२३ सप्टेंबर २०२०

जागतिक भूगोलातील विशेष ठिकाणे

     जगातील सर्वात मोठा महासागर - पॅसिफिक महासागर


·         महासागरातील सर्वात जास्त खोल गर्ता - मारीयाना गर्ता (पॅसिफिक महासागर) 


·         सर्वात मोठे आखात - मेक्सिकोचे आखात (अमेरिका)15,42,990 चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठा उपसागर - हडसन बे (कॅनडा) - 12,32,320चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठा व्दिपकल्प - अरेबिया 


·         सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (प.बंगाल) 


·         सर्वात मोठे भूखंड - युरेशिया (युरोप+आशिया)  


·         सर्वात लहान भूखंड - ऑस्ट्रेलिया - 76,87,120 चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठे बेट - ग्रीनलँड - 21 लाख 75 हजार चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठे व्दिपसमूह - इंडोनेशिया (13,000) बेटे


·         सर्वात उंच शिखर - माऊंट एव्हरेस्ट (8848 मी) 


·         सर्वात मोठी पर्वतरांग - हिमालय पर्वताची 


·         सर्वात मोठे व उंचीवरील पठार - तिबेटचे पठार. 


·         सर्वात मोठी नदी व खोरे - अॅमेझोन (द. अमेरिका)


·         सर्वात लांब नदी - नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी. 


·         सर्वात लांब हिमनदी - लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402कि.मी. 


·         सर्वात उंच धबधबा - एंजल धबधबा (व्हेनेझुयेला) 936.6मी. 


·         सर्वात मोठे खार्‍या पाण्याचे सरोवर - कॅस्पियन समुद्र (रशिया व इराण यांच्या दरम्यान) 3,93,900 चौ.कि.मी. 


·         सर्वात गोड्या खार्‍या पाण्याचे सरोवर - सुपिरीयर सरोवर (अमेरिका 82,110 चौ. किमी) 


·         सर्वाधिक उंचीवरील सरोवर - टिटीकाका (द.अमेरिका - पेरु व बोलव्हीया यांच्या दरम्यान) 


·         सर्वात मोठे वाळवंट - सहारा (आफ्रिका) 90,65,000चौ.कि.मी. 


·         सर्वात कमी तापमानाचे ठिकाण - वोस्टोक (अंटार्क्टिका) उणे 89.6 सें. 


·         सर्वात उष्ण ठिकाण - डेथ व्हॅली (अमेरिका) 


·         सर्वात मोठा देश (आकारमान) - रशिया 1,70,75,400चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठा ज्वालामुखी (कुंड) - टोबा (सुमात्रा बेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी. 


·         सर्वात छोटा देश (आकारमान) - व्हेटिकन सिटी (44हेक्टर) 


·         सर्वाधिक शेजारी असणारा देश - चीन 13 शेजारी 


·         सर्वाधिक लोकसंख्येचा देश - चीन 126 कोटी (2011) 


·         सर्वात कमी लोकसंख्येचा देश - व्हेटकिन सिटी - 900 फक्त (2011) 


·         सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश - मकाव (चीनच्या दक्षिण किनार्‍यावरील पोर्तुगीज वसाहत) दर चौ.कि.मी. ला24,411 व्यक्ती. 


·         सर्वात विरळ वस्तीचा प्रदेश - अंटार्क्टिका. लोकसंख्येची घनता अंदाजे (दर 3000 चौ.कि.मी. ला एक व्यक्ती) 


·         सर्वाधिक वस्तीचे शहर - टोकियो (जपान) - 2 कोटी 70लाख (2000) 


·         सर्वाधिक उंचीवरील राजधानी - ला पाझ (बोलेव्हीया) समुद्रसपाटीपासून उंची 3600 मी. 


·         सर्वात मोठे बंदर (विस्ताराने) - न्यूयॉर्क 


·         सर्वात गजबजलेले बंदर - रोटरडॅम (हॉलंड) 


·         सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे - अमेरिका एकूण लांबी2,95,000 कि.मी. 


·         सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 62 लाख कि.मी. 


·         सर्वात लांब मानवनिर्मित कालवा - सुवेझ कालवा (इजिप्त)162 कि.मी. 


·         सर्वात लांब बोगदा - न्यूयॉर्क डेलावेअर जलवाहिनी 170कि.मी.


·         सर्वात लांब बोगदा (रेल्वे) - सेइकन रेल टनेल जपान. समुद्राखालून जाणारा 2 बेटे 53.85 कि.मी. 


·         सर्वात लांब बोगदा (रस्ता) - सेंट गॉटहर्ड, स्वित्झर्लंड (16किमी.) 


·         सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्टेशन - बोलीव्हीयामधील कंडोर स्टेशन (4800 मी) 


·         सर्वात मोठे रेल्वे स्टेशन - ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्यूयॉर्क) 


·         सर्वाधिक उंचीवरील विमानतळ - ल्हासा विमानतळ, तिबेट उंची 4363 मी. 


·         सर्वात मोठे विमानतळ - राजा खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, रियाध (अरबस्तान) विस्तार 222 चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठे स्टेडीयम - झेकोस्लावियातील प्राग येथील स्ट्राव्ह स्टेडीयम सुमारे


·         सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ - नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी 


·         सर्वात मोठा पुतळा - हैदराबाद येथील हुसेनसागर तलावातील भगवान बुद्धाचा पुतळा, वजन सुमारे 350 टन,इंची 17.2 मीटर 


·         सर्वात मोठा नियोक्ता - भारतीय रेल्वे - सुमारे 16.5 लाख कर्मचारी 


·         सर्वात मोठी बँक - वर्ल्ड बँक, वॉशिंग्टन  


·         सर्वाधिक शाखा असणारी बँक - भारतीय स्टेट बँक 


·         सर्वात मोठे संग्रहालय - अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, न्यूयॉर्क 


·         सर्वात मोठे ग्रंथालय - लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन


·         सर्वात जुनी भाषा - चीन 6000 - 7000 वर्ष जुनी.

भारतीय निवडणूक आयोग


🅾️ही एक संवैधानिक संस्था असून कलम 324 नुसार याची स्थापना25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणुक आयोगातर्फे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ यांच्या निवडणूका पार पाडल्या जातात. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांनी कामकाज पाहिले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात व ते 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे होईपर्यंत ते पदावर राहतात.


🧩राज्यसभा..


🅾️ ससदेचे उच्च सभागृह.


🅾️ भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात


🅾️ एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त.


🅾️ सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)


🅾️ महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा


🅾️ मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा


🧩लोकसभा..

🅾️ एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)


🅾️ पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952


🅾️16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014


🅾️लोकसभा निवडणूक 2014..


🅾️16 वी लोकसभा निवडणूक.


🅾️ 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान.


🅾️16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना


🅾️एकूण मतदारसंघ: 543


🅾️ एकूण मतदान केंद्र: 927553


🅾️ सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3


🅾️ एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)


🧩 पक्षीय बलाबल

🅾️भारतीय जनता पक्ष: 282

🅾️ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44

🅾️ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06

🅾️ कम्युनिस्ट पक्ष: 01

🅾️ कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09

🅾️राज्यस्तीय पक्ष: 182

🅾️नोंदणीकृत पक्ष: 16

🅾️अपक्ष: 03


🧩 वशिष्ट्ये...


🅾️ EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला. 


🅾️नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला.


🅾️ 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला. 


🅾️ 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. 


🅾️ एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये


🅾️ महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014


🅾️ 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे. 


🅾️6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले. 


🅾️ 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.


🅾️एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला.


राज्य मानवी हक्क आयोगाची रचना.



🅾️राज्य सरकार, राज्य आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करील.


🅾️ राज्य मानवी हक्क आयोगामध्ये-


🅾️ अध्यक्ष - उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश


🅾️ एक सदस्य - उच्च न्यायालयाचा विद्यमान किंवा माजी न्यायाधीश किंवा किमान 7 वर्षे अनुभव असलेला जिल्हा न्यायाधीश


🅾️ एक-दोन सदस्य - मानवी हक्कांसंबंधी ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्ति


🅾️ सचिव हा आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल.


🅾️ राज्य आयोगाचे मुख्यालय राज्यशासन विनिर्दिष्ट करेल अशा ठिकाणी असेल.


🅾️राज्य आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांच्या नेमणुका:


🅾️अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल पुढील समितीच्या शिफारशिनुसार करतील.


🧩समितीची रचना -


🅾️मख्यमंत्री - सभाध्यक्ष


🅾️विधान मंडळाचा अध्यक्ष - सदस्य


🅾️तया राज्याच्या गृहविकासाचा प्रभारी मंत्री - 

विधानसभेतील विरोधी पक्षनेता - सदस्य


🅾️जया राज्यात विधानपरिषद असेल त्या ठिकाणी त्याचा सभापती व विरोधी पक्षनेता - सदस्य


 🅾️राज्य आयोगाच्या सभाध्यक्षांची किंवा सदस्यांची नोंदणी आणि त्यांना पदावरून दूर करणे:


🅾️राज्य आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य राज्यपालांना उद्देशून त्याच्या पदाचा राजीनामा देवू शकेल.


🅾️तसेच अध्यक्ष किंवा सदस्यास पुढील कारणावरून पदावरून दूर करता येईल .


🅾️अभिनिर्णीत नादार असेल; किंवा -


🅾️तयाने लाभाचे पद धारण केले आहे ; किंवा


🅾️ मानसिक किंवा शारीरिक अस्वास्थ्य  ; किंवा


🅾️राष्ट्रपतींच्या मते नैतिक अध : पतनाचा अंतर्भाव आहे अशा अपराधासाठी दोषी ठरविलेली व्यक्ती.


🧩राज्य आयोगाच्या अध्यक्षाचा आणि सदस्याचा पदावधी:


🅾️अध्यक्षांचा कार्यकाल - 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत.


🅾️ पनर्नियुक्ति होवू शकते.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे ‘SPICe+’ डिजिटल व्यासपीठ कार्यरत


🔰कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ‘SPICe+’ (स्पाइस प्लस) नामक डिजिटल व्यासपीठ कार्यरत केले आहे.


🔰कद्र सरकारची तीन मंत्रालये (कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, कामगार मंत्रालय आणि अर्थमंत्रालयातला महसूल विभाग), तसेच एक राज्य सरकार (महाराष्ट्र) आणि विविध बँका यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या 10 सेवा या व्यासपीठामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, त्यामुळे भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रक्रिया, लागणारा वेळ आणि खर्च यात घट झाली आहे.


🔴या 10 सेवा खालीलप्रमाणे आहेत –


🔰नाव आरक्षण

🔰निगमन

🔰DIN वाटप

🔰PANचे अनिवार्य वाटप

🔰TANचे अनिवार्य वाटप

🔰EPFO नोंदणीचे अनिवार्य वाटप

🔰ESIC नोंदणीचे अनिवार्य वाटप

🔰वयवसाय कर नोंदणीचे अनिवार्य वाटप (महाराष्ट्र)

🔰कपनीसाठी बँक खाता अनिवार्यपणे उघडणे

🔰GSTIN याचे वाटप (जर अर्ज केला असेल तर)


🔴इतर ठळक बाबी...


🔰नवीन संकेतस्थळ आधारित अर्ज प्रक्रियेमुळे कंपन्यांच्या अखंडित अंतर्भूततेसाठी ऑन-स्क्रीन फाइलिंग आणि रीअल टाइम डेटा प्रमाणीकरण सुलभ होते.


