०८ एप्रिल २०२०

ईशान्य राज्यांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास.


 
🦋2014-15 पासून आतापर्यंत ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय आणि एनईसीने ईशान्य राज्यांच्या विकासासाठी विविध योजनांच्या अंतर्गत 8640.08 कोटी रुपयांच्या 549 प्रकल्पांना मंजुरी दिली.

🦋याकाळात एकूण 667 प्रकल्प पूर्ण झाले. यामध्ये याकाळात मंजुरी मिळालेल्या 32 प्रकल्पांचा समावेश होता. उर्वरित प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत.

🦋केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

♾♾आयुष्मान भारत योजनेअंतर्गत वेलनेस सेंटर♾♾

🚦आयुष्मान भारत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटर अंतर्गत दीड लाख उपआरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे डिसेंबर 2022 पर्यंत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटरमधे रुपांतर करण्यात येत आहे.

🚦2018-19 या वित्तीय वर्षापर्यंत 40,000 हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटरना परवानगी द्यायचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात 62,000 पेक्षा जास्त मंजूऱ्या देण्यात आल्या.

🚦राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटरमधे रुपांतर करण्यासह ही केंद्रे बळकट करण्यासाठी तंत्रविषयक आणि वित्तीय सहाय्यता पुरवली जाते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.

राष्ट्रपतींनी कुष्ठरोगासाठीचे आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार केले प्रदान.

✴️राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज डॉ. एम. एस. धर्मशक्तू यांना भारतीय नामांकन (वैयक्तिक) गटासाठी तर, लेप्रसी मिशन ट्रस्टला संस्था गटासाठी कुष्ठरोगासाठीचे आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार प्रदान केले.

✴️यावेळी बोलतांना राष्ट्रपती म्हणाले की, कुष्ठरोगाविरोधातील आपल्या लढ्यात इतक्या वर्षात आपण कुष्ठरोग निर्मुलनात यशस्वी झालो आहोत.

✴️वैज्ञानिक संशोधन संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण कामामुळे कुष्ठरोगाबाबत कलंक आणि पूर्वग्रह यात लक्षणीय घट झाली आहे. मात्र तरीही नवीन रुग्ण आढळत आहेत, असे ते म्हणाले.

✴️कुष्ठरोग नियंत्रणाची हिच पातळी कायम राखण्याचे आव्हान असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. कुष्ठरोगाचे लवकर निदान, योग्य उपचार सर्वांना सहज उपलब्ध होणे आणि एकात्मिक कुष्ठरोग सेवा पुरवण्यासाठी प्रयत्नांना गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वैद्यकीय स्थितीपेक्षाही या आजाराशी जोडलेले सामाजिक कलंक अजूनही कायम असून, ही चिंतेची बाब असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.

✴️ या रोगाबाबत जागृक आणि शिक्षित व्हायला हवे आणि हिच जागृकता माहितीच्या प्रसाराद्वारे जनतेमध्ये निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

लॉकडाउन : अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम; ५२ टक्के नोकऱ्यांवर टांगती तलवार ?

- देशात करोना व्हायरसच्या वाढत्या पार्श्वभूमीवर २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. परंतु यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सीआयआयनं केलेल्या एका सर्व्हेक्षणात यामुळे देशातील ५२ टक्के नोकऱ्या जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. तब्बल २०० कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यादरम्यान ऑनालाइन पद्धतीनं सीआयआयनं सर्व्हेक्,ण केलं.

- ‘CII सीईओ स्नॅप पोल’नुसार देशातील सर्वाधिक कंपन्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचं समोर आलं आहे. तसंच यामुळेच नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुरू तिमाहित आणि गेल्या तिमाहित बहुतांश कंपन्यांच्या उत्पन्नात १० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशांतर्गत कंपन्यांचं उत्पन्न आणि नफा या दोन्हीमध्ये होत असलेल्या घसणीचा परिणाम देशाच्या जीडीपीवरही पडणार असल्याचं सीआयआयकडून सांगण्यात आलं.

