०८ ऑगस्ट २०२०

थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ

० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)

० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर

० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)

० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)

० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)

० महात्मा फुले- पुणे

० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)

० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)

० गोपाळ हरी देशमुख- पुणे

० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)

० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)

० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)

० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)

० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)

०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)

० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)

० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)

० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)

० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)

० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)

० साने गुरुजी- पालघर (रायगड)

० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)

० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)

० संत ज्ञानेश्वर- आपेगाव

०संत एकनाथ- पैठण

चालू घडामोडी प्रश्नोत्तरे

● जगातल्या महासागराच्या सर्वाधिक ज्ञात खोलीवर तळाशी पोहोचणारी पहिली महिला आणि व्यक्ती कोण?
: कॅथी सुलिव्हन (अमेरिका - 1984 साली)

● संयुक्त संशोधन, उत्पादनांच्या चाचणी व प्रमाणीकरणासाठी IFFCO या संस्थेसोबत कोणत्या संस्थेनी सामंजस्य करार केला?
: भारतीय कृषी संशोधन परिषद

● युवांना विविध व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षित करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसोबत कोणती संस्था करार करीत आहे?
: राष्ट्रीय खते मर्यादित

● ‘पूनम अवलोकन’ या अभ्यासाद्वारे कोणत्या प्राण्याची संख्या मोजली गेली?
: सिंह

● भारतातल्या डिप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेइकल (DSRV) कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले?
: विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश)

● चेन्नई आणि बेंगळुरू या शहरांमध्ये सुरूवात झालेल्या CBICच्या प्रमुख कार्यक्रमाचे नाव काय?
: तुरंत कस्टम्स

● मर्सेर संस्थेच्या '2020 कॉस्ट ऑफ लिव्हिंग' अहवालानुसार भारतातले सर्वात महागडे शहर म्हणून कोणत्या शहराला ठरविण्यात आले?
: मुंबई

● “ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट” या शीर्षकाचा अहवाल कोणत्या संघटनेनी प्रसिद्ध केला?
: जागतिक बँक

● यंदा 2020 सालची जागतिक रक्तदाता दिनाची संकल्पना काय होती?
: सुरक्षि‍त रक्त, जीव वाचवते

● भारतीय नौदलाच्या पूर्व कमांडचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
: बिस्वजीत दासगुप्ता (वाईस अ‍ॅडमिरल)

● ‘जगनन्ना चेडोडू’ योजना कोणत्या राज्यात लागू करण्यात आली?
: आंध्रप्रदेश

● ‘पूर्णपणे डिजिटल’ कार्यभार चालविणारी बांधकाम क्षेत्रातली पहिली संस्था कोण?
: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)

● संकेतस्थळ आधारित ‘आरोग्यपथ’ या नावाचे व्यासपीठ कोणत्या संस्थेनी कार्यरत केले?
: वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

● ‘कॅप्टन अर्जुन’ रोबोट कोणत्या शहराच्या रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले आहे?
: पुणे रेल्वे स्थानक

● आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागृती दिन कधी साजरा केला जातो?
: 13 जून

● ‘घर घर निगरानी’ मोबाईल अ‍ॅप कोणत्या राज्य सरकारने तयार केले?
: पंजाब

आजच्याच दिवशी कलकत्त्यातील टाऊन हॉल येथून स्वदेशी आंदोलनाची औपचारिक सुरुवात झाली होती...

🔸7 जुलै 1905 रोजी सिमला येथून लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणीची योजना घोषित केली.

🔸19 जुलै- सरकारने अधिकृतरीत्या बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतला.

🔸20 जुलै-बंगालचे विभाजन दोन भागात करण्यात आले.

🔸7 ऑगस्ट-फाळणी अंमलात येण्याच्या आधीच देशभरात वंगभंग व स्वदेशी चळवळ सुरू.

🔸16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची फाळणी अंमलात आली व बंगालमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली.