🔰परक्रियेची संख्या आधीच्या 10 च्या तुलनेत 3 करण्यात आली आहे आणि देशात व्यवसाय सुरु करण्याचा कालावधी 18 दिवसांऐवजी 4 दिवस करण्यात आला आहे.

तीन कामगार संहिता चर्चेसाठी लोकसभेत सादर केल्या.

🔰कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोष गंगवार यांनी लोकसभेत तीन कामगार संहिता सादर केल्या आहेत. ही विधेयके पुढीलप्रमाणे आहेत -


🔰औद्योगिक संबंध संहिता, 2020

व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थळी परिस्थिति विधेयक, 2020

सामाजिक सुरक्षा संहिता, 2020

ही तीन विधेयके कामगार कायद्यांच्या सुलभतेसाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्ग सुलभ करणार आणि संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रातल्या देशातल्या 50 कोटी कामगारांसाठी अनेक कामगार कल्याणकारी उपाययोजना तयार करणार.


🔴ठळक बाबी....


🔰सघटित किंवा असंघटित क्षेत्रातल्या सर्व कामगारांना किमान वेतन आणि वेळेवर वेतन देण्याचा वैधानिक हक्क तयार केला गेला आहे. देशातल्या सर्व कामगारांना किमान मजुरीच्या हक्कांची यात तरतूद आहे.सध्या खाणकाम क्षेत्र, वृक्षारोपण, गोदी कामगार, इमारत व बांधकाम कामगार, सफाई व स्वच्छता, उत्पादन क्षेत्रावरील रोजगारासाठी किमान वेतन निश्चित केले आहे.


🔰सपूर्ण सेवा क्षेत्रामध्ये (माहिती तंत्रज्ञान, आतिथ्य, वाहतूक इ.), देशातले कामगार, असंघटित कामगार, शिक्षक यांनाही हा कायदा लागू होणार.किमान वेतन दर निश्चित करण्याची पद्धत सोपी करण्यात आली आहे. सध्याची रोजगारनिहाय वेतनश्रेणी ऐवजी कौशल्ये आणि भौगोलिक स्थान या बाबी विचारात घेतल्या जाणार.


🔰सपूर्ण देशात किमान वेतन दराची संख्या सध्याच्या 10000 ऐवजी 200 असणार.मध्यवर्ती क्षेत्रात 542 च्या तुलनेत फक्त 12 किमान वेतन दर असणार.

दर 5 वर्षांनी किमान वेतनात सुधारणा केली जाणार.‘फ्लोर वेतन’ची वैधानिक संकल्पना मांडण्यात आली आहे.

जागतिक आनंद अहवाल World Happiness Report-2020


🔰UN Sustainable Solution Network द्वारे 2012 पासून जाहीर केला जातो


🔰2020 चा हा 8वा अहवाल आहे

एकूण 156 देशांची यादी जाहीर केली

या अहवालात भारताचा 144 या क्रमांक


🔰2019 मध्ये भारत 140 व्या क्रमांकावर होता


🔴2020 च्या अहवालानुसार प्रथम पाच आनंदी देश

1. फिनलंड


2. डेन्मार्क


3. स्विझरलँड 


4. आइलैंड


5.नार्वे


🔴शवटचे पाच देश


156. अफगाणिस्तान 


155. दक्षिण सुदान


154. झीबॉम्बे


153. रवांडा


152. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक

4 पीबीए या औषधाने कोविड 19 रुग्णांच्या मृत्यूची शक्यता कमी होते.

🔰करोना संसर्गावर उपयोगी ठरू शकेल असे एक नवीन औषध शोधल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला  आहे.


🔰लॉस एंजल्समधील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, 4 फेनिलब्युटिरिक अ‍ॅसिड (4 पीबीए) हे औषध प्राण्यांमध्ये कोविडवर गुणकारी ठरले आहे.


🔰ह संशोधन ‘सायटोकिन व ग्रोथ फॅक्टर्स रिव्ह्य़ू’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून कोविड रुग्णात सायटोकिन रेणू जास्त सुटत असतात.


🔰4 पीबीए या औषधाने कोविड 19 रुग्णांच्या मृत्यूची शक्यता कमी होते.

कोविड रुग्णांमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम रेसिडेंट प्रोटिन हे पेशींवरचा ताण दाखवणारे रसायन रक्तातील एक निदर्शक खूण म्हणून काम करते.

राज्यसभेत रणकंदन.

🔰नवी दिल्ली : कृषी विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांच्या गोंधळात, घोषणाबाजीत दोन्ही कृषीविषयक विधेयके राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली. या गोंधळावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.


🔰शतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार ही विधेयके रविवारी राज्यसभेत मंजूर झाली. ही विधेयके लोकसभेत आधीच मंजूर झाल्याने कायद्यात रूपांतर होण्यासाठी ती स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोिवद यांच्याकडे पाठवली जातील.


🔰लोकसभेत सत्ताधारी भाजपकडे बहुमत असल्याने ही विधेयके विनासायास मंजूर झाली. पण, राज्यसभेत भाजपकडे संख्याबळ नव्हते. त्यामुळे घाईघाईने आवाजी मतदानाने विधेयके मंजूर करून घेण्याचा कुटिल डाव आखला गेल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी केला.

भारतीयांच्या संशयास्पद बँक व्यवहारांवर अमेरिकेत अंकुश.



🔰नवी दिल्ली, मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराचे २०१३मधील ‘ऑफशोर लिक्स’ प्रकरण, २०१५मधील ‘स्वीस लिक्स’ प्रकरण, २०१६मधील ‘पनामा पेपर्स’ प्रकरण आणि २०१७मधील ‘पॅराडाईज पेपस’ प्रकरण यांपाठोपाठ आता ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने भारतीयांचा समावेश असलेले आणखी एक आंतरराष्ट्रीय संशयास्पद आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उजेडात आणले आहे. ‘फिनकेन फाईल्स’ असे त्याचे नाव आहे.


🔰ह ताजे प्रकरण उघडकीस आणताना त्यातील भारतीयांचा समावेश शोधण्यासाठी दोन हजारांहून अधिक गुप्त कागदपत्रांच्या साठय़ांची तपासणी दि इंडियन एक्स्प्रेसने केली. मनी लाँड्रिंग, दहशतवाद, अंमली पदार्थाचा व्यापार किंवा आर्थिक फसवणूक केल्याचा संशय असल्याने भारतीयांच्या या संशयास्पद बँक व्यवहारांना अमेरिकी अर्थखात्याचा ‘वॉचडॉग’ असलेल्या ‘आर्थिक गुन्हे सक्तवसुली संस्थेने’ (फिनकेन) अंकुश लावला आहे. ‘फिनकेन’ने  या कागदपत्रांना ‘सस्पीशियस अ‍ॅक्टिव्हिटी रिपोटर्स’ (सार्स) असे संबोधले आहे.


🔰अशा प्रकारच्या संशयास्पद कागदपत्रांची तपासणी ‘फिनकेन’द्वारे करण्यात येते. संबंधित बँकांच्या अनुपालन अधिकाऱ्यांमार्फत आर्थिक गुन्ह्यांचा ठपका असलेल्या व्यवहारांची किंवा त्यात सामील ग्राहकांची माहिती संकलित करण्यात येते. संबंधित बँकांनीच अशा व्यवहारांबद्दल शंका घेऊन या प्रकरणांची कायदेशीर चौकशी करण्याचे सुचवले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागानेही या प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे.

इस्लामिक देशांवरही मोदींची जादू; सहा देशांनी प्रदान केलाय सर्वोच्च नागरी सन्मान:



📚पतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१९ साली ऑगस्ट महिन्यामध्ये दोन दिवसात दोन देशांनी सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये २४ ऑगस्ट रोजी ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने मोदींना सन्मानित केले. ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तर २५ ऑगस्ट रोजी बहारिनने ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन मोदींचा गौरव केला. मात्र मोदींचा अशाप्रकारे एखाद्या मुस्लीम बहुल इस्लामिक राष्ट्रांकडून सन्मान होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 


📚मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून सहा इस्लामिक देशांनी त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले आहे. याच सहा खास सन्मानांबद्दल जाणून घेऊयात..


■**संयुक्त अरब** : अमिराती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २४ ऑगस्ट २०१९ रोजी संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वोच्च अशा ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी मोदींनी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. यूएईचे संस्थापक शेख झायेद बिन सुल्तान अल नाहयान यांच्या नावाने ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे शेख झायेद यांच्या जन्म शताब्दी वर्षात मोदींना हा पुरस्कार देण्यात आला.


■बाहरिन : भारत आणि बहारिन यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २५ ऑगस्ट २०१९ रोजी बहारिनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.


■पॅलेस्टाईन : 'द ग्रॅण्ड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन' हा पुरस्कार मोदींना १० फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदान करण्यात आला. परदेशी नागरिकांना पॅलेस्टाईनकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.


■सौदी अरेबिया : 'द किंग अब्दुल्लाझीज' हा पुरस्कार सौदी अरेबियातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. मोदींना ३ एप्रिल २०१६ साली एप्रिल महिन्यात हा पुरस्कार सौदी अरेबियाने प्रदान केला.

अफगाणिस्तान : 'द आमीर अमनुल्हा' हा पुरस्कार अफगाणिस्तानमधील सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान मोदींना ३ जून २०१६ रोजी प्रदान केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींनी प्रदान करण्यात आला होता.


■मालदीव : ८ जून २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ देऊन गौरवण्यात आले. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था विधेयक 2020 संसदेत मंजूर:



📚 शिक्षण व संशोधन संस्था विधेयक 2020  आज राज्यसभेत मंजूर झाले.  यापूर्वी 19 मार्च 2020 रोजी हे विधेयक  लोकसभेत मंजूर झाले होते.


📚राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर, गुजरातमधील जामनगर येथे अत्याधुनिक आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था (आयटीआरए)  स्थापन करण्याचा आणि त्याला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा (आयएनआय) प्रदान करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.


📚गजरात आयुर्वेद विद्यापीठ कॅम्पस जामनगर येथे सध्या अस्तित्त्वात असलेल्या आयुर्वेद संस्थाचे एकत्रीकरण एकत्रित करून आयटीआरएची स्थापना करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (अ) आयुर्वेद पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन संस्था, (ब) श्री गुलाब कुंवरबा आयुर्वेद महाविद्यालय, आणि (क) आयुर्वेदिक औषधनिर्माण संस्था, (ड) महर्षि पतंजली योग निसर्गोपचार शिक्षण व संशोधन संस्था (प्रस्तावित आयटीआरएच्या स्वास्तृत्व विभागाचा भाग बनण्यासाठी) या नामांकित संस्थाचा एक समूह असेल. 


📚या संस्था मागील अनेक दशकांपासून अस्तित्वात असून या आयुर्वेद संस्थांचा विशेष समूह आहे.

या प्रस्तावाच्या अंमलबजावणीमुळे संस्थेला आयुर्वेद आणि औषध निर्माण विज्ञान विषयात पदवी आणि पदव्युत्तर  शिक्षणाची पद्धत विकसित करण्यासाठी स्वायत्तता मिळेल अशी अपेक्षा आहे. वेगवेगळ्या संस्थांमधील समन्वयामुळे आयटीआरएला अशा आयुर्वेद शिक्षणात उच्च मानकांचे प्रतिपादन करण्यास आणि संपूर्ण आयुष क्षेत्रामध्ये प्रकाशस्तंभ संस्था म्हणून नावारूपास येण्यात मदत होईल.


