२३ ऑगस्ट २०२०

गतिविषयक समीकरणे (Equation of Motion)



१) वेग-काळ संबंधीचे समीकरण (पहिले समीकरण)

v = u + at

v = अंतिम गती

u = सुरुवातीची गती

a = त्वरण

t = काळ/वेळ


🍁 सथिती-काळ संबंधाचे समीकरण (दुसरे समीकरण)🍁

s = ut + (at२)/२

s = कापलेले अंतर

u = सुरुवातीची गती

t = वेळ/काळ

a = त्वरण


🌿🌿सथिती-वेग संबंधाचे समीकरण (तिसरे समीकरण)🌿🌿

v२ = u2 + २as

v = शेवटची गती

s = कापलेले अंतर

u = सुरुवातीची गती

a = त्वरण

चाल व वेग (Speed and velocity)


🍁चाल (Speed)

एखाद्या वस्तूने एकक काळात कापलेल्या अंतरास चाल म्हणतात. चाल ही अदिश राशी(Scalar quantity) आहे.

सूत्र : चाल = (एकूण कापलेले अंतर) / (एकूण लागलेला वेळ)


🍁वग (Velocity)

एखाद्या वस्तूने एकक काळात विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात. वेग ही सदिश राशी(Vector quantity) आहे.

सूत्र : वेग =(एकूण कापलेले अंतर + दिशा) / (एकूण लागलेला वेळ)

वेग = (विस्थापन) / (काळ)

विस्थापन आणि अंतर (Displacement and Distance



अंतर (Distance) – अंतर म्हणजे गतिमान वस्तुमधील आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातील प्रत्यक्ष मार्गक्रमण होय.

विस्थापन(Displacement) – वस्तू स्थिर झाल्यानंतर आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातील कमीत कमी सरळ रेषेतील अंतर म्हणजे विस्थापन होय.


🍀🍀अतर आणि विस्थापन मधील फरक🍀🍀

हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ की, एक मुलगा पूर्वेकडे ३ किमी जातो आणि नंतर उजवीकडे वळून ४ किमी जातो. या एकूण प्रवासामध्ये मुलाने ७ किमी अंतर कापले, पण  खरे पाहता त्या मुलाचे विस्थापन ५ किमी एवढेच झाले.

जास्तीत जास्त विस्थापन म्हणजे अंतर होय.

विस्थापन हे अंतरापेक्षा जास्त असू शकत नाही, परंतु अंतर हे विस्थापानापेक्षा जास्त असू शकते.

अंतर ही अदिश राशी (Scalar quantity) आहे, आणि विस्थापन ही सदिश राशी(Vector quantity) आहे.

गती



जर एखादी वस्तू स्वतःची जागा वेळेनुसार बदलत असेल तर ती गतीमध्ये (Motion) आहे असे म्हणतात.

 पण जर एखादी वस्तू स्वतःची जागा वेळेनुसार बदलत नसेल तर ती स्थिर (Rest) आहे असे समजले जाते.

 गती व गतीचे प्रकार (Motion and laws of motion) पुढीलप्रमाणे –


🌺🌺सथानांतरणीय गती (Translational Motion)🌺🌺

जर एखादी वस्तू एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूकडे जाऊन आपली जागा बदलत असेल, तर त्याला स्थानांतरणीय गती असे म्हणतात.

यामध्ये पहिल्या बिंदुपासून आणि शेवटच्या बिंदूकडे जाताना वापरलेला मार्ग पुन्हा गिरवला जात नाही.

MPSC Science, [01.12.19 17:49]
जर एखादी वस्तू विशिष्ट आसाभोवती फिरत असेल तर ती घुर्णन गतीमध्ये आहे असे म्हणतात.

यामध्ये वस्तू ठराविक वेळेनंनतर तोच तोच मार्ग गिरवते. आणि तो मार्ग वर्तुळाकार असतो.

उदा. भोवरा, पंखा इत्यादी.


🌿🌿दोलन गती (Oscillatory Motion)🌿🌿

जर वस्तू एकाच मार्गाने फिरत असेल पण मार्ग वर्तुळाकार नसेल तर त्या गतीस दोलन गती म्हणतात.

उदा. झोका, दोलक इत्यादी.

आवाज




एक ड्रम एक कंपन द्वारे आवाज निर्माण पडदा .

मध्ये भौतिकशास्त्र , आवाज एक आहे कंप सामान्यत: एक म्हणून प्रसार की ऐकू येईल असा एक द्वारे दबाव लाट प्रसार मध्यम अशा वायू, द्रव किंवा घन म्हणून.

मानवी मध्ये शरीरशास्त्र आणि मानसशास्त्र , आवाज आहे रिसेप्शन अशा लाटा आणि त्यांच्या समज करून मेंदू .

वारंवारता सुमारे 20 हर्ट्ज आणि 20 केएचझेड दरम्यान असते तेव्हाच माणसे केवळ वेगळ्या खेळपट्ट्या म्हणून ध्वनी लहरी ऐकू शकतात .

20 किलोहर्ट्झपेक्षा जास्त आवाज असलेल्या लाटा अल्ट्रासाऊंड म्हणून ओळखल्या जातात आणि मानवाकडून समजण्यायोग्य नसतात.

20 हर्ट्जच्या खाली ध्वनी लाटा इन्फ्रासाऊंड म्हणून ओळखले जातात .

वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये सुनावणीचे प्रमाण वेगवेगळे असते .

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर, नवी मुंबईने पटकावला तिसरा क्रमांक



केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या 'स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०' चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांक मिळवला होता.

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे.
स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईसह इतर शहरांचाही समावेश आहे. यामध्ये नाशिक ११, ठाणे १४, पुणे १५, नागूपर १८, कल्याण डोंबिवली २२, पिंपरी चिंचवड २४, औरंगाबाद २६, वसई-विरार ३२ आणि मुंबई ३५ व्या क्रमांकावर आहे.

'स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२०' हे २८ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं. स्वच्छता अॅपवरुन १ कोटी ७० लाख लोकांनी अभियानासाठी नोंदणी केली होती. सोशल मीडियावरुन ११ कोटी लोकांनी अभियानाला प्रतिसाद दिला. तर साडे पाच लाखांहून अधिक स्वच्छता कामगारांना सामाजिक कल्याणकारी योजनांशी जोडण्यात आलं.

याआधी ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत कचरामुक्त शहर मोहिमेत देशातील पाच शहरांत नवी मुंबईला स्थान मिळाले होते. नवी मुंबई राज्यातील एकमेव शहर ठरलं होतं. पाहणीच्या आधारे कचरामुक्त शहराचा दर्जा ठरविण्यात आला होता. यावेळी नवी मुंबईला पंचतारांकित दर्जा मिळाला होता. देशातील पाच शहरांत नवी मुंबईचा समावेश झाला होता, तसंच राज्यातील एकमेव शहर ठरलं होतं. गेल्या वर्षीही नवी मुंबईने हा दर्जा मिळवला होता.

गतवर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान मिळविलं होतं. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला तिसरे स्थान मिळालं होतं.

सहकार विषयी माहिती.



🅾️परत्येकाने स्वत:पुरते व स्वतंत्रपणे कार्य न करता, अनेकांनी एकत्र व परस्पर सहाय्याने कार्य करणे, हा सहकार या शब्दाचा साधा नि सोपा अर्थ आहे.
 म्हणजे समान आर्थिक व्यवहार करू इच्छिनारे लोक एकत्र येतात व ते परस्परांना मदत करून आपल्या गरजा भागविण्याचे उद्दीष्ट पार पाडतात.
 अशा प्रकारे सांघिक हित (Collective Good) साध्य करतांना वैयक्तिक हित (In-dividual Good) आपोआपच सिद्ध होते.

🧩सहकार - व्याख्या..

🅾️सहकाराच्या अनेक तज्ज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. एच. कलव्हर्टयांची व्याख्या सोपी व सूटसुटीत असल्याने सर्वमान्य आहे.

🅾️ "आपल्या स्वत:च्या आर्थिक उन्नतीसाठी ज्यावेळी अनेक व्यक्ती स्वेच्छेने, समानतेच्या भूमिकेवरून मनवतेच्या नात्याने संघटित होतात, त्यास सहकार असे म्हणतात."

🧩सहकारी संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये

🅾️सहकारी संस्थांची संघटना अन्य प्रकारच्या व्यवसाय संघटनांपेक्षा (उदा. भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था) वेगळी असते.

🧩सहकारी संघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे -

1. नोंदविलेली संस्था -व्यक्ती स्वत: उत्स्फूर्तपणे एकत्र येवून कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था स्थापन करू शकत असले तरी प्रचलित सहकारी कायद्यांतर्गत तिची नोंदणी करावी लागते.

2. स्वतंत्र व कायमचे अस्तित्व -

🅾️नोंदणी केल्यानंतर सहकारी संस्थेला स्वतंत्र अस्तित्व आणि कायद्याच्या दृष्टीने कृत्रिम व्यक्तीचे स्थान व दर्जा मिळतो. त्यानुसार तिला करार करता येतो, मालमत्ता धारण करता येते, कर्ज उभारते येते. तसेच, न्यायालय जाता येते.   

3. ध्येय आणि उद्देश -

🅾️सभासदांच्या समान गरजा भागवणे, त्यांचे आर्थिक कल्याण साध्य करणे हा सहकारी संस्थेचा उद्देश असतो.मात्र एक सामाजिक संघटन या नात्याने तिला समाजाच्या आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक विकासाचाही उद्देश बाळगावा लागतो.

4. सभासदत्व -

🅾️सहकारी संस्थेचे सभासदत्व खुले व ऐच्छिक असते. त्यासाठी जात, धर्म, पंथ, गरीब-श्रीमंत, प्रतिष्ठा इ. च्या आधारे भेदभाव केला जात नाही. तसेच, सदस्यत्वासाठी सक्ती वा बळजबरी केली जात नाही.

5. मालकीहक्क व व्यवस्थापन -

🅾️सर्व भागधारक हेच सहकारी संस्थेचे मालक असतात व तिच्या व्यवस्थापनाचे सर्व हक्क त्यांच्याकडे असतात.मात्र ते वारंवार एकत्र येवू शकत नाही, म्हणून संस्थेचा कारभार चालविण्यासाठी ते स्वत:च्या वतीने व्यवस्थापक/संचालक मंडळ निवडून देतात.सभासदांना मतदानाचे अधिकार "एक व्यक्ति-एक मत" या तत्वानुसार मिळतात.

6. जबाबदारीचे स्वरूप -

🅾️सहकारी संस्थेला अमर्यादित तसेच, मर्यादित जबाबदार्‍यांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या जबाबदारीची निवड करावी लागते.

7. भांडवल उभारणी -

🧩सहकारी संस्था भांडवल उभारणी दोन प्रकारे करते -

i) अंतर्गत मार्गांनी -

🅾️यात भाग-भांडवल, राखीव निधी, प्रवेश फी, देणगी इत्यादींचा समावेश होतो. पैकी भाग-भांडवल सर्वात महत्वाचे असते.सहकारी संस्थेचे भाग हस्तांतरक्षम असले तरी ते फक्त सभासदलाच हस्तांतरित करता येतात.तसेच, भागाची दर्शनी किंमत व विक्री किंमत नेहमीच समान असते व या भागांची शेअर बाजारात खरेदी-विक्री केली जात नाही.

ii) बाह्य मार्गानी -

🅾️यात ठेवी, कर्जे, कर्ज रोख्यांची विक्री, सरकारी अनुदाने/कर्जे यांचा समावेश होतो.सहकारी संस्था, सभासद तसेच, बिगर-सभासद यांच्याकडून ठेवी गोळा करू शकतात.

8. नफ्याची विभागणी -

🅾️सहकारी संस्था नफ्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेल्या नसतात.मात्र, आधुनिक सहकारी तत्वानुसार नफा वा आधिक्याचे न्याय वाटप करण्यावर भर देण्यात आला आहे.सभासदांच्या भाग-भांडवलावर किती व्याज म्हणजेच लाभांश द्यावा हे सहकारी कायद्याने ठरवून दिलेले असते.महाराष्ट्रातील सहकारी संस्था भाग-भांडवलावर 12 टक्के रोखीने व विशेष परवानगीने 18 टक्के पर्यंत लाभांश देऊ शकतात.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

ताम्हिणी अभयारण्य (Tamhini Sanctuary).



🅾️डोंगर कड्यांवर ओथंबून आलेली ढगांची गर्दी, दाटलेलं धुकं आणि सरींवर सरी… घेऊन कोसळणाऱ्या पावसाशी झिंगडझुम्मा करायचा असेल तर तुमच्या-माझ्या सारख्यांची पाऊलं आपणहूनच ताम्हिणी घाटाकडे वळतात. पावसाच्या अलौकिक स्पर्शानं दाटीवाटीने फुलून आलेला निसर्ग आणि आपला ताठरपणा बाजूला ठेवत अंगाखांद्यावर वृक्ष वेलींना आणि कोसळणाऱ्या धबधब्यांना घेऊन मायाळू झालेल्या डोंगररांगा यांचं वर्णन कसं करावं ? त्यासाठी शब्दही अपुरे पडतात. त्यामुळेच वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांनी इथल्या डोंगररांगा आणि घाट रस्ता फुलून जातो. मुळशी धरणाचा नयनरम्य देखावा मन प्रसन्न करतो.

🅾️पण्यापासून 70 कि.मी अंतरावर असलेल्या या घाटाचं निसर्गसौंदर्य मनाला भूरळ पाडणार आहे. मुंबई-गोवा मार्गाने कोलाडपर्यंत गेले की पुढे कुंडलिका नदी लागते. तिच्यावरचा पूल ओलांडला की डाव्या बाजूने मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाता येते. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात ताम्हिणी घाट आहे या घाटात ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य वसलेलं आहे. 3 मे 2013 रोजी या अभयारण्याची घोषणा करण्यात आली. प्रामुख्याने पुणे आणि अंशत: रायगड जिल्ह्यात 49.62 चौ.कि.मी.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

COVID -19 साठी वेगवेगळ्या राज्याच्या योजना ऍप


🔰 कोरोना कवच -- भारत सरकार
🔰 बरेक द चेन -- केरल
🔰 ऑपरेशन शील्ड --  दिल्ली सरकार
🔰 नाड़ी एप्प -- पुंदुचेरी
🔰 रक्षा सर्व -- छत्तीसगढ़ पुलिस
🔰 i GOT -- भारत सरकार
🔰 कोरोना केअर-- फोनपे
🔰 परज्ञम अॅप --- झारखण्ड
🔰 कोविडकेअर अँप -- अरुणाचल प्रदेश
🔰 कोरोना सहायता अँप -- बिहार
🔰 आरोग्य सेतु -- भारत सरकार
🔰 समाधान -- HRD मिनिस्ट्री
🔰 5T --- दिल्ली
🔰 कॉरेन्टाइन अँप -- IIT
🔰 करुणा अँप --- सिविल सर्विस एसोसिएशन
🔰 V-सेफ टनल -- तेलंगाना
🔰 लाइफलाइन UDAN-- सिविल एविएशन  मिनिस्ट्री
🔰 Vera's कोविड 19 मॉनिटरिंग सिस्टम -- तेलंगाना
🔰 सल्फ deceleration अॅप--नागालैंड
🔰 ऑपरेशन नमस्ते -- इंडियन आर्मी
🔰 कोरोना वाच अँप  -- कर्नाटक
🔰 नमस्ते ओवर हैंडशेक-- कर्नाटक
🔰 मो जीवन -- ओडिशा
🔰 टीम 11-- उत्तर प्रदेश
🔰 फीफा CAMPAIGN-- सुनील क्षेत्री

चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे



Q1) कोणत्या व्यक्तीला 2020 या वर्षासाठी ‘ग्रामोदय बंधु मित्र’ पुरस्कार देण्यात आला?
उत्तर :-  सुधा मूर्ती

Q2) कोणत्या व्यक्तीची मॉरिटानिया देशाच्या पंतप्रधान पदावर निवड झाली?
उत्तर :- मोहम्मद औल्द बिलाल

Q3) कोणत्या अरब देशाने इस्रायलसोबत केलेल्या अब्राहम कराराला सहमती दिली?
उत्तर :- संयुक्त अरब अमिराती

Q4) कोणत्या देशाने “अ‍ॅरो-2” नामक लक्ष्यभेदी आंतररोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?
उत्तर :-  इस्त्रायल

