१८ एप्रिल २०२०

General Knowledge

▪️ कोणत्या दिवशी प्रथम 'आंतरराष्ट्रीय विवेक दिन' पाळला गेला?
उत्तर : 5 एप्रिल 2020

▪️ कोणत्या योजनेच्या अंतर्गत कोविड-19 वरील चाचणी व उपचार मोफत होणार?
उत्तर : आयुष्मान भारत योजना

▪️ कोणत्या संस्थेनी ‘चॅलेंज कोविड-19’ स्पर्धेची घोषणा केली?
उत्तर : नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन

▪️ कोणत्या कलमान्वये ‘PM-CARES निधी’ला प्राप्तिकरातून सूट देण्यात आली आहे?
उत्तर : कलम 80 (G)

▪️ कोणत्या संस्थेनी ‘बायो सूट’ विकसित केला?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

▪️ भारताने कोणत्या देशासोबत ‘कार्गो-एअर-ब्रिज’ याची स्थापना केली?
उत्तर : चीन

▪️ कोणती संस्था ‘कवच’ केंद्र चालवत आहे?
उत्तर : सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंत्रेप्रेन्योरशिप

▪️ कोणत्या संस्थेनी ‘NCC योगदान’ सराव आरंभ केला?
उत्तर : नॅशनल कॅडेट कॉर्प्स

▪️ कोणत्या मंत्रालयाने “कोविड 19 फॅक्ट चेक युनिट” पोर्टल कार्यरत केले?
उत्तर : माहिती व प्रसारण मंत्रालय

▪️ कोणत्या संस्थेनी ‘जीवन लाइट’ पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार केले?
उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद

गंगा:  मोठ्या नद्यांच्या श्रेणीमध्ये जगातल्या 10 सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक

🔷

- गंगा नदी ही मोठ्या नद्यांच्या श्रेणीमध्ये जगातल्या 10 सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक बनली आहे.

▪️  ठळक बाबी

-गेल्या पाच वर्षांमध्ये स्वच्छ गंगा अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे आणि ज्यामुळे गंगामधील पाण्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. त्यामुळे जलजीवनात वाढ झालेली आहे.

- पाच वर्षांपूर्वी केवळ दहापटच गंगेटीक डॉल्फिन पाहिल्या गेल्या होत्या, परंतू यावेळी 2 हजाराहून अधिक डॉल्फिन आढळल्या आहेत आणि इतरही जलचर जीवनात सुधारणा झाली आहे.

-  कचर्‍यामध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा पाहिली गेली आहे.

- या उपक्रमामध्ये ‘सी-गंगा’ (सेंटर फॉर गंगा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट अँड स्टडीज), IIT, NIT, NEERI या शैक्षणिक संस्थांची भूमिका उल्लेखनीय आहे. तसेच युरोपीय संघ, जर्मनी, डेन्मार्क, इस्त्राएल, जापान आणि कॅनडा या देशांचे सहकार्य देखील लाभले.

- जगात उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्यापैकी केवळ 4 टक्के पाणी भारताकडे आहे तर जगातली 18 टक्के लोकसंख्या आणि समतुल्य पशुधन भारतात आहे. सर्वाधिक धरणे असलेल्या देशांमध्ये आज भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे.

▪️  भारत सरकारचा पुढाकार

- भारत सरकारच्या पुढाकाराने 2016 साली राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाला सुरुवात झाली. या अभियानाच्या अंतर्गत सांडपाणी, कचर्‍याची विल्हेवाट याच्यासंबंधित जवळपास 305 प्रकल्प हाती घेण्यात आले. त्यालाच जलशक्ती अभियानाची जोड मिळाली.

-  भारत सरकारने गंगा नदीच्या उगमापासून ते उन्नाव (उत्तरप्रदेश) पर्यंत किमान पर्यावरण-विषयक प्रवाह राखण्यासाठी अधिसूचित केले आहे.

