१८ जून २०२०

शब्दसिद्धी

शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात.       

शब्दांचे दोन प्रकार आहेत.      

१) सिद्ध शब्द  

२) साधित शब्द       

🌷🌷१) सिद्ध शब्द :-        

शब्द जसा आहे तसाच त्याचा भाषेत उपयोग केला म्हणजे त्या शब्दाला सिद्ध शब्द म्हणतात.      

सिद्ध, साधित, उपसर्ग, प्रत्यय जा, ये, कर, बस, बोल, पी यासारखे मूळ धातू किंवा शब्द भाषेत असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात.           

उदा.

ये, जा, पी, उठ, कर, गा इ.            

🌷🌷सिद्ध शब्दांचे चार प्रकार पडतात पुढीलप्रमाणे :-🌷🌷   

अ) तत्सम शब्द -          

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द' असे म्हणतात. 

उदाहरणार्थ           

कवि, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, पुरुष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, पुष्प, जल, प्रीती, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्यवान, भगवान, परंतु, यद्यपि, यथामती, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, अग्नी, नदी, कमल इत्यादी       

🌷🌷आ) तद्भव शब्द -    

जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना ' तद्भव शब्द' असे म्हणतात.

उदाहरणार्थ  

कान, चाक, आग, पान, विनंती, घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दुध, घास, कोवळा, ओठ, घाम, काम, इत्यादी     

🌷🌷इ) देशी किंवा देशज शब्द -     

महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.    

उदाहरणार्थ       

झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजरी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकुण, कंबर इत्यादी. 

🌷🌷ई) परभाषीय शब्द –  

संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना 'परभाषीय शब्द' असे म्हणतात.

याचे दोन उपप्रकार पडतात.      

अ. परकीय किंवा विदेशी शब्द  

ब. स्वदेशी शब्द (परप्रांतीय भारतीय शब्द)

🌷🌷अ) परकीय किंवा विदेशी शब्द

🌿इंग्रजी शब्द –       

टेबल, पेपर, मार्क, नंबर, टीचर, सर, म्याडम, ऑफीस, ट्रेन, रेल्वे, बस, टिकीट, इयव्हर, मोटर, कडक्टर, स्टेशन, पोस्ट, कार्ड, पार्सल, नर्स, डॉक्टर, पेशंट, इंजेक्शन, हॉस्पिटल, शर्ट, पैंट, बटन, बट, बॉल, ड्रेस, ग्लास इत्यादी. 

🌿पोर्तुगीज शब्द –     

बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरे, कोबी, हापूस, फणस इत्यादी. 

🌿फारसी शब्द –      

खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडणवीस इत्यादी.                

🌿अरबी शब्द –

अर्ज, इनाम, हुकूम, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, वाद, मदत, बदल इत्यादी   

🌷🌷ब. स्वदेशी शब्द ( परप्रांतीय भारतीय शब्द ) 

🌿कानडी शब्द –    

तूप, कुंची, हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ इत्यादी    

🌿गुजराती शब्द –   

घी, दादर, शेट, दलाल, डबा, रिकामटेकडा इत्यादी     

🌿तामिळी शब्द –

चिल्लीपिल्ली, सार, मठ्ठा इत्यादी    

🌿तेलगु शब्द –

ताळा, शिकेकाई, अनरसा, किडूकमिडूक, बंडी, डबी इत्यादी

🌷🌷साधित शब्द 🌷🌷

सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून 'साधित शब्द' तयार होतो.          

कर यासारख्या सिद्ध धातूपासून करू, करून, कर्ता, करणारा, होकार, प्रतिकार, यासारखे शब्द बनवितात त्यांना साधित शब्द असे म्हणतात.               

साधित शब्दांचे पुढील चार प्रकार पडतात. 

🌷अ) उपसर्गघटित :- 

मूळ शब्दाच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही साधित शब्द बनवितात. या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात.  

शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना 'उपसर्ग घटित शब्द' असे म्हणतात.  

शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्गघटीत शब्द असे म्हणतात. 

उदाहरणार्थ  

आ + हार = आहार, याचप्रमाणे विहार, परिहार, विहार, अपहार, संहार, उपहार, प्रहार, उपाहार इत्यादी  

🌷🌷ब) प्रत्ययघटित शब्द :-      

प्रत्ययघटीत शब्द शब्दांच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात.  

धातूच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्‍या शब्दांना 'प्रत्ययघटित शब्द' असे म्हणतात.

