१८ जुलै २०२०

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

Q1)______ येथे भारतातील पहिले ट्रान्स-शिपमेंट हब आहे.
(A) केरळ◆
(B) गोवा
(C) हैदराबाद
(D) कर्नाटक

Q2) कोणत्या व्यक्तीला ‘ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2020’ कार्यक्रमातला “टॉप पब्लिसिस्ट”चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?
(A) सचिन अवस्थी★
(B) नारायण मूर्ती
(C) लेडी गागा
(D) बियॉन्स

Q3) कोविड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी _च्यावतीने “कोविडपश्चातची बोगी’ची निर्मिती करण्यात आली आहे.
(A) भारतीय रेल्वे★
(B) रिलायन्स
(C) अदानी
(D) यापैकी नाही

Q4) ___ या दिवशी ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा केला जातो.
(A) 14 जुलै
(B) 15 जुलै★
(C) 13 जुलै
(D) 12 जुलै

Q5) _ याच्या संदर्भात सहकार्यासाठी UNICEF इंडिया या संस्थेनी FICCI सोबत करार केला आहे.
(A) ‘रिइमेजीन’ मोहीम★
(B) ‘कौशल्य भारत’ मोहीम
(C) ‘रोको टोको’ मोहीम
(D) पौधे लगाओ पर्यावरण बचाओ

Q6) कोणत्या मंत्रीच्या हस्ते डिजिटल शिक्षणाविषयी “प्रज्ञाता” या नावाने मार्गदर्शक तत्त्वांची एक यादी जाहीर करण्यात आली?
(A) रमेश पोखरियाल ‘निशंक’★
(B) रजनीश कुमार
(C) स्मृती इराणी
(D) प्रकाश जावडेकर

Q7) या देशाच्या वतीने ‘कोरोशुअर’ या नावाखाली जगातला सर्वात स्वस्त ठरलेला ‘कोविड-19 निदान संच’ विकसित करण्यात आला आहे.
(A) भारत◆
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) ग्रेटब्रिटन
(D) चीन

Q8) कोणत्या व्यक्तीला 2020 सालासाठी "इन्फ्रा बिझिनेस लीडर ऑफ द इयर”चा पुरस्कार देण्यात आला?
(A) सत्य नदेला
(B) टीम कूक
(C) रीड हेस्टिंग
(D) वेद प्रकाश दुडेजा◆

Q9) कोणत्या व्यक्तीला आशियाई विकास बँक (ADB) यामध्ये खासगी क्षेत्रातील कामकाज आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी विभागाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?
(A) अबीर लवासा
(B) नागेंद्र सिंग
(C) अशोक लवासा◆
(D) सुशील चंद्र

Q10) कोरोना साथीच्या काळात, कोणत्या देशाने इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला?
(A) वेस्ट इंडीज◆
(B) ऑस्ट्रेलिया
(C) श्रीलंका
(D) पाकिस्तान
========================

नवीन कायदा ग्राहक संरक्षण कायदा 1986चं स्वरूप आहे.

📌 केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी ही माहिती दिली आहे.

🔰 नवीन कायद्याची ही आहेत वैशिष्ट्ये 🔰

◾️ नवीन कायद्यांतर्गत ग्राहकांना दिशाभूल करणार्‍या जाहिराती दाखवल्यास कारवाई केली जाणार आहे.
◾️ ग्राहक देशातील कोणत्याही ग्राहक न्यायालयात गुन्हा दाखल करू शकतो
◾️ ऑनलाइन आणि टेलिशॉपिंग कंपन्यांचा प्रथमच नव्या कायद्यात समावेश होणार आहे
◾️ खाण्या-पिण्यातील भेसळ करणार्‍या कंपन्यांना दंड व तुरुंगवासाची तरतूद
◾️ ग्राहक मेडिएशन सेलची स्थापना, दोन्ही पक्षकार परस्पर संमतीने मेडिएशन सेलमध्ये जाऊ शकतील
◾️ पीआयएल म्हणजे याचिका आता ग्राहक मंचामध्ये दाखल करता येणार आहे. आधीच्या कायद्यात तशी तरतूद नव्हती
◾️ ग्राहक मंचामध्ये सुमारे एक कोटी खटले दाखल करता येणार आहेत
◾️ राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग एक कोटी ते दहा कोटीपर्यंतच्या प्रकरणांची सुनावणी करेल.
◾️ राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात दहा कोटींपेक्षा जास्त प्रकरणांची सुनावणी
________________________________________

