०६ एप्रिल २०२०

Important Current Affairs -



१) ' मांदियाळी ' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
अ) पु.ल. देशपांडे
ब) ग.दि. माडगूळकर
✓क) अनंतराव भालेराव
ड) यापैकी नाही

२) सप्टेंबर २०१९ मध्ये पार पडलेल्या ६४ व्या राष्ट्रकुल संसदीय संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली गेली आहे ?
अ) राम प्रसाद गर्ग
✓ब) रेबेक्का कादागा
क) जाॅन नेल्सन
ड) यापैकी नाही

३) सप्टेंबर २०१९ मध्ये ६४ वे राष्ट्रकुल संसदीय संमेलन कोठे आयोजित केले गेले होते ?
✓अ) कंपाला
ब) पोर्ट एलिझाबेथ
क) सिडनी
ड) माॅरीशस

४) अमेरिकेत येणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे ?
अ) रशिया
ब) जपान
✓क) भारत
ड) इंग्लंड

५) १० जानेवारी २०२० रोजी समलिंगी समुदायासाठी राज्यस्तरीय न्यायालय भरविणारे पहिले राज्य कोणते ?
✓अ) केरळ
ब) महाराष्ट्र
क) छत्तीसगड
ड) आसाम

Q. अमेरिकेतील अलाबामा राज्यातून----------यांची सिनेटर म्हणून निवड झाली आहे?

1)रॉय मुर
2)ग्लेन मार्क
3)स्मिथ डेव
4)डग जोन्स✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये प्रभाग हे नियोजन व विकासाचे एकक असल्याने पंचायत समिती सामर्थ्यशाली आहे?

अ. महाराष्ट्र
ब. गुजरात
क. राजस्थान
ड. आंध्रप्रदेश

पर्याय:
1. फक्त अ आणि ब
2. फक्त क आणि ड✅✅
3. फक्त ड
4. वरीलपैकी एकही राज्यात नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. पुढील वैशिष्ट्ये कोणत्या शहराची किंवा गावाची आहे ते ओळखा.

अ. येथे भद्रा मारुतीचे पुरातन मंदिर आहे.
ब. येथे औरंगजेब बादशहाची कबर आहे.
क. येथून जवळच म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण आहे.
ड. दर सोमवती अमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते.

पर्याय..👇
1] दौलताबाद*l
2] खुलताबाद✅✅
3] वेरूळ
4] अजिंठा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित pH (सामू) संकल्पना कोणी मांडली

A) सोन्स
B) अँड सब्ज़सन्स.
C) जॉन लोहनस्ल.
D) सोरेन्सन.✅✅
E) यापैकी नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. कृत्रिम बुद्धिमत्तेवर बोलवली जाणारी भारतातली पहिली परिषद ठरणारी ‘RAISE’  याचे संपूर्ण नाव काय आहे?

1]  Responsible AI for Social Empowerment 2020✅✅

2]  Responsible AI for Scientific Empowerment 2020

3]  Rebooting AI for Social Empowerment 2020  

4]  Rebooting AI for Scientific Encouragement 2020  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?

A) औष्णिक विद्युत ऊर्जा ✅✅
B) आण्विक ऊर्जा 
C) जल विद्युत ऊर्जा
D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. सन 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते शहर दशलक्षी शहर नाही

A. नांदेड✅✅
B. कल्याण-डोंबिवली
C. ठाणे
D. नाशिक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 

A) 1961
B) 1974
C) 1985 ✅✅
D) 2010

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. भारतीय राष्ट्रीय विज्ञान ॲकॅडमी च्या अध्यक्षपदी नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत?

1)उत्कर्ष सिन्हा
2)प्रिती पटेल
3)चंद्रमा शहा ✅✅
4)गीता सिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. 'लिगसी ऑफ लर्निंग' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?

(A) सविता छाबरा ✅✅
(B) तवलीन सिंग
(C) भालचंद्र मुणगेकर
(D) सलमान रश्दी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. कोणत्या व्यक्तीच्या स्मृतीत मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन पाळतात?

(A) लियू झियाबो
(B) अर्नल्फो रोमेरो ✅✅
(C) मार्टिन एन्नाल्स
(D) नटालिया एस्टेमिरोव्हा

1)कोणत्या दोन देशांमध्ये ‘नेटिव्ह फ्यूरी’ सराव आयोजित केला जातो?
(A) अमेरिका आणि ब्रिटन
(B) संयुक्त अरब अमिरात आणि अफगाणिस्तान
(C) मालदीव आणि फ्रान्स
(D) अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात.  √

2)कोणत्या व्यक्तीने गणितासाठी 2020 सालाचा एबेल पारितोषिक जिंकला?
(A) यवेस मेयर आणि अँड्र्यू विल्स
(B) हिलेल फर्स्टनबर्ग आणि ग्रेगरी मार्गुलिस.  √
(C) कॅरेन उहलेनबेक
(D) रॉबर्ट लँगलँड्स

3)'लिगसी ऑफ लर्निंग' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?
(A) सविता छाबरा. √
(B) तवलीन सिंग
(C) भालचंद्र मुणगेकर
(D) सलमान रश्दी

4)कोणत्या व्यक्तीच्या स्मृतीत मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन पाळतात?
(A) लियू झियाबो
(B) अर्नल्फो रोमेरो.  √
(C) मार्टिन एन्नाल्स
(D) नटालिया एस्टेमिरोव्हा

5)‘स्वयम प्रभा’ नावाचा उपक्रम हा कोणत्या मंत्रालयाचा पुढाकार आहे?
(A) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
(B) मनुष्यबळ विकास मंत्रालय.  √
(C) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
(D) कामगार व रोजगार मंत्रालय

6)निधन झालेले अल्बर्ट उडरझो कोणत्या कॉमिक बुक मासिकाकासाठी एक चित्रकार म्हणून कार्यरत होते?
(A) आर्ची कॉमिक्स
(B) गारफिल्ड कॉमिक्स
(C) टिनटिन कॉमिक्स
(D) अ‍ॅस्टरिक्स कॉमिक्स.  √