जन या धातूला प्रत्यय लागून जनन, जननी, जनता, जन्य यासारखे शब्द बनतात. या शब्दात न,क,ता,नी,य हे प्रत्यय होत. अशा त-हेचे प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना प्रत्ययघटीत शब्द असे म्हणतात.        

उदा.  

जनन, जनक, जननी, जनता, झोपाळू, ओढा  
      

आजची प्रश्नमंजुषा


🟣 : ब्रिटीश गव्हर्नर जनरल 'मॉडर्न इंडिया मेकर' म्हणून ओळखले जातात?

1⃣ लॉर्ड कॅनिंग
2⃣ लॉर्ड डलहौसी✅✅✅
3⃣ लॉर्ड कर्झन
4⃣ लॉर्ड माउंटबॅटन

___________________________
🟤 भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते?

1⃣ मौलाना अबुल कलाम
2⃣ एम. ए. जिन्ना
3⃣ बद्रुद्दीन तायबजी✅✅✅
4⃣ रहीमतुल्ला एम सयानी

___________________________
🔴 पुढीलपैकी कोणत्या वर्षात ब्रिटीश कारभाराची राजधानी कलकत्ता ते
दिल्ली येथे स्थानांतरित झाली?

1⃣ 1911✅✅✅
2⃣ 1857
3⃣ 1905
4⃣ 1919

___________________________
🟠 खालीलपैकी कोणते कार्यक्रम-वर्ष संयोजन चुकीचे आहे?

1⃣ चौरी चौरा - 1922
2⃣ भारत सोडा - 1942
3⃣ दांडी मार्च - 1931✅✅✅
4⃣ बंगालचे विभाजन - 1905

___________________________
🟢भारत स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.?

1⃣ जवाहरलाल नेहरू
2⃣ राजेंद्र प्रसाद
3⃣ सी राजगोपालाचारी
4⃣ जे.बी.कृपलानी✅✅✅

___________________________

भूगोल प्रश्नसंच

🔹महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?

A. 200.60 लाख हेक्टर
B. 207.60 लाख हेक्टर
C. 307.70 लाख हेक्टर✔️✔️
D. 318.60 लाख हेक्टर

🔹कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__________ कि.मी. ने कमी झाले.

A. 513 ✔️✔️
B. 213
C. 102
D. 302

🔹 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?

A. तेरणा
B. प्रवरा
C. मांजरा
D. भातसा ✔️✔️

🔹___________ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.

A. कांडला ✔️✔️
B. कोची
C. मांडवी
D. वरीलपैकी नाही

🔹जागतिक वारसा शिल्पस्थानात _____ या लेणीची नोंद केलेली आहे.

A. अजंठा लेणी ✔️✔️
B. कार्ले लेणी
C. पितळखोरा लेणी
D. बेडसा लेणी

🔹खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?

A. आंध्र प्रदेश ✔️✔️
B. महाराष्ट्
C. मध्य प्रदेश
D. गुजरात

🔹गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

A. अकोला
B. बुलढाणा
C. धुळे ✔️✔️
D. ठाणे

🔹2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात ________ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.

A. नाशिक
B. औरंगाबाद
C. पुणे ✔️✔️
D. सोलापूर

🔹महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?

A. सह्याद्रि पर्वत ✔️✔️
B. सातपुडा पर्वत
C. निलगिरी पर्वत
D. अरवली पर्वत

🔹महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _____ नावाने ओळखली जाते.

A. सायरस
B. ध्रुव
C. पूर्णिमा
D. अप्सरा✔️✔️

____________________________________

वाचा :- 20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

● आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार समजला जातो?
: रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड

● वायूच्या वितरणासाठी भारतातले पहिले व्यापार मंच कोणत्या मंडळाने तयार केले?
: इंडियन एनर्जी एक्सचेंज

● SAUNI योजना कोणत्या राज्यात राबविली जात आहे?
: गुजरात

● वृद्ध लोकांसोबत गैरवर्तन विषयक जागतिक जागृती दिनाची यंदाची (2020) संकल्पना काय होती?
: “लिफ्टिंग अप व्हॉईसेस”

● भारतीय निर्यात-आयात बँकेनी (EXIM बँक) कोणत्या देशाला 215.68 दशलक्ष डॉलर इतक्या पतमर्यादेची (LOC) घोषणा केली?
: मलावी (आफ्रिका)

● संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘कुटुंबाला रक्कम पाठवणे विषयी आंतरराष्ट्रीय दिन’ कधी पाळला जातो?
: 16 जून

● कोणत्या देशात “SIPRI ईयरबुक 2020” हा अहवाल प्रकाशित करणारी संस्था आहे?
: स्वीडन

● यंदाची (2020) ‘जागतिक बालमजुरी विरोधी दिन’ची संकल्पना काय होती?
: कोविड-19: प्रोटेक्ट चिल्ड्रेन फ्रॉम चाइल्ड लेबर, नाऊ मोअर दॅन एव्हर

● ‘IoT: ड्राईव्हिंग द पेटंट ग्रोथ स्टोरी इन इंडिया’ ही शीर्षक असलेला अहवाल कोणत्या संस्थेनी प्रकाशित केला?
:  राष्ट्रीय सॉफ्टवेयर व सेवा कंपनी संघ (NASSCOM)

● यंदा (2020) जागतिक खाद्यान्न सुरक्षा दिनाची संकल्पना काय आहे?
: फूड सेफ्टी, एव्रीवन्स बिझनेस

● ‘EY वर्ल्ड एंत्रेप्रेन्योर ऑफ द इयर 2020’ हा सन्मान कोणाला दिला गेला?
: किरण मजुमदार शॉ

● मातृत्व वय, मातामृत्यू दर याच्या संबंधित बाबी तपासण्यासाठी नेमलेल्या कृती दलाचे अध्यक्ष कोण आहेत?
:  जया जेटली

● BAFTA (ब्रिटीश अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स) या संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?
:  कृष्णेन्दु मजुमदार

● देशात ‘डीप स्पेस ग्राउंड स्टेशन’ उभारण्यासाठी NASA संस्थेसोबत कोणत्या देशाने भागीदारी केली?
: दक्षिण आफ्रिका

● स्वदेशी “नासॉफरेन्जियल” (NP) स्वॅब कोणत्या संस्थेनी विकसित केले?
: राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा

● डिसेंबर 2020 या महिन्यात त्याचा ‘K-FON’ नावाचा निशुल्क इंटरनेट प्रकल्प कोणते राज्य कार्यरत करणार आहे?
: केरळ

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

भारतातील महत्वाचे धबधबे

१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.

२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी

३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी

४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी

५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी

६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी

७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी

८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी

पोलीस भरती प्रश्नसंच

1. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?
उत्तर : भारत

2. कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?
उत्तर : चीन

3. अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?
उत्तर : निक्सन

4. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते?
उत्तर : माद्री

5. मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात?
उत्तर : मजलीस

6. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासीक नाव आहे?
उत्तर : ओडिसा

7. तुर्की या देशाची राजधानी कोणती?
उत्तर : अंकारा

8. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?
उत्तर : खरगपूर

9. डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?
उत्तर : अल्फ्रेड नोबेल

10. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?
उत्तर : रेडक्लिफ रेष

11. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?
उत्तर : बाळ गंगाधर टिळक

12. पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?
उत्तर : 14 नोव्हेंबर

13. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : पुणे

14. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
उत्तर : नागपूर

15. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात कोठे आढळतात?
उत्तर : विदर्भ

16. कोकण भागात…...या प्रकारची मृदा आढळते
उत्तर : जांभी

डब्ल्यू टी ओ

🅾डब्ल्यूटीओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था, मंत्री परिषद ही सहसा दर दोन वर्षांनी भेटते. हे डब्ल्यूटीओच्या सर्व सदस्यांना एकत्र आणते, हे सर्व देश किंवा सीमाशुल्क संघटना आहेत.

🅾 मंत्री परिषद कोणत्याही बहुपक्षीय व्यापार करारा अंतर्गत सर्व बाबींवर निर्णय घेऊ शकते. सिंगापूरमधील उद्घाटन मंत्री परिषद आणि  मध्ये कॅनकन कॉन्फरन्ससारख्या काही बैठकींमध्ये  विकसनशील आणि विकसनशील अर्थव्यवस्था यांच्यातयुक्तिवादाचा समावेश होता ज्यांना कृषी अनुदानासारख्या " सिंगापूरचे मुद्दे " असे संबोधले जाते  1999 in मध्ये सिएटलकॉन्फरन्ससारख्या इतरांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली.