राज्यसेवा पूर्व परीक्षा बुकलिस्ट - 2020


पूर्व परीक्षा : 13 सप्टेंबर, 2020

पूर्व परीक्षेचे स्वरुप : पेपर 1 व 2
सामान्य अध्ययन - 1 (GS-।) (100 प्रश्न 200 गुण वेळ 2 तास) (सकाळी 11 ते 1)
सामान्य अध्ययन - 2 (C - SAT) ( 80 प्रश्न 200 गुण वेळ 2 तास) (दुपारी 3 ते 5)

0.33% -ve marking आहे... तीन चुकीच्या उत्तरांसाठी एका बरोबर उत्तराचे गुण वजा करण्यात येतात...

💢 सामान्य अध्ययन - 1💢
💠 इतिहास

🔶 प्राचीन भारत
आर. एस. शर्मा / डी. एन. झा
( दोन्ही बुक्स मराठीत उपलब्ध) (वरीलपैकी कोणतेही एक घ्या)

🔷 मध्ययुगीन भारत
सतीश चंद्रा /  रं. ना. गायधनी
(वरीलपैकी कोणतेही एक)

🔶 आधुनिक भारत
आधुनिक भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या  विशेष संदर्भात):- समाधान महाजन - युनिक अकैडमी

🔷 आधुनिक महाराष्ट्र
11 वी स्टेट बोर्ड नवे व् जुने व् समाधान महाजन च्या पुस्तकातून हा घटक पूर्ण कव्हर होऊंन जाईल.

🔶 महाराष्ट्रातील समाजसुधारक
डॉ. अनिरुद्ध

💠भूगोल

🔶 महाराष्ट्राचा भूगोल
के. ए. खतीब / ए. बी. सवदी / दीपस्तंभ प्रकाशन
(वरीलपैकी कोणतेही एक)

🔷 भारताचा भूगोल
डॉ. अनिरुद्ध / के. ए. खतीब
(वरीलपैकी कोणतेही एक)

🔶 जगाचा भूगोल
जिआग्राफी थ्रू मैप्स वर्ल्ड : के. सिद्धार्थ (मराठीत उपलब्ध)

🔷 प्राकृतिक भू-विज्ञान
सौ. संजीवनी दाते(के'सागर) किंवा
शारदा अकैडमी नोट्स (11 वी Ncert मराठीत उपलब्ध)

💠 सामान्य विज्ञान

🔷सचिन भस्के / अनिल कोलते
(👆यापेक्षा 5 ते 10 वी स्टेट बोर्ड जरी वाचले व् 11 वी NCERT Biology केले तरी हा विषय कव्हर होतो... जवळजवळ 20 प्रश्न येतात विज्ञान घटकाचे राज्यसेवेत तेहि स्टेट बोर्ड मधून)

🔶 जैवतंत्रज्ञान : सचिन भस्के/ दीपस्तंभ प्रकाशन
(वरीलपैकी कोणतेही एक)

💠 अर्थशास्त्र

🔶 नागेश गायकवाड़ / किरण देसले (भाग 1) / रंजन कोलंबे
(वरीलपैकी कोणतेही एक)
🔷 महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2019-20
🔶 केंद्रीय अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल

💠 राज्यशास्त्र व पंचायत राज

🔷 इंडियन पॉलिटी - एम्. लक्ष्मीकांत (मराठी)
🔷 संपूर्ण राज्यव्यवस्था - तुकाराम जाधव (युनिक अकैडमी)
(वरीलपैकी कोणतेही एक)

🔰 पंचायत राज
के'सागर / किशोर लव्हटे
(वरीलपैकी कोणतेही एक)

💠 पर्यावरण
योगेश नेतनकर / युनिक अकैडमी(कलर बुक)
(वरीलपैकी कोणतेही एक)

💠 चालू घडामोडी
🔸युनिक बुलेटिन मंथली मैगजीन
🔹 पृथ्वी परिक्रमा मंथली मैगजीन
🔸 सिम्पलीफाइड पब्लिकेशन्स
🔹स्पॉटलाइट - सुशिल बारी
🔸टॉपर 777 - इद्रीस पठान
🔹सकाळ इयर बुक
(वरीलपैकी कोणतेही एक प्रकाशनाचे बुक्स घ्या व जे एकदा घेतले तेच कायम continue वाचत रहा...)

