०३ जून २०२०

लोकसभा

🧩लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती:

🅾लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आली आहे.

🧩सभासदांची संख्या :

🅾घटनेच्या 81 व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. 1974 च्या 31 व्या घटनादुरुस्तीनुसार घटकराज्यांच्या सभासदांची संख्या 525 तर केंद्रशासीत प्रदेशांची सभासद संख्या 20 इतकी करण्यात आली आहे. परंतु लोकसभेत जास्तीत जास्त 552 इतके सभासद सांगितले आहेत. त्यामध्ये 530 घटकराज्य. 20 केंद्रशासीत प्रदेश आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही तर दोन सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. भारतीयलोकप्रतींनिधी कायदा 1951 नुसार पाच ते साडेसात लाख मतदारांमागे एक लोकसभेचा उमेदवार निवडला जातो.

🧩मतदारसंघ निर्धारण आयोग :

🅾या आयोगाची निर्मिती 1972 साली करण्यात आली. त्या आयोगाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश असतो.

🧩उमेदवारांची पात्रता :

घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावीत.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

🧩निवडणूक पद्धत :

🅾लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते. ती निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली होते.

🧩लोकसभेचा कार्यकाल :

🅾पाच वर्ष इतका आहे परंतु तो कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. आणीबाणीच्या कालखंडात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच एका वर्षासाठी 83/2 कलमानुसार वाढवू शकतो.

🧩सभासदांचा कार्यकाल :

🅾प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 5 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतींकडे देऊ शकतो.

🧩बैठक किंवा अधिवेशन :

🅾घटनेच्या 85 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची वाटेल त्या वेळी अधिवेशन बोलवितो परंतु दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

🧩गणसंख्या :

🅾कोणत्याही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.

🧩पदमुक्तता :

🅾कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)

🧩लोकसभेचा सभापती कार्य आणि अधिकार :

🅾लोकसभेत निवडून आलेल्या एका सदस्याची सभापती म्हणून व दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून लोकसभेतील सदस्यांकडून निवड केली जाते.

🧩कार्य :

1. धनविधेयक आहे की नाही हे ठरविणे.
2. प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्यास परवानगी देणे.
3. प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे.
4. कमरोको प्रस्ताव आणण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक आहे.
5. सभागृहात शांतता व सुव्यवस्था राखणे.
6. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी पुरेशी गणसंख्या नसेल तर कामकाज थांबविणे.
7. राष्ट्रपतीने दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलविल्यास अध्यक्षपद भूषविणे.
8. सामान्य उद्देश समिती, नियम समिती व कार्यवाही समितीचा सभापती पदसिद्ध अध्यक्ष असतो.

🦋 🦋 🦋  🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋  🦋

०१ जून २०२०

अमेरिकेने WHO सोबतचे तोडले सर्व संबंध.

🔰सध्या जगभरातल करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत अनेक देश या संकटाचा सामना करत आहेत.

🔰तरदुसरीकडे या संकटाला चीन जबाबदार असल्याचं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर हल्लाबोल केला होता.

🔰तर त्यातच जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या हातची बाहुली असल्याचं म्हणत त्यांनी संघटनेसोबत सर्व संबंध तोडण्याचाही इशारा दिला होता.

🔰दरम्यान, शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेसोबत असलेले सर्व संबंध तोडत असल्याची घोषणा केली.

🔰तसेच ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी करोना व्हायरसच्या संकटात योग्यरित्या काम न केल्याचा ठपका ठेवत जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा निर्णय घेतला होता.

🔰तर जोवर करोनाचा प्रसार कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेची समिक्षा केली जात नाही तोवर हा निधी थांबवण्यात येणार असल्याचं ट्रम्प म्हणाले होते. तसंच त्यांनी जागति आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा इशाराही दिला होता.

वाक्याचे प्रकार

मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

1. अर्थावरून पडणारे प्रकार

2. स्वरूपावरुण पडणारे प्रकार / वाक्यात असणार्‍या विधांनांच्या संखेवरून पडणारे प्रकार

🌷🌷🌿🌿🌷🌷🌿🌿🌷🌷🌿🌿

. 🌷🌷पडणारे प्रकार :🌷🌷

1. विधांनार्थी वाक्य – ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते अशा वाक्यास विधांनार्थी वाक्य म्हणतात .

