२९ मार्च २०२०

शर्विका म्हात्रेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

- भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून नोंद करण्यात आली.

- अलिबागच्वया शर्विका म्हात्रेची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून इंडीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातील लोणेरे येथे राहणारी शर्विका ही दीड वर्षांपासून गिर्यारोहण करत आहे. तिने अतिशय दुर्गम किल्ले पायी चढून सर केले आहेत.

- जितेन म्हात्रे यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी कार्यालयाकडे शर्विकाचे गड किल्ल्यावर पायी चढतानाचे व्हिडीओ आणि कागदपत्रे पाठवली होती. ती तपासल्यानंतर शर्विकाची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून नोंद करण्यात आली. इंडिया रेकॉर्ड ऑफ बुककडून शर्विकाला मेडल, प्रमाणपत्र, बुक देण्यात आले.

- गड किल्ले पाहण्यासाठी अनेक पर्यटक, शिवभक्त जात असतात. मात्र पायी गड किल्ले सर करताना अनेकांची दमछाक होत असते. मात्र शर्विका ही दीड वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले पायी चालत जाऊन सर करीत आहे. शर्विकाचे वडील जितेन म्हात्रे आणि आई अमृता म्हात्रे यांना गड किल्ल्यावर जाण्याची हौस आहे.

-  मावळा प्रतिष्ठानमध्ये दोघेही सहभागी होऊन गड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम करीत आहेत. शर्विकालाही लहानपणापासूनच गड किल्ल्याचे आकर्षण असून सुट्टीत ती समुद्र वा इतर ठिकाणी न जाता गड किल्ल्यावर जाण्याचा हट्ट करीत असते, असे तिची आई अमृता म्हात्रे यांनी सांगितले. गड, किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेतही शर्विका स्वतहून भाग घेत असते.

- शर्विकाने आतापर्यंत ११ किल्ले हे पायी चढून सर केले आहेत. २६ जानेवारी रोजी प्रबळगड किल्ल्यावरील चढण्यास कठीण असलेला कलावंतीण किल्ला पायी चढून झेंडा फडकवला होता. शर्विकाला सर्व किल्ल्याची नावे पाठ असून छत्रपती शिवाजी महाराज यांची गारदही पाठ आहे. भविष्यात तिला चांगली गिर्यारोहक बनविण्याचा मानस असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.
———————————————

केरळ : जीवनावश्‍यक बाटलीबंद पाणी

- जादा किमतीने विक्री ठरणार गुन्हा

- हा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर केवळ भारतीय मानक संस्थेचे (बीआयएस) प्रमाणपत्र असलेल्या पाण्याच्या बाटल्या विकण्यास परवानगी दिली जाणार आहे. पाण्याच्या गुणवत्तेचे नियम कडक करणार असून, ते न पाळणाऱ्या उत्पादकाला पाणी विक्रीस बंदी घातली जाणार आहे, असा इशाराही मंत्र्यांनी दिला आहे. राज्यात १३ रुपयांपेक्षा जास्त किमतीने पाण्याची बाटली विकल्यास तो गुन्हा ठरणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष के. मुहंमद यांनी दिली.

- पाणी हा जगण्यासाठी आवश्‍यक घटक आहे. बाहेर किंवा प्रवासात जाताना बहुतेक जण पाण्याची बाटली जवळ ठेवतो; पण बाहेरचे पाणी पिण्याची वेळ आली तर अनेकदा पाणी कसे असेल, याबद्दल साशंकता मनात निर्माण होते. म्हणूनच, स्वच्छ पाण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा वापर सर्रास होता. यातूनच पाण्याच्या विक्रीत नफेखोरी होताना दिसते.

- या गोष्टी टाळण्यासाठी केरळ सरकारने बाटलीबंद पाण्याचा समावेश जीवनावश्‍यक वस्तू कायद्यामध्ये केला आहे. तेथे पाण्याच्या एका लिटरच्या बाटलीची किंमत सध्या २० रुपये असून ती सात रुपयांनी कमी करण्याचा निर्णय राज्यातील डाव्या आघाडीच्या सरकारने घेतला आहे. त्यामुळे १३ रुपयांपेक्षा जास्त किमतीला पाण्याची बाटली विकू नये, असा आदेश नागरी अन्नपुरवठा विभागाने दिला आहे. याशिवाय बाटल्यांवर नवी किंमत छापण्याचीही सक्ती केली आहे.

