३० मे २०२०

सर्व सामान्य विज्ञान

💠💠सामान्य विज्ञान (इयत्ता 5 वी).💠💠

🅾शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतरिंद्रिये म्हणतात.

 🅾मेंदू, फुफ्फुसे, हृदय, इ. आंतरिंद्रियांची उदाहरणे आहेत.

🅾 अन्नाचे पचन अन्न नलिकेमध्ये होते.

🅾 अन्न पचनास मदत करणार्‍या रसास पाचकरस असे म्हणतात.

 🅾तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते.

 🅾डाळी, मांस, दूध यामध्ये प्रथिने अधिक असतात.

🅾 भुईमुंग, करडई यांसारख्या तेलबियात स्निग्धाचे प्रमाण अधिक असते.

 🅾पालेभाज्यांपासून क्षार व जीवनसत्वे मिळतात.

 🅾मोड येताना धान्यातील जीवनसत्वाचे प्रमाण वाढते.

 🅾आंबवल्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्वात वाढ होऊन पौष्टिकता वाढते.

🅾 ओ.आर.एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन. याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो.

 🅾पोटॅशिअम परमॅगनेटच्या द्रावणाने जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात.

 🅾खडकापासून मातीचा 2.5 सेमी पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्ष लागतात.

 🅾डोंगर उतारावर घातलेल्या बांध्ंणा ताली किंवा ओटे म्हणतात.

 🅾पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे मत कणाद महर्षींनी मांडले.

🅾 कणाद महर्षींचा जन्म इसवी सनापूर्वी 6 व्या शतकात प्रभास क्षेत्र म्हणजेच गुजराथ राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभासपट्टम येथे झाला.

 🅾पदार्थाच्या सूक्ष्मतिसूक्ष्म कणाला महर्षीनी 'पीलव' म्हटले आहे.

🅾 उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणार्‍या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात.
 उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणार्‍या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात.

 🅾लोखंडाप्रमाणेच कोबाल्ट व निकेल हे धातूही चुंबकाकडे आकर्षिले जातात.

 🅾पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणार्‍या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात.

 🅾बाष्पीभवन, सांद्रीभवन, विरघळणे, उत्कलन आणि विलयन हे भौतिक बदलाचे प्रकार आहेत.

🅾 लोखंडी पत्रे, नळ इ. वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावतात.

🅾 तांब्या-पितळेच्या भांड्यांना काथिलाचा लेप देऊन कल्हई करतात.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋


💠💠सामान्य विज्ञान (इयत्ता 6 वी).💠💠

🅾अमिबा, पॅरामेशिअम, क्लोरेला, यीस्ट या सजीवांचे शरीर एक पेशीचे बनलेले असते.

 🅾चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता असे म्हणतात.

🅾प्राणी : जीवनकाळ

🅾घरमाशी - 1 ते 4 महिने
🅾कुत्रा - 16 ते 18 वर्ष
🅾शहामृग - 50 वर्ष
🅾हत्ती - 70 ते 90 वर्ष

🅾वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कॅरोलेस लिनियस या शास्त्रज्ञाकडे जाते.

🅾 बुरशी, भूछत्र, स्पायरोगायरा, नेचे व कवक यांना फुले येत नाहीत.

 🅾वड, उंबर, बोगनवेल या सपुष्प वनस्पती आहेत.

 🅾व्दिवार्षिक वनस्पती - मुळा, गाजर, बीट.वार्षिक वनस्पती - सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी, मका.

🅾 जलचर प्राणी - मासा, जेलीफिश, ऑक्टोपस

🅾 उभयचर प्राणी - बेडूक, कासव, सुसर

🅾 वडाच्या खोडावरील पारंब्या या वडाची मुळे आहेत. कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड आहे.

 🅾पेर आणि पान यांच्या दुबेळक्यात कोंबासारखा भाग दिसतो त्याला मुकूल म्हणतात. मूळाच्या टोकाशी मूलटोपी असते.

 🅾जायांग स्त्रीकेशराचा बनलेला असतो.

