०६ मे २०२०

DRDOच्या प्रयोगशाळेनी अतिनील निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केला

- संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) याच्या दिल्लीतल्या लेजर सायंस अँड टेक्नॉलॉजी सेंटर (LASTEC) या प्रयोगशाळेनी अतिबाधित क्षेत्रांमध्ये वेगाने आणि रसायन-रहीत निर्जंतुकीकरणासाठी अतिनील (UV) निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केला आहे. या उपकरणाला ‘UV ब्लास्टर’ असे नाव देण्यात आले आहे.

- संस्थेनी न्यू एज इंस्ट्रुमेंट्स अँड मटेरियल्स प्रायवेट लिमिटेड (गुरुग्राम) या कंपनीच्या सहकार्याने उपकरणाचे आरेखन केले आहे आणि विकसित केले.

▪️उपकरणाची ठळक वैशिष्ट्ये  

- हे उपकरण अतिनील किरणांच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करते. 

- या उपकरणात चौफेर किरणोत्सर्ग होण्यासाठी ‘254 nm’ लहरींवर सहा दिवे बसवले आहेत. प्रत्येक दिव्याची ऊर्जा क्षमता 43 UV-C वॅट एवढी आहे.

- खोलीत विविध ठिकाणी हे उपकरण बसवता येते. त्यानुसार अंदाजे 12x12 फुट आकाराची एक खोली 10 मिनिट आणि 400 वर्ग फुटाची खोली 30 मिनिटांमध्ये निर्जंतुक केली जाऊ शकते.

- प्रयोगशाळा, कार्यालय, विमानतळ, मॉल, उपहारगृह, कारखाने अशा महत्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी याचा प्रभावी वापर करता येऊ शकतो.

- अतिनील किरणांवर आधारित निर्जंतुकीकरणासाठी वायफायचा वापर करुन मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारेही दूर ठिकाणी ही प्रक्रीया करता येऊ शकते.
------------------------------------------------

०५ मे २०२०

इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने....

1. 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _ ह्या ठिकाणी झाला.

A. सुरत
B. बडोदा
C. पोरबंदर ✔
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)

2. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?

A. 1890
B. 1893 ✔
C. 1896
D. 1899

3. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?

A. आफ्रिकन ओपिनियन
B. इंडियन ओपिनियन ✔
C. नाताळ काँग्रेस
D. ब्लॅक सॅल्युट

4. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?

A. साबरमती आश्रम
B. सेवाग्राम आश्रम
C. फिनिक्स आश्रम ✔
D. इंडियन आश्रम

5. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य ✔

6. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916
B. सन 1918 ✔
C. सन 1919
D. सन 1920

7. जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन ✔
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन

8. _ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930
B. सन 1933 ✔
C. सन 1936
D. सन 1939

9. 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान ✔
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना

10. ____ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.

A. 1 ऑगस्ट 1920 ✔
B. 1 ऑगस्ट 1925
C. 1 ऑगस्ट 1929
D. 1 ऑगस्ट 1935

11. भारतीय घटनेत सुरूवातीला किती कलमे होती ?

A. 6
B. 8 ✔
C. 10
D. 12

12. देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते ?

A. कलम 356
B. कलम 360 ✔
C. कलम 365
D. कलम 368

13. भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो ?

A. कायदामंत्री
B. राष्ट्रपती
C. सरन्यायाधीश ✔
D. लोकसभा सभापती

14. भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते ?

A. भारतातील सनदी अधिकारी
B. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ ✔
D. भारताचे सर्वोच्च न्यायालय

15. राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते ?

A. 14 दिवस ✔
B. एक महिना
C. चार महिना
D. एक वर्ष

16. विधानसभेत कमाल किती सदस्य असतात ?

A. 250
B. 270
C. 350
D. 500 ✔

17. केंद्र-राज्य विवाद खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात ?

A. उच्च न्यायालय
B. नियोजन मंडळ
C. आंतरराज्यीय परिषद
D. यापैकी कोणी नाही ✔

18. राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो ?

A. कायम
B. 5 वर्षे ✔
C. 6 वर्षे
D. 10 वर्षे

19. भारताने घटनादुरुस्तीची पध्दत कोणत्या देशाकडून घेतली ?

