१४ जुलै २०२०

देशाच्या सीमा सुरक्षित - देसवाल यांचा निर्वाळा.

🔰गुरगाव : देशाची सर्व भूमी सुरक्षा दलांच्या ताब्यात सुरक्षित आहे, असा निर्वाळा इंडो-तिबेट सीमा पोलिस दल व सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक एस. एस देसवाल यांनी दिला आहे.

🔰भारत व चीन या देशांत पूर्व लडाखमधून माघारीबाबत मतैक्य झाले असून गेले सात आठवडे सुरू असलेला पेच मिटला असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्व लडाखमधील पेच प्रसंगाबाबत विचारले असता देसवाल यांनी सांगितले, की देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. मग ती पूर्व, पश्चिम किंवा उत्तर कुठलीही सीमा असो कुठेही धोका नाही. कारण आपली सुरक्षा दले सक्रिय, सक्षम व समर्पितपणे काम करीत आहेत. आमचे सुरक्षा जवान देशांच्या सीमांचे रक्षण करण्यास समर्थ आहेत.

🔰प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर इंडो तिबेट सीमा पोलिसांचे आणखी जवान तैनात करण्यात आले आहेत काय, असे विचारले असता त्यांनी सांगितले, की गरजेनुसार जवान  तैनात करण्यात येत आहेत. लष्कर व सीमा सुरक्षा दलांचे मनोबल उंचावलेले आहे. आमची सुरक्षा दले सतर्क आहेत.

जागतिक मुत्सद्दीगिरी (कुटनीती) निर्देशांक 2019 (Global Diplomacy Index)


● निर्देशांक जारी करणारी संस्था - Lowy Institute, Sydney

● जगातील राष्ट्रांत कोणत्या देशाचे परकीय संबंधाबाबतचे जाळे जास्त मजबूत याबाबत आकडेवारी

● एकूण 61 राष्ट्रांचा निर्देशांक काढला जातो.

● जगातील देशांत राजकीय दूतावास (Embassy), Consulate (वाणिज्य दूतावास) यांच्या संख्येवरून निर्देशांक काढण्यात आलेला आहे.

● जगात सर्वाधिक Embassy व Consulate असणारे प्रथम 5 देश

1. चीन - 276
2. अमेरिका - 273
3. फ्रांस - 267
4. जपान - 247
5. रशिया - 242

★भारत 61 देशांच्या यादीत 12 व्या स्थानी (177 - 123 राजकीय दूतावास व 54 वाणिज्यिक दूतावास)
-----------------------------------------

आजच्या प्रश्नांची उत्तरे


      

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीने अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी भूखंडावरील अतिक्रमण रोखण्याच्या हेतूने BLUIS प्रणालीचे अनावरण केले?

(A) नवीन पटनायक✅✅
(B) विजय रुपाणी
(C) अरविंद केजरीवाल
(D) उद्धव ठाकरे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦'योट्टा NM1' हे आशियातले सर्वात मोठे आणि जगातले द्वितीय क्रमांकाचे सर्वात मोठे _ आहे.

(A) कोठार
(B) सह-कार्यस्थळ
(C) डेटा सेंटर✅✅
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦सुरक्षासंबंधी सर्व अडचणींचे निराकरण केल्यानंतर ‘गुगल प्लस’ या व्यासपीठाचे नाव बदलून _ असे ठेवले गेले आहे.

(A) गुगल करंट्स✅✅
(B) गुगल मंत्रा
(C) गुगल अल्फाबेट
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦__________ हे 'महावीर: ए सोल्जर व्हू नेव्हर डाइड' या शीर्षकाच्या कादंबरीचे लेखक आहेत.

(A) व्ही. के. सिंग
(B) के. श्रीकुमार आणि रूपा कुमार✅✅
(C) पद्मनाभन
(D) दिपा अलेक्झांडर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦कोणत्या व्यक्तीच्या हस्ते ‘ASEEM’ व्यासपीठाचे अनावरण केले गेले?