Q5) कोणती व्यक्ती ‘अवर ओन्ली होम: ए क्लायमेट अपील टू द वर्ल्ड’ या शीर्षकाच्या पुस्तकाचे लेखक आहे?
उत्तर :- दलाई लामा

Q6) कोणत्या व्यक्तीची कोविड-19 लसीविषयीच्या प्रशासनासंबंधी नेमण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- डॉ. व्ही. के. पॉल

Q7) कोणत्या राज्याच्या राजकीय गटांकडून संपूर्ण राज्य संविधानाच्या सहावी अनुसूची किंवा 371 या कलमाखाली आणले जावे अशी मागणी होत आहे?
उत्तर :-अरुणाचल प्रदेश

Q8) कोणत्या संस्थेनी स्वदेशी “AUM (एयर यूनिक-मॉनिटरिंग) फोटॉनिक यंत्रणा” तयार केली?
उत्तर :-  वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन केंद्र

Q9) कोणत्या संस्थेनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असलेला "पारदर्शक करपद्धती - प्रामाणिकाचा सन्मान" यासाठीचा एक डिजिटल मंच तयार केला?
उत्तर :- केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ

Q10) कोणत्या देशाने अमेरिकेसोबत F-16 विमानांच्या खरेदी करारावर स्वाक्षरी केली?
उत्तर :- तैवान


Q-1) कोणते राज्य सरकार 92 कोटी रुपयांची ‘स्मार्ट कनेक्ट योजना’ राबवित आहे?
उत्तर :- पंजाब

Q-2) कोणत्या राज्य सरकारने तरूणांना सॉफ्ट कर्ज व अनुदान देण्यासाठी “कर्म साथी प्रकल्प” ही योजना राबविण्यास सुरूवात केली?
उत्तर :- पश्चिम बंगाल

Q-3) कोणत्या संस्थेनी वैमानिक-रहीत विमानाच्या संयुक्त विकासासाठी कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेसोबत करार केला?
उत्तर :- भारत अर्थ मूव्हर्स मर्यादित

Q-4) कोणत्या अंतराळ संस्थेनी भारतीय विज्ञान संस्थेच्या सहकार्याने चंद्रावर विटांसारखी एक संरचना तयार करण्यासाठी एक टिकाऊ प्रक्रिया विकसित केली?
उत्तर :-  ISRO

Q-5) निधन झालेले रसेल किर्श कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर :- डिजिटल छायाचित्रकारिता

Q-6) संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरणाला चालना देण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेल्या नव्या डिजिटल मंचाचे नाव काय आहे?
उत्तर :-  सृजन

Q-7) कोणत्या राज्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “ओरुणोदोई” योजना लागू करण्यात आली?
उत्तर :-  आसाम

Q-8) कोणत्या बँकेनी लष्करी व निमलष्करी व्यवसायिकांसाठी “शौर्य KGC कार्ड” नामक एक कृषीकर्ज साधन सादर केले?
उत्तर :-  HDFC बँक

Q-9) कोणत्या राज्याने ‘यलो चेन’ नामक एक ई-वाणिज्य मंच कार्यरत केला?
उत्तर :- नागालँड

Q-10) कोणत्या राज्याने ‘अमृत’ योजनेच्या कामगिरीविषयी 2020 सालाच्या मानांकन यादीत प्रथम क्रमांक पटकावला?
उत्तर :- ओडिशा


Question :- कोणती व्यक्ती पतधोरण समितीवर नेमण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शोध-नि-निवड मंडळाच्या प्रमुखपदी आहे?
And :- राजीव गौबा

Question :- कोणती बँक ‘डिजीटल अपनाए’ मोहीम राबवित आहे?
Ans :-  पंजाब नॅशनल बँक

Question :- कोणत्या मंत्रालयाने जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशात ‘नशा-मुक्त भारत’ अभियानाचा आरंभ केला?
Ans :- सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय

Question :- कोणत्या व्यक्तीची गोएयर या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली?
Ans :- कौशिक खोना

Question :- कोणत्या संस्थेनी गुवाहाटीसाठी ‘फ्लड अर्ली वॉर्निंग सिस्टम’ (FEWS) प्रस्थापित केली आहे?
Ans :- द एनर्जी अँड रिसोर्स इंस्टीट्यूट

Question :- कोणत्या संस्थेसोबत दिल्ली सरकारने रस्ता सुरक्षेविषयी सुधारणा करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे?
Ans :- ब्लूमबर्ग फिलांथ्रोपीज

Questions :- कोणत्या राज्य सरकारने ‘कृषीविषयक नवसंशोधनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ कार्यक्रम सादर केला?
Ans :-  तेलंगणा

Question :- कोणत्या व्यक्तीची इंडिया-बुल्स हाऊसिंग कंपनीचे अकार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली?
Ans :-  सुभाष शिओरतन मुंद्रा

Question :- पश्चिम आफ्रिकेच्या कोणत्या देशाने भारतासोबत अंतराळ क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार केला?
Ans :- नायजर

Question :-कोणत्या राज्य सरकारने ITI संस्थांमध्ये जर्मन व्होकेशनल ट्रेनिंगसाठी सीमेन्स आणि Giz_Gmbh या कंपन्यांसोबत त्रिपक्षीय करार केला?
Ans :- गोवा


🤔कोणत्या देशाला भारत ‘अरुण-III’ जलविद्युत प्रकल्पाची बांधणी करण्यासाठी मदत करीत आहे?
 ➡️नपाळ

🤔कोणते राज्य सरकार ‘पढाई तुहार परा’ योजना राबवित आहे?
➡️छत्तीसगड

🤔किती देशांना “वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड” (OSOWOG) या उपक्रमाच्या अंतर्गत एकाच पॉवर ग्रीडद्वारे जोडण्याचा प्रस्ताव आहे?
➡️140

🤔NTPC कंपनीने रिहांद सुपर थर्मल पॉवर स्टेशन येथे कोळशाच्या राखेची वाहतूक करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारली आहे. NTPCचा रिहांद सुपर थर्मल पॉवर स्टेशन कुठे आहे?
 ➡️उत्तरप्रदेश

🤔कोणत्या नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल बांधण्यात येत आहे?
➡️इजाई

🤔कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण क्षेत्राविषयी महिलांना कौशल्य प्रदान करण्यासाठी 1 दशलक्ष युरो एवढी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाचा आरंभ केला?
➡️यरोपीय संघ

🤔कोणत्या व्यक्तीने ‘स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2020’ ही फॉर्म्युला वन शर्यत जिंकली?
➡️लविस हॅमिल्टन

🤔निधन झालेले पंडित जसराज कोणत्या कलेसाठी प्रसिद्ध होते?
➡️गायक आणि तबला वादक

🤔कोणत्या व्यक्तीची सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) महासंचालक पदावर नेमणूक झाली?
➡️राकेश अस्थाना

🤔कोणते मंत्रालय एखाद्या जिल्ह्याचे किंवा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याला मान्यता देते?
➡️गह मंत्रालय


Q1) कोणत्या राज्य सरकारने खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीची भरपाई करण्यासाठी ‘मुख्यमंत्री शेतकरी सहाय्य योजना’ लागू केली?
उत्तर :- गुजरात

Q2) कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादीत (SAIL) या उपक्रमाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?
उत्तर :-  सोमा मोंडल

Q3) कोणते शहर स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्त्री-स्वरूपात वाहतूक सिग्नल मिळविणारे पहिले ठरले?
उत्तर :- मुंबई

Q4) कोणत्या संस्थेनी “BEEG” या नावाने देशी ‘सीड बॉल’ विकसित केले आहेत?
उत्तर :-  भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर

Q5) ‘70th अॅनिव्हर्सरी ग्रँड प्रिक्स 2020’ या शर्यतीचा विजेता कोण ठरला?
उत्तर :- मॅक्स व्हर्स्टपेन

Q6) कोणत्या संस्थेनी भारतभर ‘W-GDP विमेन कनेक्ट चॅलेंज’ उपक्रम राबविण्यासाठी USAID संस्थेसोबत भागीदारी करार केला?
उत्तर :- रिलायन्स फाऊंडेशन

Q7) कोणत्या कंपनीने “विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 2.0” यासाठी अटल इनोव्हेशन मिशन (AIM) सोबत भागीदारी केली?
उत्तर :- डेल टेक्नॉलॉजीज

Q8) कोणत्या संस्थेच्यावतीने ‘इंडिया@ 75 समिट: मिशन 2022’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते?
उत्तर :-  भारतीय उद्योग संघ (CII)

Q9) कोणत्या व्यक्तीची भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन मंडळाचे (ICRIER) अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली?
उत्तर :- प्रमोद भसीन

Q10) कोणत्या व्यक्तीने पश्चिम बंगालमधून बांग्लादेशमार्गे त्रिपुराच्या आगरतळाकडे जाणाऱ्या पहिल्या चाचणी मालवाहू जहाजाला हिरवा झेंडा दाखविला?
उत्तर :-  मनसुख मांडवीया


● सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक झाली आहे?
उत्तर : राकेश अस्थाना

● ‘स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2020’ ही फॉर्म्युला वन शर्यत कोणत्या व्यक्तीने जिंकली?
उत्तर : लेविस हॅमिल्टन

● नुकतेच निधन झालेले पंडित जसराज यांना कोणत्या साली 'पद्म विभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले होते?
उत्तर : 2000 साली

● एखाद्या जिल्ह्याचे किंवा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याला कोणते मंत्रालय मान्यता देते?
उत्तर : गृह मंत्रालय

● महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण क्षेत्राविषयी महिलांना कौशल्य प्रदान करण्यासाठी 1 दशलक्ष युरो एवढी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाचा आरंभ कोणत्या संस्थेनी केला?
उत्तर : युरोपीय संघ

● जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?
उत्तर : इजाई

● ‘पढाई तुहार परा’ योजना कोणते राज्य सरकार राबवित आहे?
उत्तर : छत्तीसगड सरकार

● “वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड” (OSOWOG) या उपक्रमाच्या अंतर्गत एकाच पॉवर ग्रीडद्वारे किती देशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे?
उत्तर : 140 देश



लवकरच AAI म्हणजे ‘एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ऐवजी ‘अदानी एअरपोर्ट्स ऑफ इंडिया’ म्हणून ओळखलं जाईल”



🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि  तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्याच्या निर्णयाला बुधवारी मंजूरी दिली आहे. सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समूहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.

🔰यावरुनच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार जयराम रमेश यांनी सरकार याच वेगाने कंत्राटं देत राहिलं तर लवकरच भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नाव बदलून ‘अदानी एअरपोर्ट्स ऑफ इंडिया’ असं होईल अशी खोचक टीका केली आहे.

🔰बधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये तीन विमानतळांचा कारभार अदानी समूहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे आता जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत. यावरुनच केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध करताना जयराम रमेश यांनी एक ट्विट केलं आहे.

यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर; मीराबाई चानू, साक्षी मलिकला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळलं



🔰यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठीच्या खेळाडूंच्या यादीला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. तर यावर्षी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार पाच खेळाडूंना देण्यात आला आहे. दरम्यान, मीराबाई चानू, साक्षी मलिकला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळलं आहे.

🔰🔰राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार🔰🔰

रोहित शर्मा - क्रिकेट
मरियप्पन थंगवेलू - पॅरा अॅथलीट
मनिका बत्रा - टेबल टेनिस
विनेश फोगाट - कुस्ती
रानी रामपाल - हॉकी

🔰🔰द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)🔰🔰

धर्मेंद्र तिवारी - तिरंदाजी
पुरुषोत्तम राय - अॅथलेटिक्स
शिव सिंग - बॉक्सिंग
रोमेश पठानिया - हॉकी
क्रिशन कुमार हुडा - कबड्डी
विजय मुनीश्वर - पॅरा पॉवरलिफ्टिंग
ओम प्रकाश दहिया - कुस्ती

🔰🔰दरोणाचार्य पुरस्कार🔰🔰

ज्यूड फेलिक्स सेबॅस्टियन - हॉकी
योगेश मालवीय - मल्लखांब
जसपाल राणा - नेमबाज
कुलदीप कुमार हांडू - वुशू
गौरव खन्ना - पॅरा बॅडमिंटन

🔰🔰अर्जुन पुरस्कार🔰🔰

ईशांत शर्मा - क्रिकेट
दीप्ती शर्मा - क्रिकेट
अतनू दास - तिरंदाजी
द्युती चंद - अॅथलेटिक्स
सात्विक रानकीरेड्डी - बॅडमिंटन
चिराग शेट्टी - बॅडमिंटन
विशेष भृगुवंशी - बास्केटबॉल
लवलीना बोर्गोहेन - बॉक्सिंग
सुभेदार मनीष कौशिक - बॉक्सिंग
अजय सावंत - घोडेस्वारी
संदेश जिंगन - फुटबॉल
अदिती अशोक - गोल्फ
आकाशदीप सिंग - हॉकी
दिपिका - हॉकी
दीपक हुडा - कबड्डी
सारिका काळे - खो खो
दत्तू भोकनळ - रोईंग
मनू भाकर - नेमबाजी
सौरभ चौधरी - नेमबाजी
मधुरीका पाटकर - टेबल टेनिस
दिविज शरण - टेनिस
शिवा केशवन - हिवाळी खेळ
दिव्या काकरान - कुस्ती
राहुल आवारे - कुस्ती
सुयश जाधव - पॅरा स्विमिंग
संदीप - पॅरा अॅथलीट
मनीष नरवाल - पॅरा नेमबाज

रायगड आणि जगदलपूर येथे ‘ट्रायफूड प्रकल्प’चा शुभारंभ.



🔰20 ऑगस्‍ट 2020 रोजी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते रायगड (महाराष्ट्र) आणि जगदलपूर (छत्तीसगड) या शहरांमध्ये ट्रायफेड संस्थेच्या “ट्रायफूड प्रकल्प”च्या प्रक्रिया केंद्रांचा आभासी शुभारंभ करण्यात आला.

🔰रायगडचा कारखाना मोह, आवळा, सीताफळ आणि जांभळाच्या मूल्यवर्धनासाठी वापरला जाणार आणि मोह सरबत, आवळा सरबत, कँडी, जांभळाचे सरबत आणि सीताफळाचा गर तयार करणार. जगदलपूरच्या बहुविध प्रक्रिया केंद्राचा वापर मोह, आवळा, मध, काजू, चिंच, आले, लसूण आणि इतर फळे तसेच भाज्याच्या प्रक्रियेसाठी केला जाणार. मोह सरबत, आवळा रस, कँडी, शुद्ध मध, आले-लसूण मिश्रण आणि फळ आणि भाज्यांचा लगदा बनवला जाणार.

🔴टरायफूड प्रकल्पाविषयी...

🔰टरायफूड प्रकल्पाचा उद्देश दोन्ही घटकांना त्याच्या इच्छित गुणवत्तेत रूपांतरित करणे हा आहे. अन्नप्रक्रिया मंत्रालयाच्या सहकार्याने आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या ट्रायफेड संस्थेकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार असून आदिवासीं वन मजुरांनी गोळा केलेल्या वन्य उत्पादनांचे योग्य मूल्यवर्धन आणि योग्य वापराद्वारे आदिवासींचे उत्पन्न वाढवणे हे ट्रायफूड प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. हे साध्य करण्यासाठी प्रारंभी दोन गौण वन उत्पादन (MFP) प्रक्रिया कारखान्यांची स्थापना करण्यात येणार आहे.

🔰अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने  प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या अंतर्गत स्थापन करण्यात येणारे कारखाने राज्यातल्या वन धन केंद्राकडून कच्चा माल खरेदी करणार. संपूर्ण प्रक्रिया केलेली उत्पादने संपूर्ण देशात ‘ट्राइब इंडिया’ दुकानात आणि नेमलेल्या दुकानांमध्ये विकली जाणार. शिवाय, उत्पादने विक्री करू शकतील अशा आदिवासी उद्योजकांना निवडून प्रशिक्षण देण्याची ट्रायफेड संस्थेची योजना आहे.

🔴इतर ठळक बाबी..

🔰टरायफेड संस्थेनी देशातल्या 21 राज्य सरकारच्या संस्थांच्या सहकार्याने राबवलेल्या या योजनेमुळे आदिवासी अर्थव्यवस्थेत आतापर्यंत 3000 कोटीं रुपयांपेक्षा अधिक निधी आला आहे.

