३१ मे २०२०

एमपीएससी मंत्रा : भारतीय संविधान, राजकारण व कायदा.


🅾भारतीय राज्य व्यवस्था या विषयाचे संविधान, राजकारण व कायदा असे पलू अभ्यासक्रमाच्या शीर्षकामध्ये नमूद करण्यात आले आहेत व त्याच क्रमाने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. मात्र अभ्यासाची सोय व अभ्यास सोप्या पद्धतीने, समजून घेऊन करता यावा यासाठी अभ्यासक्रमामधील वेगवेगळ्या ठिकाणचे मुद्दे एकत्र करून किंवा सलगपणे अभ्यासावे लागतात. त्या दृष्टीने कोणते घटक एकत्रितपणे व कोणते मुद्दे वेगवेगळ्या टप्प्यावर अभ्यासायचे ते या लेखामध्ये पाहू.

🧩 भारताचे संविधान :

🅾 संकल्पनात्मक भाग- संविधानाची निर्मिती प्रक्रिया, संविधानाची ठळक वैशिष्टय़े, उद्देशिकेतील तत्त्वज्ञान (धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि समाजवादी), मूलभूत अधिकार व कर्तव्ये, राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे, सामायिक नागरी संहिता आणि मूलभूत कर्तव्ये, केंद्र राज्य संबंध आणि नवीन राज्यांची निर्मिती, स्वतंत्र न्याय व्यवस्था, घटनादुरुस्तीच्या प्रक्रिया आणि

🧩संविधानातील प्रमुख सुधारणा :

🅾संविधानाचा अर्थ लावताना वापरण्यात आलेले ऐतिहासिक न्यायनिर्णय हा संपूर्ण भाग संकल्पनात्मक आहे. या संकल्पना समजावून घेतल्या की त्यानंतर त्यांच्याशी संबंधित संविधानातील कलमे व चालू घडामोडी या तथ्यात्मक भागाचा अभ्यास करणे सोपे होते.

🧩 भारताचे संविधान :

🅾तथ्यात्मक भाग- प्रमुख घटनात्मक पदे, आयोग आणि मंडळांची रचना आणि काय्रे निवडणूक आयोग, संघराज्य आणि राज्य लोकसेवा आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमाती आयोग, नदी पाणी विवाद निवारण मंडळ, भारताचा महाअधिवक्ता, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांचे कार्यालय इत्यादी बाबी जास्त तथ्यात्मक व मुद्देसूद आहेत त्यामुळे त्यांचा टेबल स्वरूपात अभ्यास शक्य आहे.

🧩 राजकीय यंत्रणा (शासनाची रचना, अधिकार व काय्रे) :

🅾संकल्पनात्मक भाग- भारतीय संघराज्याचे स्वरूप, संघराज्य व राज्य- विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्याययंत्रणा, केंद्र-राज्य संबंध-प्रशासकीय, कार्यकारी व वित्तीय संबंध, वैधानिक अधिकार, विषयांचे वाटप. या मुद्दय़ांचा तथ्यात्मक पद्धतीने अभ्यास करावा लागेल. या पुढील ४ उपमुद्दय़ांचा अभ्यास करताना संकल्पना, तथ्ये, व्यवहारातील कार्यपद्धती व चालू घडामोडी या बाबी लक्षात घ्याव्या लागतील.

१) केंद्र सरकार :

🅾केंद्रीय कार्यकारी मंडळ : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळ, केंद्रीय विधिमंडळ : संसद, सभापती व उपसभापती, संसदीय समित्या, कार्यकारी मंडळावरील संसदेचे नियंत्रण

२) सरकारी खर्चावर नियंत्रण :

🅾संसदीय नियंत्रण, अंदाज समिती, लोकलेखा समिती, सार्वजनिक उपक्रमांवरील समिती, पसाविषयक व राजकोषीय धोरणामधील वित्त मंत्रालयाची भूमिका, (कॅग) यांचे कार्य, महालेखापाल, महाराष्ट्र यांची रचना व कार्य.

३) राज्य सरकार व प्रशासन (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) :

🅾महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि पुनर्रचना, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, मुख्य सचिव, राज्य सचिवालय, संचालनालये, विधानसभा, विधानपरिषद-अधिकार, काय्रे व भूमिका, विधिमंडळ समित्या

४) न्यायमंडळ :

🅾न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळ- काय्रे, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये- लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय, सांविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता. जनहित याचिका.

