२१ मे २०२०

प्रश्न मंजुषा

1. सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला ...असे म्हणतात.

१) मोद्रिक धोरण.
२)राजकोषीय धोरण👈✍
३)द्रव्य निर्मिती
४) चलनविषयक धोरण

२. स्टेनलेस स्टील हे कशाचे समिश्र आहे.
१) लोखंड व कार्बन
२) लोखंड क्रोमियम व निकेल✍ 👈
३) लोखंड क्रोमियम व कोबाल्ट
४) लोखंड टीन व कार्बन

३. गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.

१)छोटा नागपूर
२)अरवली👈✍
३) मालवा
४) विध्य


४) खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.
१) कांगारू
२) पेग्विन
३) व्हेल
४) प्लॅटिपस👈

५) पंचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे
१)दुसरे
२)पाचवे
३)सातवे
४)नववे👈✍

६. रक्तगटाचा शोध कोणी लावला

१) लॅडस्टयनर👈
२)फुन्क
३)स्टेड
४)विल्यम हार्वे

७)........ या पदार्थाची विशिष्ट उष्माधरक्ता सर्वाधिक असते
१)पारा
२) चांदी
३) पाणी👈
४) लोखंड

८. भारतीय राष्ट्वादाचे जनक या‌ऺना म्हटले आहे.

१)सुरेंद्रनाथ बॅनर्जी ✍✍
२) लोकमान्य टिळक
३) न्यायमूर्ती रानडे
४)म.गांधी

९) ....... मुळे दुधाचा रंग पांढरा असतो
१)ग्लुकोज
२) लक्टोज
३)रेनिन
४)केसिन👈✍

१०. वनस्पति किवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात.
१)सी -१४ ✍✍
२) सी -१३
३) सी -१२
४) यापैकी एकही नाही

११.  चितगाव कटात सहभागी असलेल्या खालीलपैकी या युवतीने कलेक्टर स्टीव्हन सनची गोड्या घालून हत्त्या केली

१) शांती घोष व सूनिती चौधरी
२) बिनादास व अंबिका चक्रवर्ती
३) कल्पना दत्त व बिना दास
४) प्रित्तीलता वड्डेदार व कल्पना दत्त👈✍

१२. खालीलपैकी कोणती वनस्पती अन्नसंच्यायच  करणाऱ्या मुळाचे उदाहरण दर्शिविते
👉 मक्का

१३.लोखंडाच्या गॅलोनायझिंगसाठी कश्याचा वापर करतात
.👉 Zink  (जस्त)

〰〰〰〰〰〰〰〰〰

२० मे २०२०

संरक्षण क्षेत्रासंबंधी सरकारचा मोठा निर्णय



✅केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’वर भर देत काही महत्वाच्या घोषणा केल्या.

✅तर हळूहळू शस्त्रास्त्रांची आयात बंद होणार, संरक्षण क्षेत्रासंबंधी सरकारचा मोठा निर्णय.

✅सरकार शस्त्रास्त्रांची एक यादी तयार करुन मुदतबद्ध पद्धतीने शस्त्रास्त्रांची आयात बंद  करणार.

✅त्याचवेळी सैन्याला लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती भारतातच करण्यावर भर  देणार.

✅तसेच या उपायोजनांमुळे आयातीचे मोठे बिल कमी होईल.

✅संरक्षण क्षेत्रात स्वायत्तता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

✅संरक्षण उत्पादन क्षेत्रातील परकीय गुंतवणूक म्हणजे एफडीआयची मर्यादा 49 वरुन 74 टक्क्यापर्यंत वाढवण्यात आली आहे.

✅मुदतीमध्ये संरक्षण खरेदी आणि वेगवान निर्णय प्रक्रियेसाठी सरकार प्रकल्प व्यवस्थापन युनिटची स्थापना करणार.

