०८ मे २०२०

वेण्णा

महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातून वायव्य- आग्नेय दिशेने वाहणारी कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी. हिचा उगम महाबळेश्वर पठारावर क्षेत्र महाबळेश्वर परिसरात असून तेथून उगम पावणाऱ्या पंचनद्यांपैकी ही एक आहे. सुमारे ६५ किमी. लांबीची ही नदी उत्तरेस हातगेगड-आर्ले (आरळे) डोंगररांग आणि दक्षिणेस सातारा डोंगररांग यांच्यामधून, प्रामुख्याने जावळी व सातारा तालुक्यांतून वाहत जाते व सातारा शहराच्या पूर्वेस सु. ५ किमी. वरील माहुली येथे कृष्णेला मिळते. या संगामामुळे माहुली हे क्षेत्राचे ठिकाण बनले आहे.
वेण्णा नदीच्या उगमप्रदेशातच महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असून तेथील ‘वेण्णा लेक’ नौकाविहारासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे ३९.६५ हेक्टर क्षेत्रात पसरलेला हा तलाव १८४२ च्या सुमारास तयार करण्यात आला. याचे मोठ्या जलाशयात रुपांतर करण्याचे काम पूर्ण होत आले आहे
(२०००). या तलावातून बाहेर पडणारे वेण्णा नदीचे पाणी जवळच असलेल्या लिंगमाळा (लिंगमळा) किंवा वेण्णा या सु. १८० मी उंचीच्या धबधब्यावरुन दरीत कोसळते. पावसाळ्यात या धबधब्याचे दृश्य मनोहारी असते. लिंगमळा भागात स्ट्रॉबेरी, मलबेरी, बटाटे (लाल रंगाचे) यांसारखी उत्पादने घेतली जातात. हा जास्त पावसाचा, संरक्षित जंगलप्रदेश असून या खोऱ्यात जांभूळ, पिसा, गेळा, हिरडा, शिकेकाई, कारवी इ. वनस्पतिप्रकार आढळतात.
वेण्णा नदीवर सातारा तालुक्यात सातारा शहराचा वायव्येस कण्हेर गावाजवळ १९८८ साली मातीचे धरण बांधण्यात आले आहे. धरणाची उंची ५०.३४ मी. असून उजवा कालवा ५८ किमी. तर डावा कालवा २१ किमी. लांबीचा आहे. कालव्यांचे काम १९९० साली पूर्ण झाले. धरणाची पाणी साठवण क्षमता २,८६० लक्ष घ. मी. आहे. एकूण लाभक्षेत्र १२,७४५ हे. असून त्यापैकी लागवडयोग्य क्षेत्र ११,०७८ हे. आहे.
१९९३-९४ मध्ये ओलिताखालील एकूण क्षेत्रापैकी बारमाही ५५४ हे. व हंगामी ६,४०५ हे. क्षेत्राला सिंचनाचा लाभ होत होता. या धरणाच्या जलाशयात मत्स्यव्यवसायाचा विकास करण्यात आला आहे. १९९० साली कण्हेर येथे ४ मेवॉ. वीज निर्मितिक्षमतेचे जलविद्युत्‌ केंद्र उभारण्यात आले आहे. केळघर, मेढा, कण्हेर ही वेण्णा नदीखोऱ्यातील प्रमुख गावे आहेत.

नीरा नदी

कृष्णा नदीच्या भीमा ह्या उपनदीची उजवीकडील महत्त्वाची उपनदी. ही पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात, सह्याद्रीच्या डोंगर रांगांत उगम पावते.

पूर्वेस काही अंतर गेल्यावर ती ईशान्य दिशेने वाहते.
भाटघरजवळच तिला डावीकडून येळवंडी नदी मिळते. भोरपासून इंगवली गावापर्यंत नीरा तीव्र वळणे घेऊन मग पुन्हा पूर्ववाहिनी होते. तेथे तिला उत्तरेकडून शिवगंगा नदी मिळते. नंतर नीरा पुणे जिल्ह्याची दक्षिण सीमा बनते.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यांतून वाहात गेल्यानंतर, ती सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात उत्तरेकडे वळते आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व माळशिरस तालुका यांची सरहद्द बनते. सुमारे १६० किमी. वाहात गेल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या आग्नेयीस इंदापूर तालुक्यातील नरसिंगपूरजवळ भीमा नदीस मिळते. तेथे जवळच संगम नावाचे गाव आहे.

