१६ जून २०२०

लोह ( Iron)

✅18 मिली ग्रॅम ( लेश मूलद्रव्ये)

✅मांस, मासे, अंडी, घेवडा, पालक, मेथी, खजूर, मनुके, हळद, तीळ, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, सुका मेवा, यकृत, सागरी पदार्थ, सोयाबीन, गुल शेंगदाणे

✍कार्य :

✅प्रथिने विकराच्या निर्मिती साठी

✅सर्वात जास्त उपयोग तांबड्या रक्तपेशीतील हिमोग्लोबिन साठी

✅75 टक्के लोह रक्तात असते

✅90 टक्के लोहाचा पुनर्वापर होतो

✅रक्तात हिमोग्लोबिन तर स्नायुत मायोग्लोबिन मधील  लोह ऑक्सिजन च्या साह्याने वहनाचे कार्य करते

✅लोहामुळे रोगप्रतिकारक्षमता व ऊर्जानिर्मिती नियंतत्रित केली जाते

✍अभाव : ऍनिमिया

✅पांडुरोग रक्तक्षय असे म्हणतात

✅रक्तातील तांबड्या पेशी किंवा लोहाचे प्रमाण कमी होणे

✅हिमोग्लोबिन च्या कार्यात अडथळ निर्माण होतो

✅थकवा, थाप, लागणे, अशक्तपणा, चक्कर येणे, त्वचा पांढरी पडणे

✅घोट्याना सूज येणे

✅गरोदर स्त्रियांत लोहाची कमतरता दूर होण्यासाठी त्यांना दररोज 60 मी ग्रॅम लोह आणि 500 मी ग्रॅम फॉलिक आम्लाचा पुरवठा करणे आवश्यक असते

✅दिवसात दोन वेळा फेरॉन सल्फेटच्या गोळ्या देऊन लोह अभावाचा उपचार करता येतो

✍अतिसेवन :

✅लोहाआधिक्य यामुळे पातळी वाढून हिमोक्रोमॅटोसीस हा अनुवांशिक विकार होतो

✅ यकृत, ह्रदय, अंतःस्रावी ग्रंथीच्या कार्यवर परिणाम होतो1

✅ यकृताचा सिरॉसिस ,मधुमेह, सांधेदुखी परिणाम दिसून येतात

भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका


*उद्दिष्टांचा ठराव जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 ला मांडला आणि घटना समितीने तो 22 जानेवारी 1947 ला स्वीकृत केला.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*शब्दांचा क्रम:- न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता
*42 व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट शब्द:- समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*सामाजिक, आर्थिक,राजकीय न्याय
*विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य
*दर्जा आणि संधीची समानता
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
सरनामा घटनेचा भाग आहे का ?
*1960-बेरुबारी खटला- घटनेचा भाग नाही
*1973-केशवानंद भारती खटला-घटनेचा भाग आहे.
*1995-LIC खटला- घटनेचा भाग आहे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*सरनामा न्यायप्रविष्ट नाही.
*राज्य शब्दाची व्याख्या कलम 12 आणि कलम 36 मध्ये नमूद.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*सामाजिक न्याय- कलम 38
*आर्थिक न्याय - कलम 39
*राजकीय न्याय - कलम 325, 326
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

१५ जून २०२०

काळ व प्रकार

काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.

वर्तमान काळभूतकाळभविष्यकाळ

 1) वर्तमानकाळ :

क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो.

उदा.

मी आंबा खातो.मी क्रिकेट खेळतो.ती गाणे गाते.आम्ही अभ्यास करतो.

वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार घडतात.

i) साधा वर्तमान काळ

जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो.

उदा. 

मी आंबा खातो.कृष्णा क्रिकेट खेळतो.प्रिया चहा पिते.

ii) अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ

जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो. तेव्हा वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमान असतो.

उदा. 

सुरेश पत्र लिहीत आहे.दिपा अभ्यास करीत आहे.आम्ही जेवण करीत आहोत.

iii) पूर्ण वर्तमान काळ

जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला ‘पूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा.