🧩 राजकीय यंत्रणा (शासनाची रचना, अधिकार व काय्रे) :

🅾विश्लेषणात्मक भाग- हा भाग एकाच वेळी संकल्पनात्मक, तथ्यात्मक आहेत. पण महत्त्वाचे म्हणजे हे मुद्दे गतीशील (Dynamic) आहेत. त्यामुळे यांचा अभ्यास करताना संकल्पना व तथ्य समजून घेतल्यावर व्यापक कालावधीतील घडामोडींचे विश्लेषणही आवश्यक ठरते.

🧩 निवडणूक प्रक्रिया :

🅾निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्टय़े, एकसदस्यीय प्रादेशिक मतदारसंघ, दुर्बल घटकांकरिता राखीव मतदारसंघ, प्रौढ मताधिकार, निवडणूक आयोगाची भूमिका, सार्वत्रिक निवडणुका- प्रमुख कल- मतदान वर्तनाचे स्वरूप आणि मतदान वर्तनावर प्रभाव पाडणारे घटक, खुल्या व नि:पक्ष वातावरणात निवडणुका घेण्यामधील समस्या व अडचणी, निवडणूकविषयक सुधारणा- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे.

🧩पक्ष आणि दबाव गट :

🅾पक्ष पद्धतीचे स्वरूप- राष्ट्रीय पक्षांची भूमिका – विचारप्रणाली, संघटन व निवडणुकीतील कामगिरी, राजकीय पक्ष व त्यांचे सामाजिक अधिष्ठान, प्रादेशिकतावाद-प्रादेशिक पक्षांचा उदय, विचारप्रणाली, संघटन व निवडणुकीतील कामगिरी; महाराष्ट्रातील प्रमुख दबाव गट व हितसंबंधित गट- त्यांची भूमिका व धोरण निर्धारणावर त्यांचा होणारा परिणाम; महाराष्ट्रातील समाज कल्याण कार्यक्रम; महिला, बालक, कामगार, युवक, अशासकीय संघटना व समाज कल्याणामधील त्यांची भूमिका.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋🦋 🦋 🦋🦋 🦋

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद 🚔
४) नरेंद्र मोदी

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)🚔
२) CH4
३) NO2
४) CO2

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८🚔
३) २०१३
४) २०१८

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा 🚔
३) २ वेळा
४) ५ वेळा

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर🚔
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  🚔

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028🚔
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  🚔
४) कलकत्ता

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका 🚔
४) दक्षिण आफ्रिका

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  🚔
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा 🚔
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे 🚔
४) स्मिता कोल्हे

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५०  🚔
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो 🚔
४) शरद पवार

१६) बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते ?

१) अश्वघोष 🚔
२) नागार्जुन
३) वलुनिय
४) नागसेन

१६) स्वातंत्र्य आधी भारतात कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात होती ?
माफ करा या प्रश्नाचे उत्तर

उत्तर:-आसाम

____

१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद ✅✅
४) नरेंद्र मोदी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)✅✅
२) CH4
३) NO2
४) CO2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८✅✅
३) २०१३
४) २०१८

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा ✅✅
३) २ वेळा
४) ५ वेळा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर✅✅
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028✅✅
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  ✅✅
४) कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका ✅✅
४) दक्षिण आफ्रिका

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  ✅✅
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा ✅✅
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे ✅✅
४) स्मिता कोल्हे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५० ✅✅
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो ✅✅
४) शरद पवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाने कोविड-19 रोगावर जलद तपासणी साधन विकसित करण्यासाठी भारताशी भागीदारी केली?

(A) फ्रान्स
(B) इस्त्रायल✅✅
(C) टर्की
(D) रशिया

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाला जिंजा जिल्ह्यात एक ‘मिलिटरी वॉर गेम सेंटर’ उभे करण्यासाठी भारताकडून मदत केली जात आहे?

(A) रवांडा
(B) सुदान
(C) अल्जेरिया
(D) युगांडा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्याने ‘श्रम सिद्धी’ योजना राज्यात लागू केली?

