१२ ऑगस्ट २०२०

दिल्ली सरकारचे नवीन “विजेरी वाहन धोरण”

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन “विजेरी वाहन धोरण” सादर केले. दिल्ली सरकारने दिल्लीमध्ये विजेरी वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नवे धोरण तयार केले आहे.

या धोरणाच्या अंतर्गत नव्या विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या खरेदीवर अनुदान दिले जाणार आहे.
दुचाकी, तीनचाकी, ई-रिक्षा तसेच मालवाहतूक ई-वाहनांसाठी 30 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

तर विजेरी मोटारकारच्या खरेदीवर दीड लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
केंद्र सरकार त्यांच्या योजनेच्या अंतर्गत जे अनुदान देत आहे त्यावर हे अधिकचे अनुदान असणार आहे.

सरकारची इतर तयारी
पुढच्या 5 वर्षात दिल्लीत पाच लक्ष नवीन विजेरी वाहनांची नोंद करण्यात येणार असे अपेक्षित आहे. याचबरोबर, विजेरी वाहनांसाठी सरकार चार्जिंग केंद्रांचे जाळे तयार करणार आहे. एका वर्षात 200 चार्जिंग केंद्र तयार करण्याचे ध्येय थरविण्यात आले आहे.

दर तीन किलोमीटरवर चार्जिंग केंद्र मिळण्यासाठी तयारी केली जात आहे. अश्या वाहनांच्या खरेदीवर कर्जावरील व्याजात सूट देण्यासोबतच सर्व नव्या विजेरी वाहनांचा रस्ता कर आणि इतर शुल्क पूर्ण माफ करण्यात येणार आहे.

✅ भारत सरकारची ‘फेम इंडिया’ योजना 👇

केंद्र पुरस्कृत “फेम इंडिया” (फास्टर अडोप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिकइलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया) योजनेच्या अंतर्गत ‘विजेवर चालणार्‍या’ वाहनांच्या खरेदीवर अनुदान मिळते. सरकार बसच्या खरेदीवर 60 टक्के, चारचाकी वाहनावर 1.24 लक्ष रुपये आणि तीनचाकी वाहनावर 61,000 रुपयांचे अनुदान देते. तसेच चार्जिंगच्या पायाभूत सुविधेच्या स्थापनेसाठी सुद्धा अनुदान देते.

CAG

▪️भारताचे 14 वे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) म्हणून गिरीश चंद्र मुर्मू यांची नेमणूक करण्यात आली आहे.

📌ही नियुक्ती राजीव मेहऋषी यांच्या जागी करण्यात आली.

▪️भारतीय नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) हे भारतीय संविधानाच्या कलम 148-151 अन्वये स्थापन केलेले पद असून एक प्राधिकारी आहे,

👉 जो शासनाकडून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य मिळविणारी विभागे व प्राधिकरण यांच्या समावेशासह भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या सर्व जमा व खर्चाचे लेखापरिक्षण करतो.

▪️याशिवाय, CAG सरकारी मालकीच्या कंपन्यांचे बाह्य लेखापरिक्षक आहेत आणि सरकारी कंपन्यांचे पूरक लेखापरीक्षण करतात.

सिरम ही संस्था,


🔹GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि
🔹 बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत.

◾️ बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन करोना लसीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे.

◾️GAVI मार्फत निधी सिरम इन्स्टिट्युटला करोना लसीच्या उत्पादनसाठी दिला जाईल.

◾️सिरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत १०० दशलक्ष डोस पुरवणार आहे.

◾️ या लसीची जास्तीत जास्त किंमत ३ यूएस डॉलर्स म्हणजे साधारण २२५ ते २५० रुपयांच्या घरात असेल अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

◾️सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषध निर्मिती करणारी कंपनी आहे.

◾️सिरमनेही
📌 ऑक्सफर्ड आणि
📌 अमेरिकेच्या Novavax या कंपनीसोबत लसींसंदर्भातला करार केला आहे.

◾️यांच्या चाचण्या यशस्वी झाल्या आणि त्याला संमती मिळाली तर सिरम इन्स्टिट्युला लस उत्पादनासाठी निधी मिळणार आहे.

​​T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच

🔰T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील दोन वर्षांत होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाच्या आयोजनाविषयीचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी मंडळाची शुक्रवारी बैठक झाली.