🔸बंगाल प्रांताच्या विभाजनाची जबाबदारी ही पूर्णत: कर्झनची असली तरी मूळ कल्पना मात्र त्याची नव्हती.

👉सदरील फाळणीची योजना ही विल्यम वार्ड कल्पनेनुसार बंगालचा लेफ्टनंट गव्हर्नर सर अँड्रयू फ्रेजर (फाळणीच्या योजनेचा जनक) याने आखली होती...

🔸फाळणीचे कारण काय दर्शविले- प्रशासकीय सीमांचे पुननिर्धारण...

🔸 फाळणीमुळे बंगालचे परिवर्तन दुसऱ्या आयर्लंडमध्ये होईल असा इशारा निसंदिग्ध शब्दात कृष्णकुमार मित्रा यांनी 'संजीवनी' मधून दिला.

🔸ही स्वदेशी चळवळ प्रामुख्याने बंगालच्या फाळणीला विरोध दर्शवण्यासाठी सुरू करण्यात आली.

🔸जमीनदार,शेतकरी,कामगार,स्त्रिया,विद्यार्थी हा वर्ग या चळवळीत सहभागी झाला परंतु या चळवळीची उणीव म्हणजे यात मुस्लिम गटाचा विशेष करून मुस्लिम शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवता आला नाही.

वंगभंग आंदोलन-
🔸16 ऑक्टोबर 1905 हा फाळणीचा दिवस बंगाली जनतेने 'राष्ट्रीय शोक दिन' म्हणून पाळला.स्वदेशीचा पुरस्कार करून परकीय मालावर बहिष्कार टाकण्यास सुरूवात झाली.

🔸बंकिमचंद्र यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीतील 'वंदे मातरम' हे गीत आंदोलकांच्या परवलीचा शब्द बनले. विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा वर बहिष्कार टाकला.

🔸डॉ.प्रफुल्लचंद्र रे यांनी 'बंगाल केमिकल्स' हा औषधांचा स्वदेशी कारखाना काढला.

🔸या स्वदेशी चळवळीचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी,कृष्णकुमार मित्रा (संजीवनी वृत्तपत्राचे संपादक),आनंद मोहन बोस,गुरुदास बॅनर्जी,रवींद्रनाथ टागोर यांनी केले.

🔸महाराष्ट्र व पंजाब मधील जनतेनेही या चळवळीत साथ दिली.
🔸1905 च्या बनारस अधिवेशनात (अध्यक्ष-गोखले) बंगालच्या फाळणीचा तीव्र निषेध.

🔸1906 च्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट असल्याचे सांगत स्वराज,स्वदेशी,बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यास मंजुरी दिली.
अध्यक्षीय भाषणात दादाभाईंनी 'चळवळ करा,चळवळ करा,अखंड चळवळ करा' असा संदेश दिला.

👉बंगालची फाळणी रद्द करण्या संबंधीचा ठराव ढाक्याचा नवाब ख्वाजा आतिकुल्ला यांच्याकडून मांडला गेला.

🔸लोकमान्य टिळकांनी राजकीय चळवळीसाठी स्वराज्य,स्वदेशी,बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुञी कार्यक्रम भारतीयांना दिला.

🔸पुढे वंगभंग विरोधी आंदोलन राष्ट्रव्यापी बनल्याने 12 डिसेंबर 1911 (लक्षात ठेवायला सोप्प 😊 12-12-11) रोजी लॉर्ड हार्डिंग्जने भरवलेल्या दिल्ली दरबारात ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली.

सापेक्ष दारिद्रय (Relative Poverty)

◾️देशातील उच्चतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्रय असे सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र स्पष्ट होते.

🔰 निरपेक्ष दारिद्रय  (Absolute Poverty) :

◾️दारिद्रयाच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार कारण त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्रय रेषा असे म्हणतात.

🔰 राष्ट्र व राज्य पातळीवरील दारिद्रयाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी नियोजन आयोग नोडल एजन्सी म्हणून कार्य करते.
त्यासाठी NSSO मार्फत साधारणत: दर पाच वर्षांनी हाती घेण्यात आलेल्या घरगुती उपभोग खर्चावरील नमूना सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो.

