१७ सप्टेंबर २०२०

ञानेंद्रिये (Sensory Organs)

प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ.


डोळे (Eyes):

८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते.

पापणीची सतत उघडझाप चालू असते. त्याद्वारे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरविले जाऊन डोळा ओलसर राहतो.

अश्रू हे सोडियम क्लोराईड व सोडियम बाय कार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाइम (Lysozyme) नावाचे विकर असते. जे ऍन्टीसेप्टीक म्हणून काम करते.


बुबुळ (Cornea):

नेत्रदानामध्ये डोळ्याचा हा भाग काढला जातो. मृत्यूनंतर तो चार तासाच्या आत काढणे गरजेचे असते.

बुबुळ रोपणास Keratoplasty असे म्हणतात. मानवी अवयवाचे पहिले यशस्वी रोपण (Transplantation) बुबुळाचे करण्यात आले होते. ते एक्वर्ड कौराड झिर्म (Edward Kourad Zirm) या शास्त्रज्ञाने 7 डिसेंबर 1905 रोजी केले होते.


दृष्टिपटल (Retina):

हा डोळ्याचा पडदा असून वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर उलटी (inverted & Reversed) पडत असते. मात्र, मेंदूमार्फत तिचे आकलन सुलट केले जाते.


दृष्टीसातत्य :

वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ सेकंदासाठी राहत असते. त्याच्या आतच त्याच वस्तूची प्रतिमा पुन्हा पडल्यास त्या दोन प्रतिमांमधील फरक जाणवून येत नाही. याला दृष्टिसातत्य असे म्हणतात. त्यामुळेच सिनेमाच्या पडद्यावर हलणारी चित्रे पाहणे शक्य होते.


दृष्टिदोष (Defects Of Vision):


दृष्टिदोष हे प्रामुख्याने नेत्रभिंगातील संरचनात्मक दोषामुळे निर्माण होत असतात.

१) निकटदृष्टिता / हृस्वदृष्टी (Myopia/ Short-sightedness):

जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.

डोळ्याचा आकार मोठा, लांबट व चपटा होतो, त्यामुळे वस्तूची प्रतिमा पडद्याच्या अलीकडेच पडते. प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्याच्या अलीकडेच काही अंतरावर होते. अर्थात, प्रकाशकिरण ज्यावेळी पडद्यावर पोहोचतात त्यावेळी ते विकेंद्रित झालेले असतात.

उपाय: अंतर्गोल भिंगाचा चष्मा.



२) दूरदृष्टिता/ दीर्घदृष्टी (Hypermetropia/Longsightedness):

दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. त्यामुळे प्रतिमा पडद्याच्या मागे पडते.

उपाय: बहिर्गोल भिंगाचा चष्मा


३) विष्मदृष्टी / अबिंदूकता (Astigmatism):

बुबुळाच्या किंवा भिंगाच्या किंवा दोघांच्या वक्रतेमध्ये कमी -जास्तपणा निर्माण झाल्यास हा दोष निर्माण होतो. त्यामुळे वस्तूपासून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्यावर एकाच ठिकाणी न होता दोन किंवा अधिक ठिकाणी होते. त्यामुळे वस्तू अस्पष्ट दिसतात. हा दोष ह्रस्व व दीर्घदृष्टी या दोन्हींमध्ये आढळू शकतो.

 उपाय: दंडगोलाकार भिंगाचा चष्मा.


४) वृध्ददृष्टिता/ चाळीसी (Presbyopia):

वाढत्या वयामुळे होणार दोष दूरदृष्टीतेचा एक प्रकार समायोजी स्नायू दुर्बल बनल्याने भिंगाच्या समायोजन शक्तीमध्ये हळूहळू होणाऱ्या कमतरतेमुळे निर्माण होतो, त्यामुळे जवळच्या वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत.

उपाय: वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे.

राष्ट्रपतीच्या निवडणुकीत आता जम्मु आणि काश्मिरचा समावेश असेल का?



🔸जम्मु आणि काश्मिर केंद्र शासित प्रदेश होण्याअगोदर ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत होते.


🔸आता मात्र ते राज्य नसुन केंद्र शासित प्रदेश आहे. त्यामुळे त्याचा समावेश या निवडणुकीत समावेश होत नाही. 


🔸जर जम्मु आणि काश्मिरचा समावेश राष्ट्रपतींच्या निर्वाचण गणात (Electrol college) करायचा असेल तर कलम 54 मध्ये घटनादुरुस्ती करावी लागेल. 


🔸सविधान कलम 54 मध्ये राष्ट्रपतींच्या निर्वाचण गणाची तरतुद आहे.


🔸70 वी घटनादुरुस्ती करुन ज्या प्रकारे “दिल्ली आणि पुदुचेरी” चा समावेश राष्ट्रपतींच्या निर्वाचण गणात केला तसा जम्मु आणि काश्मिरचा करावा लागेल.


🔸राष्ट्रपतींच्या निवडणुक पद्धतीत बदल करण्यासाठी 2/3 विशेष बहुमत व निम्या राज्यांची संमती लागेल.

बीडब्लूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

🥇विजेतेपद - पी.व्ही.सिंधू🏆

🥈उपविजेतेपद - नोझोमी ओकूहारा (जपान)


★स्पर्धा स्थळ - बासेल , स्वित्झर्लंड


●21-7 , 21-7 अश्या 2 सरळ सेटमध्ये विजय


●1977 साली जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेस सुरुवात


●जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद प्राप्त करणारी प्रथम भारतीय खेळाडू - पी.व्ही.सिंधू ठरली आहे.


●यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पी.व्ही.सिंधूचे यश

1. 2013 - 🥉कांस्यपदक

2. 2014 - 🥉कांस्यपदक

3. 2017 - 🥈रौप्यपदक

4. 2018 - 🥈रौप्यपदक

5. 2019 - 🥇सवर्णपदक


🏆भारतास जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आजपर्यंत - 10 पदके

(त्यातील 5 पदके एकट्या पी.व्ही.सिंधुची)


🎖वयाच्या 24 वर्षी पी.व्ही.सिंधू 🏸बडमिंटन जागतिक अजिंक्यपदाची🏆 मानकरी ठरली आहे.

कष्णा-गोदावरी खोऱ्यात मिथेन इंधनाचा साठा आहे: एक शोध.

🔰सपत चाललेल्या जीवाश्म इंधनाला एक पर्याय म्हणून स्वच्छ ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांचा शोध भारतीय भूप्रदेशात लागला आहे.


🔰विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत असलेली आघरकर संशोधन संस्थेनी केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की, कृष्णा-गोदावरी खोऱ्यात ‘मिथेन हायड्रेट’ साठ्याचा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे मिथेन या नैसर्गिक वायूचा पुरेसा पुरवठा होऊ शकतो.


🔴ठळक बाबी....


🔰मिथेन स्वच्छ आणि स्वस्त इंधन आहे.

अंदाजानुसार, एक क्युबिक मीटर मिथेन हायड्रेटमध्ये 160-180 क्युबिक मीटर मिथेन असते. त्यानुसार, खोऱ्यातला मिथेन हायड्रेटसचा अगदी कमी अंदाज केला तरी, ते जगातल्या जीवाश्म इंधन साठ्यांच्या तुलनेत दुप्पट आहे.


🔰खोऱ्यात आढळलेले मिथेन हायड्रेट साठे बायोजेनिक मूळ असलेले आहेत.हायड्रोजन-बंधित पाणी आणि मिथेन वायू सागरामध्ये उच्च दाब आणि कमी तापमानाला एकत्र आले असता मिथेन हायड्रेटची निर्मिती होते.


🔰मिथेन हायड्रेट म्हणून सांधलेल्या बायोजेनिक मिथेनची निर्मिती करणार्‍या मिथेनोजेन शोधून काढले गेले आहे, जे ऊर्जेचे महत्त्वपूर्ण स्रोत असू शकते.


🔴कष्णा-गोदावरी खोरे..


🔰20 हजार चौरस किलोमीटर एवढ्या भूमी क्षेत्रात तसेच बंगालच्या उपसागराच्या 24 हजार चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात 2000 किलोमीटर एवढ्या आईसोबाथ (पाण्याच्या खोलीच्या समसमान ठिकाणी जोडली जाणारी नकाशावरील रेषा) पर्यंत कृष्णा-गोदावरी खोरे विस्तारलेले आहे.


🔰हा एक क्रॅटॉनिक फॉल्ट भूभाग आहे तसेच ईशान्य-नैऋत्य फॉल्टद्वारे मर्यादित आहे, ज्याला वायव्येकडील प्रणाहिता-गोदावरी ग्रॅबेन आणि पश्चिमेस कुडप्पा खोरेपासून वेगळे करते.

Ozone Day : ओझोन दिवस



» अंतरराष्ट्रीय ओझोन स्तर संरक्षक दिवस / अंतरराष्ट्रीय ओझोन दिवस 

» 16 सप्टेंबर 

» पासून - 1995

» 16 सप्टेंबर 1987 रोजी Montreal Protocol वरती सह्या झाल्या होत्या, या दिवसाचे स्मरण म्हणून आमसभेने 1994 मध्ये 16 सप्टेंबर हा ओझोन दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले.

» 2019 Theme: 32 Years And Healing

» 2020 Theme: Ozone for life : 35 years of ozone layer protection


◆ ओझोन म्हणजे काय ?


» ओझोन हा ऑक्सिजनचा एक विशेष प्रकार आहे, ज्याचे रासायनिक सूत्र O3 आहे. बहुतेक ओझोन वातावरणामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 ते 40 कि.मी. पर्यंत उंचीवर असतो. या प्रदेशास स्ट्रॅटोस्फियर असे म्हणतात आणि त्यात वातावरणातील सर्व ओझोनपैकी 90% समाविष्ट असतो.

» 1913 साली चार्ल्स फॅब्रि आणि हेन्री बुइसन यांनी लावला.

» व्हिएन्ना कन्व्हेंशन (ओझोन संरक्षण) 1985 साली केले होते त्यास यावर्षी 35 वर्ष होत आहेत (अंमलबजावणी 1988)

Kargil Vijay Diwas : ४ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान काय काय घडलं?; जाणून घ्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम

टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध


आजच्याच दिवशी २१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला. त्याच निमित्ताने १९९९ च्या कारगिल युद्धात नक्की काय घडले यावर ‘लोकसत्ता डॉटकॉम’ने टाकलेली नजर…


🔰 भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते.



🔰 कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली.


🔰 टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरले.


१९९९च्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम….


🔰 म ४: कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली.


🔰 म ५ ते मे १५: या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते.


🔰 म २६: भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.


🔰 म २७: भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.


🔰 म ३१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती दिली.


🔰 जन १०: पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती.


🔰 जन १२: दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चर्चेनंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच घुसखोरांनी परत जायला हवे असे सांगितले.


🔰 जन १५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली


🔰 जन २९: भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या.


🔰 जलै ४: संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली


🔰 जलै ५: शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली


🔰 जलै ११: पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली


🔰 जलै १४: भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला


🔰 जलै २६: कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली.

निकाराग्वा: आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचा 87 वा सभासद.



♾निकाराग्वा हा आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) या सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय भागीदारीमध्ये औपचारीकपणे सहभागी होणारा 87 वा देश ठरला आहे.


♾ दशाच्या प्रतिनिधींनी 22 जुलै 2020 रोजी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात असलेल्या करारावर स्वाक्षरी केली.


🔺आतरराष्ट्रीय सौर युती (ISA) विषयी.

..


♾2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान करारनाम्याच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) कार्यक्रम हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स या देशांच्या पुढाकाराने चालू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे. भारतात हरयाणाच्या गुडगाव इथल्या राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE, गवलपहारी) येथे ISAचे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-सरकारी संघटना आहे.


♾पतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. आतापर्यंत 121 संभाव्य सदस्य देशांपैकी 87 देशांनी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात असलेल्या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यापैकी 58 देशांनी त्याला मान्यता दिली आहे.


🔺निकाराग्वा देश...


♾निकाराग्वा हा मध्य अमेरिका उपखंडातला सर्वात मोठा देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेला होन्डुरास व दक्षिणेला कोस्टा रिका हे देश, पूर्वेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे.


♾मानाग्वा ही निकाराग्वाची राजधानी आहे. कोर्डोबा हे देशाचे राष्ट्रीय चलन आहे.

दक्षिण-पश्चिम भागातल्या व्यापारी व मासेमारी करणाऱ्या जहाजांसाठी वेगवेगळी जलमार्ग यंत्रणा.


📛भारत सरकारच्या नौवहन मंत्रालयाने दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) भारतीय जलमार्गातील व्यापारी व मासेमारी करणाऱ्या जहाजांचे कार्यान्वित मार्ग वेगळे केले आहेत. नवीन मार्ग 1 ऑगस्ट 2020 पासून कार्यान्वित होतील.


📛भारताच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्याभोवती असलेला अरबी समुद्र हा एक व्यस्त समुद्री मार्ग असून या ठिकाणी मोठ्या संख्येने व्यापारी जहाजे ये-जा करीत असतात तसेच मासेमारी करणारी जहाजे देखील काम करीत असतात. यामुळे काहीवेळा अपघात घडतात; परिणामी जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान आणि पर्यावरणीय प्रदूषण होते.


♻️ठळक बाबी...


📛जलवाहतूकीची सुरक्षा व कार्यक्षमता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.


📛धडक होण्यापासून बचाव, समुद्रावरील जीवनाच्या सुरक्षेसह वाहतूकीचा प्रवाह सुलभ करणे, तसेच सागरी वातावरणाचे संरक्षण वाढविणे, या बाबी देखील यामुळे सुनिश्चित होणार.नौवहन महासंचलनालयाचे हे एक अतिशय सक्रिय व सकारात्मक पाऊल आहे, जे या प्रदेशातील नौवहनाचे कार्यक्षमतेने नियमन करणार आहे.

ध्रुवास्त्र’: नवे स्वदेशी क्षेपणास्त्र.

💠भारताने नव्या ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी निर्मित म्हणजेच मेड इन इंडिया आहे. हे क्विक रिस्पॉन्स देणारे क्षेपणास्त्र आहे.


💠'ध्रुवास्‍त्र' क्षेपणास्त्राची चाचणी ओडीशाच्या बालासोर चाचणी क्षेत्रात घेण्यात आली. ही चाचणी हेलिकॉप्टर-विना घेण्यात आली.


🔆ठळक वैशिष्ट्ये.... 


💠धरुवास्त्र क्षेपणास्त्राचा वापर भारतीय भुदलाकडील ध्रुव हेलिकॉप्टरसोबत तसेच भूमीवरून केला जाऊ शकतो.