🔰व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत २०२१ आणि २०२२च्या टी-२० विश्वचषकाच्या यजमानपदाबद्दल निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०२१चा टी-२० विश्वचषक भारतातच होणार असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त टाईम्सनाऊने दिले आहे. याशिवाय २०२१मध्ये न्यूझीलंडमध्ये होणारा महिला वन डे विश्वचषकदेखील पुढे ढकलण्यात आला आहे.

🔰महिलांचा २०२१ एकदिवसीय विश्वचषक तसेच पुरुषांचे पुढील दोन टी-२० विश्वचषक यांच्या आयोजनाविषयी या बैठकीत चर्चा झाली. ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२०मध्ये होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२१च्या यजमानपदासाठी आग्रही होते. त्यामुळे भारताला २०२१ऐवजी २०२२च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळू शकते असे बोलले जात होते. पण अखेर २०२१च्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताकडेच कायम असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहे.

संस्था आणि संस्थापक


◆ १८२८:- राजाराम मोहन राय - ब्राह्मो समाज
◆ १८६५:- देवेंद्र नाथ टागोर - आदी ब्राह्मो समाज
◆ १८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज
◆ १८६७ :- आत्माराम पांडुरंग तर्खडकर - पार्थना समाज
◆ १८७२ :- आनंद मोहन बोस - सार्वजनिक समाज
◆ १८७३ :- महात्मा फुले - सत्यशोधक समाज
◆ १८७५ :- स्वामी दयानंद सरस्वती - आर्य समाज
◆ १८८० :- केशव चंद्र सेन - नावविधान समाज
◆ १८८९ :- पंडिता रमाबाई - आर्य महिला समाज
◆ १९०५ :- गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज
◆ १९११ :- शाहू महाराज - सत्यशोधक समाज कोल्हापूर
◆ १९१८ :- शाहू महाराज - आर्य समाज शाखा कोल्हापूर
◆ १९२३ :- विठ्ठल रामजी शिंदे - तरुण ब्राह्मो समाज
◆ १९५५ :- पंजाबराव देशमुख - भारत कृषक समाज

सोसायटी 

● १७८४ :- विलियम जोन्स - बंगाल अशियाटिक सोसायटी
● १७८९ :- विलियम जोन्स - असियटीक सोसायटी
● १८२२ :- जगनाथ शंकर सेठ - बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी
●  १८३८ :- जगन्नाथ शंकर सेठ - ग्रँट मेडिकल कॉलेज
● १८५२ :- भाऊ दाजी लाड - ग्रँट मेडिकल सोसायटी
● १८६२ :- सर सय्यद अहमद खान - सायंन्तफिक सोसायटी
● १८६३ :- नवाब अब्दुल लतीफ - मोहमदम लिटररी
● १८६४ :- सर सय्यद अहमद खान - ट्र्न्स्लशन सोसायटी
● १८६५ :- दादाभाई नवरोजी - लंडन इडीयन सोसायटी
● १८७५ :- मँडम ब्लावाट्सक्यी कर्नल अल्कोटा - थेओसोफिकल सोसायटी
● १९०१ :- शाहू महाराज - मराठा एजुकेशन सोसायटी
● १९०५ :- श्यामजी क्रष्णा व्रमा -इंडियन होमरुल सोसायटी
● १९०६ :- शाहू महाराज - किंग एड्वर्ड मोहमदन एजुकेशन सोसायटी
● १९४५ :- बाबासाहेब आंबेडकर - पीपल्स एजुकेशन सोसायटी

टिकटॉकला 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय एखाद्या अमेरिकन कंपनीने 15 सप्टेंबरपर्यंत विकत घेतला नाही, तर त्यानंतर टिकटॉकवर अमेरिकेत बंदी घातली जाईल असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले  आहे.

सॉफ्टवेअर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘मायक्रोसॉफ्ट’ला टिकटॉकच्या खरेदीमध्ये रस आहे.

बाइटडान्सकडे टिकटॉकची मूळ मालकी आहे. टिकटॉक अ‍ॅपचा 30 टक्के नाही तर 100 टक्के व्यवसाय खरेदी करावा अशी डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आहे.

या विषयासंदर्भात आपण मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्यासोबत चर्चा केल्याचे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले.

