१८ एप्रिल २०२०

महत्त्वाचे सामान्य ज्ञान

1) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य ?
-- राजस्थान
SMB Preparation
2) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठे राज्य?
-- उत्तरप्रदेश

3) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- गोवा

4) भारतातील लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य?
-- सिक्कीम

5) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा?
-- लेह ( लदाख )

6) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- माही ( पददूचेरी )

7) भारतातील क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश?
-- अंदमान निकोबार

8) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- लक्षद्वीप

9) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश ?
-- दिल्ली

10) भारतातील लोकसंख्यानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- दिबांग व्हॅली ( अरुणाचल प्रदेश )

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान

🖌दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

🖌परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

🖌सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

🖌प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

🖌परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

🖌मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

🖌सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

📚प्रार्थना समाजाचे कार्य📚

🖌प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.

🖌न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.

🖌ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.

🖌देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🖌अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🖌प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.

🖌मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.

🖌४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.

🖌मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.

🖌इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.

🖌इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.

🖌प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.

📚प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन📚

🖌प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.

जगातील देश व खंड

* आफ्रिका - काळे खंड

* ऑस्ट्रेलिया - कांगारूंचा देश व खंडद्वीप

* बहरीन - मोत्यांची बेटे

* बेल्जीयम - युरोपची रणभूमी

* कॅनडा - मॅपल वृक्षांचा देश, लिलीचा देश

* क्युबा - अँटिलिसचा मोती, साखरेचे कोठार

* इजिप्त - नाईलची देणगी

* नॉर्वे - मध्यरात्रीच्या सूर्याचा देश

* फिनलँड - सरोवराचा देश

* म्यानमार - पॅगोडाचा देश

* जपान - उगवत्या सूर्याचा देश

* झांझिबार - लवंगाचे बेट

* न्यूझीलंड - दक्षिण गोलार्धातील इंगलंड

* पॅलेस्टाईन - पवित्र भूमी

* आयरलँड व श्रीलंका - पांचूची बेटे

* रवांडा - आफ्रिकेचे स्वित्झर्लंड

* स्वित्झर्लंड - युरोपचे क्रीडांगण

* थायलंड - पांढऱ्या हत्तीचा देश

* बाल्कन देश - युरोपचा सुरुंग

* त्रिस्तन डा कन्हा - जगातील एकाकी बेट

* अमेरिका - सूर्यास्ताचा देश

* जपान - पॅसिफिक महासागरातील इंग्लंड

* प्रेअरी प्रदेश - जगाचे धान्याचे कोठार

* युक्रेन - युरोपचे गव्हाचे कोठार

17 वी लोकसभा निवडणूक 2019

- 543 मतदार संघात 7 टप्प्यात ही निवडणूक पार पडली.
- 24 मे 2019 रोजी निकाल जाहिर झाला.

● देशातील प्रमुख पक्ष आणि त्यांना मिळालेल्या जागा

- तृणमूल काँग्रेस 22
- बहुजन समाज पक्ष 10
- भारतीय जनता पक्ष 303
- बिजू जनता दल 12
- द्रविड मुन्नेत्र कळघम 23
- काँग्रेस पक्ष 52
- जनता दल (U) 16
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 05
- शिवसेना 18
- युवाजन श्रमिक रयथु काँग्रेस पक्ष 22

● महाराष्ट्र

- महाराष्ट्रात 48 जागांसाठी 4 टप्प्यात मतदान झाले.
[पक्षाचे नाव- जिंकलेल्या जागा- मतांची टक्केवारी]
- भारतीय जनता पक्ष 23 (27.59%)
- काँग्रेस पक्ष 1 (16.27%)
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 4 (15.52%)
- शिवसेना 18 (23.29%)
- AIMIM 1 (0.72%)
- Independent 1

©

जगातील सर्वात मोठे 

 

* खंड - आशिया

* विस्तारित देश - रशिया

* लोकसंख्येचा देश - चीन

* द्विपसमूह - इंडोनेशिया

* त्रिभूज प्रदेश - सुंदरबन [ गंगा नदीच्या मुखाजवळ ]

