०७ ऑगस्ट २०२०

विभक्ती

नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.

वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे

असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.

विभक्त्यार्थ दोन प्रकार

१) कारकार्थ - कारक व कारकार्थ
२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म

विभक्तीची आठ नावे

१) प्रथमा
२) द्वितीया
३) तृतीया
४) चतुर्थी 
५) पंचमी
६) षष्ठी
७) सप्तमी 
८)  संबोधन

विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा

विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)

१) प्रथमा  -  प्रत्यय नाही  -  प्रत्यय नाही      
२) द्वितीया  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते   
३) तृतीया  -  ने, ए, शी  -  नी, शी, ही    
४) चतुर्थी  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते    
५) पंचमी  -  ऊन, हून  -  ऊन, हून    
६) षष्ठी  -  चा, ची, चे  -  चे, च्या, ची  
७) सप्तमी  -  त, ई, आ  -  त, ई, आ  
८) संबोधन  -  प्रत्यय नाही  -  नो

विभक्तीतील रूपे

विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)

१) प्रथमा -  फूल  -  फुले
२) द्वितीया  -  फुलास, दुलाला  -  फुलांस, फुलांना
३) तृतीया  -  फुलाने, फुलाशी  -  फुलांनी, फुलांशी
४) चतुर्थी  -  फुलास, फुलाला  -  फुलांस, फुलांना
५) पंचमी  -  फुलातून, फुलाहून  -  फुलांतून, फुलांहून
६) षष्ठी  -  फुलाचा, फुलाची, फुलाचे  -  फुलांचा, फुलांची, फुलांचे
७) सप्तमी  -  फुलात  -  फुलांत
८) संबोधन  -  फुला  -  फुलांनी

कलम 370 काय आहे ?


.
जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 वरून राजकीय नेते आणि पक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे.अनेक दिवसांनी कलम 370 चा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.कलम 370 मध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत, त्यांचा संभाव्य फायदा आणि तोटा काय आहे, हे खाली विस्तृतपणे देण्यात आले आहे.
कलम 370 मधील प्रमुख मुद्दे
.
1) कलम 370 लागू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. म्हणजेच हे राज्य विशेष स्वायत्तता असलेले राज्य आहे.
.
2) कलम 370 मधील तरतुदीअंतर्गत संसदेला जम्मू-काश्मीरसाठी फक्त संरक्षण, विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा बनवण्याचा अधिकार आहे.
.
3) इतर कायदे लागू करण्यासाठी त्यांना राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे.
.
4) या विशेष अधिकारामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचादेखील अधिकार नाही.
5) कलम 370 मुळेच जम्मू-काश्मीरवर 1976 चा शहरी भूमी कायदा लागू होत नाही. याचाच अर्थ जम्मू-काश्मीरचा रहिवासी नसणारा व्यक्ती जमीन खरेदी करूशकत नाही.
.
6) एवढेच नाही तर ज्या महिलेने इतर राज्यातील मुलाशी लग्न केले असेल, तर तोसुद्धा येथे जमीन खरेदी करू शकत नाही.
.
7) याशिवाय ज्यामध्ये देशात आर्थिक आणीबाणी लावण्याची तरतूद आहे ते भारतीय घटनेचे कलम 360 देखील जम्मू-काश्मीरवरलागू होत नाही.
.
8) भारतातील सर्व राज्यांमध्येलागू होणारे कायदेसुद्धा या राज्यात लागू होऊ शकत नाहीत.
.
9) जम्मू-काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. तसेच, इतर राज्यांमध्ये हा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. कलम 370 द्वारे करण्यात आलेली ही विशेष तरतूद आहे.
.
10) पाकिस्तानने 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीरवर हल्ला केला होता. त्यानंतर राजा हरिसिंह यांनी भारताला मदत मागितली होती आणि त्यानंतर कलम370 अस्तित्वात आले.
.
11) 50 दशकाच्या सुरुवातीपासून भाजप पक्ष कलम 370 च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आला आहे. जम्मू-काश्मीर पूर्णपणे एकीकृत व्हावे, असे त्यांना वाटते.समर्थनात केले जाणारे तर्क
कलम 370 कायम ठेवण्याच्या बाजूने बोलायचे झाल्यास या कलमामुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांना त्यांच्या सोयीनुसार त्यांचे हित आणि कायदे निश्चितकरण्याचा अधिकार मिळतो. केंद्रसरकारच्या दबावातून मुक्त होऊन ते स्वत:साठी आपल्या गरजांनुसार कायदा तयार करू शकतात.
.
* भारत आणि जम्मू-काश्मीर यांच्यात झालेल्या करारांनुसार या राज्याला भारताशी जोडणारा हा कायदा आहे. याचाच उल्लेख करत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले होते की, कलम 370 ची कायम चुकीचीव्याख्या होत आलेली आहे.
.
* या कायद्यांतर्गत इतर राज्यातील लोकांना जम्मू-काश्मीरात नोकरी मिळवण्याचा अधिकार नाही. राज्याच्या शासकीय सेवादेखील केवळ जम्मू-काश्मीरच्या उमेदवारांसाठीच आहेत. यामुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी सुरक्षित राहतात.
.
* जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 मुळे दहशतवादाला खतपाणी मिळत आहे. या कलमाअंतर्गत पाकिस्तानी नागरिक जम्मू-काश्मीरच्या महिलेशी लग्न करून काश्मीरचे नागरिकत्व पत्करू शकतो. अशा रीतीने पाकिस्तानी दहशतवाद्यांनाही काश्मीरचे नागरिकत्व सहज मिळते.
.
* जम्मू-काश्मीरमध्ये माहितीचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार यासारखे कायदे लागू होत नाहीत. कलम 370 मुळे तेथील नागरिक या कायद्यांच्या लाभांपासून वंचित राहत आहेत. तेथे माहिती अधिकार कायदा केवळ केंद्र सरकारच्या कार्यालयांसाठीच लागू होतो.
.
* जम्मू-काश्मीर राज्यातील अल्पसंख्याकांच्या हितांसाठीभारत सरकार कलम 370 अंतर्गत काहीच करू शकत नाही. तथापि, अल्पसंख्याकांच्
या हितांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जम्मू-काश्मीर सरकारवर लावला जात आहे.

