवर आधारित असल्याचे राज्यातील राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. ३५ अ रद्द झाल्यास राज्यात ‘हिंदू’ धर्मियांचे लोंढे येतील, अशी शक्यता फुटीरतावादी व्यक्त करतात. जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या ७० वर्षांत सामाजिक स्थितीत फरक पडलेला नाही. राज्यातील जम्मू भागात हिंदू बहुसंख्य आहेत, तर लडाखमध्ये बौद्ध धर्मिक मोठ्या संख्येने आहेत. त्यांना खोऱ्यात संपत्ती खरेदी करण्याचा, तसेच स्थायिक होण्याचा अधिकार आहे.

भारतीय संविधान निर्मितीबाबत काही महत्वाची माहिती

भारतीय संविधानसभेच्या पहिल्या बैठकीत सूत्रसंचालन जे. पी . कृपलानी ह्यांनी केले होते , कृपलानी ह्यांनीच हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा ह्यांच्या नावाचे अनुमोदन केले होते.


मूळ राज्यघटना छापील नव्हती ! ती प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) ह्यांनी स्वतःच्या हातांनी लिहिली आहे.


आपल्या सर्वात प्रसिद्ध चित्रकारांपैकी एक – नंदलाल बोस ह्यांनी आपल्या राज्यघटनेवर सुंदर नक्षीकाम केलं आहे.

वैदिक काळातील गुरुकुल, श्रीराम-लक्ष्मण-सीता, श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, गौतमबुद्ध आणि महावीर, अशोक विक्रमादित्य तसंच अकबर, शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई – अश्यांना अनेक भागांच्या सुरुवातीला चितारण्यात आलं आहे.


२४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीच्या २८४ सभासदांनी घटनेवर स्वाक्षरी केली. समितीमध्ये १५ स्त्रिया होत्या.


ह्या स्वाक्षरी ११ पानांवर आहेत. ज्यात, अर्थातच पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकरांचीसुद्धा स्वाक्षरी आहे.

सध्या भारतातील 7 राज्यांत विधानपरिषदा आहेत.



त्यांची नावे व सदस्यसंख्या खालीलप्रमाणे:-

1. उत्तरप्रदेश - 100

2. महाराष्ट्र - 78

3. बिहार - 75

4. कर्नाटक - 75

5. आंध्रप्रदेश - 58

6. तेलंगणा - 40

7. जम्मु & काश्मीर - 36

सरोगसी (नियमन) विधेयक 2016



          मातृत्वाचा व्यवसाय मांडणार्‍या व्यावसायिक सरोगसीवर पूर्णपणे बंदी घालणार्‍यासरोगसी (नियमन) विधेयक 2016चा मसुदा 24 ऑगस्ट 2016 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. गेल्या काही वर्षांत भारत सरोगसीचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनत चालला होता. या अनैतिक व्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी हे विधेयक तयार करण्यात आले. भारतीय नागरिक असलेल्या ज्या जोडप्यांना मूलबाळ नाही, अशांनाच फक्त सरोगसीच्या सुविधेचा आधार घेता येईल. हा अधिकार अनिवासी भारतीय अथवा ओव्हरसिज इंडियन कार्ड होल्डरनादेखील मिळणार नाही.


         दरवर्षी 2000 हजार विदेशी अपत्यांना भारतीय माता सरोगसीद्वारे जन्म देतात. सरोगेट आई व या प्रकारे जन्मलेल्या मुलास कायदेशीर मान्यता देण्याची तरतूद विधेयकात आहे. मात्र, सरोगसीच्या सर्रास व्यवसायाला मान्यता देण्यास केंद्र सरकार तयार नाही. युरोपीय व अन्य देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त दरात सरोगसी उपलब्ध असल्यामुळे, गेल्या काही वर्षांपासून अनेक परदेशी नागरिक केवळ यासाठी भारतात येत.


         भारतातला आदिवासी तथा ग्रामीण भाग जणू या व्यवसायाचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनला होता. पैसे मोजून गरीब महिलांचे गर्भाशय भाड्याने घेणे गुन्हा आहे. गरजेतून निर्माण झालेली ही सोय कालांतराने लोकांच्या हौसेची बाब बनली आहे. अनेक लोकप्रिय व्यक्ती ज्यांना अगोदरच एक मुलगा अथवा कन्या आहे, तेदेखील सरोगसीचा वापर करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन महिलांचे शोषण रोखण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळाने हे विधेयक मंजूर केले.


         विधेयकाची ठळक वैशिष्ट्ये -


         * कायदेशीर विवाह झालेले भारतीय दाम्पत्यच फक्त भाडोत्री मातृत्वाने अपत्य जन्माला घालू शकेल. मात्र, त्यासाठी दोघांपैकी एकाचे वंध्यत्व वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले असणे बंधनकारक. विवाहाला 5 वर्षे झाली आहेत पण मूल नाही अशांनाच सरोगेट मदरद्वारे मूल घेता येईल.


         * परकीय नागरिकास किंवा परदेशस्थ अनिवासी भारतीयास कोणाही भारतीय स्त्रीकडून भाडोत्री माता म्हणून सेवा घेता येणार नाही. ज्या दांपत्याला मूल नाही अशानाच आणि फक्त भारतीयांनाच सरोगसी करण्याची परवानगी. एनआरआय, विदेशी नागरिक, सिंगल पॅरेंटस्, समलैंगिक दांपत्य, लिव्ह इन कपल यांना सरोगसीद्वारे मूल घेता येणार नाही.


         * अविवाहित दाम्पत्य, एकटे पालक, लिव्ह-इन पद्धतीने एकत्र राहणारे अथवा समलिंगी दाम्पत्य भाडोत्री मातृत्वाचा वापर करू शकणार नाहीत.


         * कोणाही स्त्रीला केवळ दयाळू भावनेतून इतर कोणाच्या तरी मुलाची भाडोत्री माता होता येईल. त्यासाठी तिला वैद्यकीय खर्चाखेरीज अन्य कोणताही मोबदला मिळणार नाही.


         * 25, 000 कोटींचा वर्षाला भारतात भाडोत्री मातृत्व हा धंदा भाडोत्री मातृत्वाच्या नावाखाली ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांचे शोषण होऊ नये, म्हणून खास तरतुदी.


         * भाडोत्री मातृत्वाच्या व्यवहारांचे नियमन करण्यासाठी केंद्र व राज्यांच्या पातळीवर स्वतंत्र मंडळे स्थापन करणार.


         * राष्ट्रीय सरोगसी मंडळ केंद्र सरकार स्थापन करणार असून केंद्रीय आरोग्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतील. प्रत्येक राज्यामध्ये असे सरोगसी मंडळ तेथील आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणार आहे.


         * सरोगेट मदरही केवळ जवळची नातेवाईकच पाहिजे. त्या महिलेला फक्त एकदाच सरोगेट मदर होता येईल. ती महिला विवाहित हवी.


         * सरोगेट मूल घेणार्‍या महिलेचे वय 23 ते 50 वर्षांदरम्यान हवे. पुरुषाचे वय 26 ते 55 वर्षांदरम्यान पाहिजे.