(A) संतोष कुमार गंगवार
(B) डॉ. महेंद्र नाथ पांडे✅✅
(C) रवी शंकर प्रसाद
(D) यापैकी नाही

1] भारतमंत्री हे नवे पद केव्हा तयार करण्यात आले ?

1] 1860
2] 1858
3] 1857
4] 1856

Correct answer 2] 1858

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2) मार्च 1923 साली स्वराज्य पक्षाचे पहिले अधिवेशन कुठे घेण्यात आले ?

1] अलाहाबाद
2] गया
3] पाटणा
4] लखनौ
Correct answer 1] अलाहाबाद

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3) बाळशास्त्री जांभेकरांनी दिग्दर्शक नावाचे मासिक कोणत्या साली सुरु केले ?

1] 1835
2] 1932
3] 1832
4] 1840
Correct answer 4] 1840

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4) 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना कोणी केली ?

1] महात्मा गांधी
2] महात्मा फुले
3] शाहू महाराज
4] डॉ आंबेडकर

Correct answer 4] डॉ आंबेडकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5) डॉ पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते ?

1] मुळे
2] कदम
3] घाटगे
4] भोसले

Correct answer 2] कदम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

6) अवकाशात सोडण्यात आलेल्या सर्वात पहिल्या उपग्रहाचे नाव काय ?

1] मीर
2] स्फुटनिक
3] TUBSAT
4] भास्कराचार्य

Correct answer 2] स्फुटनिक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

7) प्रवरा नदीवरील धरणाचे नाव काय ?

1] शिवसागर
2] जायकवाडी
3] प्रवरा डॅम
4] विल्सन डॅम

Correct answer 4] विल्सन डॅम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

8) सूर्यग्रहन नेहमी _ लाच होत असते.

1] अमावस्या
2] पौर्णिमा
3] सोमवती अमावस्या
4] कोजागिरी पौर्णिमा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

9) नवीन राज्याची निर्मिती , त्याचे क्षेत्र सीमा व नाव यात फेरबदल करण्यासाठी घटनेतील ___ हे कलम आहे ?

1] कलम 2
2] कलम 1
3] कलम 3
4] कलम 4
Correct answer 3] कलम 3

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

10) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?

1] घोलवण
2] श्रीरामपूर
3] भारघर
4] गंगापूर

Correct answer 4] गंगापूर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦ब्राझील देशाच्या पहिल्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे नाव ओळखा.

(A) अॅमेझोनिया-1✅✅
(B) ऑफेक
(C) स्रोस-1
(D) एरियल

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦9 जुलै 2020 रोजी चीनने _ या नावाने एका दळणवळण उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले.

(A) CZ-2A
(B) एपस्टार-6D✅✅
(C) हैयांग-1D
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦9 जुलै 2020 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी  राज्यातल्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या 6 पुलांचे उद्घाटन केले.

(A) अरुणाचल प्रदेश
(B) सिक्किम
(C) जम्मू व काश्मीर✅✅
(D) उत्तराखंड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) _ सोबत माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी एक सामंजस्य करार केला.

(A) भारतीय रिझर्व्ह बँक
(B) भारतीय रोखे व विनिमय मंडळ✅✅
(C) इन्फोसिस
(D) टाटा कन्सलटंन्सी सर्व्हिसेस

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦________ यासंबंधी संयुक्तपणे संशोधन करण्यासाठी CSIR-IGIB संस्थेनी आयआयटी अल्युमनी कौन्सिल सोबत एक करार केला.

(A) गोवर
(B) कोविड-19✅✅
(C) रोसोला
(D) देवी

तुकाराम मुंढेंना दणका; स्मार्ट सिटीच्या CEO पदावरून हटवले.


◾️नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून नागपूर स्मार्ट सिटी सीईओपदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. महेश मोरोने यांना प्रभारी सीईओपद देण्यात आले आहे. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश मोरोने काम पाहतील. पुढील काही दिवसांत पूर्ण वेळ सीईओ नेमण्यासाठी जाहिरात काढली जाणार आहे.