 🅾वस्तुमान, अंतर, तापमान, काळ अशा प्रकारात ज्यांचे मापन करायचे असते, त्यांना राशी असे म्हणतात.

 🅾MKS आणि CGS या प्रचलित मापन पद्धती आहेत.

 🅾गोलंदाजीच्या वेगाचे मापन रडार प्रणालीव्दारे केले जाते.

 🅾स्थिर वस्तूला हलविण्यासाठी बलाची आवश्यकता असते.

 🅾मॅगलेव्ह ट्रेन ही चुंबकाचा वापर करून चालणारी रेल्वे ताशी 500 ते 580 किमी वेगाने धावते.

 🅾घर्षणबल गतीच्या विरोधात कार्य करते. घर्षनामुळे वीज निर्माण होणार्‍या बलाला स्थितीक विद्युत बल असे म्हणतात.

 🅾एका दिशेने जाणार्‍या गतीला रेषीय गती असे म्हणतात.

🅾 ज्या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.

 🅾आधाराभोवती हालणार्‍या आणि न वाकणार्‍या दांड्याला तरफ म्हणतात. हे साधे यंत्र आहे.

 🅾कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.

🅾 पदार्थाच्या ताणामुळे / स्थितीमुळे साठवल्या गेलेल्या उर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात.

 🅾गतीज ऊर्जेचा वापर करून डायनॅमोमध्ये विद्युतनिर्मिती होते.

🅾 पारंपारिक ऊर्जा स्त्रोत - कोळसा, डिझेल, पेट्रोल

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स.

🅾सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित आठ ग्रह फिरतात.

 🅾चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
 प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५० मिनिटे उशिरा होतो.
 
🅾चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास २७.३ दिवस लागतात.
 एका अमावस्येपासुन दुसर्‍या आमवस्येपर्यंतचा काळ २९.५ दिवसांचा असतो.

🅾 एकूण ८८ तारकासमूह मानले जातात. त्यातील ३७ तारकासमूह उत्तर खगोलीय तर ५१ तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

 🅾प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी २७ नक्षत्रांची कल्पना केली आहे.

 🅾प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

 🅾बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त ८८ दिवस तर नेपच्यूनचा सुमारे १४६ वर्षे इतका मोठा असतो.
  
🅾बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला पहाटतारा म्हणतात.

 🅾पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना अंतर्ग्रह, तर कक्षेबाहेरील ग्रहांना बाह्यग्रह म्हणतात. मंगळ हा पहिला बाह्यग्रह आहे.

  🅾सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरुगुरूला एकूण ६३ उपग्रह आहेत.
 शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

 🅾शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

🅾 धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.हॅले हा धूमकेतू ७६ वर्षानी दिसतो. आता २०६० मध्ये दिसेल.

 🅾भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट १९ एप्रिल १९७५ रोजी सोडण्यात आला.
 त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - १, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत. ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत २१ उपग्रह सोडण्यात आले.

 🅾GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

 🅾आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार १९७५ पासून अंमलात आला आहे.

🅾जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या १९९२ च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

 🅾 ५ मार्च १८७२ रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.

🅾 चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.

 🅾मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.

 🅾इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अनुतील मूलकण आहेत.
 
🅾अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.
  
🅾प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.
 
🅾अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.
 
🅾अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.
 
🅾 मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.
 
🅾मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला संयुजा म्हणतात.

 🅾विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.
 जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.

🅾 स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.

 🅾साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.
 संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ
 संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.

 🅾पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.

🅾 रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.

 🅾WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र  काढली आहेत. (Directly Observed Treatment) मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्‍याचा जिवाणू वाहक आहे.

🅾 लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.   