7)कोणत्या राज्यांमध्ये ‘संरक्षण औद्योगिक मार्गिका’ उभारली जात आहे?
(A) तामिळनाडू आणि महाराष्ट्र
(B) उत्तरप्रदेश आणि केरळ
(C) आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र
(D) यापैकी नाही.  √

8)मध्यप्रदेश राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत?
(A) शिवराज सिंग चौहान.  √
(B) कमल नाथ
(C) एन. बीरेन सिंग
(D) त्रिवेन्द्र सिंग रावत

9)COVID-19 विषाणूला प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नेमण्यात आलेल्या वैद्यकीय तज्ञांच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
(A) रणदीप गुलेरिया
(B) प्रीती सुदान
(C) डॉ. व्ही. के. पॉल.  √
(D) सुजित सिंग

10)कोणत्या व्यक्तीची इंडसइंड बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक झाली?
(A) आदित्य पुरी
(B) श्याम श्रीनिवासन
(C) सुमंत कठपलिया.  √
(D) अमिताभ चौधरी

1)आपत्ती व्यवस्थापनासाठी हैदराबादच्या ARCI या संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘फ्युल सेल्स’ तंत्रज्ञानाचे नाव काय आहे?
(A) पॉलिमर इलेक्ट्रोलक्स मेम्ब्रेन फ्युल सेल्स
(B) पॉलीझोन इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स
(C) पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मटेरियल फ्युल सेल्स
(D) पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स.  √

2)राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानाने बचतगटाच्या उत्पादनांच्या ई-विपणनासाठी कोणत्या ई-कॉमर्स कंपनीसोबत सामंजस्य करार केला?
(A) स्नॅपडील
(B) अॅमेझॉन.  √
(C) फ्लिपकार्ट
(D) अलिबाबा

3)सर्वोत्तम विद्यापीठांच्या नव्या ‘QS जागतिक क्रमवारी’मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई कोणत्या क्रमांकावर आहे?
(A) 15
(B) 20
(C) 44.  √
(D) 50

4)जम्मू व काश्मीरमध्ये कोणत्या तंत्रज्ञानासह इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे?
(A) IMEI-IP-बाइंडिंग
(B) IMEI-बाइंडिंग
(C) IP-बाइंडिंग
(D) MAC-बाइंडिंग.  √

5)भारताच्या कोणत्या शहरात ‘आंतरराष्ट्रीय नॅनो विज्ञान व नॅनो तंत्रज्ञान परिषद 2020’ आयोजित करण्यात आली?
(A) कोलकाता.  √
(B) पुणे
(C) बंगळुरू
(D) नवी दिल्ली

6)‘जीनोम इंडिया’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात संदर्भ जीनोम (जनुकीय संरचना) माहिती तयार करण्यासाठी किती व्यक्तींचे नमुने गोळा केले जाणार?
(A) 1000
(B) 5000
(C) 10,000.  √
(D) 11,000

7)भारताच्या कोणत्या शहरात गुगल कंपनी दुसरे क्लाऊड स्टेशन उघडणार आहे?
(A) कोलकाता
(B) पुणे
(C) बंगळुरू
(D) नवी दिल्ली.  √

8)एकात्मिक स्थानिक ऊर्जा प्रणालीच्या संदर्भात कार्य करण्यासाठी भारत कोणत्या राष्ट्रसंघाबरोबर मिळून काम करणार आहे?
(A) युरोपीय संघ.  √
(B) अमेरिका संघ
(C) आफ्रिका संघ
(D) ब्रिटन

9)मार्च 2020 या महिन्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले?
(A) जापान
(B) फ्रान्स
(C) चीन.  √
(D) ब्रिटन

10)_______ हा नागरिकांना सार्वजनिक परिवहन विनामूल्य करणार जगातला पहिला देश ठरला?
(A) लक्झेमबर्ग. √
(B) चीन
(C) जापान
(D) कॅनडा

📍 कोणत्या देशाच्या सैन्याला ‘संयुक्त राष्ट्रसंघ पदक’ प्राप्त झाला?

(A) दक्षिण कोरिया
(B) फ्रान्स
(C) चीन
(D) भारत✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 "माइंड मास्टर" शीर्षक असलेले आत्मचरित्र _ यांनी लिहिले आहे.

(A) विश्वनाथन आनंद✅✅
(B) गुकेश
(C) सूर्य शेखर
(D) हरिकृष्ण

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या लेखकाने ‘दक्षिण आशियाई साहित्यासाठी DSC पारितोषिक 2019’ जिंकला?

(A) सुकेतू मेहता
(B) विक्रम सेठ
(C) अमिताभ बागची✅✅
(D) अनुजा चौहान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ऊर्जा-कार्यक्षम गृहनिर्माण कार्यक्रमासाठी भारताने कोणत्या देशाकडून 277 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचे कर्ज मिळवले?

(A) जर्मनी✅✅
(B) फ्रान्स
(C) रशिया
(D) इस्त्राएल

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 __ रोजी ‘स्टीलिंग इंडिया 2019’ नावाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

(A) 10 डिसेंबर
(B) 15 डिसेंबर
(C) 12 डिसेंबर
(D) 16 डिसेंबर✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या राज्य सरकारने ‘व्हर्च्युअल पोलिस स्टेशन’ उभारण्याचा निर्णय घेतला?

(A) ओडिशा
(B) गुजरात
(C) आंध्रप्रदेश
(D) कर्नाटक

हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत.
(A) के. व्ही. चौधरी
(B) शरद कुमार
(C) संजय कोठारी✅
(D) प्रदीप कुमार

कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
(A) त्रिपुरा
(B) मिझोरम
(C) मणीपूर
(D) आसाम✅

कोणते आसाम राज्याचे पहिले "कचरा विरहित गाव" ठरले?
(A) गुवाहाटी
(B) सिलचर
(C) तेजपूर
(D) तिताबोर✅

‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
(A) क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस✅
(B) क्लोजिंग द जेंडर इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(C) क्लोजिंग द इकनॉमिक इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(D) क्लोजिंग द इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस

कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?
(A) सायना नेहवाल
(B) पी. व्ही. सिंधू✅
(C) अश्विनी पोनप्पा
(D) ज्वाला गुट्टा

‘आस्कदिशा’ चॅटबॉट याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. भारतीय रेल्वेनी ऑक्टोबर 2019 या महिन्यात ‘आस्कदिशा’ चॅटबॉट सेवा सादर केली.