पुणे – बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर शिरवळजवळच या नदीवर पूल बांधला आहे. नीरा नदी मुख्यतः जलसिंचनासाठी उपयुक्त आहे. तिच्या येळवंडी उपनदीवर भाटघर येथे बांधलेल्या लॉइड धरणाचे पाणी नीरेतच सोडले जाते.

वीर गावाजवळ नीरा नदीवर धरण बांधले असून डावा व उजवा असे दोन कालवे काढले आहेत [ वीर धरण]. नाटंबी येथे या नदीवर आणखी एक धरण बांधण्याची योजना आहे.

राज्यसेवा प्रश्नसंच

🔹जेव्हा ___ यांना नाशिकचा कलेक्टर पेरी याने, ते धर्मशाळेसाठी काय करु शकतात असे विचारले तेव्हा त्यांनी पेरींना विंनती केली की ही धर्मशाळा गरीब लोकांसाठी आहे, येथे राहण्यासाठी त्यांच्या कडून एक पै देखिल भाडे घेतले जाणार नाही तेव्हा धर्मशाळेवरील कर रद्द करावा.

A)  गजाननमहाराज

B)  गाडगेमहाराज ✅

C) मंचरपुर सावरे गावचे पाटील

D)  देवदत्त घाटे

🔹जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत ___छापखाना सुरु केला.

A) बुद्धीसागर

B) ज्ञानसागर

C)  कालनिर्णय

D) निर्णयसागर✅

🔹विजोड व्यक्ती ओळखा :

A) बॅरिस्टर जयकर

B) वासुदेव दास्ताने

C)  अब्दुल सैफ

D) अण्णासाहेब भोकरकर✅

🔹______ शहरातील द अलबर्ट एडवर्ड हॉस्पिटलच्या स्त्रियांच्या विभागाच्या प्रमुख वैद्यम्हणून आनंदीबाई जोशी यांची नेमणूक झाली होती.

A) मुंबई

B) पुणे

C)  कोल्हापूर ✅

D) सुरत

🔹खालील विधाने विचारात घ्या :

(a) केन्द्रीय पातळीवर, अंदाज समितीतील सर्व सदस्य फक्त लोकसभेतीलच असतात. या समितीमध्ये राज्यसभेला प्रतिनिधीत्व नसते.

(b) महाराष्ट्र राज्य पातळीवर, अंदाज समितीतील सर्व सदस्य देखील फक्त विधान सभेतीलच असतात. या समितीमध्ये विधान परिषदेला प्रतिनिधीत्व नसते.

A( विधान (a) बरोबर आहे✅

B)  विधान (b) बरोबर आहे

C) दोन्हीही विधाने बरोबर आहेत

D) दोन्हीही विधाने चूकीची आहेत

🔹भारतामध्ये केंव्हापासून व्हॅट ह्या करप्रणालीची सुरवात झाली ?

A) 1 एप्रिल 2005✅

B) 1 एप्रिल 2003

C)  1 एप्रिल 2001

D) 1 एप्रिल 2002

🔹जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत ___छापखाना सुरु केला.

A) बुद्धीसागर

B) ज्ञानसागर

C) कालनिर्णय

D) निर्णयसागर✅

🔹विजोड व्यक्ती ओळखा :

A) बॅरिस्टर जयकर

B) वासुदेव दास्ताने

C)  अब्दुल सैफ

D) अण्णासाहेब भोकरकर✅

◾️मौर्य पूर्व काळात भारत _____ म्हणून ओळखला जाई.

A)  द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज✅

B) द क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज

C) द क्वीन ऑफ द सदर्न सीज

D)  द क्वीन ऑफ द एरिथ्रियन सी

नौदलाचं ऑपरेशन ‘समुद्र सेतू’, INS जलाश्व मालदीवमध्ये दाखल

◾️करोना व्हायरसमुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी नौदलाने ऑपरेशन ‘समुद्र सेतू’ लाँच केले आहे.

