१० जुलै २०२०

प्राचीन भारताचा इतिहास.

सिंधू संस्कृती

०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.

०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.

०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.

०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.

०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.

०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.

०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.

०८. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.

०९. सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.

१०. सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.

११. भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.

१२. अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.

१३. सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.

१४. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.

१५. सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.

१६. हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.

१७. राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.

१८. माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

💠💠प्राचीन भारत इतिहास.💠💠

वेद काल

०१. गुत्समद, विश्वमित्र, वामदेव, भारद्वाज, अत्री आणि वशिष्ट या ऋषींनी सुक्त अथवा मंत्रांची रचना केली आहे. लोपामुद्रा, घोष, शची आणि पौलोमी या प्रमुख ऋष्निया आहेत.

०२. आयुर्वेद हा ऋग्वेदाचा, धनुर्वेद हा यजुर्वेदाचा, गंधर्ववेद हा सामवेदाचा, शिल्पवेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. सामवेद कौथुम, रणायानीय आणि जैमिनीय तीन शाखांमध्ये विभागलेला आहे.

०३. आचार्य अश्वनी कुमार, धन्वंतरी, बाणभट्ट, सुश्रुत, माधव, जीवन व लोलींबराज हे आयुर्वेदाचे रचनाकार आहेत.

०४. ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन ब्राह्मण आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा तर शतपथ हा शुक्ल यजुर्वेदाचा ब्राह्मण आहे. तांडव, पंचविश, सद्विश, छांदोग्य हे सामवेदाचे ब्राह्मण आहेत.

०५. आरण्यकामध्ये आत्मा. मृत्यू, जीवन यांचे वर्णन केलेले आहे.  ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन आरण्यक आहेत. ऐतरेय आरण्यकाचे रचनाकार महिदास ऐतरेय आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा आरण्यक आहे. सामवेद आणि अथर्ववेदाला आरण्यक नाही.

०६. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐतरेय, छान्दोक्य, वृहदारण्यक, श्वेताश्वतर, कौशित्की, महानारायण इत्यादी प्रमुख उपनिषद आहेत.

🧩 ऋग्वैदिक काळ..

०७. ऋगवैदिककाळात गळ्यात 'निष्क', कानात 'कर्णशोभन' आणि कपाळावर 'कुंभ' नावाची आभूषणे परिधान केली जात.

०८. ऋगवैदिककाळात गाय, म्हैस, शेळ्या, घोडा, हत्ती आणि उंट या प्राण्यांचे आर्यांद्वारे पालन केले जात असे.

०९. ऋगवैदिककाळात भीषज चिकित्सेचे कार्य करीत असे.

१०. ऋगवैदिककाळात आर्य सूर्याची उपासना करीत असे. सूर्याला सविता मित्र, पूषण तसेच विष्णूचा अवतार मानले जात असे. सूर्याला देवतेचे नेत्र असे संबोधले जात असे.

११. ऋगवैदिककाळात अग्नीला देवतेचे मुख असे म्हटले जात असे. अग्नीला आर्यांचे पुरोहित असे मानले गेले आहे. आर्यांचा विचार होता कि यज्ञातील आहुती अग्नी देवतेपर्यंत पोहोचवीत असे. त्या काळात वरून देवतेला आकाश देवतेच्या रुपात पुजिले जात असे.

१२. ऋगवैदात उषा, सीता, पृथ्वी, अरण्यांनी, रात्री यांची आराधना देवीच्या रुपात केली गेली आहे. कृषी संबंधित देवी म्हणून सीतेचा उल्लेख गोमील गृह्य सूत्र तसेच परस्पर गृह्य सूत्रांमध्ये झाला आहे.

१३. ऋगवैदिककाळात व्यापाऱ्यांना 'पणि' म्हटले जात असे. हे लोक आर्यांच्या पाळीव पशूंची चोरी करत असत. 'पणि' लोकांपेक्षा जास्त हेटाळनी 'दस्यू' लोकांची होत असे. 'दस्यू' काळ्या रंगाचे, यज्ञ विरोधी व शिश्नदेवाचे पूजक होते.

१४. ऋगवैदिककाळात गाय ही अर्थव्यवस्थेचा कणा होती.

