०५ जुलै २०२०

अर्थव्यवस्था

    अर्थव्यवस्था ही उत्पादन, वितरण आणि वापरण्याची एक सामाजिक प्रणाली आहे. हे एखाद्या विशिष्ट देशात किंवा प्रदेशातील अर्थशास्त्राचे चालणारे चित्र आहे. हे चित्र एका विशिष्ट कालावधीचे आहे. उदाहरणार्थ, जर आपण 'समकालीन भारतीय अर्थव्यवस्था' म्हटले तर याचा अर्थ होतो. सध्याच्या भारतातील सर्व आर्थिक उपक्रमांचे वर्णन. अर्थशास्त्र अर्थशास्त्रातील संकल्पना आणि तत्त्वे यांचे व्यावहारिक कार्य.

इतिहास

अर्थशास्त्रामधून एखादी वस्तू वस्तूंचा विनिमय करण्यायोग्य पद्धतीने वापर करते जेव्हा जेव्हा एखादा तह खंडित होतो तेव्हा तो शब्द आणि अर्थ या दोन शब्दांमध्ये एकत्र जोडला जातो. अर्थ म्हणजे चलन होय की संपत्ती आणि सुव्यवस्था म्हणजे प्रस्थापित कार्यपद्धती. या शब्दाचा प्रारंभिक उल्लेख कौटिल्य लिखित अर्थशास्त्र पुस्तकात सापडतो . अर्थव्यवस्थेचा प्राचीन इतिहास सुमेर राजवंशच्या काळापासून ज्ञात आहे जेव्हा त्यांनी वस्तू-आधारित विनिमय प्रणाली वापरली होती. मध्ययुगीन काळात बहुतेक व्यापार हा सामाजिक गटांत झाला. आधुनिक युगात बहुतेक व्यापार युरोपमधील देश वेगवेगळ्या देशांचे गुलाम म्हणून करीत असत. अर्थव्यवस्थेच्या ताबडतोब कम्युनिझम आणि कॅपिटलिझम या दोन विचारसरणी उदयास आल्या.

व्याख्या

अर्थशास्त्र एक शास्त्र आहे, जे मानवी वर्तनाचा अभ्यास, त्याच्या गरजा (इच्छा) आणि उपलब्ध स्त्रोतांचा पर्यायी वापर यांच्यातील संबंधांचा अभ्यास करते. अर्थशास्त्राची सामग्री त्याच्या परिभाषाद्वारे दर्शविली जाते. अर्थशास्त्र ही सामाजिक विज्ञानाची शाखा आहे ज्या अंतर्गत वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वितरण, देवाणघेवाण आणि वापर यांचा अभ्यास केला जातो. अर्थशास्त्र हा शब्द संस्कृत शब्द अर्थ (संपत्ती) आणि शास्त्राच्या करारापासून आला आहे, ज्याचा शाब्दिक अर्थ 'संपत्तीचा अभ्यास' आहे. अर्थशास्त्र म्हणजे अक्षरशः संपत्तीचे शास्त्र, म्हणजेच संपत्तीच्या अभ्यासाच्या शास्त्राला अर्थशास्त्र असे म्हणतात.

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अ‍ॅडम स्मिथ यांनी 1976 मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात (अ‍ॅन्क्वायरी इन द नेचर अ‍ॅन्ड द वेल्स ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स) अर्थशास्त्राला पैशाचे शास्त्र मानले.

मध्ये प्रकाशित झालेल्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकात डॉ. मार्शल यांनी अर्थशास्त्राच्या कल्याणाची व्याख्या देऊन ते लोकप्रिय केले.

प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड रॉबिन्स यांनी 1932मध्ये प्रकाशित केलेल्या "अ‍ॅन निबंध ऑन द नेचर अँड सिग्नॅपिन्सन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स" या पुस्तकात अर्थशास्त्राला दुर्मिळतेचे तत्व मानले आहे. मानवी मते अमर्यादित असून त्या पूर्ण करण्याचे साधन मर्यादित आहेत असे त्यांचे मत आहे.

आधुनिक अर्थशास्त्रज्ञ सॅमुलसन ( सॅम्युल्सन ) अर्थशास्त्र विज्ञान विकास म्हणतात (विज्ञान ऑफ ग्रोथ).

आधुनिक अर्थशास्त्रज्ञ कपिल आर्य यांनी आपल्या "अर्थमहा" या पुस्तकात अर्थशास्त्राला आनंदाचे साधन मानले .