◾️ या ऑपरेशनतंर्गत भारतीयांना परत आणण्यासाठी नौदलाची ‘आयएनएस जलाश्व’ ही युद्धनौका मालदीवमध्ये पोहोचली आहे.

◾️ मालदीवची राजधानी मालेमध्ये ही युद्धनौका दाखल झाली आहे.

◾️आयएनएस जलाश्व 🛳बरोबर आयएनएस मगर 🛳ही युद्धनौका सुद्धा या मिशनमध्ये असणार आहे.

◾️पहिल्या टप्प्याच्या ऑपरेशनमध्ये मालदीवमधून १ हजार भारतीयांना परत आणण्यात येणार आहे.

◾️परराष्ट्र, संरक्षण, गृह, आरोग्य आणि अन्य मंत्रालयांशी समन्वय राखून ऑपरेशन समुद्र सेतू सुरु असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले.

◾️ भारताने आयएनएस शार्दुल 🛳 ही युद्धनौका संयुक्त अरब अमिरातीला पाठवली आहे.

◾️याशिवाय १२ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजार भारतीयांना परत आणण्यात येणार आहे.

_______________________________________

वायूकांड (विशाखापट्टणम वायुगळती)

भोपाळमध्ये १९८४ ला झालेल्या वायू गळतीच्या आठवणी अजूनही पुसलेल्या नाहीत. तेथील लोकांना काय भोगावे लागले, याच्या करूण कहाण्या अजूनही शहारे आणणा-या आहेत. आता देश एकीकडे कोरोनाच्या संकटाशी लढत असताना विशाखापट्टणम शहराजवळच्या एका रासायनिक प्रकल्पातून विषारी वायूची गळती झाल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला. पाच हजारांहून अधिक जणांना वायूबाधा झाली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहराजवळ आर. आर. वेंकटापूरम परिसरात ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईजवळ अशीच छोटीशी वायू दुर्घटना घडली होती. या वायू गळतीचा परिणाम पाच किलोमीटर परिसरात जाणवतो आहे.

नशीब दाट लोकवस्तीच्या भागात ही कंपनी असती, तर वायू गळतीच्या बळींची संख्या वाढली असती. ग्रामीण भाग असल्याने तेथे लोकसंख्येची घनता कमी आहे. त्यामुळे जीवितहानी फार झाली नाही. या परिसरातील लोकांना डोळ्यांमध्ये जळजळ होत असून श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागातील लोकांनी या ठिकाणापासून दूर जायला सुरुवात केली आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना जास्त त्रास होत असल्याचे आढळून येत आहे. पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत. लोकांना मेघाद्री गेड्डा आणि इतर काही ठिकाणी नेण्यात येत आहे. वायू गळतीची माहिती मिळताच आर. आर. वेंकटापूरम्, वेंकटापूरम्, पद्मनाभपूरम्, बीसी कॉलनी आणि कंपारापालेमच्या नागरिकांना इतरत्र हलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

काही जण हा वायू नाकावाटे शरीरात गेल्यामुळे बेशुद्ध झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी एलजी पॉलिमर्स कंपनीत झालेल्या या वायू गळतीची माहिती घेतली असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. हा रासायनिक प्रकल्प एलजी पॉलिमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे. 1961 मध्ये सुरू झालेले येथील प्रकल्प हिंदुस्थान पॉलिमर्सच्या मालकीचे होते. 1997 मध्ये दक्षिण कोरियाच्या एलजी या कंपनीकडे याची मालकी आली.

भोपाळचा प्रकल्प अमेरिकेच्या कंपनीचा होता, तर विशाखापट्टणमचा प्रकल्प दक्षिण कोरियाचा आहे. स्टायरिन या वायूची गळती झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. टाळेबंदीनंतर कारखान्यात पुन्हा काम सुरू करण्यात आले होते. कंपनीच्या आजूबाजूच्या गावातील लोक गाढ झोपेत असताना गुरुवारी पहाटे तीन वाजता वायू गळती सुरू झाली. अनेकांना याबाबत लगेच लक्षात आले नाही; पण हळूहळू वायू गळतीचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली. चाैकशी होईल, कारवाईचे नाटक उभे राहील; परंतु विषारी वायू पोटात गेल्याचे परिणाम कित्येक दशके भोगावे लागतात, त्याची भरपाई कशी करणार, हा खरा प्रश्न आहे.