भारतातील महत्त्वाचे रेल्‍वे समुद्री पूल


 १) पंबन रेल्‍वे पूल :- 
रामेश्‍वरमजवळ पंबन बेटापासून मुख्‍य किनारी येण्‍यासाठी बांधण्‍यात आलेला हा रेल्‍वे पूल आहे. १९११ साली याची सुरुवात झाली. १४ फेब्रुवारी १९१४ साली हा लोकांसाठी खुला करण्‍यात आला. पंबन रेल्‍वे पूल हा भारतामधील पहिला 
समुद्री पूल आहे. २०१० साली वांद्रे-वरळी सी-लिंकला सुरुवात होण्‍यापूर्वी हा भारतामधील सर्वात लांब समुद्री पूल होता. 
काँक्रिट खांबाचा यात वापर करण्‍यात आला आहे. दोन खांबामध्‍ये इतके अंतर ठेवण्‍यात आले आहे, की ज्‍याच्‍यामधून नौका आणि जहाजे जाऊ शकतील. 
याला समांतर असा पूल बांधण्‍यात आला आहे. १९८८ साली लोकांसाठी हा रस्‍ता खुला करण्‍यात आला.

-----------------------
 २) वांद्रे-वरळी सी लिंक :- वांद्रे-वरळी सी लिंकचे अधिकृत नाव राजीव गांधी सी लिंक असून दक्षिण मुंबईतील वरळी ते वांद्रे यांना जोडणारा हा पूल आहे. 
यासाठी काँक्रिट स्‍टील मटेरियल वापरण्‍यात आले आहे. 
नरीमन पॉईंटला जोडणाऱ्या फ्री वे चा हा एक भाग आहे. या पुलासाठी १६०० कोटी इतका खर्च आला आहे. हिंदुस्‍तान कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनीने बांधलेला आणि महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाने देखरेख केलेला हा पूल आहे. 
३० जून २००९ साली ८ पैकी ४ मार्ग खुले करण्‍यात आले. २४ मार्च २०१० साली सर्व ८ मार्ग खुले केले गेले.वरळी आणि वांद्रे यांच्‍यातील अंतर कमी करण्‍यासाठी हा पूल बांधण्‍यात आला आहे.
-----------------------

३) कांडरौर पूल :- हिमाचल प्रदेश मधील बिलासपूर येथे सतलज नदीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे. 
कांडरौर गावात हा पूल आहे. 
कांडरौर पुलाची उंची ८० मी. इतकी आहे. १९५९ साली याची सुरुवात झाली आहे आणि १९६४ साली हा खुला करण्‍यात आला. पुलाची रुंदी ७ मीटर आहे. नदीच्‍या पात्रापासून ६० मीटर उंचीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे. जगातील सर्वांत उंचीवर बांधण्‍यात आलेल्‍या पुलापैकी एक आणि आशियामधील सर्वांत उंच पूल अशी याची ख्‍याती आहे. कांडरौर पूल हा हमीरपूर जिल्‍हा आणि बिलासपूर जि‍ल्‍हा यांना जोडतो. बिलासपूरपासून आठ
कि.मी. अंतरावर राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक ८८ वर आहे.
---------------------

४) विद्यासागर सेतू :- विद्यासागर सेतूला दुसरा हुगळी पुल असेही
म्‍हणता येईल. 
पश्चिम बंगालमधील हुगळी नदीवर कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना जोडणारा हा सेतू आहे. 
या सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना टोल टॅक्‍स द्यावा लागतो, मात्र सायकलींना
हा कर नाही. 
विद्यासागर सेतू हा आशियाईतील सर्वांत लांब पुलांपैकी एक आहे. १९व्‍या शतकातील सुधारक ईश्‍वरचंद विद्यासागर यांचे नाव या सेतूला देण्‍यात आले आहे.
हावडा पूल आणि विवेकानंद सेतू यासारखे अनेक समांतर पूल आहेत. या सेतूच्‍या कामाची सुरुवात १९७८ साली झाली आणि १० ऑक्‍टोबर १९९२ रोजी याचे उद्घाटन करण्‍यात आले. याची रुंदी ३५ मीटर असून, लांबी ४७५ मीटर इतकी आहे. 
या सेतूचे बांधकाम विख्‍यात ब्रेथवेट बर्न आणि जेसेप किंवा बीबीजे यांनी केले आहे. 
या सेतूवर १८२.८८ मीटर लांबीची समांतर केबल वायर जोडण्‍यात आली आहे.