मी आंबा खाल्ला आहे.आम्ही पेपर सोडविला आहे.विधार्थ्यांनी अभ्यास केला आहे.

iv) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ

वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला ‘रीती वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा.    

मी रोज फिरायला जातो.प्रदीप रोज व्यायाम करतो.कृष्णा दररोज अभ्यास करतो.

2)  भूतकाळ :

जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

राम शाळेत गेला.मी अभ्यास केला.तिने जेवण केले.

भूतकाळचे 4 उपप्रकार पडतात.

i) साधा भूतकाळ

एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास ‘साधा भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

रामने अभ्यास केलामी पुस्तक वाचले.सिताने नाटक पहिले.

ii) अपूर्ण/चालू भूतकाळ

एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला ‘अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा. 

मी आंबा खात होतो.दीपक गाणे गात होता.ती सायकल चालवत होती.

iii) पूर्ण भूतकाळ

एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

सिद्धीने गाणे गाईले होते.मी अभ्यास केला होता.त्यांनी पेपर लिहिला होता.राम वनात गेला होता.

iv) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ

भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला ‘चालू-पूर्ण भूतकाळ’ किंवा ‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

मी रोज व्यायाम करीत होतो/असे.ती दररोज मंदिरात जात होती/असे.प्रसाद नियमित शाळेत जात होता/असे.

3)  भविष्यकाळ :

क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला ‘भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा.

मी सिनेमाला जाईल.मी शिक्षक बनेल.मी तुझ्याकडे येईन.

i) साधा भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी ‘साधा भविष्यकाळ’ असतो.

उदा.

उद्या पाऊस पडेल.उद्या परीक्षा संपेल.मी सिनेमाला जाईल.

ii) अपूर्ण / चालू भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला ‘अपूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा. 

मी आंबा खात असेल.मी गावाला जात असेल.पूर्वी अभ्यास करत असेल.दिप्ती गाणे गात असेल.

iii) पूर्ण भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा. 

मी आंबा खाल्ला असेल.मी गावाला गेलो असेल.पूर्वाने अभ्यास केला असेल.दिप्तीने गाणे गायले असेल.

iv) रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला ‘रीती/ चालू पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा.

मी रोज व्यायाम करत जाईल.पूर्वी रोज अभ्यास करत जाईल.सुनील नियमित शाळेत जाईल.

भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी....

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने संविधानाचा स्वीकार केला.

१. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?

- कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.

२. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?

- संविधान सभेनं २ वर्षे ११ महिने १८ दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.

३. संविधानाची भाषा

-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं.
- यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली.
-भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?

-अध्यक्ष-Dr.राजेंद्र प्रसाद

-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली.

अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला.

५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?

-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली.
- सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते.
-पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.

-फाळणीनंतर संविधान सभेतील संदस्यांची संख्या २९९ झाली.
समितीच्या ११ बैठका झाल्या.
त्या १६४ दिवस कामकाज चालले.
समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या.
त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
-मसुदा समितीच्या ४४ बैठका झाल्या.

७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?

-मूळ घटनेत ८ परिशिष्टे होती. नंतर ४ जोडण्यात आली आहेत.

- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली.

-मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती.

-सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.

८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?

-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा लागू करण्यात आला.
भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.

९. संविधान कोणी हस्तलिखित केले आहे?

-बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.

१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?

-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती.
-प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

अंकगणित

० ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात.
।।) १ हा अंक २१ वेळा येतो.
।।।) ० हा अंक ११ वेळा येतो.

१ ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूणसंख्या प्रत्येकी १९ येतात.
।।) दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकांच्याप्रत्येकी १८ संख्या असतात.

दोन अंकांमधून एकूण २ संख्या,तीन अंकांमधून एकूण ६ संख्या,चार अंकांमधून एकूण २४ संख्या व पाच अंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात.

विभाज्यतेच्या कसोटय़ा

A)२ ने नि:शेष भाग जाणारी संख्या -संख्येच्या एककस्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकीकोणताही अंक असल्यास.

B)३ ची कसोटी-संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेषभाग जात असल्यास.