A. अमेरिका
B. दक्षिण आफ्रिका ✔
C. कॅनडा
D. आयर्लंड

20. भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते ?

A. 3 वर्षे
B. 4 वर्षे
C. 5 वर्षे ✔
D. 6 वर्षे

21. रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते ?

A. मायोसीन
B. फायब्रीनोजन ✔
C. केसीन
D. व्हिटेलीन

22. एक ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात ?

A. 10
B. 8
C. 6
D. 4 ✔

23. खालीलपैकी कोणते खरे फळ आहे ?

A. सफरचंद
B. काजू
C. अननस
D. नारळ ✔

24. TRIPS आणि TRIMS ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत ?

A. WTO ✔
B. IMF
C. IBRD
D. ADB

25. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे ?

A. मिसोस्फियर
B. थर्मोस्फियर
C. ट्रोपोस्फियर ✔
D. स्ट्रॅटोस्फियर

26. एकक क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात?

A. पर्णक्षेत्र निर्देशांक
B. पर्णक्षेत्र कालावधी ✔
C. पीक वाढीचा दर
D. तुलनात्मक पीक वाढीचा दर

27. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह _ येथे झाला.

A. संगमनेर, रत्नागिरी, मालवण
B. वडाळा, मालवण, शिरोडा ✔
C. शिरोडा, संगमनेर, ठाणे
D. कल्याण, मालवण, शिरोडा

28. युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ?

A. WHO
B. WWF
C. IEEP
D. UNEP ✔

29. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?

A. कराड
B. कोल्हापूर
C. नरसोबाची वाडी ✔
D. सातारा

30. ___ यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना 'आर्यसमाज' स्थापनेसाठी मदत केली.

A. स्वामी विवेकानंद
B. आगरकर
C. गोखले
D. लोकहितवादी ✔

31. कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली ?

A. सन 1500
B. सन 1510 ✔
C. सन 1520
D. सन 1530

32. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A. सन 1500
B. सन 1550
C. सन 1600 ✔
D. सन 1650

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪️ कोणत्या केंद्रीय मंत्रीने ‘पीटर्सबर्ग क्लायमेट डायलॉग’ याच्या प्रथम आभासी सत्रात भारताचे प्रतिनिधित्व केले?
उत्तर : प्रकाश जावडेकर

▪️ कोणत्या प्रयोगशाळेनी HCARD रोबोटिक उपकरण विकसित केले?
उत्तर : केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था

▪️ कोणत्या व्यक्तीची सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : राजीव कुमार

▪️ आंतरराष्ट्रीय नृत्य दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 29 एप्रिल

▪️ कोणत्या संस्थेनी ‘अल्झायमर इनहिबिटर’ विकसित केले?
उत्तर : JNCASR

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘जगनअन्ना विद्या दिवेना’ योजना लागू केली?
उत्तर : आंध्रप्रदेश

▪️ कोणत्या व्यक्तीची OECD समूहामध्ये अमेरिकेचे दूत म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : मनीषा सिंग

▪️ कोणत्या प्रदेशावरच्या ओझोन थरात आतापर्यंतचे सर्वात मोठे छिद्र तयार झाले होते?
उत्तर : आर्क्टिक क्षेत्र

▪️ श्वासोच्छवासामधली समस्या सोडवण्यासाठी कोणत्या संस्थेनी हर्बल डिकंन्जेस्टंट स्प्रे तयार केले?
उत्तर : नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट

▪️ कोणत्या संस्थेनी चंद्राचा पहिला भौगोलिक नकाशा प्रसिद्ध केला?
उत्तर : युनायटेड स्टेट्स जियोलॉजीकल सर्व्हे (USGS)

▪️ 2020 या वर्षी कामावर सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : स्टॉप द पँडेमीक: सेफ्टी अँड हेल्थ अॅट वर्क कॅन सेव्ह लाईव्ह्ज

▪️ कोणत्या शहरात ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण’ याचे मुख्यालय आहे?
उत्तर : गांधीनगर

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘आयडीयाथॉन’ नावाने कार्यक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : जल शक्ती मंत्रालय

