२५ मे २०२०

General Knowledge


सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

▪️ कोणता देश ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020’ याच्या यादीत अग्रस्थानी आहे?
उत्तर : नॉर्वे

▪️ कोणत्या CSIR संस्थेनी कोविड-19 रोगासाठी ‘फेलुदा’ चाचणी विकसित केली?
उत्तर : इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स इंटिग्रेटीव्ह बायोलॉजी

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘विद्यादान 2.0’ मंच प्रस्तुत केले?
उत्तर : मनुष्यबळ विकास मंत्रालय

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘आपदामित्र’ मदत क्रमांक कार्यरत केला?
उत्तर : कर्नाटक

▪️ कोणत्या संस्थेनी कोविड-19 संदर्भात ‘लॉकडाऊन लर्नर्स’ मालिका आरंभ केली?
उत्तर : औषधे आणि गुन्हेगारी विषयक संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय (UNODC)

▪️ भारताच्या ध्वजाने प्रज्वलित केलेले मॅटरहॉर्न पर्वतशिखर कोणत्या देशात आहे?
उत्तर : स्वित्झर्लंड

▪️ सिटी युनियन बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ कोण आहेत?
उत्तर : एन. कामाकोडी

▪️ सुधा मुर्ती यांच्या प्रकाशित झालेल्या पहिल्या ऑडियो बूकचे शीर्षक काय आहे?
उत्तर : हाऊ द ओनियॉन गॉट इट्स लेयर्स

▪️ 2020 साली जागतिक पृथ्वी दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : क्लायमेट अॅक्शन

▪️ कोणत्या राज्याने कोविड-19 प्रकरणांच्या जलद तपासणीसाठी 'तिरंगा' नावाचे वाहन सादर केले?
उत्तर : केरळ

मिझोरम सरकारने ‘क्रिडा’ क्षेत्राला ‘औद्योगिक’ हा दर्जा दिला

- क्रिडाविषयक क्रियाकलापांना अधिक चालना देण्याच्या उद्देशाने गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मिझोरम सरकारने ‘क्रिडा’ क्षेत्राला ‘औद्योगिक’ हा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. अशी घोषणा करणारे हे देशातले पहिले राज्य आहे.

- या निर्णयामुळे अनुदान, बँकिंग सुविधांसह सर्व औद्योगिक फायदे आता क्रिडाक्षेत्रासाठी वाढविण्यात येणार. त्यामुळे या क्षेत्रात रोजगार निर्मितीला चालना मिळणार.

- मिझोरम सरकार नवीन औद्योगिक धोरण आखत आहे, त्यानुसार क्रिडाक्षेत्रालाही बरेच फायदे मिळतील. राज्यातही क्रिडा धोरण चांगले आहे.

- ईशान्य भारतातल्या आठ राज्यांपैकी मिझोरमने अनेक खेळात वर्चस्व गाठले आहे. आज या राज्याचे नाव फुटबॉल, हॉकी, भारोत्तोलन अश्या विविध आघाडीच्या क्रिडाप्रकारांमध्ये समोर येते. मिझोरममध्ये फुटबॉल, हॉकी, कुस्ती, स्टिक फाइटिंग, इन्सुकनावरा, कलछेत काल, इनारपठई अशा अनेक देशी खेळ देखील आहेत.

▪️मिझोरम राज्य

- मिझोरम हे भारताच्या ईशान्य भागातले एक राज्य आहे. मिझोरमच्या उत्तरेस आसाम, ईशान्येस मणीपूर, पश्चिमेस त्रिपुरा ही राज्ये तर पूर्वेस व दक्षिणेस म्यानमार व पश्चिमेस बांगलादेश हे देश आहेत.

- मिझोरम राज्याची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 रोजी आसाम राज्याला विभागून केली गेली. ऐझॉल ही मिझोरमची राजधानी आहे. मिझो व इंग्रजी या राज्यातल्या प्रमुख भाषा आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी ‘कांगारा चहा’ प्रभावी: ICMRचा दावा

- कोविड-19 रोगावरील उपचार पद्धतीत बदल करीत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी (ICMR) रोगप्रतिकार शक्ती वाढवणे तसेच विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘हायड्रोक्झीक्लोरोक्वीन’ (HCQ) ऐवजी HIV वरील औषधे देण्याचे ठरवले आहे.