📚औषध विज्ञानासह आयुर्वेदातील सर्व महत्वाच्या शाखांमध्ये कर्मचार्‍यांचे उच्च स्तरीय प्रशिक्षण आणि आयुर्वेद क्षेत्रात सखोल अभ्यास व संशोधन करणे अपेक्षित आहे.


📚आयटीआरए ही आयुष क्षेत्रातील आयएनआय दर्जाची पहिली संस्था असेल, आणि यामुळे या अभ्यासक्रमाची सामग्री आणि अध्यापनशस्त्रा बाबतीत स्वतंत्र व नाविन्यपूर्ण निर्णय घेण्यात हि संस्था सक्षम होईल. पारंपारिक ज्ञान-आधारित आरोग्य समाधानासाठी संपूर्ण जगाची रुची वृद्धिंगत होत असताना आणि आयटीआरए आयुर्वेद शिक्षणाला नवीन स्तरावर नेण्याची तयारी दर्शवित असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे.

उमेदवारांना सूचना


●▬▬▬▬⚜️۩۞۩⚜️▬▬▬▬●


🎯विषय :- परीक्षेच्या वेळी शारीरिक/परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही/उपाययोजना

●▬▬▬▬⚜️۩۞۩⚜️▬▬▬▬●

▪️कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र

लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांकरीता आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure-SOP) नुसार उमेदवारांना खालीलप्रमाणे सुचित करण्यात येत आहे :-

●▬▬▬▬⚜️۩۞۩⚜️▬▬▬▬●


(१) परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना उमेदवाराने किमान तीन पदरी कापडाचा मुखपट (Mask) परिधान करणे

अनिवार्य आहे.


(२) परीक्षा कक्षामध्ये मुखपट, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी (Pouch) असलेलने प्रत्येकी एक किट

उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचा वापर उमेदवारांनी दोन्ही सत्राकरीता (असल्यास) करणे अनिवार्य

आहे.


(३) परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छता (Cle anliness) तसेच आरोग्यास हितावह (Hygienic)

वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईझ सिम्पलीसिटी करणे आवश्यक आहे.


(४) कोव्हिड-१९ सदृश्य लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबधित परीक्षा उपकेंद्रावरील

पर्यवेक्षकीय अधिकारी/कर्मचारी यांना आगाऊ कळवावे.


(५) उमेदवारांनी -आरोग्य सेतु" अॅप डाऊनलोड करणे त्यांच्या हिताचे आहे.


(६) उमेदवाराने स्वत:चा जेवणाचा डबा/अल्पोपहार व पाण्याची बाटली सोबत आणावी.


(७) दोन पेपरच्या मधल्या वेळामध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास मनाई आहे.


(८) परीक्षा कक्षात एकमेकांचे पेन, लिखाण साहित्य इत्यादी वापरण्यास उमेदवारांना सक्त मनाई आहे.


(९) शारीरिक/परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील उचित माहिती फलक. सांकेतिक सिम्प्लिफाईड चिन्हे.भित्तिपत्रिका इत्यादी वरील सूचनांचे सर्व उमेदवारांनी कटाक्षाने पालन करावे.


(१०) प्रतिबंधित क्षेत्रामधील परीक्षा उपकेंद्रावरील उमेदवारांची बैठक व्यवस्था ऐनवेळी इतर परीक्षा उपकेंद्रावर करण्यात

आल्यास यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल. तसेच संबधित उमेदवाराला

त्याच्या आयोगाकडील नोंदणी क्रमांकावर एसएमएस (Msg) द्वारे कळविण्याची व्यवस्था करण्यात येईल.


(११) परोक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारिरीक /परस्पर अंतर राखणे उमेदवारांना अनिवार्य आहे.


(१२) वापरलेले टिश्यु पेपर, मुखपट, हातमोजे, सॅनिटाईझ पाऊच, इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित

कुंडीमध्ये (कचराकुंडी)  टाकावेत.


(१३) कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना/आदेश यांचे काटेकोरपणे पालन करावे.


▪️शारीरिक/परस्पर अंतराच्या अनुषंगाने वरीलप्रमाणे व प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करावे.

ECOSOC या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली.



ECOSOC ची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली.


युक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली. भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती.


“प्रतिष्ठीत ECOSOC चं सदस्यत्व भारतानं मिळवलं  आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.


आमच्या सर्व प्रयत्नांमधील समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं महत्त्वपूर्ण समर्थन देतो.


भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती. यामध्ये भारत आणि अफगाणिस्ताननं 54 सदस्यांच्या मताद्वारे विजय मिळवला.


या विजयानंतर भारत पुढील चार वर्षांसाठी या आयोगाचा सदस्य असेल. 2021 ते 2025 या कालावधीसाठी भारत संयुक्त राष्ट्राच्या कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनचा सदस्य असणार आहे.

स्थलांतरित मजुरांच्या बळींबाबत केंद्र अनभिज्ञ.


करोनामुळे देशभर अचानक लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी केंद्र सरकारकडे नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, अशी कबुली केंद्रीय कामगार मंत्रालयाने लेखी उत्तरात दिली.


संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास नसल्याने मंत्र्यांकडून तोंडी उत्तरे दिली जाणार नाहीत. मात्र, सदस्यांच्या लेखी प्रश्नांना लेखी उत्तर दिले जाईल, अशी तडजोड सत्ताधारी पक्षाने मान्य केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी करोनाकाळातील स्थलांतरित मजुरांच्या दुरवस्थेसंदर्भात केंद्र सरकारच्या वतीने लेखी उत्तर देण्यात आले. टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित मजुरांच्या मृत्यूबाबत केंद्र सरकारने कोणतीही माहिती जमा केलेली नाही. त्यामुळे याबाबत कोणतीही आकडेवारी उपलब्ध नसल्याचे उत्तर सरकारने दिले.


करोनाकाळात किती रोजगार नष्ट झाले, याचीही माहिती उपलब्ध नसल्याचे लेखी उत्तर सरकारने दिले. मात्र, ‘सेंटर फॉर मॉनिटिरग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेच्या अंदाजानुसार १.८९ कोटी संघटित रोजगार नष्ट झाले आहेत. जागतिक बँकेच्या अहवालानुसार ४ कोटी स्थलांतरित मजुरांच्या दैनंदिन जगण्यावर विपरीत परिणाम झाला आहे. सर्वाधिक फटका छोटे व्यापारी, फेरीवाले व मजुरांना बसल्याचेही या अहवालातून समोर आले आहे.

फोर्ब्सनं जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली.



🗝 फोर्ब्सनं जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली आहे.


🗝 या यादीत सात भारतीय अमेरिकन नागरिकांना स्थान देण्यात आलं आहे.

या यादीत सायबर सिक्युरिटी फर्म झेडस्केलरचे जय चौधरी हे 61 व्या स्थानावर आहेत.


🗝 तर सिम्फनी टेक्नॉलॉजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रमेश वाधवानी हे 3.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 238 व्या स्थानावर आहेत.


🗝 ऑनलाइन विक्री करणारी कंपनी वेयफेअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज शाह यांना फोर्ब्सच्या यादीत 299 वं स्थान देण्यात आलं आहे.


🗝 तयांच्याकडे 2.8 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तर सिलिकॉन व्हॅली व्हेंचर कॅपिटल फर्म खोसला व्हेंचर्सचे संस्थापक विनोद खोसला हे 2.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 353 व्या स्थानावर आहेत.


🗝 शरपालो व्हेंचर्सचे मॅनिजिंग पार्टनर कवितर्क राम श्रीराम यांना या यादीत 359 वं स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे 2.3 अब्ज डॉलर्सची संपत्ती  आहे.तर राकेश गंगवा यांना या यादीत 359 वं स्थान देण्यात आलं असून त्यांच्याकडे 2.3 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

चीनची दादागिरी मोडण्यासाठी भारत-जपान एकत्र, दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा करार.



🌑इडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनचे विस्तारवादी धोरण लक्षात घेऊन भारत आणि जपानने एकत्र येऊन एक महत्त्वाचा लष्करी सहकार्य करार केला आहे. संरक्षण सचिव अजय कुमार आणि जपाचने राजदूत सुझूकी सातोशी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.


🌑या करारामुळे संरक्षण सहकार्य दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांच्या सैन्य दलांना परस्परांचे सैन्य तळ वापरता येणार आहेत. भारताने अमेरिका, फ्रान्स, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या देशांबरोबर सुद्धा अशाच प्रकारचा करार केला आहे. २०१६ साली अमेरिकेबरोबर केलेल्या करारातंर्गत भारताला डिजीबाऊटी, गारसिया, गुआम या तळांवर सैन्य दलाशी संबंधित साधनांमध्ये इंधन भरता येऊ शकते.


🌑ऑगस्ट २०१७ साली डिजीबाऊटी येथे चीनचा परदेशातील पहिला सैन्य तळ कार्यरत झाला. त्यानंतर चिनी नौदलाच्या हिंदी महासागरातील हालचाली वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपलाही पल्ला वाढवण्याच्या दृष्टीने भारतीय नौदलाला या कराराचा फायदा होईल. ग्वादर, कराची या पाकिस्तानी बंदरांमध्ये चिनी युद्धनौका, पाणबुडयांचा विनाआडकाठी मुक्तपणे वावर सुरु असतो.

डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबल पुरस्कारासाठी नामांकन



🍂अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळालं आहे.


🍂२०२१ च्या पुरस्कारांसाठी हे नामांकन मिळालं आहे. इस्त्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील शांतता करारासाठी मध्यस्थी करुन दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.


🍂यासाठीच हे नामांकन देण्यात आलं आहे. नर्वोच्या संसदेतील सदस्य ख्रिश्चन टायब्रिंग-गजेडे यांनी ट्रम्प यांना नामांकित केलं आहे.


🍂खरिश्चन हे नॉर्वेच्या संसदेमध्ये चौथ्यांदा निवडूण आलेले खासदार आहेत. त्याचप्रमाणे ते 'नाटो'साठी काम करणाऱ्या नॉर्वेच्या संसदीय समितीचे अध्यक्षही आहेत.


🍂यएई आणि इस्रायलमधील संबंध सुधारण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं ख्रिश्चन यांनी नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाचे समर्थन करताना सांगितले.


🍂"माझ्या मते इतर कोणत्याही शांतता नोबेल पुरस्कार विजेत्यांपेक्षा ट्रम्प यांनी देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी

जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2020’



ऑक्सफोर्ड पॉवर्टी आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) या संस्थांनी प्रसिद्ध केलेला जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हे 107 विकसनशील देशांना व्यापणारी बहुआयामी दारिद्र्याचे आंतरराष्ट्रीय परिमाण आहे.


‘जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2020’ (MPI) अहवालातल्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत -


107 विकसनशील देशांमध्ये, 1.3 अब्ज लोक म्हणजेच 22 टक्के लोक बहुआयामी दारिद्रयात जगत आहेत.बहुआयामी दरिद्री लोकांपैकी निम्मे (644 दशलक्ष) 18 वर्षाखालील बालके आहेत.सहापैकी एक प्रौढ यांच्या तुलनेत तीनपैकी एक बालक दरिद्री आहे.