लोकसंख्या धोरण इ.स. २०००

लोकसंख्या वाढीचा दर आटोक्यात आणण्यासाठी दुसरे लोकसंख्याविषयक धोरण जाहीर करण्यात आले.

🔳पार्श्वभूमी

इ.स.१९९३ साली एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल १९९४ मध्ये सादर केला व त्यानुसार पुढे २००० सालचे लोकसंख्या धोरण ठरविण्यात आले.

🔳महत्त्वाची उद्दिष्टे

अल्पकालीन उद्दिष्ट - संततीनियमनासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा करणे. आरोग्याच्या पायाभूत सुविधा एकात्मिक सेवा पुरविणे

मध्यकालीन उद्दिष्ट - प्रत्येक जोडप्याला दोन मुले यासाठी प्रोत्साहन देणे

दीर्घकालीन उद्दिष्ट - लोकसंख्येचे २०४५ पर्यंत स्थिरीकरण करणे

शिफारशी

१४ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे.

शाळेतील गळतीचे प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रमाण २० टक्क्य़ांपेक्षा कमी आणावे.

जननदर नियंत्रणासाठी व संतती नियमनासाठी याबाबत सामान्य लोकांना माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करावी.

दोन मुले असलेल्या व निर्बजिीकरण करून घेतलेल्या दारिद्य्ररेषेखालील दाम्पत्यांच्या नावे ५००० रुपयांची विमा पॉलिसी उघडावी.

१८ वर्षांपेक्षा उशिरा विवाह करणाऱ्या मुलींना बक्षीस देणे तसेच २१ वर्षांनंतर मातृत्व स्वीकारणाऱ्या मुलींना बक्षीस देणे.

माता मृत्युदराचे प्रमाण दर एक लाख जिवंत जन्मामागे १०० पेक्षा कमी आणावा.

८०% प्रसूती संस्थात्मक पद्धतीने व १०० टक्के प्रसूती या प्रशिक्षित व्यक्तींच्या उपस्थितीत व्हाव्यात.

जन्म, मृत्यू, विवाह, गर्भधारणा यांचे १०० टक्के नोंदणीचे लक्ष साध्य करावे.

ग्रामीण भागात रुग्णवाहिका सेवा पुरविण्यासाठी विशेष फंड व कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून द्यावे.

पंचायत समिती व जिल्हा परिषदांना लहान कुटुंब धोरण राबविण्यासाठी बक्षिसे द्यावीत.

आई वडिलांनी आपल्या पाल्यावर वयक्तिक लक्ष द्यावे

राष्ट्रपती महाभियोग


🔘कलम:-61

🔘कारण:-घटनाभंग

🔘आरोप स्थान:-संसद सभागृहात

⏩अट:-1/4 सदस्यची लेखी नोटीस 14 दिवस अगोदर द्यावी लागते

✍एकूण सदस्य च्या 2/3 बहुमताने ठराव पास होणे आवश्यक

🔘दुसरे सभागृहात अन्वेषण नंतर 2/3 बहुमताने ठराव पास मग पदावरून दूर केले जाते

✍प्रक्रिया:-समन्यायिक

👉महाभियोगमध्ये भाग घेणारे सदस्य

1)संसदचे निर्वाचित सदस्य

2)संसदचे सर्व नामनिर्देशीत सदस्य

🎯आज पर्यंत एकदाही महाभियोग राष्ट्रपती वर लावण्यात आला नाही

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण इ.स. १९७६

घोषणा १६ एप्रिल १९७६ रोजी केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंबराज्य मंत्री डॉ. करणसिंग यांनी मांडले.

उद्दिष्टे व उपाययोजना

योग्य कायदा करून लग्न चे किमान वय मुलींसाठी १८ वष्रे व मुलांसाठी २१ वर्षांपर्यंत वाढवणे.

निर्बीजीकरण प्रोत्साहनासाठी दिल्या जाणाऱ्या राशीत वाढ करणे, दोन मुलांनंतर कुटुंब नियोजन केल्यास १५० रुपये, तीन मुलांनंतर केल्यास १०० रुपये, चार मुलांनंतर केल्यास ७० रुपये.

राज्य शासनांना अनिवार्य निर्बीजीकरणासाठी कायदे करण्याची अनुमती द्यावी.