         * देशात 2000 सरोगसी क्लिनिक आहेत. क्लिनिकने 25 वर्षांचे सरोगसी रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक आहे.


         * सरोगेट मुलगा किंवा मुलीला संबंधित दांपत्याच्या मालमत्तेत इतर मुलांप्रमाणेच वाटा मिळेल.


         * स्वतःचे मूल असलेल्यांना किंवा दत्तक मूल असलेल्यांना सरोगसीचा पर्याय वापरण्याची परवानगी नसेल. एक महिला फक्त एकदाच सरोगेट माता होऊ शकेल. त्यासाठीही ती विवाहित व निरोगी बाळाची माता असणे बंधनकारक असेल.


         * सरोगसी क्लिनिकची नोंदणी बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे या उपायातून जन्माला येणार्‍या बाळाचे संपूर्ण तपशील 25 वर्षांपर्यंत सांभाळून ठेवणे या क्लिनिकवर बंधनकारक असेल. अशा क्लिनिकने किंवा संबंधित दांपत्याने सरोगेट मातेकडे दुर्लक्ष केले किंवा बाळाचा त्याग केला तर दहा लाख रुपयांचा दंड आणि 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाईल.


दहीहंडीची उंची 20 फुटांची


          महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या दहीहंडी उत्सवात दहीहंडीचा थर वीस फुटांच्या वर नेण्यात येऊ नये, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. अनिल आर. दवे, न्या. उदय ललित व न्या. एल. नागेश्‍वर राव यांच्या पीठाने अधोरेखित केला. या निर्बंधा


निर्बंधांच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळली होती.

भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली:



भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी भारतीयांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले जाते. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला जातो की, तेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो.. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जातोच. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक असते.


संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला जातो.. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविण्याची प्रथा आहे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला असतो. प्लॅस्टिकचा ध्वज वापरणे मना असते.


राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.


संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.


राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.


ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.


केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.

कलम 370 काय आहे ?


जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 वरून राजकीय नेते आणि पक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे.अनेक दिवसांनी कलम 370 चा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.कलम 370 मध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत, त्यांचा संभाव्य फायदा आणि तोटा काय आहे, हे खाली विस्तृतपणे देण्यात आले आहे.

कलम 370 मधील प्रमुख मुद्दे

.

1) कलम 370 लागू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. म्हणजेच हे राज्य विशेष स्वायत्तता असलेले राज्य आहे.

.

2) कलम 370 मधील तरतुदीअंतर्गत संसदेला जम्मू-काश्मीरसाठी फक्त संरक्षण, विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा बनवण्याचा अधिकार आहे.

.

3) इतर कायदे लागू करण्यासाठी त्यांना राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे.

.

4) या विशेष अधिकारामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचादेखील अधिकार नाही.

5) कलम 370 मुळेच जम्मू-काश्मीरवर 1976 चा शहरी भूमी कायदा लागू होत नाही. याचाच अर्थ जम्मू-काश्मीरचा रहिवासी नसणारा व्यक्ती जमीन खरेदी करूशकत नाही.

.

6) एवढेच नाही तर ज्या महिलेने इतर राज्यातील मुलाशी लग्न केले असेल, तर तोसुद्धा येथे जमीन खरेदी करू शकत नाही.

.

7) याशिवाय ज्यामध्ये देशात आर्थिक आणीबाणी लावण्याची तरतूद आहे ते भारतीय घटनेचे कलम 360 देखील जम्मू-काश्मीरवरलागू होत नाही.

.

8) भारतातील सर्व राज्यांमध्येलागू होणारे कायदेसुद्धा या राज्यात लागू होऊ शकत नाहीत.

.

9) जम्मू-काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. तसेच, इतर राज्यांमध्ये हा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. कलम 370 द्वारे करण्यात आलेली ही विशेष तरतूद आहे.

.

10) पाकिस्तानने 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीरवर हल्ला केला होता. त्यानंतर राजा हरिसिंह यांनी भारताला मदत मागितली होती आणि त्यानंतर कलम370 अस्तित्वात आले.

.

11) 50 दशकाच्या सुरुवातीपासून भाजप पक्ष कलम 370 च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आला आहे. जम्मू-काश्मीर पूर्णपणे एकीकृत व्हावे, असे त्यांना वाटते.समर्थनात केले जाणारे तर्क

कलम 370 कायम ठेवण्याच्या बाजूने बोलायचे झाल्यास या कलमामुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांना त्यांच्या सोयीनुसार त्यांचे हित आणि कायदे निश्चितकरण्याचा अधिकार मिळतो. केंद्रसरकारच्या दबावातून मुक्त होऊन ते स्वत:साठी आपल्या गरजांनुसार कायदा तयार करू शकतात.

.

* भारत आणि जम्मू-काश्मीर यांच्यात झालेल्या करारांनुसार या राज्याला भारताशी जोडणारा हा कायदा आहे. याचाच उल्लेख करत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले होते की, कलम 370 ची कायम चुकीचीव्याख्या होत आलेली आहे.

.

* या कायद्यांतर्गत इतर राज्यातील लोकांना जम्मू-काश्मीरात नोकरी मिळवण्याचा अधिकार नाही. राज्याच्या शासकीय सेवादेखील केवळ जम्मू-काश्मीरच्या उमेदवारांसाठीच आहेत. यामुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी सुरक्षित राहतात.

.

* जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 मुळे दहशतवादाला खतपाणी मिळत आहे. या कलमाअंतर्गत पाकिस्तानी नागरिक जम्मू-काश्मीरच्या महिलेशी लग्न करून काश्मीरचे नागरिकत्व पत्करू शकतो. अशा रीतीने पाकिस्तानी दहशतवाद्यांनाही काश्मीरचे नागरिकत्व सहज मिळते.

.

* जम्मू-काश्मीरमध्ये माहितीचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार यासारखे कायदे लागू होत नाहीत. कलम 370 मुळे तेथील नागरिक या कायद्यांच्या लाभांपासून वंचित राहत आहेत. तेथे माहिती अधिकार कायदा केवळ केंद्र सरकारच्या कार्यालयांसाठीच लागू होतो.

.

* जम्मू-काश्मीर राज्यातील अल्पसंख्याकांच्या हितांसाठीभारत सरकार कलम 370 अंतर्गत काहीच करू शकत नाही. तथापि, अल्पसंख्याकांच्

या हितांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जम्मू-काश्मीर सरकारवर लावला जात आहे.

जादुटोना विरोधी कायदा

 

🔸 समत - २२ ऑगस्ट २०१३

🔺 जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये एकुन १२ कलमांचा समावेश आहे.या कायद्यानुसार केवळ अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या कृती शिक्षापात्र गौष्टी आहेत.त्या खालील प्रमाणे .


१) भूत उतरवण्याच्या बहान्याने एखाद्या व्यक्तिला बांधपन ठेउन मारहान करने , त्याचा विविध प्रकारे छळ करने , चटके देणे , मुत्र , विष्ठा खायला लावने . अशा प्रकारची कृत्य करने कायदेशिर गुन्हा आहे . पकंतु त्यासाठी प्रार्थना , मंत्र म्हटले पुजा केली तर तो गुन्हा नव्हे.


२) एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करुन फसवने , ठकवने , आर्थिक प्राप्ती करने परंतू कायदा लागु होण्याच्या अगौदरच्या गुन्ह्यांवर कारवाई करता येनार नाही.


३) जिवाला धोका निर्माण होनार्या अथवा शरिराला जीवघेण्या जखमा होतात अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब करने.


४) गुप्तधन , जारन - मारन , करणी , भानामती , नरबळी या नावाने अमानुष कृत्य करणे 


५) अतिंद्रीय शक्ती असल्याचे भासवुन इतरांच्या मनात भिती निर्माण करने व न एेकल्यास वाईट परिनामांची  धमकी देणे.


६) एखादी व्यक्ती करनी करते , जादूटोना करते , भूत लावते , जनावरांचे दुध आटवते, अपशकुनी आहे , सैतान आहे असे जाहीर करने


७) जारन - मारन , चेटुक केल्याच्या नावाखाली मारहान करने , नग्नावस्थेत धिंड काढने , रोजच्या व्यवहारावर बंदी घालने.


८) भुत पिशाचांना आवाहन करुन घबराट निर्माण करने . मृत्यूची भिती घालने , भुताच्या कोपामुळे शारिरीक इजा झाली असे सांगने.


९) कुत्रा , साप , विंचू चावल्यायस व्यक्तिला वैद्यकिय उपचार घेण्यापासुन रोखुन किंवा प्रतिबंध करुन त्याएेवजी मंञ तंत्र , गंडेदोरे , यासारखे उपचार करने . पण याचा अर्थ वैद्यकिय उपचार घेताना मंत्र तंत्र उपचार केले तर गुन्हा नाही 


१०) बोटाणे शस्त्रक्रिया करन्याचा दावा करने , गर्भवती महिलांच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करने 


११) स्वत:त विशेष शक्ती असल्याचे सांगुन अथवा मागील जन्मात पत्नी , प्रेयसी , प्रियकर होतो असे सांगुन लैंगिक संबंध ठेवने . तसेच मूल न होणार्या महिलेला अलौकिक शक्तीद्वारा मुल होण्याचे आश्वासन देउन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवने.


१२) एखाद्या मतीमंद असनार्या व्यक्तिमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा किंवा व्यवसायासाठी करने.


🔺 या अनुसुचीतिल १२ गौष्टीप्रमाने कृती करने हा गुन्हा ठरनार आहे . या गौष्टींच्या व्यतिरीक्त इतर कोणत्याही गौष्टीचा यामध्ये समावेश असनार नाही. 🔺


🔸 कायद्यांतर्गत शिक्षेची तरतूद 🔸


🔺 जादूटोना विरोधी कायदा हा दखलपात्र आणि अजामिनपात्र आहे  एखाद्या व्यक्तीने संबंदित कायद्यांतर्गत तक्रार केल्यास पोलिसांना गुन्हा नोंदवावाच लागनार आहे . या कायद्यामध्ये दोषींना कमित कमि सहा महिन्यांचा कारावास , पाच हजार रूपए दंड , सात वर्षाचा कारावास , ५००००₹ दंडाची शिक्षा ठरविण्यात आलेली आहे. तसेच एखादा गुन्हा घडल्यास त्याचा प्रचार , प्रसार करने तेवढ्याच कठोर शिक्षेस पात्र ठरनार आहे .

मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र



कलम १

सर्व मानवी व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहेत व त्यांना समान प्रतिष्ठा व समान आधिकार आहेत. त्यांना विचारशक्ती व सदसद्विवेकबुद्धी लाभलेली आहे व त्यांनी एकमेकांशी बंधुत्वाच्या भावनेने आचरण करावे.


कलम २ 

या जाहीरनाम्यात नमूद केलेले सर्व अधिकार व सर्व प्रकारचे स्वातंत्र्य प्रत्येकास आहे व त्या बाबतीत वंश, वर्ण, स्त्री-पुरुषभेद, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मतप्रणाली, राष्ट्रीय किंवा सामाजिक मूलस्थान, संपत्ती, जन्म किंवा इतर दर्जा यासारखा कोणताही भेदभाव केला जाता कामा नये. आणखी असे की, एखादी व्यक्ती ज्या देशांची किंवा प्रदेशाची रहिवासी असेल त्या देशाच्या किंवा प्रदेशाच्या, मग तो देश किंवा प्रदेश स्वतंत्र असो, स्वायत्त्त शासन नसलेला असो किंवा कोणत्याही प्रकारच्या सार्वभौमत्वा़खाली असो, राजकीय, क्षेत्राधिकारात्मक किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कारणास्तव कोणताही भेदभाव करता कामा नये.


कलम ३ 

प्रत्येकास जगण्याचा, स्वातंत्र्य उपभोगण्याचा, सुरक्षित असण्याचा अधिकार आहे.


कलम ४ 

कोणालाही गुलामगिरीत किंवा दास्यात ठेवता कामा नये; सर्व प्रकारच्या गुलामगिरीस व गुलामांच्या व्यापारास मनाई करण्यात आली पाहिजे


कलम ५ 

कोणाचाही छळ करता कामा नये. किंवा त्यास क्रूर, अमानुष किंवा कमीपणा आणणारी वागणूक देता कामा नये.


कलम ६ 

प्रत्येकाला सर्वत्र कायद्याच्या दृष्टीने माणूस म्हणून मान्यता मिळण्याचा अधिकार आहे.


कलम ७ 

सर्व लोक कायद्याच्या दृष्टीने समान आहेत व कोणताही भेदभाव न करता कायद्याचे समान संरक्षण मिळण्याचा त्यांना हक्क आहे. या जाहीरनाम्याचे उल्लंघन करून कोणत्याही प्रकारचा भेदभाव झाल्याच्या बाबतीत व असा भेदभाव करण्यास चिथावणी देण्यात आल्याच्या बाबतीत सर्वांना समान संरक्षण मिळण्याचा हक्क आहे.


कलम ८ 

राज्यघटनेने किंवा कायद्याने दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग करणाऱ्या कृत्यांच्या बाबतीत सक्षम राष्ट्रीय अधिकरणामार्फत उपाययोजना करण्याचा प्रत्येकास अधिकार आहे.


कलम ९ 

कोणालाही स्वच्छंदतः अटक, स्थानबद्ध किंवा हद्दपार करता कामा नये.


कलम १० 

प्रत्येकाला समान भूमिकेवरुन त्याचे अधिकार व जबाबदाऱ्या निश्चित करण्याच्या संबंधात किंवा त्याच्यावरील कोणत्याही दंडनीय आरोपाचा न्यायनिर्णय करण्याच्या संबंधात स्वतंत्र व नि:पक्षपाती अधिकरणामार्फत न्याय्य व जाहीर सुनावणी केली जाण्याचा हक्क आहे.


कलम ११

दंडनीय अपराधाचा आरोप ज्यावर ठेवण्यात आला आहे अशा प्रत्येक इसमास जाहीर न्याय चौकशीत तो दोषी असल्याचे सिद्ध होईपर्यंत, तो निरपराध आहे असे गृहीत धरले जाण्याचा अधिकार आहे. अशा न्याय चौकशीत त्याच्या बचावासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची हमी त्यास देण्यात आलेली असली पाहिजे.