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

▪️ कोणत्या कंपनीने नेत्रहीन लोकांसाठी “टॉकबॅक” कीबोर्ड विकसित केले आहे?
उत्तर : गुगल

▪️ कोणत्या कायद्याच्या अन्वये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा एक गुन्हा ठरविण्यात आला आहे?
उत्तर : आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५

▪️ कोविड-19 महामारीमुळे रद्द केलेला ‘टूर डी फ्रान्स’ कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : सायकल शर्यत

▪️ कोणत्या व्यक्तीला ‘इंटरनॅशनल प्राइज फॉर अरबी फिक्शन 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर : अब्देलौहब एसाओई

▪️ “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्स” याची स्थापना करण्याची शिफारस केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : एम. एस. साहू

▪️ कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?
उत्तर : हैदराबाद

▪️ कोणत्या शहराने ‘स्मार्ट शहरे’ अभियानाच्या अंतर्गत ‘सय्यम’ अॅप तयार केले?
उत्तर : पुणे

▪️ 2020 या वर्षासाठी जागतिक पुस्तक दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : शेयर ए मिलियन स्टोरीज

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘सुजलाम सुफलाम जलसंचय अभियान’ आरंभ केले?
उत्तर : गुजरात

▪️ 2020 या सालाचा ‘विल्यम ई. कोल्बी पुरस्कार’ कुणी जिंकला?
उत्तर : अ‍ॅडम हिगिनबॉथम

__________________________________

वाचा :- 10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

● कोविड-19 रोगाच्या उपचारांसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबल सॉलिडेरीटी ट्रायल’ उपक्रमात भारतातली कोणती संस्था भाग घेणार आहे?

*उत्तर* : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

● कोरोना विषाणू विषयक SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या आभासी शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने केले?

*उत्तर* : रशिया

● 'ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स अ‍ॅसेसमेंट, 2020' अहवाल कोणत्या संस्थेनी प्रसिद्ध केला?

*उत्तर* : खाद्यान्न व कृषी संघटना

● असा कोणता देश आहे ज्याने त्याच्या राजधानीतल्या रस्त्याचे नाव ‘रेहॉव्ह टॅगोर’ असे ठेवले?

*उत्तर* : इस्त्राईल

● भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालक पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

*उत्तर* : व्ही. विद्यावती

● ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन’ (CDC) ही संस्था कोणत्या देशात आहे?

*उत्तर* :  संयुक्त राज्ये अमेरिका

● बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी कोणत्या राज्याने 'होप' हे संकेतस्थळ कार्यरत केले?

*उत्तर* : उत्तराखंड

● जागतिक 'एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2020' अहवाल कोणत्या संस्थेनी प्रसिद्ध केला?

*उत्तर* : जागतिक आर्थिक मंच

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची चार वर्षे पूर्ण.

☑️प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेने (PMUY) नुकतीच चार वर्ष यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. त्यामुळे देशभरातल्या आठ कोटी गरीब आणि वंचित कुटुंबांच्या जीवनामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

☑️कोविड-19 महामारी या संकटाच्या सुरुवातीच्या काळातच भारत सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जाहीर केली होती. त्यातलाच एक महत्वाचा घटक म्हणून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना तीन महिने विनामूल्य LPG टाकी पुरवण्याचा निर्णय घेतला गेला होता. तसेच बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण योजनेनुसार 8,432 कोटींपेक्षा जास्त रुपये हस्तांतरित करण्यात आले.

🟣प्रधानमंत्री उज्ज्वला योजना:-

☑️प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक कल्याणकारी योजना आहे. वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे 2016 रोजी उत्तरप्रदेशाच्या बलिया या शहरात पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे उद्घाटन केले गेले होते. या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना पुढील 3 वर्षांत प्रत्येक जोडणीसाठी 1600 रुपये इतका आधार निधी देऊन 5 कोटी LPG जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

☑️ महिला सक्षमीकरणाची हमी देण्याच्या हेतूने विशेषत: ग्रामीण भारतात LPG जोडणी कुटुंबातल्या महिलेच्या नावाने दिले जाते. सध्या जवळपास 6.28 कोटींपेक्षा जास्त उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना विनामूल्य LPG टाकी मिळत आहे.