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪️ कोणत्या ठिकाणी 2021 साली पुरुषांची जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत?
उत्तर : बेलग्रेड, सायबेरिया

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘आयुर रक्षा क्लिनिक’ कार्यरत केले?
उत्तर : केरळ

▪️ कोणत्या संरक्षण संस्थेनी ‘समुद्र सेतू’ मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे?
उत्तर : भारतीय नौदल

▪️ निधन झालेले रोनाल्ड व्हिव्हियन स्मिथ कोणत्या क्षेत्राशी जुळलेले होते?
उत्तर : इतिहास कार्य

▪️ प्रथमच कोणता देश आर्क्टिक प्रदेशातल्या वातावरणावर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह प्रक्षेपित करणार आहे?
उत्तर : रशिया

▪️ कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन साजरा केला जातो?
उत्तर : 4 मे

▪️ कोणत्या मंत्रालयाने “अ रे ऑफ जीनीयस” हा लघुपट प्रदर्शित केला?
उत्तर : सांस्कृतिक मंत्रालय

▪️ कोणत्या मंत्रालयाने “प्रोफ. बी. बी. लाल - इंडिया रिडिसकव्हर्ड” हे शीर्षक असलेले ई-पुस्तक प्रकाशित केले?
उत्तर : सांस्कृतिक मंत्रालय

▪️ कोणत्या संस्थेनी ‘ईकोवसेन्स’ (eCovSens) नावाचे उपकरण विकसित केले?
उत्तर : राष्ट्रीय पशू जैवतंत्रज्ञान संस्था

▪️ कोणत्या संस्थेनी UV ब्लास्टर नावाचे एक निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

▪️ कोणत्या मंत्रालयाने 49 वनोपज उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली?
उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय

▪️ कोणत्या व्यक्तीची येस बँकेच्या मुख्य जोखीम अधिकारी पदावर नेमणूक झाली?
उत्तर : नीरज धवन

▪️ जेमिनी रॉय कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर : चित्रकला

▪️ कोणत्या काश्मिरी उत्पादनाला GI टॅग प्राप्त झाले?
उत्तर : केसर

▪️ 2020 साली वसंत ऋतूतला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
उत्तर : 2 मे

▪️ कोणते राज्य नागरिकांना मोफत आणि रोखविरहित विमा हप्ता प्रदान करणारे पहिले राज्य ठरले?
उत्तर : महाराष्ट्र

▪️ कोणत्या भारतीय संस्थेनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी सिम्युलेशन कोड विकसित केले?
उत्तर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम

▪️ कोण इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इंस्टीट्यूट फॉर सेमी-अरीड ट्रॉपीक्स या संस्थेचे नवे महासंचालक आहेत?
उत्तर : जॅकलिन डी’अरोस हगेस

▪️ NASA संस्थेच्या मंगळ हेलिकॉप्टरचे नाव काय आहे?
उत्तर : इंजेन्यूटी

▪️ कोणती दूरदर्शन मालिका जागतिक स्तरावर सर्वाधिक बघितला जाणारा कार्यक्रम ठरला?
उत्तर : रामायण

राज्यसेवा आणि सयुक्त पुर्व परिक्षासाठी जुन पर्यंत अभ्यास नियोजन पुढीलप्रमाणे असावे..