- शिवाय, कांगारा चहामधील रसायनेही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात व कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यात HIV वरील औषधांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. पालमपूर (हिमाचल प्रदेश) येथील हिमालयन जैवस्रोत तंत्रज्ञान संस्थेचे (IHBT) संचालक डॉ. संजय कुमार यांनी ही माहिती दिली. कांगारा चहाची हिमाचल प्रदेशात लागवड होते.

▪️कांगारा चहाचे औषधीयुक्त गुणधर्म

- कांगारा चहात मनुष्यप्राणीच्या शरीराला लाभदायक ठरणारे गुणधर्म आहेत. IHBT संस्थेनी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कोविड-19 वर मात करण्यासाठी हे सिद्ध केले आहे.

- शास्त्रज्ञांना कांगारा चहात '65 बायोॲक्टीव' रसायने किंवा 'पॉलिफेनोल्स' आढळून आली. त्यांच्या संयोगाने ते विशिष्ट विषाणूवर अधिक प्रभावी ठरु शकते. सध्या HIV वरील बाजारात उपलब्ध औषधांपेक्षाही ही रसायने अधिक प्रभावी आहेत. सध्या HIV वरील मान्यताप्राप्त औषधे कोविड-19 रुग्णांवर उपचारासाठी वापरली जात आहेत.

- 'कॅटेचिन' हे नैसर्गिक आरोग्यवर्धक घटक आहे. पेशींचे नुकसान टाळणे आणि इतर अनेक फायदे प्रदान करणे, यासाठी ते ओळखले जाते. कांगारा चहात ते पुरेपूर आहे.

- कांगारा चहा मधील रसायने मानवी शरीरातल्या प्रथिनेयुक्त विषाणूंना प्रतिबंध करु शकतात, असा दावा करण्यात आला आहे.

- तसेच संस्थेनी या चहाचा वापर करून अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझर, औषधी साबणचीही निर्मिती केली आहे. बुरशीविरोधी, जीवाणूविरोधी, स्वच्छतायुक्त आणि आर्द्रतायुक्त लाभदायक गुणधर्म आहेत.

अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेच्या नऊ उपाययोजना


- 22 मे 2020 रोजी भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीच्या आणि अनिश्चित काळात वित्तीय ओघ सुरळीत ठेवण्यासाठी आणि वित्तीय स्थैर्य राखण्यासाठी नव्या नऊ उपाययोजना जाहीर केल्या.

- रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची कपात करत हा दर 4.4 टक्क्यांवरून 4 टक्के केला. सीमांत स्थायी सुविधा दर (MSF) आणि बँक दरात कपात करून हा दर 4.65 टक्क्यांवरून 4.25 टक्के करण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो दर 3.75 टक्क्यांवरून 3.35 टक्क्यांवर केला आहे.

- परवडणाऱ्या दरात लघू उद्योगांना वाढता पत पुरवठा शक्य व्हावा यासाठी RBIने 17 एप्रिल 2020 रोजी भारतीय लघू उद्योग विकास बँक (SIDBI) यासाठी 90 दिवसांसाठी 15,000 कोटी रूपयांची विशेष पुनर्वित्त सुविधा जाहीर केली होती. ही सुविधा आता आणखी 90 दिवसांनी वाढवण्यात आली आहे.

- वॉलंटरी रिटेन्शन रूट (VRR) ही RBIने परकीय पोर्टफोलीओ गुंतवणुकीसाठी पुरवलेली खिडकी असून उच्च गुंतवणुकीसाठी सुलभ नियम याद्वारे पुरवले जातात. मान्यता दिलेल्या गुंतवणुक मर्यादेपैकी किमान 75 टक्के गुंतवणूक तीन महिन्यात केली पाहिजे, असा नियम आहे. मात्र गुंतवणूकदारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा कालावधी आता सहा महिने करण्यात आला आहे.