2. ‘आस्कदिशा’ चॅटबॉट हे प्रारंभी हिंदी भाषेत सुरू करण्यात आले.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)✅

_ या शहरात ‘इंडियन नेव्हल सिम्फॉनिक ऑर्केस्ट्रा 2020’ हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) भुवनेश्वर
(B) नवी दिल्ली✅
(C) भोपाळ
(D) चेन्नई

____ या संस्थेच्या वतीने ‘5जी हॅकाथॉन’ या कार्यक्रमाची घोषणा केली.
(A) गूगल इंडिया
(B) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(C) दूरसंचार विभाग✅
(D) भारत सरकारच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट

कोणत्या व्यक्तीने दक्षिणी नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ट्रेनिंग) या पदाची जबाबदारी स्वीकारली?
(A) अँटनी जॉर्ज✅
(B) अजित कुमार पी.
(C) अतुल कुमार जैन
(D) अनिल कुमार चावला

_ या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सव’चे उद्घाटन झाले.
(A) भोपाळ
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली✅
(D) लखनऊ

कोणत्या राज्य सरकारने ‘थाई मांगूर’ माशांचे प्रजनन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला?
(A) तामिळनाडू
(B) पश्चिम बंगाल
(C) आसाम
(D) महाराष्ट्र✅

_ हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला.
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) रॉस टेलर✅
(D) महेंद्र सिंग धोनी

विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शाळेच्या तासात कमीतकमी तीन वेळा घंटा वाजवण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) दिल्ली
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र✅

फेब्रुवारी 2020 या महिन्यात _ ही कंपनी ‘निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स’ यामध्ये नोंदवली गेली.
(A) महिंद्रा इन्फोटेक
(B) लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (L&T)✅✅
(C) ट्रायकन इन्फोटेक
(D) यापैकी नाही

_ या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ ही स्पर्धा होत आहे.
(A) भुवनेश्वर✅✅✅✅
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई

1)ग्रँड इथिओपियन रिनैसन्स डॅम (GERD) याच्या संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान बरोबर आहे?

1. GERD हा आफ्रिकेतला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे आणि तो इथिओपियाच्या शेबेल नदीवर बांधण्यात आला आहे.

2. इथिओपियाच्या पूर्वेकडे लाल समुद्राचा किनारा आहे.

अचूक पर्याय निवडा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) यापैकी नाही

2)“भूमी राशी संकेतस्थळ” _ याच्या अखत्यारीत आहे.
(A) भूशास्त्र मंत्रालय
(B) रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय.  √
(C) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
(D) पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय

3)कोणत्या चक्रात ‘मेथॅनोट्रॉफिक बॅक्टेरिया’ची भूमिका आहे?
(A) कार्बन चक्र
(B) मिथेन चक्र.  √
(C) नायट्रोजन चक्र
(D) फॉस्फरस चक्र

4)जलशक्ती मंत्रालयांतर्गत असलेले गंगा आमंत्रण अभियान ____ याच्या माध्यमातून नदीचे पुनरुज्जीवन व जलसंधारण यावर लक्ष केंद्रीत करते.
(A) गंगा नदीत ओपन वॉटर राफ्टिंग आणि कायकिंग मोहीम.  √
(B) गंगा स्वच्छतेबाबत जनजागृती करणारी पथयात्रा
(C) पत्रिकांचे वितरण
(D) यापैकी नाही

5)________ यांच्या शिफारशीनुसार ‘भारतीय रिझर्व्ह बँक कायदा-1934’ द्वारे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
(A) डी. गोरवाला आयोग
(B) हिल्टन-यंग आयोग.  √
(C) नरसिंह आयोग
(D) गाडगीळ आयोग

6)पार पडलेल्या 'विंग्स इंडिया 2020’ या कार्यक्रमाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या:

1. 'विंग्स इंडिया’ हा कार्यक्रम नागरी उड्डयन मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांनी संयुक्तपणे आयोजित केला.

2. कार्यक्रमाची “फ्लाइंग फॉर ऑल” ही संकल्पना होती.

अचूक विधान असणार पर्याय निवडा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2).  √
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) यापैकी नाही

7)_____ राज्यात ‘कौशल सतरंग योजना’ लागू करण्यात आली.
(A) मध्यप्रदेश
(B) राजस्थान
(C) उत्तरप्रदेश.  √
(D) बिहार

8)अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (CAIT) कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे भारताच्या अर्थमंत्र्यांकडे त्यांच्या व्यवसायांसाठी विमा संरक्षण देण्याची मागणी केली. त्याच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या,

1. CAIT यांनी अतिरिक्त संरक्षण म्हणून 'कोरोन विषाणूमुळे आलेला व्यत्यय' जाहीर करण्याचा सल्ला दिला.

2. संदीप खंडेलवाल हे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (CAIT) सरचिटणीस आहेत.

अचूक पर्याय निवडा.