उदा .1. मी आंबा खातो.

    2. गोपाल खूप काम करतो.

    3. ती पुस्तक वाचत
🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿

3. उद्गारार्थी वाक्य – ज्या वाक्यातून मनातील उत्कट भावना व्यक्त केल्या जातात त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. 1. अबब ! केवढा मोठा हा साप

     2. कोण ही गर्दी !

     3. शाब्बास ! UPSC पास झालास

🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿

4. होकारार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात .

उदा . 1. माला अभ्यास करायला आवडते.

      2. रमेश जेवण करत आहे.

      3. माला STI ची परीक्षा पास व्हयची आहे.
🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿

. नकारर्थी वाक्य – ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारर्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. 1. मी क्रिकेट खेळत नाही.

     2. माला कंटाळा आवडत नाही.

🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿

6. स्वार्थी वाक्य – ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. 1. मी चहा पितो.

     2. मी चहा पिला.

     3. मी चहा पिनार.
🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿

7. आज्ञार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. 1. तो दरवाजा बंद कर (आज्ञा)

     2. देव तुझे भले करो (आशीर्वाद)

     3. कृपया शांत बसा (विनंती)

     4. देवा माला पास कर (प्रार्थना)

     5. प्राणिमात्रांवर द्या करा (उपदेश)

🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿

8. विधार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून कर्तव्या, शक्यता, योग्यता,इच्छा ई. गोष्टीचा बोध होतो त्या वाक्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. 1. आई वडिलांची सेवा करावी (कर्तव्य)

    2. तू पास होशील असे वाटते (शक्यता)

    3. ते काम फक्त सचिनच करू शकतो (योग्यता)

    4. तू माझा सोबत यायला हवे असे माला वाटते (इच्छा)

🌿🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿

🍀🍀2. स्वरूपा वरुण पडणारे प्रकार :🍀🍀

1. केवळ वाक्य – ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य किवा शुद्ध वाक्य असे म्हणतात.

उदा. 1. राम आंबा खातो.

    2. संदीप क्रिकेट खेळतो.

🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀

2. संयुक्त वाक्य – जेव्हा वाक्यात दोन किवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वि अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.

उदा. 1.विजा चमकू लागल्या आणि पावसाळा सुरवात झाली.

     2.भारतात कला पैसा आला आणि बेकरी वाढली.

🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀

9. संकेतार्थी वाक्य – जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतर्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. 1. जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो.

    2. पाऊस पडला तर पीक चांगले येईल.

    3. गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता.

    4. जर काळे ढग झाले असते तर जोरदार पाऊस झाला असता.

🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷

3. मिश्र वाक्य – जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किवा अधिक गौणवाक्य उभयान्वि अव्यानि जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.

उदा.1. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला.

   2. तो शहरात गेला मम्हणून त्याला नोकरी मिळाली.

   3. रोहित शर्मा चांगला खेळला म्हणून भारत जिंकला आणि सर्वांना आनंद झाला. 

🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀

4. होकारार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात .

उदा . 1. माला अभ्यास करायला आवडते.
NB
      2. रमेश जेवण करत आहे.

      3. माला STI ची परीक्षा पास व्हयची आहे.

पोलीस भरती सराव प्रश्न

___________________________
🔴 १९३५ च्या कायद्याने-------% जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला.

१) ५
२) १०✅
३) १५
४) २०
___________________________
🟠 सांप्रदायिक निवडणुकीचे जनक असे कोणाला संबोधतात?