🔰म 2020 मध्ये सरकारकडून चालना देताना गौण वन उत्पादनांच्या किंमती 90 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्या आणि 23 नवीन वस्तूंचा समावेश MFPच्या यादीमध्ये करण्यात आला.

🔰आदिवासी जमाती आणि वनवासी तसेच घरगुती आदिवासी कारागीर यांना रोजगार निर्मितीचा स्रोत म्हणून उदयाला आलेली वन धन विकास केंद्र / आदिवासी स्टार्टअप उद्योग देखील याच योजनेचा एक घटक आहे.

🔰22 राज्यांतल्या 3.6 लक्ष आदिवासी जमातींना आणि 18000 बचत-गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 18500 बचतगटांमध्ये 1205 आदिवासी उपक्रमांची स्थापना केली आहे.

🔴TRIFED विषयी..

🔰भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) या संस्थेचे कामकाज आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत चालते. संस्थेची स्थापना 06 ऑगस्ट 1987 रोजी झाली.

२२ ऑगस्ट २०२०

Online Test Series

पोलीस भरती प्रश्नसंच

1) मसुली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यातआहे
▪️उत्तराखंड

2) गीताजंली एक्सप्रेस कोणत्या स्थानकादरम्यान धावते
▪️मबई-कोलकाता

3) चेतक एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते
▪️उदयपूर-दिल्ली

4) राजधानी एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते
▪️नवी दिल्ली - मुंबई सेंट्रल

5) उडिसा राज्यातील रुलकेला येथे कोणता कारखाना आहे
▪️पोलादाचा

6) गुजरात राज्यातील सोनगड येथे कोणता कारखाना आहे
▪️कागदाचा

7) झारखंड राज्यातील सेंद्री कशासाठी प्रसिध्द आहे
▪️खत प्रकल्प

8) हिमाचल प्रदेशातील कोणते देशातील पहिले व सर्वाधिक उंच धरण आहे
▪️भाक्रा

9) भारतातील बहुसंख्य लोकांचे प्रमुख अन्न कोणते
▪️तांदुळ

10) राजस्थानमध्ये कालव्याच्या पाणीपुरवठ्यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर वाढले आहे
▪️गहु


२१ ऑगस्ट २०२०

वाचा :- भारत सरकारच्या केंद्रीय योजना



1) स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया

▪️परारंभ - १६ जानेवारी २०१६

▪️उद्देश - या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय [स्टार्ट अप ] सुरु करण्यासाठी साहाय्य केले जाते.
______

2) दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना [DDUGKY]

▪️परारंभ - २५ सप्टेंबर २०१४

▪️योजनेचा उद्देश - ग्रामीण युवकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणे आहे.
______

3) प्रसाद [Piligrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive]

▪️परारंभ - ९ मार्च २०१५

▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत अमृतसर, अजमेर, अमरावती, द्वारका, गया, कांचीपुरम, केदारनाथ, कामाख्य, मथुरा, पुरी, वाराणसी, वेल्लकनी, या तीर्थक्षेत्रामध्ये जागतिक दर्जाच्या पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत.
______

4) उडाण योजना

▪️परारंभ - १४ नोव्हेंबर २०१४

▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत उच्च तांत्रिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहन दिले जाते.
______

5) प्रधानमंत्री उज्वला योजना

▪️परारंभ - १४ नोव्हेंबर २०१४

▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत दारिद्ररेषेखालील ५ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जात आहे.
______

6) नमामि गंगे प्रकल्प

▪️परारंभ - १० जुलै २०१४

▪️उद्देश - गंगा नदीचे शुद्धीकरण, संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
______

7) सेतू भारतम प्रकल्प

▪️परारंभ - ४ मार्च २०१६

▪️उद्देश - रेल्वे क्रॉसिंगपासून सर्व राष्ट्रीय महामार्ग मुक्त करण्यासाठी आणि २०१९ राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.


वाचा :- 10 सराव प्रश्न व उत्तरे



Q1) कोणत्या भारतीय कार्यकर्त्याची संयुक्त राष्ट्रसंघाच्या नव्या सल्लागार गटात निवड केली गेली?

➡️उत्तर :- अर्चना सोरेंग

Q2) 2020 साली जागतिक व्याघ्र दिनाची घोषणा काय आहे?

➡️उत्तर :- देअर सर्व्हायव्हल इज इन अवर हॅंड्स

Q3) भारताच्या पहिल्या ‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’चे नाव काय आहे?

➡️उत्तर :-  BelYo

Q4) कोणत्या संस्थेनी “रीपोर्ट ऑफ द अनॅलिटिकल सपोर्ट अँड सॅंक्शन्स मॉनिटरिंग टीम कंसर्निंग इसिस” या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे?

➡️उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघ

Q5) कोण “क्वेस्ट फॉर रीस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया” हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत?

➡️उत्तर :- विरल आचार्य

Q6) कोणत्या संस्थेनी ‘आश्रय’ या नावाने विलगीकरणाची वैद्यकीय सुविधा तयार केली?

➡️उत्तर :-  प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (DIAT)

Q7) कोण ‘प्रीमियर लीग गोल्डन बूट’ हा सन्मान जिंकणारा सर्वात वरिष्ठ खेळाडू ठरला?

➡️उत्तर :-  जेमी वर्डी

Q8) कोणत्या व्यक्तीची सोमालिया देशाचे कार्यवाह पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली?

➡️उत्तर :- महदी मोहम्मद गुलाईड

Q9) कोणत्या मंत्रालयाने “इंडिया रिपोर्ट ऑन डिजिटल एज्युकेशन, 2020” या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?

➡️उत्तर :- मनुष्यबळ विकास मंत्रालय

Q10) कोणत्या बँकेनी को-ब्रँडेड कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड सुविधा देण्यासाठी IRCTC सोबत भागीदारी केली?

➡️उत्तर :- भारतीय स्टेट बँक

Online Test Series

हवामानातल्या बदलांमुळे चातक पक्षीच्या स्थलांतरणाविषयी भारतीय संशोधकांद्वारे अभ्यास.



🌼हवामानातल्या बदलांमुळे चातक पक्षीच्या बदललेल्या स्थलांतरणाचा मागोवा घेण्यासाठी भारतीय संशोधक एक निरीक्षणयुक्त अभ्यास करीत आहेत.

🍁ठळक बाबी...

🌼वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII), भारतीय सुदूर संवेदी संस्था (IIRS) आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांचा हा संयुक्त कार्यक्रम आहे.

🌼आफ्रिकेतून भारतात स्थलांतर करणाऱ्या चातक पक्षीचा मार्गक्रम शोधण्याविषयीचा भारतातला हा पहिलाच अभ्यास आहे.परंपरेनी हिमालयाच्या पायथ्याशी चातक पक्षीचे आगमन ही वर्षाऋतुची चाहूल देते. पावसाळ्याच्या आगमनाच्या वेळेत भारतात दाखल होणारा हा पक्षी ‘वर्षाऋतुचा अग्रदूत’ मानला जातो.

🍁वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII) विषयी...

🌼ही भारत सरकारच्या पर्यावरण, वने व हवामानातले बदल मंत्रालयच्या अंतर्गत कार्य करणारी एक स्वायत्त संस्था आहे. त्याची स्थापना 1982 साली झाली. ही संस्था जैवविविधता, धोकादायक प्रजाती, वन्यजीव धोरण, वन्यजीव व्यवस्थापन, वन्यजीव न्यायवैद्य, स्थानिक पद्धती, पर्यावरण विकास, वास्तव्य, हवामानातले बदल इत्यादी सारख्या अभ्यासाच्या क्षेत्रात संशोधन करते.

वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे



1 6 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले तर हे कितवे राज्याचे औद्योगिक धोरण आहे?
A 3 रे
B 2 रे
C 4 थे
D 6 वे
उत्तर D

2 6 मार्चला महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले त्यानुसार 2025 पर्यन्त राज्याची अर्थव्यवस्था किती ट्रेलियन अमेरिकन डॉलर वाढविणे निश्चित केले आहे?
A 1
B 3
C 4
D यापैकी नाही
उत्तर A

3 शिखर उद्योजकता विकास संस्थेची स्थापना कोणत्या जिल्ह्यात करण्यात येत आहे?
A औरंगाबाद
B पुणे
C नागपूर
D रायगड
उत्तर D

4 क्वॉलिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2019 नुसार भारतातील किती शहरांचा समावेश करण्यात आला आहे?
A 7
B 9
C 5
D 2
उत्तर C
5 लोकशाही निर्देशक 2019 नुसार भारत कितव्या स्थानी आहे?
A 55
B 41
C 39
D 42
उत्तर D

6 भ्रष्टाचार आकलन निर्देशक 2018 नुसार भारत कितव्या स्थानी आहे?
A 80
B 78
C 90
D 81
उत्तर B

7 मंडल धरण प्रकल्प झारखंड राज्यात उत्तर कोयल नदीवर उभारला जात आहे तर या प्रकल्पातुन किती मेगावॅट विद्युत निर्मिती होणार आहे?
A 30
B 24
C 28
D 22
उत्तर C

8 ऑपरेशन क्लीन आर्ट हे कोणत्या प्राण्याच्या रक्षणासाठी सुरू केले आहे?
A गांडूळ
B उंदीर
C बेडूक
D मुंगूस
उत्तर D

9 आशिया आरोग्य परिषद ऑक्टोबर 2019 मध्ये कोणत्या शहरात पार पडली?
A चेन्नई
B सिमला
C पुणे
D दिल्ली
उत्तर D

10 राष्ट्रीय आरोग्य प्रोफाइल 2019 च्या अहवालानुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक जन्मदर आहे?
A उत्तरप्रदेश
B महाराष्ट्र
C बिहार
D मध्यप्रदेश
उत्तर C

11 राष्ट्रीय आरोग्य प्रोफाईल अहवाल प्रथम कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला?
A 2010
B 2008
C 2005
D 2002
उत्तर C

12 घडले कसे हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
A विद्या बाळ
B गिरीश कर्नाड
C राजा ढाले
D नीलम शर्मा
उत्तर B

महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी (मापिसा) 2016.



🅾️ राज्यातील अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी (मापिसा) - 2016 या नव्या कायद्याचा मसुदा शासनाच्या संकेतस्थळावर 19 ऑगस्ट रोजी टाकण्यात आला. त्यानुसार 100 पेक्षा अधिक लोकांचा सहभाग असलेला समारंभ, मेळावा, सार्वजनिक सभा इत्यादींसाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य होण्याची शक्यता आहे.

🧩मसुद्यातील काही प्रमुख बाबी -

🅾️अतर्गत सुरक्षेशी संबंधित संस्था/आस्थापना/प्रकल्पाशी संबंधित असलेल्या सर्व घटकांना सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात येणार.

🅾️ मॉल, रेल्वे स्थानके, विविध सार्वजनिक ठिकाणे, विमानतळे, एसटी बस स्थानके, तलाव व पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्या इ. सर्व सार्वजनिक ठिकाणांवर सुरक्षा तपासणी सक्तीची करण्यात येणार.

🅾️ सरक्षेचा धोका पोचविणार्‍या/कुचराई करणार्‍यास कठोर शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात येणार.

🅾️या कायद्यामुळे सामान्य नागरिकांची सुरक्षा व्यवस्था या कायद्यामुळे वाढणार आहे.

🅾️ राज्यातील धरणे, संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची स्थळे, मोठे प्रकल्प, सागरी किनारे अशा ठिकाणांना विशेष सुरक्षा विभाग म्हणून जाहीर करून तेथे अधिक व्यापक सुरक्षा पुरविणे.

🅾️ नागरी सुरक्षेत जनसहभाग वाढविणे, सीसीटीव्ही सारख्या सुविधा तेथे उभारणे.

 🅾️या कायद्यासाठी सात सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात येईल. गृहमंत्री हे समितीचे अध्यक्ष असतील. समितीत गृह राज्यमंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक, पोलीस आयकुत आणि गुप्तचर विभागाचे प्रमुख हे सदस्य असतील. राज्यात आज एक लाख नागरिकांच्या मागे केवळ 120 पोलीस कर्मचारी आहेत.

 🅾️ एकीकडे नागरीकरण वाढत असताना पोलीस दलावरील ताण वाढत आहे. अशा वेळी नागरिकांनी त्यांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहावे, या सकारात्मक हेतूने हा कायदा आणला जात असल्याचे के. पी. बक्षी यांनी स्पष्ट केले. मकोका कायद्याला 1999 मध्ये विरोध झाला होता. नागरिकांच्या विशेषाधिकारावर गंडांतर आणणारा आणि पोलिसांना अमर्याद अधिकार बहाल करणार्‍या या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यावर टीका होत आहे.

🅾️भारतातील घरबांधणी व्यवसाय

 🅾️द इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकाने भारतातील घरबांधणी व्यवसायाचा आढावा घेतला आहे.

 🅾️ अमेरिकी गृहबांधणी क्षेत्राप्रमाणे भारतीय घरबांधणी क्षेत्रदेखील गंभीर आर्थिक अवस्थेतून जात असून ती संपण्याची चिन्हे नाहीत.

 🅾️भारतात हा व्यवसाय अमेरिकेइतका पारदर्शीपणे केला जात नाही आणि त्यामुळे या व्यवसायातील भांडवलाची व्यवहार्यता व वैधता तपासण्याचा मार्ग उपलब्ध नाही.

 🅾️या व्यवसायातील वाईटाचा परिणाम मात्र सर्वसामान्य ग्राहकांवर होतो. आपल्याकडे ग्राहक घेऊ इच्छितात ते घर जरी वैधावैधतेच्या सीमारेषेवरील भांडवलातून उभे राहिले असले तरी ते विकत घेणारा हा बर्‍याच अंशी करपात्र उत्पन्नातून घरखरेदी करीत असतो.

 🅾️ जवळपास 6 लाख कोटी रुपयांची बुडीत खात्यात निघालेली कर्जे ही अनेक बँकांच्या मुळावर आलेली असताना, महामुंबई म्हणून ओळखल्या जाणार्‍या शहरांत 1.50 लाख घरे पडून आहेत.

🅾️ घरबांधणी या उद्योगात पोलाद, सिमेंट, वाळू, जमीन आणि श्रमशक्ती एकाच वेळी कामास येत असल्याने अर्थव्यवस्थेसाठी या उद्योगाचे महत्त्व विशेष आहे. तसेच हा उद्योग मानवाच्या किमान गरजा भागवण्यासाठी आवश्यक असल्याने त्या दृष्टीनेही त्याची ख्यालीखुशाली एकंदर अर्थव्यवस्थेसाठी गरजेची आहे..


सरोगसी (नियमन) विधेयक 2016.



 🅾️  मातृत्वाचा व्यवसाय मांडणार्‍या व्यावसायिक सरोगसीवर पूर्णपणे बंदी घालणार्‍यासरोगसी (नियमन) विधेयक 2016चा मसुदा 24 ऑगस्ट 2016 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. गेल्या काही वर्षांत भारत सरोगसीचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनत चालला होता. या अनैतिक व्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी हे विधेयक तयार करण्यात आले. भारतीय नागरिक असलेल्या ज्या जोडप्यांना मूलबाळ नाही, अशांनाच फक्त सरोगसीच्या सुविधेचा आधार घेता येईल. हा अधिकार अनिवासी भारतीय अथवा ओव्हरसिज इंडियन कार्ड होल्डरनादेखील मिळणार नाही.

🅾️ दरवर्षी 2000 हजार विदेशी अपत्यांना भारतीय माता सरोगसीद्वारे जन्म देतात. सरोगेट आई व या प्रकारे जन्मलेल्या मुलास कायदेशीर मान्यता देण्याची तरतूद विधेयकात आहे. मात्र, सरोगसीच्या सर्रास व्यवसायाला मान्यता देण्यास केंद्र सरकार तयार नाही. युरोपीय व अन्य देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त दरात सरोगसी उपलब्ध असल्यामुळे, गेल्या काही वर्षांपासून अनेक परदेशी नागरिक केवळ यासाठी भारतात येत.

🅾️भारतातला आदिवासी तथा ग्रामीण भाग जणू या व्यवसायाचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनला होता. पैसे मोजून गरीब महिलांचे गर्भाशय भाड्याने घेणे गुन्हा आहे. गरजेतून निर्माण झालेली ही सोय कालांतराने लोकांच्या हौसेची बाब बनली आहे. अनेक लोकप्रिय व्यक्ती ज्यांना अगोदरच एक मुलगा अथवा कन्या आहे, तेदेखील सरोगसीचा वापर करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन महिलांचे शोषण रोखण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळाने हे विधेयक मंजूर केले.