अर्थशास्त्राचे महत्त्व

अर्थशास्त्राला सैद्धांतिक आणि व्यावहारिक महत्त्व आहे.

सैद्धांतिक महत्त्व

ज्ञानासाठी

ज्ञान वाढवा

तत्त्वे वाढवा

तर्कशास्त्र वाढवा

विश्लेषण शक्ती वाढवा

इतर शास्त्रांशी नातेसंबंधाचे ज्ञान

व्यावहारिक महत्त्व

उत्पादकांना फायदे,

कामगारांना लाभ,

ग्राहकांना फायदा,

व्यापा to्यांना लाभ,

सरकारला फायदा,

समाज सुधारकांना लाभ,

राजकारण्यांना लाभ,

व्यवस्थापकांना फायदे,

विद्यार्थ्यांना फायदा,

देशाच्या उन्नतीसाठी फायदे,

मुख्य संकल्पना

मूल्य

अर्थशास्त्रात मूल्य ही संकल्पना मध्यवर्ती आहे. हे मोजण्याचे एक मार्ग म्हणजे वस्तूची बाजारभाव. अ‍ॅडम स्मिथ यांनी श्रमला मुख्य स्त्रोत म्हणून परिभाषित केले. कार्ल मार्क्ससह अनेक अर्थशास्त्रज्ञांनी "लेबर ऑफ थ्री ऑफ व्हॅल्यू" ला चालना दिली आहे. या सिद्धांतानुसार एखाद्या सेवेचे किंवा वस्तूचे मूल्य त्याच्या उत्पादनात वापरल्या जाणार्‍या मजुरीइतकेच असते. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की त्याचे मूल्य वस्तूंच्या किंमती निश्चित करते. किंमतीचे हे कामगार सिद्धांत "उत्पादन किंमतीच्या सिद्धांताशी" जोडले गेले आहेत.

मराठी व्याकरण - भाषेतील रस

रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.

साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.

मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.

साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.

१) स्थायीभाव - रती

रसनिर्मिती – शृंगार

हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन

उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.

२) स्थायीभाव – उत्साह

रसनिर्मिती - वीर

हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात

उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’

३) स्थायीभाव –शोक

रसनिर्मिती – करुण

हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात

उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

४) स्थायीभाव – क्रोध

रसनिर्मिती – रौद्र

हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन

उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.

५) स्थायीभाव – हास

रसनिर्मिती – हास्य

हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.

उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.

६) स्थायीभाव – भय

रसनिर्मिती- भयानक

हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.

उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.

७) स्थायीभाव – जुगुप्सा

रसनिर्मिती – बीभत्स

हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.

उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.

८) स्थायीभाव – विस्मय

रसनिर्मिती- अदभुत

हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात

उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

९) स्थायीभाव – शम (शांती)

रसनिर्मिती – शांत

हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.

उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

०४ जुलै २०२०

पूर्व परीक्षा संदर्भात

पूर्व परीक्षेचा अभ्यास कधी पासून , कसा करावा असे बरेच प्रश्न विचारले जातात, या संदर्भातील माझा अॅप्रोच मी शेअर करत आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्या दोन्ही साठी MCQ solving skill . चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळे  अभ्यास ची method  मेन्स ची जी आहे  ती राहू दिली तरी काही प्रॉब्लेम नाही. परंतु प्रश्न हा उभा राहतो की,  मेन्स चा अभ्यासक्रम विस्तृतपणे उपलब्ध आहे,त्यामुळे कशे आणि किती वाचायचे याची कल्पना येते, परंतु प्रेलिम ला हेच लक्षात येत नाही( सामान्य अध्ययन चा बाबतीत तरी घडते).कारण आयोगाने देखील अभ्यासक्रम एका घटकासाठी एका ओळीत मांडला आहे. त्यामुळे किती खोलात जायचे, किती wide  , . त्या काळात अभ्यास करायचा ,याची आयडिया येत नाही.त्यामुळे gs ल बऱ्याचदा स्कोअर खूप कमी येतो.तर काय करावे आणि काय करू नये

१)  पुस्तके -
२-३ टॉपर ची booklist scan. करा .
त्यानंतर स्वतः ची booklist तयार करा. standard books. असतील तर एकच source  राहू द्यात.
e.g राज्यशास्त्र - कोळंबे किंवा लक्ष्मीकांत एकच वाचला तरी sufficient आहे.