* वाळवंट - सहारा

* महासागर - पॅसिफिक

* द्विपकल्प - अरेबिया

* बेट - ग्रीनलँड

* खंडद्वीप - ऑस्ट्रेलिया

* समुद्र - दक्षिण चिनी समुद्र

* उपसागर - हडसनचा उपसागर

* आखात - मेक्सिकोचे आखात

* नदी व खोरे - अमेझॉनचे खोरे

* पर्वतराजी - हिमालय

* मैदानी प्रदेश - पश्चिम सायबेरिया

* गोड्या पाण्याचे सरोवर - सुपीरिअर

* ज्वालामुखी - मौना लोआ, हवाई बेटे.

* समुद्रभरती - फुंडीचे आखात

* खाऱ्या पाण्याचे सरोवर - कास्पियन समुद्र

* नदी मुख - ऑब नदीचे मुख

* वाळूचे बेट - फ्रेझर आयर्लंड

* लॅगुन - लॅगोआ डॉस पॅटॉस, ब्राझील

* अरण्य - सूचिपर्णी वृक्षांचे अरण्य, रशिया

* सिमेंट क्रॉंक्रीटचे धरण - कोलंबिया नदीवरील ग्रॅन्ड कुली, अमेरिका

* बंदर - न्यूयॉर्क

* विस्तारित शहर - लंडन

* दिवस - २१ जून

जाणून घ्या :- सामान्य ज्ञान

📌 भारतीय सर्व्हेक्षण विभाग (SOI)
- स्थापना: वर्ष 1767;
- मुख्यालय: देहरादून.

📌 भारतीय शेतकरी खत सहकारी मर्यादित (IFFCO)
- स्थापना: 3 नोव्हेंबर 1967;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 MTNL (महानगर टेलीफोन निगम लिमिटेड)
- स्थापना: 01 एप्रिल 1986;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 BSNL (भारत संचार निगम लिमिटेड)
- स्थापना: 15 सप्टेंबर 2000;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 WWF (वर्ल्ड वाइड फंड)
- स्थापना: 29 एप्रिल 1961;
- मुख्यालय: ग्लॅंड, स्वित्झर्लंड.

📌 अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF)
- स्थापना: 23 जून 1937;
- मुख्यालय: दिल्ली.

📌 भारतीय क्रिडा प्राधिकरण (SAI)
- स्थापना: वर्ष 1984;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघ (IWF)
- स्थापना: वर्ष 1905;
- मुख्यालय: बुडापेस्ट, हंगेरी.

📌 राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT)
- स्थापना: 01 सप्टेंबर 1961;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)
- स्थापना: वर्ष 1945;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 राष्ट्रीय महिला आयोगाची
- स्थापना - 31 जानेवारी 1992.

📌 इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX)
- स्थापना: 28 जून 2008;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

बाजारात तरलता वाढवण्यासाठी रेपो दरात पाव टक्के कपात.

🎯 कोविड १९ च्या साथीमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीवर रिझर्व बँकेचं बारकाईनं लक्ष आसून वेळोवेळी पावलं उचलण्यात येत आहेत असं गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

🎯कोविड१९ ची महामारी आणि त्याला प्रतिबंध करण्याच्या प्रयत्नांदरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असून त्यातून सावरण्याच्या दृष्टीने आणखी काही उपाय रिझर्व बँकेनं जाहीर केले आहेत.

🎯 बाजारात तरलता वाढवण्याच्या उद्देशानं रिव्हर्स रेपो दरात पाव टक्के कपात करुन तो पावणेचार टक्के केला आहे. हा दर तात्काळ लागू झाला आहे. या उपाययोजनांमुळे बँकांकडे आणखी रोख रक्कम उपलब्ध होईल. 