२००१ वर्षांपर्यंत लोकसभा व राज्य विधानसभा यामधील प्रतिनिधित्व १९७१ च्या जनगणनेनुसार निश्चित करावे.

केंद्रीय व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लहान कुटुंब संकल्पना स्वीकारण्यासाठी प्रोत्साहनपर लाभ द्यावेत.

राज्यांना त्यांच्या कुटुंबनियोजन कार्यक्रमासाठी केंद्राकडून निधी मिळावा.

फलीत

१९७६ चे लोकसंख्या धोरण हे जास्त काळ टिकले नाही. १९७७ साली निवडणुका झाल्या व ११ मे २००० रोजी भारताची लोकसंख्या १०० कोटी झाली.

जगातील क्षेत्रफळाच्या २.४ % क्षेत्रफळ असलेल्या या देशात जगातील १६ % लोकसंख्या आहे.

सत्तेत आलेल्या सरकारने २९ जून १९७७ रोजी वरील धोरणातील, कुटुंबनियोजन कार्यक्रमात जी सक्ती करण्यात आली होती, ती रद्द केली.

१९७५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने आणीबाणी जाहीर केली व या काळात १९७६ च्या लोकसंख्या धोरणाला संसदेत मान्यता देण्यात आली. 

संजय गांधी यांच्यामुळे या धोरणात सक्तीच्या कुटुंबनियोजनाचा समावेश करण्यात आला. या काळात मोठय़ा प्रमाणावर निर्बजिीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्या

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा लांबणीवर.


🔺करोनाच्या साथीमुळे यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा एक किंवा दोन महिने लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रपती भवनाकडून निर्देश मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

🔺महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त दरवर्षी राष्ट्रपती भवनात राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद असे प्रतिष्ठेचे पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. परंतु या वर्षी करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे पुरस्कारांच्या वितरणास विलंब होणार आहे. मात्र अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही.

🔺‘‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आम्ही निर्देशांच्या प्रतीक्षेत आहोत. परंतु राष्ट्रपती भवनाकडून आम्हाला अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे सध्या तरी याबाबत कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही. करोनाच्या साथीमुळे सध्या देशात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणे कठीण आहे,’’ असे क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

चालू घडामोडी सराव 30 प्रश्न व उत्तरे

Q1) कोणत्या भारतीय कार्यकर्त्याची संयुक्त राष्ट्रसंघाच्या नव्या सल्लागार गटात निवड केली गेली?

➡️उत्तर :- अर्चना सोरेंग

Q2) 2020 साली जागतिक व्याघ्र दिनाची घोषणा काय आहे?

➡️उत्तर :- देअर सर्व्हायव्हल इज इन अवर हॅंड्स

Q3) भारताच्या पहिल्या ‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’चे नाव काय आहे?

➡️उत्तर :-  BelYo

Q4) कोणत्या संस्थेनी “रीपोर्ट ऑफ द अनॅलिटिकल सपोर्ट अँड सॅंक्शन्स मॉनिटरिंग टीम कंसर्निंग इसिस” या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे?

➡️उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघ

Q5) कोण “क्वेस्ट फॉर रीस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया” हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत?

➡️उत्तर :- विरल आचार्य

Q6) कोणत्या संस्थेनी ‘आश्रय’ या नावाने विलगीकरणाची वैद्यकीय सुविधा तयार केली?

➡️उत्तर :-  प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (DIAT)

Q7) कोण ‘प्रीमियर लीग गोल्डन बूट’ हा सन्मान जिंकणारा सर्वात वरिष्ठ खेळाडू ठरला?

➡️उत्तर :-  जेमी वर्डी

Q8) कोणत्या व्यक्तीची सोमालिया देशाचे कार्यवाह पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली?

➡️उत्तर :- महदी मोहम्मद गुलाईड

Q9) कोणत्या मंत्रालयाने “इंडिया रिपोर्ट ऑन डिजिटल एज्युकेशन, 2020” या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?

➡️उत्तर :- मनुष्यबळ विकास मंत्रालय

Q10) कोणत्या बँकेनी को-ब्रँडेड कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड सुविधा देण्यासाठी IRCTC सोबत भागीदारी केली?