वारे व त्यांचे प्रकार

🔥दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. 

🔥दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात

🔥भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नाही. 

🔥कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते.

❗️ गरजणारे  चाळीस’ (Roaring Forties)

🔥 ४०° दक्षिण अक्षांशापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात या वाऱ्यांना ‘गरजणारे  चाळीस’ (Roaring Forties) असे म्हणतात. 

❗️ खवळलेले पन्‍नास’ (Furious Fifties)

🔥५०° दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहत असतात. या भागात त्यांना यां ‘खवळलेले
पन्‍नास’ (Furious Fifties) म्हणतात.

❗️किंचाळणारे साठ’ (Screeching Sixties)

🔥६०°दक्षिण अक्षांशाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात. त्यांना यां ‘किंचाळणारे साठ’ (Screeching Sixties)म्हणतात.

वातावरणाचे थर -


वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते...

👉 वातावरणाचे मुख्य थर (प्रकार)

🔸तपांबर -भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर.याची सरासरी जाडी ११ किमी.या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात.पाऊस,वारे,ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात...

🔸तापस्तधी-तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय.उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते...

🔸स्थितांबर-तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय.या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण नसतात व हवा शुष्क असते...

🔸स्थितस्तब्धी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तब्धी होय.या थरातील तापमान स्थिर असते.या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो.हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो...

🔸मध्यांबर-स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय.या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते...

🔸मध्यस्तब्धी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तब्धी होय...

🔸दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय.या थरात उंचीनुसार तापमान वाढते...

🔸आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे.या थरात उंचीनुसार तापमान वाढते.या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात...

🔸बाह्यांबर - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांबर होय.भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे.या थरातील विविध वायूंचे अणू,रेणू,पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात..

चक्रवर्ती समिती (Chakravarty Committee)

🌻भारतीय मौद्रिक प्रणालीच्या कामकाजासंबंधीचा अभ्यास करण्याकरिता स्थापन करण्यात आलेली समिती.

☂१९७० ते १९८०च्या दशकात सरकारकडून पैशाची सतत होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक सरकारला जास्तीत जास्त कर्ज देत होती.

☂त्यासाठी लागणाऱ्या चलनाच्या उभारणीसाठी बँकांच्या वैधानिक रोखता गुणोत्तरात (statutary liquidity ratio) सतत वाढ केली जात होती.

☂त्यामुळे ‘राखीव चलनात’ किंवा ‘मूळ चलनात’ वाढ होऊन देशातील चलन पुरवठ्यातही वाढ होत होती. त्याचा परिणाम म्हणजे, महागाईचा भार देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडत होता.

☂अशा वेळी चलन पुरवठ्यातील वाढ रोखण्यासाठी रिझर्व बँक ही बँकांच्या ‘आवश्यक रोख राखीव गरजेवर’ (Cash Resrve Requirment) सतत वाढ करत होती.

☂या चक्रातून बाहेर पडून येणाऱ्या काळात महागाईमुक्त नियोजित विकास कसा साध्य करता येईल, हे ठरविण्यासाठी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ सुखमय चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली.

☂शिफारसी : चक्रवर्ती समितीने मौद्रिक प्रणालीच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व बँक व भारत सरकार यांनी १९८१ पर्यंत नेमलेल्या सर्व समित्यांचा व अभ्यासगटांच्या अहवालांचा आधी सखोल अभ्यास केला.