🅾 द चौथ्या सेवा परिषद मध्ये दोहा 2001 मध्ये जागतिक व्यापार संघटना चीन च्या नोंद मंजूर आणि सुरू दोहा विकास फेरी करून यावेत होते जे सहाव्या जागतिक व्यापार संघटना सेवा परिषद (मध्ये हाँगकाँग ) कृषी निर्यात अनुदान टप्प्याटप्प्याने आणि अवलंब मान्य जे युरोपियन युनियन च्या सर्व काही परंतु कमीतकमी विकसनशील देशांकडून आलेल्या वस्तूंच्या शुल्कासाठी शस्त्रास्त्रांचा पुढाकार.

🅾बारावा मंत्रालयीन परिषद (MC12) मध्ये आयोजित करण्यात सेट आहे नूर-सुलतान , कझाकस्तान जून 2020 पर्यंत.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

‘IMD वर्ल्ड कॉम्पटेटिवनेस इंडेक्स 2020’ यामध्ये भारताचा 43 वा क्रमांक.


🅾इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) या संस्थेनी त्यांचा ‘वर्ल्ड कॉम्पटेटिवनेस इंडेक्स 2020’ या शीर्षकाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात 63 अर्थव्यवस्थांच्या कामगिरीबद्दल स्पष्टता दिली गेली आहे.

🅾कमकुवत पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रात अपर्याप्त गुंतवणूक यासारख्या काही परंपरागत धोरणांमुळे भारताला “जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2020” या क्रमवारीत 43 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.

🅾भारतासाठी, दीर्घकालीन रोजगारात वाढ, चालू खात्यातली शिल्लक, उच्च तंत्रज्ञानाची निर्यात, परकीय चलन साठा, शिक्षणावरील सार्वजनिक खर्च, राजकीय स्थैर्य आणि एकूणच उत्पादकता या क्षेत्रांमध्ये सुधारणा नोंदविण्यात आल्या आहेत. तथापि, विनिमय दर स्थिरता, वास्तविक GDP वृद्धी, स्पर्धात्मक कायदे आणि कर यासारख्या क्षेत्रात स्थिती कमकुवत झाली आहे.

🧩इतर ठळक बाबी...

🅾या 63 अर्थव्यवस्थांच्या यादीत सिंगापूर या देशाने पहिले स्थान कायम राखले आहे.

🅾सिंगापूरच्या यशामागील घटक म्हणजे त्याची मजबूत आर्थिक कामगिरी जी भक्कम आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक, रोजगार आणि कामगार बाजारपेठेच्या उपायांमुळे उद्भवते.

🅾शिक्षण प्रणाली आणि दूरसंचार, इंटरनेट बँडविड्थ वेग आणि उच्च तंत्रज्ञानाची निर्यात यासारख्या तंत्रज्ञानात्मक पायाभूत सुविधांमधील स्थिर कामगिरी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

🅾सिंगापूरच्या पाठोपाठ अनुक्रमे द्वितीय ते पाचव्या क्रमांकावर, डेन्मार्क, स्वित्झर्लँड, नेदरलँड्स आणि हाँगकाँग SAR या देशांचा क्रम लागतो आहे.

🅾मध्य-पूर्व प्रदेश तेलाच्या संकटामुळे नकारात्मकपणे प्रभावित झाले आहे.
BRICS देशांमध्ये चीननंतर भारत द्वितीय क्रमांकावर आहे. त्यानंतर जागतिक यादीत रशिया 50 वा, ब्राझील 56 वा आणि दक्षिण आफ्रिका 59 व्या क्रमांकावर आहे.

🅾सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या ASEAN देशांमध्ये केवळ सिंगापूर आणि थायलंड या देशांची आरोग्यासेवा संबंधी पायाभूत सुविधांच्या परिणामकारकतेत सकारात्मक कामगिरी आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा संयुक्त ‘विज्ञान दळणवळण मंच’.

🅾कार्यक्रम आणि विज्ञान संप्रेषण केंद्रित उपक्रमांच्या समन्वयासाठी कार्य करते. ही परिषद विज्ञान समजून घेणे आणि लोकांमध्ये विज्ञानाची रूची वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशभरात कार्यक्रम आयोजित करणे, देशातील विज्ञान संप्रेषण आणि विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी धोरणे आणि इतर क्रियाकलापांचे आयोजन करण्याची देखील जबाबदारी आहे.

🧩पार्श्वभूम..