▪️ गंगा नदी

- गंगा नदी ही दक्षिण आशियातली भारत व बांग्लादेश या दोन देशातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ब्रह्मपुत्रा नदीनंतर ही भारतातली सर्वात मोठी नदी आहे.

-  गंगा नदीची लांबी 2,525 किलोमीटर आहे आणि तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातल्या गंगोत्री येथे होतो.

- तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातल्या गंगेच्या खोऱ्यातून वाहत बांग्लादेशात प्रवेश करते. बांग्लादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते.

इंग्रज अधिकारी व कामगिरी

.   

_✍👉   आयोगाकडून नेहमी विचारले जाणारे प्रश्न

▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था (१७६५)

◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट(१७७३)

◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत(१७९३)

◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज(१७९८-१८०५)

◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त(१८१८-२२)

◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा(१८२९)

◾️ चार्ल्स मटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता(१८३५)

◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी(१८४४)

◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरणांचा पुरस्कार(१८४८)

◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय(१८५८)

◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना(१८६८)

◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक(१८७०)

◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट(१८७८)

◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक(१८८२)

वित्तीय क्षेत्राला दिलासा!

​🔷

- रिझव्‍‌र्ह बँकेचे पूरक अर्थसहाय्य धोरण
करोना संकटाबाबत चिंता व्यक्त करतानाच टाळेबंदीचा अर्थव्यवस्थेवरील अल्पकालिन फटका रिझव्‍‌र्ह बँकने शुक्रवारी मान्य केला. यातून काहीसा दिलासा म्हणून कर्जदारांचे व्याजदर कमी करण्यासह आस्थापनांना थकीत कर्जाबाबत मुभा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.

- टाळेबंदीदरम्यान दुसऱ्यांदा शुक्रवारी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दृकश्राव्य माध्यमातून घेतलेल्या निर्णयाचा लाभ कर्जदार, व्यापारी बँका तसेच आस्थापनांना होणार आहे. बँकांचे अनुत्पादित कर्ज निश्चित केला जाणारा कालावधी आता ९० वरून थेट दुप्पट, १८० दिवस करण्यात आला आहे. यामुळे व्यापारी बँकांबरोबरच अशा अनुत्पादित मालमत्तेस निमित्त ठरणारे थकीत कर्जदार, आस्थापना, लघू उद्योजक यांनाही दिलासा मिळणार आहे.
देशातील आघाडीच्या वित्त पुरवठादार बँक, वित्त तसेच गृह वित्त कंपन्यांना सध्याच्या अर्थसंकटातही विनासाय रोकड उपलब्ध होण्याच्या दृष्टिने रिझव्‍‌र्ह बँकेने नव्याने ५०,००० कोटी रुपये देऊ केले आहेत.

- यानुसार, पैकी २५ हजार कोटी रुपये नाबार्ड, १५ हजार कोटी रुपये सिडबी व उर्वरित १० हजार कोटी रुपये नॅशनल हाऊसिंग बँकेला प्राप्त होतील.
रोकड चणचण भासणाऱ्या गैर बँकिंग वित्त कंपन्या तसेच सूक्ष्म वित्त कंपन्यांनाही ५०,००० कोटी रुपये देऊ करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी दिलेली ही रक्कम यापूर्वीच्या २५,००० कोटी रुपयां व्यतिरिक्त आहे.

- लाभांशांची भागधारकांना प्रतीक्षा
रिव्हर्स रेपो दर कमी करण्याच्या माध्यमातून व्यापारी बँकांकडे अतिरिक्त रक्कम उपलब्ध करून देतानाच या बँकांना लाभांश जारी करण्यावर मर्यादा घालण्यात आली आहे. यानुसार, शेडय़ुल्ड व्यापारी बँकांसह सहकारी बँकांना त्यांच्या २०१९-२० वित्ती वर्षांसाठीचा भागधारकांना देय असलेला लाभांश ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वितरित करता येणार नाही.