- निर्यातदारांना माल पाठवण्यापूर्वी आणि माल पाठवल्यानंतरच्या काळासाठी बँकांकडून निर्यात पत करिता असलेला एक वर्षाचा काळ, आता 15 महिने करण्यात आला आहे. 31 जुलै 2020 पर्यंत वितरीत केलेल्या मालासाठी हा नियम लागू राहणार.

- भारताच्या परकीय व्यापाराला वित्त पुरवठा करण्यासाठी, सुलभता आणण्यासाठी, चालना देण्यासाठी भारतीय निर्यात-आयात (EXIM) बँकेला 15,000 कोटी रुपयांचे कर्ज जाहीर करण्यात आले आहे. 90 दिवसांसाठी ही कर्ज सुविधा देण्यात येणार असून ती एक वर्षाने वाढवण्याची तरतूदही आहे. परकीय चलन संसाधन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी बँकेला हे कर्ज दिले जाणार आहे.

- भारतात नेहमीच्या आयातीसाठी (सोने/हिरे आणि मौल्यवान धातू/ जडजवाहीर वगळता) आयात देयकासाठीचा सहा महिन्याचा काळ, आता माल पोहचवण्यापूर्वीच्या तारखेपासून  बारा महिने करण्यात आला आहे. 31 जुलै 2020 किंवा त्यापूर्वी केलेल्या आयातीला  हा कालावधी लागू राहणार.

- RBIने याआधी जाहीर केलेल्या काही नियामक उपाययोजनांना आणखी 3 महिन्यांची 1 जून 2020 पासून 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या उपाययोजना आता एकूण सहा महिन्यांसाठी (1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020) लागू राहतील.

- कर्ज देणाऱ्या संस्थाना खेळत्या भांडवलासाठीची सीमा मूळ पातळीवर आणण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंतची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खेळते भांडवल चक्र मुल्यांकनविषयक उपायांना 31 मार्च 2021 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

- कर्ज देणाऱ्या संस्थाना खेळत्या भांडवलावरच्या लांबणीवर टाकलेल्या सहा महिन्यांच्या (1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020) काळातल्या व्याजाचे व्याज मुदत कर्जात रुपांतर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 31 मार्च 2021 रोजी संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षात त्याची संपूर्ण परतफेड करणे आवश्यक आहे.

- विशिष्ट कंपनी समूहाला, जास्तीत जास्त पत पुरवठा करण्याच्या बँकाच्या मर्यादेत 25 टक्क्यांरून 30 टक्के पर्यंत वाढ करण्यात आली आहे. बाजारातून पैसे उभे करण्यासाठी कंपन्यांना सध्या येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना बँकाकडून वित्त पुरवठा करता यावा यासाठी हा उपाय करण्यात आला आहे. 30 जून 2021 पर्यंत ही वाढीव मर्यादा लागू राहणार.

- राज्यांना त्यांची देणी पूर्ण करता यावीत यासाठी राखीव म्हणून संकलित निधी ठेवण्यात येतो. यातून निधी काढण्यासाठीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. हा बदल तातडीने अंमलात येणार असून 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहणार.

जागतिक बँकेतील पदावर आभास झाला

- जागतिक बँकेत भारतीय अर्थशास्त्रज्ञ आभास झा यांची दक्षिण आशियातील हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापन जोखीम व्यवस्थापन विभागात प्रक्रिया व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- जागतिक पातळीवर हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या प्रगत पद्धती आहेत, त्या दक्षिण आशियात वापरण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असणार आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा व बांगलादेश यांना अम्फान वादळाचा तडाखा बसलेला असतानाच त्यांची या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

-  हवामान बदल व इतर काही समस्यांवर उच्च प्रतीची विकासात्मक प्रक्रिया स्वरूपाची उत्तरे सुचवण्याची जबाबदारी त्यांच्या विभागावर आहे. सिंगापूर येथे झा यांची नियुक्ती झाली असून दक्षिण आशियातील नैसर्गिक आपत्तींवर प्रक्रियात्मक व्यवस्थापकीय उपाय सुचवण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.