💠या क्षेपणास्त्राचा मारा पल्ला चार किलोमीटर ते सात किलोमीटर पर्यंत आहे.


💠ह स्वयंचलितपणे मार्गक्रम करणारे म्हणजेच गाइडेड रणगाडा-भेदी क्षेपणास्त्र आहे. हे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र आहे.


💠या क्षेपणास्त्राची लांबी 1.9 मीटर आहे आणि व्यास 0.16 मीटर आहे. त्याचे वजन 45 किलोग्रॅम आहे.हे क्षेपणास्त्र 240 मीटर / सेकंद या गतीने प्रवास करू शकते.


💠सरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) यांनी तयार केलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव आधी ‘नाग’ असे होते; जे नंतर बदलण्यात आले. 


💠हलिकॉप्टरमार्फत सोडल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या आवृत्तीला “हेलीकॉप्टर-लॉंच्ड NAG (HELINA / हेलीना)” असे नाव देण्यात आले आहे.

अरुण कुमार: आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या सुरक्षा विभागाचे नवे उपाध्यक्ष.



🌼रल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक असलेले अरुण कुमार यांची पॅरिस येथे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाचे उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. UICच्या 96व्या महासभेच्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.


🌼ही नियुक्ती दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी झाली आहे म्हणजेच जुलै 2022 ते जुलै 2024 पर्यंत ते पदावर असणार.


🍂आतरराष्ट्रीय रेल्वे संघ (UIC) विषयी...


🌼आतरराष्ट्रीय रेल्वे संघ (UIC) याची स्थापना 1922 साली झाली आणि त्याचे मुख्यालय फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस या शहरात आहे. संघाची उद्दिष्टे तीन स्तरांनुसार परिभाषित केली गेली आहेत; ते आहेत –धोरणात्मक, तांत्रिक/व्यवसायिक आणि समर्थन सेवा.


🌼वर्तमानात इटलीचे जियान्लुइगी कॅस्टेली संघाचे अध्यक्ष आहेत आणि फ्रान्सिओस डेवेन्न महासंचालक आहेत.


🌼UIC संघाचा सुरक्षा विभाग रेल्वे क्षेत्रातली मालमत्ता, स्थापना आणि सुरक्षा यांच्या संबंधित सर्व बाबींसाठी विश्लेषण आणि धोरणे निश्चित करते आणि ते विकसित करण्याचे अधिकार ठेवतो. या व्यासपीठाद्वारे सदस्यांमध्ये माहितीची आणि अनुभवांची देवाणघेवाण होते आणि सुरक्षेला प्रोत्साहन दिले जाते.

मानवी चेतासंस्था



- मध्यवर्ती, परिघिय आणि स्वायत्त चेतासंस्था असे तीन प्रकार आहेत.

- मेंदू आणि मेरूरज्जू यांनी मध्यवर्ती चेतासंस्था तयार होते.


● मानवी मेंदू

- चेतासंस्थेचे नियंत्रण करणारा प्रमुख भाग

- प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन 1300 ते 1400 ग्रॅम इतके असते

- 100 अब्ज चेतापेशींपासून मेंदूची निर्मिती 

- मेंदूच्या डाव्या बाजूची कार्ये: संभाषण, लिखाण, तर्कसंगत व विश्लेषणात्मक विचार, भाषा, शास्त्र व गणित

- मेंदूच्या उजव्या बाजूची कार्ये: सर्वांगीण व प्रतिभात्मक विचार, नवनिर्मिती, कला व संगीत 

- डावी आणि उजवी बाजू एकमेकास नियंत्रीत करतात

- प्रमस्तिष्क: मोठा मेंदू

- अनुमस्तिष्क: छोटा मेंदू

- मस्तिष्कपुच्छ: सर्वात शेवटचा भाग 


● मेरूरज्जू

- त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे

- मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन करणे

- प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वयक केंद्र म्हणून कार्य करतो.

तिरंगा ध्वज



*🔮🌀कोणत्याही देशाची एकता, अखंडता आणि त्याची ओळख त्या देशाचा झेंडा असतो. असाच आपल्या देशाचा तिरंगा आहे. पण हा तयार कसा झाला ? याच्या निर्मिती मागचा विचार काय होता ? हे जाणून घेऊया....*


🔺 दशाला पहिला राष्ट्रध्वज १९०६ मध्ये तयार करण्यात आला होता. कोलकातातील बागान चौकात हा ध्वज फडकवण्यात आला होता. यात केसरी, पिवळा आणि हिरवा रंग होता. तसेच त्यात अर्ध्या उमललेल्या कमळाच्या फूलाचे चित्रही होते. सोबतच या ध्वजावर वंदे मातरम लिहिले होते. याआधीही एक ध्वज तयार करण्यात आला होता तो केवळ दोन रंगांचा होता. हा ध्वज पॅरिसमध्ये मॅडम कामा आणि त्यांच्यासोबत निर्वासित झालेल्या काही क्रांतिकारकांनी फडकवला होता.


🔺 तर हा ध्वज बर्लिनमध्येही एका संमेलनात दाखवला गेला होता. यात तीन रंग होते. तर वरच्या पट्टीवर कमळाचं फूल होतं. सोबतच सात तारेही होते. याआधी स्वातंत्र्याबाबत आपल्या भावना प्रकट करण्यासाठी १९०४ मध्ये राष्ट्रध्वज निर्माण केला होता. हा स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या सिस्टर निवेदिता यांनी तयार केला होता. बंगालच्या एका रॅलीमध्ये या ध्वजाचा वापर करण्यात आला होता. नंतर नवीन राष्ट्रध्वज १९१७ मध्ये समोर आला. यात ५ लाल आणि ४ हिरव्या रंगांच्या पट्ट्या होत्या. तसेच त्यात तारेही होते. हा ध्वज डॉ. एनी बेझेंट आणि लोकमान्य टिळक यांनी एका आंदोलनादरम्यान तयार केला होता.


🔺 भारतीय राष्ट्रध्वजाचा मुख्य प्रवास १९२१ मध्ये तेव्हा सुरु झाला जेव्हा महात्मा गांधी यांनी देशासाठी ध्वजाचा विषय काढला. आणि त्यावेळी ध्वज पिंगली वैंकय्या यांनी तयार केला होता. यात केवळ लाल आणि हिरवा असे दोन रंग होते. ध्वजाच्या मधे पांढरा रंग आणि चरखा जोडण्याची सूचना गांधीजींनी लाला हंसराज यांच्या सल्ल्यानुसार दिली होती. पांढरा रंग ठेवल्याने सर्वधर्म समभाव आणि चरख्याने ध्वजाला स्वदेशीची प्रतिमा मिळाली. त्यानंतर ध्वजामध्ये काही बदल करण्यात आले. हा ध्वज आधी अखिल भारतीय कॉंग्रेससाठी तयार करण्यात आला होता. नंतर राष्ट्रीय ध्वज १९३१ मध्ये तयार करण्यात आला होता. हा राष्ट्रीय ध्वज तयार करण्यासाठी एक प्रस्ताव पारित करण्यात आला होता. गांधीजींच्या संशोधनानंतर यात केसरी, पांढरा आणि हिरवा रंग आणि चरख्याच्या जागी अशोक चक्र ठेवण्यात आला. २२ जुलै, १९४७ रोजी संविधान समितीने भारताचा राष्ट्रध्वज निश्चित केला.


🔰धवजातील रंगांचा अर्थ🔰


📌 भगवा किंवा केशरी रंग हे त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. 

📌 पांढरा रंग प्रकाश, शांती आणि सत्याची भावना व्यक्त करणारा आहे.

📌 तर, हिरवा समृद्धी आणि निसर्गाचे भूमीशी असलेले नाते व्यक्त करणारा रंग आहे. 

📌 तयाचप्रमाणे झेंड्यातील मधले निळे अशोकचक्र हे सागराची अथांगता आणि कालचक्राचे द्योतक आहे. हे अशोकचक्र म्हणजे जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले धम्मचक्र आहे.


🔰राष्ट्रध्वजासंबंधी नियम🔰


💥भारताचा राष्ट्रध्वज कसा असावा, कसा वापरावा आणि कधी वापरावा यासंदर्भात भारतीय घटनेने काही नियम ठरविले आहेत.


*–    भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे.*


*–    राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे*.


*–    ध्वज फडविताना तो सगळ्यांना दिसेल अशा सन्मानपूर्वक उच्च स्थानावरून फडकविला जावा*


*–    शासकीय इमारतींवर कोणत्याही हवामानात तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकत राहावा व सूर्यास्तानंतर उतरविताना बिगूल वाजवून अगदी हळूहळू आदरपूर्वक उतरविला जावा*


*–    केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनादिवशीच तो फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो*


*–    राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.*🔙🙏👍🌹


काही महत्त्वाची पुस्तके आणि लेखक


आयोगाच्या कोणत्याही परीक्षेत एक तरी प्रश्न पुस्तकावर नेहमीच असतो.


The becoming - मिशेल ओबामा

Healed -मनीषा कोईराला

India after Modi -अजय गुडावर्थी

I do what I do -रघुराम राजन

The third pillar -रघुराम राजन

Every vote counts -नवीन चावला

India in distress -ममता बॅनर्जी

The republican ethic -रामनाथ कोविंद

लोकतंत्र के स्वर -रामनाथ कोवींद

Electronic voting machine -आलोक शुक्ला

Bad man - गुलशन ग्रोव्हर

The best thing about you is you -अनुपम खेर

Lessons life taught me unknowingly -अनुपम खेर

My life my lessons -बाबा रामदेव

We are displaced -मलाला युसुफजाई

Indian fiscal federalism -Y V Reddy आणि G R Reddy

Whispers of time -कृष्णा सक्सेना

Six machine  क्रिस गेल

Straight task -अभिषेक मनु सिंघवी

Citizen delhi -शीला दीक्षित

The assassination of mahatma Gandhi-एम एस स्वामिनाथन

40 years of sportstar -पी व्ही सिंधू

Mind matter -विश्वनाथन आनंद

Unseen,unheard,unsaid - भरत वटवाणी

Let me say it now - राकेश मारिया

Who killed the sunderbans -तुषार कांजीलाल

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी भारताचा अमेरिका, फ्रान्स, जर्मनी यांच्यासोबत ‘एअर बबल’ करार

कोविड-19 महामारीमुळे बंद पडलेल्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेला काही निवडक देशांसाठी पुन्हा चालू करण्याच्या उद्देशाने भारताने संयुक्त राज्ये अमेरिका, फ्रान्स, जर्मनी या देशांच्या सोबत द्विपक्षीय ‘एअर बबल’ करार केले आहेत.


🔸महामारीमुळे बंद पडलेल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा क्षेत्राला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे लवकरात लवकर विमान सेवा सुरु कारण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीबरोबर करार करून या देशांमध्ये विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.


ठळक बाबी


🔸टाळेबंदीनंतर प्रथमच भारत-अमेरिका विमानसेवा सुरु झाली आहे. 18 जुलैपासून फ्रान्ससोबत हवाई सेवा सुरू होणार आहे.


🔸‘एअर बबल’ करारानुसार ठरलेल्या कालावधीतच निश्चित विमानसेवा पूर्ण करावयाच्या असतात. 


🔸अमेरिका आणि भारत यांच्यात 17 ते 31 जुलै 2020 या कालावधीत 18 विमानांची उड्डाणे निश्चित झाली आहेत. 


🔸ही उड्डाणे दिल्ली ते न्यूयॉर्क आणि दिल्ली ते सॅन फ्रॅन्सिस्को दरम्यान होतील. यासह एअर फ्रान्स दिल्ली, मुंबई, बंगळुरू पॅरिस दरम्यान 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत 28 विमानाचे उड्डाण करणार आहे.


🔸तसेच ब्रिटनसोबत हवाईसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना

♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.


♦️ सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.


♦️राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.


♦️तयामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.


♦️कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.

जालियनवाला बाग हत्याकांड



🔷पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती.


🔷1919 साली भारतीय जनतेतील वाढता असंतोष दडपण्याबाबत उपाययोजना रौलेट समितीने सुचवली.


🔷 तयानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटला न चालवता स्थानबदध करण्याचा अधिकार शासनास मिळाला.


🔷गांधीजीनी या काळया कायदयाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनतेला 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.


🔷 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरप्रणीत जालियनवाला बागेतील हत्याकंड घडले.


🔷या घटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी ब्रिटिश शासनाशी असहकार करण्याचा निर्धार व्यक्त केला. 


🔷 रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला.


वत्तपत्रे व संक्षिप्त माहिती



🔷दिग्दर्शन:


 श्रीरामपूर मिशनच्या विल्यम कॅरी  आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १८१८ मध्ये सुरु केले.


🔷समाचार दर्पण:  


२३ मे १८१८ रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरु केले. देशी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान त्याच्याकडे जातो.


🔷सोमप्रकाश: 


पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५८ पासून चालू झाले. द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचे संपादक होते.


🔷तत्त्वबोधिनी पत्रिका: 


देवेंद्रनाथ टागोर  यांच्या तत्त्वबोधिनी सभेचे तत्त्वबोधिनी पत्रिका हे मासिक.


🔷सलभ समाचार :


 केशवचंद्र सेन (१८७८)

रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे



 (जन्म: इ.स. १८४८; मृत्यू : ९ फेब्रुवारी, इ.स. १८९७) 


🌱ह एक भारतीय कामगार पुढारी होते.


नारायण मेघाजींचे मूळ गाव  पुणे जिल्ह्यातील सासवडजवळचे कन्हेरसर. 

🌱माळी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले. 

सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली.


 तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात, दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुटीही मिळत नसे; परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले.

 त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. त्यांनी बाँबे मिल हँड्‌स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापली. 

ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते.


🌱 इ.स.च्या १९व्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात.


🌱लोखंडे हे महात्मा फुल्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. 

तसेच सत्यशोधक चळवळीतली त्यांची कामगिरीही महत्त्वपूर्ण मानली जाते.


🌱लोखंडे यांच्या पत्‍नीचे नाव गोपिकाबाई व मुलाचे नाव गोपीनाथ असे होते.


🍀🍀पत्रकारिता 🍀🍀


इ.स. १८८० मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले.

🌱 ह नियतकालिक शेतकरी-कामकरी वर्गाची बाजू हिरिरीने मांडे; त्यांच्या हालअपेष्टांना, दुःखाला वाचा फोडून सरकाचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे. 

लोखंडे यांनी गुराखी या नावाचे एक दैनिकही काढले होते.


🌱सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, मागासलेल्यांना नोकरीत प्रवेश, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांना जंगलच्या कायद्यामुळे होणारा त्रास, विधवांच्या केशवपनास बंदी वगैरे अनेक प्रश्नांना लोखंडे यांनी दीनबंधूमधून वाचा फोडली.

 रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज दीनबंधूने उठविला.


🍀परस्कार आणि सन्मान 🍀


लॉर्ड लॅन्सडाऊन च्या काळात मुंबईत १८९३ मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्याचे काम नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले. 

या कामगिरीबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी बहाल केली.


ब्रिटिश सरकारने लोखंडे यांनी कामगारांसाठी केलेल्या कामगिरीची दखल देऊन त्यांना ‘जे.पी.’ (जस्टिस ऑफ पीस) हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.


🍀पलेगने मृत्यू 🍀


मुंबईत इ.स. १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. याही वेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेगग्रस्तांसाठी एक ‘मराठा इस्पितळ’ काढले; परंतु दुर्देवाने लोखंडे यांनाच प्लेगने पछाडले व त्यातच त्यांचा अंत झाला.

बरिटिशकालीन शिक्षण



♦️चार्ल्स वुडचा खलिता -1854



♦️कोणत्या अहवालाला "Magnacarta of English education in india " असे म्हणतात.

= चार्ल्स वुड



♦️मबई, कोलकाता, आणि मद्रास येथे केव्हा विद्यापीठे स्थापन झाली.

=इ स 1857



♦️कोणी कलकत्ता येथे स्वखर्चाने 'बेथ्यून कॉलेज' काढले.

= लॉर्ड डलहौसी



♦️हटर आयोग स्थापन.

= 1882



♦️भारतात मुद्रणकलेची सुरुवात कोठे झाली.

= गोवा


♦️मद्रण कलेचा प्रसार करण्याचे श्रेय कोणाला जाते?

= डॉ, कॅरे



♦️महाराष्टात ख्रिश्चन मिशऱ्यानी ग्रंथ छपाई केव्हा सुरू केली?

= इ स 1810

गोपाळ हरी देशमुख

▶️ रव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया‘ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इ.स.१८४२मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हिंदुस्थानचा इतिहास ‘हे पुस्तक लिहिले.

 पुस्तकाचे प्रकाशन मात्र इ.स.१८७८मध्ये झाले.


 ➡️ इ.स. १८४८ पासून त्यांनी मुंबईहून निघणाऱ्या प्रभाकर या साप्ताहिकात(संपादक :भाई महाजन), लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. त्या नावाने त्यांचा पहिला लेख त्या वर्षी १२मार्च रोजी प्रसिद्ध झाला. लेखाचा विषय होता..’इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या गैरसमजुती’. याशिवाय, लोकहितवादींनी ‘एक ब्राह्मण‘ या नावानेही लिखाण केले आहे. त्या काळी लहान वयातच लग्न करून द्यायची प्रथा होती. लहान वयातील लग्नामुळे काय अडचणी होतात हे त्यांनी प्रभाकरमध्ये पत्र लिहून लोकांच्या नजरेस आणले. पुढील काळात त्यांनी अनेक समस्यांबाबत, विविध विषयांवर पत्रद्वारा लेखन केले.


इ.स. १८४८ ते इ.स. १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले.


▶️ हच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला. लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. लोकहितवादी हे एकोणिसाव्याशतकाच्या पूर्वाधातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ञ. 

▶️‘ लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. "मातृभाषेतून शिक्षण" या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला.


मराठीप्रमाणेच त्यांनी गुजरातीतही लिखाण

रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी



(फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - ९ ऑक्टोबर इ.स. १८९२)

.इ स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. 

प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. .

 भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुटें हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली

१६ सप्टेंबर २०२०

वाचा :- महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने



1) गाडगे महाराज - अमरावती

2) समर्थ रामदास- सज्जनगड

3) संत एकनाथ - पैठण

4) गजानन महाराज - शेगाव

5) संत ज्ञानेश्वर - आळंदी

6) संत गोरोबा कुंभार - ढोकी

7) संत चोखा मेळा - पंढरपूर

8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी

9) संत तुकडोजी  - मोझरी

10) संत तुकाराम - देहू

11) साईबाबा - शिर्डी

12) जनार्दन स्वामी - कोपरगाव

13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर

14) दामाजी पंत - मंगळवेढा

15) श्रीधरस्वामी - पंढरपूर

16) गुरुगोविंदसिंह - नांदेड

17) रामदासस्वामी - जांब

18) सोपानदेव - आपेगाव

19) गोविंदप्रभू - रिधपुर

20) जनाबाई - गंगाखेड

21) निवृत्तीनाथ - आपेगाव

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

1.  आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे मुख्यालय कुठे आहे?

(A) बिजींग, चीन✅
(B) जिनेव्हा, स्वित्झर्लंड
(C) शांघाय, चीन
(D) टोकियो, जापान

2.  जुलै 2019 मध्ये हुसेन मुहम्मद इरशाद यांचा मृत्यू झाला. ते ____ या देशाचे माजी राष्ट्रपती होते.

(A) अफगाणिस्तान
(B) इराक
(C) बांग्लादेश✅
(D) सौदी अरब


3.  कोणत्या खेळाडूने विक्रमी सहाव्यांदा ब्रिटिश ग्रँड प्रिक्स ही शर्यत जिंकली?

(A) वल्टरी बोटास
(B) सेबेस्टियन व्हेटेल
(C) मॅक्स वर्स्टपेन
(D) लेविस हॅमिल्टन ✅


4.  लॅटीशा चॅन आणि इवान डोडिग यांनी 2019 विम्बल्डन स्पर्धेच्या मिश्र गटाचे विजेतेपद जिंकले. चॅन हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

(A) चीन
(B) जापान
(C) तैवान ✅
(D) क्रोएशिया


5.  कुसुम योजनेचा उद्देश काय आहे ?

(A) सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे  ✅

(B) वस्त्र उद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवणे

(C) शालेय पोषण स्तराची सुधारणा

(D) स्वच्छ इंधन पुरवठा करणे


6.   मेक्सिको देशाचा सर्वोच्च पुरस्कार Mexican Order of Aztec Eagle देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले?

(A) रतन टाटा

(B) डॉ. रघुपती सिंघानीया  ✅

(C) पृथ्वीराज सिंह ओबरॉय

(D) आनंद महिंद्रा


7. भारतातील पहिले ऊर्जा सल्लागार केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे ?

(A) आयआयटी मद्रास

(B) आयआयटी मुंबई

(C) आयआयटी कानपूर ✅

(D) आयआयएम अहमदाबाद



8.  जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या दलित पँथर या सामाजिक संघटनेच्या सहसंस्थापकाचे नाव काय होते?

(A) नामदेव ढसाळ
(B) जे. व्ही. पवार
(C) अरुण कांबळे
(D) राजा ढाले ✅


9.  15 जुलै रोजी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेनी कोणत्या बँकेला 7 कोटी रुपयांचा दंड ठोठावला?

(A) बँक ऑफ महाराष्ट्र
(B) पंजाब नॅशनल बँक
(C) भारतीय स्टेट बँक ✅
(D) कॅनरा बँक


10.    2020 साली रायफल / पिस्तूल / शॉटगन या प्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) विश्वचषक कुठे खेळवला जाणार आहे?

(A) नवी दिल्ली ✅
(B) महाराष्ट्र
(C) पश्चिम बंगाल
(D) गोवा


11.  कोणत्या व्यक्तीची सिंगापूर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्ट (SICC) याचे आंतरराष्ट्रीय न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली गेली आहे?

(A) दिपक मिश्रा
(B) ए. के. सिक्री ✅
(C) मदन लोकुर
(D) टी. एस. ठाकुर


12.   भारतातल्या महिलांना डिजिटल कृतींचा अवलंब करण्यास आणि डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी GSMAच्या ‘कनेक्टेड विमेन’ या उपक्रमासोबत ____ ने भागीदारी केली.

(A) BSNL
(B) एअरटेल
(C) रिलायन्स जियो ✅
(D) व्होडाफोन


13.   जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या आसामी साहित्यकाराचे नाव काय होते?

(A) इंदिरा गोस्वामी
(B) माहीम बोरा
(C) पुरोबी बोर्मूदेय ✅
(D) यापैकी नाही


14.  कोणत्या व्यक्तीची हिमाचल प्रदेश राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नेमणूक केली गेली?

(A) आचार्य देवव्रत
(B) कलराज मिश्रा ✅
(C) केशरी नाथ त्रिपाठी
(D) कल्याण सिंग

गणितातील महत्वाची सूत्रे



● a×a = a2

● (a×b) + (a×c) = a (a+c)

●  a × b + b= (a+1) × b

● (a+b)2 = a2 + 2ab + b2

● (a-b)2 = a2 + 2ab + b2

● a2-b2 = (a+b) (a-b)

● a2-b2 / a+b = a-b a2-b2/a-b = a+b

● (a+b)3 / (a+b)2 = a+b (a+b)3 / (a-b) = (a+b)2

● (a-b)3 / (a+b)2 = (a-b) (a-b)3 / (a-b) = (a+b)2

● a3 – b3 = (a-b) (a2 + ab+ b2)

● a × a × a = a3

● (a×b) – (a×c) = a (b-c)

● a × b- b = (a-1) × b ;

● :: a2 + 2ab + b2 / a+b = (a+b)

● :: a2 – 2ab + b2 / a-b = (a-b)

● (a+b)3 = a3 + 3a2b + 3ab2 + b3

● (a-b)3 = a3 – 3a2b + 3ab2 + b3

●  a3 + b3 = (a+b) (a2-ab+b2)

● :: a3+b3 / a2-ab+b2 = (a-b)

भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे


● अन्नागुडई - 2695 - केरळ

●  दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू

●  गुरुशिखर - 1722 - राजस्थान

●  कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र

●  महेंद्रगिरी - 1501 - ओडिसा

●  मलयगिरी - 1187 - ओडिसा

●  पूर्वघाट लांबी - 1,097 कि.मी.

● पश्चिम घाट लांबी - 1,700 कि.मी.

भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे


● अन्नागुडई - 2695 - केरळ

●  दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू

●  गुरुशिखर - 1722 - राजस्थान

●  कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र

●  महेंद्रगिरी - 1501 - ओडिसा

●  मलयगिरी - 1187 - ओडिसा

●  पूर्वघाट लांबी - 1,097 कि.मी.

● पश्चिम घाट लांबी - 1,700 कि.मी.

शिखरे (महाराष्ट्रातील) (उंचीनुसारक्रम) :



शिखर ———–ऊंची ———जिल्हा

कळसूबाई—-1646मी. ——अहमदनगर

साल्हेर ——1567मी.—— नाशिक

महाबळेश्वर –1438मी.—— सातारा

हरिश्चंद्रगड –1424मी. ——-नगर

सप्तश्रुंगी —-1416मी.——- नाशिक

तोरणा——-1404मी.——- पुणे

अस्तंभा ——   –    ———नंदुरबार

त्र्यंम्बकेश्वर- 1304मी.——- नाशिक

तौला ——-1231मी. ——–नाशिक

बैराट ——1177मी. ——–गविलगड टेकड्या अमरावती

चिखलदरा –1115मी.——– अमरावती

हनुमान—- 1063मी.——— धुळे

General Knowledge



● ‘अमृत’ योजनेच्या कामगिरीविषयी 2020 सालाच्या मानांकन यादीत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला?

*उत्तर* : ओडिशा

● तरूणांना सॉफ्ट कर्ज व अनुदान देण्यासाठी “कर्म साथी प्रकल्प” ही योजना कोणत्या राज्य सरकारने राबविण्यास सुरूवात केली?

*उत्तर* : पश्चिम बंगाल

● वैमानिक-रहीत विमानाच्या संयुक्त विकासासाठी कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेसोबत कोणत्या संस्थेनी करार केला?

*उत्तर* : भारत अर्थ मूव्हर्स मर्यादित (BEML)

● डिजिटल छायाचित्रकारितेचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखले जाते?

*उत्तर* : रसेल किर्श

● स्वदेशीकरणाला चालना देण्याच्या हेतूने संरक्षण उत्पादन विभागाने कोणते डिजिटल व्यासपीठ तयार केले आहे?

*उत्तर* : “सृजन / SRIJAN” नामक एक ‘वन स्टॉप शॉप’

● महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “ओरुणोदोई” योजना कोणत्या राज्यात लागू करण्यात आली?

*उत्तर* : आसाम

● लष्करी व निमलष्करी व्यवसायिकांसाठी “शौर्य KGC कार्ड” नामक एक कृषीकर्ज साधन कोणत्या बँकेनी सादर केले?

*उत्तर* : HDFC (गृहनिर्माण विकास व वित्त निगम)

● ‘यलो चेन’ नामक एक ई-वाणिज्य मंच कोणत्या राज्याने कार्यरत केला?

*उत्तर* : नागालँड

● सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक झाली आहे?

*उत्तर* : राकेश अस्थाना

● ‘स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2020’ ही फॉर्म्युला वन शर्यत कोणत्या व्यक्तीने जिंकली?

*उत्तर* : लेविस हॅमिल्टन

● नुकतेच निधन झालेले पंडित जसराज यांना कोणत्या साली 'पद्म विभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले होते?

*उत्तर* : 2000 साली

● एखाद्या जिल्ह्याचे किंवा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याला कोणते मंत्रालय मान्यता देते?

*उत्तर* : गृह मंत्रालय

● महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण क्षेत्राविषयी महिलांना कौशल्य प्रदान करण्यासाठी 1 दशलक्ष युरो एवढी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाचा आरंभ कोणत्या संस्थेनी केला?

*उत्तर* : युरोपीय संघ

● जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?

*उत्तर* : इजाई

● ‘पढाई तुहार परा’ योजना कोणते राज्य सरकार राबवित आहे?

*उत्तर* : छत्तीसगड सरकार

● “वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड” (OSOWOG) या उपक्रमाच्या अंतर्गत एकाच पॉवर ग्रीडद्वारे किती देशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे?

*उत्तर* : 140 देश

● ‘वंदे भारत मिशन’ या अभियानाचा उद्देश काय?

*उत्तर* : 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणणे.

● येस बँकेनी UDMA टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने कोणते  मोबाइल अ‍ॅप एक डिजिटल वॉलेट सुविधा म्हणून सादर केले.

*उत्तर* : ‘युवा पे’

● भारतीय हवामान विभाग (IMD) याचे वर्तमान महानिदेशक कोण आहे?

*उत्तर* : डॉ. मृत्युंजय महापात्रा

● MSME मंत्री नितीन गडकरी यांनी ‘CGSSD’ योजनेचे उद्घाटन केले. त्या CGSSD याचे पूर्ण नाव काय?

*उत्तर* : Credit Guarantee Scheme for Sub-ordinate Debt

● NASA संस्थेच्या मुख्यालय इमारतीचे नाव कोणाच्या नावावरून ठेवले जाणार आहे.