राज्यसेवा प्रश्नसंच


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जगातला सर्वात उंच रेल्वे पूल कुठे बांधण्यात येत आहे?

(A) उत्तराखंड
(B) जम्मू व काश्मीर✅✅
(C) लडाख
(D) मणीपूर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या संस्थेत “विमेन आंत्रेप्रेनेऊरशिप अँड एंपोवरमेंट (WEE) कोहोर्ट” उपक्रमाचा प्रारंभ केला गेला?

(A) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली✅✅
(B) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू
(C) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद
(D) महिला व बाल विकास मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या बँकेनी ‘कोना कोना उम्मीद’ मोहीमेचा प्रारंभ केला?

(A) फेडरल बँक
(B) HDFC बँक
(C) कोटक महिंद्रा बँक✅✅
(D) ICICI बँक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

“स्वच्छ भारत रेव्होल्यूशन” या पुस्तकाचे संपादक कोण आहेत?

(A) जयदीप गोविंद
(B) समीर कुमार
(C) व्ही. राधा
(D) परमेश्वरन अय्यर✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या संस्थेच्यावतीने “सहकार कूपट्यूब NCDC चॅनेल” कार्यक्रमाचा प्रारंभ केला?

(A) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र
(B) राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ✅✅
(C) राष्ट्रीय दुग्ध संस्कृती संग्रह
(D) राष्ट्रीय हवामान माहिती संस्कृती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या संस्थेच्यावतीने भारत आणि रशिया यांच्यामधील संशोधन व विकास तंत्रज्ञान कार्यक्रमासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला?

(A) विज्ञान व तंत्रज्ञान विभाग✅✅
(B) जैवतंत्रज्ञान विभाग
(C) गृह मंत्रालय
(D) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रालयाने ‘नॅशनल ट्रान्झिट पास सिस्टम (NTPS)’ याचे अनावरण केले?

(A) गृह मंत्रालय
(B) पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालय✅✅
(C) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
(D) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात नवी अत्याधुनिक ‘मध परीक्षण प्रयोगशाळा’ आहे?

(A) गुजरात✅✅
(B) राजस्थान
(C) उत्तरप्रदेश
(D) मध्यप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणते आठव्या कलमान्वये उद्योगपतींच्या नेतृत्वात एक कंपनी तयार करणारे पहिले राज्य ठरले?

(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तेलंगणा
(D) कर्नाटक✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

‘युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स’चे बोधवाक्य काय आहे?

(A) सेम्पर फोर्टिस
(B) डी ओप्रेसो लिबर
(C) सेम्पर सुप्रा ✅✅
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणती अंतराळ संस्था ‘ASTHROS’ मोहीम प्रक्षेपित करणार आहे?