🧩विधेयकाची ठळक वैशिष्ट्ये -

🅾️ कायदेशीर विवाह झालेले भारतीय दाम्पत्यच फक्त भाडोत्री मातृत्वाने अपत्य जन्माला घालू शकेल. मात्र, त्यासाठी दोघांपैकी एकाचे वंध्यत्व वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले असणे बंधनकारक. विवाहाला 5 वर्षे झाली आहेत पण मूल नाही अशांनाच सरोगेट मदरद्वारे मूल घेता येईल.

🅾️परकीय नागरिकास किंवा परदेशस्थ अनिवासी भारतीयास कोणाही भारतीय स्त्रीकडून भाडोत्री माता म्हणून सेवा घेता येणार नाही. ज्या दांपत्याला मूल नाही अशानाच आणि फक्त भारतीयांनाच सरोगसी करण्याची परवानगी. एनआरआय, विदेशी नागरिक, सिंगल पॅरेंटस्, समलैंगिक दांपत्य, लिव्ह इन कपल यांना सरोगसीद्वारे मूल घेता येणार नाही.

🅾️अविवाहित दाम्पत्य, एकटे पालक, लिव्ह-इन पद्धतीने एकत्र राहणारे अथवा समलिंगी दाम्पत्य भाडोत्री मातृत्वाचा वापर करू शकणार नाहीत.

🅾️ कोणाही स्त्रीला केवळ दयाळू भावनेतून इतर कोणाच्या तरी मुलाची भाडोत्री माता होता येईल. त्यासाठी तिला वैद्यकीय खर्चाखेरीज अन्य कोणताही मोबदला मिळणार नाही.

 🅾️25, 000 कोटींचा वर्षाला भारतात भाडोत्री मातृत्व हा धंदा भाडोत्री मातृत्वाच्या नावाखाली ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांचे शोषण होऊ नये, म्हणून खास तरतुदी.

🅾️ भाडोत्री मातृत्वाच्या व्यवहारांचे नियमन करण्यासाठी केंद्र व राज्यांच्या पातळीवर स्वतंत्र मंडळे स्थापन करणार.

🅾️राष्ट्रीय सरोगसी मंडळ केंद्र सरकार स्थापन करणार असून केंद्रीय आरोग्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतील. प्रत्येक राज्यामध्ये असे सरोगसी मंडळ तेथील आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणार आहे.

🅾️सरोगेट मदरही केवळ जवळची नातेवाईकच पाहिजे. त्या महिलेला फक्त एकदाच सरोगेट मदर होता येईल. ती महिला विवाहित हवी.

🅾️सरोगेट मूल घेणार्‍या महिलेचे वय 23 ते 50 वर्षांदरम्यान हवे. पुरुषाचे वय 26 ते 55 वर्षांदरम्यान पाहिजे.

🅾️ दशात 2000 सरोगसी क्लिनिक आहेत. क्लिनिकने 25 वर्षांचे सरोगसी रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक आहे.

🅾️सरोगेट मुलगा किंवा मुलीला संबंधित दांपत्याच्या मालमत्तेत इतर मुलांप्रमाणेच वाटा मिळेल.

🅾️ सवतःचे मूल असलेल्यांना किंवा दत्तक मूल असलेल्यांना सरोगसीचा पर्याय वापरण्याची परवानगी नसेल. एक महिला फक्त एकदाच सरोगेट माता होऊ शकेल. त्यासाठीही ती विवाहित व निरोगी बाळाची माता असणे बंधनकारक असेल.

🅾️सरोगसी क्लिनिकची नोंदणी बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे या उपायातून जन्माला येणार्‍या बाळाचे संपूर्ण तपशील 25 वर्षांपर्यंत सांभाळून ठेवणे या क्लिनिकवर बंधनकारक असेल. अशा क्लिनिकने किंवा संबंधित दांपत्याने सरोगेट मातेकडे दुर्लक्ष केले किंवा बाळाचा त्याग केला तर दहा लाख रुपयांचा दंड आणि 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाईल.

🅾️दहीहंडीची उंची 20 फुटांची

 🅾️ महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या दहीहंडी उत्सवात दहीहंडीचा थर वीस फुटांच्या वर नेण्यात येऊ नये, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. अनिल आर. दवे, न्या. उदय ललित व न्या. एल. नागेश्‍वर राव यांच्या पीठाने अधोरेखित केला. या निर्बंधा

🅾️निर्बंधांच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळल


मनोरुग्ण सुरक्षा विधेयक मंजूर.



🅾️ मनोरूग्णावस्थेत आत्महत्येचा प्रयत्न करणे यापुढे गुन्हा ठरणार नाही..

🅾️अशा प्रकरणात मानसिक रूग्णावस्थेने ग्रस्त व्यक्तिवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करता येणार नाही, हा महत्वपूर्ण आशय अधोरेखित करणारे तसेच मनोरूग्णांच्या सुविधा व अधिकारांवर भर देणारे, मनोरूग्ण सुरक्षा व अधिकार दुरूस्ती विधेयक राज्यसभेत १३४ दुरूस्त्यांसह मंजूर झाले..

🅾️ आरोग्यमंत्री.. :-
जे.पी. नड्डा..

🅾️ विधेयकातील तरतूदींनुसार मनोरूग्णांवर आवश्यकतेनुसार उपचार केले जातील..

🅾️महिला व लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. मानसिक दृष्टया आजारी रूग्णाला रूग्णालयात ३0 दिवस ठेवता येईल..

🅾️ तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ९0 दिवसांपर्यंत ही मुदत वाढवताही येईल..

🅾️ मानसिक रूग्णांच्या उपचारासाठी देशात सुयोग्य डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, ही बाब लक्षात घेउन वैद्यकीय अभ्यासक्रमात मनोरूग्ण चिकि त्सा अभ्यासक्रमाच्या जागाही वाढवण्यात आल्या आहेत..

🅾️  दशात मानसिक रूग्णांची संख्या नेमकी किती याचा शोध घेण्यासाठी बंगलुरूच्या निमहान्स संस्थेने सर्वेक्षण सुरू केले आहे..

🅾️ या सर्वेक्षणासाठी देशाची विभागणी ६ प्रभागांमधे करण्यात आली आहे..

🅾️ पराथमिक अंदाजानुसार देशात एकुण लोकसंख्येपैकी ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजाराने कमी अधिक प्रमाणात ग्रस्त असल्याचा अंदाज आहे..

🅾️ यापैकी २ टक्के रूग्ण गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त आहेत..


भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या सुरक्षेसाठी ड्रोन आधारित टेहळणी प्रणालीचा वापर.



🔰कमीत कमी मनुष्यबळामध्ये खूप मोठ्या जागेवर सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन टेहळणी प्रणाली एक अतिशय महत्त्वाची आणि किफायतशीर प्रणाली म्हणून उदयाला येत आहे. रेल्वेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे आणि सुरक्षा व्यवस्थेला आणखी पाठबळ पुरवणे हा ड्रोन प्रणाली तैनात करण्याचा उद्देश आहे.

🔴ठळक बाबी..

🔰मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे स्थानकाची संकुले, रेल्वे ट्रॅक सेक्शन यार्ड, कार्यशाळा इत्यादीसारख्या रेल्वेच्या जागांची अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षा करण्याकरीता आणि त्यावर लक्ष ठेवण्याकरीता दोन ‘निन्जा’ मानव-रहीत हवाई वाहनांची खरेदी केली आहे. वास्तविक वेळेत शोध, चलचित्रपट तयार करण्याची या ड्रोनची क्षमता आहे आणि स्वयंचलित फॉल सेफ मोडमध्ये देखील त्यांचे परिचालन करता येते.

🔰रल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) चार कर्मचाऱ्यांच्या एका पथकाला ड्रोन उड्डाणाचे, त्याद्वारे लक्ष ठेवण्याचे आणि देखभालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

🔰रल्वेच्या सुरक्षेसाठी ड्रोनचा व्यापक प्रमाणावर वापर करण्याचे RPF दलाने ठरवले असून आतापर्यंत 31.87 लक्ष रुपये खर्चून दक्षिण पूर्व रेल्वे, मध्य रेल्वे, मॉडर्न कोचिंग फॅक्टरी, रायबरेली आणि दक्षिण पश्चिम रेल्वे येथे नऊ ड्रोन खरेदी करण्यात आले आहेत.

🔰तसेच 97.52 लक्ष रुपये खर्चाने आणखी 17 ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत RPFच्या 19 कर्मचाऱ्यांना ड्रोनचे प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि त्यापैकी चार जणांना ड्रोन उड्डाणाचा परवाना प्राप्त झाला आहे.

🔴ड्रोन प्रणालीचे उपयोग...

🔰रल्वेच्या संकुलात जुगार, कचरा फेकणे, फेरीने विक्री करणे यांसारख्या गुन्हेगारी तत्वांवर लक्ष ठेवण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त आहे.

🔰याचा वापर विविध प्रकारच्या माहितीचे संकलन आणि विश्लेषणासाठी होणार आहे. या माहितीचा उपयोग रेल्वेगाड्यांच्या सुरक्षित परिचालनासाठी आणि संवेदनशील भागांमध्ये होऊ शकतो.

🔰आपत्ती घडलेल्या ठिकाणी मदत, बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी तसेच विविध संस्थांमध्ये समन्वयासाठी देखील ड्रोन तैनात केली जाऊ शकतात.

🔰रल्वेच्या मालमत्तांवर होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी या मालमत्तांचा नकाशा तयार करण्यासाठी देखील ड्रोन उपयुक्त आहेत.

🔰खप जास्त प्रमाणात होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करताना जास्त गर्दी होणारी ठिकाणे, गर्दीची वेळ आणि गर्दी पांगवण्यासाठी आवश्यक असलेले उपाय याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती ही प्रणाली उपलब्ध करू शकते आणि त्यानुसार गर्दी नियंत्रणाच्या योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी करता येणार.

🔰डरोनच्या एका कॅमेऱ्याने आठ ते दहा कर्मचाऱ्यांची गरज असलेल्या खूप मोठ्या भागावर लक्ष ठेवता येऊ शकते. त्यामुळे मनुष्यबळाची टंचाई असताना अतिशय कमी मनुष्यबळामध्ये कामे करता येतात.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे आर्थिक शिक्षणाविषयी पंचवार्षिक ‘राष्ट्रीय धोरण’.



🔰आर्थिकदृष्ट्या जागृत आणि सशक्त भारत तयार करण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवून, येत्या पाच वर्षांत आर्थिक शिक्षणाची अंमलबजावणी करण्याविषयीचे ‘राष्ट्रीय धोरण’ भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) जाहीर केले आहे.

🔴उद्दिष्टे..

🔰लोकसंख्येच्या विविध स्तरांमध्ये आर्थिक शिक्षणाद्वारे आर्थिक साक्षरता संकल्पनांचा प्रचार करणे.

🔰सक्रिय बचतीच्या वर्तनाला प्रोत्साहन देणे.वृद्धपकाळ आणि निवृत्तीसाठी असणाऱ्या उत्पादनांच्या व्यतिरिक्त संबंधित व योग्य विमा संरक्षणाद्वारे आयुष्याच्या विविध टप्प्यांवरील जोखमीचे व्यवस्थापन करणे.

🔴धोरणाविषयी...

🔰धोरण पाच ‘C’ स्तंभांवर तयार करण्यात आले आहेत – सामुग्री (Content) याचा विकास, क्षमता (Capacity) निर्मिती, समुदाय (Community) केंद्रीत पद्धती, योग्य संपर्क (Communication) धोरण, आणि शेवटी भागीदारांमध्ये समन्वय (Collaboration).

🔰धोरणामुळे पतविषयी शिस्तीचा विकास होणार आणि औपचारिक वित्तीय संस्थांकडून आवश्यकतेनुसार कर्ज घेण्याला प्रोत्साहन मिळणार. याशिवाय डिजिटल वित्तीय सेवांच्या वापराच्या सुरक्षित पद्धती सुधारणार.

🔰हक्क, कर्तव्ये आणि तक्रारीच्या निवारणासाठीच्या मार्गांविषयीचे ज्ञान दिले जाणार.आर्थिक शिक्षणामधील प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी संशोधन व मूल्यांकन पद्धती सुधारणार.

🔰धोरणात केलेल्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी एक सक्षम संनियंत्रण व मूल्यांकन कार्यचौकट अवलंबण्याचाही सल्ला दिला गेला आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! सरकारी नोकरीसाठी सामायिक परीक्षा.



🔰सरकारी नोकरीबाबत मोदी सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय भरती संस्था अर्थात National Recruitment Agency स्थापन करण्यात येईल. त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल. शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी युवा पिढी अनेक मार्गाचा अवलंब करते. प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपल्या परीक्षा ठेवतात. नोकरीच्या महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने या सगळ्या परीक्षा देतात. मात्र मोदी सरकारच्या निर्णयामुळे हे चित्र बदलण्याची चिन्हं आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयासंबंधी झालेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली.

🔰सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सामायिक परीक्षा घेतली जाईल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था अर्थात National Recruitment Agency स्थापन करण्यात येणार आहे. या संस्थेत एकदा नोंदणी केली की एकच परीक्षा देऊन युवकांना आपली योग्यता सिद्धता करावी लागेल. नोकरीसाठी दारोदारी परीक्षा देत भटकण्याची वेळ युवा पिढीवर येणार नाही. प्रकाश जावेडकर यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हणले, “युवकांना जागोजागी परीक्षा देण्यासाठी जावं लागू नये म्हणून एकच Common Eligibility test असेल. यात गुणवत्ता सिद्ध करुन उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल.”

🔰आज कॅबिनेट मिटिंगमध्ये राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्याखेरीज आणखी एक मोठा निर्णय झाला. देशातल्या सहा विमानतळांचं व्यवस्थापन आणि दैनंदिन व्यवहार खासगी संस्थेला देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. विमान प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने हे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं जावडेकर यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय भरतीसाठी राष्ट्रीय संस्था.



🔰कद्र सरकारमधील बिगर राजपत्रित कर्मचारी, रेल्वे आणि सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी ‘राष्ट्रीय भरती संस्था’ स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. ही संस्था भरती प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत सामायिक पात्रता परीक्षा घेईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

🔰सध्या वेगवेगळ्या २० भरती संस्था केंद्रीय मंत्रालय आणि विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पार पाडतात. त्यासाठी स्वतंत्रपणे विविध पात्रता परीक्षा घेण्यात येतात. केंद्र सरकारी विभागातील ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील १.२५ लाख रिक्त पदांसाठी दरवर्षी सुमारे ३ कोटी उमेदवार विविध परीक्षा देतात. त्यातून वेळ आणि पैसा यांचा अपव्यय होतो.

🔰भरती करणाऱ्या संस्थांमध्ये समन्वय नसल्याने एकाच दिवशी अनेक पात्रता परीक्षा होतात. त्यामुळे उमेदवारांना कुठली तरी एकच परीक्षा देण्याची संधी मिळते.  हा गोंधळ कमी करण्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची भरती कर्मचारी निवड आयोग, रेल्वेसाठी रेल्वे भरती मंडळ  व बँकेतील भरती बँक कर्मचारी निवड संस्था ‘आयबीपीएस’द्वारे केली जाते. सुरुवातीच्या टप्प्यात या तीन संस्थांसाठी एकत्रित सामायिक पात्रता परीक्षा घेतली जाईल.

🔰दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सामायिक पात्रता परीक्षा देता येईल. ती ऑनलाइन असेल आणि गुण तात्काळ जाहीर होतील.  ही परीक्षा १२ भाषांमध्ये घेतली जाईल. या निर्णयासह जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम हे आणखी तीन विमानतळ विकास व व्यवस्थापनासाठी अदानी ग्रुप या खासगी कंपनीकडे ५० वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. लखनऊ,  अहमदाबाद आणि मंगळुरू या विमानतळांची जबाबदारी अदानी समूहाकडे सोपवण्यात आली आहे.