*उत्तर* : मेरी जॅक्सन (प्रथम आफ्रिकी- अमेरिकी महिला अभियंता)

● फ्लिपकार्टचे माजी सह-संस्थापक सचिन बन्सल यांनी स्थापना केलेल्या ‘वित्तीय सेवा’ स्टार्टअप उद्योगाचे नाव काय?

*उत्तर* : “नावी”

● ‘आसाम वायू गळती’ या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत?

*उत्तर* : न्यायमूर्ती बी. पी. कटाके

● ‘2023 फिफा महिला विश्वचषक’ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?

*उत्तर* : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

● ‘स्वदेशी मायक्रोप्रोसेसर चॅलेंज’ कार्यक्रमाचा आरंभ कोणत्या मंत्रालयाच्यावतीने करण्यात आला?

*उत्तर* : इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

● “औषध तारा” नामक किटाणूरोधी पोशाख कोणत्या संस्थेनी तयार केला?

*उत्तर* : डिफेंस इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी

● “लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज” नामक डिजिटल उपक्रमाचा आरंभ कोणत्या बँकेच्यावतीने करण्यात आला?

*उत्तर* : यस बँक

● भारतीय भुदलाने चाचणी घेतलेल्या ‘पिनाका’ अग्निबाणाची निर्मिती कोणत्या कंपनीने केली?

*उत्तर* : इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड

● ‘दहशतवाद पीडितांना श्रद्धांजली व स्मृतिचा आंतरराष्ट्रीय दिन’ कोणत्या दिवशी पाळला जातो?

*उत्तर* : 21 ऑगस्ट

● ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ क्रमवारीमध्ये कोणत्या शहराला प्रथम क्रमांक देण्यात आला?

*उत्तर* : इंदूर

● ‘NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड’ कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती कोणाची करण्यात आली?

*उत्तर* : रितेश शुक्ला

● 'ट्रायफूड' प्रकल्प कोणत्या मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येत आहे?

*उत्तर* : आदिवासी कल्याण मंत्रालय

● भारतीय खते संघ, दक्षिण विभाग (FAI SR) याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

*उत्तर* : किशोर रुंगटा

Q1) शांघाय सहकार्य संघटना (SCO) 2020 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक कोठे नियोजित आहे?
-- मास्को ( रशिया )

Q2) कोणत्या व्यक्तीच्या नावाची शिफारस भारतीय स्टेट बँकेचे (SBI) नवे अध्यक्ष म्हणून बॅंक बोर्ड ब्युरो कडून करण्यात आली?
-- दिनेश कुमार खारा

Q3) भारतात ‘राष्ट्रीय क्रिडा दिन’ कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो?
-- मेजर ध्यानचंद ( 29 ऑगस्ट )

Q4) कोणत्या राज्य सरकारने ‘प्रतीक्षा’ नामक पहिली सागरी रुग्णवाहिका कार्यरत केली?
-- केरळ

Q5) राजीव गांधी खेळ रत्न क्रिडा पुरस्कारांची रक्कमेत किती वाढ करण्यात आली आहे?
-- 25 लक्ष रुपये ( अगोदर 7.5 लक्ष होती )

Q6) कोणत्या दिवशी तेलुगू भाषा दिन साजरा केला जातो?
-- 29 ऑगस्ट

Q7) कोणत्या कालावधीत ‘एरो इंडिया’ प्रदर्शनी आयोजित केली जाणार आहे?
--  3 ते 5 फेब्रुवारी 2021

Q8) कोणत्या देशाने ‘झार बॉम्ब’ तयार केला?
--  रशिया

Q9) कोणत्या शहरातल्या बंदरावर प्लास्टिकचा कचरा हाताळण्यासाठी एक सुविधा ऑगस्ट 2020 या महिन्यात कार्यरत करण्यात आली?
-- कोची

Q10) कोणत्या देशात ‘2021 BRICS खेळ’ या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे?
-- भारत

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

 Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

● यंदाची जागतिक नारळ दिनाची संकल्पना काय होती?
*उत्तर* : इन्व्हेस्ट इन कोकोनट टू सेव्ह द वर्ल्ड

● गेल्या सात वर्षात ग्रँड स्लॅम एकेरीतला मुख्य सामना जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला?

*उत्तर* :  सुमित नागल

● ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020’च्या क्रमवारीत भारताचा क्रमांक काय आहे?

*उत्तर* : 48वा

● गुगल कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रावर आधारित पूराविषयी पूर्वानुमानसाठी कोणत्या देशासोबत भागीदारी करार केला?

*उत्तर* : बांगलादेश

● कोणत्या अक्षय ऊर्जा कंपनीला क्षमतेच्या बाबतीत जगातली प्रथम क्रमांकाची सौर कंपनी ठरविण्यात आले आहे?

*उत्तर* : अदानी ग्रीन

● एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ योजनेत सामील झाला असून तो योजनेत समाविष्ट होणारे कोणते राज्य वा केंद्रशासित प्रदेश 26 वा ठरले आहे?

*उत्तर* : लडाख आणि लक्षद्वीप

● ‘वॉटर हीरोज कॉन्टेस्ट 2.0’ कार्यक्रमाचा आरंभ कोणत्या मंत्रालयाच्यावतीने करण्यात आला?

*उत्तर* : जलशक्ती मंत्रालय

● केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘जम्मू व काश्मीर अधिकृत भाषा विधेयक 2020’ याला मंजुरी दिली असून याद्वारे कोणत्या 5 अधिकृत भाषा निश्चित केल्या आहेत.

*उत्तर* : उर्दू, काश्मिरी, डोगरी, हिंदी आणि इंग्रजी

● हरितक्षेत्र सुरक्षित राखण्यासाठी कोणत्या राज्याने राज्यातले ‘आय रखवाली’ नामक मोबाइल अॅप तयार केले?

*उत्तर* : पंजाब

● गिझाच्या पिरॅमिडच्या आकारापेक्षा दुप्पट असलेला कोणता लघुग्रह 6 सप्टेंबर 2020 रोजी पृथ्वीच्या जवळून गेला?

*उत्तर* : 465824 2010 FR

● जी-20 सदस्य राष्ट्रांच्या शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे यजमानपद कोणत्या देशाने भूषवित होते?

*उत्तर* : सौदी अरब

● ISROच्या कोणत्या मोहीमेने पृथ्वीच्या वातावरणाचा चंद्रावर होणारा संभाव्य परिणाम स्पष्ट करणारे पुरावे दिले आहेत?

*उत्तर* : चंद्रयान 1

● भारतीय संरक्षण मंत्रीची अफगाणिस्तान व द्विपक्षीय सहकार्य तसेच प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी कोणत्या देशासोबत बैठक झाली?

*उत्तर* : इराण

● “बॅक टु व्हिलेज” कार्यक्रमाचा तिसरा टप्पा कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात येणार आहे?

*उत्तर* : जम्मू व काश्मीर

● RBIच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, प्राधान्य क्षेत्राच्या अंतर्गत वित्तसहाय्य मिळविण्यासाठी स्टार्टअप उद्योगासाठी उलाढालीची मर्यादा किती आहे?

*उत्तर* : 50 कोटी रुपये

● 'द स्टेट ऑफ यंग चाईल्ड इन इंडिया' अहवालात मुलांची काळजी घेण्यासंबंधी तयार केलेल्या यादीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे?

*उत्तर* : केरळ

● 30 नोव्हेंबर 2020 रोजी शांघाय सहकार्य संघटना (SCO) सरकारांच्या प्रमुखांच्या शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे?

*उत्तर* : भारत

● यूएस-इंडिया स्ट्रेटजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) च्या तृतीय वार्षिक शिखर परिषदेची संकल्पना काय होती?

*उत्तर* : यूएस-इंडिया नेव्हिगेटिंग न्यू चॅलेंजस

● जगातले सर्वात मोठे नौदल कोणत्या देशाकडे असल्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली?

*उत्तर* : चीन

● साऊथ इंडियन बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली?

*उत्तर* : मुरली रामकृष्णन

● 2020 या वर्षाच्या ‘जी-20 परराष्ट्र मंत्र्यांची असाधारण बैठक’चे यजमानपद कोणत्या देशाकडे होते?

*उत्तर* : सौदी अरब

● भारतीय रिझर्व्ह बँकेनी कोणत्या बँकिंग कंपनीच्या कामकाजावर प्रतिबंध आणले आहेत?

*उत्तर* : आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक

● भारतीय रेल्वे मंडळाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती झाली?

*उत्तर* : विनोदकुमार यादव

● ‘टाइम्स हायर एज्युकेशन (THE) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज 2021’ या मानांकन यादीत 301-350 या क्रम श्रेणीत कोणत्या भारतीय संस्थेला स्थान मिळाले?

*उत्तर* : भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू

● दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या कितव्या शनिवारी ‘जागतिक प्रथमोपचार दिन’ साजरा करतात?

*उत्तर* : दुसऱ्या शनिवारी

● सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (MSME) विकासासाठी भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) सोबत कोणत्या राज्य सरकारने भागीदारी करार केला?

*उत्तर* : राजस्थान

● भारतातल्या सर्वात मोठ्या “पिगेरी अभियान”चा आरंभ कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाने केला?

*उत्तर* : मेघालय

● “हवामानदृष्ट्या स्मार्ट शहर मूल्यांकन आराखडा 2.0” (CSCAF 2.0) कार्यक्रमाचा आरंभ कोणत्या मंत्रालयाने केला?

*उत्तर* : गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालय

● स्वच्छता कामगारांसाठी 'गरिमा' योजना कोणत्या राज्यात लागू करण्यात आली आहे?

*उत्तर* : ओडिशा

● सप्टेंबर-2020 महिन्यात इस्रायलसोबत संबंध सामान्य करण्याला कोणत्या अरबी देशाने सहमती दिली?

*उत्तर* : बहरीन

● ब्रिटनने ब्रेक्जिट घटनेनंतरच्या व्यापारासंबंधी पहिला मोठा करार कोणत्या देशासोबत केला?

*उत्तर* : जपान

● ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सीज’ (CBDCs) तपासणी मंच’ कोणत्या संस्थेनी तयार केला?

*उत्तर* : मास्टरकार्ड

Online Test Series

१५ सप्टेंबर २०२०

लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या.



🧩लोकसंख्या :

1. 600 ते 1500 - 7 सभासद

2. 1501 ते 3000 - 9 सभासद

3. 3001 ते 4500 - 11 सभासद

4. 4501 ते 6000 - 13 सभासद

5. 6001 ते 7500 - 15 सभासद

6. 7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद

🅾️निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.

🅾️कार्यकाल - 5 वर्ष

🅾️विसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.

🧩आरक्षण :

1. महिलांना - 50%

2. अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात

3. इतर मागासवर्ग - 27% (महिला 50%)

भारतीय वित्तीय व्यवस्था.


🅾️कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास त्या देशातील वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो.
V
🅾️विकसित अर्थव्यवस्थेतील वित्तीय व्यवस्था विकसित असते. उलटपक्षी, वित्तीय व्यवस्था न्यूनविकसित असल्यास अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेस मर्यादा येतात.

🧩अर्थ -

🅾️वयापक दृष्टीने, वित्त म्हणजे कर्जाने दिला-घेतला जाणारा पैसा होय. अशा वित्ताची गरज व्यक्ती, कुटुंबे, व्यापारी, व्यावसायिक, उद्योगपती, शेतकरी तसेच, विविध सरकारे इत्यादींना असते.

🅾️ उदा. व्यक्ती व कुटुंबांना वित्ताची गरज दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तसेच गृह बांधणीसाठी असते.

🅾️ वयापर्‍यांना वित्ताची गरज आपला माल विकत घेण्यासाठी तसेच, साठवण्यासाठी असते. तर, उद्योगपतींना आपल्या स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी वित्त आवश्यक असते.

🅾️ सरकारला सुद्धा आपला चालू खर्च भागविण्यासाठी विकासात्मक कार्यासाठी तसेच, युद्धसज्जतेसाठी पैशाची आवश्यकता असते.

🅾️ अशा विविध कारणांसाठी वापरण्यात येणार्‍या वित्ताच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणार्‍या व्यवस्थेस 'वित्तीय व्यवस्था' (Financial System) असे म्हणतात.

💠💠भारतीय वित्तीय व्यवस्थेची रचना.💠💠

🅾️ वित्ताच्या कालावधीनुसार भारतीय वित्तीय व्यवस्थेचे दोन भाग पडतात. 

1. भारतीय नाणे बाजार -

🅾️ वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात अल्पकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला नाणे बाजार असे म्हणतात.

🅾️ नाणे बाजारात कर्ज व्यवहार 1 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी होतात. मात्र, कृषीसाठी हा अल्प कालावधी 15 ते 18 महिन्यांपर्यंतचा असू शकतो.

🅾️भारताच्या नाणे बाजारात असंघटित क्षेत्राचा तसेच, संघटित क्षेत्राचा समावेश होतो.

🅾️ असंघटित क्षेत्रात सावकार, सराफी पेढीवाले तसेच, बँकेतर वित्तीय संस्थांचा समावेश होतो. 

🅾️ सघटित क्षेत्रात व्यापारी बँकांचा समावेश होतो. त्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच, परकीय बँकांचा समावेश होतो. 

2. भारतीय भांडवल बाजार -

🅾️वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात मध्यम तसेच दीर्घकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला भांडवल बाजार असे म्हणतात. 

🅾️भांडवल बाजारात 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीचे कर्ज व्यवहार होतात. साधारणत: 5 वर्षापर्यंतच्या कालावधीला मध्यमकालीन तर त्यापेक्षा जास्त 20-25 वर्षापर्यंतच्या कालावधीला दीर्घ-कालीन समजले जाते. 

🅾️ भारतीय भांडवल बाजारात वित्त पुरवठा करणार्‍या व इतर वित्तीय सेवा प्रदान करणार्‍या संस्थांमध्ये खालील संस्थांचा समावेश होतो. 

1. व्यापारी बँका

2. विकास वित्तीय संस्था. उदा. IFCI, IDBI, ICICI, SFCs, SIDCs, इ.

3. विकास कंपन्या - LIC आणि GIC.

4. मर्चंट बँका.

5. म्युचुअल फंड्स - UTI

6. पतदर्जा ठरविणार्‍या संस्था CRISIL, CARE, ICRA

🅾️ तसेच, भांडवल बाजारात कर्ज घेणार्‍यांना (ऋणको) व कर्ज देणार्‍यांना (धनको) एकत्र आणणारे रोखे बाजार (Stock exchanges) व त्यातील दलाल महत्वाची भूमिका पार पाडतात. 