बहुआयामी दरिद्री लोकांपैकीजवळजवळ 84.3 टक्के लोक उप-सहारा आफ्रिका (558 दशलक्ष) आणि दक्षिण आशिया (530 दशलक्ष) प्रदेशात आहेत.67 टक्के बहुआयामी दरिद्री लोक मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आहेत.


भारताने(2005/2006–2015/2016 या काळात) राष्ट्रीय पातळीवर तसेच बालकांपैकी बहुआयामी दरिद्री लोकांची संख्या (273 दशलक्ष) केली असून ती सर्वात मोठी घट आहे. तसेच MPI गुण देखील निम्मे केले.‘2019/2020 जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक’मध्ये भारताचा 62 वा (गुण: 0.123) क्रमांक आहे.


🏵इतर ठळक बाबी.


संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकासासंबंधी उच्च-स्तरीय राजकीय व्यासपीठावर दरवर्षी जुलै महिन्यात हा निर्देशांक जाहीर केला जातो. मात्र कोविड-19 महामारीमुळे बऱ्याच राष्ट्रांची संपर्ण माहिती प्राप्त झालेली नसल्यामुळे 2019 साली प्रसिद्ध केलेल्या माहितीचा आधार घेऊन यावर्षीचा अहवाल तयार करण्यात आला.


‘जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2020’ (MPI) यावर देखरेख ठेवून त्यात सुधारणा करण्याची जबाबदारी नोडल संस्था म्हणून नीती आयोग (भारत) या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे.

मनमोहन सिंग यांना भारतरत्न द्या; वरिष्ठ पत्रकाराची मागणी.


 

✳️माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी वरिष्ठ महिला पत्रकार सागरिका घोष यांनी केली आहे.


✳️दशातील सुमारे २७ कोटी जनतेला दारिद्र्य रेषेतून बाहेर काढल्याने मनमोहन सिंग या पुरस्काराचे मानकरी असल्याचं घोष यांनी म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेल्या आपल्या ब्लॉगमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे हा मुद्दा उपस्थित केला आहे.


✳️घोष यांनी म्हटलं की, भारताचे १३वे राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं नुकतचं निधन झालं तेव्हा मनमोहन सिंग आपल्या माजी सहकार्याची प्रशंसा करताना थांबत नव्हते. त्यांनी मुखर्जी यांना स्वतंत्र भारतातील महान नेत्यांपैकी एक म्हटलं आहे. घोष पुढे म्हणाल्या, प्रणव मुखर्जींनी दीर्घकाळ सरकारमध्ये असणं ही एक असाधारण गोष्ट आहे. मात्र, एक प्रश्न असाही आहे की, मनमोहन सिंग हे आपल्या सहकाऱ्याच्या तुलनेत भारतरत्नसाठी अधिक योग्य आहेत?


✳️मनमोहन सिंग सन १९९१ मध्ये जेव्हा अर्थमंत्री बनले, तेव्हा त्यांनी अनेक बदल घडवून आणले. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या पाठिंब्याने त्यांनी दशकांपासून सुरु असलेल्या मजबूत नियंत्रित अर्थव्यवस्थेला मुक्त केले. २००६ ते २०१६ दरम्यान २७१ मिलियन म्हणजेच २७.१ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेखालून वर काढले. या काळात मोठ्या कालावधीसाठी मनमोहन सिंग हेच देशाचे पंतप्रधान राहिले. भारतातील करोडो लोकांना दारिद्र्य रेषेखालून वर काढल्याची आकडेवारी संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केली आहे. आत्ताच्या गरिबांसाठीच्या अनेक योजना जशा वित्तीय समावेशन, मनरेगा आणि आधार कार्ड त्यांच्याच कार्यकाळातील देणं आहे, असं घोष यांनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन: 7 सप्टेंबर



संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात सदस्य राष्ट्रांमध्ये 7 सप्टेंबर 2020 रोजी "क्लीन एअर फॉर ऑल" या संकल्पनेखाली पहिला ‘निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन’ साजरा करण्यात आला. 19 डिसेंबर 2019 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनी हा दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला होता.


दिनाचे उद्दीष्टः


🔸आरोग्य, उत्पादकता, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण याच्या दृष्टीने स्वच्छ हवेचे महत्त्व पटवून देणे.


🔸हवेच्या गुणवत्तेचा इतर पर्यावरणीय / विकासात्मक आव्हानांशी असलेला जवळचा संबंध दर्शविणे.


🔸कार्यक्षम ज्ञान, सर्वोत्कृष्ट सरावपद्धती, नवकल्पना आणि यशोगाथा सामायिक करून हवेची गुणवत्ता सुधारण्याविषयीच्या उपाययोजना जाहीर करणे आणि उपलब्ध करून देणे.


भारतातला कार्यक्रम


भारतात केंद्रीय पर्यावरण मंत्री, प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली 7 सप्टेंबर  2020 रोजी या दिनानिमित्त एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचे नगरविकास व पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सहभागी झाले.

हक्कभंग म्हणजे नेमकं काय ?


💫 अभिनेत्री कंगना पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.


⚡️ यावेळी नेमकं हक्कभंग म्हणजे काय? हक्कभंग दाखल झाल्यास पुढे काय होतं?


💁‍♂️ हक्कभंग कधी होतो?:


▪️ खासदार आणि आमदार अशा लोक प्रतिनिधींना घटनेने काही विशेषाधिकार प्रदान केलेले आहेत. विधानसभेने नेमलेल्या समितीलाही असे विशेष अधिकार असतात. 


▪️ या अधिकारांच्या आड येणारे वक्तव्य किंवा वर्तन कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाला करता येत नाही.


▪️ आमदार विधानसभेत जे विचार मांडतात. त्यावर इतरांना विधानसभेच्या बाहेर टीका-टिप्पणी करता येत नाही, अन्यथा तो हक्कभंग ठरु शकतो.


💁‍♂️ हक्कभंग असा निदर्शनास आणतात :


▪️ सभागृह समितीचा अहवाल

▪️ विधिमंडळ सभासदाकडून तक्रार

▪️ विधानसभा सचिवांचा अहवाल

▪️ याचिका


💁‍♂️ शिक्षा :

1)आरोपी स्वतः आमदार असेल तर सभागृहातून त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते.


2)  दुसरा कोणी तिर्‍हाईत असेल तर समज देऊन सोडून देण्यापासून तुरुंगवास ठोठावण्यापर्यंत कोणतीही शिक्षा होऊ शकते.


📌 दरम्यान, कंगना रनौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला.

Online Test Series

२० सप्टेंबर २०२०

Online Test Series

जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती


🔴  खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश


✔️कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन


✔️ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया.


✔️अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना.


✔️ क्रोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.


✔️जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.


✔️टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.


✔️टंगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया.


✔️तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.


✔️तेल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.


✔️निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.


✔️बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.


✔️सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.


✔️युरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.


✔️पारा:- इटली, स्पेन, अमेरिका.


✔️मंगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.


✔️ लोहखनिज(साठे):- अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.


✔️लोहखनिज (उत्पादन):- रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.


✔️ शिसे:- ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.

बीबी का मकबरा

◾️हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा, आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. 


◾️औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी (दिलरास बानो बेगम) हिची कबर आहे.


◾️ बीबी का मकबरा यास सन्मानाने मराठवाड्याचा ताजमहाल म्हणतात.


◾️आजम शाहने 1679  मध्ये बांधला. हा लाल आणि काळ्या दगडांबरोबर, संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनविलेला आहे. या मिश्रणास स्टको प्लॅस्टर (Stucco Plaster) असे म्हणतात.


◾️मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. त्या कबरीवर छतांच्या खिडक्यांतून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्र प्रकाश पडेल, अशी रचना केली आहे मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड वापरला आहे.


◾️राबिया दुर्रानीची कबर 28 नोव्हेंबर 1951 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली


(बांधकामाच्या तारखेबद्दल संभ्रम आहे)

५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला.

◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे. 


◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे १०वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे. 


◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.


◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. 


◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.


◾️ तया सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे. 


‼️ पण २/३ पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.

मध्यवर्ती मैदाने-मध्यवर्ती मैदान

मध्यवर्ती मैदान उत्तरेकडील हिमालय पर्वत आणि दक्षिणेकडील द्विपकल्पीय पठार यामध्ये आहे.


हे मैदान पश्चिमेकडे रुंद आणि पूर्वेकडे अरुंद आहे.


त्याची पूर्व -पश्चिम लांबी 1050 km आहे.


हे मैदान भारतीय संस्कृतीचे माहेरघर आहे. या प्रदेशात हरिद्वार ,प्रयाग ,मथुरा ,काशी आणि गया ही प्राचीन पवित्र शहरे आहेत.


गंगा मैदान- भारतीय मदानी प्रदेशातील हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. याची पश्चिम पूर्व लांबी १४०० कि.मी. असून याची सरासरी रुंदी ३०० कि.मी. इतकी आहे. गंगा मदानाचे उपविभाजन खालीलप्रकारे केले जाते. ऊध्र्व गंगा मदान, ब) मध्य गंगा मदान, क) निम्न गंगा मदान.

कद्राच्या कार्यप्रणालीची अंमलबजावणी राज्यांना बंधनकारक

🚥 करोना संशयित अथवा लागण झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासह ‘कोविड-१९’साठी केंद्र सरकारने विविध कार्यप्रणाली निश्चित केल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी करणे राज्यांवर बंधनकारक असल्याचे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.


🚥 करोना संशयित अथवा  लागण झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका अवाजवी दर आकारत असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका ‘अर्थ’ या संघटनेने केली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान, रुग्णवाहिकांचे दर राज्यांनी निश्चित करावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.


🚥 सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर स्पष्ट केले की, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने याबाबत प्रमाणित कार्यप्रणाली जाहीर केली असून राज्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे.

दिल्ली विधानसभा समितीकडून फेसबुकच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला समन्स.

☑️दिल्ली विधानसभेच्या एका समितीनं द्वेषमूलक मजकूरप्रकरणी फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांना समन्स बजावले असून १५ सप्टेंबरला समितीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडिया मंच या संघटनेकडून देशात द्वेषमूलक मजकूराचे प्रसारण रोखण्यात फेसबुककडून आवश्यक पावलं न उचलल्याबद्दलच्या तक्रारींवरुन समितीनं हा निर्णय घेतला आहे.


☑️समितीनं शनिवारी निवेदनाद्वारे म्हटलं की, “हे समन्स प्रमुख साक्षीदारांनी दिलेला जबाब आणि त्यांनी नोंदवलेली आक्षेपार्ह माहिती सादर केल्यानंतर बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” दिल्ली विधानसभेच्या शांतात आणि सौहार्द समितीद्वारे हे समन्स वॉलस्ट्रीट जर्नलच्या त्या बातमीनंतर बजावण्यात आले आहे. ज्यामध्ये हा दावा करण्यात आला आहे की, फेसबुकच्या भारतातील अधिकाऱ्याने तेलंगणातील भाजपाच्या एका नेत्यावर बंदी घालण्यापासून रोखले होते. या भाजापा नेत्यानं कथित स्वरुपात जातीयवादी आणि चिथावणी देणारी पोस्ट शेअर केली होती.