१) लॉर्ड कर्झन
२) लॉर्ड मिन्टो✅
३) मोंटेग्यु
४)  चेम्सफर्ड
___________________________
🟡 ---------- च्या चार्टर कायद्यानुसार नागरी सेवकांसाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येवू लागले

१) १८५८
२)  १८११
३) १८६१
४) १८३३ ✅
_______________________
🟢 १८३३ च्या चार्टर कायद्यानुसार बंगालच्या  गव्हर्नर  जनरल ला भारताचा  गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात आले भारताचे प्रथम गव्हर्नर  जनरल ----------------- हे होते


१) विल्यम बेंटिक ✅
२) वॉरन हेस्टीग्ज
३) रोबर्ट क्लाइव्ह
४) लॉर्ड कोर्नवालीस
___________________________
🔵 १७७३  च्या रेग्युलेटिंग  कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर ला गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात येवू लागले पहिले गव्हर्नर जनरल ------------- हे होते


१) विल्यम बेंन्टीक
२) वॉरन हेस्टीग्ज ✅
३) रोबर्ट क्लाइव्ह
४ लॉर्ड कोर्नवालीस
___________________________
🟣 भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?

१) मार्क्विस ऑफ हेस्टीग्ज ✔️✔️
२) लॉर्ड वेलस्ली
३) लॉर्ड मिंटो
४) लॉर्ड विल्यम बेंटिक
___________________________
⚫️ भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

१) वॉरन हेस्टींग्ज
२) विल्यम कॅरी
३) लॉर्ड विल्यम बेंटिक
४) चार्ल्स बॅबेज
५) लॉर्ड कॉर्नवालीस ✅
___________________________
⚪️ ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात
कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
१) रोबर्ट हुक
२) जॉन स्नोव
३) लॉर्ड कॉंर्नवालीस ✅
४) रॉबर्ट कोच
___________________________
🟤 भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात?
१)फ्रँकेल
२)लॉर्ड कर्झन
३) रिकेट्स
४) लॉर्ड कॉंर्नवालीस ✅
_______________________
🔴 भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?
१) एम.डब्लू.beijerinck1
२) लॉर्ड विल्यम बेंटीक ✅
३) जे.एच. वॉलकर
४)लॉर्ड मिंटो
_______________________

🦠 कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ साजरा केला जातो?

(A) 26 जानेवारी
(B) 24 जानेवारी
(C) 25 जानेवारी✅✅
(D) 22 जानेवारी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 2020 या वर्षासाठी कोणत्या देशाने ‘ग्रुप ऑफ 77’ या समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे?

(A) भारत
(B) गुयाना✅✅
(C) ट्युनिशिया
(D) अफगाणिस्तान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कोणती व्यक्ती 2020 या वर्षासाठी ‘दक्षिण आशियाच्या निवडणूक व्यवस्थापन मंडळाचा मंच’ (FEMBoSA) याचे अध्यक्ष आहेत?

(A) के. एम. नुरुल हुडा
(B) सुनील अरोरा✅✅
(C) सुशील चंद्र
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कोणत्या ठिकाणी सेवेसाठी प्राण्यांना समर्पित केलेले देशातले पहिले युद्ध स्मारक उभारण्यात येणार आहे?

(A) जम्मू
(B) लखनऊ
(C) पटना
(D) मेरठ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 निवडणूक-विषयक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने पापुआ न्यू गिनी आणि ____ या देशांसोबत सामंजस्य करार केला आहे.

(A) ट्युनिशिया✅✅
(B) श्रीलंका
(C) बांग्लादेश
(D) मालदीव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कोणत्या राज्याने कृषी व्यवसायांना मदत करण्यासाठी जागतिक बँकेसोबत 210 दशलक्ष डॉलरचा कर्ज करार केला?

(A) आसाम
(B) नवी दिल्ली
(C) मणीपूर
(D) महाराष्ट्र✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अर्थ व वाणिज्यविषयक घडामोडी .


🅾 चेन्नई हे शहर भारताचे ‘रिटेल कॅपिटल’ म्हणून ओळखले जाते..

🅾 स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली ११,१११ वी शाखा गुवाहाटी येथे सुरू केली..

🅾 जगातील सर्वाधिक आनंदी असणाऱ्या लोकांच्या यादीतील प्रथम क्रमांकाचा देश :-
डेन्मार्क..

🅾 दहाव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट :-
समता व सामाजिक न्यायसह
विकास..

🅾 अकराव्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक :-
वेगवान व सर्वसमावेशक वृद्धीकडे..

🅾 भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू करणारे राज्य :-
हरियाणा..

🅾 सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष :-
न्या. बी. एन. श्रीकृष्णन..