💢 C - SAT 💢
🔷 संपूर्ण C - SAT - प्रणिल गिल्डा
किंवा
C - SAT Decoded - सारथी प्रकाशन
(यात फक्त उतारे आहेत Day wise plan)

🔶 बुद्धिमत्ता चाचणी -  सुजित पवार / फिरोज पठान / सचिन ढवले / संदीप आरगड़े
(वरीलपैकी कोणतेही एक)

🔷 समग्र अंकगणित - फिरोज पठाण / सचिन ढवले
(वरीलपैकी कोणतेही एक)

💢 गतवर्षीच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका 💢

🔷 सामान्य अध्ययन पेपर 1 ला 2013 ते 2019 पर्यँत आयोगाच्या प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणांसाहित-  के'सागर / प्रवीण चोरमले / सिम्पलीफाइड पब्लिकेशन्स

🔶 C-SAT 2013 ते 2019 पर्यँत आयोगाच्या प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणांसाहित- सचिन ढवळे/ज्ञानदीप प्रकाशन

🔰 इतर संदर्भ
लोकसत्ता, मटा, इंडियन एक्सप्रेस, दी हिंदू, लोकराज्य, योजना, कुरुक्षेत्र, इंडिया ईयर बुक - 2020, PIB News

टीप :

1. जिथे Oblique ( / ) देऊन एकपेक्षा अधिक पुस्तके दर्शवली आहेत तिथे योग्य ते कोणतही एकच बुक्स घ्या.... (वरील पुस्तके मी फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेचा विचार करूनच दिली आहेत... )
2. अभ्यासाला सुरवात करण्यापूर्वी गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका वाचून काढा. (2013 ते 2019 पर्यंतच्या)
3. पुस्तके घेतांना नेहमी नवीन आवृत्ती घ्या.
4. वर उल्लेखित केलेल्या बुक्स व्यतिरिक्त अजून काही वेगळी पुस्तके तुमच्या कडे असतील किंवा confuse होत असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा...
6. याव्यतिरिक्त आपणाकडे
आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोवर व् बेल्हेलर, गाठाळ, शांता कोठारे, के'सागर, डॉ. बिपन चंद्रा, जयसिंगराव पवार
महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कठारे
भूगोल व् कृषी : ए. बी. सवदी
भूगोल व् पर्यावरण : ए. बी. सवदी
अर्थशास्त्र : रंजन कोलंबे
सा. विज्ञान : सोनाली भुसारे/ नवनाथ जाधव
पर्यावरण - तुषार घोरपडे
ही पुस्तके असतील तरी आपण हेच continue करू शकता...

‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX): भारतातला पहिला राष्ट्रव्यापी ऑनलाइन वितरण-व्यापार सुविधा मंच.


🔶पेट्रोलियम व नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते ‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX) या नावाने भारतातल्या पहिल्या राष्ट्रव्यापी ऑनलाइन वितरण-व्यापार सुविधा मंचाच्या कार्याला सुरुवात करण्यात आली.

🔥मुख्य बाबी

🔶‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX) याच्या माध्यमातून नैसर्गिक वायूच्या वितरणासाठी व्यापार मंच म्हणून कार्य करण्यात येणार आहे.
भारतामध्ये ऊर्जा बाजार मंचाचे पूर्ण स्वामित्व असलेली ‘इंडियन एनर्जी एक्सचेंज’ (IEX) या कंपनीची उपकंपनी म्हणून IGX कार्यरत राहणार आहे.नैसर्गिक वायू बाजारपेठेतल्या सर्व सहभागींना प्रमाणित मानकांनुसार व्यापार करण्यासाठी ही नवीन कंपनी समर्थ असणार आहे.

🔶या मंचामुळे ग्राहकांना कोणत्याही समस्येविना, अडथळ्याविना व्यापार करणे शक्य होणार आहे.IGX याचे कामकाज पूर्णपणे संकेतस्थळ-आधारित मंचच्या मदतीने करण्यात येणार आहे.

🔥IGXचे भविष्यकालिन फायदे🔥

🔶नैसर्गिक वायू व्यापारासाठी सुरू केलेल्या या नवीन इलेक्ट्रॉनिक मंचामुळे भारतातल्या ऊर्जा क्षेत्रामध्ये एका नवीन अध्यायाला प्रारंभ झाला. यामुळे नैसर्गिक वायूसाठी मुक्त बाजार मूल्य निर्धारण करण्याच्या दिशेने देशाला पुढे पावले टाकण्यासाठी मदत मिळणार आहे.