☑️दिल्ली विधानसभेच्या उपसचिवांनी १० सप्टेंबर रोजी पाठवलेल्या नोटीशीत म्हटलं आहे की, “आम्ही तुम्हाला (अजित मोहन) विधानसभा परिसरात समितीसमोर १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता हजर राहण्याचा आदेश देत आहोत. यावेळी मोहन यांचा शपथपत्रावर जबाब नोंदवण्यात येणार आहे, तसेच समितीद्वारे करण्यात येत असलेल्या चौकशीत त्यांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

ग्रँडस्लॅम क्षितिजावर आज नव्या ताऱ्याचा उदय.

🌞तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचूनही ग्रँडस्लॅम उंचावण्याचे स्वप्न अधुरे राहिलेला डॉमिनिक थिम आणि पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा अलेक्झांडर झ्वेरेव्ह या नव्या ताऱ्यांना आता ग्रँडस्लॅम उंचावण्याची संधी रविवारी मिळणार आहे.


🌞करोनामुळे अमेरिकेत प्रवास करण्यास नकार देणारा राफेल नदाल आणि दुखापतीमुळे वर्षभर टेनिसपासून दूर राहणारा रॉजर फेडरर यांच्या अनुपस्थितीत नोव्हाक जोकोव्हिच अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजला जात होता. पण जोकोव्हिचची अनपेक्षित हकालपट्टी झाल्यामुळे सहा वर्षांनंतर अमेरिकन स्पर्धेला नवा विजेता मिळणार आहे.


🌞जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रियाच्या थिमने चौथ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असली तरी त्याच्यासमोर यंदा फेडरर, नदाल, जोकोव्हिच या टेनिसमधील मातब्बर त्रिकू टाचे आव्हान नसेल. त्यामुळे कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घालण्याची संधी त्याच्यासमोर असेल.


🌞झवेरेव्हने यावर्षी ऑस्ट्रेलियन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. आता अमेरिकन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून त्याने आपली कामगिरी उंचावली आहे. शुक्रवारी थिमने उपांत्य फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा ६-२, ७-६ (९-७), ७-६ (७-५) असा पाडाव केला होता. दोन सेटने पिछाडीवर पडल्यानंतरही झ्वेरेव्हने स्पेनच्या पाबलो बस्टाला ३-६, २-६, ६-३, ६-४, ६-३ अशी धूळ चारली.

नाओमी ओसाकाने ‘यू.एस. ओपन 2020’ टेनिस स्पर्धा जिंकली.

🔰जापानच्या नाओमी ओसाका हिने ‘यू.एस. ओपन 2020’ या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्हिक्टोरिया अझरेंकाचा पराभव करीत महिला एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले. नाओमी ओसाकाचे हे तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. विम्बल्डन


🔴सपर्धेच्या इतर गटाचे विजेते -


🔰परुष एकेरी - राफेल नदाल (स्पेन)

🔰परुष दुहेरी – माटे पाव्हीक (क्रोएशिया) आणि ब्रुनो सोरेस (ब्राझील)

🔰महिला दुहेरी - लॉरा सिगेमुंड (जर्मनी) आणि वेरा झ्वोनारेवा (रशिया)


🔴आतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF) विषयी...


🔰ही जागतिक टेनिस, व्हीलचेयर टेनिस आणि बीच टेनिस स्पर्धांसाठीची प्रशासकीय संस्था आहे. 1913 साली ‘आंतरराष्ट्रीय लॉंन टेनिस महासंघ’ म्हणून याची स्थापना केली गेली.


🔰 याचे मुख्यालय लंडन (ब्रिटन) येथे आहे. आज या संघटनेशी 211 राष्ट्रीय टेनिस संघटना आणि सहा क्षेत्रीय संघटना संलग्न आहेत.


🔰ऑस्ट्रेलियन ओपन (जानेवारी), फ्रेंच ओपन (मे-जून), विंबल्डन (जून-जुलै) आणि यू.एस. ओपन (ऑगस्ट-सप्टेंबर) या स्पर्धा ITF तर्फे आयोजित केल्या जातात.

जागतिक प्रथमोपचार दिन: 12 सप्टेंबर 2020.

❇️दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ‘जागतिक प्रथमोपचार दिन’ साजरा करतात. हा वर्षातला 254 वा (लीप वर्षात 255 वा) दिवस असतो. या दिवशी जीवितहानी टाळण्याच्या प्रयत्नात प्रथमोपचार किती महत्वाची भूमिका बजावू शकते याविषयी जनजागृती केली जाते.


❇️2000 साली इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस अँड रेड क्रिसेंट सोसायटीज (IFRC) या संस्थेच्यावतीने या दिवसाची स्थापना करण्यात आली.


🌐परथमोपचार म्हणजे काय?


❇️अपघात, इजा अथवा गंभीर स्वरूपाच्या आजाराने जर्जर अशा आपद्ग्रस्त व्यक्तीस वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा तिला रुग्णालयात नेईपर्यंतच्या कालावधीत जे उपचार केले जातात त्यांना ‘प्रथमोपचार’ म्हणतात.


❇️असे उपचार बहुतांशी या विषयाचे प्रशिक्षण घेतलेल्या कित्येक आपद्ग्रस्तांचे प्राण वाचू शकतात, इजेची व्याप्ती न वाढता ती मर्यादित राहू शकते, तसेच रुग्णालयात पडून राहण्याचा कालही कमी होतो.


❇️रडक्रॉस ही अशा तऱ्हेचे कार्य करणारी व सर्वसामान्यांना तद्‌विषयक प्रशिक्षण देणारी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संस्था आहे.


🌐इटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस अँड रेड क्रिसेंट सोसायटीज (IFRC) विषयी...


❇️ही एक जागतिक मानवतावादी संस्था आहे, जी संघर्ष-नसलेल्या परिस्थितीत नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीनंतर आंतरराष्ट्रीय सहकार्यामध्ये समन्वय राखते. त्याची स्थापना 1919 साली झाली आणि त्याचे मुख्यालय जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे.


❇️24 जून 1859 रोजी सॉल्फरिनोच्या युद्धानंतर, हेन्री ड्युनंट यांनी जखमी सैनिकांची काळजी घेण्यासाठी एका स्वतंत्र संस्थेची कल्पना मांडली होती.

हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायधीश : अॅना चंडी..



अॅना चंडी केरळ राज्यात कायद्याची पदवी घेणाऱ्या पहिल्या मल्याळी महिला मानल्या जातात.


सन 1959 मध्ये त्या केरळ हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायधीश बनल्या. स्त्रीवादी विचारांच्या अॅना चंडी यांनी महिलांच्या अधिकारांसाठीआवाज उठवला.काही काम फक्त बायकांचीच आहेत या पारंपारिक विचारसरणीला बदलण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. 


पत्नीच्या कमाईने पतीच्या आत्मसन्मानाला धक्का लागेल या विचारांचं त्यांनी खंडन केलं,

त्यांनी आपल्या 'श्रीमती' या मासिकाव्दारे महिलांसाठी आरक्षणाची

मागणी केली.


केरळात 1920-30 या काळात महिलांचं शिक्षण आणि आर्थिक अधिकार या विषयांवर काम होत होतं. पण अॅना यांनी महिलांचा आपल्या शरीरावर पूर्णतः अधिकार असावा आणि महिलांना आपण कधी आई बनावं हे ठरवण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी केली.

परदेशी पत्रकारांवर ऑस्ट्रेलियात निर्बंध

🅾️मलबर्न : ऑस्ट्रेलियातील परदेशी पत्रकारांवर आता संघराज्य संस्थांकडून देखरेख केली जाणार असून त्यांनी जर देशाची चुकीची प्रतिमा रंगवली व देशातील लोकशाही राज्यव्यवस्थेत हस्तक्षेप करून बौद्धिक संपदा हक्क चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.


🅾️चीनशी सुरू असलेल्या वादामुळे ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला आहे. चीनने अनेक देशातील संस्थांमध्ये त्यांचे हस्तक पाठवून बरीच माहिती चोरल्याचे ऑस्ट्रेलियातील एका संस्थेच्या अहवालात उघड झाले आहे.


🅾️ऑस्ट्रेलियाचे गृह कामकाज मंत्री पीटर डय़ुटन यांनी सांगितले, की ऑस्ट्रेलियातील संघराज्य पोलिस विभाग व परराष्ट्र विभाग हे आता सरकारच्या इतर विभागांशी सहकार्य करतील. ऑस्ट्रेलियातील परदेशी हस्तक्षेपावर लक्ष ठेवण्याचे काम आता गांभीर्याने केले जाणार आहे. जर येथे काही परदेशी पत्रकार चुकीच्या पक्षपाती बातम्या देत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ऑस्ट्रेलियन कायद्याच्या हिताविरोधात काम करणारे परदेशी पत्रकार व उद्योगपती यांच्यावर कारवाई केली जाईल. हेरगिरीच्या कारवाया कुणी केल्या तर तो एक मोठा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियात येणाऱ्या परदेशी पत्रकारांची छाननी केली जाईल.

टिकटॉक अॅपची भागीदारी मायस्क्रोसॉफ्ट विकणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.


🦋चिनी कंपनी बाईटडान्सची मालकी असलेल्या ‘टिकटॉक’ या प्रसिद्ध व्हिडिओ शेअरिंग अॅपची भागीदारी मायस्क्रोसॉफ्ट विकणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.


🦋मायक्रोसॉफ्टने स्वतः ही माहिती दिली आहे. दरम्यान, अमेरिकेत टिकटॉकच्या कार्यात्मकतेची भागीदारी विकणे किंवा हे अॅप बंद करण्याची कालमर्यादा लवकरच समाप्त होणार आहे.


🦋या पार्श्वभूमीवर हा निर्णय समोर आला आहे. त्यामुळे अमेरिकेत आता टिकटॉक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


🦋टरम्प यांच्याकडून बाइटडान्स कंपनीला टिकटॉकचे कार्यात्मकता (ऑपरेशन्स) अमेरिकेत सुरु ठेवण्यासाठी त्याची भागीदारी अमेरिकन कंपनीला विकण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

एअर इंडिया कोणी विकत घेतली नाही तर कायमची बंद करणार; मोदी सरकारचा खुलासा.

✍️सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी आहे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी एअर इंडियासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं आहे.


✍️शक्य झाल्यास सरकार ही कंपनी सुरु ठेवेल. मात्र कंपनीवर ६० हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळेच या कंपनीचे खासगीकरण किंवा ती बंद करणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. विमान संशोधन विधेयक २०२० राज्यसभेमध्ये सादर करण्याआधी पुरी यांनी सभागृहाला ही माहिती दिली. एकीकडे कंपनी बंद करण्याचे वक्तव्य करतानाच दुसरीकडे पुरी यांनी या कंपनीला लवकरच नवा मालक मिळेल आणि त्याचे उड्डाण यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


✍️परी यांनी दिलेल्या माहितीनुसार २०११-१२ पासून आतापर्यंत केंद्र सरकारने एअर इंडियामध्ये ३० हजार ५२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही कंपनी विकल्यानंतरही सरकारला फारसा फायदा होणार नाही. हवाई क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ कपिल कौल यांनी लाइव्ह मिंटला दिलेल्या माहितीनुसार या कंपनीच्या विक्रीतून सरकारला फार काही मिळण्याची अपेक्षा नाहीय. सध्या उपलब्ध निधी आरोग्य, शिक्षण, बांधकाम यासारख्या इतर महत्वाच्या गोष्टींसाठी वापरण्याचा सरकारचा विचार आहे.