2) योग्य नियोजन -
दोन पेपर आहेत आपल्याला. दोन्हीला संतुलित करता आले पाहिजे. असे होते की , GS . मध्ये विषय एवढे जास्त असल्याने , CSAT  कडे, आपले दुर्लक्ष होते. अपुऱ्या तयारी मुळे ,पेपर पण अवघड जातो, आणि पूर्व ला अपेक्षित marks. येत नाही. त्यामुळे दोन्ही पेपर व्यवस्थित कसे  cover  होतील हे पहिले पाहिजे. त्यादृष्टीने नियोजन केले पाहिजे.

3)  मागील वर्षाच्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण -
बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की विश्लेषण का करावे , आणि करावे तर कसे करावे
A) . का करावे
विश्लेषण मुळे प्रश्नांचा रोख कसा आहे,कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायचे , काठिण्य पातळी किती आहे ह्या सर्व बाबींची समज येते. तसेच अभ्यासाला दिशा मिळते
B)  विश्लेषण कसे करायचे
a) प्रश्न  हा कोणत्या विषयाशी संबंधित आहे हे ओळखता आला पाहिजे
b) त्यांनतर त्या विषयातील कोणत्या घटकाशी related  आहे.
c) त्याविषयावर to प्रश्न ,कसे विचारले आहेत
म्हणजे
factual , conceptual ,  किँवा statement based आहेत हे वर्गीकरण करणे
अश्या काही गोष्टी यात येतात

4) minimum books with maximum revision
पुस्तके जेवढी वाढवाल तेवढी उजळणी करताना समस्या येईल. त्यामुळे कमी पुस्तके निवडून जास्त वेळा चाळलेली better.  साधारण 1 reading नंतर 3-4 वेळा revision होतील अश्या दृष्टीने प्रयत्न करा. जेवढ्या जास्त revision तेवढं जास्त लक्षात राहते, विषयावरील  पकड  आणखी घट्ट होते.

5) सराव MCQ based. परिक्षा आहे,त्यामुळे ह्या प्रश्न कसे टाकलेत ,हा जो जाणतो तो यशस्वी होतो.  हे कौशल्य जास्तीत जास्त प्रश्न डोळ्या खालून गेल्यावर विकसित होते. त्यामुळे जास्तीत जास्त Quality प्रश्न सोडवण्याची सवय ठेवा.
त्यासाठी प्रश्न संच किंवा / आणि टेस्ट सीरिज चे प्रश्न सोडवू शकता.

6) टेस्ट सीरिज लावावी का नाही

ज्यांना time mgmt जमत नाही, अभ्यासात discipline राहत नाही त्यांनी अवश्य लावा. त्यामुळे हे issue tar solve होतातच , शिवाय स्पर्धेत आपण कुठे आहोत हे पण कळते
परंतु लावलीच पाहिजे तरच success   मिळते असे नाही. काही जणांना,टेस्ट चे paper किंवा मिळालेल्या मार्क्स मुळे टेन्शन वाढते,अश्यानी घरी आणून solve केले तरी चालेल.
टेस्ट पेपर चा फायदा करून घायचा असेल तर, मार्क्स किती मिळाले व रंक किती आली यापेक्षा , आपल्या कुठे चुका झाल्या , का झाल्या ह्या भागावर भर द्या.चुकलेले प्रश्न मार्क करून ठेवा, पेपर ची उजळणी करताना त्या कडे विशेष लक्ष द्या.

तयारी आपण केलेली असते ,खूप कष्ट घेतलेले असते,परंतु सर्वात महत्वाचे असते D - day  ची temperament, attitude. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करणे , exam दिवशी सुधा तो दृष्टिकोन maintain ठेवणे, याचा तुम्हाला  यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा असेल. शेवटी relative performance matters. त्यामुळे एक्झाम मध्ये कठीण प्रश्न आले म्हणून depress hou नका किंवा खूप सोपे वाटले म्हणून excite होऊ नका. 2 तास sincere ठेवा, यश तुमचेच असेल.