▪️ GI टॅग प्राप्त झालेले ‘चक-हाओ’ हे काय आहे?
उत्तर : मणीपूरचा काळा तांदूळ

▪️ कोणत्या संस्थेनी "अतुल्य" नावाचे मायक्रोवेव्ह निर्जंतुकीकरण यंत्र विकसित केले?
उत्तर : डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी

▪️ कोणत्या विभागाने ‘यश’ नावाने एका कार्यक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : विज्ञान व तंत्रज्ञान विभाग

▪️ CSIR याच्या कोणत्या संस्थेनी ‘किसान सभा’ नावाचे अ‍ॅप तयार केले?
उत्तर : केंद्रीय रस्ते संशोधन संस्था

▪️ कोणत्या राज्य / केंद्रशासित प्रदेशाने ‘आयुरक्षा’ कार्यक्रम आयोजित केला?
उत्तर : दिल्ली

▪️ कोण ‘राष्ट्रीय पायाभूत पाइपलाइन’ संदर्भात नेमलेल्या कृती दलाचे प्रमुख होते?
उत्तर : अतनू चक्रवर्ती

▪️ कोणता देश जगातला सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय सागरी सराव आयोजित करतो?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

General Knowledge

▪️ कोणत्या संस्थेनी “आय स्टँड विथ ह्यूमॅनिटी” मोहीम चालवली?
उत्तर : आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन

▪️ कोणत्या राज्य सरकार वा केंद्रशासित प्रदेशाने ‘ऑपरेशन SHIELD’ कार्यक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : दिल्ली

▪️ कोणती व्यक्ती परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ता आहेत?
उत्तर : अनुराग श्रीवास्तव

▪️ ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालय, जेथे ‘नादिया’ वाघ कोविड-19 विषाणूने संक्रमित झाला, ते कोणत्या देशात आहे?
उत्तर : संयुक्त राज्य अमेरिका

▪️ कोणत्या दिवशी 'विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिडा दिन' साजरा केला जातो?
उत्तर : 6 एप्रिल

▪️ भारतात कोविड-19 तपासणीची पहिली मोहीम कोणत्या प्रयोगशाळेकडून आरंभ करण्यात आली आहे?
उत्तर : डॉ. डॅंग्स लॅब

▪️ कोणती संस्था चंद्रावर ‘आर्टेमिस बेस कॅम्प’ स्थापन करणार आहे?
उत्तर : नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन

▪️ कोणत्या संस्थेनी ‘पर्सनल सॅनिटायझेशन एनक्लोजर’ या नावाने शरीर निर्जंतुकीकरण कक्ष विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

▪️ 2020 या वर्षी राष्ट्रीय सागरी दिनाची संकल्पना काय होती?
उत्तर : सस्टेनेबल शिपिंग फॉर सस्टेनेबल प्लॅनेट

▪️ कोणता घटक अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या ‘5T’ योजनेचा भाग नाही?
उत्तर : टेस्टिफाय

General Knowledge

▪️ कोणत्या केंद्रीय मंत्रीने ‘पीटर्सबर्ग क्लायमेट डायलॉग’ याच्या प्रथम आभासी सत्रात भारताचे प्रतिनिधित्व केले?
उत्तर : प्रकाश जावडेकर

▪️ कोणत्या प्रयोगशाळेनी HCARD रोबोटिक उपकरण विकसित केले?
उत्तर : केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था

▪️ कोणत्या व्यक्तीची सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : राजीव कुमार

▪️ आंतरराष्ट्रीय नृत्य दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 29 एप्रिल

▪️ कोणत्या संस्थेनी ‘अल्झायमर इनहिबिटर’ विकसित केले?
उत्तर : JNCASR

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘जगनअन्ना विद्या दिवेना’ योजना लागू केली?
उत्तर : आंध्रप्रदेश

▪️ कोणत्या व्यक्तीची OECD समूहामध्ये अमेरिकेचे दूत म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : मनीषा सिंग

▪️ कोणत्या प्रदेशावरच्या ओझोन थरात आतापर्यंतचे सर्वात मोठे छिद्र तयार झाले होते?
उत्तर : आर्क्टिक क्षेत्र

▪️ श्वासोच्छवासामधली समस्या सोडवण्यासाठी कोणत्या संस्थेनी हर्बल डिकंन्जेस्टंट स्प्रे तयार केले?
उत्तर : नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट

▪️ कोणत्या संस्थेनी चंद्राचा पहिला भौगोलिक नकाशा प्रसिद्ध केला?
उत्तर : युनायटेड स्टेट्स जियोलॉजीकल सर्व्हे (USGS)

घटना परिषदेची इतर महत्वाची कामे

I. राष्ट्रीय ध्वज स्वीकारला – २२ जुलै १९४७
II. राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी देण्यात आली.- मे १९४९
III. राष्ट्रगीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०
IV. राष्ट्रीय गीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०
V. पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली- २४ जानेवारी १९५०

घटना परिषदेविषयी विशेष महत्वाचे

या घटना परिषदेची स्थापना करण्यात आल्यापासून तिचे कामकाज २ वर्ष ११ महिने व १८ दिवस चालले. शेवटची बैठक २४ जानेवारी १९५० रोजी झाली. घटनापरिषदेने देशांच्या घटनांचा अभ्यास केला. या परिषदेवर एकूण कालावधीमध्ये ६० लाख रुपये खर्च झाले. या परिषदेचे एकूण ११४ दिवस अधिवेशन चालले.

घटना समितीतील महत्वाच्या समित्या व त्यांचे अध्यक्ष

अ. क्र.   समितीचे नाव   समितीचे अध्यक्ष
१   संघराज्य घटना समिती   पं. जवाहरलाल नेहरू
२.   केंद्रीय उर्जा समिती   पं. जवाहरलाल नेहरू
३.   मसुदा समिती   डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४.   प्रांतीय राज्यघटना समिती   सरदार पटेल
५.   राज्य समिती   पं. जवाहरलाल नेहरू
६.   सुकाणू समिती   डॉ. राजेंद्र प्रसाद
७.   सभागृह समिती   पट्टाभी सीतारामय्या

मसुदा समिती

आपण पाहिलेल्या समितीमध्ये मसुदा समितीचे कार्य हे महत्वाचे होते. कारण, या समितीने घटनेला लिखित स्वरूप प्राप्त करून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २९ ऑगस्ट १९४७ मध्ये मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश करण्यात आलेला होता.
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( अध्यक्ष)
२) एन. गोपालस्वामी अय्यंगार
३) अल्लादी कृष्णास्वामी अय्यर
४) के.एम.मुन्शी
५) सय्यद मोहमद शादुल्ला
६) एन. माधव राव
७) टी. टी. कृष्णम्माचारी ( यांची निवड खैतानच्या मृत्युनंतर करण्यात आली.)
मसुदा समितीने घटना परिषदेतील वेगवेगळ्या समित्यांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या गटांबरोबर चर्चा करून आपला मसुदा फेब्रुवारी १९४८ मध्ये प्रसिध्द केला.
तो मसुदा प्रसिद्ध केल्यानंतर लोकांना त्यावर चर्चा करण्यासाठी व त्यावर आपले मत मांडण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. ज्या लोकांना आपले मत मांडावयाचे आहे त्यांच्यासाठी पत्राद्वारे आपले मत मांडण्यास परवानगी देण्यात आली.
- लोकांकडून आलेल्या मतानुसार काही दुरुस्त्या करण्यात आल्या. काही दुरुस्त्या करण्यात येऊन ऑक्टोबर १९४८ मध्ये पुन्हा मसूदा तयार करण्यात आला.

मसुद्याचे कायद्यात रुपांतर कसे झाले ?

पहिले वाचन

४ नोव्हेंबर १९४८ मध्ये मसुदा घटना परिषदेसमोर ठेवण्यात आला. या परिषदेमध्ये मसुद्यावर सर्वसाधारण ५ दिवस चर्चा करण्यात आली. या वाचनामध्ये काही दुरुस्त्या सुचवण्यात आल्या.

दुसरे वाचन

दुसऱ्या वाचन १५ नोव्हेंबर १९४८ ते १७ ऑक्टोबर १९४९ या कालावधीदरम्यान करण्यात आले. पहिल्या वाचनामध्ये ज्या दुरुस्त्या सुचवण्यात आलेल्या होत्या त्यावर चर्चा करण्यात आली.