(A) स्पेसएक्स
(B) इस्रो
(C) ईएसए
(D) नासा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

‘मल्टि-इंटरऑपरेबल क्यूआर कोड’ची शिफारस करणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या समितीचे प्रमुख कोण आहेत?

(A) डी. बी. पाठक✅✅
(B) कुश तनेजा
(C) अशोक कुमार गुप्ता
(D) संजीव चड्ढा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणती संस्था GAIL मर्यादित कंपनीच्या सहयोगाने ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ प्रकल्प उभारणार आहे?

(A) BHEL
(B) NTPC
(C) CCSL✅✅
(D) HPCL

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणाची इंडियन ओव्हरसीज बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी या पदावर नेमणूक झाली?

(A) संभव जैन
(B) अनसूया उइके
(C) गणेशी लाल
(D) पार्थ प्रतिम सेनगुप्ता✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणाची टाटा AIA लाइफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नेमणूक झाली?

(A) नवीन तहिलयानी✅✅
(B) ऋषी श्रीवास्तव
(C) विभा पडळकर
(D) आशिष वोहरा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या  गव्हर्नर  जनरलनि  इनाम  कमिशन  1828  ला  नेमले .

A) लॉर्ड  विलियम बेंटिक ✅✅
B) लॉर्ड  हेस्टिंग्स
C) लॉर्ड  वेलस्ली
D) लॉर्ड मेयो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बॉम्बे  ठाणे  रेल्वे  कोणत्या  वर्षी  सुरु  झाली.

A) 1852
B) 1853✅✅
C) 1854
D) 1855
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इ. स .  1848 ते  1856 या   काळात  अनेक  संस्थाने  कोणी  खालसा  केली.

A) लॉर्ड  रिपन
B) लॉर्ड  विलियम  बेंटिक
C) लॉर्ड कॉर्नवालिस
D) लॉर्ड  डलहौसी ✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


इ. स. 1800 मध्ये कोणी  हिंदी  लोकांसाठी  कलकत्ता येथे  फोर्ट  विलियम  महाविद्यालयाची  स्थापना  केली.

A) लॉर्ड  मेकॅले
B) लॉर्ड  बेंटिक
C) लॉर्ड  वेलस्ली ✅✅
D) लॉर्ड  डलहौसी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


शासकीय  कर्मचाऱ्यावर   राष्ट्रीय  काँग्रेसशी  संबंध  ठेवण्यास कोणी  बंदी  घातली.

A) लॉर्ड  कर्झन
B) लॉर्ड  डफरीन ✅✅
C) लॉर्ड रिपन
D) ए.  ओ.  ह्यूम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो.?

19 जुलै
29 जुलै ✅✅
30 जून
30 जुलै

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कारगिल विजय दिवस भारतीय भुदलाच्या कोणत्या विजयी मोहीमेच्या स्मृतीत पाळला जातो?

(A) ऑपरेशन कॅक्टस
(B) ऑपरेशन पवन
(C) ऑपरेशन विजय ✅✅
(D) ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या संस्थेनी ‘उन्नत भारत अभियान’साठी TRIFED सोबत सामंजस्य करार केला?

(A) भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू
(B) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद
(C) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास
(D) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात चौथ्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार?

(A) हरयाणा✅✅
(B) राजस्थान
(C) उत्तरप्रदेश
(D) मध्यप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणाची वेस्टर्न एअर कमांडच्या प्रमुखपदी नेमणूक झाली?

(A) एअर मार्शल विवेक राम चौधरी✅✅
(B) एअर मार्शल व्ही. आर. चौधरी
(C) एअर मार्शल बी. सुरेश
(D) एअर मार्शल आय. पी. विपिन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 कोणत्या मंत्रालयाने ‘BIS-केअर’ अॅपचे अनावरण केले?

(A) ग्राहक कल्याण, खाद्यान्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय ✅✅
(B) खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
(C) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय
(D) अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 कोणत्या संस्थेनी स्टार्टअप उद्योग आणि नवसंशोधकांसाठी ‘डेअर टू ड्रीम 2.0’ ही स्पर्धा आयोजित केली?

(A) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
(B) संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO)✅ ✅
(C) NTPC मर्यादित
(D) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 कोणत्या मंत्रालयाने ‘नॉलेज रिसोर्स सेंटर नेटवर्क (KRCNet)’ याचे उद्घाटन केले?

(A) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(B) जलवाहतूक मंत्रालय
(C) भूशास्त्र मंत्रालय ✅✅
(D) ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 राजस्थानमध्ये तयार झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालाच्या अधिकारांविषयी खालील विधाने विचारात घ्या:

1. कलम 174 अन्वये राज्यपाल योग्य वाटेल त्यावेळी आणि कोणत्याही ठिकाणी सभा बोलवू शकतात.