🅾️भारतात बँक व्यवसायाचे अस्तित्व प्राचीन काळापासूनच असले तरी आधुनिक बँक-व्यवसाय मात्र ब्रिटिश काळापासूनच सुरू झाला.

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.



🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी

🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी

🔶 धवनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स

🔶 गरह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी

🔶 वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी

🔶 मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी

🔶 पराणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी

🔶पथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी

🔶 कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी

🔶 धातूंचा अभ्यास - मेटलर्जी

🔶 भगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी

🔶 जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी

🔶 विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी

🔶 हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स

🔶 पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी

🔶सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी

🔶 आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स

🔶 मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी

🔶 विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी

🔶 हरदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी

🔶 अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स

🔶 पराणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी

🔶 मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी

🔶 जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री

🔶 सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी

🔶 रगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स

🔶मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी

🔶 उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर

🔶 शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी

🔶 फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी

 मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

🔶 भपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे


Q1) शांघाय सहकार्य संघटना (SCO) 2020 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक कोठे नियोजित आहे?
-- मास्को ( रशिया )

Q2) कोणत्या व्यक्तीच्या नावाची शिफारस भारतीय स्टेट बँकेचे (SBI) नवे अध्यक्ष म्हणून बॅंक बोर्ड ब्युरो कडून करण्यात आली?
-- दिनेश कुमार खारा

Q3) भारतात ‘राष्ट्रीय क्रिडा दिन’ कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो?
-- मेजर ध्यानचंद ( 29 ऑगस्ट )

Q4) कोणत्या राज्य सरकारने ‘प्रतीक्षा’ नामक पहिली सागरी रुग्णवाहिका कार्यरत केली?
-- केरळ

Q5) राजीव गांधी खेळ रत्न क्रिडा पुरस्कारांची रक्कमेत किती वाढ करण्यात आली आहे?
-- 25 लक्ष रुपये ( अगोदर 7.5 लक्ष होती )

Q6) कोणत्या दिवशी तेलुगू भाषा दिन साजरा केला जातो?
-- 29 ऑगस्ट

Q7) कोणत्या कालावधीत ‘एरो इंडिया’ प्रदर्शनी आयोजित केली जाणार आहे?
--  3 ते 5 फेब्रुवारी 2021

Q8) कोणत्या देशाने ‘झार बॉम्ब’ तयार केला?
--  रशिया

Q9) कोणत्या शहरातल्या बंदरावर प्लास्टिकचा कचरा हाताळण्यासाठी एक सुविधा ऑगस्ट 2020 या महिन्यात कार्यरत करण्यात आली?
-- कोची

Q10) कोणत्या देशात ‘2021 BRICS खेळ’ या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे?
-- भारत

संयुक्त राष्ट्रात चीनला झटका; भारताला मिळालं ‘ECOSOC’चं सदस्यत्व



🔶संयुक्त राष्ट्रात चीनला पुन्हा एकदा झटका लागला आहे. चीनवर मात करत आर्थिक आणि सामाजिक परिषद (ECOSOC) ची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली. भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती.

🔶“प्रतिष्ठीत ECOSOC चं सदस्यत्व भारतानं मिळवलं आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. आमच्या सर्व प्रयत्नांमधील समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं महत्त्वपूर्ण समर्थन देतो. आम्ही सदस्य देशांना समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद देतो,” अशी प्रतिक्रिया टीएस. तिरूमूर्ती यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

🔶भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती. यामध्ये भारत आणि अफगाणिस्ताननं ५४ सदस्यांच्या मताद्वारे विजय मिळवला. यामध्ये चीनला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. चीनला या प्रक्रियेत अर्धीदेखील मतं मिळाली नाहीत. बीजिंग कॉन्फरन्स ऑन वुमनचं (१९९५) यावर्षी २५ वं वर्ष आहे. असं असतानाही चीनला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला.

१०० वर्ष झालेली एक महत्तवपुर्ण घटना



🔰डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नागपूरशी एक अनोखे नाते आहे. त्यांच्या चळवळीत नागपूरचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. याचा उल्लेख त्यांनी अनेकदा केलेलाही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर  ३० मे १९२० रोजी पहिल्यांदा नागपूरला आले आणि त्यानंतर भेटी वाढत जाऊन नागपूरकरांशी त्यांचे ऐतिहासिक ऋणानुबंध निर्माण झाले.

🔰३०, ३१ मे आणि १ जून १९२० रोजी नागपूर येथे

🔰 अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद आयोजित करण्यात आली होती.
विशेष महत्त्वाची बाब म्हणजे अस्पृश्य समाजाच्या राजकीय हक्कांच्या मागण्यासंबंधीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली राष्ट्रीय स्तरावरील ही "पहिलीच" बाहिष्कृत समाजाची परिषद होती. त्यामुळे या परिषदेचे ऐतिहासिक महत्त्व होते.

🔰कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे या परिषदेचे नियोजित अध्यक्ष होते. गोंदियाचे बाबू कालिचरण नंदागवळी हे स्वागताध्यक्ष आणि गणेश आकाजी गवई व किशन फागुजी बनसोडे हे सेक्रेटरी होते.

🔰साऊथबरो कमिटीपुढे २७ जानेवारी १९१९ रोजी मतदानाच्या संदर्भात अस्पृश्यांच्या राजकीय मागण्यांची कैफियत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केली होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या परिषदेत बोलावण्यात आले होते. कस्तूरचंद पार्क (तेव्हाचा आर्सेनल ग्राऊंड)वर ही परिषद बोलावण्यात आली होती.

🔰परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा व्यासपीठावर होते. त्यांचे भाषण झाले नाही. परंतु अस्पृश्यांचे राजकीय हक्क प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने या परिषदेतील त्यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे ठरले.

🔰 ‘अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व न देता त्यांचे हितसंरक्षण उच्चवर्णीय हिंदू प्रतिनिधींच्या हाती सोपवावे,’ असे मत डिप्रेस्ड क्लास मिशनचे वि. रा. शिंदे यांनी साऊथबरो कमिटीसमोर मांडले होते. याविरुद्धचा ठराव डॉ. आंबेडकरांच्या पुढाकारानेच या परिषदेत मंजूर करण्यात आला.

🔰पहिल्या दिवशीच्या सभेनंतर रात्री नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत बाबासाहेबांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे यांचे मत बहिष्कृत समाजासाठी कसे घातक ठरेल हे पटवून दिले. त्यानंतर एकमताने याविरुद्धचा ठराव मंजूर झाला.

🔰यासोबतच या परिषदेत बहिष्कृत समाजास राजकीय प्रतिनिधित्व देणे, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र खाते निर्माण करणे, स्थानिक स्वराज्य संस्थानात प्रतिनिधी घेणे आणि मुलांना आणि मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणे, असे महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक ठरावही परिषदेत मंजूर करण्यात आले. या परिषदेनंतर बाबासाहेबांचे काम अधिक गतीने सुरू झाले. आंदोलने झाली. नागपूरकर त्यांच्या कार्याशी, चळवळीशी अधिक जुळले. दुसºया गोलमेज परिषदेत बाबासाहेबांना सहभागी करून घेण्यासाठी नागपुरातून लंडनला अनेक तारा करण्यात आल्या. पुढे अनेक महत्त्वाच्या परिषदा, निवडणूक यानिमित्ताने त्यांचे नागपूर व विदर्भात येणे वाढले आणि शेवटी बौद्ध धम्माची ऐतिहासिक धम्मदीक्षा घेण्यासाठीही त्यांनी नागपूरचीच निवड केली.

🔴छत्रपती शाहू महाराजांची भव्य मिरवणूक

🔰छत्रपती शाहू महाराज यांचे नागपूरच्या भारतीय बहिष्कृत परिषदेला येणे ही अस्पृश्यांच्या चळवळीच्या दृष्टीने फार मोठी घटना होती. नागपुरात छत्रपती शाहू महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. महाराजांच्या या मिरवणुकीत कोणताही लवाजमा नव्हता. ही मिरवणूक साधी परंतु ऐतिहासिक होती. नागपुरातील अस्पृश्य बांधवांनी अतिशय आपुलकीने ही मिरवणूक ३० मे १९२० रोजी काढली होती. तत्पूर्वी शाहू महाराज यांच्या रेल्वे प्रवासातही त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. रेल्वे स्टेशनच्या वरच्या माळ्यावर त्यांच्यासाठी फलाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. बफसाहेब यांच्या बंगल्यावर त्यांच्या विश्रांतीची व्यवस्था केली गेली. सायंकाळी ५ वाजता मिरवणुकीने त्यांना परिषदेच्या ठिकाणी नेण्यात आले.

"डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा वाढदिवस अर्थात राष्ट्रीय अभियांत्रिकी दिवस.."



विश्वेश्वरैयांचे कार्य -

१८८३ साली सिंध प्रांतातील सक्कर या शहराला सिंधू नदीपासून पाणी पुरवण्यासाठी व शुद्धिकरणासाठी त्यांनी प्रसिद्ध ‘सक्कर’ बंधाऱ्याची योजना केली व या योजनेच्या यशामुळे त्यांना “केसर ए हिंद” नावाने गौरविण्यात आले.

बैंगलोर, पूणे,म्हैसूर, बड़ौदा, कराची, हैदराबाद, ग्वालियर, इंदौर, कोल्हापुर, सूरत, नाशिक, नागपुर, बीजापुर, धारवाड़ सहित अनेक भागांत जलसिंचन व्यवस्था करुन जलसमृद्ध करण्याचे कार्य त्यांनी केले.

१८९९ मध्ये शेतकऱ्यांसाठी ब्लॉक सिस्टिम शोधून काढली ही कृषी सिंचन क्षेत्रातील क्रांतीच म्हणावी लागेल.

तसेच धरणातील वाया जाणारे पाणी थांबवण्यासाठी स्वयंचलित दरवाजाची रचना केली.

त्यांनी शिवसमुद्रम, शिंशा, गिरसप्पा, कृष्णराजसागरसाठी अनेक धरणांच्या योजना आखून कार्यवाही केली, त्यामुळे घराघरांतून वीज खेळविली गेली व अनेक कारखाने सुरू झाले.

डॉ.विश्वेश्वरय्या यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरणाची योजना आखली व त्याच्या नजीकच वृंदावन बगच्याची रचना केली हा बगिचा आजही पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली.

विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

याचबरोबर मा.महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळकांबरोबर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी कार्य केले.

व्यापार आणि उद्योगधंदे यांच्या वाढीसाठी त्यांनी ‘बँक ऑफ म्हैसूर’ च्या स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता..

डॉ.विश्वेश्वरय्या यांनी लोकांचे अज्ञान व दारिद्‌र्य नष्ट ह्वावे यासाठी लढा उभारला आणि यातूनच म्हैसूर विद्यापीठाची निर्मिती झाली.

म्हैसूर सोप फॅक्टरी,किटकनाशक प्रयोगशाळा,भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्,श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट,बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी,स्टेट बँक ऑफ मैसुर,सेंचुरी क्लब,मीसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले.

त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊनच टाटांनी त्यांची टाटा इस्पातच्या सल्लागारपदी नेमणूक केली होती. या पदावर त्यांनी १९२७ ते १९५५ पर्यंत काम केले.

देशात अर्थव्यवस्था नियोजन असावे, यावर काम करणारे डॉ.विश्वेश्वरय्या पहिलेच अभियंता होते. त्यांनी या विषयावर ‘प्लॅन्ड इकोनॉमी फॉर इंडिया’ हे पुस्तक लिहिले आहे.

समाजसेवक बाबा आमटे.



कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणारे समाजसेवक बाबा आमटे यांचा आज जन्मदिवस.

🗣मिळालेले पुरस्कार👌👌👌

- पद्मश्री पुरस्कार : (1971)
- रमण मॅगसेसे पुरस्कार : (1985)
- पद्म विभूषण : (1986)
- मानव अधिकार क्षेत्रात अतुल्य योगदानासाठी संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार : (1988)
- गांधी शांती पुरस्कार : (1999)
- राष्ट्रीय भूषण : (1978)
- जमनालाल बजाज अवार्ड : (1979)
- एन.डी. दीवान अवाॅर्ड : (1980)
- रामशास्त्री अवार्ड : (1993) ( रामशासत्री प्रभुणे संस्था महाराष्ट्र )
- इंदिरा गांधी मेमोरियल अवार्ड : (1985)
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी 
- राजा राममोहन राॅय अवार्ड : (1986) दिल्ली सरकार
- फ्रांसीस मश्चियो प्लॅटिनम ज्युबिली अवार्ड : (1987)
- जी.डी. बिरला इंटरनॅशनल अवार्ड : (1987)
- आदिवासी सेवक अवार्ड :  (1991) भारत सरकार
- मानव सेवा अवार्ड : (1997) यंग मॅन गांधीयन असोसिएशन राजकोट, गुजरात.
- सारथी अवाॅर्ड : (1997) नागपुर
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी 
- महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट अवार्ड : (1997) नागपुर
- कुमार गंधर्व पुरस्कार : (1998)
- सावित्रीबाई फुले अवाॅर्ड : (1998) भारत सरकार
- फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर ऑफ काॅमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिी अवार्ड : (1988)
- आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र सरकार : (1998)
- महाराष्ट्र भुषण अवार्ड : (2004) महाराष्ट्र सरकार

सन्मानीत पदव्या

- डी.लिट : टाटा इंस्टीटयुट ऑफ सोशल सायन्स मुंबई , भारत 1999
- डी.लिट : 1980 नागपुर युनिव्हर्सिटी नागपुर , भारत
- डी लिट : 1985-86 पुणे युनिव्हर्सिटी महाराष्ट्र
- देसिकोत्तमा : 1988  सन्माननीय डाॅक्टरेट, विश्वभारती युनिव्हर्सिटी, शांतीनिकेतन पश्चिम बंगाल

१४ सप्टेंबर २०२०

pH मान


जल का Ph मान = 7
दूध का ph मान = 6.4
सिरके का ph मान = 3
मानव रक्त का ph मान =7.4
नीबू का ph मान = 2.4
NaCl का ph मान = 7
शराब का ph मान = 2.8
मानव मूत्र का ph मान = 4.8-8.4
समुद्री जल का ph मान =8.5
आंसू का ph मान =7.4
मानव लार का ph मान =6.5-7.5
अन्य एसिडिक सूची
HCL का PH मान = 0
H2SO4 का PH मान = 1.0
सेब, सोडा का pH मान(pH Value) =3.0
अचार का pH मान(pH Value) =3.5-3.9
टमाटर का pH मान(pH Value) =4.5
केले का pH मान(pH Value) =4.5-5.2
एसिड वर्षा का pH मान(pH Value) =5.0 के आसपास
रोटी का pH मान(pH Value) =5.3-5.8
लाल मांस का pH मान(pH Value) =5.4 से 6.2
चारेदार पनीर का pH मान(pH Value) =5.9
मक्खन का pH मान(pH Value) =6.1 से 6.4
मछली का pH मान(pH Value) =6.6 से 6.8
अन्य क्षारकता सूची:
शैम्पू का pH मान(pH Value) = 7.0 से 10
बेकिंग सोडा (सोडियम बाइकार्बोनेट) का pH मान(pH Value) = 8.3
टूथपेस्ट का pH मान(pH Value) = लगभग 9
मैग्नेशिया के दूध का pH मान(pH Value) =10.5
अमोनिया का pH मान(pH Value) =11.0
हेयर स्ट्रोकिंग केमिकल्स का pH मान(pH Value) =11.5 से 14
लाइम (कैल्शियम हाइड्रोक्साइड) का pH मान(pH Value) =12.4
लाइ का pH मान(pH Value) =13.0
सोडियम हाइड्रोक्साइड (NaOH) का pH मान(pH Value) =14.0

बराह्मणेतरांच्या संघटना

 - डेक्कन रयत समाज, मराठा राष्ट्रीय संघ, ऑल इंडिया मराठा लीग.