- बाटलीबंद पाण्यासाठी अव्याच्यासवा किंमत आकारली जात असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून आल्याने सरकारने हे पाऊल उचलून माफत दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला.

- खरे तर सरकारने दोन वर्षांपूर्वीच पाण्याच्या एका लिटरच्या बाटलीची किंमत ११ ते १२ रुपयापर्यंत खाली आणली होती. मात्र त्याला बाटलीबंद पाण्याच्या उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने ही योजना बारगळी होती.

- केरळ बाटलीबंद पाणी उत्पादक संघटनेचे म्हणणे असे आहे की, पाण्याच्या बाटलीची विक्री १२ रुपयांनी करण्याची तयारी त्यांनी दोन वर्षांपूर्वीच दाखविली होती; पण संघटनेच्या काही सदस्यांनी त्याला विरोध दर्शविला होता. ‘‘११-१२ रुपयांना पाण्याची बाटली विकण्याच्या प्रस्तावास स्थानिक व्यापाऱ्यांनीही विरोध केला होता. आता बाटलीबंद पाण्याचा समावेश जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये केल्याने किंमत कमी करणे शक्य झाले आहे,’’ असे अन्नधान्य व नागरी पुरवठा मंत्री पी. तिलोत्तमन यांनी सांगितले.

- सोड्याचा परवाना अन् पाण्याचे उत्पादन
- पाणी शुद्धीकरणाचे २२० अधिकृत प्रकल्प केरळमध्ये आहेत. याशिवाय २०० बेकायदा कारखानेही सुरू आहेत. त्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे. बाटलीबंद पाण्याचा प्रकल्प सुरू करण्यासाठी विविध प्रकारचे १२ परवाने आवश्‍यक आहेत; पण अन्नसुरक्षा विभागाकडून सोडा निर्मितीचा परवाना मिळविल्यानंतर काही कारखानदार कमी गुणवत्तेच्या बाटलीबंद पाण्याचे उत्पादन आणि विक्री करीत असल्याचे आढळले आहे
———————————————

शस्त्र आयातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर

▪️आयत
- सौदी अरब अव्वल, चीन पाचव्या स्थानी, शस्त्र आयातीत भारत आता जगातील सर्वात मोठा देश राहिला नाही. सौदी अरेबिया शस्त्र आयातीत अव्वल स्थानी आहे तर भारत दुसऱ्या स्थानी. या यादीत मिस्त्र तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया चौथ्या तर चीन पाचव्या स्थानावर आहे.
-  सौदी अरब अव्वल, चीन पाचव्या स्थानी
- शस्त्र आयातीत भारत आता जगातील सर्वात मोठा देश राहिला नाही. सौदी अरेबिया शस्त्र आयातीत अव्वल स्थानी आहे तर भारत दुसऱ्या स्थानी. या यादीत मिस्त्र तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया चौथ्या तर चीन पाचव्या स्थानावर आहे. हे अव्वल पाच देश जगातील एकूण शस्त्र आयातीच्या ३६ टक्के आयात करतात.

▪️निर्यात
- शस्त्रांच्या आयात निर्यातीवर लक्ष ठेवणाऱ्या स्टॉकहोमच्या सिप्री संस्थेने २०१५ ते २०१९ दरम्यान शस्त्र खरेदी व विक्री व्यवसायाची आकडेवारी एका अहवालातून सादर केली आहे. जगात सध्याच्या घडीला अमेरिका सर्वाधिक शस्त्रनिर्यात करतो. त्यापाठोपाठ रशिया, फ्रान्स, जर्मनी व चीन यांचा क्रमांक लागतो.

- नव्या माहितीनुसार पश्चिम आशियाई देश सर्वाधिक शस्त्र खरेदी करीत आहेत. सध्या हैती बंडखोरांसोबत युद्धाचा सामना करीत असलेला सौदी अरेबिया सर्वाधिक शस्त्र आयात करीत आहे. शस्त्र निर्यातीच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अमेरिका व फ्रान्सने आघाडी घेतली आहे. अमेरिकेच्या एकूण निर्यातील २३ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.