◾️नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. स्मार्ट सिटीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत सत्ताधारी भाजपातर्फे गेल्या काही दिवसांपासून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू आहेत.

◾️शुक्रवारी, १० जून रोजी जवळपास तीन तासांपेक्षा जास्त काळ नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाची झंझावाती बैठक झाली. या बैठकीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर संदीप जोशी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, एनआयटी चेअरमन उपस्थित होते. चोख पोलीस बंदोबस्तात ही बैठक पार पडली.

◾️तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीचे संचालकपद आणि सीईओपद बळकवल्याचा आरोप आजच्या बैठकीत सिद्ध झाल्याचं नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितलं आहे.

१३ जुलै २०२०

आजपर्यंतचे निवडणूक आयुक्त

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दि.26 एप्रिल, 1994 रोजी करण्यात आली. आत्तापर्यंत खालील आयुक्तांनी राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पद संभाळले आहे.

💁‍♂️ *नाव आणि कार्यकाळ* :

● श्री. डि. एन. चौधरी (26 मार्च1994 ते 25 मार्च1999)

● श्री. वाय. एल. राजवाडे (15 जून 1999 ते 14 जून 2004)

● श्री. नन्दलाल (15 जून 2004  ते 14 जून 2009)

● श्रीमती नीला सत्यनारायण (07 जुलै 2009 ते 06 जुलै 2014)

● श्री.जगेश्वर सहारिया (05 सप्टेंबर 2014 ते आजपर्यंत)

General Knowledge

● अटल पेन्शन योजनेचे संचालन कोणती संस्था करते?
: ‘निवृत्ती वेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण’ (PFRDA)

● ‘FIR आपके द्वार’ हि  योजना कोणत्या राज्य सरकारने राज्यात लागू केली?
: मध्यप्रदेश

● भारतात ‘सेरोसर्वे’ कोणती संस्था आयोजित करणार आहे?
: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

● भारतात तयार केले गेलेले पहिले ‘PPE किट सीम सीलिंग’ यंत्र कोणत्या कंपनीने विकसित केले?
: मॅकपॉवर सीएनसी

● देशातील कोणत्या राज्यात सर्वात कमी बालमृत्यू दर आहे?
: केरळ

● केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अध्यक्ष पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
: मनोज अहुजा

● तामिळनाडूच्या कोणत्या उत्पादनाला GI हा टॅग प्राप्त झाला?
: तंजावूर नेट्टी कलाकृती

● ‘फेड कप हार्ट अवॉर्ड’ जिंकणारी प्रथम भारतीय कोण ठरली?
: सानिया मिर्झा

● DFRL संस्थेनी विकसित केलेल्या फिरत्या तपासणी प्रयोगशाळेचे नाव काय?
: परख

● स्कायट्रॅक्सचा जगातले सर्वोत्कृष्ट विमानतळ हा 2020 सालाचा पुरस्कार कोणत्या विमानतळाला जाहीर झाला?
: चांगी विमानतळ

● कोविड-19 रोगाच्या उपचारांसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबल सॉलिडेरीटी ट्रायल’ उपक्रमात भारतातली कोणती संस्था भाग घेणार आहे?
: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

● कोरोना विषाणू विषयक SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या आभासी शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने केले?
: रशिया

● 'ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स अ‍ॅसेसमेंट, 2020' अहवाल कोणत्या संस्थेनी प्रसिद्ध केला?
: खाद्यान्न व कृषी संघटना

● असा कोणता देश आहे ज्याने त्याच्या राजधानीतल्या रस्त्याचे नाव ‘रेहॉव्ह टॅगोर’ असे ठेवले?
: इस्त्राईल

● भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालक पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
: व्ही. विद्यावती

● ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन’ (CDC) ही संस्था कोणत्या देशात आहे?
:  संयुक्त राज्ये अमेरिका

● बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी कोणत्या राज्याने 'होप' हे संकेतस्थळ कार्यरत केले?
: उत्तराखंड

● जागतिक 'एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2020' अहवाल कोणत्या संस्थेनी प्रसिद्ध केला?
: जागतिक आर्थिक मंच

● नुकत्याच झालेल्या जागतिक मधमाशी दिनाची संकल्पना (2020) काय होती?
: बी एंगेज्ड

● ‘चॅलेंज कोविड-19 कॉम्पटिशन (C3)’ची घोषणा कोणत्या संस्थेनी केली?
: नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन

● गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कचरा मुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात कोणत्या शहराला 5 स्टार रेटिंग प्राप्त झाले नाही?
: बंगळुरू

● यंदा (2020) ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन’ची संकल्पना काय?
: म्यूजियम्स फॉर इक्वलिटी: डायव्हरसिटी अ‍ॅण्ड इनक्लूजन

● ‘H.A.C.K.’ या नावाने सायबर सुरक्षा-विशिष्ट अ‍ॅस्सेलिरेटर केंद्र कोणत्या राज्याने उघडले?
: कर्नाटक

● सामाजिक अंतर राखण्यात मदत होण्यासाठी ‘आयफिल-यू’ ब्रेसलेट कोणत्या देशाच्या संशोधकांनी विकसित केले?
: इटली

● इस्राईल देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे?
: बेंजामिन नेतन्याहू

● प्रथम आभासी जागतिक आरोग्य परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?
: डॉ. हर्ष वर्धन

अमेरिका, ब्रिटन, चीनला मागे टाकून करोना लस संशोधनात रशियाने मारली बाजी


📌संपूर्ण जगाला करोना व्हायरसने त्रस्त करुन सोडले आहे. या व्हायरसला रोखणारी लस बनवण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. पण सध्याच्या घडीला यामध्ये रशियाने बाजी मारल्याचे दिसत आहे.

📌रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर बनवलेली लस सर्व क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे. विद्यापीठानेच तसा दावा केला आहे. सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे त्रस्त आहे. या आजारामुळे अर्थचक्र सुद्धा ठप्प झाले आहे. त्यामुळे करोनाला रोखणारी लस कधी उपलब्ध होणार, याकडे सगळयांचेच लक्ष लागले होते.

📌रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर लस बनवली आहे. सेचेनोव्ह विद्यापीठाने स्वयंसेवकांवरील या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. चाचणी परीक्षणात ही लस यशस्वी ठरल्याचा विद्यापीठाचा दावा आहे.

📌स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात येईल.
दुसऱ्या गटाला २० जुलैला डिस्चार्ज देण्यात येणार आहे असे वादिम तारासोव्ह यांनी सांगितले. ते इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक आहेत. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

📌रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरु केल्या होत्या.

📌"करोना व्हायरसविरोधात बनवण्यात आलेल्या जगातील पहिल्या लसीच्या स्वयंसेवकांवरील चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत" असे तारासोव्ह यांनी सांगितले. रशियन विद्यापीठाचा हा दावा खरा ठरला तर करोना व्हायरसला रोखणारी जगातील पहिली लस ठरेल.

📌सध्या अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशांमध्ये करोना रोखणारी लस विकसित करण्यासाठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु असून त्यांच्यात स्पर्धा सुद्धा आहे.

📌मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे हाच या चाचणीमागचा हेतू आणि तो साध्य झाला आहे असे अलेक्झँडर लुकाशेव यांनी सांगितले. करोना विरोधात वापरण्याससाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे असे लुकाशेव यांनी स्पुटनिकला सांगितले. करोना व्हायरसवर प्रभावी लस बनवण्यासाठी जगभरात १२० पेक्षा जास्त प्रकल्प सुरु आहेत.