C)४ ची कसोटी-संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाऱ्यासंख्येला ४ ने नि:शेष भाग जात असल्यासअथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्यअसल्यास.

D)५ ची कसोटी-संख्येच्या एकक स्थानचा अंक जर ० किंवा ५असल्यास.

E)६ ची कसोटी-ज्या संख्येला २ व ३ या अंकांनी नि:शेष भागजातो त्या संख्यांना ६ ने नि:शेष भाग जातोचकिंवा ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निश्चित भाग जातो.

F)७ ची कसोटी-संख्येतील शेवटच्या ३ अंकांनी तयारहोणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्याअंकांनी तयार झालेली संख्या वजा करूनआलेल्या संख्येस ७ ने नि:शेष भाग गेल्यास त्यासंख्येला ७ ने नि:शेष भाग जातो.

G)८ ची कसोटी-संख्येतील शेवटच्या तीन अंकांनीतयार होणाऱ्या संख्येला ८ ने निशेषभाग जातअसल्यास किंवा संख्येत शेवटी कमीतकमी ३शून्य असल्यास त्या संख्येला ८ ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी २ हा अंकअसतो व जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८ने भाग जातो त्या संख्येला ८ ने भाग जातो.

H)९ ची कसोटी-संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला९ ने निशेषभाग जातो.

I)११ ची कसोटी-ज्या संख्येच्या विषम स्थानच्याया समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११च्यापटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भागजातो. एक सोडून १ अंकांची बेरीज समान असते किंवा फरक ० किंवा ११ च्या पटीत असतो.

J)१२ ची कसोटी-ज्या संख्येला ३ व ४या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो.

K)१५ ची कसोटी-ज्या संख्येला ३ व ५ अंकानी निशेष भाग जातोत्या संख्येला १५ ने भाग जातो.

L)३६ ची कसोटी-ज्या संख्येला ९ व ४ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो.

M)७२ ची कसोटी-ज्या संख्येला ९ व ८ ने निशेषभाग जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो.

राज्यसेवा आयोगाचा उद्देश

अपात्र लोकांना सेवेच्या बाहेर ठेऊन पात्र लोकांना सेवेत घेणे.

रचना

राज्य लोकसेवा आयोगामध्ये एक अध्यक्ष व राज्यपाल ठरवितील इतके सदस्य असतात.

नेमणूक

भारताचे राज्यपाल करतात (मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने)

शपथ

राज्यपाल देतात.

राजीनामा

राज्यपालाकडे 

कार्यकाल

अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल वयाची 62 वर्ष किंवा नेमणुकीस सहा वर्ष यापैकी कोणतीही एक बाब अगोदर होईल तोपर्यंत ते पदावर रहातात.

अयोगाचे कार्य :

राज्यसरकारला कर्मचार्‍यांच्या नेमणुकीबाबद सल्ला देणे.

राज्यसरकारच्या निरनिराळ्या शासकीय पदांसाठी नेमणुकीची पद्धत ठरविणे.

मुलकी अधिकार्‍यांच्या नेमणुका आणि पदोन्नती याबाबद नियम ठरविणे.

अधिकार्‍यांची निवड करतांना लेखी परीक्षा घेणे व त्याची यादी राज्यसरकारकडे सादर करणे.

राज्यपालांनी सोपविलेली इतर कामे पार पाडणे.

भारत सरकार कायदा (सन 1935)


◆ सन 1930, 1931 व 1932 या तीन वेळा भरलेल्या गोलमेज परिषदेच्या चर्चेवर आधारित 1933 मध्ये श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली आणि या श्वेतपत्रिकेवर आधारित 1935 चा भारत सरकार कायदा पास करण्यात आला.

■ या कायद्याची वैशिष्टे-

◆ भारतात संघराज्य पद्धती स्वीकारण्यात आली.

◆ प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली व प्रांतिक शासनाचा कारभार भारतीयांकडे सोपविण्यात आला.

◆ संपूर्ण विषयाच्या 1) मध्यवर्ती सूची 2) प्रांतिक सूची 3) समवर्ती सूची अशा तीन सूची तयार करण्यात आल्या. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ भारत मंत्र्याला सल्ला देण्याकरिता तयार करण्यात आलेले इंडिया कौन्सिल रद्द करून त्या ठिकाणी सल्लागार मंडळाची निर्मिती करण्यात आली.