१५. ऋगवैदिककाळात गायीला 'अधन्या', युद्धाला 'गलिन्टी', पाहुण्यांना 'मोहन' आणि पुत्रीला 'दुहीन्ति' असे संबोधले जात असे.

१६. ऋगवैदात 'वशिष्ठ' यांना उर्वशीचा मानसपुत्र तसेच वरुणाच्या वीर्यातून एका मातीच्या घागरीतून जन्मलेला म्हटले जाते. अगस्त्य यांना सुद्धा मातीच्या घागरीतून जन्मलेला असे म्हटले जाते.

१७. बल्बुभ तसेच तरुक्ष द्वास हे सरदार होते. पुरोहितांना दानधर्म करून आर्य समाजात त्यांनी उच्च स्थान प्राप्त केले होते.

१८. ऋग्वेदात इंद्राचा सर्वात जास्त वेळेस उल्लेख केला आहे. त्याच्या खालोखाल वरुणाचा उल्लेख केलेला आहे. प्रजापतीचा उल्लेख आदी पुरुष म्हणून केलेला आहे. देवता हे त्याचेच वंशज होते.

१९. ऋग्वेदात राजाचा उल्लेख 'गोप्ता जनस्य' असा आहे. ऋग्वेदात भूमी अधिकाऱ्याला 'व्राजपति', सैन्य अधिकाऱ्याला 'ग्रामणी' आणि कुटुंबाच्या प्रमुखाला 'कुलूप' असे संबोधले जात असे.

२०. 'सोम' हा वनस्पतींचा देवता होता. सोम हे एक मादक पेयसुद्धा होते. ज्याच्या बनविण्याचा विधी ऋग्वेदात सांगितला आहे.

🧩उत्तर वैदिककाळ..

२१. उत्तर वैदिक कालीन साहित्य इसवी सन पूर्व ११०० ते ६०० या काळात रचलेले आहे. या काळात मातीचे चित्रित भांडी व लोखंडाच्या औजारांचा वापर केला जात असे. पूर्व वैदिक काळातील मुख्य धान्य बार्ली होते पण उत्तर वैदिक काळात मुख्य धान्य उत्पादन भात व गहू होते.

२२. उत्तर वैदिक काळात राजांनी राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ व वाजपेय यज्ञ करायला सुरुवात केली.

२३. उत्तर वैदिक काळात गोत्र परंपरा तसेच गोत्राच्या बाहेर लग्न करण्याची परंपरा सुरु झाली.

२४. उत्तर वैदिक काळाच्या साहित्यात तीन आश्रमांचा उल्लेख मिळतो. ब्रह्मचर्य, गृहस्थ व वानप्रस्थ. सन्यास आश्रमाचा स्पष्टपणे उल्लेख आढळत नाही.

२५.  उत्तर वैदिक काळात 'सोम' वनस्पती मिळेनासे झाल्याने. दुसऱ्या पेयांचा प्रयोग करण्यास सुरुवात झाली.

२६.  उत्तर वैदिक काळात सोने व चांदीचा उपयोग आभूषणे व भांडी बनविण्यासाठी केला जात असे. तर इतर धातूंचा वापर इतर उपकरणे बनविण्यासाठी केला जात असे.

२७.  उत्तर वैदिक काळात व्यापाऱ्यांनी आपआपले गट तयार केले होते. आर्यांच्याद्वारे समुद्रव्यापार सुद्धा केला जात असे.

💠💠महाराष्ट्राचा इतिहास.💠💠

🧩 मौर्य ते यादव...

🅾(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)

🧩 मौर्य साम्राज्याचा काळ...

🅾महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.

🧩 सातवाहन साम्राज्याचा काळ...

🅾सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष.

🅾महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.

🧩 वाकाटकांचा काळ...

🅾वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.

🧩कलाचुरींचा काळ...

🅾वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.

🧩 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ...

🅾वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी.

🅾त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.

🧩 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ..

🅾वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.

🧩 यादवांचा काळ..

🅾महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता.

🅾यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

● भारताच्या मदतीने नेपाळमध्ये उघडण्यात आलेल्या संस्कृत शाळेचे नाव काय आहे?

*उत्तर* :  ‘श्री सप्तमाई गुरुकुल संस्कृत विद्यालय’

● दरवर्षी कोणत्या दिवशी ‘जागतिक पशूजन्य रोग दिन’ साजरा केला जातो?