2. कलम 163 मध्ये असे नमूद आहे की राज्यपाल आपली कार्ये केवळ मंत्रिमंडळाच्या मदतीने आणि त्यांच्या सल्ल्यानुसार करावी आणि ते स्वतःची विवेकबुद्धी वापरू शकत नाही.

📌 दिलेले कोणते विधान अचूक आहे?

(A) केवळ 1 ✅✅
(B) केवळ 2
(C) 1 आणि 2
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 निधन झालेले आमला शंकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A) बालकांच्या शिक्षणाचे प्रवर्तक
(B) मानवी हक्क कार्यकर्ता
(C) पत्रकार
(D) नृत्यदिग्दर्शक✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 कोणत्या देशाने सामाजिक न्याय आणि संघ-स्थापना बैठकीसाठी पहिल्यांदाच क्रिकेट सामना आयोजित केला?

(A) न्युझीलँड
(B) ऑस्ट्रेलिया
(C) दक्षिण आफ्रिका ✅✅
(D) इंग्लंड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या सार्वजनिक संस्थेनी स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षण, संशोधन आणि उद्योजकता विकास यासाठी IIT कानपूर या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?

(A) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
(B) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन
(C) पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन✅✅✅
(D) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाने पारंपरिक औषधी आणि होमिओपथी क्षेत्रातल्या परस्पर सहकार्यासाठी भारतासोबत सामंजस्य करार केला?

(A) केनिया
(B) झिम्बाब्वे✅✅
(C) मोझांबिक
(D) मलावी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाने अॅंटीमायक्रोबियल रेझिस्टन्स विषयक संशोधनासाठी भारतासोबत करार केला?

(A) ब्रिटन✅✅✅
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) स्पेन
(D) कॅनडा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणाला भूशास्त्र मंत्रालयाकडून ‘जीवनगौरव उत्कृष्ठता पुरस्कार 2020’ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) अशोक साहनी✅✅
(B) डॉ. एस. एस. बाबू
(C) जे. के. भट्टाचार्य
(D) टी. चक्रवर्ती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात पवन हंस या कंपनीने उडान योजनेच्या अंतर्गत प्रथम हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभ केला?

(A) हिमाचल प्रदेश
(B) जम्मू व काश्मीर
(C) सिक्किम
(D) उत्तराखंड✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतीय हवाई दलाच्या कोणत्या पथकाला ‘गोल्डन अॅरोज’ म्हणून संबोधले जाते?

(A) स्क्वॉड्रॉन 12
(B) स्क्वॉड्रॉन 102
(C) स्क्वॉड्रॉन 17✅✅
(D) स्क्वॉड्रॉन 8

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशासोबत भारतीय रिझर्व्ह बँकेनी 400 दशलक्ष डॉलरच्या चलनाची अदलाबदल करण्यासाठी करार केला?

(A) इथिओपिया
(B) सेनेगल
(C) सेशेल्स
(D) श्रीलंका ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

काश्मीर खोऱ्यातल्या कोणत्या मसाल्याला केंद्र सरकारकडून GI टॅग प्राप्त झाला?

(A) कोशूर माऱ्त्सिवागुन
(B) कोशूर झुर
(C) काश्मीर कहवा
(D) केसर ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रालयाने भाडेतत्वावर देण्याच्या संदर्भातल्या भारतीय लेखा मानदंडांमध्ये दुरुस्ती केली?

(A) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
(B) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय ✅✅
(C) कायदा व न्याय मंत्रालय
(D) अर्थमंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2020 साली जागतिक हेपॅटायटीस दिनाची संकल्पना काय आहे?

(A) इन्व्हेस्ट इन एलिमीनेटिंग हेपॅटायटीस
(B) हेपॅटायटीस फ्री फ्युचर✅✅
(C) फाइंड द मिसिंग मिलियन्स
(D) मेकिंग हेपॅटायटीस एलिमीनेशन ए रीयालिटी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशात भारत निर्यातीला चालना देण्यासाठी कापूस साठविण्यासाठी गोदाम उभारणार आहे?

(A) व्हिएतनाम✅✅
(B) म्यानमार
(C) अफगाणिस्तान
(D) फिलीपिन्स

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रालयाने ग्रामीण विकास कार्यक्रमांचे मूल्यांकन करण्यासाठी “वित्तीय व्यवस्थापन निर्देशांक” जाहीर केला?