🎯 रिझर्व बँकेकडून दीर्घ मुदतीची अतिरिक्त कर्जं बँकांना उचलता येतील. शिवाय, नाबार्ड, राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, सिडबी अशा संस्थांना ५० हजार कोटी रुपयापर्यंत पुनर्वित्तपुरवठा करण्याची मुभा दिली आहे.

🎯 बँकांनी आताच्या परिस्थितीत लाभांश वाटप करू नये, अशी सूचनाही रिजर्व्ह बँकेनं केली आहे. मार्च महिन्यात निर्यातीत झालेली सुमारे 34.5 टक्के घट काळजीचं कारण असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. 

🎯 कोरोना प्रादुर्भावाचं संकट निवळल्यानंतर देशाचा आर्थिक विकास दर ७.२ टक्के एवढा होऊ शकतो, असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं. जगभरात कच्चा तेलाच्या दरामध्ये घसरण होत असून, जगामध्ये मोठी मंदी येण्याची शक्यता आहे.

🎯 महागाईचा दरही खाली येत असून, या आर्थिक वर्षाच्या मध्यापर्यंत तो चार टक्क्यापर्यंत कमी होईल, असा अंदाजही दास यांनी वर्तवला आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचं दास यांनी नमूद केलं. 

भारतातील जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन विषयक कायदे व नियम

1) जल प्रदूषण प्रतिबंध व नियमन -: 1974

2) पर्यावरण संरक्षण अर्धीनियम -: 1986

3)हवा प्रदूषण प्रतिबंध व नियम -: 1981

4) जैवविविधता अध्धीनियम -: 2002

5)भारतीय वन कायदा -: 1927

6.)वन संवर्धन अधिनियम :- 1980

7)आदिवासी जमाती आणि इत वनरहिवासी अधिनियम -: 2006

8.)वन्य जीवन संरक्षण अधिनियम - :1972

9.) सार्वजनिक दायित्व विमा अधिनियम -: 1991

10) राष्ट्रीय पर्यांवरण अपील प्राधिकरण अधिनियम -: 1997

11) राष्ट्रीय हरित लवाद अधिनियम -: 2010

12) आयात आणि निर्यात नियंत्रण अधिनियम -: 1947

13) खनन आणि खनिज द्रव्य विकास अधिनियम -: 1957

14) सीमाशुल्क अधिनियम -: 1962

15 ) महापालिका घन कचरा व्यवस्थापन नियम -: 2000

16) पर्यावरण स्नैही उत्पादनावरून खून पट्टी कायदा -: 1991

17) जैविक कचरा नियोजन -: 1998

18) पुन्हा वापरण्यासाठी प्लैस्टिकचे उत्पादन व वापर नियम -: 1999

General Knowledge

▪️ कोणत्या दिवशी प्रथम 'आंतरराष्ट्रीय विवेक दिन' पाळला गेला?
उत्तर : 5 एप्रिल 2020

▪️ कोणत्या योजनेच्या अंतर्गत कोविड-19 वरील चाचणी व उपचार मोफत होणार?
उत्तर : आयुष्मान भारत योजना

▪️ कोणत्या संस्थेनी ‘चॅलेंज कोविड-19’ स्पर्धेची घोषणा केली?
उत्तर : नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन

▪️ कोणत्या कलमान्वये ‘PM-CARES निधी’ला प्राप्तिकरातून सूट देण्यात आली आहे?
उत्तर : कलम 80 (G)

▪️ कोणत्या संस्थेनी ‘बायो सूट’ विकसित केला?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

▪️ भारताने कोणत्या देशासोबत ‘कार्गो-एअर-ब्रिज’ याची स्थापना केली?
उत्तर : चीन

▪️ कोणती संस्था ‘कवच’ केंद्र चालवत आहे?
उत्तर : सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंत्रेप्रेन्योरशिप

▪️ कोणत्या संस्थेनी ‘NCC योगदान’ सराव आरंभ केला?
उत्तर : नॅशनल कॅडेट कॉर्प्स

▪️ कोणत्या मंत्रालयाने “कोविड 19 फॅक्ट चेक युनिट” पोर्टल कार्यरत केले?
उत्तर : माहिती व प्रसारण मंत्रालय

▪️ कोणत्या संस्थेनी ‘जीवन लाइट’ पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार केले?
उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद

गंगा:  मोठ्या नद्यांच्या श्रेणीमध्ये जगातल्या 10 सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक

🔷

- गंगा नदी ही मोठ्या नद्यांच्या श्रेणीमध्ये जगातल्या 10 सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक बनली आहे.