- महागाई, मोसमी पावसाबाबत आशावाद; मात्र..
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सध्याच्या करोना, टाळेबंदी तसेच त्याच्या अर्थव्यवस्थेवरील विपरित परिणामांचा उल्लेख शुक्रवारच्या सादरीकरणादरम्यान केला. महागाई येत्या कालावधीत कमी होण्याच्या शक्यतेसह सरासरी मोसमी पावसाबाबतही आशावाद व्यक्त केला. मात्र त्याचबरोबर देशाच्या वाढत्या विकास दराबाबत साशंकता व्यक्त केली. अपेक्षित ७ टक्के विकास दर वित्त वर्ष २०२१-२२ मध्ये अनुभवता येईल, असे ते म्हणाले.

- कर्ज स्वस्त; मात्र ठेवींवरही कमी व्याज
रिझव्‍‌र्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरात पाव टक्का कपात केल्याने व्यापारी बँकांकडे अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार असून त्याचा सदुपयोग त्यांना कर्जाचे व्याजदर कमी करण्यासाठी होणार आहे. बँकांनी प्रत्यक्षात कर्ज व्याजदर कमी केले तर त्याचा लाभ लाखो गृह, वाहन आदी कर्जदारांना होईल. तूर्त किमान वार्षिक ७ टक्क्य़ांच्या आसपास असलेले कर्जाचे व्याजदर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचबरोबर ठेवींवरील व्याजदरही खाली येण्याची भीती वर्तविली जात आहे.
-------------------------

भारताच्या जीडीपीची वाढ तीन टक्क्यांपेक्षा खाली घसरण्याची भीती

​🔷

- करोना व्हायरसनं भारतासह जगभरात धुमाकूळ घातलेला असून अर्थव्यवस्थांनाही चांगलाच फटका बसला आहे. करोनाचा उत्पात अर्थव्यवस्थेसाठी यापुढेही जाणवणार असल्याचे समोर येत आहे.

- परिस्थिती अशीच बिकट राहिली तर भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ २०२०-२१ या आर्थिक वर्षात तीन टक्क्यांपेक्षा कमी गतीने होण्याची भीती केपीएमजीनं व्यक्त केली आहे. केपीएमजीनं कोविड-१९ - दी मेनी शेड्स ऑफ क्रायसिस हा अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. या अहवालात मुख्यत: मीडिया व एंटरटेनमेंट क्षेत्राचा आढावा घेण्यात आला आहे.
या अहवालामध्ये केपीएमजीनं तीन शक्यता वर्तवल्या आहेत. जर का आत्ताच करोनाचा प्रसार आटोक्यात आला तर, भारतानं करोनावर नियंत्रण मिळवलं पण जगभरात मंदीची लाट राहिली तर आणि जगभरात मंदीची लाट राहिली व भारतातही करोना आटोक्यात नाही राहिला तर अशा तीन शक्यता केपीएमजीनं विचारात घेतल्या आहेत.

- जर पहिली शक्यता जी अत्यंत सकारात्मक आहे ती वास्तवात आली तर भारताची अर्थव्यवस्था या आर्थिक वर्षात ५.३ ते ५.७ टक्के या गतीने वाढेल. भारतात करोनाची साथ आटोक्यात राहिली परंतु जगभरात मंदी आली तर भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ आणखी मंदावेल व ती अवघ्या ४-४.५ टक्के या गतीने वाढेल. आणि सगळ्यात वाईट स्थिती ओढवली व भारतातही करोनाची साथ इतक्यात नियंत्रणात आली नाही व जगभरात मंदीही कायम राहिली तर मात्र

- भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती तीन टक्क्यांपेक्षा खाली जाण्याची भीती केपीएमजीनं व्यक्त केली आहे.
गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत आधीच भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग सहा वर्षातल्या नीचांकावर म्हणजे ४.७ टक्क्यांवर होता. त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिली तर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आणखी वाईट स्थिती ओढवण्याची भीती आहे.