बँक व स्थापना

🏦 RBI:-1 एप्रिल 1935

🏦 IFCI:-1948

🏦 SBI:-1 जुलै 1955

🏦 LIC:-सप्टेंबर 1956

🏦 UTI:-1 फेब्रुवारी 1964

🏦 IDBI:-जुलै 1964

🏦 GIC:-नोव्हेंबर 1972

🏦 RRB:-2 ऑक्टोबर 1975

🏦 EXIM:-1 जानेवारी 1982

🏦 NABARD:-12 जुलै 1982

🏦 NHB:-जुलै 1988

🏦 SIDBI:-1990
____________________________________

ब्रिटीश राजवटीचे आर्थिक दुष्परिणाम

◾️1. १७ व्या शतकात मुगल काळात भारत जगात सर्वात जास्त औद्योगिक उत्पादन करणारा देश होता.

◾️2. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज काळात भारतातील लोकांना कच्च्या मालांपासून पक्का माल तयार करण्याची बंदी करण्यात आली.

◾️3. ब्रिटिशांनी आपल्या सत्तेच्या जोरावर, प्रसंगी शास्त्राचा धाक दाखवून स्थानिक लोकांना उद्योग धंदे करू न देता, ब्रिटीश व्यापारास प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्याकाळी जगातील सर्वात श्रीमंत देश असलेला भारत जगातील सर्वात दरिद्री देश इंग्रजांनी बनविला.

◾️4. स्थानिक व्यापारावर ब्रिटिशांनी प्रतिबंधात्मक कायदे केले. बंगालमधील जे कुशल विणकर आपल्या बोटांनी उत्तम प्रकारचे तलम रेशमी कापड तयार करीत त्यांची बोटे तोडून टाकण्यापर्यंत इंग्रजांची मजल गेली. कंपनीने भारतात येणाऱ्या ब्रिटीश मालावर अडीच टक्के आयात कर ठेवला. त्यामुळे भारतातील उद्योगधंदे बसले व ब्रिटीश माल कमालीचा स्वस्त झाला.

◾️5. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे एक नवा श्रीमंत भांडवलदार वर्ग निर्माण झाला. हा वर्ग १८१३ साली कंपनीची व्यापारी मक्तेदारी मोडून टाकण्यात यशस्वी झाला. भारत सरकारला मुक्त व्यापार धोरण स्वीकारावे लागले. त्यामुळे ब्रिटीश माल भारतात मुक्तपणे येऊ लागला. १८१३ साली ब्रिटीश सुती कापडाची आयात १ लाख १० हजार पौंडाची होती, ती १८५६ साली ६ कोटी ३० लाखांची झाली.

◾️6. ब्रिटिशांनी भारताची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक केली. या संपत्तीच्या लुटीचे विश्लेषण करण्यासाठी दादाभाई नौरोजींनी इस्ट इंडिया असोसिएशनच्या लंडन येथील बैठकीत २ मे १८६७ रोजी आपला Englands Debt to India हा निबंध सादर केला. त्या वेळी Drain of Wealth हा शब्दप्रयोग उपयोगात आणला.

◾️7. न्या. रानडे यांनीही असाच संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत मांडला. दादाभाई नौरोजी यांनी Poverty And Un-British Rule in India (1867), The Wants and means of India (1870), The Commerce of India (1871) या लेखांत ब्रिटीशांच्या संपत्तीच्या अपहरणाच्या सिद्धांताचे तपशीलवार विवेचन केले आहे. संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने १८९६ साली कलकत्ता अधिवेशनात अधिकृतपाने स्वीकारला.

◾️8. ब्रिटिशांनी भारतीय औद्योगीकरणास बंदी घातली. परंतु भारताला फार काळ किंवा कायमपणे औद्योगिकरणापासून दूर ठेवणे इंग्रजांनाही शक्य नव्हते. त्यानुसार भारतात प्रथम नीळ, चहा, व कॉफी यांची औद्योगिक पातळीवर लागवड सुरु झाली.

◾️9. भारतात रेल्वेमार्गाची बांधणी झाल्यानंतर १९ व्या शतकाच्या मध्यास आधुनिक यंत्रसामग्री रेल्वे वाहतुकीद्वारे देशाच्या अंतर्भागात प्रस्थापित करणे शक्य झाले. त्यामुळे सुती कापडगिरण्या, ज्यूट, कोळसा इत्यादी उद्योग सुरु झाले. १९ व्या शतकाच्या अखेरीस भारताचे थोडे औद्योगीकरण आणि आधुनिकीकरण झाले.