*उत्तर* : 6 जुलै 

● देशातील कोणत्या राज्य सरकारने भूमिहीन शेतकर्‍यांसाठी 'बलराम योजना' सादर केली.

*उत्तर* : ओडिशा सरकार

● कोणत्या बँकेनी ‘लोन इन सेकंड’ या नावाने डिजिटल सुविधा सुरू केली?

*उत्तर* : येस बँक

● ‘ओव्हरड्राफ्ट: सेव्हिंग द इंडियन सेव्हर’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

*उत्तर* : माजी RBI गव्हर्नर उर्जित पटेल

● “LEAD” या नावाचे एक ई-लर्निंग डिजिटल व्यासपीठ कोणत्या राज्य / केंद्रशासित प्रदेशाने तयार केले?

*उत्तर* : दिल्ली

● ‘देहिंग पटकाई’ अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

*उत्तर* : आसाम

● रेल्वे मंडळामध्ये रेल्वे आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली?

*उत्तर* :  डॉ. बिष्णू प्रसाद नंदा

०९ जुलै २०२०

गव्हर्नर.

☑️भारतीय नोटा चलन म्हणून स्वीकारण्यास योग्य असल्याचे प्रमाण आणि सरकार तर्फे खात्री म्हणून रिझर्व बॅंकेचे सर्वोच्च अधिकारी गव्हर्नर नोटांवर एक वचन नामा लिहितात आणि त्यावर आपली स्वाक्षरी करतात.

☑️सर ओस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व बॅंकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रिल १९३५ रोजी आपला कार्यभार स्वीकारला. ते दि. ३०-जून-१९३७ पर्यंत आपल्या पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटवर त्यांची स्वाक्षरी नाही.

☑️त्यानंतर स‍र जेम्स ब्रेड टेलर हे दि. ०१-०७-१९३७ ते दि. १७-०२-१९४३ या काळात गव्हर्नर होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर, ते दि. ११-०८-१९४३ रोजी या पदावर विराजमान झाले. १९५० ते १९५६ या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणून काम पाहिले.

☑️आधी वित्त सचिव आणि नंतर गव्हर्नर अशी दुहेरी भूमिका बजावणारे अधिकारीही झाले आहेत. त्यातही डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान पद भूषविणारे आतापर्यंत एकमेव गव्हर्नर ठरले आहेत. दि. ०१-०४-१९३५ पासून दि. ०५-०९-२००८ पर्यंत २१ विविध सनदी अधिकाऱ्यांनी गव्हर्नर म्हणून काम केले आहे.

☑️दि. ०३-०९-२०१३ पासून या पदावर रघुराम राजन हे आहेत. नुकताच, दि. ०४-०९-२०१६ ला उर्जीत पटेल यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यभार सांभाळला आहे.nov 2018 शक्तिकान्त दास हे RBI governor झाले...

महाराष्ट्र पोलिस भरती - प्रश्न सराव


1. भारतात अनुसूचित जमतीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे?

गुजरात
तामिळनाडू
मिझोरम
ओरिसा
उत्तर : मिझोरम

2. भारताला एकूण —– किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.

6555
8517
7517
6000
उत्तर : 7517

3. खालीलपैकी कोणते बंदर लोह-खनिज निर्याताभिमुख आहे?

चेन्नई
कोलकाता
नवीन मंगलोर
कांडला
उत्तर : नवीन मंगलोर

4. चहाची लागवड —— या राज्यात सर्वात प्रथम झाली.

कर्नाटक
केरळ
आसाम
तामिळनाडू
उत्तर : आसाम

5. भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही —– पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.

पहिल्या
दुसर्‍या
तिसर्‍या
चौथ्या
उत्तर : दुसर्‍या

6. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा —– क्रमांक आहे.

प्रथम
व्दितीय
तृतीय
चतुर्थ
उत्तर : चतुर्थ

7. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर —– हे आहे.

कांडला
मार्मागोवा
हल्दिया
न्हावा-शेवा
उत्तर : न्हावा-शेवा

8. मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक —— आहे.

सोळा
सतरा
अठरा
वीस
उत्तर : सतरा

9. —– हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.