➡️उत्तर :- भारतीय स्टेट बँक

Q1) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने अरावलीच्या भागात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी एरियल सीडिंग हे तंत्र वापरले?
उत्तर :-  हरियाणा

Q2) ब्रिटनने भारताला परत केलेली ‘नटेशा’ची प्रतिमा कोणत्या राज्यातल्या मंदिरामधली आहे?
उत्तर :-  राजस्थान

Q3) कोणते मंत्रालय पंचायत निधीच्या संबंधित ऑनलाईन लेखापरीक्षण करणार आहे?
उत्तर :- पंचायतराज मंत्रालय

Q4) कोणत्या संस्थेसोबत भारत सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी जैवतंत्रज्ञान विकसित करण्यासंबंधी करार करणार आहे?
उत्तर :- युरोपीय संघ

Q5) कोणत्या व्यक्तीची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर नेमणूक करण्यात आली?
उत्तर :-  एस. एन. राजेश्वरी

Q6) कोणत्या आंतरराष्ट्रीय बँकेनी भारतासाठी कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी 3 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले?
उत्तर :- आशियाई विकास बँक

Q8) कोणत्या संस्थेनी ‘अॅस्ट्रोनोमी जिनियालॉजी’ प्रकल्पाचा प्रारंभ केला?
उत्तर :- अमेरिकन अॅस्ट्रोनोमिकल सोसायटी

Q9) कोणत्या राज्यात कृषी क्षेत्रातल्या उत्सर्जनात घट करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ‘ग्रीन-अ‍ॅग्री’ प्रकल्प चालू करण्यात आला आहे?
उत्तर :- मिझोरम

Q10) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने रस्ते दुरुस्तीसाठी ‘मॅकॅडमीशन’ कार्यक्रम चालवला?
उत्तर :- जम्मू व काश्मीर

Q1) जगातला सर्वात उंच रेल्वे पूल कुठे बांधण्यात येत आहे?
उत्तर :-  जम्मू व काश्मीर

Q2) कोणत्या संस्थेत “विमेन आंत्रेप्रेनेऊरशिप अँड एंपोवरमेंट (WEE) कोहोर्ट” उपक्रमाचा प्रारंभ केला गेला?
उत्तर :- भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

Q3)कोणत्या बँकेनी ‘कोना कोना उम्मीद’ मोहीमेचा प्रारंभ केला?
उत्तर :- कोटक महिंद्रा बँक

Q4) "स्वच्छ भारत रेव्होल्यूशन” या पुस्तकाचे संपादक कोण आहेत?
उत्तर :- परमेश्वरन अय्यर

Q5) कोणत्या संस्थेच्यावतीने “सहकार कूपट्यूब NCDC चॅनेल” कार्यक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ

Q6 'खेलो इंडिया’योजनेच्या सर्वसाधारण परिषदेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर :- किरेन रीजीजू

Q7) कोणत्या व्यक्तीची ऑल इंडिया रेडिओच्या वार्ता सेवा विभागाच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली?
उत्तर :- जयदीप भटनागर

Q8) कोणत्या राज्याने महिला सक्षमीकरणासाठी ITC, HUL आणि P&G या संस्थांसोबत सामंजस्य करार केला?
उत्तर :- आंध्रप्रदेश

Q9) कोणत्या संस्थेला ‘गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन अवॉर्ड 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर :-  भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर

Q10) कोणत्या व्यक्तीची HDFC बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- शशिधर जगदीशन ( अगोदरचे आदित्य पुरी )

भिल्लांचा उठाव

  कालखंड :- 1817 ते 1857

  नेतृत्व :- चिलनाईक, काजीसिंग

  मुख्य ठिकाण :- अजिंठा, सातमाळा, सातपुडा

🖍 यांची वस्ती अरवली, विंध्य, सह्याद्री व सातपुडा या पर्वतरांगात असून सर्वात जास्त वस्ती खानदेशात असे व यावेळी तेथे कलेक्टर हा कॅप्टन ब्रीज हा होता.

🖍  यावेळी त्यांनी अजिंठा, सातमाळा या भागात उठाव केले.

🖍  1857 मध्ये काजीसिंग (खर्जासिंग) याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी खानदेशात उठाव केले व सातपुडा भागात शंकरशहाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला.

🖍  तसेच भिमा नाईक, भागोजी नाईक, दौलतसिंग, कुजरसिंग नाईक, नेवशा नाईक यांच्या नेवृत्वाखाली 1870 पर्यंत भिल्ल हे इंग्रजांविरुध्द लढा देत होते.

Online Test Series

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...