- मीडिया व एंटरटेनमेंट सेक्टरसंदर्भात असलेल्या या अहवालामध्ये प्रिंट मीडियासाठी नजीकचा काळ आव्हानाचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच जिथं गर्दी होते अशा व्यवसायासाठी म्हणजे चित्रपटगृहांशी संबंधित व्यवसायासाठी खडतर काळ असल्याचे व घरच्या घरी बघता येणाऱ्या करमणूक क्षेत्राची वाढ यापुढेही होत राहील असे नोंदवण्यात आले आहे.

​ऋषिकेशच्या AIIMS संस्थेनी भारतातली पहिली ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’ विकसित केली

🔷
- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHEL) या सरकारी कंपनीच्या सहकार्याने ऋषिकेशच्या अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्थेनी (AIIMS) भारतातली पहिली ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’ विकसित केली आहे.

- या प्रणालीसाठी एक संकेतस्थळ आणि मोबाईल अॅप्लिकेशन देखील तयार करण्यात आले आहे.

- या सुविधेमुळे रुग्णाच्या शरीराचे तापमान आणि इतर बाबी प्रत्यक्षात उपस्थित नसताना चिकित्सक आपल्या ठिकाणीच मिळवू शकतील, ज्यामुळे आजारांचा संसर्ग टाळता येणार.

- कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी उत्तराखंडमध्ये या प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याची योजना आहे. राज्यात कोविड-19 रूग्णांचा शोध घेण्यासाठी देखील राज्यातली यंत्रणा ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’चा वापर करणार आहे. एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्यास प्रणाली तसा इशारा देखील देणार.

१४ एप्रिल २०२०

कोरोनाच्या संकटादरम्यान रेल्वेत बंपर भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड-

■देशातील सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, भारतीय रेल्वेनेही कोरोनाचा सामना  करण्यासाठी कंबर कसली आहे.

■कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशासमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. देशातील सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, भारतीय रेल्वेनेही कोरोनाचा सामना  करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी रेल्वेमध्ये विविध वैद्यकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

■दक्षिण रेल्वेमध्ये 600 पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या सर्व पदांवर कुठल्याही लेखी परिक्षेशिवाय थेट भरती होणार आहे. 

■या भरतीप्रक्रियेमध्ये डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, हॉस्पिटल अटेंडेंट, हाउसकिपिंग असिस्टंट आदी जागा भरल्या जातील. या भरती प्रक्रियेमधून भरल्या जाणाऱ्या जागांचे विवरण पुढीलप्रमाणे-

■डॉक्टर्स 72 जागा, नर्सिंग स्टाफ 120 जागा, लॅब असिस्टंट 24, रेडिओग्राफर 24 पदे, हॉस्पिटल अटेंडेंट 120 जागा, हाऊस किपिंग असिस्टंट 240 जागा. 

■रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार डॉक्टर्सच्या पदांसाठी 15 एप्रिल, नर्सिंग स्टाफसाठी 16 एप्रिल आणि लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, हॉस्पिटल अटेंडेंट, हाउसकिपिंग असिस्टंट आदी पदांसाठी 17 एप्रिल रोजी थेट मुलाखती होतील.

■विविध पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. यानुसार 18 ते 50 ही वयोमर्यादा आहे. योग्य आणि पात्र उमेदवारांनी योग्य कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही’ वनस्पती करु शकते करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत; भारतीय संशोधकांचा दावा


- सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत करोनावरील औषधं आणि लस शोधण्यास वैज्ञानिक दिवसरात्र एक करत आहे. अशावेळी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

- समुद्रातील लाल शेवाळाचा यामध्ये उपयोग होऊ शकतो. तसंच यातूव काढलेल्या संयुगांचा वापर सॅनिटरी वस्तूंवरील आवरण बनवण्यासाठी केला जाईल. तसेच संसर्गविरोधी औषध बनवण्यासाठीही हे संयुग वापरलं जाऊ शकतं.