-जगातील एकूण शस्त्रनिर्यातीत आता अमेरिकेचा वाटा ३६ टक्के येवढा आहे. २०१५-१९ दरम्यान अमेरिकेचा शस्त्रनिर्यात व्यवसाय दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सच्या तुलनेत ७६ टक्क्यांनी जास्त आहे. अमेरिका जगातील ९६ देशांना शस्त्रांचा पुरवठा करीत आहे.

▪️राफेलने फ्रान्सला फायदा, रशियाला धक्का

- महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेच्या एकूण निर्यातीमध्ये अर्धा वाटा पश्चिम आशियाई देशांचा आहे. त्यातही अर्धा वाटा एकट्या सौदी अरबने खरेदी केला आहे. सौदी अरबने एकूण शस्त्रास्त्र विक्रीच्या १२ टक्के शस्त्रांस्त्रांची खरेदी केली आहे.

- सौदी अरबला सर्वाधिक शस्त्रांची विक्री अमेरिकेने केली आहे. भारताची राफेल खरेदी व मिस्त्र व कतारने शस्त्रास्त्र खरेदी केल्याने फ्रान्सच्या शस्त्रास्त्र निर्यातीत मोठी वाढ झाली आहे.
———————————————

संयुक्त गट - ब जाहिरातीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा...!

● जाहिरात पडताच बऱ्याच विध्यार्थी मित्रांच्या चर्चा रंगल्या आहेत.

● काही विध्यार्थी मित्रांचा मनात आनंद आहे की ऍड पडली व काही विध्यार्थी चिंतेत आहेत की कोणत्या परिक्षेवर फोकस करायचा....

● या पोस्ट साठी एवढ्या जागा पडल्या, त्या पोस्ट साठी तेवढ्या जागा पडल्या.....

● या वेळेला या पोस्टचा कमी जागा पडल्या, त्या पोस्ट साठी जास्त जागा आहेत....

● राज्यसेवाची तयारी करायची का Combine ची तयारी करायची....

● यावेळेस पेपर सोपा असेल का अवघड... कोणत्या Subject ला जास्त लक्ष दिले जावे....

❇️ या सर्वा प्रश्नचे किंवा चिंतेचे खूप सोपे उत्तरे आहेत...

❌ सर्वात पहिले जाहिराती बद्दल चिंता करणे सोडा....

✅ जाहिरातीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा...

❌ कोणत्या पोस्ट साठी किती जागा आहेत याचा विचार करणे सोडा...

🥳 असा विचार करा की, कमीत कमी MPSC जागा तर काढत आहे, महापोर्टल प्रमाणे भ्रष्टाचार तर नाही करत....

🧐 काही आगावू विध्यार्थी दुसऱ्यास भेडवण्यासाठी, तुम्हास अभ्यासापासून दूर करत असतात.... हे समजून घ्या.... (आगावू विद्यार्थी स्वतः अभ्यास करतात व इतरांना अभ्यासापासून दूर ठेवतात)

⏰ अभ्यासाचे वेळापत्रक बनवा व प्रामाणिक पणे अभ्यास करा ( प्रामाणिक हे स्वतः शी असले पाहिजे)

😎 स्मार्ट प्रकारे अभ्यास करा, जेणेकरून तुम्ही इतरांपेक्षा लवकर पोस्ट काढू शकाल ( शॉर्ट ट्रिक्स प्रमाणे अभ्यास केल्यास लवकर यश मिळेल)

♻️ राज्यसेवा व combine चे काही subject समान आहेत त्यामुळे तुम्ही दोन्ही परीक्षा वेवस्थित रित्या उत्तीर्ण होऊ शकतात....

🎁 सर्वात महत्त्वाचे :- 800 जागा आहेत का 900 या कडे लक्ष न देता, "यातील एक जागा फिक्स माझी आहे...!" असा दृष्टिकोन ठेवा....

All the very Best..... 👍👍

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

१】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेवठ चे भाषण कोठे झाले?

A】 कुशीनगर

B】 सारनाथ

C】 मुंबई

D】 दिल्ली

उत्तर:- B

२】 श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचा जन्म केंव्हा झाला?

A】 १७ मार्च १८६३

B】 १५ मार्च १८६५

C】 २० मार्च १८६७

D】 ०४ मार्च १८६१

उत्तर:- A

३】 भारतीय संविधानाची अमलबजावणी  कोणत्या दिवसापासून करण्यात आली?