🔶बाजार संचलित मूल्य निश्चिती प्रणाली असल्यामुळे इंडिया गॅस एक्सचेंज (IGX) नैसर्गिक वायूसाठी मुक्त बाजार साकार करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावू शकणार आहे.

🔶पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) देशातल्या सर्व भागामध्ये नैसर्गिक गॅस योग्य दरामध्ये उपलब्ध व्हावा यासाठी दरांच्या सुसूत्रीकरणावर भर दिला जाणार आहे. या मंचमुळे मुक्त बाजारपेठेमध्ये ग्राहकांचा विचार मूल्यनिर्धारण करताना करणे शक्य होणार आहे. IGX बाजारपेठेतले चढ-उतार लक्षात घेवून किंमत निश्चित करू शकणार आहे.

🔶IGXच्या माध्यमातून LNG टर्मिनल, गॅस पाइपलाईन, CGD पायाभूत सुविधा आणि बाजारपेठेचा कल पाहून किंमत यंत्रणा यासंबंधी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार, अशी अपेक्षा आहे.

🔶भारताची अर्थव्यवस्था LNG आधारित बनवण्यासाठी हाती घेतलेली कार्ये देशाकडे लवकरच 50 MMT एवढी LNG टर्मिनल क्षमता असणार आहे.

🔶देशाने कतार, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि अमेरिका यांच्यासारख्या अनेक देशांबरोबर दीर्घकालीन LNG करार केले आहेत. तसेच मोझांबिक, रशिया आणि इतर देशांमध्ये अतिशय महत्वाच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूकही केली आहे.

🔶देशामध्ये LNG विषयक पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी ऊर्जा गंगा, पूर्व भारत ग्रिड, ईशान्येकडे इंद्रधनुष प्रकल्प, धमरा-दहेज गॅसवाहिनी प्रकल्प, कोळसा गॅसीफिकेशन प्रकल्प आणि CBM कार्यशैली यासारख्या योजना सध्या कार्यरत आहेत.

🔶येत्या काही वर्षामध्ये देशात 30,000 किलोमीटरपेक्षा जास्त पाइपलाईन तयार असणार आहे.

इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले

◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन

◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता

◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम

◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह

◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.

◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.

◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष

◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन

◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय

◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी

◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर

◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार

◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
– गारेट ब्रिटीश इतिहासकार.

◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु

◾️क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.

◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.

◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.

◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे

◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.

◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक

◾️इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक

◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना

◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स

महामार्ग संरचना दर्जेदार करण्यासाठी NHAI देशातल्या अव्वल तंत्र संस्थांशी भागीदारी करणार.

🔰जागतिक दर्जाचे महामार्ग जाळे तयार करण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग म्हणून, देशातल्या सर्व भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) आणि नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्याशी सहयोग करीत जवळचा राष्ट्रीय महामार्ग पट्टा स्वेच्छेने, संस्थात्मक सामाजिक दायित्व म्हणून स्वीकारावा, यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) त्यांच्याशी संपर्क केला आहे.

🔰विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या प्रतिभेचा देशातल्या रस्ते संरचना सुधारण्यासाठी लाभ व्हावा, हा यामागचा उद्देश आहे. विद्यार्थी, प्राध्यापक यासह संस्थाना स्थानिक आवश्यकता, भौगोलिक रचना, संसाधने क्षमता याविषयी उत्तम जाण असते आणि याचाच NHAI रस्ते बांधकाम करण्यापूर्वी, बांधकाम करण्यासाठी अशा विविध टप्प्यात उपयोग करू इच्छिते.

🔰संस्थेनी पट्ट्याचे दायित्व स्वीकारल्याने वाहतूक कोंडी, अपघात प्रवण स्थळे तातडीने जाणणे, यासह स्थानिक समस्या दूर करण्यासाठी मदत होणार आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि अधिकारी यांच्यामार्फत स्थानिक समस्या दूर करण्यासाठी अधिक सक्षम बनणार आहेत.

🔰यामुळे NHAIला सध्याच्या आणि भविष्यातल्या प्रकल्पांसाठी स्थानिक गरजा जाणून घ्यायला, देखभाल सुधारायला आणि प्रवास सुखकर करायला, तसेच महामार्गालगत सुविधा विकसित करायला मदत होणार आहे. तसेच यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाश्यांना अनुकूल आणि आनंददायी प्रवास अनुभवता येणार.