- रोजगाराकडे पाहिल्यास संबंधित क्षेत्रांमध्ये ५२ टक्के नोकऱ्यांवर गडांतर येऊ शकतं. तर दुसरीकडे लॉकडाउनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ४७ टक्के कंपन्यांमध्ये १५ टक्क्यापेक्षा कमी नोकऱ्यांवर गडांतर येण्याची शक्यता आहे. तर ३२ टक्के कंपन्यांमध्ये १५ ते ३० टक्क्यांच्या दरम्यान रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता सर्व्हेक्षणादरम्यान व्यक्त करण्यात आली आहे.
--------------------------------------------------

१५ एप्रिलनंतर भारतात आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा.

🔰तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी १५ एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ठेवा अशी मागणी मोदी सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी BCG च्या अहवालाचा हवाला दिला आहे. ३ जूनपर्यंत भारतात परिस्थिती आटोक्यात येईल असं या अहवालात म्हटल्याचं राव यांनी स्पष्ट केलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवण्याची मागणी केली आहे. खरंतर लॉकडाउन संपण्यासाठी १४ एप्रिल ही तारीख अजून उजाडायची आहे. मात्र तो संपण्याआधीच के चंद्रशेखर राव यांनी आणखी दोन आठवडे भारतात लॉकडाउन हवा अशी मागणी केली आहे.

🔰२५ मार्च ते १४ एप्रिल या २१ दिवसांच्या कालावधीसाठी देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्याआधी २२ मार्चच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर २५ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत देशात लॉकडाउन पुकारण्यात आला. आता हा कालावधी आणखी वाढवावा अशी मागणी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

🔰भारतात करोनाग्रस्तांची संख्या ४ हजारांच्या वर गेली आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि येत्या काळातही ही संख्या वाढू शकते हे लक्षात घेऊन लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवावा असं राव यांनी म्हटलं आहे. अद्याप लॉकडाउन नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कुणाकडेच नाही. मात्र आता तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांनी केलेल्या मागणीवर मोदी सरकार काही विचार करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कॅनडाचा ऑलिम्पिक २०२०मधून माघार घेण्याचा निर्णय

🔰करोना व्हायरसमुळे जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा स्थगित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने (IOC) योग्य वेळी स्पर्धे संदर्भातील निर्णय घेऊ असे म्हटले आहे. तर जपानचे पंतप्रधान स्पर्धा स्थगित किंवा पुढे ढकलण्याची गरज नसल्याचे सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर एक मोठा धक्का बसला आहे.

🔰कॅनडाने ऑलिम्पिक २०२०मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी रविवारी ही घोषणा केली. कॅनडाच्या ऑलिम्पिक समितीने आणि पॅराऑलिम्पिक समितीने करोना व्हायरसमुळे २०२०मध्ये होणाऱ्या दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेणार नसल्याचे म्हटले आहे.

🔰याशिवाय गेल्या ४८ तासात कॅनडा अनेक देशातील ऑलिम्पिक समिती आणि क्रीडा संघटनांना जुलैपासून सुरू होणारी ही स्पर्धा स्थगित करण्याची मागणी करण्यास सांगत आहेत. याआधी अमेरिका आणि ब्रिटनच्या ऑलिम्पिक समितीने ही स्पर्धा स्थगित करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण या वर्षीच्या स्पर्धेतून एखाद्या देशाने माघार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

🔰करोना व्हायरसमुळे जगभरात १३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा वेळी ऑलिम्पिकचे आयोजन करणे अशक्य वाटत आहे. कॅनडाच्या ऑलिम्पिक समिती आणि पॅराऑलिम्पिक समितीने दोन्ही स्पर्धा एक वर्षासाठी स्थगित करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील विनंती त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला देखील केली आहे.

🔰सध्याच्या परिस्थितीत ही स्पर्धा स्थगित करणे योग्य ठरले.खेळाडूंची सुरक्षितता आणि जगाचे आरोग्य महत्त्वाचे असल्याचे कॅनडाच्या समितीने म्हटले आहे.