कद्राची लोकसभेत माहिती- सहा सरकारी कंपन्या होणार बंद.

⭕️कद्र सरकारचा स्कूटर्स इंडियासह सहा सरकारी कंपन्या बंद करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.


⭕️20 केंद्रीय कंपन्या आणि त्यांच्या युनिटमधील हिस्सा विकण्याची प्रक्रिया निरनिराळ्या टप्प्यांवर आहे.तसंच सहा कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.


⭕️सकूटर्स इंडिया, हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड, भारत पंप्स अँड कंप्रेसर्स लिमिटेड, हिंदुस्तान प्रीफॅब, हिंदुस्तान न्यूजप्रिन्ट आणि कर्नाटक अँटीबायोटिक अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपन्या बंद करण्यावर सरकार विचार करत आहे.नीति आयोगाच्या निर्गुतवणुकीच्या निकषांनुसार सराकरनं 2016 पासून 34 कंपन्यांमध्ये निर्गुतवणुकीला मंजुरी दिली आहे.


⭕️यापैकी 8 कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया पूर्ण  झाली आहे. तर अन्य 6 कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू आहे.याव्यतिरिक्त 20 कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया निरनिराळ्या टप्प्यांवर असल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात दिली.

उमेदवारांना परीक्षा उपकेंद्रात करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन.


💠महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने आयोजित परीक्षांकरिता कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सूचना तसेच उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत. यासंबंधी आयोगाकडून परिपत्रक काढण्यात आले असून, उमेदवारांना या सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.


💠परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करताना उमेदवाराने किमान तीन पदरी कापडाचा मास्क परिधना करणे अनिवार्य असणार आहे.  परीक्षा कक्षामध्ये मास्क, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा वापर उमेदवारांनी दोन्ही सत्राकरिता(असल्यास) करणे अनिवार्य आहे.


💠परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छता तसेच आरोग्यास हितावह वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे. कोविड सदृश्य लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी आढळून येत असल्यास संबधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवक्षकीय अधिकारी, कर्मचारी यांना अगोदर कळवणे बंधनकारक असणार आहे. शिवाय उमेदवारांनी आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करणे देखील हिताचे असेल असे कळवण्यात आले आहे.

विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’ याला राज्यसभेत मंजुरी.


✈️राज्यसभेत ‘विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’ याला मंजुरी देण्यात आली आहे. विधेयकामुळे देशात विमानांची सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे.


🚧ठळक बाबी..


✈️विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’ याला राज्यसभेत मंजुरी.


✈️राज्यसभेत ‘विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’ याला मंजुरी देण्यात आली आहे. विधेयकामुळे देशात विमानांची सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे.


🚧ठळक बाबी....


✈️विधेयकामार्फत 1934 साली लागू झालेल्या विमान कायद्यामध्ये दुरुस्ती केली जाणार आहे.


✈️विधेयकाच्या मंजुरीमुळे, नागरी विमानचालन महानिदेशालय (DGCA), नागरी विमानचालन सुरक्षा कार्यालय (BCAS) आणि विमान अपघात अन्वेषण कार्यालय (AAIB) या तीन नियमन संस्थांना वैधानिक दर्जा प्रदान केला जाणार आहे, ज्यामुळे त्या भारतातल्या नागरी विमानचालन क्षेत्रात अधिक प्रभावी होणार आहेत.


✈️नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडाची रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. सध्या जास्तीतजास्त दंड मर्यादा 10 लक्ष रुपये आहे, जी आता वाढवून एक कोटी रुपये एवढी करण्यात आली आहे.


✈️शस्त्रे, दारूगोळा किंवा धोकादायक वस्तू घेऊन जाणे किंवा कोणत्याही प्रकारे विमानाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करण्याच्या शिक्षेव्यतिरिक्त, वर्तमान कायद्यात दंड दहा लक्ष रुपये आहे, जो आता वाढविण्यात आला आहे.


✈️विधेयकामार्फत 1934 साली लागू झालेल्या विमान कायद्यामध्ये दुरुस्ती केली जाणार आहे.


✈️विधेयकाच्या मंजुरीमुळे, नागरी विमानचालन महानिदेशालय (DGCA), नागरी विमानचालन सुरक्षा कार्यालय (BCAS) आणि विमान अपघात अन्वेषण कार्यालय (AAIB) या तीन नियमन संस्थांना वैधानिक दर्जा प्रदान केला जाणार आहे, ज्यामुळे त्या भारतातल्या नागरी विमानचालन क्षेत्रात अधिक प्रभावी होणार आहेत.


✈️नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडाची रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. सध्या जास्तीतजास्त दंड मर्यादा 10 लक्ष रुपये आहे, जी आता वाढवून एक कोटी रुपये एवढी करण्यात आली आहे.


✈️शस्त्रे, दारूगोळा किंवा धोकादायक वस्तू घेऊन जाणे किंवा कोणत्याही प्रकारे विमानाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करण्याच्या शिक्षेव्यतिरिक्त, वर्तमान कायद्यात दंड दहा लक्ष रुपये आहे, जो आता वाढविण्यात आला आहे.

टाटा समूह ८६१ कोटींमध्ये उभारणार नवं संसद भवन



🚦संसदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी तब्बल ८६१.९० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.


🚦टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडनं ८६१.९० कोटी रुपयांना संसंदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीचं कंत्राट मिळवलं आहे.


🚦टाटा समुहासोबतच या प्रक्रियेमध्ये लार्सन अँड टुब्रो, शापुरजी पालनजीसारख्या दिग्गज कंपन्यांचाही समावेश होता.


🚦ससदेची नवी इमारत पार्लियामेंट हाऊसच्या प्लॉट नंबर ११८ वर उभी राहणार आहे. या इमारतीची उभारणी सेंट्रल विस्ता रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या अंतर्गत होणार आहे.


🚦ससदेच्या नव्या प्रस्तावित भवनाचा एकूण परिसर ६५ हजार चौरस मीटर इतका आहे. यामध्ये एकूण १६ हजार ९२१ चौरस मीटरच्या बेसमेंटचाही समावेश आहे. 


🚦नवं संसद भवन दोन मजली असेल. तसंच २०२२ मध्ये भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी याचं काम पूर्ण होणार आहे.


बलू फ्लॅग’ प्रमाणपत्रासाठी भारतातल्या आठ सागरी किनाऱ्यांचे नामांकन देण्यात आले.


⭕️परथमच, ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी भारतातल्या आठ सागरी किनाऱ्यांचे नामांकन देण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत -


⭕️शिवराजपूर (गुजरात), घोघला (दमण व दीव), कासारकोड आणि पादुबिद्री (कर्नाटक), कप्पड (केरळ), ऋषिकोंडा (आंध्रप्रदेश), गोल्डन बीच (ओडिशा) आणि राधानगर (अंदमान व निकोबार)


✅ठळक बाबी


⭕️दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा तिसरा शनिवार हा ‘आंतरराष्ट्रीय तटिय स्वच्छता दिन’ साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 19 सप्टेंबर 2020 रोजी साजरा करण्यात आला आहे. या दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून यासंबंधी घोषणा करण्यात आली.‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्या आठ किनाऱ्यांचा जगातल्या सर्वात स्वच्छ किनाऱ्यांच्या यादीत समावेश होणार.


✅"BEAMS" (सागरी किनारा पर्यावरण व सौंदर्यिकरण व्यवस्थापन सेवा)


⭕️हा भारत सरकारचा स्वतःचा कार्यक्रम आहे, ज्याच्याअंतर्गत स्वच्छ किनाऱ्यांना राष्ट्रीय प्रमाणपत्र बहाल केले जातात. किनारी प्रदेशात शाश्वत विकासासाठी असलेल्या धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी SICOM आणि पर्यावरण मंत्रालयाने ICZM (एकात्मिक किनारी क्षेत्र व्यवस्थापन) प्रकल्पाच्या अंतर्गत BEAM कार्यक्रम राबवत आहे.


⭕️समग्र तटीय व्यवस्थापनाद्वारे किनारी आणि सागरी पर्यावरण तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मंत्रालयाने संवादात्मक ICZM (एकात्मिक किनारी क्षेत्र व्यवस्थापन) उपक्रम राबवत आहे. ICZMची संकल्पना 1992 साली रिओ दे जनेरो येथे झालेल्या पृथ्वी शिखर परिषदेत मांडली गेली होती.


✅‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र


⭕️हा पर्यावरणाशी अनुकूल असलेल्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सागरी किनारा, सागरी परिसंस्था किंवा शाश्वत बोटिंग टूरिझम कार्यवाहक यांना बहाल केला जाऊ शकणारा सन्मान आहे. हा सन्मान डेन्मार्कच्या फाउंडेशन फॉर एनविरोनमेंटल एज्युकेशन (FEE) या ना-नफा संस्थेच्यावतीने दिला जातो.

गुगलने प्ले स्टोअर वरून Paytm काढून टाकले

◾️ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम हे लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशन गुगलने आपल्या प्ले स्टोअर प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकले आहे.मात्र या कारवाईमुळे हे अ‍ॅप वापरणाऱ्या 45 कोटी युझर्सच्या पैशांचे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

◾️ह अ‍ॅप वापरणाऱ्या युझर्सला काळजी करण्याची गरज नसून त्यांचे पैसे सुरक्षित असल्याचे कंपनीने म्हटलं आहे. त्याचप्रमाणे लवकरच आम्ही परत या प्लॅटफॉर्मवर येऊ असं म्हटलं आहे.

◾️ह सर्व गुगलच्या नियमांमध्ये बसणारे नाही असं सांगत गुगलने पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अ‍ॅपवरही कारवाई केली आहे.

वायव्य चीनमध्ये (brucellosis) संसर्ग तीन, हजार 235 रुग्ण आढळून आले


🔶वायव्य चीनमध्ये ब्रुसेलोसिसचा (brucellosis) संसर्ग झालेले हजारो रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.


🔶एका औषध निर्मिती कंपनीमधून लीक झालेल्या रसायनांमुळे विषाणूमुळे होणाऱ्या या आजाराचे हजारो रुग्ण आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.


🔶गान्सू प्रांतातील लॅन्झू शहरातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ब्रुसेलोसिसचे तीन हजार 235 रुग्ण आढळून आले आहेत. ब्रुसेला या विषाणुमुळे हा आजार होतो असं सांगण्यात आलं आहे.


🔶24 जुलै 2019 ते 20 ऑगस्टदरम्यान झॉनगुम लॅन्झू येथील जैविक औषधनिर्मिती करणाऱ्या कारखान्यामध्ये लस निर्मिती करण्याचं काम केलं जात होतं.


🔶लन्झू येथील प्राणी संशोधन केंद्राजवळ  असणाऱ्या या कारखान्यामध्ये प्राण्यांना होणाऱ्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रुसेला विषाणुंच्या मदतीने औषधांची निर्मीत करण्यात येत होती.


🔶याच औषध निर्मितीदरम्यान कारखान्यातील धूर आणि गॅस प्रक्रिया न करता तो बाहेर सोडण्यात आला. त्यामधूनच लोकांना आता आजाराची बाधा झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुदर्शन टीव्हीला सुनावले



🚦सपूर्ण समाजाला लक्ष्य करण्याची परवानगी माध्यमांना देता येऊ शकते का, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुदर्शन टीव्ही या वृत्तवाहिनीला ‘बिनधास्त बोल’प्रकरणी सुनावले.