(A) केवळ (1) बरोबर आहे.  √
(B) केवळ (2) बरोबर आहे
(C) (1) आणि (2) असे दोन्ही बरोबर आहेत
(D) ना (1) आणि ना (2) बरोबर आहे

9)कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनी (EPFO) ठेवींवरील व्याज दर किती टक्के कमी केले आहेत?
(A) 7 टक्के
(B) 8.5 टक्के.  √
(C) 6 टक्के
(D) 7.5 टक्के

10)भारतात कोरोना विषाणूच्या 80 पेक्षा जास्त प्रकरणांची पुष्टी झाल्यानंतर सरकारने __ म्हणून जाहीर केले.
(A) नैसर्गिक संकट
(B) सूचित संकट.  √
(C) मोठे संकट
(D) सर्वोच्च संकट

1)बोडोलँड प्रादेशिक क्षेत्र कोणत्या राज्यात येते?
(A) मेघालय.  √
(B) आसाम
(C) अरुणाचल प्रदेश
(D) त्रिपुरा

2)COMCASA करारानंतर P-8I विमानांसाठी भारतीय नौदल आणि बोईंग कंपनी यांच्यात झालेल्या कराराच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. COMCASA ही LEMOA याची भारतीय आवृत्ती आहे.

2. COMCASA हा रशियाकडून भारताला सुरक्षा उपकरणे हस्तांतरित करण्यासाठी कायदेशीर चौकट उपलब्ध करुन देणारा करार आहे.

अचूक विधान असलेला पर्याय निवडा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) दिलेल्यापैकी एकही नाही.  √

3)17 मार्च 2020 रोजी लोकसभेनी विशेष गटातल्या महिलांसाठी गर्भपात करण्यासाठीचा कालावधी 20 आठवड्यांवरून 24 आठवड्यांपर्यंत वाढविण्याची परवानगी देणारा विधेयक मंजूर केला. या विधेयकाने कोणत्या कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे?
(A) वैद्यकीय गर्भपात कायदा-1971.  √
(B) वैद्यकीय गर्भपात कायदा-2002
(C) वैद्यकीय गर्भपात कायदा-2015
(D) भारतीय दंड संहिता-1860

4)अर्थ मंत्रालयाने भारत सरकार आणि ब्रुनेई दरुसलाम सरकार यांच्यात झालेल्या कराराला अधिसूचित केले. करार कोणत्या विषयाच्या संबंधित आहे?
(A) दोन्ही देशांमधील करासंबंधी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हा करार आहे.  √
(B) लष्करी उद्देशासाठी उच्च-अंत प्रगत तंत्रज्ञानाविषयी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हा करार आहे
(C) ज्ञानाची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने विद्यार्थी विनिमय कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी हा करार आहे
(D) वास्तुशास्त्र विषयक ज्ञानासंबंधी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हा करार आहे

5)भारत सरकार कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत दुग्धशाळा उद्योजकता विकास योजना (DEDS) राबविणार आहे?
(A) ग्रामीण विकास
(B) सागरी क्षेत्र
(C) कौशल्य विकास
(D) पशुसंवर्धन.  √

6)_________ या शहरात संस्कृती मंत्रालयाने “केंद्रीय हिमालयी संस्कृती शिक्षण संस्था” (Central Institute of Himalayan Culture Studies) याची स्थापना केली.
(A) कोकराझर, आसाम
(B) दाहुंग, अरुणाचल प्रदेश.  √
(C) लोहित, अरुणाचल प्रदेश
(D) सिंदई, मेघालय

7)भारत कोणत्या देशाला शाळेच्या बांधकामासाठी सुमारे सात कोटी रुपये देणार आहे?
(A) बांग्लादेश
(B) नेपाळ.  √
(C) भूतान
(D) श्रीलंका

8)कोणत्या संस्थेनी स्टार्चपासून ‘हेमोस्टॅट’ हा पदार्थ विकसित केला?
(A) भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर
(B) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद
(C) इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी.  √
(D) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था

9)कोणत्या बॅडमिंटनपटूने 2020 ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतल्या महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले?
(A) सेरेना विल्यम्स
(B) तेई तेजु यिंग.  √
(C) सिमोना हेलेप
(D) व्हिक्टर अॅक्सलसेन

10)______ हे इराक देशाचे नवे पंतप्रधान आहेत.
(A) मोहम्मद तौफिक अल्लावी
(B) बरहम सालिह
(C) अदनान अल झुर्फी.  √
(D) आदिल अब्दुल-महदी अल-मुन्ताफिकी

1)‘रोड सेफ्टी मीडिया फेलोशिप अवॉर्ड 2019’ _ ह्यांना देण्यात आला.
(A) रवींद्र शेट्टी
(B) प्राची साळवे.  √
(C) पूर्णिमा सिंग
(D) यापैकी नाही

2)COVID-19 विषाणूच्या लसीची पहिली मानवी चाचणी अमेरिकेच्या सिएटल या शहरात घेतली जात आहे. लसीचे नाव काय आहे?
(A) mRNA-1233
(B) mRNA-1723
(C) mRNA-1273.  √
(D) tRNA-1273

3)संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून मान्य करण्यात आलेल्या 83 LCA तेजस विमानांच्या खरेदीच्या प्रस्तावासंदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. LCA तेजस विमानाची संरचना बोईंग कंपनीने केली आहे.

2. संरक्षण अधिग्रहण परिषद (DAC) गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

अचूक विधान ओळखा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) यापैकी नाही.  √

4)_____ हे 'इनव्हिन्सिबल - ए ट्रिब्यूट टू मनोहर पर्रीकर' शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत.
(A) सद्गुरु पाटील आणि मायाभूषण नागवेणकर
(B) पूर्णिमा सिंग आणि रवींद्र शेट्टी
(C) तरुण विजय.  √
(D) श्रीपाद नाईक

5)_____ या कंपनीच्या सहकार्याने "इनोव्हेट फॉर अॅक्सेसीबल इंडिया’ ह्या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला.
(A) एक्सेंचर
(B) मायक्रोसॉफ्ट.  √
(C) गूगल
(D) अॅमेझॉन

6)सिंगापूरमध्ये होणाऱ्या ‘जागतिक शहरे शिखर परिषद-2020’ याचा विषय काय आहे?
(A) लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज: अ‍ॅडॉप्टिंग टू ए डिसरप्टेड वर्ल्ड. √
(B) ग्रीन अँड क्लीन लिव्हिंग: प्रीपेरींग फॉर फ्युचर
(C) सिटीज अडॅप्टेशन फॉर बेटर लाइफ
(D) अडॉप्टिंग टू क्लायमेट चेंज