(A) सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
(B) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(C) कामगार व रोजगार मंत्रालय
(D) ग्रामीण विकास मंत्रालय✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी तयार केलेल्या भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मोबाइल अॅपचे नाव काय आहे?

(A) ऋतू
(B) जलवायू
(C) मौसम ✅✅
(D) अवधी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रालयाने ‘BIS-केअर’ अॅपचे अनावरण केले?

(A) ग्राहक कल्याण, खाद्यान्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय ✅✅
(B) खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
(C) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय
(D) अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

___ या दिवशी ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा केला जातो.

(A) 14 जुलै
(B) 15 जुलै✅✅
(C) 13 जुलै
(D) 12 जुलै

प्रश्न मंजुषा

Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.
1 १९ जुलै √√√√
2 ३१ आॅक्टोबर
3  २३ एप्रिल
4 १ व ३

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.
1  २००७
2  २००४
3  २००५√√√√√√
4  २०१३

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.3  भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही
1  कामगारांची वाढती संख्या
2  अयोग्य तंत्रज्ञान
3  प्रभावी मागणीची     
कमतरता
4  कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?
1  १९४८-४९
2  १९३१-३२√√√√
3  १९११-१२
4  १८६७-६८

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.5  खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?
1   चलन निश्चलीकरन
2   रुपयाचे अवमूल्यन√√√√
3   १ व २  दोन्ही घडले
4  १ व २ दोन्ही घडले नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.6  रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?
1   बँकदर
2  रोख राखीव प्रमाण
3  वैधानिक रोखता प्रमाण
4  रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.7  खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.
1  "से" चा बाजार विषयक नियम
2  उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम
3  एंजल चा नियम√√√√√
4  फिलिप्स वक्ररेषा

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.8  १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.
1  २० कोटी व ३४० रुपये वार्षिक
2  २४० कोटी व २० रुपये वार्षिक
3  ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√
4  ३४० कोटी वार्षिक व २०  रुपये मासिक

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?
1  अन्नधान्य उत्पादन
2  राष्ट्रीय उत्पन्न
3  दरडोई उत्पन्न
4  किमतीचा निर्देशांक√√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.10  भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?
अ. ग्रामीण शिक्षण
ब. ग्रामीण आरोग्य
क. ग्रामीण पाणीपुरवठा
ड. ग्रामीण रस्ते
1   अ आणि ब  √√√√√
2   ब आणि क
3   क आणि ड
4  अ आणि ड

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.11  खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते?
1  चीन -भारत युध्द
2  भारत पाकिस्तान संघर्ष
3  आर्थिक मंदी
4  राजकीय अस्थिरता √√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.12  तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.
1  मुद्रा अवपात
2  मुद्रा संस्फीती√√√√√
3  स्टगफ्लेशन
4  स्टगनेशन

📖📖📖📖📖📖📖📖📖

[Q.13  भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?
1  यु एस ए √√√√√√ 
2  यु के 
3  चीन  
4  सिंगापूर

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?
अ इंदिरा गांधी
ब  मोरारजी देसाई
क जयप्रकाश नारायण
ड  रिझर्व्ह बँक
1  अ आणि क
2  ब आणि  ड√√√√√√
3  ब आणि  क
4  क आणि ड

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.15  तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.
1  अन्नधान्य उत्पादन
2  राष्ट्रीय उत्पन्न
3  परकीय चलन साठा
4  किमतीचा निर्देशांक√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.16  भारतात मध्यवर्ती   बँकेची शिफारस कोणी केली नव्हती?
1   हिल्टन यंग आयोग
2   चेंबर्लिन आयोग
3   फौलर समिती
4   मॅकलेगन समित✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.17  ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.
1  राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.
2  मद्रास फर्टिलायझर ली.
3  हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√
4  वरील सर्व

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?
1  १९४६
2  १९३८√√√√√
3  १९२९
4  १९२५

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?
1  रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे
2  नवीन चलन निर्मिती
3  स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे
4  जमा झालेले महसूल√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.
1  रोख
2  बहुआयामी
3  शून्याधारीत√√√√√
4  यापैकी नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?
1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√
2 प्रो पिगु
3 डॉ मार्शल
4 वरील पैकी नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?
1  पुरोगामी
2  न्याय्य
3  प्रतिगामी√√√√√√
4  प्रमाणशीर

📖📖📖📖📖📖📖📖

रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी.


🅾(फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - ९ ऑक्टोबर इ.स. १८९२)
.इ स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. 

🅾प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनीसमाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. .
 
🅾भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुटें हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे.

🅾मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...