(A) उत्तरप्रदेश
(B) हरयाणा
(C) राजस्थान
(D) मध्यप्रदेश✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीला न्यूयॉर्क इंटेलेक्चुवल प्रॉपर्टी लॉ असोसिएशन या संस्थेच्या वतीने ‘इंव्हेंटर ऑफ द इयर’ हा सन्मान जाहीर केला गेला?

(A) कविता सेठ
(B) छेको असाकावा
(C) राजीव जोशी✅✅
(D) सत्य चौहान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

‘जागतिक थायरॉईड दिवस’ कधी पाळला जातो?

(A) 25 मे✅✅
(B) 26 मे
(C) 27 मे
(D) 28 मे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

वाचा :- 20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

१. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय

1) राज्य विधिमंडळ 

2) कार्यकारी मंडळ   

3) संसद ✓

4) न्यायमंडळ

२.  योग्य विधान ओळखा

1)कुरबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे

2) पानवठ हा पूल कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल आहे

A)1 बरोबर

B) 2 बरोबर

C) दोनीही बरोबर ✓💐🏅

D) दोनीही चूक

३. ____ याला सहकाराचा जनक मानतात.

रॉबर्ट ओवेन✓
रॉबर्ट हूक
मायकेल ओवेन
यापैकी नाही

४. आपल्या कुठल्या पुस्तकात गांधीनी क्रांतिकारकांची 'वाट चुकलेले देशभक्त' अशी संभावना केली ? 

हिंद स्वराज संघ

हिंदुस्‍थान स्‍वराज्‍य संघ

हिंद स्वराज✓.

यापैकी नाही

५. भारतातून ____ हे वृत्त जाते.

कर्कवृत्त✓✓

मकरवृत्त

विषुववृत्त

कोणतेही जात नाही

६. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ...साली झाला ?

1901

1902✓✓✓

1903

1904

७. 1976 साली कोणत्या घटनादुरुस्तीने 'समाजवाद' हा शब्द संविधानाच्या सरनाम्यात घालण्यात आला ? 

..42...वी घटनादुरुस्ती ✓

८. महाराष्ट्र शासन कोणत्या शहरात 'भाषा भवन' बांधत आहे?

औरंगाबाद

नाशिक

पुणे

मुंबई✅✅

९. भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे?

नागपूर

आर्वी✅✅

अहमदाबाद

चंद्रपूर

१०. अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

सरस्वती

यमुना

शरयू✓

घंडक

११. प्राथमिक शिक्षणाचा मुलभूत हक्कांत समावेश २००२ सालच्या .......... घटनादुरुस्ती नुसार करण्यात आला .

....८६... व्या✅✅

१२. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

A. सरदार वल्लभभाई पटेल✓

B. जी. बी. पंत

C. जी. एल. नंदा

D. लाल बहादूर शास्त्री

१३. लोकसभेचे पिता ..... आहे.

A. अनंतसांणम

B. झिकीर हुसैन

C. बासमम

D. मावळणकर✓

१४. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत?

48✓✓

१५. .....ह्या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती आहेत

प्रतिभादेवी पाटील✓

१६. महाराष्ट्रामधील राज्यसभेच्या पदांची संख्या काय आहे

19✓✓

१७. पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग

२) राजेन्द्रप्रसाद

३) मेघनाद ✓

४) नरेंद्र मोदी

१८. ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे

CFC✓

१९. युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते

2015✅✅

२०. घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?


  ब्रिटेन  ✅✅

राजा राममोहन रॉय

★ जन्म
२२ मे १७७२
राधानगर, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत

★ मृत्यू २७ सप्टेंबर १८३३ (६३ वर्ष)
इंग्लंड, ब्रिस्टॉल

★मृत्यूचे कारण :-मेंदूज्वर

★ पर्शियन लिपीत व अरेबिक भाषेत त्यांनी 'वेदान्त' ग्रंथ नावाचे पहिले पुस्तक लिहिले.

★ १८१५ मध्ये कलकत्ता येथे परतल्यावर त्यांनी 'वेदान्त' ग्रंथाचे बंगाली भाषेत भाषांतर केले.

★ मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते.

★ मुगल सम्राट दुसरा अकबर याने राममोहन राॅय यांना राजा ही उपाधी बहाल केली.  

★ त्यांनी सर्वप्रथम "ब्रह्मपत्रिका"नावाचे वृत्तपत्र सुरू केले

★ समाजाला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी २० ऑगस्ट १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. 

