२१ जुलै २०२०

महान क्रांतीकारक बटुकेश्वर दत्त


🔸कानपूरात शिकत असताना भगतसिंग यांच्याशी त्यांची ओळख झाली.त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते सुरुवातीला कानपूरमध्ये 'हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' या क्रांतीकारी संघटनेत कार्य करू लागले...

🔸या संघटनेत काम करत असतानाच त्यांनी बाँब बनविण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक बाँब बनविण्याचा कारखाना गुप्तपणे चालू करण्यात आला...

🔸लाहोर येथे सायमन आयोगाविरुद्ध निदर्शने करताना झालेल्या जबर लाठीहल्ल्यात ज्येष्ठ क्रांतिकारक लाला लजपतराय हे जखमी होऊन पुढे त्यांचे निधन झाले (१९२८).

🔸या घटनेमुळे ब्रिटिशांच्या विरोधात देशभर तीव्र असंतोषाची लाट पसरली. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाठीहल्ल्याचा मुख्य सूत्रधार पोलीस अधिकारी स्कॉट याचा खून करण्याचे ठरविले...

🔸तथापि या हल्ल्यात स्कॉट ऐवजी दुसरा पोलीस अधिकारी साँडर्स मारला गेला.तेव्हा लालाजींच्या मृत्यूचा बदला घेतल्याची पत्रके लाहोरच्या रस्त्यांवर झळकली...

🔸त्यातच ब्रिटिश सरकारला अनिर्बंध सत्ता व अधिकार मिळवून देणारी दोन अन्यायकारक विधेयके (Trade Dispute Bill व Public Safety Bill) ब्रिटिश सरकार लादणार होते...

🔸या विधेयकांना विरोध करण्यासाठी व लालाजींच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी दिल्लीच्या कें.विधानसभेत बाँब टाकण्याचे ठरविले...

🔸सभागृहात ८ एप्रिल १९२९ रोजी ही विधेयके मांडण्यात आली. प्रेक्षकसज्जातून भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी कोणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या सभागृहात बाँब फेकला,हवेत गोळ्या झाडल्या व निषेधपत्रके भिरकावली...

🔸त्यांच्या निषेधपत्रात ‘बहिऱ्या झालेल्या लोकांसाठी हा मोठा आवाज असून खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यासाठी बलिदान चालू आहेʼ,असा मजकूर होता...

🔸त्यानंतर पळून न जाता दोघेही ‘इन्किलाब जिंदाबादʼ अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले...

🔸भगत व दत्त यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली.तर तत्पूर्वीच्या लाहोर येथील साँडर्स हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवून भगतसिंग आणि त्यांचे सहकरी सुखदेव, राजगुरू यांना पुढे फाशीची शिक्षा सुनावली...

🔸आपल्याला फाशी झाली नाही म्हणून बटुकेश्वर दत्त दु:खी होते.परंतु क्रांतिकारक फासावर लटकूनच नाही,तर जिवंतपणी कारागृहात मरणयातना भोगूनसुद्धा लढा देतात, अशा शब्दांत भगतसिंगांनी त्यांची समजूत घातली...

🔸अंदमानच्या कारागृहातही दत्त यांनी उपोषण करून इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठवला...

🔸महात्मा गांधी यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली (१९३८)...

🔸छोडो भारत आंदोलनात भाग घेतल्यावरून पुन्हा त्यांना 4 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली.या दरम्यान त्यांना क्षयरोगाचाही सामना करावा लागत होता.पुढे १९४५ साली त्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली...

🔸भारतीय स्वातंत्र्यानंतर ते राजकीय प्रसिद्धीपासून दूरच राहिले.अंजली या युवतीशी त्यांनी विवाह केला (१९४७) व पाटणा येथे स्थायिक झाले..

🔸दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्यावरील अंत्यसंस्कार हे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिस्थळाशेजारी हुसेनीवाला (पंजाब) येथे करण्यात आले...

अब्दुल रसूल कुर्बान हुसेन:-

📚अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते.

📚 कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून, १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविले. त्यावेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे २२ वर्षे होते. एवढ्या तरुण वयात हौतात्म्य लाभलेले ते पहिलेच संपादक असावेत.