🅾विज्ञान दळणवळणासाठी भारताची मजबूत संघटनात्मक रचना आहे. विज्ञान दळणवळणाच्या विकासासाठी कमीतकमी पाच राष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत - राष्ट्रीय विज्ञान दळणवळण आणि सूचना स्रोत संस्था (1951), होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (1974),  राष्ट्रीय विज्ञान वस्तुसंग्रहालय परिषद (1978), राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दळणवळण परिषद (1982), आणि विज्ञान प्रसार (1989).

🅾याव्यतिरिक्त, विविध वैज्ञानिक संस्थांचे त्यांचे विज्ञान दळणवळण विभाग आहेत. यामध्ये विज्ञान प्रसार एकक (CSIR), कृषी ज्ञान व्यवस्थापन संचालनालय (ICAR), प्रकाशने व माहिती विभाग (ICMR), जनसंपर्क संचालनालय (DRDO), जन जागरूकता विभाग (DAE), मीडिया आणि जनसंपर्क कार्यालय (ISRO), विज्ञान कक्ष, आकाशवाणी इत्यादीचा समावेश आहे.

🅾या संस्था विज्ञान दळणवळणात हातभार लावण्यासाठी आणि त्यांचे मत लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध पद्धती आणि माध्यमांचा उपयोग करीत आहेत. तथापि, सामान्य धोरणे विकसित करण्यासाठी आणि व्यापक स्तरावर सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी संवाद आणि एकत्रीकरणासाठी यामध्ये पुरेसा वाव आहे. देशव्यापी कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करणे आवश्यक आहे. त्यातून राष्ट्रीय विज्ञान दळणवळण आराखडा उभा होऊ शकतो.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

महाराष्ट्रातील अभयारण्ये.

🅾नरनाळा - अकोला
🅾टिपेश्वर -यवतमाळ 
🅾येडशी रामलिंग - उस्मानाबाद
🅾अनेर - धुळे, नंदुरबार
🅾अंधेरी - चंद्रपूर

🅾औट्रमघाट - जळगांव
🅾कर्नाळा - रायगड
🅾कळसूबाई - अहमदनगर
🅾काटेपूर्णा - अकोला
🅾किनवट - नांदेड,यवतमाळ

🅾कोयना - सातारा
🅾कोळकाज - अमरावती
🅾गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
🅾चांदोली - सांगली, कोल्हापूर
🅾चपराला - गडचिरोली

🅾जायकवाडी - औरंगाबाद
🅾ढाकणा कोळकाज - अमरावती
🅾ताडोबा - चंद्रपूर
🅾तानसा - ठाणे
🅾देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर

🅾नवेगांव - भंडारा
🅾नागझिरा - भंडारा
🅾नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
🅾नानज - सोलापूर
🅾पेंच - नागपूर

🅾पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
🅾फणसाड - रायगड
🅾बोर - वर्धा
🅾बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
🅾भिमाशंकर - पुणे, ठाणे

🅾मालवण - सिंधुदुर्ग
🅾माळढोक - अहमदनगर, सोलापूर
🅾माहीम - मुंबई
🅾मुळा-मुठा - पुणे
🅾मेळघाट - अमरावती

🅾यावल - जळगांव
🅾राधानगरी - कोल्हापूर
🅾रेहेकुरी - अहमदनगर
🅾सागरेश्वर - सांगली

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

१७ जून २०२०

आता भारत-जपान मिळून चंद्रावर जाणार, जाक्साने जाहीर केला कार्यक्रम.


◾️या मोहिमेतंर्गत लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरवण्याचे उद्दिष्टय आहे.

◾️जपानची अवकाश संशोधन संस्था जाक्साने ही माहिती दिली आहे.

◾️मागच्यावर्षी चांद्रयान-२ मोहिमेत भारताला फक्त लँडिंगमध्ये अपयश आले होते.

◾️विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. ते अपयश मागे सोडून भारत आता जपानच्या साथीने पुन्हा चंद्रावर झेप घेणार आहे.

◾️भारत आणि जपानची ही संयुक्त चंद्र मोहिम २०२३ नंतर पार पडणार आहे.

◾️भारताने सध्या ‘मिशन गगनयान’ या मानवी अवकाश मोहिमेकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

◾️२०२२ मध्ये भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आहे. लँडिंग मॉडयुल आणि👍 रोव्हरची निर्मिती जाक्सा करेल तर इस्रो लँडरची सिस्टिम बनवेल. जपानमधून या यानाचे उड्डाण होणार असून एच ३ रॉकेटमधून हे यान चंद्राच्या दिशेने झेपावेल.