▪️  ठळक बाबी

-गेल्या पाच वर्षांमध्ये स्वच्छ गंगा अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे आणि ज्यामुळे गंगामधील पाण्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. त्यामुळे जलजीवनात वाढ झालेली आहे.

- पाच वर्षांपूर्वी केवळ दहापटच गंगेटीक डॉल्फिन पाहिल्या गेल्या होत्या, परंतू यावेळी 2 हजाराहून अधिक डॉल्फिन आढळल्या आहेत आणि इतरही जलचर जीवनात सुधारणा झाली आहे.

-  कचर्‍यामध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा पाहिली गेली आहे.

- या उपक्रमामध्ये ‘सी-गंगा’ (सेंटर फॉर गंगा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट अँड स्टडीज), IIT, NIT, NEERI या शैक्षणिक संस्थांची भूमिका उल्लेखनीय आहे. तसेच युरोपीय संघ, जर्मनी, डेन्मार्क, इस्त्राएल, जापान आणि कॅनडा या देशांचे सहकार्य देखील लाभले.

- जगात उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्यापैकी केवळ 4 टक्के पाणी भारताकडे आहे तर जगातली 18 टक्के लोकसंख्या आणि समतुल्य पशुधन भारतात आहे. सर्वाधिक धरणे असलेल्या देशांमध्ये आज भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे.

▪️  भारत सरकारचा पुढाकार

- भारत सरकारच्या पुढाकाराने 2016 साली राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाला सुरुवात झाली. या अभियानाच्या अंतर्गत सांडपाणी, कचर्‍याची विल्हेवाट याच्यासंबंधित जवळपास 305 प्रकल्प हाती घेण्यात आले. त्यालाच जलशक्ती अभियानाची जोड मिळाली.

-  भारत सरकारने गंगा नदीच्या उगमापासून ते उन्नाव (उत्तरप्रदेश) पर्यंत किमान पर्यावरण-विषयक प्रवाह राखण्यासाठी अधिसूचित केले आहे.

▪️ गंगा नदी

- गंगा नदी ही दक्षिण आशियातली भारत व बांग्लादेश या दोन देशातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ब्रह्मपुत्रा नदीनंतर ही भारतातली सर्वात मोठी नदी आहे.

-  गंगा नदीची लांबी 2,525 किलोमीटर आहे आणि तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातल्या गंगोत्री येथे होतो.

- तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातल्या गंगेच्या खोऱ्यातून वाहत बांग्लादेशात प्रवेश करते. बांग्लादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते.

इंग्रज अधिकारी व कामगिरी

.   

_✍👉   आयोगाकडून नेहमी विचारले जाणारे प्रश्न

▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था (१७६५)

◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट(१७७३)

◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत(१७९३)

◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज(१७९८-१८०५)

◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त(१८१८-२२)

◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा(१८२९)

◾️ चार्ल्स मटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता(१८३५)

◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी(१८४४)

◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरणांचा पुरस्कार(१८४८)

◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय(१८५८)

◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना(१८६८)

◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक(१८७०)

◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट(१८७८)

◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक(१८८२)

वित्तीय क्षेत्राला दिलासा!

​🔷

- रिझव्‍‌र्ह बँकेचे पूरक अर्थसहाय्य धोरण
करोना संकटाबाबत चिंता व्यक्त करतानाच टाळेबंदीचा अर्थव्यवस्थेवरील अल्पकालिन फटका रिझव्‍‌र्ह बँकने शुक्रवारी मान्य केला. यातून काहीसा दिलासा म्हणून कर्जदारांचे व्याजदर कमी करण्यासह आस्थापनांना थकीत कर्जाबाबत मुभा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.