📚सोलापुरातील स्वातंत्र्यलढा दडपण्यासाठी इंग्रजांनी मार्शल कायदा लागू केला. त्यामुळे कुर्बान हुसेन यांचे वृत्तपत्र बंद पडले.

📚त्यांनी १९२७ साली ‘गझनफर’ नावाचे उर्दू भाषेतील साप्ताहिक सुरु केले होते.

📚‘गझनफर’ या शब्दाचा अर्थ आहे सिंह. लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ वृत्तपत्राने ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यासाठी जागृती केली, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हयात कुर्बान हुसेन यांच्या ‘गझनफर’ वृत्तपत्राने कार्य सुरु केले होते. गझनफर हे नाव उर्दू भाषेतील होतं, परंतु ते मराठी भाषेत देवनागरी लिपीत छापले जात असे. त्यांनी गझनफर वृत्तपत्रातून स्वातंत्र्यलढा, कामगारांचे प्रश्न, हिदु-मुस्लिम ऐक्य यासह विविध विषयांवर लेखन केले.

📚त्यांची भाषा प्रभावी आणि परखड होती. कुर्बान हुसेन हे एका सामान्य मुस्लीम कुटुंबात जन्माला आले. ते गिरणी कामगार होते. कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जात होते, ते सभांमध्ये अतिशय प्रभावी भाषणे करीत असत. ५ मे १९३० रोजी महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर सोलापूर शहरात जे सभा झाली, त्यातील त्यांचे भाषण ऐकून तरुण कार्यकर्ते इंग्रजाविरुद्ध पेटून उठले होते.

📚 सोलापुरातील तरुण रस्त्यावर उतरल्यानंतर येथील परिस्थिती कलेक्टर यांच्या नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे ९, १०, ११ मे १९३० हे तीन दिवस सोलापूर शहरात इंग्रज सरकारचे शासनच नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी तीन दिवस सोलापूर शहराने पूर्ण स्वातंत्र्य अनुभवले.

माता मृत्यूदर कमी असणाऱ्या राज्यांत महाराष्ट्र दुसरा (प्रथम केरळ).

माता मृत्यू दर(MMR) :-

- प्रति एकलाख जिवंत जन्मापैकी
- २०१४-१६ मध्ये १३०,
   २०१५-१७ मध्ये १२२ तर
   २०१६-१८ मध्ये ११३.

- WHO SDG नुसार हे प्रमाण २०३० पर्यंत "७०" उद्दिष्ट.

-  सर्वात कमी(कंसातील आकडे मागील वर्षाचे)
  १ केरळ- ४३,
  २. महाराष्ट्र- ४६(५५),
  ३. तमिळनाडू - ६०,
  ४. तेलंगणा- ६३
  ५. आंध्रप्रदेश- ६५.

- सर्वाधिक-
1.आसाम- २१५,
२. उत्तर प्रदेश- १९७,
३. मध्य प्रदेश- १७३,
4.राजस्थान-१६४,
5.छत्तीसगड-१५९.

- प्रमाण वाढले 👉 केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, छत्तीसगड.

- प्रमाण खूप कमी झाले 👉 राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा

चालू घडामोडी


.........................................................
• सीमा रस्ते संस्था (BRO) ने................हा पूल पूर्णपणे बदलण्यासाठी ‘प्रोजेक्ट अरुणक’ आरंभ केला
- डापोरीजो पूल (अरुणाचल प्रदेशातल्या अप्पर सुबानसिरी जिल्ह्यात).

• केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने EPF ग्राहकांकडून तीन महिन्यांपर्यंत मूलभूत वेतन आणि महागाई भत्तेच्या रकमेपर्यंत किंवा EPF खात्यात सदस्याच्या जमा असलेल्या रकमेच्या ____पर्यंत, जे कमी असेल, आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी दिली
- 75 टक्के.

• पहिल्यांदाच, भारतीय स्टेट बँकेने (SBI)................. इतक्या रकमेचे ग्रीन बॉन्ड उभारले आहेत जे SBIच्या लंडन शाखेत सिंगापूर SGX वर सूचीबद्ध केले जातील
- 100 दशलक्ष डॉलर.