◆ त्याचप्रमाणे भारतमंत्र्याचे अधिकार कमी करण्यात आले.

◆ केंद्रात व्दिदल राजकीय पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. या अंतर्गत मध्यवर्ती सूचितील काही खाती भारतीयांकडे सोपविण्यात आली तर महत्वाची खाती शासनाने स्वत:कडे राखून ठेवली.

◆ सिंध व ओरिसा नवीन प्रांत निर्माण करण्यात आले व ब्रम्हदेश भारतापासून वेगळा करण्यात आला.

◆ पं. नेहरूंनी या कायद्याचे वर्णन इंजिनाशिवाय ब्रेकची व्यवस्था केली अशा शब्दात केले आहे.

महाराष्ट्राची भौगोलीक परिस्थिती

■ महाराष्ट्रातील 5 प्रादेशिक विभाग

1) कोकण : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड

2) पाश्चिम महाराष्ट्र : पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर

3) खानदेश/उत्तर महाराष्ट्र : जळगाव, नंदुरबार, धुळे. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

4) विदर्भ : नागपूर, चंदपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम

5) औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद

★ महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने:-

◆- ताडोबा - चंदपूर
◆- प्रियदर्शनी/पेंच - नागपूर
◆- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - बोरीवली, नवी मुंबई
◆- गुगामाल/मेळघाट - अमरावती
◆- नवेगाव बांध - गोंदिया
◆- सह्याद्री/चांदोली वाघ्र प्रकल्प - सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर

★ ● महाराष्ट्र जिल्हे निर्मिती :

● 1 मे 1981 :

◆ रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)

◆ औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

● 16 ऑगस्ट 1982 :

◆ उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),

● 26 ऑगस्ट 1982 :

◆ चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

● 1990 :

◆ मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

● 1 जुलै 1998 :

◆ धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)

◆ अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

● 1 मे 1999 :

◆ परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)

◆ भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)

● 1 ऑगस्ट 2014 :

◆ ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)

'एमपीएससी'ची याच वर्षी होणार परीक्षा... कधी ते नक्‍की वाचा 

युपीएससीसह अन्य परीक्षांच्या तारखा पाहून ठरेल वेळापत्रक 

राज्यातील दोन लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची (एमपीएससी) तयारी करीत आहेत. कोरोनामुळे दोनदा परीक्षांचे वेळापत्रक रद्द करावे लागले. तरीही आता 'युपीएससी'चे वेळापत्रक जाहीर झाले असून आणखी केंद्र व राज्य सरकारच्या अन्य कोणत्या विभागांच्या परीक्षा आहेत का, याचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार 'एमपीएससी'च्या परीक्षांचे वेळापत्रक निश्‍चित होईल. या वर्षात परीक्षा नक्‍की घेण्याच्यादृष्टीने तयारी सुरु आहे. 
- गीता कुलकर्णी, प्रभारी उपसचिव, एपीएससी, मुंबई 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्य सेवेची पूर्व परीक्षा 26 मार्चला घेण्याचे ठरविले होते. त्यानंतर पुन्हा वेळापत्रकात बदल करावा लागला. मात्र, आता 'युपीएससी'च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता परीक्षा केंद्रांची उपलब्धता अन्‌ केंद्र व राज्य शासनाच्या अन्य विभागांच्या परीक्षांच्या तारखांचा आढावा 'एमपीएससी'कडून घेतला जात आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केल्याने डिसेंबरपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होतील आणि काही दिवसांत वेळापत्रक जाहीर होईल, असे *'एमपीएससी'च्या प्रभारी उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सांगितले* . 