वाचा :- महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी



● *मुंबई* : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

● *रत्नागिरी* : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

● *सोलापूर* : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

● *कोल्हापुर* : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

● *रायगड* : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

● *सातारा* : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

● *परभणी* : ज्वारीचे कोठार.

● *नागपुर* : संत्र्यांचा जिल्हा.

● *भंडारा* : तलावांचा जिल्हा.

● *जळगाव* : कापसाचे शेत, केळीच्या बागा.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती? 
✅ - कृष्णा. 

2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅  - कृष्णा

3. पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? 
✅ - कृष्णा. 

4.  मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला?
✅  - पुणे.

5. कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला? 
✅ - हरीपुर.

7.  कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला? 
✅ - नरसोबाची वाडी. 

8.  इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते?
✅ - देहु. 

9. शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
✅  - कोयना. 

10. पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो?
✅  - खडकवासला. 

11. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - मुठा.

12. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे? 
✅ - राधानगरी. 

13.  चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - वारणा. 

15. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - नीरा.

16. कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक कोणत्या जिल्हयात आहे? 
✅ - सातारा. 

17.  उजणी धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - भीमा. 

18. दुघगंगा योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो?
✅  - कोल्हापूर.

19. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते?
✅  - पुणे. 

20. मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे? 
✅ - पुणे. 

महाराष्ट्र पोलिस भरती Imp प्रश्न


१. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती ? :- गोदावरी

२. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे ? :- २८८

३. सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता ? :- गुरु

४. कोणत्या नदीला आसामचे दुखाश्रु म्हणून संबोधले जाते ? :- ब्रह्मपुत्रा

५. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले ? :- स्वामी रामानंद तीर्थ

६. हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे ? :- शक्ती

७. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण ?:- वासुदेव बळवंत फडके

८.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ? :- यशवंतराव चव्हाण

९.कोणत्या राज्याने फणस या फळाला राज्यफळाचा दर्जा दिला आहे ? :- केरळ

१०. शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे ? :- कावेरी

१२ जुलै २०२०

भारतीय क्षेपणास्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये

● *बराक 8* : हे भारत आणि इस्रायल यांच्याकडून संयुक्तपणे विकसित केले जाणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे हवेत अधिकतम 16 किमी उंचीवर आणि 100 किमी लांबीवरील लक्ष्यांवर मारा करू शकते

● *निर्भय* : या निर्भय’ क्षेपणास्त्राची क्षमता ही अमेरिकेच्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांएवढी आहे. निर्भय क्षेपणास्त्राची 1000 किलोमीटर पर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता असून त्यावर 300 किलो वजनाची पारंपरिक अण्वस्त्रे बसवता येतात.

● *पिनाका अग्निबाण प्रणाली 6* : अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.

● *आकाश* : हे जमिनीवरून हवेत अधिकतम 18 किमी उंचीवर आणि 25 ते 30 किमी लांबीवर मारा करू शकणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे

● *ब्राम्होस* : हे भारत आणि रशियामार्फत संयुक्तरीत्या विकसित केले जात असलेले सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्र आहे. या सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचा वेग 2.8 मॅच क्रमांक आहे. म्हणजेच त्याचा वेग ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा 2.8 पटीने जास्त असेल. यानुसार त्याचा वेग ताशी 3,400 कि.मी. इतका असेल. त्याचे उड्डाण पाणबुडी, विमान, जहाज तसेच जमिनीवरून केले जाऊ शकेल.

● *त्रिशुल* : या क्षेपणास्त्राचा पल्ला हवेत 9 किमी इतका आहे.

● *नाग* : हे रणगाडा भेदी मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याची मारक क्षमता 7 किलोमीटर आहे.

● *सूर्या* : हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला 5 हजार ते 8 हजार कि.मी एवढा आहे.

● *सागरिका* : हे भारताचे पाण्याखालून मारा करणारे, अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र के-15 या कार्यक्रमाने विकसित करण्यात आलेले आहे.

