१३ जुलै २०२०

General Knowledge

● अटल पेन्शन योजनेचे संचालन कोणती संस्था करते?
: ‘निवृत्ती वेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण’ (PFRDA)

● ‘FIR आपके द्वार’ हि  योजना कोणत्या राज्य सरकारने राज्यात लागू केली?
: मध्यप्रदेश

● भारतात ‘सेरोसर्वे’ कोणती संस्था आयोजित करणार आहे?
: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

● भारतात तयार केले गेलेले पहिले ‘PPE किट सीम सीलिंग’ यंत्र कोणत्या कंपनीने विकसित केले?
: मॅकपॉवर सीएनसी

● देशातील कोणत्या राज्यात सर्वात कमी बालमृत्यू दर आहे?
: केरळ

● केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अध्यक्ष पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
: मनोज अहुजा

● तामिळनाडूच्या कोणत्या उत्पादनाला GI हा टॅग प्राप्त झाला?
: तंजावूर नेट्टी कलाकृती

● ‘फेड कप हार्ट अवॉर्ड’ जिंकणारी प्रथम भारतीय कोण ठरली?
: सानिया मिर्झा

● DFRL संस्थेनी विकसित केलेल्या फिरत्या तपासणी प्रयोगशाळेचे नाव काय?
: परख

● स्कायट्रॅक्सचा जगातले सर्वोत्कृष्ट विमानतळ हा 2020 सालाचा पुरस्कार कोणत्या विमानतळाला जाहीर झाला?
: चांगी विमानतळ

● कोविड-19 रोगाच्या उपचारांसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबल सॉलिडेरीटी ट्रायल’ उपक्रमात भारतातली कोणती संस्था भाग घेणार आहे?
: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

● कोरोना विषाणू विषयक SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या आभासी शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने केले?
: रशिया

● 'ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स अ‍ॅसेसमेंट, 2020' अहवाल कोणत्या संस्थेनी प्रसिद्ध केला?
: खाद्यान्न व कृषी संघटना

● असा कोणता देश आहे ज्याने त्याच्या राजधानीतल्या रस्त्याचे नाव ‘रेहॉव्ह टॅगोर’ असे ठेवले?
: इस्त्राईल

● भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालक पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
: व्ही. विद्यावती

● ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन’ (CDC) ही संस्था कोणत्या देशात आहे?
:  संयुक्त राज्ये अमेरिका

● बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी कोणत्या राज्याने 'होप' हे संकेतस्थळ कार्यरत केले?
: उत्तराखंड

● जागतिक 'एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2020' अहवाल कोणत्या संस्थेनी प्रसिद्ध केला?
: जागतिक आर्थिक मंच

● नुकत्याच झालेल्या जागतिक मधमाशी दिनाची संकल्पना (2020) काय होती?
: बी एंगेज्ड

● ‘चॅलेंज कोविड-19 कॉम्पटिशन (C3)’ची घोषणा कोणत्या संस्थेनी केली?
: नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन

● गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कचरा मुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात कोणत्या शहराला 5 स्टार रेटिंग प्राप्त झाले नाही?
: बंगळुरू

● यंदा (2020) ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन’ची संकल्पना काय?
: म्यूजियम्स फॉर इक्वलिटी: डायव्हरसिटी अ‍ॅण्ड इनक्लूजन

● ‘H.A.C.K.’ या नावाने सायबर सुरक्षा-विशिष्ट अ‍ॅस्सेलिरेटर केंद्र कोणत्या राज्याने उघडले?
: कर्नाटक

● सामाजिक अंतर राखण्यात मदत होण्यासाठी ‘आयफिल-यू’ ब्रेसलेट कोणत्या देशाच्या संशोधकांनी विकसित केले?
: इटली

● इस्राईल देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे?
: बेंजामिन नेतन्याहू

● प्रथम आभासी जागतिक आरोग्य परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?
: डॉ. हर्ष वर्धन

अमेरिका, ब्रिटन, चीनला मागे टाकून करोना लस संशोधनात रशियाने मारली बाजी


📌संपूर्ण जगाला करोना व्हायरसने त्रस्त करुन सोडले आहे. या व्हायरसला रोखणारी लस बनवण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. पण सध्याच्या घडीला यामध्ये रशियाने बाजी मारल्याचे दिसत आहे.

📌रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर बनवलेली लस सर्व क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे. विद्यापीठानेच तसा दावा केला आहे. सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे त्रस्त आहे. या आजारामुळे अर्थचक्र सुद्धा ठप्प झाले आहे. त्यामुळे करोनाला रोखणारी लस कधी उपलब्ध होणार, याकडे सगळयांचेच लक्ष लागले होते.