दिल्ली ते आग्रा
मुंबई ते ठाणे
हावडा ते खडकपूर
चेन्नई ते रेनीगुंठा
उत्तर : मुंबई ते ठाणे

10. पश्चिम महाराष्ट्रातील —– जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.

नाशिक
पुणे
कोल्हापूर
सोलापूर
उत्तर : कोल्हापूर

मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

१.उत्तराखंड 🏆
२.जम्मू काश्मीर
३.सिक्किम
४.उत्तर प्रदेश

२.भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात?

१.बेट
२.त्रिभुजप्रदेश
३.द्वीपकल्प 🏆
४.मैदानी प्रदेश

3. केदारनाथ कोणत्या राज्यात आहे?

१. उत्तर प्रदेश
२. हिमाचल प्रदेश
३. उत्तराखंड 🏆
४. जम्मू-काश्मीर

४. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्ष असतो?

१. ०२ वर्ष
२. ०४ वर्ष
३. ०५ वर्ष
४. ०६ वर्ष🏆

५) भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापित केली गेली ?

१. पुणे
२. हैदराबाद
३. चेन्नई
४. मुंबई🏆

६) मार्च 2019 मध्ये खालील पैकी कोणत्या माझी आरबीआय गव्हर्नर ला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला?

१.  मनमोहनसिंग
२.  रघुराम राजन🏆
३.  विमल जलान
४.  उर्जित पटेल

७) चांद्रयान-१ हे भारताचे पहिले मिशन टु मुन...... रोजी यशस्वीपणे पाठवण्यात आले?

१. जानेवारी - २००७
२. ऑक्टोबर- २००८🏆
३. सप्टेंबर-  २०११
४. ऑक्टोबर -२०१२

८) ऑक्टोबर 2018 मध्ये वर रुबान नावाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळ निर्माण झाले ?

१. अरबी समुद्र 🏆
२. बंगालचा उपसागर
३. पॅसिफिक महासागर
४.  हिंदी महासागर

९) लोरियस स्पोर्ट मॅन ऑफ द इयर 2019 पुरस्कार कोणी जिंकला?

१. नोवाक जोकोविक🏆
२.  रॉजर फेडरर
३. राफेल नदाल
४.टायगर वूड्स

१०) मुलभूत कर्तव्य संदर्भात तरतुदी भारतीय घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आली आहे?

१. भाग -२
२. भाग -३
३. भाग -४
४. भाग -४अ🏆

११) 'सत्यार्थ प्रकाश' या ग्रंथांची रचना..... यांनी केली?

१. स्वामी दयानंद सरस्वती🏆
२. स्वामी विवेकानंद
३. राजाराम मोहन राय 
४. स्वामी परमहंस

१२) आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?
१. क्षय
२.  डायरिया
३. ॲनिमिया🏆
४. बेरीबेरी

१३) बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता?

१.  लॉर्ड मिंटो
२. लॉर्ड कर्झन🏆
३. लॉर्ड रिपन
४. लॉर्ड डलहौसी

१४) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध ........ यांनी आवाज उठविला?

१. महात्मा फुले
२. सावित्रीबाई फुले
३. लोकमान्य टिळक
४.वि.रा. शिंदे 🏆

१५)दिल्ली ही भारताची राजधानी केव्हापासून झाली?

१. १८५७ च्या उठावाच्या वेळी खानदेशात भिल्लांनी ....... च्या नेतृत्वाखाली बंड केले - *कजारसिंग*

२. "Early History Of Deccan" हा ग्रंथ कुणाचा आहे - *डाँ. भंडारकर*

३. १९१९ चा कौन्सिल अँक्ट म्हणजे ...... सुधारणा कायदा होय - *माँन्टेग्यू चेम्सफर्ड*

४. चंद्राचा किती टक्के भाग पृथ्वीवरून दिसू शकतो - *५९%*

५. इ.स.१५०४ मध्ये संत एकनाथांचा जन्म कोणत्या गावी झाला - *जांब*

६. भारतातील सर्वांत मोठे खा-या पाण्याचे सरोवर कोणते - *चिल्का सरोवर*

७. ...... या बंदराचे नाव बदलून ते दिनदयाल करण्यात आले - *कांडला बंदर*

८. वसंत ऋतुच्या आगमनापूर्वी साजरा केला जाणारा 'कार्निवल' हा भारतातील ...... राज्यातील प्रमुख सांस्कृतिक उत्सव आहे - *गोवा*