• नवी दिल्लीच्या AIIMS संस्थेतर्फे स्थापन करण्यात आलेले टेलीमेडिसिन केंद्र, ज्याद्वारे तज्ञ डॉक्टर देशभरातल्या तज्ञांशी संपर्क साधतील
- CoNTeC (कोविड-10 राष्ट्रीय दूर-सल्लामसलत केंद्र).

• 1971 साली पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या वेळी बांगलादेशाच्या मुक्तिसाठी चालविण्यात आलेल्या हवाई मोहिमांमध्ये नेतृत्व करणारे निवृत्त एअर वाइस-मार्शल........... यांचे 29 मार्च रोजी निधन झाले
– चंदन सिंग राठौड.

• .................या राज्य विधानसभेने 30 मार्च 2020 रोजी 2020-21 या आर्थिक वर्षात राज्य सरकारला त्याच्या एकत्रित निधीतून 1.55 लक्ष कोटी रुपये खर्च करण्याचे विनियोजन विधेयक एकमताने मंजूर केले
- ओडिशा.

• ..............या भारतीय संस्थेने विलगीकरण केलेल्या लोकांचा मागोवा घेण्यासाठी ‘कोरोनटाईन’ (CORONTINE) नावाचे एक व्यासपीठ तयार केले
- भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई.

• ICICI लोंबार्ड कंपनीने ................. या व्यापारी देयक व्यासपीठासह भागीदारीत दुकानदारांसाठी 'कोविड-19 संरक्षण विमा' सेवा सुरू केली
– भारत पे.

• जगातले सर्वात थंड महाद्वीप जिथे शास्त्रज्ञांनी सन 2019-20 उन्हाळ्यात प्रथमच उष्णलहरीच्या घटनेची नोंद केली
- अंटार्क्टिका.

• लिबियावरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या शस्त्रास्त्र बंदीची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ................ या देशाने भूमध्य समुद्रात ‘ऑपरेशन इरिनी’ नावाने नौदल मोहीम सुरू करण्याची घोषणा केली
– युरोपिय संघ.

• सध्या चालू असलेल्या देशव्यापी बंदीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उत्पादनांचा पुरवठा सुलभ करण्यासाठी रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) यांच्या वतीने घेण्यात आलेला पुढाकार
- 'फूड सोल्जर प्रोजेक्ट'.

• .............या राज्य सरकारने कोविड-19 संकटातून निघण्यासाठी व्यवसाय आणि लोकांना मदत करण्यासाठी पुढील पाच वर्षात वीज दरात सरासरी 8 टक्के कपात करण्याची घोषणा केली – महाराष्ट्र.

• आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिन
- 31 मार्च.

• तामिळनाडूच्या करुर शहरात दैनंदिन किरकोळ व्यवहार करण्यासाठी ‘एन्कासू’ नावाचे भारताचे पहिले प्री-पेड कार्ड सादर करणारी ......... ही बँक होय
– करुर वैश्य बँक.

• 'लाइफलाईन उडान फ्लाइट्स' उपक्रमाच्या अंतर्गत सतत वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी भारत आणि........... या देशात "कार्गो एअर ब्रिज" उभारण्याची सरकारने घोषणा केली
- चीन.

• 31 मार्च 2020 रोजी झालेल्या आभासी “जी-20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्री बैठक” याचे अध्यक्षपद ........... होते
- सौदी अरब.

• संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) या गटाच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ‘ठराव 2518’ मंजूर केला
- शांती सैनिक.

•  ‘द डेथ ऑफ जीसस’ या कादंबरीचे लेखक
- जे. एम. कोएत्सी.

• वाहनांसाठी ई-पास देण्याकरिता ...........या राज्य सरकारने ‘प्रग्यान अॅप’ सुरू केले
- झारखंड.

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स

1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख

🅾समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)

15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर

16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे

17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज

18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील

19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख

20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर

21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर

22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग

23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर

24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय

25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे

26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे

27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी

🅾समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)

28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ

29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड

30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स

31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स

32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ

33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान

34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ

35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान

36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी

37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट

38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज

39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा

40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर

41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज

🅾समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)

42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे

43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे

44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले

45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील

46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय

47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले

48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे

49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे

50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे

51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले

52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज

53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर

54) सेवा सदन — वि.रा.शिंदे

55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे

56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई

57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई

58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई

🅾समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 5)

59) केसरी — लोकमन्या टिळक

60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव
देशमुख

61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे

62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख

63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी

64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर

65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी

66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित

67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे

68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर

69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे

70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे

71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित

72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज

73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज

🅾समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 6)

74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशि

1857 च्या पूर्वीचे उठाव.