जे कोणतेही कृत्य किंवा वर्तन ज्या वेळी घडले त्या वेळी ते राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याने दंडनीय अपराध ठरत नसेल तर त्या कृत्याच्या किंवा वर्तनाच्या संबंधात कोणालाही कोणत्याही दंडनीय अपराधाचा दोषी म्हणून समजता कामा नये. त्याचप्रमाणे दंडनीय अपराध घडला असेल त्यावेळी जी शिक्षा करण्याजोगी असेल त्या शिक्षेपेक्षा अधिक कडक शिक्षा त्यास देता कामा नये.


कलम १२ 

कोणाचेही खाजगी जीवन, त्याचे कुटुंब, घर अथवा त्याचा पत्रव्यवहार यांच्या संबंधात स्वच्छंद ढवळाढवळ होता कामा नये; त्याचप्रमाणे त्याची प्रतिष्ठा किंवा नावलौकिक यावर हल्ला होता कामा नये. अशी ढवळाढवळ किंवा हल्ला झाल्यास त्याविरुद्ध प्रत्येकास कायद्याने संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे.


कलम १३ 

प्रत्येकास प्रत्येक राष्ट्राच्या हद्दीत संचार व वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे.

प्रत्येकास स्वतःचा देश धरुन कोणताही देश सोडून जाण्याचा अथवा स्वतःच्या देशात परत येण्याचा अधिकार आहे.


कलम १४ 

प्रत्येकास छळापासून मुक्तता करून घेण्यासाठी इतर देशात आश्रय मिळवण्याचा व तो उपभोगण्याचा अधिकार आहे.

अराजकीय स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या संबंधात अथवा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या उद्दिष्टांशी व तत्त्वांशी विरुद्ध असलेल्या कृत्यांच्या संबंधात वस्तुतः उद्भवलेल्या खटल्यांच्या बाबतीत प्रस्तुत अधिकाराचा आश्रय घेता येणार नाही.


कलम १५ 

प्रत्येकांस राष्ट्रीयत्व मिळण्याचा अधिकार आहे.

कोणाचेही राष्ट्रीयत्व स्वच्छंदतः हिरावून घेतले जाता कामा नये, तसेच कोणासही आपले राष्ट्रीयत्व बदलण्याचा अधिकार नाकारता कामा नये.


कलम १६ 

वयात आलेल्या पुरुषांना व स्त्रियांना वंश, राष्ट्रीयत्व, अथवा धर्म यांचे कोणतेही बंधन न ठेवता विवाह करण्याचा व कौटुंबिक जीवन जगण्याचा अधिकार आहे. विवाहाच्या संबंधात वैवाहिक जीवन चालू असताना आणि विवाह-विच्छेदनाच्या वेळी त्यांना समान अधिकार मिळण्याचा हक्क आहे.

नियोजित जोडीदारांनी स्वेच्छेने व पूर्ण संमती दिली असेल तरच विवाह करावा.

कुटुंब हे समाजाचा एक स्वाभाविक व मूलभूत घटक आहे व त्यास समाजाकडून आणि शासनाकडून संरक्षण मिळण्याचा हक्क आहे.


कलम १७ 

प्रत्येकास एकट्याच्या नावावर तसेच इतरांबरोबर मालमत्ता धारण करण्याचा अधिकार आहे.

कोणाचीही मालमत्ता स्वच्छंदतः हिरावून घेतली जाता कामा नये.


कलम १८ 

प्रत्येकास विचारस्वातंत्र्य, आपल्या सदसद्विवेकबुद्धीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य, धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. या अधिकारांत स्वतःचा धर्म अथवा श्रद्धा बदलण्याच्या स्वातंत्र्याचा आणि एकट्याने वा इतरांसह सामुदायिकरीत्या आपला धर्म अथवा श्रद्धा, शिकवणुकीत, व्यवहारात, उपासनेत व आचरणात जाहीर रितीने अथवा खाजगी रितीने व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो.


कलम १९ 

प्रत्येकास मतस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ न होता मत बाळगण्याच्या स्वातंत्र्याचा , तसेच कोणत्याही माध्यमातून व सीमांचा विचार न करता माहिती व विचार ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे, ती मिळवणे व इतरांना ती देणे यासंबधीच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो.


कलम २० 

प्रत्येकास शांततापूर्ण सभास्वातंत्र्य व संघटना असण्याचा अधिकार आहे.

कोणावरही कोणत्याही संघटनेचा सभासद होण्याची सक्ती असता कामा नये.


कलम २१ 

प्रत्येकास आपण स्वतः अथवा आपल्या इच्छेनुरूप निवडलेल्या आपल्या प्रतिनिधीमार्फत आपल्या देशाच्या शासनात भाग घेण्याचा अधिकार आहे.

प्रत्येकास आपल्या देशाच्या शासकीय सेवेत प्रवेश मिळण्याचा समान अधिकार आहे.

जनतेची इच्छा ही शासकीय प्राधिकाराचा पाया असली पाहिजे. जनतेची इच्छा नियतकालिक व खर्याखुऱ्या निवडणुकांद्वारे व्यक्त झाली पाहिजे व या निवडणुका गुप्त मतदानपद्धतीने अथवा त्यासारख्या निर्बंधरहित पद्धतीने घेतल्या पाहिजेत.


कलम २२ 

प्रत्येकास समाजाचा एक घटक या नात्याने सामाजिक सुरक्षितता प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे आणि राष्ट्रीय प्रयत्न व आंतरराष्ट्रीय सहकार्य यांच्या द्वारे व प्रत्येक राष्ट्राच्या व्यवस्थेनुसार व साधनसंपत्तीनुसार आपल्या प्रतिष्ठेस व आपल्या व्यक्तीमत्वाच्या मुक्त विकासासाठी अनिवार्य असलेले आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार संपादन करण्याचा हक्क आहे.


कलम २३ 

प्रत्येकास काम मिळण्याचा, आपल्या इच्छेनुरूप काम निवडण्याचा, कामाच्या न्याय्य व अनुकूल शर्तींचा फायदा मिळवण्याचा व बेकारीपासून संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे.

कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता प्रत्येकास समान कामाबद्दल समान वेतन मिळण्याचा अधिकार आहे.

काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस स्वतःला व आपल्या कुटुंबाला मानवी प्रतिष्ठेस साजेसे जीवन जगता येईल असे न्याय्य व योग्य पारिश्रमिक व जरूर लागल्यास त्याशिवाय सामाजिक संरक्षणाची इतर साधने मिळण्याचा अधिकार आहे.

प्रत्येकास आपल्या हितसंबंधांच्या संरक्षणार्थ संघ स्थापण्याचा व त्याचा सदस्य होण्याचा अधिकार आहे.


कलम २४ 

वाजवी मर्यादा असलेले कामाचे तास व ठरावीक मुदतीने पगारी सुट्ट्या धरून प्रत्येकास विश्रांती व आराम मिळण्याचा अधिकार आहे.