९. "लोक माझे सांगाती" ही राजकीय आत्मकथा कोणी लिहिली - *शरद पवार*

१०. महाराष्ट्र सरकारने ...... या गावाला फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित केले आहे - *पारपोली*

११. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे 'अध्वर्यू ' असे कुणाला म्हटले जाते - *विक्रम साराभाई*

१२. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्य स्तरावर किती बक्षिस मिळते - *५ लाख*

१३. सशस्त्र झेंडा दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात - *७ डिसेंबर*

१४. जगातील सर्वांत लांब पल्ल्याची सायकलची शर्यंत कोणती - *टूर टू फ्रान्स*

१५. कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणाचे आहे - *अनुताई वाघ*

१.  "गिताई" ही भगवद्गीतेतील समश्लोकी टीका कोणी लिहीली
- लोकमान्य टिळक

२.  "Living History" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत
- हिलरी क्विंटन

३.  संस्थानाच्या सामिलीकरणाच्या प्रक्रियेच्या वेळी जुनागडच्या नवाबाचा प्रमुख सल्लागार कोण होता
- शहानवाझ भुत्तो

४.  'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे
- प्रदिप

५.  कोणत्या व्यक्तिला "सार्वजनिक काका" असे संबोधतात
- गणेश वासुदेव जोशी

६.  "मिस क्लार्क होस्टेल" या वसतीगृहाची स्थापना कोणी केली
- शाहू महाराज

७.  मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता
- गीतारहस्य

८.  "गांधी व्हर्सेस लेनीन" या पुस्तकाचे लेखक कोण
- श्रीपाद अमृत डांगे

९.  कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते - आप्पासाहेब पटवर्धन

१०.  हँरी पाँटर या मालिकेतील पुस्तके कोणी लिहिली आहेत
- जे. के. राउलिंग

११.  अमेरीकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता
- निक्सन

१२.  इ.स.१९३० मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले
- रँम्से मँक्डोनाँल्ड

१३.  ३ आँगस्ट १७८० मध्ये इंग्रज सेनापती पोफँम याने महादजी शिंद् यांचा पराभव करून कोणता किल्ला ताब्यात घेतला
- ग्वाल्हेर

१४.  कोणत्या अँक्टनुसार बंगालचा गव्हर्नर-जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला
- १८३३

१५.  १८३५ मध्ये बेंटिकच्या पुढाकाराने कोठे वैद्यक महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली
- कोलकाता

चालू घडामोडी

• COVID-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय भुदलाने................... हे अभियान सुरू केले आहे.
- “ऑपरेशन नमस्ते”.

• नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) चा 30 वा सदस्य
- उत्तर मॅकेडोनिया.

• ...................या संघटनेनी COVID-19 विषाणूसाठी संभाव्य औषधे विकसित करण्यासाठी ‘एकता चाचणी’ राबविण्यास आरंभ केला
- जागतिक आरोग्य संघटना.

• संशोधन व विकास प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप आणि MSME उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानांना जाणून घेण्यासाठी........... या विभागाने “COVID19 कृती दल” स्थापन केले
- विज्ञान व तंत्रज्ञान विभाग.

• आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ..............या औषधाला परिशिष्ट H1 औषध म्हणून घोषित केले
- हायड्रोक्सीक्लोरोक्वीन.

• वित्त मंत्रालयाने कोरोनाचा प्रादुर्भाव व्यवस्थापित करण्यासाठी कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचार्यांसाठी............. इतका विमा जाहीर केला
– 50 लक्ष रुपये.

• केंद्र सरकारने मनरेगा योजनेच्या अंतर्गत कामगारांसाठी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये मजुरी आत्ताच्या 13 रुपायांवरून ................ एवढी वाढवली आहे.
- 34 रुपये (सरासरी मंजूरी: 201 प्रति दिन)

• भारत सरकारचा ................. हा नवा स्मार्टफोन अॅप ज्याचा हेतू कोरोनाचा प्रसार रोखणे आहे
- “CoWin-20” अॅप.

• ..................या वित्तीय संस्थेनी COVID-19 विषाणूशी लढा देण्यासाठी विविध सरकारांनी केलेल्या उपायांवर नजर ठेवण्यासाठी ‘____ पॉलिसी ट्रॅकर’ सादर केले
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी.