◾️10. ब्रिटीश जमीन महसूल व्यवस्थेमुळे गावातील समाजातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक एकोपा नष्ट झाला. जमीनदार वर्ग सर्व गावचा मालक झाला. गावातील बलुतेदार, कारागीर व मजूर यांचे परंपरेने चालत आलेले आर्थिक व सामाजिक अधिकार नष्ट झाले.

औद्योगिक विकास.


🅾औद्योगिक क्रांती कारखाने विकास समाजात यामुळे बदल मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आले. मुळात कारखाने स्टीम-चालित होते, परंतु नंतर इलेक्ट्रिकल ग्रीड विकसित झाल्यानंतर ते विजेवर बदलले गेले .

🅾 यांत्रिकीकृत असेंब्ली लाइनची प्रक्रिया पुनरावृत्ती करण्यायोग्य फॅशनमध्ये भाग एकत्र करण्यासाठी केली गेली होती, ज्यात प्रत्येक कामगार प्रक्रियेदरम्यान विशिष्ट पावले करतात. 

🅾यामुळे कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आणि शेवटी प्रक्रियेची किंमत कमी झाली. नंतर मानवी ऑपरेटर पुनर्स्थित करण्यासाठी ऑटोमेशनचा वापर वाढत्या प्रमाणातझाला. संगणक आणि रोबोटच्या विकासासह या प्रक्रियेस वेग आला आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠औद्योगिक कामगार.💠💠

🅾 औद्योगिक समाजात, लोकसंख्येचा एक मोठा भाग उद्योग नियुक्त करतो. हे सामान्यतः उत्पादन क्षेत्रात होते. मजदूर संघ म्हणजे मजुरांची एक संघटना जी मजुरी, तास आणि इतर काम परिस्थिती यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सामान्य उद्दीष्टे साध्य करण्यासाठी एकत्र काम केली. 

🅾कामगार संघटना, त्यांच्या नेतृत्त्वात, युनियन सदस्यांच्या वतीने नियोक्ताशी सौदे ( रँक आणि फाइल सदस्य) आणि नियोक्तांसह कामगार करारावर बोलतो. ही चळवळ प्रथम औद्योगिक कामगारांमध्ये उठली.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

उद्योग.



🅾 एक उद्योग क्षेत्रातील आहे.  निर्मिती वस्तू किंवा संबंधित सेवा एक आत अर्थव्यवस्था .  एखाद्या समूहाचे किंवा कंपनीच्या कमाईचे मुख्य स्त्रोत हे कोणत्या उद्योगात वर्गीकृत केले जावे हे सूचक आहे . 

🅾जेव्हा मोठ्या कॉर्पोरेट गटामध्ये कमाईचे अनेक स्रोत असतात, तेव्हा ते वेगवेगळ्या उद्योगांमध्ये कार्यरत असल्याचे मानले जाते. औद्योगिक क्रांतीच्या काळात युरोपियन आणि उत्तर अमेरिकन देशांमध्ये उत्पादन उद्योग उत्पादन व कामगारांचे एक महत्त्वाचे क्षेत्र बनले आणि त्यांनी पूर्वीचे व्यापारी आणि सरंजाम अस्वस्थ केले.

🅾अर्थव्यवस्था. स्टीम पॉवरचा विकास आणि स्टील आणि कोळशाचे उत्पादन यासारख्या तंत्रज्ञानाच्या निरंतर जलद प्रगतीतून हे पुढे आले .

🅾औद्योगिक क्रांतीनंतर शक्यतो आर्थिक उत्पादन एक तृतीयांश उत्पादन उद्योगांनी केले. बरेच विकसित देश आणि अनेक विकसनशील / अर्ध-विकसित देश (चीन, भारत इ) उत्पादन उद्योगावर लक्षणीय अवलंबून आहेत.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

निर्मल भारतअभियान

सुरुवात :- भारत सरकारद्वारे 2002 मध्ये सुरू करण्यात आलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाचे 2012 मध्ये नाव बदलून निर्मल भारत अभियान करण्यात आले

उद्देश शौचालय बांधून व त्याद्वारे उघड्यावरील उत्सर्गाची पद्धत पूर्णपणे बंद करून आरोग्य व स्वच्छतेचे प्रोत्साहन देणे

निर्मल भारत योजनेअंतर्गत स्वतंत्र शौचालय बांधण्याकरिता दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्रोत्साहन मदत दिली जाते