7)कोणत्या व्यक्तीची भारतातल्या गुगल क्लाऊड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली?
(A) सत्य नडेला
(B) सुंदर पिचाई
(C) राजीव कुमार
(D) करण बाजवा.  √

8)“माय एन्काऊंटर्स इन पार्लीमेंट” हे पुस्तक कोणी लिहिले?
(A) भालचंद्र मुणगेकर.  √
(B) व्यंकय्या नायडू
(C) चेतन भगत
(D) सोमनाथ चटर्जी

9)कोणत्या दिवशी आयुध निर्माण कारखाना दिवस साजरा केला जातो?
(A) 10 मार्च
(B) 18 मार्च.  √
(C) 12 मार्च
(D) 20 मार्च

10)______ हे ऊर्जा वित्त महामंडळाचे (PFC) नवे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
(A) रवींदर सिंग ढिल्लोन.  √
(B) अरुण गुप्ता
(C) रमेश बाबू
(D) एच. शंकर

भारतीयांमध्ये रोगप्रतिकारकक्षमता उत्तम

- जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूविरोधी लढय़ातील भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. भारतातील टाळेबंदीचे डब्ल्यूएचओचे विशेष प्रतिनिधी डॉ. डेव्हिड नवारो यांनी समर्थन केले आहे. युरोप आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांनी कोरोना संकट गांभीर्याने घेतले नसताना भारतात मात्र यावर जलदगतीने काम झाले आहे.

- भारतात उष्ण हवामान आणि हिवतापामुळे नागरिकांमध्ये उत्तम रोगप्रतिकारकक्षमता आहे. भारतीयांचे शरीर कोरोनाला पराभूत करेल अशी अपेक्षा करतो, असे नवारो म्हणाले.

- कोरोनाविरोधात मोदी सरकारने उचललेल्या कठोर पावलांचे नवारो यांनी कौतुक केले आहे. टाळेबंदीमुळे मोठा त्रास होत असला तरीही याचमुळे लवकर दिलासा मिळणार आहे. भारताकडे कोरोनाला रोखण्याची अद्भूत क्षमता आहे. भारताने लोकांना संसर्गापासून बचावाची माहिती दिली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्रितपणे पावले उचलल्याचे नवारो यांनी म्हटले आहे.

- इटली आणि अमेरिकेत कोविड-19 विषाणू समुदायात फैलावत राहिला. या देशांनी लक्षणे आढळून आल्यावरही लोकांना विलग करणे टाळले. वेगाने कारवाई न केल्यास अडचणी वाढू शकतात. जलद पावले उचलणे हाच एकमात्र उपाय असून भारतात योग्यप्रकारे अंमलबजावणी केली जात असल्याचे नवारो यांनी नमूद केले.

▪️सर्वांची चाचणी अशक्य

- सर्व नागरिकांची चाचणी करणे युरोप आणि अमेरिकेतही शक्य नाही. संशयित व्यक्तीला त्वरित विलग केले जावे. या प्रयत्नांमधूनच कोरोनाचा संसर्ग नियंत्रित केला जाऊ शकतो. टाळेबंदीमुळे गरीब अधिकच गरीब होतात. अन्नधान्याच्या किमती वाढू लागतात आणि लोकांना त्रास सहन करावा लागतो. परंतु आजाराला रोखण्यासाठी हे आवश्यक आहे. स्वतःच्या वर्तनात बदल घडवून आणत समुदायाला संसर्गापासून वाचवू शकतो असे नवारो म्हणाले.

▪️मास्कचा वापर व्हावा

- संसर्ग झालेल्या लोकांनी मास्कचा वापर करणे गरजेचा आहे. तसेच लोकांनी परस्परांपासून किमान दोन मीटरचे अंतर राखावे. मास्क वापरण्यासह लोकांना खोकण्याच्या आणि शिंकण्याच्या योग्य पद्धतीची माहिती असावी. आरोग्य कर्मचाऱयांना सुरक्षेची सर्वाधिक गरज आहे. ते प्रंटलाईनवर कार्यरत असून रुग्णांच्या संपर्कात येत असतात. अधिकाधिक लोकांनी मास्क परिधान करावा, अशी सूचना त्यांनी केली.

▪️वयोगट महत्त्वाचा घटक

- उष्ण हवामान असलेल्या देशांमधील लोक संसर्गजन्य आजारांना वारंवार तोंड देत असतात. या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता तुलनेने अधिक असते. यानुसार कोविड-19 विषाणू भारतीयांच्या शरीरातच पराभूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. बीसीजी लसीमुळे लोकांना संसर्गापासून मदत मिळू शकते. तसेच लोकांचा वयोगट आजाराला तोंड देण्यासाठीचा महत्त्वाचा घटक आहे. विकसनशील देशांमध्ये तुलनेने तरुण लोकसंख्या असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत

IBM च्या CEO पदी भारतीय :: अरविंद कृष्णा

◾जगप्रसिद्ध आयबीएमच्या (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) विशेष कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अरविंद कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◾तसेच अनेक वर्षांपासून सीईओ असणाऱ्या व्हर्जिनिया रोमेटी यांच्याकडून अरविंद सहा एप्रिल रोजी कार्यभार स्वीकारतील.

◾ 62 वर्षीय रोमेटी या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. 40 वर्षांपासून कंपनीच्या सेवेमध्ये असणाऱ्या रोमेटी या 2020 च्या शेवटी निवृत्त होणार असल्याचंही कंपनीने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

◾अरविंद सध्या आयबीएमच्या क्लाऊड आणि कग्नेटीव्ह विभागाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

◾ क्लाऊड तंत्रज्ञान आणि डेटासंदर्भातील कामे या विभागांकडून पाहिली जातात. आयबीएम क्लाऊड, आयबीएम सिक्युरिटी, कग्नेटीव्ह अॅप्लिकेशन्स, आयबीएम रिसर्च अशा चार मुख्य शाखांचे नेतृत्व अरविंद करत आहेत.