📌रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर लस बनवली आहे. सेचेनोव्ह विद्यापीठाने स्वयंसेवकांवरील या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. चाचणी परीक्षणात ही लस यशस्वी ठरल्याचा विद्यापीठाचा दावा आहे.

📌स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात येईल.
दुसऱ्या गटाला २० जुलैला डिस्चार्ज देण्यात येणार आहे असे वादिम तारासोव्ह यांनी सांगितले. ते इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक आहेत. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

📌रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरु केल्या होत्या.

📌"करोना व्हायरसविरोधात बनवण्यात आलेल्या जगातील पहिल्या लसीच्या स्वयंसेवकांवरील चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत" असे तारासोव्ह यांनी सांगितले. रशियन विद्यापीठाचा हा दावा खरा ठरला तर करोना व्हायरसला रोखणारी जगातील पहिली लस ठरेल.

📌सध्या अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशांमध्ये करोना रोखणारी लस विकसित करण्यासाठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु असून त्यांच्यात स्पर्धा सुद्धा आहे.

📌मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे हाच या चाचणीमागचा हेतू आणि तो साध्य झाला आहे असे अलेक्झँडर लुकाशेव यांनी सांगितले. करोना विरोधात वापरण्याससाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे असे लुकाशेव यांनी स्पुटनिकला सांगितले. करोना व्हायरसवर प्रभावी लस बनवण्यासाठी जगभरात १२० पेक्षा जास्त प्रकल्प सुरु आहेत.

वाचा :- महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी



● *मुंबई* : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

● *रत्नागिरी* : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

● *सोलापूर* : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

● *कोल्हापुर* : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

● *रायगड* : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

● *सातारा* : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

● *परभणी* : ज्वारीचे कोठार.

● *नागपुर* : संत्र्यांचा जिल्हा.

● *भंडारा* : तलावांचा जिल्हा.

● *जळगाव* : कापसाचे शेत, केळीच्या बागा.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती? 
✅ - कृष्णा. 

2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅  - कृष्णा

3. पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? 
✅ - कृष्णा. 

4.  मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला?
✅  - पुणे.

5. कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला? 
✅ - हरीपुर.

7.  कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला? 
✅ - नरसोबाची वाडी. 

8.  इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते?
✅ - देहु. 

9. शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
✅  - कोयना. 

10. पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो?
✅  - खडकवासला. 

11. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - मुठा.

12. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे? 
✅ - राधानगरी. 

13.  चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - वारणा. 

15. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - नीरा.

16. कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक कोणत्या जिल्हयात आहे? 
✅ - सातारा. 

17.  उजणी धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - भीमा. 

18. दुघगंगा योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो?
✅  - कोल्हापूर.

19. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते?
✅  - पुणे. 

20. मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे? 
✅ - पुणे. 

महाराष्ट्र पोलिस भरती Imp प्रश्न


१. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती ? :- गोदावरी

२. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे ? :- २८८

३. सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता ? :- गुरु

४. कोणत्या नदीला आसामचे दुखाश्रु म्हणून संबोधले जाते ? :- ब्रह्मपुत्रा

५. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले ? :- स्वामी रामानंद तीर्थ

६. हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे ? :- शक्ती

७. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण ?:- वासुदेव बळवंत फडके

८.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ? :- यशवंतराव चव्हाण

९.कोणत्या राज्याने फणस या फळाला राज्यफळाचा दर्जा दिला आहे ? :- केरळ

१०. शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे ? :- कावेरी

१२ जुलै २०२०

भारतीय क्षेपणास्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये

● *बराक 8* : हे भारत आणि इस्रायल यांच्याकडून संयुक्तपणे विकसित केले जाणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे हवेत अधिकतम 16 किमी उंचीवर आणि 100 किमी लांबीवरील लक्ष्यांवर मारा करू शकते

● *निर्भय* : या निर्भय’ क्षेपणास्त्राची क्षमता ही अमेरिकेच्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांएवढी आहे. निर्भय क्षेपणास्त्राची 1000 किलोमीटर पर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता असून त्यावर 300 किलो वजनाची पारंपरिक अण्वस्त्रे बसवता येतात.

● *पिनाका अग्निबाण प्रणाली 6* : अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.