🌼 डक्कन रयत समाज

१) ऑगस्ट 1916 मध्ये महाराष्ट्रात डेक्कन रयत समाज नावाची संघटना अस्तित्वात आली.

२) अण्णासाहेब लठ्ठे, मुकुंदराव पाटील, नाशिकचे रामचंद्र बंडेकर, वालचंद कोठारी, सीताराम बोले, कविवर्य नारायण टिळक यांनी ही संघटना स्थापन केली.

३) ही ब्राह्मण इतरांची पहिली राजकीय संघटना होय.

४) या संघटनेच्या वतीने डेक्कन रयत या नावाचे साप्ताहिक अण्णासाहेब लठ्ठे यांनी सुरू केले होते.

५) उच्चवर्णीयांच्या सामाजिक जुलुमाखाली दडपलेल्या मागास जातींना न्याय मिळवून देणे हा या संस्थेचा हेतू होता.

🌼 मराठा राष्ट्रीय संघ

१) 26 ऑक्टोबर 1917 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुणे येथे हे मराठा राष्ट्रीय संघ स्थापन केला होता.

२) हा संघ स्थापन करण्यात काशिनाथ ठकुजी जाधव, त्रंबक हरी ओटे, नारायण एरवंडे, सखारामपंत जेधे आदींचा सहभाग होता

३) राष्ट्रीय सभेला अनुकूल असे धोरण आखण्याचे या सभेने ठरवले होते.

🌼 ऑल इंडिया मराठा लीग

१) 19 डिसेंबर 1917 रोजी पुणे येथे  ऑल इंडिया मराठा लीग ही संस्था बाबुराव जेधे यांनी स्थापन केली होती.

२) जॉईंट सिलेक्ट कमिटी पुढे या संस्थेच्या वतीने साक्ष देण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठविले होते.

३) भास्करराव जाधव इंग्लंडला गेले इंग्लंडला गेले पण विलायतेतील लोकांना आपल्या जातीचे गोड बंगाल पटवून देणे कठीण आहे आहे हे त्यांच्या लक्षात आले.

वरील तीनही संघटनांनी ब्राह्मणेतर समाजात राजकीय व सामाजिक जागृती घडवून आणली म्हणून ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली.

हक्कभंग (Privilege motion)



🔸मबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना रनौत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला ...!

🔸हक्क भंग म्हणजे काय नेमक ?
खासदार आणि आमदार अशा लोक प्रतिनिधींना घटनेने काही विशेषाधिकार प्रदान केलेले आहेत. विधानसभेने एखाद्या विषयाचा अभ्यास किंवा चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीलाही असे विशेष अधिकार असतात. या अधिकारांच्या आड येणारे वक्तव्य किंवा वर्तन कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाला करता येत नाही, आमदार विधानसभेत जे विचार मांडतात त्यावर इतरांना विधानसभेच्या बाहेर टीका-टिप्पणी करता येत नाही, अन्यथा तो हक्कभंग ठरु शकतो.

🔸सभागृहाचा हक्कभंग किंवा अवमान झाल्याचा प्रकार सभापतींच्या संमतीने सभागृहाच्या निदर्शनास कसा आणला जाऊ शकतो?
विशेष अधिकार भंग व अवमान सुचना नियम 273 नुसार  सभागृह सदस्याचा अवमान केल्याबद्दल आणला जातो. किंवा,
1. विधिमंडळ सभासदाकडून तक्रार
2. विधानसभा सचिवांचा अहवाल
3. याचिका
4. सभागृह समितीचा अहवाल


🔸हक्कभंग सिद्ध झाल्यास काय शिक्षा?
विधानसभेचा अवमान किंवा हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकारही सभागृहाला असतो. आरोपी स्वतः आमदार असेल तर सभागृहातून त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते.

🔸आरोपी तिर्‍हाईत असेल तर समज देऊन सोडून देण्यापासून तुरुंगवास ठोठावण्यापर्यंत कोणतीही शिक्षा होऊ शकते.


आरोपीला समन्स पाठवून विधानसभेत बोलावले जाऊ शकते. समज देणे, ताकीद देणे, आरोपी आमदार असल्यास निलंबन किंवा हकालपट्टी करणे, दंड आकारणे, अटक करुन तुरुंगवास किंवा सभागृहाला योग्य वाटेल ती शिक्षा करण्याची तरतूद कायद्याने केलेली आहे.

महाराष्ट्रातील महामंडळे


१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२
२. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६
३. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२
४. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२
५. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८
६. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२
७. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५
८. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१
९. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित. - १९६३
१०. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५
११. मराठवाडा विकास महामंडळ - १९६७
१२. कोकण विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
१३. विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
१४. महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६
१५. विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७
१६. कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७
१७. तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७
१८. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८
१९. महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ  - १९७८
२०. म्हाडा - १९७६

अन्न सुरक्षा विषयक तरतुदी



✍️भारतात भूकेची समस्या प्रचंड असून २०१७च्या जागतिक भूक निर्देशांकात भारताचा ११९ देशांमध्ये १०० वा क्रमांक आहे.

✍️आशियातील (बांगला देश वगळता) सर्व देशांमध्ये भारत हा भुकेच्या समस्येसंदर्भात वरच्या क्रमांकावर आहे. पुरेसे अन्न न मिळाल्याने श्रमशक्ती व त्यांच्या उत्पन्नात घट होते.

✍️अन्नासाठी प्राधान्यक्रम दिला जात असल्याने शिक्षण, आरोग्य, बचत या गोष्टींसाठी उत्पन्न शिल्लक राहत नाही. परिणामत: गरीबी दूर होण्यास अडथळे येतात.

✍️दशाच्या आर्थिक विकासासाठी देशातील नागरिकांना स्वस्त दराने पुरेसे अन्न देण्याची आवश्यकता असते. भारतीय अन्न सुरक्षेचे स्वरूप गुणात्मक, परिणामात्मक आणि आर्थिक असे आहे. भारतातील अन्नधान्यात पौष्टिक आहाराची कमतरता आहे.

 ✍️जागतीक पोषक विशेषज्ञानुसार संतुलीत आहारातून एका व्यक्तिला ३,००० कॅलरीजची आवश्यकता असते; मात्र भारतीयांच्या आहारात फक्त २,००० कॅलरीजचा समावेश असल्याचे दिसते. मुळात भारतीय जनतेची क्रयशक्ती कमी असल्यामुळे त्यांना पोषक आहार मिळत नाही.

✍️याशिवाय देशातील सातत्याने विशेषत: २००८ नंतरच्या भाववाढीमुळे वाढलेल्या किंमतीत अन्नधान्य खरेदी करणे कठीण होत आहे. भारतातील मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, छत्तीसगड, गुजरात ही राज्ये अन्न सुरक्षेपासून आजही बरीच दूर आहेत.

 ✍️दशातील २० कोटी लोकसंख्या आजही अर्धपोटी असून अल्पपोषण, रक्ताल्पता या समस्यांनी ती ग्रस्त आहेत. परिणामत: पोषण सुरक्षेपासून देश अद्यापही बराच दूर आहे.

✍️४ जून २००९ रोजी केंद्रीय ग्राहक गतिविधी, अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याबाबत संकल्पनात्मक टिपणे तयार करून जाहीर केले. त्यानंतर २०१३ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यास मान्यता मिळाली.

✍️ भारतीय जनतेसाठी अन्नसुरक्षा प्रदान करण्यासाठी उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या कायद्याच्या तरतुदीनुसार देशातील कुटुंबाचे दोन वर्गांत वर्गीकरण केले आहे.

✍️एक, दारिद्र्य रेषेखालील प्राधान्य कुटुंबे आणि दोन, दारिद्र्य रेषेवरील सर्वसाधारण कुटुंबे. अन्न सुरक्षा कायद्याच्या कक्षेत ग्रामीण वसाहतीतील ७५% व नागरी वसाहतीतील ५०% लोकसंख्येचा समावेश आहे.

 ✍️या कायद्यान्वये देशात प्राधान्य कुटुंबात प्रतिव्यक्ती ७ कि. ग्रॅ. गहू/तांदूळ प्रत्येकी अनुक्रमे २ किंवा ३ रू. प्रति किलो दराने, तर सर्वसाधारण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दरमहा ३ कि. ग्रॅ. गहू/तांदूळ निर्धारित किंमतीच्या निम्म्या किंमतीला सरकारी स्वस्त धान्य दुकानातून दिले जाते.

✍️तसेच गर्भवती महिला व १४ वर्षांखालील मुलामुलींना पोषक आहार, कुपोषीत मुलामुलींसाठी उच्च पोषण मूल्य आहार दिला जातो. या कायद्यामुळे देशातील सुमारे ६४% लोकसंख्येला स्वस्त धान्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.

NEFT आणि RTGS मध्ये नेमका फरक काय आहे


ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही नेहमी पाहत असाल की आपल्याला NEFT आणि RTGS हा पर्याय दाखवतो. पण कधी तुम्ही विचार केलाय का, काय आहे हे NEFT आणि RTGS? त्याचं महत्त्व काय? आणि नेमका त्यांच्यामधील फरक काय?

जाणून घेऊया.....

भारतात पैसे पाठवणे प्रक्रिया रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या देखरेखी खाली चालते. सध्या भारतात विविध प्रकारच्या पैसे पाठवणे प्रक्रिया अस्तित्वात आहेत, ज्यातील प्रमुख प्रक्रिया आहेत-

🔷१. National Electronic Fund Transfer – NEFT
🔷२. तात्काळ पैसे पाठवणे (Real Time Gross Settlement – RTGS
🔷३. Immediate Payment Service – IMPS

🔶आपण आता या तिन्ही प्रक्रियांविषयी स्वतंत्रपणे जाणून घेऊया:

🛑 १. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT)
ही भारतातील सर्वात प्रमुख पैसे हस्तांतरण प्रणालीपैकी एक आहे. ही प्रणाली नोव्हेंबर २००५ मध्ये सुरु करण्यात आली. या पद्धतीने पैसे लगेच ट्रान्सफर होत नाहीत, या प्रणालीमध्ये प्रत्येक तासाचा टाइम स्लॉट बनवलेला असतो आणि त्यानुसार पैसे दुसऱ्याला पाठवले जातात. हे इलेक्ट्रॉनिक संदेशाच्या माध्यमाने वापरले जाते. ही सुविधा देशाच्या ३०००० बँकांमध्ये उपलब्ध आहे.

🛑 २. रीअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS)
भारतीय RTGS प्रणाली महिन्याच्या केवळ १६ दिवसात देशाच्या जीडीपी एवढी देवाण – घेवाण करते. RTGS च्या माध्यमातून मोठमोठी देवाणघेवाण केली जाते. देशातील ९५% देवाणघेवाण याच प्रणाली मधून होते. ही प्रक्रिया जगात सर्वात जास्त वापरली जाणारी प्रक्रिया आहे १९८५ पर्यंत केवळ ३ देश ही पद्धत वापरत असतं, पण आज जगातील १०० पेक्षा जास्त देश या प्रणालीचा वापर करतात. RTGS प्रणालीच्या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरीत करता येतात. या पद्धतीमध्ये OK बटण दाबल्यावर लगेच पैसे समोरच्याच्या खात्यामध्ये जमा होतात.

🛑 ३. इमीडेट पेमेंट सर्विस (IMPS)
ही सेवा भारतामध्ये २२ नोव्हेंबर २०१० रोजी सार्वजनिकरीत्या सुरु करण्यात आली होती. या सेवेमार्फत एका बँक खात्यामधून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे कधीही पाठवता येऊ शकतात. मोबाईलच्या माध्यमातून देखील या सेवेचा वापर करता येतो. एकीकडे NEFT आणि RTGS च्या वापरावर मर्यादा आहे, तर दुसरीकडे IMPS चा वापर मात्र दिवसाच्या २४ तासांत कधीही आणि सुट्टीच्या दिवशीही करता येतो. ह्या सेवेचे व्यवस्थापन NationalPayment Corporation Of India (NPCI) द्वारे केले जाते.

🔶NEFT आणि RTGS मध्ये काय फरक आहे?

🛑 १. NEFT च्या माध्यमाने छोटे बचत खाते धारक पैसे हस्तांतरीत करतात. तर RTGS चा उपयोग मोठमोठ्या उद्योगसंस्था आणि कंपन्या करतात.

🛑 २. NEFT मधून किमान पैसे पाठवण्याची मुभा असते, परंतु RTGS मधून कमीत कमी २ लाख रुपये हस्तांतरीत करणे अनिवार्य असते.

🛑 ३. NEFT मधून पैसे हस्तांतरीत होण्यासाठी वेळ लागतो, पण RTGS मधून पैसे लगेच हस्तांतरीत होतात.

🛑 ४. NEFT च्या माध्यमातून बँकेच्या कार्यालयीन वेळातच पैसे ट्रान्सफर करता येतात. RTGS मध्ये लगेचच पैसे ट्रान्सफर होतात पण त्यादिवशी बँक चालू असणे गरजेचे असते.