☑️घरामध्ये स्वयंपाकाचा गॅस आल्यामुळे दैनंदिन जीवनात सोय-सुविधा निर्माण झाली इतकंच नाही, तर आता निरोगी, सुरक्षित आयुष्य जगता येत असल्याचे अनेकांनी नमूद केले. स्वयंपाकासाठी जळण, लाकूडफाटा गोळा करण्याच्या त्रासातून कायमची मुक्ती मिळाली. तसेच नोंदणी केल्यानंतर अतिशय कमी कालावधीमध्ये भरलेली टाकी मिळत आहे.

WHOमध्ये भारताला मोठे पद.

👍भारत पुढच्या आठवड्यात जागतीक आरोग्य संघटनेच्या (WHO) एक्झिक्युटिव्ह बोर्डाचा चेअरमन होत आहे.

👍कोरोनाच्या मुद्यावर जगातील अनेक देश चीनवरोधात आवाज उठवत आहेत. असे असतानाच, या चीन विरोधाचा सामना भारत कशापद्धतीने करतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.

👍चीनने या महामारीसंदर्भात जगाला अंधारात ठेवले, असा आरोप अनेक देशांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या चौकशीची मागणीही केली जाते आहे.

👍भारत डब्ल्यूएचओमध्ये जपानची जागा घेईल. या जागतीक संघटनेच्या साउथ-ईस्ट आशिया ग्रुपने सर्वसंमतीने या पदासाठी भारताच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.

👍भारत एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या पुढील बैठकीत हे पद स्वीकारेल. यात डब्ल्यूएचओचे 194 सदस्य देश आणि पर्यवेक्षक भाग घेतील.

👍 विशेष म्हणजे चीन आणि अमेरिका यांच्यात कोरोनाच्या मुद्यावर तणावाचे वातावरण असतानाच, भारत या पदाची सूत्रे आपल्या हाती घेत आहे.

१८ मे २०२०

यशाचा राजमार्ग महत्त्वाची पोस्ट

नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो या lockdown
काळात विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडलेले आहेत त्यातील काही प्रातिनिधिक प्रश्न आणि त्यांची उत्तरे मी द्यायचा एक प्रयत्न करत आहे.

1.Mpscची परीक्षा कधी होणार? विभागवार परीक्षा कधी होणार?

उ-थोड्या उशिरा होतील परंतु परीक्षा नक्की होणार. ज्यादिवशी परीक्षा होणार त्या दिवसाच्या परीक्षेसाठी तयार राहा. परीक्षा होण्यासाठी जो वेळ लागणार आहे तो वेळ आपल्याला covid-19 विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी किती काळ लागणार आहे त्यावर अवलंबून आहे. संस्था ,शासन असो निर्णय हे असे असतात जे वेळ आणि परिस्थिती नुसार बदलत असतात त्यामुळे येत्या 4-5 महिन्यात जर परिस्थिती सुधारली तसेच कोणत्या विभागाला मनुष्यबळाची कमतरता जाणवली तर नक्कीच परीक्षा होतील.

2.घरी आहे, गावाकडे आहे अभ्यास होत नाही, मन लागत नाही काय करू?

उ-मित्रांनो अभ्यासाला लागते ती आंतरिक इच्छा! आपण त्याच घरी राहतो त्याच गावात राहतो जिथे आपण दहावी-बारावीची परीक्षा दिली चांगले मार्क्स मिळवून यशस्वी झालो आणि आता त्याच वातावरणात आपला अभ्यास होत नाहीये? का परीक्षा पुढे गेलेली आहे त्यामुळे अभ्यास करण्याची इच्छा होत नाहीये का? दुसऱ्यांशी आपण compare करतोय का? कोणीच अभ्यास करत नाहीये म्हणून मी पण अभ्यास करायचा नाहीये असे वाटते का? आपल्याला आपले ध्येय मिळवायचं असेल तर आंतरिक इच्छा हवी *(अभ्यास करायचा प्रयत्न होत नसेल तर आपली आंतरिक इच्छा आणि ध्येय मिळवण्यासाठीची समर्पित वृत्ती ची कमतरता आपल्यात आहे, अन् यशाच्या तीव्रते पेक्षा वडिलांच्या माराची भीती ची तीव्रता जास्त होती का? म्हणून ज्या घरात आत्ता आपला अभ्यास होत नाही त्याच घरात 10-12 ला अभ्यास करून चांगले मार्क मिळवले होते)* आणि अभ्यास करायलाच हवा हाच काळ आहे जो आपल्याला इतर विद्यार्थ्यां पेक्षा पुढे घेऊन जाईल पळत जा चालत जा रांगत जा किंवा घरंगळत जा परंतु आपला अभ्यासाचा प्रवास थांबवू नका.