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होतील का, याबाबत संभ्रम आहे. तर दुसरीकडे राज्यातील परीक्षा केंद्रांची उपलब्धता आणि अन्य परीक्षांची आढावा घेऊन राज्य सेवेची पूर्व परीक्षा आणि पोलिस उपनिरीक्षक व मंत्रालयीन सहायक या पदांची परीक्षा घेण्याचे वेळापत्रक 'एमपीएससी'कडून निश्‍चित केले जात आहे. कोविड-19 च्या संशयित तथा बाधित रुग्णांसाठी राज्यातील बहूतांश महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. आता खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्स ठेवावा लागणार असल्याने जास्तीत जास्त इमारती तथा वर्ग खोल्यांची गरज लागणार आहे. तर दुसरीकडे बहूतांश विद्यार्थी युपीएससी, एमपीएससीसह राज्य शासनाच्या विविध परीक्षांची तयारी करीत असतात. त्यामुळे त्या परीक्षांच्या तारखा सोडून परीक्षा कोणत्यावेळी घेणे विद्यार्थ्यांसह 'एमपीएससी'ला सोयीस्कर होईल, पुरेशा प्रमाणात परीक्षक उपलब्ध होतील का, याचे नियोजन सुरु झाले आहे. तर दुसरीकडे जिल्हाबंदीचा परीक्षांवर काही परिणाम होईल का, याचीही स्थिती जाणून घेतली जात आहे. दरम्यान, डिसेंबरपर्यंत निश्‍चितपणे 'एमपीएससी'ची परीक्षा घेतली जाईल, असा विश्‍वासही उपसचिव कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्‍त केला.

१४ जून २०२०

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन

▫️   यांचा जन्म स्कॉटलंडमधील डुंबार्टशायर येथे ६ ऑक्टोबर, इ.स. १७७९ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण एडिनबरो येथील रॉयल हायस्कूलमध्ये झाले.

▫️शिक्षण पूर्ण झाल्यांनतर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीला लागले. तिथे त्यांचे काका संचालक होते.

▫️ इ.स. १७९६ साली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना भारतात कोलकाता येथे दुय्यम पदावर नियुक्त केले.  बनारसचे (आताचे वाराणसी) मॅजिस्ट्रेट डेव्हिसयाचा सहाय्यक  म्हणून त्यांनी काम केले. 

▫️ इ.स. १७९९ मध्ये कंपनी सरकारने   अवधचा नवाब वाजीर अली खान   याला पदच्युत केल्याने तिथे दंगल उसळली व त्यात ब्रिटिश लोकांची कत्तल करण्यास सुरु झाली यातून एल्फिन्स्टन वाचले.

▫️इ.स. १८०१ मध्ये पुणे येथील दुसऱ्या बाजीराव पेशवेच्या दरबारातील ब्रिटीश रेसिडेंट बॅरी क्लोज याचा सहाय्यक म्हणून एल्फिन्स्टन यांची नेमणूक झाली.

भूगोल प्रश्नसंच

महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?

A]  200.60 लाख हेक्टर

B] 207.60 लाख हेक्टर

C]  307.70 लाख हेक्टर✔️

D]  318.60 लाख हेक्टर


कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__________ कि.मी. ने कमी झाले.

A] 513✔️

B]  213

C]  102

D]  302

खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?

A]  तेरणा

B] प्रवरा

C] मांजरा

D]  भातसा✔️


___________ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.

A]  कांडला

B] कोची

C]  मांडवी

D] वरीलपैकी नाही

जागतिक वारसा शिल्पस्थानात _________ या लेणीची नोंद केलेली आहे.

A]  अजंठा लेणी✔️

B] कार्ले लेणी

C] पितळखोरा लेणी

D] बेडसा लेणी

गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

A]  अकोला   

B]  बुलढाणा

C] धुळे✔️

D] ठाणे

2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात ____________ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.

A] नाशिक

B] औरंगाबाद

C] पुणे✔️

D] सोलापूर


महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?

A] सह्याद्रि पर्वत✔️

B]  सातपुडा पर्वत

C] निलगिरी पर्वत

D]  अरवली पर्वत


महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _________ नावाने ओळखली जाते.

A] सायरस

B]  ध्रुव

C]  पूर्णिमा

D] अप्सरा ✔️


महाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे _________ जिल्ह्यात आहे.  

A]  अमरावती व अकोला

B] नांदेड व परभणी

C] हिंगोली व वाशिम

D] यवतमाळ वे रत्नागिरी✔️

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...