☂त्यानंतर एप्रिल १९८५ मध्ये समितीने आपला अहवाल रिझर्व बँकेला  सादर केला

पॅनकार्डच्या 10 अंकांमध्ये बरीच महत्वाची माहिती दडलेली आहे,जाणून घ्या त्याचा अर्थ


📌  _पॅनकार्डमध्ये जन्माच्या तारखेच्या खाली 10-अंकी पॅन लिहिलेले असते. त्याची सुरूवात इंग्रजीतील काही मोठ्या अक्षरे ने केली जाते._

🔅 *पहिल्या तीन अंकी:*
आयकर विभागानुसार कोणत्याही पॅनचे पहिले तीन अंक इंग्रजी वर्णमाला मालिका दाखवतात. या वर्णमाला मालिकेत एएए ते झेडझेडझेड अशी कोणतीही तीन-अक्षरी इंग्रजी मालिका असू शकतात. याचा निर्णय आयकर विभागाने घेतला आहे.

🔅 *पॅनचे चौथे पत्रः पॅनच्या चौथ्या पत्रात*
आयकर भरणाऱ्याची स्थिती दर्शविली जाते. चौथ्या क्रमांकावर पी असेल तर हे पॅन क्रमांक एका व्यक्तीचे वैयक्तिक साधन असल्याचे दर्शवते.

▪️F दर्शविते की संख्या एका फर्मची आहे.
▪️सी कंपनी दाखवते -एआरई
ऑफ असोसिएशन ऑफ पर्सन
▪️टी टी-टीआरईएसटी-बडी
ऑफ बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल-
एल लोकलमधून
▪️जे कृत्रिम न्यायिक व्यक्ती-
जी सरकारकडून.

🔅 *पॅनचा पाचवा अंक –* पॅनचा पाचवा अंकही
एक इंग्रजी पत्र आहे.

हे पॅनकार्ड धारकाच्या *आडनावाचे* पहिले अक्षर दर्शविते. उदाहरणार्थ, जर एखाद्याचे आडनाव जाधव  असेल तर पॅनचा पाचवा अंक जे.

🔅 *सहाव्या ते नवव्या अंकांच्या*
आडनावाचे पहिले अक्षर त्यानंतर चार अंकी असते. या संख्या 00001 ते 9999 दरम्यान कोणतेही चार अंक असू शकतात. या आकडेवारी त्या काळात चालू असलेल्या आयकर विभागाची मालिका दाखवते.

🔅 *दहावा अंक*
पॅनकार्डचा दहावा अंकही  एक इंग्रजी पत्र आहे. प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार तो एक अक्षराचा चेक अंक असू शकतो. हे ए ते झेड दरम्यानचे कोणतेही पत्र असू शकते.

इंग्रज सरकार विरुध्दच्या या उठावात भारतीयांना आलेल्या अपयशाची प्रमुख कारणे



🖍 हा उठाव स्थानिक स्वरुपात, मोजक्याच क्षेत्रात, मर्यादीत प्रमाणात व असंघटीत असा होता.

🖍 तसेच भारतातील एेक्याचा अभाव हे देखील या उठावाच्या पराभवाचे मोठे कारण होते.

🖍  इंग्रजांच्या लष्करातील जवळपास अर्धेहिंदी सैनिक इंग्रजांच्याच बाजूने लढले, तसेच शिखांनी देखील इंग्रजांना साथ दिली.

🖍  सिंध, राजपुताना, पंजाब, काश्मिर, मुंबई, मद्रास या प्रांतातील जनता, शासक तसेच संस्थानिक यांनी या उठावात सक्रिय सहभाग न घेता ते शांत राहिले.
🖍   शिवाय शेतकरी तसेच खालच्या जातीतील लोकांनीही या उठावात सक्रिय भाग घेतला नाही.

🖍   पातियाळा, जिंद, ग्वाल्हेर, हैद्राबाद येथील राजांनी हा उठाव दडपून टाकण्यास सरकारला उघड सहकार्य केले.

🖍  या उठावाचा जास्त प्रभाव केवळ पश्चिम बिहार, अवध, रोहिलखंड, दिल्ली तसेच नर्मदा व चंबळ नद्यांमधील प्रदेश येथेच जाणवला.