3.अभ्यास संदर्भ उपलब्ध नाहीये अभ्यास कसा करू?

उ-मला मान्य आहे ऑफलाइन अभ्यास पुस्तके वाचन, पुस्तकात नोट्स काढणे पुस्तकावर रेघा मारून अभ्यास करणे हाच खरा अभ्यास परंतु या काळात काही काळापुरता का होईना अभ्यासाची modality बदलावी लागेल
A. YouTube वर आपणास ज्या शिक्षकाचे video समजत आहे त्यांचे शिकवणे समजत आहे असे video पहावे(ksagar spardha महाराष्ट्रातील समाज सुधारक या लेक्चर सिरीज साठी फॉलो करा)
B. ठराविक असे telegram channel फॉलो करा यावरून daily updates काही प्रमाणात current affairs यांचा अभ्यास होईल यासाठी आपण ksagar publication telegram channel फॉलो करू शकता.
C 3-4 आपल्या मित्रांचा एक discussion group बनवून व्हाट्सअप वर video call द्वारे ही आपण वेळ ठरवून,topic ठरवून discussion करू शकता.
D आपल्या घरातील लहान बहिण भाऊ यांचे शालेय पुस्तके किंवा कॉलेजमधील अशी पुस्तके की ज्याचा आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होऊ शकतो अशा पुस्तकांचे हे आपण वाचन करू शकता तसेच आपल्या शेजारील घरात जरी या पद्धतीचे पुस्तक उपलब्ध उपलब्ध होत असतील तेही वाचू शकता कोणताही स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असा अभ्यास आपण करू शकता तो करावा. Specific subjectसाठी हट्ट धरू नये specific subject चा हट्ट म्हणजे आपली अभ्यास करायची इच्छा कमी असणे असा लावता येऊ शकतो (सर्वात महत्त्वाचे आपण जर इंटरनेटचा वापर (you tube, Facebook)जर अभ्यासासाठी करत असाल तर याचा वापर टाईम वेस्ट म्हणजे timepass साठी करू नका नाहीतर अभ्यास करता करता कधी टाईमपास करायला लागलो आणि कसा वेळ गेला हे समजणार नाही.)

4.इतक्या वर्ष अभ्यास करत आहे आणि परीक्षा पुढे गेली यामुळे tension येत आहे depression येत आहे काय करू?

उ-मित्रांनो आजची परिस्थिती उद्या रहात नाही आजचा प्रश्न उद्या राहत नाही सिच्युएशन चेंज होत राहते त्यामुळे अकारण tension घेऊ नका tension आणि depression येण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे घरच्यांशी हरवलेला सुसंवाद यामुळे सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे घरच्यांशी सुसंवाद.. फक्त अशाच मित्रांशी कॉन्टॅक्ट ठेवा ज्यांच्यामुळे आपणास अभ्यास करण्याची स्फुर्ती मिळते प्रेरणा मिळते जे आपणास अभ्यास कर असे सांगतात. ज्या विद्यार्थ्यांमुळे negative vibes येतात,जाऊदे मरू दे रे माझा अभ्यास होत नाही tension येतंय,व अशा पद्धतीचे बोलणाऱ्या मित्र मैत्रिणी पासून काही काळापुरता संवाद कमी करावा. या काळात जमत असेल तर एक नवीन टाईम टेबल बनवा ज्यामध्ये घरच्या घरी yoga, मेडिटेशन काही व्यायाम करायचा प्रयत्न करा एक ठराविक वेळ घरच्यांशी संवाद साधण्यासाठी ठेवा. एक ठराविक वेळ स्वतःसाठी ठेवा, ज्यात आपण जमत असेल तर अवांतर वाचन, आवडत असलेले काम, गाणे ऐकणे किंवा ज्या गोष्टींमुळे आपले tension कमी होते अशा गोष्टींसाठी ठेवावा. घरात असल्यामुळे बाहेर मेसला जाऊन जेवण,बाहेर जाऊन चहा, मित्रांबरोबर च्या इतर गप्पा यासाठी जो वेळ राखून होता त्या

ऐवजी वरील गोष्टींना वेळ देऊन वेळेचा सदुपयोग करावा आणि tension कमी करण्यास थोडीशी स्वतः स्वतःला मदत करावी.