कलम २५ 

प्रत्येकास स्वतःचे व आपल्या कुटुंबीयांचे आरोग्य व स्वास्थ्य यांच्या दृष्टीने समुचित राहणीमान राखण्याचा अधिकार आहे.यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय मदत व आवश्यक सामाजिक सोई या गोष्टींचा अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणे बेकारी, आजारपण, अपंगता, वैधव्य किंवा वार्धक्य यामुळे किंवा त्याच्या आवाक्याबाहेरील परिस्थितीमुळे उदरनिर्वाहाचे दुसरे साधन उपलब्ध नसल्यास सुरक्षितता मिळण्याचा अधिकार आहे.

माता व मुले यांना विशेष देखरेख व मदत मिळण्याचा हक्क आहे; सर्व मुलांना, मग ती औरस असोत किंवा अनौरस, सारखेच सामाजिक संरक्षण मिळाले पाहिजे.


कलम २६ 

प्रत्येकास शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. निदान प्राथमिक व मूलावस्थेतील शिक्षण मोफत असले पाहिजे, माध्यमिक शिक्षण सक्तीचे असले पाहिजे. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देण्यात आले पाहिजे आणि गुणवत्तेप्रमाणे, उच्चशिक्षण सर्वांना सारखेच उपलब्ध असले पाहिजे.

ज्यायोगे मानवी व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास साधेल व मानवी अधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्य याविषयीची आदरभावना दृढ होईल अशी शिक्षणाची दिशा असली पाहिजे. तसेच शिक्षणाने सर्व राष्ट्रांमध्ये आणि वांशिक किंवा धार्मिक गटांमध्ये सलोखा, सहिष्णुता व मैत्री वृद्धिंगत झाली पाहिजे. शिवाय त्यायोगे शांतता राखण्यासंबंधीच्या संयुक्त राष्ट्रांच्या कार्यास चालना मिळाली पाहिजे.

आपल्या पाल्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण देण्यात यावे हे ठरविण्याचा अधिकार पालकांना आहे.


कलम २७ 

प्रत्येकास समाजातील सांस्कृतिक जीवनात मोकळेपणाने भाग घेण्याचा, कलांचा आनंद उपभोगण्याचा आणि वैज्ञानिक प्रगती व तिच्यापासून मिळणारे फायदे यांत सहभागी होण्याचा अधिकार आहे.

आपण निर्माण केलेल्या कोणत्याही वैज्ञानिक, साहित्यिक किंवा कलात्मक कृतीपासून निष्पन्न होणाऱ्या नैतिक व भौतिक हितसंबंधांना संरक्षण मिळण्याचा प्रत्येकास अधिकार आहे.


कलम २८ 

ह्या जाहीरनाम्यातग्रथित केलेले अधिकार व स्वातंत्र्य पूर्णपणे साध्य करता येतील अशा सामाजिक व आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा प्रत्येकास हक्क आहे.


कलम २९ 

समाजामध्येच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास पूर्णपणे व निर्वेधपणे करता येत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची समाजाप्रत काही कर्तव्ये असतात.

आपले अधिकार व स्वातंत्र्य यांचा उपभोग घेताना इतरांचे अधिकार व स्वातंत्र्य यास योग्य मान्यता मिळावी व त्याचा योग्य तो आदर राखला जावा आणि लोकशाही समाज-व्यवस्थेत नीतिमत्ता, सार्वजनिक सुव्यवस्था व सर्वसाधारण लोकांचे कल्याण यासंबंधातील न्याय्य अशा आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या जाव्यात या आणि केवळ याच कारणासाठी कायद्याने ज्या मर्यादा घालून दिल्या असतील त्याच मर्यादांच्या आधीन प्रत्येक व्यक्तीस रहावे लागेल.

संयुक्त राष्ट्रांचे उद्देश व तत्त्वे यांच्याशी विरोधी ठरेल अशा रितीने ह्या अधिकारांचा व स्वातंत्र्याचा कोणत्याही स्थितीत वापर करता कामा नये.


कलम ३० 

ह्या जाहीरनाम्यात ग्रथित केलेल्या अधिकारांपकी कोणतेही अधिकार व स्वातंत्र्ये नष्ट करण्याच्या उद्देशाने कोणतीही हालचाल किंवा कोणतेही कृत्य करण्याचा अधिकार कोणत्याही राष्ट्रास, गटास किंवा व्यक्तीस आहे असे ध्वनित होईल अशा रितीने ह्या जाहीरनाम्यातील कोणत्याही मजकुराचा अर्थ लावता कामा नये.

महिलांसाठीच्या खास काही योजना:



1. डवाकरा योजना -1982


2. न्यू मॉडेल चर्खा योजना -1987


3. नोरडा प्रशिक्षण योजना -1989


4. महिला सामख्या योजना -1993


5. राष्ट्रीय महिला कोश योजना -1993


6. राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना -1994


7. इंदिरा महिला योजना -1995


8. ग्रामीण महिला विकास योजना -1996


9. राजराजेश्वरी विमा योजना -1997


10. आरोग्य सखी योजना -1997


11. महिला आर्थिक विकास महामंडळ -24 फेब्रुवारी 1975


12. महाराष्ट्र राज्य महिला आयोग -1993


13. महाराष्ट्र राज्य समाज कल्याण सल्लागार बोर्ड -1960

बालक



1. बालकांकरीता आंतरराष्ट्रीय आपत्कालीन अर्थकोष -1946


2. बालकांच्या हक्कांसाठीची आंतरराष्ट्रीय परिषद -1990


3. एकात्मिक बालविकास सेवा योजना-1975


4. बाळसेविका प्रशिक्षण कार्यक्रम -1962


5. बालकांची काळजी घेणारी केंद्रे


6. शाळापूर्व बालकांसाठी शिक्षण


7. आनंद आकृतीबांधावर आधारित एकात्मिक कुटुंबकल्यान कार्यक्रम-


8. बालकांसाठी राष्ट्रीय परितोषिक -1981


युवा कल्याण:


1. राष्ट्रीय सेवा योजना


2. राष्ट्रीय लष्करी प्रशिक्षण संस्था


3. एन.सी.सी. शिष्यवृती योजना


4. नेहरू युवा केंद्र


5. राष्ट्रीय युवक पारितोषिक


6. युवक विकासासाठी राष्ट्रीय संस्था


7. मानवी जीवनमूल्य प्रशिक्षण कायदा


बालकामगार:


बालकामगार म्हणजे कष्टाची आनिजात जीविताला धोका उद्भवतो अशी कामे करणारी अल्पवयीन मुले होय. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने बालकामगार म्हणजे अशी अल्पवयीन व्यक्ती की जीच्यावर अकाली प्रौढत्व लादले जाते. त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांचा विचार न करता कमी वेतनावर कष्टप्रद कामेकरण्याची सक्ती केली जाते. संयुक्त राष्ट्र संघाच्या बालकामगार विषयक समितीने असे प्रतिपादन केले आहे की, बाललोकसंख्येतील असा घटक की, ज्यास वेतन देवून कष्टप्रद कामे करण्यास भाग पाडले जाते तो बालकामगार होय. भारतीय घटनेतील कलम क्रमांक 24 मध्ये कारखान्यात किंवा धोकादायक ठिकाणी काम करणारी वयाच्या 14 वर्षाखालील व्यक्ती म्हणजे बालकामगार होय.