★ त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर

★ १२ एप्रिल १८२२ रोजी "मिरात_उल_ अखबार" हे पर्शियन वृतपत्र सुरू केले.

★ त्यांनी १८२८ साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले.

★ लॉर्ड विल्यम बेंटिक या भारताच्या गव्हर्नर जनरलच्या साहाय्याने ४ डिसेंबर १८२९ मध्ये भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद करवली.

★ याकामी जगन्नाथ शंकर शेठ यांची साथ मिळाली

★ भारतीय पत्रकारितेचे अर्ध्वयु' म्हणूनही इतिहासात त्यांची नोंद आहे. 

★ १९३३ साली मेदुचा ताप या आजारपणामुळे राजा राममोहन रॉय यांचे निधन झाले.

महत्त्वाचे सामान्य ज्ञान


---------------------------------–----------------------
▪ ARCI या संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘फ्युल सेल्स’ तंत्रज्ञानाचे नाव काय आहे?
उत्तर : पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स

▪ शास्त्रज्ञांनी कोणत्या बाह्य ग्रहाला ‘सुपर-अर्थ’ म्हणून संबोधले?
उत्तर : K2-18b

▪ कोणत्या दिवशी जागतिक वन्यजीवन दिन पाळला गेला?
उत्तर : 3 मार्च

▪ ‘मुख्यमंत्री दाल भात योजना’ कोणत्या राज्याची अनुदानित भोजन योजना आहे?
उत्तर : झारखंड

▪ कोणत्या व्यक्तीची भारताचे नवे वित्त सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : अजय भूषण पांडे

▪ राष्ट्रीय ललित कला अकादमीचा 61 वा वार्षिक पुरस्कार किती कलाकारांना देण्यात आला?
उत्तर : 15

▪ पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने कोणत्या तलावाला ‘सजीव घटक’ म्हणून घोषित केले?
उत्तर : सुखना तलाव

▪ 1 मार्च 2020 रोजी निधन पावलेले रिचर्ड जॉन पईस कोणत्या क्षेत्राशी जुळलेले होते?
उत्तर : साहित्य

▪ कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय प्रथिने दिन’ पाळण्यात आला?
उत्तर : 27 फेब्रुवारी

▪ ताज्या FIH जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघाचा क्रमांक काय आहे?
उत्तर : 4 था
 

प्रशासकीय प्रमुख:-


...............................................................
• भारताचे केंद्रीय कॅबीनेट सचिव:- राजीव गौबा (३० ऑगस्ट २०१९)

• भारताचे गृह सचिव:- अजय कुमार भल्ला ( २२ ऑगस्ट २०१९)

• भारताचे वित्त सचिव:- अजय भूषण पांडे (३ मार्च २०२० पासून)

• भारताचे संरक्षण सचिव:- अजय कुमार (२३ ऑगस्ट २०१९)

• भारताचे परराष्ट्र सचिव:- हर्षवर्धन शृंगला (२९ जानेवारी २०२० पासून)

• राष्ट्रातींचे सचिव:- कपिल देव त्रिपाठी

• पंतप्रधानांचे मुख्य सचिव:- डॉ. प्रमोद कुमार मिश्रा (११ सप्टेंबर २०१९ पासून)

• भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे सचिव:- राम सेवक शर्मा

• केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अध्यक्ष:- एल. नरसिम्हा रेड्डी

नक्की वाचा :- स्पर्धा परीक्षेची तयारी करताना...

हल्ली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे एक आव्हान बनले आहे. लॉकडाऊनच्या काळात मानसिकदृष्ट्या सक्षम असण्याबरोबरच सुयोग्य नियोजन तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मदत करतील. त्यासाठी खालील पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता.    

1. वेळापत्रक बनवा : अभ्यासाचा Syllabus, जेवण्याचे आणि झोपण्याचे नित्यक्रमानुसारच वेळापत्रक बनवावे. त्या पद्धतीने गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.

2 नोट्स तयार करा : तयारी करताना जो विषय जास्त अवघड वाटतो त्या विषयाचे पुस्तक आधी घ्यावे आणि त्याचे नोट्स तयार करून घ्या. म्हणजे ऐन परीक्षेच्या वेळीस गोंधळ होणार नाही.