5. परीक्षा पुढे ढकलल्या मुळे कॉम्पिटिशन वाढेल का मेरीट high जाईल का

उ- होय अभ्यासाला  जास्त वेळ मिळाला आहे म्हणजे मेरिट high जाऊ शकते.covid-19 मुळे अनेक अर्थतज्ञ अभ्यासक म्हणतात जागतिक मंदी येऊ शकते आणि त्याचा जर भारतावर परिणाम झाला तर private sector चे job कमी होऊन ज्यांचे job गेले ते लोक secure option म्हणून govt. jobs ला प्राधान्य देऊ शकतात आणि येत्या 1-2 वर्षात स्पर्धा वाढू शकते.

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

▪️ कोणत्या कंपनीने नेत्रहीन लोकांसाठी “टॉकबॅक” कीबोर्ड विकसित केले आहे?
उत्तर : गुगल

▪️ कोणत्या कायद्याच्या अन्वये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा एक गुन्हा ठरविण्यात आला आहे?
उत्तर : आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५

▪️ कोविड-19 महामारीमुळे रद्द केलेला ‘टूर डी फ्रान्स’ कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : सायकल शर्यत

▪️ कोणत्या व्यक्तीला ‘इंटरनॅशनल प्राइज फॉर अरबी फिक्शन 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर : अब्देलौहब एसाओई

▪️ “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्स” याची स्थापना करण्याची शिफारस केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : एम. एस. साहू

▪️ कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?
उत्तर : हैदराबाद

▪️ कोणत्या शहराने ‘स्मार्ट शहरे’ अभियानाच्या अंतर्गत ‘सय्यम’ अॅप तयार केले?
उत्तर : पुणे

▪️ 2020 या वर्षासाठी जागतिक पुस्तक दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : शेयर ए मिलियन स्टोरीज

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘सुजलाम सुफलाम जलसंचय अभियान’ आरंभ केले?
उत्तर : गुजरात

▪️ 2020 या सालाचा ‘विल्यम ई. कोल्बी पुरस्कार’ कुणी जिंकला?
उत्तर : अ‍ॅडम हिगिनबॉथम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली माघार घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नऊ अधिकृत उमेदवारांची बिनविरोध निवड झाली

📌 शपथ घेणारे सदस्य

🎇 शिवसेना 🎇

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नीलम गोऱ्हे

🎇 भाजप 🎇

गोपीचंद पडळकर
प्रवीण दटके
रणजितसिंह मोहिते-पाटील
रमेश कराड

🎇 राष्ट्रवादी 🎇

शशिकांत शिंदे
अमोल मिटकरी

🎇 काँग्रेस 🎇

राजेश राठोड

नाम व त्याचे प्रकार

·         प्रत्यक्षात असणार्‍या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला 'नाम' असे म्हणतात.

·         उदा. टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खरेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इ.

👉नामाचे प्रकार :

·         नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात.

🛑सामान्य नाम -

·         एकाच जातीच्या पदार्थातील समान गुण धर्मामुळे त्या वस्तूचे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला 'सामान्य नाम' असे म्हणतात.

·         उदा. मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ.

 

·         (सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.)

🛑विशेष नाम -

·         ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास 'विशेष नाम' असे म्हणतात.

·         उदा. राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन, अमेरिका,गोदावरी इ.

·         (विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नाही आल्यास सामान्य नाम समजावे.)

·         उदा. या गावात बरेच नारद आहेत.

🛑भाववाचक नाम -

·         ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला 'भाववाचक नाम' असे म्हणतात.

·         उदा. धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.

 

·         (पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिति किंवा क्रिया दाखविणार्यां नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात.)