🧩आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 - 18)

🅾गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला.बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.
शेवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.
हटकरांचा उठाव - मराठवाड्यात

🅾नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 - 1820 या काळात.नेता - नौसोजी नाईक.प्रमुख ठाणे - नोव्हाब्रिटीशांनी उठाव मोडून काढला.  खानदेशातील भिल्लाचा उठाव

🅾भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.
नेते - काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्लभिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.

🧩खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:

🅾1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या.  बंडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.

🧩काजरसिंग नाईकचा उठाव:

🅾1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.
ब्रिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.
1858 च्या 'अंबापाणी' लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई स्रियांचाही सहभाग होता.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

होमरूळ चळवळ (1916)

🅾लोकमान्य टिळकांच्या जीवनातील होमरूळ चळवळ म्हणजे शेवटची राष्ट्रव्यापी चळवळ होय

🅾ब्रिटिशांच्या अटकेतून सुटका झाल्यानंतर लोकमान्य टिळकांना राष्ट्रीय चळवळ थंडावली असे वाटले

🅾त्याच वेळी त्यांनी स्वराज्याची मागणी करून राष्ट्रीय आंदोलन सुरू केले .

🅾त्यासाठी महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी व मद्रासमध्ये डॉ  अनी बेझेंट यांनी होमरुळ लीग ची स्थापना केली .

🅾होमरुळ लीगने जागृती घडवून आणली ; त्यामुळे लोकमान्य टिळक व अनि बेझेंट यांना अटक करण्यात आली .

🅾शेवटी लोकमान्य टिळकांनी हाय कोर्टात जाऊन दाद मागितली व सुटका करून घेतली.

🅾होमरुळ म्हणजे स्वराज्य .सरकारच्या दडपशाही व अन्याय्य कायद्याच्या लोकांनी न डगमगता आपली चळवळ पुढे चालू ठेवण्याचा संदेश लोकमान्य टिळकांनी जनतेला दिला .

२० जुलै २०२०

पोलीस भरती प्रश्नसंच

: १. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती ? :- गोदावरी

२. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे ? :- २८८

३. सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता ? :- गुरु

४. कोणत्या नदीला आसामचे दुखाश्रु म्हणून संबोधले जाते ? :- ब्रह्मपुत्रा

५. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले ? :- स्वामी रामानंद तीर्थ

६. हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे ? :- शक्ती

७. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण ?:- वासुदेव बळवंत फडके

८.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ? :- यशवंतराव चव्हाण

९.कोणत्या राज्याने फणस या फळाला राज्यफळाचा दर्जा दिला आहे ? :- केरळ

१०. शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे ? :- कावेरी

: 1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती? 
✅ - कृष्णा. 

2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅  - कृष्णा

3. पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? 
✅ - कृष्णा. 

4.  मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला?
✅  - पुणे.

5. कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला? 
✅ - हरीपुर.

7.  कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला? 
✅ - नरसोबाची वाडी. 

8.  इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते?
✅ - देहु. 

9. शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
✅  - कोयना. 

10. पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो?
✅  - खडकवासला. 

11. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - मुठा.

12. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे? 
✅ - राधानगरी. 

13.  चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - वारणा. 

15. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - नीरा.

16. कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक कोणत्या जिल्हयात आहे? 
✅ - सातारा. 

17.  उजणी धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - भीमा. 

18. दुघगंगा योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो?
✅  - कोल्हापूर.

19. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते?
✅  - पुणे. 

20. मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे? 
✅ - पुणे. 