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

आरोग्यशास्ञ


🅾 हत्तीरोगाचा रक्त नमुना कधी घेतात - राञी

🅾 लाल रक्तपेशी तयार होण्याकरीता कोणता घटक आवश्यक असतो - फॉलिक अँसिड

🅾 जन्मताच ह्रदयात दोष असणार्या मुलांना ब्लू बेबी म्हणतात

🅾 करडई तेलातील - लिनोलिक हे मेदाम्ल रक्तात्ल कोलेस्टेरॉलची माञा कमी राखते

🅾 सोयाबिन मध्ये - ४०% प्रथिन असतात

🅾 पुरुषांमधिल कुटूंबनियोजन शस्ञक्रियेस - व्हँसेक्टॉमि म्हणतात

🅾 स्ञियांमधिल कुटूंबनियाेजन शस्ञक्रियेस - ट्युबोक्टोमी म्हणतात

🅾 आयुर्वेदाची निर्मिती अथर्ववेदा पासुन झाली आहे

🅾 शरीराच्या एकुन वजनाच्या सुमारे २\३ भाग स्नायुंनी बनलेला असतो

🅾 ह्रदयास ऑक्सिजन चे प्रमाण कमि पडल्यास - हायपरटेंशन हा आजार होतो

🅾ह्रदयाचा एक ठोका पडन्यास - ०.८ सेतंद लागतात

🅾 शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि आरबीसीचे प्रमाण मोजण्यासाठी - फॉस्फरस ३२ वापरतात.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

जगातील १५ सर्वात उष्ण ठिकाणांमध्ये भारतातील १० शहरं; महाराष्ट्रातील दोन शहरांत लाहीलाही

- गेल्या काही वर्षांत ऋतुचक्र पूर्णपणे पालटले आहे. यावर्षीही वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन वर्षभरच सुरू आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होऊनही तापमानात वाढ होत नव्हती. मात्र, मागील दोन आठवडय़ापासून सूर्यनारायण चांगलाच कोपला आहे.

- हवामान निरीक्षण संकेतस्थळ अल डोरादोनुसार, गेल्या २४ तासांतील जगातील सर्वाधिक उष्ण १५ ठिकाणांमध्ये भारताच्या तब्बल दहा शहराचा समावेश आहे. जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील दोन शहराचा समावेश आहे. तसेच भारतासह पाकिस्तानमधीलही उष्ण ठिकाणाचा यामध्ये सहभाग आहे.

- उत्तर व मध्य भारत सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेत होरपळत असून, काही ठिकाणी तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेले आहे.‘वायव्य भारत, मध्य भारत आणि पूर्व भारताचे लगतचे भाग यांवर उत्तर-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या कोरडय़ा वाऱ्यांमुळे सध्याची उष्णतेच्या लाटेची परिस्थिती येत्या २४ तासांमध्ये कायम राहण्याची मोठी शक्यता आहे.

-  राजस्थानमधील चूरू देशातील सर्वाधिक उष्ण ठिकाण असल्याची नोंद बुधवारी झाली आहे. चुरू राजस्थानची राजधानी जयपूरपासून अवघ्या २० किमी अंतरावर आहे. मंगळवारी चुरूचे तापमान ५० डिग्री सेल्सिअस होतं. चुरूला थार रेगिस्तानचं प्रवेशद्वारही म्हटले जातेय. पाकिस्तानच्या जेकबाबाद आणि भारताच्या चुरूचं तापमान जमिनीवरील सर्वात उष्ण ठिकाण म्हणून मंगळवारी नोंद झाली.

- बीकानेर, गंगानगर आणि पिलानी राजस्थानमधील अन्य तीन शहरं आहेत. ज्यांचा जगातील सर्वाधिक १५ उष्ण ठिकाणामध्ये सहभाग आहे.
जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन शहरांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील बांदा आणि हरियाणातील हिसारमध्ये मंगळवारी ४८ डिग्री सेस्लियस तापमानाची नोंद झाली.

- सर्वात उष्ण शहरांच्या यादीत ४७.६ डिग्री सेल्सअस तापमानासह राजधानी दिल्ली, ४७.४ डिग्री सेल्सिअससह बीकानेर, ४७ डिग्री सेल्सिअसह गंगानगर, ४७ डिग्री सेल्सिअससह झांसी, ४९.९ डिग्री सेल्सियससह पिलानी, ४६.८ डिग्री सेल्सिअससह नागुपूरमधील सोनगांव आणि ४६.५ डिग्री सेल्सिअस तापमानासह अकोला यांचा क्रमांक लागला आहे.