🛑 ५. ट्रान्सफरसाठी आकारण्यात येणारे शुल्क :

🔷NEFT मध्ये आकारण्यात येणारे शुल्क

🔷१ लाखांपर्यंत आकारण्यात येणारे शुल्क:- ५ रुपये + सेवा कर

🔷१ लाखापेक्षा जास्त आणि २ लाखांपेक्षा कमीसाठी आकारण्यात येणारे शुल्क :- १५ रुपयापेक्षा जास्त नाही + सेवा कर

🔷२ लाखापेक्षा जास्त पैसे पाठवण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :- २५ रुपयापेक्षा जास्त नाही+सेवा कर

▪️RTGS मध्ये लागणारे शुल्क :

🔷२ लाख रुपये ते ५ लाखांपर्यंत देवाणघेवाण करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :- प्रत्येक ट्रान्सफरला कमाल ३० रुपये

🔷५ लाख रुपयांपेक्षा जास्तची देवाणघेवाण करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :- प्रत्येक ट्रान्सफरला कमाल ५५ रुपये...

पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय



👉पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे खोटं पकडण्याची चाचणी, ही विज्ञानात लावण्यात आलेल्या अनेक रंजक शोधांपैकी एक टेस्ट.

👉 यात एखादा माणूस खोटं बोलत असला की त्याच्या शारीरिक क्रियांमध्ये किंचित बदल होतात, हेच बदल टिपून तो खरं बोलतोय की खोटं हे ठरवलं जातं.

✅✅**पॉलिग्राफ टेस्ट कधीपासून सुरू झाली**✅✅

👉पॉलिग्राफ टेस्टचा सर्वात पहिला वापर १९२१ साली अमेरिकेतील जॉन ऑगस्टस लार्सन या पोलिस अधिकारी आणि वैद्यकीय अभ्यासकाने केला.

👉 एखादी व्यक्ती खरं बोलत असेल तेव्हा त्याचे रक्तदाब, नाडीचे ठोके, श्वासोच्छवास, शरीराचं तापमान सामान्य असतं.

👉परंतु, जेव्हा ती खोटं बोलते, तेव्हा या सर्व घटकांमध्ये बदल होऊ लागतात. रक्तदाब-नाडीचे ठोके वाढून श्वासोच्छवास जोराने होऊ लागतो, याच तत्त्वाचा वापर लार्सन यांनी केला.

👉 सन १९२१ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील एका ख्रिश्चन धर्मगुरूची हत्या करण्याचा आरोप असलेल्या विल्यम हायटॉवर या व्यक्तीवर ही पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली.

👉 यात हायटॉवरला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं आणि पॉलिग्राफ टेस्टमध्ये दिसलेले निष्कर्ष याच्या आधारावर त्याला दोषी ठरविण्यात आलं. याआधी विल्यम मार्स्टन याने रक्तदाबावरून करण्यात येणाऱ्या या चाचण्यांचा प्रयत्न करून पाहिला होता.

👉 या चाचण्या उपयोगी असल्याचं पटवून देण्यासाठी त्याने अनेक प्रयत्नही केले. परंतु, त्यानंतर लार्सनने केलेल्या प्रात्याक्षिकामुळे त्याला समाजात मान्यता मिळाली.

आतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2020’



● 2020 वर्षासाठीचा ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक’ नेदरलॅंडच्या लेखिका आलेल्या 29 वर्षीय मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांना जाहीर झाला
● बुकर पारितोषिक मिळवणाऱ्या त्या सर्वात कमी वयाच्या लेखक ठरल्या आहेत.
● नेदरलॅंडमधल्या ग्रामीण भागातल्या एका धार्मिक शेतकरी कुंटुबाच्या कहाणीवर आधारित “द डिसकंफर्ट ऑफ ईवनिंग’ या पुस्तकासाठी त्यांना हा पारितोषिक दिला गेला आहे. ● पारितोषिकाची 50 हजार पौंड रक्कम लेखिका आणि अनुवादक मिशेल हचिंसन यांच्यात विभागून दिली जाणार आहे.

● आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक:-

● हा ब्रिटनमध्ये (UK) दिला जाणारा आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार आहे.
● ‘मॅन ग्रुप’ या संस्थेतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार इंग्रजी भाषेत प्रकाशित होणार्‍या कल्पित साहित्यासाठी तसेच किंवा सामान्यत: इंग्रजी भाषेत भाषांतरित केल्या गेलेल्या साहित्यासाठी कोणतेही राष्ट्रीयत्व असलेल्या जिवंत लेखकाला दिला जातो.
● मॅन बुकर पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर जून 2004 मध्ये या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
●2005 साली पहिला पुरस्कार दिला गेला

हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायधीश : अॅना चंडी..



🔥अना चंडी केरळ राज्यात कायद्याची पदवी घेणाऱ्या पहिल्या मल्याळी महिला मानल्या जातात.

🔥सन 1959 मध्ये त्या केरळ हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायधीश बनल्या.
स्त्रीवादी विचारांच्या अॅना चंडी यांनी महिलांच्या अधिकारांसाठीआवाज उठवला.
काही काम फक्त बायकांचीच आहेत या पारंपारिक विचारसरणीला बदलण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.

🔥पत्नीच्या कमाईने पतीच्या आत्मसन्मानाला धक्का लागेल या विचारांचं त्यांनी खंडन केलं,
त्यांनी आपल्या 'श्रीमती' या मासिकाव्दारे महिलांसाठी आरक्षणाची
मागणी केली.

🔥करळात 1920-30 या काळात महिलांचं शिक्षण आणि आर्थिक अधिकार या विषयांवर काम होत होतं. पण अॅना यांनी महिलांचा आपल्या शरीरावर पूर्णतः अधिकार
असावा आणि महिलांना आपण कधी आई बनावं हे ठरवण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी केली.

टपाल विभागाची ‘पंचतारांकित गावे’ योजना.


♒️10 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय टपाल विभागाच्या ‘पंचतारांकित गावे’ (Five Star Villages) योजनेचे उद्घाटन झाले. टपाल विभागाच्या योजना देशातल्या संपूर्ण ग्रामीण भागात पोहचाव्यात हा या योजनेचा हेतु आहे.

♒️टपाल विभाग अनेक उत्पादने आणि सेवा पुरवते, मात्र ते खेड्यांपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणूनच अशी सर्व उत्पादने आणि सेवा ग्रामीण स्तरावर उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.

💢योजनेविषयी...

♒️शाखा कार्यालये त्यांच्या टपालविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी 'वन स्टॉप शॉप' म्हणून काम करणार.

♒️खड्यातल्या प्रत्येक घरात टपाल योजनांची 100 टक्के व्याप्ती सुनिश्चित करणे हे पंचतारांकित गाव योजनेची संकल्पना आहे. कोणत्याही गावाने खालीलपैकी चार योजना पूर्ण केल्या तर त्या गावाला चार तारांकित दर्जा मिळतो, जर कोणत्याही खेड्यातून तीन योजना पूर्ण झाल्या तर त्या गावाला तीन तारांकित दर्जा मिळतो.

♒️परारंभी, महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यानंतर त्या अनुभवाच्या धर्तीवर संपूर्ण देशभरात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार.
सुरुवातीला महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांतासाठी दोन ग्रामीण जिल्ह्यांची निवड पुढीलप्रमाणे केली आहे - अकोला, वाशीम (नागपूर विभाग), परभणी, हिंगोली (औरंगाबाद विभाग), सोलापूर, पंढरपूर (पुणे विभाग), कोल्हापूर, सांगली (गोवा विभाग), मालेगाव, पालघर (नवी मुंबई विभाग).

♒️2020-2021 या आर्थिक वर्षात प्रत्येक जिल्ह्यातली 50 गावे समाविष्ट केली जाणार. प्रादेशिक कार्यालये पंचतारांकित गावे अंतर्गत समाविष्ट करावयाच्या गावांची निवड करणार.

♒️सर्व योजनांसाठी जनजागृती मोहीम राबवून आणि पात्र ग्रामस्थांना एकत्र करून नेमण्यात आलेला टपाल गट घरोघरी भेट देणार. त्याचप्रमाणे पंचायत कार्यालये, शाळा, ग्रामीण दवाखाने, बस आगार, बाजारपेठ इत्यादी सर्व प्रमुख ठिकाणी नोटिस बोर्ड लावले जाणार.

💢टपाल योजना....

♒️बचत बँक खाते (बचत खाता / आवर्ती ठेव / मुदत ठेव / मासिक उत्पन्न योजना (MIS) किंवा राष्ट्रीय बचत योजना (NSC) / कृषी विकास पत्र)
सुकन्या समृद्धि खाते / PPF खाते
वित्त पोषित पोस्ट ऑफिस बचत खात्याशी संलग्न केलेले IPPB खाते
टपाल जीवन विमा / ग्रामीण टपाल जीवन विमा योजनापंतप्रधान सुरक्षा विमा योजना / पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना

💢भारतीय टपाल विभाग...

♒️‘इंडिया पोस्ट’ या नावाखाली व्यवहार करणारे टपाल विभाग, ही भारत सरकारची टपाल प्रणाली आहे जी दळणवळण मंत्रालयाची उपसंस्था आहे. ही जगातली सर्वाधिक प्रमाणात विस्तारलेली टपाल प्रणाली आहे. 01 ऑक्टोबर 1854 रोजी लॉर्ड डलहौजी यांनी संस्थेची स्थापना केली. त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन: 10 सप्टेंबर.



◼️दरवर्षी 10 सप्टेंबर या दिवशी जगभर ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ पाळला जातो. आत्महत्या रोखण्यासाठी जागतिक वचनबद्धता स्पष्ट करणे आणि त्यासंबंधी पावले उचलणे याविषयी जनजागृती करणे हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे.

◼️आतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध संघ (IASP), जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) यांच्या संयुक्त सहकार्याने वर्ष 2003 पासून जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आयोजित केला जात आहे.

◼️भारतीय गुन्हे अभिलेख विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार,

◼️दशात गेल्या वर्षात सुमारे 1.39 लक्ष जणांनी आत्महत्या केली. आत्महत्यांचे प्रमाण महाराष्ट्र राज्यात अधिक आहे. देशात झालेल्या एकूण आत्महत्यापैकी 13.6 टक्के आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

◼️आत्महत्येच्या तुलनेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या 40 पट जास्त असते. 2019 साली भारतात आत्महत्या करणाऱ्या गृहिणींची संख्या 15.4 टक्के आहे.

◼️2019 साली वयनिहाय आत्महत्येचे प्रमाण - 18 वर्षापेक्षा कमी वय (6.9 टक्के), 18 ते 30 वर्ष वयोगट (35.1 टक्के), 30 ते 45 वर्ष वयोगट (31.8 टक्के)

◼️आत्महत्येची प्रमुख कारणे - कौटुंबिक आणि वैवाहिक कारण, आजारपण, व्यसनाधीनता, प्रेमभंग, कर्जबाजारीपणा.
जगभरात दरवर्षी आठ लक्ष लोक आत्महत्या करतात. जगात दर 40 सेकंदाला एक जण आत्महत्या करतो.

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :



  भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन

खारफुटी जंगले



♻️आंतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन - २६ जुलै♻️

🟩 खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते.

🔸मराठीत या वनस्पतीला कच्छ वनस्पती,
🔸इग्रजीत मॅंग्रोव्ह असे म्हणतात.
🔸 तिवर हा या समूहातील एक उपप्रकार आहे.

🔷या वनस्पतीमुळे बनलेल्या वनश्रीला कांदळवन म्हणतात.

🔺भारतामध्ये जगातील सर्वांत जास्त खारफुटीचे जंगल हे भारताच्यापूर्व किनारपट्टीवर असणारे सुंदरबनचे जंगल आहे.


🔶जगामध्ये खारफुटी वनस्पतीच्या एकूण ७३ जाती आहेत.
🔹तयापैकी भारतामध्ये ४६ जाती आहेत.
🔹पश्चिम किनार पट्टीवर २७,
🔹पर्व किनार पट्टीवर ४०,
🔹अदमान आणि निकोबार या बेटावर ३८ जाती आहेत.

♻️उपयुक्तता♻️

🔘खारफुटीचे लाकूड चमकदार असले, तरी आर्थिक दृष्ट्या ते फारसे उपयुक्त नसते.

🔘मोठ्या झाडांचे लाकूड बंदरातील गोदी व धक्के बांधण्यासाठी वापरले जाते.

🔸कारण या वनस्पतीचे लाकूड पाण्यात कुजत नाही, तसेच त्याला कीड लागत नाही.

🔘तांबड्या खारफुटीच्या सालीपासून टॅनिन हा पदार्थ मिळतो.
🔸टनिनचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी, रंगविण्यासाठी व माशांची जाळी मजबूत बनविण्यासाठी केला जातो.

🔘निपा नावाचे पाम जातीचे झाड असते, त्यापासून साखर निर्माण करतात.

🔘चिपी जातीच्या झाडांच्या फळांपासून श्रीलंकेत खाद्यपेये बनवतात.

🔘खारफुटीच्या विविध जातींपासून पारंपरिक औषधे तयार होतात.

🔘मेस्वाल या वनस्पतीपासून साबणापासून टूथपेस्टपर्यंत विविध वस्तू तयार होतात.

 🔘Acanthus ilicifolius ही वनस्पींपासून अस्थमा, संधीवात आणि त्वचा विकार हा बरा होतो.

 🔘तिवर या वनस्पतीचा जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोग केला जातो.

🔴या समूहात एकच विषारी वनस्पती आढळते ती म्हणजे इक्झोकरीआ अगर गेवा.🔴

✅ गीर फाऊंडेशन ही संस्था गुजरात मधील खारफुटी वनस्पतीवर काम करीत आहे. ✅

बर्फाळप्रदेशीय बिबट्या संवर्धन केंद्र


- भारतातील पहिले.
- उत्तराखंड राज्य सरकार UNDP च्या सहकार्याने उभारणार आहे.

🔸 रिझर्व्ह बँक द्वैमासिक मौद्रीक आढावा
- रेपो दर ४% तर रिव्हर्स रेपो दर ३.३५% कायम ठेवण्यात आला

🔸 "बैरुत"
- लेबेनॉन देशाची राजधानी, या शहरात "अमोनियम नायट्रेट" या स्फोटकाच्या साहाय्याने केलेल्या हल्ल्यात १३५ जण मृत्युमुखी पडले!

🔸 कोविड-१९ मुळे थकीत राहणाऱ्या कर्जांबाबत वित्तीय परिमाणे ठरवण्यासाठी RBI ने समिती स्थापन केली.
- अध्यक्ष- के व्ही कामत

🔸 "जी सी(गिरीश चंद्र) मुर्मु"
- भारताचे नवीन (CAG) महालेखापरीक्षक
- १९८५ च्या गुजरात बॅचचे IAS व जम्मू व काश्मिरचे विद्यमान लेफ्टनंट जनरल(त्यांच्या जागी मनोज सिन्हा यांची नियुक्ती)
- पहिले आदिवासी(ST) कॅग!