● *आकाश* : हे जमिनीवरून हवेत अधिकतम 18 किमी उंचीवर आणि 25 ते 30 किमी लांबीवर मारा करू शकणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे

● *ब्राम्होस* : हे भारत आणि रशियामार्फत संयुक्तरीत्या विकसित केले जात असलेले सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्र आहे. या सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचा वेग 2.8 मॅच क्रमांक आहे. म्हणजेच त्याचा वेग ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा 2.8 पटीने जास्त असेल. यानुसार त्याचा वेग ताशी 3,400 कि.मी. इतका असेल. त्याचे उड्डाण पाणबुडी, विमान, जहाज तसेच जमिनीवरून केले जाऊ शकेल.

● *त्रिशुल* : या क्षेपणास्त्राचा पल्ला हवेत 9 किमी इतका आहे.

● *नाग* : हे रणगाडा भेदी मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याची मारक क्षमता 7 किलोमीटर आहे.

● *सूर्या* : हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला 5 हजार ते 8 हजार कि.मी एवढा आहे.

● *सागरिका* : हे भारताचे पाण्याखालून मारा करणारे, अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र के-15 या कार्यक्रमाने विकसित करण्यात आलेले आहे.

● *शौर्य* : हे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अर्ध - बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याचा वापर भूदलामार्फत केला जाईल. याचा पल्ला 750 कि.मी. आहे. हे क्षेपणास्त्र एक टन वजनाची पारंपरिक व आण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.

● *धनुष* : हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी क्षेपणास्त्राचे नौदलासाठीचे बॅलिस्टिक संस्करण आहे.

● *अग्नी* : हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या पाच श्रृंखला आहेत. अग्नी 1 - हे अग्नी क्षेपणास्त्राचे कमी पल्ल्याचे (700 कि.मी.) संस्करण आहे.

● *तेजस* : हे भारत विकसित करीत असलेल्या हलके लढाऊ विमानाचे नाव आहे. तेजस हे सर्वात लहान, खूप हलके, एक व्यक्ती बसू शकेल असे, एक इंजिन सुपरसोनिक, बहुआयामी, चौथ्या पिढीतील लढाऊ विमान आहे.

● *सारथ* : हे एक पायदळ लढाऊ विमान आहे. ते भारतीय बनावटीचे असून त्रिशूल, आकाश आणि नाग क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

● *हॉक्स* : हे ब्रिटनचे अ‍ॅडव्हान्स्ड जेट ट्रेनर्स आहेत. वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांचा वापर करण्यात येईल.

● *फाल्कन* : हे इस्त्रायलने निर्माण केलेले मोबाईल रडार आहे.

खुदीराम बोस.

🅾भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक

🅾स्मृतिदिन - ११-०८-१९०५

🧩खुदीराम बोस  :

🅾भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी पालनपोषण केले.

🅾बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटीश सरकारने १९०३ साली निश्चित केले. सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणाऱ्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणाऱ्या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.

🅾यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचा हकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याच्या सहकाऱ्याने दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर बाँब फेकून त्याला मारण्याचे निश्चित झाले. त्याप्रमाणे एक बाँब फेकण्यात आला. परंतु तो चुकून दुसऱ्याच एका गाडीवर फेकण्यात आल्याने त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला.

🅾घटनेच्या दुसऱ्या दिवशी खुदीराम पकडल्या गेला तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीरामवर खटला भरण्यात आला. त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला दि. ११-०८-१९०५ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारा खुदीराम पहिला क्रांतीकारक ठरला.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

११ जुलै २०२०

राज्यसेवा अभ्यासक्रमात खालील प्रमाणे बदल झाला आहे

● सामान्य अध्ययन १ मध्ये रिमोट सेन्सिंग या टाँपिक मध्ये काही अधिक उपघटक समाविष्ट केले आहेत.

● सामान्य अध्ययन २ मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,१९६६ नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.

● सामान्य अध्ययन ४ मधील विज्ञान व तंत्रज्ञान या विभागातील संगणक व माहिती तंत्रज्ञान या उपघटकात काही नविन मुद्दे समाविष्ट केले आहेत.

● सामान्य अध्ययन १ मधील रिमोट सेन्सिंग च्या अभ्यासाचा फायदा अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये होईल.

● जैव तंत्रज्ञान चा अभ्यासक्रम असा सुटसुटीत करुन देण्यात आला आहे. याचा टु द पाँईट अभ्यास करण्यासाठी नक्कीच  फायदा होईल..

● सामान्य अध्ययन २ या पेपर मध्ये हा नविन उपघटक समाविष्ट करण्यात आला आहे..