1) सर्वसाधारण  जून पर्यंत म्हणजेच 50 दिवस

2) कोरोना नंतर साधारण ऑगस्ट  किवा त्यानतंर  पुर्व परिक्षा होतील असा अंदाज

3) जून पर्यंत पुढील विषयावर  विशेष  भर असावा
    (मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून)
   -भूगोल    
   -राज्यघटना
   -अर्थव्यवस्था
   -(फक्त सयुक्त परिक्षा लक्ष्य आसलेले
    विद्द्यार्थ्यांनी काही काही प्रमाणात मराठी आणि
    इंग्लिश ही करुन घ्यावे )

4 ) दररोज किमान एक तास 30 मी csat करावे
    ( सयुक्त पुर्व वर भर असणारे विद्द्यार्थ्यांनी
    बुद्धिमत्ता आणि  गणीत अधिक करावे )

5)बाकी इतर सर्व विषय पुर्व परिक्षेच्या उद्देश  समोर ठेउन पुर्व करण्यावर भर  द्यावा

6) सद्या तुमच्या सोबत अभ्यास साहित्य जेवढे आहे ते उत्तम करण्यावर भर द्या( बाकी साहीत्य  नाही ही समश्या मानू नका)

7) सद्या जे अभ्यास साहीत्य नाही ते जुलै  महिन्यात करण्याचे नियोजन करा.

8) परिक्षा आपली कोणतीही समश्या समजुन घेत नाही ( आपण परीक्षेच्या demand पुर्ण करावेच लागेल )

9)  If u want RESULT  dont give
    REASON (मार्ग शोधा दिशा सापडेल )

10) तूम्ही परिक्षा फॉर्म  भरला आहे तर अभ्यास केलाच पाहिजे.

11) तुमच्या आजुबाजुला लहान भाऊ बहिण आहेत त्यांच्या कडून state board book घ्या आणि  तात्पुरता  आभ्यस चालू ठेवा.

12) अभ्यास होत नसेल तेव्हा सराव प्रश्नसंच अधिक वापरा..

13) आरोग्य आणि अभ्यास  दोन्हीची उत्तम काळजी घ्या...उत्तम रहा.. सकारात्मक रहा..

                                    )

Motivation


आईवडीलांच्या संघर्षातुन निर्माण झालेले मोटीव्हेशन हे जगातील कोणत्याही मोटीव्हेशनल बायोपीक पेक्षा जास्त टचिंग असतात.



०७ मे २०२०

राज्य सरकारचा मोठा निर्णय! यंदा नोकरभरती नाही.

🅾कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आरोग्यसेवा वगळता इतर विभागांत  नोकर भरती न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

🅾तसेच शासकीय खर्चाला 67 टक्के कट लावण्यात आला असून, प्रत्येक विभागाला आता त्यांच्या एकूण बजेटच्या फक्त 33 टक्केच रक्कम मिळणार आहे. शिवाय, नवीन कोणतीही योजना सादर करू नये, असे वित्त विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

🅾तर प्रत्येक विभागाने आपल्या चालू योजनांचा आढावा घेऊन ज्या योजना पुढे ढकलण्यासारख्या आहेत किंवा रद्द करण्यासारख्या आहेत त्या निश्चित कराव्यात, असे आदेशात म्हटले आहे.
वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, मदत पुनर्वसन हे विभाग प्राधान्य क्रमाचे विभाग म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

🅾 या विभागांनी फक्त कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आपला निधी खर्च करायचा आहे. अन्य विभागांना कोणत्याही खरेदीच्या नव्या प्रस्तावांना मंजुरी देता येणार नाही.तसेच फर्निचर, दुरुस्ती, झेरॉक्स मशीन, संगणक, कार्यशाळा, सेमिनार, भाड्याने कार्यालय घेणे, असे खर्चदेखील आता करता येणार नाहीत.

🅾प्राधान्यक्रम नसलेल्या विभागांना, कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना, प्रशासकीय मान्यता देता येणार नाही अथवा प्रशासकीय मान्यता प्राप्त असली तरी निविदा प्रसिद्ध करता येणार नाही.मात्र औषधे, अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे व त्यांचा पुरवठा यांच्या खरेदीसाठी खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे.

राज्य ३१ मे पर्यंत करोनामुक्त झालंच पाहिजे, उद्धव ठाकरेंचे आदेश :

राज्यात वेगाने पसरणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ क़ॉन्फरन्सिंगवरुन बैठक घेतली व ३१ मे पर्यंत राज्य करोनामुक्त करण्याचे आदेश दिले.