A】 २६ नोव्हेंबर १९४९

B】 १५ ऑगस्ट १९४७

C】 २६ जानेवारी १९५०

D】 यापैकी नाही

उत्तर:- C

४】 भारताची राज्यघटना लिहिण्यास कोणत्या दिवसापासून सुरुवात झाली?

A】 २५ डिसेंबर १९४७

B】 २५ नोव्हेंबर १९४५

C】 २५ नोव्हेंबर १९४६

D】 २५ जानेवारी १९४७

उत्तर:- C

५】 सिद्धार्थ गौतमाने कोणत्या पौर्णिमेस सुजाताकडून अन्नग्रहण केले?

A】 चैत्र पोर्णिमा

B】 वैशाख पोर्णिमा

C】 आषाढ पौर्णिमा

D】श्रावण पोर्णिमा

उत्तर:- A

६】 संत कबीर हे कोणत्या राज्यातील होते?

A】 कर्नाटक

B】 महाराष्ट्र

C】 मध्यप्रदेश

D】 उत्तरप्रदेश

उत्तर:- D

७】पीपल्स एज्यूकेशनची  स्थापना कधी झाली?

A】 १९४५

B】 १९४८

C】 १९४२

D】 १९५२

उत्तर:- A

गालफुगी


गालगुंड किंवा गालफुगी(Mumps) हा सर्वसाधारणपणे लहान मुलांच्या लाळ ग्रंथींना होणारा विषाणूजन्य आजार आहे. बहुधा दोन्ही गालामध्ये येणारी दुखरी सूज हे त्याचे लक्षण. एका गालास आलेली सूज आणि सूज ना येणे अशी दोन्ही पर्याय कधी कधी आढळतात. पॅरोटायटिस असे त्याचे इंग्रजी नाव आहे. गालामधील लाळग्रंथीना पॅरोटिड ग्लँड असे म्हणतात. त्यामुळे हे नाव. त्याचे मम्स हे नाव ओल्ड इंग्लिशमध्ये गालामधील फुगण्याला वापरलेल्या शब्दावरून आले आहे.

वर्णनसंपादन करा

झपाट्याने संसर्ग होणारा हा आजार शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरतो. गालफुगी हा गोवराइतका संसर्गजन्य नाही. एके काळी गालफुगी हा सामान्यपणे सर्वत्र आढळणारा आजार होता. सार्वत्रिक लसीकरणानंतर याचे प्रमाण कमी झाले आहे. चार ते सात या वयात तो साधारणपणे आढळतो. भारतातील दर एक लाख मुलांमधील त्याचे १९४१ मधील प्रमाण दररोज २५० नवे रुग्ण असे होते. गालफुगीच्या लसीचा वापर सुरू झाल्यानंतर हे प्रमाण ७६ एवढे कमी झाले. गालफुगीची लस प्रचलित झाल्याने गालफुगीच्या रुग्णामध्ये खूपच घट झाली. १९८७मध्ये काही राज्यांमध्ये गालफुगीच्या रुग्णामध्ये पाच पटीने वाढ झाली होती. याचे कारण शाळेमध्ये लसीकरणामध्ये झालेले दुर्लक्ष. १९९६ पासून शाळेतील मुलांमध्ये १००% लसीकरणाची मोहीम राबवल्याने सीडीसी (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल- यू एस ) च्या रिपोर्ट प्रमाणे देशभरात फक्त ७५१ नवे रुग्ण आढळले. (दर पन्नास लाखात एक ).