● सामान्य अध्ययन १ मधील निवडक समाजसुधारक यामध्ये काही नव्याने समाजसुधारक समाविष्ट केले आहेत..

● या राष्ट्रीय चळवळी मधीलमहत्त्वाच्या व्यक्ती वर प्रश्न येतच होते. आता त्यांची नावे स्पेसिफिक नमुद करण्यात आली आहेत..

● सामान्य अध्ययन १ मधील मानवी भूगोल मध्ये काही संकल्पना अँड करण्यात आल्या आहेत..

लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी परीक्षा रद्द करण्याची भूमिका - उदय सामंत.

🌺🌺लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी परीक्षा रद्द करण्याची भूमिका - उदय सामंत.🌺🌺

🔰“सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत ठेवता येणार नाही. आता विद्यार्थ्यांच्या संभ्रमावस्थेत अधिक भर पडली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी आम्ही परीक्षा रद्द करण्याची आमची भूमिका मांडली,” असं मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं.

🔰काही दिवसांपूर्वी राज्यातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. त्यानंतर यूजीसीनं सप्टेंबर अखेरिस परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. या संपूर्ण विषयावर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंशी झालेल्या चर्चेबद्दल आणि त्यांची मतं काय होती याबाबतही माहिती दिली.

🔰“सप्टेंबरल महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत ठेवता येणार नाही. ६ एप्रिल रोजी आमची पहिली बैठक झाली. त्या बैठकीत करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा कशा घ्यायच्या याची पडताळणी करण्यासाठी समिती स्थापन केली. सहा कुलगुरूंची एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि डॉ. सुहास पेडणेकर हे त्या समितीचे प्रमुख होतं.

🔰त्यानंतर २९ एप्रिल रोजी यूजीसीच्या गाडईलाईन्स आल्या. त्यामध्ये करोनाच्या परिस्थितीत तिथल्या शासनानं निर्णय घ्यावा, तसंच करोनाची परिस्थिती पाहून तिथल्या शासनानं आणि विद्यापीठांनी गाईडलाईन्स ठरवण्याचं सांगण्यात आलं होतं,” असं सामंत यावेळी म्हणाले.

भारतात उद्योगस्नेही वातावरण

🔰भारत ही आशियातील तिसरी मोठी आणि खुली अर्थव्यवस्था असून आमच्याकडे उद्योगस्नेही, स्पर्धात्मक व संधींनी परिपूर्ण असे वातावरण आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत करोनाकाळातील टाळेबंदीनंतर आता पुन्हा हिरवी पालवी दिसत असून परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ‘ग्लोबल वीक २०२०’ या कार्यक्रमात त्यांनी जगातील कंपन्यांना गुंतवणुकीकरिता भारतात येण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे सूचित केले.

🔰ते म्हणाले, की सर्व जागतिक कंपन्यांचे आमच्याकडे स्वागतच आहे. आमची अर्थव्यवस्था जगातील जास्तीतजास्त खुल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारतात ज्या संधी उद्योगांना आहेत त्या क्वचितच इतरत्र दिसून येतील. अलीकडच्या काळात कृषी, अवकाश व संरक्षण क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा लेखाजोखा त्यांनी मांडला. जागतिक भांडवलाला भारताकडे वळवण्यासाठी त्यांनी परदेशी कंपन्यांना आवाहन केले.

🔰आम्ही अर्थव्यवस्था जास्त उत्पादक, गुंतवणूकस्नेही व स्पर्धात्मक करीत आहोत. भारतात अनेक शक्यता व संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रातील सुधारणांमुळे साठवणूक व रसद पुरवठा क्षेत्रात गुंतवणुकीला संधी आहेत. कंपन्यांना आम्ही थेट गुंतवणुकीची संधी दिली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातही सुधारणा करण्यात आल्या असून त्या मोठय़ा उद्योगांना पूरक आहेत. संरक्षण उत्पादनाचे क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले करण्यात आले असून त्यात सुटय़ा भागांची निर्मिती या कंपन्या करू शकतील. यातही गुंतवणुकीला संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चालू घडामोडी प्रश्नसंच

📕भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक लांबी असलेल्या रेलगाडीचे नाव काय आहे?

(A) आत्रेय
(B) अधिरीत
(C) शेषनाग✅✅
(D) अभिरथ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 पाकिस्तानी लष्कराची प्रथम महिला लेफ्टनंट जनरल कोण आहे?