‘प्रत्येक जिल्हा ग्रीन झोन बनलाच पाहिजे. भले मग त्यासाठी तुम्ही कितीही कठोर भूमिका घ्या’, असे उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना म्हणाले.

‘स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी आवश्यक निर्णय घेऊ शकतात. पण करोना नियंत्रणात आणण्याच्या बाबतीत कुठलीही हयगय अजिबात सहन करणार नाही असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले’. दैनिक भास्करने हे वृत्त दिले आहे.

पोलीस भरती प्रश्नसंच

▶️खालीलपैकी दिनविशेष व दिनांक यांची चुकीची जोड ओळखा.

A. बालदिन - १४ नोव्हेंबर

B. कामगार दिन -१ मे

C. शिक्षणदिन - १५ सप्टेंबर✅

D. बालिका दिन -३ जानेवारी

▶️छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत खाली पर्यायांपैकी कोणते?

A. तुकाराम - एकनाथ

B. रामदास -तुकाराम✅

C. तुकाराम - नामदेव

D. रामदास - एकनाथ

▶️शेतकऱ्यांवर मोठे अरिष्ट कोसळले” अधोरेखित शब्दांची जात कोणती?

A. सर्वनाम

B. नाम✅

C. क्रियापद

D. विशेषण

▶️मतलई वारे कोणत्या वेळी वाहतात.

A. फक्त दिवस

B. डोपरी किंवा पहाटे

C. फक्त रात्री✅

D. दिवस किंवा रात्री

▶️खालील संख्यामालीकेत प्रश्नाचीन्हाच्या जगही क्रमाने येणारे संख्या पर्यायातून निवडा:

३८ , २९ , २२ , ? , १४ , १३

A. १८

B. १६

C. १७✅

D. १९

▶️अक्षमाला : कखगघड, चछजझत्र, टठडढण, तथदधन, पफवभग.

सोबतच्या अक्षरमालेतील ट च्या डावीकडील चौथा अक्षर हे वर्णमालेतील कितवे अक्षर आहे?

A. १४

B. ८

C. ७✅

D. ११

▶️३५ मी. लांब व ५० मी. रुंद असलेल्य आयताकृती बागेच्या कडेने समीक्षने चार फेऱ्या मारल्या; तर ती किती मीटर अंतर चालली?

A. ९२०✅

B. २३०

C. ११५

D. ६९०

▶️_यांचे पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर

A. संत गाडगेबाबा✅

B. संत तुकाराम

C. संत चोखामेळा

D. संत शेख महंमद

▶️बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेले आंदोलन कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ?

A. स्वदेशी आंदोलन

B. चोरीचौरा आंदोलन

C. फोडा आणि तोडा आंदोलन

D. बंग - भंग आंदोलन✅

▶️खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक दर्शविणारा पर्याय कोणता?

A. ५/६

B. ३/५

C. ७/९

D. ४/७✅

▶️◾️◾️इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये (डिजिटल) अंकात्मक संदेश

अ. सलग संदेश संच पुरवत नाहीत.

ब. स्वतंत्र (विलग) पाय-यांमध्ये सादर केले जातात.

क. बायनरी (द्विमान) संख्यापद्धतीचा उपयोग करतात.

ड. दशमान आणि द्विमान (बायनरी) या दोन्ही संख्यापद्धतींचा उपयोग करतात.

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

पर्यायी उत्तरे :

A) फक्त अ आणि ब

B) फक्त ब आणि के

C) अ, ब आणि क✅

D) वरील सर्व

▶️◾️अणुकेंद्रका भोवली दुसन्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणा-या इलेक्ट्रॉनची उर्जा - 3.4 eV आहे. त्याची तिस-या भ्रमण कक्षेतील उर्जा किती ?

A) - 1.51J

B) - 3.4eV

C) - 1.51 eV ✅

D) - 13.6 eV

▶️◾️खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?

A)  भारताचे पहिले पर्यावरण पुरक जैव इंधन (bio-fuel) युक्त विमान चेन्नई आणि बेंगलुरु दरम्यान उडाले. ✅

B)  भारताने नुकतेच आपले जैव इंधन 2018 चे राष्ट्रीय धोरण जाहिर केले आहे.