- टाळेबंदीदरम्यान दुसऱ्यांदा शुक्रवारी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दृकश्राव्य माध्यमातून घेतलेल्या निर्णयाचा लाभ कर्जदार, व्यापारी बँका तसेच आस्थापनांना होणार आहे. बँकांचे अनुत्पादित कर्ज निश्चित केला जाणारा कालावधी आता ९० वरून थेट दुप्पट, १८० दिवस करण्यात आला आहे. यामुळे व्यापारी बँकांबरोबरच अशा अनुत्पादित मालमत्तेस निमित्त ठरणारे थकीत कर्जदार, आस्थापना, लघू उद्योजक यांनाही दिलासा मिळणार आहे.
देशातील आघाडीच्या वित्त पुरवठादार बँक, वित्त तसेच गृह वित्त कंपन्यांना सध्याच्या अर्थसंकटातही विनासाय रोकड उपलब्ध होण्याच्या दृष्टिने रिझव्‍‌र्ह बँकेने नव्याने ५०,००० कोटी रुपये देऊ केले आहेत.

- यानुसार, पैकी २५ हजार कोटी रुपये नाबार्ड, १५ हजार कोटी रुपये सिडबी व उर्वरित १० हजार कोटी रुपये नॅशनल हाऊसिंग बँकेला प्राप्त होतील.
रोकड चणचण भासणाऱ्या गैर बँकिंग वित्त कंपन्या तसेच सूक्ष्म वित्त कंपन्यांनाही ५०,००० कोटी रुपये देऊ करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी दिलेली ही रक्कम यापूर्वीच्या २५,००० कोटी रुपयां व्यतिरिक्त आहे.

- लाभांशांची भागधारकांना प्रतीक्षा
रिव्हर्स रेपो दर कमी करण्याच्या माध्यमातून व्यापारी बँकांकडे अतिरिक्त रक्कम उपलब्ध करून देतानाच या बँकांना लाभांश जारी करण्यावर मर्यादा घालण्यात आली आहे. यानुसार, शेडय़ुल्ड व्यापारी बँकांसह सहकारी बँकांना त्यांच्या २०१९-२० वित्ती वर्षांसाठीचा भागधारकांना देय असलेला लाभांश ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वितरित करता येणार नाही.

- महागाई, मोसमी पावसाबाबत आशावाद; मात्र..
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सध्याच्या करोना, टाळेबंदी तसेच त्याच्या अर्थव्यवस्थेवरील विपरित परिणामांचा उल्लेख शुक्रवारच्या सादरीकरणादरम्यान केला. महागाई येत्या कालावधीत कमी होण्याच्या शक्यतेसह सरासरी मोसमी पावसाबाबतही आशावाद व्यक्त केला. मात्र त्याचबरोबर देशाच्या वाढत्या विकास दराबाबत साशंकता व्यक्त केली. अपेक्षित ७ टक्के विकास दर वित्त वर्ष २०२१-२२ मध्ये अनुभवता येईल, असे ते म्हणाले.

- कर्ज स्वस्त; मात्र ठेवींवरही कमी व्याज
रिझव्‍‌र्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरात पाव टक्का कपात केल्याने व्यापारी बँकांकडे अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार असून त्याचा सदुपयोग त्यांना कर्जाचे व्याजदर कमी करण्यासाठी होणार आहे. बँकांनी प्रत्यक्षात कर्ज व्याजदर कमी केले तर त्याचा लाभ लाखो गृह, वाहन आदी कर्जदारांना होईल. तूर्त किमान वार्षिक ७ टक्क्य़ांच्या आसपास असलेले कर्जाचे व्याजदर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचबरोबर ठेवींवरील व्याजदरही खाली येण्याची भीती वर्तविली जात आहे.
-------------------------

भारताच्या जीडीपीची वाढ तीन टक्क्यांपेक्षा खाली घसरण्याची भीती

​🔷

- करोना व्हायरसनं भारतासह जगभरात धुमाकूळ घातलेला असून अर्थव्यवस्थांनाही चांगलाच फटका बसला आहे. करोनाचा उत्पात अर्थव्यवस्थेसाठी यापुढेही जाणवणार असल्याचे समोर येत आहे.