3. शिस्त पाळा : आपण जे ठरवलंय ते त्याचा पद्धतीने होत आहे कि नाही? हे वेळोवेळी तपासून पाहण्याची सवय लावा. याने नक्कीच फायदा होईल.

4. प्रलोभनांना बळी नको : सोशल मीडिया (फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर) तसेच वेळ घेणार्‍या प्रलोभन पासून दूर रहा. याने तुमचा वेळ वाचेल.

5. मॉर्क टेस्ट सोडवून बघा : मागील वर्षाचे टेस्ट पेपर्स सोडवून बघा. मॉर्क टेस्ट दिल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची क्षमता वाढते. ऑफलाईन टेस्ट सिरीजचा पर्याय निवडा. यामुळे सेंटरमध्ये असल्यासारखे वाटेल व परीक्षेची भीती नाहीशी होईल.

३० मे २०२०

२१ जून


🅾उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.

🅾पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस १३ तास १३ मिनिटांचा असतो. त्यामुळे २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. २१ जूनपासून उत्तरायन संपून दक्षिणायन सुरु होते.

🅾या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. पृथ्वी अक्षवृत्त साडे तेवीस डिग्रीच्या झुकावाने ११ हजार किमी प्रती तासाच्या गतीने पश्चिमेकडून पूर्व दिशेला फिरते. यासोबतच पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील २१ जून जसा मोठा दिवस असतो तसाच वर्षातला लहान दिवस २२ डिसेंबर असतो.

🅾दिवस व रात्रीचा कालावधी कमी-जास्त होणे आपण नेहमीच अनुभवित असतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कलला असल्याने हे घडत असते. याचाच परिणाम म्हणूनही सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायनसुद्धा आपल्याला अनुभवता येते. कोणत्याही वस्तूच्या पडणार्‍या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायन व उत्तरायण आपल्यासुद्धा लक्षात येऊ शकते. पृथ्वीवरील ऋतुसुद्धा पृथ्वीच्या अक्षाच्या कलत्या स्थितीमुळेच निर्माण होतात.

🅾आकाशात वैषुविक आणि आयनिक वृत्तांचे दोन काल्पनिक छेदनबिंदू आहेत. त्यापैकी एका बिंदूत २१ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो (याला वसंत संपात बिंदू म्हणतात) तर त्याच्याविरुद्ध बिंदूत २२ सप्टेंबर रोजी सूर्य प्रवेश करतो (याला शरद संपात बिंदू म्हणतात.) या दोन्ही दिवशी रात्रीचा आणि दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो. इतर दिवशी मात्र दिनमान आणि रात्रमान हे कधीच सारखे नसते.

🅾२१ मार्चनंतर सूर्याचा प्रवास उत्तरेकडे सुरू होतो. याला उत्तरायण असे म्हणतात. यावेळी जसाजसा सूर्य उत्तरेकडे सरकतो. तसतसा दिवसाचा कालावधी वाढत जातो व रात्र कमी होऊ लागते. सूर्याचा हा उत्तरेकडचा प्रवास २१ जूनपर्यंत चालतो. या दिवशी सूर्य विषुववृत्ताच्या जास्तीत जास्त उत्तरेकडे असतो. अर्थात म्हणूनच या दिवशी दिवसाचा कालावधी अधिकाअधिक असतो व रात्र सर्वाधिक कमी कालावधीची असते. सूर्याच्या या अती उत्तरेकडील बिंदूला विष्टंभ म्हणजेच समर सोल्स्टाईस असे म्हणतात. या बिंदूपाशी सूर्य थोडासा थबकल्यासारखा भासतो व नंतर त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि येथून दिनमान कमी कमी होऊ लागते व रात्रमान वाढत जाते.

🅾२२ सप्टेंबर रोजी सूर्य शरद संपात बिंदूपाशी पोहोचतो. त्या दिवशी दिनमान व रात्रमान सारखेच असते. २२ सप्टेंबरनंतर सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडे सरकू लागतो आणि दक्षिणायनास प्रारंभ होतो. आता मात्र दिनमान कमी होऊन रात्रमान वाढत जाते. २२ डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला विंटर सोल्स्टाईस असे म्हणतात. या बिंदूत सूर्य असतानाच दिवस हा वर्षातील सर्वात लहान दिवस व रात्र ही सर्वात मोठी असते.

🦋 🦋 🦋 🦋🦋 🦋🦋 🦋🦋 🦋

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...