कारण आणि लक्षणेसंपादन करा

पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या लाळेमधील विषाणूमुळे गालगुंड होतो. गालगुंड झालेल्या व्यक्तीच्या शिंकणे आणि खोकल्यामधून याचा प्रसार होतो. एकदा व्यक्ती विषाणूच्या संपर्कात आली म्हणजे बारा ते पंधरा दिवसाने गालगुंडाची लक्षणे दिसतात. संसर्गाची प्राथमिक लक्षणे म्हणजे थंडी वाजून येणे, डोकेदुखी, भूक ना लागणे आणि निरुत्साह. कधी कधी संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये यातील कोणतेही लक्षण दिसत नाही. लक्षणे दिसू लागल्यानंतर बारा ते चोवीस तासात गालगुंड झाल्याचे आढळते. अन्न चावण्यास आणि गिळण्यास त्रास होतो. त्यातल्या त्यात आम्लयुक्त पदार्थ गिळताना अधिक त्रास होतो. ताप ४० सें (१०४ फॅ) पर्यंत असतो. दुसऱ्या दिवशी गालाची सूज वाढते. सातव्या दिवशी सूज पूर्णपणे उतरते. एकदा गालगुंड झाले म्हणजे रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि परत गालगुंडाचा त्रास होत नाही. बहुतेक रुग्णामध्ये होणारा आजार गुंतागुंतीशिवाय बरा होतो. आजार मोठ्या व्यक्तीस झाला म्हणजे गुंतागुंत होण्याची शक्यता असते. १५% रुग्णामध्ये मेंदू आणि मज्जारज्जूचा दाह- मेनेंजायटिस होतो.

डेंग्यू ताप

लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात​.

एकदम जोराचा ताप चढणे

डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे

डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते

चव आणि भूक नष्ट होणे

छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे

मळमळणे आणि उलट्या

त्वचेवर व्रण उठणे

२) डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ)

हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्राव - चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्राव, अंतर्गत रक्तस्राव-आंतड्यांमधून रक्तस्राव, प्लेटलेट्‌सची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणेच असतात.

तीव्र, सतत पोटदुखी

त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे

नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे

रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे

झोप येणे आणि अस्वस्थता

रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडते

नाडी कमकुवतपणे जलद चालते

श्वास घेताना त्रास होणे

३) डेंग्यू अतिगंभीर आजार

ही डेंग्यू रक्तस्राराच्या तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्येच ही दिसून येते. यात रुग्णाचे अस्वस्थ होणे, थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढवू शकतो.

-लक्षणांमध्ये उच्च ताप, डोकेदुखी, पुरळ आणि स्नायू आणि संयुक्त वेदना यांचा समावेश आहे. गंभीर प्रकरणांमध्ये गंभीर रक्तस्त्राव आणि शॉक आहे, जे जीवघेणा धोकादायक असू शकते. -ताप आणि वेदनादायक डोकेदुखी अचानक अचानक सुरू झाल्यामुळे ही फ्लूसारखी गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. इतर लक्षणामध्ये त्वचेवर पुरळ, स्नायू आणि संयुक्त वेदना, मळमळ आणि उलट्या समाविष्ट होतात. अत्यंत प्रकरणांमध्ये, अत्याधिक रक्तस्राव (रक्तस्राव) आणि मृत्यू होऊ शकतो.

रेबिज


रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी (विशेषतः की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
------------------------------------------------------

स्वाईन फ्ल्यू संकलित माहिती

स्वाइन फ्लू रोगाची लक्षणे

हा एक लेख स्वाईन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाईन फ्लू/स्वाईन फ्ल्यू असेही म्हटले जाते.

आजाराची कारणे

स्वाईन इन्फ्लूएन्झा किंवा स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा ह्या रोगाचा एक प्रकार आहे ; हा सामान्यतः डुक्करामध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. डुक्करांमध्ये सतत वावरणाऱ्या माणसाला ह्या विषाणूची बाधा होऊ शकते. स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे, ार्थात तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसारित होऊ शकतो.

डुकराचे शिजवलेले मांस खाण्याचा या रोगाशी संबध नाही. त्या प्रमाणेच भारतात २००९मधील स्वाइन इन्फ्लूएन्झाची साथसुद्धा भारतातील डुकरांमुळे आलेली नव्हती, तर ती अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील डुकरांपासून सुरू झलेलि होती.

संसर्ग

स्वाईन फ्लू या रोगाचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे होतो. याचा संसर्ग माणसाद्वारे सुद्धा होतो. रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम वा त्याची थुंकी यांमधून या विषाणूंचा प्रसार होतो. स्वाईन फ्लूचे विषाणू हे हवेत साधारणतः 8 तास जीवंत राहतात.