🚦सरकारी सेवेत मुस्लीमांना घुसविण्याचे कारस्थान रचले जात असल्याची बाब उघड करणार असल्याचा दावा या कार्यक्रमाच्या जाहिरातीद्वारे करण्यात आला होता. बिनधास्त बोल या कार्यक्रमाबाबत तक्रार करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, एखाद्या वाहिनीला विशिष्ट वृत्त फोडण्याचा अधिकार आहे, मात्र वाहिनी अशा प्रकारचे वृत्त प्रसारित करून संपूर्ण समाजावर विशिष्ट शिक्का मारू  शकत नाही.


🚦जव्हा एखाद्या समाजातील व्यक्ती नागरी सेवांमध्ये सहभागी होण्याबाबतचे वृत्त दिले जाते तेव्हा तुम्ही आयसिसचा उल्लेख करता, मुस्लीम समाज नागरी सेवांमध्ये सहभागी होतो तो तळागाळात रुजलेल्या कटाचा एक भाग आहे, असे तुम्हाला म्हणावयाचे आहे का, संपूर्ण समाजाला लक्ष्य करण्याची परवानगी माध्यमांना देता येऊ शकते का, असा सवाल न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने केला.

गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोफत साधने द्या.


⚜️ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले असले तरी लॅपटॉप, मोबाइल स्मार्ट फोन व डेटा पॅक असल्याशिवाय त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे या सुविधा सरकारी आणि खासगी शाळांनी गरीब विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्याव्यात, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.


⚜️नया. मनमोहन व न्या. संजीव नरुला यांनी सांगितले, की खासगी विनाअनुदानित शाळांना या साधनांच्या खरेदीसाठी खर्चाची प्रतिपूर्ती करून द्यावी. शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अंतर्गत इंटरनेट डेटा पॅकही गरीब विद्यार्थ्यांना मोफत देण्यात यावा. यासाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात यावी, त्यात केंद्राचे शिक्षण सचिव किंवा त्यांचे प्रतिनिधी, खासगी शाळांचे प्रतिनिधी, दिल्ली सरकारचे शिक्षण सचिव यांचा समावेश करण्यात यावा.


⚜️‘जस्टीस फॉर ऑल ’ या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेत  विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप, स्मार्टफोनची मागणी केली होती.

खासदारांची पगार कपात करणारं विधेयक राज्यसभेत मंजूर.


➡️लोकसभेने खासदारांचं वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक (Salaries and Allowances of Ministers Amendment Bill, 2020) मंजूर करण्यात आलं होतं. यामुळे आता पुढील वर्षभरासाठी खासदारांच्या वेतनामध्ये ३० टक्के कपात होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक खासादाराला दरवर्षी देण्यात येणाऱ्या ५ कोटींच्या खासदार निधीही पुढील दोन वर्षांसाठी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं.


➡️करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मोदी सरकारने घेतला असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आज (शुक्रवार) राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं.


➡️करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून राज्यसभेत आवाजी मतदानाद्वारे दोन्ही विधेयकं संमत करण्यात आली. सोमवारी लोकसभेमध्ये संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक २०२० सादर केलं. या विधेयकानुसार खासदारांना देण्यात येणारा पगार तसेच भत्ते आणि निवृत्ती निधीसंदर्भातील २०२० अध्यादेशाऐवजी हे विधेयक अंमलात आलं होतं.


➡️कलम १०६ अंतर्गत सरकारने हे विधेयक आणण्यात आलं. एक वर्ष वेतन कपात होणाऱ्यांमध्ये पंतप्रधान, मंत्रीमंडळातील मंत्री, राज्यमंत्री आणि खासदारांचा समावेश आहे. या विधेयकानुसार एप्रिल २०२० ते पुढील आर्थिक वर्षापर्यंत वेतन कपात होणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ७९० खासदार असतात.

चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे

Q1) जागतिक बँकेच्या वार्षिक ‘मानवी भांडवल निर्देशांक-2020’ अहवालाच्या ताज्या आवृत्तीत भारताचा क्रमांक काय आहे?

------- 116


Q2) ‘ब्रू’ ही _ राज्यातल्या मूळ 21 अनुसूचित जमातींपैकी एक आहे.

------ त्रिपुरा


Q3) NASA संस्थेच्या अभ्यासानुसार, सूर्याच्या कितव्या नव्या चक्रकालाचा आरंभ झाला?

------- सौर चक्र 25


Q4) कोणत्या राज्यात ‘कोसी रेल मेगा पूल’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले?

------- बिहार


Q5) कोणत्या संघटनेनी “भूमी अवनती क्षपण विषयक जागतिक उपक्रम” आणि “प्रवाळ प्रदेश कार्यक्रम” यांना सादर केले?

-------- जी-20


Q6) आफ्रिकेतल्या कोणत्या देशांमध्ये ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) या कंपनीने त्याचे कामकाज बंद केले?

--------  सुदान


Q7) कोणत्या देशाने जागतिक ‘2020 स्मार्ट सिटी इंडेक्स’ याच्या यादीत पहिला क्रमांक पटकवला?

-------- सिंगापूर


Q8) कोणत्या बँकेसोबत टायटन कंपनीने संपर्क-विरहित पैसे देण्याच्या प्रक्रियेसाठी ‘टायटन पे’ घड्याळ तयार करण्यासाठी भागीदारी करार केला?

-------  भारतीय स्टेट बँक


Q9) 2020 साली ‘जागतिक रुग्ण सुरक्षा दिन’ची संकल्पना काय आहे?

--------- हेल्थ वर्कर सेफ्टी: ए प्रायोरिटी फॉर पेशंट सेफ्टी


Q10) भारतातील कोणत्या राज्यात शिशु मृत्यू दर सर्वाधिक आहे?

------- मध्यप्रदेश  

१९ सप्टेंबर २०२०

महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे



●  अकलोली ठाणे


● उनकेश्वर


● उनपदेव


● उन्हेरे


● गणेशपुरी


● खेड (रत्नागिरी)


● तुरळ


● देवनवरी


● राजवाडी


● राजापूर


● वज्रेश्वरी


● सव


● सातिवली


● सुनपदेव


● पाली

चालु घडामोडी महत्त्वाचे प्रश्न


1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)

2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे) 

3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)

4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर :- अमित शहा (29 वे)

5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)

6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)

7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे) 

8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?

उत्तर :- शरद बोबडे (47 वे)

9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)

10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :- जनरल बिपीन रावत 

11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- अजित डोवाल

12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- दत्ता पडसलगीकर

13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर :- पियुष गोयल

14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8

15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- सुनील अरोरा

16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- यु.पी.एस.मदान

17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर :- लेह ( लदाख )

18) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने

19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- आर.के.एस.भदौरिया

20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह

स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित चळवळ आणि वर्ष


    

  १. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना
  उत्तर -1885

  २. वंग-भंगआंदोलन (स्वदेशी चळवळ)
  उत्तर- 1905

  3.मुस्लिम लीगची स्थापना
  उत्तर- 1906

  4.कॉंग्रेसची फाळणी
  उत्तर- 1907

  5. होमरुल चळवळ
  उत्तर 1916

  6. लखनऊ करार
  उत्तर- डिसेंबर 1916

  7. मॉन्टग घोषणा
  उत्तर -20 ऑगस्ट 1917

  8. रोलेट कायदा
  उत्तर-१ मार्च १९१९

  9. जालियनवाला बाग हत्याकांड
  उत्तर -13 एप्रिल 1919

  10. खिलाफत आंदोलन
  उत्तर -१९१९

  ११. हंटर समितीचा अहवाल प्रसिद्ध
  उत्तर -18 मे 1920

  १२. कॉंग्रेसचे नागपूर अधिवेशन
  उत्तर - डिसेंबर 1920

  13. असहकार चळवळीस प्रारंभ
  उत्तर -1 ऑगस्ट 1920

  14. चौरी-चौरा घोटाळा
  उत्तर -5 फेब्रुवारी 1922

  १.. स्वराज्य पक्षाची स्थापना
  उत्तर- 1 जानेवारी 1923

  16. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन
  उत्तर - ऑक्टोबर 1924

  17. सायमन कमिशनची नेमणूक
  उत्तर -8 नोव्हेंबर 1927

  18. सायमन कमिशनचा भारत दौरा
  उत्तर -3 फेब्रुवारी 1928

  19. नेहरू अहवाल
  उत्तर- ऑगस्ट 1928

  20. बार्डोली सत्याग्रह
  उत्तर - ऑक्टोबर 1928

  21. लाहोर पद्मंत्र प्रकरण
  उत्तर -8 एप्रिल 1929

  22. कॉंग्रेसचे लाहोर अधिवेशन
  उत्तरः डिसेंबर १९२९ @BHAVIADHIKARI2020

  23. स्वातंत्र्य दिनाची घोषणा
  उत्तर -2 जानेवारी 1930

  24. मीठ सत्याग्रह
  उत्तर -12 मार्च 1930 ते 5 एप्रिल 1930

  25. सविनय कायदेभंग आंदोलन
  उत्तर -6 एप्रिल 1930

  26. प्रथम गोलमेज परिषद
  उत्तर-12 नोव्हेंबर 1930

  27. गांधी-इरविन करार
  उत्तर -8 मार्च 1931

  28. दुसरी गोलमेज परिषद
  उत्तर- 7 सप्टेंबर 1931

  २९. जातीय निवाडा
  उत्तर -16 ऑगस्ट 1932

  30. पूणे करार
  उत्तर - सप्टेंबर 1932

  31. तिसरी गोलमेज परिषद
  उत्तर-17 नोव्हेंबर 1932

  32. कॉंग्रेस सोशलिस्ट पक्षाची स्थापना
  उत्तर- मे 1934

  फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना
  उत्तर -१ मे १९३९

  34. मोक्ष (salvation day)दिन
  उत्तर -22 डिसेंबर 1939

  35. पाकिस्तानची मागणी
  उत्तर-24 मार्च 1940

  36. ऑगस्ट ऑफर
  उत्तर- 8 ऑगस्ट 1940

  37. क्रिप्स मिशन प्रस्ताव
  उत्तर- मार्च 1942

  38. भारत छोडो प्रस्ताव
  उत्तर -8 ऑगस्ट 1942

  39. शिमला परिषद
  उत्तर-25 जून 1945

  40. नौदल बंड
  उत्तर -19 फेब्रुवारी 1946

  41. पंतप्रधान एटलीची घोषणा
  उत्तर -15 मार्च 1946

  .२. कॅबिनेट मिशनचे आगमन
  उत्तर-24 मार्च 1946

  43. प्रत्यक्ष कृती दिवस
  उत्तर -16 ऑगस्ट 1946

  44. अंतरिम सरकारची स्थापना
  उत्तर -2 सप्टेंबर 1946

  45. माउंटबॅटन योजना
  उत्तर -3 जून 1947

  46. ​​स्वातंत्र्य प्राप्ती
  उत्तर -15 ऑगस्ट 1947

  प्रश्न: - स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
  उत्तरः लॉर्ड माउंटबॅटन.

  प्रश्नः भारताचा पहिला वायसराय कोण होता?
  उत्तर: - लॉर्ड कॅनिंग.

  प्रश्न: - भारताची प्रथम महिला राजदूत कोण होती?
  उत्तर: - विजयालक्ष्मी पंडित.

  प्रश्नः भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे नाव काय?
  उत्तर: - अप्सरा.