बालकामगर समस्येची कारणे:


1. दारिद्र्य


2. बेकारी


3. शैक्षणिक सुविधांचा अभाव


4. कौटुंबिक समस्या


5. शैक्षणिक मागासलेपणा


6. वेतन पद्धती


7. हुंडा


बालकामगार समस्येचे परिणाम:


1. बालकांचा छळ


2. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचा अडथळा


3. बालकांचे शोषण


4. बालकांचा दुरुपयोग

अंतरराज्यीय व्यापार, वाणिज्य आणि संचार :



तरतूद :- भाग १२ मधील कलम ३०१ ते ३०७


०१. कलम ३०१ अन्वये भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र व्यापार, वाणिज्य आणि संचार यांचे स्वातंत्र्य असेल. हे मुक्त असे स्वातंत्र्य आहे मात्र या स्वातंत्र्यावर कलम ३०२ ते ३०५ अन्वये काही बंधने घालण्यात आलेली आहेत.


०२. कलम ३०२ अन्वये संसदेला कायद्याद्वारे राज्याराज्यातील किंवा देशातील राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालता येतील. मात्र संसद एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देऊ शकत नाही किंवा त्यात भेदभाव करू शकत नाही. मात्र एखाद्या भागातील टंचाईच्या परिस्थितीचा त्याला अपवाद आहे. उदा. संसदेने १९५५ साली पारित केलेला 'अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५'.


०३. कलम ३०३ अन्वये संसद किंवा राज्य विधीमंडळाला ७ व्या परिशिष्टातील कोणत्याही व्यापार किंवा वाणिज्याशी संबंधित विषयाच्या आधारे, एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देणारा किंवा राज्याराज्यात भेदभाव करणारा किंवा तसे प्राधिकृत करणारा कायदा करता येणार नाही. मात्र माल टंचाईतून उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असल्यास असा भेदभावपूर्ण कायदा संसदेस करता येईल.


०४. कलम ३०४ अन्वये राज्य विधीमंडळाला

---१--- अन्य राज्यातून आयात केलेल्या मालावर, राज्यात उत्पादित केलेल्या मालावर लावण्यात येणाऱ्या करासारखे आणि त्याइतके कर लावता येईल.

---२--- राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालू शकते मात्र विधानसभेत हे विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीने मांडावे लागते.


०४. कलम ३०५ (राज्य मक्तेदारीची तरतूद). यानुसार संसद किंवा राज्य विधीमंडळ नागरिकांना पूर्णतः किंवा अंशतः वगळून स्वतःच एखादा व्यापार, धंदा, उद्योग किंवा सेवा चालविण्यासाठी कायदा करू शकते.

राज्‍यसभा



घटकराज्‍ये व संघराज्‍य क्षेत्रांचे राज्‍यसभा प्रतिनिधित्‍व करते. कलम 80 मध्‍ये राज्‍यसभेच्‍या स्‍थापनेविषयी माहि‍ती देण्‍यात आली आहे.


रचना:- राज्‍यसभेची कमाल सदस्यसंख्‍या 250 इतकी असते. यापैकी 238 सभासद घटकराज्‍ये व संघराज्‍य क्षेत्रांचे प्रतिनिधी असतात, तर उरलेल्‍या 12 नामवंत व्‍यक्‍तींची नियुक्‍ती साहित्‍य, विज्ञान, कला व समाजसेवा या क्षेत्रांतून राष्‍ट्रपतींद्वारा केली जाते. सध्‍या राज्‍यसभेत 245 सदस्‍य आहेत. त्‍यापैकी 233 घटकराज्‍य व संघराज्‍याचे प्रतिनिधित्त्व करतात तर, 12 सदस्‍यांची नेमणूक राष्‍ट्रपतीमार्फत केली जाते. महाराष्‍ट्रातून राज्‍यसभेवर 19 सदस्‍य पाठवले जातात.


पात्रता :- राज्‍यसभेच्‍या सदस्‍यत्त्वासाठी खालील पात्रता असणे आवश्‍यक आहे.


1)  तो भारताचा नागरिक असावा.


2)  त्‍याच्‍या वयाची 30 वर्षे पूर्ण झालेली असावीत.


3)  संसदेने वेळोवेळी कायदा करून निश्चित केलेल्‍या अटी त्‍याने पूर्ण केलेल्‍या असाव्‍यात.


सदस्‍यांची निवड :- राज्‍यसभेच्‍या सदस्‍यांची निवड घटकराज्‍यांच्‍या विधानसभेच्‍या सदस्‍यांकडून गुप्‍त मतदान पद्धतीने केली जाते.


कार्यकाल :- राज्‍यसभा हे स्‍थायी सभागृह आहे. तिचे विसर्जन होत नाही. राज्‍यसभेचे 1/3 सभासद त्‍यांच्‍या जागी नव्‍याने निवडले जातात. सामान्‍यत: राज्‍यसभेच्‍या सदस्‍यांची मुदत 6 वर्षे असते.


राज्‍यसभेतील राज्‍यनिहाय जागा :-


आंध्रप्रदेश (11)


आसाम (7)


अरुणाचल (1)


बिहार (16)


छत्तीसगड (5)


गोवा (1)


गुजरात (11)


हरियाणा (5)


हिमाचल प्रदेश (3)


जम्‍मू - काश्‍मीर (4)


झारखंड (6)


      कर्नाटक (12)


केरळ (9)


मध्‍यप्रदेश (11)


महाराष्‍ट्र (19)


मणिपूर (1)


मेघालय (1)


मिझोराम (1)


नागालँड (1)


ओडिशा (10)


पंजाब (7)


राजस्‍थान (10)


सिक्किम (1)


तामिळनाडू (18)


तेलंगणा (7)


त्रिपुरा (1)


उत्तरप्रदेश (31)


पश्चिम बंगाल (16)


उत्तराखंड (3)


दिल्‍ली (3)


पुड्डुचेरी (1)

१४ ऑक्टोबर २०२०

Online Test Series

डेली का डोज


1.हाल ही में किस मशहूर नृत्यांगना एवं कोरियोग्राफर का 101 वर्ष की उम्र में निधन हो गया है?

a. अमला शंकर✔️

b. मृणालिनी साराभाई

c. सितारा देवी

d. शोभना नारायण


2.कारगिल विजय दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 25 मई

b. 10 जून

c. 26 जुलाई✔️

d. 15 मार्च


3.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआइ) ने अयोध्या में सिविल वर्क और सौंदर्यीकरण के लिए कितने करोड़ रुपए मंजूर किए हैं?

a. 55 करोड़ रुपए✔️

b. 25 करोड़ रुपए

c. 35 करोड़ रुपए

d. 15 करोड़ रुपए


4.खेल मंत्रालय और भारतीय टेबल टेनिस फेडरेशन ने किस देश के कोच यिन वेई का अनुबंध बढ़ाने का फैसला किया है?