🖍   उठावकर्त्यांच्या तुलनेने इंग्रजांकडे विपुल साधन सामग्री होती. उठावाला शिपायांजवळही फारच थोड्या बंदुका होत्या व तलवारी आणि भाले हिच भारतीयांची मुख्य शस्त्र होती.

🖍   आधुनिक शस्त्रांच्या सहाय्याने तसेच तारायंत्राच्या सुविधेमुळे उठाव दडपून टाकण्यासाठी एक सार्वत्रिक योजना बनविण्यात इंग्रज सफल झाले व अनुभवी अधिकाऱ्यांच्या रुपात कंपनी जवळ योग्य नेतृत्वही होते.

🖍   या उठावाचे संघटन भारतीयांनी नियोजनबध्द पध्दतीने केले नव्हते. उठावात भाग घेणारे नेते शूर होते, परंतु संघटन क्षमता, अनुभव व परस्पर सहकार्याने काम करण्यात ते कमी पडले, तसेच त्यांच्यामध्येनेतृत्व गुणांचा देखील 
अभाव होता.

🖍   कुवरसिंह व मौलवी अहमदुल्ला यांचा अपवाद वगळता प्रत्येकजण हे केवळ आपल्या क्षेत्रातच लढले.

Online Test Series

०७ ऑगस्ट २०२०

Daily Questions and answers



१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?
१)विजयालक्ष्मी पंडित
२)हंसाबेन मेहता✅✅✅
३)सरोजिनी नायडू
4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही

२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?
१)२६जानेवारी१९५०
२)२६जानेवारी१९४९
३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅
५)२६नोव्हेंबर १९५०

३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?
१)डॉ बाबासाहेब आंबेडकर
२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅
३)पंडित नेहरू
४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते

४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?
१)दक्षिण आफ्रिका
२)अमेरिका
३)आयर्लंड ✅✅✅
४)वरीलपैकी एकही नाही

५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे?
१)सहावा
२)नववा✅✅✅
३) पाचवा
४)वरीलपैकी नाही

६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?
१)कलम ५१ब
२)कलम५१अ✅✅✅
३)कलम ५१क
४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही

७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?
१)उच्च न्यायालय
२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅
३)जिल्हा न्यायालय
४)कुटुंब न्यायालय

८.खालील पैकी संसद बरोबर काय?
१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा
२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल
३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅
४)मुळात अस काही नसतं

९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?
१)९
२)१०✅✅✅
३)११
४)यापैकी नाही

१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?
१)१०९✅✅✅
२)१०८
३)१०७
४)१०६

महत्त्वाचे प्रश्नसंच

०१] हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास

०२] भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम

०३] कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow’s Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश

०४] कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद

०५]  हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची

०६] फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव

०७] मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप

०८] भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.

०९] नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार

१०] महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश

११] महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर

१२]  परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग

१३] ‘V’ आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण

१४] दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite

१५] बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद

१६] Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी

१७] हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम

१८] पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर

१९] पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता

२०] गोवरी’ कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान

२१] घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा

२२] ग्रेट बॅरियर रीफ’ कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर

२३] या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र

२४]  कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी

२५]   भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम

२६] जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी

२७] भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र

२८]  इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्‍यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश

२९] पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश

३०] वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्‍ट्र

३१]  लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश

३२] फिग्रीन ऑफ गोरा देव’ (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात

३३] पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान

३४] कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम

३५] झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३६] भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३७] महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार

३८] कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ

३९] महाराष्ट्रातील कोणता प्रदेश ‘तलावाचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ

४०]  राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर

४१] महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा

४२] ‘श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प’ कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा

४३] महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%

४४] महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

>>> उत्तर सीमेला

४५] महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

>>> ७२० किमी

४६]  कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?

>>> पंचगंगा

४७] महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?

>>> ४४० कि.मी.

४८] महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

४९] यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत?

>>> वणी

५०] मेळघाट हे वाघासाठी सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे?

>>> अमरावती

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...