🔴भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) विषयी..

🔰भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे. हे भारतात 1,15,000 कि.मी.पैकी एकूण 50,000 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठी जबाबदार आहे. संस्थेची स्थापना 1988 साली झाली. हे केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते.

गुगल कंपनी भारतात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार.

🔰13 जुलै 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले सुंदर पिचाई यांच्याशी संवाद साधला.

🔰येत्या 5 ते 7 वर्षांत गुगल कंपनी भारतात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा सुंदर पिचाई यांनी केली. ते ‘गुगल फॉर इंडिया डिजिटलायझेशन फंड’ या ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते.

🔰प्रत्येक भारतीयाला स्वभाषेत माहिती प्राप्त होणे, भारताच्या विशिष्ट गरजांप्रमाणे वस्तू आणि सेवा विकसित करणे, डिजिटल बदलांना आत्मसात करणाऱ्या उद्योगांना मदत तसेच कल्याणकारी योजनांमध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर या चार क्षेत्रांसाठी ही गुंतवणूक वापरली जाणार.

🔰बंगळुरु शहरातली कृत्रिम बुद्धीमत्ता संशोधन प्रयोगशाळा, पुराचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा तसेच कोविड-19 विषयी अचूक आणि विश्वसनीय माहिती देणाऱ्या यंत्रणेविषयी देखील यावेळी उल्लेख केला गेला.

परदेशी विद्यार्थ्यांना परतपाठवणीच्या निर्णयावरून ट्रम्प प्रशासनाची माघार.

🔰ऑनलाइन वर्गात शिकणाऱ्या अमेरिकी विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या मायदेशी पाठवण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने रद्द केला आहे.

🔰हार्वर्ड, एमआयटी यासह अनेक विद्यापीठांनी या निर्णयाविरोधात स्थलांतर व अंतर्गत सुरक्षा विभागाविरोधात न्यायालयात दावे दाखल केले होते. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता. उन्हाळी शैक्षणिक सत्रात जे विद्यार्थी ऑनलाइन वर्गासाठी हजेरी लावणार असतील त्यांना देशातून परत पाठवण्याचा निर्णय अमेरिकेच्या स्थलांतर विभागाने ६ जुलै रोजी घेतला होता.

🔰सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यानच्या शैक्षणिक सत्रात करोना संसर्गाच्या भीतीने अनेक विद्यापीठांनी ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले असताना ट्रम्प प्रशासनाने जे परदेशी विद्यार्थी ऑनलाइन वर्गास हजेरी लावणार असतील त्यांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन आठवडय़ांनी या निर्णयावर मंगळवारी माघार घेण्यात आली असून एमआयटी, हार्वर्ड विद्यापीठ यांच्यासह एकूण दोनशे शिक्षण संस्थांनी याविरोधात न्यायालयात खटले दाखल केले होते, तसेच या निर्णयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाली होती. या निर्णयाला विरोध करण्यात १७ राज्ये, गुगल, मायक्रोसॉप्ट, फेसबुक यासारख्या कंपन्याही सहभागी होत्या.

आता मास्क, सॅनिटायझरचे दरही निश्चित होणार; राज्य शासन नेमणार समिती.

🔰करोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा वापर वाढला असून याच्या किंमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत एक समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपस्थित होते.

🔰आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, “करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांकडून मास्क आणि सॅनिटायजरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. करोनावर सध्या तरी प्रतिबंधात्मक उपाय हेच औषध असल्याने आणि नागरिकांनाही वेळोवेळी मास्क आणि सॅनिटाजरचा वापर करण्याबाबत विविध माध्यमातून आवाहन केले जात असल्याने या दोन्ही वस्तूंची मागणी वाढली आहे.

🔰राज्य शासनाने यापूर्वी करोना रुग्णांकडून मनमानी पद्धतीने बिल आकारणी करणाऱ्या रुग्णालयांना शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे आकारणी करण्यास भाग पाडले आहे. त्याचबरोबर करोना चाचण्यांचे तसेच रुग्णवाहिकांसाठीही दर निश्चित करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत मास्क आणि सॅनिटायजर उपलब्ध व्हावे यासाठी त्यांचे दर निश्चित करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...