 

मुद्रा (चलन).


🅾चलन पैसे किंवा पैशाचे स्वरूप आहे जे रोजच्या जीवनात खरेदी आणि विक्री करते. यात नाणी व कागदी नोट्स दोन्ही आहेत. एखाद्या देशात सामान्यतः वापरलेले चलन त्या देशाच्या सरकारी यंत्रणेद्वारे तयार केले जाते. 

🧩उदाहरणार्थ,:- भारतीय रुपया आणि पैसा विनिमय.

🅾आम्ही करतो त्या आधारे आपण चलनाबद्दल बोलू शकतो. सामान्यत: आम्ही चलनाच्या कामांमध्ये विनिमय करण्याचे माध्यम, मूल्याचे मोजमाप आणि पैसे जमा करणे आणि डिफर्ड पेमेंट्सचे मूल्य इ. समाविष्ट करतो. विविध अर्थशास्त्रज्ञांनी चलन काय करते त्या आधारावर परिभाषित केले आहे. 

🅾चलनमध्ये सामान्य स्वीकृतीची मालमत्ता असणे फार महत्वाचे आहे, जर एखाद्या वस्तूमध्ये सामान्य स्वीकृतीचे वैशिष्ट्य नसते तर त्या वस्तूला चलन म्हटले जाऊ शकत नाही. अशा प्रकारे चलन म्हणजे कोणतीही वस्तू जी नियमन, मूल्य मोजणे, संपत्ती साठवणे आणि सर्वसाधारणपणे कर्जे भरण्याचे माध्यम म्हणून स्वीकारली जाऊ शकते.

कागदी चलन.

🅾कागदी चलन हे नियंत्रित चलनव्यवस्थेखाली काढले जाते. मध्यवर्ती बॅंक कागदी नोटा प्रचारात आणते व कागदी चलनाला आधार म्हणून चलनाला काही टक्के भाग सुवर्णाच्या स्वरूपात आपल्या खजिन्यात ठेवते. प्रातिनिधिक कागदी चलन असले, तर जेवढ्या कागदी नोटा असतील तेवढ्याच किमतीचे सोने आधार म्हणून ठेवावे लागते. कागदी चलनाचे रूपांतर सुवर्णात करता येते.

🅾प्रमाणित निधिपद्धती असेल, तर एकूण कागदी चलनाच्या काही विशिष्ट प्रमाणात सुवर्णनिधी ठेवावा लागतो. वेळोवेळी कायद्याने हे प्रमाण ठराविले जाते. मर्यादित विश्वासनिधि-पद्धती अस्तित्वात असेल, तर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत चलनास सोन्याचा आधार द्यावा लागत नाही. मात्र त्या मर्यादेपेक्षा अधिक कागदी चलन काढावयाचे असेल, तर तितक्याच किमतीचे सोने मध्यवर्ती बॅंकेत वा सरकारी तिजोरीत ठेवावे लागते.

🅾आज बहुतेक देशांनी अपरिवर्तनीय कागदी चलनपद्धतीचा अवलंब केला आहे. अशा पद्धतीत कागदी चलनाचे धातूत रूपांतर करून मिळत नाही. लोकांचा सरकारवर जो विश्वास असतो, त्या आधारावर ही पद्धती टिकून राहते. चलननिर्मितीवर योग्य ते नियंत्रण ठेवले, तर किमती स्थिर राहतात व चलनव्यवहार सुरळीतपणे पार पडू शकतात .

चलनवाढीचे परिणाम.

1) अर्थव्यवस्थेत परिणाम
1) उद्योग - चलनवाढीचा काळ म्हणजे सुगीचा काळ
ii) गुंतवणूक - वाढते (देशी+परकीय गुंतवणूकीला चालना)
i) रोजगार निर्मीती - वाढते (बेरोजगारी कमी होते)
iv) करवसूली - बाढते
v) बचत - कमी होते (गुंतवणूकीत वाढ झाल्याने)
vi) व्याजदर - वाढते

खर्चदाबजन्य/पुरवठा कमी करणारी कारणे.

1. कृषी उत्पादनातील चढ-उतार
2. अपुरी औद्योगिक वाट
3. औद्योगिक कलह
4. नैसर्गिक संकटे
5. निर्यातीत वाढ
6. अपुन्या पायाभूत सुविधा
7. सट्टेबाजी व साठेबाजी
8. घटत्या फलाचा सिद्धांत

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...