a. नेपाल

b. चीन✔️

c. रूस

d. जापान


5.निम्न में से किस राज्य को खेलो इंडिया गेम्स 2021 की मेजबानी सौंपी गयी है?

a. पंजाब

b. दिल्ली

c. कर्नाटक

d. हरियाणा✔️


6.भारत और किस देश ने मुक्त व्यापार करार (एफटीए) के लिए बातचीत शुरू करने की प्रतिबद्धता जताई है?

a. नेपाल

b. चीन

c. बांग्लादेश

d. ब्रिटेन✔️


7.भारतीय रिजर्व बैंक ने श्रीलंका को कितने करोड़ डॉलर की मुद्रा अदला-बदली सुविधा के लिए यहां आवश्यक दस्तावेजों पर हस्ताक्षर किए हैं?

a. 40 करोड़ डॉलर✔️

b. 20 करोड़ डॉलर

c. 30 करोड़ डॉलर

d. 10 करोड़ डॉलर


8.संयुक्त अरब अमीरात के बाद हाल ही में किस देश ने भी अपना मंगल मिशन सफलतापूर्वक लांच कर दिया?

a. भारत

b. पाकिस्तान

c. चीन✔️

d. नेपाल


9.किस राज्य सरकार ने कौशल विकास के क्षेत्र में सहयोग करने हेतु रोपड़ स्थित भारतीय प्रौद्योगिकी संस्थान के साथ एक समझौते पर हस्ताक्षर किए हैं?

a. बिहार

b. तमिलनाडु

c. पंजाब✔️

d. कर्नाटक


10.हाल ही में किस देश ने दक्षिण चीन सागर में संयुक्त राष्ट्र के लिए औपचारिक घोषणा में बीजिंग के क्षेत्रीय और समुद्री दावों को खारिज कर दिया?

a. पाकिस्तान

b. ऑस्ट्रेलिया✔️

c. चीन

d. अमेरिका

महत्वपूर्ण IMP प्रश्नसंच

1) कोणत्या संघटनेच्यावतीने लेह  इथल्या DIHAR केंद्रामध्ये  कोविड-19 चाचणी सुविधा स्थापन करण्यात आली?

(A) संरक्षण संशोधन व विकास संघटना  (DRDO)✅✅
(B) उदय फाउंडेशन
(C) राही
(D) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2) कोणत्या राज्यात ‘ई-सचिवालय’ संकेतस्थळ कार्यरत करण्यात आले?

(A) राजस्थान
(B) मध्यप्रदेश
(C) हिमाचल प्रदेश
(D) हरयाणा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3) कोणत्या व्यक्तीची आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाच्या उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात  आली?

(A) आर. श्रीलेखा
(B) अरुण कुमार✅✅
(C) आसरा गर्ग
(D) मनीष शंकर शर्मा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4) कोणत्या देशाला जागतिक व्यापार संघटनेनी निरीक्षकाचा दर्जा बहाल केला?

(A) इराण
(B) उझबेकिस्तान
(C) तुर्कमेनिस्तान✅✅
(D) जिबूती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5) कोणाची BRICS CCI संस्थेचे मानद सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली?

(A) साहिल सेठ✅✅
(B) दया शंकर
(C) प्रशांत गावंडे
(D) बिपिन सुधाकर जाधव

१.  भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?

१. राणीगंज व विरभूम✅
२. झरिया व खेत्री
३. ब्राम्हणी व देवगढ 
४. बोकारो व राजमहाल

२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?

१. मिथेन व आयसो मिथेन
२. ईथेन व आयसो ईथेन 
३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅
४. प्रोपेन व आयसो प्रोपेन


३.  अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर,  बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?

१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी
२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅


५.  जोड्या लावा :
अ. हेन्री बेक्केरेल।     १. पहिल्या अणु चाचणीचा जनक

ब. आँटो हाँन।         २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी

क. एन्रिको फर्मी।     ३. किरणोत्सारितेचा शोध

ड. ओपेनहायमर।     ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध

१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅
२. अ-३, ब-२, क-४, ड-१
३. अ-१, ब-४, क-२, ड-३
४. अ-१, ब-२, क-४, ड-३


६.  भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?

१. पायदळ लढाऊ विमान 
२. हलके लढाऊ विमान ✅
३. वैमानिकरहित लक्ष्य विमान 
४. जेट ट्रेनर



७.  राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?

१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅ 
२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे
३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून
४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून



८.  जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?

१. हरमन होलोरिथ
२. हाँवर्ड एकेन✅
३. थिओडोर मँमन
४. के.आर. पोर्टर


९.  भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?

१. १५ आँगस्ट १९९३
२. १५ आँगस्ट १९९५✅
३. १५ आँगस्ट १९९७
४. १५ आँगस्ट १९९९


१०.  योग्य विधान निवडा :

१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.
२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.
३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅
४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.



११.  जोड्या लावा :

अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर।           १. बँगलोर

ब. इस्रो सँटलाईट सेंटर।         २. अहमदाबाद

क. सतिष धवन स्पेस सेंटर।               ३. थुंबा 

ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर।             ४. श्रीहरीकोटा

१. अ-३, ब-२, क-३, ड-१
२. अ-२, ब-१, क-३, ड-४
३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅
४. अ-२, ब-३, क-४, ड-१


१२.  पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या  भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?

१. परम आनंद
२. परम अनंत✅
३. परम सुलभ 
४. परम तेज


१३.  १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?

१. कलकत्ता - हावडा
२. मुंबई - दिल्ली
३. कराची - लाहोर✅
४. मुंबई - ठाणे

१४.  पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?
अ. अँस्ट्राँनाँमी।       ब. अँस्ट्राँलाँजी।          क. अँस्ट्रोफिजिक्स

१. अ आणि ब
२. ब आणि क
३. अ आणि क✅
४. अ, ब, आणि क


१५.  'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?

 उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते. 
त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.


1) कोपेनच्या वर्गीकरणानुसार "AW" हवामान प्रदेश काय निर्देशित करतो ?

1) लघु शुष्क ऋतृचा मोसमी प्रकार 
2) उष्णकटिबंधीय सॅव्हाना ✅
3) उष्ण वाळवंटी प्रकार 
4) ध्रुवीय प्रकार

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

2) " एल निनो " हा ऊबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा ------- आहे.

1) अर्जेटिना 
2) पेरू ✅
3) ब्राझील 
4) चीली

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

3) -----------% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापरेंत पोहचत नाही .

1) 79 % 
2) 59 %
3) 49 %✅
4) 39 %

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

4) असा कोणता देश आहे ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही.

1) फ्रान्स 
2) स्वित्झलंड ✅
3) स्वीडन 
4) पेरू

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

5) पर्वतीय वाऱ्याना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात.

1) अमेरिका आणि मेक्सिको 
2) अमेरिका आणि कॅनडा ✅
3) ब्राझील आणि अर्जेटिना 
4) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड.

Current Affairs


Q.1. DRDO ने भारतीय सेना में सटीक निगरानी के लिए कौनसा ड्रोन विकसित किया है ?

Ans. भारत


Q.2. पेमेंट एप ने भारत का पहला नंबरलेस कार्ड लांच करने की घोषणा की है ?