• .................या राज्य सरकारने “मो जीबन” कार्यक्रम सुरू केला
- ओडिशा.

• जागतिक उपासमार निर्देशांक 2020 यामध्ये भारताचा............ वा क्रमांक आहे
- 102.

• नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया (NIXI) याच्या घोषणेनुसार, ‘भारत’ या डोमेनमध्ये ....................या नऊ भारतीय लिपींमध्ये इंटरनेट पत्ता लिहिले जाऊ शकते
- संस्कृत, काश्मिरी, कन्नड, उडिया, सिंधी आणि मल्याळम.

• केंद्र सरकारने COVID-19 विषाणूला ____ म्हणून घोषित केले
- राष्ट्रीय 'आपत्ती'.

• उत्कृष्ट महिला पत्रकार म्हणून चमेली देवी जैन पुरस्कार 2020 हा ..................... यांना विभागून देण्यात आला आहे
- आरफा खानूम शेरवानी आणि रोहिणी मोहन.

• जागतिक ग्राहक हक्क दिन (15 मार्च 2020)रोजी ................. हे अभियान राबवले गेले
-  सस्टेनेबल कंझ्यूमर.

• ACI ASQ पुरस्कारांमध्ये 2019 या वर्षासाठी आशिया-प्रशांत क्षेत्रातले 'आकार आणि प्रदेशानुसार सर्वोत्कृष्ट विमानतळ'
- राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद.

• "अॅन एक्स्ट्राऑर्डिनरी लाइफ: ए बायोग्राफी ऑफ मनोहर पर्रीकर" या पुस्तकाचे लेखक
- सद्गुरू पाटील आणि मायाभूषण नागवेणकर.

• प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये  (PM-KISAN) सामील न झालेले.................... भरततील एकमेव राज्य
- पश्चिम बंगाल.

• खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) सह सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने ................... ही मोहीम सुरु केली आहे.
– सोलार चरखा मिशन.

• लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज: अॅडॉप्टिंग टू ए डिसरप्टेड वर्ल्ड” या विषयाखाली ‘जागतिक शहरे शिखर परिषद-2020’ .................या देशात 5 ते 9 जुलै 2020 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
- सिंगापूर.

• ....................या भारतीय कंपनीने भूतान देशात पहिले पेट्रोल पंप चालू केला
- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL).

• कोरोना विषाणूच्या चाचण्या घेण्यासाठी परवाना मिळविणारी पहिली खासगी कंपनी
– रोशे डायग्नोस्टिक्स इंडिया (स्विस).

• ..................या राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक मंडळामध्ये विलय करण्याचा निर्णय घेतला
- महाराष्ट्र.

• राज्य आणि केंद्र सरकारांच्या वित्तीय एकत्रीकरणाच्या मार्गदर्शकांचा आढावा घेण्यासाठी वित्त आयोगाने ............ यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती नेमली
– एन. के. सिंग (15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष).

• कोरोना विषाणूमुळे त्रस्त झालेल्या व्यवसाय क्षेत्रांसाठी मदत निधीबाबत निर्णय घेण्यासाठी पंतप्रधानांनी...........  यांच्या नेतृत्वाखाली 'COVID-19 आर्थिक प्रतिसाद कार्य दल' गठित करण्याची घोषणा केली
- वित्तमंत्री निर्मला सीतारमण.

• UN च्या जागतिक आनंद अहवालानुसार, जगातला सर्वात आनंदी देश
- फिनलँड (सलग तिसरे वर्ष).

• भारत जगातला ____ सर्वात मोठा वीज उत्पादक देश आहे आणि वर्ष 2017 मध्ये तो दरडोई वापराच्या बाबतीत 106व्या क्रमांकावर आहे
- तिसरा.

• 5 कोटी आदिवासी उद्योजकांचे रूपांतराचा TRIFEDचा अनोखा प्रकल्प
- “टेक फॉर ट्राइबल”.

• मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
- न्यायमूर्ती भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी.