● *शौर्य* : हे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अर्ध - बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याचा वापर भूदलामार्फत केला जाईल. याचा पल्ला 750 कि.मी. आहे. हे क्षेपणास्त्र एक टन वजनाची पारंपरिक व आण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.

● *धनुष* : हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी क्षेपणास्त्राचे नौदलासाठीचे बॅलिस्टिक संस्करण आहे.

● *अग्नी* : हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या पाच श्रृंखला आहेत. अग्नी 1 - हे अग्नी क्षेपणास्त्राचे कमी पल्ल्याचे (700 कि.मी.) संस्करण आहे.

● *तेजस* : हे भारत विकसित करीत असलेल्या हलके लढाऊ विमानाचे नाव आहे. तेजस हे सर्वात लहान, खूप हलके, एक व्यक्ती बसू शकेल असे, एक इंजिन सुपरसोनिक, बहुआयामी, चौथ्या पिढीतील लढाऊ विमान आहे.

● *सारथ* : हे एक पायदळ लढाऊ विमान आहे. ते भारतीय बनावटीचे असून त्रिशूल, आकाश आणि नाग क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

● *हॉक्स* : हे ब्रिटनचे अ‍ॅडव्हान्स्ड जेट ट्रेनर्स आहेत. वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांचा वापर करण्यात येईल.

● *फाल्कन* : हे इस्त्रायलने निर्माण केलेले मोबाईल रडार आहे.

खुदीराम बोस.

🅾भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक

🅾स्मृतिदिन - ११-०८-१९०५

🧩खुदीराम बोस  :

🅾भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी पालनपोषण केले.

🅾बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटीश सरकारने १९०३ साली निश्चित केले. सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणाऱ्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणाऱ्या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.

🅾यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचा हकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याच्या सहकाऱ्याने दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर बाँब फेकून त्याला मारण्याचे निश्चित झाले. त्याप्रमाणे एक बाँब फेकण्यात आला. परंतु तो चुकून दुसऱ्याच एका गाडीवर फेकण्यात आल्याने त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला.

🅾घटनेच्या दुसऱ्या दिवशी खुदीराम पकडल्या गेला तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीरामवर खटला भरण्यात आला. त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला दि. ११-०८-१९०५ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारा खुदीराम पहिला क्रांतीकारक ठरला.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

११ जुलै २०२०

राज्यसेवा अभ्यासक्रमात खालील प्रमाणे बदल झाला आहे

● सामान्य अध्ययन १ मध्ये रिमोट सेन्सिंग या टाँपिक मध्ये काही अधिक उपघटक समाविष्ट केले आहेत.

● सामान्य अध्ययन २ मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,१९६६ नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.

● सामान्य अध्ययन ४ मधील विज्ञान व तंत्रज्ञान या विभागातील संगणक व माहिती तंत्रज्ञान या उपघटकात काही नविन मुद्दे समाविष्ट केले आहेत.

● सामान्य अध्ययन १ मधील रिमोट सेन्सिंग च्या अभ्यासाचा फायदा अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये होईल.

● जैव तंत्रज्ञान चा अभ्यासक्रम असा सुटसुटीत करुन देण्यात आला आहे. याचा टु द पाँईट अभ्यास करण्यासाठी नक्कीच  फायदा होईल..

● सामान्य अध्ययन २ या पेपर मध्ये हा नविन उपघटक समाविष्ट करण्यात आला आहे..

● सामान्य अध्ययन १ मधील निवडक समाजसुधारक यामध्ये काही नव्याने समाजसुधारक समाविष्ट केले आहेत..

● या राष्ट्रीय चळवळी मधीलमहत्त्वाच्या व्यक्ती वर प्रश्न येतच होते. आता त्यांची नावे स्पेसिफिक नमुद करण्यात आली आहेत..

● सामान्य अध्ययन १ मधील मानवी भूगोल मध्ये काही संकल्पना अँड करण्यात आल्या आहेत..

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...