- चुरूमध्ये गेल्या दहा वर्षांत मे महिन्यात दुसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. याआधी १९ मे २०१६ रोजी चुरूचे तापमान ५०.२ डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं होतं. २२ मे २०२० पासून चुरूमध्ये तापमानाची स्थिती पाहिली जात आहे. २२ मे रोजी येथील तापमान ४६.६ डिग्री सेल्सिअर नोंदवलं होतं.

-  त्यानंतर प्रत्येकदिवशी तापमान वाढत राहिले २३ मे रोजी ४६.६ डिग्री सेल्सिअस, २४ मे रोजी ४७.४ डिग्री सेल्सिअस आणि २५ मे रोजी ४७.५ डिग्री सेल्सिअस तापमान होतं.

- विकासाच्या गर्तेत सर्वच शहरांमध्ये हिरवे जंगल कमी होऊन सिमेंटच्या जंगलात वाढ होत आहे. त्यामुळे तापमानवाढीसाठी हा घटक देखील तेवढाच कारणीभूत ठरत आहे. एरवी उन्हाळ्यात दिवसा रस्त्यावर वर्दळ कमी असते. मात्र, टाळेबंदीमुळे दीड महिन्याहून अधिक काळ नागरिक घरातच बंदिस्त होते. आता हळूहळू शहरातील व्यवहार सुरू होऊ लागल्याने उन्हाची तमा न बाळगता नागरिक रस्त्यावर दिसून येत आहेत.

-  पण वाढलेल्या तापमानामुळे पुन्हा घरातच राहावे लागत आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या ३० मे पर्यंत उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत.

मराठी व्याकरण :- वाचा महत्त्वाच्या म्हणी


1 कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं.
अर्थ:
लाजलज्जा पार सोडून देणे.

2 कठीण समय येता कोण कामास येतो?
अर्थ:
आपल्या अडचणींच्या वेळी कोणीही उपयोगी पडत नाही.

3 कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच.
अर्थ:
माणसाचा मुळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही.

4 कधी खावे तुपाशी, कधी राहावे उपाशी.
अर्थ:
सांसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते.

5 कर नाही त्याला डर कशाला?
अर्थ:
ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही.

6 कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी.
अर्थ:
सर्वांचे दिवस येतात, तीच ती स्थिती कधीच राहत नाही.

7 करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी हो‌ईल का?
अर्थ:
जी गोष्ट लहान असते, ती कितीही प्रयत्न केला तरी अमर्याद मोठी होऊ शकत नाही

8 करणी कसायची, बोलणी मानभावची.
अर्थ:
बोलणे गोड गोड, आचरण मात्र निष्ठूर.

9 करायला गेले गणपती अन् झाला मारुती.
अर्थ:
जे करायचे ते समजून उमजून नीटपणे करावे. नाहीतर त्यातून भलतेच घडते.

10 करायला गेलो एक अन् झाले एक.
अर्थ:
करायचे एक आणि झाले भलतेच.

11 करावे तसे भरावे.
अर्थ:
जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे.

12 करीन ती पूर्व दिशा.
अर्थ:
एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे.

13 कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीती गोड.
अर्थ:
दुष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवंतीला प्रेम आवडते.

14 कवडी कवडी माया जोडी.
अर्थ:
काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते.

15 कवड्याचे दान वाटले, गावात नगारे वाजले.
अर्थ:
करणे थोडे पण गवगवाच फार.

16 कसायाला गाय धार्जिणी.
अर्थ:
भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नसतात.

17 काकडीची चोरी, फाशीची शिक्षा.
अर्थ:
अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी.

18 काखेत कळसा अन् गावाला वळसा.
अर्थ:
भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे.

19 काट्याचा नायटा करणे.
अर्थ:
एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे.

20 काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.
अर्थ:
खर्‍या मैत्रीचा भंग आगंतुक कारणांनी होऊ शकत नाही.