आता दारिद्र रेषेवरील अनुसूचित जाती-जमातीतील कुटुंबे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी घर असलेले भूमिहीन मजूर शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे यांच्यासाठी योजना लागू केली आहे

प्रति सौचालय बांधकामाची किंमत 5500 ( रुपये 6000 डोंगराळ व अति दुर्गम भागासाठी) निर्धारित केली आहे व त्यावरील केंद्रशासनाच्या वाटा 3:2 ( रुपये 3700 डोंगराळ व अति दुर्गम भागासाठी) राज्य शासनाचा वाटा 1400 व लाभार्थ्यांची योगदान 900 याप्रमाणे आहे

या अभियानांतर्गत नोव्हेंबर 2012 पर्यंत 71.72 लाख स्वतंत्र कौटुंबिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे

इसपू ३०००-१५०० सिंधू खोरे संस्कृती


५७६ गौतम बुद्धाचा जन्म

५२७ महावीरांचा जन्म

३२७-३२६ अलेक्झांडरचे भारतावर आक्रमण, त्यामुळे भारत आणि युरोपदरम्यानचा खुष्कीचा मार्ग खुला झाला.

३१३ जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याचे राज्यारोहण

३०५ चंद्रगुप्त मौर्याकडुन सेल्युकसचा पराभव

२७३-२३२ अशोकाचे साम्राज्य

२६१ कलिंगची लढाई

१४५-१०१ श्रीलंकेचा चौल राजा एलाराचे राज्य, विक्रम संवत्सराची सुरुवात

इस ७८ शक संवत्सराची सुरुवात

१२० कनिष्काचे राज्यारोहण

३२० गुप्त काळाची सुरुवात. भारतातील हिंदु सुवर्णयुगाची सुरुवात

३८० विक्रमादित्याचे राज्यारोहण

४०५-११ चिनी प्रवासी फा-हियानची भारतभेट

४१५ कुमार गुप्त १ ला चे राज्यारोहण

४५५ स्कंदगुप्ताचे राज्यारोहण

६०६-६४७ हर्षवर्धनाचे साम्राज्य

७१२ सिंधमध्ये पहिल्यांदा अरबांचे आक्रमण

८३६ कनौजच्या राजा भोजचे राज्यारोहण

९८५ चौल राजा राजराजाचे राज्यारोहण

९९८ सुलतान महमुदचे राज्यारोहण

१०००-१४९९
१००१ मौहम्मद गझनीचे भारतावर पहिल्यांदा आक्रमण, पंजाबचा राजा जयपालचा पराभव

१०२५ मौहम्मद गझनीद्वारा सोमनाथ मंदिराची तोडफोड

११९१ तराईचे पहिले युद्ध

११९२ तराईचे दुसरे युद्ध

१२०६ कुतुबुद्दिन ऐबकाचे दिल्लीच्या तख्तावर राज्यारोहण

१२१० कुतुबुद्दिन ऐबकाचा मृत्यू

१२२१ चेंगीझ खानाचे भारतावर आक्रमण (मंगोल आक्रमण)

१२३६ रझिया सुलतानचे दिल्लीच्या तख्तावर राज्यारोहण

१२४० रझिया सुलतानचा मृत्यू

१२९६ अल्लाउद्दिन खिलजीचे राज्यारोहण

१३१६ अल्लाउद्दिन खिलजीचा मृत्यू

१३२५ महम्मद बिन तुघलकाचे राज्यारोहण

१३२७ तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहुन दौलताबदेला आणि तेथून दख्खनला नेली.

१३३६ दक्षिणेत विजयनगर साम्राज्याची स्थापना

१३५१ फिरोजशाहाचे राज्यारोहण

१३९८ भारतावर तैमूरलंगचे आक्रमण

१४६९ गुरुनानक यांचा जन्म

१४९४ फरघणामध्ये बाबरचे राज्यारोहण

१४९७-९८ वास्को द गामाची पहिली भारतसफर (युरोपातुन केप ऑफ गुड होपमार्गे भारतात येण्याच्या सागरी मार्गाचा शोध)

१५००-१७९९
१५२६ पानिपतची पहिली लढाई, बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला, भारतात बाबराने मुघल साम्राज्याची स्थापना केली.

१५२७ खान्याची लढाई, बाबरने राणा संगाचा पराभव केला.