अमेरिकेने ‘ओपन स्कायज ट्रीटी’ मधून माघार घेतली

- रशियाने केलेल्या कराराच्या उल्लंघनाचा खुलासा करीत संयुक्त राज्ये अमेरिका या देशाने ‘ओपन स्कायज ट्रीटी’ या 34 देशांच्या करारामधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.

▪️कराराविषयी

- 1 जानेवारी 2002 रोजी ‘ओपन स्कायज ट्रीटी’ हा करार अस्तित्वात आला. या करारामुळे सहभागी देशांना निशस्त्र हवाई पाळत ठेवण्याची परवानगी मिळते.

- लष्करी कारवाया आणि त्यांच्याशी संबंधित इतर बाबींची हवाई मार्गाने घेतलेल्या छायाचित्रांद्वारे माहिती गोळा करण्याची परवानगी कराराच्या स्वाक्षरीकर्त्यांना देऊन परस्पर देशांमधला विश्वास वाढविण्याच्या उपाययोजना आणि परस्पर समन्वय आणि सहकार्यामध्ये सुधारणा करणे हा कराराचा मुख्य उद्देश आहे.

- लिथुयानिया, स्लोव्हाकिया, इटली, रशिया, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, हंगेरी, डेन्मार्क (ग्रीनलँडसह), टर्की, झेक प्रजासत्ताक, रोमानिया, स्वीडन, लक्समबर्ग, बोस्निया आणि हर्जेगोविना, जर्मनी, बेल्जियम, कॅनडा, ग्रीस, नॉर्वे, आईसलँड, एस्टोनिया, फ्रान्स, ब्रिटन, जॉर्जिया, फिनलँड, लाटविया, बल्गेरिया, पोलंड, कझाकस्तान, बेलारूस, युक्रेन, स्पेन, नेदरलँड्स, पोर्तुगाल हे या कराराचे 34 सदस्य आहेत.

- किर्गिस्तानने या करारावर स्वाक्षरी केली आहे परंतु त्याला मंजूरी दिलेली नाही.

Advanced Synonyms

🚫Very capable        ✅accomplished 
🚫Very clever           ✅brilliant 
🚫Very dirty              ✅squalid  
🚫Very good             ✅superb
🚫Very happy           ✅jubilant
🚫Very hot                ✅scalding
🚫Very hungry         ✅ravenous
🚫Very large             ✅colossal
🚫Very light              ✅imponderable
🚫Very high              ✅sky-high
🚫Very neat              ✅immaculate  
🚫Very quiet             ✅silent
🚫Very rude              ✅vulgar
🚫Very serious         ✅solemn
🚫Very small             ✅tiny
🚫Very strong           ✅unyielding 
🚫Very valuable        ✅precious
🚫Very weak             ✅feeble
🚫Very wet                ✅soaked
🚫Very wicked          ✅villainous
🚫Very wise              ✅sagacious
🚫Very worried         ✅anxious
🚫Very dangerous    ✅malignant
🚫Very complex        ✅overspecified
🚫Very frequent        ✅continual

ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता.


1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.

🅾ग्रामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.

🅾सरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.

🅾सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.

🧩राजीनामा :

🅾सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.

🅾उपसरपंच - सरपंचाकडे

🧩निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :

🅾सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.

🧩अविश्वासाचा ठराव :

🅾सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

🅾बैठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)

🅾अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच

🅾तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.

🅾अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.

🅾आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

२४ मे २०२०

घटनेतील मूलभूत कर्तव्य.


1.घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.  

2.ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ति मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करने. 

3.भारतात सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेऊन त्यांचे संरक्षण करणे. 

4.देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. 

5. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे. 

6. आपल्या समिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशांचे मोल जाणून त्यांचे जतन करणे. 

7. वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्रा बद्दल दया भाव बाळगणे. 

8. विज्ञान वादी दृष्टीकोण, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणा यांचा विकास करणे. 

9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 

10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तीगत व सामुदायिक कार्याचे सर्व क्षेत्रा मध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. 

11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या आपत्यास  अथवा पल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.   

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

दादासाहेब फाळके पुरस्कार.