चालू घडामोडी प्रश्नोत्तरे सराव


राज्यसेवा तसेच सयूंक्त गट ब आणि गट क साठी उपयुक्त

▪️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकृती’ नावाने संकेतस्थळ कोणत्या संस्थेने तयार केले?
उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

▪️ भारतीय संविधानातल्या कितव्या दुरुस्तीद्वारे पंचायतींना संविधानिक दर्जा दिला गेला?
उत्तर : 73 वी दुरुस्ती

▪️ चीनच्या पहिल्या मंगळ शोध मोहिमेचे नाव काय आहे?
उत्तर : तियानवेन 1

▪️ कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत ई-ग्राम स्वराज्य संकेतस्थळ आणि स्वामीत्व योजना चालवली जात आहे?
उत्तर : पंचायतराज मंत्रालय

▪️ कोणत्या देशाने ‘नूर’ नावाचा लष्करी उपयोगाचा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला?
उत्तर : इराण

▪️ कोणत्या व्यक्तीने 21 एप्रिल 2020 रोजी झालेल्या जी-20 कृषिमंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले?
उत्तर : नरेंद्र सिंग तोमर

▪️ UNESCO संघटनेनी कोणत्या शहराची 2020 या वर्षाची जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड केली?
उत्तर : क्वालालंपुर

▪️ कोणता दिवस ‘इंग्रजी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो?
उत्तर : 23 एप्रिल

▪️ कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अ‍ॅप तयार केले?
उत्तर : उत्तराखंड

▪️ कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे?
उत्तर : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद ✅✅
४) नरेंद्र मोदी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)✅✅
२) CH4
३) NO2
४) CO2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८✅✅
३) २०१३
४) २०१८

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा ✅✅
३) २ वेळा
४) ५ वेळा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर✅✅
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028✅✅
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  ✅✅
४) कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका ✅✅
४) दक्षिण आफ्रिका

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  ✅✅
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा ✅✅
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे ✅✅
४) स्मिता कोल्हे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५० ✅✅
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो ✅✅
४) शरद पवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

घाट (खिंड):

पर्वतरांगेतील दोन्ही प्रदेशात जाण्या – येण्याजोगा किवा दळनवळनाचा ‘डोंगररस्ता’ म्हणजे घाट होय.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
घाट जिल्हा जोडणारी गावे (मार्ग)