🅾 सर्वाधिक कर्जबाजारी असलेले राज्य :-
उत्तर प्रदेश..

🅾 केंद्र सरकारने मंजुरी दिलेले सर्वाधिक एसईझेड :-
आंध्र प्रदेश..

🅾 युनायटेड वेस्टर्न बँकेचे आयडीबीआय बँकेत विलीनीकरण झाले..

🅾 युटीआय बँकेचे अ‍ॅक्सीस बँक म्हणून नवीन नामकरण झाले..

भारताचे मानचिन्हे.


🅾 22 जुलै 1947 रोजी संविधानसभेने भारताच्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली व हा राष्ट्रध्वज 14 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आला..

🅾 राष्ट्रध्वजाचा आकार 3:2 या प्रमाणात असतो..

🅾 घटना समितीने 24 जानेवारी 1950 रोजी जन गण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली..

🅾 जन गण मन हे गीत गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी रचले आहे..

🅾 संविधान सभेने वंदेमातरम या गीतालासुद्धा राष्ट्रगीताचा दर्जा बहाल केला आहे..

🅾 वंदेमातरम हे प्रसिद्ध बंगाली कवी बकीमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून घेण्यात आले आहे..

🅾 भारताचे बोधचिन्ह सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहाच्या प्रतिकृतीवरून घेण्यात आले आहे..

🅾 या बोधचिन्हात मंडूकोपनिषदातील सत्यमेव जयते हे वाक्य अंतर्भूत करण्यात आले आहे..

🅾राष्ट्रीय नदी :- गंगा..

🅾राष्ट्रीय महाकाव्य :- गीता..

🅾राष्ट्रीय जलजीव :- गंगा डॉल्फिन..

🅾राष्ट्रीय फळ :- आंबा..

🅾राष्ट्रीय विरासत पशु :- हत्ती..

🅾राष्ट्रीय खेळ :- हॉकी..

🅾राष्ट्रीय वृक्ष :- वड..

🅾राष्ट्रीय पशु :- वाघ..

३१ मे २०२०

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची कार्ये.

🅾मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबतच्या तक्रारींची चौकशी करणे.

🅾 न्यायालयाकडे प्रलंबित असलेल्या मानवी हक्कांच्या कार्यवाहीमध्ये न्यायालयाच्या समतीने मध्यस्थी करणे.

🅾 मानवी हक्कांसंबधी कायद्यांनी केलेल्या संरक्षणाचा आढावा घेणे आणि ते अधिक परिणामकारक ठरावे यासाठी उपाययोजना करणे.

🅾दहशतवादासह सर्व घटकांचा आढावा घेणे आणि सुधारात्मक उपाय सुचविणे.

🅾 मानवी हक्कासंबंधी संशोधंनात्मक ग्रंथांचा आणि आंतरराष्ट्रीय दस्तऐवजांचा अभ्यास करणे आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी शिफारशी करणे .

🅾 समजाच्या विविध स्तरांमद्धे मानवी हक्कांसंबधी साक्षरतेचा प्रसार करणे.

🅾 मानवी हक्क क्षेत्रामध्ये कार्यरत बिगर सरकारी संघटना व संस्थांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे.

🅾 मानवी हक्कांच्या प्रचलंनासाठी त्याला आवश्यक वाटतील अशी इतर कार्ये करणे.

🧩चौकशीच्या संबंधातील अधिकार:

🅾या कायद्यानुसार तक्रारींची चौकशी करताना आयोगाला दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 खालील दिवाण्यांची चौकशी करण्यासाठी दिवाणी न्यायालयाला जे अधिकार असतात ते सर्व अधिकार असतील आणि विशेषत : पुढील प्रकारचे अधिकार असतील -

🅾 साक्षीदारांना उपस्थित राहण्यासाठी समन्स काढणे आणि त्यांची शपथेवर तपासणी करणे.

🅾 कोणतेही दस्तऐवज शोधून काढणे व सादर करणे.

🅾 शपथपत्रावरील पुरावा स्वीकारणे.

🅾 कोणत्याही न्यायालयातून किंवा कार्यालयातून कोणत्याही शासकीय अभिलेखाच्या प्रतीची मागणी करणे.