आजाराची लक्षणे

ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची काही लक्षणे आहेत. टॅमी फ्ल्यू हे औषध एच-१ एन-१ च्या विषाणूच्या संसर्गावर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. या औषधाचा भारत सरकारकडे पुरेसा साठा असतो. तथापि, या औषधांचा वापर या विषाणूंचा संसर्ग झाल्याचे नक्की झाल्यावरच होणे आवश्यक आहे. या औषधास विषाणूंकडून प्रतिरोध निर्माण होऊ नये यासाठी शासन ही काळजी घेत असते.

टॅमी फ्ल्यू याा गोळ्यांशिवाय , एन ९५, मास्क आणि सर्जिकल मास्क वगैरे वैयक्तिक संरक्षक साधनांचा पुरेसा साठा भारत सारकारकडे असतो. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तसेच बंदरांवर येणाऱ्या परदेशी प्रवाशांची तपासणी वैद्यकीय पथकांच्या साहाय्याने करण्यात येते. २०१४ साली हा आजार महाराष्ट्रातही आला असून पुणे-मुंबईमध्ये आणि नाशिक जिल्ह्यामधील चांदवड, निफाड व मनमाड येथेही या रोगाचे रुग्ण सापडले आहेत.

आजार कसा टाळावा ?

१. हात नेहमी साबण-पाण्याने धुवावेत.

२. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे.

३. स्वाईन फ्ल्यू रुग्णापासून किमान एक हात तरी दूर राहावे.

४. खोकताना- शिंकताना तोंडाला रुमाल लावावा.

५. भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी.

६. पौष्टिक आहार घ्यावा.

७. हस्तांदोलन करण्याचे अथवा आलिंगन देण्याचे, व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे.

८. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.

९. आजारी असल्यास शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवावा व घरीच विश्रांती घ्यावी.

१०. आहारात पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यावेत. . ११. तोंडावर मास्क लावावा.

उपचारानंतर दहा दिवसांत रुग्ण बरा होऊ शकतो.

रोग निदान, विषाणू तपासणी

स्वाईन फ्ल्यूचे प्राथमिक निदान लक्षणांवर आधारित आहे. निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा लागतो.रुग्णाच्या विषाणू तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), पुणेव राष्ट्रीय संचारी रोग संस्था ("नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस'-एनआयसीडी), दिल्ली येथे प्रयोगशाळा तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे.

उपचार

कोणत्याही खासगी वैद्यकांना, खासगी डॉक्टरांना अथवा खासगी रुग्णालयांची स्वाईन फ्लूवर उपचार करण्याची क्षमता नसून, त्यांना तशी परवानगीही नाही. या रोगाचे उपचार राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष अथवा मान्यताप्राप्त शासकीय रुग्णालयातच उपलब्ध असतात, आणि तसे ते शासकीय रुग्णालयातूनच घेणे बंधनकारक आहे.जर एखादी व्यक्ती या रोगाने आजारी असेल, विषाणू प्रतिबंधक औषधे त्याचे आजार काही प्रमाणात कमी करू शकतात व त्यामुळे रोग्यास लवकर बरे वाटू शकते. लवकरात लवकर (लक्षणे दिसून आल्यावर दोन दिवसात) उपचार सुरु केल्यास, औषधांचा खूप फायदा होतो. विषाणू प्रतिबंधक लस घेण्याखेरीज घरात अथवा इस्पितळात पूरक देखभाल केल्यास ताप कमी होऊ शकतो तसेच यातना कमी होऊ शकतात. त्याप्रमाणेच, माध्यमिक संक्रमण व इतर आरोग्यविषयक समस्या ओळखू येतात.

प्रतिबंधक लस

या रोगाच्या विविध प्रकारांना प्रतिबंध करणाऱ्या विविध लसी उपलब्ध आहेत.
१५ सप्टेंबर २००९ ला अमेरिकन एफडीए ने स्वाइन फ्ल्यूसाठी पहिली लस प्रामाणित केली.
ती घेतली की १० दिवसांत शरीरामध्ये प्रतिबंधक रसायने तयार होतात.
अध्ययनातून असे लक्षात आले की, या लसी परिणामकारक तसेच सुरक्षितही आहेत.स्कॉटलंडमध्ये (२५डिसेंबर२००९ पूर्वी) लस घेतलेल्या २,४८,००० लोकांचे सर्वेक्षण केल्यावर असे लक्षात आले की, ९५% लोकांवर तिचा परिणाम झाला आहे

Latest post

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.

१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४  - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...