- रिलायन्स लाईफ सायन्सद्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. नैसर्गिक स्त्रोत म्हणजेच वनस्पती आणि जीव, बॅक्टेरिया आणि काही मोठ्या झाडांपासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनात आजारांविरोधात लढण्याची अधिक ताकद असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.
पॉली सॅकराइड्स, अल्गीनेट्स, फुकोडिन, कारागिनन, रमनन सल्फेटसारख्या नैसर्गिक संयुगांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीव्हायरल क्षमता असते. 'मरिन रेड अल्गा पोरफिरिडियम इज ए सोर्स ऑफ सल्फेटेड पॉलिसॅकाराइड्स फॉर कंबेटिंग अगेंस्ट कोविड-१९' या मथळ्याखाली हे संसोधन करण्यात आलं आहे. यामध्ये संशोधकांनी उपलब्ध आकड्यांच्या संदर्भात समुद्री शेवाळातून मिळणाऱ्या पॉलीसॅकाराइड्सच्या संभाव्य अँटी व्हायरस क्षमतेची चाचणी केली.
शेवाळाचे अनेक फायदे
पोरफाइरिडियमपासून मिळणाऱ्या सल्फेट पॉलिसेकेराइडवर करण्यात आलेल्या जगभरातील निरनिराळ्या संशोधनातून शेवाळ हे अनेक व्हायरल आजारांवरील उपचारात महत्त्वपूर्ण ठरू शकतं असं नमूद करण्यात आल्याचं प्रिप्रिन्टमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनपर माहितीत म्हटलं आहे.

-  करोना व्हायरस श्वसन संसर्गाच्या नियंत्रणास विविध जैविक स्त्रोतांमधून प्राप्त केलेली कॅरीगीनची भूमिकाही स्तुत्य आहे.
---------------------------------------------------

जालियनवाला बाग हत्याकांड

👉दिनांक 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश-भारतात ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर ह्याने अमृतसर (पंजाब) येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. या घटनेला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत.

👉इतिहास👈

👉सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी एक घोळका दिनांक 10 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमध्ये जात होता.

👉 त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार केला गेला आणि परिणामी तेव्हापासून हिंसक घटनांना सुरुवात झाली.

👉दोन्ही बाजूंच्या प्रतिकारात्मक कारवायांच्या पार्श्वभूमीवर अखेर 13 एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला. त्याचदिवशी ’बैसाखी’ हा पंजाबी सण देखील होता.

👉हा सण साजरा करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता, जे की मार्शल लॉ लागू असल्याने नियमबाह्य होते.

👉जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर गोळीबार केला.

👉या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. या घटनेत 379 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

जागतिक आरोग्य संघटना

🍀🍀(World Health Organisation)🍀🍀

📌संयुक्त राष्ट्र संघटनेची विशेष संस्था आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यावर समन्वय प्राधिकरण म्हणून कार्य करते.
- स्थापना : 7 एप्रिल 1948
- 7 एप्रिल 1948 रोजी जिनिव्हा येथे पहिली जागतिक आरोग्य सभा पार पडली होती.
-मुख्यालय : जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
- लीग ऑफ नेशनच्या आरोग्य संघटनेची जागा घेतली.
-संयुक्त राष्ट्र विकास गटाची सदस्य संस्था

कार्ये

📌 WHO सार्स, मलेरिया, क्षयरोग, इन्फ्लूएन्झा, एड्स आणि कोविड-19 सारख्या संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी व उपचार करण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचे समन्वय करते.

📌 लसीकरण विस्तारीत कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरक्षित आणि प्रभावी लस, फार्मास्युटिकल डायग्नोस्टिक्स आणि ड्रग्सच्या विकासास आणि वितरणाला समर्थन देते.