तिसरे वाचन

तिसरे वाचन १९ नोव्हेंबर १९४९ रोजी करण्यात आले. हे एक औपचारिक वाचन होते. कारण ज्या काही दुरुस्त्या होत्या त्या दुसऱ्या वाचनादरम्यान करण्यात आलेल्या होत्या. या वाचनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला मसुदा मान्यतेसाठी घटना समितीसमोर ठेवला.
२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये घटना परिषदेकडून राज्यघटनेला मान्यता देण्यात आली.

राज्य घटना प्रत्यक्ष लागू

- २६ जानेवारी १९५० रोजी राज्य घटना प्रत्यक्ष लागू करण्यात आली. २६ जानेवारी ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आलेली होती.

राज्य घटनेची वैशिष्ट्ये :

a)विस्तृत लिखित राज्यघटना:

जगामध्ये दोन प्रकारच्या राज्यघटना अस्तित्वात आहेत. लिखित राज्यघटना व अलिखित राज्यघटना. अमेरिकेच्या राज्यघटनेकडे पाहिल्यास या घटनेमध्ये फक्त १४ कलमे आहेत.
मात्र भारताच्या राज्यघटनेमध्ये ८ परिशिष्टे व ३९५ कलमे होती. सध्या १२ परिशिष्टे व ४५० कलमांचा समावेश करण्यात आला आहे.

b) विविध स्त्रोतांपासून निर्मिती:

- राज्यघटना बनवत असताना इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला.
- या राज्यघटनेवर १९३५ च्या कायद्याचा जास्त प्रमाणावर प्रभाव दिसून येतो.
- अमेरिकन राज्यघटनेवरून मुलभूत हक्क / न्यायालयीन पुनर्विलोकन या बाबींचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला.
- आयर्लंडच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करण्यात आला.

c) मुलभूत हक्क:

- राज्यघटनेनुसार देशातील नागरिकांना काही मुलभूत हक्क देण्यात आलेले आहेत.
- राज्यघटनेमध्ये एकूण सहा प्रकारचे मुलभूत हक्क देण्यात आले आहेत.
- मुलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेच्या तिसऱ्या विभागामध्ये करण्यात आला आहे.

d) लवचिक व ताठर राज्यघटना :

- अमेरिकन राज्यघटना ही खूपच ताठर आहे. कारण या राज्यघटनेतील कलमांमध्ये सहजासहजी बदल / दुरुस्त्या करता येत नाहीत.
- तर ब्रिटिश राज्यघटना ही खूपच लवचिक आहे.
- मात्र घटनाकर्त्यांनी या दोन्हींचा विचार करून मधला मार्ग निवडला आहे.
- काही कलमांची दुरुस्ती ही सहज करता येते तर काही कलमांच्या दुरुस्तीसाठी विशेष अशा बहुमताची गरज असते.

e) मुलभूत कर्तव्य :

- १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीन्वये राज्यघटनेमध्ये एकूण ११ कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे.
- मुलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यासाठी स्वर्ण सिंग समितीची स्थापना करण्यात आली होती.
- या समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.
- मात्र मुलभूत कर्तव्यांबाबत कायदेशीर बंधने घालण्यात आलेली नाहीत.
- ही केवळ आदर्शे आहेत.

f) निधर्मी राष्ट्र:

- पाकिस्तानसारखे राष्ट्र हे एक इस्लाम धर्म असणारे राष्ट्र आहे.
- मात्र भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. कोणत्या एका धर्माला जास्त महत्व न देता सर्वांना समानता देण्यात आली आहे.
- सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता, आरोग्य यांना बाधा न आणता सर्वांना धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
- अल्पसंख्यांकांना शिक्षण संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

g) मार्गदर्शक तत्व:

- घटनेच्या चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.
- शासनाने आपला राज्यकारभार कोणत्या उद्देशासाठी करावा- हे स्पष्ट करणारी मार्गदर्शक तत्वे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
- ही मार्गदर्शक तत्वे- राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानवहित, आरोग्य यासंबंधी आहेत.
- या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशी होते, त्यावरून त्या राज्याच्या शासनाच्या कार्याचे मूल्यमापन होत असते.

h) एकेरी नागरिकत्व :