🛑अशाच पद्धतीने नामांच्या कार्यावरून त्यांचे काही नियम आहेत ते खालीलप्रमाणे-

👉नियम –

1. केव्हा-केव्हा सामान्यनाम हे विशेषनामांचे कार्य करतात.

उदा.

आत्ताच मी नगरहून आलो.

शेजारची तारा यंदा बी.ए. झाली.

वरील वाक्यामध्ये वापरली गेलेली नगर कोणतेही शहर, तारा(नक्षत्र) ही  मुळीच सामान्यनामे आहेत परंतु येथे ती विशेषनामे म्हणून वापरली गेलेली आहेत.

. 👉केव्हा-केव्हा विशेषनाम सामान्य नामाचे कार्य करतात.

उदा.

तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.

आमचे वडील म्हणजे जमदग्नि आहेत.

आम्हाला आजच्या विधार्थ्यात सुदाम नकोत भीम हवेत.

वरील वाक्यांत कुंभकर्ण, जमदग्नि, सुदाम, भीम गे मुळची विशेषनामे आहेत.
पण येथे कुंभकर्ण अतिशय झोपाळू, जमदग्नि = अतिशय रागीट मनुष्य, सुदाम=अशक्त मुलगे व भीम=सशक्त मुलगे या अर्थाने वापरली आहेत. म्हणजे मुळची विशेषनामे वरील वाक्यांत सामान्य नामांचे कार्य करतात.

. 👉 विशेषनामाचे अनेकवचन होत नाही झाल्यास त्यांना सामान्यनाम म्हणतात.

उदा. 

आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.

या गावात बरेच नारद आहेत.

माझ्या आईने सोळा सोमवारांचे व्रत केले.

विशेषनामाचे अनेकवचन होत नाही पण वरील वाक्यात विशेषनामे अनेकवचनी वापरलेली दिसतील या वाक्यातील विशेषनामे म्हणून वापरली आहेत.

कर्मवीर भाऊराव पाटील


🔵 जीवन, शिक्षण व समाजकार्य 🔵

🔺भाऊरावांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी
एका जैन कुटूंबात झाला.

🔺 त्यांचे वडिल इस्ट इंडिया कंपनीत लिपिक म्हणून नोकरीस होते.

🔺 सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय

🔺भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज, दहिवडी, विटे इत्यादी ठिकाणी झाले.

🔺 पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले

🔺 राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती

🔺 राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला

🔺 साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले

🔺 संस्थेचे चिन्ह बोधी व्रुक्ष आहे, याच्या खालीच सिद्धार्थ गौतमांना द्न्यानप्राप्ती झाली होती म्हणुन

🔺 सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक "४ ऑक्टोबर १९१९" रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

🔺 त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला

🔺 महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. 
‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ – या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

🔺 भाऊरावांनी महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले "फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल" सुरू केले.

🔺 भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले.

🔺 २५ फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते सातार्यातील वसतिगृहाचे "श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस" असे नामकरण केले गेले.

🔺 १६ जून १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली सातार्‍यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.

🔺  १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात "छत्रपती शिवाजी कॉलेज" ची, तर  १९५४ साली कऱ्हाड येथे "सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज" ची स्थापना केली.

🔺प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले

🔺 केंद्र सरकारने पद्मभूषन पुरस्कार दिला

🔺 1959 साली पुणे विद्यापीठाने डी लिट ही पदवी दिली

🔺9 मे 1959 या दिवशी पुण्याच्या ससून रुग्णालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले.

१७ मे २०२०

अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार..

🔰अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवला आहे.

🔰तसेच करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार असल्याचेही सांगितले  आहे.

🔰“मला सांगायला अभिमान वाटतो की अमेरिका आमच्या मित्र देश भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार आहे. या महामारीच्या काळात आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे आहोत.

🔰आम्ही करोनाविरोधात लस विकसित करण्यासाठी सहकार्य करत आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र येवून या अदृश्य शत्रूचा पराभव करु” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

🔰तर माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, ‘वर्षाच्या अखेरीस कोविड -19 वर लस उपलब्ध होईल अशी आशा आहे.’ त्यासाठी काही अधिकारी नेमण्याची त्यांनी घोषणा केली आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...