२० ऑगस्ट २०२०

चालू घडमोडी



• फोर्ब्स मासिकाच्या 2020 साली सर्वाधिक मानधन मिळविणाऱ्या 100 खेळाडूंच्या यादीत असलेला एकमेव भारतीय आणि क्रिकेटपटू - विराट कोहली (क्रमांक: 66 वा).

• फोर्ब्स मासिकाच्या 2020 साली सर्वाधिक मानधन मिळविणाऱ्या 100 खेळाडूंच्या यादीत पहिला क्रमांक (पुरुष) - स्विस टेनिसपटू रॉजर फेडरर (द्वितीय: रोनाल्डो; तिसरा: लिओनेल मेस्सी).

• फोर्ब्स मासिकाच्या 2020 साली सर्वाधिक मानधन मिळविणाऱ्या 100 खेळाडूंच्या यादीत पहिला क्रमांक (महिला) - जपानी टेनिसपटू नाओमी ओसाका.

• ..............या राज्य सरकारने मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी ‘रोजगार सेतू’ योजना लागू केली आहे - मध्यप्रदेश.

• नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (NCDEX) यांनी .............. हे भारतातले पहिला अॅग्री फ्युचर्स इंडेक्सचालू केला  - NCDEX अॅग्रीडेक्स.

• राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) याच्या कक्षेत असलेल्या JEE, NEET सारख्या परीक्षांसाठी उमेदवारांना सराव करण्यासाठी............. हे नवीन मोबाइल अॅप सुरु केले आहे. - ‘नॅशनल टेस्ट अभ्यास’ अॅप.

• गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वर्ष 2019-20 मधील कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंग यादीच्या अंतर्गत पंच तारांकित रेटिंग प्राप्त शहरे............ ही आहेत. - अंबिकापूर, राजकोट, सूरत, म्हैसूर, इंदूर आणि नवी मुंबई.

• प्रधान मंत्री वय वंदना योजना (PMVVY) यासाठी ............ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली  - 31 मार्च 2023 पर्यंत.

• 2020-21 ते 2024-25 या आर्थिक वर्षांच्या कालावधीत भारतातल्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या शाश्वत आणि जबाबदार विकासाद्वारे निल क्रांती घडविण्याची नवी योजना - प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY).

• पुढील एका वर्षासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे नवीन अध्यक्ष.................... हे आहेत. - डॉ हर्ष वर्धन (भारताचे आरोग्य मंत्री).

• राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) याचे नवे अध्यक्ष - गोविंदा राजुलू चिंतला.

• भारतीय पोलाद संघाचे (ISA) नवे अध्यक्ष - दिलीप ऊंमेन.

• .................या राज्य सरकारने शेतकऱ्यांना अधिक पिके घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी राजीव गांधी किसान कल्याण योजना जाहीर केली – छत्तीसगड.

• ..................या राज्यातल्या आदिवासीबहुल झाबुआ जिल्ह्यात ग्रामीण उपजीविका अभियानाच्या महिलांनी सुरक्षित प्रसूतीसाठी ग्रामीण महिलांसाठी दीदी वाहन सेवा सुरू केली - मध्यप्रदेश.

• भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी कोविड-19च्या निदानासाठी मान्यता दिलेली पूर्णपणे स्वदेशी निदान चाचणी पद्धत - ट्रूनॅट कोविड-19 टेस्ट.

• जैवविविधतेच्या संभाषणात तरुण पिढीचा सहभाग समाविष्ट असलेला WWF इंडिया याचा नवा उपक्रम - WWF मॉडेल कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (MCoP).

•  ‘प्रत्येकाला रोजगार मिळेल’ (Everybody will get employment) या  योजनेची घोषणा करणारे........... राज्य होय - मध्यप्रदेश.

• सप्टेंबर 2020 पासून उघडणाऱ्या "हुनर हाट" ची थीम  - "लोकल टू ग्लोबल".

• इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतीय हवामान विभाग (IMD) सेवा.................. या मोबाइल अॅपवर आणली आहे - उमंग (युनिफाइड मोबाइल अॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नेंस).

• ...........या केंद्रशासित प्रदेश सरकारने “सुकून’ - कोविड-19 बीट द स्ट्रेस” उपक्रम सुरू केला – जम्मू व काश्मीर.

• ...............या ट्रेडिंग व्यासपीठाने कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज क्षेत्रात 'गोल्ड मिनी ऑप्शन्स' बाजारात सादर करण्याची घोषणा केली - नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE).

• ऑटोमॅटिक कंट्रोल अँड डायनामिक ऑप्टिमायझेशन सोसायटी याद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल इंटरनेशनल ट्रॅव्हल अवॉर्ड या पुरस्काराचे विजेता - डॉ. तौसिफ खान एन. (एसआरएम युनिव्हर्सिटी, आंध्रप्रदेश).

• आंतरराष्ट्रीय जाहिरात संघ (IAA) यांचा "2020 यंग लीडर कंपास अवॉर्ड" या पुरस्काराचे विजेता - अनंत गोयंका (इंडियन एक्सप्रेस ग्रुप).

• भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या नावावरून ..............या देशाने राजधानीतल्या रस्त्याला नाव दिले - इस्त्रायल.

• .....................या देशाच्या अध्यक्षतेत ‘कोविड-19 महामारी विषयक शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आभासी परिषद’ पार पडली - रशिया.

• आदिवासी तरुणांना डिजिटल माध्यमातून मार्गदर्शनासाठी तयार केलेला नवीन कार्यक्रम - “गोल (गोइंग ऑनलाईन अॅज लीडर्स)”.

• भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाचे नवे महासंचालक - व्ही. विद्यावती.

• पश्चिम बंगाल सरकारने 6 जिल्ह्यात 50,000 एकर नापीक जमीन वापरात आणण्यासाठी तयार केलेली योजना - ‘मतीर स्मृस्ती’

• ................या राज्य सरकारने शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत मोफत शिक्षण मिळविण्यासाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख रुपयांवरून अडीच लाखांपर्यंत वाढविली आहे. – राजस्थान.

• ...............हे राज्य सरकार महत्वाकांक्षी राजीव गांधी किसान न्याय योजना 21 मे पासून राज्यात लागू करणार आहे - छत्तीसगड.

• डिजिटल / ऑनलाइन शिक्षणापर्यंत बहू-पद्धतीने प्रवेश मिळविण्यासाठी भारत सरकारचा............... हां नवा कार्यक्रम आहे. – पीएम ई-विद्या (PM eVIDYA).

• 2025 सालापर्यंत प्रत्येक मुलाने इयत्ता 5 वीच्या शिक्षणाची पातळी गाठली पाहिजे याची खात्री करुन घेण्यासाठी राष्ट्रीय मूलभूत साक्षरता व संख्याशास्त्र अभियान...............पर्यंत सुरू केले जाणार आहे. - डिसेंबर 2020.

• 2020 साली जागतिक उच्च रक्तदाब दिनाची (17 मे) ............. ही होती. - "मेजर युवर ब्लड प्रेशर, कंट्रोल इट, लिव लॉन्गर".

• उपग्रहांच्या संरक्षणासाठी ‘स्पेस ऑपरेशन्स स्क्वॉड्रॉन’ नावाने नवीन अंतराळ संरक्षण दल तयार करणारा.......... हा देश आहे.– जापान.

• ..............या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने 18 मे 2020 रोजी पहिल्या आभासी आणि 73 व्या जागतिक आरोग्य सभेचे उद्घाटन झाले - इस्रायल देशाचे पंतप्रधान ज्यांनी 17 मे रोजी पाचव्या वेळी शपथ घेतली - बेंजामिन नेतन्याहू

• 2020 साली जागतिक मधमाशी दिन (20 मे) याची संकल्पना - “बी एनगेज्ड”.
•  ...................देशाने भारतीय राज्यांतल्या लिम्पीयाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी या विवादित प्रदेशांचा समावेश करीत नवीन राजकीय नकाशाला मान्यता दिली - नेपाळ.

• .................हा देश 2020-21 या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्षपद भूषविणार आहे. - भारत (जपानच्या जागी).

• कोविड-19 महामारीपासून मुक्त होणारा युरोपमधला पहिला देश............. हा होय - स्लोव्हेनिया.

• भारतीय जलशास्त्र (hydrography) आणि संपूर्ण हिंद महासागराच्या क्षेत्रात त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी ब्रिटनच्या अलेक्झांडर डॅलरिम्पल पुरस्काराने सन्मानित झालेल्या भारतीय – वाइस अॅडमिरल विनय बढवार (भारत सरकारचे राष्ट्रीय जलशास्त्रज्ञ).

• ................या संस्थेनी कोविड-19 तपासणीसाठी कमी किंमतीची RT-PCR ची नवीन चाचणी विकसित केली आहे जी केवळ एक तास आणि 45 मिनिटांत परिणाम देते - AIIMS, रायपूर.

• भारतीय नौदलाचे............ हे जहाज मालदीव, मॉरिशस, सेशल्स, मेडागास्कर आणि कोमोरोस या देशांना ‘सागर अभियान’ याच्या अंतर्गत अन्न, औषधे पुरविण्यासाठी रवाना झाले होते. – INS केसरी.

• कोविड-19 प्रकरणांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर वैद्यकीय व्यवसायिकांना मदत करण्याकरीता भारत सरकारने ...............या आखाती देशात 88 परिचारिकांची पहिली तुकडी पाठवली होती. - संयुक्त अरब अमिराती (UAE).

• तंत्रज्ञान विकास मंडळ आणि भारतीय उद्योग संघ (CII) यांच्या वतीने 11 मे 2020 रोजी ...........या शहरात ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला पुनर्चालना (RESTART)’ विषयक एक उच्चस्तरीय डिजिटल परिषद आयोजित केली होती. - नवी दिल्ली.

• भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ आणि............... या स्वयंसेवी संस्थेने आदिवासी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार केला - आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन.

• ................या राज्य सरकारने प्रवासी कामगारांना मदत करण्यासाठी ‘प्रवासी राहत मित्र’ अॅप तयार केले - उत्तरप्रदेश.

• 2020 साली आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन (12 मे) याची संकल्पना - "नर्सेस: ए वॉइस टू लीड – नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ".

• भारतीय महारजिस्ट्रार कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, .............या राज्याने 4 एवढ्या बालमृत्यू दरासह सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे - नागालँड.

• ..............या अभियानाचा भाग म्हणून राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) तिरुचिराप्पल्ली येथे एक अत्याधुनिक महासंगणक स्थापन केले जाणार आहे - नॅशनल सुपरकंप्यूटिंग मिशन.

• ‘फायनान्शियल टाईम्स एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन 2020’ याच्या जागतिक क्रमवारीत .............या भारतीय संस्थेने 50 अग्रगण्य संस्थांमध्ये जागा मिळवली – भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), बंगळुरू (45 व्या क्रमांकावर).

• 2020 वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्सचे भारत आणि मध्य आशियामधले सर्वोत्कृष्ट क्षेत्रीय विमानतळ म्हणून स्कायट्रॅक्स पुरस्कार विजेता - केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळूरू.

• आशिया/ओशिनिया क्षेत्रासाठी फेड कप हार्ट अवॉर्ड 2020 जिंकणारी प्रथम भारतीय खेळाडू  - सानिया मिर्झा (टेनिसपटू).

• युरोप/आफ्रिका क्षेत्रासाठी फेड कप हार्ट अवॉर्ड 2020 याचा विजेता - अॅनेट कोन्टाविट (एस्टोनिया).

• भारतातले........... या राज्याने  ‘FIR आपके द्वार योजना’ लागू केली - मध्यप्रदेश.

• सूक्ष्म उद्योगांची नवीन व्याख्या - गुंतवणूक: रु. 1 कोटीपेक्षा कमी आणि उलाढाल: रु. 5 कोटी.

• लघू उद्योगांची नवीन व्याख्या - गुंतवणूक: रु. 10 कोटी आणि उलाढाल: रु. 50 कोटींपेक्षा कमी.

• मध्यम उद्योगांची नवीन व्याख्या - गुंतवणूक: रु. 20 कोटी आणि उलाढाल: रु. 100 कोटी.

• जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक 'एनर्जी ट्रांजिशन इंडेक्स 2020'मध्ये भारताचा क्रमांक - 74 वा.
       (जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक 'एनर्जी ट्रांजिशन इंडेक्स 2020'मध्ये प्रथम क्रमांक - स्वीडन (त्याच्या पाठोपाठ   स्वित्झर्लंड व फिनलँड)

• देशात पहिल्यांदाच, ...............या राज्यात रेल्वे आणि टपाल खात्याने दरवाजावर वितरण सेवा प्रदान करण्यासाठी हातमिळवणी केली आहे - केरळ.

• भारतीय भुदलाचा युवकांसाठी तीन वर्षांचा इंटर्नशिप कार्यक्रम - ‘टूर ऑफ ड्युटी’.


• ...............या देशाचे नौदल हवाईमध्ये ‘रिम ऑफ द पॅसिफिक’ सराव आयोजित करणार आहे – अमेरिका.

• बौद्धिक संपदा फ्रेमवर्क संदर्भात सुधारणांच्या अभावासाठी .............या देशाने भारताला 'प्रियोरिटी वॉच लिस्ट'मध्ये ठेवले – अमेरिका.

• NASA संस्थेच्या पहिल्या मंगळ हेलिकॉप्टरला अधिकृतपणे “इंजेन्यूटी” नाव देण्यात आले आहे जे ..............या 17 वर्षीय भारतीय मुलगीने सुचविले - वनिझा रुपाणी.

• ओपन बजेट सर्वे 2019’ याच्यानुसार, अर्थसंकल्पीय पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या बाबतीत भारताचे स्थान............. वे आहे. - 53 वा.

• ‘ओपन बजेट सर्वे 2019’ याच्यानुसार, अर्थसंकल्पीय पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या बाबतीत पहिले स्थान - न्यूझीलंड.

• 2020 साली आंतरराष्ट्रीय पत्र स्वातंत्र्य दिनाची (3 मे) संकल्पना - “जर्नलिजम विदाउट फियर ऑर फेवर”.

• 18 ते 20 ऑक्टोबर या काळात .................या ठिकाणी जागतिक पत्र स्वातंत्र्य परिषद 2020 आयोजित केली जाणार आहे – द हेग, नेदरलँड.

• ..................हा देश एव्हरेस्ट पर्वताची उंची मोजण्यासाठी नवीन सर्वेक्षण करीत आहे - चीन.

• फिलिपीन्समधील आशियाई विकास बँक (ADB) येथे प्रधान कार्यकारी समन्वय विशेषज्ञ म्हणून नियुक्त केले गेलेले भारतीय - निलय मिताश.

• फोर्ब्स मासिकाच्या अब्जाधीश राजकारणींच्या वर्ष 2020च्या यादीत समावेश असलेली एकमेव भारतीय  महिला - सावित्री जिंदाल (क्रमांक: 349; संपत्ती: सुमारे 4.6 अब्ज डॉलर).

• जर्मनीच्या ड्यूश वेले या संस्थेचा ‘फ्रीडम ऑफ स्पीच’ पुरस्कार प्राप्त करणारे भारतीय - सिद्धार्थ वरदराजन (द वायर या संस्थेचे संपादक).

• शहरी भागात राहणाऱ्यांना किमान 120 दिवसांच्या रोजगाराची हमी देणारी मुख्यमंत्री शहरी रोजगार गॅरंटी योजना............ या राज्य सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतला - हिमाचल प्रदेश.

• भारतीय विमा नियंत्रण व विकास प्राधिकरणाने (IRDAI) सर्व विमाधारकांद्वारे दिले जाऊ शकणारे विमा मध्यस्थांसाठी मानक व्यवसायिक नुकसानभरपाई धोरणाचा आराखड़ा तयार करण्यासाठी................ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली - यज्ञप्रिया भारत.

• 4 एप्रिल 2020 रोजी कोविड19 विषयक नॉन अलाइन्ड मुव्हमेंट (NAM) यांची आभासी परिषद.............. यांच्या  अध्यक्षतेखाली आयोजित केली गेली - अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हम अलीयेव.

• 4 एप्रिल 2020 रोजी आभासी ‘कोरोनाव्हायरस ग्लोबल रिस्पॉन्स इंटरनॅशनल प्लेजिंग कॉन्फरन्स’ आयोजित करणारे देश – ब्रिटन आणि इतर आठ देश.

• केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते .............या व्यासपीठावर “द सरस कलेक्शन” उपक्रम आरंभ करण्यात आला - गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM).

• महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत राज्यातली जवळपास 100 टक्के लोकसंख्या विमा संरक्षणाखाली आणणारे पहिले राज्य........... हे होय  - महाराष्ट्र.


• रशिया सरकारने नव्या घटनात्मक दुरुस्तीने रशियाचे विद्यमान राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे ..............या वर्षापर्यंत देशाचे नेतृत्व करणार आहे  – वर्ष 2036.

• ................... हा देश 2023 साली पहिला पर्यटक अंतराळात पाठवणार आहे - रशिया.

• सांख्यिकी दिन 2020 निमित्त, सांख्यिकी क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी............. यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. :- - सी. रंगराजन (RBIचे माजी गव्हर्नर).

• आगामी 2020-21 हंगामात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या प्रमुख पंच समितीत समावेश झालेले सर्वात तरुण व्यक्ती............... ही आहे. - नितीन मेनन (36 वर्षीय)

• राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी उत्तरप्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे .............या राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सोपवला  - मध्यप्रदेश.

• ...............या राज्य सरकारने 'प्लॅटिना' नावाचा कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्मा थेरपी-कम-ट्रायल प्रकल्प सुरू केला, जो जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे - महाराष्ट्र.

• ..................हे मंत्रालय 28 जून ते 12 जुलै 2020 या कालावधीत ‘संकल्प पर्व’ कार्यक्रम राबवित आहे, ज्यांच्या अंतर्गत वड, पिंपळ, आवळा, अशोक आणि बेल ही पाच झाडे लावण्यात येणार आहे - सांस्कृतिक मंत्रालय.

• .................या राज्य सरकारने ‘विशेष सुरक्षा दल’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे - उत्तरप्रदेश.

• ...................हे राज्य सरकार 1 जुलैपासून ‘आदर्श पोलीस स्टेशन’ योजना लागू करणार आहे - छत्तीसगड.

• .................या राज्य सरकारने गर्भवती व स्तनपानावर असलेल्या महिलांना पोषक आहार उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री मातृ पुष्टी उपहार योजना’ जाहीर केली आहे. - त्रिपुरा.

• 25-26 जून 2020 रोजी CII संस्थेनी .................या राज्यात आभासी ‘संरक्षण परिषद 2020’ आयोजित केली - गुजरात.

• नीती आयोगाची वर्तन बदल मोहीम - ‘नॅव्हिगेटिंग द न्यू नॉर्मल’.

• केंद्रीय पंचायतराज मंत्रालय द्वारे स्थापित, विविध ऑनलाईन सेवा पुरवण्यासाठी ‘ई-पंचायत पुरस्कार 2020’ याचा विजेता असलेले राज्य  - हिमाचल प्रदेश.

• स्टार्टअप जिनोम संस्थेच्या ‘द ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम रिपोर्ट 2020’ याच्यानुसार, जागतिक स्तरावरील यशस्वी स्टार्टअप तयार करण्यासाठी जगातल्या सर्वाधिक अनुकूल शहरांच्या यादीत प्रथम 40 मध्ये स्थान मिळविणारी दोन भारतीय शहरे - बंगळुरू (26 वा) आणि दिल्ली (36 वा).

• इंडियन रेड क्रॉस सोसायटीद्वारे विकसित केलेले........... हे नवीन मोबाइल अॅप आहे. - ‘ईबल्डसर्विसेस’

• 2019 साली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारी सर्वात लहान राज्ये ......... ही आहेत छोटी - नागालँड आणि त्रिपुरा.(2019 साली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारी 50 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली राज्ये - गुजरात, आंध्रप्रदेश आणि हिमाचल प्रदेश. तर  2019 साली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे केंद्रशासित प्रदेश - दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव.)

• समलिंगी समुदायासाठी नोएडाच्या सेक्टर 50 मेट्रो स्टेशनला समर्पित केल्यानंतर नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (NMRC) त्याचे नाव................ हे ठेवले - "रेनबो" स्टेशन.

•  ‘ज्युरी कमिटी स्पेशल अवॉर्ड’ श्रेणीत ‘संसद रत्न पुरस्कार 2020’ पुरस्काराने गौरविण्यात आलेला........... हा सर्वात तरुण खासदार – के. राम मोहन नायडू (श्रीकाकुलम खासदार).

• महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव - संजय कुमार (अजोय मेहता यांच्या जागी)

• २०२०  चा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार.............. यांना जाहीर झाला आहे  जिंकणारे - डॉ. तात्याराव लहाने (वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक व नेत्ररोग तज्ज्ञ).


• 17-21 ऑगस्ट 2020 या काळात होणाऱ्या शस्त्रास्त्रे व्यापार संधिच्या सदस्य देशांची सहावी परिषद (CSP6)........... येथे आयोजित केली आहे :-  जिनिव्हा, स्वित्झर्लंड.

• भारताबाहेर जगातले पहिले योग विद्यापीठ............ येथे स्थापन करण्यात आले.:- - विवेकानंद योग विद्यापीठ, लॉस एंजेलिस, अमेरिका.

• जागतिक स्तरावर, ताज्या ‘QS नेक्स्ट 100 अंडर 50' रॅंकिंग 2021’ यात प्रथम स्थान - सिंगापूरचे नानयांग टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी.

• केंद्रीय मंत्रीमंडळाने................. या राज्यातल्या कुशीनगर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित करण्याला मान्यता दिली - उत्तरप्रदेश.

• ताज्या ‘QS नेक्स्ट 100 अंडर 50' रॅंकिंग 2021’ यात स्थान मिळविणाऱ्या चार भारतीय संस्था.................... या आहेत  - IIT गुवाहाटी, IIT हैदराबाद, हैदराबाद विद्यापीठ आणि ओपी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी.

• ..................या राज्य सरकारने गरजू लोकांना शिजवलेले भोजन पुरवण्यासाठी ‘इंदिरा रसोई योजना’ लागू केली - राजस्थान.

• महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या 2018-19 या वर्षासाठीच्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार .............. यांना जाहिर करण्यात आला :-  ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर.

• महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या 2018-19 या वर्षासाठीच्या संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ............... यांना जाहिर झाला आहे.:- ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर.

• भारत आणि अमेरिका खंडातला ................हा देश ‘ट्रॅव्हल कॉरिडोर’ तयार करण्याच्या योजनेवर काम करीत आहे ज्यामुळे दोन्ही देशातल्या प्रवासावरील निर्बंध कमी होतात  – संयुक्त राज्ये अमेरिका.

• केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी उच्च शिक्षण संस्थांमधल्या संगोपणाखालील स्टार्टअप उद्योगाना मदत करण्यासाठी ................या उपक्रमाची सुरूवात केली – ‘युक्ती 2.0' (Young India combating COVID with Knowledge, Technology and Innovation).

• ‘हरुन रिच लिस्ट 2020’ यादीनुसार जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती - जेफ बेझोस (अॅमेझॉन). (हरुन रिच लिस्ट 2020’ यादीनुसार 9 व्या क्रमांकावर असलेले भारतीय - मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीज)

•  ‘कोरोनिल’ नावाने कोविड-19 आयुर्वेद औषध तयार करणारी कंपनी - पतंजली आयुर्वेद.

• एकूण बाजार भांडवलाच्या बाबतीत जागतिक स्तरावरील सूचीबद्ध कंपन्यांच्या यादीत 57 व्या क्रमांकावर असणारी पहिली भारतीय कंपनी............... ही होय  - रिलायन्स इंडस्ट्रीज (150 अब्ज डॉलर).

• “डिकार्बनायझिंग ट्रान्सपोर्ट इन इमर्जिंग इकॉनॉमीज” या उपक्रमात............... हे देश सहभागी झाले होते. - अर्जेंटिना, अझरबैजान, भारत आणि मोरोक्को.

• एकूण बाजार भांडवलाच्या बाबतीत जागतिक स्तरावरील सूचीबद्ध कंपन्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असणारी कंपनी - सौदी अरामको, सौदी अरब (1764.5 अब्ज डॉलर).

• 11 लक्ष कोटी रुपये एवढे बाजार भांडवल गाठणारी.................. ही पहिली भारतीय कंपनी  ठरली.- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड.

• महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या “अभय” नावाच्या उपक्रमासाठी “आत्मनिर्भर भारत 65 वा राष्ट्रीय SKOCH पुरस्कार 2020” जिंकणारे - सिद्धार्थ कौशल (प्रकाशम जिल्हा पोलिस अधीक्षक).

• .............. या राज्य सरकारने कल्पनाक्षम शिक्षणासाठी ‘एकतू खेलो, एकतू पढो’ नावाचा एक उपक्रम जाहीर केला - त्रिपुरा.

• 2020 साली आंतरराष्ट्रीय योग दिनाची (21 जून) संकल्पना ................... ही होती.- "योग फॉर हेल्थ – योग अॅट होम".

• २१ जून 2020 रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक जल-सर्वेक्षण दिनाची संकल्पना ................ ही होती.- “हायड्रोग्राफी एनेबलिंग ऑटोनोमस टेक्नॉलजीज”.

• जागतिक संगीत दिन ................ रोजी साजरा केला जातो.- 21 जून.

• नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या ग्रहाच्या ‘ट्रायडंट’ नावाच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध घेण्यासाठी मोठा ‘ट्रायडंट’ मोहीम पाठविणार आहे - नेपच्यून.

• फुटबॉलमध्ये ‘महिला आशिया चषक 2020’ स्पर्धेचा यजमान देश.............. हा होय. - भारत.


• ऑगस्ट 2021 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद ................. या देशांकडे असणार आहे.:- - भारत.

• आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पर्यटन मंत्रालयाच्या आठवडाभराच्या समारंभाची सुरुवात 15 जूनला सोशल मीडियावरील कार्यक्रमांमधून झाली, जे ..............या विषयावर तयार केले गेले आहेत - “योग @ होम अँड योग विथ फॅमिली”.

• ऑन-डिमांड म्हणून सादर केलेली.............. ही भारताची पहिली क्लाऊड सर्व्हिस - डेटा समुद्र, बेंगळुरू (टेलीइंडियाची उपकंपनी).

• 21 जून रोजी संगीताच्या माध्यमातून ‘स्पिरिट ऑफ योग’ नावाचा योग उत्सव ...........या संस्थेच्या वतीने जगभरातल्या भारतीय मिशनद्वारे सुरू केला जाणार आहे - भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR).

• “ए सॉन्ग ऑफ आइस अँड फायर” मालिकेसाठी सायन्स फिक्शन श्रेणीत ‘टेरन प्राइज’ पुरस्कार.............. यांनी  जिंकला आहे. - मौरिस ह्याईम्स (मुंबईत जन्मले).

• बनारसी पान, बनारसी लंगडा (आंबा), बाराबंकी हातमाग यासाठी GI टॅग प्राप्त करणारे  भारतातील राज्य - उत्तरप्रदेश.

• BP कंपनीच्या अहवालानुसार, वर्ष 2019 मध्ये जगातल्या प्राथमिक ऊर्जेचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक........... वा लागतो  – द्वितीय (प्रथम: चीन).

• वर्ष 2021-22 या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी आशिया-प्रशांत प्रदेशातून संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) ...........या देशाचा नवनियुक्त तात्पुरता सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे :- भारत (आठव्यांदा).

• वर्ष 2021-22 या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याचे नवनियुक्त तात्पुरते सदस्य.......... हे आहेत:- भारत, आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वे.

• संयुक्त राष्ट्रसंघ महासभेचे (UNGA) नवनियुक्त अध्यक्ष........... हे आहेत.:- वोल्कन बोजकिर (तुर्की मुत्सद्दी).

• भारताची पहिली फिरती कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा........... ही आहे : – इनफेक्शीयस डिसीज डायग लॅब लॅब (I-LAB).

• 24 जून 2020 रोजी........... या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विजय दिनाच्या पथ संचलनामध्ये भाग घेण्यासाठी 75 सदस्यांचे भारतीय त्रि-सेवा पथक पाठविण्याला भारताने सहमती दर्शविली होती. - मॉस्को, रशिया.

• व्यवसायिक ड्रोन ऑपरेटरसाठी भारतातले पहिले विमा संरक्षण प्रदान करणारी........... ही  कंपनी आहे. -HDFC एर्गो (ट्रोपोगोच्या भागीदारीत).

• ...............या ठिकाणी 10 हजार खाटांचे जगातली सर्वात मोठी कोरोनाव्हायरस रुग्णालय सुविधा उभारण्यात आले आहे - दिल्ली (राधा सोआमी अध्यात्मिक केंद्रात).

• जर्मन पबलिशर्स अँड बूकसेलर असोसिएशन द्वारे सादर केलेल्या ‘2020 पीस प्राइज ऑफ द जर्मन बूक ट्रेड’ या पुरस्काराचे विजेते ........... हे आहे. - अमर्त्य सेन (नोबेल पुरस्कार विजेते भारतीय अर्थशास्त्रज्ञ).

• .................हे राज्य सरकार फेस मास्क घालण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘मास्क दिन’ म्हणून पाळणार आहे - कर्नाटक.

• बिहार खादीचे ब्रँड अॅम्बेसेडरम्हणून ................ यांची निवड करण्यात आली आहे. - अभिनेता पंकज त्रिपाठी.

• ...................या संस्थेच्या संशोधकांनी संघटनांना कामाची जागा कोविड-10 विषाणूपासून संरक्षित करण्यात मदत करण्यासाठी ‘वर्कप्लेस रेडीनेस इंडिकेटर’ विकसित केले आहे - भारतीय विज्ञान संस्था (IISc) बेंगळुरू.

• 2020 साली ‘जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन’ची संकल्पना............. ही होती. - “फूड.फीड.फायबर. – द लिंक्स बिटविन कन्जम्पशन अँड लँड”.

• UNCTADच्या ‘जागतिक गुंतवणूक अहवाल 2020’नुसार, 2019 साली भारतात झालेली FDI गुंतवणूक – 51 अब्ज डॉलर (20 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ).

• .............ही संस्था चीन, जपान, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलँड आणि व्हिएतनाम या देशांना जोडणारी उच्च-कार्यक्षम पाण्याखालून इंटरनेट केबल टाकत आहे - एशिया डायरेक्ट केबल (ADC) कन्सोर्टियम.

• इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) यांच्या ‘जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2020’च्या अहवालानुसार भारताचा ............. वा क्रमांक लागतो. - 43 वा.


वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे



1 6 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले तर हे कितवे राज्याचे औद्योगिक धोरण आहे?
A 3 रे
B 2 रे
C 4 थे
D 6 वे
उत्तर D

2 6 मार्चला महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले त्यानुसार 2025 पर्यन्त राज्याची अर्थव्यवस्था किती ट्रेलियन अमेरिकन डॉलर वाढविणे निश्चित केले आहे?
A 1
B 3
C 4
D यापैकी नाही
उत्तर A

3 शिखर उद्योजकता विकास संस्थेची स्थापना कोणत्या जिल्ह्यात करण्यात येत आहे?
A औरंगाबाद
B पुणे
C नागपूर
D रायगड
उत्तर D

4 क्वॉलिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2019 नुसार भारतातील किती शहरांचा समावेश करण्यात आला आहे?
A 7
B 9
C 5
D 2
उत्तर C
5 लोकशाही निर्देशक 2019 नुसार भारत कितव्या स्थानी आहे?
A 55
B 41
C 39
D 42
उत्तर D

6 भ्रष्टाचार आकलन निर्देशक 2018 नुसार भारत कितव्या स्थानी आहे?
A 80
B 78
C 90
D 81
उत्तर B

7 मंडल धरण प्रकल्प झारखंड राज्यात उत्तर कोयल नदीवर उभारला जात आहे तर या प्रकल्पातुन किती मेगावॅट विद्युत निर्मिती होणार आहे?
A 30
B 24
C 28
D 22
उत्तर C

8 ऑपरेशन क्लीन आर्ट हे कोणत्या प्राण्याच्या रक्षणासाठी सुरू केले आहे?
A गांडूळ
B उंदीर
C बेडूक
D मुंगूस
उत्तर D

9 आशिया आरोग्य परिषद ऑक्टोबर 2019 मध्ये कोणत्या शहरात पार पडली?
A चेन्नई
B सिमला
C पुणे
D दिल्ली
उत्तर D

10 राष्ट्रीय आरोग्य प्रोफाइल 2019 च्या अहवालानुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक जन्मदर आहे?
A उत्तरप्रदेश
B महाराष्ट्र
C बिहार
D मध्यप्रदेश
उत्तर C

11 राष्ट्रीय आरोग्य प्रोफाईल अहवाल प्रथम कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला?
A 2010
B 2008
C 2005
D 2002
उत्तर C

12 घडले कसे हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
A विद्या बाळ
B गिरीश कर्नाड
C राजा ढाले
D नीलम शर्मा
उत्तर B

वेदिक वाड्मयाची रचना



◾️ आर्य लोक निसर्गप्रेमी आणि अनेक देव-देवतांचे पूजक होते.