- अमेरिकेमध्ये संघाचे व राज्याचे असे वेगवेगळे नागरिकत्व दिले जाते.
- भारतामध्येही अनेक राज्य अस्तित्वात आहेत, मात्र या प्रत्येक राज्यांना वेगवेगळे नागरिकत्व न देता सर्वांसाठी एकच (एकेरी) नागरिकत्व देण्यात आले आहे.

i) स्वतंत्र व एकेरी न्यायव्यवस्था :

- संपूर्ण देशासाठी एकसूत्री न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
- सर्व देशासाठी सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे. (apex court)

j)मतदानाचा अधिकार :

- पहिल्यांदा २१ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता.
- मात्र १९८९ मध्ये ५१ व्या घटनादुरुस्तीनुसार १८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.

k)आणीबाणीची तरतूद :

- काही घटनात्मक पेचप्रसंगाच्या वेळी देशामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते, अशा वेळी आणीबाणी लागू केली जाते. हे आणीबाणी लागू करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत.
- या आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र हे प्रबळ बनते. राज्याचे सर्व अधिकार केंद्राकडे जात असतात.

l) त्रि–स्तरीय सरकारची स्थापना:

- केंद्र, राज्य, पंचायत राज
- यानुसार पूर्ण देशासाठी केंद्र सरकार अस्तित्वात असून, ही एक उच्च अशी शासनव्यवस्था आहे.
- प्रत्येक राज्यासाठी राज्य सरकारची निर्मिती करण्यात आली आहे.
- तर जिल्हा- तालुका- ग्राम( खेडे) यासाठी पंचायतराजची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यघटनेविषयीचे काही दोष:

1. घटना निर्मिती करण्यासाठी जी घटना परिषद बनवण्यात आली होती, त्यातील सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानाद्वारे करण्यात आली नव्हती.
2. लॉर्ड विस्काऊट सायमन व विन्स्टन चर्चिलच्या मते, “ भारतीय राज्यघटना ही हिंदू लोकांपासून बनवण्यात आलेली आहे.”
3. काहींच्या मते, “ घटना परिषद ही वकील- राजकीय व्यक्तींची बनलेली होती.”

पोलीस भरती प्रश्नसंच


▶️महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?

👉🏿उत्तर — कोल्हापूर

▶️महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर  — औरंगाबाद

▶️विदर्भातील ............. जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.?
👉🏿 उत्तर —  गोंदिया

▶️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी ............. या जिल्ह्यात चालते.
👉🏿उत्तर — रत्नागिरी

▶️ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?
👉🏿उत्तर — गोंदिया

▶️महाराष्ट्राचे पठार ............. या खडकाने बनलेले आहे.
👉🏿. उत्तर — बेसॉल्ट

▶️महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला .....................म्हणून ओळखतात.
👉🏿 उत्तर — सह्याद्री

▶️महाराष्ट्रातील ............... जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे.
👉🏿उत्तर — मुंबई

▶️ महाराष्ट्रातील ............... या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
👉🏿. उत्तर — रत्नागिरी

▶️ महाराष्ट्रात ................... या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
👉🏿उत्तर — गडचिरोली

▶️ महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर — सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

▶️महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता ?

👉🏿उत्तर — वर्धा.

▶️महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आणि कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला ?

👉🏿 उत्तर —  प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर.

▶️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत ?

👉🏿उत्तर — महाराष्ट्रात

▶️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोणत्या जिल्यात आहे ?

👉🏿 उत्तर — नाशिक

▶️ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता ?

👉🏿उत्तर — अहमदनगर.

▶️ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉🏿 उत्तर —  रायगड

▶️महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ................ येथे पडतो.

👉🏿उत्तर — आंबोली (सिंधुदुर्ग)

▶️ पढरपूर हे शहर .............. या नदीकाठी आहे. आणि त्या नदीलाच महाराष्ट्राची काशी म्हणतात.

👉🏿उत्तर — भीमा

▶️कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

▶️जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ? 
👉🏿
उत्तर — बुलढाणा

▶️बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?

👉🏿औरंगाबाद

▶️ पणे जिल्ह्यातील हे शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

👉🏿उत्तर - जुन्नर

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...