🅾 साक्षीदारांची किंवा दस्तऐवजाची तपासणी करण्यासाठी आदेश काढणे.

🅾जर आयोगास योग्य वाटत असेल तर त्या आयोगासमोर दाखल केलेली तक्रार ती राज्यात उद्भावली असेल त्या राज्याच्या राज्य आयोगाकडे हस्तांतरित करू शकेल .

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

भारतीय संविधान.


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

✅19 ते 25
      31 ते 35
      22 ते 24
      31 ते 51

2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

✅ राष्ट्रपती
      उपराष्ट्रपती
      पंतप्रधान
      राज्यप ल

3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

      राष्ट्रपती
      राज्यपाल
      पंतप्रधान
✅ सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती

4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?

✅11 डिसेंबर 1946
      29 ऑगस्ट 1947
      10 जानेवारी 1947
      9 डिसेंबर 1946

5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

      परिशिष्ट-1
      परिशिष्ट-2
✅परिशिष्ट-3
      परिशिष्ट-4

6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

✅47
      48
      52
      यापैकी नाह.

7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

      डॉ. आंबेडकर
✅डॉ. राजेंद्रप्रसाद
      पंडित नेहरू
      लॉर्ड माऊंटबॅटन

8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

      डॉ. राजेंद्रप्रसाद
✅डॉ. आंबेडकर
       महात्मा गांधी
       पंडित नेहरू

9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

      लोकसभा
      विधानसभा
✅ राज्यसभा
      विधानपरिषद

10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

✅लोकसभा सदस्य
      मंत्रीमंडळ
      राज्यसभा सदस्य
      राष्ट्रपती

11. लोकसभेची मुदत किती वर्ष असते?

      1.8 वर्षे
      6 वर्षे
      4 वर्षे
✅ 5 वर्षे

12. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

      राष्ट्रपती
      सभापती
      उपराष्ट्रपती
✅पंतप्रधान

13. खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?

      संरक्षण
      तार
      पोस्ट
✅ जमिनमहसूल

14. लहान मुलाला प्रथम नागरीकत्वाचे धडे ----- पासून मिळतात.

      कुटुंब
      शाळा
✅दोन्हीही
      मंदिर

15. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?

✅राष्ट्रपती
     उपराष्ट्रपती
     पंतप्रधान
     सरन्यायधीश

16. भारतात कोणत्या प्रकारातील शासनप्रणाली आहे?

       लष्करी
      अध्यक्षीय
      हुकूमशाही
✅संसदीय

17. राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात?

      18
✅ 12
      16
      20

18. राज्यघटनेमध्ये एकूण सूची किती?
       2
       1
  ✅3
       4

19. योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

      राष्ट्रपती
      उपराष्ट्रपती
✅ पंतप्रधान
      अर्थमंत्री

20. राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी किती वर्षे असतो?

      4 वर्षे
      5 वर्षे
✅ 6 वर्षे
      कायमस्वरूपी

🦋 🦋 🦋  🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋  🦋

अंतरराज्यीय व्यापार, वाणिज्य आणि संचार.


🅾तरतूद :- भाग १२ मधील कलम ३०१ ते ३०७

🅾कलम ३०१ अन्वये भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र व्यापार, वाणिज्य आणि संचार यांचे स्वातंत्र्य असेल. हे मुक्त असे स्वातंत्र्य आहे मात्र या स्वातंत्र्यावर कलम ३०२ ते ३०५ अन्वये काही बंधने घालण्यात आलेली आहेत.

🅾कलम ३०२ अन्वये संसदेला कायद्याद्वारे राज्याराज्यातील किंवा देशातील राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालता येतील. मात्र संसद एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देऊ शकत नाही किंवा त्यात भेदभाव करू शकत नाही. मात्र एखाद्या भागातील टंचाईच्या परिस्थितीचा त्याला अपवाद आहे. उदा. संसदेने १९५५ साली पारित केलेला 'अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५'.