ब्रिटनचे ऑक्सफोर्ड विद्यापीठ सर्वोत्तम विद्यापीठ


लंडनच्या ‘टाइम्स’ या संस्थेच्यावतीने ‘टाइम्स हायर एज्युकेशन जागतिक विद्यापीठ अहवाल 2020’ प्रसिद्ध केला. या अहवालानुसार
भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरू आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था , रोपार या केवळ दोन भारतीय संस्थांनी या यादीत प्रथम 350 क्रमांकामध्ये जागा मिळविलेली आहे. या दोन संस्थांनी समान गुणासह संयुक्तपणे क्रमांक ‘301-350’ या गटात जागा मिळविलेली आहे.

🔰 अहवालातील महत्वाचे निष्कर्ष:-
• जगातले सर्वोत्तम विद्यापीठ - ऑक्सफोर्ड विद्यापीठ, ब्रिटन.

🔰 प्रथम 10 सर्वोत्तम विद्यापीठे
१. ऑक्सफोर्ड विद्यापीठ.( ब्रिटन.)
२. कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका),
३. केंब्रिज विद्यापीठ (ब्रिटन)
४. स्टॅनफोर्ड विद्यापीठ (अमेरिका)
५. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका)
६.प्रिन्सटन विद्यापीठ (अमेरिका)
७.हार्वर्ड विद्यापीठ (अमेरिका)
८. येल विद्यापीठ (अमेरिका)
९. शिकागो विद्यापीठ (अमेरिका)
१०. इम्पीरियल कॉलेज लंडन (ब्रिटन)

•  जागतिक क्रमवारीत भारताची उपस्थिती सुधारली असून गेल्यावर्षी केवळ 49 संस्था यादीत समाविष्ट होत्या मात्र या वर्षी 56 संस्थांचा क्रमांक लागला आहे. नवीन IIT इंदौर या संस्थेचे 351-400 गटात स्थान आहे, पंजाब विद्यापीठ, चंदीगड 601-800 या गटात कायम असून IIT गांधीनगर नव्यानेच 501-600 या गटात प्रवेश केला आहे.

• जागतिक क्रमवारीत समाविष्ट केल्या गेलेल्या भारतीय संस्थांच्या संख्येमुळे, भारत हा आशिया खंडात पाचव्या स्थानावर असून जापान आणि चीन अव्वल आहेत

16वी घटनादुरुस्ती 1963

1)  राज्यसंस्थेला भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांच्या हितार्थ भाषण आणि अभिव्यक्ती, शांततापूर्व एकत्र जमणे आणि संघटना, संस्था स्थापन करणे या मूलभूत हक्कांवर आणखी निर्बंध लादण्याचे अधिकार प्रदान.

2) कायदेमंडळाला निवडणूक लढविणारे उमेदवार कायदेमंडळाच्या सदस्य, मंत्री, न्यायाधीश आणि भारताचे महालेखापरीक्षक यांनी करावयाच्या सत्य विधान आणि शपथेच्या प्रारूपामध्ये सार्वभौमत्व आणि अखंडता यांचा समावेश

15वी घटनादुरुस्ती 1963

1)  एखादी कृती, गुन्हा, कृत्य एखाद्या उच्च न्यायालयाच्या भौगोलिक अधिकार क्षेत्रात घडलेले असेल तर त्या संबंधातील खटल्याच्या न्यायनिवाड्यात उच्च न्यायालय त्या भौगोलिक क्षेत्राबाहेरील कोणत्याही व्यक्तीला किंवा अधिसत्तेला न्यायालयीन आदेश बजावू शकते.

2) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय ६० वरून ६२ करण्यात आले.

3) उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीशाला त्याच उच्च न्यायालयात हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची तरतूद

4) एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये बदली केलेल्या न्यायाधीशाला हानिपूरक भत्ता देण्याची तरतूद

5) उच्च न्यायालयाचा सेवानिवृत्त न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचा अस्थायी न्यायाधीश म्हणून कार्य करू शकते.

6) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वय निश्चितीची कार्यपद्धती.