📌 1980 मध्ये WHO ने देवीच्या रोगाचे (smallpox) निर्मुलन झाल्याचे घोषित केले. मानवाच्या प्रयत्नाने निर्मुलन झालेला हा इतिहासातील पहिला रोग आहे.

महासंचालक
- WHO चे प्रमुख महासंचालक असतात.
- नेमणूक - वर्ल्ड हेल्थ असेंब्ली करते
- सध्या महासंचालक (8 वे) - टेड्रोस अँधनॉम (जुलै 2017 पासून)

जागतिक आरोग्य दिन
- दरवर्षी 7 एप्रिल रोजी पाळला जातो.
.- WHO चा स्थापना दिवस.
- 1950 मध्ये पहिल्यांदा हा दिवस पाळण्यात आला.
- जवाहरलाल नेहरू यांनी हा दिवस सुरु करण्यासाठी WHO ला सल्ला दिला होता.

प्रकाशने
-बुलेटिन ऑफ द ‘हू'
-क्रॉनिकल
-इंटरनॅशनल डायजेस्ट ऑफ हेल्थ
-लेजिस्लेशन
- वर्ल्ड हेल्थ
.
प्रादेशिक कार्यालये (प्रदेश व HQ)
- आफ्रिका - बॅझाव्हिल, काँगो
- अमेरिका - वॉशिंग्टन, अमेरिका
- आग्नेय आशिया - नवी दिल्ली, भारत
- यूरोप - कोपनहेगन, डेन्मार्क
- भूमध्य समुद्र - पूर्वभाग- अलेक्झांड्रिया, ईजिप्त
- पश्चिम पॅसिफिक (सागरीय) - मॅनिला, फिलिपीन्स..

उष्ण वारे


◾️ फॉन  - आल्प्स पर्वत

◾️ चिनुक - रॉकी पर्वत

◾️ सिरोको - उ.आफ्रिका

◾️ खामसिंन - इजिप्त

◾️ हरमाटन-गिनीआखात

◾️ नॉर्वेस्टर व लु-भारत

◾️ सिमुम -अरेबियन वाळवंट

◾️ बर्ग- द.आफ्रिका

◾️ ब्रिकफिल्डर-ऑस्ट्रेलिया

◾️ झोण्डा- अर्जेंटिना

◾️ सॅनटाआना-केलिफोर्नि

◾️ काराबूरण -मध्य आशिया

COVID -19 Apps Campaigns

◾️ कोरोना कवच - भारत सरकार

◾️आरोग्य सेतु - भारत सरकार

◾️ महाकवच - महाराष्ट्र

◾️ ऑपरेशन शील्ड - दिल्ली

◾️ 5T - दिल्ली

◾️ ऑपरेशन नमस्ते - इंडियन आर्मी

◾️ COVA PUNJAB - पंजाब

◾️ TEST YOURSELF - गोवा, पडूचेरी

◾️ क्वारंटाईन मॉनिटर - तामिळनाडू

◾️ क्वारंटाईन वाच अँप - कर्नाटक

◾️ कोरोना वाच अँप - कर्नाटक

◾️ ब्रेक द चेन - केरल

◾️ रक्षा सर्व - छत्तीसगढ़ पुलिस

◾️ समाधान - HRD मिनिस्ट्री

◾️ कोरोना सहायता अँप - बिहार

◾️ टीम 11- उत्तर प्रदेश

◾️कोव्हीड 19 ट्रकर - चंदीगड

◾️ सेल्फ deceleration अॅप - नागालैंड

◾️V-सेफ टनल - तेलंगाना

◾️ मो जीवन प्रोग्राम - ओडिशा

◾️ नमस्ते ओवर हैंडशेक अभियान - कर्नाटक

______________________________

भूगोल प्रश्नसंच


🔹महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?