🔸 "मॉरिशस" देशाने तेलगळतीमुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली
- जपानच्या तेलवाहू जहाजातून किनाऱ्यावर तेलगळती होत असल्याने
- मॉरिशस बेटसमूहामधील "अगालेगा" बेट भारताचा लष्करी तळ उभारण्यासाठी भाडे तत्वावर दिलेले आहे.

🔸 "राष्ट्रीय हातमाग दिवस"
- ७ ऑगस्ट. २०१५ पासून साजरा करण्यास सुरुवात
-१९०५ मध्ये याच दिवशी स्वदेशी चळवळ सुरुवात केली होती त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा.
- राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम- एप्रिल २०१७ ते मार्च २०२० या काळासाठी राबवला गेला

🔸 ६ ऑगस्ट १९४५!
- हिरोशिमा शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब फेकल्याच्या घटनेस ७५ वर्षे पूर्ण झाली.
- लिटल बॉय, १,४०,००० लोक मृत्युमुखी
- तर ९ ऑगस्टला नागासाकी शहरावर अणुबॉम्ब फेकला!
- फॅटमॅन, ४०,००० मृत्युमुखी
- UK, कॅनडा व USA यांनी मिळून मॅनहॅटन प्रकल्प दुसऱ्या महायुद्धात अण्वस्त्र विकसित करण्यासाठी उभारण्यात आला होता.
- पहिली अनुचाचणी ट्रिनिटी(१६ जुलै१९४५)

🔸 "स्वच्छ भारत क्रांती"
-  "Swachh Bharat Revolution" या इंग्रजी पुस्तकाचा हिंदी अनुवाद.
- देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी या योजनेच्या यशाबाबत अनुभवपर लिहिलेल्या ३५ निबंधांचा समावेश आहे.

RBIने बुडीत कर्जाची समस्या सोडविण्यासाठी एक समिती नेमली



भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) कोविड-19 महामारीच्या काळात टाळेबंदी लागू केल्यामुळे झालेल्या नुकसानीमधून निर्माण झालेली बुडीत कर्जाची समस्या सोडविण्यात व्यवहारिक निकष ठरविण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली आहे.

ठळक बाबी

🔸के. व्ही. कामत हे समितीचे अध्यक्ष आहेत.

🔸ही तज्ज्ञ समिती प्रस्तावित योजनांमध्ये तातडीने अनिवार्य असलेल्या आर्थिक बाबींच्या संदर्भात शिफारसी करण्यात येणार आहे.

🔸RBIने ‘रिझोल्यूशन फ्रेमवर्क फॉर कोविड-19-रिलेटेड स्ट्रेस’ जाहीर केले आहे. हे दस्तऐवज संकटात आलेल्या मालमत्तेसंबंधी समस्येच्या निराकरणासाठी एक मार्गदर्शक आहे.

वर्तमान स्थिती

🔸सप्टेंबर 2019 अखेर बँकांच्या अनुत्पादित कर्जाचे (NPA) प्रमाण 9.3 टक्क्यांवरून सप्टेंबर 2020 पर्यंत 9.9 टक्क्यांवर जाणार, असा इशारा RBIच्या एका वित्तीय स्थैर्य अहवालात देण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या ढोबळ थकीत कर्जाचे प्रमाण वाढून सप्टेंबर 2020 महिन्याच्या अखेरीस 13.2 टक्के तर खासगी बँकांच्या बाबतीत हे प्रमाण 4.2 टक्क्यांपर्यंत वाढणार, असा अंदाज आहे.

RBI विषयी

🔸भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

🔸भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.

🔸भारतीय रिझर्व्ह बँकेने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले.

🔸RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उप गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.

पंतप्रधानांच्या हस्ते कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत आर्थिक सुविधांचा शुभारंभ होणार



▪️भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून “कृषी पायाभूत सुविधा निधी” (Agriculture Infrastructure Fund) अंतर्गत एकूण 1 लक्ष कोटी रुपयांच्या आर्थिक सुविधांचा शुभारंभ करणार आहेत.

▪️पतप्रधान पीएम-किसान योजनेच्या अंतर्गत 8.5 कोटी शेतकऱ्यांना 17,000 कोटी रुपयांच्या सहावा हप्त्याच्या निधीचे वितरण देखील करणार आहेत.

▪️8 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने "कृषी पायाभूत सुविधा निधी" अंतर्गत 1 लक्ष कोटी रुपयांच्या केंद्रीय वित्तपुरवठा सुविधा योजनेला मंजुरी दिली होती.

▪️ही योजना कापणीच्या हंगामानंतर व्यवस्थापन, पायाभूत सोयी-सुविधा आणि सामुदायिक कृषीविषयक मालमत्तांसाठी व्यवहार्य प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याच्या हेतूने व्याज अनुदान आणि आर्थिक सहाय्याद्वारे मध्यम-दीर्घ मुदतीसाठी कर्जपुरवठा सुविधा उपलब्ध करुन देणार.

▪️योजनेचा कालावधी आर्थिक वर्ष 2020 ते आर्थिक वर्ष 2029 अर्थात 10 वर्षांचा असणार आहे.

▪️हा निधी

👉शीतगृह,
👉सकलन केंद्र,
👉परक्रिया केंद्र

▪️यासारखी सामुदायिक शेती मालमत्ता आणि कापणी नंतरचे पायाभूत सुविधा व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरणार.

T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच



🔰T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील दोन वर्षांत होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाच्या आयोजनाविषयीचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी मंडळाची शुक्रवारी बैठक झाली.

🔰वहिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत २०२१ आणि २०२२च्या टी-२० विश्वचषकाच्या यजमानपदाबद्दल निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०२१चा टी-२० विश्वचषक भारतातच होणार असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त टाईम्सनाऊने दिले आहे. याशिवाय २०२१मध्ये न्यूझीलंडमध्ये होणारा महिला वन डे विश्वचषकदेखील पुढे ढकलण्यात आला आहे.

🔰महिलांचा २०२१ एकदिवसीय विश्वचषक तसेच पुरुषांचे पुढील दोन टी-२० विश्वचषक यांच्या आयोजनाविषयी या बैठकीत चर्चा झाली. ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२०मध्ये होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२१च्या यजमानपदासाठी आग्रही होते. त्यामुळे भारताला २०२१ऐवजी २०२२च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळू शकते असे बोलले जात होते. पण अखेर २०२१च्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताकडेच कायम असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहे.

सिरम ही संस्था,


🔹GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि
🔹 बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत.

◾️ बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन करोना लसीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे.

◾️GAVI मार्फत निधी सिरम इन्स्टिट्युटला करोना लसीच्या उत्पादनसाठी दिला जाईल.

◾️सिरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत १०० दशलक्ष डोस पुरवणार आहे.

◾️ या लसीची जास्तीत जास्त किंमत ३ यूएस डॉलर्स म्हणजे साधारण २२५ ते २५० रुपयांच्या घरात असेल अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

◾️सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषध निर्मिती करणारी कंपनी आहे.

◾️सिरमनेही
📌 ऑक्सफर्ड आणि
📌 अमेरिकेच्या Novavax या कंपनीसोबत लसींसंदर्भातला करार केला आहे.

◾️यांच्या चाचण्या यशस्वी झाल्या आणि त्याला संमती मिळाली तर सिरम इन्स्टिट्युला लस उत्पादनासाठी निधी मिळणार आहे.

जागतिक प्रथमोपचार दिन: 12 सप्टेंबर 2020.


🔰दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ‘जागतिक प्रथमोपचार दिन’ साजरा करतात. हा वर्षातला 254 वा (लीप वर्षात 255 वा) दिवस असतो. या दिवशी जीवितहानी टाळण्याच्या प्रयत्नात प्रथमोपचार किती महत्वाची भूमिका बजावू शकते याविषयी जनजागृती केली जाते.

🔰2000 साली इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस अँड रेड क्रिसेंट सोसायटीज (IFRC) या संस्थेच्यावतीने या दिवसाची स्थापना करण्यात आली.

🔴परथमोपचार म्हणजे काय?

🔰अपघात, इजा अथवा गंभीर स्वरूपाच्या आजाराने जर्जर अशा आपद्ग्रस्त व्यक्तीस वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा तिला रुग्णालयात नेईपर्यंतच्या कालावधीत जे उपचार केले जातात त्यांना ‘प्रथमोपचार’ म्हणतात.

🔰असे उपचार बहुतांशी या विषयाचे प्रशिक्षण घेतलेल्या कित्येक आपद्ग्रस्तांचे प्राण वाचू शकतात, इजेची व्याप्ती न वाढता ती मर्यादित राहू शकते, तसेच रुग्णालयात पडून राहण्याचा कालही कमी होतो.

🔰रडक्रॉस ही अशा तऱ्हेचे कार्य करणारी व सर्वसामान्यांना तद्‌विषयक प्रशिक्षण देणारी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संस्था आहे.

🔰इटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस अँड रेड क्रिसेंट सोसायटीज (IFRC) विषयी

🔰ही एक जागतिक मानवतावादी संस्था आहे, जी संघर्ष-नसलेल्या परिस्थितीत नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीनंतर आंतरराष्ट्रीय सहकार्यामध्ये समन्वय राखते. त्याची स्थापना 1919 साली झाली आणि त्याचे मुख्यालय जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे.

🔰24 जून 1859 रोजी सॉल्फरिनोच्या युद्धानंतर, हेन्री ड्युनंट यांनी जखमी सैनिकांची काळजी घेण्यासाठी एका स्वतंत्र संस्थेची कल्पना मांडली होती.

नवीन शैक्षणिक धोरण 2022 पासून लागू होत आहे.



🔰नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे गुणपत्रिकेचे ओझे काढून टाकण्यात आले असून नवीन अभ्यासक्रम पद्धती देश स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करीत असताना, 2022 पासून लागू होत आहे.

🔰तयामुळे विद्यार्थी नवीन भविष्याकडे वाटचाल करतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
नवीन धोरणातील अभ्यासक्रम व तरतुदी भविष्यवेधी, वैज्ञानिक पद्धतीच्या आहेत असेही ते म्हणाले.

🔰नवीन धोरणातील तरतुदीनुसार 2022 पासून प्रत्येक विद्यार्थी शिक्षण घेईल.गणिती विचार, वैज्ञानिक विचार, गमतीदार पद्धतीतून शिक्षण यावर भर दिला  आहे.अभ्यासक्रम कमी करून मूलभूत तत्त्वांवर भर दिला आहे.

🔰विद्यार्थ्यांची शिक्षणातून गळती ही त्यांना विषय निवडण्याचे स्वातंत्र्य नसण्याशी काही प्रमाणात निगडित होती. आता त्यांना हे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. विविध ज्ञानशाखातील बंदिस्तता काढली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारत-जपान दरम्यान संरक्षणविषयक सहकार्य करार.



🔰अनेक वर्षांच्या चर्चेनंतर भारत आणि जपान यांच्यात ऐतिहासिक करार करण्यात आला असून त्यानुसार दोन्ही देशांना व्यूहात्मक रचनेसाठी एकमेकांच्या लष्करी तळांचा वापर करता येणार आहे. चीनच्या लष्कराचे प्रादेशिक प्राबल्य वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर हा करार करण्यात आला आहे.

🔰भारत आणि जपान यांच्या सशस्त्र दलांमध्ये एकमेकांना मदत आणि सेवा देण्याची तरतूद असलेला करार दोन्ही देशांमध्ये करण्यात आला आहे. संरक्षण सचिव अजयकु मार आणि जपानचे राजदूत सुझुकी सातोशी यांनी बुधवारी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या, असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

🔰दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांनी एकमेकांच्या सुविधांचा वापर करणे, एकमेकांना सहकार्य करणे आदी मुद्दय़ांचा करारामध्ये समावेश आहे.

ससदेच्या अधिवेशनाचे 62 टक्के कामकाज डिजिटल पद्धतीने चालेल.


🔰करोनाच्या साथरोगामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज नेहमीप्रमाणे घेणे अशक्य असल्याने ते अधिकाधिक डिजिटल केले जाईल.त्यादृष्टीनेही हे अधिवेशन ऐतिहासिक ठरेल, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले.
संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सदस्यांना सर्व लेखी प्रश्न ऑनलाइन पाठवावे लागतील.

🔰अधिवेशनाचे 62 टक्के कामकाज डिजिटल पद्धतीने चालेल.नजिकच्या भविष्यात ते पूर्णत: डिजिटल करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती बिर्ला यांनी दिली.लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे प्रश्न विचारण्याची संधी यावेळी अधिवेशनात दिली जाणार नाही.

🔰या संदर्भात बिर्ला म्हणाले की, प्रश्नोत्तराचा तास रद्द केला गेला असला तरी लेखी प्रश्न विचारले जाऊ शकतात व त्याला उत्तरेही दिली जातील. शून्यप्रहर 60 मिनिटांऐवजी अर्ध्या तासाचा असेल.

म्हणी व अर्थ





🔹चढेल तो पडेल------
उत्कर्षासाठी धडपडणाऱ्या माणसाला अपयश आले तरी त्यात कमीपणा नाही


🔹चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही------
काही विशेष कार्य केल्याशिवाय लोक मान देत नाहीत


🔹चांभाराच्या देवाला खेटराची पूजा------
जशास तसे या न्यायाने वागणे चांगले


🔹चार आण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला------
क्षुल्लक गोष्टीला अधिक खर्च


🔹चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे------
प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची संधी आयुष्यात मिळतेच


🔹चालत्या गाडीला खीळ घालणे------
व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचणी निर्माण करणे


🔹चिंती परा ते ये‌ई घरा------
दुसर्‍याचे वाईट चिंतीत राहिले की ते आपल्यावरच उलटते


🔹चोर तो चोर वर शिरजोर------
गुन्हा करुन वर मुजोरी


🔹चोर सोडून संन्याशाला फाशी------
खरा गुन्हेगार न पकडता आणि त्याला शिक्षा न देता निरपराध माणसाला शिक्षा होणे


🔹चोराच्या उलट्या बोंबा------
स्वतःच गुन्हा करुन दुसर्‍याच्या नावाने ओरडणे


🔹चोराच्या मनात चांदणे------
वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटणे


🔹चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक------
वाईट माणसांनाच वाईट माणसाची लक्षणे कळतात


🔹चोराच्या हातची लंगोटी------
ज्यांच्याकडून काही मिळायची आशा नाही त्याच्याकडून थोडेसे मिळणे हेच नशीब


🔹चोराला सुटका आणि गावाला फटका------
चोर सोडून निरपराधी माणसाला पकडणे


🔹चोरावर मोर------
एकापेक्षा एक सवाई


🔹चोरीचा मामला हळू हळू बोंबला------
पापकर्म केल्यामुळे आपत्ती आली किंवा हानी झाली तरी न ओरडता निपटून घ्यायचे असते.

Online Test Series

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...