०७ एप्रिल २०२०

General Knowledge

▪ कोणाच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
उत्तर : राम नाथ कोविंद

▪ तंजावूर हे शहर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : तामिळनाडू

▪ कोणत्या राज्यात ‘मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजना’ लागू करण्यात आली?
उत्तर : उत्तरप्रदेश

▪ 21 जानेवारीला कोणत्या राज्याने राज्याचा 48 वा स्थापना दिन साजरा केला?
उत्तर : मेघालय

▪ कोणत्या राज्य सरकारने शाळांमध्ये संविधानाची प्रस्तावना याचे वाचन अनिवार्य केले आहे?
उत्तर : महाराष्ट्र

▪ ‘कार्बन डिसक्लोजर प्रोजेक्ट 2019’ या अहवालात भारत कोणत्या क्रमांकावर आहे?
उत्तर : 5 वा

▪ कोणत्या राज्यात ‘फिट इंडिया सायक्लोथन’ आयोजित केले गेले?
उत्तर : गोवा

▪ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांचा 15 वा उदय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
उत्तर : 18 जानेवारी

▪ कोणते राज्य 6 मार्च 2020 रोजी ‘चपचार कुट’ महोत्सव साजरा करणार?
उत्तर : मिझोरम

▪ कोणत्या कंपनीने 3.5 अब्ज डॉलर एवढ्या रकमेसह भारतातली ‘उबर इट्स’ ही कंपनी विकत घेतली?
उत्तर : झोमॅटो

▪ कोणत्या राज्यात भारतातले पहिले ई-वेस्ट क्लिनिक उघडण्यात आले?
उत्तर : मध्यप्रदेश

▪ कोणते राज्य शेतजमीन भाड्याने देण्याचे धोरण आखणारे पहिले राज्य ठरले?
उत्तर : उत्तराखंड

▪ कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन’ पाळला जातो?
उत्तर : 24 जानेवारी

▪ कोणत्या खेळाडूने मेटन चषक या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले?
उत्तर : दिव्यांश सिंग पनवार

▪ कोणत्या बँकेनी जानेवारी 2020 या महिन्यामध्ये ATM द्वारे ‘कार्डविरहित पैसे काढण्याची सुविधा कार्यरत केली?
उत्तर : ICICI बँक

▪ ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेले ‘वज्र’ नावाचे देयक व्यासपीठ कुणी प्रस्तुत केले?
उत्तर : भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI)

▪ भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?
उत्तर : चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी

▪ ‘ग्रीनपीस इंडिया’च्या अहवालानुसार, भारतातले कोणते शहर सर्वात प्रदूषित आहे?
उत्तर : झारिया

▪ मनमोहन सूद ह्यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
उत्तर : क्रिकेट

▪ कोणाच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
उत्तर : राम नाथ कोविंद

▪ कोणत्या शहरात 36 व्या राष्ट्रीय खेळांच्या अधिकृत शुभंकराचे अनावरण केले गेले?
उत्तर : पणजी

▪ IBM कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणत्या व्यक्तीची निवड झाली?
उत्तर : अरविंद कृष्ण

▪ ऑस्कर पुरस्काराच्या सोहळ्यात ऑर्केस्ट्राची जबाबदारी स्वीकारणारी प्रथम महिला कोण ठरल्या?
उत्तर : एमियर नून

▪ कोणत्या राज्याने देशाची पहिली ‘फ्रूट ट्रेन’ रवाना केली?
उत्तर : आंध्रप्रदेश

▪ कोणत्या राष्ट्राध्यक्षाने ‘अमेरिका-मेक्सिको-कॅनडा करार’ या नव्या त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली?
उत्तर : डोनाल्ड ट्रम्प

▪ भारतात कोणत्या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन पाळला जातो?
उत्तर : 30 जानेवारी

▪ कोणता खेळाडू ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अ‍ॅथलीट’चा पुरस्कार जिंकणारा प्रथम हॉकीपटू ठरला?
उत्तर : राणी रामपाल

▪ ‘संप्रीती’ हा कोणत्या दोन देशांदरम्यानचा युद्ध सराव आहे?
उत्तर : भारत आणि बांग्लादेश

▪ कोणत्या जिल्ह्यात 34 वा ‘सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळावा 2020’ भरणार आहे?
उत्तर : फरीदाबाद

▪ कोणत्या राज्यात जगातल्या सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन झाले?
उत्तर : तेलंगणा

पहिल्यांदाच पृथ्वीवर इतकी शुद्ध हवा

👉🏻 कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे पृथ्वीला मोठा दिलासा मिळाला आहे. पृथ्वी आता अधिक स्वच्छ हवेचा श्वास घेत आहे.