A. 200.60 लाख हेक्टर

B. 207.60 लाख हेक्टर

C. 307.70 लाख हेक्टर✅

D. 318.60 लाख हेक्टर

🔹कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__________ कि.मी. ने कमी झाले.

A. 513✅

B. 213

C. 102

D. 302

🔹 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?

A. तेरणा

B. प्रवरा

C. मांजरा

D. भातसा✅

🔹___________ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.

A. कांडला✅

B. कोची

C. मांडवी

D. वरीलपैकी नाही

🔹जागतिक वारसा शिल्पस्थानात _____ या लेणीची नोंद केलेली आहे.

A. अजंठा लेणी✅

B. कार्ले लेणी

C. पितळखोरा लेणी

D. बेडसा लेणी

🔹खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?

A. आंध्र प्रदेश✅

B. महाराष्ट्

C. मध्य प्रदेश

D. गुजरात

🔹गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

A. अकोला

B. बुलढाणा

C. धुळे✅

D. ठाणे

🔹2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात ________ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.

A. नाशिक

B. औरंगाबाद

C. पुणे✅

D. सोलापूर

🔹महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?

A. सह्याद्रि पर्वत✅

B. सातपुडा पर्वत

C. निलगिरी पर्वत

D. अरवली पर्वत

🔹महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _____ नावाने ओळखली जाते.

A. सायरस

B. ध्रुव

C. पूर्णिमा

D. अप्सरा✅

🔹महाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे _____ जिल्ह्यात आहे.  

A. अमरावती व अकोला

B. नांदेड व परभणी

C. हिंगोली व वाशिम

D. यवतमाळ वे रत्नागिरी✅

🔹________  हा महाराष्ट्रातील पहीला पर्यटन जिल्हा आहे.

A. कोल्हापूर

B. नाशिक

C. सिंधूदुर्ग✅

D. रत्नागिरी

🔹जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यांशी जोडल्या आहेत ?

(a) बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद

(b) बुलढाणा, वाशिम, परभणी, नांदेड, बीड, औरंगाबाद, जळगाव

(c) औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलढाणा

पर्यायी उत्तरे :

A. फक्त विधान (a) बरोबर आहे. ✅

B. फक्त विधान (b) बरोबर आहे.

C. फक्त विधान (C) बरोबर आहे.

D. वरील सर्व विधाने चूक आहेत.

🔹1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा ______ प्रवृत्ती दर्शवितो.

A. स्थिर

B. घटती ✅

C. वाढती

D. तटस्थ

🔹महाराष्ट्र राज्यातील कोंकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे.

(a) शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग

(b) वन आणि खनिज संपत्ती

(c) कापड उद्योग

(d) मत्स्यपालन, फलोत्पादन, पर्यटन

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

A. फक्त (a)

B. (a) आणि (b)

C. फक्त (d)✅

D. (c) आणि (d)

महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे


🏝जायकवाडी         नाथसागर
🏝पानशेत              तानाजी सागर
🏝भंडारदरा          ऑर्थर लेक/विल्सन डॅम  
🏝गोसिखुर्द           इंदिरा सागर
🏝वरसगाव               वीर बाजी पासलकर
🏝तोतलाडोह            मेघदूत जलाशय
🏝भाटघर                  येसाजी कंक
🏝मुळा                      ज्ञानेश्वर सागर
🏝माजरा                   निजाम सागर
🏝कोयना                   शिवाजी सागर
🏝राधानगरी                लक्ष्मी सागर
🏝तानसा                     जगन्नाथ शंकरशेठ
🏝तापी प्रकल्प            मुक्ताई सागर
🏝माणिक डोह            शहाजी सागर
🏝चांदोली                   वसंत सागर
🏝उजनी                     यशवंत सागर
🏝दूधगंगा                  राजर्षी शाहू सागर
🏝विष्णुपुरी             शंकर सागर
🏝वैतरणा                 मोडक सागर

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...