प्रमुख युद्ध सराव

🔴गरुड़ : भारत-फ्रांस
🔵गरुड़ शक्ति : भारत-इंडोनेशिया
🟠वरुण : भारत- फ्रांस
🟣हॅन्ड-इन-हॅन्ड : भारत-चीन
🟡जिमेक्स : भारत-जपान
⚫️धर्मा गार्डियन : भारत-जपान
🟢कजिन संधि अभ्यास : भारत-
जापान तटरक्षकदल
⚪️सूर्य किरण : भारत-नेपाळ
🟤सिम्बेक्स : सिंगापुर-भारतीय नौदल
🔴लाब्समर : भारत, ब्राझील, दक्षिण
अफ्रीका यांचं नौदल
🟠कोंकण : भारतीय नौदल-ब्रिटन नेवी
🔵इंद्रधनुष : भारत-ब्रिटन
🟣मालाबार : भारत-अमेरिका-जपान
🟡रेड फ्लैग : भारत-अमेरिका
🟤कोप : भारत-अमेरिका
⚫️मित्र शक्ति : भारत-श्रीलंका
🟢सलिनेक्स : भारत नौदल-श्रीलंका
इंद्र : भारत-रशिया
🟠नसीम अल बह्न : भारत-ओमान
🔵सम्प्रीती : भारत- बांग्लादेश
🟤औसीइंडेक्स भारत-ऑस्ट्रेलिया नौदल
🟢नोमेडिक एलीफैंट : मंगोलिया-भारतीय सेना
🟡एकुवेरिन : मालदीव-भारत

वृत्तपत्रे व संक्षिप्त माहिती.

🧩दिग्दर्शन:

🅾श्रीरामपूर मिशनच्या विल्यम कॅरी  आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १८१८ मध्ये सुरु केले.

🧩समाचार दर्पण:  

🅾२३ मे १८१८ रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरु केले. देशी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान त्याच्याकडे जातो.

🧩सोमप्रकाश: 

🅾पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५८ पासून चालू झाले. द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचे संपादक होते.

🧩तत्त्वबोधिनी पत्रिका: 

🅾देवेंद्रनाथ टागोर  यांच्या तत्त्वबोधिनी सभेचे तत्त्वबोधिनी पत्रिका हे मासिक.

🧩सुलभ समाचार :

🅾केशवचंद्र सेन (१८७८)

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

जालियनवाला बाग हत्याकांड.

🅾पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती.

🅾1919 साली भारतीय जनतेतील वाढता असंतोष दडपण्याबाबत उपाययोजना रौलेट समितीने सुचवली.

🅾 त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटला न चालवता स्थानबदध करण्याचा अधिकार शासनास मिळाला.

🅾गांधीजीनी या काळया कायदयाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनतेला 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.

🅾 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरप्रणीत जालियनवाला बागेतील हत्याकंड घडले.

🅾या घटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी ब्रिटिश शासनाशी असहकार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

🅾 रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

गोपाळ हरी देशमुख

🅾 रेव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया‘ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इ.स.१८४२मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हिंदुस्थानचा इतिहास ‘हे पुस्तक लिहिले.पुस्तकाचे प्रकाशन मात्र इ.स.१८७८मध्ये झाले.

🅾 इ.स. १८४८ पासून त्यांनी मुंबईहून निघणाऱ्या प्रभाकर यासाप्ताहिकात(संपादक :भाई महाजन), लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. त्या नावाने त्यांचा पहिला लेख त्या वर्षी १२मार्च रोजी प्रसिद्ध झाला.

🅾लेखाचा विषय होता..’इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या गैरसमजुती’. याशिवाय, लोकहितवादींनी ‘एक ब्राह्मण‘ या नावानेही लिखाण केले आहे. त्या काळी लहान वयातच लग्न करून द्यायची प्रथा होती.

🅾 लहान वयातील लग्नामुळे काय अडचणी होतात हे त्यांनी प्रभाकरमध्ये पत्र लिहून लोकांच्या नजरेस आणले. पुढील काळात त्यांनी अनेक समस्यांबाबत, विविध विषयांवर पत्रद्वारा लेखन केले.

🅾इ.स. १८४८ ते इ.स. १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले.

🅾 हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली.

🅾धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला.

🅾लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले.

🅾 लोकहितवादी हे एकोणिसाव्याशतकाच्या पूर्वाधातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ञ.

🅾‘ लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. "मातृभाषेतून शिक्षण" या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला.

🅾मराठीप्रमाणेच त्यांनी गुजरातीतही लिखाण 

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...