🍁मळशेज घाट ठाणे, पुणेअहमनगर – शहापूर

🍁नाणे घाट ठाणे, पुणेजुन्नर – कल्यान

🍁कुसूर घाट रायगड, पुणेराजगुरूनगर – कर्जत

🍁वरंधा घाट रायगड, पुणेपुणे – महाड

🍁कुरुळ घाट सिंधुदुर्ग, कोल्हापूर कोल्हापूर – वैभववाडी- राजापूर

🍁चंदनापुरी नगर संगमणेर – पुणे

🍁सारसा घाट चंद्रपुर सिरोंचा – चंद्रपुर

🍁बिजासण घाट धुळे धुळे – आग्रा

🍁मांजरसुभा घाट बीड बीड – नगर

🍁अंबेनळी घाट सातारा महाबळेश्वर – कोल्हापूर

🍁ताम्हणी घाट पुणे पुणे – पौदरोड – चिपळूण

🍁धब (कसारा)घाट नाशिक नाशिक – मुंबई

🍁बोर घाट पुणे पुणे – मुंबई

🍁ख्ंबाटकी घाट सातारा पुणे – सातारा

🍁दिवा घाट पुणे पुणे – बारामती

🍁कुंभार्ली घाट सांगली – सातारा कराड – चिपळूण

🍁आंबा घाट कोल्हापूर – रत्नागिरी कोल्हापूर – रत्नागिरी

🍁आंबोली घाट कोल्हापूर कोल्हापूर – सावंतवाडी बेळगाव

🍁फोंडा घाट कोल्हापूर कोल्हापूर – पणजी

🍁पसरणी घाट सातारा वाई – महाबळेश्वर.
___________________________

राज्य आणि मुख्यमंत्री



● *महाराष्ट्र* : उद्धव ठाकरे

● *आंध्रप्रदेश* : जगमोहन रेड्डी 

● *अरुणाचल प्रदेश* : प्रेमा खांडू

● *आसाम* : सर्बानंद सोनवल

● *बिहार* : नितीश कुमार

● *छत्तीसगड* : भूपेश बघेल

● *दिल्ली* : अरविंद केजरीवाल

● *गोवा* : प्रमोद सावंत

● *गुजरात* : विजय रूपानी       

● *हरियाणा* : मनोहरलाल खट्टर

● *हिमाचल प्रदेश* : जयराम ठाकूर

● *झारखंड* : हेमंत सोरेन

● *कर्नाटक* : बी.एस. येडियुरप्पा

● *केरळ* : पिनराई विजयन

● *मध्यप्रदेश* : शिवराज सिंह चौहान

● *पुदुच्चेरी* : व्ही. नारायणस्वामी

● *पंजाब* : अमरिंदर सिंग

● *राजस्थान* : अशोक गेहलोत

● *सिक्कीम* : प्रेम सिंग तमांग

● *तामिळनाडू* : ई. के. पलानीस्वामी     

● *मणिपूर* :  एन. बिरेन सिंग

● *मेघालय* : कॉनराड संगमा

● *मिझोराम* : झोरामथांगा

● *नागालँड* : नेफिऊ रिओ

● *ओडिशा* : नवीन पटनायक                

● *तेलंगणा* : के. चंद्रशेखर राव

● *त्रिपुरा* : बिप्लब कुमार देब

● *पश्चिम बंगाल* :  ममता बनर्जी

२९ मे २०२०

General Knowledge

▪️ कोणती उड्डाणादरम्यान प्रवाश्यांची कोरोना तपासणी करणारी पहिली हवाई सेवा आहे?
उत्तर : एमिरेट्स

▪️ कोणत्या कलाकाराच्या जयंतीनिमित्त ‘जागतिक कला दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : लिओनार्डो दा विंची

▪️ कोणत्या बँकेनी सामाजिक अंतर पाळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘सेफ्टी ग्रिड’ मोहीम चालवली आहे?
उत्तर : HDFC बँक

▪️ आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन (IWF) चे कार्यवाह अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : उर्सुला पापंड्रिया

▪️ ‘किसान रथ’ अॅपचे कार्य काय आहे?
उत्तर : अन्नधान्यांच्या वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे

▪️ 2020 साली जागतिक आवाज दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : फोकस ऑन युवर वॉइस

▪️ हांग्जो शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘2022 एशियन पॅरा गेम्स’या स्पर्धांचे शुभंकर काय आहे?
उत्तर : फीफी

▪️ 2020 साली जागतिक हिमोफिलिया दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : गेट+इनवॉल्व्ड

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘सिघाट’ (Cghaat) संकेतस्थळाचे अनावरण केले?
उत्तर : छत्तीसगड

▪️ कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने ‘अॅसेस करो ना’ मोबाइल अॅप सादर केले?
उत्तर : दिल्ली

देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना.

🅾देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

🅾देशातील पहिले ग्हर्नर
ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

🅾देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

🅾देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

🅾देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू

🅾देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर

🅾देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश

🅾देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)

🅾देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

🅾देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

🅾देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान

🅾देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

🅾देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

🅾देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

🅾देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

🅾देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

🅾देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

🅾देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

🅾देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली

🅾देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

🅾देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

🅾देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर

🅾देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

🅾देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

🅾देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

🅾देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

🅾देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

🅾देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

•देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

🅾देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

🅾देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

🅾देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

🅾देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे

🅾देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश

🅾देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

🅾देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

🅾देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

🅾देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

🅾देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

🅾देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

🅾देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

🅾देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

🅾देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

🅾देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश

🅾देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

🅾देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे

🅾देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

🅾देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...