◾त्याआधी ते आयबीएमच्या सिस्टीम्स आणि टेक्नोलॉजीच्या डेव्हलपमेंट आणि निर्मिती विभागामध्ये महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत होते.

◾१९९० साली कंपनीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर ते आयबीएमच्या डेटासंदर्भातील उद्योग विभागामध्ये होते.

भारतातील चलन इतिहास


भारतात ऋग्वेद काळापासून सोन्याचे चलन होते. वेदांत नाण्याचा ‘निष्क’ असा उल्लेख आढळतो. उपलब्ध माहितीवरून भारतातील अनेक लहानमोठ्या राज्यांत सोन्याचे मुख्य नाणे व चांदी, तांबे या धातूंची उपनाणी प्रचारात होती असे दिसते. अकबराच्या वेळी द्विधातुचलनपद्धती अस्तित्वात होती. सोने व चांदी या दोन्ही धातूंची नाणी प्रचारात असून त्यांचे परस्परांशी विनिमयमूल्य ठरलेले होते.

मराठी राज्यात सोन्याची नाणी वापरात होती. परंतु सर्वसामान्य व्यवहारासाठी रुपयाची नाणी उपयोगात आणली जात. ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली, तेव्हा भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील स्वतंत्र राजे आपापली नाणी पाडीत. १७६० च्या सुमारास सु. ९९४ नाणी प्रचारात असून ती नाणी कमीअधिक वजनाची व दर्जाची होती. साहजिकच सराफाची मदत घेतल्यावाचून ती पारखणे अशक्य होई आणि नाणी असंख्य असल्याने सर्वसामान्य लोकांचा गोंधळ होई. औरंगजेबाच्या कारकीर्दीत टांकसाळींची संख्या दोनशेपर्यंत होती. ईस्ट इंडिया कंपनीने औरंगजेबाच्या विरोधाला न जुमानता मुंबईत टांकसाळ स्थापन करून नाणी पाडली. हळूहळू कंपनीने कलकत्ता, पाँडेचेरी, अर्कांट, डाक्का आदी ठिकाणी टांकसाळी सुरू केल्या. १८३५ साली नाण्यांसंबंधी करण्यात आलेल्या कायद्यानुसार मद्रास येथे चालू असलेला १८० ग्रेनचा चांदीचा रुपया देशभर प्रमाणभूत चलन म्हणून प्रचारात आला. सोन्याच्या मोहरा रद्द करण्यात आल्या. लोकांना चांदीच्या बदल्यात टांकसाळीतून रुपये मिळण्याची व्यवस्था करण्यात आली. रुपयाची दर्शनी किंमत व त्यासाठी वापरण्यात आलेल्या चांदीची किंमत समान ठेवण्यात आली. अशा प्रकारे भारतात १८३५ मध्ये चांदीचे चलन अगर रौप्यमापनपद्धती अस्तित्वात आली.

🟤 चलन 🟤

विनिमयाचे सर्वमान्य साधन म्हणजे चलन. सरकारी शिक्क्याने चलनास सार्वत्रिक मान्यता प्राप्त होते व लोकांचा त्यावर विश्वास बसतो. कायद्याचा पाठिंबा व लोकांचा विश्वास ह्या आधारावर समाजात चलन वापरले जाते. सर्वग्राह्यता हा चलनाचा प्रमुख गुण. चलन आणि पैसा हे शब्द समानार्थी म्हणून अनेकदा वापरले जातात. पण पैसा ही संकल्पना अधिक व्यापक आहे. नाणी व कागदी नोटा यांस चलन म्हणता येईल. बॅंकेचा धनादेश सर्वग्राह्य नसल्याने त्यास चलन म्हणता येणार नाही. मात्र पैसा ह्या संकल्पनेत चलन आणि बॅंकनिर्मित पत या दोन्हींचा समावेश होतो.


🟤चलनमान🟤

चलनाची निर्मिती आणि चलनाच्या मूल्यावरील नियंत्रण यांसाठी जी व्यवस्था केलेली असते, तिला चलनमान असे म्हणतात. चलनाचे देशांतर्गत मूल्य म्हणजे देशातील वस्तू खरेदी करण्याची शक्ती. हे मूल्य किंमतीच्या व्यस्त प्रमाणात असते. वस्तूच्या किंमती वर गेल्या तर चलनाची क्रयशक्ती खाली येते. उलटपक्षी वस्तू स्वस्त झाल्या म्हणजे चलनाचे अंतर्गत मूल्य वाढते. देशाची हुंडणावळ ही देशाच्या चलनाचे बाह्य मूल्य होय. देशाच्या चलनाच्या बदली दुसऱ्या देशाच्या जितके चलन मिळेल, त्या प्रमाणास चलनाचे बाह्य मूल्य म्हणतात. विशिष्ट देशाच्या चलनाचे वेगवेगळ्या देशांतील चलनांच्या संदर्भात बाह्य मूल्य निश्चित केले जाते.

चलनमानाचे स्थूलमानाने दोन प्रकार आहेत : धातुमान पद्धती व कागदी चलनपद्धती. धातुमान पद्धतीचे दोन विभाग केले जातात : (१) द्विधातुपद्धती आणि (२) एकधातुपद्धती. एकधातुपद्धतीत सुवर्णपरिमाण किंवा रौप्यपरिमाण असते. द्विधातुपद्धतीत दोन्ही परिमाणे एकाच वेळी वापरात असतात.