- परिस्थिती अशीच बिकट राहिली तर भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ २०२०-२१ या आर्थिक वर्षात तीन टक्क्यांपेक्षा कमी गतीने होण्याची भीती केपीएमजीनं व्यक्त केली आहे. केपीएमजीनं कोविड-१९ - दी मेनी शेड्स ऑफ क्रायसिस हा अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. या अहवालात मुख्यत: मीडिया व एंटरटेनमेंट क्षेत्राचा आढावा घेण्यात आला आहे.
या अहवालामध्ये केपीएमजीनं तीन शक्यता वर्तवल्या आहेत. जर का आत्ताच करोनाचा प्रसार आटोक्यात आला तर, भारतानं करोनावर नियंत्रण मिळवलं पण जगभरात मंदीची लाट राहिली तर आणि जगभरात मंदीची लाट राहिली व भारतातही करोना आटोक्यात नाही राहिला तर अशा तीन शक्यता केपीएमजीनं विचारात घेतल्या आहेत.

- जर पहिली शक्यता जी अत्यंत सकारात्मक आहे ती वास्तवात आली तर भारताची अर्थव्यवस्था या आर्थिक वर्षात ५.३ ते ५.७ टक्के या गतीने वाढेल. भारतात करोनाची साथ आटोक्यात राहिली परंतु जगभरात मंदी आली तर भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ आणखी मंदावेल व ती अवघ्या ४-४.५ टक्के या गतीने वाढेल. आणि सगळ्यात वाईट स्थिती ओढवली व भारतातही करोनाची साथ इतक्यात नियंत्रणात आली नाही व जगभरात मंदीही कायम राहिली तर मात्र

- भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती तीन टक्क्यांपेक्षा खाली जाण्याची भीती केपीएमजीनं व्यक्त केली आहे.
गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत आधीच भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग सहा वर्षातल्या नीचांकावर म्हणजे ४.७ टक्क्यांवर होता. त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिली तर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आणखी वाईट स्थिती ओढवण्याची भीती आहे.

- मीडिया व एंटरटेनमेंट सेक्टरसंदर्भात असलेल्या या अहवालामध्ये प्रिंट मीडियासाठी नजीकचा काळ आव्हानाचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच जिथं गर्दी होते अशा व्यवसायासाठी म्हणजे चित्रपटगृहांशी संबंधित व्यवसायासाठी खडतर काळ असल्याचे व घरच्या घरी बघता येणाऱ्या करमणूक क्षेत्राची वाढ यापुढेही होत राहील असे नोंदवण्यात आले आहे.

​ऋषिकेशच्या AIIMS संस्थेनी भारतातली पहिली ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’ विकसित केली

🔷
- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHEL) या सरकारी कंपनीच्या सहकार्याने ऋषिकेशच्या अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्थेनी (AIIMS) भारतातली पहिली ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’ विकसित केली आहे.

- या प्रणालीसाठी एक संकेतस्थळ आणि मोबाईल अॅप्लिकेशन देखील तयार करण्यात आले आहे.

- या सुविधेमुळे रुग्णाच्या शरीराचे तापमान आणि इतर बाबी प्रत्यक्षात उपस्थित नसताना चिकित्सक आपल्या ठिकाणीच मिळवू शकतील, ज्यामुळे आजारांचा संसर्ग टाळता येणार.

- कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी उत्तराखंडमध्ये या प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याची योजना आहे. राज्यात कोविड-19 रूग्णांचा शोध घेण्यासाठी देखील राज्यातली यंत्रणा ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’चा वापर करणार आहे. एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्यास प्रणाली तसा इशारा देखील देणार.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...