  प्रश्न: - भारताची प्रथम महिला पायलट कोण होती?
  उत्तर: - प्रेमा माथूर.

  प्रश्न: - भारतीय वायुसेनेची प्रथम महिला पायलट?
  उत्तर: - हरिता कौर देओल.

  प्रश्न: - परमवीर चक्र प्राप्त करणारे भारतीय वायुसेनेचे पहिले अधिकारी?
  उत्तर: निर्मलजीत सेखो.

  प्रश्न: - भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा?
  उत्तर: - मीरा कुमार.

  प्रश्नः भारताचे पहिले कम्युनिस्ट लोकसभा अध्यक्ष कोण होते?
  उत्तर: - सोमनाथ चटर्जी.

  प्रश्नः भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?
  उत्तर: - सुकुमार सेन.

  प्रश्नः भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
  उत्तर: - सरदार वल्लभभाई पटेल.

  प्रश्नः भारताचे पहिले संरक्षणमंत्री कोण होते?
  उत्तर: - सरदार बलदेव सिंह.

  प्रश्न: - भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
  उत्तर: - आर.के. षणमुखम चेट्टी.

  प्रश्नः भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?
  उत्तर: - मौलाना अबुल कलाम आझाद.

मराठी - वाक्यप्रचार व अर्थ


1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे


2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे


3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे


4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे

मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे


5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे


6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे


7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे


8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे


9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे


10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे


11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे


12)रामराम ठोकणे - निरोप घेणे


13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे


14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे



15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे


16) वर्ज्य करणे - टाकणे


17) काडीमोड करणे - संबंध तोडणे


18) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे


19) अगतिक होणे - उपाय न चालणे


20) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे


21) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे


22) इडापिडा टळणे - संकट जाणे


23) उतराई होणे - उपकार फेडणे


24) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे


25) लकडा लावणे - सारखी घाई करणे


26) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे


27) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे


28)कागाळी करणे - तक्रार करणे


29) खांदा देणे - मदत करणे


30) खोबरे करणे - नाश करणे


31) गय करणे - क्षमा करणे


32) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे


33) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे


34) जीव ओतणे - मन लावून काम करणे


35) सुपारी देणे - आमंत्रण देणे


36) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे


37) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे


38) नामोहरम होणे - पराभूत होणे


39) पदर पसरणे - याचना करणे


40) पाणउतारा करणे - अपमान करणे


41) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे


42) हात तोकडे पडणे - मदत करण्यास  क्षमता कमी पडणे


43) हिरमुसले होणे - नाराज होणे


44) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे


45) विटून जाणे - त्रासणे


46) डोके सुन्न होणे - काही न सुचणे


47) फडशा पाडणे - संपवणे


48) गोरेमोरे होणे - लाज वाटणे


49)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे


50)धिंडवडे निघणे - फजिती होणे


61) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे


62)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे


63) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे


64)हातपाय गाळणे - धीर सोडणे


65) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील


 काम न करता कागदी पराक्रम गाजविणे


66) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे


67)झाकड पडणे - अंधार पडणे


68)पोटात आग पडणे - खूप भूक लागणे


69)टोपी उडवणे - टवाळी करणे


70)पाणी पाजणे - पराभव करणे


71)वहिवाट असणे - रीत असणे


72)छी थू होणे - नाचक्की होणे


73)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे


74)दंडेली करणे - जबरदस्ती करणे


75)दिवा विझणे - मरण येणे


76)मूठमाती देणे - शेवट करणे


77) सुगावा लागणे - अंदाज लागणे


78)प्रतारणा करणे - फसवणूक करणे


79)डोक्यावर घेणे - कौतुक करणे


80)कानाशी लागणे - चहाडी करणे


81)किटाळ करणे - आरोप होणे


82)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे


83)हातावर तुरी देणे - फसविणे


84)बेगमी करणे - साठा करणे


85)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे

आठ महत्वपूर्ण उद्योगांचे निर्देशांक



आठ महत्वपूर्ण उद्योगांचा निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात 5.8 टक्क्याने कमी होऊन 127 इतका राहिला. एप्रिल ते ऑक्टोबर 2019-20 दरम्यान एकत्रित वाढ 0.2 टक्के इतकी राहिली


✅ कोळसा ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये कोळशाच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 17.6 टक्क्याने घट झाली. एप्रिल ते ऑक्टोबर 2019 दरम्यान या क्षेत्राचा एकत्रित निर्देशांक गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.8 टक्क्याने कमी राहिला.


✅ खनिज तेल ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये खनिज तेलाच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 5.1 टक्क्याने घट झाली.


✅ नसर्गिक वायू ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये नैसर्गिक वायूच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 5.7 टक्क्याने घट झाली.


✅ रिफायनरी उत्पादने ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये पेट्रोलियम रिफायनरी उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 0.4 टक्क्याने वाढ झाली.


✅ खते ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये खतांच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 11.8 टक्क्याने वाढ झाली.


✅ पोलाद ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये पोलाद उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 1.6 टक्क्याने घट झाली.


✅ सिमेंट ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये सिमेंटच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 7.7 टक्क्याने घट झाली.


✅ वीज ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये वीज निर्मितीत ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 12.4 टक्क्याने घट झाली.


नोव्हेंबर 2019 साठीच्या औद्योगिक निर्देशांक 31 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

91वी घटनादुरुस्ती 2003



मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित ठेवणे, सार्वजनिक पदे धारण करण्यापासून, पक्षांतर करणाऱ्यांना रोखणे आणि पक्षांतर बंदी कायदा बळकट करणे या उद्देशाकरिता पुढील तरतुदी केल्या.


1) प्रधानमंत्र्यासहित, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये (अनु. ७५ क)


2) संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्र घोषित केले असेल तर तो व्यक्ती मंत्रीपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल (अनु. ७५ ‘१ख’)


3) मुख्यमंत्र्यांसहित, राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या संबंधित राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. परंतु मुख्यमंत्रासहित, एकूण मंत्र्यांची संख्या १२ पेक्षा कमी असू नये (अनु. १६४ ‘क’)


4) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहातील, कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्र घोषित केले असेल तर तो व्यक्ती मंत्रीपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल. (अनु. १६४ ‘१ख’)


5) संसदेच्या किंवा राज्यविधिमंडळाच्या सदस्यांपैकी, कोणत्याही पक्षाचा सदस्य असणाऱ्याला पक्षांतराच्या आधारे अपात्र घोषित केलेले असेल तर, तिला इतर कोणतेही मोबदला प्राप्त राजकीय पद भूषविता येणार नाही.  मोबदला प्राप्त राजकीय पदे म्हणजे


केंद्र वा राज्य शासनाच्या अखत्यारीतील असे कोणतेही पद. जिला संबंधित शासनाच्या सार्वजनिक महसुलातून वेतन वा मोबदला दिला जातो.


एखाद्या संस्थांतर्गत वा मंडळांतर्गत पद, जिचा समावेश शासनामध्ये केलेला असेल आणि त्या पदासाठी ते मंडळ. संस्था वेतन वा  मोबदला देत असेल (अपवाद, असे वेतन वा मोबदल्याचे स्वरूप नुकसान भरपाईचे असेल तर) (अनु. ३६१ ‘ख’)


6) १० व्या परिशिष्टामधील पक्षांतरबंदी कायद्यामध्ये तरतूद केली होती कि, विधिमंडळीय पक्षा पासून विभक्त झाल्यास ते पक्षांतरामुळे अपात्र ठरणार नाहीत. या घटनादुरुस्तीने ही तरतूद रद्द केली. याचाच अर्थ पक्षांतर करणाऱ्यांना फुटीचा आधार घेऊन कोणतेही संरक्षण उपलब्ध नाही.

महाराष्ट्र पोलीस भरती ⭕️मराठी म्हणी⭕️

1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे

2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही

3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे

4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच

5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे

6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा

7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते

8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो

9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे

10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही

11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा

12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे

13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे

14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर

15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही

16. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो

17. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे

18. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो

19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी

22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते

21. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ

22. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती

23. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे

24. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण

25. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे

26. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे

27. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे

28. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत

29. पायीची वहाण पायी बरी – योग्यतेप्रमाणे वागवावे

30. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये

31. उंटावरून शेळ्या हाकणे – आळस, हलगर्जीपणा करणे

32. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही

33. कोल्हा काकडीला राजी – लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात

34. गाढवाला गुळाची चव काय – अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते

35. घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे

36. डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे

37. भरंवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे

38. वरातीमागून घोडे – एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे

39. पाण्यात राहून माशाशी वॆर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?

40. खायला काळ भुईला भार – ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो

41. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे

42. नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी

43. हपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते

44. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे

45. गर्जेल तो पडेल काय? – पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही

46. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही – कष्टाशिवाय यश मिळत नाही

47. वारा पाहून पाठ फिरवावी – वातावरण पाहून वागावे

48. कुंपणानेच शेत खाणे – रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे

49. दगडावरची रेघ- कायमची गोष्ट

ब्रिटिश काळातील शिक्षण विषयक समिती आणि आयोग



1.जेम्स थॉमसन शिक्षण व्यवस्था-1843-53


2.मेकॉले समिती-1853


3.वुडचा खलिता-1854


4.हंटर समिती-1882-83


5.थॉमस रॅले-1904 यांच्या शिफारशीने  भारतीय विद्यापीठ कायदा 1904


6.सॅडलर समिती-1917-18


7.हारटोग समिती-1929


8.वर्धा योजना/मौलिक व आधारभूत शिक्षण-1937


9.सार्जंट योजना-1944


10.राधाकृष्ण आयोग-1948


Trick :


 शिक्षणासाठी=( थॉमसन,मेकॉले,वुडला )-हंटर ने मारल्याने ते रडले(रॅले),सॅड झाले,हर्ट झाल्याने -वर्ध्यास अर्जंट(सार्जंट) राधाकृष्ण यांच्याकडे गेले.

सामान्य ज्ञान


जागतिक आर्थिक मंच (WEF) - 

➖सथापना: सन 1971 (01 जानेवारी); 

➖मख्यालय: कोलोग्नी, स्वित्झर्लंड.


ग्रुप ऑफ 20 (जी-20) याची 

➖ सथापना – सन 1999 (26 सप्टेंबर).


पश्चिम बंगाल राज्य - 

➖ सथापना: सन 1950 (26 जानेवारी); 

➖राजधानी: कोलकाता.


छत्तीसगड राज्य - 

➖ सथापना: सन 2000 (01 नोव्हेंबर); 

➖ राजधानी: रायपूर.


सकल राष्ट्रीय उत्पन्न (Gross domestic product -GDP) याची मूलभूत संकल्पना मांडणारे ब्रिटिश अर्थशास्त्री - विलियम पेटी.


भारतातले राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) याची 

➖ सथापना – सन 1993 (12 ऑक्टोबर).


भारतातले केंद्रीय माहिती आयोग (CIC) याची 

➖ सथापना – सन 2005 (12 ऑक्टोबर) (माहितीचा अधिकार कायद्यान्वये).


भारतात माहितीचा अधिकार (RTI) कायदा या साली लागू करण्यात आला – सन 2005 (15 जून).


ब्रिटीश भारतातली प्रथम पदवीधर महिला - कामिनी रॉय (बंगाली कवीयत्री, समाजसेवक आणि स्त्रीवादी).

Online Test series

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...