Ans. FamPay


Q.3. किस देश ने रिलायंस जियो को उन कंपनियों की लिस्ट में रखा है जो Clean Telcos की तरह अग्रसर हो रहीं हैं ?

Ans. अमेरिका


Q.4. भारत ने किस देश के साथ आपातकालीन चिकित्सा सेवाएं शुरू करने के लिए समझौता किया है ?

Ans. मालदीव


Q.5. पारेषण लाइन और पारेषण टावरों के निरीक्षण के लिए ड्रोन का इस्तेमाल करने वाला पहला राज्य कौन बना है ?

Ans. महाराष्ट्र


Q.6. Spacex ने किस देश के सैन्य उपग्रह ANASIS-2 को सफलतापूर्वक लांच किया है ?

Ans. दक्षिण कोरिया


Q.7. भारत के किस राज्य में दुर्लभ पीला कछुआ पाया गया है ?

Ans. ओडिशा


Q.8. सिंगापुर के शोधकर्ताओं ने किस देश में 14 पैरों वाले विशाल समुद्री कॉक्रोच की खोज की है ?

Ans. इंडोनेशिया


Q.9. रमेश बाबू बोडू को किस बैंक का MD&CEO नियुक्त किया गया है ?

Ans. करूर वैश्य बैंक


Q.10. आरोग्यश्री स्वास्थ्य सेवा योजना किस राज्य सरकार ने लागू की है ?

Ans. आंध्र प्रदेश

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे



Q1) भारतातील प्रथमच अशी पूर्णपणे संपर्क-विरहीत विमानतळ कार पार्किंग व्यवस्था _ येथे सादर केली गेली.
उत्तर :- हैदराबाद विमानतळ

Q2) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने ‘मुख्यमंत्री घर घर रेशन योजना’ मान्य केली?
उत्तर :-  दिल्ली

Q3) सूरज केदे मरदा न’ हे शीर्षक असलेले पुस्तक कुणी लिहिले?
उत्तर :- बलदेव सिंग सदकनामा

Q4) कोणाच्या हस्ते ‘मनोदर्पण’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर:-  रमेश पोखरियाल ‘निशंक’

Q5) दक्षिण कोरिया देशाने ____ या नावाने त्याचा पहिला लष्करी दळणवळण उपग्रह प्रक्षेपित केला.
उत्तर:- ANASIS

Q6) कोणत्या राज्याने ‘वन-स्टॉप शॉप’ योजनेला मान्यता दिली?
उत्तर:- राजस्थान

Q7) ____ येथे देशातील पहिल्या “EV (इलेक्ट्रिक व्हेईकल) चार्जिंग प्लाझा”चे उद्‌घाटन करण्यात आले.
उत्तर :- नवी दिल्ली

Q8) भारतीय नौदलाने _ यांच्यासोबत ‘पासएक्स’ नावाचा एक सागरी सराव पार पाडला.
उत्तर :- अमेरिकेचे नौदल

Q9) नुकतेच निधन झालेले सी. एस. शेषाद्री हे एक प्रसिद्ध भारतीय _ होते.
उत्तर :- गणितज्ञ

Q10) कोणत्या व्यक्तीला ‘SAP इंडियन सबकॉन्टिनेन्ट’ कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमण्यात आले?
उत्तर :-  कुलमीत बावा

Q1) भारताने ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली जे _ आहे.
उत्तर :-  रणगाडा-भेदी गाइडेड क्षेपणास्त्र

Q2) कोणत्या अणुऊर्जा प्रकल्पाचा निर्णायक टप्पा कार्यरत करण्यात आला आहे?
उत्तर :- काकरापार अणुऊर्जा संयंत्र

Q3) भारताने माले या शहरात ‘_________’ स्थापन करण्यासाठी मालदीव सोबत करार केला.
उत्तर :- आपत्कालीन वैद्यकीय सेवा

Q4) ईशान्येकडील राज्यांकडे वस्तूंची वाहतूक करण्यासाठी भारत _ या देशातल्या बंदरांचा उपयोग करीत आहे.
उत्तर :- बांग्लादेश

Q5) ग्रेटा थुनबर्गला 1,000,000 युरो एवढ्या रकमेचा ‘गुलबेनकियान प्राइज फॉर ह्यूमॅनिटी’ हा सन्मान देण्यात आला. ती एक ____ आहे.
उत्तर :-  पर्यावरण कार्यकर्ता

Q6) संरक्षण संशोधन व विकास संघटनाने भारतीय भुदलाकडे ‘भारत’ नावाचा __ सोपवला.
उत्तर :- ड्रोन

Q7) कोणत्या व्यक्तीच्या हस्ते नवी दिल्लीच्या वायू भवनात ‘भारतीय हवाई दलाच्या कमांडर परिषद’चे (AFCC) उद्घाटन झाले?
उत्तर :-  राजनाथ सिंग

Q8) कोणत्या व्यक्तीची SBI जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नेमणूक करण्यात आली?
उत्तर:-  प्रकाश चंद्र कंदपाल

Q9) कोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली?
उत्तर :-  सुमित देब

Q10) भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाने (NCPI) आवर्ती देयकांसाठी समर्पित असलेली कोणती सुविधा सादर केली?
उत्तर :- UPI ऑटो पे

▪️ कोणत्या व्यक्तीला ‘WWF इंडिया’ या संस्थेचा दूत म्हणून नेमण्यात आले आहे?
उत्तर : विश्वनाथन आनंद

▪️ कोणत्या संस्थेनी ‘पुसा डीकंटॅमिनेशन टनेल’ विकसित केले?
उत्तर : भारतीय कृषी संशोधन संस्था

▪️ कोणत्या नियंत्रण मंडळाने ‘OBICUS’ कार्यक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)

▪️ ‘चित्रा GeneLAMP-N’ काय आहे?
उत्तर : कोविड-19 नैदानिक उपकरण

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘सहयोग’ मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले?
उत्तर : विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

▪️ कोणत्या व्यक्तीने ‘बांग्ला दिनदर्शिका’ प्रस्तुत केली?
उत्तर : अकबर

▪️ कोणत्या देशाने भारताला जहाज-रोधी हार्पून क्षेपणास्त्र आणि टॉरपीडो विक्री करण्याला मंजुरी दिली?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

▪️ कोणत्या औद्योगिक संस्थेनी ‘एक्झिट फ्रॉम द लॉकडाउन’ अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : भारतीय उद्योग संघ (CII)

▪️ कोणत्या कंपनीने ‘नियरबाय स्पॉट’ अॅप सादर केले?
उत्तर : गूगल

▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी ‘स्टेट ऑफ वर्ल्ड्स नर्सिंग रिपोर्ट 2020’ अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : जागतिक आरोग्य संघटना

तुम्हास माहीत आहे का :- भारतातील बारा जोतिर्लिँगे



१)सोमनाथ (गुजरात - वेरावळ)


२)मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)


३)महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)


४)ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर)


५)वैजनाथ (महाराष्ट्र - परळी बीड)


६)भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर पूणे)


७)रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)


८)नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ हिंगोली)


९)काशी विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)


१०)त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर नाशिक)


११)केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ)


१२)घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद).

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...