१५३० बाबरचा मृत्यू आणि हुमायुनचे राज्यारोहण

१५३९ शेरशहा सुरीने हुमायुनचा पराभव केला आणि भारताचा सम्राट बनला.

१५४० कनौजची लढाई

१५५५ हुमायुनने पुन्हा दिल्लीचे तख्त काबीज केले.

१५५६ पानिपतची दुसरी लढाई

१५६५ तालिकोटची लढाई

१५७६ हल्दीघाटीची लढाई, राणा प्रतापचा अकबराद्वारा पराभव

१५८२ अकबरने दिन-ए-इलाही पंथाची स्थापना केली.

१५९७ राणा प्रतापचा मृत्यू

१६०० ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना

१६०५ अकबरचा मृत्यू आणि जहांगीरचे राज्यारोहण

१६०६ गुरु अर्जुन देवांना देहदंड

१६११ जहांगीर आणि नूर जहाँचा विवाह

१६१६ सर थॉमस रोई आणि जहांगीरची भेट

१६२७ शिवाजी महाराजांचा जन्म आणि जहांगिराचा मृत्यू

१६२८ शाहजहान भारताचा सम्राट

१६३१ मुमताज महलचा मृत्यू

१६३४ ब्रिटिशांना भारतात बंगालमध्ये व्यापार करण्याची परवानगी

१६५९ औरंगजेबाचे राज्यारोहण, शाहजहान कैदेत.

१६६५ शिवाजी महाराज औरंगजेबाद्वारा कैद

१६६६ शाहजहानचा मृत्यू

१६७५ शिखांचे नववे गुरू तेग बहादूर यांना देहदंड

१६८० शिवाजीराजांचा मृत्यू

१७०७ औरंगजेबाचा मृत्यू

१७०८ गुरु गोबिंदसिंगांचा मृत्यू

१७३९ नादिरशाहाचे भारतावर आक्रमण

१७५७ प्लासीची लढाई, लॉर्ड क्लाईव्हद्वारा भारतात ब्रिटिशांच्या राजकीय वर्चस्वाची स्थापना

१७६१ पानिपतची ३ री लढाई, दुसरा शाह आलम भारताचा सम्राट

१७६४ बक्सरची लढाई

१७६५ क्लाईव्हची भारतातील कंपनीचा गव्हर्नर म्हणून नेमणुक

१७६७-६९ पहिले म्हैसूर युद्ध

१७७० बंगालचा दुष्काळ

१७८० महाराजा रणजित सिंगांचा जन्म

१७८०-८४ दुसरे म्हैसूर युद्ध

१७८४ पिट्स इंडिया ऍक्ट

१७९०-९२ तिसरे म्हैसूर युद्ध

१७९३ बंगालचा कायमस्वरुपी तोडगा

१७९९ चौथे म्हैसूर युद्ध, टिपू सुलतानचा मृत्यू

१८००-१९००
१८०२ भसिनचा तह

१८०९ अमृतसरचा तह

१८२९ सतीच्या प्रथेवर बंदी

१८३० ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांची इंग्लंडला भेट

१८३३ राजा राम मोहन रॉय यांचे निधन

१८३९ महाराज रणजित सिंग यांचे निधन

१८३९-४२ पहिले अफगाण युद्ध

१८४५-४६ पहिले शीख-इंग्रज युद्ध

१८५२ दुसरे इंग्रज-बर्मी युद्ध

१८५३ ठाणे-मुंबई दरम्यान पहिली रेल्वेगाडी धावली आणि कलकत्त्यामध्ये पहिली तारसेवा सुरु

१८५७ १८५७ चा उठाव

१८६१ रविंद्रनाथ टागोरांचा जन्म

१८६९ महात्मा गांधींचा जन्म

१८८५ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना

१८८९ जवाहरलाल नेहरुंचा जन्म

१८९७ सुभाषचंद्र बोस यांचा जन्म

१९००-१९७०
१९०४ तिबेट मोहीम

१९०५ लॉर्ड कर्झनद्वारा बंगालची पहिली फाळणी

१९०६ मुस्लिम लीगची स्थापना

१९११ दिल्ली दरबार, ब्रिटनच्या राजा आणि राणीची भारतभेट, दिल्ली भारताची राजधानी

१९१६ पहिले महायुद्ध सुरू

१९१६ मुस्लिम लीग आणि कॉंग्रेसमध्

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...