(A) बेगम राना
(B) शाहीदा बादशाह
(C) शाहिदा मलिक
(D) निगार जोहर✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📘 कोणती कार कंपनी जगातली सर्वात मूल्यवान कार कंपनी बनली आहे?

(A) टेस्ला✅✅
(B) टोयोटा मोटर कॉर्पोरेशन
(C) जनरल मोटर्स
(D) होंडा मोटर कंपनी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📙 कोण प्रथम आभासी ‘रेस अक्रॉस अमेरिका 2020’ स्पर्धेत पोडियमवर स्थान मिळविणारा पहिला भारतीय ठरला?

(A) लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू✅✅
(B) कॅप्टन श्रीराम सिंग शेखावत
(C) कॅप्टन गोपाल नारायण देवांग
(D) मेजर जनरल मोहम्मद अमीन नाईक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 कोणत्या संस्थेनी CSIR संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रग डिस्कवरी हॅकथॉन’ स्पर्धा आयोजित केली?

(A) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(B) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)✅✅
(C) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT)
(D) भारतीय वैद्यकीय परिषद (MCI)


• ................या आंतरराष्ट्रीय संस्थेनी दक्षिण आशियाई प्रदेशात कोरोन विषाणूच्या आजाराशी संबंधित माहिती पुरविण्यासाठी एक संकेतस्थळ सुरू केले
– SAARC आपत्ती व्यवस्थापन केंद्र.

• देशभरात BS-6 इंधनाचा पुरवठा सुरू करणारी ................. ही पहिली भारतीय तेल कंपनी ठरली आहे 
- इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC).

• जगातल्या सर्व सात खंडांतल्या सर्वोच्च ज्वालामुखींवर चढणारा भारतीय पर्वतारोही............ हा होय
- सत्यरूप सिद्धांत.

• ..................या भारतीय संस्थेच्या संशोधकांनी "प्रोब-फ्री डिटेक्शन एसे" नावाने कोरोनाची तपासणी करण्यासाठी सर्वात स्वस्त चाचणी पद्धत विकसित केली
- IIT दिल्ली.

• २३ मार्च रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक हवामान दिनाची संकल्पना............ ही होती
- "क्लायमेट अँड वॉटर".

•  ‘राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ विधेयक 2020’  नुसार .............या विद्यापीठाला राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ म्हणून स्थापित  केले जाणार आहे.
- गुजरात फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ.

• ‘राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ विधेयक 2020’ नुसार दिल्लीच्या ............या संस्थेला राष्ट्रीय महत्व असणारी संस्था म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे
- लोक नायक जयप्रकाश नारायण राष्ट्रीय गुन्हेगारी व न्यायवैद्यक संस्था.

• COVID-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय भुदलाने................... हे अभियान सुरू केले आहे.
- “ऑपरेशन नमस्ते”.

• नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) चा 30 वा सदस्य
- उत्तर मॅकेडोनिया.

• ...................या संघटनेनी COVID-19 विषाणूसाठी संभाव्य औषधे विकसित करण्यासाठी ‘एकता चाचणी’ राबविण्यास आरंभ केला
- जागतिक आरोग्य संघटना.

• संशोधन व विकास प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप आणि MSME उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानांना जाणून घेण्यासाठी........... या विभागाने “COVID19 कृती दल” स्थापन केले
- विज्ञान व तंत्रज्ञान विभाग.

• आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ..............या औषधाला परिशिष्ट H1 औषध म्हणून घोषित केले
- हायड्रोक्सीक्लोरोक्वीन.

• वित्त मंत्रालयाने कोरोनाचा प्रादुर्भाव व्यवस्थापित करण्यासाठी कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचार्यांसाठी............. इतका विमा जाहीर केला
– 50 लक्ष रुपये.

• केंद्र सरकारने मनरेगा योजनेच्या अंतर्गत कामगारांसाठी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये मजुरी आत्ताच्या 13 रुपायांवरून ................ एवढी वाढवली आहे.
- 34 रुपये (सरासरी मंजूरी: 201 प्रति दिन)

• भारत सरकारचा ................. हा नवा स्मार्टफोन अॅप ज्याचा हेतू कोरोनाचा प्रसार रोखणे आहे
- “CoWin-20” अॅप.

• ..................या वित्तीय संस्थेनी COVID-19 विषाणूशी लढा देण्यासाठी विविध सरकारांनी केलेल्या उपायांवर नजर ठेवण्यासाठी ‘____ पॉलिसी ट्रॅकर’ सादर केले
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी.

• .................या राज्य सरकारने “मो जीबन” कार्यक्रम सुरू केला
- ओडिशा.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...