◾️ सर्य, अग्नी, पर्जन्य, मरुत आणि इंद्र या त्यांच्या प्रमुख देवता होत्या. या देवतांना प्रत्यांना प्रसन्न करण्यासाठी ते प्रार्थना करीत व स्तुति करण्याकरीता मंत्र म्हणीत असे.

◾️ या मंत्राना सूक्त म्हणतात या मंत्राचा समूह म्हणजे वेद होय. यामधून आर्यांनी खालील ग्रथसंपदेची रचना केली.

◾️ वद : आर्यानी निर्माण केलेली पहिली ग्रंथरचना म्हणजे वेद होय. वेद चार प्रकारचे आहेत.

1) ऋवेद : हा आर्यांचा पहिला ग्रंथ असून यामध्ये देवतांना प्रसन्न करण्याकरीता रचलेल्या ऋचांचा समावेश आहे.

2) यजुर्वेद : हा ग्रंथ यज्ञाविषयी माहिती देणारा आहे.

3) सामवेद : या ग्रंथामध्ये ऋचांचे तालासुरात कसे गायन करावे याबाबतची माहिती आहे.

4) अर्थवेद : या ग्रंथामध्ये दैनंदिन जीवनातील संकटे निवारण करण्याकरीता आणि उत्तम आरोग्य कराव्या लागणार्‍या उपायाची माहिती आहे.

'स्पेस एक्स'ची कुपी अवकाशवीरांसह माघारी



▪️अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन ही कुपी अवकाश स्थानकाला भेट देऊन अवकाशवीरांसह परत येत आहे.

▪️खासगी कंपनीच्या माध्यमातून नासाने अवकाशवीर पाठवणे व त्यांचे परत पृथ्वीवर येणे या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच घडत असून ही अवकाश कुपी पृथ्वीवर सुरक्षित उतरवण्यासाठी स्पेस एक्स कंपनी मार्गदर्शन करीत आहे.

▪️मक्सिकोच्या आखातात रविवारी दुपारी ही कुपी अवतरण करणार असून दोन महिन्यांच्या अवकाश वास्तव्यानंतर ती परत येत आहे.

▪️ही कुपी उतरवण्यासाठी मेक्सिको आखाताची निवड करण्यात आली आहे, कारण फ्लोरिडातील किनाऱ्यावर एक उष्णकटीबंधीय वादळ आहे.

▪️अवकाश वैमानिक डग हर्ले व बॉब हेनकेन हे दोन अमेरिकी अवकाशवीर आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात स्पेस एक्सच्या ड्रॅगन अवकाशकुपीतून गेले होते.

🛑 ताशी २८ हजार कि.मी. वेगाने परतीचा प्रवास

▪️डरॅगन अवकाशकुपीला आता एंडेव्हर नाव देण्यात आले असून तिचा वेग पृथ्वीकडे येताना ताशी २८ हजार कि.मी असेल.

▪️तो वातावरणात येईपर्यंत ताशी ५६० कि.मी पर्यंत खाली आणावा लागेल.

▪️तयानंतर ही कुपी सागरात पडताना तिचा वेग ताशी २४ कि.मी राहील. परत येताना अवकाशकुपीचे तापमान १९०० अंश सेल्सियस राहील.


जीवशास्त्र - महत्त्वाच्या शाखा


1) Anatomy - Study of the structure of the body.

2) Algology - Study of Algae.

3) Apiology - Study of bees.

4) Anthropology - Study of human cultures.

5) Arachnology - Study of Spiders.

6) Arthrology - Study of Joints.

7) Biology - Study of Life.

8) Botany - Study of Plants.

10) Bacteriology - Study of Bacteria.

11) Bromatology - Study of Food.

12) Carcinology - Study of crabs, crustaceans.

13) Cardiology - Study of the Heart.

14) Carpology - Study of Fruits.

15) Chirology - Study of the Hands.

चालू घडामोडी सराव प्रश्नोत्तरे



● जगातल्या महासागराच्या सर्वाधिक ज्ञात खोलीवर तळाशी पोहोचणारी पहिली महिला आणि व्यक्ती कोण?
: कॅथी सुलिव्हन (अमेरिका - 1984 साली)

● संयुक्त संशोधन, उत्पादनांच्या चाचणी व प्रमाणीकरणासाठी IFFCO या संस्थेसोबत कोणत्या संस्थेनी सामंजस्य करार केला?
: भारतीय कृषी संशोधन परिषद

● युवांना विविध व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षित करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसोबत कोणती संस्था करार करीत आहे?
 : राष्ट्रीय खते मर्यादित

● ‘पूनम अवलोकन’ या अभ्यासाद्वारे कोणत्या प्राण्याची संख्या मोजली गेली?
 : सिंह

● भारतातल्या डिप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेइकल (DSRV) कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले?
: विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश)

● चेन्नई आणि बेंगळुरू या शहरांमध्ये सुरूवात झालेल्या CBICच्या प्रमुख कार्यक्रमाचे नाव काय?
 : तुरंत कस्टम्स

● मर्सेर संस्थेच्या '2020 कॉस्ट ऑफ लिव्हिंग' अहवालानुसार भारतातले सर्वात महागडे शहर म्हणून कोणत्या शहराला ठरविण्यात आले?
 : मुंबई

● “ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट” या शीर्षकाचा अहवाल कोणत्या संघटनेनी प्रसिद्ध केला?
 : जागतिक बँक


● यंदा 2020 सालची जागतिक रक्तदाता दिनाची संकल्पना काय होती?
 : सुरक्षि‍त रक्त, जीव वाचवते

● भारतीय नौदलाच्या पूर्व कमांडचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
: बिस्वजीत दासगुप्ता (वाईस अ‍ॅडमिरल)

● ‘जगनन्ना चेडोडू’ योजना कोणत्या राज्यात लागू करण्यात आली?
 : आंध्रप्रदेश

● ‘पूर्णपणे डिजिटल’ कार्यभार चालविणारी बांधकाम क्षेत्रातली पहिली संस्था कोण?
 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)

● संकेतस्थळ आधारित ‘आरोग्यपथ’ या नावाचे व्यासपीठ कोणत्या संस्थेनी कार्यरत केले?
: वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

● ‘कॅप्टन अर्जुन’ रोबोट कोणत्या शहराच्या रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले आहे?
 : पुणे रेल्वे स्थानक

● आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागृती दिन कधी साजरा केला जातो?
 : 13 जून

● ‘घर घर निगरानी’ मोबाईल अ‍ॅप कोणत्या राज्य सरकारने तयार केले?
 : पंजाब

● आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार समजला जातो?
 : रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड

● वायूच्या वितरणासाठी भारतातले पहिले व्यापार मंच कोणत्या मंडळाने तयार केले?
 : इंडियन एनर्जी एक्सचेंज

● SAUNI योजना कोणत्या राज्यात राबविली जात आहे?
 : गुजरात

● वृद्ध लोकांसोबत गैरवर्तन विषयक जागतिक जागृती दिनाची यंदाची (2020) संकल्पना काय होती?
 : “लिफ्टिंग अप व्हॉईसेस”

● भारतीय निर्यात-आयात बँकेनी (EXIM बँक) कोणत्या देशाला 215.68 दशलक्ष डॉलर इतक्या पतमर्यादेची (LOC) घोषणा केली?
: मलावी (आफ्रिका)

● संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘कुटुंबाला रक्कम पाठवणे विषयी आंतरराष्ट्रीय दिन’ कधी पाळला जातो?
: 16 जून

● कोणत्या देशात “SIPRI ईयरबुक 2020” हा अहवाल प्रकाशित करणारी संस्था आहे?
 स्वीडन

● यंदाची (2020) ‘जागतिक बालमजुरी विरोधी दिन’ची संकल्पना काय होती?
: कोविड-19: प्रोटेक्ट चिल्ड्रेन फ्रॉम चाइल्ड लेबर, नाऊ मोअर दॅन एव्हर

● यंदाची (2020) आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना काय होती?
: “योग फॉर हेल्थ-योग अ‍ॅट होम”

● नवसंशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अटल नवसंशोधन अभियान (AIM) सोबत कोणत्या संस्थेनी भागीदारी केली?
: कोल इंडिया लिमिटेड (CIL)

● अंटार्क्टिकामध्ये प्रथमच अंड्याचे जीवाश्म सापडले आहे. या जीवाश्मला काय नाव देण्यात आले आहे?
: ‘द थिंग’

● यंदाची (2020) जागतिक जल-सर्वेक्षण दिनाची संकल्पना काय होती?
: हायड्रोग्राफी एनेबलिंग ऑटोनोमस टेक्नॉलजीज

● जागतिक बँकेनी बांगलादेशला 1.05 अब्ज डॉलर एवढी रक्कम कोणत्या प्रकल्पाला वित्तपूरवठा करण्यासाठी मंजूर केली?
: प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड डिजिटल आनत्रेप्रेनेऊरशिप

● ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’  दुसऱ्या कोणत्या नावाने संबोधले जाते?
 : रिंग ऑफ फायर

● ‘BMW इंडिया’ या कंपनीचे नवे अध्यक्ष कोण आहेत?
 : विक्रम पवाह (1 ऑगस्ट 2020 पासून)

● अन्नसुरक्षेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाय विकसित करण्यासाठी जागतिक खाद्यान्न कार्यक्रमासोबत कोणत्या संस्थेनी भागीदारी केली?
: भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली


● संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय संक्रांतीचा उत्सव दिन (International Day of the Celebration of the Solstice) कधी साजरा केला जातो?
: 21 जून

●  पहिली आभासी ‘आरोग्यसेवा व वैयक्तिक स्वच्छता प्रदर्शनी 2020’ कोणत्या संस्थेनी आयोजित केली?
: फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री

● ‘इंदिरा रसोई योजना’ कोणत्या राज्य सरकारने जाहीर केली आहे?
 : राजस्थान

● ‘स्टँडर्ड चार्टर्ड बँक ऑफ इंडिया’चे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?
: गौरव माहेश्वरी

● दरवर्षी ‘ऑलिम्पिक दिन’ कधी साजरा केला जातो?
: 23 जून

● “लिजेन्ड ऑफ सुहेलदेव: द किंग हू सेव्ह्ड इंडिया” हे शीर्षक असलेले पुस्तक कोणी लिहिले?
: अमिश त्रिपाठी (लंडन नेहरू सेंटर, संचालक)

● ‘भारतीय वित्तीय तंत्रज्ञान व संबंधित सेवा (IFTAS)’ याचे अध्यक्ष या पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली?
: टी. रबी शंकर

● ‘रत्न व दागिने निर्यात जाहिरात परिषद’चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले?
 : कोलिन शाह



● भारताबाहेरील पहिल्या योग विद्यापीठाचे नाव काय?
: ‘विवेकानंद योग विद्यापीठ’ (VAYU)

● समुदायाप्रती सार्वजनिक सेवेचे मूल्य आणि विकास प्रक्रिया याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘संयुक्त राष्ट्रसंघ लोकसेवा दिन’ कधी साजरा केला जातो?
 : 23 जून

●  मुख्यमंत्री दूरस्थ शिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी हरयाणा सरकारसोबत कोणत्या कंपनीने करार केला?
: रिलायन्स जिओ

● ‘बीदौ उपग्रह प्रणाली’चे प्रक्षेपण कोणत्या देशाने पूर्ण केले आहे?
: चीन

● ‘जिवाणू पेशी’चे आवरण नष्ट करणारे ‘नॅनोझाइम’ कोणत्या संस्थेनी विकसित केले आहे?
 : भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरु

● प्रथम ऑनलाइन ‘कान चित्रपट महोत्सव-2020’ मधील आभासी ‘इंडिया पॅव्हिलियन’चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
 : प्रकाश जावडेकर (माहिती व प्रसारणमंत्री)

● चीनचा ‘दिओयू’ बेट यांच्या मालकी मुद्द्यावरून जापान आणि तैवान सोबत वाद चालू आहे. अलीकडेच जापानने या बेटाला दिलेले नवीन नाव काय आहे? 
 : ‘टोनोशिरो सेनकाकू’

● रमेश पोखरियाल यांनी उद्घाटन केलेल्या द्वितीय आवृत्तीच्या YUKTI योजनेचे पूर्ण नाव काय?
: Young India combating COVID with Knowledge, Technology, and Innovation


स्वर्गीय सूर हरपला - पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन.



🔰पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन झाल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. न्यू जर्सी येथे त्यांचं निधन झालं. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते. भारत सरकारने २००० मध्ये संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौवरले होते. पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते.

🔰गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे समजल्याने त्यांनी तबला वादन सोडून गायक बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू मणिरामजी यांनी त्यांना गाणे शिकवले. भारतीय संगीतातला एक स्वर्गीय सूर हरपला अशीच भावना संगीत रसिकांच्या मनात आहे.

🔰पडित जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० रोजी झाला होता. पंडित जसराज हे गेल्या ८० वर्षांपासून जास्त काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. संगीत क्षेत्रातल्या अनेक प्रमुख पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. मेवाती घराण्यातील गायकी असलेल्या पंडित जसराज यांच्या निधनाने शास्त्रीय संगीत गायन क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे.

सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची बीएसएफच्या डीजी पदावर नियुक्ती .



🔰सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची सीमा सुरक्षा दलाच्या मुख्य निर्देशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २०१८ साली सीबीआय विरुद्ध सीबीआय प्रकरणामुळे ते चर्चेत आले होते. मंगळवारी सकाळी राकेश अस्थाना आपला नवीन पदभार स्वीकारणार आहेत.

🔰राकेश अस्थाना १९८४ बॅचचे गुजरात केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी काही हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे. १९९७ साली चारा घोटळायात त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना अटक केली होती.

🔰सीबीआयमध्ये ते पोलीस अधीक्षकपदावर होते. २०१८ साली लाचखोरीचा आरोप झाल्यानंतर सीबीआयमधून त्यांना हटवण्यात आले. तत्कालीन सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या इशाऱ्यावरुन हे सर्व झाल्याचा आरोप अस्थाना यांनी केला होता.

सार्वजनिक कंपन्यांकडून १९०० कोटींचे योगदान.



🔰दशातील ३७ सार्वजनिक कंपन्यांनी सामाजिक दायित्व म्हणून ‘पीएम केअर्स फंड’मध्ये १९०० कोटींचे भरीव योगदान दिले आहे.

🔰करोना उद्रेकाच्या पाश्र्वभूमीवर २८ मार्चला ‘पीएम केअर्स फंड’ची स्थापना करण्यात आली.  ‘पीएम केअर्स फंडा’तील योगदानाचा तपशील माहिती अधिकार कायद्याद्वारे देता येणार नसल्याचे १८ मे रोजी पंतप्रधान कार्यालयाने म्हटले होते. मात्र, कंपन्यांकडून ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला माहितीच्या अधिकारात मिळालेल्या तपशीलानुसार, ३१ मार्च २०२० अखेर ‘पीएम केअर्स फंड’मध्ये ३,०७६.६२ कोटी रुपये जमा झाले होते. त्यातील ३०७५.८५ कोटी रूपयांच्या देणग्या हे ‘स्वयंस्फूर्त योगदान’ होते.

🔰५० सार्वजनिक कंपन्यांकडून माहिती अधिकारात तपशील मागवण्यात आला होता. त्यास ३७ कंपन्यांनी प्रतिसाद दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कंपन्यांनी गेल्या पाच महिन्यांत ‘पीएम केअर्स फंड’ला १९०५.३८ कोटी रूपये दिले. त्यातील काही कंपन्यांनी २०१९-२०२० या आर्थिक वर्षांतील अखर्चित सामाजिक दायित्व निधी या फंडासाठी दिला. काही कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षांसाठी सामाजिक दायित्व निधीची तरतूद निश्चित करण्याआधीच रक्कम ‘पीएम केअर्स फंड’मध्ये जमा केली. एका कंपनीने तर सामाजिक दायित्व निधीच्या तरतुदीपेक्षा अधिक रकमेचे योगदान दिले.