• भारतीय लघोद्योग विकास बँक (SIDBI) नवोदित उद्योजकांसाठी ..........ही रेल्वेगाडी 5 जून 2020 रोजी सुरू करणार आहे, जी लखनऊ ते वाराणसी दरम्यान धावणार आणि 11 उद्योगी शहरांना भेट देण्यासाठी 15 दिवसांच्या कालावधीत 7,000 किमीचा प्रवास करणार आहे.
- स्वावलंबन एक्स्प्रेस.

• .................या कंपनीने नॅसकॉम फाउंडेशनसोबत दिव्यांग व्यक्तींच्या सबलीकरणासाठी "इनोव्हेट फॉर अॅन अॅक्सेसीबल इंडिया कॅम्पेन" ची घोषणा केली
- मायक्रोसॉफ्ट इंडिया.

• लोकसभेनी जामनगर शहरातल्या ..............या संस्थेला राष्ट्रीय महत्व असणारी संस्था हा दर्जा प्रदान करणारे विधेयक संमत केले
- आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था (आणि गुजरात आयुर्वेद विद्यापीठ परिसरातल्या आयुर्वेद संस्थांचा समूह).

• ................या शहरांमध्ये दोन नॅशनल डेटा सेंटर उघडण्यात येणारा आहे
- भोपाळ,( मध्यप्रदेश) आणि गुवाहाटी, (आसाम.)

• ..................या राज्य सरकारने कोरोना विषाणूला ‘अधिसूचित संसर्गजन्य रोग’ म्हणून घोषित केले
- मध्यप्रदेश.

• ...................या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला अनुसरून प्रदेशातल्या सर्व रहिवाशांना विनाशुल्क मोफत सार्वत्रिक आरोग्य विमा देण्यासाठी आरोग्य योजना सुरू करण्यास मान्यता दिली
- जम्मू-काश्मीर.

• २० मार्च रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक चिमणी दिनाची संकल्पना............... ही होती
- “आय लव्ह स्पॅरो”.

• २१ मार्च २०२० रोजी साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वन दिनाची संकल्पना ................ ही होती
- “फॉरेस्ट अँड बायोडायवरसिटी”.

• IUCN रेड लिस्टमध्ये समाविषतः करण्यात आलेली सर्वसामान्यपणे आढळणारी पक्षी प्रजाती........... ही होय
- चिमणी.

• UNच्या 8 व्या जागतिक आनंद अहवालात भारताचा क्रमांक............ वा आहे
– 144

• ................या आंतरराष्ट्रीय संस्थेनी दक्षिण आशियाई प्रदेशात कोरोन विषाणूच्या आजाराशी संबंधित माहिती पुरविण्यासाठी एक संकेतस्थळ सुरू केले
– SAARC आपत्ती व्यवस्थापन केंद्र.

• देशभरात BS-6 इंधनाचा पुरवठा सुरू करणारी ................. ही पहिली भारतीय तेल कंपनी ठरली आहे 
- इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC).

• जगातल्या सर्व सात खंडांतल्या सर्वोच्च ज्वालामुखींवर चढणारा भारतीय पर्वतारोही............ हा होय
- सत्यरूप सिद्धांत.

• ..................या भारतीय संस्थेच्या संशोधकांनी "प्रोब-फ्री डिटेक्शन एसे" नावाने कोरोनाची तपासणी करण्यासाठी सर्वात स्वस्त चाचणी पद्धत विकसित केली
- IIT दिल्ली.

• २३ मार्च रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक हवामान दिनाची संकल्पना............ ही होती 
- "क्लायमेट अँड वॉटर".

•  ‘राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ विधेयक 2020’  नुसार .............या विद्यापीठाला राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ म्हणून स्थापित  केले जाणार आहे.
- गुजरात फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ.

• ‘राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ विधेयक 2020’ नुसार दिल्लीच्या ............या संस्थेला राष्ट्रीय महत्व असणारी संस्था म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे
- लोक नायक जयप्रकाश नारायण राष्ट्रीय गुन्हेगारी व न्यायवैद्यक संस्था.

फेसबुक सह ८९ अ‍ॅप्स काढून टाकण्याचे जवानांना निर्देश

📌आपल्या मोबाइल फोनमधून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ८९ अ‍ॅप्स १५ जुलैपर्यंत काढून टाकावीत, असे निर्देश लष्कराने अधिकारी, जवानांना दिले आहेत.

📌 सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा लष्कराने दिला आहे.

📌याआधी भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय जाहीर केला होता.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...