🟤द्विधातुपद्धती🟤

जेव्हा चलनव्यवहारात दोन धातूंचा एकाच वेळी उपयोग केला जातो, तेव्हा द्विधातुपद्धती अस्तित्वात येते. एकोणिसाव्या शतकात अनेक देशांत ही पद्धती चालू होती. चलनासाठी सोने व चांदी या दोन धातूंचा वापर करण्यात येई. सोन्याची व चांदीची नाणी विधिग्राह्य पैसा म्हणून वापरली जात. ज्या देशांत द्विधातुपद्धती होती, त्या देशांत कायद्याने प्रत्येक चलनाचे सोने व चांदी यांमधील मूल्य निश्चित करण्यात आले होते. दोन्ही धातूंसाठी मुक्त बाजारपेठ होती आणि दोन्ही धातूंचे नाण्यांत रूपांतर करण्याची पूर्ण मुभा होती. चलनाचे सोने व चांदी यांमधील मूल्य ठरविले की, दोन्ही धातूंच्या नाण्यांचा आपापसांतील विनिमयदर ठरविणे सोपे जाई. उदा., १९७२ मध्ये अमेरिकेने डॉलरचे सुवर्णातील मूल्य २४·७५ ग्रेन आणि चांदीतील मूल्य ३७१·२५ ग्रेन असे ठेवले. साहजिकच सोने व चांदी यांतील विनिमयदर १ : १५ असा झाला.

🟤सुवर्णमुद्रा पद्धती🟤

या पद्धतीत सोन्याची नाणी प्रचारात असतात. टांकसाळ लोकांना खुली असते. टांकसाळीत सोने देऊन त्याऐवजी सोन्याची नाणी मिळविता येतात व सोन्याच्या नाण्यांच्या बदली सोने मिळू शकते. चलनात हलक्या धातूंची नाणी अगर कागदी नोटा असल्या, तरी त्यांचे रूपांतर सोन्यात करता येते. सोन्याच्या आयातनिर्यातीवर निर्बंध नसतात. ही पद्धती अंमलबजावणीच्या दृष्टीने सोपी असून व्यवहारातील चलनाचे प्रमाण चलनसंस्थेच्या लहरीनुसार बदलत नाही. सोन्याचा प्रचंड साठा खजिन्यात असावा लागतो. ग्रेट ब्रिटनने ही पद्धत १८१६ पासून पहिले महायुद्ध सुरू होईपर्यंत म्हणजे १९१४ पर्यंत चालू ठेवली होती. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदी देशांत ही पद्धती अस्तित्वात होती. सोन्याची नाणी सतत वापरात असली की झिजतात आणि मौल्यवान धातूंचा अपव्यय होतो. तसेच सोन्याचा पुरवठा  अपेक्षेइतका खाणीतून मिळाला नाही, तर गरज असूनही चलनात वाढ करणे शक्य होत नाही. अशा ताठर पद्धतीपेक्षा कमी खर्चाची व अधिक सोयीस्कर पद्धती सुवर्णखंड परिमाण पद्धती होय.

🟤सुवर्णखंड परिमाण पद्धती🟤

या पद्धतीत सोन्याची नाणी प्रचारात नसतात. गौण नाणी व कागदी चलन वापरात असते. वापरातील चलनाचे विशिष्ट दराने सोन्याच्या तुकड्यांत रूपांतर करण्याचे दायित्व चलनसंस्थेवर असते. सोन्याची नाणी चलनात नसल्याने मौल्यवान धातूंची झीज होत नाही. कायद्याने ठरविलेल्या दराने सुवर्णांची खरेदी-विक्री करण्याची जबाबदारी सरकार घेत असल्याने लोकांचा चलनावर विश्वास असतो. चलनाची सोन्याशी सांगड घातली असल्याने सोन्याच्या साठ्यावर चलनवाढ व चलनघट अवलंबून असते.त्यामुळे सरकारच्या मर्जीप्रमाणे चलनाच्या प्रमाणात बदल होऊ शकत नाही. सुवर्णमुद्रा पद्धतीपेक्षा ही पद्धत अधिक लवचिक आहे. इंग्लंडमध्ये ही पद्धती १९२५–३१ या काळात अस्तित्वात होती. हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार भारताने १९२७ मध्ये ही पद्धती स्वीकारली; पण चार वर्षांनी १९३१ मध्ये ती रद्द केली.

🟤सुवर्ण विनिमय पद्धती🟤

या पद्धतीत सोन्याची नाणी चलनात नसतात. अंतर्गत चलनाची सोन्याशी अप्रत्यक्षपणे सांगड घातलेली असते. देशातील चलनाचा सुवर्णमानावर अधिष्ठित असलेल्या दुसऱ्या एखाद्या देशातील चलनाशी संबंध जोडलेला असतो. कागदी चलनाचे रूपांतर देशातल्या देशात न होता दुसऱ्या देशामध्ये सोन्यात व त्या देशाच्या चलनात केले जाते. या पद्धतीचा अवलंब करणाऱ्या देशाला परदेशात सोन्याचा वा सुवर्णमानावर अधिष्ठित असलेल्या परदेशी चलनाचा साठा ठेवावा लागतो. व्यापार आणि आर्थिक संबंध ह्या बाबतींत एखाद्या मोठ्या देशावर अवलंबून असणाऱ्या देशांनी पहिल्या महायुद्धापूर्वीच्या काळात सुवर्ण विनिमय पद्धतीचा अंगीकार केल्याचे दिसते. हॉलंडने १८७७ मध्ये ही पद्धती स्वीकारली. रशियाने १८९४ मध्ये, फिलिपीन्सने १९०३ मध्ये व मेक्सिकोने १९०४ साली ही पद्धत चालू केली. १८९३ पासून १९२७ पर्यंत (युद्धकाळ सोडल्यास) भारतात ही पद्धत अस्तित्वात होती. ज्या देशांकडे सुवर्णाचा मोठा साठा नाही, त्यांना ही पद्धती फार सोयीची असते. सोन्याचा अल्प साठा असला, तरी त्या आधारावर चलनाचा संबंध सुवर्णमानाशी निगडित करणे त्या देशांना शक्य होते. मात्र देशातील चलन परदेशांतील चलनाशी जोडलेले असल्यामुळे जागतिक बाजारपेठांत परदेशी चलनाच्या किमतीत होणाऱ्या चढउतारांचा परिणाम देशातील चलनावर होत राहतो. देशाला चलनविषयक धोरण स्वतंत्रपणे आखता येत नाही.