🅾  सुरुवात -1969

🅾 स्वरूप - दहा लाख रुपये सुवर्णकमळ आणि शाल

🅾  चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार दिला जातो

🅾 पहिले विजेते -देविका राणी

🅾 भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार. भारतीय चित्रपट सृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत तंत्रज्ञाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते

🅾 अलीकडील पुरस्कार विजेते
   1) 2014 - शशि कपूर
   2) 2015 - मनोज कुमार
   3) 2016- के विश्वनाथ
   4) 2017 विनोद खन्ना
   5) 2018 अमिताभ बच्चन

🅾 आतापर्यंत सहा महिलांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यामध्ये 3 महिला महाराष्ट्रीयन आहेत

🧩  पुरस्कार विजेते महाराष्ट्रीयन:-

1)  दुर्गा खोटे 1983
2) वी शांताराम 1985
3) लता मंगेशकर 1989
4) भालजी पेंढारकर 1991
5) आशा भोसले 2000

🅾 अमिताभ बच्चन हे या पुरस्काराचे 50 वे मानकरी ठरले आहेत

🦋 🦋 🦋🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

२३ मे २०२०

वाचा :- 10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

● नुकत्याच झालेल्या जागतिक मधमाशी दिनाची संकल्पना (2020) काय होती?

*उत्तर* : बी एंगेज्ड

● ‘चॅलेंज कोविड-19 कॉम्पटिशन (C3)’ची घोषणा कोणत्या संस्थेनी केली?

*उत्तर* : नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन

● गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कचरा मुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात कोणत्या शहराला 5 स्टार रेटिंग प्राप्त झाले नाही?

*उत्तर* : बंगळुरू

● यंदा (2020) ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन’ची संकल्पना काय?

*उत्तर* : म्यूजियम्स फॉर इक्वलिटी: डायव्हरसिटी अ‍ॅण्ड इनक्लूजन

● ‘H.A.C.K.’ या नावाने सायबर सुरक्षा-विशिष्ट अ‍ॅस्सेलिरेटर केंद्र कोणत्या राज्याने उघडले?

*उत्तर* : कर्नाटक

● सामाजिक अंतर राखण्यात मदत होण्यासाठी ‘आयफिल-यू’ ब्रेसलेट कोणत्या देशाच्या संशोधकांनी विकसित केले?

*उत्तर* : इटली

● इस्राईल देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे?

*उत्तर* : बेंजामिन नेतन्याहू

● प्रथम आभासी जागतिक आरोग्य परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?

*उत्तर* : डॉ. हर्ष वर्धन

पश्चिम घाटातल्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागाबाबत अधिसूचना जाहीर करण्याची राज्यांची मागणी.

🌦 21 मे 2020 रोजी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात आणि तामिळनाडू या सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पश्चिम घाटातल्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागांबाबत अधिसूचना जाहीर करण्याच्या मुद्यांवर चर्चा केली.

🌦 या चर्चेदरम्यान पश्चिम घाटाचे महत्त्व लक्षात घेता या घाटाचे संरक्षण करण्याची गरज असल्याबाबत या सर्व राज्यांनी सहमती व्यक्त केली. पर्यावरण आणि जैवविविधता यांचे संरक्षण करण्यासाठी अधिसूचना लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी या राज्यांनी केली आहे.

🌑पार्श्वभूमी-

🌦 पश्चिम घाटांच्या जैव विविधतेचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच या भागाचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना केली होती. या समितीने महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये पश्चिम घाटाच्या अंतर्गत येणारे भौगोलिक क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग म्हणून घोषित करावे अशी शिफारस केली होती. हे भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर करणाऱ्या अधिसूचनेचा मसुदा ऑक्टोबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.

🌑पश्चिम घाट-

🌦 जैवविविधता, खनिज संपदा यांनी समृद्ध असलेला व अनेक प्रजातींचे वस्तीस्थान असलेला पश्चिम घाट हा भारताच्या पश्चिमेला आहे. पश्चिम घाटाला ‘सह्य़ाद्री’ म्हणूनही ओळखले जाते.