🅾कलम ३०३ अन्वये संसद किंवा राज्य विधीमंडळाला ७ व्या परिशिष्टातील कोणत्याही व्यापार किंवा वाणिज्याशी संबंधित विषयाच्या आधारे, एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देणारा किंवा राज्याराज्यात भेदभाव करणारा किंवा तसे प्राधिकृत करणारा कायदा करता येणार नाही. मात्र माल टंचाईतून उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असल्यास असा भेदभावपूर्ण कायदा संसदेस करता येईल.

🅾 कलम ३०४ अन्वये राज्य विधीमंडळाला
---१--- अन्य राज्यातून आयात केलेल्या मालावर, राज्यात उत्पादित केलेल्या मालावर लावण्यात येणाऱ्या करासारखे आणि त्याइतके कर लावता येईल.
---२--- राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालू शकते मात्र विधानसभेत हे विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीने मांडावे लागते.

🅾कलम ३०५ (राज्य मक्तेदारीची तरतूद). यानुसार संसद किंवा राज्य विधीमंडळ नागरिकांना पूर्णतः किंवा अंशतः वगळून स्वतःच एखादा व्यापार, धंदा, उद्योग किंवा सेवा चालविण्यासाठी कायदा करू शकते.

🦋 🦋 🦋  🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋  🦋

इंग्रज अधिकारी व कामगिरी.


🅾रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था

🅾वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट*

🅾लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत

🅾लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज

🅾लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त

🅾 लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा

🅾 चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता

🅾 लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

🅾 लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

🅾 लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

🅾सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

🅾 लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

🅾 लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

🅾 लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

IIT मद्रास संस्थेच्या संशोधकांनी ‘सोलर पॅराबोलिक ट्रॉफ कलेक्टर’ विकसित केले.


🅾 मद्रास (किंवा चेन्नई) येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांनी अधिक कार्यक्षमतेनी कार्य करणारे कमी किंमतीचे ‘सोलर पॅराबोलिक ट्रॉफ कलेक्टर’ (PTC) प्रणाली विकसित केली आहे. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रा. के. श्रीनिवास रेड्डी यांच्या नेतृत्वात हे संशोधन केले गेले.

🧩ठळक वैशिष्ट्ये...

🅾ही प्रणाली डिसॅलिनेशन, स्पेस हिटिंग आणि स्पेस कूलिंग यासारख्या क्षेत्रात औद्योगिक वापरासाठी वापरली जाते.

🅾हे उपकरण वजनानी हलके आणि भारतीय हवामानाच्या परिस्थितीत उच्च ऊर्जा कार्यक्षमता असलेले आहे. उष्णता अनुप्रयोगांचा समावेश असलेल्या विविध प्रणालीमध्ये या उपकरणाचा उपयोग केला जाऊ शकतो.

🅾हे संशोधन सौर ऊर्जेच्या उत्पादकांना आणि संशोधकांना उच्च कार्यक्षमतेसह विविध उपकरणे बनविण्यात मदत करू शकते.

🅾राष्ट्रीय सौर अभियानाच्या अंतर्गत भारत सरकारद्वारे 2022 सालापर्यंत सौरऊर्जेद्वारे 20 हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. हा टप्पा गाठण्यासाठी यासारखे संशोधन महत्त्वाचे ठरू शकते.

🧩 पॅराबोलिक ट्रॉफ कलेक्टर (PTC) विषयी...

🅾‘पॅराबोलिक ट्रॉफ कलेक्टर’ (PTC) प्रणालीमध्ये या प्रणालीमध्ये एक रिफ्लेक्टर, एक रिसीव्हर आणि त्यांना उभे धरून ठेवणारी संरचना तसेच एक ट्रॅकिंग एकक असते. रिफ्लेक्टरवर पडणारे सूर्यकिरण परावर्तित होऊन ते सर्व रिसीव्हर संचावर केंद्रित केले जातात. एकाच ठिकाणी सूर्यकिरण जमा झाल्यामुळे त्याठिकाणी अत्याधिक उष्मा तयार होते.

🅾ती उष्मा पाण्याची वाफ करण्यासाठी वापरली जाते आणि वाफ पुढे टर्बाइन आणि जनरेटर चालविण्यासाठी वापरली जाते आणि त्यापासून वीज निर्मिती होते.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...