🔰‘पीएम केअर्स फंड’मध्ये योगदान देणाऱ्या ३७ कंपन्यांमध्ये तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) आघाडीवर असून, त्यांनी तीनशे कोटी रूपये दिले आहेत. २०२०-२१ या वर्षांसाठी सामाजिक दायित्व निधीची तरतूद ठरलेली नसताना रक्कम दिल्याची कबुली ‘ओएनजीसी’ने दिली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड म्हणजे ‘एचपीसीएल’नेही २०२०-२१ साठीची तरतूद निश्चित नसताना आधीच १२० कोटी रुपये ‘पीएम केअर्स फंड’मध्ये दिले आहेत. ‘दी पॉवर फायनान्स कार्पोरेशन’ने २०२०-२१ मधील सामाजिक दायित्व निधी तरतुदीपेक्षा अधिक रक्कम म्हणजे २०० कोटी रुपये दिले आहेत.

मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल’



🔰भारतीय रेल्वे मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल’ बांधत आहे.

🔴ठळक बाबी...

🔰नोनी जिल्ह्यातल्या मारंगचिंग गावाजवळ डोंगराळ भागात इजाई नदीवर हा पूल बांधण्यात येत आहे.पूलाची उंची 141 मीटर आहे, जी युरोपातल्या 139 मीटर उंचीच्या माला-रिजेका पूलापेक्षा अधिक आहे.हा प्रकल्प जिरीबाम-तुपुल-इंफाळ BG लाइन प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्याची एकूण लांबी 703 मीटर असणार.

🔴भारतीय रेल्वे विषयी....

🔰भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारचे कें‍द्रीय रेल्वे विभाग भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो.

🔰भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ 1853 साली झाला. 1947 सालापर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. 1951 साली या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

🔰भारतात पहिली रेलगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले गेले होते.

🔰1951 साली झालेल्या राष्ट्रीयीकरणानंतर, सहा रेल्वे विभागांमध्ये (झोन) त्यांची विभागणी करण्यात आली. यानुसार हैदराबादची निझाम रेल्वे, ग्वाल्हेरची सिंदिया रेल्वे आणि घोलपूर रेल्वे यांची मिळून 'मध्य रेल' असा विभाग बनवला. 'बॉम्बे बरोडा अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे', सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे आणि जयपूर रेल्वे यांना एकत्र करून 'पश्चिम रेल्वे' विभाग बनवण्यात आला. उत्तर रेल्वे ही 'ईस्टर्न पंजाब रेल्वे' व जोधपूर रेल्वे, बिकानेर रेल्वे यांना मिळून बनवण्यात आली. अवध, आसाम, तिरहुत या रेल्वे कंपन्यांच्या एकत्रीकरणातून ईशान्य रेल्वे (उत्तर-पूर्व रेल) याची स्थापना झाली. 'पूर्व रेल'मध्ये बंगाल-नागपूर रेल्वे आणि 'ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी' यांचा समावेश होता.

🔰वर्तमानात व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेचे 16 विभाग करण्यात आले आहेत. कोलकाता मेट्रोचे मालकी हक्क व संचालन भारतीय रेल्वेकडे असले तरी देखील ही मेट्रो सेवा कोणत्याही प्रभागामध्ये येत नाही. संचालनाच्या दृष्टीने या रेल्वेस विभागीय रेल्वेचा दर्जा दिला गेला आहे.

परोजेक्ट लायन’ आणि ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ या संवर्धन कार्यक्रमांची घोषणा.


🔰 दशातल्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी चाललेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, 15 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रोजेक्ट लायन’ आणि ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ या नव्या संवर्धन कार्यक्रमांची घोषणा केली.

 🔰 ‘प्रोजेक्ट टायगर’ आणि ‘प्रोजेक्ट एलिफंट’ यांच्या यशानंतर आता आगामी काळात आशियाई सिंह आणि गंगा डॉल्फिन या प्रजातींच्या संवर्धनासाठी भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालयाने 10 वर्षांच्या कार्यक्रमाची योजना आखली आहे.

🔴ठळक बाबी...

🔰 ‘प्रोजेक्ट लायन’ अंतर्गत आशियाई सिंहांची सुरक्षा, आवश्यक पायाभूत सुविधा, त्यांच्यासाठी आवश्यक विशेष आरोग्य सुविधा यावर काम होणार आहे.‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ अंतर्गत नद्या, समुद्रात राहणाऱ्या दोन्ही प्रकारच्या डॉल्फिन प्रजातींच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित केले जाणार.

🔰 गगा डॉल्फिन (शास्त्रीय नाव: प्लॅटनिस्टा गंगेटिका गंगेटिका / गंगेटिक रिव्हर डॉल्फिन) ही प्रामुख्याने गंगा आणि ब्रह्मपुत्र नद्यांमध्ये आढळणारी गोड्या पाण्यातली डॉल्फिन प्रजाती आहे.आशियाई सिंह (शास्त्रीय नाव: एशियाटिक लायन) ही भारतातली ‘पॅंथरा लियो’ या कुटुंबातली एक प्रजाती आहे. आज भारतात ही प्रजाती गुजरातच्या गिर राष्ट्रीय उद्यानापुरतीच मर्यादित आहे.

BRICS अमली पदार्थ-रोधी कार्यरत गट’ची चौथी बैठक संपन्न.



🔰ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका आणि भारत या देशांचा समावेश असलेल्या ‘BRICS अमली पदार्थ-रोधी कार्यरत गट’ याची चौथी बैठक या आठवड्यात पार पडली. रशियाच्या अध्यक्षतेखाली 12 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून यावर्षीची बैठक पार पडली.

🔰भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्त्व अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी केले.

🔴चर्चेतले मुद्दे...

🔰BRICS राज्यांमधील अमली पदार्थांच्या स्थितीसंबंधी मतांची फलदायी देवाणघेवाण, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर अनधिकृत पद्धतीने होणारी अंमली पदार्थांच्या तस्करीच्या पद्धती, मानसिक संतुलन बिघडविणारे पदार्थ आणि त्यांचे पूर्वगामी तसेच परिस्थितीवरील विविध अंतर्गत आणि बाह्य घटकांचा होणारा परिणाम असे अनेक मुद्दे चर्चेअंतर्गत समाविष्ट केले गेले.
उद्भवलेल्या समान मुद्यांच्या संदर्भात सदस्य देशांमध्ये वास्तिविक माहिती सामायिक करणे आणि सागरी मार्गांद्वारे वाढलेल्या अमली पदार्थांच्या वाहतुकीवर अंकुश ठेवणे तसेच अंधाराचा गैरफायदा आणि अमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी इतर प्रगत तंत्रज्ञानाचा गैरवापर हे या बैठकीचे प्रमुख मुद्दे होते.

🔴BRICS विषयी...

🔰BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली या समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले.

🔰रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.

भारत सरकारचे ‘राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान’



🔰दिनांक 15 ऑगस्ट 2020 पासून आरोग्य क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा पुढाकार घेतला गेला आहे. “राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान” (National Digital Health Mission) या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

🔰या कार्यक्रमामध्ये तंत्रज्ञानाची खूप मोठी आणि महत्त्वाची भूमिका असणार आहे. कोणालाही औषधोपचार करताना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी तंत्रज्ञानाची अतिशय उत्तम पद्धतीने मदत घेवून हे अभियान राबविण्यात येणार आहे.

🔰परत्येक भारतीयासाठी “हेल्थ आय.डी.”

🔰परत्येक भारतीयाला एक “हेल्थ आय.डी.” म्हणजेच विशिष्ट “आरोग्य ओळखपत्र” देण्यात येणार.

🔰या आरोग्य ओळखपत्रामध्ये प्रत्येकाच्या आरोग्याची माहिती डिजिटल माध्यमातून जमा केली जाणार.प्रत्येकाने केलेल्या आरोग्य चाचण्या, प्रत्येकाचे आजार, कोणत्या आरोग्य चाचण्या केल्या त्याविषयीची माहिती, चिकित्सकांकडून कोणते औषध घेतले, त्यांनी तुमच्या आजाराचे नेमके काय निदान केले, कधी कोणते औषध दिले, केलेल्या चाचणीचा अहवाल काय आला, अशी सगळी माहिती त्या एकाच आरोग्य ओळखपत्रामध्ये मिळू शकणार आहे.चिकित्सकांनी रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले असो, पैसे जमा करावे लागणार असो, या सर्व गोष्टींचा तपशील सर्वांना मिळू शकणार आहे.

🔴भविष्यातले परिणाम...

🔰या अभियानाच्या माध्यमातून वैद्यकीय विषयक अनेक प्रश्नांतून सुटका मिळू शकणार आहे. त्यामुळे उत्तम आरोग्य मिळवताना, प्रत्येक नागरिक अगदी योग्य निर्णय घेवू शकणार. ही व्यवस्था आता देशात लवकरच उपलब्ध होणार आहे.

🔴पार्श्वभूमी...

🔰मार्च 2017 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘राष्ट्रीय आरोग्य धोरण-2017’ला मंजूरी देण्यात आली होती. त्यात आरोग्य प्रणालीमध्ये नियमन, विकास आणि डिजिटल आरोग्य सुविधा आणण्यासाठी ‘राष्ट्रीयडिजिटलआरोग्प्राधिकरण’ (NDHA) स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला गेला होता.

🔰म 2018 मध्ये डिजिटल आरोग्याविषयी भारताकडून प्रस्तावित करण्यात आलेला ठराव जिनेव्हा येथे 71 व्या जागतिक आरोग्य सभेदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) अंगिकारला गेला. डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानाची सार्वत्रिक आरोग्य आच्छादनाला (UHC) मदत देण्यास प्रचंड क्षमता आहे. तसेच त्यामधून आरोग्य सेवांची उपलब्धता, गुणवत्ता वर्धित करण्यास आणि स्वस्त होण्यास मदत मिळणार. याच्याअंतर्गत आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि अन्य प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास मदत मिळणार. तसेच डिजिटल आरोग्यासंबंधी वैश्विक धोरण आखण्यास WHOचा मार्ग प्रशस्त होतो.

सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांकावर.


🔰नसर्गिक शेती ही काही भारतामध्ये नवीन संकल्पना नाही. शेतीचे सेंद्रिय अवशेष, गाईचे शेण, पालापाचोळा कुजवून तयार करण्यात आलेले खत, यांचा वापर शेतीमध्ये केला जातो.

🔰सद्रिय उत्पादनाला केवळ भारतामध्येच नाही तर जागतिक पातळीवर सातत्याने मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. निरोगी शरीरासाठी सुरक्षित अन्नधान्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. त्यामुळे शेतामध्ये रसायनांचा, रसायनिक खतांचा वापर करणे टाळून सेंद्रिय शेती करण्याला सिद्ध असलेल्या शेतकरीच्या दृष्टीने चांगल्या संधी निर्माण होत आहेत.

🔴भारतातली सेंद्रिय शेती...

🔰सद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. तर सेंद्रिय शेतीच्या क्षेत्राचा विचार केला तर भारत नवव्या क्रमांकावर आहे.सिक्कीम या संपूर्ण राज्यामध्ये केवळ सेंद्रिय शेती केली जाते. पूर्णतः सेंद्रिय शेती करणारे हे जगातले पहिले राज्य ठरले आहे.

🔰सिक्कीम पाठोपाठ त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यांनी आपल्या क्षेत्रात संपूर्णपणे सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ईशान्य भारतामध्ये पारंपरिक पद्धतीने सेंद्रिय शेती केली जाते. या भागात रासायनिक खतांचा वापर इतर देशांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी करतात. त्याचबरोबर आदिवासी आणि इतर लहान बेटांवरही सेंद्रिय शेती करण्यात येत आहे.

🔰रसायनमुक्त, सेंद्रिय शेती व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन योजना तयार करण्यात आल्या आहेत - ‘मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट फॉर नॉर्थ ईस्ट रिजन’ (MOVCD) आणि ‘परंपरागत कृषी विकास योजना’ (PKVY). या योजना 2015 साली लागू करण्यात आल्या. त्याच्याच जोडीला ‘कृषी निर्यात धोरण 2018’ तयार करण्यात आल्यामुळे सेंद्रिय कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत खूप चांगली मागणी निर्माण होऊ लागली.

🔰भारतीय सेंद्रिय बाजारपेठ
भारताने 2018-2019 या आर्थिक वर्षात 5,151 कोटी रुपयांच्या सेंद्रिय कृषी उत्पादनाची निर्यात केली. या निर्यातीमध्ये जवळपास 50 टक्के वाढ झाली आहे.

🔰उत्पादनांमध्ये प्रामुख्याने अंबाडीचे बी, जवस, तीळ, सोयाबीन, चहा, वनौषधी, तांदूळ आणि डाळी यांचा समावेश आहे.
परंपरागत कृषी विकास योजनेमधून सुमारे 40,000 शेतकी समूह तयार करण्यात आले असून त्यामध्ये 7 लक्ष हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे.

🔰‘मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट फॉर नॉर्थ ईस्ट रिजन (MOVCD) अंतर्गत 160 कृषी उत्पादन संघटनांच्या (FPO) माध्यमातून 80 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे.

🔰ह सर्व शाश्वत समूह ठरावेत यासाठी बाजारपेठेतल्या मागणीचा विचार करून उत्पादनाच्या कराराची पद्धती स्वीकारण्यात आली आहे. त्यामुळे आलेल्या उत्पादनाला तयार बाजारपेठ उपलब्ध होत आहे. तसेच गरजेनुसार उद्योजकांना योग्य गुणवत्तेचे उत्पादन मिळण्यासही मदत होत आहे.

🔰आले, हळद, काळे तांदूळ, मसाले, पोषक तृणधान्य, अननस, औषधी वनस्पती, गव्हाचे तृण, बांबूचे कोवळे कोंब, इत्यादींचा पुरवठा उद्योगांना करण्यात येत आहे. मेघालयातून मदर डेअरी, रेवांता अन्न आणि मणीपूरातून बिग बास्केट या कंपन्यांना सेंद्रिय उत्पादने पुरवली जातात.

🔰सद्रिय उत्पादनाला बाजारपेठ निर्माण करणे, तसेच थेट विक्री करणे यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये काम केले जात आहे. त्यामुळे लोकांना आपल्या दारामध्ये ताजी सेंद्रिय उत्पादने मिळू लागली आहेत. तसेच पंजाबमध्ये विशेष प्रकारे तयार करण्यात आलेल्या विजेरी वाहनांच्या माध्यमातून लोकांना घरपोच सेंद्रिय उत्पादने मिळत आहेत.

करिडा मंत्रालयाचा राष्ट्रव्यापी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ कार्यक्रम.



🔰कद्रीय क्रिडा मंत्रालयाकडून 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सर्वात मोठ्या देशव्यापी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ नामक धावशर्यतीचे आयोजन केले जात आहे. लठ्ठपणा, आळस, ताणतणाव, बेचैनी आणि इतर आजारांपासून नागरिकांना मुक्त करणे आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे हे या कार्यक्रमाचे घोषवाक्य आहे.

🔰कद्रीय क्रिडामंत्री किरेन रिजीजू यांनी 14 ऑगस्ट 2020 रोजी या उपक्रमाचे उद्घाटन केले. कोविड-19 महामारीच्या निकषांचे पालन करतानाच स्वतःला तंदुरुस्त राखण्याबाबत जनतेला प्रोत्साहित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

🔴शर्यतीचे स्वरूप...

🔰सध्याची महामारीची स्थिती लक्षात घेऊन आणि वैयक्तिक अंतराच्या निकषांचे पालन करून या उपक्रमात सहभागी होणाऱ्या धावपटूंना त्यांच्या स्वतःच्या गतीने त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही ठिकाणी धावण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

🔰तया व्यतिरिक्त धावपटू या अनेक दिवस धावण्याच्या उपक्रमाच्या कालावधीत मध्येच धाव खंडित करू शकतात.
धावपटूंनी कापलेले एकूण अंतर आणि त्यासाठी घेतलेला वेळ याची माहिती GPS घड्याळाच्या मदतीने किंवा स्वतः नोंदवता येऊ शकतो.15 ऑगस्टला असलेल्या देशाच्या 74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या 151व्या जयंतीनिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Online Test Series

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...