🌦 ही पर्वतराजी तापी नदीच्या दक्षिणेकडून महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेशेजारी सुरू होते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतून या पर्वतरांगा दक्षिण टोकाच्या जवळ पोचतात. या पर्वतराजीची लांबी 1600 कि.मी. असून याचा 60 टक्के भाग कर्नाटकात येतो. या पर्वतरांगांचे क्षेत्रफळ 60 हजार वर्ग कि.मी. असून पश्चिम घाटाच्या एकूण भूभागांपकी 30 टक्के भूभाग हा जंगलक्षेत्रात मोडतो. पश्चिम घाट हा जगातल्या जैवविविधतेच्या प्रमुख आठ (हॉटस्पॉट) प्रदेशांपैकी एक असून जगभरातल्या महत्त्वाच्या एकूण 34 प्रदेशांपैकी एक मानला जातो.

🌦 भारताच्या एकूण जैवविविधतेपकी 25 टक्के जैवविविधता पश्चिम घाटात आढळते. दरवर्षी प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक नवीन प्रजाती पश्चिम घाटामध्ये सापडतात. पश्चिम घाटातल्या जंगलांमुळे या प्रदेशातल्या हवामानावर अनुकूल परिणाम होतो. यामुळे पश्चिम उतार आणि पश्चिम किनारपट्टीवर अधिक पाऊस पडतो तर पूर्व उतारावर मध्यम पाऊस पडतो. पश्चिम किनारपट्टीवरील बंदरे आणि खाड्या हे वाहतूक व अर्थोत्पादनासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

🌑टिप्पणी:

🌦 1988 साली नॉर्मन मेअर या संशोधकाने सर्वप्रथम जैवविविधता ‘हॉटस्पॉट’ याविषयी संकल्पना मांडली होती. जैवविविधता ‘हॉटस्पॉट’ हे धोकाग्रस्त जैवविविधता संपन्न प्रदेश असतात. हिमालय, हिंद-म्यानमार, पश्चिम घाट, अंदमान व निकोबार हे चारही जैवविविधतेचे क्षेत्र भारतात अंशत: वसलेले आहेत.

ऑगस्ट महिन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर.

🔰करोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या बहुतांश क्रीडा स्पर्धा बंद आहेत. आयसीसी आणि अनेक क्रिकेट बोर्ड प्रेक्षकांविना सामने खेळवण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. अद्याप याबद्दल कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसून, बीसीसीआय देशात क्रिकेटची बंद पडलेली गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला जुलै महिन्यात तिरंगी मालिका खेळण्याचं निमंत्रण दिलं होतं. बांगलादेशच्या संघही या मालिकेत सहभागी होणं श्रीलंकेला अपेक्षित आहे.

🔰श्रीलंकेनंतर आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डही भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आफ्रिका दौरा करेल यासाठी आशादायी आहे.

🔰दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे हंगामी कार्यकारी अध्यक्ष जॅक फॉल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या दौऱ्याबद्दल क्रिकेट साऊथ आफ्रिका आणि बीसीसीआय या दोन्ही बोर्डांमध्ये चर्चा सुरु असल्याचं फॉल म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यातील भारतीय संघाचा प्रस्तावित टी-२० दौरा हा आयसीसीच्या नियमांनुसार नाहीये.

🔰दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे संचालक ग्रॅम स्मिथ आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात फेब्रुवारी महिन्यात याविषयी चर्चा झाली होती. यानंतर २० मे रोजी दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये टेलि-कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हा दौरा निश्चीत झाल्याचं फॉल यांनी सांगितलं. दोन्ही क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना सरावाची संधी कशी उपलब्ध करुन देता येईल याची चाचपणी करत आहेत.

राज्य निर्वाचन आयोगाची कार्य.

1. राज्य सरकार आणि राज्यपाल निवडणूक विषयक सल्ला देणे.

2. जिल्हापरिषद, पंचायतसमिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका यांचा मतदार याद्या तयार करणे.

3. वरील निवडणुका घेतल्यानंतर त्यांचे निकाल लावणे आणि विजयी उमेदवारांची नवे जाहीर करणे.

4. राष्ट्रीय पक्षांना निवडणूक चिन्ह बहाल करणे.

5. निवडणूक चिन्हांच्या बाबतीत राजकीय पक्षाद्वारे वाद निर्माण झाल्यास तो सोडविणे.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...