👉🏻 अशी स्वच्छ हवा 75 वर्षानंतर पृथ्वीवर आढळते आहे. यापूर्वी, दुसर्‍या महायुद्धानंतर इतकी स्वच्छ हवा होती.

👉🏻 कोरोनामुळे बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे जगभरात प्रदुषणाचं प्रमाण कमी झालं आहे.

👉🏻 ग्लोबल कार्बन प्रोजेक्टचे प्रमुख रॉब जॅक्सन यांनी म्हटलं की, यावर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये 5 टक्के घट झाली आहे.

👉🏻 याआधी  2008 च्या आर्थिक मंदीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी झालं होतं. त्यामुळे 1.4 टक्के घट पाहायला मिळाली होती.

👉🏻 संयुक्त राष्ट्राने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक अहवाल प्रकाशित केला होता. प्रत्येक वर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये 7.6 टक्के घसरण झाली तरच ग्लोबल वॉर्मिंगमध्ये 1.5 डिग्री सेल्सियसची कमतरता येईल.

👉🏻 वैज्ञानिकांच्या मते, कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे कार्बन उत्सर्जनमध्ये 10 ते 20 टक्के घट झाली आहे.

👉🏻 पण हे जास्त काळ नसणार आहे. कारण 2021 च्या सुरुवातीला हे पुन्हा वाढायला लागेल. त्यामुळे चिंता पुन्हा वाढायला लागतील.

कोरो फ्लू’ लशीची भारतात निर्मिती

भारत बायोटेक कंपनीचा पुढाकार; तीस कोटी डोसचे जगभरात वितरण
हैदराबाद येथील भारत बायोटेक या जैवतंत्रज्ञान कंपनीने करोना संसर्गावर नाकावाटे देण्याची लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन (मॅडिसन), लस कंपनी फ्लुजेन यांच्या मदतीने ही लस तयार करण्यात येत असून त्यात भारत बायोटेक कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यांनी ही लस तयार करण्याचे काम सुरू केले असून या लशीचे नाव ‘कोरो फ्लू’ असे ठेवण्यात आले आहे. भारत बायोटेक कंपनी लस तयार करून त्याच्या वैद्यकीय चाचण्या घेणार आहे.
या लशीचे एकूण तीस कोटी डोस जगात वितरित केले जाणार आहेत फ्लू जेन ही लस कंपनी त्यांची सध्याची उत्पादन प्रक्रिया भारत बायोटेकला देणार असून त्यामुळे लशीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे, असे मत भारत बायोटेकचे उद्योग विकास प्रमुख डॉ. राचेश एला यांनी व्यक्त केले आहे.
या लसीचा भविष्यातील वापर प्रभावीरित्या केला जाऊ शकतो, त्यासाठी हा पुढाकार घेण्यात आल्याचे या वेळी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
करोनाला रोखण्याचे तंत्र
करोनावर उपचार पद्धती विकसित करण्यासाठी जोरात काम सुरू असून सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणू मानवी पेशीत ज्या दरवाजांनी प्रवेश करतो ते बंद करण्यासाठी एक अभिनव उपचार पद्धती विकसित केली जात आहे. ‘सेल’ या नियतकालिकात प्रसिद्ध संशोधनानुसार सार्स सीओव्ही २ विषाणूला पेशींमध्ये प्रवेश नाकारण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाचे जोस पेनिंगर यांनी म्हटले आहे की, यातील निकाल उत्साहवर्धक असून संबंधित औषध रक्तवाहिन्या व मूत्रपिंडावर कसा परिणाम करते याचीही माहिती उपलब्ध आहे. एसीई २ हे पेशींवरील प्रथिन सध्या या विषाणूच्या प्रवेशास कारण ठरत आहे. सार्स सीओव्ही २ या विषाणूवरील ग्लायकोप्रोटिनची ओळख एसीई २ प्रथिनामुळे पटवली जाते व विषाणू पेशीत घुसून थैमान घालतो असे दिसून आले आहे. २००३ मध्ये सार्स सीओव्ही १ विषाणूतही ग्लायकोप्रोटिनची ओळख एसीई २ प्रथिनामुळे पटून तो विषाणू पेशीत घुसण्यात यशस्वी होत होता. कुठल्याही विषाणूरोधक औषधात नेमकी विषाणूची पेशीत घुसण्याची क्रिया रोखली जात असते. यात एपीएन ०१ या औषधाने हवा तो परिणाम साधला जातो

महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्नउत्तरे


1. तुर्की या देशाची राजधानी कोणती?
उत्तर : अंकारा

2. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?
उत्तर : खरगपूर

3. डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?
उत्तर : अल्फ्रेड नोबेल

4. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?
उत्तर : रेडक्लिफ रेष

5. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?
उत्तर : बाळ गंगाधर टिळक

6. पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?
उत्तर : 14 नोव्हेंबर

7. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : पुणे

8. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
उत्तर : नागपूर

9. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात कोठे आढळतात?
उत्तर : विदर्भ

10. कोकण भागात…...या प्रकारची मृदा आढळते
उत्तर : जांभी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भूगोल प्रश्नसंच

◾️कोपेनच्या वर्गीकरणानुसार "AW" हवामान प्रदेश काय निर्देशित करतो ?

1) लघु शुष्क ऋतृचा मोसमी प्रकार
2) उष्णकटिबंधीय सॅव्हाना ✅
3) उष्ण वाळवंटी प्रकार
4) ध्रुवीय प्रकार

◾️2) " एल निनो " हा ऊबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा ------- आहे.

1) अर्जेटिना
2) पेरू ✅
3) ब्राझील
4) चीली

◾️3) -----------% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापरेंत पोहचत नाही .

1) 79 %
2) 59 %
3) 49 %✅
4) 39 %

◾️4) असा कोणता देश आहे ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही.

1) फ्रान्स
2) स्वित्झलंड ✅
3) स्वीडन
4) पेरू

5) पर्वतीय वाऱ्याना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात.

1) अमेरिका आणि मेक्सिको
2) अमेरिका आणि कॅनडा ✅
3) ब्राझील आणि अर्जेटिना
4) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

जागतिक आरोग्य दिन: 7 एप्रिल

दरवर्षी 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक आरोग्य दिन’ पाळला जातो.

यावर्षी म्हणजेच 2020 साली “सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईव्ह्ज” ही या दिनाची संकल्पना आहे.

यावर्षी जागतिक आरोग्य दिन आरोग्य सेवा पुरविण्यात सर्व परिचारिका आणि सुईणींची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका जगापुढे मांडत आहे आणि त्यांचे कार्यदल बळकट करण्यासाठी जगाला आवाहन करीत आहे.

दिनाचा इतिहास

1948 साली जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) प्रथम ‘जागतिक आरोग्य सभा’ आयोजित केली होती. त्या सभेत दरवर्षी 7 एप्रिल ही तारीख जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय वर्ष 1950 पासून प्रभावी करण्यात आला.

प्रत्येक वर्षी जगाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय निवडला जातो. विषयनिहाय कार्यक्रमांचे आयोजन आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर केले जाते आणि त्यामधून जनजागृती केली जाते.

जागतिक आरोग्य दिन हा आठ अधिकृत जागतिक आरोग्य मोहिमांपैकी एक आहे. इतर सात मोहिमा - जागतिक क्षयरोग दिन, जागतिक लसीकरण आठवडा, जागतिक मलेरिया दिन, जागतिक तंबाखू विरोधी दिन, जागतिक एड्स दिन, जागतिक रक्तदाता दिन आणि जागतिक हिपॅटायटीस दिन.

ऑक्सिजन चक्र (Oxygen Cycle )


◾️पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21% तसेच जलावरण आणि शिलावरण अशा तीनही आवरणामध्ये ऑक्सिजन आढळतो.

◾️वातावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. या चक्रात देखील जैविक व अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात. वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होते.
तसेच त्याचा सातत्याने वापरही होत असतो.

◾️ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगांशी त्याचा संयोग होतो.

◾️रेण्वीय ऑक्सिजन (O), पाणी (H,O), कार्बन डाय ऑक्साईड (CO.) व असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवावरणातील ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचे असते.

◾️प्रकाशसंश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते तर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...