C) या धोरणानुसार 2030 पर्यत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

D) वरीलपैकी एकही नाही

▶️◾️ नुकताच 'बॉनेटहेड
शार्क' (Bonnethead Shark) मासा बातम्यांमध्ये होता, त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :

अ] तो प्रामुख्याने समुद्र गवत (sea grass) खातो.

ब] तो प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळतो.

खाली दिलेल्या पर्यायातून योग्य विधान/ने निवडा :

पर्यायी उत्तरे :

A) फक्त अ✅

B) फक्त ब

C) अ आणि ब दोन्हीही

D) अ आणि ब दोन्हीही नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या ई कमिटीकडून नॅशनल मास्टर डाटाबेस तयार करण्याची प्रकिया सुरू.

🏵न्यायालयात दाखल होणारी प्रकरणे ई-फायलिंग  पद्धतीने दाखल करतायावेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या ई कमिटीकडून नॅशनल मास्टर डाटाबेस तयार करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

🏵यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडून राज्यात प्रॅक्टिस करत असलेल्या वकिलांची यादी मागविण्यात आली आहे, अशी माहिती बार कौन्सिलतर्फे देण्यात आली.

🏵सर्वोच्च न्यायालयाच्या इ कमिटीकडून या आराखड्यावर सध्या काम सुरू आहे. या कमिटीकडून बार कौन्सिल ऑफ इंडियाला याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.महाराष्ट्र बरोबरच देशातील इतर राज्यांत कडूनही यासाठी माहिती मागविण्यात आली आहे.

🏵ही माहिती गोळा करण्यात आल्यानंतर कोर्टात दाखल होणारे दावे ई-फायलिंग द्वारे कसे दाखल करता येतील याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

🏵महाराष्ट्रातील वकिलांची माहिती गोळा करण्यासाठी तसेच ई-फायलिंग या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकतीच बैठक घेण्यात आली अशी माहिती कौन्सिलचे सदस्य अड. राजेंद्र उमाप यांनी दिली.

🏵राज्यातील व परराज्यातील माहिती गोळा करण्यात आल्यानंतर ही माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या इ कमिटी कडे येणार आहे. त्या नंतर पुढील आराखडा तयार केला जाणार आहे.

🏵ही माहिती गोळा करण्यात आल्यानंतर प्रत्येक वकीलाला तालुका, जिल्हा, हायकोर्ट, आणि सुप्रीम कोर्टातही ई फाइलिंग द्वारे दावे दाखल करता येऊ शकणार आहेत, असे ही अड. उमाप यांनी सांगितले.

करोना व्हायरसवरील औषध निर्मितीमध्ये भारताला महत्वपूर्ण यश.

🔰सध्याच्या घडीला करोना व्हायरसवर अत्यंत परिणामकारक ठरणारे रेमडेसिविर औषध बनवण्याच्या दिशेने भारताने पहिले पाऊल टाकले  आहे.हैदराबाद स्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीने रेमडेसिविर औषध बनवण्यासाठी सुरुवातीला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती केली आहे.

🔰औषधात वापरण्यात येणारे घटकद्रव्य बनवण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.तसेच उद्या गरज पडली तर भारतात रेमडेसिविर औषधाची निर्मिती सुरु व्हावी, यासाठी IICT ने सिप्ला सारख्या औषध कंपन्यांसाठी टेक्नोलॉजीची प्रात्यक्षिक सुरु केली आहेत. गिलीयड सायन्सेस या औषध कंपनीने रेमडेसिविर औषधाची निर्मिती केली आहे.

🔰तर अमेरिकेत इमर्जन्सीमध्ये या औषधाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेमडेसिविर अँटीव्हायरल ड्रग हे औषध करोना व्हायरसवरील उपचारांमध्ये अत्यंत प्रभावी ठरत आहे.गिलीयड सायन्सेसकडे रेमडेसिविर औषधाचे पेटंट  आहे. पेटंट कायद्यानुसार व्यावसायिक वापरासाठी नव्हे, फक्त संशोधनासाठी या औषधाची निर्मिती करता येईल.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...