🟤सुवर्णमानाचे गुणदोष🟤

समजण्यास व व्यवहारात आणण्यास सोपी, आपोआप चालणारी व आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढीस लावणारी अशी सुवर्णमान पद्धती असल्याने, अनेक देशांनी सुवर्णमानाचा अवलंब केला. चलनाचे प्रमाण सुवर्णसंचयावर अवलंबून ठेवलेले असल्याने चलनसंस्थेला स्वतःच्या लहरीनुसार चलनपुरवठ्यात बदल करता येत नाही. या पद्धतीत कागदी चलन असल्यास तेदेखील सुवर्णात परिवर्तनीय असल्याने सरकारला फार सावधगिरी बाळगावी लागते. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीतही सुवर्णमान उपकारक ठरते. सुवर्णमानावर अधिष्ठित असणाऱ्या वेगवेगळ्या देशांतील चलनांचा विनिमयदर निश्चित असतो व यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारास उत्तेजन मिळते.

🟤कागदी चलन🟤

कागदी चलन हे नियंत्रित चलनव्यवस्थेखाली काढले जाते. मध्यवर्ती बॅंक कागदी नोटा प्रचारात आणते व कागदी चलनाला आधार म्हणून चलनाला काही टक्के भाग सुवर्णाच्या स्वरूपात आपल्या खजिन्यात ठेवते. प्रातिनिधिक कागदी चलन असले, तर जेवढ्या कागदी नोटा असतील तेवढ्याच किमतीचे सोने आधार म्हणून ठेवावे लागते. कागदी चलनाचे रूपांतर सुवर्णात करता येते. प्रमाणित निधिपद्धती असेल, तर एकूण कागदी चलनाच्या काही विशिष्ट प्रमाणात सुवर्णनिधी ठेवावा लागतो. वेळोवेळी कायद्याने हे प्रमाण ठराविले जाते. मर्यादित विश्वासनिधि-पद्धती अस्तित्वात असेल, तर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत चलनास सोन्याचा आधार द्यावा लागत नाही. मात्र त्या मर्यादेपेक्षा अधिक कागदी चलन काढावयाचे असेल, तर तितक्याच किमतीचे सोने मध्यवर्ती बॅंकेत वा सरकारी तिजोरीत ठेवावे लागते.

🟤रिझर्व्ह बॅंकेचे कार्य🟤

पतचलननिर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेले अधिकार रिझर्व्ह बॅंकेला आहेत. पतनिर्मितीवर संख्यात्मक निर्बंध लादण्याच्या दृष्टीने व्याजाच्या दरात फेरफार करणे रोख्यांची खरेदी-विक्री करणे व बॅंकांनी ठेवावयाच्या राखीव निधीचे प्रमाण बदलणे या तीनही साधनांचा उपयोग रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी केलेला दिसतो; त्याचप्रमाणे गुणात्मक निर्बंधांचा योग्यवेळी परिणामकारक उपयोग करण्याच्या दृष्टीने तिने पावले उचललेली दिसतात.

रिझर्व्ह बॅंकेने १९३५ च्या नोव्हेंबरमध्ये व्याजाचा दर ३·५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणला व १९३५–५१ या काळात सुलभ द्रव्यपुरवठा योजना स्वीकारून व्याजाचा दर ३% स्थिर ठेवला. १९५१ मध्ये व्याजाचा दर पुन्हा ३·५ टक्क्यांवर नेण्यात आला. १९५६-५७ मध्ये किंमती वाढत गेल्यामुळे चलनवाढीस आळा घालण्यासाठी १९५७ च्या मे महिन्यात व्याजाचा दर ४ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला. भाववाढ रोखण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने व्याजाचा दर जानेवारी १९६३ मध्ये ४·५%, सप्टेंबर १९६४ मध्ये ५% आणि फेब्रुवारी १९६५ मध्ये ६% केला. भांडवलउभारणीस उत्तेजन मिळावे आणि अर्थकारणास गती प्राप्त व्हावी, म्हणून रिझर्व्ह बॅंकेने मार्च १९६८ मध्ये व्याजाचा दर ६ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत उतरविला; पण पुन्हा बॅंकेने ‘महाग पैसा’ धोरणाचा पाठपुरावा केला आणि व्याजाचा दर जानेवारी १९७१ मध्ये पुन्हा ६ टक्क्यांवर नेला. व्याजाच्या दरांत फेरबदल करून चलनविषयक नीती कार्यवाहीत आणण्याचे कार्य रिझर्व्ह बॅंकेने प्रथमपासून मोठ्या सावधगिरीने केले आहे, असे म्हटले पाहिजे.

🟤 अनुदाने 🟤
   
       वरिष्ठ सरकारी शासनाने आपल्या उत्पन्नातून कनिष्ठ शासनाला दिलेली आर्थिक मदत. एखाद्या कर-उत्पन्नातील विशिष्ट भाग किंवा ठराविक रक्कम प्रतिवर्षी अनुदानरूपाने मध्यवर्ती सरकार घटक-राज्यांना, वा घटकराज्ये स्थानिक स्वराज्य-संस्थांना देत असतात. इंग्लंडने १८३५ च्या सुमारास अनुदानांची प्रथा रूढ केली. सांप्रत अमेरिकेची संयुक्त संस्थाने, भारत यांसारख्या संघराज्यांत अनुदाने सरकारी अर्थव्यवस्थेचे आवश्यक अंग होऊन बसल्याचे दिसते. संविधानाने व कायद्याने दिलेल्या आर्थिक सत्तेचा वापर करूनही, घटकराज्यांना आपली विकासाची व लोककल्याणाची उद्दिष्टे आणि योजना पुऱ्‍या करण्यासाठी आवश्यक तेवढा पैसा उभा करता येत नाही. हा काही प्रमाणावर पुरविण्याच्या उद्देशाने केंद्राशासनाकडून घटकराज्यांना केंद्रीय राजस्वातून काही भाग अनुदानरूपाने देण्यात येतो. त्यामागे सर्व राज्यांचा विकास व समतोल प्रमाणात विकास असे दुहेरी उद्देश असतात.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...